Maza avadta sant essay in Marathi | माझा आवडता संत मराठी निबंध


नमस्‍कार मित्रांनो आज आपण माझा आवडता संत मराठी निबंध बघणार आहोत.  भारत ही संताची भुमी आहे. संतानी आपल्‍या शिकवणी व ज्ञानातुन समाजाची प्रगतीच करण्‍याचे काम केले आहे. भारताला खुप मोठी संतपंरपरा लाभलेली आहे. याच संतपंरपरेतील संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज , संत गाडगेबाबा यांच्‍या विषयी अनुक्रमे ३ निबंध बघणार आहोत चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

maza-avadta-sant-essay-in-marathi
maza-avadta-sant-essay-in-marathi

 majha avadta sant tukaram nibandh | संत तुकाराम महाराज

मुद्दे : 
  • महाराष्ट्राला संतांची परंपरा 
  • संत तुकाराम महाराज हे एक श्रेष्ठ संतकवी 
  • आई-वडील, जन्म इ. 
  • प्रतिष्ठित घराणे
  • घरात विठ्ठलभक्तीची परंपरा 
  • लहान वयातच आध्यात्मिक विदयेचे संस्कार
  • कालांतराने अध्यात्माची ओढ 
  •  गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत वगैरे थोर ग्रंथांचा व्यासंग 
  • विरक्ती- स्वप्नात गुरूपदेश 
  • कवित्वाची स्फूर्ती 
  • अलौकिक प्रतिभेतून निर्माण झालेली अमृतवाणी 
  • भोंदू लोकांवर कोरडे ओढले
  • सामान्यांपासून प्रतिष्ठितांपर्यंत सर्व थरांतील लोक आकर्षित 
  • मत्सरी लोकांकडून छळ 
  • धर्मरक्षण हेच जीवितकार्य 
  • जातिभेद नाकारले 
  • 'संत तुकारामांची गाथा' हे मराठी भाषेचे श्रेष्ठ असे भूषण.

महाराष्ट्राला थोर संतांची फार मोठी परंपरा लाभली आहे. या परंपरेतील संत तुकाराम महाराज हे एक श्रेष्ठ संतकवी होत. त्यांचा जन्म १६०८ साली देहू येथे झाला.  संत तुकारामांचे घराणे हे त्या काळातील एक प्रतिष्ठित घराणे होते. त्यांचे शिक्षण त्या काळातील प्रतिष्ठित घराण्यांतील व्यक्तींप्रमाणे झाले.

संत तुकाराम महाराजांच्या घरात पिढ्यान्पिढ्यांची विठ्ठलभक्तीची परंपरा होती. त्यांचे एक पूर्वज विश्वंभर यांना शेतात विठ्ठल-रखुमाईची मूर्ती सापडली. त्यांनी नदीकाठावरील घरात त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. या घराला 'देऊळवाडा' असे म्हणत. या देऊळवाड्यात चालणारी भजने, कीर्तने, पुराणे ऐकून लहान वयातच तुकाराम महाराजांच्या मनावर आध्यात्मिक विदयेचे खोलवर संस्कार झाले.

त्या काळात महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. असंख्य माणसे देशोधडीला लागली. कित्येक मृत्युमुखी पडली. तुकाराम महाराजांवर नातेवाइकांचेही  मृत्यू पाहण्याचे दुर्भाग्य ओढवले. त्या भीषण दुष्काळाने माणसांची केलेली दैना पाहून तुकाराम महाराजांच्या मनात विरक्ती दाटून आली. लहानपणापासून अध्यात्मविदयेचे संस्कार जागृत झाले. त्यांचे मन अध्यात्मचिंतनात गढू लागले. ते देहूजवळच्या भामनाथगडावर जाऊन अध्यात्मचिंतन करू लागले. 

गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, नामदेव गाथा वगैरे थोर ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला. या दरम्यानच्या काळात संत तुकाराम महाराजांना स्वप्नात गुरूपदेश झाला. संत नामदेव पांडुरंगासमवेत त्यांच्या स्वप्नात आले. त्यांनी त्यांना कवित्व करायला सांगितले आणि अलौकिक प्रतिभेतून स्फुरलेली त्यांची अमृतवाणी सिद्ध झाली.

संत तुकाराम महाराजांच्या  काव्याकडे सामान्य माणसापासून ते त्या काळातील प्रतिष्ठित लोकांपर्यंत सर्व थरांतील लोक आकर्षित झाले. गावागावांत त्यांची कीर्ती पसरली. संत तुकाराम महाराजांची लोकप्रियता पाहून काहीजणांना त्यांचा मत्सर वाटू लागला. हे मत्सरी लोक त्यांचा नाना प्रकारे छळ करू लागले. त्यांच्या अभंगांच्या वह्या  त्या दुष्ट लोकांनी इंद्रायणी नदीत बुडवायला लावल्या. परंतु विठ्ठलकृपेने त्या वह्या  तरंगून वर आल्या, ही कथा सगळ्यांना ठाऊकच आहे. यामुळे लोकांच्या मनात तुकाराम महाराजांविषयी अपार भक्तिभावच निर्माण झाला.

संत तुकाराम महाराजांनी धर्मरक्षण हेच जीवितकार्य मानले होते. त्यांनी जातपात, उच्चनीच हे भेद नाकारले. संत तुकाराम महाराजांच्या कार्याच्या रूपाने भागवत संप्रदायाने कळसच गाठला. त्यांचे काव्य सुभाषितांसारख्या वचनांनी नटलेले आहे

जे का रंजले गांजले। त्यांसि म्हणे जो आपुले।
 तोचि साधु ओळखावा। देव तेथेचि जाणावा।।

अशा हजारो प्रासादिक अभंगांतून आपले दिव्य तत्त्वज्ञान संत तुकाराम महाराजांनी जनतेसमोर मांडले आहे. जनसामान्यांच्या जिभेवर हे काव्य विराजमान झाले आहे. 'संत तुकारामांची गाथा' ही मराठी भाषेचे एक अलौकिक भूषण बनले आहे.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला  हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता बाकीचे २ निबंध तुम्‍हाला खाली स्‍क्रोल केल्‍यावर दिसुन येतील. धन्‍यवाद   


maza avadta sant eknath marathi nibandh | संत एकनाथ मराठी निबंध


आजही जन्मावरून माणसांत उच्चनीचता मानली जाते. अशा वेळी मनात येते, स्वर्गातील एकनाथांच्या आत्म्याला काय वाटत असेल? चारशे वर्षांपूर्वी एकनाथांनी प्रत्यक्ष कृतीद्वारा समाजाला समानतेची व मानवतेची शिकवण दिली होती.

इ. स. १५३३ मध्ये सुविदय, भाविक अशा चक्रपाणींच्या घरात संत एकनाथांचा जन्म झाला. एकनाथांच्या घराण्यात विठ्ठलभक्ती फार पूर्वीपासून रुजलेली होती. त्यांच्या आजोबांनी म्हणजे संत भानुदासांनी कर्नाटकातून पांडुरंगाची मूर्ती पंढरीला आणली. एकनाथांना तर अगदी बालपणापासून परमेश्वरप्राप्तीचे वेड लागले होते. त्यासाठी त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षीच घराचा त्याग केला आणि ते देवगडला आपल्या गुरुगृही, जनार्दनस्वामींकडे आले. जनार्दनस्वामींनी एकनाथांची परीक्षा घेतली. ते त्या कसोटीला उत्तम प्रकारे उतरले. तेव्हा त्यांना गुरूंचा अनुग्रह मिळाला.

एकनाथ विद्वान होते, ज्ञानी होते; धर्म व रूढी यांतील फरक त्यांनी जाणला होता. सनातनीपणाचे पांघरूण पांघरणारे लोक माणुसकीपासून दूर जात आहेत, हे एकनाथांनी ओळखले. संस्कृत भाषेचा त्यांचा उत्तम अभ्यास होता. तिची थोरवी ते जाणत होते; पण त्याचबरोबर मराठीची महत्ताही त्यांनी जाणली होती. त्यामुळे त्यांनी कर्मठ समाजाचा रोष पत्करूनही सामान्य जनांसाठी मराठीत प्रासादिक रचना केली.

त्यांनी अविश्रांत परिश्रम घेऊन ज्ञानेश्वरांच्या भावार्थदीपिकेचे शुद्धीकरण केले व तिच्यातील पाठभेद काढून टाकून 'ज्ञानेश्वरी' सिद्ध केली. एकनाथांनी भागवताची रचना केली व भावार्थ रामायणातून रामकथा सांगितली. 'रुक्मिणी-स्वयंवर' हा त्यांच्या पंडिती काव्याचा उत्कृष्ट नमुना आहे. एकनाथांनी ही सर्व रचना मराठीत केली. एकनाथांच्या या मराठी रचनेला काशीच्या पंडितांनी प्रारंभी विरोध केला; पण ग्रंथ श्रवण केल्यावर त्याच पंडितांनी एकनाथांच्या ग्रंथाची काशीत मिरवणूक काढली.

एकनाथ संत होते, कवी होते, तसेच ते श्रेष्ठ समाजसुधारक होते. समाजातील चातुर्वर्ण्य पद्धत व त्यामुळे समाजातील विशिष्ट वर्गावर होणारा अन्याय त्यांना मान्य नव्हता. रणरणत्या वाळूत रडणाऱ्या हरिजन बालकाला त्यांनी उचलून घेतले व त्याला महारवाड्यात नेऊन पोचवले. एवढेच नव्हे, तर त्यांनी स्वत:च्या वडलांच्या श्राद्धाला महारांना आपल्या घरी पंक्तीला जेवायला बोलावले. काशीहून आणलेली गंगा तहानलेल्या गाढवाला पाजली. हे सारे एकनाथ करू शकले; कारण जनता हाच त्यांचा जनार्दन होता व जनसेवा हीच त्यांना ईश्वरपूजा वाटत होती.


sant gadge baba essay in marathi | संत गाडगेबाबा मराठी निबंध एक समाजसेवक संत

मुद्दे :
  • जन्म - बालपण
  • दारिद्र्याचे चटके
  • निरक्षरता, अंधश्रद्धा यांविरुद्ध प्रचार
  • 'गाडगेबाबा' हे नाव का पडले?
  • कष्ट करून भिक्षा घेणे
  • स्वच्छतेचा आग्रह
  • देणग्यांचा उपयोग जनतेसाठी
  • अनेक संस्था
  • निधन
संत गाडगेबाबांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यात झाला. त्यांचे मूळ नाव डेबूजी हे होते. वडिलांना दारूचे व्यसन असल्यामुळे घरात कायमचे दारिद्र्य होते. वडील अकाली वारले. त्यामुळे त्यांच्या मामाने त्यांचा सांभाळ केला.
संत गाडगेबाबांनी मामासोबत शेतात खूप कष्ट केले, पण सावकाराने मामाच्या शेतावर जप्ती आणली. मामाच्या अशिक्षितपणामुळे सावकाराने मामाला फसवले. या घटनेचा गाडगेबाबांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्यामुळे 'व्यसन सोडा, शिक्षण घ्या. कर्ज घेऊ नका,' असा त्यांनी आयुष्यभर प्रचार केला.

सामाजिक प्रबोधनासाठी त्यांनी भजन, कीर्तन व प्रवचन हा मार्ग वापरला. ते नेहमी अंगावर फाटकी गोधडी घेत. त्यांच्या हातात नेहमी गाडगे असे. त्यामुळे त्यांना 'गाडगेबाबा' हे नाव पडले. गाडगेबाबा कधी एका जागी जास्त काळ राहत नसत. कष्ट करूनच भिक्षा घेत. त्यांच्या हातात नेहमी झाडू असे. ते स्वत: झाडण्याचे काम करत आणि लोकांना स्वच्छतेचा उपदेश करत.

लोकांकडून त्यांनी खूप देणग्या मिळवल्या. पण एकही पैसा स्वत:साठी खर्च केला नाही. त्यांनी धर्मशाळा बांधल्या, गोरक्षण संस्था उभारल्या. त्यांनी अनेक शाळा व महाविदयालये सुरू केली. आयुष्याच्या अंतापर्यंत त्यांनी लोकजागृतीचे व लोकसेवेचे काम केले. १९५६ साली त्यांचे निधन झाले. ते एक महान सेवाभावी संत होते.

Maza avadta sant essay in Marathi | माझा आवडता संत मराठी निबंध

Maza avadta sant essay in Marathi | माझा आवडता संत मराठी निबंध


नमस्‍कार मित्रांनो आज आपण माझा आवडता संत मराठी निबंध बघणार आहोत.  भारत ही संताची भुमी आहे. संतानी आपल्‍या शिकवणी व ज्ञानातुन समाजाची प्रगतीच करण्‍याचे काम केले आहे. भारताला खुप मोठी संतपंरपरा लाभलेली आहे. याच संतपंरपरेतील संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज , संत गाडगेबाबा यांच्‍या विषयी अनुक्रमे ३ निबंध बघणार आहोत चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

maza-avadta-sant-essay-in-marathi
maza-avadta-sant-essay-in-marathi

 majha avadta sant tukaram nibandh | संत तुकाराम महाराज

मुद्दे : 
  • महाराष्ट्राला संतांची परंपरा 
  • संत तुकाराम महाराज हे एक श्रेष्ठ संतकवी 
  • आई-वडील, जन्म इ. 
  • प्रतिष्ठित घराणे
  • घरात विठ्ठलभक्तीची परंपरा 
  • लहान वयातच आध्यात्मिक विदयेचे संस्कार
  • कालांतराने अध्यात्माची ओढ 
  •  गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत वगैरे थोर ग्रंथांचा व्यासंग 
  • विरक्ती- स्वप्नात गुरूपदेश 
  • कवित्वाची स्फूर्ती 
  • अलौकिक प्रतिभेतून निर्माण झालेली अमृतवाणी 
  • भोंदू लोकांवर कोरडे ओढले
  • सामान्यांपासून प्रतिष्ठितांपर्यंत सर्व थरांतील लोक आकर्षित 
  • मत्सरी लोकांकडून छळ 
  • धर्मरक्षण हेच जीवितकार्य 
  • जातिभेद नाकारले 
  • 'संत तुकारामांची गाथा' हे मराठी भाषेचे श्रेष्ठ असे भूषण.

महाराष्ट्राला थोर संतांची फार मोठी परंपरा लाभली आहे. या परंपरेतील संत तुकाराम महाराज हे एक श्रेष्ठ संतकवी होत. त्यांचा जन्म १६०८ साली देहू येथे झाला.  संत तुकारामांचे घराणे हे त्या काळातील एक प्रतिष्ठित घराणे होते. त्यांचे शिक्षण त्या काळातील प्रतिष्ठित घराण्यांतील व्यक्तींप्रमाणे झाले.

संत तुकाराम महाराजांच्या घरात पिढ्यान्पिढ्यांची विठ्ठलभक्तीची परंपरा होती. त्यांचे एक पूर्वज विश्वंभर यांना शेतात विठ्ठल-रखुमाईची मूर्ती सापडली. त्यांनी नदीकाठावरील घरात त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. या घराला 'देऊळवाडा' असे म्हणत. या देऊळवाड्यात चालणारी भजने, कीर्तने, पुराणे ऐकून लहान वयातच तुकाराम महाराजांच्या मनावर आध्यात्मिक विदयेचे खोलवर संस्कार झाले.

त्या काळात महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. असंख्य माणसे देशोधडीला लागली. कित्येक मृत्युमुखी पडली. तुकाराम महाराजांवर नातेवाइकांचेही  मृत्यू पाहण्याचे दुर्भाग्य ओढवले. त्या भीषण दुष्काळाने माणसांची केलेली दैना पाहून तुकाराम महाराजांच्या मनात विरक्ती दाटून आली. लहानपणापासून अध्यात्मविदयेचे संस्कार जागृत झाले. त्यांचे मन अध्यात्मचिंतनात गढू लागले. ते देहूजवळच्या भामनाथगडावर जाऊन अध्यात्मचिंतन करू लागले. 

गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, नामदेव गाथा वगैरे थोर ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला. या दरम्यानच्या काळात संत तुकाराम महाराजांना स्वप्नात गुरूपदेश झाला. संत नामदेव पांडुरंगासमवेत त्यांच्या स्वप्नात आले. त्यांनी त्यांना कवित्व करायला सांगितले आणि अलौकिक प्रतिभेतून स्फुरलेली त्यांची अमृतवाणी सिद्ध झाली.

संत तुकाराम महाराजांच्या  काव्याकडे सामान्य माणसापासून ते त्या काळातील प्रतिष्ठित लोकांपर्यंत सर्व थरांतील लोक आकर्षित झाले. गावागावांत त्यांची कीर्ती पसरली. संत तुकाराम महाराजांची लोकप्रियता पाहून काहीजणांना त्यांचा मत्सर वाटू लागला. हे मत्सरी लोक त्यांचा नाना प्रकारे छळ करू लागले. त्यांच्या अभंगांच्या वह्या  त्या दुष्ट लोकांनी इंद्रायणी नदीत बुडवायला लावल्या. परंतु विठ्ठलकृपेने त्या वह्या  तरंगून वर आल्या, ही कथा सगळ्यांना ठाऊकच आहे. यामुळे लोकांच्या मनात तुकाराम महाराजांविषयी अपार भक्तिभावच निर्माण झाला.

संत तुकाराम महाराजांनी धर्मरक्षण हेच जीवितकार्य मानले होते. त्यांनी जातपात, उच्चनीच हे भेद नाकारले. संत तुकाराम महाराजांच्या कार्याच्या रूपाने भागवत संप्रदायाने कळसच गाठला. त्यांचे काव्य सुभाषितांसारख्या वचनांनी नटलेले आहे

जे का रंजले गांजले। त्यांसि म्हणे जो आपुले।
 तोचि साधु ओळखावा। देव तेथेचि जाणावा।।

अशा हजारो प्रासादिक अभंगांतून आपले दिव्य तत्त्वज्ञान संत तुकाराम महाराजांनी जनतेसमोर मांडले आहे. जनसामान्यांच्या जिभेवर हे काव्य विराजमान झाले आहे. 'संत तुकारामांची गाथा' ही मराठी भाषेचे एक अलौकिक भूषण बनले आहे.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला  हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता बाकीचे २ निबंध तुम्‍हाला खाली स्‍क्रोल केल्‍यावर दिसुन येतील. धन्‍यवाद   


maza avadta sant eknath marathi nibandh | संत एकनाथ मराठी निबंध


आजही जन्मावरून माणसांत उच्चनीचता मानली जाते. अशा वेळी मनात येते, स्वर्गातील एकनाथांच्या आत्म्याला काय वाटत असेल? चारशे वर्षांपूर्वी एकनाथांनी प्रत्यक्ष कृतीद्वारा समाजाला समानतेची व मानवतेची शिकवण दिली होती.

इ. स. १५३३ मध्ये सुविदय, भाविक अशा चक्रपाणींच्या घरात संत एकनाथांचा जन्म झाला. एकनाथांच्या घराण्यात विठ्ठलभक्ती फार पूर्वीपासून रुजलेली होती. त्यांच्या आजोबांनी म्हणजे संत भानुदासांनी कर्नाटकातून पांडुरंगाची मूर्ती पंढरीला आणली. एकनाथांना तर अगदी बालपणापासून परमेश्वरप्राप्तीचे वेड लागले होते. त्यासाठी त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षीच घराचा त्याग केला आणि ते देवगडला आपल्या गुरुगृही, जनार्दनस्वामींकडे आले. जनार्दनस्वामींनी एकनाथांची परीक्षा घेतली. ते त्या कसोटीला उत्तम प्रकारे उतरले. तेव्हा त्यांना गुरूंचा अनुग्रह मिळाला.

एकनाथ विद्वान होते, ज्ञानी होते; धर्म व रूढी यांतील फरक त्यांनी जाणला होता. सनातनीपणाचे पांघरूण पांघरणारे लोक माणुसकीपासून दूर जात आहेत, हे एकनाथांनी ओळखले. संस्कृत भाषेचा त्यांचा उत्तम अभ्यास होता. तिची थोरवी ते जाणत होते; पण त्याचबरोबर मराठीची महत्ताही त्यांनी जाणली होती. त्यामुळे त्यांनी कर्मठ समाजाचा रोष पत्करूनही सामान्य जनांसाठी मराठीत प्रासादिक रचना केली.

त्यांनी अविश्रांत परिश्रम घेऊन ज्ञानेश्वरांच्या भावार्थदीपिकेचे शुद्धीकरण केले व तिच्यातील पाठभेद काढून टाकून 'ज्ञानेश्वरी' सिद्ध केली. एकनाथांनी भागवताची रचना केली व भावार्थ रामायणातून रामकथा सांगितली. 'रुक्मिणी-स्वयंवर' हा त्यांच्या पंडिती काव्याचा उत्कृष्ट नमुना आहे. एकनाथांनी ही सर्व रचना मराठीत केली. एकनाथांच्या या मराठी रचनेला काशीच्या पंडितांनी प्रारंभी विरोध केला; पण ग्रंथ श्रवण केल्यावर त्याच पंडितांनी एकनाथांच्या ग्रंथाची काशीत मिरवणूक काढली.

एकनाथ संत होते, कवी होते, तसेच ते श्रेष्ठ समाजसुधारक होते. समाजातील चातुर्वर्ण्य पद्धत व त्यामुळे समाजातील विशिष्ट वर्गावर होणारा अन्याय त्यांना मान्य नव्हता. रणरणत्या वाळूत रडणाऱ्या हरिजन बालकाला त्यांनी उचलून घेतले व त्याला महारवाड्यात नेऊन पोचवले. एवढेच नव्हे, तर त्यांनी स्वत:च्या वडलांच्या श्राद्धाला महारांना आपल्या घरी पंक्तीला जेवायला बोलावले. काशीहून आणलेली गंगा तहानलेल्या गाढवाला पाजली. हे सारे एकनाथ करू शकले; कारण जनता हाच त्यांचा जनार्दन होता व जनसेवा हीच त्यांना ईश्वरपूजा वाटत होती.


sant gadge baba essay in marathi | संत गाडगेबाबा मराठी निबंध एक समाजसेवक संत

मुद्दे :
  • जन्म - बालपण
  • दारिद्र्याचे चटके
  • निरक्षरता, अंधश्रद्धा यांविरुद्ध प्रचार
  • 'गाडगेबाबा' हे नाव का पडले?
  • कष्ट करून भिक्षा घेणे
  • स्वच्छतेचा आग्रह
  • देणग्यांचा उपयोग जनतेसाठी
  • अनेक संस्था
  • निधन
संत गाडगेबाबांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यात झाला. त्यांचे मूळ नाव डेबूजी हे होते. वडिलांना दारूचे व्यसन असल्यामुळे घरात कायमचे दारिद्र्य होते. वडील अकाली वारले. त्यामुळे त्यांच्या मामाने त्यांचा सांभाळ केला.
संत गाडगेबाबांनी मामासोबत शेतात खूप कष्ट केले, पण सावकाराने मामाच्या शेतावर जप्ती आणली. मामाच्या अशिक्षितपणामुळे सावकाराने मामाला फसवले. या घटनेचा गाडगेबाबांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्यामुळे 'व्यसन सोडा, शिक्षण घ्या. कर्ज घेऊ नका,' असा त्यांनी आयुष्यभर प्रचार केला.

सामाजिक प्रबोधनासाठी त्यांनी भजन, कीर्तन व प्रवचन हा मार्ग वापरला. ते नेहमी अंगावर फाटकी गोधडी घेत. त्यांच्या हातात नेहमी गाडगे असे. त्यामुळे त्यांना 'गाडगेबाबा' हे नाव पडले. गाडगेबाबा कधी एका जागी जास्त काळ राहत नसत. कष्ट करूनच भिक्षा घेत. त्यांच्या हातात नेहमी झाडू असे. ते स्वत: झाडण्याचे काम करत आणि लोकांना स्वच्छतेचा उपदेश करत.

लोकांकडून त्यांनी खूप देणग्या मिळवल्या. पण एकही पैसा स्वत:साठी खर्च केला नाही. त्यांनी धर्मशाळा बांधल्या, गोरक्षण संस्था उभारल्या. त्यांनी अनेक शाळा व महाविदयालये सुरू केली. आयुष्याच्या अंतापर्यंत त्यांनी लोकजागृतीचे व लोकसेवेचे काम केले. १९५६ साली त्यांचे निधन झाले. ते एक महान सेवाभावी संत होते.