माणसे अमर झाली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक Manus Amar Zala Tar Essay In Marathi

निबंध 1 
माणसे अमर झाली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक Manus Amar Zala Tar Essay In Marathi:  माझा छोटा भाऊ विचारीत होता, “दादा, देवांना 'त्रिदश' का म्हणतात?" मी म्हणालो, "अरे, त्यांना माणसांसारखी चौथी वार्धक्यावस्था नाही.देव कधी मरत नाहीत." म्हणजे देव अमर आहेत. “देवांप्रमाणेच माणसे अमर झाली तर " त्याने प्रश्न निर्माण केला.


 खरोखर, देवांना मिळालेली संजीवनीची कुपी माणसापर्यंत आली तर? नाहीतरी आज माणसाचे त्या दिशेने प्रयत्न चालू आहेतच. रक्तदान, मूत्रपिंडदान असे अवयव दान करून, अवघड शस्त्रक्रिया पार पाडून आणि प्रभावी औषधोपचार करून तो माणसाला मृत्यूच्या दारातून मागे फिरवितो. आज माणसाची आयुर्मर्यादा वाढली आहे आणि मृत्युसंख्या घटली आहे; तरीपण मानव मृत्यूवर पूर्णपणे मात करू शकलेला नाही. आजही माणूस मर्त्य आहे. अशा या मानवाला संजीवनी गवसली तर....


Manus Amar Zala Tar Essay In Marathi
Manus Amar Zala Tar Essay In Marathi

तर प्रथम ज्याच्या हातास ती संजीवनी-अमृत-गवसेल तो लक्षाधीश, कोट्याधीश होईल. मग या अमृताचा काळाबाजार' होईल. कारण कोणतीही गोष्ट अदृश्य करून तिचा काळाबाजार करण्यात माणस मोठा पटाईत आहे. मग या अमृतातही भेसळ होईल व थोड्याच दिवसांत या अमृताची नक्कल केलेले कृत्रिम अमृतही बाजारात अवतरेल.

विचार करण्याचा मुद्दा असा आहे की, माणसाला अमृत गवसल्याने तरी त्याचे दुःख संपेल का? तो सुखी होईल का? होईल, कारण त्याला त्यामुळे आपल्या प्रिय माणसांचा वियोग होणार नाही. एक-एक कुटुंब म्हणजे पारंब्या फुटलेला मोठा वटवृक्षच होईल. पण यामुळे मात्र समाजाला नको असलेली दुष्ट माणसे देखील अमर होतील की! असे घडले तर मात्र माणसे सुखी होण्याची शक्यता कमीच. 


शिवाय 'अतिपरिचयात् अवज्ञा' या उक्तीनूसार अमरत्व प्राप्त झालेली ही माणसे एकमेकांचा दुस्वास करू लागतील. शिवाय या अनुषंगाने विचार करता, दोन पिढयांतील विचारांचे अंतर हीसुद्धा एक चिंतेची बाब ठरेल. आज अनेक घरांतून, समाजांतून अनेक त-हेचे वाद निर्माण झाले आहेत. माणसे अमर झाली तर हे पिढीतील विचारांचे अंतर फारच वाढेल. कुटुंबात, समाजात तीन-चार पिढ्या आढळतील. मग वादांना काय तोटा?



माणसाला अमरत्व प्राप्त झाले की, लोकसंख्या बेसुमार वाढणार आणि वाढत्या बेकारीचा प्रश्न 'आ' वासून उभा राहणार. आजही आपल्या देशापुढे बेकारीची समस्या आहेच, त्यामुळे मग माणसे अमर झाली तर हाहाःकारच उडेल. अन्नधान्य, पाणी, निवारा या मूलभूत गरजा भागविण्यासाठी आपल्याला आपल्या सवयी बदलाव्या लागतील. कदाचित या सर्व गरजा भागविण्यासाठी वैयक्तिक मालकी हक्काला राष्ट्रीय संपत्तीचे स्वरूप दयावे लागेल. प्रयोगशाळांना शरण जावे लागेल आणि निसर्गनिर्मित संपत्तीला मानवनिर्मितीची जोड दयावी लागेल.



 आपण अमर आहोत असे एकदा सिद्ध झाले की, माणसातील साहसी वृत्तीला उधाण येईल. चंद्राबरोबर इतर ग्रहांवर जाण्यासाठीही माणूस पुढे सरसावेल. धाडसी स्पर्धांना ऊत येईल. पण येथे एक धोकाही संभवतो. मरण नाही म्हटल्यावर पुनर्जन्माची कल्पना नष्ट होईल. त्याबरोबरच पापपुण्याचा निवाडा होण्याची कल्पनाही लोप पावेल. त्यामुळे माणूस दुष्कृत्ये करताना कचरणार नाही, ऐहिक जीवनात गुंतलेला असताना तो अध्यात्माचा विचार करणार नाही आणि मग मानवी जीवन क्षुद्र बनेल



या साऱ्या विचारांत एक धोका आपण विसरलो आणि तो म्हणजे माणूस अमर झाला तरी तो अजर होणार का? तसे नसेल तर माणसाला हे अमरत्व नकोसे होईल. जखमेची वेदना घेऊन शोकाकूल अवस्थेत फिरणारा चिरंजीव अश्वत्थामा आपल्या परिचयाचा आहेच. त्याला आपले चिरंजीवित्व नकोसे झाले होते. त्याप्रमाणेच माणसाची अवस्था होईल व तो देवाकडे गा-हाणे घालील, “देवा, सोडव रे बाबा आता या यातनांतून, लवकर मरण येऊ दे."

वरील निबंध माणसे अमर झाली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद
धन्‍यवाद

निबंध 2  


पुराणकालीन कथांमध्ये देवदानवांनी अमृतमंथन केले आणि त्यातून अमृताचा कलश बाहेर काढला. त्यामुळे त्यांच्यात भांडण झाले. अखेरीस देवांच्याच युक्तीने 'मोहिनी' रूपात आलेल्या श्रीविष्णूने ते देवांना मिळवून देण्याचा प्रयत्न केला तो यशस्वी झाला अन् सारे देव अमर झाले. ही कथा ऐकत असताना माझ्या दहा वर्षांच्या भावाने मला प्रश्न विचारला. "दादा तसे ते अमृत आपल्याला मिळाले तर ? आपले आजी-आजोबा, बाबा-आई, तू-मी सर्वजण अमर होऊन जा ना ! आपण अमर झाल्यावर काय मज्जा येईल नाही !"

भावाच्या या प्रश्नाने माझी मात्र झोप उडाली. अहो, खरोखरच जर हा 'अमृताचा कलश' या माणसांपर्यंत आला आणि माणसे अमर झाली तर ? आज आपण पाहतोय काळ बदलतोय... नवीन नवीन शोध लागताहेत. औषधे, इलाज, शस्त्रक्रिया या मोठ्या प्रमाणात होताहेत आणि त्या यशस्वी होताहेत. प्रभावी गुणकारी औषधोपचाराने माणूस आज मृत्यूच्या दारातून अनेकवेळा परत आला आहे. त्याची आयुर्मर्यादा वाढली आहे, तरी पण 'मृत्यू' कुणाला टळलेला नाही. माणूस हा मर्त्य आहेच. आणि मग अशा माणसाला ही 'संजीवनी' मिळाली तर...


प्रथम या 'अमृताचा'च काळाबाजार वाढेल, भ्रष्टाचार वाढेल. सर्वजण लक्षाधीश, कोट्यधीश होतील. अमृतातही भेसळ होईल आणि पुढे तर कृत्रिम अमृतही बनवले जाईल. पण माणसाला अमर झाल्यानंतर त्याची दुःखे संपतील का? एकमेकांतील भांडणतंटे-दुरावा-दुःस्वास-स्पर्धा या थांबतील का ? नाही ! उलट आयुष्यमान वाढल्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अतिरेक होईल. अंदाधुंदी माजेल, बेबंदशाही आणि हाहाकार निर्माण होईल. प्रेम-भक्ती अशा भावनांचा अंत होईल.


दुसरीकडे अमृत गवसल्याने लोकसंख्या प्रचंड वाढेल त्याबरोबर खाणारी तोंडे... म्हणजेच पुन्हा बेकारीची समस्या, पृथ्वीतलावर असलेल्या 'अन्न-पाणी-हवा' या मूलभूत गरजा भागविता येणार नाहीत... त्यासाठी पुन्हा सुंदोपसुंदी वैयक्तिक संपत्ती म्हणून मानव ते जमा करू लागेल. आणि प्रिय माणसांचा वियोग होणार नाही, ही गोष्ट धरली तरी 'अति परिचयात् अवज्ञा' ही उक्ती खरी होईल. पिढ्या वाढत जातील. विचारांची रेलचेल होईल. एक घर, एक समाज, एक देश अशा मर्यादा न राहता अविचारांचाच धुमाकूळ सुरू होईल.

सध्या सुद्धा तीन-चार पिढ्या झाल्या तरी त्यांच्यात ऐक्य टिकणे कठीण आहे, तर मग ही अफाट नाती, या अनेक पिढ्या यांचे काय होणार ? महाभारतातील 'यादवी' आठवते ना? तशीच ती सुरू होईल. माणसे माणसांना मारतील. राहायला जागा राहणार नाही.


माणसांच्या साहसीवृत्तीचा-त्यांच्या बुद्धिमत्तेचा ही विचार करायला लागतो तर त्यांना हे ब्रह्मांड कमी पडेल. कल्पनांच्या भराऱ्या आकाशपाताळ एक करतील. त्यामुळे पुन्हा सर्व गोष्टी विनाशाकडेच वळतील. पुनर्जन्म-पापपुण्य, कल्याण, सुखदुःख या गोष्टींचा नामोनिशाण राहणार नाही. मानवी जीवनाचे महत्त्वच नाहीसे होईल, तो क्षद्र होऊन जाईल आणि अखेर पुन्हा त्या पुराणकथेतील अमरत्व प्राप्त झालेल्या अश्वत्थामा आठवू लागेल.


तोही त्याच्या चिरंजीवत्वाला कंटाळला. जखमेच्या वेदना घेऊन शोकाकूल होऊन अखंडपणे नाहक भटकत राहिला. हे सर्व आठवल्यावर वाटते, "नको रे बाबा ते अमरत्व, आणि त्या यातना, फक्त हे ईश्वरा, अमर असे कल्याणकारी काम मात्र आमच्याकडून करून घे. एवढेच मागणे." मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

माणसे अमर झाली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक | Manus Amar Zala Tar Essay In Marathi

 माणसे अमर झाली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक Manus Amar Zala Tar Essay In Marathi

निबंध 1 
माणसे अमर झाली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक Manus Amar Zala Tar Essay In Marathi:  माझा छोटा भाऊ विचारीत होता, “दादा, देवांना 'त्रिदश' का म्हणतात?" मी म्हणालो, "अरे, त्यांना माणसांसारखी चौथी वार्धक्यावस्था नाही.देव कधी मरत नाहीत." म्हणजे देव अमर आहेत. “देवांप्रमाणेच माणसे अमर झाली तर " त्याने प्रश्न निर्माण केला.


 खरोखर, देवांना मिळालेली संजीवनीची कुपी माणसापर्यंत आली तर? नाहीतरी आज माणसाचे त्या दिशेने प्रयत्न चालू आहेतच. रक्तदान, मूत्रपिंडदान असे अवयव दान करून, अवघड शस्त्रक्रिया पार पाडून आणि प्रभावी औषधोपचार करून तो माणसाला मृत्यूच्या दारातून मागे फिरवितो. आज माणसाची आयुर्मर्यादा वाढली आहे आणि मृत्युसंख्या घटली आहे; तरीपण मानव मृत्यूवर पूर्णपणे मात करू शकलेला नाही. आजही माणूस मर्त्य आहे. अशा या मानवाला संजीवनी गवसली तर....


Manus Amar Zala Tar Essay In Marathi
Manus Amar Zala Tar Essay In Marathi

तर प्रथम ज्याच्या हातास ती संजीवनी-अमृत-गवसेल तो लक्षाधीश, कोट्याधीश होईल. मग या अमृताचा काळाबाजार' होईल. कारण कोणतीही गोष्ट अदृश्य करून तिचा काळाबाजार करण्यात माणस मोठा पटाईत आहे. मग या अमृतातही भेसळ होईल व थोड्याच दिवसांत या अमृताची नक्कल केलेले कृत्रिम अमृतही बाजारात अवतरेल.

विचार करण्याचा मुद्दा असा आहे की, माणसाला अमृत गवसल्याने तरी त्याचे दुःख संपेल का? तो सुखी होईल का? होईल, कारण त्याला त्यामुळे आपल्या प्रिय माणसांचा वियोग होणार नाही. एक-एक कुटुंब म्हणजे पारंब्या फुटलेला मोठा वटवृक्षच होईल. पण यामुळे मात्र समाजाला नको असलेली दुष्ट माणसे देखील अमर होतील की! असे घडले तर मात्र माणसे सुखी होण्याची शक्यता कमीच. 


शिवाय 'अतिपरिचयात् अवज्ञा' या उक्तीनूसार अमरत्व प्राप्त झालेली ही माणसे एकमेकांचा दुस्वास करू लागतील. शिवाय या अनुषंगाने विचार करता, दोन पिढयांतील विचारांचे अंतर हीसुद्धा एक चिंतेची बाब ठरेल. आज अनेक घरांतून, समाजांतून अनेक त-हेचे वाद निर्माण झाले आहेत. माणसे अमर झाली तर हे पिढीतील विचारांचे अंतर फारच वाढेल. कुटुंबात, समाजात तीन-चार पिढ्या आढळतील. मग वादांना काय तोटा?



माणसाला अमरत्व प्राप्त झाले की, लोकसंख्या बेसुमार वाढणार आणि वाढत्या बेकारीचा प्रश्न 'आ' वासून उभा राहणार. आजही आपल्या देशापुढे बेकारीची समस्या आहेच, त्यामुळे मग माणसे अमर झाली तर हाहाःकारच उडेल. अन्नधान्य, पाणी, निवारा या मूलभूत गरजा भागविण्यासाठी आपल्याला आपल्या सवयी बदलाव्या लागतील. कदाचित या सर्व गरजा भागविण्यासाठी वैयक्तिक मालकी हक्काला राष्ट्रीय संपत्तीचे स्वरूप दयावे लागेल. प्रयोगशाळांना शरण जावे लागेल आणि निसर्गनिर्मित संपत्तीला मानवनिर्मितीची जोड दयावी लागेल.



 आपण अमर आहोत असे एकदा सिद्ध झाले की, माणसातील साहसी वृत्तीला उधाण येईल. चंद्राबरोबर इतर ग्रहांवर जाण्यासाठीही माणूस पुढे सरसावेल. धाडसी स्पर्धांना ऊत येईल. पण येथे एक धोकाही संभवतो. मरण नाही म्हटल्यावर पुनर्जन्माची कल्पना नष्ट होईल. त्याबरोबरच पापपुण्याचा निवाडा होण्याची कल्पनाही लोप पावेल. त्यामुळे माणूस दुष्कृत्ये करताना कचरणार नाही, ऐहिक जीवनात गुंतलेला असताना तो अध्यात्माचा विचार करणार नाही आणि मग मानवी जीवन क्षुद्र बनेल



या साऱ्या विचारांत एक धोका आपण विसरलो आणि तो म्हणजे माणूस अमर झाला तरी तो अजर होणार का? तसे नसेल तर माणसाला हे अमरत्व नकोसे होईल. जखमेची वेदना घेऊन शोकाकूल अवस्थेत फिरणारा चिरंजीव अश्वत्थामा आपल्या परिचयाचा आहेच. त्याला आपले चिरंजीवित्व नकोसे झाले होते. त्याप्रमाणेच माणसाची अवस्था होईल व तो देवाकडे गा-हाणे घालील, “देवा, सोडव रे बाबा आता या यातनांतून, लवकर मरण येऊ दे."

वरील निबंध माणसे अमर झाली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद
धन्‍यवाद

निबंध 2  


पुराणकालीन कथांमध्ये देवदानवांनी अमृतमंथन केले आणि त्यातून अमृताचा कलश बाहेर काढला. त्यामुळे त्यांच्यात भांडण झाले. अखेरीस देवांच्याच युक्तीने 'मोहिनी' रूपात आलेल्या श्रीविष्णूने ते देवांना मिळवून देण्याचा प्रयत्न केला तो यशस्वी झाला अन् सारे देव अमर झाले. ही कथा ऐकत असताना माझ्या दहा वर्षांच्या भावाने मला प्रश्न विचारला. "दादा तसे ते अमृत आपल्याला मिळाले तर ? आपले आजी-आजोबा, बाबा-आई, तू-मी सर्वजण अमर होऊन जा ना ! आपण अमर झाल्यावर काय मज्जा येईल नाही !"

भावाच्या या प्रश्नाने माझी मात्र झोप उडाली. अहो, खरोखरच जर हा 'अमृताचा कलश' या माणसांपर्यंत आला आणि माणसे अमर झाली तर ? आज आपण पाहतोय काळ बदलतोय... नवीन नवीन शोध लागताहेत. औषधे, इलाज, शस्त्रक्रिया या मोठ्या प्रमाणात होताहेत आणि त्या यशस्वी होताहेत. प्रभावी गुणकारी औषधोपचाराने माणूस आज मृत्यूच्या दारातून अनेकवेळा परत आला आहे. त्याची आयुर्मर्यादा वाढली आहे, तरी पण 'मृत्यू' कुणाला टळलेला नाही. माणूस हा मर्त्य आहेच. आणि मग अशा माणसाला ही 'संजीवनी' मिळाली तर...


प्रथम या 'अमृताचा'च काळाबाजार वाढेल, भ्रष्टाचार वाढेल. सर्वजण लक्षाधीश, कोट्यधीश होतील. अमृतातही भेसळ होईल आणि पुढे तर कृत्रिम अमृतही बनवले जाईल. पण माणसाला अमर झाल्यानंतर त्याची दुःखे संपतील का? एकमेकांतील भांडणतंटे-दुरावा-दुःस्वास-स्पर्धा या थांबतील का ? नाही ! उलट आयुष्यमान वाढल्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अतिरेक होईल. अंदाधुंदी माजेल, बेबंदशाही आणि हाहाकार निर्माण होईल. प्रेम-भक्ती अशा भावनांचा अंत होईल.


दुसरीकडे अमृत गवसल्याने लोकसंख्या प्रचंड वाढेल त्याबरोबर खाणारी तोंडे... म्हणजेच पुन्हा बेकारीची समस्या, पृथ्वीतलावर असलेल्या 'अन्न-पाणी-हवा' या मूलभूत गरजा भागविता येणार नाहीत... त्यासाठी पुन्हा सुंदोपसुंदी वैयक्तिक संपत्ती म्हणून मानव ते जमा करू लागेल. आणि प्रिय माणसांचा वियोग होणार नाही, ही गोष्ट धरली तरी 'अति परिचयात् अवज्ञा' ही उक्ती खरी होईल. पिढ्या वाढत जातील. विचारांची रेलचेल होईल. एक घर, एक समाज, एक देश अशा मर्यादा न राहता अविचारांचाच धुमाकूळ सुरू होईल.

सध्या सुद्धा तीन-चार पिढ्या झाल्या तरी त्यांच्यात ऐक्य टिकणे कठीण आहे, तर मग ही अफाट नाती, या अनेक पिढ्या यांचे काय होणार ? महाभारतातील 'यादवी' आठवते ना? तशीच ती सुरू होईल. माणसे माणसांना मारतील. राहायला जागा राहणार नाही.


माणसांच्या साहसीवृत्तीचा-त्यांच्या बुद्धिमत्तेचा ही विचार करायला लागतो तर त्यांना हे ब्रह्मांड कमी पडेल. कल्पनांच्या भराऱ्या आकाशपाताळ एक करतील. त्यामुळे पुन्हा सर्व गोष्टी विनाशाकडेच वळतील. पुनर्जन्म-पापपुण्य, कल्याण, सुखदुःख या गोष्टींचा नामोनिशाण राहणार नाही. मानवी जीवनाचे महत्त्वच नाहीसे होईल, तो क्षद्र होऊन जाईल आणि अखेर पुन्हा त्या पुराणकथेतील अमरत्व प्राप्त झालेल्या अश्वत्थामा आठवू लागेल.


तोही त्याच्या चिरंजीवत्वाला कंटाळला. जखमेच्या वेदना घेऊन शोकाकूल होऊन अखंडपणे नाहक भटकत राहिला. हे सर्व आठवल्यावर वाटते, "नको रे बाबा ते अमरत्व, आणि त्या यातना, फक्त हे ईश्वरा, अमर असे कल्याणकारी काम मात्र आमच्याकडून करून घे. एवढेच मागणे." मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद