स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी | swachata che mahatva marathi nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी बघणार  आहोत. या निबंधात  स्वच्छतेचे महत्‍व  व त्‍याचे फायचे ,   स्वच्छतेसाठी सरकार करत असलेल्‍या उपाययोजना, स्वच्छतेविषयी नागरीकांनी उचलण्‍याची पावले याबद्दल माहीती दिली आहे चला तर सुरूवात करूया निबंधाला. 
निबंध मराठी क्रमांक 1 (391 शब्‍दात)
माझी आजी नेहमी सांगत असे की, 'हात फिरे, तेथे लक्ष्मी वसे.' केवढा मोठा अर्थ आहे या शब्दांत! आपण स्वच्छता ठेवली की, वैभव आपोआपच चालत येते. पण आपण हे कधीच लक्षात घेत नाही. आपले वर्तन सुधारत नाही.

वैयक्तिक स्वच्छता ही आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असते. नीट आंघोळ केली नाही, तर त्वचारोग होतील. तोंडाची स्वच्छता ठेवली नाही, तर दात किडतील. केसांची स्वच्छता राखली नाही, तर केसांत उवा होतील.
व्यक्तिगत स्वच्छतेइतकीच घराची, गावाची, देशाचीही स्वच्छता आवश्यक आहे. प्रत्येक गावात शौचालये हवीत. तरच गावात स्वच्छता राहील. गावातील लोक नदी-तलावाचे पाणी खराब करतात. भांडी घासणे, कपडे धुणे, जनावरांची स्वच्छता ही सर्व कामे लोक नदीत करतात. त्यामुळे ते पाणी पिण्यास अयोग्य ठरते. त्या पाण्यामुळे रोगराई पसरते. म्‍हणुन ही नदी स्वच्छतेचे काम हाती घेतले पाहीजे. 

आपण सर्वांनी आपल्या घराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेत तर असतोच पण आपण जेव्‍हा आपल्‍या परीसराची काळजी घेऊ तेव्हाच आपल्या देशात स्वच्छता होईल कारण प्रत्येक व्यक्ती परीसराच्‍या  स्वच्छता करत असेल तरच आपला देश स्वच्छ होईल . घरात स्‍वच्‍छता राखण्‍याचे फायदे पण भरपुर आहेत,घरात स्वच्छता ठेवल्‍याने  आपण आजारी पडणार नाही. मनही प्रसन्न राहील. 

जर आपण घरात अस्‍वच्‍छता ठेवली तर अनेक प्रकारचे किटक जसे झुरळ, डास आपल्‍या घरात शिरून रोगराई पसरविण्‍याचे काम करतात. व परीणामी आपण आजारी पडतो त्‍यात आपले पैसे व वेळ दोन्‍ही वाया जातात. घरात स्‍वच्‍छता असली व घरात एखादा पाहुणा आल्‍यास तो घरातील स्‍वच्‍छता पाहुन खुप खुष होतो. पण जर का घराता स्‍वच्‍छता नसेल तर ती अस्‍वच्‍छता  कोणालाच आवडणार नाही.  स्वच्छता म्हणजे आपले शरीर, मन आणि आपल्या परीसर स्वच्छ करणे. स्वच्छता हा मानवाचा आवश्यक गुण आहे. विविध प्रकारचे आजार रोखण्यासाठी हा एक सोपा उपाय आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत असा विश्वास आहे की जिथे स्वच्छता असते तेथे लक्ष्मी निवास करते.

swachata che mahatva marathi nibandh
 swachata che mahatva marathi nibandh 


काही लोकांचे मत असे असते की स्वच्छता  करणे हे सरकारचे काम आहे म्‍हणुन ते स्‍वत: काहीच करत नाहीत आणि सर्व जबाबदारी सरकार सोडुन मोकळे होतात. यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्‍य वाढुन रोगराई वाढण्‍यास मदत होते. प्रत्येक भारतीयांने आपआपल्या वैयक्तीेक पातळीवर स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला पाहीजे. तरच मोहीम सफल होण्यास मदत होईल. आजही ६० टक्‍याहुनही अधिक लोक बाहेर शौचास जाणे या सवयीमुळे विविध प्रकारच्‍या आजारास कारणीभुत ठरत आहेत. चांगल्या आरोग्यासाठी शरीराची स्वच्छता खूप महत्वाची असते. शरीरात घाण आणि रोग नेहमीच एकत्र राहतात त्‍यामुळे शरीर निरोगी आणि आजारांपासून दुर  ठेवण्यासाठी स्वच्छता खुप महत्‍वाची ठरते.
अनेक थोरामोठ्यांनी, गाडगेबाबांसारख्या संतांनी स्वच्छतेचा आग्रह धरला. आता शासनानेही सर्वत्र नरेंद्र मोदींजीचे स्वच्छ भारत अभियान राबवले आहे. त्यामुळे गावाचा, पर्यायाने देशाचा विकास होईल.


निबंध मराठी क्रमांक 2 (520 शब्‍दात)
प्रसिध्‍द म्‍हण आहे की स्‍वच्‍छता ईश्‍वरासमान आहे.  या ओळी आपल्‍याला खुप काही व्‍यक्‍त करून जातात ते म्‍हणजे स्‍वच्‍छता स्‍वस्‍थ जिवनाचा आवश्‍यक भाग आहे. स्वच्छता आणि आरोग्य एकमेकांशी संबधीत असतात. तुम्‍ही जेवढी स्वच्छता ठेवाल तेवढे निरोगी राहाल. स्वच्छतेचे महत्‍व समजुन घेऊन आपण स्वच्छतेबद्दल जनजागृती केली पाहीजे. ज्‍याप्रमाणे मानवी जिवनात अन्‍न , वस्‍त्र आणि निवारा गरजेचे आहे तितक्याच प्रमाणात स्वच्छतेला महत्‍व दिले गेले पाहीजे . कारण अस्वच्छता साथीच्‍या रोगांना आमंत्रण देते.

साथीच्‍या रोगांना प्रसार करण्‍यास व वाढ होण्‍यास अस्वच्छता मदत करते. जर प्रत्‍येकाने घर व घराजवळील परीसर स्वच्छ ठेवल्‍यास आपण संपुर्ण देश स्वच्छ करून घातक रोगांना दुर ठेवु शकतो. स्वच्छतेचे महत्‍व जाणुन घेतल्‍यामुळेच स्वच्छ भारत मोहीम सुरू करण्‍यात आली आहे. या मोहीमेमुळे देशात स्वच्छता राहुन नागरीकांचे आरोग्य सुधारूण आपल्‍या देशाची प्रगती होण्‍यास मदत होईल. स्वच्छ भारत मोहीमेमध्‍ये काही ठळक कामे करण्‍यात आली आहे. त्‍यातिल काही पुढील प्रमाणे सांगता येईल.

  • पुरेश्‍या प्रमाणात प्रमाणात शौचालय बांधण्‍यात येत आहेत.
  • ग्रामीण भागातील नागरीकांना स्वच्छतेचे महत्‍व पटविण्‍यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम घेण्‍यात येत आहेत.
  • शहरातील प्रदुषण नियंत्रित करण्‍यासाठी प्रदुषण कायद्यात आवश्‍यक ते बदल करण्‍यात येत आहेत .
  • स्वच्छता कशी ठेवावी त्‍याचे महत्व काय याचे ज्ञान सामान्‍य नागरीकांना साध्‍या सरळ सोप्‍या भाषेत देण्‍यात आले .
  • स्वच्छतेची जबाबदारी फक्त महानगरपालीकेच्‍या सफाई कारगाराचीच नसुन ती आपल्‍या सर्वाचीच आहे याबद्दल जनजागृती करण्‍यात आली .
  • स्वच्छतेतुन प्रगत व निरोगी राष्‍ट्र निर्मिती कशी होईल याचे मार्गदर्शन करण्‍यात आले.
  • पिण्यााचे शुध्द पाणी पोहचविले जात आहे. 

स्वच्छता ही एक अशी चांगली सवय आहे की ज्‍यामुळे आपण चांगले शारीरीक व मानसिक आरोग्य प्राप्‍त करू शकतो. सर्वच पालक आपल्‍या मुलांना लहानपणी चालणे शिकवतात, कारण ही गोष्‍ट त्‍यांना आयुष्‍यभर उपयोगी येत असते. लहान मुलांमध्‍ये कोणतीही गोष्‍ट लवकर शिकण्‍याची क्षमता असते म्‍हणुन लहान वयापासुनच त्‍यांना स्वच्छता आपल्‍यासाठी किती महत्‍वाची आहे यांची तार्किक चर्चा केली पाहीजे. व स्वच्छतेचे महत्‍व पटवुन दिले गेले पाहीजे. 

जर पालकांनी मुलांना प्रोत्‍साहीत केले तर ते स्वच्छतेची चांगली सवय सहजतेने लावु शकतील. जेवनाच्‍या आधी हात धुणे, रोज अंघोळ करणे यासारख्‍या सवयीचे फायदे समजावुन सांगीतले गेले पाहीजे.  स्वच्छता एक वेळा करून उरकुन टाकण्‍याचे काम नाही , स्वच्छतेला आपल्याला दैनदीन जिवनात उपयोगात आणायला पाहीजे. गांधीजींनी म्‍हटल्‍याप्रमाणे स्वच्छता हिच सेवा आहे . देशाला व आपल्‍याला आज स्वच्छतेची गरज आहे. कारण अस्वच्छतेमुळे अनेक नागरीक रोगांचे बळी ठरत आहेत . त्‍यामुळे स्वच्छतेकडे गंभिररित्‍या लक्ष देऊन आपला व आपल्‍या राष्ट्राचा विकास साधुन घेतला पाहीजे.  

देशात पर्यटन व्‍यवसाय वाढविण्‍यासाठी स्वच्छता हा एक चांगला मार्ग आहे . कारण भारतातील अस्वच्छता कोणत्‍याही पर्यटकाला आवडणार नाही. आपल्याला भारत देशांची प्र‍तिमा उंचावण्‍याची ही एक संधी आहे. येणारा प्रत्‍येक पर्यटक भारतातील सौदर्य व परीसरातील स्वच्छता पाहुन त्‍यांचे मन प्रसन्‍न राहील्‍या शिवाय राहणार नाही. आरोग्याची तुलना संपत्‍ती बरोबर केली जाते आणि आरोग्य प्राप्‍तीसाठी आपण आपल्‍या सभोवतालाच्‍या परीसरासोबतच आपले शरिर व मन पण स्वच्छ ठेवले पाहीजे , मन स्वच्छ ठेवण्‍यासाठी ध्‍यान धारण व योगासने करणे आवश्‍यक आहे . स्वच्छता हे फक्‍त सरकारचे काम नाही ती सर्व भारतीयांची जबाबदारी आहे. आणि ती आपण चांगल्‍या प्रकारे पार पाडुन भारताचे नाव संपुर्ण विश्‍वात उंच करू व भारताच्‍या प्रगतीत मोठी भर घालु  यात काडीमात्र शंका नाही. 

मित्रांनो तुम्‍हाला स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी | swachata che mahatva marathi nibandh कसा वाटला हे कमेंट करून कळवा.  भारताला प्रगतीशील समृध्‍द राष्‍ट्र बनविण्‍यासाठी व स्वच्छतेबद्दल जनजागृती होण्‍यासाठी हा निबंध तुम्‍हाच्‍या मित्र परीवारा सोबत शेअर करा . धन्‍यवाद 

स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी | swachata che mahatva marathi nibandh


स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी | swachata che mahatva marathi nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी बघणार  आहोत. या निबंधात  स्वच्छतेचे महत्‍व  व त्‍याचे फायचे ,   स्वच्छतेसाठी सरकार करत असलेल्‍या उपाययोजना, स्वच्छतेविषयी नागरीकांनी उचलण्‍याची पावले याबद्दल माहीती दिली आहे चला तर सुरूवात करूया निबंधाला. 
निबंध मराठी क्रमांक 1 (391 शब्‍दात)
माझी आजी नेहमी सांगत असे की, 'हात फिरे, तेथे लक्ष्मी वसे.' केवढा मोठा अर्थ आहे या शब्दांत! आपण स्वच्छता ठेवली की, वैभव आपोआपच चालत येते. पण आपण हे कधीच लक्षात घेत नाही. आपले वर्तन सुधारत नाही.

वैयक्तिक स्वच्छता ही आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असते. नीट आंघोळ केली नाही, तर त्वचारोग होतील. तोंडाची स्वच्छता ठेवली नाही, तर दात किडतील. केसांची स्वच्छता राखली नाही, तर केसांत उवा होतील.
व्यक्तिगत स्वच्छतेइतकीच घराची, गावाची, देशाचीही स्वच्छता आवश्यक आहे. प्रत्येक गावात शौचालये हवीत. तरच गावात स्वच्छता राहील. गावातील लोक नदी-तलावाचे पाणी खराब करतात. भांडी घासणे, कपडे धुणे, जनावरांची स्वच्छता ही सर्व कामे लोक नदीत करतात. त्यामुळे ते पाणी पिण्यास अयोग्य ठरते. त्या पाण्यामुळे रोगराई पसरते. म्‍हणुन ही नदी स्वच्छतेचे काम हाती घेतले पाहीजे. 

आपण सर्वांनी आपल्या घराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेत तर असतोच पण आपण जेव्‍हा आपल्‍या परीसराची काळजी घेऊ तेव्हाच आपल्या देशात स्वच्छता होईल कारण प्रत्येक व्यक्ती परीसराच्‍या  स्वच्छता करत असेल तरच आपला देश स्वच्छ होईल . घरात स्‍वच्‍छता राखण्‍याचे फायदे पण भरपुर आहेत,घरात स्वच्छता ठेवल्‍याने  आपण आजारी पडणार नाही. मनही प्रसन्न राहील. 

जर आपण घरात अस्‍वच्‍छता ठेवली तर अनेक प्रकारचे किटक जसे झुरळ, डास आपल्‍या घरात शिरून रोगराई पसरविण्‍याचे काम करतात. व परीणामी आपण आजारी पडतो त्‍यात आपले पैसे व वेळ दोन्‍ही वाया जातात. घरात स्‍वच्‍छता असली व घरात एखादा पाहुणा आल्‍यास तो घरातील स्‍वच्‍छता पाहुन खुप खुष होतो. पण जर का घराता स्‍वच्‍छता नसेल तर ती अस्‍वच्‍छता  कोणालाच आवडणार नाही.  स्वच्छता म्हणजे आपले शरीर, मन आणि आपल्या परीसर स्वच्छ करणे. स्वच्छता हा मानवाचा आवश्यक गुण आहे. विविध प्रकारचे आजार रोखण्यासाठी हा एक सोपा उपाय आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत असा विश्वास आहे की जिथे स्वच्छता असते तेथे लक्ष्मी निवास करते.

swachata che mahatva marathi nibandh
 swachata che mahatva marathi nibandh 


काही लोकांचे मत असे असते की स्वच्छता  करणे हे सरकारचे काम आहे म्‍हणुन ते स्‍वत: काहीच करत नाहीत आणि सर्व जबाबदारी सरकार सोडुन मोकळे होतात. यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्‍य वाढुन रोगराई वाढण्‍यास मदत होते. प्रत्येक भारतीयांने आपआपल्या वैयक्तीेक पातळीवर स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला पाहीजे. तरच मोहीम सफल होण्यास मदत होईल. आजही ६० टक्‍याहुनही अधिक लोक बाहेर शौचास जाणे या सवयीमुळे विविध प्रकारच्‍या आजारास कारणीभुत ठरत आहेत. चांगल्या आरोग्यासाठी शरीराची स्वच्छता खूप महत्वाची असते. शरीरात घाण आणि रोग नेहमीच एकत्र राहतात त्‍यामुळे शरीर निरोगी आणि आजारांपासून दुर  ठेवण्यासाठी स्वच्छता खुप महत्‍वाची ठरते.
अनेक थोरामोठ्यांनी, गाडगेबाबांसारख्या संतांनी स्वच्छतेचा आग्रह धरला. आता शासनानेही सर्वत्र नरेंद्र मोदींजीचे स्वच्छ भारत अभियान राबवले आहे. त्यामुळे गावाचा, पर्यायाने देशाचा विकास होईल.


निबंध मराठी क्रमांक 2 (520 शब्‍दात)
प्रसिध्‍द म्‍हण आहे की स्‍वच्‍छता ईश्‍वरासमान आहे.  या ओळी आपल्‍याला खुप काही व्‍यक्‍त करून जातात ते म्‍हणजे स्‍वच्‍छता स्‍वस्‍थ जिवनाचा आवश्‍यक भाग आहे. स्वच्छता आणि आरोग्य एकमेकांशी संबधीत असतात. तुम्‍ही जेवढी स्वच्छता ठेवाल तेवढे निरोगी राहाल. स्वच्छतेचे महत्‍व समजुन घेऊन आपण स्वच्छतेबद्दल जनजागृती केली पाहीजे. ज्‍याप्रमाणे मानवी जिवनात अन्‍न , वस्‍त्र आणि निवारा गरजेचे आहे तितक्याच प्रमाणात स्वच्छतेला महत्‍व दिले गेले पाहीजे . कारण अस्वच्छता साथीच्‍या रोगांना आमंत्रण देते.

साथीच्‍या रोगांना प्रसार करण्‍यास व वाढ होण्‍यास अस्वच्छता मदत करते. जर प्रत्‍येकाने घर व घराजवळील परीसर स्वच्छ ठेवल्‍यास आपण संपुर्ण देश स्वच्छ करून घातक रोगांना दुर ठेवु शकतो. स्वच्छतेचे महत्‍व जाणुन घेतल्‍यामुळेच स्वच्छ भारत मोहीम सुरू करण्‍यात आली आहे. या मोहीमेमुळे देशात स्वच्छता राहुन नागरीकांचे आरोग्य सुधारूण आपल्‍या देशाची प्रगती होण्‍यास मदत होईल. स्वच्छ भारत मोहीमेमध्‍ये काही ठळक कामे करण्‍यात आली आहे. त्‍यातिल काही पुढील प्रमाणे सांगता येईल.

  • पुरेश्‍या प्रमाणात प्रमाणात शौचालय बांधण्‍यात येत आहेत.
  • ग्रामीण भागातील नागरीकांना स्वच्छतेचे महत्‍व पटविण्‍यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम घेण्‍यात येत आहेत.
  • शहरातील प्रदुषण नियंत्रित करण्‍यासाठी प्रदुषण कायद्यात आवश्‍यक ते बदल करण्‍यात येत आहेत .
  • स्वच्छता कशी ठेवावी त्‍याचे महत्व काय याचे ज्ञान सामान्‍य नागरीकांना साध्‍या सरळ सोप्‍या भाषेत देण्‍यात आले .
  • स्वच्छतेची जबाबदारी फक्त महानगरपालीकेच्‍या सफाई कारगाराचीच नसुन ती आपल्‍या सर्वाचीच आहे याबद्दल जनजागृती करण्‍यात आली .
  • स्वच्छतेतुन प्रगत व निरोगी राष्‍ट्र निर्मिती कशी होईल याचे मार्गदर्शन करण्‍यात आले.
  • पिण्यााचे शुध्द पाणी पोहचविले जात आहे. 

स्वच्छता ही एक अशी चांगली सवय आहे की ज्‍यामुळे आपण चांगले शारीरीक व मानसिक आरोग्य प्राप्‍त करू शकतो. सर्वच पालक आपल्‍या मुलांना लहानपणी चालणे शिकवतात, कारण ही गोष्‍ट त्‍यांना आयुष्‍यभर उपयोगी येत असते. लहान मुलांमध्‍ये कोणतीही गोष्‍ट लवकर शिकण्‍याची क्षमता असते म्‍हणुन लहान वयापासुनच त्‍यांना स्वच्छता आपल्‍यासाठी किती महत्‍वाची आहे यांची तार्किक चर्चा केली पाहीजे. व स्वच्छतेचे महत्‍व पटवुन दिले गेले पाहीजे. 

जर पालकांनी मुलांना प्रोत्‍साहीत केले तर ते स्वच्छतेची चांगली सवय सहजतेने लावु शकतील. जेवनाच्‍या आधी हात धुणे, रोज अंघोळ करणे यासारख्‍या सवयीचे फायदे समजावुन सांगीतले गेले पाहीजे.  स्वच्छता एक वेळा करून उरकुन टाकण्‍याचे काम नाही , स्वच्छतेला आपल्याला दैनदीन जिवनात उपयोगात आणायला पाहीजे. गांधीजींनी म्‍हटल्‍याप्रमाणे स्वच्छता हिच सेवा आहे . देशाला व आपल्‍याला आज स्वच्छतेची गरज आहे. कारण अस्वच्छतेमुळे अनेक नागरीक रोगांचे बळी ठरत आहेत . त्‍यामुळे स्वच्छतेकडे गंभिररित्‍या लक्ष देऊन आपला व आपल्‍या राष्ट्राचा विकास साधुन घेतला पाहीजे.  

देशात पर्यटन व्‍यवसाय वाढविण्‍यासाठी स्वच्छता हा एक चांगला मार्ग आहे . कारण भारतातील अस्वच्छता कोणत्‍याही पर्यटकाला आवडणार नाही. आपल्याला भारत देशांची प्र‍तिमा उंचावण्‍याची ही एक संधी आहे. येणारा प्रत्‍येक पर्यटक भारतातील सौदर्य व परीसरातील स्वच्छता पाहुन त्‍यांचे मन प्रसन्‍न राहील्‍या शिवाय राहणार नाही. आरोग्याची तुलना संपत्‍ती बरोबर केली जाते आणि आरोग्य प्राप्‍तीसाठी आपण आपल्‍या सभोवतालाच्‍या परीसरासोबतच आपले शरिर व मन पण स्वच्छ ठेवले पाहीजे , मन स्वच्छ ठेवण्‍यासाठी ध्‍यान धारण व योगासने करणे आवश्‍यक आहे . स्वच्छता हे फक्‍त सरकारचे काम नाही ती सर्व भारतीयांची जबाबदारी आहे. आणि ती आपण चांगल्‍या प्रकारे पार पाडुन भारताचे नाव संपुर्ण विश्‍वात उंच करू व भारताच्‍या प्रगतीत मोठी भर घालु  यात काडीमात्र शंका नाही. 

मित्रांनो तुम्‍हाला स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी | swachata che mahatva marathi nibandh कसा वाटला हे कमेंट करून कळवा.  भारताला प्रगतीशील समृध्‍द राष्‍ट्र बनविण्‍यासाठी व स्वच्छतेबद्दल जनजागृती होण्‍यासाठी हा निबंध तुम्‍हाच्‍या मित्र परीवारा सोबत शेअर करा . धन्‍यवाद