कल्पनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कल्पनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

यंत्रे संपावर गेली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक | Yantra Sampavar Geli Tar Marathi Nibandh

यंत्रे संपावर गेली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक | Yantra Sampavar Geli Tar Marathi Nibandh आज आपण पावलोपावली यंत्रांवर अवलंबून असतो. ही यंत्रे आता आपल्या नित्य व्यवहारात एवढी एकरूप झाली आहेत की ती यंत्रे आहेत व त्यांच्याविना आपले अडेल हे आपल्याला उमगतही नाही. कळले तरी वळत नाही. मग अनेकदा आपण त्या यंत्रांना अतिशय निष्काळजीपणे वागवतो. एकदा काय झाले, ही यंत्रे रागावली आणि त्यांनी आपली संघटना स्थापन केली. या संघटनेने संपाचा आदेश दिला. एका मध्यरात्री सारी यंत्रे संपावर गेली. मग जो गोंधळ उडाला तो काय वर्णावा!



सकाळी नेहमीप्रमाणे घड्याळाने आपला गजरच केला नाही. त्यामुळे सर्वांना जाग आली ती उन्हं वर आल्यावरच. धावत धावत आई नळाजवळ गेली; पण नळातून एक थेंबही पाणी येत नव्हते. घरातला फ्रीज बंद पडला होता. रेडिओ बोलत नव्हता. पंखा फिरत नव्हता. घराबाहेर आलो तर लिफ्टही चालत नव्हती. सगळेजण हवालदिल झाले. रोज सकाळी सकाळीच वृत्तपत्रे वाचायची सवय. सवय कसली, व्यसनच म्हणा ना! पण आज त्या वृत्तपत्रांचाही पत्ता नव्हता.



रस्त्यावर एकही गाडी धावत नव्हती. बस नाही, स्कूटर नाही, साधी सायकलही नाही. रस्त्यावर फक्त दिसत होती माणसेच माणसे. सारीच गोंधळून गेलेली. हे काय आहे? असे कशामुळे झाले? जरा चौकशी करा, वृत्तपत्रांकडे विचारा. पोलिसांना कळवा. कुणीतरी कल्पना काढली . फोन करा, फोन उचलला गेला, पण त्यातून कसलाच आवाज आला नाही. फोनही बंद. आता पायी चालण्याशिवाय पर्याय नव्हता. लोक हिंडू लागले, अदमास घेऊ लागले.

yantra sampavar geli tar marathi nibandh
yantra sampavar geli tar marathi nibandh


नेहमी यावेळी गजबजलेली स्टेशने आज शांत होती. म्हणजे माणसे जा-ये करीत होती; पण गाड्याच धावत नव्हत्या. 'पूतळ्याच्या' खेळातल्याप्रमाणे त्या जागच्या जागी उभ्या होत्या. बेकरीत ब्रेड नव्हता. मार्केटात भाजी नव्हती. शहरातील सारे जीवन विस्कळीत झाले होते. पाण्याच्या अभावामुळे लोकांच्या तोंडचे पाणी पळाले होते.
सहज एका रुग्णालयात डोकावलो, तेथे तर हाहाकार उडाला होता.


 यंत्रे थांबल्यामुळे शल्यविशारद शस्त्रक्रिया पार पाडू शकत नव्हते. त्यामुळे रोग्यांचे विलक्षण हाल होत होते. पंखे फिरत नव्हते. रक्त, सलाईन देता येत नव्हते. एका कमी वजनाच्या बाळाला दिवे लावून विशिष्ट उबेत ठेवले होते. पण तो दिवाच बंद पडला होता. त्यापेक्षा शोचनीय गोष्ट म्हणजे-एका हृदयविकाराच्या रुग्णाला कृत्रिम श्वासोच्छ्वासाचे यंत्र लावून ठेवले होते, ते यंत्र बंद पडल्याने तो रोगी गतप्राण झाला होता!  



सारे वातावरण बेचैन, अस्वस्थ होते. यंत्रविशारद यंत्रांशी झगडत होते; पण यंत्रे चालूच होत नव्हती. अशा अस्वस्थ वातावरणात दिवस तर संपला. यंत्रे चालू होत नव्हती; पण आकाशातील सहस्ररश्मीचे यंत्र मात्र व्यवस्थित चालु होते. ठरलेल्या वेळी भास्कर अस्ताचलावर गेला आणि सर्वत्र काळोख पडला. नेहमी विजेच्या दिव्यांनी झगमगणारे ते शहर! पण त्या दिव्यांनीही असहकार पुकारला होता. त्यामुळे सर्वत्र पणत्या, मेणबत्त्या तेवत होत्या. या शहरातील लोकांचे आज प्रथम लक्ष गेले ते आकाशातील चंद्राकडे व चांदण्यांकडे. पण तरीसुद्धा पृथ्वीवरचा काळोख नकोसा झाला होता. शेवटी मानवी उपाय संपल्यावर सर्वांना आठवण झाली ती दैवी उपायांची.



सर्वधर्मीय मानवांनी शहरातील मोठ्या पटांगणावर येऊन यंत्रांची क्षमा मागितली यंत्रदेवाला विनविले, “या पामरांना माफ कर आणि यंत्रांची चक्रे सुरू कर. यंत्राविना माणूस अपूर्ण आहे." यंत्रजगतात खळबळ उडाली, विचारविनिमय झाला. दिली तेवढी शिक्षा बस झाली असा विचार एकमताने ठरला आणि यंत्रांनी संप मागे घेतला. कारण अखेरीस मानवच त्यांचा जन्मदाता होता. दिवे लागले, पंखे फिरू लागले, नळांना पाणी आले, सर्वत्र आनंदीआनंद झाला.


वरील निबंध यंत्रे संपावर गेली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

यंत्रे संपावर गेली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक | Yantra Sampavar Geli Tar Marathi Nibandh

सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध 
Essay on sun in marathi
Surya Ugavala Nahi Tar Essay in Marathi

निबंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण सूर्य उगवला नाही तर मराठी निबंधबघणार आहोतसुर्य उगवला नाही तर असा विचारही करणे आपल्‍यासाठी कठीण आहे. कारण जसे मानवाला अन्‍नवस्‍त्रनिवारा या मुलभुत गरजा आहेत त्‍यासोबतच सुर्याचीपण नितांत आवश्‍यकता आहे.ते खालील निबंधावरून समजुन घेता येईल.

 दहावी - बारावी इयत्तेतील विदयार्थ्यांचे जे काही हाल होतात, ते अन्य लोकांना समजणे अशक्यच आहे. ज्यांना हे समजून घ्यायचे असतील, त्यांनी या दहावीबारावीच्या परीक्षेला बसून बघावेच ! सुखाची झोप टाकून पहाटे पहाटे उठणे, पेंगुळणाऱ्या डोळ्यांनी अभ्यासाला बसणे, धावत-पळत क्लासला जाणे. पुन्‍हा घुऊन येऊन गृहपाठ . मग शाळेत जाणे,  

शाळेतून आल्यावर पुन्हा क्लासला जाणे, घरी आल्यावर पुन्हा अभ्यासाला बसणे व रात्री उशिरापर्यंत सराव प्रश्नपत्रिका सोडवायला बसणे या रहाटगाड्यात अक्षरशःआम्ही पिळून निघतो ! सकाळी जबरदस्तीने उठताना वाटते - हा सूर्य उगवला नाही तर किती बरे होईल ! सगळी पीडा नाहीशी होईल ! 

खरेच सांगतो, माझ्या मनात अनेकदा हा विचार येतो - सूर्य उगवला नाही तर ? तर... सगळी मज्जाच मज्जा ! मग सकाळी उठायची कटकट नसेल. हवे तितके मनसोक्त झोपता येईल ! उठल्यावरही कसली घाई नसेल. शाळेत जाण्याची धावाधाव नसेल. मनसोक्त टी. व्ही. पाहता येईल. पत्ते, कॅरम हे खेळ भरपूर खेळता येतील.

अमूक वाजले; आता हे करा; तमूक वाजले; आता ते करा. असल्या जाचातून मुक्तता होईल. सूर्यच नसल्याने घामाच्या धारा नसतील आणि कडाक्याच्या उन्हाळ्याने हैराण व्हावे लागणार नाही ! 

surya-ugawala-nahi-tar-essay-in-marathi
surya-ugawala-nahi-tar-essay-in-marathi
कडक उन्हाळाच नसल्याने नदी-नाले-विहिरी आटण्याचा प्रश्नच येणार नाही. मैल मैल अंतरावरून पाण्याचे हंडे वाहून आणण्याचे काबाडकष्ट करावे लागणार नाहीत. दिवसच नसल्याने सगळ्यांची कामाची ठिकाणे जवळच असतील. दूर दूर अंतराच्या प्रवासाची दगदग संपलेली असेल. आई-बाबा खूप वेळ घरी असतील... आणि आमच्या गावाकडची मजा तर काय विचारूच नका... सतत पांढरेशुभ्र चांदणे ! किती किती फायदे !

मी मात्र त्याच वेळी माझे दुसरे मन मला सावध करू लागले - खरेच का, सूर्य नसेल तर फक्त मजाच असेल? थोडा वेळ विचार करताच भविष्यातील एकेक बाब डोळ्यासमोर साकार होऊ लागली. भीतीदायक विचारांचे मोहोळच उठू लागले. सूर्य उगवलाच नाही, तर शाळा नसेल, हे वरवर ठीक वाटते. पण शाळेत मिळणारा केवढा आनंद आयुष्यातून वजा होईल ! 

मित्र नसतील, मग मित्रांबरोबर संध्याकाळचे भटकणे कसे घडेल? मित्रांबरोबरची सगळी धमालच नष्ट होईल ! मैदानावर कधी मनसोक्त खेळताच येणार नाही ! कायम घरात नि घरात ! टी. व्ही., पत्ते, कॅरम किती वेळ चालणार? अंथरुणात लोळत तरी किती वेळ राहणार? 

सूर्य उगवलाच नाही तर शाळा नसतील; म्हणून ज्ञानाचे मार्ग बंद होतील. मग मानवाने आजवर साधली तशी प्रगती कुठे असेल? विविध सेवा पुरवणारी कार्यालये नसतील; कारखाने व उदयोगधंदेही नसतील; म्हणजे नोकऱ्या नसतीलच. मग पैसे कुठून येतील? खाणार काय?

सूर्य नसल्यामुळे सगळीकडे काळोख असेल. फक्त काळा रंग ! मग वसंत ऋतूतील विविधरंगी फुलांच्या सौंदर्याचे वैभव व श्रावणातील लावण्यवती सृष्टी यांचा आस्वाद कसा घेणार? आयुष्यातून सगळे रंग हद्दपार होतील ! सूर्योदय व सूर्यास्त या क्षणांचे दर्शन घेण्याचे सुख कायमचे निघून जाईल !

एक वेळ सर्व ठीक मानता येईल. पण खाणार काय? ऊन नाही म्हणून पाऊस नाही. म्हणून शेती नसेल. मग अन्नधान्य कसे मिळेल? मुख्य म्हणजे सूर्यप्रकाश हा सर्व वनस्पतींचा जीवनाधार. सूर्य नसेल तर, म्हणूनच वनस्पती-सृष्टीही नसेल. अशा स्थितीत प्राणी, मानव इतकेच कशाला कोणताही सजीव कसा काय जगु शकेल ? म्ह णजे पृथ्वी  फक्ता मातीचा एक निर्जीव गोळा बनेल. आपण कोणीच अस्तित्वा‍त नसणार ! 

नको रे बाबा ! सूर्य न उगवण्यााची कल्पनाच नको. तो आपल्याप सर्व सजीवांचा जीवनदाता आहे. तो हवाच . ओम सूर्यनारायणाय नम : 

निबंध 2

सूर्य संतापला, तर... मराठी निबंध 

सूर्यसंतापला, तर... मराठी निबंध : जगात माणसाला नेहमी स्वत:च्या कर्तृत्वाचा फार गर्व असतो. 'हे मी केलं, ते मी केलं,' असे तो मोठमोठ्याने ओरडून सांगतो आणि त्यावेळी आपण खरोखरी किती परावलंबी आहोत, याचा त्याला विसर पडतो.

आता सूर्याचीच गोष्ट पाहा ना! भगवान सूर्यदेव आहेत म्हणून पृथ्वीतलावरील प्राणी जगू शकतात. सूर्यापासून आपल्याला प्रकाश व उष्णता मिळते. पण सूर्य आपल्याला देत असलेल्या सर्व गोष्टींची महती अतिपरिचयाने आपल्याला वाटेनाशी होते. समजा हाच सर्वदायी सूर्य आपल्यावर रागावला तर... आणि आकाशात उगवलाच नाही, तर ...

तर सर्वत्र काळोख पसरेल. चोवीस तास रात्रच रात्र. काही दिवसांनी वातावरणातील उष्णता संपेल आणि अतोनात थंडी वाजू लागेल. सूर्य उगवलाच नाही तर रोगराई वाढेल, झाडांची वाढ खुंटेल. सूर्य नाही तर, पाण्याची वाफ कशी होणार? वाफ नाही तर पाऊस कसा पडणार?

माणसांनो, तुमच्यास वागण्यातील भोंदूपणाचा आम्हांंला उबग येतो. इतर वेळी आमच्यााशी निष्ठुशरपणे वागणारे तुम्ही  वनमहोत्स‍वाच्या‍ निमित्तायने दोन-चार दिवस आमचे कौतुक करता. तुमच्याातील काही विद्वान कवी आमच्यामवर कविता करतात. पण तुमच्या दांभिक वागणुकीचा वीट येऊन आम्ही आता तुमच्या्शी बोलण्यावचे सोडुन देणार आहोत. असे सांगून झाडे कायमची गप्पद झाली. 

निबंध 3

 सूर्य उगवला नाही तर 

'राजू, ऊठ लवकर. शाळेत नाही जायच का?' आईने नेहमीप्रमाणे उठवायला सुरुवात केली. 'होय ग, उठतो पाच मिनीटांत' म्हणत मी परत पांघरुण ओढले, माझ्या मनात आले काय ही रोज सकाळी शाळेची कटकट आहे. त्याऐवजी सूर्य उगवलाच नाही तर? काय हरकत आहे? डॉक्टर संपावर जाऊ शकतात, कामगार संपावर जाऊ शकतात मग सूर्य संपावर गेला तर काय बिघडले?


काय मज्जा येईल नाही? रोज सकाळी आई उठवणार नाही. शाळेत जायला लागणार नाही. शाळा नाही म्हणजे परिक्षा नाही आणि परिक्षा नाहीत म्हणजे निबंध लेखनही नाही. दिवसभर, नव्हे रात्रभर गादीत लोळायला मिळेल. खेळायला मिळेल. उन्हाळ्यात उकाड्याने जीव हैराण होणार नाही. आपले सगळयांचे वेळापत्रक कोलमडेल. 


अरे! पण सूर्यच नसला तर पाऊस तरी कसा पडेल? कारण उष्णता नसल्याने पाण्याची वाफ होणारच नाही. झाडे आपले अन्न तयार करु शकणार नाही. मग आपल्याला अन्न कसे मिळेल? फळ नाहीत, धान्य नाही तर मग आपण खाणार काय? पृथ्वीचे तापमान एकदम खाली येईल. प्राणवायु  मिळणार नाही. सौर उर्जेवर चालणाऱ्या  यंत्रांचा उपयोग करता येणार नाही.


पृथ्वीवर नेहमीच अंधार असेल. प्रकाशासाठी आपल्याला कायम लाइट, बल्ब लावावे लागतील. मग इलेक्ट्रिसीटीचे बिल किती वाढेल! चोरांची तर मज्जाच होईल. काम व्यवसायानिमित्त लोक बाहेर कसे पडतील? काम नसल्यामुळे आपण आळशी होऊ. सूर्य नाही म्हणजे चंद्र नाही की चांदण्या नाही. मग चांदण्या रात्रीची, कोजागिरी पोर्णिमेची मजा कशी लुटणार? म्हणजे आपले जीवन अगदी निरुत्साही, निरस बनेल. नुसता विचार करुनही माझा थरकाप उडाला.

आपण सूर्याला देव का मानत आलो आहोत हे लक्षात आले. अशा या सूर्यदेवाने संपावर जाण्याचा विचारही करु नये म्हणून मी त्याचीच प्रार्थना करु लागलो.

टीप : वरील निबंध सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते
  • autobiography of sun in marathi
  • atmakatha of sun in marathi
  • surya information in marathi
  • surya che mahatva in marathi
  • surya chi atmakatha in marathi
  • marathi nibandh surya
  • surya ugavala nahi tar short essay in marathi

सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध