ग्रामीण जीवनातील समस्या मराठी निबंध | GRAMIN JIVANATIL SAMSYA ESSAY MARATHI

ग्रामीण जीवनातील समस्या मराठी निबंध | GRAMIN JIVANATIL SAMSYA ESSAY MARATHI

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण ग्रामीण जीवनातील समस्या मराठी निबंध बघणार आहोत. 

मददे : 

महात्माजींचा तरुणांना संदेशखेड्यांच्या समस्या

रोजगाराचा अभाव

 शेतमालाला उठाव नाही

दलालांची दादागिरी

मूलभूत गरजाही भागत नाहीत

 पाण्याचा अभाव

 वैदयकीय सेवा उपलब्ध नाहीत

शहरी चैनींचे आकर्षण अज्ञान, अंधश्रद्धा 

 धनिकांकडून पिळवणूक

 जातीय विषमतेचे स्तोम

 यावर मात करण्यासाठी सामाजिक संस्था 


समाजसेवक यांची आवश्यकता महात्मा गांधीजींनी 'खेड्यांकडे चला' असा संदेश दिला होता. त्या वेळी काही ध्येयनिष्ठ तरुण खेड्यांकडे वळलेही; पण स्वातंत्र्यानंतरची पासष्ठ वर्षे उलटून गेल्यावर आज भारतीय खेड्यांचे रूप कसे आहे? दिवसेंदिवस खेड्यांकडून शहरांकडे माणसांचा ओघ वाढत चालला आहे. 


शहरे लोकसंख्येने अवास्तव विस्तारत आहेत आणि खेडी ओस पडत आहेत. ती अधिकाधिक दरिद्री बनत चालली आहेत. असे का? अशा कोणत्या समस्या आहेत ग्रामीण जीवनाच्या? आज शहरांत भयंकर गर्दी, जागेचा व पाण्याचा तुटवडा, प्रदूषणाची भेसूर समस्या, अपघात, हिंसा यांची सततची टांगती तलवार... असे असतानाही लोकांचे लोंढे खेड्यांकडून शहरांकडे का वळतात? 


चटकन उत्तर मिळते 'पोटासाठी.' ज्याचे गावात शेत नाही वा मळा नाही त्याला गावात रोजगार नाही, ही ग्रामीण भागातील सर्वांत मोठी समस्या आहे. पूर्वीची बलुतेदारी नष्ट झाली, पण त्याला पर्यायी उदयोग उभे राहिले नाहीत. एखादया छोट्याशा शेतकऱ्याने कष्टाने एखादे पीक काढले, तर त्याला गावात योग्य भाव मिळत नाही. 


मग त्याला पडेल भावाने तो माल विकावा लागतो किंवा एखादया दलालामार्फत माल शहरात पाठवावा लागतो. शेतकऱ्याचा सगळा फायदा दलालच खातो. ग्रामीण भागात आवश्यक सुधारणा पोहोचू शकल्या नाहीत. कित्येक गावांत पाण्याची कायम टंचाई असते. वाहतूक व्यवस्था, दळणवळणाची साधने यांचा पूर्ण अभाव असतो. 


शाळा, महाविदयालय या शैक्षणिक सुविधा नसतात. कित्येक खेडेगावांत रुग्णालये सोडाच, पण वेळप्रसंगी डॉक्टरही उपलब्ध नसतो. शहरात आज मनोरंजनाची साधने विपुल आहेत. स्वाभाविकच तरुण पिढीला याचेच आकर्षण असते. मग ते खेड्यांतून शहरांकडे पळतात. गावे माणसांशिवाय ओस पडतात.


ग्रामीण जीवनातील काही समस्या या तेथील लोकांच्या अज्ञानातून, अंधश्रद्धेतून निर्माण होतात. गावातील एखादया धनिकावर, सावकारावर वा त्याच्या मर्जीवर गावातील गरिबांचे जीवन अवलंबून असते. ग्रामीण जीवनात अजून जातपात, स्पृश्यास्पृश्यता यांचे प्रस्थ आहे. 


शहरात येऊन शहरी वातावरणाचा लाभ घेऊनही आपापल्या गावी गेल्यावर हेच लोक पुन्हा आपली जात, धर्म, पारंपरिक चालीरीती सांभाळत राहतात. या साऱ्या दुष्टचक्रातून ग्रामीण समाजाला मुक्त करायचे असेल तर समाजसेवी संस्थांनी आणि सेवाभावी युवकांनी ग्रामीण जीवनाच्या ज्वलंत समस्या सोडवण्यात पुढाकार घेतला पाहिजे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद