Mazi Aaji Essay In Marathi

निबंध क्र १ 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझी आजी मराठी निंबध बघणार आहोत. या निबंधामध्‍ये गावाकडे राहणा-या आजीची दिनचर्या व माहीती दिली आहे . या निबंधात आजीने माझे म्हणजे नातवाचे पुरवलेले लाड, गावात असणा-या लोकांची मदत आजी कश्‍याप्रकारे करते हे  तुम्‍हाला वाचण्‍यात येईल . चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


बाबांना 'पारितोषिक मिळाले होते आणि बाबांचा सत्कार समारंभ होता, म्हणून आजी गावाहुन आली होती. आज ती परत जायला निघाली होती. आम्ही तिला येथेच राहण्याचा खूप आग्रह करीत होतो. पण ती मुळीच तयार नव्हती. आजी म्हणाली, " अरे नंदू, माझी खुप कामे रखडली आहेत तिकडे. हे बघ यापेक्षा आता ऑक्टोबरमध्ये तुला सुट्टी लागेल ना, तेव्हा तूच तिकडे ये. अरे, तुझी मदत होईल मला." आजीने माझी समजूत घातली आणि घराबाहेर पाऊल टाकले. आम्ही पाहतच राहिलो.


आजीने वयाची पंच्याहत्तरी ओलांडली आहे; पण आजी थोडीही वाकलेली नाही. खरं सांगायचं तर गेल्या कित्येक वर्षांत आजीच्या शारीरिक ठेवणीत कोणताच बदल झालेला नाही. गेली वीस वर्षे आजीआजोबा त्या गावात राहत आहेत. चार वर्षांपूर्वी आजोबा वारले, तेव्हा वाटलं की आजी आता तरी आमच्या घरी शहरात येईल; पण उलट आजी गावातच अधिक गुंतत गेली.


माझे आजीआजोबा हे पहिल्यापासूनच आदर्शवादी. उत्कृष्ट गुणवत्ता असतानाही ते कधी पैशांच्या मागे लागले नाहीत; तर आयुष्यभर ते दोघेही कर्मवीर भाऊरावांच्या 'रयत शिक्षण' संस्थेत काम करीत राहिले. संस्थेतून निवृत्त झाल्यावर ते सासवने गावात काम करीत राहिले. सगळा 'निष्काम कर्मयोग'! काम करणाऱ्याला कामांची उणीव कधीच भासत नाही हे खरंच!  


हे  निबंध पण वाचा  




आजीआजोबांच्या भोवती सदा माणसांचा गराडा असे. आता आजोबा नाहीत. पण एकटी आजी गावाचे सगळे प्रश्न सोडवत असते. ती साऱ्या गावाची 'मोठी आई' बनली आहे.

Mazi Aaji Essay In Marathi
Mazi Aaji Essay In Marathi


आजीच्या स्वतःच्या गरजा अतिशय मर्यादित आहेत. अगदी सकाळी लवकर उठून ती स्वतःची सर्व कामे  आवरते. साडेआठ नऊला ती न्याहरी करते. न्याहरी म्हणजे भाकरी किंवा पोळी. कधी भाताची पेज. पण हेच आजीचे दिवसभराचे जेवण. आजी दिवसातून एकदाच जेवते. मधल्या वेळी एखादे फळ आणि रात्री फक्त कपभर दूध; मर्यादित खाणे हेच आजीच्या उत्तम प्रकृतीचे गमक असावे, असे मला वाटते. 


आजी स्वतःसाठी नित्याच्या स्वयंपाकाखेरीज खास काही करत नसली, तरी निरनिराळे स्वादिष्ट पदार्थ तयार करण्यात तिचा हातखंडा आहे. त्यामुळे सुट्टीत आजीकडे गेलो की, चंगळ असते. दुसरी चंगळ असते, ती वाचनाची. आजीकडे उत्तम पुस्तकांचा संग्रह आहे. त्यामुळे मला मनसोक्त वाचन करता येते. आजीने गावाला अगदी वेगळेच रूप आणून दिले आहे. गावातील सर्व स्त्रिया आता स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. आजीने त्यांचे बचतगट स्थापन केले आहेत. आजी स्वतः कोणत्याही पदावर नसते; पण ती त्यांच्या मागे खंबीरपणे उभी असते. आजीच्या स्वास्थ्यपूर्ण जीवनाचे हेच रहस्य असावे.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व गावाकडील तुमच्‍या कोणत्‍या आडवणी ताज्‍या झाल्‍या त्‍या तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद 
महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • शहरापेक्षा खेडेगावात राहणे आजीला आवडते
  • पंच्याहत्तरी ओलांडली तरी
  • तेवढीच कार्यव्यग्रता 
  • सुरुवातीपासून आदर्शवादी जीवन 
  • दुसऱ्यांसाठी झटणे 
  • वेळ अपुरा पडतो 
  • कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता सतत कामात दंग.

निबंध क्र २ 

Majhi Aaji Essay In Marathi


माझी आजी ! आमच्या कुटुंबातील वयाने सर्वांत मोठी, वडीलधारी व्यक्ती. तिच्या वागण्याबोलण्यात कमालीचा साधेपणा आहे. ती सकाळी आमच्या लवकर उठते. अंघोळ आटोपली की ती माझ्या आईबरोबर स्वयंपाकघरात वावरते. आई तिला काम करू देत नाही. पण आजी ऐकतच नाही. आजीला स्वयंपाक करायला खूप आवडते. न्याहारीसाठी ती कधीतरी एखादा पदार्थ करते. तिने केलेला पदार्थ सगळ्यांना आवडला की ती खूश होते. दुपारी जेवून झाले की काही वेळ ती टी. व्ही. पाहते. कधी कधी टी. व्ही. पाहता पाहता तेथेच झोपते. संध्याकाळ झाली की ती फेरी मारायला बाहेर पडते. ही संध्याकाळची फेरी मात्र ती कधीच चुकवत नाही.


माझी आजी एका कारणासाठी मला खूप आवडते. ती कधीही रागावत नाही. मला तिने अजूनपर्यंत एकदाही साधी एक चापटही मारलेली नाही. एकदाही रागावली नाही. उलट, आईबाबा रागावले की ती माझीच बाजू घेते. माझ्या बाबांनाच दटावते ! आईबाबा अभ्यासासाठी खूप मागे लागले, तरी आजीला आवडत नाही. त्यामुळे मी आजीवर खूश ! तिने काहीही सांगितले की मी ताबडतोब करतो. तिला वाईट वाटणार नाही. याची काळजी घेतो. आईबाबासुद्धा आजीसारखेच वागले, तर किती छान होईल ! 



आजीला वाचनाचा छंद आहे; पण हल्ली तिचे डोळे दुखतात. मग ती मलाच, वाचायला सांगते आणि ती ऐकते. तिला माझी अभ्यासाची पुस्तकेसुद्धा आवडतात. माझीच पुस्तके मला मोठ्याने वाचायला सांगते. दररोज संध्याकाळी मी तिच्यासाठी माझे एखादे पुस्तक वाचतो. मध्ये मध्ये तिला काही कळले नाही की ती मला आपली शंका विचारते. मीसुद्धा माझ्या परीने तिचे शंकानिरसन करतो. अलीकडे माझ्या लक्षात येऊ लागले आहे की, आजीला वाचून दाखवता दाखवता माझा अभ्यास आपोआप होत असतो.


एका गोष्टीसाठी मात्र तिचा खास आग्रह असतो. काहीही खाण्यापूर्वी किंवा स्वयंपाकाच्या भांड्यांना हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुतले पाहिजेत, असे ती सांगते. बाबांनासुद्धा ती तसेच सांगते. आजीने काहीही सांगितले की बाबा निमूटपणे ऐकतात. माझे मित्र घरी आले की आजी बेहद्द खूश होते. ती काहीतरी खाऊ करून त्यांना देतेच. ऐंशीच्या घरातील माझी आजी अजूनही उत्साहात वावरते. ती कधी आजारी पडल्याचे मला तरी आठवत नाही. कधीतरी ती मला आपले पाय चेपायला सांगते, तेवढेच. अशी ही माझी आजी मला खूप खूप आवडते.


महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )
  • माझी आजी साधी 
  • दिनक्रम 
  • सकाळी अंघोळीनंतर देवपूजा
  • स्वयंपाकात आईला मदत
  • दुपारी टी. व्ही. पाहणे
  • संध्याकाळी फेरी मारणे
  • रागावत नाही
  • नीटनेटकेपणा स्वच्छता 
  • मित्रांशी प्रेमाने वागते 
  • अजूनही ठणठणीत.



निबंध क्र ३ 

आजीने केव्हाच सत्तरी ओलांडली आहे, पण याची आठवण आजीला कुठे आहे? तीन वर्षांपूर्वी तिचा सत्तरावा वाढदिवस साजरा करायला आम्ही सगळेजण तिच्या घरी-तळेगावला गेलो, तेव्हा तिला धक्काच बसला. आपण इतके वृद्ध झालो आहोत, असे तिच्या कधी स्वप्नातही आले नव्हते.आजीचे म्हणजेच आम्हा सर्वांचे घर तळेगावला आहे. तेथून जवळच आमचा एक शेतमळा आहे.

त्यामुळे माझे बाबा, काका, आत्या शिक्षणासाठी आणि पुढे नोकरी-व्यवसायासाठी गावाबाहेर पडले, तरी आजीआजोबा तळेगावच्या घरातच वास्तव्य करून राहिले आणि आजोबांच्या मागेही आजी आजवर त्याच घरात एकटी राहते. आपण एकटे आहोत असे मुळी तिला कधी वाटतच नाही. दिवसभर ती आपल्या कामातच गुंतलेली असते. आमची आजी तेथील शेजारपाजारच्या लोकांची 'आई' आहे.

ती सकाळी लवकर उठते आणि आपली स्वत:ची सर्व कामे उरकून, थोडीशी न्याहारी करून गावातल्या 'निवारा' केंद्रात जाते. तेथे अनेक वृद्ध राहतात. त्यांतील काही वृद्ध निराधार आहेत. रोज दोन तास आजी तेथील मंडळींची कामे करत असते. कुणाचे पत्र लिहायचे असते, कुणाच्या शर्टाला गुंड्या लावायच्या असतात. अशी बारीकसारीक हजारो कामे करताना आजी स्वत:ला कधी वृद्ध समजतच नाही.

दुपारच्या वेळी काही गृहिणी जमतात. त्यांच्याबरोबर चांगल्या पुस्तकांचे वाचन, वर्तमानपत्रांचे सामुदायिक वाचन, त्यावर चर्चा, चिंतन असे तिचे कार्य सतत चाललेले असते. तोपर्यंत दुपार संपत येते. नंतर आजी जवळच्या एका आदिवासी पाड्यावर जाते. त्या आदिवासी स्त्री-पुरुषांना चांगल्या कामात गुंतवून व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी आजी धडपडत असते. हातपाय चालतात तोवर माणसाने काही तरी कार्य करत राहिले पाहिजे अशी तिची शिकवण आहे. खऱ्या अर्थाने आजी त्या गावाच्या परिसरातील लोकांची आई झाली आहे.


निबंध क्र ४ 

आमची आजी घरातील सर्वांना खूप आवडते. ती नेहमी हसतमुख असते. सगळ्यांशी प्रेमाने वागते.आमची आजी अजिबात आळशी नाही. ती सर्वांच्या आधी उठते आणि रात्री मात्र सर्वांत लवकर झोपते. ती आम्हांला नेहमी सांगते, “लवकर निजे, लवकर उठे, त्यास ज्ञान, आरोग्य भेटे." सकाळी उठल्यावर स्वत:ची सर्व कामे आटोपून घेते. मग देवपूजा व पोथीवाचन करते. देवपूजेनंतर न्याहरी करते. त्यानंतर ती आईसोबत थोडे कामही करते.

 नऊ वाजेपर्यंत सगळेजण आपापल्या कामावर निघून जातात, मग आजी एकटीच घरी असते. तीच मग घराची काळजी घेते. संध्याकाळी आम्ही घरी येतो, तेव्हा ती आम्हाला काहीतरी छानसा खाऊ करून देते,संध्याकाळी ती मुरलीधराच्या देवळात जाते. तेथे ती सातपर्यंत रमलेली असते, घरी जाल्यावर थोडेसे काहीतरी खाऊन ती वाचन करते आणि मग झोपी जाते. अशी ही आमची आजी सर्वांची आवडती आहे.
महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • आजीचे घरातील आणि इतरांच्या मनातील स्थान 
  • वयदिनक्रम 
  • सुगरण, सुगृहिणी 
  • संध्याकाळी देवळात 
  • रात्री जेवण, वाचन व झोप.

निबंध क्र 5

“मी देवळात जाऊन येते ग,' पूजेच्या तबकात ओंजळभर मोगऱ्याची फुलं आणि दुर्वांची जुडी ठेवत आजी आईला म्हणाली. आम्हा नातवंडांपैकी एकालाही बरोबर चलण्याचा आग्रह तिने केला नाही. कारण आज तिला एकटीलाच जायचे होते. त्या दिवशी आजीने गजानन महाराजांच्या पादुकांवर मोगऱ्याची फुले वाहून माथा टेकवला तो अखेरचाच! मनाचा मोगरा, देहाचे दुर्वांकुर योगिराजाच्या चरणी समर्पित केले. असं भाग्याचं मरण 

एखाद्याच्याच भाळी रेखलं असतं.  आजीच्या मृत्यूने आमच्या कुटुंबावर दुर्भाग्याची कुन्हाड कोसळली. अपत्यांवर, सुनांवर, नातवंडांवर अतूट माया करणाऱ्या त्या माऊलीने 'भरल्या गोकुळा' चा कायमचा निरोप घेतला. 'देवळात जाते' सांगून 'देवाघरी' प्रयाण केले. आम्ही शोकावेगाने फोडलेला टाहो तिला ऐकू जाणार नव्हता. एकाच वर्षाच्या आत आजोबा-आजीचं छत्र हिरावून घेणारा देव ‘दयाघन' उरला नाही. आमचं दुःख शब्दातीत होतं.


आमच्यावर आजीचा केवढा जीव ! बाबा म्हणायचे, "तुझं मुलांपेक्षा नातवंडांवर काकणभर जास्तच प्रेम आहे.' त्यावर ती उत्तरायची, “अरे बाबा, नातवंडं म्हणजे दुधावरची साय'' खरं सांगायचं तर तिने आम्हाला सायीपेक्षाही जास्त जपलं. तिच्या शब्दात काय जादू होती कोणास ठाऊक, तिने सांगितलेली प्रत्येक गोष्ट मला पटायची. साहजिकच तिची अवज्ञा करण्याचा प्रसंग सहसा येत नसे.


लवकर उठणे, देवपूजेसाठी फुले तोडणे, आईला छोट्या छोट्या कामात मदत करणे, नियमित गृहपाठ करणे, संध्याकाळी खेळून आल्यावर शुभंकरोति, रामरक्षा म्हणणे यामुळे आजी माझ्यावर खूष असायची. माझी चुलत भावंडं लटक्या रुसव्याने म्हणायची, "नाहीतरी समीरदादा आजीचा जास्तच लाडका आहे.'' लोण्याहून मऊ अंतःकरणाची आजी कठीण वज्राचा भेद करण्याइतकी खंबीरही होती. तिचं जीवन म्हणजे एक कंटकमय प्रवास.


ऐन तारुण्यात आजोबांना अपघात झाला. 'जिवावरचं पायावर निभावलं' यातच आजीनं समाधान मानल. पदरी तीन अपत्य. संसाराचा गाडा कसा रेटायचा? यक्षप्रश्न होता. युधिष्ठिराच्या स्थिरतेने, चतुराईने तिने तो सोडवला. सुदैवाने एका खाजगी शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली. पतीची सेवा, मुलांचं संगोपन करता करता विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करण्याचे काम ती मनापासून करू लागली. तिच्या उद्बोधक गोष्टी नि सुरेल आवाजातील कविता ऐकणे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक सुखद अनुभव होता.



आजीच्या स्वभावाचा एक उल्लेशनीय पैलू म्हणजे ती 'आदर्श सासू' होती. तिने सुनांना भरभरून प्रेम दिले. त्यांना माहेरची आठवण येऊ दिली नाही. “सून म्हणजे गृहलक्ष्मी. ती प्रसन्न असली तर घरात स्वर्गसुख नांदतं' असं तिचं ठाम मत होतं. त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला न घातला त्यांच्यावर प्रेमाचा अंकुश ठेवण्याचं तंत्र तिला उत्तम साधलं होतं. पुरणपोळी खावी तर आजीच्याच हातची. अन्नपूर्णेचा वरदहस्त लाभलेली आजी 'सुगरण' होती हे सांगायलाच नको. चटणीपासून पंचपक्वान्नांपर्यंत तिच्या हातच्या प्रत्येक पदार्थाला अमृताची गोडी असायची. जेवणाऱ्याने तृप्तीची ढेकर दिली की आजीचं मन आनंदाने तुडुंब भरायचं. चेहऱ्यावर समाधान झळकायचं.


तिचं प्रत्येक काम स्वच्छ, व्यवस्थित, नीटनेटकं. अंगणात रेखलेली रांगोळी असो की पाटीवर लिहिलेली बाराखडी असो, ती पुसावीशी वाटत नसे. तिला काय येत नव्हतं ते विचारा. शिवणकाम, विणकाम, भरतकाम, पाककला, हस्तकला सर्वच कलांमध्ये तिला चांगली गती होती. अशा 'बहुगुणी' आजीचे गुण किती व" नि किती नको?


आजी म्हणजे अस्सल चंदनी खोड. झिजणे हा तिचा मंत्र. आजाऱ्याची शुश्रूषा करायची, अडल्यानडल्याच्या मदतीला धावून जायचे, हतबल झालेल्याला धीर द्यायचा हेच तिचं जीवनव्रत होतं. उपासना होती, देवपूजा होती. तिने व्रतवैकल्यं, सोवळंओवळं, पूजापोथी याचं फारसं अवडंबर केल्याचं स्मरत नाही. 'Work is worship, Duty is God' हे वचन तिनं आपल्या जीवनात उतरवलं होतं. तिच्या पार्थिव देहाला अग्नी देण्यात आला तेव्हा मनात विचार चमकून गेला, चितेवर रचलेली काष्ठे चंदनाची नसतील, पण देह मात्र अस्सल चंदनी आहे.'

निबंध क्र 6

 माझी आजी ही माझ्या जीवनातील एक महत्त्वाची व्यक्ती आहे. तिचे वय साठ वर्षे आहे. मात्र तिची प्रकृती अतिशय उत्तम आहे. मी आजपर्यंत तिला कधीही आजारी पडलेले किंवा औषधे घेताना पाहिले नाही. फक्त वाचण्यापुरता तिला चश्मा लावावा लागतो. तिचा पोशाख म्हणजे साधी पण स्वच्छ सुती साडी. स्वच्छतेच्या बाबतीत ती फार काटेकोर असते.


आजी कायम हसतमुख असते. ती आजोबांच्या तब्बेतीची सर्व प्रकारे काळजी घेते. दिवसभर ती स्वत:ला व्यस्त ठेवते. तिला वाचनाची अतिशय आवड आहे. वेळ मिळेल तेव्हा ती पुस्तके वाचते. रोज संध्याकाळी ती नियमाने फिरायला जाते. सणांच्या दिवशी मंदिरात जाणे, पूजा-अर्जा करायला तिला अतिशय आवडते. तिने बनविलेले पदार्थही अतिशय रुचकर असतात. ती अतिशय शिस्तप्रिय आहे. आम्हा नातवंडांनाही ती शिस्तीचे धडे देत असते. बाबा तिचा व आजोबांचा सल्ला घेतल्याशिवाय कुठलेही काम करीत
नाहीत.


मला माझी आजी खूप आवडते. आई किंवा बाबा मला रागवल्यावर तीच माझी समजूत काढते. मी परिक्षेत चांगले गुण मिळवल्यावर ती माझे कौतुक करते. रोज झोपतांना ती मला एक छानशी गोष्ट सांगते. आजी आमच्या घरातील महत्त्वाची व्यक्ती आहे. मला माझी आजी खूप आवडते.

निबंध क्र 7

माझी आजी मराठी निबंध 


माझी आजी :  माझ्या आजीचे नाव आहे 'मथुरा'. ती मुंबईला  राहते. तिला निसर्ग फार आवडतो . तिला स्वच्छता फार आवडते. ती शिस्तप्रिय आहे. तिला रिकामे बसणे आवडत नाही . वेळ अमूल्य आहे, वेळेचा सदुपयोग करा हाच तिचा संदेश आहे.


सत्तरी उलटली तरी ती उद्योगी आहे. 'आळसे कार्यभाग नासतो' हे तिचे ठाम मत आहे. अजूनही ती दिवसभर घरकाम , बागकाम , समाजकार्य यात मग्न असते. ती रोज सकाळी देवदर्शनास जाते, ज्ञानेश्वरी वाचते, गीतेचे श्लोक म्हणते, बातम्या ऐकते व सायंकाळी समुद्रकिनाऱ्यावर जाते. तिला समुद्र, खळाळणाऱ्या लाटांचं संगीत , देखणा सूर्यास्त सारं खूप आवडतं. शांतपणे निसर्ग निरखित ती बराच वेळ स्तब्धपणे बसून राहते. जणू अथांग सागरासारख्या या अथांग जीवनाचा वेध घेत असावी.



माझी आजी उत्तम कवयित्री आहे. निसर्गाचं सान्निध्य तिला खूप आवडतं. वृक्ष , लता, वेली, पाखरं , चंद्र, चांदणे, धरती, आभाळ हे तिचे जिवाभावाचे शब्द . आपल्या हृदयातल्या भावना या शब्दात ती सहजगत्या ओवते. कविता जन्माला येते. नुसते शब्द नसतात ते! सारं जीवन बध्द असतं त्यात! 


आजीचं शिक्षण फारसं झालेलं नसलं तरी हृदयानं ती खूप खूप श्रीमंत आहे, मोठ्या मनाची आहे. केस पांढरे झाले पण मनाचा हिरवेपणा कायम आहे. ती चिरयौवना आहे. दुःखी, गरजू यांच्या हाकेला ती धावून जाते. सर्व जण तिला 'आजी' च म्हणतात.


पांढरी शुभ्र साडी, नितळ कांती, हसरा चेहरा, बोलके डोळे, केसांचा घट्ट अंबाडा, त्यात खोचलेले गुलाबाचे फूल, सारं काही सुंदर. तिच्या हातच्या बेसनाच्या लाडूची चव काही वेगळीच! अन्न हे पूर्णब्रह्म आहे, फक्त उदरभरण नाही, हे तिनेच मला समजाविले . संस्काराचं जे खत-पाणी तिने मला दिलं , तो माझा अमूल्य ठेवा आहे. तिच्याबरोबर राहण्याची गोडीच अवीट आहे. प्रत्येक सुटीत मी आजीकडे जातो.



सुटी संपली की तिला सोडून निघणं जिवावर येतं. पाय निघतच नाही तिथून . आम्हा दोघांचेही डोळे पाणावतात तिच्या सहवासातले क्षण अलगद मुठीत मखमली मुलायमतेने लपवून मी निघतो, परत लवकर येण्यासाठी! ती बरोबर नसताना तिने सांगितलेल्या गोष्टी आठवतात , मग एकटाच मी कधी खदाखदा हसतो तर कधी एकटाच हमसाहमशी रडतो.


तिने माझ्याबरोबर दिलेली तिची औषधे मला हमखास बरी करतात इतिहासातले आदर्श तिने गोष्टीतून माझ्या रक्ताच्या थेंबाथेंबात पेरले आहेत ; मला त्याची जाणीव आहे. मला खऱ्या अर्थाने 'मोठे' होऊन कुटुंब, समाज , देश यांचे ऋण फेडायचे आहे. तिनेच मला सांगितले 
“ फेक भविष्य फसवे,
हाती ठेव वर्तमान..." 

इतक्या सहजतेने ती जीवनाला सामोरं जाणं शिकविते . ती माझा गुरू , मित्र सारं काही आहे. दुधावरच्या सायीसारखं ती मला जपते. तिच्या मायेच्या पदराआड अखिल विश्वातली भीती लुप्त होते. तिच्या प्रेमात मी आकंठ तृप्त होतो. फुलासारखं कोमल तर प्रसंगी वज्राहूनही कठीण असं तिच हृदय आहे. माझ्या निराशेवर ती फुकर घालते. तिचे वर्णन करायला शब्द थिटे पडतात.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

Mazi Aaji Essay In Marathi | माझी आजी मराठी निबंध

Mazi Aaji Essay In Marathi

निबंध क्र १ 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझी आजी मराठी निंबध बघणार आहोत. या निबंधामध्‍ये गावाकडे राहणा-या आजीची दिनचर्या व माहीती दिली आहे . या निबंधात आजीने माझे म्हणजे नातवाचे पुरवलेले लाड, गावात असणा-या लोकांची मदत आजी कश्‍याप्रकारे करते हे  तुम्‍हाला वाचण्‍यात येईल . चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


बाबांना 'पारितोषिक मिळाले होते आणि बाबांचा सत्कार समारंभ होता, म्हणून आजी गावाहुन आली होती. आज ती परत जायला निघाली होती. आम्ही तिला येथेच राहण्याचा खूप आग्रह करीत होतो. पण ती मुळीच तयार नव्हती. आजी म्हणाली, " अरे नंदू, माझी खुप कामे रखडली आहेत तिकडे. हे बघ यापेक्षा आता ऑक्टोबरमध्ये तुला सुट्टी लागेल ना, तेव्हा तूच तिकडे ये. अरे, तुझी मदत होईल मला." आजीने माझी समजूत घातली आणि घराबाहेर पाऊल टाकले. आम्ही पाहतच राहिलो.


आजीने वयाची पंच्याहत्तरी ओलांडली आहे; पण आजी थोडीही वाकलेली नाही. खरं सांगायचं तर गेल्या कित्येक वर्षांत आजीच्या शारीरिक ठेवणीत कोणताच बदल झालेला नाही. गेली वीस वर्षे आजीआजोबा त्या गावात राहत आहेत. चार वर्षांपूर्वी आजोबा वारले, तेव्हा वाटलं की आजी आता तरी आमच्या घरी शहरात येईल; पण उलट आजी गावातच अधिक गुंतत गेली.


माझे आजीआजोबा हे पहिल्यापासूनच आदर्शवादी. उत्कृष्ट गुणवत्ता असतानाही ते कधी पैशांच्या मागे लागले नाहीत; तर आयुष्यभर ते दोघेही कर्मवीर भाऊरावांच्या 'रयत शिक्षण' संस्थेत काम करीत राहिले. संस्थेतून निवृत्त झाल्यावर ते सासवने गावात काम करीत राहिले. सगळा 'निष्काम कर्मयोग'! काम करणाऱ्याला कामांची उणीव कधीच भासत नाही हे खरंच!  


हे  निबंध पण वाचा  




आजीआजोबांच्या भोवती सदा माणसांचा गराडा असे. आता आजोबा नाहीत. पण एकटी आजी गावाचे सगळे प्रश्न सोडवत असते. ती साऱ्या गावाची 'मोठी आई' बनली आहे.

Mazi Aaji Essay In Marathi
Mazi Aaji Essay In Marathi


आजीच्या स्वतःच्या गरजा अतिशय मर्यादित आहेत. अगदी सकाळी लवकर उठून ती स्वतःची सर्व कामे  आवरते. साडेआठ नऊला ती न्याहरी करते. न्याहरी म्हणजे भाकरी किंवा पोळी. कधी भाताची पेज. पण हेच आजीचे दिवसभराचे जेवण. आजी दिवसातून एकदाच जेवते. मधल्या वेळी एखादे फळ आणि रात्री फक्त कपभर दूध; मर्यादित खाणे हेच आजीच्या उत्तम प्रकृतीचे गमक असावे, असे मला वाटते. 


आजी स्वतःसाठी नित्याच्या स्वयंपाकाखेरीज खास काही करत नसली, तरी निरनिराळे स्वादिष्ट पदार्थ तयार करण्यात तिचा हातखंडा आहे. त्यामुळे सुट्टीत आजीकडे गेलो की, चंगळ असते. दुसरी चंगळ असते, ती वाचनाची. आजीकडे उत्तम पुस्तकांचा संग्रह आहे. त्यामुळे मला मनसोक्त वाचन करता येते. आजीने गावाला अगदी वेगळेच रूप आणून दिले आहे. गावातील सर्व स्त्रिया आता स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. आजीने त्यांचे बचतगट स्थापन केले आहेत. आजी स्वतः कोणत्याही पदावर नसते; पण ती त्यांच्या मागे खंबीरपणे उभी असते. आजीच्या स्वास्थ्यपूर्ण जीवनाचे हेच रहस्य असावे.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व गावाकडील तुमच्‍या कोणत्‍या आडवणी ताज्‍या झाल्‍या त्‍या तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद 
महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • शहरापेक्षा खेडेगावात राहणे आजीला आवडते
  • पंच्याहत्तरी ओलांडली तरी
  • तेवढीच कार्यव्यग्रता 
  • सुरुवातीपासून आदर्शवादी जीवन 
  • दुसऱ्यांसाठी झटणे 
  • वेळ अपुरा पडतो 
  • कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता सतत कामात दंग.

निबंध क्र २ 

Majhi Aaji Essay In Marathi


माझी आजी ! आमच्या कुटुंबातील वयाने सर्वांत मोठी, वडीलधारी व्यक्ती. तिच्या वागण्याबोलण्यात कमालीचा साधेपणा आहे. ती सकाळी आमच्या लवकर उठते. अंघोळ आटोपली की ती माझ्या आईबरोबर स्वयंपाकघरात वावरते. आई तिला काम करू देत नाही. पण आजी ऐकतच नाही. आजीला स्वयंपाक करायला खूप आवडते. न्याहारीसाठी ती कधीतरी एखादा पदार्थ करते. तिने केलेला पदार्थ सगळ्यांना आवडला की ती खूश होते. दुपारी जेवून झाले की काही वेळ ती टी. व्ही. पाहते. कधी कधी टी. व्ही. पाहता पाहता तेथेच झोपते. संध्याकाळ झाली की ती फेरी मारायला बाहेर पडते. ही संध्याकाळची फेरी मात्र ती कधीच चुकवत नाही.


माझी आजी एका कारणासाठी मला खूप आवडते. ती कधीही रागावत नाही. मला तिने अजूनपर्यंत एकदाही साधी एक चापटही मारलेली नाही. एकदाही रागावली नाही. उलट, आईबाबा रागावले की ती माझीच बाजू घेते. माझ्या बाबांनाच दटावते ! आईबाबा अभ्यासासाठी खूप मागे लागले, तरी आजीला आवडत नाही. त्यामुळे मी आजीवर खूश ! तिने काहीही सांगितले की मी ताबडतोब करतो. तिला वाईट वाटणार नाही. याची काळजी घेतो. आईबाबासुद्धा आजीसारखेच वागले, तर किती छान होईल ! 



आजीला वाचनाचा छंद आहे; पण हल्ली तिचे डोळे दुखतात. मग ती मलाच, वाचायला सांगते आणि ती ऐकते. तिला माझी अभ्यासाची पुस्तकेसुद्धा आवडतात. माझीच पुस्तके मला मोठ्याने वाचायला सांगते. दररोज संध्याकाळी मी तिच्यासाठी माझे एखादे पुस्तक वाचतो. मध्ये मध्ये तिला काही कळले नाही की ती मला आपली शंका विचारते. मीसुद्धा माझ्या परीने तिचे शंकानिरसन करतो. अलीकडे माझ्या लक्षात येऊ लागले आहे की, आजीला वाचून दाखवता दाखवता माझा अभ्यास आपोआप होत असतो.


एका गोष्टीसाठी मात्र तिचा खास आग्रह असतो. काहीही खाण्यापूर्वी किंवा स्वयंपाकाच्या भांड्यांना हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुतले पाहिजेत, असे ती सांगते. बाबांनासुद्धा ती तसेच सांगते. आजीने काहीही सांगितले की बाबा निमूटपणे ऐकतात. माझे मित्र घरी आले की आजी बेहद्द खूश होते. ती काहीतरी खाऊ करून त्यांना देतेच. ऐंशीच्या घरातील माझी आजी अजूनही उत्साहात वावरते. ती कधी आजारी पडल्याचे मला तरी आठवत नाही. कधीतरी ती मला आपले पाय चेपायला सांगते, तेवढेच. अशी ही माझी आजी मला खूप खूप आवडते.


महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )
  • माझी आजी साधी 
  • दिनक्रम 
  • सकाळी अंघोळीनंतर देवपूजा
  • स्वयंपाकात आईला मदत
  • दुपारी टी. व्ही. पाहणे
  • संध्याकाळी फेरी मारणे
  • रागावत नाही
  • नीटनेटकेपणा स्वच्छता 
  • मित्रांशी प्रेमाने वागते 
  • अजूनही ठणठणीत.



निबंध क्र ३ 

आजीने केव्हाच सत्तरी ओलांडली आहे, पण याची आठवण आजीला कुठे आहे? तीन वर्षांपूर्वी तिचा सत्तरावा वाढदिवस साजरा करायला आम्ही सगळेजण तिच्या घरी-तळेगावला गेलो, तेव्हा तिला धक्काच बसला. आपण इतके वृद्ध झालो आहोत, असे तिच्या कधी स्वप्नातही आले नव्हते.आजीचे म्हणजेच आम्हा सर्वांचे घर तळेगावला आहे. तेथून जवळच आमचा एक शेतमळा आहे.

त्यामुळे माझे बाबा, काका, आत्या शिक्षणासाठी आणि पुढे नोकरी-व्यवसायासाठी गावाबाहेर पडले, तरी आजीआजोबा तळेगावच्या घरातच वास्तव्य करून राहिले आणि आजोबांच्या मागेही आजी आजवर त्याच घरात एकटी राहते. आपण एकटे आहोत असे मुळी तिला कधी वाटतच नाही. दिवसभर ती आपल्या कामातच गुंतलेली असते. आमची आजी तेथील शेजारपाजारच्या लोकांची 'आई' आहे.

ती सकाळी लवकर उठते आणि आपली स्वत:ची सर्व कामे उरकून, थोडीशी न्याहारी करून गावातल्या 'निवारा' केंद्रात जाते. तेथे अनेक वृद्ध राहतात. त्यांतील काही वृद्ध निराधार आहेत. रोज दोन तास आजी तेथील मंडळींची कामे करत असते. कुणाचे पत्र लिहायचे असते, कुणाच्या शर्टाला गुंड्या लावायच्या असतात. अशी बारीकसारीक हजारो कामे करताना आजी स्वत:ला कधी वृद्ध समजतच नाही.

दुपारच्या वेळी काही गृहिणी जमतात. त्यांच्याबरोबर चांगल्या पुस्तकांचे वाचन, वर्तमानपत्रांचे सामुदायिक वाचन, त्यावर चर्चा, चिंतन असे तिचे कार्य सतत चाललेले असते. तोपर्यंत दुपार संपत येते. नंतर आजी जवळच्या एका आदिवासी पाड्यावर जाते. त्या आदिवासी स्त्री-पुरुषांना चांगल्या कामात गुंतवून व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी आजी धडपडत असते. हातपाय चालतात तोवर माणसाने काही तरी कार्य करत राहिले पाहिजे अशी तिची शिकवण आहे. खऱ्या अर्थाने आजी त्या गावाच्या परिसरातील लोकांची आई झाली आहे.


निबंध क्र ४ 

आमची आजी घरातील सर्वांना खूप आवडते. ती नेहमी हसतमुख असते. सगळ्यांशी प्रेमाने वागते.आमची आजी अजिबात आळशी नाही. ती सर्वांच्या आधी उठते आणि रात्री मात्र सर्वांत लवकर झोपते. ती आम्हांला नेहमी सांगते, “लवकर निजे, लवकर उठे, त्यास ज्ञान, आरोग्य भेटे." सकाळी उठल्यावर स्वत:ची सर्व कामे आटोपून घेते. मग देवपूजा व पोथीवाचन करते. देवपूजेनंतर न्याहरी करते. त्यानंतर ती आईसोबत थोडे कामही करते.

 नऊ वाजेपर्यंत सगळेजण आपापल्या कामावर निघून जातात, मग आजी एकटीच घरी असते. तीच मग घराची काळजी घेते. संध्याकाळी आम्ही घरी येतो, तेव्हा ती आम्हाला काहीतरी छानसा खाऊ करून देते,संध्याकाळी ती मुरलीधराच्या देवळात जाते. तेथे ती सातपर्यंत रमलेली असते, घरी जाल्यावर थोडेसे काहीतरी खाऊन ती वाचन करते आणि मग झोपी जाते. अशी ही आमची आजी सर्वांची आवडती आहे.
महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • आजीचे घरातील आणि इतरांच्या मनातील स्थान 
  • वयदिनक्रम 
  • सुगरण, सुगृहिणी 
  • संध्याकाळी देवळात 
  • रात्री जेवण, वाचन व झोप.

निबंध क्र 5

“मी देवळात जाऊन येते ग,' पूजेच्या तबकात ओंजळभर मोगऱ्याची फुलं आणि दुर्वांची जुडी ठेवत आजी आईला म्हणाली. आम्हा नातवंडांपैकी एकालाही बरोबर चलण्याचा आग्रह तिने केला नाही. कारण आज तिला एकटीलाच जायचे होते. त्या दिवशी आजीने गजानन महाराजांच्या पादुकांवर मोगऱ्याची फुले वाहून माथा टेकवला तो अखेरचाच! मनाचा मोगरा, देहाचे दुर्वांकुर योगिराजाच्या चरणी समर्पित केले. असं भाग्याचं मरण 

एखाद्याच्याच भाळी रेखलं असतं.  आजीच्या मृत्यूने आमच्या कुटुंबावर दुर्भाग्याची कुन्हाड कोसळली. अपत्यांवर, सुनांवर, नातवंडांवर अतूट माया करणाऱ्या त्या माऊलीने 'भरल्या गोकुळा' चा कायमचा निरोप घेतला. 'देवळात जाते' सांगून 'देवाघरी' प्रयाण केले. आम्ही शोकावेगाने फोडलेला टाहो तिला ऐकू जाणार नव्हता. एकाच वर्षाच्या आत आजोबा-आजीचं छत्र हिरावून घेणारा देव ‘दयाघन' उरला नाही. आमचं दुःख शब्दातीत होतं.


आमच्यावर आजीचा केवढा जीव ! बाबा म्हणायचे, "तुझं मुलांपेक्षा नातवंडांवर काकणभर जास्तच प्रेम आहे.' त्यावर ती उत्तरायची, “अरे बाबा, नातवंडं म्हणजे दुधावरची साय'' खरं सांगायचं तर तिने आम्हाला सायीपेक्षाही जास्त जपलं. तिच्या शब्दात काय जादू होती कोणास ठाऊक, तिने सांगितलेली प्रत्येक गोष्ट मला पटायची. साहजिकच तिची अवज्ञा करण्याचा प्रसंग सहसा येत नसे.


लवकर उठणे, देवपूजेसाठी फुले तोडणे, आईला छोट्या छोट्या कामात मदत करणे, नियमित गृहपाठ करणे, संध्याकाळी खेळून आल्यावर शुभंकरोति, रामरक्षा म्हणणे यामुळे आजी माझ्यावर खूष असायची. माझी चुलत भावंडं लटक्या रुसव्याने म्हणायची, "नाहीतरी समीरदादा आजीचा जास्तच लाडका आहे.'' लोण्याहून मऊ अंतःकरणाची आजी कठीण वज्राचा भेद करण्याइतकी खंबीरही होती. तिचं जीवन म्हणजे एक कंटकमय प्रवास.


ऐन तारुण्यात आजोबांना अपघात झाला. 'जिवावरचं पायावर निभावलं' यातच आजीनं समाधान मानल. पदरी तीन अपत्य. संसाराचा गाडा कसा रेटायचा? यक्षप्रश्न होता. युधिष्ठिराच्या स्थिरतेने, चतुराईने तिने तो सोडवला. सुदैवाने एका खाजगी शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली. पतीची सेवा, मुलांचं संगोपन करता करता विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करण्याचे काम ती मनापासून करू लागली. तिच्या उद्बोधक गोष्टी नि सुरेल आवाजातील कविता ऐकणे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक सुखद अनुभव होता.



आजीच्या स्वभावाचा एक उल्लेशनीय पैलू म्हणजे ती 'आदर्श सासू' होती. तिने सुनांना भरभरून प्रेम दिले. त्यांना माहेरची आठवण येऊ दिली नाही. “सून म्हणजे गृहलक्ष्मी. ती प्रसन्न असली तर घरात स्वर्गसुख नांदतं' असं तिचं ठाम मत होतं. त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला न घातला त्यांच्यावर प्रेमाचा अंकुश ठेवण्याचं तंत्र तिला उत्तम साधलं होतं. पुरणपोळी खावी तर आजीच्याच हातची. अन्नपूर्णेचा वरदहस्त लाभलेली आजी 'सुगरण' होती हे सांगायलाच नको. चटणीपासून पंचपक्वान्नांपर्यंत तिच्या हातच्या प्रत्येक पदार्थाला अमृताची गोडी असायची. जेवणाऱ्याने तृप्तीची ढेकर दिली की आजीचं मन आनंदाने तुडुंब भरायचं. चेहऱ्यावर समाधान झळकायचं.


तिचं प्रत्येक काम स्वच्छ, व्यवस्थित, नीटनेटकं. अंगणात रेखलेली रांगोळी असो की पाटीवर लिहिलेली बाराखडी असो, ती पुसावीशी वाटत नसे. तिला काय येत नव्हतं ते विचारा. शिवणकाम, विणकाम, भरतकाम, पाककला, हस्तकला सर्वच कलांमध्ये तिला चांगली गती होती. अशा 'बहुगुणी' आजीचे गुण किती व" नि किती नको?


आजी म्हणजे अस्सल चंदनी खोड. झिजणे हा तिचा मंत्र. आजाऱ्याची शुश्रूषा करायची, अडल्यानडल्याच्या मदतीला धावून जायचे, हतबल झालेल्याला धीर द्यायचा हेच तिचं जीवनव्रत होतं. उपासना होती, देवपूजा होती. तिने व्रतवैकल्यं, सोवळंओवळं, पूजापोथी याचं फारसं अवडंबर केल्याचं स्मरत नाही. 'Work is worship, Duty is God' हे वचन तिनं आपल्या जीवनात उतरवलं होतं. तिच्या पार्थिव देहाला अग्नी देण्यात आला तेव्हा मनात विचार चमकून गेला, चितेवर रचलेली काष्ठे चंदनाची नसतील, पण देह मात्र अस्सल चंदनी आहे.'

निबंध क्र 6

 माझी आजी ही माझ्या जीवनातील एक महत्त्वाची व्यक्ती आहे. तिचे वय साठ वर्षे आहे. मात्र तिची प्रकृती अतिशय उत्तम आहे. मी आजपर्यंत तिला कधीही आजारी पडलेले किंवा औषधे घेताना पाहिले नाही. फक्त वाचण्यापुरता तिला चश्मा लावावा लागतो. तिचा पोशाख म्हणजे साधी पण स्वच्छ सुती साडी. स्वच्छतेच्या बाबतीत ती फार काटेकोर असते.


आजी कायम हसतमुख असते. ती आजोबांच्या तब्बेतीची सर्व प्रकारे काळजी घेते. दिवसभर ती स्वत:ला व्यस्त ठेवते. तिला वाचनाची अतिशय आवड आहे. वेळ मिळेल तेव्हा ती पुस्तके वाचते. रोज संध्याकाळी ती नियमाने फिरायला जाते. सणांच्या दिवशी मंदिरात जाणे, पूजा-अर्जा करायला तिला अतिशय आवडते. तिने बनविलेले पदार्थही अतिशय रुचकर असतात. ती अतिशय शिस्तप्रिय आहे. आम्हा नातवंडांनाही ती शिस्तीचे धडे देत असते. बाबा तिचा व आजोबांचा सल्ला घेतल्याशिवाय कुठलेही काम करीत
नाहीत.


मला माझी आजी खूप आवडते. आई किंवा बाबा मला रागवल्यावर तीच माझी समजूत काढते. मी परिक्षेत चांगले गुण मिळवल्यावर ती माझे कौतुक करते. रोज झोपतांना ती मला एक छानशी गोष्ट सांगते. आजी आमच्या घरातील महत्त्वाची व्यक्ती आहे. मला माझी आजी खूप आवडते.

निबंध क्र 7

माझी आजी मराठी निबंध 


माझी आजी :  माझ्या आजीचे नाव आहे 'मथुरा'. ती मुंबईला  राहते. तिला निसर्ग फार आवडतो . तिला स्वच्छता फार आवडते. ती शिस्तप्रिय आहे. तिला रिकामे बसणे आवडत नाही . वेळ अमूल्य आहे, वेळेचा सदुपयोग करा हाच तिचा संदेश आहे.


सत्तरी उलटली तरी ती उद्योगी आहे. 'आळसे कार्यभाग नासतो' हे तिचे ठाम मत आहे. अजूनही ती दिवसभर घरकाम , बागकाम , समाजकार्य यात मग्न असते. ती रोज सकाळी देवदर्शनास जाते, ज्ञानेश्वरी वाचते, गीतेचे श्लोक म्हणते, बातम्या ऐकते व सायंकाळी समुद्रकिनाऱ्यावर जाते. तिला समुद्र, खळाळणाऱ्या लाटांचं संगीत , देखणा सूर्यास्त सारं खूप आवडतं. शांतपणे निसर्ग निरखित ती बराच वेळ स्तब्धपणे बसून राहते. जणू अथांग सागरासारख्या या अथांग जीवनाचा वेध घेत असावी.



माझी आजी उत्तम कवयित्री आहे. निसर्गाचं सान्निध्य तिला खूप आवडतं. वृक्ष , लता, वेली, पाखरं , चंद्र, चांदणे, धरती, आभाळ हे तिचे जिवाभावाचे शब्द . आपल्या हृदयातल्या भावना या शब्दात ती सहजगत्या ओवते. कविता जन्माला येते. नुसते शब्द नसतात ते! सारं जीवन बध्द असतं त्यात! 


आजीचं शिक्षण फारसं झालेलं नसलं तरी हृदयानं ती खूप खूप श्रीमंत आहे, मोठ्या मनाची आहे. केस पांढरे झाले पण मनाचा हिरवेपणा कायम आहे. ती चिरयौवना आहे. दुःखी, गरजू यांच्या हाकेला ती धावून जाते. सर्व जण तिला 'आजी' च म्हणतात.


पांढरी शुभ्र साडी, नितळ कांती, हसरा चेहरा, बोलके डोळे, केसांचा घट्ट अंबाडा, त्यात खोचलेले गुलाबाचे फूल, सारं काही सुंदर. तिच्या हातच्या बेसनाच्या लाडूची चव काही वेगळीच! अन्न हे पूर्णब्रह्म आहे, फक्त उदरभरण नाही, हे तिनेच मला समजाविले . संस्काराचं जे खत-पाणी तिने मला दिलं , तो माझा अमूल्य ठेवा आहे. तिच्याबरोबर राहण्याची गोडीच अवीट आहे. प्रत्येक सुटीत मी आजीकडे जातो.



सुटी संपली की तिला सोडून निघणं जिवावर येतं. पाय निघतच नाही तिथून . आम्हा दोघांचेही डोळे पाणावतात तिच्या सहवासातले क्षण अलगद मुठीत मखमली मुलायमतेने लपवून मी निघतो, परत लवकर येण्यासाठी! ती बरोबर नसताना तिने सांगितलेल्या गोष्टी आठवतात , मग एकटाच मी कधी खदाखदा हसतो तर कधी एकटाच हमसाहमशी रडतो.


तिने माझ्याबरोबर दिलेली तिची औषधे मला हमखास बरी करतात इतिहासातले आदर्श तिने गोष्टीतून माझ्या रक्ताच्या थेंबाथेंबात पेरले आहेत ; मला त्याची जाणीव आहे. मला खऱ्या अर्थाने 'मोठे' होऊन कुटुंब, समाज , देश यांचे ऋण फेडायचे आहे. तिनेच मला सांगितले 
“ फेक भविष्य फसवे,
हाती ठेव वर्तमान..." 

इतक्या सहजतेने ती जीवनाला सामोरं जाणं शिकविते . ती माझा गुरू , मित्र सारं काही आहे. दुधावरच्या सायीसारखं ती मला जपते. तिच्या मायेच्या पदराआड अखिल विश्वातली भीती लुप्त होते. तिच्या प्रेमात मी आकंठ तृप्त होतो. फुलासारखं कोमल तर प्रसंगी वज्राहूनही कठीण असं तिच हृदय आहे. माझ्या निराशेवर ती फुकर घालते. तिचे वर्णन करायला शब्द थिटे पडतात.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद