शाळेतील माझा पहिला दिवस मराठी निबंध | Shalecha Pahila Divas In Marathi Essay



NIBANDH 1 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आमच्‍या ब्लॉगवर तुमचे स्‍वागत आहे, आज आपण शाळेतील माझा पहिला दिवस मराठी निबंध | Shalecha Pahila Divas In Marathi Essay या विषयावर निबंध  बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून 5 निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता.
शाळेच्‍या पहील्‍या दिवसाची उत्‍सुकता सर्वानाच असते तेथील वातावरण, इमारत परिसर हे सर्व पहील्‍या दिवशी नवीनच असते, त्‍या परीस्‍थीतीसोबत जुळवुन घेण्‍यात वेगळीच गंमत असते अश्‍याच प्रंसगाचे वर्णन या निबंधात करण्‍यात आले आहे. चला तर मग निबंधाला सुरूवात करूया.    

जीवन म्हणजे एक लांबलचक प्रवासच आहे. आगगाडीतल्या प्रवासासारखा ! अनेक वळणं येतात या प्रवासामध्ये! माझ्या आयुष्यातही असंच एक वळण आलं होतं दहा वर्षांपूर्वी. त्यावेळी मी ६ वर्षांची होते. बालमनाची नाजूक अवस्था! स्वच्छंदपणे मुक्त विहार करणाऱ्या पक्ष्यालाही लाजवेल असं आयुष्य वहात होतं. 

असं माझं अल्लड अवखळ बालपण उपभोगत होते मी ! अन् एके दिवशी 'शाळेत जायचं' हे वारं आमच्याही घरात शिरलं. मुळात मी खूप घाबरले. कारण खूप काहीबाही ऐकलं होतं ना शाळेबद्दल ! तरी आईने नवीन कपडे आणले. बाबांनी बूट आणले. नवीन डबा, वॉटरबॅग, नवीन दप्तर! अन् आमची स्वारी तयार होऊन बाबांचं बोट धरून शाळेत निघाली. 

पण! पण माझं सारं स्वातंत्र्य हिरावून घेणारा होता तो क्षण ! त्या इवल्याशा मनामध्ये भीती अन् आश्चर्य यांचं भांडण  चाललं होतं. प्रथम मला नेलं ते हेडमास्तरांकडे. त्यांना पाहून मला बागुलबुवाची आठवण झाली. माझं नाव विचारल्यावर मी तत्परतेनं सांगितलं. नाव नोंदणी झाली आणि बाबांनी मला माझ्या वर्गात (की कोंडवाड्यात) सोडलं. तिथे आमच्या बाई उभ्या होत्या. किती गोड! हसऱ्या! त्यांच्या त्या नजरेनंच माझ्यात वर्गात पाऊल टाकण्याचं धैर्य झालं. 

पण वर्गात माझं स्वागत झालं ते बावरलेल्या चेहऱ्यांनी आणि हुंदक्यांनी ! काहींनी तर तारसप्तकात सूर लावला होता. झाडाच्या फांदीवर चिमण्या बसाव्यात तशी पोरे बाकावर एकमेकाला बिलगून बसली होती. भित्र्या डोळ्यांनी ससा बघतो तशी आजूबाजूला बघत होती तर काही बांधावरचे कोवळे गवत उघड्या वाऱ्यात कापते ना तशी थरथर कापत होती! थोड्याच वेळात मीही त्यांच्यातलीच बनून गेले.

आता प्रथमच माझी नजर आजूबाजूला गेली. तो काय, मज्जाच मज्जा! मण्यांची खेळणी, चेंडू, ठोकळे, आणखीन बरंच काही. सगळं खेळून आम्ही दमलो. मग मधली सुट्टी झाली. डबा खाल्ला. मग होता झोपायचा तास! मला खूप आवडला. मी मात्र झोपले नाही. किलकिले डोळे करून मजा पाहावी म्हटलं तर सगळी मुले पण माझंच जणू काही अनुकरण करत होती. मग आमच्या बाई परत वर्गात आल्या. त्यांनी आम्हाला खूप छान गोष्ट सांगितली. ससा आणि कासवाची. मी एकदम खूष होऊन गेले शाळेवर! सर्वांत जास्त झोपेच्या तासावर! 

पण काही असो! शाळा जरी मला आवडली तरी सवय नसल्यामुळे कधी एकदा घरी जाईन असं झालं होतं अन् घंटेनं तुरुंगवास संपल्याची आठवण करून देताच मी एखाद्या बऱ्याच वर्षाच्या कैद्याप्रमाणे सुसाट बाहेर पळाले. आनंदाने चेहरा फुलला होता. बघते तो काय, फाटकापाशीच आईवडील! माझ्या चेहऱ्यावरचं प्रतिबिंब त्यांच्या चेहऱ्यावर उमटलं होतं. 

असं माझ्या आयुष्यातलं पहिलं वळण! पण आज मी अशा वळणावर उभी आहे की जिथून विशाल भविष्यकाळाचं क्षितीज पसरलंय, ज्याला कधी अंतच नाही. महाविद्यालयीन शिक्षण माझी वाट पाहत आहे. परंतु आज मात्र मला वाटतं की तो माझा शाळेतला पहिला दिवस म्हणजे माझ्या उज्ज्वल भविष्यकाळाची एक सुंदर रम्य पहाट होती की जिच्यावर भीती आणि आनंद यांची मिश्रित प्रभा फाकली होती.
 


SHALETIL MAZA PAHILA DIVAS
SHALETIL MAZA PAHILA DIVAS

मित्र-मैत्रिणींनो तुमच्‍या जिवनातील शाळेतील पहील्‍या दिवसाचा अनुभव कसा होता हे कमेंट जरूर कळवावे . Shalecha Pahila Divas In Marathi Essay हा निबंध तुम्‍हाला नक्‍की आवडला असेल अशी आशा करतो. खालील क्रमांक २ चा निबंध वाचण्यास  विसरू नका  धन्‍यवाद. 

NIBANDH 2 

माझे बालपण, माझे बालपण अगदी खेडेगावात गेल्यामुळे बालोदयान, शिशुविहार, के. जी. वगैरे शिक्षणक्षेत्रातील पांढरपेशी प्रकार माझ्या वाट्याला कधी आलेच नाहीत. चांगली पाच वर्षे पूर्ण होऊन सहावे लागल्यावर मला शाळेत घालण्यात आले. मे महिन्यात माझा जन्मदिवस असल्याने जूनच्या पहिल्या दिवशी शाळेचे नवीन वर्ष सुरू होताना मी शाळेत जाऊ शकलो.  त्या घटनेला इतकी वर्षे होऊन गेली तरी ती घटना, तो दिवस माझ्या डोळ्यांसमोर जसाचा तसा उभा आहे.


माझा शालेय प्रवेशाचा दिवस पंचांग पाहून ठरविण्यात आला होता. भल्या सकाळीच आमचे गुरुजी आले. थोड्या प्रमाणात होमहवन करण्यात आले आणि मग मी आईवडिलांच्या दृष्टीने शाळेत जाण्यास पात्र ठरलो. तोपर्यंत शाळा म्हणजे काय याची मला काहीच कल्पना नसल्यामुळे मी मोठ्या खुषीत होतो.


घरात चालणाऱ्या विविध समारंभांपैकी हाही एक काहीतरी समारंभ असावा, असे मला वाटत होते. वरणापुरणाचे जेवण झाले. मला नवीन कपडे घालण्यात आले. माझ्या पायांतील चप्पलही नवी कोरी होती. नवे दप्तर, नवी कोरी पाटी, नवी पेन्सिल या नवेपणाच्या धुंदीत बाबांचे बोट धरून मी शाळेच्या दारात केव्हा येऊन पोहोचलो ते मलाच कळले नाही.



एका जुन्या वाड्यात आमची शाळा होती. एका मोठ्या दालनात दोन-दोन वर्ग भरले होते. दोन दालनांत मिळून चार वर्ग होते; आणि दोन गुरुजी शाळा सांभाळत होते. बाबांनी मला गुरुजींच्या स्वाधीन केले आणि बाबा परत फिरले तेव्हा खरोखर मला ब्रहमांड आठवले. बाबांशी बोलताना जो गुरुजींचा आवाज मधाळ वाटत होता, तो बाबांची पाठ फिरल्यावर एकदम कठोर झाला आणि कोपऱ्यात ठेवलेली वेताची छडी गुरुजींनी हातात घेतली.


ते पाहून मला कापरेच भरले. गुरुजी शरीरयष्टीने धिप्पाड होते. डोक्यावरच्या टोपीतून त्यांची शेंडी बाहेर डोकावत होती. खरे पाहता, त्यांची ती शेंडी पाहून मला हसूच येत होते; पण हसण्याचे धाडस नव्हते. उकडत असूनही गुरुजींनी कोट घातला होता. तेव्हापासून माझी पक्की समजत झाली होती की, गुरुजी म्हटले म्हणजे त्यांच्या अंगावर कोट हवाच! मुंबईला प्रशालेत आल्यावर मात्र ही समजूत पुसली गेली.


आमचे हे गुरुजी एकाच वेळी दोन वर्ग सांभाळत होते. एरवी वानराप्रमाणे उड्या मारणारे आम्ही पंचवीसजण गुरुजी वर्गावर आले की शेळीसारखे बसत होतो. गुरुजी सतत फेऱ्या मारीत चौथीच्या वर्गाला गणित घालत होते, तर पहिलीच्या मुलांना शब्द घालत होते. एकाही अक्षराची अदयापि मला ओळख नाही हे समजल्यावर त्यांनी माझ्या बावन्न पिढयांचा उद्धार केला असावा.


तीन-चार तास एका जागी बसण्याची मला सवय नव्हती. अपरिचित जागा, अनोळखी माणसे! भीतीने माझ्या डोळ्यांतून गंगा-यमुना वाह लागल्या; तसे मास्तर कडाडले, "रडायला काय झालंय?" आता फक्त छडीच मारायची उरली होती. डोळयांतले पाणी मी पुसून टाकले आणि मोठ्या निग्रहाने अक्षरे गिरवू लागलो.या घटनेला आज बरीच वर्षे होऊन गेली, तरी तो शाळेतील पहिला दिवस मी विसरू शकत नाही. त्याच छडीच्या धाकाखाली शाळेतील चार वर्षे पार पडली आणि पाचवीसाठी मी शहरात आलो.




मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 3

shalecha pahila divas in marathi Essay


 वाढदिवस आणि सणांच्या व्यतिरिक्त काही महत्त्वपूर्ण दिवस असे असतात जे आपण विसरू शकत नाही. प्रथमच शाळेत जाणे लहान मुलांसाठी खूप रोमांचकारी असते. त्याचा प्रभाव बालकाच्या मनावर पडतो.
जरी मी आज आठवीचा विद्यार्थी असलो तरी शाळेच्या पहिल्या दिवसाचा विचार येताच मन उत्साहित होते. माझी बहीण शारदा मंदिरमध्ये त्यावेळी शिकत होती. ती माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठी आहे. माझ्या आई बाबांनी मला पण त्याच शाळेत घालण्याचा निश्चय केला. जेव्हा मी पाच वर्षांचा झालो तेव्हा माझे नाव त्या शाळेत दाखल करण्यात आले.


पावसाळ्याचे दिवस होते. एके दिवशी सकाळीच आईने मला लवकर उठविले. नित्यकर्मे आटोपल्यावर स्नान करून बरोबर सहा वाजता मी तयार झालो. दूध आणि नाश्ता केला. मी आवडीने शाळेचा गणवेश घातला. नवे बूट मोजे, दफ्तर पाहून मी उत्साहित झालो. माझ्या वडिलांनी मला आणि बहिणीला कारमध्ये बसवून शाळेत नेले.
शाळेची इमारत तीन मजली असून सुंदर होती. बाहेरच्या फाटकावर खाकी गणवेश घातलेला चौकीदार होता. वडिलांनी मुख्य फाटकाजवळ कार उभी केली आणि आमच्यासह शाळेत प्रवेश केला. 



माझी बहीण तिच्या वर्गात निघून गेली. वडिलांनी मला मुख्याध्यापकांच्या खोलीत नेले. तिथे बरीच मुले आपल्या आई वडिलांबरोबर आलेली दिसली. मुख्याध्यापक क्रमाक्रमाने प्रत्येकाला बोलावीत होते व त्यांच्या प्रवेशअर्जावर सह्या करीत होते. मला पहिल्या वर्गात प्रवेश मिळाला. माझा वर्ग तळमजल्यावरच होता. वर्गात प्रवेश केल्यावर तिथे २०/२५ विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित असलेले दिसले. माझ्या बहिणीची मैत्रीण सुधा, हिची लहान बहीण पण होती. ती मला लगेच 'हॅलो'" म्हणाली. 


माझ्या वर्गशिक्षिकेने मला तिच्या जवळच पहिल्या ओळीत बसविले. दोन तासांनंतर मधल्या सुट्टीची घंटी वाजली. सर्व मुले दफ्तर भरून व बंद करून बाहेर आली मी पण त्यांच्याबरोबरच बाहेर पडलो. माझी बहीण आधीच माझ्या वर्गाबाहेर आली होती. नंतर आम्ही डबा खाल्ला. सुट्टी संपल्यावर सगळी मुले आपापल्या वर्गात गेली.


पहिल्याच दिवशी वर्गशिक्षिकेने आम्हाला शाळेचे नियम समजावून सांगितले. पाठ्यपुस्तकांची यादी दिली. पाढे शिकविले. मला कविता म्हणावयास सांगितली व त्यानंतर खुश होऊन मला शाबासकी दिली. साडेबारा वाजता शाळा सुटली. माझी बहीण धावतच माझ्या वर्गाजवळ आली. आम्ही दोघे शाळेच्या बाहेर आलो. फाटकापाशी आमची आई वाट पाहत उभी होती. नंतर आम्ही तिघे रिक्षाने घरी आलो.
असा हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस. मी कितीही मोठा झालो तरीही हा दिवस माझ्या कायम लक्षात राहील.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 4

shalecha pahila divas marathi nibandh


शाळेतला पहिला दिवस ज्या दिवशी मी प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत प्रवेश केला, त्या दिवसाची स्मृती माझ्या मनात एखाद्या शिलालेखाप्रमाणे कोरली गेली आहे. त्या दिवशी  मी आत प्रवेश केला आणि दिंडीप्रमाणेच जरा भव्य वाटणाऱ्या इमारतीपुढे उभा राहिलो, तेव्हा माझ्या मनात निरनिराळ्या, परस्परविरोधी भावनांचा कल्लोळ माजला होता. सारं नवीन, शाळा नवीन, वह्या - पुस्तकं नवीन, गणवेश नवीन या नाविन्यामुळे हरखून गेलो होतो आणि त्याचवेळी जुनी शाळा, जुने शिक्षक, जुने मित्र आता भेटणार नाहीत, म्हणून खंतावलो होतो


थोडा चिंतेनेसुद्धा ग्रासलो होतो. नवीन शिक्षक कसे असतील ? वर्गातील मुले कशी असतील ? ती माझ्याजवळ कशी वागतील ? हा वरच्या शाळेतला अभ्यास आपल्याला जमेल का ? झेपेल का ? असे प्रश्न एकीकडे भेडसावत होते, तर दुसरीकडे नवीन विषय, इंग्रजी - संस्कृत, ऑलजिब्रा जास्त विषयांचं ज्ञान या कल्पनेने उत्कंठित झालो होतो. थोडक्यात मनःस्थिती काहीशी शब्दातीतच होती.



पहिला तास सुरू झाला. नवीन मास्तर सर्वांना नांव विचारीत होते. माझी पाळी आली. मी गांगरलो - गोंधळलो होतोच. तेव्हा मी माझे नांव सांगताना जरा अडखळलो. हळू आवाजात बोललो. मास्तर एकदम ओरडले. तत् पप् काय करतोस ? खणखणीत आवाजात बोल ! मला वाईट वाटलं. मास्तर रागावले म्हणून नव्हे,  सगळी मुले हसली म्हणून. ते हसणे, तो उपहास अजूनही माझ्या कानात घुमतोय. पहिला धडा मिळाला, खणखणीत स्वरात बोलायचं. 


पहिला तास संपला. मगाचचे सर गेले आणि दुसरे सर आले हे बघून मला अचंबाच वाटला. आले ते फाड-फाड इंग्रजीतूनच बोलायला लागले. मी घाबरलो. मागचाच प्रश्न नव्याने उभा राहिला. “मला झेपेल ना या शाळेतला अभ्यास ?" पण हे सर चांगले होते. अगदी खेळकरपणे ते शिकवीत होते. सर्व तास त्यांनी आम्हाला हसत ठेवले होते. मला धीर आला. ते म्हणाले 'मी तुम्हाला फक्त इंग्रजीच शिकवणार नाही. तुमचं सामान्यज्ञान वाढविणार आहे. तुमचं व्यक्तिमत्त्व सुधारणार आहे. 



आपलं व्यक्तिमत्त्व तसं आकर्षक, लोभस असलं पाहिजे.' मी दुसरा धडा गिरवला. आपली खरी कसोटीची वेळ मधल्या सुट्टीत आली. मधली सुटी झाल्याबरोबर आतापर्यंत शांतपणे बसलेल्या मुलांनी गोंगाट करायला सुरवात केली. काही मुलांच्या धिटाईचं मला कौतुक वाटलं. आपण बरीच वर्षं या शाळेत शिकत आहोत, अशा थाटात ते वागत होते. माझ्या बाकावर शेजारी बसलेल्या मुलाने 'तू काय आणलं आहेस डब्यात ?' असं विचारून माझ्याशी सलगी केली. आम्ही एकमेकांच्या डब्यातलं खाल्लं. मजा आली. आणखी एक धडा शिकलो. सर्वांजवळ सलगीने वागायचं.


मधल्या सुटीत मी मुलांचं निरीक्षण करीत होतो. काही मुले चेहऱ्यावरूनच हुशार आणि शांत वाटली. काही बंडखोर वाटली. काहीच्या तोंडात तर शिव्या होत्या. काही मुलं जागेवरच मुकस्तंभासारखी बसून राहिली होती. त्याचवेळी मी मनात आणखी एक धडा गिरवला. आपण मुलांजवळ जपून वागायचे. चांगल्या मुलांचीच संगत धरायची. वाईट मुलांची संगत टाळायची.
 

मग गणित शिकवणारे सर आले. आतापर्यंत मला कळून चुकलं होतं की प्रत्येक विषयाला निरनिराळे शिक्षक असतात. गणिताच्या शिक्षकांनी नवीन काही शिकवलं नाही. आम्हालाच पाढे विचारले. संख्या वाचायला सांगितल्या, शिवाय गणित हा विषय कसा सोपा आहे, गमतीशीर आहे, वगैरे काहीसे बोलले. माझी कळी खुलली. गणित शिकायच्या अगोदरच मला गणित हा विषय सोपा वाटायला लागला...


शेवटचा तास पी.टी.चा -शारीरिक शिक्षण. तिथेसुद्धा शिक्षकांनी आम्हाला रांगेत उभे केले. आणि मग नांवे विचारली. पहिल्या तासाला मिळालेला धडा मी चांगला गिरवला होता. माझी पाळी आली, तेव्हा मी माझं नांव अगदी खणखणीत आवाजात सांगितलं. शिक्षक म्हणाले "शाबास ! असा आवाज पाहिजे खणखणीत."
एकूण काय, पहिला दिवस चांगला गेला. मला वाटतं शाळेतला पहिला दिवस हाच एकूण शालेय जीवन कसं जाणार ते ठरवतो. मला धीर आला. खात्री पटली. माझं शालेय जीवन चांगलं जाणार - खणखणीत.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद
टीप : वरील निबंध शाळेतील माझा पहिला दिवस मराठी निबंध या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते
  • mazya shalecha pahila divas in marathi
  • marathi nibandh shalecha pahila divas in marathi
  • shalecha pahila divas nibandh marathi madhe
  • majha shalecha pahila diwas nibandh
  • sayesha pahila divas marathi nibandh

निबंध 5

शाळेतील माझा पहिला दिवस मराठी निबंध | Shalecha Pahila Divas In Marathi Essay


ज्या दिवशी मी प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत प्रवेश केला, त्या दिवसाची स्मती माझ्या मनात एखाद्या शिलालेखाप्रमाणे कोरली गेली आहे. त्या दिवशी जरा भव्य वाटणाऱ्या दिडीतून मी आत प्रवेश केला आणि दिंडीप्रमाणेच जरा भव्य वाटणाऱ्या इमारतीपुढे उभा राहिलो. 


तेव्हा माझ्या मनात निरनिराळ्या, परस्परविरोधी भावनांचा कल्लोळ माजला होता. सारं नवीन, शाळा नवीन, वह्या - पुस्तकं नवीन, गणवेश नवीन या नाविन्यामुळे हरखून गेलो होतो आणि त्याचवेळी जुनी शाळा, जुने शिक्षक, जुने मित्र आता भेटणार नाहीत, म्हणून खंतावलो होतो. 


थोडा चिंतेनेसुद्धा ग्रासलो होतो. नवीन शिक्षक कसे असतील ? वर्गातील मुले कशी असतील ? ती माझ्याजवळ कशी वागतील ? हा वरच्या शाळेतला अभ्यास आपल्याला जमेल का ? झेपेल का ? असे प्रश्न एकीकडे भेडसावत होते, तर दुसरीकडे नवीन विषय, इंग्रजी - संस्कृत, ऑलजिब्रा जास्त विषयांचं ज्ञान या कल्पनेने उत्कंठित झालो होतो. 


थोडक्यात मनःस्थिती काहीशी शब्दातीतच होती.  पहिला तास सुरू झाला. नवीन मास्तर सर्वांना नांव विचारीत होते. माझी पाळी आली. मी गांगरलो - गोंधळलो होतोच. तेव्हा मी माझे नांव सांगताना जरा अडखळलो. हळू आवाजात बोललो. 


मास्तर एकदम ओरडले. तत् पप् काय करतोस ? खणखणीत आवाजात बोल ! मला वाईट वाटलं. मास्तर रागावले म्हणून नव्हे, पण मास्तरांच्या शेऱ्यानंतर सगळी मुले हसली म्हणून. ते हसणे, तो उपहास अजूनही माझ्या कानात घुमतोय. पहिला धडा मिळाला, खणखणीत स्वरात बोलायचं.



पहिला तास संपला. मगाचचे सर गेले आणि दुसरे सर आले हे बघून मला अचंबाच वाटला. आले ते फाड-फाड इंग्रजीतूनच बोलायला लागले. मी घाबरलो. मागचाच प्रश्न नव्याने उभा राहिला. "मला झेपेल ना या शाळेतला अभ्यास ?" पण हे सर चांगले होते. 


अगदी खेळकरपणे ते शिकवीत होते. सर्व तास त्यांनी आम्हाला हसत ठेवले होते. मला धीर आला. ते म्हणाले 'मी तुम्हाला फक्त इंग्रजीच शिकवणार नाही. तुमचं सामान्यज्ञान वाढविणार आहे. तुमचं व्यक्तिमत्त्व सुधारणार आहे. आपलं व्यक्तिमत्त्व तसं आकर्षक, लोभस असलं पाहिजे.' मी दुसरा धडा गिरवला.



आपली खरी कसोटीची वेळ मधल्या सुट्टीत आली. मधली सुटी झाल्याबरोबर आतापर्यंत शांतपणे बसलेल्या मुलांनी गोंगाट करायला सुरवात केली. काही मुलांच्या धिटाईचं मला कौतुक वाटलं. आपण बरीच वर्षं या शाळेत शिकत आहोत, अशा थाटात ते वागत होते. 


माझ्या बाकावर शेजारी बसलेल्या मुलाने 'तू काय आणलं आहेस डब्यात ?' असं विचारून माझ्याशी सलगी केली. आम्ही एकमेकांच्या डब्यातलं खाल्लं. मजा आली. आणखी एक धडा शिकलो. सर्वांजवळ सलगीने वागायचं.



मधल्या सुटीत मी मुलांचं निरीक्षण करीत होतो. काही मुले चेहऱ्यावरूनच हुशार आणि शांत वाटली. काही बंडखोर वाटली. काहीच्या तोंडात तर शिव्या होत्या. काही मुलं जागेवरच मूकस्तंभासारखी बसून राहिली होती. त्याचवेळी मी मनात आणखी एक धडा गिरवला. 


आपण मुलांजवळ जपून वागायचे. चांगल्या मुलांचीच संगत धरायची. वाईट मुलांची संगत टाळायची. मग गणित शिकवणारे सर आले. आतापर्यंत मला कळून चुकलं होतं की प्रत्येक विषयाला निरनिराळे शिक्षक असतात. गणिताच्या शिक्षकांनी नवीन काही शिकवलं नाही. आम्हालाच पाढे विचारले. 



संख्या वाचायला सांगितल्या, शिवाय गणित हा विषय कसा सोपा आहे, गमतीशीर आहे, वगैरे काहीसे बोलले. माझी कळी खुलली. गणित शिकायच्या अगोदरच मला गणित हा विषय सोपा वाटायला लागला. शेवटचा तास पी.टी.चा -शारीरिक शिक्षण. तिथेसुद्धा शिक्षकांनी आम्हाला रांगेत उभे केले. आणि मग नांवे विचारली. 



पहिल्या तासाला मिळालेला धडा मी चांगला गिरवला होता. माझी पाळी आली, तेव्हा मी माझं नांव अगदी खणखणीत आवाजात सांगितलं. शिक्षक म्हणाले "शाबास ! असा आवाज पाहिजे खणखणीत." एकूण काय, पहिला दिवस चांगला गेला. 


मला वाटतं शाळेतला पहिला दिवस हाच एकूण शालेय जीवन कसं जाणार ते ठरवतो. मला धीर आला. खात्री पटली. माझं शालेय जीवन चांगलं जाणार - खणखणीत.



भास्कराचार्यांसारखे थोर गणिती आपल्या देशात होऊन गेले. सर्व जगाला '0' ची देणगी आम्ही दिली. पण हे वैयक्तिक पातळीवर झाले. सांघिक असे काही घडले नाही. अखिल देशाला ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात रॉकेटसारखी झेप घ्यायला लावील असा शिक्षणतज्ज्ञ भारतात निपजला नाही, हे खेदाने नमूद करावे लागते..


चिपळूणकर, टिळक, आगरकर, आपटे-कर्वे अशी देशाला शिक्षण क्षेत्रात पुढे आणण्यासाठी झटणारी मंडळी होऊन गेली. महात्मा फुल्यांनी तर आपल्याला -

विद्येविना मती गेली । 

मतीविना गती गेली ।।

गतीविना वित्त गेले | 

वित्ताविना शुद्र खचले ।। 




असा मंत्र दिला. पण एवढ्या प्रचंड देशात शिक्षित फारच थोडे झाले आणि सुशिक्षित तर त्याहूनही थोडे झाले.
आपलं दुर्भाग्य असं की लॉर्ड मेकॉलेच्या तोडीचा शिक्षणतज्ज्ञ स्वतंत्र भारताला कधी लाभला नाही. मेकॉलेने आपल्याला युरोपीय भाषा आणि युरोपीय शास्त्रे शिकवायला सुरुवात केली आणि साऱ्या हिंदुस्थानचा कायापालट झाला.


इंग्रजांनी दिलेल्या शिक्षणाने, त्यांचे राज्य चालवायला मदत करणारे कारकून तयार केले. हे सत्य आहे; पण त्याच शिक्षणातून आपल्या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी प्राणपणाने लढणारी माणसं निर्माण झाली, हेही सत्य आहे.



ज्वालांच्या झोतावर स्वार होऊन, आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज असलेल्या ब्रिटिश साम्राज्यावर धडका देऊन ते खिळखिळे करून टाकणारे सशस्त्र क्रांतिकारकही त्याच शिक्षणातून निर्माण झाले, हेही सत्य आहे. सध्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांतीचे वारे वहात आहेत. 


कित्येक भारतीय जागतिक पातळीवर ताऱ्यासारखे चमकत आहेत. भारताच्या उज्ज्वल भविष्याची सोनपहाट लवकरच फटफटणार आहे, याचीच ही प्रसादचिन्हे आहेत.

शाळेतील माझा पहिला दिवस मराठी निबंध | Shalecha Pahila Divas In Marathi Essay

शाळेतील माझा पहिला दिवस मराठी निबंध | Shalecha Pahila Divas In Marathi Essay



NIBANDH 1 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आमच्‍या ब्लॉगवर तुमचे स्‍वागत आहे, आज आपण शाळेतील माझा पहिला दिवस मराठी निबंध | Shalecha Pahila Divas In Marathi Essay या विषयावर निबंध  बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून 5 निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता.
शाळेच्‍या पहील्‍या दिवसाची उत्‍सुकता सर्वानाच असते तेथील वातावरण, इमारत परिसर हे सर्व पहील्‍या दिवशी नवीनच असते, त्‍या परीस्‍थीतीसोबत जुळवुन घेण्‍यात वेगळीच गंमत असते अश्‍याच प्रंसगाचे वर्णन या निबंधात करण्‍यात आले आहे. चला तर मग निबंधाला सुरूवात करूया.    

जीवन म्हणजे एक लांबलचक प्रवासच आहे. आगगाडीतल्या प्रवासासारखा ! अनेक वळणं येतात या प्रवासामध्ये! माझ्या आयुष्यातही असंच एक वळण आलं होतं दहा वर्षांपूर्वी. त्यावेळी मी ६ वर्षांची होते. बालमनाची नाजूक अवस्था! स्वच्छंदपणे मुक्त विहार करणाऱ्या पक्ष्यालाही लाजवेल असं आयुष्य वहात होतं. 

असं माझं अल्लड अवखळ बालपण उपभोगत होते मी ! अन् एके दिवशी 'शाळेत जायचं' हे वारं आमच्याही घरात शिरलं. मुळात मी खूप घाबरले. कारण खूप काहीबाही ऐकलं होतं ना शाळेबद्दल ! तरी आईने नवीन कपडे आणले. बाबांनी बूट आणले. नवीन डबा, वॉटरबॅग, नवीन दप्तर! अन् आमची स्वारी तयार होऊन बाबांचं बोट धरून शाळेत निघाली. 

पण! पण माझं सारं स्वातंत्र्य हिरावून घेणारा होता तो क्षण ! त्या इवल्याशा मनामध्ये भीती अन् आश्चर्य यांचं भांडण  चाललं होतं. प्रथम मला नेलं ते हेडमास्तरांकडे. त्यांना पाहून मला बागुलबुवाची आठवण झाली. माझं नाव विचारल्यावर मी तत्परतेनं सांगितलं. नाव नोंदणी झाली आणि बाबांनी मला माझ्या वर्गात (की कोंडवाड्यात) सोडलं. तिथे आमच्या बाई उभ्या होत्या. किती गोड! हसऱ्या! त्यांच्या त्या नजरेनंच माझ्यात वर्गात पाऊल टाकण्याचं धैर्य झालं. 

पण वर्गात माझं स्वागत झालं ते बावरलेल्या चेहऱ्यांनी आणि हुंदक्यांनी ! काहींनी तर तारसप्तकात सूर लावला होता. झाडाच्या फांदीवर चिमण्या बसाव्यात तशी पोरे बाकावर एकमेकाला बिलगून बसली होती. भित्र्या डोळ्यांनी ससा बघतो तशी आजूबाजूला बघत होती तर काही बांधावरचे कोवळे गवत उघड्या वाऱ्यात कापते ना तशी थरथर कापत होती! थोड्याच वेळात मीही त्यांच्यातलीच बनून गेले.

आता प्रथमच माझी नजर आजूबाजूला गेली. तो काय, मज्जाच मज्जा! मण्यांची खेळणी, चेंडू, ठोकळे, आणखीन बरंच काही. सगळं खेळून आम्ही दमलो. मग मधली सुट्टी झाली. डबा खाल्ला. मग होता झोपायचा तास! मला खूप आवडला. मी मात्र झोपले नाही. किलकिले डोळे करून मजा पाहावी म्हटलं तर सगळी मुले पण माझंच जणू काही अनुकरण करत होती. मग आमच्या बाई परत वर्गात आल्या. त्यांनी आम्हाला खूप छान गोष्ट सांगितली. ससा आणि कासवाची. मी एकदम खूष होऊन गेले शाळेवर! सर्वांत जास्त झोपेच्या तासावर! 

पण काही असो! शाळा जरी मला आवडली तरी सवय नसल्यामुळे कधी एकदा घरी जाईन असं झालं होतं अन् घंटेनं तुरुंगवास संपल्याची आठवण करून देताच मी एखाद्या बऱ्याच वर्षाच्या कैद्याप्रमाणे सुसाट बाहेर पळाले. आनंदाने चेहरा फुलला होता. बघते तो काय, फाटकापाशीच आईवडील! माझ्या चेहऱ्यावरचं प्रतिबिंब त्यांच्या चेहऱ्यावर उमटलं होतं. 

असं माझ्या आयुष्यातलं पहिलं वळण! पण आज मी अशा वळणावर उभी आहे की जिथून विशाल भविष्यकाळाचं क्षितीज पसरलंय, ज्याला कधी अंतच नाही. महाविद्यालयीन शिक्षण माझी वाट पाहत आहे. परंतु आज मात्र मला वाटतं की तो माझा शाळेतला पहिला दिवस म्हणजे माझ्या उज्ज्वल भविष्यकाळाची एक सुंदर रम्य पहाट होती की जिच्यावर भीती आणि आनंद यांची मिश्रित प्रभा फाकली होती.
 


SHALETIL MAZA PAHILA DIVAS
SHALETIL MAZA PAHILA DIVAS

मित्र-मैत्रिणींनो तुमच्‍या जिवनातील शाळेतील पहील्‍या दिवसाचा अनुभव कसा होता हे कमेंट जरूर कळवावे . Shalecha Pahila Divas In Marathi Essay हा निबंध तुम्‍हाला नक्‍की आवडला असेल अशी आशा करतो. खालील क्रमांक २ चा निबंध वाचण्यास  विसरू नका  धन्‍यवाद. 

NIBANDH 2 

माझे बालपण, माझे बालपण अगदी खेडेगावात गेल्यामुळे बालोदयान, शिशुविहार, के. जी. वगैरे शिक्षणक्षेत्रातील पांढरपेशी प्रकार माझ्या वाट्याला कधी आलेच नाहीत. चांगली पाच वर्षे पूर्ण होऊन सहावे लागल्यावर मला शाळेत घालण्यात आले. मे महिन्यात माझा जन्मदिवस असल्याने जूनच्या पहिल्या दिवशी शाळेचे नवीन वर्ष सुरू होताना मी शाळेत जाऊ शकलो.  त्या घटनेला इतकी वर्षे होऊन गेली तरी ती घटना, तो दिवस माझ्या डोळ्यांसमोर जसाचा तसा उभा आहे.


माझा शालेय प्रवेशाचा दिवस पंचांग पाहून ठरविण्यात आला होता. भल्या सकाळीच आमचे गुरुजी आले. थोड्या प्रमाणात होमहवन करण्यात आले आणि मग मी आईवडिलांच्या दृष्टीने शाळेत जाण्यास पात्र ठरलो. तोपर्यंत शाळा म्हणजे काय याची मला काहीच कल्पना नसल्यामुळे मी मोठ्या खुषीत होतो.


घरात चालणाऱ्या विविध समारंभांपैकी हाही एक काहीतरी समारंभ असावा, असे मला वाटत होते. वरणापुरणाचे जेवण झाले. मला नवीन कपडे घालण्यात आले. माझ्या पायांतील चप्पलही नवी कोरी होती. नवे दप्तर, नवी कोरी पाटी, नवी पेन्सिल या नवेपणाच्या धुंदीत बाबांचे बोट धरून मी शाळेच्या दारात केव्हा येऊन पोहोचलो ते मलाच कळले नाही.



एका जुन्या वाड्यात आमची शाळा होती. एका मोठ्या दालनात दोन-दोन वर्ग भरले होते. दोन दालनांत मिळून चार वर्ग होते; आणि दोन गुरुजी शाळा सांभाळत होते. बाबांनी मला गुरुजींच्या स्वाधीन केले आणि बाबा परत फिरले तेव्हा खरोखर मला ब्रहमांड आठवले. बाबांशी बोलताना जो गुरुजींचा आवाज मधाळ वाटत होता, तो बाबांची पाठ फिरल्यावर एकदम कठोर झाला आणि कोपऱ्यात ठेवलेली वेताची छडी गुरुजींनी हातात घेतली.


ते पाहून मला कापरेच भरले. गुरुजी शरीरयष्टीने धिप्पाड होते. डोक्यावरच्या टोपीतून त्यांची शेंडी बाहेर डोकावत होती. खरे पाहता, त्यांची ती शेंडी पाहून मला हसूच येत होते; पण हसण्याचे धाडस नव्हते. उकडत असूनही गुरुजींनी कोट घातला होता. तेव्हापासून माझी पक्की समजत झाली होती की, गुरुजी म्हटले म्हणजे त्यांच्या अंगावर कोट हवाच! मुंबईला प्रशालेत आल्यावर मात्र ही समजूत पुसली गेली.


आमचे हे गुरुजी एकाच वेळी दोन वर्ग सांभाळत होते. एरवी वानराप्रमाणे उड्या मारणारे आम्ही पंचवीसजण गुरुजी वर्गावर आले की शेळीसारखे बसत होतो. गुरुजी सतत फेऱ्या मारीत चौथीच्या वर्गाला गणित घालत होते, तर पहिलीच्या मुलांना शब्द घालत होते. एकाही अक्षराची अदयापि मला ओळख नाही हे समजल्यावर त्यांनी माझ्या बावन्न पिढयांचा उद्धार केला असावा.


तीन-चार तास एका जागी बसण्याची मला सवय नव्हती. अपरिचित जागा, अनोळखी माणसे! भीतीने माझ्या डोळ्यांतून गंगा-यमुना वाह लागल्या; तसे मास्तर कडाडले, "रडायला काय झालंय?" आता फक्त छडीच मारायची उरली होती. डोळयांतले पाणी मी पुसून टाकले आणि मोठ्या निग्रहाने अक्षरे गिरवू लागलो.या घटनेला आज बरीच वर्षे होऊन गेली, तरी तो शाळेतील पहिला दिवस मी विसरू शकत नाही. त्याच छडीच्या धाकाखाली शाळेतील चार वर्षे पार पडली आणि पाचवीसाठी मी शहरात आलो.




मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 3

shalecha pahila divas in marathi Essay


 वाढदिवस आणि सणांच्या व्यतिरिक्त काही महत्त्वपूर्ण दिवस असे असतात जे आपण विसरू शकत नाही. प्रथमच शाळेत जाणे लहान मुलांसाठी खूप रोमांचकारी असते. त्याचा प्रभाव बालकाच्या मनावर पडतो.
जरी मी आज आठवीचा विद्यार्थी असलो तरी शाळेच्या पहिल्या दिवसाचा विचार येताच मन उत्साहित होते. माझी बहीण शारदा मंदिरमध्ये त्यावेळी शिकत होती. ती माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठी आहे. माझ्या आई बाबांनी मला पण त्याच शाळेत घालण्याचा निश्चय केला. जेव्हा मी पाच वर्षांचा झालो तेव्हा माझे नाव त्या शाळेत दाखल करण्यात आले.


पावसाळ्याचे दिवस होते. एके दिवशी सकाळीच आईने मला लवकर उठविले. नित्यकर्मे आटोपल्यावर स्नान करून बरोबर सहा वाजता मी तयार झालो. दूध आणि नाश्ता केला. मी आवडीने शाळेचा गणवेश घातला. नवे बूट मोजे, दफ्तर पाहून मी उत्साहित झालो. माझ्या वडिलांनी मला आणि बहिणीला कारमध्ये बसवून शाळेत नेले.
शाळेची इमारत तीन मजली असून सुंदर होती. बाहेरच्या फाटकावर खाकी गणवेश घातलेला चौकीदार होता. वडिलांनी मुख्य फाटकाजवळ कार उभी केली आणि आमच्यासह शाळेत प्रवेश केला. 



माझी बहीण तिच्या वर्गात निघून गेली. वडिलांनी मला मुख्याध्यापकांच्या खोलीत नेले. तिथे बरीच मुले आपल्या आई वडिलांबरोबर आलेली दिसली. मुख्याध्यापक क्रमाक्रमाने प्रत्येकाला बोलावीत होते व त्यांच्या प्रवेशअर्जावर सह्या करीत होते. मला पहिल्या वर्गात प्रवेश मिळाला. माझा वर्ग तळमजल्यावरच होता. वर्गात प्रवेश केल्यावर तिथे २०/२५ विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित असलेले दिसले. माझ्या बहिणीची मैत्रीण सुधा, हिची लहान बहीण पण होती. ती मला लगेच 'हॅलो'" म्हणाली. 


माझ्या वर्गशिक्षिकेने मला तिच्या जवळच पहिल्या ओळीत बसविले. दोन तासांनंतर मधल्या सुट्टीची घंटी वाजली. सर्व मुले दफ्तर भरून व बंद करून बाहेर आली मी पण त्यांच्याबरोबरच बाहेर पडलो. माझी बहीण आधीच माझ्या वर्गाबाहेर आली होती. नंतर आम्ही डबा खाल्ला. सुट्टी संपल्यावर सगळी मुले आपापल्या वर्गात गेली.


पहिल्याच दिवशी वर्गशिक्षिकेने आम्हाला शाळेचे नियम समजावून सांगितले. पाठ्यपुस्तकांची यादी दिली. पाढे शिकविले. मला कविता म्हणावयास सांगितली व त्यानंतर खुश होऊन मला शाबासकी दिली. साडेबारा वाजता शाळा सुटली. माझी बहीण धावतच माझ्या वर्गाजवळ आली. आम्ही दोघे शाळेच्या बाहेर आलो. फाटकापाशी आमची आई वाट पाहत उभी होती. नंतर आम्ही तिघे रिक्षाने घरी आलो.
असा हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस. मी कितीही मोठा झालो तरीही हा दिवस माझ्या कायम लक्षात राहील.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 4

shalecha pahila divas marathi nibandh


शाळेतला पहिला दिवस ज्या दिवशी मी प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत प्रवेश केला, त्या दिवसाची स्मृती माझ्या मनात एखाद्या शिलालेखाप्रमाणे कोरली गेली आहे. त्या दिवशी  मी आत प्रवेश केला आणि दिंडीप्रमाणेच जरा भव्य वाटणाऱ्या इमारतीपुढे उभा राहिलो, तेव्हा माझ्या मनात निरनिराळ्या, परस्परविरोधी भावनांचा कल्लोळ माजला होता. सारं नवीन, शाळा नवीन, वह्या - पुस्तकं नवीन, गणवेश नवीन या नाविन्यामुळे हरखून गेलो होतो आणि त्याचवेळी जुनी शाळा, जुने शिक्षक, जुने मित्र आता भेटणार नाहीत, म्हणून खंतावलो होतो


थोडा चिंतेनेसुद्धा ग्रासलो होतो. नवीन शिक्षक कसे असतील ? वर्गातील मुले कशी असतील ? ती माझ्याजवळ कशी वागतील ? हा वरच्या शाळेतला अभ्यास आपल्याला जमेल का ? झेपेल का ? असे प्रश्न एकीकडे भेडसावत होते, तर दुसरीकडे नवीन विषय, इंग्रजी - संस्कृत, ऑलजिब्रा जास्त विषयांचं ज्ञान या कल्पनेने उत्कंठित झालो होतो. थोडक्यात मनःस्थिती काहीशी शब्दातीतच होती.



पहिला तास सुरू झाला. नवीन मास्तर सर्वांना नांव विचारीत होते. माझी पाळी आली. मी गांगरलो - गोंधळलो होतोच. तेव्हा मी माझे नांव सांगताना जरा अडखळलो. हळू आवाजात बोललो. मास्तर एकदम ओरडले. तत् पप् काय करतोस ? खणखणीत आवाजात बोल ! मला वाईट वाटलं. मास्तर रागावले म्हणून नव्हे,  सगळी मुले हसली म्हणून. ते हसणे, तो उपहास अजूनही माझ्या कानात घुमतोय. पहिला धडा मिळाला, खणखणीत स्वरात बोलायचं. 


पहिला तास संपला. मगाचचे सर गेले आणि दुसरे सर आले हे बघून मला अचंबाच वाटला. आले ते फाड-फाड इंग्रजीतूनच बोलायला लागले. मी घाबरलो. मागचाच प्रश्न नव्याने उभा राहिला. “मला झेपेल ना या शाळेतला अभ्यास ?" पण हे सर चांगले होते. अगदी खेळकरपणे ते शिकवीत होते. सर्व तास त्यांनी आम्हाला हसत ठेवले होते. मला धीर आला. ते म्हणाले 'मी तुम्हाला फक्त इंग्रजीच शिकवणार नाही. तुमचं सामान्यज्ञान वाढविणार आहे. तुमचं व्यक्तिमत्त्व सुधारणार आहे. 



आपलं व्यक्तिमत्त्व तसं आकर्षक, लोभस असलं पाहिजे.' मी दुसरा धडा गिरवला. आपली खरी कसोटीची वेळ मधल्या सुट्टीत आली. मधली सुटी झाल्याबरोबर आतापर्यंत शांतपणे बसलेल्या मुलांनी गोंगाट करायला सुरवात केली. काही मुलांच्या धिटाईचं मला कौतुक वाटलं. आपण बरीच वर्षं या शाळेत शिकत आहोत, अशा थाटात ते वागत होते. माझ्या बाकावर शेजारी बसलेल्या मुलाने 'तू काय आणलं आहेस डब्यात ?' असं विचारून माझ्याशी सलगी केली. आम्ही एकमेकांच्या डब्यातलं खाल्लं. मजा आली. आणखी एक धडा शिकलो. सर्वांजवळ सलगीने वागायचं.


मधल्या सुटीत मी मुलांचं निरीक्षण करीत होतो. काही मुले चेहऱ्यावरूनच हुशार आणि शांत वाटली. काही बंडखोर वाटली. काहीच्या तोंडात तर शिव्या होत्या. काही मुलं जागेवरच मुकस्तंभासारखी बसून राहिली होती. त्याचवेळी मी मनात आणखी एक धडा गिरवला. आपण मुलांजवळ जपून वागायचे. चांगल्या मुलांचीच संगत धरायची. वाईट मुलांची संगत टाळायची.
 

मग गणित शिकवणारे सर आले. आतापर्यंत मला कळून चुकलं होतं की प्रत्येक विषयाला निरनिराळे शिक्षक असतात. गणिताच्या शिक्षकांनी नवीन काही शिकवलं नाही. आम्हालाच पाढे विचारले. संख्या वाचायला सांगितल्या, शिवाय गणित हा विषय कसा सोपा आहे, गमतीशीर आहे, वगैरे काहीसे बोलले. माझी कळी खुलली. गणित शिकायच्या अगोदरच मला गणित हा विषय सोपा वाटायला लागला...


शेवटचा तास पी.टी.चा -शारीरिक शिक्षण. तिथेसुद्धा शिक्षकांनी आम्हाला रांगेत उभे केले. आणि मग नांवे विचारली. पहिल्या तासाला मिळालेला धडा मी चांगला गिरवला होता. माझी पाळी आली, तेव्हा मी माझं नांव अगदी खणखणीत आवाजात सांगितलं. शिक्षक म्हणाले "शाबास ! असा आवाज पाहिजे खणखणीत."
एकूण काय, पहिला दिवस चांगला गेला. मला वाटतं शाळेतला पहिला दिवस हाच एकूण शालेय जीवन कसं जाणार ते ठरवतो. मला धीर आला. खात्री पटली. माझं शालेय जीवन चांगलं जाणार - खणखणीत.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद
टीप : वरील निबंध शाळेतील माझा पहिला दिवस मराठी निबंध या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते
  • mazya shalecha pahila divas in marathi
  • marathi nibandh shalecha pahila divas in marathi
  • shalecha pahila divas nibandh marathi madhe
  • majha shalecha pahila diwas nibandh
  • sayesha pahila divas marathi nibandh

निबंध 5

शाळेतील माझा पहिला दिवस मराठी निबंध | Shalecha Pahila Divas In Marathi Essay


ज्या दिवशी मी प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत प्रवेश केला, त्या दिवसाची स्मती माझ्या मनात एखाद्या शिलालेखाप्रमाणे कोरली गेली आहे. त्या दिवशी जरा भव्य वाटणाऱ्या दिडीतून मी आत प्रवेश केला आणि दिंडीप्रमाणेच जरा भव्य वाटणाऱ्या इमारतीपुढे उभा राहिलो. 


तेव्हा माझ्या मनात निरनिराळ्या, परस्परविरोधी भावनांचा कल्लोळ माजला होता. सारं नवीन, शाळा नवीन, वह्या - पुस्तकं नवीन, गणवेश नवीन या नाविन्यामुळे हरखून गेलो होतो आणि त्याचवेळी जुनी शाळा, जुने शिक्षक, जुने मित्र आता भेटणार नाहीत, म्हणून खंतावलो होतो. 


थोडा चिंतेनेसुद्धा ग्रासलो होतो. नवीन शिक्षक कसे असतील ? वर्गातील मुले कशी असतील ? ती माझ्याजवळ कशी वागतील ? हा वरच्या शाळेतला अभ्यास आपल्याला जमेल का ? झेपेल का ? असे प्रश्न एकीकडे भेडसावत होते, तर दुसरीकडे नवीन विषय, इंग्रजी - संस्कृत, ऑलजिब्रा जास्त विषयांचं ज्ञान या कल्पनेने उत्कंठित झालो होतो. 


थोडक्यात मनःस्थिती काहीशी शब्दातीतच होती.  पहिला तास सुरू झाला. नवीन मास्तर सर्वांना नांव विचारीत होते. माझी पाळी आली. मी गांगरलो - गोंधळलो होतोच. तेव्हा मी माझे नांव सांगताना जरा अडखळलो. हळू आवाजात बोललो. 


मास्तर एकदम ओरडले. तत् पप् काय करतोस ? खणखणीत आवाजात बोल ! मला वाईट वाटलं. मास्तर रागावले म्हणून नव्हे, पण मास्तरांच्या शेऱ्यानंतर सगळी मुले हसली म्हणून. ते हसणे, तो उपहास अजूनही माझ्या कानात घुमतोय. पहिला धडा मिळाला, खणखणीत स्वरात बोलायचं.



पहिला तास संपला. मगाचचे सर गेले आणि दुसरे सर आले हे बघून मला अचंबाच वाटला. आले ते फाड-फाड इंग्रजीतूनच बोलायला लागले. मी घाबरलो. मागचाच प्रश्न नव्याने उभा राहिला. "मला झेपेल ना या शाळेतला अभ्यास ?" पण हे सर चांगले होते. 


अगदी खेळकरपणे ते शिकवीत होते. सर्व तास त्यांनी आम्हाला हसत ठेवले होते. मला धीर आला. ते म्हणाले 'मी तुम्हाला फक्त इंग्रजीच शिकवणार नाही. तुमचं सामान्यज्ञान वाढविणार आहे. तुमचं व्यक्तिमत्त्व सुधारणार आहे. आपलं व्यक्तिमत्त्व तसं आकर्षक, लोभस असलं पाहिजे.' मी दुसरा धडा गिरवला.



आपली खरी कसोटीची वेळ मधल्या सुट्टीत आली. मधली सुटी झाल्याबरोबर आतापर्यंत शांतपणे बसलेल्या मुलांनी गोंगाट करायला सुरवात केली. काही मुलांच्या धिटाईचं मला कौतुक वाटलं. आपण बरीच वर्षं या शाळेत शिकत आहोत, अशा थाटात ते वागत होते. 


माझ्या बाकावर शेजारी बसलेल्या मुलाने 'तू काय आणलं आहेस डब्यात ?' असं विचारून माझ्याशी सलगी केली. आम्ही एकमेकांच्या डब्यातलं खाल्लं. मजा आली. आणखी एक धडा शिकलो. सर्वांजवळ सलगीने वागायचं.



मधल्या सुटीत मी मुलांचं निरीक्षण करीत होतो. काही मुले चेहऱ्यावरूनच हुशार आणि शांत वाटली. काही बंडखोर वाटली. काहीच्या तोंडात तर शिव्या होत्या. काही मुलं जागेवरच मूकस्तंभासारखी बसून राहिली होती. त्याचवेळी मी मनात आणखी एक धडा गिरवला. 


आपण मुलांजवळ जपून वागायचे. चांगल्या मुलांचीच संगत धरायची. वाईट मुलांची संगत टाळायची. मग गणित शिकवणारे सर आले. आतापर्यंत मला कळून चुकलं होतं की प्रत्येक विषयाला निरनिराळे शिक्षक असतात. गणिताच्या शिक्षकांनी नवीन काही शिकवलं नाही. आम्हालाच पाढे विचारले. 



संख्या वाचायला सांगितल्या, शिवाय गणित हा विषय कसा सोपा आहे, गमतीशीर आहे, वगैरे काहीसे बोलले. माझी कळी खुलली. गणित शिकायच्या अगोदरच मला गणित हा विषय सोपा वाटायला लागला. शेवटचा तास पी.टी.चा -शारीरिक शिक्षण. तिथेसुद्धा शिक्षकांनी आम्हाला रांगेत उभे केले. आणि मग नांवे विचारली. 



पहिल्या तासाला मिळालेला धडा मी चांगला गिरवला होता. माझी पाळी आली, तेव्हा मी माझं नांव अगदी खणखणीत आवाजात सांगितलं. शिक्षक म्हणाले "शाबास ! असा आवाज पाहिजे खणखणीत." एकूण काय, पहिला दिवस चांगला गेला. 


मला वाटतं शाळेतला पहिला दिवस हाच एकूण शालेय जीवन कसं जाणार ते ठरवतो. मला धीर आला. खात्री पटली. माझं शालेय जीवन चांगलं जाणार - खणखणीत.



भास्कराचार्यांसारखे थोर गणिती आपल्या देशात होऊन गेले. सर्व जगाला '0' ची देणगी आम्ही दिली. पण हे वैयक्तिक पातळीवर झाले. सांघिक असे काही घडले नाही. अखिल देशाला ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात रॉकेटसारखी झेप घ्यायला लावील असा शिक्षणतज्ज्ञ भारतात निपजला नाही, हे खेदाने नमूद करावे लागते..


चिपळूणकर, टिळक, आगरकर, आपटे-कर्वे अशी देशाला शिक्षण क्षेत्रात पुढे आणण्यासाठी झटणारी मंडळी होऊन गेली. महात्मा फुल्यांनी तर आपल्याला -

विद्येविना मती गेली । 

मतीविना गती गेली ।।

गतीविना वित्त गेले | 

वित्ताविना शुद्र खचले ।। 




असा मंत्र दिला. पण एवढ्या प्रचंड देशात शिक्षित फारच थोडे झाले आणि सुशिक्षित तर त्याहूनही थोडे झाले.
आपलं दुर्भाग्य असं की लॉर्ड मेकॉलेच्या तोडीचा शिक्षणतज्ज्ञ स्वतंत्र भारताला कधी लाभला नाही. मेकॉलेने आपल्याला युरोपीय भाषा आणि युरोपीय शास्त्रे शिकवायला सुरुवात केली आणि साऱ्या हिंदुस्थानचा कायापालट झाला.


इंग्रजांनी दिलेल्या शिक्षणाने, त्यांचे राज्य चालवायला मदत करणारे कारकून तयार केले. हे सत्य आहे; पण त्याच शिक्षणातून आपल्या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी प्राणपणाने लढणारी माणसं निर्माण झाली, हेही सत्य आहे.



ज्वालांच्या झोतावर स्वार होऊन, आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज असलेल्या ब्रिटिश साम्राज्यावर धडका देऊन ते खिळखिळे करून टाकणारे सशस्त्र क्रांतिकारकही त्याच शिक्षणातून निर्माण झाले, हेही सत्य आहे. सध्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांतीचे वारे वहात आहेत. 


कित्येक भारतीय जागतिक पातळीवर ताऱ्यासारखे चमकत आहेत. भारताच्या उज्ज्वल भविष्याची सोनपहाट लवकरच फटफटणार आहे, याचीच ही प्रसादचिन्हे आहेत.