कवि शब्द सृष्टीचे ईश्वर मराठी निबंध | KAVI SHABDH SUSHTICHE ISHVAR ESSAY MARATHI
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण कवि शब्द सृष्टीचे ईश्वर मराठी निबंध बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून 3 निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. भोज प्रबंधामध्ये कवी बल्लाळ यांनी सुरस कथा वर्णन केली आहे. भोजराजाच्या सभेत कालिदासाला ठठं ठठवं तळतं ठठष्ठंः। हा चवथा चरण दिला निरर्थक अक्षरांचा, परंतु कवी म्हणजे शब्दसृष्टीचे ईश्वर व कालिदास तर कविकुलगुरु! त्याने लगेच सुरुवातीचे तीन चरण रचून समस्या पूर्ण केली.
रामाभिषेके जलम् आहरन्त्याः ।
हस्तात् च्युतः हेमघट: युवत्याः।
सोपानमार्गेण करोति शद्वं।
ठठं, ठठष्ठः, ठठठं, ठठष्ठठ॥
रामाला अभिषेक करण्याच्या प्रसंगी पाणी आणणाऱ्या एका युवतीच्या हातून सोन्याचा घडा निसटून पडला. तो पायऱ्यावरून आवाज करीत गेला- ठठं- ठठष्ठंः, ठठठं, ठठष्ठः। "कविता करणे' येरागवाळ्याचे काम नाही. केशवसुत सांगतात
"कविता म्हणजे आकाशातली वीज आहे. तिला धरू पाहणारे नळ्याणऊजण होरपळून जातात.' शंभरात एखादाच खरा कवी निर्माण होतो. Poets are born, not made! अलौकिक काव्यशक्ती असणारा कवी शब्दसृष्टीची शब्दांनी पूजा बांधणारा भक्त व ईश्वरही. तुकाराम महाराजांनीही म्हटलं आहे. शचि आमुच्या जीवाचे जीवन !
या जगात महाकवी व्यास, कालिदास, वाल्मिकी, वर्डस्वर्थ, टेनिसन, केशवसुत, कुसुमाग्रज, यशवंत, भा. रा. तांबे. असे प्रतिभाशाली कवी नसते तर? हे जीवन किती नीरस, रुक्ष वाटले असते. केशवसुत ठणकावून सांगतातच आम्हाला वगळा गतप्रभ झणी होतील तारांगणे. आम्हाला वगळा विकेल कवडीमोलावरी हे जिणे!
कवी आपल्या प्रतिभेच्या बलावर आकाशात विहार करतात व दिक्कालाला भेदन त्याच्याही पलीकडच्या गोष्टी पाह शकतात. कवी संवेदनाशील असतात, म्हणून साध्याही गोष्टीत- विषयात त्यांना आशय सापडतो. म्हणून बालकवींसारखे कवी एका उमलत्या कळीला नववधू समजून सूर्यकिरणाबरोबर, तिच्या विवाहाचा रम्य
सोहळा शब्दांनी उभा करतात. बुद्धीला खाद्य व मनाला शांती देतात, कवीचे अंत:करण कोमल असते, हृदय उललेले, फाटलेले विदीर्ण झालेले असते म्हणूनच त्यांच्या हृदयातून spontaneous overflow of feelings उत्स्फूर्त भावनावेग बाहेर पडून करुण, वीर, शृंगार किंवा हास्यरसाचे फवारे रसिकांवर उडू लागतात.
रसिक त्यात न्हाऊन तृप्त होतात. पोर खाटेवर, क्षणोक्षणी उठे, भेटून नऊ महिन्यांनी किंवा गर्जा जयजयकार, जयोस्तुते श्री महन्मंगले, कोठून हे आले येथे, काल संध्याकाळी नव्हते-' इ. कवितांच्या ओळी रसिकांच्या हृदयात ठाण मांडून बसतात. त्याला आनंद देतात, रंजन करतात, धुंद करून सोडतात.
कवी शून्यातून सुरेल संगीत निर्माण करतात. पावित्र्य, मांगल्य यांचे दर्शन घडवतात. मनातील अर्थ, भाव, नीटनेटक्या शब्दाने मांडतात. बाल्यातील उत्छंखल वृत्ती, तारुण्यातील उंच पहाड, वार्धक्यातली खोल दरी कवीच्या प्रतिभेला अडथळा करू शकत नाही.
रूपगर्वितेसारखी ती धावत जाते. कवी शदूसृष्टीचे शिल्पकार आहेत. ईश्वर आहेत. भर्तृहरीने नीतिशतकात कवींविषयी काढलेले उद्गार किती सार्थ आहेत.
जयन्ति ते सुकृतिन: रससिद्धाः कवीश्वराः।
नास्ति येषां यश: काये जरामरणजं भयम्॥
(ज्यांच्या कीर्तिरूपी शरीराला म्हातारपण व मृत्यू यांचे भय नसते, असे हे पुण्यशील [नवरस] रस निर्माण करण्यात सिद्धी मिळालेले श्रेष्ठ कवी जयशाली असतात.) श्रेष्ठ, रसपूर्ण वाङ्मय व ते निर्माण करणारे कवी अजरामर असतात! मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
निबंध 2