कलावंत नसते तर मराठी निबंध | Kalavant Naste Tar Marathi Nibandh

 कलावंत नसते तर मराठी निबंध | Kalavant Naste Tar Marathi Nibandh

 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण कलावंत नसते तर मराठी निबंध बघणार आहोत. नुकतंच मान्यवर लेखिका ‘योगिनी जोगळेकर' लिखित 'रेषा' हे पुस्तक वाचण्यात आले. लेखिकेने लिहिले आहे की, “कलाकार फक्त कलेचाच ताबेदार असतो. आणि तो फक्त तिच्याच तालावर नाचत असतो. 


अचानक मनाने मला विचारलं, हे सारे कलावंत संपावर गेले तर....? बापरे! काय हा प्रश्न? कला हे जीवनाचे अविभाज्य अंग आहे. कलेशिवाय जीवन जगणं निरस ठरेल .


कलावंत त्याच्या कलेतून जगतो, वाढतो.... व बहरतो. कला आणि कलावंत दोन नसतातच मुळी! समाजात , जगात कलावंताचे स्थान मोलाचे आहे. त्यांनी संप पुकारला तर जीवनातलं सौंदर्य संपेल. वाळवंटासारखं रूक्ष जीवन हाती येईल. 


अप्रतिम, भव्य सौंदर्य जे कलेत ओपप्रोत भरलेलं आहे ते लुप्त होईल. मन प्रसन्न राहणार नाही. कागदी फुलातही सुगंध निर्माण करण्याचं सामर्थ्य कलेत आहे. कारण कला जन्म घेते हृदयात . हृदय व भावना यांचे अतूट नाते आहे. त्याला कल्पकतेची जोड आहे. वास्तव काय आहे. 


यापेक्षा ते वास्तव कलाकाराच्या कुंचलेत किंवा शब्दात किंवा कृतीत कसे बध्द झाले आहे. हे महत्त्वाचे आहे. ती अनमोल आनंदाची गुरुकिल्ली आहे. जीवनाचा मधुघट घडवितांना कलावंताची कला जादू करून जाते. झरझर बरसणारं सौंदर्य, आनंदाची पखरण, प्रसन्न वातावरण, एक वेगळंच रम्य विश्व याची प्रचीती मनाला येते. 


कला थकल्या-भागल्या जिवाचा विसावा आहे. मरगळलेल्या मृत मनासाठी ती अमृतमय संजीवनी आहे. माणूस मर्त्य असला तरी कला अमर असते. ती कला जो साकारतो त्याला तर अमर करतेच पण त्याचबरोबर ती ज्याला साकारते त्यालाही अमर करते. 


कलेचा आविष्कार म्हणजे 'सत्यम शिवम् सुंदरम्' यांचा मनोज्ञ मिलाफ होय. कलावंत संपावर गेले तर जीवनाचा प्रकाशच मावळेल. कारण कला जीवनाचा प्रकाश आहे. - साहित्य, नाटके, चित्रपट, चित्रप्रदर्शने, हस्तकलेचे नमुने, काव्य, ग्रंथ, नक्षीकामाची इतर कलानमुने ऐतिहासिक इमारती या सर्वांमध्ये कला ओतप्रोत भरलेली आहे. 


भूत, भविष्य आणि वर्तमान तिन्ही काळांकडे समर्थपणे पाहण्याची दृष्टी कलावंताकडे आहे. मोठा विषय छोट्या आशयातून व्यक्त करण्याची कला त्याच्याकडे आहे. त्यामुळे रूक्ष विषयही रंजक झाले आहेत. कलावंतांनी संप पुकारला तर स्नेहसंमेलने, नाटके, चित्रपट, आकाशवाणी, दूरचित्रवाणी सारेच बंद पडेल. 


कारण कलावंतामळेच त्यांचे अस्तित्व आहे. कला कोणतीही असो, ती सौंदर्य व प्रसन्नता घेऊनच अवतरते. ती प्रदीर्घ आहे. जीवनभर ती साथ देते. माणसातल्या गुणांचा ती विकास करते. कलेत लपवाछपवी नाही. 


ती सरळ सरळ हृदय उघड करते . कला चैतन्यमय आहे. मनाला हिरवेपण देण्याचे कसब कलेत आहे. कलेतून अव्यक्त मनही व्यक्त होते. जीवन निर्मल , सुंदर, आनंदमय बनत जाते. वेळेचा सदुपयोग केला जातो. 


या विश्वाला सुंदर बनविण्यात कलावंताचा मोठा वाटा आहे. लेण्या, प्राचीन मंदिरे , ऐतिहासिक स्मारके आजही या गोष्टीची साक्ष देत आहेत . मन म्हणू लागले "स्वर रूसले, संगीत लोपले, झंकारली वीणा शब्द गोठले, सौंदर्य हरवले, कागद झाला सुना रंग विरले, कुंचलेविण चित्रही मावळले 


आनंद जन्मेना विश्वि आता, कलावंत हे रूसले! नाही अभिनय, नाही चित्रकारी नाही बासुरी-तबला , नाही संगीतलहरी आनंद लोपला, कृत्रिम जीवन झाले. अवचित घडले कसे, कलावंत संपावर का गेले?" 


कलेला जन्म देऊन कलावंत स्वतः जेवढा आनंदी होतो त्यापेक्षा कित्येक पटीने तो त्या कलेच्या रूपाने दुसऱ्यांना अधिक आनंद प्रदान करीत असतो. कलेची किंमत पैशात करता येत नाही. 


हल्ली बाजारात कलेचाही व्यापार होतो. ही शोकांतिका आहे. कलेची खरी कदर केली गेली तर कलावंत संपावर जाणार नाहीत. कलेशिवाय ते जगूच शकत नाहीत आणि त्यांच्या या कलेनेच आपणही जीवनात आनंदाचे नंदनवन फुलवित असतो.   पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध 2 

कलावंत नसते तर मराठी निबंध | Kalavant Naste Tar Marathi Nibandh


पाण्याचा थेंब तव्यावर पडला की उष्णतेने नाहीसा होतो. जमिनीवर पडला तर तो जमिनीत मुरतो. याउलट तोच थेंब पहाटेच्यावेळी झाडांच्या पानावर पडल्यास मोत्याप्रमाणे चकाकतो. शिंपल्यात पडल्यास मोतीच बनतो. परिसस्पर्श होताच लोखंडाचे सोने बनते तद्वतच आपल्या जीवनाला कलावंताचा परिसस्पर्श होताच जीवन उजळून निघते.



दररोज कोणी ना कोणी संपावर जात असतो. त्याचप्रमाणे अनेक कल्पना सूचनाऱ्या व सर्वांचे जीवन खुलवून स्वर्गसुखाचा आस्वाद देणाऱ्या या कलावंताना संपावर जाण्याची कल्पना सूचली तर..... किंवा कलावंतर संपावर गेले तर......


“आम्हला वगळा - गतप्रभझणी होतिल तारांगणे

आम्हाला वगळा - विकेल कवडीमोलावरी हे जिणे!”


या केशवसुतांच्या काव्य ओळींप्रमाणे या स्वर्गाचे नरकात रूपांतर व्हायला फारसा वेळ लागणार नाही. कारण चांगल्याचे वाईट व्हायला काहीच वेळ लागत नाही. कलावंताचे संपावर जाणे म्हणजे कलावंत नसणे त्यामुळे कला पोरकी होईल. सौंदर्य कोमलता, भव्यता, दिव्यता, अप्रतिमता शब्द माणसांच्या शब्द कोशातून निघून जातील.



माणसाचं जीवन वाळवंटाप्रमाण रूक्ष, खिन्न, नीरस आणि एकाकी बनेल. कारण प्रत्येक क्षेत्राला परिसासम हात लावणारे कलावंतच आहेत. केवळ साहित्य, काव्य, नाटके, कादंबऱ्या, कथा, ग्रंथच नव्हे तर इमारती, मंदिरे जगातील आश्चर्यकारक रूप देणारे कलावंतच आहेत.



पिरॅमिड, चीनची भींत, झुलता मनोरा, हवेत टांगलेला बाग, ताजमहल, बेबिका मकबरा, कुतुबमिनार, वेरूळ-अजिंठा लेण्या या सर्व गोष्टी आपल्याला आश्चर्यच वाटतात पण हे तर कलावंताना सहज हातात कुंचला घेऊन रेष ओढावी त्यातून सुंदर चित्र तयार व्हावे तसे सहज साध्य झालेले आहे. 


त्यांच्या तो हाताचा मळच आहे. कलावंत वाळूचे कण रगडून तेल काढू शकतात. म्हणजेच नसलेल्यांना सौंदर्य प्राप्त करून देतात. अथवा रूक्ष वाटणाऱ्या स्थळाला सौंदर्याची बहर आणण्याचे सामर्थ्य त्यांच्यात असते. कलावंताच्या शब्दांनी दगडालाही पाझर फुटतो आणि म्हणूनच तर कवी विंदा करंदीकर म्हणतात,


“ऊन हिवाळ्यातील शिरशिरता

स्थितप्रज्ञ काळ्यादगडावर मला वाटते क्षणभर फुटतो

दगडाला इच्छेचा अंकुर”


असे सामर्थ्य कलावंतामध्ये असते. तेच जर नसतील तर सर्वच अनर्थ होईल. जीवनात, कलावंताच्या कलेतून जीवन जगण्यासाठी क्षणाक्षणाला मिळाणारे प्रोत्साहन, चैतन्य नष्ट होईल. चंद्रावरून आलेल्या शास्त्रज्ञांनी सांगितले. चंद्र भाजलेल्या पापडासारखा आहे. 


तिथे सुधा कुठली, साधे पाणी सुद्धा नाही. वातावरण नाही. कुसुमाग्रजांनी याला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांचा चंद्र वेगळा, आमचा चंद्र वेगळा आहे. आमचा चंद्र स्वप्नांचा सौदागर आहे. कलावंत संपावर असल्याने हे काहीच घडणार नाही. चित्रपट, नाटके, दूरदर्शन, आकाशवाणी हे सारेच बंद पडेल. 


जीवनातील ओलावा, हास्य संपेल. एक प्रकारे जीवनातील अस्तित्वाचाच शेवट होईल. एखाद्या उजाड माळरानावर जनावरे शांत रवंथ करण्याविना बसावित तशी माणसं जीवन संपुष्टात आल्यासारखी रूक्ष होवून बसतील. 



त्यांच्यातील ओलावा नष्ट झाल्याचे जाणवू लागेल. कृत्रीम जीवन जगण्याखेरीज त्यांच्यावर पर्याय राहणार नाही. एकटेपणाची सवय लागेल. विचारांच देवाण घेवाण थांबेल. निसर्गसृष्टी जिवंत असूनही नष्ट झाल्यासारखी वाटेल.
कलावंताजवळ अचाटबुद्धी सामर्थ्य, इतरांना प्रसन्न करणारा ताजा कला नैवैद्य, तिन्ही काळातून आरपार पाहू शकणारी दृष्टी, सामान्यांजवळ नसलेली व प्रत्येक गोष्टीतून चांगलेच घेण्याची प्रवृत्ती कलावंताजवळ असते. 


ते संपावर जाणे म्हणजे अचाटशक्तीचे पुळचट प्रयोग करण्यासारखे नव्हे काय ? पण..... त्यांनाच राहवेल काय? त्यांचीच स्थिती अवघड बनेल. लतामंगेशकरला गाण्यावाचून, झकीर हुसेनला तबला वाजवण्यापासून, चित्रकार हुसेनला हातात कुचला घेतल्याविना, गोविंदा, ह्रतिक रोशनला अभिनय केल्यावाचून एवढेच नव्हेत तर.....


सत्तरीकडे चाललेल्या अमिताभलासुद्धा अभिनयावाचून राहवेल काय? नक्कीच ते संप मागे घेवून या सृष्टीत स्वर्ग निर्माण करतील. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद