Dr Babasaheb Ambedkar Essay In Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध

निबंध 1 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध  बघणार आहोत. या पानावर पुर्ण 5 निबंध दिले आहेत.  भारतासाठी केलेले कार्य व समाज बांधवासाठी केलेला त्‍याग व कार्य सविस्‍तरपणे स्‍पष्‍ट केले आहेत.    चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर - म्हणजेच, डॉ. भीमराव रामजी आंबेडकर  यांनी भारत स्वतंत्र झाल्याबरोबर भारतीय जनतेला एक मौलिक संदेश दिला होता. तो असा की, लोकशाहीचे अस्तित्व आपणांस टिकवायचे असेल, तर आपले सामाजिक आणि आर्थिक उद्देश साध्य करण्यासाठी आपण फक्त सनदशीर मार्गांचाच अवलंब केला पाहिजे. केवढी दुरदृृृृृष्‍टी होती  या संदेशात !

 पण आपण आज - अगदी स्वतंत्र होऊनही साठ वर्षे झाली तरी या गोष्टी आपल्या आचरणात आणल्या नाहीत. कोणत्याही क्षुल्लक कारणाने प्रक्षोभ झाला की, लगेच जाळपोळ, मोडतोड केली जाते. कारण आपण तेव्हा हे विसरलेले असतो की, अशा विध्वंसात आपण आपलेच नुकसान करत असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र आणि साहित्य यांतून आपल्याला असे मोलाचे संदेश मिळत असतात.

१४ एप्रिल १८९१ मध्ये एका गरीब घरात बाबासाहेबांचा जन्म झाला होता. त्यात भर म्हणजे 'मागासलेली जात' हा शिक्का उमटलेला. पण ते कोणत्याही अडचणीला डगमगले नाहीत. कशासाठीही कुरकुरत बसायचे नाही, हा तर त्यांचा निश्चय होता. त्यामुळे चाळीतल्या गोंगाटातही ते उत्तम अभ्यास करू शकले. माणूस फक्त ज्ञानामुळेच दु:खमुक्त होऊ शकतो, हे त्यांनी जाणले होते.

डॉ. आंबेडकर यांनी स्वत:ची उन्नती तर साधलीच, पण त्यांचा मोठेपणा असा की, ते आपल्या अन्यायग्रस्त समाजालाही विसरले नाहीत. आयुष्यभर खडतर ज्ञानसाधना करून विधिशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी ज्ञानशाखांवर त्यांनी प्रभुत्व संपादन केले होते.
Dr Babasaheb Ambedkar Essay In Marathi
Dr Babasaheb Ambedkar Essay In Marathi

 दलितांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. जनतेला एकत्र आणण्यासाठी त्यांनी 'बहिष्कृत हितकारिणी सभा' (१९२४) स्थापन केली. पुढे 'स्वतंत्र मजूर पक्ष' या राजकीय पक्षाची १९३६ साली स्थापना केली. १९४२ मध्ये 'ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन' या संस्थेची स्थापना केली. दलित जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी विपुल लेखन केले.

 'मूकनायक', 'जनता' (याचेच रूपांतर पुढे 'प्रबुद्ध भारत' असे झाले) अशा नियतकालिकांद्वारे समाजात जागृती निर्माण केली. 'बहिष्कृत भारत'चे ते संस्थापक संपादक होते. 'हु वेअर दि शूद्राज?', 'बुद्ध अँड हिज धम्म' इत्यादी त्यांचे अनेक ग्रंथ विख्यात आहेत. 'भारतरत्न' या सर्वश्रेष्ठ पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले होते.


जातीयतेचा कलंक नाहीसा व्हावा म्हणून बाबासाहेब आयुष्यभर झगडले. जातिपातीचा विचार न करता सर्वांनाच पाणी भरण्याचा हक्क मिळावा, म्हणून बाबासाहेबांनी महाडच्या चवदार तळ्यावर १९२७ साली सत्याग्रह केला. १९३० साली नाशिकच्या काळाराम मंदिरातील प्रवेशाचा लढा दिला.

 हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान हे वर्णवर्चस्वावर आधारलेले असल्यामुळे दलितांना हिंदू धर्मात समतेची व न्यायाची वागणूक मिळणे अशक्य आहे, अशी त्यांची खात्री झाली होती. म्हणून त्यांनी १९५६ मध्ये आपल्या हजारो अनुयायांसह नागपूर येथे हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्मात प्रवेश केला.


डॉ. आंबेडकरांनी महिलांच्या शिक्षणाचाही आग्रह धरला. त्यासाठी ते पालकांना सांगत - मुलामुलींची लग्ने लवकर करू नका. निदान त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहू द्या.  स्त्रियांचे हक्क, त्यांची उन्नती, त्यांचा विकास साधण्यासाठी बाबासाहेबांनी १९४८ मध्‍ये कायदेमंडळापुढे 'हिंदू कोड बिल' सादर केले. मुरळी, देवदासी, मजूर, कामकरी स्त्रिया इत्यादींच्या हक्कांसाठीही ते झटले. कारण स्त्रियांचा सन्मान त्यांना महत्त्वाचा वाटे.


समाजातील जो घटक पीडित आहे, अन्यायग्रस्त आहे, त्याने त्या अन्यायाच्या निवारणासाठी स्वत:च पुढे आले पाहिजे, तरच त्याचे दुःख संपू शकते, असे बाबासाहेब सांगत. आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत अन्यायाविरुद्ध लढलेल्या बाबासाहेबांचे १९५६ साली महानिर्वाण झाले.

 मित्रांनो तुम्‍हाला Dr Babasaheb Ambedkar Nibandh In Marathi हा निबंध कसा वाटला  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद .
महत्‍वाचे मुद्दे : 

  • भारतीय घटनेचे शिल्पकार 
  • लोकशाही राज्य कसे असावे याबाबत मार्गदर्शन 
  • जन्म १८९१
  • कष्टाने शिक्षण
  • ज्ञानामुळेच दु:खमुक्ती हा विश्वास
  • विविध शास्त्रांचा अभ्यास 
  • विपुल लेखन 
  • 'भारतरत्न' पुरस्कार
  • वाचनाची विलक्षण आवड
  • विदयार्थ्यांना मार्गदर्शन 
  • आत्मविश्वास 
  • दीर्घोदयोग, शीलसंवर्धन 
  • स्त्रियांना शिक्षणाचा आग्रह 
  • 'हिंदू कोड बिला'चा आग्रह 
  • प्रत्येकाने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध करावा.
निबंध 2

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल, १८९१ रोजी झाला. शाळेत, महाविद्यालयात अस्पृश्यतेमुळे त्यांचा अनेकदा मानभंग झाला होता व त्यांच्या रास्त हक्कांपासून त्यांना वंचित केले गेले होते. बडोदयाचे महाराज सयाजीराव गायकवाड व कोल्हापूरचे शाहू महाराज यांच्या आर्थिक साहाय्यावर ते बी. ए. झाले. परदेशात जाऊन त्यांनी अर्थशास्त्र या विषयात एम. ए. पीएच. डी. या पदव्या मिळवल्या.

तेथे ते बॅरिस्टरही झाले; सिडनहॅम महाविदयालयात काही काळ ते प्राध्यापक होते. सरकारी विधी महाविदयालयात त्यांनी प्राध्यापक व नंतर काही वर्षे प्राचार्यपद सांभाळले. उच्चवर्णीयांकडून वर्षांनुवर्षे होणाऱ्या पिळवणुकीने दलित समाज भरडला जात होता. अशा या निद्रिस्त समाजाला जागृत करण्याचे अवघड कार्य डॉ. आंबेडकरांनी केले. 



भीमरावांनी आपल्या समाजासाठी वकिली करण्याचा निश्चय केला. त्यासाठी त्यांनी २० जुलै, १९२४ रोजी 'बहिष्कृत हितकारिणी सभा' स्थापन केली. 'शिकवा, चेतवा व संघटित करा' हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते. डॉ. आंबेडकरांना आपल्या निद्रिस्त समाजाची अस्मिता फुलवायची होती. त्यासाठी ते त्या 'मूक समाजाचे नायक' झाले. त्यांनी आपल्या या अशिक्षित बांधवांना एक दिव्य संदेश दिला, 'वाचाल, तर वाचाल.'

वसतिगृहे स्थापन करून अस्पृश्य मुलांना निवासाची सोय पुरवून त्यांना शिक्षण देणे, वाचनालये काढणे, रात्रीच्या शाळा भरवणे, तरुणांसाठी क्रीडामंडळे चालवणे अशा कार्यांवर 'बहिष्कृत हितकारिणी सभे'चा भर होता. आपल्या उत्तर आयुष्यात बाबासाहेबांनी 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी' ही संस्था स्थापन करून मुंबईत सिद्धार्थ महाविदयालय व औरंगाबाद येथे 'मिलिंद महाविदयालय' या संस्था काढल्या व नावारूपास आणल्या. 



दलित समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी १९२७ मध्ये डॉ. आंबेडकरांनी महाडला ‘चवदार तळे' येथे अहिंसक सत्याग्रह केला. अस्पृश्यांना मंदिरप्रवेश मिळावा म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या काळाराम मंदिरातील प्रवेशासाठी सत्याग्रह करण्यात आला.डॉ. आंबेडकरांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळावर काम केले. १९४२ साली ते केंद्र सरकारात मजूरमंत्री होते.

गोलमेज परिषदेसाठी ते दलितांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले आणि स्वातंत्र्योत्तर काळात ते स्वतंत्र भारताच्या घटनेचे शिल्पकार झाले. आपल्या बांधवांना जागृत करण्यासाठी त्यांनी विद्वत्तापूर्ण असे अनेक ग्रंथ लिहिले. राजगृहात त्यांचा स्वत:चा ग्रंथसंग्रह फार मोठा होता. बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर, १९५६ रोजी आपल्या लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. ६ डिसेंबर, १९५६ रोजी दिल्ली येथे डॉ. आंबेडकरांचे महानिर्वाण झाले. मात्र पददलित समाजाला 'भीमशक्ती' प्रदान करूनच डॉ. भीमराव आंबेडकर हा आदित्य अस्तंगत झाला.

महत्‍वाचे मुद्दे : 

  • जन्मतः अस्पृश्यतेचा डाग 
  • पावलोपावली मानभंग 
  • शिक्षण व त्यासाठी मिळालेले साहाय्य 
  • निद्रिस्त समाजाला जागे केले 
  • बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना 
  • मूक समाजाचे नायक
  • वाचाल, तर वाचाल
  • संस्थेची स्थापना
  • महाविद्यालये काढली
  • चवदार तळे', मंदिरप्रवेश इत्यादी चळवळी 
  • वाचनाचा छंद 
  • अनेक ग्रंथलेखन 
  • ग्रंथसंग्रह 
  • घटना तयार केली 
  • बौद्ध धर्माचा स्वीकार 
  • महानिर्वाण

निबंध 3

‘सूर्यफुले हातात ठेवणारा फकीर हजारो वर्षांनंतर लाभला, आता सूर्यफुलासारखे सूर्योन्मुख झालेच पाहिजे,' या शब्दांत कवी नामदेव ढसाळ बाबासाहेब आंबेडकरांविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करतात. कवीने जणू आपल्या शब्दांतून सर्व दलितांचे मनोगतच व्यक्त केले आहे. दलितांना गुलामगिरीच्या बेड्या तोडून ताठ मानेने जगायला बाबासाहेबांनीच शिकवले, म्हणून दलितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परमेश्वरासमानच वाटतात. दलितांच्या वाट्याला आलेली दु:खे त्यांनी स्वतः अनुभवली होती, त्यामुळेच तेे आपल्या बांधवांना आत्मविकासाचा योग्य मार्ग दाखवू शकले,



बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू येथे आला होता, रत्नागिरी जिल्हयातील मंडणगडजवळील आंबवडे हे त्यांचे मूळ गाव, पण त्यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथे आणि माध्यमिक व विश्वविदयालयीन शिक्षण मुंबईत झाले. बडोदे सरकारची शिष्यवृत्ती मिळवून ते अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी गेले, अर्थशास्त्रात पीएच्. डी. पदवी प्राप्त केलेल्या आंबेडकरांना नोकरीत कनिष्ठ जातीमुळे अनेकदा अपमान सहन करावा लागला. तेव्हाच त्यांनी आपल्या कार्याची दिशा निश्चित केली. पुढे इंग्लंडला जाऊन ते कायदयाचे पदवीधर झाले.



विविध वृत्तपत्रे काढून आणि परिषदा भरवून त्यांनी दलित समाजात जागृती निर्माण केली. 'शिकवा, चेतवा व संघटित करा' हे त्यांच्या 'बहिष्कृत हितकारिणी' या संस्थेचे ब्रीदवाक्य होते. १९२७ मध्ये दलितांना प्रवेश करण्यास मनाई असणाऱ्या महाडच्या चवदार तळ्यात ते आपल्या जातिबांधवांसह उतरले. १९३० मध्ये त्यांनी नासिक येथील काळाराम मंदिरात प्रवेश करण्यासाठी सत्याग्रह केला. सायमन कमिशनपुढे साक्ष देऊन व तीनही गोलमेज परिषदांमध्ये भाग घेऊन त्यांनी दलितांची बाजू सातत्याने मांडली. भारताची राज्यघटना व हिंदू कोड बिल ही डॉ. आंबेडकरांची दोन महान कार्ये होत. आपल्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. आपल्या थोर नेत्याविषयी बोलताना कवी म्हणतो,


'तू फुकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर। 

तू तोडल्यास गुलामांच्या पायांतल्या बेड्या।।


निबंध 4 



 १९ व्या शतकात भारतीय समाजाला कलंक असलेल्या अस्पश्यतेच्या निवारणाचे कार्य निरनिराळ्या समाजसुधारकांनी केले होते पण या सर्वापेक्षा अतिशय निष्ठेने स्वानुभवाच्या आधारावर अस्पृश्यांना गुलामगिरीच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी जागृत व संघटित करण्याचे शिक्षणाद्वारे त्यांच्यात नवविचारांचा प्रसार करण्याचे व आत्मसन्मानाचा नवीन मार्ग दाखविण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. तसेच भारताच्या घटनेचे शिल्पकार म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य वेगळे व असामान्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील 'महु' या गावी झाला.



त्यांची माता भीमाबाई लहानपणीच वारल्याने वडील रामजी यांनी त्यांचे पालनपोषण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती पण त्यांना अभ्यासाची आवड होती. तरी त्यांनी बिकट परिस्थितीत १९१२ मध्ये एल्फिन्स्टन कॉलेजमधून बी. ए.ची परीक्षा पास केली. उच्च शिक्षण घेण्याची त्यांची जिज्ञासा होतीच त्यामुळे त्यांनी १९१५ मध्ये प्राचीन भारतातील व्यापार या विषयावर प्रबंध लिहुन त्यांनी कोलंबिया विद्यापीठाची एम. ए. पदवी संपादन केली.

१९१६ मध्ये त्यांच्या 'नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया ए हिस्टॉरिकल अॅण्ड अॅनॅलिटिकल स्टडी' या प्रबंधाबद्दल कोलंबिया विद्यापीठाने त्यांना पी. एच. डी. ही पदवी प्रदान केली. डॉ. आंबेडकरांना अर्थशास्त्रात संशोधन करण्याची व लंडन विद्यापीठाची पदवी मिळविण्याची आणि बॅरिस्टर होण्याची इच्छा होती. १९२१ मध्ये ते एम. एस. सी झाले. 'प्रॉब्लेम ऑफ रूपी' हा त्यांचा प्रबंध मान्य करून लंडन विद्यापीठाने त्यांना डी.एस.सी. पदवी दिली. १९२३ मध्ये बॅरिस्टरच्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले.


१९१७ मध्ये मुंबईला आंबेडकर आल्यानंतर त्यांनी बडोदा संस्थानची नोकरी स्वीकारली पण या नोकरीत ते अस्पृश्य असल्याने त्यांना इतरांकडून अतिशय मानहानीची वागणूक मिळाली तसेच अवहेलना व अपमान सहन करावा लागला. या वागणुकीमुळे आंबेडकरांनी अस्पृश्यांना शिक्षण देणे त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणणे आपल्या न्याय्य सामाजिक व आर्थिक हक्कांसाठी अहिंसक मार्गाने संघटित लढा देण्यासाठी अस्पृश्यांना आत्मनिर्भर बनविणे व त्यांच्या समान हक्कांसाठी निरनिराळ्या चळवळी करणे यांना पुढील काळात प्राधान्य दिले.


जातिसंस्था व अस्पृश्यता ही भारतीय समाज जीवनातील कीड असून अस्पृश्यांना अतिशय दयनीय मानहानिकारक जीवन जगावे लागत होते. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी २० जुलै १९२४ रोजी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. महाड येथे भरलेल्या सत्याग्रह परिषदेतच हिंदू समाजाचा धर्मग्रंथ असलेल्या मनुस्मृतीचे २५ डिसेंबर १९२७ रोजी दहन करण्यात आले. ही घटना अस्पृश्यांचा आत्मविश्वास वाढविणारी घटना होती.

 तसेच त्यांनी महाडच्या चवदार तळ्यावरील केलेला सत्याग्रह अन्यायी समाजव्यवस्थेविरुद्ध केलेले बंड होते. आपणास हक्क आहे हे देशाला सांगणारी एक प्रतीकात्मक कृती होती. २ मार्च १९३० रोजी नाशिक येथील काळा राम मंदिर येथे त्यांनी सत्याग्रह केले. त्याच्या प्रयत्नामुळे २४ सप्टेंबर १९३२ रोजी पुणे करारात अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदाराऐवजी १४८ जागा राखीव ठेवण्यात आल्या. 


१९33 साली काँग्रेसच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीयनी सह्या केल्या. १९३७ - १९३५ कायद्यामुळे झालेल्या निवडणुकीने आंबेडकर विरोधी पक्ष नेते निवडले गेले. १९२० च्या माणगांव परिषदेचा अध्यक्षपद भूषविले.१९३०-३१-३२ या तिन्ही साली गोलमेज परिषदेला अस्पृश्याचे प्रतिनिधी म्हणून उपस्थिती राहिले.१५ ऑगस्ट १९४७ च्या पंडीत नेहरूंच्या मंत्रिमंडळात ते कायदा मंत्री झाले. घटनेचा मसुदा समितीची प्रमुख जबाबदारी डॉ.आंबेडकरांवर टाकली गेली व ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्यामुळेच त्यांना घटनेचे शिल्पकार म्हटले जाते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक अस्पृश्य असल्यामुळे लोकांचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला नव्हता आणि त्यानी जे अस्पृश्यांसाठी कार्य केले त्यामळे उच्चवर्णीय लोकांमध्ये त्याच्या बद्दल आक्रोश होता पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाना अस्पृश्यासाठी जे कार्य केले त्यामुळे अस्पृश्यांना समाजात आर्थिक हक्कांसाठी शिक्षण घेण्यासाठी आत्मनिर्भर बनविले. त्यामुळे आंबेडकर अस्पृश्यांसाठी देवाचे अवतार आहेत.

हिंदू कोडबील संसदेत मांडल्यामुळे आधुनिक मनु म्हणून भारत देश त्यांना 'दलितांचा कैवारी' म्हणून ओळखतो. भारत शासनाने १९९०-९१ साली मरणोत्तर 'भारत रत्न' पुरस्कार दिला व १९९०-९१ साली सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे केले.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या कार्यामुळे बेव्हरले निफोल्सन ने आंबेडकरच्या तोंडून बाहेर पडणारे शब्द म्हणजे पिस्तुलातून बाहेर पडणारे बार त्यांच्याविषयी उद्गार म्हटले आहे. तसेच आचार्य अत्रे त्यांना महाराष्ट्राचा तेजस्वी ज्ञानयोगी म्हणतात. सयाजीराव गायकवाड त्यांना 'दलितांचा उद्धारकर्ता' म्हणतात तर राजर्षी शाहूमहाराज त्यांना 'दलितांचा मुक्तिदाता' म्हणत.


१९३६ साली त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली आणि १९४२ साली त्यांनी 'अखिल भारतीय शेड्युल्ड कास्टस फेडरेशन सोसायटी'ची स्थापना केली. तसेच १९४६ साली पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि त्याच वर्षी औरंगाबाद येथे 'मिलिंद महाविद्यालय' व 'सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स' मुंबई येथे त्यांनी सुरू केले.


१९१६ साली त्यांनी 'Caste in India' हे पुस्तक लिहिले. राजर्षीच्या मदतीने १९२० साली 'मूकनायक' वृत्तपत्र सुरू केले १९३० साली त्यांनी 'जनता उत्कृष्ट वृत्तपत्र' सुरू केले. पुढे ५६ साली नामांतर करून त्याचे 'प्रबुद्ध भारत' केले गेले. १९४६ साली त्यांनी Who Were Shudras पुस्तक लिहिले तसेच त्यांनी The Untouchable हा ग्रंथ लिहिला १९५६ साली त्यांनी Bouddh and his Dharm हा ग्रंथ लिहिला जो त्याच्या मृत्यूनंतर म्हणजे ६ डिसेंबर १९५६ साली त्यांचा मृत्यू झाला आणि १९५७ साली हा ग्रंथ प्रकाशित झाला.



डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना समिती तयार केली जगात सर्वांत उत्कृष्ट घटना समिती आहे. त्यांनी त्या घटना समितीत अस्पृश्यांसाठी राखीव जागा ठेवली आहे ज्यामुळे अस्पृश्यांना नोकरी व अन्य कोणत्याही क्षेत्रात प्रवेश घेता येतो. महात्मा ज्योतीबा फुले, महाराजा सयाजीराव गायकवाड, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, गोपाळबाबा वलंगकर विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारण्याचे कार्य सुरू केलेले होते. पण वरिष्ठ जातींच्या मनोभूमिकेत काहीही बदल झाला नाही.

डॉ. आंबेडकर यांनी हा बदल घडवून आणला. तसेच हे कार्य करताना त्यांना हिंदू धर्मात अस्पृश्यांना माणुसकीचे अधिकार मिळणार नाहीत जाणवू लागले होते. त्यामुळे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे चंद्रमणी महास्थवीर यांच्या हस्ते बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. अशाप्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक महान व्यक्ती होते.

निबंध 5

महामानव - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

थोर समाज उद्धारक, दलितांचे कैवारी, प्रकांड पंडीत, घटनेचे शिल्पकार, मानवतावादी विचारांचे महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. त्यांचे संपूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर. त्यांचे माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे झाले. त्या काळातील समाज अज्ञान, निरक्षरता, अनिष्ट रूढी-परंपरा, गरिबी अशा व्याधींनी पोखरलेला होता.दलित बांधवांना तर मानवतेचे हक्कसुद्धा नाकारले जात होते. 


अन्याय, छळ, अपमान यांनी त्यांचे रोजचे जीवन दु:खमय झाले होते. अशा समाज बांधवांची दुःखे डॉ. बाबासाहेबांनी पाहिली आणि स्वत:ही अनुभवली होती. माझ्या बांधवांचे दुःख मी दूर करीन. त्यांना मानवतेचे अधिकार मिळवून देईन; अशा विचारांनी प्रेरीत होऊन त्यांनी आपल्या कार्याला सुरवात केली. शिक्षणाचे महत्त्व त्यांनी ओळखले होते. म्हणूनच अत्यंत बिकट परिस्थितीतही त्यांनी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतले.


अर्थशास्त्रात डॉक्टरेट आणि कायद्यातील बॅरीस्टर ह्या उच्च पदव्या मिळविल्या. लंडनला भरलेल्या गोलमेज परीषदेत त्यांनी आपल्या बांधवांचे दु:ख जगासमोर आणले. लोकशाही राज्यव्यवस्थेचा पुरस्कार केला.
दलित बांधवात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी मुंबई, औरंगाबाद येथे महाविद्यालये, वसतीगृहांची स्थापना केली. शिका, संघर्ष करा आणि आपले हक्क मिळवा, अशी आपल्या बांधवांना शिकवण दिली. 



समाज प्रबोधनासाठी, त्यांनी अनेक संस्थांची स्थापना केली. अनेक महान ग्रंथ लिहून समाजशिक्षण केले.
त्यांच्या अथक प्रयत्नाने दलित बांधवांमध्ये शिक्षणाचा खूप प्रसार झाला. बाबासाहेबांनी त्यांना माणूसकीचे अधिकार मिळवून दिले. मानाने जगण्यास शिकवले...



हे सर्व करीत असताना त्यांनी आपल्या देशासाठी मोठे योगदान दिले. शेतकरी, मजूर, कामगार यांचे प्रश्न सोडविले. स्वतंत्र भारतासाठी राज्यघटना लिहुन भारतात लोकशाही राज्यव्यवस्थेचा मजबूत पाया घातला. म्हणूनच आज भारत हे जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र ठरले आणि जगाच्या प्रशंसेस पात्र ठरले.



असे सर्व झाले तरी रूढीग्रस्त समाज अजूनही दलित बांधवांना आपले म्हणत नव्हता. म्हणून अखेर डॉ. बाबासाहेबांनी पूर्ण विचार करून आपल्या लाखो अनुयायासह हिंदू धर्माचा त्याग करून १९५६ मध्ये बौद्ध धर्माचा स्वीकार केला. असे मानवतेचे, समाजप्रबोधनाचे कार्य करीत असताना त्यांना राजर्षी शाहूमहाराज, बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी मदत केली. 


डॉ. बाबासाहेबांनी, आपला समाज, आपला देश यांची उन्नती करण्यासाठी अखेरपर्यंत लढा दिला. देशाने आणि जगाने या महामानवाला अनेक सन्मान देऊन गौरविले. आपल्या बांधवांची आणि देशाची सेवा करीत असतानाच ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे महानिर्वाण झाले.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

Dr Babasaheb Ambedkar Essay In Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध


Dr Babasaheb Ambedkar Essay In Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध

निबंध 1 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध  बघणार आहोत. या पानावर पुर्ण 5 निबंध दिले आहेत.  भारतासाठी केलेले कार्य व समाज बांधवासाठी केलेला त्‍याग व कार्य सविस्‍तरपणे स्‍पष्‍ट केले आहेत.    चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर - म्हणजेच, डॉ. भीमराव रामजी आंबेडकर  यांनी भारत स्वतंत्र झाल्याबरोबर भारतीय जनतेला एक मौलिक संदेश दिला होता. तो असा की, लोकशाहीचे अस्तित्व आपणांस टिकवायचे असेल, तर आपले सामाजिक आणि आर्थिक उद्देश साध्य करण्यासाठी आपण फक्त सनदशीर मार्गांचाच अवलंब केला पाहिजे. केवढी दुरदृृृृृष्‍टी होती  या संदेशात !

 पण आपण आज - अगदी स्वतंत्र होऊनही साठ वर्षे झाली तरी या गोष्टी आपल्या आचरणात आणल्या नाहीत. कोणत्याही क्षुल्लक कारणाने प्रक्षोभ झाला की, लगेच जाळपोळ, मोडतोड केली जाते. कारण आपण तेव्हा हे विसरलेले असतो की, अशा विध्वंसात आपण आपलेच नुकसान करत असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र आणि साहित्य यांतून आपल्याला असे मोलाचे संदेश मिळत असतात.

१४ एप्रिल १८९१ मध्ये एका गरीब घरात बाबासाहेबांचा जन्म झाला होता. त्यात भर म्हणजे 'मागासलेली जात' हा शिक्का उमटलेला. पण ते कोणत्याही अडचणीला डगमगले नाहीत. कशासाठीही कुरकुरत बसायचे नाही, हा तर त्यांचा निश्चय होता. त्यामुळे चाळीतल्या गोंगाटातही ते उत्तम अभ्यास करू शकले. माणूस फक्त ज्ञानामुळेच दु:खमुक्त होऊ शकतो, हे त्यांनी जाणले होते.

डॉ. आंबेडकर यांनी स्वत:ची उन्नती तर साधलीच, पण त्यांचा मोठेपणा असा की, ते आपल्या अन्यायग्रस्त समाजालाही विसरले नाहीत. आयुष्यभर खडतर ज्ञानसाधना करून विधिशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी ज्ञानशाखांवर त्यांनी प्रभुत्व संपादन केले होते.
Dr Babasaheb Ambedkar Essay In Marathi
Dr Babasaheb Ambedkar Essay In Marathi

 दलितांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. जनतेला एकत्र आणण्यासाठी त्यांनी 'बहिष्कृत हितकारिणी सभा' (१९२४) स्थापन केली. पुढे 'स्वतंत्र मजूर पक्ष' या राजकीय पक्षाची १९३६ साली स्थापना केली. १९४२ मध्ये 'ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन' या संस्थेची स्थापना केली. दलित जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी विपुल लेखन केले.

 'मूकनायक', 'जनता' (याचेच रूपांतर पुढे 'प्रबुद्ध भारत' असे झाले) अशा नियतकालिकांद्वारे समाजात जागृती निर्माण केली. 'बहिष्कृत भारत'चे ते संस्थापक संपादक होते. 'हु वेअर दि शूद्राज?', 'बुद्ध अँड हिज धम्म' इत्यादी त्यांचे अनेक ग्रंथ विख्यात आहेत. 'भारतरत्न' या सर्वश्रेष्ठ पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले होते.


जातीयतेचा कलंक नाहीसा व्हावा म्हणून बाबासाहेब आयुष्यभर झगडले. जातिपातीचा विचार न करता सर्वांनाच पाणी भरण्याचा हक्क मिळावा, म्हणून बाबासाहेबांनी महाडच्या चवदार तळ्यावर १९२७ साली सत्याग्रह केला. १९३० साली नाशिकच्या काळाराम मंदिरातील प्रवेशाचा लढा दिला.

 हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान हे वर्णवर्चस्वावर आधारलेले असल्यामुळे दलितांना हिंदू धर्मात समतेची व न्यायाची वागणूक मिळणे अशक्य आहे, अशी त्यांची खात्री झाली होती. म्हणून त्यांनी १९५६ मध्ये आपल्या हजारो अनुयायांसह नागपूर येथे हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्मात प्रवेश केला.


डॉ. आंबेडकरांनी महिलांच्या शिक्षणाचाही आग्रह धरला. त्यासाठी ते पालकांना सांगत - मुलामुलींची लग्ने लवकर करू नका. निदान त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहू द्या.  स्त्रियांचे हक्क, त्यांची उन्नती, त्यांचा विकास साधण्यासाठी बाबासाहेबांनी १९४८ मध्‍ये कायदेमंडळापुढे 'हिंदू कोड बिल' सादर केले. मुरळी, देवदासी, मजूर, कामकरी स्त्रिया इत्यादींच्या हक्कांसाठीही ते झटले. कारण स्त्रियांचा सन्मान त्यांना महत्त्वाचा वाटे.


समाजातील जो घटक पीडित आहे, अन्यायग्रस्त आहे, त्याने त्या अन्यायाच्या निवारणासाठी स्वत:च पुढे आले पाहिजे, तरच त्याचे दुःख संपू शकते, असे बाबासाहेब सांगत. आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत अन्यायाविरुद्ध लढलेल्या बाबासाहेबांचे १९५६ साली महानिर्वाण झाले.

 मित्रांनो तुम्‍हाला Dr Babasaheb Ambedkar Nibandh In Marathi हा निबंध कसा वाटला  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद .
महत्‍वाचे मुद्दे : 

  • भारतीय घटनेचे शिल्पकार 
  • लोकशाही राज्य कसे असावे याबाबत मार्गदर्शन 
  • जन्म १८९१
  • कष्टाने शिक्षण
  • ज्ञानामुळेच दु:खमुक्ती हा विश्वास
  • विविध शास्त्रांचा अभ्यास 
  • विपुल लेखन 
  • 'भारतरत्न' पुरस्कार
  • वाचनाची विलक्षण आवड
  • विदयार्थ्यांना मार्गदर्शन 
  • आत्मविश्वास 
  • दीर्घोदयोग, शीलसंवर्धन 
  • स्त्रियांना शिक्षणाचा आग्रह 
  • 'हिंदू कोड बिला'चा आग्रह 
  • प्रत्येकाने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध करावा.
निबंध 2

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल, १८९१ रोजी झाला. शाळेत, महाविद्यालयात अस्पृश्यतेमुळे त्यांचा अनेकदा मानभंग झाला होता व त्यांच्या रास्त हक्कांपासून त्यांना वंचित केले गेले होते. बडोदयाचे महाराज सयाजीराव गायकवाड व कोल्हापूरचे शाहू महाराज यांच्या आर्थिक साहाय्यावर ते बी. ए. झाले. परदेशात जाऊन त्यांनी अर्थशास्त्र या विषयात एम. ए. पीएच. डी. या पदव्या मिळवल्या.

तेथे ते बॅरिस्टरही झाले; सिडनहॅम महाविदयालयात काही काळ ते प्राध्यापक होते. सरकारी विधी महाविदयालयात त्यांनी प्राध्यापक व नंतर काही वर्षे प्राचार्यपद सांभाळले. उच्चवर्णीयांकडून वर्षांनुवर्षे होणाऱ्या पिळवणुकीने दलित समाज भरडला जात होता. अशा या निद्रिस्त समाजाला जागृत करण्याचे अवघड कार्य डॉ. आंबेडकरांनी केले. 



भीमरावांनी आपल्या समाजासाठी वकिली करण्याचा निश्चय केला. त्यासाठी त्यांनी २० जुलै, १९२४ रोजी 'बहिष्कृत हितकारिणी सभा' स्थापन केली. 'शिकवा, चेतवा व संघटित करा' हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते. डॉ. आंबेडकरांना आपल्या निद्रिस्त समाजाची अस्मिता फुलवायची होती. त्यासाठी ते त्या 'मूक समाजाचे नायक' झाले. त्यांनी आपल्या या अशिक्षित बांधवांना एक दिव्य संदेश दिला, 'वाचाल, तर वाचाल.'

वसतिगृहे स्थापन करून अस्पृश्य मुलांना निवासाची सोय पुरवून त्यांना शिक्षण देणे, वाचनालये काढणे, रात्रीच्या शाळा भरवणे, तरुणांसाठी क्रीडामंडळे चालवणे अशा कार्यांवर 'बहिष्कृत हितकारिणी सभे'चा भर होता. आपल्या उत्तर आयुष्यात बाबासाहेबांनी 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी' ही संस्था स्थापन करून मुंबईत सिद्धार्थ महाविदयालय व औरंगाबाद येथे 'मिलिंद महाविदयालय' या संस्था काढल्या व नावारूपास आणल्या. 



दलित समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी १९२७ मध्ये डॉ. आंबेडकरांनी महाडला ‘चवदार तळे' येथे अहिंसक सत्याग्रह केला. अस्पृश्यांना मंदिरप्रवेश मिळावा म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या काळाराम मंदिरातील प्रवेशासाठी सत्याग्रह करण्यात आला.डॉ. आंबेडकरांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळावर काम केले. १९४२ साली ते केंद्र सरकारात मजूरमंत्री होते.

गोलमेज परिषदेसाठी ते दलितांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले आणि स्वातंत्र्योत्तर काळात ते स्वतंत्र भारताच्या घटनेचे शिल्पकार झाले. आपल्या बांधवांना जागृत करण्यासाठी त्यांनी विद्वत्तापूर्ण असे अनेक ग्रंथ लिहिले. राजगृहात त्यांचा स्वत:चा ग्रंथसंग्रह फार मोठा होता. बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर, १९५६ रोजी आपल्या लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. ६ डिसेंबर, १९५६ रोजी दिल्ली येथे डॉ. आंबेडकरांचे महानिर्वाण झाले. मात्र पददलित समाजाला 'भीमशक्ती' प्रदान करूनच डॉ. भीमराव आंबेडकर हा आदित्य अस्तंगत झाला.

महत्‍वाचे मुद्दे : 

  • जन्मतः अस्पृश्यतेचा डाग 
  • पावलोपावली मानभंग 
  • शिक्षण व त्यासाठी मिळालेले साहाय्य 
  • निद्रिस्त समाजाला जागे केले 
  • बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना 
  • मूक समाजाचे नायक
  • वाचाल, तर वाचाल
  • संस्थेची स्थापना
  • महाविद्यालये काढली
  • चवदार तळे', मंदिरप्रवेश इत्यादी चळवळी 
  • वाचनाचा छंद 
  • अनेक ग्रंथलेखन 
  • ग्रंथसंग्रह 
  • घटना तयार केली 
  • बौद्ध धर्माचा स्वीकार 
  • महानिर्वाण

निबंध 3

‘सूर्यफुले हातात ठेवणारा फकीर हजारो वर्षांनंतर लाभला, आता सूर्यफुलासारखे सूर्योन्मुख झालेच पाहिजे,' या शब्दांत कवी नामदेव ढसाळ बाबासाहेब आंबेडकरांविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करतात. कवीने जणू आपल्या शब्दांतून सर्व दलितांचे मनोगतच व्यक्त केले आहे. दलितांना गुलामगिरीच्या बेड्या तोडून ताठ मानेने जगायला बाबासाहेबांनीच शिकवले, म्हणून दलितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परमेश्वरासमानच वाटतात. दलितांच्या वाट्याला आलेली दु:खे त्यांनी स्वतः अनुभवली होती, त्यामुळेच तेे आपल्या बांधवांना आत्मविकासाचा योग्य मार्ग दाखवू शकले,



बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू येथे आला होता, रत्नागिरी जिल्हयातील मंडणगडजवळील आंबवडे हे त्यांचे मूळ गाव, पण त्यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथे आणि माध्यमिक व विश्वविदयालयीन शिक्षण मुंबईत झाले. बडोदे सरकारची शिष्यवृत्ती मिळवून ते अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी गेले, अर्थशास्त्रात पीएच्. डी. पदवी प्राप्त केलेल्या आंबेडकरांना नोकरीत कनिष्ठ जातीमुळे अनेकदा अपमान सहन करावा लागला. तेव्हाच त्यांनी आपल्या कार्याची दिशा निश्चित केली. पुढे इंग्लंडला जाऊन ते कायदयाचे पदवीधर झाले.



विविध वृत्तपत्रे काढून आणि परिषदा भरवून त्यांनी दलित समाजात जागृती निर्माण केली. 'शिकवा, चेतवा व संघटित करा' हे त्यांच्या 'बहिष्कृत हितकारिणी' या संस्थेचे ब्रीदवाक्य होते. १९२७ मध्ये दलितांना प्रवेश करण्यास मनाई असणाऱ्या महाडच्या चवदार तळ्यात ते आपल्या जातिबांधवांसह उतरले. १९३० मध्ये त्यांनी नासिक येथील काळाराम मंदिरात प्रवेश करण्यासाठी सत्याग्रह केला. सायमन कमिशनपुढे साक्ष देऊन व तीनही गोलमेज परिषदांमध्ये भाग घेऊन त्यांनी दलितांची बाजू सातत्याने मांडली. भारताची राज्यघटना व हिंदू कोड बिल ही डॉ. आंबेडकरांची दोन महान कार्ये होत. आपल्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. आपल्या थोर नेत्याविषयी बोलताना कवी म्हणतो,


'तू फुकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर। 

तू तोडल्यास गुलामांच्या पायांतल्या बेड्या।।


निबंध 4 



 १९ व्या शतकात भारतीय समाजाला कलंक असलेल्या अस्पश्यतेच्या निवारणाचे कार्य निरनिराळ्या समाजसुधारकांनी केले होते पण या सर्वापेक्षा अतिशय निष्ठेने स्वानुभवाच्या आधारावर अस्पृश्यांना गुलामगिरीच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी जागृत व संघटित करण्याचे शिक्षणाद्वारे त्यांच्यात नवविचारांचा प्रसार करण्याचे व आत्मसन्मानाचा नवीन मार्ग दाखविण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. तसेच भारताच्या घटनेचे शिल्पकार म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य वेगळे व असामान्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील 'महु' या गावी झाला.



त्यांची माता भीमाबाई लहानपणीच वारल्याने वडील रामजी यांनी त्यांचे पालनपोषण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती पण त्यांना अभ्यासाची आवड होती. तरी त्यांनी बिकट परिस्थितीत १९१२ मध्ये एल्फिन्स्टन कॉलेजमधून बी. ए.ची परीक्षा पास केली. उच्च शिक्षण घेण्याची त्यांची जिज्ञासा होतीच त्यामुळे त्यांनी १९१५ मध्ये प्राचीन भारतातील व्यापार या विषयावर प्रबंध लिहुन त्यांनी कोलंबिया विद्यापीठाची एम. ए. पदवी संपादन केली.

१९१६ मध्ये त्यांच्या 'नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया ए हिस्टॉरिकल अॅण्ड अॅनॅलिटिकल स्टडी' या प्रबंधाबद्दल कोलंबिया विद्यापीठाने त्यांना पी. एच. डी. ही पदवी प्रदान केली. डॉ. आंबेडकरांना अर्थशास्त्रात संशोधन करण्याची व लंडन विद्यापीठाची पदवी मिळविण्याची आणि बॅरिस्टर होण्याची इच्छा होती. १९२१ मध्ये ते एम. एस. सी झाले. 'प्रॉब्लेम ऑफ रूपी' हा त्यांचा प्रबंध मान्य करून लंडन विद्यापीठाने त्यांना डी.एस.सी. पदवी दिली. १९२३ मध्ये बॅरिस्टरच्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले.


१९१७ मध्ये मुंबईला आंबेडकर आल्यानंतर त्यांनी बडोदा संस्थानची नोकरी स्वीकारली पण या नोकरीत ते अस्पृश्य असल्याने त्यांना इतरांकडून अतिशय मानहानीची वागणूक मिळाली तसेच अवहेलना व अपमान सहन करावा लागला. या वागणुकीमुळे आंबेडकरांनी अस्पृश्यांना शिक्षण देणे त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणणे आपल्या न्याय्य सामाजिक व आर्थिक हक्कांसाठी अहिंसक मार्गाने संघटित लढा देण्यासाठी अस्पृश्यांना आत्मनिर्भर बनविणे व त्यांच्या समान हक्कांसाठी निरनिराळ्या चळवळी करणे यांना पुढील काळात प्राधान्य दिले.


जातिसंस्था व अस्पृश्यता ही भारतीय समाज जीवनातील कीड असून अस्पृश्यांना अतिशय दयनीय मानहानिकारक जीवन जगावे लागत होते. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी २० जुलै १९२४ रोजी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. महाड येथे भरलेल्या सत्याग्रह परिषदेतच हिंदू समाजाचा धर्मग्रंथ असलेल्या मनुस्मृतीचे २५ डिसेंबर १९२७ रोजी दहन करण्यात आले. ही घटना अस्पृश्यांचा आत्मविश्वास वाढविणारी घटना होती.

 तसेच त्यांनी महाडच्या चवदार तळ्यावरील केलेला सत्याग्रह अन्यायी समाजव्यवस्थेविरुद्ध केलेले बंड होते. आपणास हक्क आहे हे देशाला सांगणारी एक प्रतीकात्मक कृती होती. २ मार्च १९३० रोजी नाशिक येथील काळा राम मंदिर येथे त्यांनी सत्याग्रह केले. त्याच्या प्रयत्नामुळे २४ सप्टेंबर १९३२ रोजी पुणे करारात अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदाराऐवजी १४८ जागा राखीव ठेवण्यात आल्या. 


१९33 साली काँग्रेसच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीयनी सह्या केल्या. १९३७ - १९३५ कायद्यामुळे झालेल्या निवडणुकीने आंबेडकर विरोधी पक्ष नेते निवडले गेले. १९२० च्या माणगांव परिषदेचा अध्यक्षपद भूषविले.१९३०-३१-३२ या तिन्ही साली गोलमेज परिषदेला अस्पृश्याचे प्रतिनिधी म्हणून उपस्थिती राहिले.१५ ऑगस्ट १९४७ च्या पंडीत नेहरूंच्या मंत्रिमंडळात ते कायदा मंत्री झाले. घटनेचा मसुदा समितीची प्रमुख जबाबदारी डॉ.आंबेडकरांवर टाकली गेली व ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्यामुळेच त्यांना घटनेचे शिल्पकार म्हटले जाते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक अस्पृश्य असल्यामुळे लोकांचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला नव्हता आणि त्यानी जे अस्पृश्यांसाठी कार्य केले त्यामळे उच्चवर्णीय लोकांमध्ये त्याच्या बद्दल आक्रोश होता पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाना अस्पृश्यासाठी जे कार्य केले त्यामुळे अस्पृश्यांना समाजात आर्थिक हक्कांसाठी शिक्षण घेण्यासाठी आत्मनिर्भर बनविले. त्यामुळे आंबेडकर अस्पृश्यांसाठी देवाचे अवतार आहेत.

हिंदू कोडबील संसदेत मांडल्यामुळे आधुनिक मनु म्हणून भारत देश त्यांना 'दलितांचा कैवारी' म्हणून ओळखतो. भारत शासनाने १९९०-९१ साली मरणोत्तर 'भारत रत्न' पुरस्कार दिला व १९९०-९१ साली सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे केले.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या कार्यामुळे बेव्हरले निफोल्सन ने आंबेडकरच्या तोंडून बाहेर पडणारे शब्द म्हणजे पिस्तुलातून बाहेर पडणारे बार त्यांच्याविषयी उद्गार म्हटले आहे. तसेच आचार्य अत्रे त्यांना महाराष्ट्राचा तेजस्वी ज्ञानयोगी म्हणतात. सयाजीराव गायकवाड त्यांना 'दलितांचा उद्धारकर्ता' म्हणतात तर राजर्षी शाहूमहाराज त्यांना 'दलितांचा मुक्तिदाता' म्हणत.


१९३६ साली त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली आणि १९४२ साली त्यांनी 'अखिल भारतीय शेड्युल्ड कास्टस फेडरेशन सोसायटी'ची स्थापना केली. तसेच १९४६ साली पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि त्याच वर्षी औरंगाबाद येथे 'मिलिंद महाविद्यालय' व 'सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स' मुंबई येथे त्यांनी सुरू केले.


१९१६ साली त्यांनी 'Caste in India' हे पुस्तक लिहिले. राजर्षीच्या मदतीने १९२० साली 'मूकनायक' वृत्तपत्र सुरू केले १९३० साली त्यांनी 'जनता उत्कृष्ट वृत्तपत्र' सुरू केले. पुढे ५६ साली नामांतर करून त्याचे 'प्रबुद्ध भारत' केले गेले. १९४६ साली त्यांनी Who Were Shudras पुस्तक लिहिले तसेच त्यांनी The Untouchable हा ग्रंथ लिहिला १९५६ साली त्यांनी Bouddh and his Dharm हा ग्रंथ लिहिला जो त्याच्या मृत्यूनंतर म्हणजे ६ डिसेंबर १९५६ साली त्यांचा मृत्यू झाला आणि १९५७ साली हा ग्रंथ प्रकाशित झाला.



डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना समिती तयार केली जगात सर्वांत उत्कृष्ट घटना समिती आहे. त्यांनी त्या घटना समितीत अस्पृश्यांसाठी राखीव जागा ठेवली आहे ज्यामुळे अस्पृश्यांना नोकरी व अन्य कोणत्याही क्षेत्रात प्रवेश घेता येतो. महात्मा ज्योतीबा फुले, महाराजा सयाजीराव गायकवाड, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, गोपाळबाबा वलंगकर विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारण्याचे कार्य सुरू केलेले होते. पण वरिष्ठ जातींच्या मनोभूमिकेत काहीही बदल झाला नाही.

डॉ. आंबेडकर यांनी हा बदल घडवून आणला. तसेच हे कार्य करताना त्यांना हिंदू धर्मात अस्पृश्यांना माणुसकीचे अधिकार मिळणार नाहीत जाणवू लागले होते. त्यामुळे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे चंद्रमणी महास्थवीर यांच्या हस्ते बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. अशाप्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक महान व्यक्ती होते.

निबंध 5

महामानव - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

थोर समाज उद्धारक, दलितांचे कैवारी, प्रकांड पंडीत, घटनेचे शिल्पकार, मानवतावादी विचारांचे महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. त्यांचे संपूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर. त्यांचे माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे झाले. त्या काळातील समाज अज्ञान, निरक्षरता, अनिष्ट रूढी-परंपरा, गरिबी अशा व्याधींनी पोखरलेला होता.दलित बांधवांना तर मानवतेचे हक्कसुद्धा नाकारले जात होते. 


अन्याय, छळ, अपमान यांनी त्यांचे रोजचे जीवन दु:खमय झाले होते. अशा समाज बांधवांची दुःखे डॉ. बाबासाहेबांनी पाहिली आणि स्वत:ही अनुभवली होती. माझ्या बांधवांचे दुःख मी दूर करीन. त्यांना मानवतेचे अधिकार मिळवून देईन; अशा विचारांनी प्रेरीत होऊन त्यांनी आपल्या कार्याला सुरवात केली. शिक्षणाचे महत्त्व त्यांनी ओळखले होते. म्हणूनच अत्यंत बिकट परिस्थितीतही त्यांनी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतले.


अर्थशास्त्रात डॉक्टरेट आणि कायद्यातील बॅरीस्टर ह्या उच्च पदव्या मिळविल्या. लंडनला भरलेल्या गोलमेज परीषदेत त्यांनी आपल्या बांधवांचे दु:ख जगासमोर आणले. लोकशाही राज्यव्यवस्थेचा पुरस्कार केला.
दलित बांधवात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी मुंबई, औरंगाबाद येथे महाविद्यालये, वसतीगृहांची स्थापना केली. शिका, संघर्ष करा आणि आपले हक्क मिळवा, अशी आपल्या बांधवांना शिकवण दिली. 



समाज प्रबोधनासाठी, त्यांनी अनेक संस्थांची स्थापना केली. अनेक महान ग्रंथ लिहून समाजशिक्षण केले.
त्यांच्या अथक प्रयत्नाने दलित बांधवांमध्ये शिक्षणाचा खूप प्रसार झाला. बाबासाहेबांनी त्यांना माणूसकीचे अधिकार मिळवून दिले. मानाने जगण्यास शिकवले...



हे सर्व करीत असताना त्यांनी आपल्या देशासाठी मोठे योगदान दिले. शेतकरी, मजूर, कामगार यांचे प्रश्न सोडविले. स्वतंत्र भारतासाठी राज्यघटना लिहुन भारतात लोकशाही राज्यव्यवस्थेचा मजबूत पाया घातला. म्हणूनच आज भारत हे जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र ठरले आणि जगाच्या प्रशंसेस पात्र ठरले.



असे सर्व झाले तरी रूढीग्रस्त समाज अजूनही दलित बांधवांना आपले म्हणत नव्हता. म्हणून अखेर डॉ. बाबासाहेबांनी पूर्ण विचार करून आपल्या लाखो अनुयायासह हिंदू धर्माचा त्याग करून १९५६ मध्ये बौद्ध धर्माचा स्वीकार केला. असे मानवतेचे, समाजप्रबोधनाचे कार्य करीत असताना त्यांना राजर्षी शाहूमहाराज, बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी मदत केली. 


डॉ. बाबासाहेबांनी, आपला समाज, आपला देश यांची उन्नती करण्यासाठी अखेरपर्यंत लढा दिला. देशाने आणि जगाने या महामानवाला अनेक सन्मान देऊन गौरविले. आपल्या बांधवांची आणि देशाची सेवा करीत असतानाच ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे महानिर्वाण झाले.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद