मदर टेरेसा मराठी निबंध | Mother Teresa Essay in Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मदर टेरेसा मराठी निबंध बघणार आहोत.चला तर मग सुरूवात करूया निबंधाला

Mother-Teresa-Essay-in-Marathi
Mother-Teresa-Essay-in-Marathi


निबंध 1 


कलकत्याच्या एका रस्त्यावरून एक विदेशी स्त्री चालली होती. तिच्याबरोबर तिच्या दोन सहकारी स्त्रियाही होत्या. पोशाखावरून ती स्त्री सेवाव्रत स्वीकारलेली धर्मप्रचारिका वाटत होती. रस्त्याच्या कडेला एक माणूस असहाय अवस्थेत पडला होता. जाणाऱ्या-येणाऱ्यांना त्याच्याकडे पाहायलाही सवड नव्हती. तो आता फार थोड्या तासांचा सोबती होता. त्या स्त्रीने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्याला आपल्या आश्रमात आणले. त्याचे अंग पुसले. त्याला स्वच्छ कपडे घातले. मरण्यापूर्वी मिळालेल्या या वागणुकीने त्याचा चेहरा उजळला. तेव्हा ती स्त्री आपल्या साथीदार स्त्रियांना म्हणाली, "मरताना त्याला जर जाणवले की, आपले कोणी तरी आहे तर त्याचे मरण सुखाचे होईल."



एका भिकाऱ्याचा एवढा विचार करणारी ही जगावेगळी आई म्हणजे 'मदर टेरेसा' होय. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांना आपल्या जीवनध्येयाचा साक्षात्कार झाला; तेव्हाच त्यांनी स्वत:ला गरिबांच्या सेवेसाठी वाहून घ्यायचे ठरवले. अठराव्या वर्षी त्यांनी धर्मप्रचारिकेची दीक्षा घेतली व घर सोडले. १९३१ साली दार्जिलिंग येथे त्यांनी सेवेची व धर्मप्रचाराची शपथ घेतली व १९३९ साली त्यांनी कलकत्त्यात आपल्या कामाला सुरवात केली. आतापर्यंत त्यांचे हे कार्य अखंड चालू आहे. १० सप्टेंबर १९४६ नंतर त्यांनी झोपडपट्टीतील दीनदुबळे व गरीब यांच्यासाठी आपले आयुष्य वेचण्याचे ठरवले व त्या लाखो अनाथांच्या, अपंगांच्या सर्वार्थाने 'मदर' झाल्या.


 मदर टेरेसांच्या या सेवेचे मोल जगाला उमगले आणि १९७९ साली त्यांना 'शांततेचे नोबेल पारितोषिक' मिळाले. ती संपूर्ण रक्कमही त्यांनी गरिबांसाठीच खर्चण्याचे ठरवले. भारतानेही 'भारतरत्न' हा किताब देऊन त्यांचा गौरव केला आहे. मदर टेरेसा म्हणजे साक्षात प्रेम आणि मूर्तिमंत करुणा होय.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. व पुढील दुसरा निबंध वाचण्‍यास विसरू नका  धन्‍यवाद





निबंध 2



ती समाजात सेवेचे व्रत घेऊन 'सिस्टर' म्हणून उतरली आणि आपल्या कार्याने समाजाची 'मदर' झाली, अशी ही एक आगळी आई - म्हणजे 'मदर तेरेसा'. स्वत:चे सर्वस्व इतरांच्या सेवेसाठी झोकून देण्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे 'मदर तेरेसा'. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मदर तेरेसांचे सेवाकार्य चालू होते आणि त्याचा विस्तार जगातील पाच खंडांत, सव्वाशे देशांत झालेला आहे.



मदर तेरेसा या मूळच्या अल्बानिया या देशातील. २६ ऑगस्ट १९१० मध्ये 'स्कोपजे' नावाच्या खेड्यात त्यांचा जन्म झाला होता. वयाच्या एकोणिसाव्या वर्षीच त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित केले. 'नन' बनून दुःखितांचे दुःख दूर करायचे हे ते ध्येय होते.


सिस्टर अॅग्नेस म्हणून त्या भारतात कोलकाता येथे आल्या, तेव्हा 'जनसेवा' या एकाच विचाराने त्या झपाटलेल्या होत्या. २४ मार्च १९३१ मध्ये त्यांनी पहिली शपथ घेतली. त्यानुसार त्यांनी गरिबी, ब्रह्मचर्य व कृपाशीलता या गोष्टी स्वीकारल्या. स्वत:साठी 'तेरेसा' हे नाव घेतले. कोलकाता येथे आल्यावर त्यांनी प्राथमिक शाळेत शिकवण्याची जबाबदारी स्वीकारली.


 त्यासाठी प्रथम त्यांनी बंगाली व हिंदी भाषा शिकून घेतल्या. नंतर त्यांची शाळेतील कारकीर्द ' उत्कृष्ट शिक्षिका' म्हणून ठरली. शिक्षिकेचे काम करत असताना सिस्टर तेरेसांना 'ईश्वरी' आवाहन झाले आणि 'कॉन्व्हेंट 'च्या चार भिंती सोडून त्या अधिक व्यापक कार्यासाठी बाहेर पडल्या. त्यांनी मिशन स्थापन केले. सेंट तेरेसा शाळेत पहिले औषधालय काढले व शिवणकामाचे वर्ग सुरू केले.



२० डिसेंबर १९४८ मध्ये त्यांनी कोलकाता शहरात मध्यभागी असलेले 'मोतीझल' हे ठिकाण ही आपली कर्मभूमी म्हणून निवडली. त्यावेळी ते ठिकाण अत्यंत घाणेरडे व अस्वच्छ होते. असाध्य रोगाने ग्रासलेल्या एका मरणासन्न व्यक्तीला त्यांनी रस्त्याच्या कडेला पाहिले. त्या व्यक्तीचा शेवट तरी शांततापूर्ण व्हावा म्हणून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तिला उचलून आपल्या संस्थेत आणले. या घटनेतूनच तेरेसांचे 'सेवागृह' सुरू झाले व तेरेसा त्या सेवागृहाच्या 'मदर' झाल्या.



त्या क्षणापासून या मदरचे काम सतत विस्तारतच गेले. त्यांनी १२५ देशांत ७५५ आधारगृहे काढली. 'मिशनरीज ऑफ चॅरिटी' ही आंतरराष्ट्रीय संस्था त्यांनी सुरू केली. या संस्थेमार्फत पाच लाख लोकांना रोजचे मोफत जेवण सुरू झाले. तीन लाख लोकांना मोफत उपचार मिळू लागले. वीस हजार मुलांच्या शिक्षणाची सोय झाली. यांखेरीज अपंग संस्था, कुष्ठधाम, दुर्बलांसाठी निवारे, व्यसनग्रस्तांसाठी उपचारगृहे त्यांनी सुरू केली. २५ जानेवारी १९६२ रोजी भारत सरकारने त्यांना ' पद्मश्री' हा किताब देऊन गौरवले. १९७१ मध्ये त्यांना 'रॅमन मॅगॅसेसे अॅवॉर्ड' मिळाले. त्यातून त्यांनी आग्रा येथे कुष्ठरुग्णांसाठी आश्रम सुरू केला.



वॉशिंग्टन येथील जोसेफ केनेडी अकादमीचे पारितोषिकही त्यांना मिळाले. त्या पैशांतून त्यांनी कोलकात्याच्या डमडम उपनगरात मनोदुर्बल मुलांसाठी रुग्णालय सुरू केले.  १९७९ साली मदर तेरेसा यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक मिळाले. त्या निमित्ताने तेथे होणारी मेजवानी रद्द करवून घेऊन त्यासाठी होणाऱ्या खर्चाची रक्कम त्यांनी आपल्या कार्यासाठी देणगी म्हणून स्वीकारली. १९८० मध्ये भारत सरकारने त्यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब बहाल करून सन्मानित केले. ५ सप्टेंबर १९९७ रोजी त्यांचे वयाच्या ८८व्या वर्षी कोलकाता येथे निधन झाले. शेवटपर्यंत मोह, मत्सर या दुर्गुणांच्या पलीकडे जाऊन माया, प्रेम, सेवा आणि भक्ती यांचाच साऱ्या जगावर या मदरने वर्षाव केला. अशी होती ही एक आगळी आई !


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

मदर टेरेसा मराठी निबंध | Mother Teresa Essay in Marathi

 मदर टेरेसा मराठी निबंध | Mother Teresa Essay in Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मदर टेरेसा मराठी निबंध बघणार आहोत.चला तर मग सुरूवात करूया निबंधाला

Mother-Teresa-Essay-in-Marathi
Mother-Teresa-Essay-in-Marathi


निबंध 1 


कलकत्याच्या एका रस्त्यावरून एक विदेशी स्त्री चालली होती. तिच्याबरोबर तिच्या दोन सहकारी स्त्रियाही होत्या. पोशाखावरून ती स्त्री सेवाव्रत स्वीकारलेली धर्मप्रचारिका वाटत होती. रस्त्याच्या कडेला एक माणूस असहाय अवस्थेत पडला होता. जाणाऱ्या-येणाऱ्यांना त्याच्याकडे पाहायलाही सवड नव्हती. तो आता फार थोड्या तासांचा सोबती होता. त्या स्त्रीने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्याला आपल्या आश्रमात आणले. त्याचे अंग पुसले. त्याला स्वच्छ कपडे घातले. मरण्यापूर्वी मिळालेल्या या वागणुकीने त्याचा चेहरा उजळला. तेव्हा ती स्त्री आपल्या साथीदार स्त्रियांना म्हणाली, "मरताना त्याला जर जाणवले की, आपले कोणी तरी आहे तर त्याचे मरण सुखाचे होईल."



एका भिकाऱ्याचा एवढा विचार करणारी ही जगावेगळी आई म्हणजे 'मदर टेरेसा' होय. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांना आपल्या जीवनध्येयाचा साक्षात्कार झाला; तेव्हाच त्यांनी स्वत:ला गरिबांच्या सेवेसाठी वाहून घ्यायचे ठरवले. अठराव्या वर्षी त्यांनी धर्मप्रचारिकेची दीक्षा घेतली व घर सोडले. १९३१ साली दार्जिलिंग येथे त्यांनी सेवेची व धर्मप्रचाराची शपथ घेतली व १९३९ साली त्यांनी कलकत्त्यात आपल्या कामाला सुरवात केली. आतापर्यंत त्यांचे हे कार्य अखंड चालू आहे. १० सप्टेंबर १९४६ नंतर त्यांनी झोपडपट्टीतील दीनदुबळे व गरीब यांच्यासाठी आपले आयुष्य वेचण्याचे ठरवले व त्या लाखो अनाथांच्या, अपंगांच्या सर्वार्थाने 'मदर' झाल्या.


 मदर टेरेसांच्या या सेवेचे मोल जगाला उमगले आणि १९७९ साली त्यांना 'शांततेचे नोबेल पारितोषिक' मिळाले. ती संपूर्ण रक्कमही त्यांनी गरिबांसाठीच खर्चण्याचे ठरवले. भारतानेही 'भारतरत्न' हा किताब देऊन त्यांचा गौरव केला आहे. मदर टेरेसा म्हणजे साक्षात प्रेम आणि मूर्तिमंत करुणा होय.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. व पुढील दुसरा निबंध वाचण्‍यास विसरू नका  धन्‍यवाद





निबंध 2



ती समाजात सेवेचे व्रत घेऊन 'सिस्टर' म्हणून उतरली आणि आपल्या कार्याने समाजाची 'मदर' झाली, अशी ही एक आगळी आई - म्हणजे 'मदर तेरेसा'. स्वत:चे सर्वस्व इतरांच्या सेवेसाठी झोकून देण्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे 'मदर तेरेसा'. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मदर तेरेसांचे सेवाकार्य चालू होते आणि त्याचा विस्तार जगातील पाच खंडांत, सव्वाशे देशांत झालेला आहे.



मदर तेरेसा या मूळच्या अल्बानिया या देशातील. २६ ऑगस्ट १९१० मध्ये 'स्कोपजे' नावाच्या खेड्यात त्यांचा जन्म झाला होता. वयाच्या एकोणिसाव्या वर्षीच त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित केले. 'नन' बनून दुःखितांचे दुःख दूर करायचे हे ते ध्येय होते.


सिस्टर अॅग्नेस म्हणून त्या भारतात कोलकाता येथे आल्या, तेव्हा 'जनसेवा' या एकाच विचाराने त्या झपाटलेल्या होत्या. २४ मार्च १९३१ मध्ये त्यांनी पहिली शपथ घेतली. त्यानुसार त्यांनी गरिबी, ब्रह्मचर्य व कृपाशीलता या गोष्टी स्वीकारल्या. स्वत:साठी 'तेरेसा' हे नाव घेतले. कोलकाता येथे आल्यावर त्यांनी प्राथमिक शाळेत शिकवण्याची जबाबदारी स्वीकारली.


 त्यासाठी प्रथम त्यांनी बंगाली व हिंदी भाषा शिकून घेतल्या. नंतर त्यांची शाळेतील कारकीर्द ' उत्कृष्ट शिक्षिका' म्हणून ठरली. शिक्षिकेचे काम करत असताना सिस्टर तेरेसांना 'ईश्वरी' आवाहन झाले आणि 'कॉन्व्हेंट 'च्या चार भिंती सोडून त्या अधिक व्यापक कार्यासाठी बाहेर पडल्या. त्यांनी मिशन स्थापन केले. सेंट तेरेसा शाळेत पहिले औषधालय काढले व शिवणकामाचे वर्ग सुरू केले.



२० डिसेंबर १९४८ मध्ये त्यांनी कोलकाता शहरात मध्यभागी असलेले 'मोतीझल' हे ठिकाण ही आपली कर्मभूमी म्हणून निवडली. त्यावेळी ते ठिकाण अत्यंत घाणेरडे व अस्वच्छ होते. असाध्य रोगाने ग्रासलेल्या एका मरणासन्न व्यक्तीला त्यांनी रस्त्याच्या कडेला पाहिले. त्या व्यक्तीचा शेवट तरी शांततापूर्ण व्हावा म्हणून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तिला उचलून आपल्या संस्थेत आणले. या घटनेतूनच तेरेसांचे 'सेवागृह' सुरू झाले व तेरेसा त्या सेवागृहाच्या 'मदर' झाल्या.



त्या क्षणापासून या मदरचे काम सतत विस्तारतच गेले. त्यांनी १२५ देशांत ७५५ आधारगृहे काढली. 'मिशनरीज ऑफ चॅरिटी' ही आंतरराष्ट्रीय संस्था त्यांनी सुरू केली. या संस्थेमार्फत पाच लाख लोकांना रोजचे मोफत जेवण सुरू झाले. तीन लाख लोकांना मोफत उपचार मिळू लागले. वीस हजार मुलांच्या शिक्षणाची सोय झाली. यांखेरीज अपंग संस्था, कुष्ठधाम, दुर्बलांसाठी निवारे, व्यसनग्रस्तांसाठी उपचारगृहे त्यांनी सुरू केली. २५ जानेवारी १९६२ रोजी भारत सरकारने त्यांना ' पद्मश्री' हा किताब देऊन गौरवले. १९७१ मध्ये त्यांना 'रॅमन मॅगॅसेसे अॅवॉर्ड' मिळाले. त्यातून त्यांनी आग्रा येथे कुष्ठरुग्णांसाठी आश्रम सुरू केला.



वॉशिंग्टन येथील जोसेफ केनेडी अकादमीचे पारितोषिकही त्यांना मिळाले. त्या पैशांतून त्यांनी कोलकात्याच्या डमडम उपनगरात मनोदुर्बल मुलांसाठी रुग्णालय सुरू केले.  १९७९ साली मदर तेरेसा यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक मिळाले. त्या निमित्ताने तेथे होणारी मेजवानी रद्द करवून घेऊन त्यासाठी होणाऱ्या खर्चाची रक्कम त्यांनी आपल्या कार्यासाठी देणगी म्हणून स्वीकारली. १९८० मध्ये भारत सरकारने त्यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब बहाल करून सन्मानित केले. ५ सप्टेंबर १९९७ रोजी त्यांचे वयाच्या ८८व्या वर्षी कोलकाता येथे निधन झाले. शेवटपर्यंत मोह, मत्सर या दुर्गुणांच्या पलीकडे जाऊन माया, प्रेम, सेवा आणि भक्ती यांचाच साऱ्या जगावर या मदरने वर्षाव केला. अशी होती ही एक आगळी आई !


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद