पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध | Pani Adva Pani Jirva In Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज जलसंकट हे जगासमोर भेडसावणारी मोठी समस्‍या बनली आहे. “पाणी” निसर्गाने आपल्‍याला दिलेली अमुल्‍य भेट आहे. परंतु पाण्‍याचा जपुन वापर न केल्‍यामुळे मानवजाती पुढे जलसं‍कट उभे ठाकले आहे . याच्‍यासाठी समाजात,शाळा,महाविद्यालयामध्‍ये पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्‍पनेचे महत्‍व पटवुन जनजागृती केली गेली पाहीजे. चला तर मग  या निबंधाला सुरूवात करूया 

सर्व प्राणिमात्रांच्या जीवनात पाणी हे फार महत्त्वाचे आहे. पाणी म्हणजे जीवन. पण शहरातील लोकांना पाण्याची किंमत कळत नाही. ते लोक पाणी जपून वापरत नाहीत. खूप पाणी वाया घालवतात. खेड्यापाड्यांतील स्त्रियांना दूर अंतरावरून पाणी वाहून आणावे लागते. त्यांचे कष्ट लक्षात घेतले पाहिजेत. उन्हाळ्यात नदया, विहिरी आटतात. त्या वेळी लहानशा वाटीने खड्ड्यातील पाणी भरणारी मुले पाहिली की, जीव तडफडतो.

पाणी ही निसर्गाची देणगी आहे. त्यामुळेच माणसाला त्याची किंमत कळत नाही. पाण्याची टंचाई ही आता जगभर निर्माण झाली आहे. कारण जमिनीच्या पोटातील पाण्याची पातळी फार खाली गेली आहे. माणसाने जंगले नष्ट केली, बांधकाम केले. त्यामुळे जमिनीत जेवढे पाणी मुरायला हवे, तेवढे मुरत नाही. म्‍हणुन पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्‍पनेवर भर दिला गेला पाहीजे.

सुदैवाने आपल्या देशात विपुल पाऊस पडतो. पण हे पाणी समुद्रात वाहून जाते. आता हे पाणी आपण जमिनीत जिरवायला हवे, साठवायला हवे. त्यासाठी तळी, बंधारे किंवा धरणे बांधली पाहिजेत. म्हणजे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढेल. विहिरींना व नदयांना बारमहा पाणी राहील. झाडे जगतील. जंगले वाढतील. शेती चांगली होईल, माणूस सुखाने जगेल.  


पाणी हे जीवनाचे मूलतत्त्व आहे. पाण्याशिवाय जीवन ही कल्पनाच शक्य नाही. पाण्यावरच सर्व सजीवसृष्टीचे जीवन सुख समृद्धी अवलंबून आहे.  सध्या पाणी प्रश्नाबाबत जागतिक स्तरावर प्रयत्न होत आहेत. त्याचाच परिपाक म्हणजे एप्रिल महिन्यात आयोजित केले जाणारे 'जल संपत्ती दिन' या निमित्त आपल्या देशात जे साक्षरता अभियान राबविले जात आहे. 'पाणी वाचवाल तर वाचाल' हा नव्या युगाचा महामंत्र आहे.

प्रयोगशाळेत पाणी बनविता येते परंतु सर्वांची गरज पुरवेल इतके नक्कीच नाही. आज जगात पाण्यावरून संघर्ष पेटलेले दिसतात.  क्योटो इथे झालेल्या  जागतिक जलपरिषदेतील अहवालात हा इशारा देण्यात आला आहे  की या पुढील युद्धे ही पाणी वाटपाबाबत किंवा पाण्याच्या तुटवड्यावरून होतील.  आपल्या सर्वांचा प्रमुख जलस्रोत म्हणजे 'पाऊस' ज्याचे अनिश्चित आगमन, उपलब्धी प्रमाण ही समस्या सतत भेडसावत  असते.

त्यामुळे पाण्याचे नियोजन आणि व्यवस्थापन ही समस्या दिवसेंदिवस गुंतागुंतीची होत चालली आहे. पाणी, लोकसंख्या आणि जमीन यांचा त्रिकोण जमविणे आवश्यक आहे.  युनिसेफने महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश या राज्यांच्या जलसर्वेक्षणाबाबत दिलेल्या अहवालात  या राज्यांना पिण्याच्या पाण्याची व उपलब्धतेची प्रमुख टंचाई भासण्याचा इशारा दिला आहे.

समस्यांचे मूळ कारण म्हणजे वाढते उद्योगीकरण, लोकसंख्येचा भस्मासुर, जंगलाची अवैध तोड यामुळे जलचक्राचे नियमन, पर्यावरणाचे संतुलन, वन्य प्राण्यांची कमी होणारी संख्‍या इ. समस्या ठळक रूपाने स्पष्ट होऊ लागल्या. पूर व दुष्काळ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

भारताचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान व प्रचंड जीवितहानी दरवर्षी होत असते. भू-गर्भातील पाण्याचा प्रचंड उपसा होत आहे. त्यामुळे ४०० फुटापर्यंतसुद्धा कूपनलिका कोरड्या ठणठणीत असतात. पुरोगामी महाराष्ट्रात ७५ तालुके अवर्षण प्रवणग्रस्त आहेत. दिवसेंदिवस हा आकडा फुगतच चालला आहे.

Pani Adva Pani Jirva In Marathi Nibandh
Pani Adva Pani Jirva In Marathi Nibandh


जलसंवर्धन व जलप्रदूषण या आणखी दोन प्रमुख समस्या भेडसावत आहेत. वाढते उद्योगिकरण त्यातून होणारे सांडपाणी, रासायनिक प्रदूषके, नागरी वस्तीचा सांडपाण्याचा लोट यामुळे पाण्यात प्रदूषणाचा उच्चांक झाला आहे.  याबाबत जंगलांचे संवर्धन करणे,त्यांचे संरक्षण करणे आणि पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्‍पना चांगल्‍या प्रकारे राबवायला पाहीजे.

ही काळाची गरज बनली आहे. 'वनश्री तेथे धनश्री' त्या प्रमाणेच वनश्री तेथे जलश्री याबाबत उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे. सर्व जलस्रोत, नद्या यांचा उगम बहुतांशी जंगलातच होतो. त्यामुळे वनांची बेसुमार व अवैधरीत्या तोड रोखणे गरजेचे आहे. तसेच डोंगर उतारावर वृक्षांची लागवड करून जमिनीची होणारी धूप रोखणे महत्त्वाचे आहे.

त्याचबरोबर, शेती करण्याचे आधुनिक पद्धतींचा वापर नगदी पिके उदा. ऊस यासारख्या पिकांवर संशोधन व कमी पाण्यात येणारी पिके यावर भर देणे, सध्या मोठ्या धरणांनी निर्माण केलेले प्रश्न हे फायद्यापेक्षा तोट्याचेच जास्त आहे. तेव्हा नद्यांवर छोटी-छोटी धरणे बांधून नदीचा प्रवाह जिवंत ठेवणे ज्यामुळे आजूबाजूचा परिसर हिरवागार राहील.

 भूजल पातळी टिकण्यास मदत होईल. ग्रामीण भागात विहीर पुनर्भरणासारखे कार्यक्रम राबवणे, पाणलोट क्षेत्र कार्यक्रम हाती घेणे. छोटे-छोटे नाले, बंधारे बांधणे 'गाव तेथे तळे' या संकल्पना साकारणे, ओढे, नाले यावर बांध घालणे इ. प्रमुख उपाययोजना या समस्यांवर सांगता येतील. जेणेकरून विविध प्रकारच्या जमिनीमध्ये पाणी जिरण्यास मदत होईल.

कारण पावसाचे पडणारे पाणी जमिनीत किती प्रमाणात मुरते व बाष्पीभवनाद्वारे किती पाणी वर बाष्पाच्या रूपात उडून जाते; याबाबत अजून कोणालाही अचूक सांगता आलेले नाही. त्यामुळे पाण्याचा एक एक थेंब या धरणीमातेच्या 'उदरात जिरवणे व भूजलपातळी सुधारणे' या गोष्टी आपल्या हातात आहे.


हवा, जल, प्राणी, वन, मानव ही पर्यावरणाची परस्परावलंबी साखळी अबाधित ठेवणे गरजेचे आहे. या साखळीतील प्रत्येक कडीचे जतन व संवर्धन करणे आवश्यक आहे, तरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल आणि या निसर्गाची जैव विविधता टिकून राहील. आज हजारो सपुष्प वनस्पती, शेकडो प्राणी, पक्ष्यांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत पाणी आणि निसर्गाच्या दरबारात चुकीला क्षमा नाही. याचे प्रत्यंतर 'ग्लोबल वॉर्मिंग, कॅटरीना, रीटा, त्सुनामी' या प्रलयांमधून आपण भोगत आहोत.

आज पाण्याला कितीतरी महत्त्व आले आहे. कारण पृथ्वीतलावर साधारण ७५% पाणीसाठा हा आकडा किती फसवा आहे? हे आपल्याला पुढील संदर्भावरून लक्षात येईल. त्यांपैकी फक्त २% पाणी गोड आणि त्यातील १-१.२५%  पाणी पिण्यासाठीशेतीसाठी योग्य आहे.

 तेव्हा पाण्याचा अवास्तव वापर करणे किती चुकीचे व मूर्खपणाचे आहे हे आपल्या लक्षात येते. पाणी संपत्ती असून तिचा पर्याप्त वापर केला गेला पाहिजे. आज महाराष्ट्रात हिरवे बाजार, राळेगण सिद्धी, दरेवाड, नायगाव, काळदरी ही गावे जल धोरणांचा योग्य पाठपुरावा करून ती कृतीत आणून विकास प्रक्रियेच्या दिशेने घोडदौड करीत आहेत आणि त्यात सातत्य राखत आहेत. जर या गावांना हे शक्य होत असेल तर ते आपल्याला का शक्य नाही?

 यासाठी आवश्यक आहे ती आत्मविश्वास, एकोपा व दृढनिश्चयाची. जलसमस्या ही शासनाची नसून माझी आहे. माझ्या गावाची आहे याची जाणीव होणे गरजेचे आहे. पुढील प्रत्येक विकास कार्यात जनतेला सहभागी करून घेणे क्रम प्राप्त ठरेल आणि जनतेचा पुढाकार व शासन त्यात सहभागी या धोरणाचा अवलंब केला पाहिजे.

समाजसेवक हजारे, डॉ. विलासराव साळुखे, राजस्थानचे जोहडवाले (पाणीवाले) डॉ. राजेंद्र सिंग यांनी आपल्यासमोर आदर्श उभे केले आहोत. जलसाक्षरता चळवळ वाडी वस्तीवर पोहोचवून पाण्याचे जतन म्हणजे पाण्याची निर्मिती या सूत्राचा प्रचार केला पाहिजे. जलसंवर्धन व जलसंरक्षणासाठी केलेले कायदे याबरोबर जनसहभाग वाढलाच पाहिजे. किंबहुना जनसहभाग हा जलसंवर्धनाचा मूलमंत्रच आहे.  असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्‍याच बरोबर पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना सवोच्‍च महत्‍व देऊन राबवली गेली पाहीजे तरच जलसंवर्धन होण्‍यास मदत होईल. 


वरील निबंधावरून आपल्‍याला समजुन येईल की जलसंकट किती भिषण समस्‍या आहे व त्‍यावर कोणत्‍या उपाययोजना केल्‍या पाहीजेत. तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे कमेंट करून सांगा तसेच जलसंवर्धन आणि पाणी अडवा पाणी जिरवा हे धोरण संपुर्णपणे यशस्‍वी करण्‍यासाठी व जनजागृती करण्‍यासाठी एक शेअर जरूर करा.  

पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध | Pani Adva Pani Jirva In Marathi Nibandh

पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध | Pani Adva Pani Jirva In Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज जलसंकट हे जगासमोर भेडसावणारी मोठी समस्‍या बनली आहे. “पाणी” निसर्गाने आपल्‍याला दिलेली अमुल्‍य भेट आहे. परंतु पाण्‍याचा जपुन वापर न केल्‍यामुळे मानवजाती पुढे जलसं‍कट उभे ठाकले आहे . याच्‍यासाठी समाजात,शाळा,महाविद्यालयामध्‍ये पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्‍पनेचे महत्‍व पटवुन जनजागृती केली गेली पाहीजे. चला तर मग  या निबंधाला सुरूवात करूया 

सर्व प्राणिमात्रांच्या जीवनात पाणी हे फार महत्त्वाचे आहे. पाणी म्हणजे जीवन. पण शहरातील लोकांना पाण्याची किंमत कळत नाही. ते लोक पाणी जपून वापरत नाहीत. खूप पाणी वाया घालवतात. खेड्यापाड्यांतील स्त्रियांना दूर अंतरावरून पाणी वाहून आणावे लागते. त्यांचे कष्ट लक्षात घेतले पाहिजेत. उन्हाळ्यात नदया, विहिरी आटतात. त्या वेळी लहानशा वाटीने खड्ड्यातील पाणी भरणारी मुले पाहिली की, जीव तडफडतो.

पाणी ही निसर्गाची देणगी आहे. त्यामुळेच माणसाला त्याची किंमत कळत नाही. पाण्याची टंचाई ही आता जगभर निर्माण झाली आहे. कारण जमिनीच्या पोटातील पाण्याची पातळी फार खाली गेली आहे. माणसाने जंगले नष्ट केली, बांधकाम केले. त्यामुळे जमिनीत जेवढे पाणी मुरायला हवे, तेवढे मुरत नाही. म्‍हणुन पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्‍पनेवर भर दिला गेला पाहीजे.

सुदैवाने आपल्या देशात विपुल पाऊस पडतो. पण हे पाणी समुद्रात वाहून जाते. आता हे पाणी आपण जमिनीत जिरवायला हवे, साठवायला हवे. त्यासाठी तळी, बंधारे किंवा धरणे बांधली पाहिजेत. म्हणजे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढेल. विहिरींना व नदयांना बारमहा पाणी राहील. झाडे जगतील. जंगले वाढतील. शेती चांगली होईल, माणूस सुखाने जगेल.  


पाणी हे जीवनाचे मूलतत्त्व आहे. पाण्याशिवाय जीवन ही कल्पनाच शक्य नाही. पाण्यावरच सर्व सजीवसृष्टीचे जीवन सुख समृद्धी अवलंबून आहे.  सध्या पाणी प्रश्नाबाबत जागतिक स्तरावर प्रयत्न होत आहेत. त्याचाच परिपाक म्हणजे एप्रिल महिन्यात आयोजित केले जाणारे 'जल संपत्ती दिन' या निमित्त आपल्या देशात जे साक्षरता अभियान राबविले जात आहे. 'पाणी वाचवाल तर वाचाल' हा नव्या युगाचा महामंत्र आहे.

प्रयोगशाळेत पाणी बनविता येते परंतु सर्वांची गरज पुरवेल इतके नक्कीच नाही. आज जगात पाण्यावरून संघर्ष पेटलेले दिसतात.  क्योटो इथे झालेल्या  जागतिक जलपरिषदेतील अहवालात हा इशारा देण्यात आला आहे  की या पुढील युद्धे ही पाणी वाटपाबाबत किंवा पाण्याच्या तुटवड्यावरून होतील.  आपल्या सर्वांचा प्रमुख जलस्रोत म्हणजे 'पाऊस' ज्याचे अनिश्चित आगमन, उपलब्धी प्रमाण ही समस्या सतत भेडसावत  असते.

त्यामुळे पाण्याचे नियोजन आणि व्यवस्थापन ही समस्या दिवसेंदिवस गुंतागुंतीची होत चालली आहे. पाणी, लोकसंख्या आणि जमीन यांचा त्रिकोण जमविणे आवश्यक आहे.  युनिसेफने महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश या राज्यांच्या जलसर्वेक्षणाबाबत दिलेल्या अहवालात  या राज्यांना पिण्याच्या पाण्याची व उपलब्धतेची प्रमुख टंचाई भासण्याचा इशारा दिला आहे.

समस्यांचे मूळ कारण म्हणजे वाढते उद्योगीकरण, लोकसंख्येचा भस्मासुर, जंगलाची अवैध तोड यामुळे जलचक्राचे नियमन, पर्यावरणाचे संतुलन, वन्य प्राण्यांची कमी होणारी संख्‍या इ. समस्या ठळक रूपाने स्पष्ट होऊ लागल्या. पूर व दुष्काळ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

भारताचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान व प्रचंड जीवितहानी दरवर्षी होत असते. भू-गर्भातील पाण्याचा प्रचंड उपसा होत आहे. त्यामुळे ४०० फुटापर्यंतसुद्धा कूपनलिका कोरड्या ठणठणीत असतात. पुरोगामी महाराष्ट्रात ७५ तालुके अवर्षण प्रवणग्रस्त आहेत. दिवसेंदिवस हा आकडा फुगतच चालला आहे.

Pani Adva Pani Jirva In Marathi Nibandh
Pani Adva Pani Jirva In Marathi Nibandh


जलसंवर्धन व जलप्रदूषण या आणखी दोन प्रमुख समस्या भेडसावत आहेत. वाढते उद्योगिकरण त्यातून होणारे सांडपाणी, रासायनिक प्रदूषके, नागरी वस्तीचा सांडपाण्याचा लोट यामुळे पाण्यात प्रदूषणाचा उच्चांक झाला आहे.  याबाबत जंगलांचे संवर्धन करणे,त्यांचे संरक्षण करणे आणि पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्‍पना चांगल्‍या प्रकारे राबवायला पाहीजे.

ही काळाची गरज बनली आहे. 'वनश्री तेथे धनश्री' त्या प्रमाणेच वनश्री तेथे जलश्री याबाबत उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे. सर्व जलस्रोत, नद्या यांचा उगम बहुतांशी जंगलातच होतो. त्यामुळे वनांची बेसुमार व अवैधरीत्या तोड रोखणे गरजेचे आहे. तसेच डोंगर उतारावर वृक्षांची लागवड करून जमिनीची होणारी धूप रोखणे महत्त्वाचे आहे.

त्याचबरोबर, शेती करण्याचे आधुनिक पद्धतींचा वापर नगदी पिके उदा. ऊस यासारख्या पिकांवर संशोधन व कमी पाण्यात येणारी पिके यावर भर देणे, सध्या मोठ्या धरणांनी निर्माण केलेले प्रश्न हे फायद्यापेक्षा तोट्याचेच जास्त आहे. तेव्हा नद्यांवर छोटी-छोटी धरणे बांधून नदीचा प्रवाह जिवंत ठेवणे ज्यामुळे आजूबाजूचा परिसर हिरवागार राहील.

 भूजल पातळी टिकण्यास मदत होईल. ग्रामीण भागात विहीर पुनर्भरणासारखे कार्यक्रम राबवणे, पाणलोट क्षेत्र कार्यक्रम हाती घेणे. छोटे-छोटे नाले, बंधारे बांधणे 'गाव तेथे तळे' या संकल्पना साकारणे, ओढे, नाले यावर बांध घालणे इ. प्रमुख उपाययोजना या समस्यांवर सांगता येतील. जेणेकरून विविध प्रकारच्या जमिनीमध्ये पाणी जिरण्यास मदत होईल.

कारण पावसाचे पडणारे पाणी जमिनीत किती प्रमाणात मुरते व बाष्पीभवनाद्वारे किती पाणी वर बाष्पाच्या रूपात उडून जाते; याबाबत अजून कोणालाही अचूक सांगता आलेले नाही. त्यामुळे पाण्याचा एक एक थेंब या धरणीमातेच्या 'उदरात जिरवणे व भूजलपातळी सुधारणे' या गोष्टी आपल्या हातात आहे.


हवा, जल, प्राणी, वन, मानव ही पर्यावरणाची परस्परावलंबी साखळी अबाधित ठेवणे गरजेचे आहे. या साखळीतील प्रत्येक कडीचे जतन व संवर्धन करणे आवश्यक आहे, तरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल आणि या निसर्गाची जैव विविधता टिकून राहील. आज हजारो सपुष्प वनस्पती, शेकडो प्राणी, पक्ष्यांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत पाणी आणि निसर्गाच्या दरबारात चुकीला क्षमा नाही. याचे प्रत्यंतर 'ग्लोबल वॉर्मिंग, कॅटरीना, रीटा, त्सुनामी' या प्रलयांमधून आपण भोगत आहोत.

आज पाण्याला कितीतरी महत्त्व आले आहे. कारण पृथ्वीतलावर साधारण ७५% पाणीसाठा हा आकडा किती फसवा आहे? हे आपल्याला पुढील संदर्भावरून लक्षात येईल. त्यांपैकी फक्त २% पाणी गोड आणि त्यातील १-१.२५%  पाणी पिण्यासाठीशेतीसाठी योग्य आहे.

 तेव्हा पाण्याचा अवास्तव वापर करणे किती चुकीचे व मूर्खपणाचे आहे हे आपल्या लक्षात येते. पाणी संपत्ती असून तिचा पर्याप्त वापर केला गेला पाहिजे. आज महाराष्ट्रात हिरवे बाजार, राळेगण सिद्धी, दरेवाड, नायगाव, काळदरी ही गावे जल धोरणांचा योग्य पाठपुरावा करून ती कृतीत आणून विकास प्रक्रियेच्या दिशेने घोडदौड करीत आहेत आणि त्यात सातत्य राखत आहेत. जर या गावांना हे शक्य होत असेल तर ते आपल्याला का शक्य नाही?

 यासाठी आवश्यक आहे ती आत्मविश्वास, एकोपा व दृढनिश्चयाची. जलसमस्या ही शासनाची नसून माझी आहे. माझ्या गावाची आहे याची जाणीव होणे गरजेचे आहे. पुढील प्रत्येक विकास कार्यात जनतेला सहभागी करून घेणे क्रम प्राप्त ठरेल आणि जनतेचा पुढाकार व शासन त्यात सहभागी या धोरणाचा अवलंब केला पाहिजे.

समाजसेवक हजारे, डॉ. विलासराव साळुखे, राजस्थानचे जोहडवाले (पाणीवाले) डॉ. राजेंद्र सिंग यांनी आपल्यासमोर आदर्श उभे केले आहोत. जलसाक्षरता चळवळ वाडी वस्तीवर पोहोचवून पाण्याचे जतन म्हणजे पाण्याची निर्मिती या सूत्राचा प्रचार केला पाहिजे. जलसंवर्धन व जलसंरक्षणासाठी केलेले कायदे याबरोबर जनसहभाग वाढलाच पाहिजे. किंबहुना जनसहभाग हा जलसंवर्धनाचा मूलमंत्रच आहे.  असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्‍याच बरोबर पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना सवोच्‍च महत्‍व देऊन राबवली गेली पाहीजे तरच जलसंवर्धन होण्‍यास मदत होईल. 


वरील निबंधावरून आपल्‍याला समजुन येईल की जलसंकट किती भिषण समस्‍या आहे व त्‍यावर कोणत्‍या उपाययोजना केल्‍या पाहीजेत. तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे कमेंट करून सांगा तसेच जलसंवर्धन आणि पाणी अडवा पाणी जिरवा हे धोरण संपुर्णपणे यशस्‍वी करण्‍यासाठी व जनजागृती करण्‍यासाठी एक शेअर जरूर करा.