दहशतवाद मराठी निबंध | Terrorism Essay In Marathi

 दहशतवाद मराठी निबंध | Terrorism Essay In Marathi 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  दहशतवाद  मराठी निबंध बघणार आहोत . दिवस होता ११ सप्टेंबर २००१ आणि मी जे पाहतो आहे ते खरेच आहे की, मला भास होतो आहे, असे क्षणभर वाटले. स्वतःलाच चिमटा काढून पाहिला, नाही मी ठिकाणावर होतो. 


पण अमेरिकेची व जगाची झोप उडाली होती. कारण घटनाच तेवढी भयानक होती. अमेरिकेच्या Twin Towers वर ओसामा बिन लादेनच्या दोन अतिरेक्यांनी विमानाने हल्ला करून जमीनदोस्त केले होते. कित्येक लोक ठार झाले.


ज्यांचा काही दोष नव्हता त्यांचे प्राण गेले आणि 'ट्रिन टॉवर्स' जेवढे हादरलेत त्यापेक्षा कैकपटीने सारे जग हादरले. ताबडतोब बुश साहेबांनी जगाला फर्मान सोडले "जर तुम्ही आमच्यासोबत नसाल तर आमच्याविरुद्ध आहात असे आम्ही समजू."


आज अमेरिकाच नव्हे तर सारे जग दहशतवादाच्या सावटाखाली आहे. भारतासारख्या देशाला गेल्या ५० वर्षांपासून दहशतवादाचे या ना त्या प्रकारे हादरे बसत आहेत. 'पाकिस्तान स्पॉन्सर्ड' दहशतवादाची भयंकर डोकेदुखी निर्माण झाली आहे. मुंबईसारख्या महानगरांमध्ये तर सकाळी ऑफिसला जाणारा माणूस रात्री सुस्वरूप घरी परतेल याची शाश्वती राहिली नाही.


९/११ च्या हल्ल्याने फक्त अमेरिकाच नव्हे तर साऱ्या जगाला दहशतवादाविषयी नव्याने विचार करून रणनीती आखायला प्रवृत्त केले. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर एका पीडिताची प्रतिक्रिया मोठी बोलकी होती. तो म्हणतो, "हम रोज थोडे थोडे मरकर जिते है." नंतर २००२ साली गोध्रा हत्याकांड झाले. सारा देश हादरला. 


हिंदू-मुस्लीम दंगली पेटल्या. फाळणीसारखी स्थिती निर्माण झाली. अल्पसंख्याक घरात जीव लपवून बसले. खरोखर दहशतवादाचे सावट आज प्रत्येकाच्या मानगुटीवर बसले आहे, ते केव्हा उतरेल याची कुणालाही कल्पना नाही. गोध्रा हत्याकांडात सुखरूप बचावलेल्या व्यक्तीबाबतची बोलकी प्रतिक्रिया होती -


जीवन जगायलाच जर माणूस घाबरत असेल, तर तो खरोखर सुरक्षित आहे का याचा विचार झाला पाहिजे. यानंतर ११ जुलैचे बॉम्बस्फोट झाले, मालेगाव शहरात बॉम्बस्फोट होऊन शेकडो मृत्युमुखी पडले ही मालिका नंतर चालूच आहे. आज दहशतवादापासून कोणाचे जीवन सुरक्षित राहिलेले नाही. 


दहशतवादी सार्वभौमत्वाचे प्रतीक असलेल्या संसदेवर हल्ला करायला धजावले याचा गांभीर्याने विचार करायला हवा. कारण सगळ्या राष्ट्राच्या भवितव्याचाच प्रश्न निर्माण झाला आहे. हा फक्त राजकारण्यांचाच प्रश्न नसून संपूर्ण जनतेने या लढ्यात सहभागी झाले पाहिजे. 


दहशतवादाच्या भीतीच्या सावटाखालीच जणू काही महानगरातील मनुष्य आज जगतो आहे. सैनिकांना तर 'रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग' अशीच पाळी आली आहे. अतिरेक्यांकडे 'Suicide Bombs' असल्यामुळे होणारी मनुष्यहानी मोठ्या प्रमाणात असते. 


मुंबईच्या बॉम्बस्फोटानंतर वृत्तपत्रात बातम्या आल्या की 'दुसऱ्या दिवशी मुंबईकर पुन्हा कामाला जायला लागला, मुंबईकरांचे आशावादी जीवन पुन्हा सुरू' वगैरे, परंतु खरोखर तो जीवन जगण्याचा आशावाद होता की, जीवन जगण्याची अपरिहार्यता होती ?


आपण दहशतवादापायी दोन पंतप्रधान गमावले. कित्येक जीव आत्तापर्यंत गेले. याची सांख्यिकी नाही. सरकारने, राजकारण्यांनी, धोरण बनविण्याऱ्यांनी दहशतवादाचा सर्वसमावेशक विचार करायला हरा. उदा. अमेरिकेनेच लादेनला पोसले त्याला मोठे केले व एकदिवस हाच लादेन अमेरिकेवर उलटला. म्हणून बड्या राष्ट्रांनी आपले धोरण स्वार्थापायी ठरविताना


याचा विचार करायला हवा, तसेच 'पाकपुरस्कृत दहशतवाद संपविण्यासाठी युद्धाची गरज आहे' असा एक वर्ग म्हणता पण युद्ध कुणाला परवडेल ? १९६५, १९७१ च्या युद्धांनी काय साधले ? शेवटी मनामनांतील दरी रुंदावली. चर्चेनेच प्रश्न सुटतात, चर्चा घडून यायलाच पाहिजे पण गरज पडली तर सौम्य बळाचा वापरदेखील ताकद दाखवायला केला पाहिजे. पण युद्ध करून 'पाक पुरस्कृत दहशतवाद' मोडून निघेल हा भोळा आशावाद ठरेल. साहिर लुधियानवी म्हणतात -

'टॅक आगे बढे या पिछे हटे


कोख धरती की तो बांझ ही होती है.' इस्राईल-पॅलेस्टिनी प्रश्नाबाबत आपण काय पाहत आहोत? शेवटी भारत काय, अमेरिका काय या पुरताच दहशतवाद मर्यादित राहिला नसून मालेगाव, मनमाडसारख्या ग्रामीण भागातही पाळेमुळे पसरली आहेत. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 2

दहशतवाद मराठी निबंध | Terrorism Essay In Marathi 


"बॉम्बस्फोट धमक्या निरपराध नागरिकांची अमानवी हत्या

कशाचे कुणाला भय राहिले नाही.

उन्मादाचे थैमान महासत्तेच्या दारात थांबले" सगळे जगच जळतंय धुमसतंय, श्वास घेणं देखील अतिशय अवघड झालंय, ११ सप्टेंबर २००१ रोजी त्या काळ्या मंगळवारी घडलेल्या घटनेने आपणास काही वर्षापूर्वी मुंबईत घडलेल्या बॉम्बस्फोटांची व दुर्दैवी घटनांची अप्रिय आठवण करून दिली. मृत्यूचे थैमान, आक्रोश, रडणारी मुले, रक्ताचे लोट, तिरस्कार काय नव्हतं त्या वेळच्या घटनेत?


या घटनेतही आकाशात धुराचे लोट उठलेत, जमिनीवर रक्ताचे शिंपण झाले यावरील निकराचा उपाय म्हणून ११ सप्टेंबरच्या अतिरेकी हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बुश यांनी अमेरिकेत आणीबाणी जाहीर केली. पाकिस्तानात लष्करी हकूमशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांचे शासन असल्याने तेथे नेहमीच आणीबाणी सदृश स्थिती असते. 


श्रीलंकेत १९८३ सालापासन आणीबाणी लागू करण्यात आली. त्याला फक्त दिवंगत माजी पंतप्रधान प्रेमदास यांच्या काळातील सहा महिन्यांचा अपवाद होता. त्यानंतर पुन्हा आणीबाणी लागू करण्यात आली, नेपाळमध्येही माओवाद्यांचा हिंसाचार उसळल्याने राजे ग्यानेंद्र यांनी आणीबाणी जाहीर केली.


अमेरिका, श्रीलंका, नेपाळ या तीनही राष्ट्रात शिगेस पोहोचलेला दहशतवाद हे आणीबाणी लागू करण्याचे प्रमुख कारण होय. दहशतवादाचा सातत्याने सामना करणारा पण आणीबाणी जाहीर न करणारा भारत एकमेव देश आहे.


आज सर्वत्र इंटरनेटवर प्रसार केला जातोय. त्या नॉस्ट्रॉडॅमसच्या भविष्यानुसार जगाचा अंत जवळ आलायं का? या बद्दल आपण अनभिज्ञ आहोत. आज जिकडे तिकडे दहशतवाद पसरलाय. भारतात पाक घुसखोरांचा, श्रीलंकेत एलटीटीईचा, नेपाळमध्ये माओवादी लोकांचा अन् अमेरिकेत लादेनचा.


यापूर्वी इस्लामी दहशतवाद्यांनी १९९३ मध्ये न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला होता. त्यानंतरही अमेरिकेच्या चार प्रवासी विमानांचे अपहरण करून वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अमानुष हल्ला करून दहशतवाद्यांनी हजारो निरपराध लोकांचे प्राण घेतले. 

यावरून महासत्तेची सुरक्षा व गुप्तहेर यंत्रणा यांचे पोकळ स्वरूप लक्षात आले. वास्तविक पाहता संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनात दहशतवादाविरुद्ध संमत झालेल्या ठरावाची गंभीर दखल घेऊन अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरुद्ध आज जी ठोस कारवाई जाहीर केली आहे, 


तेव्हापासून ती अमलात आणली असती तर ११ सप्टेंबरचा गंभीर अनर्थ टळला असता. पाक-अफगाण सीमेवर सुमारे दहा हजार इस्लामी बंडखोरांना प्रशिक्षण देण्यात आल्याच्या वॉशिंग्टन पोस्टाच्या वृत्ताची दखल अमेरिकेने घेतली नाही. 

या प्रशिक्षित नराधम दहशतवाद्यांना पाकने काश्मिरात घुसवून तेथील लोकांना कमी करण्याचे एकच कार्य हाती घेतले आहे. युद्धशास्त्राचा प्रणता 'सुन झु' या चिनी तत्त्ववेत्त्याने २५०० वर्षांपूर्वी दहशतवादाची महत्ता विशद केली होती


एकाला मारा, दहा हजारांना भयभीत करा' युद्धप्रक्रियेत व इतर चळवळीत दहशतवादाचा अनेक उदाहरण दता यतील. परंतु केवळ तीन तासांच्या अवधीत साऱ्या जगाचे लक्ष्य वेधन घेणाऱ्या ११ सप्टबरच्या घटनेची सर त्यातील कोणालाच येणार नाही.


९ ऑगस्ट, १९४५ या दिवशी हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकून अमेरिकन दुसर महायुद्ध पूणतस आणले असले, तर ११ सप्टेंबर २००१ला विश्वव्यापार केंद्र व पेंटॅगॉनवर बेदरकार व अमानुष धाड घालून दहशतवादी लोकांनी एका नव्या जगव्यापी युद्धाची नांदी केली आहे. या दोन्ही दहशतवादी घटना तेवढ्याच विश्वव्यापक व दूरगामी आहेत.


जर जगातील स्वातंत्र्यप्रिय व मानववादी घटकांनी एकत्र येऊन वेळेतच या भेसूर, रौद्र आणि अक्राळ-विक्राळ शक्तीवर प्रहार केले नाहीत तर साऱ्या मानवतेला गिळंकृत करण्याची अचाट क्षमता त्यांच्यात आहे. निष्पाप लोकांचा लक्ष्य म्हणून दहशतवादी प्रामुख्याने उपयोग करतात.


तसेच दहशतवाद हे इतर पद्धतीपेक्षा कमी खर्चाचे व प्रत्यक्ष समोरासमोर न यता लढा देण्याचे दुय्यम तंत्र आहे. त्याद्वारे विकसनशील व अविकसित देशातील असंतुष्ट घटक विश्वातील महाशक्तींना आव्हान देऊ शकतात.


मानवाच्या अस्तित्वावरील या महान संकटाचा सामना धीरोदात्तपणे व एकजुटीने करणे गरजेचे आहे, जो समाज संत ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्या पांडुरंग भेटीच्या ब्रह्मांडात न्हाऊन निघत असेल, वीर सावरकर, स्वामी विवेकानद यांच्या देशभक्तीच्या पराक्रमाचे पोवाडे गात असेल, 


न्यूटन, अलेक्झांडर, फ्लेमिंग या शास्त्रज्ञांसारखा पेटंट मिळविण्यासाठी वेडे झालेला असेल, लता मंगेशकर, भीमसेन जोशी यांच्या सप्तसुरांच्या मैफलीत बेभान झालेला असेल आणि जीवन साकार, समृद्ध, सार्थ करण्यास युवा पिढी सिद्ध झालेली असेल तर तो खरोखर 'सोनियाचा दिनू' असेल.


असे तारुण्य, सळसळते रक्त आहे.  स्वतःला ओळखा, स्वतःची ओळख निर्माण करा. तू करू शकतोस, तू बनू शकतोस व तू बनवू शकतोस या आत्मशक्तीला प्रेरित ठेवा. ध्येय निश्चित करा प्रवाहाबरोबर सगळेच जातात, प्रवाहाविरुद्ध जातो, तोच 'मार्गदर्शक ठरतो. 


स्वतःतील 'स्व'चा विस्तार करा. पण यासाठी गरज आहे वेडे होण्याची, स्वतःला झोकून देण्याची जेव्हा तुम्हांला असे वेड लागेल तेव्हा तुमची मन:पूर्ती होईल. 'World Record' मध्ये वेड्यांनो क्षितिज तुम्हांला आव्हान करत आहे. स्वीकारा ते आव्हान...

"तू जिंदा है, तू जिंदा है,
 तू जिंदगीकी जीत पर 
यकीन कर अगर कहीं है 
स्वर्ग तो, उसे उतार लो जमीन पर''
मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद