अंधविश्वास मराठी निबंध | Andhvishwas Marathi essay.

 अंधविश्वास  मराठी निबंध | Andhvishwas Marathi essay

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  अंधविश्वास  मराठी निबंध बघणार आहोत.  आजचे युग विज्ञान व संगणकाचे युग आहे. मानवाने चंद्रावर विजय प्राप्त केला आहे. लवकरच तो दुसऱ्या ग्रहांवरही जाऊ शकेल. वाहतूक आणि संचाराच्या आधुनिक साधनांनी संपूर्ण जगाला एका विश्व ग्रामात रूपांतरित केले आहे. असे असले तरी मानव अंधविश्वासूच आहे. 


त्याचा आजही मंत्र तंत्र जादू टोण्यावर, शकुना-अपशकुनांवर विश्वास आहे. प्रत्येक काम सुरू करण्यापूर्वी पुजारी, पंडे, बडवे आणि तांत्रिकाचा सल्ला घेतला जातो. तांत्रिक, मांत्रिक, पुजारी, ज्योतिषी, बुवा आणि देवांचा जणू पूर आला आहे. रोज कुणी ना कुणी नवा, स्वामी, भगवान उगवतात. 


आधुनिक युगातही लोक आपल्या संकटातून मुक्त होण्यासाठी ग्रह-नक्षत्रांवर अवलंबून राहतात आणि फसवेगिरी करणाऱ्या तांत्रिक, मांत्रिकांच्या आहारी जातात. ही मोठी नवलाची गोष्ट आहे.


• अंधविश्वासाचे मूळ कारण आहे अशिक्षितपणा. अंधविश्वासाबरोबरच वाईट रूढी, गरिबी, मागासलेपणा, कुप्रथा, धर्मांधता इत्यादी गोष्टीही उत्पन्न होतात. वृक्ष आणि दगडांची पूजा, ताईत घालणे, शकून विचारणे, अज्ञात आणि अनामिक शक्तींना घाबरणे, स्वप्नांवर विश्वास ही काही अंधविश्वासाची उदाहरणे होत. 


सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, धूमकेतू दिसणे, तारे तुटताना दिसणे यामुळे आजही लोक भयभीत होतात. कामाला जाताना मांजर आडवी गेली तर अपशकून समजतात. कुणाचे शिंकणे, घुबडाचा घुत्कार, गाढवाचे ओरडणे अपशकुनी समजतात व लोक त्याला घाबरतात. 


याचा फायदा समाजातील धूर्त लोक घेतात. दुर्दैव, असुरक्षितता, अज्ञात आणि प्रतिकूल शक्तींची लोकांना सतत भीती वाटत राहते. हे सर्व आपले अज्ञान, अशिक्षितपणा, मानसिक विकृती आणि संकुचित विचारांच्या परिणामामुळे घडते. 


जेव्हा एखाद्या घटनेची कारणे, परिणाम आपल्याला समजू शकत नाहीत तेव्हा आपण त्याला रहस्यमय, दैवी आणि अनैसर्गिक, अमानवी समजून घाबरतो. त्याचा फायदा घेऊन तांत्रिक, मांत्रिक, पुजारी सहजपणे आपला स्वार्थ घेतात व पैसा कमावतात.


साधून अज्ञान आणि शास्त्रीय विचारांचा अभाव हे अंधविश्वासाचे जनक आहेत. वाईट चाली, अशिक्षितपणा, अफवा यामुळे ते अधिक भयावह बनते. लोकांची विचार शक्ती कुंठित होते आणि म्हणून ते योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे सामाजिक विकास थांबतो. 


अंधविश्वास व्यक्तीच्या मनोबलाचा आणि आत्मविश्वासाचा विनाश करतो. अंधविश्वासामुळेच धर्माच्या नावावर लोक, असहिष्णु, हिंसक, धर्मांध बनतात. परिणामी समाजात अराजकता, धार्मिक द्वेष आणि फुटीर वृत्ती उत्पन्न होते. अंधविश्वास आणि दुराचरण या एकाच नाण्याच्या दोन बाजू बाहेत. एकाचे निराकरण झाले की दुसऱ्याचे निराकरण आपोआपच होते. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद