कथनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कथनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

दुष्काळी कामावरील एक प्रसंग मराठी निबंध

Dushkal Ek Bhishan Samasya Marathi Nibandh


दुष्काळी कामावरील एक प्रसंग मराठी निबंध लिहीताना आठवण येते ती त्‍या वर्षी पडलेल्या दुष्‍काळाची,  त्‍या वर्षी राज्यातील पंधरा जिल्हयांत दुष्काळ जाहीर केला गेला होता. सातत्याने दुष्काळ पडण्याचे हे चौथे वर्ष होते. रखरखीत उन्हामुळे आणि पाण्याचा अंशही कोठे न राहिल्याने जमिनीला सर्वत्र भेगाच भेगा पडल्या होत्या. सगळीकडे दुष्काळी कामे सुरू केली गेली होती. त्या दुष्काळी कामांवरचा मुख्य अधिकारी म्हणून माझ्या वडिलांची नेमणूक झाली होती. त्यामुळे बाबांचा सतत दौरा चालू असे.


सुट्टीचे दिवस म्हणून मीही रिकामटेकडा होतो. सतत महिनाभर सुट्टी असल्याने दिवस अगदी कंटाळवाणे झाले होते. शेवटी एक दिवस बाबांच्या जीपमध्येच जाऊन बसलो. मला पाहून बाबा म्हणाले. “अरे, त कशाला येतोस? तेथे काहीही पाहण्यासारखे नाही. दुष्काळामळे सारा प्रदेश उजाड, भगभगीत झालेला आहे." पण आज मी ठरविलेच होते की आपण बाबांबरोबर जायचेच.

dushkal ek bhishan samasya marathi nibandh
dushkal ek bhishan samasya marathi nibandh

बाबा वाटेत दुष्काळाच्या तीव्रतेचे वर्णन करीत होते आणि जागोजाग त्याचे दर्शन घडतच होते. तृषार्त वसुधा डोळे वटारलेल्या भगवान सहस्ररश्मीकडे काकुळतीने पाहत होती. वाटेत लागणाऱ्या वस्त्यांतील हवालदिल माणसे, त्यांच्या हातापायांच्या झालेल्या काड्या, खपाटीला गेलेली पोटे, रिकामे गोठे दुष्काळाच्या लीला मूकपणे दाखवीत होते. एका ठिकाणी मोठे मोठे पक्ष घिरट्या घालताना दिसत होते. 

बाबा म्हणाले, “जनावर मेलेलं दिसतंय!" थोडे पुढे गेलो तर पक्ष्यांनी खाऊन उरलेल्या एका जनावराचा मोठा सांगाडा पडला होता. मनात आले, या अवर्षणरूपी असुरापुढे भेदभाव नाही. माणसे, जनावरे, पक्षी सारेच याला सारखे. माणसाला आपल्या विद्वत्तेचा केवढा गर्व; पण निसर्ग पुनः पुन्हा त्याला जाणीव करून देतो, “अरे तुझ्या जीवनाच्या साऱ्या नाड्या माझ्या हातात आहेत बघ!"

दुष्काळी काम म्हणून एका ठिकाणी रस्ता बांधण्याचे काम चालू होते. हजारो माणसे कामात गुंतलेली होती. त्यांतील काही खडी फोडण्याचे काम करीत होती. जीप थांबली आणि बाबा खाली उतरले; तशी दहा-बीस माणसे त्यांच्या पाया पडू लागली, क्षणभर मला प्रश्न पडला की अशी कोणती आगळीक झाली आहे या लोकांकडून? मग लक्षात आले की, ते बाबांकडे कामाची मागणी करीत आहेत. “साहेब, काम दया, पोटाला दया,” असे केविलवाण्या शब्दांत ते विनवीत होते. माणसांची ही दयनीय स्थिती पाहून माझे मन सुन्न झाले.

बाबा दुष्काळी कामाची पाहणी करीत होते. तेथील मुकादमाला आणि इतर अधिकाऱ्यांना कामाच्या प्रगतीबाबत विचारणा करीत होते. इतक्यात दूरवर काहीतरी गडबड झाली म्हणून आम्ही तेथे गेलो तर काम करणारी एक स्त्री बेशुद्ध होऊन पडली होती. ती स्त्री गरोदर असावी. तात्पुरत्या उपायाने ती शुद्धीवर येईना, तेव्हा तिला जवळच्या गावातील सरकारी दवाखान्यात न्यायचे ठरले. दुसरे काही वाहन नसल्यामुळे आमच्या जीपमधून न्यायचे ठरले. "हिचे नात्याचे कुणी आहे का येथे?" बाबांनी पुनःपुन्हा विचारले, पण कोणीही पुढे आले नाही. तेव्हा तेथील एक सामाजिक कार्यकर्ता जीपमध्ये बसला.

गाडी पुढे निघाली तेव्हा त्या साऱ्या दृश्याने मी अगदी हबकूनच गेलो होतो. पण खरा धक्का मला पुढेच बसला. दवाखाना आला तेव्हा त्या बाईला डॉक्टरच्या स्वाधीन करून आम्ही तेथील डाकबंगल्यावर गेलो तेव्हा तो समाजसेवक बाबांना म्हणाला, “दादासाहेब, तुम्हांला काही गोष्टी सांगायच्या आहेत. तुमच्या या कामावरचे मुकादम मजुरांना अत्यंत छळतात. 

त्यांना मिळणाऱ्या चार-पाच रुपये मजुरीतील प्रत्येकी एक-एक रुपया हे राक्षस कापून घेतात. मजुरांना देण्यात येणाऱ्या धान्यापैकी माप-माप काढून घेतात आणि हजारो रुपये कमावतात. पण हे गरीब लोक परिस्थितीने एवढे हवालदिल झाले आहेत की ते त्यांच्याविरुदध काही बोल शकत नाहीत. आता ही जी बाई बेशुद्ध पडली तिचा नवरा तेथे कामावर होता. पण रोज बुडेल म्हणून त्याने आपली ओळख दिली नाही वा तो बाईबरोबर आलाही नाही.”

हे सारे ऐकून माझे मन अगदी सुन्न झाले. वाटले, दुष्काळाने माणसाला केवढे हे निष्ठूर बनविले आहे!

टीप : वरील निबंध दुष्काळी कामावरील एक प्रसंग मराठी या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते
  • दुष्काळ एक समस्या निबंध
  • दुष्काळ एक आपत्ती निबंध मराठी
  • दुष्काळ एक भीषण समस्या निबंध मराठी
  • पाण्याचा दुष्काळ निबंध मराठी
  • dushkal padla tar marathi nibandh
  • dushkal che parinam marathi nibandh

दुष्काळी कामावरील एक प्रसंग मराठी निबंध | Dushkal Ek Bhishan Samasya Marathi Nibandh

माझे आवडते पुस्तक निबंध मराठी | My Favourite Book Essay In Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो तुमचे स्‍वागत आहे आमच्‍या ब्‍लॉगवर. आज आपण  माझे आवडते पुस्तक निबंध मराठी बघणार  आहोत. या निबंधामध्‍ये लेखकाने आपल्‍या आवडत्‍या पुस्तकाचे वर्णन केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 

माझे आवडते पुस्तक निबंध मराठी लिहीताना आठवण येते ती उन्‍हाळ्याच्‍या  सुट्टीची, दरवर्षी वर्षी सुट्टी लागली की मी माझ्या आवडत्या छंदाचे लाड पुरवून घेतो. म्हणजे मी 'ग्रंथालयाचा सभासद' होतो आणि मनसोक्तपणे पुस्तके वाचून काढतो. सुट्टीतील माझ्या या अवांतर वाचनावर कुणाचा आक्षेप नसतो. 

उलट आई कौतुकाने सांगते, “आमच्या बाळ्याचा सुट्टीत काही त्रास नसतो. तो आणि त्याची पुस्तके." खरोखर पुस्तके असली की वेळ कसा जातो ते कळतही नाही. या वर्षी मी अनेक पुस्तके वाचली. या सर्व पुस्तकांत एका पुस्तकाने माझ्या मनात कायमचे स्थान मिळविले आहे. ते पुस्तक आहे गोदावरी परुळेकर यांचे 'जेव्हा माणूस जागा होतो ."

 या पुस्तकाला शासनाचा पुरस्कार मिळाला होता, म्हणून ते वाचावयाचे असे मी ठरविले होते पण ग्रंथालयात मला त्या पुस्तकासाठी क्रमांक लावून काही दिवस थांबावे लागले. जेव्हा ते पुस्तक घेऊन मी घरी आलो आणि वाचावयास सुरुवात केली तेव्हा त्या पुस्तकाचे शेवटचे पान वाचल्यानंतरच मी ते खाली ठेवले. नंतरही दोन वेळा मी ते पुस्तक वाचले.

'जेव्हा माणूस जागा होतो...' ही काही एखादी कादंबरी नाही, किंवा काव्यसंग्रहही नाही. तरी देखील ते पुस्तक आपल्या मनाला भिडते. कारण ती एक सत्यकथा आहे. एका वसाहतीची ती हृदयस्पर्शी कहाणी आहे. या पुस्तकाची लेखिका प्रस्तावनेतच सागून टाकते की, ती काही स्वतः नाणावलेली लेखिका नाही. तरी पण हे पुस्तक उत्कृष्ट उतरले आहे. कारण त्या कादंबरीतील क्षणन् क्षण लेखिका स्वतः जगली आहे.

maze avadte pustak nibandh in marathi
maze avadte pustak nibandh in marathi

लेखिका गोदावरी परुळेकर यांचे बालपण व शिक्षण पुण्यात पार पडले. पण कॉ. परुळेकरांबरोबर राजकीय-सामाजिक कार्य करताना त्यांना या डोंगरकपारीतील आदिवासींची व्यथा जाणवली; त्यांची गुलामावस्था पाहिली म्हणून त्यांनी त्यांच्यातील माणूस जागा केला. या आपल्या साऱ्या कामगिरीचा वृत्तान्त त्यांनी या पुस्तकात सांगितला आहे-अगदी साध्या, सोप्या, रसाळ भाषेत.

आदिवासींचे जीवन किती कष्टप्रद आहे, हे सांगताना त्यांनी कोंड्याची भाकर व अंबाडीच्या भाजीचे केलेले वर्णन आपल्याला खूप काही सांगून जाते. चहा कसा करतात हेही त्या वारल्यांना माहीत नव्हते. 'लग्नगडी' व 'वेठीच्या आसा'चा फेरा या परंपरागत रूढी म्हणजे जमीनदारांच्या निपुणतेचा पुरावाच आहे. लेखिकेला पहिले काम करायचे होते ते आदिवासींच्या मनातील दुबळेपणा काढून टाकायचे. वर्षानुवर्षांचा जुलमी छळ अंगवळणी पडल्यामुळे ते दुबळे झाले होते;

 त्यांचा आत्मविश्वास हरवला होता. लेखिकेने त्यासाठी त्यांना संघटित केले. त्यांच्यातील आत्मविश्वास फुलविला. पुस्तकाच्या अखेरीस हाच आदिवासी ‘खऱ्या अर्थाने माणूस' होऊन जमीनदारांच्या विरुद्ध बंड करावयास उभा ठाकलेला आपल्याला दिसतो.

या पुस्तकाची विशेषता मला जाणवली ती अशी की, समाजातील हा प्रश्न इतका महत्त्वाचा असूनही समाजातील बहुसंख्यांना त्याची काही माहितीही नव्हती. आदिवासींची पिळवणूक चालते असे आम्ही ऐकतो, बोलतो; पण ही पिळवणूक किती अमानुष रीतीने चालते, कशी चालते याची खरीखरी कल्पना हे पुस्तक आपल्याला आणून देते. आदिवासी हा अशिक्षित आहे. 

अंधश्रद्धेत गुरफटलेला आहे असे आपण मानतो; पण त्याच्या मनातील माणूसही मोठा आहे हेही आपल्याला येथे दिसते. पकडवॉरन्ट असलेली गोदामाई त्यांच्या घरी आली तेव्हा तिला पोहोचविण्यासाठी या आदिवासींनी आपल्या प्राणांची बाजी लावली. कधी त्यांनी तिला आपली 'म्हातारी माय' मानली; तर कधी तिला आपली 'माहेरवाशीण' बनविली

'जेव्हा माणूस जागा होतो...' या पुस्तकाला बक्षीस देऊन सरकारने एका परीने लेखिकेचाच यथोचित गौरव केला आहे. प्रत्येकाने संग्रही ठेवावे असेच हे पुस्तक आहे. आणि म्हणूनच ते माझे विशेष आवडते आहे.

टीप : वरील निबंध माझे आवडते पुस्तक निबंध मराठी या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते

  • mi vachalele pustak marathi nibandh
  • mla aavdlele pustk
  • mala award lele pustak nibandh

माझे आवडते पुस्तक निबंध मराठी | My Favourite Book Essay In Marathi

शाळेतील माझा पहिला दिवस मराठी निबंध | Shalecha Pahila Divas In Marathi Essay



NIBANDH 1 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आमच्‍या ब्लॉगवर तुमचे स्‍वागत आहे, आज आपण शाळेतील माझा पहिला दिवस मराठी निबंध | Shalecha Pahila Divas In Marathi Essay या विषयावर निबंध  बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून 5 निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता.
शाळेच्‍या पहील्‍या दिवसाची उत्‍सुकता सर्वानाच असते तेथील वातावरण, इमारत परिसर हे सर्व पहील्‍या दिवशी नवीनच असते, त्‍या परीस्‍थीतीसोबत जुळवुन घेण्‍यात वेगळीच गंमत असते अश्‍याच प्रंसगाचे वर्णन या निबंधात करण्‍यात आले आहे. चला तर मग निबंधाला सुरूवात करूया.    

जीवन म्हणजे एक लांबलचक प्रवासच आहे. आगगाडीतल्या प्रवासासारखा ! अनेक वळणं येतात या प्रवासामध्ये! माझ्या आयुष्यातही असंच एक वळण आलं होतं दहा वर्षांपूर्वी. त्यावेळी मी ६ वर्षांची होते. बालमनाची नाजूक अवस्था! स्वच्छंदपणे मुक्त विहार करणाऱ्या पक्ष्यालाही लाजवेल असं आयुष्य वहात होतं. 

असं माझं अल्लड अवखळ बालपण उपभोगत होते मी ! अन् एके दिवशी 'शाळेत जायचं' हे वारं आमच्याही घरात शिरलं. मुळात मी खूप घाबरले. कारण खूप काहीबाही ऐकलं होतं ना शाळेबद्दल ! तरी आईने नवीन कपडे आणले. बाबांनी बूट आणले. नवीन डबा, वॉटरबॅग, नवीन दप्तर! अन् आमची स्वारी तयार होऊन बाबांचं बोट धरून शाळेत निघाली. 

पण! पण माझं सारं स्वातंत्र्य हिरावून घेणारा होता तो क्षण ! त्या इवल्याशा मनामध्ये भीती अन् आश्चर्य यांचं भांडण  चाललं होतं. प्रथम मला नेलं ते हेडमास्तरांकडे. त्यांना पाहून मला बागुलबुवाची आठवण झाली. माझं नाव विचारल्यावर मी तत्परतेनं सांगितलं. नाव नोंदणी झाली आणि बाबांनी मला माझ्या वर्गात (की कोंडवाड्यात) सोडलं. तिथे आमच्या बाई उभ्या होत्या. किती गोड! हसऱ्या! त्यांच्या त्या नजरेनंच माझ्यात वर्गात पाऊल टाकण्याचं धैर्य झालं. 

पण वर्गात माझं स्वागत झालं ते बावरलेल्या चेहऱ्यांनी आणि हुंदक्यांनी ! काहींनी तर तारसप्तकात सूर लावला होता. झाडाच्या फांदीवर चिमण्या बसाव्यात तशी पोरे बाकावर एकमेकाला बिलगून बसली होती. भित्र्या डोळ्यांनी ससा बघतो तशी आजूबाजूला बघत होती तर काही बांधावरचे कोवळे गवत उघड्या वाऱ्यात कापते ना तशी थरथर कापत होती! थोड्याच वेळात मीही त्यांच्यातलीच बनून गेले.

आता प्रथमच माझी नजर आजूबाजूला गेली. तो काय, मज्जाच मज्जा! मण्यांची खेळणी, चेंडू, ठोकळे, आणखीन बरंच काही. सगळं खेळून आम्ही दमलो. मग मधली सुट्टी झाली. डबा खाल्ला. मग होता झोपायचा तास! मला खूप आवडला. मी मात्र झोपले नाही. किलकिले डोळे करून मजा पाहावी म्हटलं तर सगळी मुले पण माझंच जणू काही अनुकरण करत होती. मग आमच्या बाई परत वर्गात आल्या. त्यांनी आम्हाला खूप छान गोष्ट सांगितली. ससा आणि कासवाची. मी एकदम खूष होऊन गेले शाळेवर! सर्वांत जास्त झोपेच्या तासावर! 

पण काही असो! शाळा जरी मला आवडली तरी सवय नसल्यामुळे कधी एकदा घरी जाईन असं झालं होतं अन् घंटेनं तुरुंगवास संपल्याची आठवण करून देताच मी एखाद्या बऱ्याच वर्षाच्या कैद्याप्रमाणे सुसाट बाहेर पळाले. आनंदाने चेहरा फुलला होता. बघते तो काय, फाटकापाशीच आईवडील! माझ्या चेहऱ्यावरचं प्रतिबिंब त्यांच्या चेहऱ्यावर उमटलं होतं. 

असं माझ्या आयुष्यातलं पहिलं वळण! पण आज मी अशा वळणावर उभी आहे की जिथून विशाल भविष्यकाळाचं क्षितीज पसरलंय, ज्याला कधी अंतच नाही. महाविद्यालयीन शिक्षण माझी वाट पाहत आहे. परंतु आज मात्र मला वाटतं की तो माझा शाळेतला पहिला दिवस म्हणजे माझ्या उज्ज्वल भविष्यकाळाची एक सुंदर रम्य पहाट होती की जिच्यावर भीती आणि आनंद यांची मिश्रित प्रभा फाकली होती.
 


SHALETIL MAZA PAHILA DIVAS
SHALETIL MAZA PAHILA DIVAS

मित्र-मैत्रिणींनो तुमच्‍या जिवनातील शाळेतील पहील्‍या दिवसाचा अनुभव कसा होता हे कमेंट जरूर कळवावे . Shalecha Pahila Divas In Marathi Essay हा निबंध तुम्‍हाला नक्‍की आवडला असेल अशी आशा करतो. खालील क्रमांक २ चा निबंध वाचण्यास  विसरू नका  धन्‍यवाद. 

NIBANDH 2 

माझे बालपण, माझे बालपण अगदी खेडेगावात गेल्यामुळे बालोदयान, शिशुविहार, के. जी. वगैरे शिक्षणक्षेत्रातील पांढरपेशी प्रकार माझ्या वाट्याला कधी आलेच नाहीत. चांगली पाच वर्षे पूर्ण होऊन सहावे लागल्यावर मला शाळेत घालण्यात आले. मे महिन्यात माझा जन्मदिवस असल्याने जूनच्या पहिल्या दिवशी शाळेचे नवीन वर्ष सुरू होताना मी शाळेत जाऊ शकलो.  त्या घटनेला इतकी वर्षे होऊन गेली तरी ती घटना, तो दिवस माझ्या डोळ्यांसमोर जसाचा तसा उभा आहे.


माझा शालेय प्रवेशाचा दिवस पंचांग पाहून ठरविण्यात आला होता. भल्या सकाळीच आमचे गुरुजी आले. थोड्या प्रमाणात होमहवन करण्यात आले आणि मग मी आईवडिलांच्या दृष्टीने शाळेत जाण्यास पात्र ठरलो. तोपर्यंत शाळा म्हणजे काय याची मला काहीच कल्पना नसल्यामुळे मी मोठ्या खुषीत होतो.


घरात चालणाऱ्या विविध समारंभांपैकी हाही एक काहीतरी समारंभ असावा, असे मला वाटत होते. वरणापुरणाचे जेवण झाले. मला नवीन कपडे घालण्यात आले. माझ्या पायांतील चप्पलही नवी कोरी होती. नवे दप्तर, नवी कोरी पाटी, नवी पेन्सिल या नवेपणाच्या धुंदीत बाबांचे बोट धरून मी शाळेच्या दारात केव्हा येऊन पोहोचलो ते मलाच कळले नाही.



एका जुन्या वाड्यात आमची शाळा होती. एका मोठ्या दालनात दोन-दोन वर्ग भरले होते. दोन दालनांत मिळून चार वर्ग होते; आणि दोन गुरुजी शाळा सांभाळत होते. बाबांनी मला गुरुजींच्या स्वाधीन केले आणि बाबा परत फिरले तेव्हा खरोखर मला ब्रहमांड आठवले. बाबांशी बोलताना जो गुरुजींचा आवाज मधाळ वाटत होता, तो बाबांची पाठ फिरल्यावर एकदम कठोर झाला आणि कोपऱ्यात ठेवलेली वेताची छडी गुरुजींनी हातात घेतली.


ते पाहून मला कापरेच भरले. गुरुजी शरीरयष्टीने धिप्पाड होते. डोक्यावरच्या टोपीतून त्यांची शेंडी बाहेर डोकावत होती. खरे पाहता, त्यांची ती शेंडी पाहून मला हसूच येत होते; पण हसण्याचे धाडस नव्हते. उकडत असूनही गुरुजींनी कोट घातला होता. तेव्हापासून माझी पक्की समजत झाली होती की, गुरुजी म्हटले म्हणजे त्यांच्या अंगावर कोट हवाच! मुंबईला प्रशालेत आल्यावर मात्र ही समजूत पुसली गेली.


आमचे हे गुरुजी एकाच वेळी दोन वर्ग सांभाळत होते. एरवी वानराप्रमाणे उड्या मारणारे आम्ही पंचवीसजण गुरुजी वर्गावर आले की शेळीसारखे बसत होतो. गुरुजी सतत फेऱ्या मारीत चौथीच्या वर्गाला गणित घालत होते, तर पहिलीच्या मुलांना शब्द घालत होते. एकाही अक्षराची अदयापि मला ओळख नाही हे समजल्यावर त्यांनी माझ्या बावन्न पिढयांचा उद्धार केला असावा.


तीन-चार तास एका जागी बसण्याची मला सवय नव्हती. अपरिचित जागा, अनोळखी माणसे! भीतीने माझ्या डोळ्यांतून गंगा-यमुना वाह लागल्या; तसे मास्तर कडाडले, "रडायला काय झालंय?" आता फक्त छडीच मारायची उरली होती. डोळयांतले पाणी मी पुसून टाकले आणि मोठ्या निग्रहाने अक्षरे गिरवू लागलो.या घटनेला आज बरीच वर्षे होऊन गेली, तरी तो शाळेतील पहिला दिवस मी विसरू शकत नाही. त्याच छडीच्या धाकाखाली शाळेतील चार वर्षे पार पडली आणि पाचवीसाठी मी शहरात आलो.




मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 3

shalecha pahila divas in marathi Essay


 वाढदिवस आणि सणांच्या व्यतिरिक्त काही महत्त्वपूर्ण दिवस असे असतात जे आपण विसरू शकत नाही. प्रथमच शाळेत जाणे लहान मुलांसाठी खूप रोमांचकारी असते. त्याचा प्रभाव बालकाच्या मनावर पडतो.
जरी मी आज आठवीचा विद्यार्थी असलो तरी शाळेच्या पहिल्या दिवसाचा विचार येताच मन उत्साहित होते. माझी बहीण शारदा मंदिरमध्ये त्यावेळी शिकत होती. ती माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठी आहे. माझ्या आई बाबांनी मला पण त्याच शाळेत घालण्याचा निश्चय केला. जेव्हा मी पाच वर्षांचा झालो तेव्हा माझे नाव त्या शाळेत दाखल करण्यात आले.


पावसाळ्याचे दिवस होते. एके दिवशी सकाळीच आईने मला लवकर उठविले. नित्यकर्मे आटोपल्यावर स्नान करून बरोबर सहा वाजता मी तयार झालो. दूध आणि नाश्ता केला. मी आवडीने शाळेचा गणवेश घातला. नवे बूट मोजे, दफ्तर पाहून मी उत्साहित झालो. माझ्या वडिलांनी मला आणि बहिणीला कारमध्ये बसवून शाळेत नेले.
शाळेची इमारत तीन मजली असून सुंदर होती. बाहेरच्या फाटकावर खाकी गणवेश घातलेला चौकीदार होता. वडिलांनी मुख्य फाटकाजवळ कार उभी केली आणि आमच्यासह शाळेत प्रवेश केला. 



माझी बहीण तिच्या वर्गात निघून गेली. वडिलांनी मला मुख्याध्यापकांच्या खोलीत नेले. तिथे बरीच मुले आपल्या आई वडिलांबरोबर आलेली दिसली. मुख्याध्यापक क्रमाक्रमाने प्रत्येकाला बोलावीत होते व त्यांच्या प्रवेशअर्जावर सह्या करीत होते. मला पहिल्या वर्गात प्रवेश मिळाला. माझा वर्ग तळमजल्यावरच होता. वर्गात प्रवेश केल्यावर तिथे २०/२५ विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित असलेले दिसले. माझ्या बहिणीची मैत्रीण सुधा, हिची लहान बहीण पण होती. ती मला लगेच 'हॅलो'" म्हणाली. 


माझ्या वर्गशिक्षिकेने मला तिच्या जवळच पहिल्या ओळीत बसविले. दोन तासांनंतर मधल्या सुट्टीची घंटी वाजली. सर्व मुले दफ्तर भरून व बंद करून बाहेर आली मी पण त्यांच्याबरोबरच बाहेर पडलो. माझी बहीण आधीच माझ्या वर्गाबाहेर आली होती. नंतर आम्ही डबा खाल्ला. सुट्टी संपल्यावर सगळी मुले आपापल्या वर्गात गेली.


पहिल्याच दिवशी वर्गशिक्षिकेने आम्हाला शाळेचे नियम समजावून सांगितले. पाठ्यपुस्तकांची यादी दिली. पाढे शिकविले. मला कविता म्हणावयास सांगितली व त्यानंतर खुश होऊन मला शाबासकी दिली. साडेबारा वाजता शाळा सुटली. माझी बहीण धावतच माझ्या वर्गाजवळ आली. आम्ही दोघे शाळेच्या बाहेर आलो. फाटकापाशी आमची आई वाट पाहत उभी होती. नंतर आम्ही तिघे रिक्षाने घरी आलो.
असा हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस. मी कितीही मोठा झालो तरीही हा दिवस माझ्या कायम लक्षात राहील.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 4

shalecha pahila divas marathi nibandh


शाळेतला पहिला दिवस ज्या दिवशी मी प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत प्रवेश केला, त्या दिवसाची स्मृती माझ्या मनात एखाद्या शिलालेखाप्रमाणे कोरली गेली आहे. त्या दिवशी  मी आत प्रवेश केला आणि दिंडीप्रमाणेच जरा भव्य वाटणाऱ्या इमारतीपुढे उभा राहिलो, तेव्हा माझ्या मनात निरनिराळ्या, परस्परविरोधी भावनांचा कल्लोळ माजला होता. सारं नवीन, शाळा नवीन, वह्या - पुस्तकं नवीन, गणवेश नवीन या नाविन्यामुळे हरखून गेलो होतो आणि त्याचवेळी जुनी शाळा, जुने शिक्षक, जुने मित्र आता भेटणार नाहीत, म्हणून खंतावलो होतो


थोडा चिंतेनेसुद्धा ग्रासलो होतो. नवीन शिक्षक कसे असतील ? वर्गातील मुले कशी असतील ? ती माझ्याजवळ कशी वागतील ? हा वरच्या शाळेतला अभ्यास आपल्याला जमेल का ? झेपेल का ? असे प्रश्न एकीकडे भेडसावत होते, तर दुसरीकडे नवीन विषय, इंग्रजी - संस्कृत, ऑलजिब्रा जास्त विषयांचं ज्ञान या कल्पनेने उत्कंठित झालो होतो. थोडक्यात मनःस्थिती काहीशी शब्दातीतच होती.



पहिला तास सुरू झाला. नवीन मास्तर सर्वांना नांव विचारीत होते. माझी पाळी आली. मी गांगरलो - गोंधळलो होतोच. तेव्हा मी माझे नांव सांगताना जरा अडखळलो. हळू आवाजात बोललो. मास्तर एकदम ओरडले. तत् पप् काय करतोस ? खणखणीत आवाजात बोल ! मला वाईट वाटलं. मास्तर रागावले म्हणून नव्हे,  सगळी मुले हसली म्हणून. ते हसणे, तो उपहास अजूनही माझ्या कानात घुमतोय. पहिला धडा मिळाला, खणखणीत स्वरात बोलायचं. 


पहिला तास संपला. मगाचचे सर गेले आणि दुसरे सर आले हे बघून मला अचंबाच वाटला. आले ते फाड-फाड इंग्रजीतूनच बोलायला लागले. मी घाबरलो. मागचाच प्रश्न नव्याने उभा राहिला. “मला झेपेल ना या शाळेतला अभ्यास ?" पण हे सर चांगले होते. अगदी खेळकरपणे ते शिकवीत होते. सर्व तास त्यांनी आम्हाला हसत ठेवले होते. मला धीर आला. ते म्हणाले 'मी तुम्हाला फक्त इंग्रजीच शिकवणार नाही. तुमचं सामान्यज्ञान वाढविणार आहे. तुमचं व्यक्तिमत्त्व सुधारणार आहे. 



आपलं व्यक्तिमत्त्व तसं आकर्षक, लोभस असलं पाहिजे.' मी दुसरा धडा गिरवला. आपली खरी कसोटीची वेळ मधल्या सुट्टीत आली. मधली सुटी झाल्याबरोबर आतापर्यंत शांतपणे बसलेल्या मुलांनी गोंगाट करायला सुरवात केली. काही मुलांच्या धिटाईचं मला कौतुक वाटलं. आपण बरीच वर्षं या शाळेत शिकत आहोत, अशा थाटात ते वागत होते. माझ्या बाकावर शेजारी बसलेल्या मुलाने 'तू काय आणलं आहेस डब्यात ?' असं विचारून माझ्याशी सलगी केली. आम्ही एकमेकांच्या डब्यातलं खाल्लं. मजा आली. आणखी एक धडा शिकलो. सर्वांजवळ सलगीने वागायचं.


मधल्या सुटीत मी मुलांचं निरीक्षण करीत होतो. काही मुले चेहऱ्यावरूनच हुशार आणि शांत वाटली. काही बंडखोर वाटली. काहीच्या तोंडात तर शिव्या होत्या. काही मुलं जागेवरच मुकस्तंभासारखी बसून राहिली होती. त्याचवेळी मी मनात आणखी एक धडा गिरवला. आपण मुलांजवळ जपून वागायचे. चांगल्या मुलांचीच संगत धरायची. वाईट मुलांची संगत टाळायची.
 

मग गणित शिकवणारे सर आले. आतापर्यंत मला कळून चुकलं होतं की प्रत्येक विषयाला निरनिराळे शिक्षक असतात. गणिताच्या शिक्षकांनी नवीन काही शिकवलं नाही. आम्हालाच पाढे विचारले. संख्या वाचायला सांगितल्या, शिवाय गणित हा विषय कसा सोपा आहे, गमतीशीर आहे, वगैरे काहीसे बोलले. माझी कळी खुलली. गणित शिकायच्या अगोदरच मला गणित हा विषय सोपा वाटायला लागला...


शेवटचा तास पी.टी.चा -शारीरिक शिक्षण. तिथेसुद्धा शिक्षकांनी आम्हाला रांगेत उभे केले. आणि मग नांवे विचारली. पहिल्या तासाला मिळालेला धडा मी चांगला गिरवला होता. माझी पाळी आली, तेव्हा मी माझं नांव अगदी खणखणीत आवाजात सांगितलं. शिक्षक म्हणाले "शाबास ! असा आवाज पाहिजे खणखणीत."
एकूण काय, पहिला दिवस चांगला गेला. मला वाटतं शाळेतला पहिला दिवस हाच एकूण शालेय जीवन कसं जाणार ते ठरवतो. मला धीर आला. खात्री पटली. माझं शालेय जीवन चांगलं जाणार - खणखणीत.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद
टीप : वरील निबंध शाळेतील माझा पहिला दिवस मराठी निबंध या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते
  • mazya shalecha pahila divas in marathi
  • marathi nibandh shalecha pahila divas in marathi
  • shalecha pahila divas nibandh marathi madhe
  • majha shalecha pahila diwas nibandh
  • sayesha pahila divas marathi nibandh

निबंध 5

शाळेतील माझा पहिला दिवस मराठी निबंध | Shalecha Pahila Divas In Marathi Essay


ज्या दिवशी मी प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत प्रवेश केला, त्या दिवसाची स्मती माझ्या मनात एखाद्या शिलालेखाप्रमाणे कोरली गेली आहे. त्या दिवशी जरा भव्य वाटणाऱ्या दिडीतून मी आत प्रवेश केला आणि दिंडीप्रमाणेच जरा भव्य वाटणाऱ्या इमारतीपुढे उभा राहिलो. 


तेव्हा माझ्या मनात निरनिराळ्या, परस्परविरोधी भावनांचा कल्लोळ माजला होता. सारं नवीन, शाळा नवीन, वह्या - पुस्तकं नवीन, गणवेश नवीन या नाविन्यामुळे हरखून गेलो होतो आणि त्याचवेळी जुनी शाळा, जुने शिक्षक, जुने मित्र आता भेटणार नाहीत, म्हणून खंतावलो होतो. 


थोडा चिंतेनेसुद्धा ग्रासलो होतो. नवीन शिक्षक कसे असतील ? वर्गातील मुले कशी असतील ? ती माझ्याजवळ कशी वागतील ? हा वरच्या शाळेतला अभ्यास आपल्याला जमेल का ? झेपेल का ? असे प्रश्न एकीकडे भेडसावत होते, तर दुसरीकडे नवीन विषय, इंग्रजी - संस्कृत, ऑलजिब्रा जास्त विषयांचं ज्ञान या कल्पनेने उत्कंठित झालो होतो. 


थोडक्यात मनःस्थिती काहीशी शब्दातीतच होती.  पहिला तास सुरू झाला. नवीन मास्तर सर्वांना नांव विचारीत होते. माझी पाळी आली. मी गांगरलो - गोंधळलो होतोच. तेव्हा मी माझे नांव सांगताना जरा अडखळलो. हळू आवाजात बोललो. 


मास्तर एकदम ओरडले. तत् पप् काय करतोस ? खणखणीत आवाजात बोल ! मला वाईट वाटलं. मास्तर रागावले म्हणून नव्हे, पण मास्तरांच्या शेऱ्यानंतर सगळी मुले हसली म्हणून. ते हसणे, तो उपहास अजूनही माझ्या कानात घुमतोय. पहिला धडा मिळाला, खणखणीत स्वरात बोलायचं.



पहिला तास संपला. मगाचचे सर गेले आणि दुसरे सर आले हे बघून मला अचंबाच वाटला. आले ते फाड-फाड इंग्रजीतूनच बोलायला लागले. मी घाबरलो. मागचाच प्रश्न नव्याने उभा राहिला. "मला झेपेल ना या शाळेतला अभ्यास ?" पण हे सर चांगले होते. 


अगदी खेळकरपणे ते शिकवीत होते. सर्व तास त्यांनी आम्हाला हसत ठेवले होते. मला धीर आला. ते म्हणाले 'मी तुम्हाला फक्त इंग्रजीच शिकवणार नाही. तुमचं सामान्यज्ञान वाढविणार आहे. तुमचं व्यक्तिमत्त्व सुधारणार आहे. आपलं व्यक्तिमत्त्व तसं आकर्षक, लोभस असलं पाहिजे.' मी दुसरा धडा गिरवला.



आपली खरी कसोटीची वेळ मधल्या सुट्टीत आली. मधली सुटी झाल्याबरोबर आतापर्यंत शांतपणे बसलेल्या मुलांनी गोंगाट करायला सुरवात केली. काही मुलांच्या धिटाईचं मला कौतुक वाटलं. आपण बरीच वर्षं या शाळेत शिकत आहोत, अशा थाटात ते वागत होते. 


माझ्या बाकावर शेजारी बसलेल्या मुलाने 'तू काय आणलं आहेस डब्यात ?' असं विचारून माझ्याशी सलगी केली. आम्ही एकमेकांच्या डब्यातलं खाल्लं. मजा आली. आणखी एक धडा शिकलो. सर्वांजवळ सलगीने वागायचं.



मधल्या सुटीत मी मुलांचं निरीक्षण करीत होतो. काही मुले चेहऱ्यावरूनच हुशार आणि शांत वाटली. काही बंडखोर वाटली. काहीच्या तोंडात तर शिव्या होत्या. काही मुलं जागेवरच मूकस्तंभासारखी बसून राहिली होती. त्याचवेळी मी मनात आणखी एक धडा गिरवला. 


आपण मुलांजवळ जपून वागायचे. चांगल्या मुलांचीच संगत धरायची. वाईट मुलांची संगत टाळायची. मग गणित शिकवणारे सर आले. आतापर्यंत मला कळून चुकलं होतं की प्रत्येक विषयाला निरनिराळे शिक्षक असतात. गणिताच्या शिक्षकांनी नवीन काही शिकवलं नाही. आम्हालाच पाढे विचारले. 



संख्या वाचायला सांगितल्या, शिवाय गणित हा विषय कसा सोपा आहे, गमतीशीर आहे, वगैरे काहीसे बोलले. माझी कळी खुलली. गणित शिकायच्या अगोदरच मला गणित हा विषय सोपा वाटायला लागला. शेवटचा तास पी.टी.चा -शारीरिक शिक्षण. तिथेसुद्धा शिक्षकांनी आम्हाला रांगेत उभे केले. आणि मग नांवे विचारली. 



पहिल्या तासाला मिळालेला धडा मी चांगला गिरवला होता. माझी पाळी आली, तेव्हा मी माझं नांव अगदी खणखणीत आवाजात सांगितलं. शिक्षक म्हणाले "शाबास ! असा आवाज पाहिजे खणखणीत." एकूण काय, पहिला दिवस चांगला गेला. 


मला वाटतं शाळेतला पहिला दिवस हाच एकूण शालेय जीवन कसं जाणार ते ठरवतो. मला धीर आला. खात्री पटली. माझं शालेय जीवन चांगलं जाणार - खणखणीत.



भास्कराचार्यांसारखे थोर गणिती आपल्या देशात होऊन गेले. सर्व जगाला '0' ची देणगी आम्ही दिली. पण हे वैयक्तिक पातळीवर झाले. सांघिक असे काही घडले नाही. अखिल देशाला ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात रॉकेटसारखी झेप घ्यायला लावील असा शिक्षणतज्ज्ञ भारतात निपजला नाही, हे खेदाने नमूद करावे लागते..


चिपळूणकर, टिळक, आगरकर, आपटे-कर्वे अशी देशाला शिक्षण क्षेत्रात पुढे आणण्यासाठी झटणारी मंडळी होऊन गेली. महात्मा फुल्यांनी तर आपल्याला -

विद्येविना मती गेली । 

मतीविना गती गेली ।।

गतीविना वित्त गेले | 

वित्ताविना शुद्र खचले ।। 




असा मंत्र दिला. पण एवढ्या प्रचंड देशात शिक्षित फारच थोडे झाले आणि सुशिक्षित तर त्याहूनही थोडे झाले.
आपलं दुर्भाग्य असं की लॉर्ड मेकॉलेच्या तोडीचा शिक्षणतज्ज्ञ स्वतंत्र भारताला कधी लाभला नाही. मेकॉलेने आपल्याला युरोपीय भाषा आणि युरोपीय शास्त्रे शिकवायला सुरुवात केली आणि साऱ्या हिंदुस्थानचा कायापालट झाला.


इंग्रजांनी दिलेल्या शिक्षणाने, त्यांचे राज्य चालवायला मदत करणारे कारकून तयार केले. हे सत्य आहे; पण त्याच शिक्षणातून आपल्या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी प्राणपणाने लढणारी माणसं निर्माण झाली, हेही सत्य आहे.



ज्वालांच्या झोतावर स्वार होऊन, आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज असलेल्या ब्रिटिश साम्राज्यावर धडका देऊन ते खिळखिळे करून टाकणारे सशस्त्र क्रांतिकारकही त्याच शिक्षणातून निर्माण झाले, हेही सत्य आहे. सध्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांतीचे वारे वहात आहेत. 


कित्येक भारतीय जागतिक पातळीवर ताऱ्यासारखे चमकत आहेत. भारताच्या उज्ज्वल भविष्याची सोनपहाट लवकरच फटफटणार आहे, याचीच ही प्रसादचिन्हे आहेत.

शाळेतील माझा पहिला दिवस मराठी निबंध | Shalecha Pahila Divas In Marathi Essay

माझे बालपण मराठी निंबध | Majhe Balpan Marathi Nibandh

निबंध 1

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो माझे बालपण मराठी निंबध या निबंधामध्‍ये बालपणीच्‍या रम्य प्रसंगाचे वर्णन केले आहे बालपणीचे मित्र, दिवस दिवसभर खेळलेले खेळ, परीक्षा झाल्‍यानंतर असलेला दिनक्रम या गोष्‍टी वाचल्‍यानंतर तुम्‍हाला तुमचे बालपण आठवल्‍याशिवाय राहणार नाही. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 

माझे बालपण मराठी निंबध सुरूवात करताच बालपणातील खुपश्‍या गमतीदार ताज्‍या होतात. शालांत परीक्षेचा शेवटचा पेपर देऊन घरी आलो आणि मला हलके हलके वाटू लागले. गेले दोन-चार महिने मी अभ्यासाने अगदी झपाटून गेलो होतो. आता मी संपूर्ण मोकळा झालो होतो. सुट्टीतील वेळ घालविण्यासाठी बाबांनी अनेक पर्याय माझ्यापुढे ठेवले होते; पण ते सारे मला नकोसे वाटत होते. एकदम मला आठवला तो आमचा वाडा-बालपण जिथे घालविले तो वाडा.

तो वाडा आमचा होता, म्हणजे माझ्या आजोबांचा होता. बाबांना कधीच त्याच्याविषयी आपलेपणा वाटला नाही. म्हणून तर आजी-आजोबांच्या पश्चात बाबांनी तो वाडा विकला आणि हा प्रशस्त बंगला बांधला, पण त्या वाड्यातील मजा हया बंगल्यात कधीच अनुभवता आली नाही. वाड्याचे आम्ही मालक होतो आणि शिवाय इतर दहा भाडेकरू होते; पण बंगल्यात येईपर्यंत मला हे कधी माहीतच नव्हते. कारण वाड्यात दहा चुली पेटत होत्या, तरी सर्व माणसे एकाच कुटुंबातील असल्याप्रमाणे वागत होती. त्यामुळे बालपणी वाड्यात हुंदडताना कधी कोठे हा आपला, तो परका असे जाणवलेच नाही.

त्यावेळी या वाड्यात माझे दहा-बारा सवंगडी होते. सकाळी सूर्य वर आला की आमच्या खेळाला सुरुवात होत असे. आम्ही खेळात इतके रमून जात असू की, कशाचे म्हणून आम्हांला भान राहत नसे. मग आठ वाजता गोखले गुरुजींची हाक आली की पुढच्या ओटीवर 'शिकवणी' सुरू व्हायची; पण या खाजगी वर्गालाही वाड्यातील सगळी मुले येत असत. गोखले गुरुजी अगदी तन्मयतेने शिकवीत असत. त्यामुळे दोन तास अभ्यास झाला तरी कंटाळा येत नसे. जेवणे उरकली की वाड्यातील सगळेजण मिळून शाळेला जात असू. संध्याकाळी खेळानंतर कवितागायनाने वाडा नुसता दुमदुमून जायचा.

majhe balpan marathi nibandh
majhe balpan marathi nibandh

सुट्टीच्या दिवसांत तर वाड्यातील त्या बालपणाला आगळा रंग यायचा. सकाळच्या वेळी विहिरीवर पोहणे, दुपारी अंगण खेळांनी दुमदुमवून टाकणे, संध्याकाळचे फिरायला जाणे आणि रात्री भुताखेतांच्या गप्पा मारणे हा कार्यक्रम ठरलेलाच. सुट्टीमध्ये पाहुणेमुलांची भर असे. मग उन्हाळा म्हणून अंगणात अंथरुणे पडत. भेळ, आंब्याचा रस, आइस्क्रीम असे बेत आखले जात. दरवर्षी वाड्यातील कोणाकडे तरी कार्य निघेच. मग ते कार्य त्या घरापरतेच मर्यादित न राहता संपूर्ण वाड्याचेच होत असे. सगळी बालसेना त्या कार्यात एकजुटीने रंगलेली असे.

अशा त्या आगळ्यावेगळ्या आनंदात मी केव्हा मोठा झालो हे मला कळलेच नाही. आज मात्र जाणवते की
'अहा ते सुंदर दिन हरपले

मधुभावांचे वेड जयांनी जीवाला लाविले.' 
बालपणातील त्या दिवसांचे वर्णन करावयास कवयित्री शांता शेळके यांच्या या पंक्तींचा आधार घ्यावा लागेल
'अवनी गमली अद्भुत अभिनव जिये सुखाविण दुजा न संभव घरी वा दारी वात्सल्याचे मळे नित्य बहरले॥'


मित्रांनो बालपण एकदा मिळाल्‍यानंतर कधीही न मिळणारी गोष्‍ट आहे. बालपणातील ते रम्‍य क्षण कोणीही विसरू शकत नाही. तुम्‍ही तुमच्‍या बालपणातील झालेल्‍या खट्याळ गोष्‍टी कमेंट करून सांगु शकता माझे बालपण मराठी निंबध हा तुम्‍हाला कसा वाटला कमेंट करून जरूर सांगावे.

निबंध 2

my childhood essay in marathi


बालपण म्हणजे जीवनातील सकाळ, जीवनातील वसंत ऋतू, साऱ्या जीवनाला जो प्रसन्न, प्रफुल्लित बनवतो. या वसंतऋतूत प्रत्येक कळीला फुलायचा मोह होतोच! माझ्या जीवनाची कळीही अशीच जन्मली, उमलली-आनंदपुरात !  खरोखरच तिथे आनंदाचा पूर वाहत होता. लहानपणी आम्ही एका मोठ्या वाड्यात राहायचो. 

आमचा वाडा-शांतीसदन! परंतु आम्ही सर्व मुलांनी या वाड्याला अगदी 'अशांती सदन'च बनवून टाकलं. सूर्यदेव उगवल्यापासून ते निरोप घेईपर्यंत आम्ही जो धुडगूस घालायचो...सीता, गीता, संजय, सुनील, पप्पू... आठवतायत ह्या बालमूर्ती... 'बालपणीचे सखे सोबती, आठवणींना अजून झोंबती!' आठवतोय, चिंचा काढण्यासाठी पाटलांच्या मळ्यातील चिंचेच्या झाडावर चढलेला समीर! कैऱ्या खाल्ल्या म्हणून माळ्याकडून मार बसलेला बंडू! टिपऱ्यांच्या खेळात सतत भांडणारी अबोली-अगदी विरोधाभासच! नंतर रोज सकाळी आम्ही सर्व जण हातात हात घालून शाळेत जायचो. 

शिस्तीने थोडीशी चुणूक दाखवायला सुरुवात केली. गुरुजींचा प्रेमळ हात पाठीवरून आजही फिरतोय असंच वाटतं. दुपारी घरी यायचो, जेवायला. अन् एकदा का जेवण झालं की घराबाहेरच धूम ठोकायचो. मग विहीरीवर पोहायला जायचो. आमच्या वाड्यातील काकांचा मुलगा ‘अभय' खूप भित्रा होता. त्याला विहिरीत उतरायला लावायचंच असं एकदा आम्ही सर्वांनी ठरवलं. 'अभय' असूनही त्याला पाण्याचं मात्र भय वाटत असे. आम्ही असंच काहीतरी सांगून त्याला रमत गमत नेला, तो विहिरीच्या काठावरच आणून उभा केला.

खाली पाण्यात संजय, अजय होतेच. वरून गर्जना झाली-बजरंगबली की जय! अन् 'अरे, मेलो मेलो ! वाचवा, वाचवा!... 'असं म्हणणाऱ्या अभयच्या बटुमूर्तीनं थेट जीवनाला आलिंगन दिलं. इतकं, की त्याच्या प्रेमभारानं तो गुदमरू लागला. संजय, अजयनी त्याला वर आणलं. दोन महिन्यातच अभय-निर्भय तर बनलाच पण पट्टीचा पोहणाराही !

संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी मात्र आमचं पाऊल उंबरठ्याच्या आतच असे. हात-पाय-तोंड धुवून आम्ही सर्वजण परवचा म्हणायचो, अन् मग आम्हाला रामकृष्णाच्या गोष्टी सांगायचे-बुद्धिसागरकाका !
किती छान होते ते दिवस !... फुलपाखरालाही लाजवेल असे ते स्वच्छंदी जीवन... मनाला षड्रिपूंचा स्पर्शही झाला नव्हता. जिज्ञासा, कुतूहल, उत्सुकता, नवलाई म्हणजेच जीवन होते. ते माझं बालपण म्हणजे अवखळपणे वाहणारा निर्मळ झराच! 'बाळपणीचा काळ सुखाचा आठवतो घडी घडी' असं म्हणता म्हणता,

'अहा ते सुंदर दिन हरपले,
मधुभावांचे वेड जयांनी जीवा लावले,' 

असं म्हणण्याची पाळी आली आहे. बालपणानंतर तरूणपण आलं, वृद्धत्वही डोकावू लागेल, परंतु जीवनातील वसंत ऋतू मात्रा माझ्या हातातून निसटला आहे. पण काळाची गती कोणाला रोखता आली आहे ? तो पुढे धावणारच ! मग आणि म्हणूनच प्रौढत्वातही बालपणाला जपणं, एवढंच आज माझ्या अन् तुमच्या हातात आहे.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 3

ramya te balpan composition in marathi



हिरवे हिरवे गार गालिचे, 
हरिततृणांच्या मखमालीचे।
त्या सुंदर मखमालिवरती,
 फुलराणी ही खेळत होती।। 


बालकवींची ही हरिततृणांची मखमल आणि या मखमलीवरती खेळणारी फुलराणी ! शून्यातून विश्वात आलेली ! नवनिर्मात्याच्या निर्माण कार्यातील नवनिर्मितीच म्हणावे तिला ! मग ते हिरवे गार गालिचे असोत की बाभळीचे काटे, उजाड डोंगरवाट वा रखरखते ऊन, परंतु या सर्वांचा मनसोक्त, मनमुराद


आनंद - सुख अनुभवून अलौकिक-असामान्य परिपूती साधणारा ही फुलराणी म्हणजे आयुष्यातील प्रत्येक क्षण मग तो बालपणीची चिमुकली पावले टाकणारा काळ असो वा तारुण्याचा मखमली चादर असो हे सर्व अनुभवणारी एक समृद्ध अभिव्यक्तीच नव्हे काय ? 



मनोमयी विश्वातील प्रत्येक व्यक्तिरेखा कमी-जास्त प्रमाणात का होईना पण विश्वाच्या प्रत्येक इवल्याशा कोपऱ्यात सुखाची झालर शोधत असते, कारण तिला हवे असतात ते सुंदर दिन ! बालपणीच्या निरागस बोबड्या बोलांचे, किशोरावस्थेतील त्या अद्भुत बदलांचे व यौवनातील सुखद स्वप्नांचे ! ते सर्वच दिन ! ते सुखद दिन ! आज कुठेतरी हरपलेले ते सुंदर दिन !


सौंदर्यनिर्मितीच्या कर्तृत्वातून सौंदर्यशीलता फुलते, असे कवी कुसुमाग्रजांनी समजावून सांगितले आहे. 'जीवन' हा शब्दच सुंदर, संपन्न व सार्थ आहे आणि हे जीवन जगण्याची कला जाणणारा कलाकार हा जीवनाचा भाष्यकार ठरतो. 


कसेतरी रडतकुढत जीवन रेटणे म्हणजेच जीवन जगणे नव्हे. जगणे म्हणजेच जीवनाला अर्थ प्राप्त करून देणे होय, आणि या अर्थातच बालपण, किशोरावस्था, यौवन व प्रौढत्व वा वृद्धत्वाचेही मर्म सामावलेले असते. 


नदीच्या प्रत्येक टप्प्यातील - प्रत्येक वळणावरील अनुभवांतून साकारलेला समुद्र म्हणजेच जीवन होय. पण या मनमुराद कल्पना, ते स्वातंत्र्य, नी चंचलता, निरागसता व खळखळत्या पाण्यासारखी अवखळता असे ते दिन आजच्या या जागतिकीकरण, प्रदूषण, दहशतवाद व यांसारख्याच अनेक वादांमध्ये हरविल्याची संवेदना कुठेतरी सतत जाणवत राहते.


आज जीवनात प्रचंड अस्थिरता, अशांतता, अनिश्चितता भरतीच्या उफाळलेल्या सागरात सापडलेल्या नावेप्रमाणे हेलकावे खाते आहे. सिमेंटच्या जंगलात मार्ग शोधता शोधता आबालवृद्ध अनेक ठिकाणी ठेचाळत आहेत.

स्वतःचे स्वत्वममत्व विसरलेली आजची आधुनिक स्त्री पाश्चात्त्यीकरणाच्या नावाखाली उगाचच गल्लीबोळांतून फिरताना दिसते आहे. या सर्व अंदाधुंदीत, संवेदनशील मनुष्य मात्र आमराईतील आंबे चोरून खाण्याचे ते दिन,


परकरात बोरीचे गुच्छ जमविण्याचे ते दिन, सागरी वाळूत दिवसभरात एकदा तरी जाणे कित्येकवेळा पण किल्ले बांधण्याचे ते दिन, त्या व अशा सुखद दिनाच्या पायऱ्या वर्तमानकाळाच्या उंबरठ्यावर बसून मोजतो आहे. 


कारण आजच्या आधुनिकतेच्या व उद्योगीकरणाच्या गलबलात त्याची दृष्टी संवेदनशील वृत्ती अधू होत चालली आहे. या परिस्थितीत त्याला भविष्यातील अंधकार स्पष्ट दिसतो आहे.


जीवनाच्या वाटेवर, पाऊल टाक जपून। पायात रुतण्यासाठी काटे आहेत टपून॥ या व अशा परिस्थितीतही आजचा रसिक मात्र गुलमोहराची ती मनोहारी स्वप्न, स्पर्शाची ती सुखद अनुभूती, पापण्याच्या अर्धकलमामध्ये त्या सुंदर दिनांच्या आठवणी जपून ठेवणार आहे.कारण तो खराखुरा रसिक आहे. 


जीवनाच्या वाटेवरील प्रत्येक अनुभव तो निर्मिकाची भेट म्हणून जपून ठेवणार आहे. कारण या आठवणींशिवाय जीवनात रस नाही. रूप तर येणारच नाही मग रंग कुठला भरणार ? हे ती जाणून आहे. आणि म्हणूनच हरपलेल्या त्या सुंदर दिनांच्या आठवणी आजचा हा रसिक हृदयाच्या पिंपळावर कोरून ठेवणार आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


टीप : वरील निबंध माझे बालपण या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते
  • majhe balpan prasang lekhan marathi

माझे बालपण मराठी निंबध | Majhe Balpan Marathi Nibandh


माझा आवडता छंद मराठी निबंध | My Favourite Hobby Essay In Marathi
निबंध 1


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता छंद मराठी निबंध बघणार आहोत. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला सुखाचे चार क्षण मिळतात ते त्याला आवडत असलेल्या छंदापासून म्हणून प्रत्येकजण कोणता ना कोणता छंद जोपासत असतो. अश्याच सुखकर छंदाविषयी आपण पुढील 7 वेगवेगळ्या निबंधामध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


प्रत्‍येक जण आपल्‍या आवडत्‍या छंदातुन आनंद शोधण्‍याचा प्रयत्‍न करत असतो. कुणाला छंद असतो शिकारीचा, तर कुणाला छंद असतो गडकिल्ले हिंडण्याचा. कुणाला छंद असतो पोस्टाची तिकिटे, नाणी किंवा विविध जुन्या वस्तू गोळा करण्याचा. कुणी मित्र गोळा करून पत्ते कुटत बसतात.


तर कुणी एकटेच सतार छेडत बसतात. कुणी पुस्तकांना आपले मित्र करतात; तर कुणी कागदावर कुंचल्यांनी चित्रे खेचतात. माझा छंद तसा जगावेगळा आहे. मला लहानपणापासून आवड आहे ती माणसे जोडण्याची आणि जसजसा मी मोठा होत गेलो तसतशी माझी ही आवडही वाढत गेली.


तसे पाहता आमचे कुटुंब फार छोटे आहे. आई, बाबा आणि मी. पण अगदी लहानपणापासून मला आपल्या घरी खूप माणसे यावीत, गर्दी व्हावी, गडबड उडावी असे वाटे. आई सांगते की, मी लहानपणी आपल्याकडे 'हळदीकुंकू' कर, 'सत्यनारायणाची पूजा' कर असा नेहमी हट्ट करीत असे. कारण त्यामुळे घरात खूप माणसे येत. सुट्टीचा वार रविवार वा सुट्टीचा 'मे' महिना मला फार प्रिय आहे. कारण सुट्टीमुळे खूप पाहणे घरी येतात. सुट्टी येण्यापूर्वीच मी माझ्या आप्तांना, मित्रांना आमंत्रणे पाठवितो. त्यांना वाटते की किती विनम्र, लाघवी मुलगा आहे. पण माझे माणसवेड त्यांना 'अनभिज्ञ' असते.


मला आवडतात ती माणसे फक्त नात्यागोत्याचीच अथवा आपल्या योग्यतेची असतात असे नाही हं! मला कोणतीही माणसे आवडतात. आम्ही राहतो त्या कॉलनीत आमचा बंगला पहिला बांधला गेला. इतर सतरा बंगले नंतर आमच्या देखत बांधले गेले. तेव्हा मी प्राथमिक शाळेत होतो; भरपूर मोकळा वेळ असे. त्यावेळी बांधकाम करणाऱ्या माणसांशीही मी दोस्ती करीत असे. बांधकामावर खूप स्त्रिया असत. त्यांच्याबरोबर त्यांची लहान मुले असत.


या मुलांबरोबर मी खूप खेळत असे. त्यांच्याकडूनच मी विटीदांडूचा खेळ शिकलो. ही मुले लहान वयातही आपल्या आईवडिलांना केवढी मदत करीत. आज ती मुले वयाने मोठी होऊन पुरुष झाले आहेत, त्यांच्यातील कित्येकजण स्वतंत्र कामे करू लागले आहेत.





maza avadta chand marathi nibandh 


मी मोठ्या शाळेत जाऊ लागलो, तसा माझा हा छंद वाढतच गेला.
वर्गातील दोस्तच काय, पण शाळेतील सगळी मुले माझे मित्र बनले. तसा माझा स्वभाव बडबड्या आहे. मला बोलायला खूप आवडते, पण तितकेच मला इतरांचे विचारही ऐकायला आवडतात. त्यामुळे दूरचा प्रवासही मला कधी कंटाळवाणा होत नाही. प्रवासात अनेक ओळखी होतात, अनेक अनुभव ऐकावयास मिळतात, अनेक दोस्त मिळतात,


गाडीत माल विकणाऱ्या फेरीवाल्यांबरोबरही मला गप्पा मारायला आवडतात. माझे वडील म्हणतात, "अरे, यांच्याशी तू कसल्या गप्पा मारतोस?" मी फक्त हसतो. पण मला आठवते ते काणेकरांनी सांगितलेले, 'सामान्याचे असामान्यत्व.' काणेकर त्यांचा अनुभव सांगतात की, ज्या माणसाजवळ डोके कमी त्याच्याजवळ माणुसकी मोठी असते. मलाही हा अनुभव आलेला आहे. 'बोलघेवड्या मित्रांपेक्षा साधेभोळे, कष्टकरी मित्रच आपल्या जास्त उपयोगी पडतात.'


माझा हा माणसे जोडण्याचा छंद आहे ना, त्याचेही मी एक शास्त्र तयार केले आहे. मला जेव्हा नवीन मित्र भेटतात तेव्हा मी त्या मैत्रीची नोंद ठेवतो. त्या मित्रांचे पत्ते लिहून ठेवतो. वेळोवेळी त्यांना पत्रे लिहितो. त्यांची पत्रे मला येत असतात. त्यामुळे जीवघेणा कंटाळा मला कधीही ग्रासू शकत नाही. मी कधीही एकटा नसतो. मी जोडलेली असंख्य माणसे, मित्र सदैव माझ्याभोवती असतात-कधी प्रत्यक्ष, तर कधी पत्ररूपाने किंवा फोटोरूपाने.


तुम्ही विचाराल या छंदात मला कधी नुकसान सोसावे लागले नसेल का? नाही असे नाही, पण फारच अल्प. काही लोकांनी माझ्याशी दोस्ती केली पण ती खरी दोस्ती नव्हती, ते केवळ दोस्तीचे नाटक होते. काहींनी तेवढया ओळखीवर माझ्या काही मौल्यवान गोष्टी हडप केल्या; पण असे अनुभव फार विरळ. माझ्या या माणसांसाठी मला तनमनाने झिजावे लागते.


अगदी परीक्षेच्या दिवसांतही एखादयासाठी वेळ खर्चावा लागतो.
पण त्यात मला आगळा आनंद मिळतो. माझे सारे सुखच या छंदात सामावलेले आहे.
मित्रांनो तुम्हाला माझा आवडता छंद मराठी निबंध कसा वाटला , आपला आवडता छंद कोणता आहे हे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद.


निबंध 2

maza avadta chand marathi nibandh


माझा आवडता छंद संगीत आहे, संगीत ही अखिल मानवाची खरी भाषा आहे! ती देवरूप आहे. “जिथे संगीत तिथे पावित्र्य'- असं थोर तत्त्वज्ञ म्हणतो. “संगीतप्रेमी राजाच्या राज्यात सुखाची रेलचेल असते.” असं मेनसियस म्हणतो. यात नक्कीच तथ्य आहे.


घराच्या वातावरणातून व्यक्तित्व घडते. माझं कुटुंब संगीतप्रेमी म्हणून मीही संगीताच्या तालावर वाढलो. सुरात म्हटलेल्या कविता, भजन, सिनेमाची गाणी यांनी मी 'तानसेन' झालो. रविशंकरांची सतार, बिस्मिल्लांची शहनाई, शिवकुमारांची संतुर यांच्या सुरांच्या बरसातीत मी चिंब भिजू लागलो. शास्त्र कळत नसे पण सौंदर्य जाणवत असे. समाधी लागत असे. पेटीवर बोटे फिरवू लागलो. एरवी सामान्य वाटणारी बोटे पेटीवर जादूची वाटू लागत. वाढत्या वयाबरोबर संगीताचं ज्ञानही वाढू लागलं.


संगीत हा सर्वांत स्वस्त छंद. पण म्हटलं तर तितकाच महागडा. म्हणूनच कुठल्याही स्तरावरचा माणूस त्याचा आनंद लुटू शकतो. संगीताला ना स्थळांचे बंधन ना वेळेचे. न्हाणीघरही उत्तम जागा तर मध्यरात्रही उत्तम वेळ ! व्यक्तिगत तसेच सार्वजनिक मनोरंजनाचे एकमेव साधन-संगीत ! शुभकार्य- लग्न, बारशी, सण उत्सव- गणपती, नवरात्र, सभा-संमेलने या सर्वांना आनंदाचा, उत्साहाचा, शुचितेचा स्पर्श देत ते संगीतच! विलापालाही कारुण्याची किनार देतं ते संगीतच!... संगीतविरहित नृत्य किंवा सिनेमातील भावनांचा उत्कट प्रसंग रंगूच शकत नाही.

संगीत ही कोण्या एका वर्गाची मक्तेदारी नसते. लोकलमधून पैशासाठी गाणारा दरिद्रीनारायण इतका सुरेल असतो की त्यापुढे लक्ष्मीनारायणाच्या पैशाचा आवाज बदसूर वाटू लागतो... शास्त्र, कला व वाणिज्य या जीवनाच्या विद्यापीठाच्या तिन्ही शाखांचा अधिष्ठाता म्हणजे संगीत ! पेशकश ही कला, लहरींचं शास्त्र आणि उदरनिर्वाहाचं साधनही बनणारं संगीत म्हणूनच मला वामनाची पावलं वाटतात.


राष्ट्रीय गीत, वेदमंत्र ही संगीतात असतात. शब्द संपतात तिथे सूर जन्म घेतात. निसर्गाची भाषा सुरांचीच! झऱ्याचं गाणं, सागराचं गरजणं, पक्षांचे आवाज, ढगांचे आवाज... सारे आपल्याला संगीत शिकवतात. पण भौतिक सुखामागे कानात बोळे घालून धावणाऱ्या आम्हाला “छन्ऽछन्ऽऽ" या नगद नारायणाच्या शिवाय दुसरा आवाज ऐकू येत नाही.. चालायचंच! अभ्यासाने कंटाळलेल्या मला संगीताचे सप्तसूर संजीवन प्राप्त करून देतात.
खरंच, संगीत हा माणसानं निर्माण केलेला स्वर्ग आहे. या क्षणभंगुर आयुष्यामध्ये तेच एक शाश्वत सुख आहे...!


निबंध 3


My Hobby Essay in Marathi



छंद ! या शब्दाची व्याख्या अनेक विद्वानांनी वेगवेगळ्या शब्दांत केली आहे. माझ्या मते, आपल्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी म्हणजे छंद नव्हे, छंद म्हणजे नेहमीच्या गोष्टींशिवाय दुसऱ्याच काही गोष्टींची आवड निर्माण होऊन ती गोष्ट शिकणे किंवा त्या गोष्टीबद्दल माहिती जमवणे किंवा ती गोष्ट आणखी मिळविण्याचा प्रयत्न करणे.


छंद म्हणजे एक प्रकारचे वेडच असते. कुणाला छंद असतो वाचण्याचा, कोणाला काव्य करण्याचा, कोणाला शिकारीचा, कोणाला ग्रीटिंग जमा करण्याचा, तर कोणाला मित्रांसमवेत काही खेळ खेळण्याचा, तर कुणाला गाण्याचा, संगीताचा छंद असतो. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' या उक्तीला अनुसरून व्यक्ती तितके छंद असतात. प्रत्येकालाच वेगवेगळ्या प्रकारचे छंद असता.


मला छंद आहे वाचनाचा. लहानपणापासूनच मला वाचायचे वेड निर्माण झाले. का कुणास ठाऊक आमच्या आईने बाजारातून पुडी बांधून काही समान आणले, तरी त्या पुडीचा कागदही मी वाचून काढत असे. ग्रंथ हे मानवाचे खरे गुरू आहेत असे म्हणतात. स्वतःजवळचे ज्ञान ते कोणताही आडपडदा न ठेवता भरभरून दोन्ही हातांनी वाटत असतात. पण ते केवळ गुरूच असतात असे नाही बरं का ! माता-पिता, पुत्र, पत्नी, मित्र यांसारख्या सर्व नात्यांतून ते आपल्याला वेळोवेळी योग्य सल्ला देतात.


वाचनाच्या छंदामुळे आपले व्यक्तिमत्वही संपन्न होते. जगातील विविध संशोधकांची चरित्रे आपण वाचली तर आपल्या लक्षात येईल की, माणसे जाती, धर्म, देश, भाषा, चालीरीती या सर्व बाबतीत पूर्णपणे भिन्न होती; पण त्यांच्यातील एक सवय समान होती आणि ती म्हणजे वाचनाची. वाचनामुळे माणूस आपले ज्ञान अद्ययावत ठेवू शकतो आणि त्याच्या प्रगतीचा मार्गही सुकर होतो. ग्रंथवाचनाने आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. हे ज्ञान आपल्याला फुकट मिळत असते.


'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' या गीतोक्तीप्रमाणे ते निरिच्छ वृत्तीने आपली सेवा करतात. आपल्या जीवनात आनंद व समाधान यांचा जीवनरस ओततात. मात्र, त्या रसाची अवीट गोडी चाखण्याची रसिकता अंगी हवी. अनेक थोरामोठ्यांची चरित्रे, आत्मचरित्रे आपल्याला स्फूर्तिदायक ठरतात. आपल्या जीवनातील अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य वाचनातून निर्माण होते. म्हणून मी माझा हा छंद कायम जोपासण्याचा प्रयत्न करतो.




वाचनाच्या छंदामुळे मला संतांचा परिचय झाला. त्यांचे खडतर जीवन समजले. अनेक लेखकांच्या वाचनामुळे मला त्यांच्या जीवनाचा प्रवास समजला. खांडेकरांच्या 'ययाती' आणि 'अमृतवेल' या कादंबऱ्या वाचून जीवन जगण्याचा मार्ग समजला. फडक्यांच्या कलावादी दृष्टिकोनाने मन कलावादी बनले.


माटेंचे 'उपेक्षितांचे अंतरग वाचुन मला गलबलले कुसुमाग्रजांचा 'विशाखा' काव्यसंग्रह वाचून मातृभूमीविषयी अतूट नाते निर्माण झाले. तर अत्र्यांच्या उधळलेल्या झेंडु फुलांनी मला अगदी खदखदून हसविले. खरंच, मला या छंदामुळे खूप काही मिळविता आले. मला सर्वजण वाचाड्या' असे म्हणत, पण खरच मला ते मनापासून आवडत होते. कारण मला माहीत होते की, माझ्या छंदामुळे माझ्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. मला आत्तापर्यंत खूप बक्षिसे मिळाली ती कशामुळे वाचना मुळेच, म्हणजेच काही छंद माणसाला प्रसिद्धीच्या शिखरावर नेतात. त्यांत मी वाचनाच्या छंदाला अग्रक्रम देतो.


मला वाचाड्या हे टोपणनाव का पडले असावे ? कारण एकदा गंमतच झाली. मी रणजित देसाईंची 'श्रीमान योगी ही कादंबरी रेल्वेमध्ये वाचत होतो. मला तळेगावला जायचे होते. माझी कादंबरी वाचून संपली तेव्हा रेल्वे शिवाजीनगरला आली होती. विचारांती समजले की, मी त्याच लोकलने लोणावळ्याला जाऊन परत आले. ज्या कामासाठी जायचे होते ते काम बाजूला राहिले, पण माझी श्रीमान योगी' वाचून झाली. ही गंमत जेव्हा मी सर्वांना सांगितली तेव्हापासून मला हे टोपणनाव पडले आणि माझा जो वाचनाचा छंद होता तो चांगलाच गाजला.


कोणी काय काय बोलले ते सांगत नाही. तरीसुद्धा माझ्या मते, ग्रंथांचा सहवास आपल्यावर स्वर्गीय आनंदाची बरसात करतो. तो मन धुंद करतो आणि त्या धुंदीतून आपल्याला सर्व काही चांगले मिळते. वाचनाने विचाराला, चिंतनाला वाव मिळतो, म्हणून मला माझा हा गाजलेला छंद सर्वात जास्त आवडतो.


निबंध 4

माझा आवडता छंद short marathi nibandh
मुद्दे :

  • छंदाचा फायदा
  • छंद कसा लागला?
  • संग्रह
  • मिळणारा आनंद
  • बदललेल्या सवयी
  • होणारे इतर फायदे.




माणसाला कोणता ना कोणता चांगला छंद हवा कारण छंद माणसाला कष्टांतून विसावा देतो. माझा छंद जरा वेगळा आहे. त्याचे बीज माझ्या लहानपणीच रोवले गेले. आई नोकरी करत असल्यामुळे आजी माझा सांभाळ करत असे. आजी काम करत असताना नेहमी चांगल्या चांगल्या कविता म्हणत असे. त्यामुळे लिहा-वाचायला येण्यापूर्वीच अनेक कविता, काव्यपंक्ती माझ्या तोंडपाठ होत्या.




लिहायला यायला लागल्यापासून मी चांगल्या कविता उतरवून ठेवू लागलो. अशा अनेक वह्या आज भरलेल्या आहेत. त्या पुन:पुन्हा वाचायला मला आवडतात. आवडत्या कविता माझ्या ओठांवर सतत असतात.


या पाठांतराचा मला फायदा होतो. काव्यवाचनाच्या स्पर्धेत किंवा अंताक्षरीमध्ये मी नेहमी यशस्वी होते. आमच्या बाई कधी कधी ‘पावसावरच्या कविता', 'चांदण्यावरच्या कविता' किंवा 'आईवरील कविता' असा उपक्रम घेतात. त्या वेळी मीच आघाडीवर असते. निबंध लिहितानाही मला या छंदाचा उपयोग होतो. असा हा माझा कविता जमवण्याचा छंद मला खूप आवडतो.

निबंध 5

सत्य , शिव आणि सुंदरता यांचा मिलाफ म्हणजे कविता . माझे वडील उस्फूर्त कवी होते. सहकारी मंडळांच्या सभेत त्यांचे तोंडी काव्योद्गार बाहेर पडत . लेखणी व कागद यांचीही गरज नाही. साहजिकच मलाही कवितेचा छंद जडला यात नवल नाही. छंद विविध प्रकारचे असतात. वाचन , पक्षी-निरीक्षण, पिसे , तिकिटे, नाणी यांचा संग्रह करणे, चित्रकला , सुविचार-संग्रह इत्यादी . छंद आणि कला यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. आपल्या भावनांचे, विचारांचे, संस्कृतीचे, आत्म्याचे प्रकटीकरण म्हणजे कला. जोसेफ मॅझिनी म्हणतात
" कविता ही चेतना आहे. कविता ही गति आहे.


भविष्याचा मार्ग प्रकाशित करणारी ती चांदणी आहे.'' बालपणापासूनच मी अनेक कवींच्या कविता वाचत मोठा झालो. मला निसर्ग खूप खूप आवडतो. त्याचे नर्तन , त्याचे गर्जन , त्याचे दर्शन सारेच मला मंत्रमुग्ध करते. नकळत मी निसर्गाच्या कुशीत भावनांना शब्दबध्द करतो व माझी कविता जन्म घेते. निराश मन लेखणानंतर हलकं होत तर आनंदी मन लिखाणानंतर सुखावतं. भावनांना शब्दरूप देताना वेळ कसा निघून जातो ते कळतही नाही . वर्तमानपत्र, शालेय मासिके तसेच आकाशवाणी या माध्यमांद्वारे माझ्या कविता वाचकांना सोपविताना खूप आनंद होतो.


माझ्या या छंदाने मला खूप खूप समृद्ध केलंय. हिरवंगार मन त्यानेच मला दिलंय. शब्दांचे सामर्थ्य काय असते हे मला त्यामुळेच पटले आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा 'किनारा' काव्यसंग्रह तसेच प्रसिद्ध कवयित्री पद्मा गोळे यांचा 'श्रावणमेघ' काव्यसंग्रह असे अनेक काव्यसंग्रह माझ्या संग्रही आहेत. मला कविता वाचायलाही खूप आवडते . माझ्या अनेक कवितांचा सुंदर संग्रह मी करून ठेवला आहे. शब्दांची जुळणी, सुंदर कल्पनांचा आविष्कार , जीवनाचे मर्म यांचा मिलाफ म्हणजे खरी कविता होय. वर्डस्वर्थ यांनी म्हटलेच आहे
"कविता हे सर्व ज्ञानपुष्पांचे अत्तर आहे." मोजक्या शब्दात आशय मांडण्याचे कसब कवितेत आहे.


हृदयातील भावना कागदावर चित्रित होतात. छंद म्हणून मी कवितेला जिवापाड जपतो. तिच्याशिवाय माझी लेखणी अधुरी आहे . या छंदाने मला विविध कल्पना दिल्या आहेत . मी दिवाळी , संक्रांत , नाताळचा सण , नववर्ष यानिमित्त मित्र व नातेवाईक यांना शुभेच्छा पत्रे देतो. ही शुभेच्छा पत्रे मी घरीच बनवतो. छान कवितेतुन संदेश त्यावर लिहितो . मला माझ्या छंदाने खूप शाबासकी मिळवून दिली आहे, माझे खूप कौतुक झाले आहे. असा माझा आगळा-वेगळा छंद मी अखेरपर्यंत जपणार आहे. देवी सरस्वतीचा वरदहस्त लाभो हीच प्रभूचरणी प्रार्थना आहे.


मानवी जीवन क्षणभंगुर आहे. काळ कोणासाठी थांबत नाही. प्रत्येक क्षण सार्थकी लावला गेला पाहिजे . म्हणूनच जीवनात छंदाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. फावल्या वेळेत छंद म्हणून केलेला उद्योग कधी कधी नकळत व्यवसायही बनतो. रिकामे बसण्यापेक्षा ज्या गोष्टीची आवड आहे त्यातून काही निर्मिती करण्याचा आंनद खूप मोठा आहे. म्हणून छंद हा हवाच! तो आपल्या जीवनाचा अनमोल ठेवा आहे, मनाची मरगळ घालविणारा तो सुखद स्पर्श आहे. तो विरंगुळा असा आहे की, जो आपल्यास ताजेतवाना करतो.
"माझ्या छंदाबरोबर मी जगतच गेलो


निबंध 6

माझा आवडता छंद | "व्यक्ती तितक्या प्रकृती" असे म्हटले आहे. अर्थात प्रत्येकाची आवड निवड ही वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळ्या कृतीत गोडी वाटत असते. फावल्या वेळेचा सदुपयोग जर एखादा छंद जोपासण्यासाठी केला गेला तर काहीतरी नवीन निर्मिती होवू शकते. त्यातून स्वत:ला आनंद तर होतोच परंतु इतरांना सुद्धा त्याचा फायदा होवू शकतो. म्हणून छंद असणे ही चांगली बाब आहे.


मला बालपणापासून वाचनाचा छंद आहे. पाठ्य पुस्तकांव्यतिरिक्त इतर पुस्तके वाचण्याचा छंद, मला ५ वी पासून आहे. बाल वांड:मयातील कित्येक पुस्तके मी वाचून काढली. त्यामध्ये परीकथा, साहस कथा, चातुर्य कथा, बोध कथा इत्यादी पुस्तके वाचली. तसेच महापुरुषांच्या कार्याची ओळख करुन देणारी पुस्तके वाचली. 'इसापनीती' व 'जातक कथा' ही दोन पुस्तके मला अतिशय आवडली. इसापनीती व जातक कथा मध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचा आधार घेवून अनेक मानवी मूल्य शिकविली आहेत.

ह्या कथा वाचनाने वाचक निश्चितच सदगुणी बनतो. त्याचप्रमाणे जीवनात केंव्हा कोठे व कसे वागावे ह्याची जाणीव येते. परीकथा किंवा साहस कथांनी काही काळ आपण स्वप्नाच्या जगात रमतो परंतु वास्तव जीवन व स्वप्नाचे जग यात खूप अंतर आहे. म्हणून अशा कथा व्यावहारिक दृष्टीकोनातुन फारशा उपयोगाच्या वाटत नाहीत. परंतु विरंगुळा म्हणून साहसकथा किंवा परीकथा वाचायला हरकत नाही.


वाचनाचा हा छंद ज्ञान वाढविणारा आहे. करमणूकी शिवाय आपले ज्ञान वर्धित करणारा आहे. वाचन म्हणजे फावल्या वेळेचा सदुप पुस्तके वाचल्याने आपला शब्द साठा वाढतो व आपले भाषा ज्ञान समृद्ध है त्याचप्रमाणे कल्पनाशक्ती विकसित होते. वाचन सुधारते. विविध मुल्ये अंगी रुजतात. वाईट व्यसनांपासुन आपण दूर राहतो. पुस्तके मित्रांप्रमाणे दुर्गुणांपासून वाचतो. वाचनाने विचार क्षमता विकसित होते. बऱ्या वाईटाची जाणीव होते. योग्य अयोग्य गोष्टींची जाणीव येते. विवेक बुद्धी वाढीस लागते. एवढे सारे फायदे वाचनाने होतात. म्हणून हा छंद मी जोपासतो.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका 



निबंध 7 

माझा आवडता छंद मराठी निबंध | My Favourite Hobby Essay In Marathi



छंद म्हणजे कोणत्या तरी चांगल्या गोष्टीची आवड असणे, नाद असणे. माणसाला कोणता ना कोणता छंद असावा; म्हणजे त्याचा वेळ चांगला जातो. माझा छंद आहे उत्तम विचार असलेल्या उताऱ्यांचा संग्रह करणे.' लहानपणापासून मला वाचनाची खूप आवड आहे. 


याच माझ्या आवडीतून माझ्या या छंदाचा जन्म झाला. वाचनाची माझी आवड माझ्या बाबांच्या लक्षात आली होती. त्यामुळे ते मला उत्तम पुस्तके आणून देत असत. माझा दहावा वाढदिवस होता, तेव्हा बाबांनी मला एक सुंदर डायरी भेट दिली. 


बाबांनी ती डायरी दिल्यापासून मी वाचलेल्या प्रत्येक पुस्तकातील सुंदर वाक्ये, सुंदर कल्पना माझ्या डायरीत लिहू लागलो. पाहता पाहता माझी डायरी सुंदर विचारांनी व सुभाषितांनी भरू लागली. मग माझ्या बाबांनी मला दुसरी डायरी दिली... तिसरी डायरी दिली. आज या चार वर्षांत माझ्याजवळ अशा सात डायऱ्या झाल्या आहेत.


उत्तम गदय उताऱ्यांबरोबर मी त्यात मला आवडलेल्या काही सुंदर कविताही लिहून ठेवल्या आहेत. 'आई' या विषयावरच्या कितीतरी सुंदर ओळी माझ्याजवळ आहेत. आपल्याजवळचे फोटोंचे आल्बम जसे आपण पुनःपुन्हा पाहत असतो, त्याप्रमाणे माझा हा विचारसंग्रह मी पुनःपुन्हा वाचत असतो. हाच माझा आनंद आहे. 



हा विचारसंग्रह, या डायऱ्या म्हणजे माझा खजिनाच आहे. माणसांना विविध प्रकारचे छंद असतात. कुणी देश-विदेशांची नाणी गोळा करतात, कुणी स्टॅम्प्स गोळा करतात. कुणी प्रवासाला जातात; तर कुणी गिर्यारोहणाला जातात; तर कुणी देश-विदेशांतील दुर्मीळ वस्तू गोळा करतात. 


माणसाला छंद अवश्य असावा; पण माणसाने छांदिष्ट असू नये. आपल्या छंदामुळे दुसऱ्यांना त्रास न होता, त्यांच्या आनंदात भर कशी पडेल हे आपण पाहिले पाहिजे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


[शब्दार्थ : विचारसंग्रह - collection of thoughts. वियारसंग्रह. विचारों का संग्रह। खजिना-treasure. नी. खजाना। छांदिष्ट- slave of hobby. शोजनो गुवाम. सनकी (शौक का गुलाम)।]


माझा आवडता छंद मराठी निबंध | My Favourite Hobby Essay In Marathi

मी रांग लावतो किंवा रांगेतील काही अनुभव निबंध मराठी | Rang lavto Marathi Nibandh

आपले सारे बालपण रांग लावण्यात हरवले असल्याचे आमची आई नेहमी सांगत असते. दुसऱ्या महायुद्धाचे दिवस होते ते! त्या दिवसांत साऱ्या गोष्टींचे दुर्भिक्ष्य होते. दूध, पाणी, रॉकेल, धान्य साऱ्या दैनंदिन आवश्यक गोष्टींसाठी रांग अनिवार्य झाली होती. 'रांग' हाच मुळी जीवनाचा अविभाज्य घटक झाला होता. त्यावेळी रांगेत लग्ने जमत. रांगेवर कथा, कविता लिहिल्या जात आणि रांगेचे वर्णन करणारे ‘आम्ही रांगवाले, रांगवाले' हे भावगीत तर म्हणे विशेष लोकप्रिय झाले होते.


आज स्वातंत्र्योत्तर काळातही रांग आमचा पिच्छा पुरवीत आहेच. कुठे बसने जायचे असेल तर थांबा रांगेत. चांगला सिनेमा, नाटक पाहावयाचे असेल तर पकडा रांग. इतकेच काय, पण नावाजलेल्या शाळेत प्रवेश हवा असेल तर धरा पहाटेपासून रांग. अशी ही रांग अक्षरशः आमच्या पाचवीलाच पुजलेली आहे. अशाच एका रांगेत उभे राहण्याची वेळ माझ्यावर आली. त्याची ही कथा.

 सुटीत मामाच्या गावी जायचे म्हणजे मला ती आनंदाची पर्वणीच असते; पण बाबांनी यंदा जाहीर केले, "तुला जायचे असेल तर खशाल जा; पण तझे गाडीचे तिकीट तच काढन आणले पाहिजेस." हे ऐकून माझ्या पोटात भीतीचा गोळा उठला. कारण सुटीच्या मोसमात तिकीट काढायचे म्हणजे भल्यामोठ्या रांगेला तोंड देणे भाग आहे. पण ते आता अटळ हाते.




rang lavto essay marathi
 rang lavto essay marathi
तिकीट काढून आणण्यासाठी आईने मला भल्या पहाटे उठविले आणि सायकलवर टांग मारून मी स्टेशनवर आलो. नुकतेच उजाडत होते. मला वाटत होते, बहुतेक माझाच पहिला क्रमांक असेल. पण तेथील रांग पाहन मी चाटच पडलो. पहिली पाच-दहा मिनिटे रांगेचे टोक शोधण्यात गेली. नंतर रांगेच्या टोकाशी उभा राहून मी त्या रांगेचे मूळ शोधत होतो; पण मला ते काही दृष्टीस पडेना. पण आता मला हलताही येईना; कारण माझ्या पाठीमागेही ही रांग दूरवर पसरली होती, क्षणाक्षणाला मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढतच होती.


खिशातील पैसे सांभाळत मी रांगेत उभा होतो. लोक गप्पा मारू लागले होते. गप्पांचा विषय होता-'तिकिटांचा काळा बाजार.' उभे राहून राहून दमल्यामुळे काही लोक चक्क खाली बसले होते. तेथे भेदभाव नव्हता. सर्वजण एकाच ध्येयाने आलेले. सर्वांची तपस्या एकच. गप्पा ऐकता ऐकता वेळ कसा गेला ते कळलेच नाही. पावणेनऊच्या सुमारास रांगांचे रक्षण करण्यासाठी रेल्वे पोलिस अवतरले आणि नऊ वाजता खिडकी उघडली गेली.

 त्या क्षणी ढकलाढकल सुरू झाली. काही लोकांनी मध्ये घुसण्याचा यत्न केला; तेव्हा भांडणेही सुरू झाली. जेवढे बाहेरचे वातावरण तप्त, तेवढेच आतले तिकीटबाबू शांत होते. मुंगीच्या गतीने रांग सरकत होती. कुणी मध्ये घुसण्याचा यत्न केला की लोक चिडत. तेवढ्यात कुणाचा तरी खिसा कापला गेल्यामुळे लोकांचा गलबलाट वाढला.


 घड्याळाचे काटे फिरत होते, पोटात भकेचा डोंब उसळला होता; पण अदयापि माझा क्रमांक येत नव्हता. मध्ये मध्ये तिकीटबाबू येऊन कुठल्या गाडीची तिकिटे संपली ते फळ्यावर लिहीत होता. क्षणाक्षणाला माझी अधीरता वाढत होती. शेवटी ११ वाजता मला तिकीट मिळाले. आता शरीरातले त्राण संपले होते. मी तिकीट घेऊन मागे वळलो, तर तेथे बाबा उभे होतेच. माझी दयनीय अवस्था पाहून त्यांनी मला उपाहारगृहात नेले हे सांगायला नकोच!

मी रांग लावतो किंवा रांगेतील काही अनुभव निबंध मराठी | Rang lavto Marathi Nibandh

शालेय जीवनातील गमतीजमती मराठी निबंध
Shaletil Aathvani In Essay Marathi


शालेय जीवनातील विनोद शाळेतील स्नेहसंमेलन चालू होते. राम-रावणाच्या जीवनातील पौराणिक नाटक विदयार्थी सादर करीत होते. नाटक फार रंगात आले होते. तीन हजार विदयार्थी श्वास रोखून रावण व मारुती यांच्यातील प्रवेश पाहत होते आणि अचानक काय झाले कोणास ठाऊक! रावण झालेल्या पात्राला लावलेल्या नऊ खोट्या तोंडांपैकी एकएक तोंड गळून पडू लागले.

प्रथम प्रेक्षकांना काही समजेना. हा काहीतरी 'ट्रिक सीन' असावा असे त्यांना वाटले; पण सिंहासनावर आरूढ झालेला देशमुख मात्र त्यामुळे गोंधळन गेला. त्याला आपली वाक्ये आठवेनात. तेव्हा विदयार्थ्यांच्या लक्षात आले की, रावणाला लावलेल्या या कृत्रिम मुखवट्यांना सांधणारी दोरी तुटली आहे. मग काय हशाचा नुसता कल्लोळ उडाला!


राम-रावण युद्ध होण्यापूर्वीच दशानन रावणाचा पराभव झाला होता आणि सगळ्या नाटकाचा बट्ट्याबोळ झाला होता. असे हे स्नेहसंमेलन होऊन कितीतरी दिवस लोटले, तरी ही विनोदी घटना आम्ही विदयार्थी विसरू शकलो नाहीत. जय शाळेच्या जीवनातील असे हे विनोदी प्रसंग म्हणजे वाळवंटातील 'ओयासिसच' जणु! आम्ही विदयार्थी विनोदासाठी नेहमीच आसुसलेले असतो. त्यासाठी आमचे काही ना काही उपद्व्याप चालूच असतात. 


शिक्षकांचे लक्ष नाही हे पाहून एखादया दोस्ताच्या शर्टाला 'हे विकाऊ गाढव आहे'-अशी चिठ्ठी लावली जाते. मग ओठ दाबून हसण्याची खसखस पिकते. तरीपणचाणाक्ष गुरुजी ओळखतात की, वर्गात काहीतरी गडबड आहे. मग आमच्या या विनोद बुद्धीची गणना 'वाहयातपणा'त होते.



Shaletil Aathvani In Essay Marathi


Shaletil Aathvani In Essay Marathi


'टवाळा आवडे विनोद' हे समर्थांचे मत गुरुजी आम्हांला नेहमीच सुनावीत असतात. पण 'जीवनातील तारुण्याचे खरे रहस्य विनोदात दडले आहे,' हा विनोदाच्या भाष्यकाराचा-आचार्य अत्रे यांचा संदेश हे आमचे 'आचार्य' मात्र सोयिस्करपणे विसरलेले असतात. वर्गातील विनोदाला खरा बहर येतो तो मोकळ्या तासाच्या वेळी. मग वर्गातील अनेक विदुषकांच्या कल्पनाशक्तीला बहर येतो. 

उत्तम विनोद निर्माण करण्यासाठी तल्लख बुद्धीची आणि बहुश्रुततेची नितांत आवश्यकता असते, याची प्रचीती तेव्हा येते. अशा मोकळ्या तासाच्या वेळी एखादा 'पुस्तकी किडा'रूपी स्कॉलर वर्गाच्या एखादया कोपऱ्यात हमखास अभ्यास करीत बसलेला आढळतो. असा हा वर्गमित्र वर्गाला विनोदासाठी उत्तम विषय ठरतो. मग सारा वर्ग त्याच्यामागे हात धुऊन लागतो. कित्येकदा हा स्कॉलरही आपली गंभीरपणाची कात टाकून खेळकरपणा स्वीकारतो व मग तोही शालेय जीवनातील विनोदाचा आस्वाद घेऊ लागतो.


शालेय जीवनात असे अनेक प्रकारचे विनोद घडत असतात. कधी कधी पाठ्यपुस्तकातील लेखकांच्या वा प्रसिद्ध व्यक्तींच्या छायाचित्रांना दाढीमिश्या लावून त्यांना विविध रूपे दिली जातात आणि मग एखादा सात्त्विक वृत्तीचा लेखक पक्का दरोडेखोर झालेला दिसतो. स्नेहसंमेलन, सहली अशा प्रसंगी तर विनोदाला बहर येतो. एकदा आमच्या वर्गात एक खुप लठ्ठ मूलगी होती आणि तिचे नाव होते 'शशी', 

सहलीत 'फिश पाँड'च्या कार्यक्रमात तिला 'फिश पाँड' मिळाला शशी वाढतो कलेकलेने। शशी वाढते किलोकिलोने॥
शालेय जीवन संपले, तरी शालेय जीवनातील या गमतीजमती, हे विनोद विसरले जात नाहीत. ते सदैव आपल्या स्मरणात राहून आपले जीवन फुलवीत असतात.


वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते
  • माझ्या आठवणीतील शाळा निबंध
  • शाळेत घडलेला विनोदी प्रसंग निबंध
  • शालेय जीवनातील आठवणी निबंध

शालेय जीवनातील गमतीजमती मराठी निबंध | Shaletil Aathvani In Essay Marathi

माझे पहिले भाषण मराठी  निबंध | My First Speech Essay In Marathi

निबंध 1 
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझे पहिले भाषण मराठी निबंध बघणार आहोत. आज एवढ्या मोठ्या समारंभात हजारो प्रेक्षकांसमोर एका नामांकित साहित्यिकाकडून माझा गौरव करण्यात आला. मला पारितोषिकासोबत मिळालेले ते संदर प्रशस्तिपत्रक आताही माझ्या समोर आहे. त्या समारंभात मिळालेल्या पुष्पगुच्छातील फुलांच्या परिमलाने माझी अभ्यासिका अजूनही दरवळते आहे. साऱ्या महाराष्ट्रात विख्यात असलेल्या 'रानडे वक्तृत्वस्पर्धे'त मी पहिला क्रमांक मिळवून पाचशे रुपयांचे बक्षीस मिळविले होते.


त्यासाठी हा सत्कारसमारंभ झाला होता. त्यामुळे आता माझ्या डोळ्यांसमोर प्रसंग उभा होता तो 'माझ्या आयुष्यातील पहिल्या भाषणाचा'. या पहिल्या भाषणाच्या वेळी मी मनात जो संकल्प सोडला होता, तोच आज पूर्ण झाला होता. आजवर विविध वक्तृत्वस्पर्धांत मी अनेक बक्षिसे मिळविली होती. पण हे बक्षीस पटकावून मी एका त-हेने उच्चांक गाठला आहे. याचसाठी मी अट्टाहास केला होता. माझे पहिले भाषणही मी केले होते, ते असेच आव्हान पत्करूनच. 


मला आठवते की, त्यावेळी मी नुकताच हायस्कूलात जाऊ लागलो होतो. घरातील शेंडेफळ म्हणून मी जरा अधिकच लाडात वाढलो होतो. त्यामुळे पाचवीत पोहोचलो तरी बोबडे बोल माझ्या तोंडून काही सुटले नव्हते. इतकेच नव्हे तर कित्येकदा बोलताना मी अडखळतही असे. माझ्यातील या वैगुण्यामुळे माझे वर्गमित्र माझी नेहमीच चेष्टा करीत असत. त्यामुळे वक्तृत्वस्पर्धेत भाग, घेण्याबाबत गुरुजींनी विचारले असता मी जेव्हा माझे नाव देण्यासाठी उभा राहिलो, तेव्हा संपूर्ण वर्गात हशा पिकला. 



maze pahile bhashan nibandh in marathi
maze pahile bhashan nibandh in marathi

गुरुजींनीही माझी चेष्टा करून मला स्पर्धेत भाग घेण्यापासून वंचित केले. त्या दिवशी मी रडत रडतच घरी आलो. मी फार दुखावलो होतो; पण माझे मन जाणले ते माझ्या आईने! ती गुरुजींना भेटली आणि आपण तयारी करून घेत असल्याचे त्यांना आश्वासन दिले. बस्स! त्या दिवसापासून माझ्या पहिल्या भाषणाच्या तयारीला निश्चयाने सुरुवात झाली. मला आठवते, माझे ते भाषण महाकवी रवींद्रनाथ टागोरांविषयी होते. 


त्या स्पर्धेच्या वेळी तिघे नामांकित वक्ते परीक्षक म्हणून समोर बसले होते. संपूर्ण हॉल विदयार्थ्यांनी गच्च भरला होता. एकापाठोपाठ एक विदयार्थी व्यासपीठावर येऊन भाषण करून जात होते. आणि माझ्या डोळ्यांसमोर गेल्या महिन्यातील सारी धडपड उभी राहिली होती.

या भाषणासाठी माझी सारी तयारी आईने करवून घेतली होती. भाषणही तिनेच लिहिले होते. रोज सकाळी ती मला लवकर उठवत असे. भाषणातील प्रत्येक शब्द स्पष्ट उच्चारला जावा यावर तिचा कटाक्ष होता. भाषणाची अखेर टागोरांच्या 'गीतांजली'तील पंक्तीनेच केली होती. मी या विचारात गुरफटलो असतानाच माझे नाव पुकारले गेले आणि मी भाषण करण्यासाठी व्यासपीठावर जाऊन उभा राहिलो. 


श्रोत्यांनी भरलेला हॉल प्रथमच पाहिला आणि क्षणभर माझे डोळे दिपले. भाषणातील काही आठवेना. इतक्यात आईचे शब्द आठवले, “हे बघ, आपल्याला हसणाऱ्यांचे हसे करावयाचे आहे बरं का!" आणि मी आवेशाने भाषणाला सुरुवात केली. टाळ्यांचा कडकडाट झाला तेव्हा मला कळले की, आपले भाषण संपले. व्यासपीठावरून उतरताना अनेकांनी जवळ बोलावून माझी पाठ थोपटली तेव्हाच स्पर्धेचा निकाल जणू जाहीर झाला होता. हसणाऱ्यांचे हसे झाले होते. त्यांची तोंडे बंद झाली होती आणि तेव्हापासून वक्तृत्वस्पर्धा म्हटली म्हणजे सर्वांच्या डोळ्यांसमोर मीच उभा राहतो.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील  निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद
निबंध 2

माझे पहिले भाषण


झोपाळ्यावर बसून मोठ्या मजेत माझे कवितावाचन चालू होते. विराट राजाचा पुत्र उत्तर, राणीवशात आपल्या शूरपणाच्या भाकडकथा ऐकवीत होता. पण प्रत्यक्ष युद्धभूमीवर मात्र त्याची कशी गाळण उडाली याचे मोठे मार्मिक वर्णन मोरोपंतांनी केले आहे. उत्तराच्या फजितीचे वर्णन वाचून हसायला आले. पण क्षणभरच ! दुसऱ्याच क्षणी उत्तराच्या जागी मला माझी मूर्ती दिसायला लागली. फरक एवढाच होता की उत्तर रणभूमीवर घाबरला होता आणि मी व्यासपीठावर ! 


मला अजूनही तो दिवस चांगला आठवतो. आमच्या शाळेच्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन होते. उद्घाटनासाठी सुप्रसिद्ध लेखक श्री. रवींद्र पिंगे यांना पाचारण केले होते. मी स्नेहसंमेलनाची सचिव असल्यामुळे पाहण्यांचा परिचय करून देण्याचे काम साहजिकच माझ्याकडे आले.


एरवी अष्टौप्रहर बडबड करणारी मी ! मला ते काम फारसे अवघड वाटले नाही. त्यामुळे मी ते सहजपणे स्वीकारले. बाईंनाही माझ्या धीटपणाविषयी खात्री होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी एक छोटेसे पण सुंदर भाषण लिहून काढले. सुदैवाने स्मरणशक्ती चांगली असल्यामुळे, एका दिवसात ते खाडखाड पाठ झाले. एकंदरीत माझ्या भाषणाच्या तयारीवर मी जाम खूष होते. आपल्या वक्तृत्वावर खूष होऊन श्रोतेजन टाळ्यांचा कडकडाट करीत आहेत, 

आपल्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे, बाई कौतुकाने आपली पाठ थोपटीत आहेत अशी स्वप्नं मला पडू लागली. बड्या पाहुण्यांसमोर मला मिळणार असलेल्या संधीचा माझ्या काही मैत्रिणींना हेवा वाटत होता तर काहींना माझे कौतुक वाटत होते.


भाषणाचा दिवस उजाडला. कार्यक्रमाची वेळ जवळ येऊन ठेपली. शाळेचा परिसर श्रोत्यांनी फुलून गेला होता. मा. पाहुण्यांचे स्वागत झाले. सुरेल आवाजात स्वागतगीत गायिले गेले आणि काय झाले कोणास ठाऊक. माझ्या मनात भीतीने हळूच शिरकाव केला. छाती धडधडू लागली. घशाला कोरड पडली. माझं नाव पुकारलं जाताच स्टेजवर चढण्याची कशीबशी हिंमत केली. पण माईकसमोर उभं राहिल्यावर तर माझा अक्षरशः अर्जुन झाला. नव्हे, उत्तर झाला.



म - म - मला, भा - भा - भाषण देण्याची भी - भी - भीती, असं म्हणून मी मटकन खाली बसले. झालेल्या फजितीमुळे मला स्वतःची इतकी काही लाज वाटत होती की पुढील कार्यक्रमातील एकही शब्द मला ऐकू आला नाही. तर असं झालं माझं पहिलं (आणि शेवटचं) भाषण.

तेव्हापासून मी भाषणाचा इतका काही धसका घेतला आहे की भाषण देणं सोडाच मी कोणाचं भाषण ऐकायलाही जायचं धाडस करत नाही. भाषणाला मी कायमचा रामरामच ठोकला आहे म्हणा ना ।

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 3
 
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझे पहिले भाषण मराठी निबंध बघणार आहोत.  


तो दिवस मला अजून आठवतो. त्या वेळी मी पहिलीत होते. नगर-वाचनालयात वक्तृत्वस्पर्धा होत्या. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्या स्पर्धा असाव्यात. शाळेतील बाईंच्या व आईच्या सक्तीमुळे मी स्पर्धेत भाग घेतला होता. भाषण केलं की, बक्षीस मिळतं, प्रशस्तिपत्रक मिळतं, अशी लालूच त्यांनी दाखवली होती.


सकाळी नऊ वाजता पूर्ण तयारीनिशी, मोठ्या आत्मविश्वासाने व चेहऱ्यावर खोटे धैर्य धारण करून मी सभागृहात पाऊल टाकले. भाषणाची तयारी शाळेत बाईंनी व घरी आईनं छान करून घेतली होती. मीही त्यांना न अडखळता, सावकाशपणे भाषण म्हणून दाखवले होते. त्यामुळे मी नक्कीच बक्षीस पटकावणार या कल्पनेत त्या होत्या. मी सभागृहात गेले तेव्हा श्रोते फारच कमी होते. त्यामुळे मी निःश्वास सोडला. पण हळूहळू श्रोत्यांच्या संख्येत भर पडू लागली, तसतशी माझी भीती वाढू लागली व आत्मविश्वास कमी होऊ लागला.


सर्व श्रोते, स्पर्धक व परीक्षक जमले तरी अध्यक्षमहाराजांचा पत्ता नव्हता. अर्धा तास वाट पाहिल्यावर अध्यक्षमहाशय, आपण कोणी तरी 'खास' आहोत असे समजून प्रवेश करते झाले. भाषणांना सुरुवात झाली. इतर वक्त्यांची भाषणे ऐकून मी तयार केलेलं भाषण विसरल्यासारखे वाटू लागले. त्यांच्या भाषणातील वाक्ये तोंडात येऊ लागली, कानात घुमू लागली. 


तेवढ्यात माझं नाव पुकारलं गेलं. सर्वांचं लक्ष माझ्यावर केंद्रित झालं. जागेवरून उठून मी व्यासपीठापर्यंत गेले. मी व व्यासपीठ यांच्यात फक्त दहा-पंधरा पावलांचं अंतर होतं. पण मी इतक्या संथपणे व्यासपीठाकडे गेले की, माझ्या त्या अभूतपूर्व संथ चालीला सर्वजण हसायला लागले. भाषणाच्या दडपणाच्या मणा-मणाच्या बेड्या माझ्या पायात पडल्यासारखं वाटत होतं. संथ गतीला 'गज-गती' म्हणतात पण माझी चाल उससे भी जादा संथ होती. जसजसे श्रोते हसू लागले तसतशी मी अधिक बावरले.



या सगळ्या प्रसंगाला तोंड देऊन मी कशीबशी व्यासपीठावर चढले आणि उसनं अवसान आणून मी सर्व भाषण न चुकता न अडखळता म्हणत होते. तरी श्रोत्यांमध्ये चुळबुळ का सुरू व्हावी मला काहीच कळेना. नंतर मी भाषण संपवून माझ्या जागेवर परतले तेव्हा समजलं की, मी इतक्या हळू आवाजात भाषण केले की ते माझ्याशिवाय कोणालाच ऐकू आलं नाही. 


टी. व्ही. चा आवाज बंद करून नुसता टी. व्ही. चालू ठेवला की, कशी नुसती तोंडं हालताना दिसतात, तशीच मी भाषण करताना दिसत होते. माझ्यानंतरची भाषणं जांभया देतच ऐकली. केव्हा एकदा सभागृहातून बाहेर पडीन असं झालं होतं. पण लगेच दहा मिनिटात स्पर्धेचा निकाल जाहीर होईल तेव्हा कोणी बाहेर पडू नये,' असं जाहीर करण्यात आलं, त्यामुळे थांबणंच भाग पडलं. आजच्या सभेत सर्व स्पर्धकांना प्रशस्तिपत्रकं मिळणार होती.

पुन्हा एकदा माझं नाव पुकारलं गेले. मी प्रशस्तिपत्रक घेऊन आले. या वेळी मात्र मी झटकन जाऊन पट्कन परत आले. पण काही का होईना, त्या पहिल्या प्रशस्तिपत्रकानं मला जेवढा आनंद झाला, तेवढा कदाचित् जिल्ह्यातील वक्तृत्वस्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्यावरही झाला नसेल!
मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील  निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 4 

माझे पहिले भाषण

१२ वर्षांपूर्वीचा तो काळ. ७ जून उजाडला. शाळा सुरू झाली. मीही माझा नवा गणवेश घालून नवे दप्तर, नवी
पुस्तके घेऊन शाळेला जाण्यास सज्ज झाले.
'आई, उशीर होतोय गं ! डबा आणतेस ना !'

'या नीलेची सतत गडबड आणि धांदल, चांगली सातवीत गेली पण गडबड काही संपत नाही.' असे पुटपुटत आई बाहेर आली नि डबा नीलेच्या ताब्यात दिला.

लहानपणापासूनच माझ्या आईवडिलांना माझा फार अभिमान. आपली नीला मोठी हुशार आहे. ती मोठी झाल्यावर विदुषी होणार असे, तर तिने गृहीतच धरले होते. 'नीले, चांगली शीक ग बाई ! आम्हांला शिकायला नाही मिळाले. म्हणनच ही जन्माची ताबेदारी अन् चूल खंडाची गुलामगिरी चालू आहे बघ.' आपली मुलगी विविध कलांनी संपन्न असावी अशी तर तिची सुप्त इच्छा. एकदा तिच्या वाचनात 'वक्तृत्व कला ही अनेक ज्ञानाची जननी आहे, असे आले. धीटपणा, अभ्यास त्याच्यासाठी वाचन, विषयासाठी समर्पक मुद्दे काढणे आणि ते सर्वांसमोर उत्तम रीतीने सादर करणे. झाले, आईसाहेबांची ट्युशन सुरू झालीच.


भाषण कसे करावे, भाषण करताना कसे उभे राहावे, कितपत हातवारे करावेत, आवाज चढवावा कुठे, उतरवावा कोठे, याचे धडे रोज मिळू लागले. त्यातच गणेशोत्सव आला आणि शाळेत स्पर्धा सुरू झाल्या. माझ्यापेक्षा आईलाच जास्त आनंद झाला. मला मात्र खरेच वक्तत्व कलेत अजिबात गोडी नव्हती. परंत केवळ मातोश्रींच्या धाकाने आणि तिच्या हव्यासापोटी माझी भाषणाची तयारी सरू झाली होती. त्या काळात माझा गुरू आणि माझा श्रोता एकच होता, माझा आई.

तिच्या इशाऱ्यानुसार माझा आवाज वर-खाली होई. योग्य ठिकाणी थांबे घेई. आईसाहेबांची येणाऱ्या-जाणाऱ्यांपुढे तारीफ चाललेली असायची. 'आमची नीलू किनई दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये जाणार आहे, भाषण द्यायला.'
त्यावर्षी म. गांधींची जन्मशताब्दी सुरू होतो. त्यामुळे अखिल भारतात शाळाशाळातून-महाविद्यालयातून 'गांधी शताब्दी वर्ष' साजरे केले जात होते. त्यानिमित्त आमच्याही विद्यालयात मुलामुलींच्या वक्तृत्व स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. आणि आईच्या आग्रहाखातर मीही स्पर्धेसाठी नाव नोंदवले होते. 


आईसाहेबांचे मार्गदर्शन सुरू होतच. एकदाचा तो दिवस उजाडला. सात मिनिटांपर्यंत बोलायचे होते. माझा नंबर पुकारला. मी सुरुवात जोरात झाली, उत्सुकता वाढवली. माझी भीती ही कमी झाली होती. पाठीमागे बसलेल्या आई-बाबांकडे पाहायचेच नाही असे ठरवूनही चोरटी नजर जात होतीच. परीक्षक आणि भरगच्च भरलेला वर्ग अधूनमधून नजरेखाली येत होते. पायाला-हाताला कप सुटला होता परंतु मातोश्रींचे शब्द आठवले, 'आपल्यासमोर कोणीही बसले नाहीत असे समजून बोलायला सुरुवात कर...' अध्यक्ष महोदय... म्हटले अन् स्वतःला सावरत-सावरत सुरुवातीला उसने अवसान आणून केली.


 अफाट जमलेल्या विद्यार्थी आणि श्रोतृवर्गाकडे पाहून सर्वांगाला घाम फुटतो की काय असे झाले होते. टेबलाचा आधार घेत, क्षणभर डोळे मिटून घेतले आणि भाषण चालू ठेवले. श्रोतृवृंदातूनही खोकणे, खाकरणे चालूच होते, पण नंतर मी माझे भाषण घडाघडा बोलत राहिले. योग्य तयारीनुसार सर्व सुरू ठेवले होते. हावभाव करीत होतेच पण ते समजतही नव्हते... समोरचा समाजही अंधूक-अंधूक दिसत होता. विषयही संपत आला होता. वॉर्निंग बेल झाली अन् मी बोलणे आटोपते घेतले. 


महात्मा गांधीजींना वंदन करून व्यासपीठावरून खाली उतरले. टाळ्यांचा कडकडाट सातत्याने चालू राहिला. अंगाला भरलेले कापरे आता एकदम थंड पडायला लागले. खाली उतरून भराभरा निघाले ते आईच्या कुशीतच शिरले. आई-बाबा दोघेही शाबासकी देत होते. 'छान झालं. छान बोललीस' म्हणत होते. वाटत होते की ते कौतुकापोटी बोलताहेत,


 माझ्यानंतर तीन स्पर्धकांची भाषणे झाली. तिकडे माझे लक्षच नव्हते. मध्यंतराची अर्धा तास सुट्टी दिली. पुन्हा सभागह भरले. अध्यक्ष उभे राहिले त्यांनी पहिल्या क्रमांकासाठी माझे नाव जाहीर केले, मला तर आनंदयक्त धक्काच बसला पन्हा टाळ्याचा कडकडाट झाला आणि 'नीला देसाई' पहिल्याच भाषणात 'वक्ता' बनली. पण डोळ्यासमोर सारखी दिसत होती ती माझ्या आईची जबरदस्त इच्छा, तिचे प्रयत्न. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

माझे पहिले भाषण मराठी निबंध | My First Speech Essay In Marathi