शाळेचा निरोपसमारंभ मराठी निबंध
Nirop Samarambha Essay Marathi



नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण शाळेचा निरोपसमारंभ मराठी निबंध बघणार आहोत.शाळा म्‍हटली की सर्वाना आठवण येते त्‍या शाळेतील झालेल्‍या गंमती जमती, शिक्षकांनी आपल्‍या केलेल्‍या तक्रारी, आपण केलेली मौजमजा , बालपणाचा हा काळ कोणीही विसरू शकत नाही . त्‍या अनुशंगाने आपण सविस्‍तर निंबध लेखन करणार आहोत चला तर निबंधाला सुरूवात करूया.

 
शाळेचा निरोप समारंभ जसाजसा जवळ येत होता तशी निरोप समारंभाची आतुरता वाढत होती . आजवर दहा वर्षे या सभागृहात मी अनेक समारंभांसाठी आलो आहे, बसलो आहे, पण कालचा 'निरोपसमारंभ' हा साऱ्या समारंभांपेक्षा खरोखरच आगळावेगळा होता. 


खरं पाहता या समारंभाची आम्ही सर्वजण गेली वर्षभर वाट पाहत होतो. दहावीत आल्यापासून अनेकदा या निरोपसमारंभाविषयी गप्पा निघत, त्यावेळी आमचे अनेक दोस्त 'आपण या समारंभाविषयी अमूक एक बोलणार, अमूक एक सुनावणार' अशा गोष्टी करीत, पण प्रत्यक्ष वेळ आल्यावर काय घडले?


पूर्वपरीक्षेचा निर्णय जाहीर झाल्यावरच शाळेने हा समारंभ आयोजित केला होता. त्यामुळे "प्रत्येकाला अभ्यासात आपण कोठे आहोत?" हे उमगले होते. “उरलेल्या एका महिन्यात आपण काय करणे आवश्यक आहे" हेच विचार सर्वांच्या मनात गर्दी करून होते. 


निरोपसमारंभाच्या दिवशी आम्हांला सुटी दिली गेली होती आणि ठीक पाच वाजता शाळेत बोलाविले होते. गणवेषाचीही सक्ती नव्हती. किंबहुना आज कोणत्याही नियमाचे बंधन आमच्यावर नव्हते. कारण आजच्या समारंभाचे आम्ही पाहुणे होतो.

nirop-samarambha-essay-marathi


सवयीप्रमाणे पंधरा मिनिटे आधी, म्हणजे पावणेपाचला शाळेत गेलो. रोजची परिचयाची शाळा आज वेगळीच भासत होती. प्रवेशद्वारात भलीमोठी रांगोळी काढली होती आणि सारे गुरुजन आमच्या स्वागतासाठी उभे होते. या स्वागतानेच आम्ही सारे भारावून गेलो. 


सभागृहात पाऊल टाकले तर ते सभागृह आज नव्या नवलाईने नटलेले दिसत होते. आजवर ज्यांनी शाळेस उत्कृष्ट यश मिळवून दिले अशा विदयार्थ्यांची छायाचित्रे मुख्याध्यापकांनी सभोवताली स्टँडवर लावून ठेवली होती. 


केवढी कल्पकता होती यांत! या साऱ्या प्रतिमा आम्हांला प्रेरणा देत होत्या तुम्हांलाही असेच यश मिळवायचे आहे, शाळेचा लौकिक वाढवायचा आहे, असेच जणू त्या आम्हांला सांगत होत्या. निशिगंधाची व गुलाबाची फूले जागोजागी लावल्याने सारे वातावरण कसे सुगंंधित झाले होते. समोरच्या फलकावर एक अर्थपूर्ण कविता लिहिली होती, ती आमच्याच एका शिक्षिकेने केलेली होती. कविता वाचताच आठवले ते त्या बाई शाळेत नवीन आल्या होत्या तो दिवस. किती त्रास दिला होता त्यांना आम्ही! उगाचच, अगदी वाहयातपणा म्हणून. पण पुढे त्यांनी आपल्या उत्कृष्ट शिकविण्याने आम्हांला जिंकून घेतले होते.



ठरल्यावेळी कार्यक्रमाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी समारंभाचे अध्यक्ष होते. पाहुण्यांची ओळख मुख्याध्यापकांनी करून दिली तेव्हा एक सुखद धक्का बसला. कारण ते अधिकारी आमच्याच शाळेचे 'माजी विदयार्थी' होते व त्यांचे नाव शाळेच्या सन्माननीय विदयार्थ्यांत झळकत होते.


निरोपसमारंभाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे आजच्या समारंभात भाषणांची आतिषबाजी नव्हती. मोजक्या शब्दांत मुख्याध्यापकांनी आमच्या बॅचने मिळविलेल्या गेल्या दहा वर्षांतील यशाचा आढावा घेतला. इतिहासाच्या सरांनी चटकदार शैलीत मागच्या काही सुखद आठवणींची उजळणी केली, तर संस्कृतच्या गुरुजींनी  आम्हांला परीक्षेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. पाहुण्यांनीही अगदी मोजक्या शब्दांत आपल्या जीवनातील यशाचे श्रेय शाळेकडे कसे जाते हे विनम्रपणे सांगितले. 



नंतर विदयार्थी आणि शिक्षक यांच्याकडून एकमताने निवड झालेल्या आदर्श विदयार्थ्यांचा सत्कार पाहण्यांतर्फे करण्यात आला. नंतर विदयार्थ्यांना भाषण करण्यास पाचारण करण्यात आले. पण नेहमी सभा गाजविणारे सारे वीर आज गप्प झाले होते. भारावलेल्या कंठांतून शब्द फुटेनात. सारेच वातावरण गंभीर झाले. म्हणून काही गमतीदार खेळ सुरू करण्यात आले व नंतर अल्पोपहाराचा कार्यक्रम होऊन समारंभ संपला..


समारंभ संपला तरी आज आमचे पाय शाळेतून बाहेर पडत नव्हते. त्या वास्तूत अनेक आठवणी दडलेल्या होत्या. नेहमी अगदी वायातपणे वागणारे विदयार्थीही गुरुजनांना वाकून वंदन करीत होते,  कोणताही निरोपसमारंभ हा असा हेलावून टाकणाराच असतो.


तुमच्‍या शाळेतील निरोप समारंभातील आठवणी तुम्‍ही खाली कमेंट मध्‍ये व्‍यक्त करू शकतात मित्रांनो तुम्‍हाला शाळेचा निरोपसमारंभ मराठी निबंध,nirop samarambha essay marathi हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 2

शाळेतील निरोप समारंभ मराठी निबंध | Shaletil Nirop Samarambha Essay Marathi


आज शाळेतील शेवटचा दिवस. मनात विचारांचे काहूर ऊठले. आज खरेच आपण ह्या शाळामातेचा निरोप घेणार? ह्या मातेनेच मला अक्षरे गिरवायला शिकवले, गणितातील अंकांशी ओळख करून दिली, अनेक संतांची महती सांगितली. या शाळेमुळेच माझी शास्त्रज्ञांशी ओळख झाली. नव्हे; या जगाशीच ओळख झाली. आलो, तेव्हा मी म्हणजे एक मातीचा गोळा होतो. आज त्या गोळ्याने आकार घेतलाय. ते सारे माझे गुरुजन, ते मित्र, ती स्नेहसंमेलने, त्या स्पर्धा, तो बक्षीस-समारंभ, कधी कौतुक, तर कधी शिक्षा ! खरेच किती आणि कसा भुर्रकन गेला तो काळ. 


मी भूतकाळातील माणिक-मोती शोधत होतो. एकदम भानावर आलो, ते टाळ्यांच्या आवाजाने. सर्व सभागृह दहावीच्या मुलांनी भरले होते. मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकवृंद सभागृहात दाखल  झाले. कार्यक्रमाची सुरुवात झाली. एवढी वर्षे ज्या प्रार्थनेने शालेय अभ्यासाची सुरुवात व्हायची, ती प्रार्थना सर्वांनी म्हटली. आजची प्रार्थना धीरगंभीर वाटली. 


मुख्याध्यापकांनी सर्वांचे स्वागत केले. सुरूवात झाली ती त्यांच्याच भाषणाने. आज त्यांच्या भाषणात पित्याची माया होती. भावनेचा ओलावा होता. कमंडलूतल्या माशाला कधीतरी महासागरात जावेच लागते. या त्यांच्या वाक्याने मन घट्ट करावे लागले. वस्तुस्थितीची जाणीव झाली.


सर्ववर्गांच्या वर्गशिक्षकांनी आम्हाला भावी आयुष्यासाठी मोलाचा सल्ला व शुभेच्छा दिल्या. आमच्या सरांनी कविता वाचून दाखविली -
"माहीत होते, जाल उडुनिया दोन दिसांनंतर,
- नव्हते ठाऊक असे वियोगी उलेल हे अंतर."

सरांचे डोळे पाणावले. आम्हालाही गलबलून आले. वातावरण गंभीर बनले. सर्वांच्याच भावना तरल बनल्या होत्या. वाटले, 'वियोगाचा प्रत्येक क्षण असाच कातर असतो का?' काही विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त करणारी, काही आठवणी सांगणारी भाषणे केली. मलाही वाटत होते की, आपणही आपल्या हृद्य आठवणी सांगाव्यात, कृतज्ञता व्यक्त करावी; पण माझे शब्दच जणू गोठून गेले होते.

कार्यक्रम संपन्न झाला. शाळामातेने दिलेला प्रेमाचा घास आम्ही सर्वांनी खाल्ला. स्मृती राहण्यासाठी वर्गातील सर्व विद्यार्थी व शिक्षक, असा फोटो काढला. पाऊले जड झाली होती. शाळेच्या मातीतून पाय निघत नव्हता. सर्व शिक्षकांना भेटलो. शाळामातेला डोळे भरून पाहिले. कृतज्ञतेचे दोन अश्रू गालांवरून ओघळले. खरे तर मोठ्या विश्वात प्रवेश करण्यासाठी प्रवासाला निघालोय. 


शाळामातेने बरोबर ज्ञानशिदोरी, संस्कार दिलेय, ते घेऊन निघालो. निघताना निश्चय केला, “शाळेने दिलेले ते ज्ञानाचे रोप आपणही रुजवायचं.” निरोप घेतला नि एकदाही मागे वळून न बघता घराचा रस्ता धरला.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद

वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते.
  • शाळेचा निरोप समारंभ भाषण मराठी
  • कॉलेज निरोप समारंभ निबंध
  • कनिष्ठ महाविद्यालयाचा निरोप घेताना मराठी निबंध
  • निरोप समारंभ मनोगत भाषण

शाळेचा निरोपसमारंभ मराठी निबंध | Nirop Samarambha Essay Marathi

शाळेचा निरोपसमारंभ मराठी निबंध
Nirop Samarambha Essay Marathi



नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण शाळेचा निरोपसमारंभ मराठी निबंध बघणार आहोत.शाळा म्‍हटली की सर्वाना आठवण येते त्‍या शाळेतील झालेल्‍या गंमती जमती, शिक्षकांनी आपल्‍या केलेल्‍या तक्रारी, आपण केलेली मौजमजा , बालपणाचा हा काळ कोणीही विसरू शकत नाही . त्‍या अनुशंगाने आपण सविस्‍तर निंबध लेखन करणार आहोत चला तर निबंधाला सुरूवात करूया.

 
शाळेचा निरोप समारंभ जसाजसा जवळ येत होता तशी निरोप समारंभाची आतुरता वाढत होती . आजवर दहा वर्षे या सभागृहात मी अनेक समारंभांसाठी आलो आहे, बसलो आहे, पण कालचा 'निरोपसमारंभ' हा साऱ्या समारंभांपेक्षा खरोखरच आगळावेगळा होता. 


खरं पाहता या समारंभाची आम्ही सर्वजण गेली वर्षभर वाट पाहत होतो. दहावीत आल्यापासून अनेकदा या निरोपसमारंभाविषयी गप्पा निघत, त्यावेळी आमचे अनेक दोस्त 'आपण या समारंभाविषयी अमूक एक बोलणार, अमूक एक सुनावणार' अशा गोष्टी करीत, पण प्रत्यक्ष वेळ आल्यावर काय घडले?


पूर्वपरीक्षेचा निर्णय जाहीर झाल्यावरच शाळेने हा समारंभ आयोजित केला होता. त्यामुळे "प्रत्येकाला अभ्यासात आपण कोठे आहोत?" हे उमगले होते. “उरलेल्या एका महिन्यात आपण काय करणे आवश्यक आहे" हेच विचार सर्वांच्या मनात गर्दी करून होते. 


निरोपसमारंभाच्या दिवशी आम्हांला सुटी दिली गेली होती आणि ठीक पाच वाजता शाळेत बोलाविले होते. गणवेषाचीही सक्ती नव्हती. किंबहुना आज कोणत्याही नियमाचे बंधन आमच्यावर नव्हते. कारण आजच्या समारंभाचे आम्ही पाहुणे होतो.

nirop-samarambha-essay-marathi


सवयीप्रमाणे पंधरा मिनिटे आधी, म्हणजे पावणेपाचला शाळेत गेलो. रोजची परिचयाची शाळा आज वेगळीच भासत होती. प्रवेशद्वारात भलीमोठी रांगोळी काढली होती आणि सारे गुरुजन आमच्या स्वागतासाठी उभे होते. या स्वागतानेच आम्ही सारे भारावून गेलो. 


सभागृहात पाऊल टाकले तर ते सभागृह आज नव्या नवलाईने नटलेले दिसत होते. आजवर ज्यांनी शाळेस उत्कृष्ट यश मिळवून दिले अशा विदयार्थ्यांची छायाचित्रे मुख्याध्यापकांनी सभोवताली स्टँडवर लावून ठेवली होती. 


केवढी कल्पकता होती यांत! या साऱ्या प्रतिमा आम्हांला प्रेरणा देत होत्या तुम्हांलाही असेच यश मिळवायचे आहे, शाळेचा लौकिक वाढवायचा आहे, असेच जणू त्या आम्हांला सांगत होत्या. निशिगंधाची व गुलाबाची फूले जागोजागी लावल्याने सारे वातावरण कसे सुगंंधित झाले होते. समोरच्या फलकावर एक अर्थपूर्ण कविता लिहिली होती, ती आमच्याच एका शिक्षिकेने केलेली होती. कविता वाचताच आठवले ते त्या बाई शाळेत नवीन आल्या होत्या तो दिवस. किती त्रास दिला होता त्यांना आम्ही! उगाचच, अगदी वाहयातपणा म्हणून. पण पुढे त्यांनी आपल्या उत्कृष्ट शिकविण्याने आम्हांला जिंकून घेतले होते.



ठरल्यावेळी कार्यक्रमाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी समारंभाचे अध्यक्ष होते. पाहुण्यांची ओळख मुख्याध्यापकांनी करून दिली तेव्हा एक सुखद धक्का बसला. कारण ते अधिकारी आमच्याच शाळेचे 'माजी विदयार्थी' होते व त्यांचे नाव शाळेच्या सन्माननीय विदयार्थ्यांत झळकत होते.


निरोपसमारंभाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे आजच्या समारंभात भाषणांची आतिषबाजी नव्हती. मोजक्या शब्दांत मुख्याध्यापकांनी आमच्या बॅचने मिळविलेल्या गेल्या दहा वर्षांतील यशाचा आढावा घेतला. इतिहासाच्या सरांनी चटकदार शैलीत मागच्या काही सुखद आठवणींची उजळणी केली, तर संस्कृतच्या गुरुजींनी  आम्हांला परीक्षेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. पाहुण्यांनीही अगदी मोजक्या शब्दांत आपल्या जीवनातील यशाचे श्रेय शाळेकडे कसे जाते हे विनम्रपणे सांगितले. 



नंतर विदयार्थी आणि शिक्षक यांच्याकडून एकमताने निवड झालेल्या आदर्श विदयार्थ्यांचा सत्कार पाहण्यांतर्फे करण्यात आला. नंतर विदयार्थ्यांना भाषण करण्यास पाचारण करण्यात आले. पण नेहमी सभा गाजविणारे सारे वीर आज गप्प झाले होते. भारावलेल्या कंठांतून शब्द फुटेनात. सारेच वातावरण गंभीर झाले. म्हणून काही गमतीदार खेळ सुरू करण्यात आले व नंतर अल्पोपहाराचा कार्यक्रम होऊन समारंभ संपला..


समारंभ संपला तरी आज आमचे पाय शाळेतून बाहेर पडत नव्हते. त्या वास्तूत अनेक आठवणी दडलेल्या होत्या. नेहमी अगदी वायातपणे वागणारे विदयार्थीही गुरुजनांना वाकून वंदन करीत होते,  कोणताही निरोपसमारंभ हा असा हेलावून टाकणाराच असतो.


तुमच्‍या शाळेतील निरोप समारंभातील आठवणी तुम्‍ही खाली कमेंट मध्‍ये व्‍यक्त करू शकतात मित्रांनो तुम्‍हाला शाळेचा निरोपसमारंभ मराठी निबंध,nirop samarambha essay marathi हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 2

शाळेतील निरोप समारंभ मराठी निबंध | Shaletil Nirop Samarambha Essay Marathi


आज शाळेतील शेवटचा दिवस. मनात विचारांचे काहूर ऊठले. आज खरेच आपण ह्या शाळामातेचा निरोप घेणार? ह्या मातेनेच मला अक्षरे गिरवायला शिकवले, गणितातील अंकांशी ओळख करून दिली, अनेक संतांची महती सांगितली. या शाळेमुळेच माझी शास्त्रज्ञांशी ओळख झाली. नव्हे; या जगाशीच ओळख झाली. आलो, तेव्हा मी म्हणजे एक मातीचा गोळा होतो. आज त्या गोळ्याने आकार घेतलाय. ते सारे माझे गुरुजन, ते मित्र, ती स्नेहसंमेलने, त्या स्पर्धा, तो बक्षीस-समारंभ, कधी कौतुक, तर कधी शिक्षा ! खरेच किती आणि कसा भुर्रकन गेला तो काळ. 


मी भूतकाळातील माणिक-मोती शोधत होतो. एकदम भानावर आलो, ते टाळ्यांच्या आवाजाने. सर्व सभागृह दहावीच्या मुलांनी भरले होते. मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकवृंद सभागृहात दाखल  झाले. कार्यक्रमाची सुरुवात झाली. एवढी वर्षे ज्या प्रार्थनेने शालेय अभ्यासाची सुरुवात व्हायची, ती प्रार्थना सर्वांनी म्हटली. आजची प्रार्थना धीरगंभीर वाटली. 


मुख्याध्यापकांनी सर्वांचे स्वागत केले. सुरूवात झाली ती त्यांच्याच भाषणाने. आज त्यांच्या भाषणात पित्याची माया होती. भावनेचा ओलावा होता. कमंडलूतल्या माशाला कधीतरी महासागरात जावेच लागते. या त्यांच्या वाक्याने मन घट्ट करावे लागले. वस्तुस्थितीची जाणीव झाली.


सर्ववर्गांच्या वर्गशिक्षकांनी आम्हाला भावी आयुष्यासाठी मोलाचा सल्ला व शुभेच्छा दिल्या. आमच्या सरांनी कविता वाचून दाखविली -
"माहीत होते, जाल उडुनिया दोन दिसांनंतर,
- नव्हते ठाऊक असे वियोगी उलेल हे अंतर."

सरांचे डोळे पाणावले. आम्हालाही गलबलून आले. वातावरण गंभीर बनले. सर्वांच्याच भावना तरल बनल्या होत्या. वाटले, 'वियोगाचा प्रत्येक क्षण असाच कातर असतो का?' काही विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त करणारी, काही आठवणी सांगणारी भाषणे केली. मलाही वाटत होते की, आपणही आपल्या हृद्य आठवणी सांगाव्यात, कृतज्ञता व्यक्त करावी; पण माझे शब्दच जणू गोठून गेले होते.

कार्यक्रम संपन्न झाला. शाळामातेने दिलेला प्रेमाचा घास आम्ही सर्वांनी खाल्ला. स्मृती राहण्यासाठी वर्गातील सर्व विद्यार्थी व शिक्षक, असा फोटो काढला. पाऊले जड झाली होती. शाळेच्या मातीतून पाय निघत नव्हता. सर्व शिक्षकांना भेटलो. शाळामातेला डोळे भरून पाहिले. कृतज्ञतेचे दोन अश्रू गालांवरून ओघळले. खरे तर मोठ्या विश्वात प्रवेश करण्यासाठी प्रवासाला निघालोय. 


शाळामातेने बरोबर ज्ञानशिदोरी, संस्कार दिलेय, ते घेऊन निघालो. निघताना निश्चय केला, “शाळेने दिलेले ते ज्ञानाचे रोप आपणही रुजवायचं.” निरोप घेतला नि एकदाही मागे वळून न बघता घराचा रस्ता धरला.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद

वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते.
  • शाळेचा निरोप समारंभ भाषण मराठी
  • कॉलेज निरोप समारंभ निबंध
  • कनिष्ठ महाविद्यालयाचा निरोप घेताना मराठी निबंध
  • निरोप समारंभ मनोगत भाषण