खेळाचे महत्व मराठी निबंध | Khelache Mahatva Essay Marathi

निबंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण खेळाचे महत्व मराठी निबंध  बघणार आहोतया लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. या निबंधामध्‍ये आज खेळांबद्दल असलेला दृष्‍टीकोन , खेळाचे शारीरीक व मानसीक दृष्‍टया असणारे फायदे स्‍पष्‍ट केले आहेत.  आज आपण खेळाचे महत्व  शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 


आज भारतीयांच्या जीवनात खेळांना महत्त्व आले आहे. आजकाल खेळाविषयीचा दृष्टिकोन थोडा थोडा बदलू लागला आहे; पण काही वर्षांपूर्वी खेळण्यात वेळ घालवणारे मूल हे अवलक्षणी समजले जायचे. इतकेच काय, एखादयाने 'खेळ' हे आपले जीवनध्येय (करिअर) करायचे ठरवले, तर त्याला 'भिकेचे डोहाळे' लागले असे मानले जायचे.


आज खेळातूनही पैसा मिळू शकतो, हे पाहून काही लोक तो आपल्या करिअरचा भाग करतात; पण त्याचबरोबर खेळाचे इतर फायदेही आज आपणाला उमगले आहेत. निकोप शरीरातच निकोप मन असू शकते, हे उमगल्यावर शरीर निकोप, सुदृढ ठेवण्यासाठी माणसे धडपडू लागली आणि निकोप शरीराचा एक मार्ग खेळाच्या पटांगणातून जातो, हे उमगल्यावर त्यांना खेळ हवेहवेसे वाटू लागले.


Khelache-Mahatva-Essay-Marathi
Khelache-Mahatva-Essay-Marathi


लहानपणी आपला बराचसा वेळ हा खेळण्यात जातो; पण लहानपणचे बहुतेक खेळ हे गमतीखातर खेळले जातात. त्यांत कोणतीही शिस्त नसते. बालपण हे फुलपाखरासारखे असते. जेव्हा बालपण संपते, शैशवही ओलांडले जाते आणि कुमारावस्था प्राप्त होते, तेव्हा शिस्तीची आवश्यकता निर्माण होते. जीवनातील सर्वच क्षेत्रांत शिस्त अनिवार्य आहे, तशी ती खेळांतही आवश्यक असते.(हा निबंध पण वाचा शालेय जीवनात खेळाचे महत्त्व)


खेळांनी व्यायाम होतो, शरीर बळकट होते; पण खेळातील शिस्त जीवनालाही वळण देते. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. तेथे आपल्या एकट्याचा विचार करून चालत नाही, संपूर्ण संघाचा विचार करावा लागतो. खेळामुळे मनोरंजन होते व मनाला उत्साह मिळतो. दोन-चार तास अभ्यास केल्यावर कंटाळा येतो. त्यानंतर थोडा वेळ खेळल्यावर कंटाळा पळून जातो आणि अभ्यासासाठी पुन्हा उत्साह येतो. खेळात मनाची एकाग्रता साधता येते.



खेळांचाही अभ्यास करावा लागतो, खेळालाही सराव लागतो आणि खेळासाठीही उत्तम मार्गदर्शक गुरू असावा लागतो. खेळ म्हटला की यश आणि अपयश आलेच. कधी हार होणार, कधी जीत होणार; पण हारही हसत स्वीकारता आली पाहिजे. हरणारा खेळाडू जिंकलेल्या खेळाडूचे प्रथम अभिनंदन करतो. खेळातून येणारी ही खिलाडूवृत्ती जीवनात फार उपयोगी पडते. (हा निबंध पण वाचा माझा आवडता खेळाडू निबंध मराठी मध्ये)



प्रत्येकाला आपल्या जीवनात केव्हा ना केव्हा संकटाला तोंड दयावे लागते. कधी हार  पत्करावी लागते. अशा वेळी खिलाडूवृत्ती असेल तरच आपण पुढे जातो. अपयशाने खचून जाणाऱ्याच्या हातून काहीच घडत नाही. जशी हार, तशीच जीत ! हार झाल्याने खचून जाऊ नका. तसेच, जीत झाल्याने फुगून जाऊ नका, असे सच्चा खेळाडू सांगतो. खेळातील हार संयमाने स्वीकारावी, तसाच जीवनातील विजयही विनम्रतेने स्वीकारावा.

खेळात हार-जीत असली तरी खेळ खेळले जातात ते मैत्रीसाठी! ऑलिम्पिक, विम्बल्डन, एशियाड आदी विविध खेळांच्या जागतिक स्पर्धा वर्षभर खेळल्या जातात, ते एकमेकांचे कौतुक करण्यासाठी, स्नेहाचा हात पुढे करण्यासाठी! खेळांमुळेच आपली उत्साही वृत्ती टिकून राहते.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 2

अभ्यासाइतकेच जीवनात व्यायाम व खेळ यांनाही महत्त्व आहे. मुलांच्या मानसिक विकासाबरोबरच मुलाचा शारीरिक विकासही झाला पाहिजे. व्यायाम, खेळ शारीरिक विकास करतात तर शिक्षण, चिंतन, मननामुळे व्यक्तीचा मानसिक विकास होतो. 


खेळाची अनेक रूपे आहेत. काही खेळ मुलांसाठी, काही मोठ्यांसाठी तर काही वृद्धांसाठी असतात. काही खेळ खेळण्यासाठी मोठी मैदाने लागतात. काही खेळांना मात्र लागत नाहीत. घरातल्या घरात खेळले जाणारे कॅरम, पत्ते, बुद्धिबळ, सोंगट्या या खेळामुळे मनोरंजन व बौद्धिक विकास होतो.

स्वस्थ शरीरातच स्वस्थ मनाचा विकास होतो" जी मुले अभ्यासाबरोबरच खेळातही भाग घेतात ती चपळ, उत्साही असतात. त्यांची हाडे मजबूत आणि चेहरा तजेलदार होतो. पचनशक्ती चांगली राहते. डोळे चांगले राहतात, शरीर वज्राप्रमाणे होते. व्यायाम न केल्यास मनुष्य आळशी व निस्तेज बनतो.



मनुष्याला जे धडे शिक्षण शिकवू शकत नाही ते खेळाचे मैदान शिकविते. उदा० खेळ खेळताना शिस्त पाळावी, नेत्याच्या आज्ञेचे पालन करावे, खेळात विजयाच्या वेळी उत्साह असावा पण हार झाली तरी बदल्याची भावना नसावी. 


मुलांच्या किशोरावस्थेपासूनच त्यांना त्यांच्या आवडीचे खेळ खेळू दिले पाहिजेत. त्यांना संघर्षासाठी तयार केले पाहिजे. म्हणजे ते भविष्यातही यशस्वी होतील. विश्व विक्रम करून आपला आणि देशाचा गौरव ते वाढवितील. सांघिक खेळांमुळे संघभावना व जबाबदारीची जाणीव होते.


खेड्यांतील आणि शहरांतील खेळात फरक असतो. खेड्यांतली मुले विटीदांडू, कबड्डी, गोट्या खेळतात. तर शहरातील मुले क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिससारखे खेळ खेळतात. वाढत्या लोकसंख्येमुळे खेळांची मैदाने कमी होत आहेत. खेळांडूसाठी खेळाचे मैदान मोठे आणि हवेशीर असले पाहिजे. त्यांनी हिरव्या भाज्या, दूध, फळे आदींचे सेवन केले पाहिजे. 


स्वच्छ वातावरणात राहिले पाहिजे. हे शरीर ईश्वराची देणगी आहे. त्याला निरोगी ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे. त्याच्या सुरक्षिततेसाठी खेळ, व्यायाम, आणि शिक्षण आवश्यक आहे. शाळेमध्ये खेळांत भाग घेण्यास उत्तेजन दिले पाहिजे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 3


खेळाचे महत्व मराठी निबंध | Khelache Mahatva Essay Marathi


विद्यार्थी जीवनात अभ्यासाइतकेच खेळालाही महत्त्व आहे. पालकांच्या आता हे लक्षात आले आहे की, मुलांच्या मानसिक विकासाबरोबरच त्यांचा शारीरिक विकासही झाला पाहिजे. मानवाचे संपूर्ण जीवन मन आणि शरीररूपी गाडीच्या दोन चाकांवर चालते.



शिक्षण, चिंतन, मनन, व्यक्तीचा मानसिक विकास आणि व्यायाम, खेळ, शारीरिक विकास करतात. खेळाची दोन रूपे असतात. घरात बसून खेळले जाणारे खेळ उदा. कॅरम, बुद्धिबळ, पत्ते इ. मैदानावर मोकळ्या जागी खेळले जाणारे खेळ उदा. खो खो, क्रिकेट, फुटबॉल इ. घरात खेळल्या जाणाऱ्या खेळांमुळे व्यायाम कमी पण बौद्धिक विकास आणि मनोरंजन होते. मैदानी खेळांमुळे शरीराला भरपूर व्यायाम होतो व मनोरंजनही होते.



'निरोगी शरीरात निरोगी मनाचा निवास असतो' शरीर अस्वथ असेल तर मनही अस्वस्थ असते. जी मुले केवळ पुस्तकातील किडे असतात त्यांचा शारीरिक विकास खुंटतो. ती चिडचिडी व सुस्त होतात. स्वत:चे रक्षणही ती करू शकत नाहीत. जी मुले अभ्यासाबरोबरच निरनिराळे खेळही खेळतात ती प्रसन्न व निरोगी राहतात.

उत्साही आणि चपळ राहिल्यामुळे शारीरिक शक्तीचा विकास होतो. यावरच मानसिक व आत्मिक विकास अवलंबून असतो. दिवसभर यंत्राप्रमाणे काम केल्यानंतर जर खेळाच्या मैदानावर मुले गेली नाहीत तर बुद्धिमान विद्यार्थीसुद्धा निर्बुद्ध होऊन जाईल. आणखी काम करण्याची इच्छा मनांत निर्माण होण्यासाठी खेळणे आवश्यक आहे.


विद्यार्थी, जीवनात फक्त अभ्यासच करीत राहू नये किंवा नुसते खेळतच बसू तये तर “Work while you work, play while you play." हे चांगल्या विद्यार्थ्याचे लक्षण आहे. माणसाचे मन सदैव अभ्यासात गुंतलेले राहिल्यास डोके जड़ पडते आणि त्याला विश्रांतीची गरज भासते. ही विश्रांती खेळण्यामुळेच मिळते.



खेळण्यामुळे मानसिक द्वंद्व मिटते. मन हलके होऊन शरीरात नवीन ऊर्जा शक्ती येते. हाडे मजबूत होतात आणि चेहरा कांतिमान होतो. पचनशक्ती चांगली राहते. डोळ्यांची ज्योती (तेज) वाढते. शरीर वज्राप्रमाणे होते. खेळ जीवनात संजीवनी बुटीचे काम करते. खेळ मनोरंजनाचे एक चांगले साधन आहे.



जेव्हा खेळाडू खेळाच्या मैदानावर खेळतो तेव्हा तो पुलकित होतो. खेळ खेळण्यामुळे खेळाडू, स्वतः प्रेक्षकही आनंदी होतात. क्रिकेट आणि हॉकीचा सामना पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक स्टेडियमवर उपस्थित असतात. खेळाडूची एकाग्रता खेळ व अन्य कामांत सारखीच असते.



शिक्षण घेऊन जे शिकावयास मिळत नाही ते खेळात शिकावयास मिळते. उदा. शिस्त विद्यार्थी जीवनात शिस्तीला खूप महत्त्व आहे. शिस्तीत राहूनच विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतो. शिक्षकही शिस्तीतच अध्यापन करतात. शिस्त नसेल तर शाळा कुस्तीचे मैदान बनेल.



जो संघ जितका शिस्तबद्ध असेल तितके सामना जिंकणे त्याला सोपे होते. अन्यथा हरण्याची शक्यता जास्त असते. याखेरीज खेळात परस्पर सहकार्याची भावना पण उत्पन्न होते. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी इत्यादी खेळांमध्ये दोन संघ असतात. प्रत्येक संघाचे खेळ वेगळे असतात व प्रत्येकाचे महत्त्वही वेगळे असते.



कप्तान संघनेता असतो. त्याच्या आदेशाचे सगळे खेळाडू पालन करतात. संघातील खेळाडूंच्या परस्पर सहकार्यामुळे संघ विजयी होतो. खेळ मनुष्याला स्वावलंबी व आत्मविश्वासू बनवितो. ज्याप्रमाणे विद्यार्थी जीवनाचे उद्दिष्ट अभ्यास करणे हे असते त्याचप्रमाणे खेळाच्या मैदानावर उतरल्यावर खेळाडूचे उद्दिष्ट आत्मविश्वासाने खेळून विजय प्राप्त करणे हे असते. विजयाची इच्छा खेळाडूला विजयी बनविते.

खेळ हा खेळाडूचा आत्मा असतो. खेळ केवळ खेळाच्या भावनेतूनच खेळले जावेत. त्यामुळे खेळाडूंमध्ये परस्पर सहकार्य, शिस्त, संघटन, सहनशीलपणा येतो. खेळात संघर्ष हा असतोच. त्यातून जो विजय मिळतो त्याचा आनंद खास असतो.



विजय मिळाल्यावर उत्साह वाटणे, पराजय सहन करणे व बदल्याची भावना मनात न ठेवता पराजयाच्या कारणांचा शोध घेऊन ती दूर करून जिंकण्याचा प्रयत्न करणे ही खऱ्या खेळाडूची लक्षणे होत. पराजयच यशाचा संदेश देते.


खेळांमध्ये केवळ दोन संघांमध्येच जवळीक निर्माण होते, असे नसून क्रिकेटसारख्या खेळांमुळे दोन देशांमध्ये ही जवळीक निर्माण होते. खेळ विश्वबंधुत्वाची भावना निर्माण करतात. धनुर्विद्या, घोडेस्वारी, कबड्डी, मल्लयुद्ध यासारख्या खेळांची परंपरा आपल्या देशात प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.



आजही या खेळांचे महत्त्व कमी झालेले नाही. भारत खेळांमध्ये मागे नाही. आशियाई क्रीडा स्पर्धा, क्रिकेटचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामने येथे नेहमीच होतात. जिल्हा, मंडळ, प्रादेशिक, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडास्पर्धा होत राहतात. विजयी खेळाडूंना पुरस्कार दिले जातात.



नव्या खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाते. खेळामध्ये नव्या गोष्टी शिकावयास मिळतात. आपल्या पराजयाची कारणे शोधून ती दूर करून पुन्हा विजय प्राप्त केला जातो. यात गुरू वा प्रशिक्षकाचे सहकार्य मिळते म्हणून भारत सरकार विजयी खेळाडूला "अर्जुन पुरस्कार" देते आणि प्रशिक्षकाला "द्रोणाचार्य पुरस्कार' देते.

शिक्षण मनुष्याला सभ्य आणि देशप्रेमी बनविते. खेळांमुळे बंधुत्व, सहकार्य, शिस्त, निष्ठा, स्वावलंबीपणा इत्यादी गुण विकसित होतात. म्हणून जीवनात खेळांचे स्थान गौण नाही. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.

खेळाचे महत्व मराठी निबंध | Khelache Mahatva Essay Marathi

खेळाचे महत्व मराठी निबंध | Khelache Mahatva Essay Marathi

निबंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण खेळाचे महत्व मराठी निबंध  बघणार आहोतया लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. या निबंधामध्‍ये आज खेळांबद्दल असलेला दृष्‍टीकोन , खेळाचे शारीरीक व मानसीक दृष्‍टया असणारे फायदे स्‍पष्‍ट केले आहेत.  आज आपण खेळाचे महत्व  शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 


आज भारतीयांच्या जीवनात खेळांना महत्त्व आले आहे. आजकाल खेळाविषयीचा दृष्टिकोन थोडा थोडा बदलू लागला आहे; पण काही वर्षांपूर्वी खेळण्यात वेळ घालवणारे मूल हे अवलक्षणी समजले जायचे. इतकेच काय, एखादयाने 'खेळ' हे आपले जीवनध्येय (करिअर) करायचे ठरवले, तर त्याला 'भिकेचे डोहाळे' लागले असे मानले जायचे.


आज खेळातूनही पैसा मिळू शकतो, हे पाहून काही लोक तो आपल्या करिअरचा भाग करतात; पण त्याचबरोबर खेळाचे इतर फायदेही आज आपणाला उमगले आहेत. निकोप शरीरातच निकोप मन असू शकते, हे उमगल्यावर शरीर निकोप, सुदृढ ठेवण्यासाठी माणसे धडपडू लागली आणि निकोप शरीराचा एक मार्ग खेळाच्या पटांगणातून जातो, हे उमगल्यावर त्यांना खेळ हवेहवेसे वाटू लागले.


Khelache-Mahatva-Essay-Marathi
Khelache-Mahatva-Essay-Marathi


लहानपणी आपला बराचसा वेळ हा खेळण्यात जातो; पण लहानपणचे बहुतेक खेळ हे गमतीखातर खेळले जातात. त्यांत कोणतीही शिस्त नसते. बालपण हे फुलपाखरासारखे असते. जेव्हा बालपण संपते, शैशवही ओलांडले जाते आणि कुमारावस्था प्राप्त होते, तेव्हा शिस्तीची आवश्यकता निर्माण होते. जीवनातील सर्वच क्षेत्रांत शिस्त अनिवार्य आहे, तशी ती खेळांतही आवश्यक असते.(हा निबंध पण वाचा शालेय जीवनात खेळाचे महत्त्व)


खेळांनी व्यायाम होतो, शरीर बळकट होते; पण खेळातील शिस्त जीवनालाही वळण देते. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. तेथे आपल्या एकट्याचा विचार करून चालत नाही, संपूर्ण संघाचा विचार करावा लागतो. खेळामुळे मनोरंजन होते व मनाला उत्साह मिळतो. दोन-चार तास अभ्यास केल्यावर कंटाळा येतो. त्यानंतर थोडा वेळ खेळल्यावर कंटाळा पळून जातो आणि अभ्यासासाठी पुन्हा उत्साह येतो. खेळात मनाची एकाग्रता साधता येते.



खेळांचाही अभ्यास करावा लागतो, खेळालाही सराव लागतो आणि खेळासाठीही उत्तम मार्गदर्शक गुरू असावा लागतो. खेळ म्हटला की यश आणि अपयश आलेच. कधी हार होणार, कधी जीत होणार; पण हारही हसत स्वीकारता आली पाहिजे. हरणारा खेळाडू जिंकलेल्या खेळाडूचे प्रथम अभिनंदन करतो. खेळातून येणारी ही खिलाडूवृत्ती जीवनात फार उपयोगी पडते. (हा निबंध पण वाचा माझा आवडता खेळाडू निबंध मराठी मध्ये)



प्रत्येकाला आपल्या जीवनात केव्हा ना केव्हा संकटाला तोंड दयावे लागते. कधी हार  पत्करावी लागते. अशा वेळी खिलाडूवृत्ती असेल तरच आपण पुढे जातो. अपयशाने खचून जाणाऱ्याच्या हातून काहीच घडत नाही. जशी हार, तशीच जीत ! हार झाल्याने खचून जाऊ नका. तसेच, जीत झाल्याने फुगून जाऊ नका, असे सच्चा खेळाडू सांगतो. खेळातील हार संयमाने स्वीकारावी, तसाच जीवनातील विजयही विनम्रतेने स्वीकारावा.

खेळात हार-जीत असली तरी खेळ खेळले जातात ते मैत्रीसाठी! ऑलिम्पिक, विम्बल्डन, एशियाड आदी विविध खेळांच्या जागतिक स्पर्धा वर्षभर खेळल्या जातात, ते एकमेकांचे कौतुक करण्यासाठी, स्नेहाचा हात पुढे करण्यासाठी! खेळांमुळेच आपली उत्साही वृत्ती टिकून राहते.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 2

अभ्यासाइतकेच जीवनात व्यायाम व खेळ यांनाही महत्त्व आहे. मुलांच्या मानसिक विकासाबरोबरच मुलाचा शारीरिक विकासही झाला पाहिजे. व्यायाम, खेळ शारीरिक विकास करतात तर शिक्षण, चिंतन, मननामुळे व्यक्तीचा मानसिक विकास होतो. 


खेळाची अनेक रूपे आहेत. काही खेळ मुलांसाठी, काही मोठ्यांसाठी तर काही वृद्धांसाठी असतात. काही खेळ खेळण्यासाठी मोठी मैदाने लागतात. काही खेळांना मात्र लागत नाहीत. घरातल्या घरात खेळले जाणारे कॅरम, पत्ते, बुद्धिबळ, सोंगट्या या खेळामुळे मनोरंजन व बौद्धिक विकास होतो.

स्वस्थ शरीरातच स्वस्थ मनाचा विकास होतो" जी मुले अभ्यासाबरोबरच खेळातही भाग घेतात ती चपळ, उत्साही असतात. त्यांची हाडे मजबूत आणि चेहरा तजेलदार होतो. पचनशक्ती चांगली राहते. डोळे चांगले राहतात, शरीर वज्राप्रमाणे होते. व्यायाम न केल्यास मनुष्य आळशी व निस्तेज बनतो.



मनुष्याला जे धडे शिक्षण शिकवू शकत नाही ते खेळाचे मैदान शिकविते. उदा० खेळ खेळताना शिस्त पाळावी, नेत्याच्या आज्ञेचे पालन करावे, खेळात विजयाच्या वेळी उत्साह असावा पण हार झाली तरी बदल्याची भावना नसावी. 


मुलांच्या किशोरावस्थेपासूनच त्यांना त्यांच्या आवडीचे खेळ खेळू दिले पाहिजेत. त्यांना संघर्षासाठी तयार केले पाहिजे. म्हणजे ते भविष्यातही यशस्वी होतील. विश्व विक्रम करून आपला आणि देशाचा गौरव ते वाढवितील. सांघिक खेळांमुळे संघभावना व जबाबदारीची जाणीव होते.


खेड्यांतील आणि शहरांतील खेळात फरक असतो. खेड्यांतली मुले विटीदांडू, कबड्डी, गोट्या खेळतात. तर शहरातील मुले क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिससारखे खेळ खेळतात. वाढत्या लोकसंख्येमुळे खेळांची मैदाने कमी होत आहेत. खेळांडूसाठी खेळाचे मैदान मोठे आणि हवेशीर असले पाहिजे. त्यांनी हिरव्या भाज्या, दूध, फळे आदींचे सेवन केले पाहिजे. 


स्वच्छ वातावरणात राहिले पाहिजे. हे शरीर ईश्वराची देणगी आहे. त्याला निरोगी ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे. त्याच्या सुरक्षिततेसाठी खेळ, व्यायाम, आणि शिक्षण आवश्यक आहे. शाळेमध्ये खेळांत भाग घेण्यास उत्तेजन दिले पाहिजे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 3


खेळाचे महत्व मराठी निबंध | Khelache Mahatva Essay Marathi


विद्यार्थी जीवनात अभ्यासाइतकेच खेळालाही महत्त्व आहे. पालकांच्या आता हे लक्षात आले आहे की, मुलांच्या मानसिक विकासाबरोबरच त्यांचा शारीरिक विकासही झाला पाहिजे. मानवाचे संपूर्ण जीवन मन आणि शरीररूपी गाडीच्या दोन चाकांवर चालते.



शिक्षण, चिंतन, मनन, व्यक्तीचा मानसिक विकास आणि व्यायाम, खेळ, शारीरिक विकास करतात. खेळाची दोन रूपे असतात. घरात बसून खेळले जाणारे खेळ उदा. कॅरम, बुद्धिबळ, पत्ते इ. मैदानावर मोकळ्या जागी खेळले जाणारे खेळ उदा. खो खो, क्रिकेट, फुटबॉल इ. घरात खेळल्या जाणाऱ्या खेळांमुळे व्यायाम कमी पण बौद्धिक विकास आणि मनोरंजन होते. मैदानी खेळांमुळे शरीराला भरपूर व्यायाम होतो व मनोरंजनही होते.



'निरोगी शरीरात निरोगी मनाचा निवास असतो' शरीर अस्वथ असेल तर मनही अस्वस्थ असते. जी मुले केवळ पुस्तकातील किडे असतात त्यांचा शारीरिक विकास खुंटतो. ती चिडचिडी व सुस्त होतात. स्वत:चे रक्षणही ती करू शकत नाहीत. जी मुले अभ्यासाबरोबरच निरनिराळे खेळही खेळतात ती प्रसन्न व निरोगी राहतात.

उत्साही आणि चपळ राहिल्यामुळे शारीरिक शक्तीचा विकास होतो. यावरच मानसिक व आत्मिक विकास अवलंबून असतो. दिवसभर यंत्राप्रमाणे काम केल्यानंतर जर खेळाच्या मैदानावर मुले गेली नाहीत तर बुद्धिमान विद्यार्थीसुद्धा निर्बुद्ध होऊन जाईल. आणखी काम करण्याची इच्छा मनांत निर्माण होण्यासाठी खेळणे आवश्यक आहे.


विद्यार्थी, जीवनात फक्त अभ्यासच करीत राहू नये किंवा नुसते खेळतच बसू तये तर “Work while you work, play while you play." हे चांगल्या विद्यार्थ्याचे लक्षण आहे. माणसाचे मन सदैव अभ्यासात गुंतलेले राहिल्यास डोके जड़ पडते आणि त्याला विश्रांतीची गरज भासते. ही विश्रांती खेळण्यामुळेच मिळते.



खेळण्यामुळे मानसिक द्वंद्व मिटते. मन हलके होऊन शरीरात नवीन ऊर्जा शक्ती येते. हाडे मजबूत होतात आणि चेहरा कांतिमान होतो. पचनशक्ती चांगली राहते. डोळ्यांची ज्योती (तेज) वाढते. शरीर वज्राप्रमाणे होते. खेळ जीवनात संजीवनी बुटीचे काम करते. खेळ मनोरंजनाचे एक चांगले साधन आहे.



जेव्हा खेळाडू खेळाच्या मैदानावर खेळतो तेव्हा तो पुलकित होतो. खेळ खेळण्यामुळे खेळाडू, स्वतः प्रेक्षकही आनंदी होतात. क्रिकेट आणि हॉकीचा सामना पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक स्टेडियमवर उपस्थित असतात. खेळाडूची एकाग्रता खेळ व अन्य कामांत सारखीच असते.



शिक्षण घेऊन जे शिकावयास मिळत नाही ते खेळात शिकावयास मिळते. उदा. शिस्त विद्यार्थी जीवनात शिस्तीला खूप महत्त्व आहे. शिस्तीत राहूनच विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतो. शिक्षकही शिस्तीतच अध्यापन करतात. शिस्त नसेल तर शाळा कुस्तीचे मैदान बनेल.



जो संघ जितका शिस्तबद्ध असेल तितके सामना जिंकणे त्याला सोपे होते. अन्यथा हरण्याची शक्यता जास्त असते. याखेरीज खेळात परस्पर सहकार्याची भावना पण उत्पन्न होते. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी इत्यादी खेळांमध्ये दोन संघ असतात. प्रत्येक संघाचे खेळ वेगळे असतात व प्रत्येकाचे महत्त्वही वेगळे असते.



कप्तान संघनेता असतो. त्याच्या आदेशाचे सगळे खेळाडू पालन करतात. संघातील खेळाडूंच्या परस्पर सहकार्यामुळे संघ विजयी होतो. खेळ मनुष्याला स्वावलंबी व आत्मविश्वासू बनवितो. ज्याप्रमाणे विद्यार्थी जीवनाचे उद्दिष्ट अभ्यास करणे हे असते त्याचप्रमाणे खेळाच्या मैदानावर उतरल्यावर खेळाडूचे उद्दिष्ट आत्मविश्वासाने खेळून विजय प्राप्त करणे हे असते. विजयाची इच्छा खेळाडूला विजयी बनविते.

खेळ हा खेळाडूचा आत्मा असतो. खेळ केवळ खेळाच्या भावनेतूनच खेळले जावेत. त्यामुळे खेळाडूंमध्ये परस्पर सहकार्य, शिस्त, संघटन, सहनशीलपणा येतो. खेळात संघर्ष हा असतोच. त्यातून जो विजय मिळतो त्याचा आनंद खास असतो.



विजय मिळाल्यावर उत्साह वाटणे, पराजय सहन करणे व बदल्याची भावना मनात न ठेवता पराजयाच्या कारणांचा शोध घेऊन ती दूर करून जिंकण्याचा प्रयत्न करणे ही खऱ्या खेळाडूची लक्षणे होत. पराजयच यशाचा संदेश देते.


खेळांमध्ये केवळ दोन संघांमध्येच जवळीक निर्माण होते, असे नसून क्रिकेटसारख्या खेळांमुळे दोन देशांमध्ये ही जवळीक निर्माण होते. खेळ विश्वबंधुत्वाची भावना निर्माण करतात. धनुर्विद्या, घोडेस्वारी, कबड्डी, मल्लयुद्ध यासारख्या खेळांची परंपरा आपल्या देशात प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.



आजही या खेळांचे महत्त्व कमी झालेले नाही. भारत खेळांमध्ये मागे नाही. आशियाई क्रीडा स्पर्धा, क्रिकेटचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामने येथे नेहमीच होतात. जिल्हा, मंडळ, प्रादेशिक, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडास्पर्धा होत राहतात. विजयी खेळाडूंना पुरस्कार दिले जातात.



नव्या खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाते. खेळामध्ये नव्या गोष्टी शिकावयास मिळतात. आपल्या पराजयाची कारणे शोधून ती दूर करून पुन्हा विजय प्राप्त केला जातो. यात गुरू वा प्रशिक्षकाचे सहकार्य मिळते म्हणून भारत सरकार विजयी खेळाडूला "अर्जुन पुरस्कार" देते आणि प्रशिक्षकाला "द्रोणाचार्य पुरस्कार' देते.

शिक्षण मनुष्याला सभ्य आणि देशप्रेमी बनविते. खेळांमुळे बंधुत्व, सहकार्य, शिस्त, निष्ठा, स्वावलंबीपणा इत्यादी गुण विकसित होतात. म्हणून जीवनात खेळांचे स्थान गौण नाही. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.