mi pahilela apghat essay in marathi | मी पाहिलेला अपघात मराठी निबंंध



निबंंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी पाहिलेला अपघात मराठी निबंंध  बघणार आहोतया लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

मी पाहिलेला अपघात रोजच्याप्रमाणे सकाळी शाळेत जाण्यासाठी मी बाहेर पडलो होतो. माझ्याबरोबर माझा एक वर्गमित्र होता. रस्त्यावर नेहमीचीच वर्दळ होती. मित्राबरोबर मी गप्पा मारत चाललो असताना 'कर्रऽऽ' असा आवाज आमच्या कानी आला. बसचे ब्रेक लावल्याचा तो विलक्षण कर्कश आवाज होता. त्या राक्षसी आवाजाने माझ्या अंगाचा थरकाप उडाला.

mi-pahilela-apghat-essay-in-marathi
mi-pahilela-apghat-essay-in-marathi


मी चमकून समोर पाहिले तो एक दुमजली बस थडथडत उभी होती. रस्त्यावरचे लोक बसच्या दिशेने पळत होते. पाहता पाहता बघ्यांची अलोट गर्दी तेथे लोटली. बसमधील उतारू डोकावून बघत होते. मोठा अपघात झाला असणार अशी शंका माझ्या मनात आली. म्हणून मी त्या गर्दीत थोडे पुढे शिरण्याचा प्रयत्न केला.



लोकांच्या बोलण्यावरून मला समजले की, दोन छोट्या मुली बसखाली आल्या होत्या. मला आठवले की, दररोज या वेळी दोन छोट्या मुली आपल्या नर्सरी शाळेत जाण्यासाठी शाळेच्या बसची वाट पाहत उभ्या असत. त्यांचे ते हसरे, बोलके, निरागस चेहरे माझ्या डोळ्यांसमोरून तरळून गेले.

आज शाळेच्या बसच्या आधी आलेली ही बस त्यांचा घात करून बसली होती. गर्दी वाढत होती. त्या मुलींचे पालक ओक्साबोक्शी रडत होते. पोलीस गर्दी हटवण्याची पराकाष्ठा करत होते. शाळेला उशीर होईल म्हणून मी तेथून जड पावलांनी पुढे गेलो; पण ते दृश्य काही केल्या माझ्या डोळ्यांपुढून हलत नव्हते.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला  व अपघात कमी करण्‍यासाठी काय उपाय केले पाहीजे याविषयी  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंंध 2

मी पाहिलेला अपघात निबंध | Mi Pahilela Apghat Marathi Essay

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी पाहिलेला अपघात मराठी निबंध बघणार आहोत. वाहतुकीसाठी भारतात रस्ते फार लोकप्रिय आहेत. कारण अगदी लहान खेड्यापासून मोठ्या शहरापर्यंत सगळीकडे रस्ते आहेत. रस्त्यामुळे संपूर्ण देश जोडला गेला आहे. 


रस्त्याने जाणे येणे जसे सोयिस्कर आहे तसेच स्वस्तही. परंतु भारतात रस्त्यांची स्थिती फार वाईट आहे. पावसाळ्यात तर ती अधिकच धोकादायक व दयनीय होऊन जाते. रस्त्यांची देखभाल आणि विकास यात भारत फारच मागासलेला आहे. रस्त्यांवरील वाहतूक खूप वाढली आहे. परंतु त्यानुसार रस्त्यांचा विकास झालेला नाही. 


परिणामी आपले रस्ते रक्तरंजित आहेत. रोज शेकडो अपघात रस्त्यांवर होतात. त्यात भरपूर प्राणहानी व वित्तहानी होते. दरवर्षी अंदाजे ६०,००० लोकांचा रस्त्यांवरील अपघातात मृत्यू होतो. त्यापेक्षा किती तरी पटीने जास्त लोक जखमी व अपंग होतात. 


अमेरिकेच्या तुलनेत भारतात रस्त्यांवरील अपघातांत मरणारांची संख्या २५ पट जास्त आहे. रस्त्यांवर वाहुतकीचा पडणारा ताण दिवसेंदिवस वाढतच आहे. दरवर्षी अंदाजे ८.१० % रस्त्यांवरील वाहतुकीत वाढ होत आहे. 


१९५१ मध्ये भारतात ३ लाख मोटारी होत्या आता त्या ५४० लाख झाल्या आहेत. फक्त दिल्लीत ३ लाख वाहने असतील. वाहन-चालक वाहतुकीच्या नियमांचा भंग करतात. वाहन चांगल्या प्रकारे चालविता येत नसले तरी वाहन चालक परवाना दिला जातो. याच्याशी संबंधीत सर्व सरकारी कार्यालयांत सर्वात जास्त भ्रष्टाचार होतो.


एक अडचण ही पण आहे की येथील रस्त्यांवर अनेक प्रकारची वाहने चालतात. उदा. ट्रक, मोटारी, बस, ट्रॅक्टर, टेम्पो, स्कूटर, सायकली, बैलगाड्या, पादचारी, घोडे, गाढवे इ. यापैकी काही जलद काही मंद तर काही अगदी हळू गतीची आहेत. गावांत शहरांत बसमध्ये गर्दी असणे ही तर सामान्य गोष्ट आहे. 


खेड्यातील लोक बसच्या टपावर बसून प्रवास करतात. दोन चाकी वाहनांवर कधीकधी ४ जणांचे संपूर्ण कुटुंब प्रवास करते. परिणामी गंभीर स्वरूपाचे अपघात होतात आणि वाहतूक अधिकारी त्याकडे डोळे झाक करतात. वाहतुकीच्या नियमांचे नागरिकांकडून कडक पालन करवून घेत नाहीत. 


वास्तविक वाहतुकीच्या नियम पालनाचा समावेश शाळेच्या पाठ्यक्रमातच असला पाहिजे. म्हणजे बालपणापासूनच नियमपालनाची सवय लागते. रस्त्यावरून चालावे कसे? वाहने कशी चालवातीत? वाहतुकीचे नियम कोणते इत्यादींची माहिती होते.


रस्त्यांची स्थिती तर खराब आहेच पण त्याहीपेक्षा जास्त वाहनांची स्थिती वाईट आहे. ती जुनी व निरुपयोगी आहेत तरी त्यांचा वापर केला जातो. त्यांची वेळेवर दुरुस्ती केली जात नाही. योग्य निगा राखली जात नाही, ती खूप धूर सोडतात, ज्यामुळे प्रदूषण वाढते, व इतर वाहनाचालकांना रस्ता नीट दिसत नाही. 


एका सर्वेक्षणानुसार ५०% वाहने भारतीय रस्त्यांवर चालण्यास निरुपयोगी आहेत. अमर्याद बोजा लादल्यामुळे, प्रवाशांना चढविण्यामुळे रस्ते व वाहने लवकर खराब होतात. रेल्वेमार्गावर पुष्कळ ठिकाणी चौक असतात पण तिथे फाटकाची सोय नसते वा देखरेख करणारा रेल्वे कर्मचारी नसतो त्यामुळे असंख्य अपघात होतात.


या सर्व कारणांमुळे भारतातील रस्त्यांवरून प्रवास करणे खूपच धोकादायक झाले आहे. बस व ट्रक चालकांना सामान्यपणे दारूची, अमली पदार्थांची सवय असते. त्याचे सेवन करूनच ते वाहने चालवितात. शिवाय ते कमी शिकलेले व मागास जातीचे असतात. 


सतत १०/१२ तास वाहन चालवून थकून जातात. थकल्यावर नशा करणे त्यांची सवय होते. कच्च्या, खराब रस्त्यांवर त्यांचा वाहनावरील ताबा सुटतो आणि मग अपघात होतो. दुर्घटनेनंतर ते पळून जातात. कारण त्यांच्यात मानवता, दया, करुणा, सहकार्याची भावना नसते. शिवाय वाहनात प्रथमोपचाराची पेटी नसते. 


रस्त्याच्या जवळ दवाखाना, अॅम्ब्युलन्स, क्रेन आदींची सोय नसते. पोलिसांचा व्यवहारही असमाधानकारकच असतो. रस्त्यावरच कुठेही, कशीही वाहने उभी केली जातात. रस्त्याच्या बाजूला सार्वजनिक जागेवर दुकाने, वर्कशॉप, घरे, खानावळी असतात. त्यामुळे वाहतुकीत अडथळे येऊन अपघात होतात. 


सांडपाण्याच्या नाल्या उघड्या असतात. मेनहोलमधून घाण बाहेर येते. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडून वाहतुकीत अडथळे येतात. रस्त्यांवरील अपघातांना आळा बसावा म्हणून अल्पकालीन व दीर्घकालीन योजना बनवून त्या अमलात आणाव्यात. रस्त्यांची सुरक्षितता हा विषय शालेय अभ्यासक्रमात असावा. 


रस्त्यांमध्ये वाढ करावी, नवे रस्ते बांधावेत, जुने दुरुस्त करावेत, त्यांची वरचेवर देखभाल करावी. वाहन चालकांना योग्य ते प्रशिक्षण दिले जावे. वेळोवेळी वाहन चालकांच्या परीक्षा घ्याव्यान. मंदगती वाहनांसाठी वेगळे रस्ते असावेत. वाहनांची गती, निगा, उपयुक्तता यांची तपासणी व्हावी. 


रस्ते व वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्यात यावी. परंतु त्यासाठी संबंधित अधिकारी प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ असले पाहिजेत. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद  या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता.


निबंंध 3

mi pahilela apghat essay in marathi | मी पाहिलेला अपघात मराठी निबंंध

मी ज्या बसस्टॉपवर उभा होतो, तो रस्ता खप गर्दीचा होता. संध्याकाळची वेळ होती. आजूबाजूच्या शाळा सुटल्या होत्या. मी देखील घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या फूटपाथवर बरेच विक्रेते आपला माल घेऊन बसले होते.


अचानक कर्कश आवाज आला व एक मारुती गाडी थांबली. त्या गाडीसमार एक विदयार्थी पडला होता. त्याचे दप्तर बाजूला पडले होते. त्याच्या डोक्याला खोक पडली होती आणि तो खूप घाबरलेला दिसत होता. क्षणात लोकांची गर्दी जमली होती; पण मदत करायला कोणी पुढे येत नव्हते.


सिग्नल पडला म्हणून हा विद्यार्थी रस्ता ओलांडायला पुढे आला आणि सिग्नल पडण्यापूर्वी आपण रस्ता ओलांडू, या विचाराने मारुती गाडीवाला पुढे आला अन् अपघात घडला. गाडीवाला त्या मुलाला डॉक्टरकडे न्यायला तयार होता. पण गर्दीतून कोणीही पुढे यायला तयार नव्हते. 


अशा वेळी मी त्याला म्हणालो, "चला, मी येतो तुमच्याबरोबर." अपघात झालेल्या त्या मुलाचे नाव होते सुदीप खरे. आम्ही सुदीपला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी त्याच्या जखमेवर औषधोपचार केले व त्याला कॉफी प्यायला दिली. आम्ही दोघांनी सुदीपला त्याच्या घरी पोहोचवले. 


त्या गाडीवाल्याने आपले कार्ड सुदीपच्या आईवडिलांना दिले व 'काही गरज वाटल्यास फोन करा' असे सांगन त्याने त्यांचा निरोप घेतला आणि मलाही माझ्या घरी सोडले. तेव्हा माझे आभार मानायला तो विसरला नाही.


अपघाताबद्दल माझ्या आईला सांगताना माझ्या मनात आले की, हा अपघात टाळता आला नसता का? याला जबाबदार कोण? मला असे वाटते की रहदारीसाठी सिग्नल असले. तरी लहान मुले आणि वृद्ध यांच्यासाठी, विशेषत: गर्दीच्या वेळी रहदारी नियंत्रक पोलीस हवाच.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


[शब्दार्थ : कर्कश आवाज- harsh sound. श भवा४. कठोर आवाज, तीव्र आवाज। रहदारी- traffic. सव२४१२. यातायात, आवागमन।]



mi pahilela apghat essay in marathi | मी पाहिलेला अपघात मराठी निबंंध



mi pahilela apghat essay in marathi | मी पाहिलेला अपघात मराठी निबंंध



निबंंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी पाहिलेला अपघात मराठी निबंंध  बघणार आहोतया लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

मी पाहिलेला अपघात रोजच्याप्रमाणे सकाळी शाळेत जाण्यासाठी मी बाहेर पडलो होतो. माझ्याबरोबर माझा एक वर्गमित्र होता. रस्त्यावर नेहमीचीच वर्दळ होती. मित्राबरोबर मी गप्पा मारत चाललो असताना 'कर्रऽऽ' असा आवाज आमच्या कानी आला. बसचे ब्रेक लावल्याचा तो विलक्षण कर्कश आवाज होता. त्या राक्षसी आवाजाने माझ्या अंगाचा थरकाप उडाला.

mi-pahilela-apghat-essay-in-marathi
mi-pahilela-apghat-essay-in-marathi


मी चमकून समोर पाहिले तो एक दुमजली बस थडथडत उभी होती. रस्त्यावरचे लोक बसच्या दिशेने पळत होते. पाहता पाहता बघ्यांची अलोट गर्दी तेथे लोटली. बसमधील उतारू डोकावून बघत होते. मोठा अपघात झाला असणार अशी शंका माझ्या मनात आली. म्हणून मी त्या गर्दीत थोडे पुढे शिरण्याचा प्रयत्न केला.



लोकांच्या बोलण्यावरून मला समजले की, दोन छोट्या मुली बसखाली आल्या होत्या. मला आठवले की, दररोज या वेळी दोन छोट्या मुली आपल्या नर्सरी शाळेत जाण्यासाठी शाळेच्या बसची वाट पाहत उभ्या असत. त्यांचे ते हसरे, बोलके, निरागस चेहरे माझ्या डोळ्यांसमोरून तरळून गेले.

आज शाळेच्या बसच्या आधी आलेली ही बस त्यांचा घात करून बसली होती. गर्दी वाढत होती. त्या मुलींचे पालक ओक्साबोक्शी रडत होते. पोलीस गर्दी हटवण्याची पराकाष्ठा करत होते. शाळेला उशीर होईल म्हणून मी तेथून जड पावलांनी पुढे गेलो; पण ते दृश्य काही केल्या माझ्या डोळ्यांपुढून हलत नव्हते.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला  व अपघात कमी करण्‍यासाठी काय उपाय केले पाहीजे याविषयी  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंंध 2

मी पाहिलेला अपघात निबंध | Mi Pahilela Apghat Marathi Essay

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी पाहिलेला अपघात मराठी निबंध बघणार आहोत. वाहतुकीसाठी भारतात रस्ते फार लोकप्रिय आहेत. कारण अगदी लहान खेड्यापासून मोठ्या शहरापर्यंत सगळीकडे रस्ते आहेत. रस्त्यामुळे संपूर्ण देश जोडला गेला आहे. 


रस्त्याने जाणे येणे जसे सोयिस्कर आहे तसेच स्वस्तही. परंतु भारतात रस्त्यांची स्थिती फार वाईट आहे. पावसाळ्यात तर ती अधिकच धोकादायक व दयनीय होऊन जाते. रस्त्यांची देखभाल आणि विकास यात भारत फारच मागासलेला आहे. रस्त्यांवरील वाहतूक खूप वाढली आहे. परंतु त्यानुसार रस्त्यांचा विकास झालेला नाही. 


परिणामी आपले रस्ते रक्तरंजित आहेत. रोज शेकडो अपघात रस्त्यांवर होतात. त्यात भरपूर प्राणहानी व वित्तहानी होते. दरवर्षी अंदाजे ६०,००० लोकांचा रस्त्यांवरील अपघातात मृत्यू होतो. त्यापेक्षा किती तरी पटीने जास्त लोक जखमी व अपंग होतात. 


अमेरिकेच्या तुलनेत भारतात रस्त्यांवरील अपघातांत मरणारांची संख्या २५ पट जास्त आहे. रस्त्यांवर वाहुतकीचा पडणारा ताण दिवसेंदिवस वाढतच आहे. दरवर्षी अंदाजे ८.१० % रस्त्यांवरील वाहतुकीत वाढ होत आहे. 


१९५१ मध्ये भारतात ३ लाख मोटारी होत्या आता त्या ५४० लाख झाल्या आहेत. फक्त दिल्लीत ३ लाख वाहने असतील. वाहन-चालक वाहतुकीच्या नियमांचा भंग करतात. वाहन चांगल्या प्रकारे चालविता येत नसले तरी वाहन चालक परवाना दिला जातो. याच्याशी संबंधीत सर्व सरकारी कार्यालयांत सर्वात जास्त भ्रष्टाचार होतो.


एक अडचण ही पण आहे की येथील रस्त्यांवर अनेक प्रकारची वाहने चालतात. उदा. ट्रक, मोटारी, बस, ट्रॅक्टर, टेम्पो, स्कूटर, सायकली, बैलगाड्या, पादचारी, घोडे, गाढवे इ. यापैकी काही जलद काही मंद तर काही अगदी हळू गतीची आहेत. गावांत शहरांत बसमध्ये गर्दी असणे ही तर सामान्य गोष्ट आहे. 


खेड्यातील लोक बसच्या टपावर बसून प्रवास करतात. दोन चाकी वाहनांवर कधीकधी ४ जणांचे संपूर्ण कुटुंब प्रवास करते. परिणामी गंभीर स्वरूपाचे अपघात होतात आणि वाहतूक अधिकारी त्याकडे डोळे झाक करतात. वाहतुकीच्या नियमांचे नागरिकांकडून कडक पालन करवून घेत नाहीत. 


वास्तविक वाहतुकीच्या नियम पालनाचा समावेश शाळेच्या पाठ्यक्रमातच असला पाहिजे. म्हणजे बालपणापासूनच नियमपालनाची सवय लागते. रस्त्यावरून चालावे कसे? वाहने कशी चालवातीत? वाहतुकीचे नियम कोणते इत्यादींची माहिती होते.


रस्त्यांची स्थिती तर खराब आहेच पण त्याहीपेक्षा जास्त वाहनांची स्थिती वाईट आहे. ती जुनी व निरुपयोगी आहेत तरी त्यांचा वापर केला जातो. त्यांची वेळेवर दुरुस्ती केली जात नाही. योग्य निगा राखली जात नाही, ती खूप धूर सोडतात, ज्यामुळे प्रदूषण वाढते, व इतर वाहनाचालकांना रस्ता नीट दिसत नाही. 


एका सर्वेक्षणानुसार ५०% वाहने भारतीय रस्त्यांवर चालण्यास निरुपयोगी आहेत. अमर्याद बोजा लादल्यामुळे, प्रवाशांना चढविण्यामुळे रस्ते व वाहने लवकर खराब होतात. रेल्वेमार्गावर पुष्कळ ठिकाणी चौक असतात पण तिथे फाटकाची सोय नसते वा देखरेख करणारा रेल्वे कर्मचारी नसतो त्यामुळे असंख्य अपघात होतात.


या सर्व कारणांमुळे भारतातील रस्त्यांवरून प्रवास करणे खूपच धोकादायक झाले आहे. बस व ट्रक चालकांना सामान्यपणे दारूची, अमली पदार्थांची सवय असते. त्याचे सेवन करूनच ते वाहने चालवितात. शिवाय ते कमी शिकलेले व मागास जातीचे असतात. 


सतत १०/१२ तास वाहन चालवून थकून जातात. थकल्यावर नशा करणे त्यांची सवय होते. कच्च्या, खराब रस्त्यांवर त्यांचा वाहनावरील ताबा सुटतो आणि मग अपघात होतो. दुर्घटनेनंतर ते पळून जातात. कारण त्यांच्यात मानवता, दया, करुणा, सहकार्याची भावना नसते. शिवाय वाहनात प्रथमोपचाराची पेटी नसते. 


रस्त्याच्या जवळ दवाखाना, अॅम्ब्युलन्स, क्रेन आदींची सोय नसते. पोलिसांचा व्यवहारही असमाधानकारकच असतो. रस्त्यावरच कुठेही, कशीही वाहने उभी केली जातात. रस्त्याच्या बाजूला सार्वजनिक जागेवर दुकाने, वर्कशॉप, घरे, खानावळी असतात. त्यामुळे वाहतुकीत अडथळे येऊन अपघात होतात. 


सांडपाण्याच्या नाल्या उघड्या असतात. मेनहोलमधून घाण बाहेर येते. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडून वाहतुकीत अडथळे येतात. रस्त्यांवरील अपघातांना आळा बसावा म्हणून अल्पकालीन व दीर्घकालीन योजना बनवून त्या अमलात आणाव्यात. रस्त्यांची सुरक्षितता हा विषय शालेय अभ्यासक्रमात असावा. 


रस्त्यांमध्ये वाढ करावी, नवे रस्ते बांधावेत, जुने दुरुस्त करावेत, त्यांची वरचेवर देखभाल करावी. वाहन चालकांना योग्य ते प्रशिक्षण दिले जावे. वेळोवेळी वाहन चालकांच्या परीक्षा घ्याव्यान. मंदगती वाहनांसाठी वेगळे रस्ते असावेत. वाहनांची गती, निगा, उपयुक्तता यांची तपासणी व्हावी. 


रस्ते व वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्यात यावी. परंतु त्यासाठी संबंधित अधिकारी प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ असले पाहिजेत. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद  या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता.


निबंंध 3

mi pahilela apghat essay in marathi | मी पाहिलेला अपघात मराठी निबंंध

मी ज्या बसस्टॉपवर उभा होतो, तो रस्ता खप गर्दीचा होता. संध्याकाळची वेळ होती. आजूबाजूच्या शाळा सुटल्या होत्या. मी देखील घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या फूटपाथवर बरेच विक्रेते आपला माल घेऊन बसले होते.


अचानक कर्कश आवाज आला व एक मारुती गाडी थांबली. त्या गाडीसमार एक विदयार्थी पडला होता. त्याचे दप्तर बाजूला पडले होते. त्याच्या डोक्याला खोक पडली होती आणि तो खूप घाबरलेला दिसत होता. क्षणात लोकांची गर्दी जमली होती; पण मदत करायला कोणी पुढे येत नव्हते.


सिग्नल पडला म्हणून हा विद्यार्थी रस्ता ओलांडायला पुढे आला आणि सिग्नल पडण्यापूर्वी आपण रस्ता ओलांडू, या विचाराने मारुती गाडीवाला पुढे आला अन् अपघात घडला. गाडीवाला त्या मुलाला डॉक्टरकडे न्यायला तयार होता. पण गर्दीतून कोणीही पुढे यायला तयार नव्हते. 


अशा वेळी मी त्याला म्हणालो, "चला, मी येतो तुमच्याबरोबर." अपघात झालेल्या त्या मुलाचे नाव होते सुदीप खरे. आम्ही सुदीपला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी त्याच्या जखमेवर औषधोपचार केले व त्याला कॉफी प्यायला दिली. आम्ही दोघांनी सुदीपला त्याच्या घरी पोहोचवले. 


त्या गाडीवाल्याने आपले कार्ड सुदीपच्या आईवडिलांना दिले व 'काही गरज वाटल्यास फोन करा' असे सांगन त्याने त्यांचा निरोप घेतला आणि मलाही माझ्या घरी सोडले. तेव्हा माझे आभार मानायला तो विसरला नाही.


अपघाताबद्दल माझ्या आईला सांगताना माझ्या मनात आले की, हा अपघात टाळता आला नसता का? याला जबाबदार कोण? मला असे वाटते की रहदारीसाठी सिग्नल असले. तरी लहान मुले आणि वृद्ध यांच्यासाठी, विशेषत: गर्दीच्या वेळी रहदारी नियंत्रक पोलीस हवाच.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


[शब्दार्थ : कर्कश आवाज- harsh sound. श भवा४. कठोर आवाज, तीव्र आवाज। रहदारी- traffic. सव२४१२. यातायात, आवागमन।]