चिंतनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चिंतनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

 सोशल मिडिया मराठी निबंध | social media essay in marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण सोशल मिडिया मराठी निबंध बघणार आहोत.  आजचे युग डिजीटल युग म्‍हणुन ओळखले जाते यात सोशल मिडीयाचे महत्‍व दिवसेदिवस वाढत आहे कोणतीही बातमी क्षणात आपल्‍या मोबाईलवर दिसून येते , आपल्‍याला आपले मत सहज मांडता येते पण  कोणत्‍याही गोष्‍टीचा अतीवापर केल्‍यास त्‍याचे नुकसान दिसुन येत असतात, आज ज्‍या प्रमाणात सोशल मिडीयाचा अतिवापर होत आहे त्‍याचे दुष्‍परिणाम आज आपण या निबंधात बघणार आहोत चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


social-media-essay-in-marathi
social-media-essay-in-marathi



आज घराघरात मोबाईल आहे आणि इंटरनेट सुद्धा बहुतेक जण वापरतात. बरीच मुलं मुली, विद्यार्थी तासनतास मोबाइल हाताळण्यात घालवितात. फेसबुक, ट्विटर यावर पोस्ट शेअर करणे, पोस्ट लाईक करणे, चाट करणे, पोस्ट अपलोड करणे इत्यादी कार्यात अगदी भान हरपून असतात. ह्याची त्यांना एवढी आवड निर्माण होते की त्या शिवाय त्यांना करमत नाही. ही लागलेली सवय वाईट व्यसना इतकीच घातक ठरु शकते. 


वेळ खर्च होतो. इंटरनेट  करिता जास्तीचा पैसा लागतो. आणि अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. परिणामी परीक्षेत कमी गुण मिळणे किंवा अपयश येणे ह्या बाबी घडतात.  इंटरनेट वापरणारे कधी कधी जाली कंपन्यांच्या जाळ्यात अचूक अडकतात. बऱ्याच कंपनी ई मेल पत्यावर जाहिराती पाठवितात. कळत नकळत त्या फसव्या जाहिरातींना आपण बळी पडतो. व आपले आर्थिक नुकसान करुन बसतो. 


काही कंपन्या किंवा सायबर गुन्हेगार आपली सर्व माहिती काढून त्याचा दुरुपयोग करतात. बँक अधिकारी बोलतो अशी थाप मारुन आपला ए.टी.एम. नंबर विचारुन खात्यातील रक्कम लंपास झाल्याची अनेक उदाहरणे घडली आहेत. 


इंटरनेट  चा वापर मग तो कोणत्याही कामाकरिता करायचा असेल तर बसल्या जागी करावा लागतो. तासनतास बसल्यामुळे शारीरिक हालचाल होत नाहीत. परिणामी पचन संस्था कमी कार्यक्षम होते. त्यामुळे कमजोरी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शरीराची हालचाल न झाल्यामुळे लठ्ठपणा येतो. स्क्रीन च्या प्रकाशामुळे डोळ्यावर ताण येतो व डोळे कमजोर होवू लागतात. आज आपण पाहतो लहान मुलामुलींना चष्मे लागलेले आहेत. पुढे पुढे पाठ दुखी, मान दुखीचा त्रास व्हायला लागतो. अपचन, आम्लपित्त, मलावरोध यासारखे आजार बळावतात.


सोशल मिडीया वापरून लोकांना छळले जाते विशेषतः मुलींच्या बाबतीत हा प्रकार जास्त घडतो. पहिल्यांदा मुलींना विश्वासात घ्यायचं. त्यांचे फोटो मोबाइल मध्ये घ्यायचे. किंवा त्यांच्या  नकळत फोटो काढायचे व पुढे ते फोटो फेसबुक वर टाकण्याची धमकी द्यायची. व त्यांच्याकडून अधिक वाईट कामे करुन घ्यायची. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. आपली अब्रू वाचविण्याचा जेवढा प्रयत्न ती मुलगी करते तेवढी ती आणखी आणखी फसत जाते. शेवटी आत्महत्या केवळ हाच एक पर्याय तिच्यासमोर उरतो. अशी कित्येक प्रकरणे झाली आहेत. त्यातील केवळ काहीच उघड झाली आहेत कित्येक दाबून ठेवली गेलीत केवळ अब्रू झाकण्यासाठी.



बरेचदा काही देवीदेवतांच्या विटंबना होतील असा मजकूर अथवा फोटो अपलोड केले जातात. त्यामुळे धार्मिक भक्त संतप्त होतात आणि अशा वेळेस दोन गटात हाणामारी, जाळपोळ इत्यादी प्रकार होतात. त्यांचे परिणाम निरपराध्यांना सुद्धा भोगावे लागतात. सामाजिक संबंध दुरावतात. कायदा व सुव्यवस्था राहत नाही.


इंटरनेट मुळे जगातील कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीशी संपर्क साधता येतो. ह्यामुळे अनोळखी व्यक्तीच्या प्रेमात पडणाऱ्याची संख्या सुद्धा वाढली आहे. यामध्ये जेव्हा ती व्यक्ती आधीच विवाहित असेल किंवा वाईट स्वभावाची असेल किंवा दुर्व्यसनी असेल तेव्हा धोका बसतो. घरातील मंडळीना विरोध करुन अशी लग्ने झालीत व अप्लावधीतीतच मुलीच्या जीवाला धोका झाला अशी बरीच उदाहरणे आहेत. 


सोशल मिडिया एवढा लोकप्रिय झाला की मुलांना त्याचे तोटे दिसत नाहीत. त्याचा वापर करु दिला नाही तर मुले व आईवडील यांच्यातील संबंध बिघडायला लागतात. ते आई वडिलांचे ऐकेनासे होतात. सतत नेटच्या संपर्कात राहिल्यामुळे एकटेपणा वाढतो. काही ताण तणाव निर्माण झाल्यास इतरांशी शेअर न करता ताण दाबण्याचा प्रयत्न केला जातो. जो घातक ठरु शकतो. कधी कधी अधिक ताण सहन न झाल्याने अशी व्यक्ती आत्महत्येस प्रवृत्त होते. ह्या सर्व दुष्परिणामावरुन निष्कर्ष निघतो की सोशल मिडिया मुळे सांस्कृतिक पर्यावरण दुषित झाले आहे व होत आहे.


या सर्व समस्‍यांचा कमी करण्‍यासाठी पुढील उपाय वापरतात येतील.   म्हणजे सोशल मिडीया मर्यादीत वापरणे , त्‍यावर असणारी माहीती खरी आहे की नाही हे अगोदर तपासुन घेणे . आणखी काही समस्‍या असल्‍यास वडीलधाऱ्या व्यक्‍तीसमोर ती मांडणे . 


जगभरात करोडो लोग सोशल मिडीया वापरतात . यातील नकारात्‍मक गोष्‍टी न वापरल्‍यास व सोशल मिडीया हे चांगल्‍याप्रकारे वापरल्‍यास आपल्‍याला त्यापासुन फक्‍त फायदाच मिळेल. 


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  व तुमचे सोशल मिडीया बद्दल काय मत आहे हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद

सोशल मिडिया मराठी निबंध | social media essay in marathi

 petrol sample tar marathi nibandh | पेट्रोल संपले तर मराठी निबंध 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पेट्रोल संपले तर मराठी निबंध बघणार आहोत.पेट्रोल व डिझल सारख्‍या खनिज तेलावर  मयार्देपेक्षा अवलंबुन राहील्‍यावर त्‍याचे काय परीणाम होत आहेत व ते संपल्‍यावर काय परीणाम होतील याबद्दल या निबंधात सविस्‍तर माहीती दिली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


petrol-sample-tar-marathi-nibandh
petrol-sample-tar-marathi-nibandh




भौतिक सुखाचा दिवा पेट्रोलवर  तेवतो' हे आजच्या युगातील सुभाषितच म्हणावे लागेल. आज आलेली जीवनाची गती हे पेट्रोलने दिलेलं वरदान आहे. आज ऑस्ट्रेलियात सकाळचा चहा घेऊन भारतात जेवण करून दुपारचा चहा इंग्लंडमध्ये घेऊन रात्री जेवून झोपायला अमेरिकेत जाणे हे यामुळेच शक्य आहे. आजचे युग हे प्लॅस्टिकचे युग मानले जाते त या पेट्रोलमुळेच ! 


निसर्गान आपल्या जादुइ पोतडीतून मानवाला पेट्रोल दिल आणि माणूस हरकुन गेला. त्याची चालच बदलली. तो धावू लागला सुसाट वेगाने ! शाब्दिक आणि लाक्षणिक अर्थानेही !  पण माणूस मुळातच हावरट. 'अजून' अजून' चा जप तो सोडत नाही. हव्यास ही जशी प्रगतीची निशाणी तशी अधोगतीचीही ! कुठे थांबावे ? हेच माणसाला कळत नाही.


 खनिज तेल निसर्गाने पृथ्वीच्या पोटात साठवले, ते मानवाने उकरून काढले... वापरले, वापरत आहे...पण किती अमर्याद ? त्यात माणूस हा प्राणी नंबर एकचा अप्पलपोटा, स्वार्थी, लबाड आणि भांडकुदळ. ' तुझे ते माझे आणि माझे तेही माझेच' ही त्याची वृत्ती ! त्यातूनच उद्भवले हे आखाती युद्ध.साऱ्या जगाला, विशेषत: भारतासारख्या विकसनशील देशांना वेठीला धरणारे. सद्दाम हुसेनने तर उद्दाम होऊन मुद्दाम तेल विहिरी पेटवून दिल्या, समुद्रात तेल सोडून दिले. त्यावर अमेरिका अणुयुद्धाची' बेजबाबदार भाषा बोलते आहे. त्यामुळे साऱ्या तेलविहिरी नष्ट वा निरुपयोगी होतील. मग पुढे ?... तर काय, भौतिक सुखांचा दिवा फडफडू लागेल अन् काही काळाने 'राम' म्हणेल आणि मग माणसाचे डोळे खाडकन् उघडतील.


 आपणच मांडून ठेवलेल्या पसाऱ्याचा अडथळा होऊ लागेल. दळणवळण कोलमडेल. स्कूटर्स, मोटारी आपापल्या जागीच थांबून राहतील. जणू पुतळेच. प्रवास खडतर होईल. संथ होईल. घोडागाडी, बैलगाडी, सायकली आणि स्वतःचे पाय वापरावे लागतील. वेगात चाललेल्या वाहनाला ब्रेक लागून गतिरोध व्हावा तसे जीवन होईल. व्यापार धोक्यात येईल. जिथे जे पिकत नाही तिथे ते पोहचविणे अडचणिचे होईल. महागाई आभाळाला टेकेल तर नश्वर पदार्थांचे अवमूल्यन होईल. द्राक्ष, आंबे यांना विदेश दिसणार नाही. परकीय चलन बुडेल. देशाच्या तिजोरीवर ताण पडेल. एखाद्या वटवृक्षाने स्वतःच 'बोनसाय' बनावे तसे मानवी जीवन खुरटलेलं होईल.


पण यातून काही फायदेही होतील. माणूस निसर्गाच्या जवळ जाईल. प्रदूषणाच्या छायेतुन  बाहेर पडेल, कारण कारखाने पक्षाघात झाल्यासारखे होतील. हातपाय वापरल्याने कात टाकलेल्या सापाप्रमाणे त्याच्यातील चैतन्य पुन्हा सळसळू लागेल...अज्ञात साठे-तेलाचे तो हुडकून काढेल, आणि नाहीच मिळाले तर पर्यायी इंधन तो शोधल-माणूस तसा हिकमती आहे ! 


सौरऊर्जा, समुद्राच्या लाटांपासून तसेच, अणुऊर्जा असे काही ना काही तो शोधेलच. 'गरज ही शोधाची जननी आहे.' माणसाजवळ तेवढी क्षमता नक्कीच आहे. चंद्रावर पाऊल उमटवणाऱ्या मानवी मेंदूला अशक्य काहीच नाही. खनिज तेल संपल्याने जीवनमान दोन पावलं मागे येईल ते पुढची मोठी उडी घेण्यासाठीच !

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

petrol sample tar marathi nibandh | पेट्रोल संपले तर मराठी निबंध

 jangal tod ek samasya marathi nibandh | जंगलतोड  एक समस्या मराठी निंबध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण जंगलतोड  एक समस्या मराठी निंबध बघणार आहोत.  या निबंधामध्‍ये मानवाने स्‍वताची प्रगती करण्‍यासाठी कश्‍याप्रकारे जंगलतोड करून पर्यावरणाची हानी केली आहे व याचे कोणकोणते विपरीत परीणाम होत आहेत याबद्दल सविस्‍तर निबंध दिला आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


jangal-tod-ek-samasya-marathi-nibandh
jangal-tod-ek-samasya-marathi-nibandh



निसर्गाचे चिकित्सक अभ्यासक सांगतात की, मुंगीपासून गरुडापर्यंत सर्व मानवेतर प्राणी धरतीची प्रकृती सांभाळून आपली जीवनयात्रा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात; पण माणसाची बुद्धिमत्ता आणि त्याची कार्यशक्ती निसर्गाला शाप ठरली आहे. जंगलात लागणारा वणवा ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. पण काही वेळेला माणसाच्या हलगर्जीपणामुळेही जंगलात आगी लागतात आणि अफाट जंगलसंपत्ती नष्ट होते.माणसाने जास्तीत जास्त जंगलसंपत्ती नष्ट केली आहे. जंगले तोडून माणसाने नगरे वसवली. त्या नगरांतील आपल्या घरांसाठी, घरे सजवण्यासाठी माणसाने वारेमाप झाडे तोडली.


आज भारतातील जंगलांचा झपाट्याने होणारा नाश ही चिंतेची बाब ठरली आहे. वनक्षेत्र कमी झाल्यामुळे मातीची धूप व पुराचे प्रमाण वाढले आहे. अधिकाधिक भूप्रदेश ओसाड बनले आहेत. पर्जन्याचे प्रमाण कमी झाले आहे. पर्यावरणाच्या संतुलनाची समस्या निर्माण झाली आहे.


लाकडाचा उपयोग कागदाचा लगदा तयार करण्यासाठी केला जातो. यासाठीही अनेक जंगले तोडली जातात. जंगलतोड झाल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. वन उत्पादनामध्ये लाख, राळ, डिंक, औषधी वनस्पती, मध, मोह, विविध प्रकारचे गवत, रेशीम, वेत, बांबू इत्यादी असंख्य वस्तूंचा समावेश होतो. वनातील वृक्षावरील एक प्रकारच्या किड्यापासून लाख मिळते. 


बाभळीची साल कातडी कमावण्यासाठी व औषधासाठी उपयोगी असते. शेतकऱ्यांची अवजारे, क्रीडासाहित्य, काडेपेटीतील काड्या यांसाठी ही जंगलतोड होते. जंगलनाशाबरोबर जंगलातील प्राणी-पक्षीही कमी होत आहेत. वाघ व मोर यांची हौसेखातर प्रचंड हत्या होते, हे थांबायला हवे आहे. वृक्ष-संरक्षण कायदा केला गेला आहे. पण सर्व गोष्टी केवळ कायदयाने होत नाहीत. त्यासाठी सर्वसामान्य जनतेचे त्याला हार्दिक व विधायक सहकार्य हवे. 


जंगले नष्ट झाली की तेथील आदिवासींचेही प्रश्न उभे राहतात. 'मेळघाट प्रकल्प'सारख्या अनेक संस्था निर्माण झाल्या पाहिजेत आणि वनाच्या रक्षणाची जबाबदारी प्रत्येकाला आपली वाटली पाहिजे. नाहीतर पुढील काळात एखादया भल्यामोठ्या ओसाड जागेवर पाटी लावावी लागेल - 'येथे जंगल होते.' 


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व जंगलतोड थांबवण्‍यासाठी कोणते उपाय केले पाहीजेत  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


jangal tod ek samasya marathi nibandh | जंगलतोड एक समस्या मराठी निंबध

 एकविसाव्या (21 )शतकातील आव्हाने मराठी निबंध | Ekvisavya Shatkatil Avhane Marathi Nibandh

निबंध 1


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण एकविसाव्या (21 )शतकातील आव्हाने मराठी निबंध | Ekvisavya Shatkatil Avhane Marathi Nibandh बघणार आहोत. या निबंधामध्‍ये  मानवाने केलेली वैज्ञानिक व आर्थीक प्रगती व त्‍याबदल्‍यात त्‍याने पर्यावरणाला पोहचवलेली हानी , वाढलेली लोकसंख्‍या व इतर सामा‍जिक समस्‍या मानवापुढे कश्‍याप्रकारे समोर आल्‍या आहेत याबद्दल  स्‍पष्‍टीकरणात्‍मक दोन  निबंध दिलेले आहेत  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला


Ekvisavya-Shatkatil-Avhane-Marathi-Nibandh
Ekvisavya-Shatkatil-Avhane-Marathi-Nibandh



एकविसावे शतक आज माणसांसमोर अनेक नवी आव्हाने घेऊन उभे ठाकले आहे. नुकत्याच सरलेल्या विसाव्या शतकाकडे दृष्टिक्षेप टाकला तर काय आढळते? चतुर मानवाने नेत्रदीपक प्रगती साधली आहे.एकविसाव्या शतकातील मानवाने आपल्या पूर्वजांपेक्षा मोठी वैचारिक प्रगती साधली आहे. आज आपण 'व्यक्तिस्वातंत्र्य' हा मूलभूत हक्क मानला आहे. कोणी कुणाचा गुलाम नाही. 


आपल्या देशातल्या कुठल्याही कोपऱ्यात राहणाऱ्या माणसाला स्वत:ची प्रगती साधण्याचा हक्क आहे. कुठल्याही विशिष्ट ज्ञानावर वा कामावर कुणाचीही मक्तेदारी राहिली नाही. जन्मावर 'कर्म' अवलंबून नाही, तर कर्मावर त्याचे समाजातील स्थान' अवलंबून आहे. म्हणून तर दलित समाजातील व्यक्तीही राष्ट्रपतिपद भुषवू शकते.


एकविसाव्या शतकातील सगळ्यात बिकट आव्हान आहे ते म्हणजे 'लोकसंख्येच्या विस्फोटाचे. भारताची लोकसंख्या अब्जांची मर्यादा ओलांडून पुढे गेली आहे. विश्वातील या सर्व मानवांना मूलभूत गरजा पुरवणे हेही एक आव्हानच आहे. माणसाने हे ओळखले आहे. पण त्याचबरोबर या लोकसंख्यावाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठीही कंबर कसावी लागणार आहे. पण अंधश्रद्धा व अज्ञान हे फार मोठे अडथळे मध्ये आहेत. ते दूर करणे हेही फार मोठे आव्हान आहे.


आपल्या भारतापुढे गरिबी व बेकारी हे एक मोठे आव्हान आहे. पण आम्ही ते स्वीकारले आहे. हरितक्रांती, श्वेतक्रांती यांनी प्रत्येकाला चारा उपलब्ध केला आहे. संगणकामुळे बेकारी वाढेल असे वाटत असतानाच संगणकाने अनेक नवे व्यवसायही निर्माण केले. नव्या उद्योगधंदयांबरोबरच आमच्या अनेक परंपरागत उदयोगांचेही पुनरुज्जीवन केले जात आहे.


एकविसाव्या शतकात आज माणसांपुढे उभा राहिलेला मोठा प्रश्न म्हणजे पर्यावरणाचा! माणसाने अविचाराने जंगलतोड केली, उभ्या केलेल्या प्रचंड कारखान्यांमुळे हवा बेसुमार दूषित झाली. माणसांना विविध आजारांना तोंड दयावे लागत आहे. त्यांत दुष्काळ, महापूर, भूकंप अशा नाना नैसर्गिक आपत्ती माणसांची कसोटी पाहायला येत आहेत. वैश्विक तापमान वाढत आहे, हे एक नवे संकट येत आहे. पण एकविसाव्या शतकातील माणूस आता याबाबतही जागृत झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रात नित्य नवे शोध लावून तो या आजारांवर मात करत आहे. आता तर आमच्या संशोधकांनी माणसाच्या जनुकांचाही अभ्यास चालवला आहे. त्यातून तो माणसाला आपल्यातील त्रुटी दूर करण्यास मदत करील.



एकविसाव्या शतकात डाचणारी आणखी एक गोष्ट म्हणजे सामाजिक विषमता! जात, धर्म, पंथ, श्रीमंती, शिक्षण अशा अनेक पातळ्यांवर भीषण विषमता आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर कुठे ना कुठे संघर्ष पेटलेला असतो. या संघर्षाने तीव्र स्वरूप घेतले की, त्यांतून 'दहशतवाद' बोकाळतो आणि माणसाचे जगणे मोठे कठीण होते.



भारतात आणि इतर काही देशांत भ्रष्टाचाराचे एवढे साम्राज्य पसरले आहे की, आपल्या क्षुल्लक फायद्यासाठी भेसळ करणारा माणूस सहज दुसऱ्यांचे प्राण घेतो. याला कारण म्हणजे मानवी जीवनातील नैतिक मूल्यांची झालेली घसरण. हे सारे चित्र एकविसाव्या शतकातील माणसांचे जगणे असह्य, भयंकर करून टाकेल का? अशी भीती क्षणभर वाटते. पण क्षणभरच ! कारण अनेक आपत्तीत जगाच्या कानाकोपऱ्यांतून धावत आलेले मदतीचे हात आठवतात आणि ते आश्वासन देतात की, या साऱ्या साऱ्या आव्हानांना आम्ही पुरून उरू.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता व दुसरा निबंध वाचण्‍यास विसरू नका  धन्‍यवाद


निबंध 2

 एकविसाव्या शतकाची आव्हाने 


कुठलेही राष्ट्र प्रगत आहे की अप्रगत, हे ठरवण्याचे काही निश्चित निकष सर्वमान्य झालेले आहेत. राष्ट्राची एकूण संपत्ती, त्या राष्ट्रात राहणाऱ्या जनतेचे उंचावत जाणारे राहणीमान, त्यांची होणारी प्रगती आणि जागतिक बाजारपेठेत त्या राष्ट्राची असलेली प्रतिष्ठा किंवा पत हे त्यांतले काही प्रमुख निकष आहेत. हे निकष साध्य करण्यासाठी भारताला एकविसाव्या शतकात वाटचाल करायची आहे.


भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारताचे भाग्य म्हणजे त्याला विविध प्रकारचे हवामान लाभले आहे. उन्हाळा, पावसाळा मुबलक. भारताने याचा जेवढा फायदा करून घ्यायला हवा तेवढा अजून करून घेतलेला नाही. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात हरितक्रांती झाली. भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झाला. याच्या पुढचे पाऊल म्हणजे 'धान्याची निर्यात'. त्यासाठी भारतातील शेतकऱ्याने परंपरागत शेतीची पद्धत बदलली पाहिजे. पाश्चात्त्य देशाच्या तुलनेने अजून आपले एकरी उत्पन्न कमी पडते. धान्याची प्रत आणि प्रमाण वाढायला हवे. धान्याबरोबरच साखर, फळे, फुले यांचीही निर्यात साधायला हवी.


 एकविसाव्या शतकातील भारताला ग्रासणारा दुसरा प्रश्न म्हणजे येथील विषमता - यातील आर्थिक विषमता हा मोठा डाचणारा प्रश्न आहे. 'गरिबी हटाव'साठी अनेक योजना आखल्या गेल्या; पण गरिबी संपली नाही. एकविसाव्या शतकात या सामाजिक दोषालाच नेस्तनाबूत करायचे आहे. त्यासाठी निरक्षरतेवर मात करता आली पाहिजे. जर भारतातील जनता जास्तीत जास्त साक्षर झाली तर भारतीय लोकशाही अधिक प्रभावी बनेल.

एकविसाव्या शतकात भारतात तंत्रज्ञान क्षेत्रात खूप प्रगती व्हायला हवी. आज त्या दृष्टीने भारत पावले टाकत आहे. कारण प्रगत तंत्रज्ञान हेच आजच्या जगात कुठल्याही राष्ट्राच्या प्रगतीचे लक्षण असते. त्यासाठी भारताला आपले आंतरिक सामर्थ्य वाढवावेच लागेल. भारताला आपली अर्थव्यवस्था भक्कम करावी लागेल. एकविसाव्या शतकातील अनेक प्रकल्पांपैकी ती एक आहे. त्यासाठीच भारताने 'मुक्त अर्थव्यवस्था' स्वीकारली आहे. देशांतर्गत व्यापारामध्येही-विशेषतः कृषी, औदयोगिक आणि सेवा या क्षेत्रांत स्पर्धात्मक वातावरण ठेवणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने विशाल रस्ते तयार करून राज्ये जोडणे आणि नदया जोडणे हे प्रकल्प हाती घेतले आहेत.



जगामध्ये आपण लष्करी व आर्थिकदृष्ट्या वरचढ राहणे आवश्यक आहे. १९९० पर्यंत युद्ध हे शस्त्रांनीच लढले जाई. पण आता  आर्थिक युद्धाला सुरवात झाली आहे. लष्कर, संरक्षण या क्षेत्रातही प्रगत आणि स्वावलंबी होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर परकीय गुंतवणूक आपल्याकडे अधिकाधिक येईल याची काळजी घेतली पाहिजे.

जगामधील एक प्रगत आणि निडर राष्ट्र म्हणून भारताला स्थान मिळवून दयायचे असेल तर भारतातील प्रचंड युवाशक्ती एकदिलाने कामाला लागली पाहिजे. मग आपल्या सर्वांचे हे स्वप्न लवकर साकार होईल.


एकविसाव्या (21 )शतकातील आव्हाने मराठी निबंध | Ekvisavya Shatkatil Avhane Marathi Nibandh

Vachan Ek Uttam Chand Essay In Marathi | वाचन एक उत्तम छंद

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  वाचन  एक उत्तम छंद मराठी निबंध बघणार आहोत.आज आपण वाचन एक उत्तम छंदशीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत प्रत्‍येकाला कोणतातरी छंद असतोच आणि यांच छंदामुळे आपण उत्‍साहाने भरून जात असतो व त्‍याच बरोबर त्‍यामुळे आपण आनंद, मनोरंजन , ज्ञान पण मिळवु शकतो. आज आपण वाचन या छंदाविषयी माहीती या निबंधात बघणार आहोत चला  तर मग सुरूवात करूया निबंधाला.


मुद्दे :

  • उत्तम छंद 
  • भरपूर वाचन असलेला माणूस संकुचित विचार विसरतो
  • वाचनामुळे अन्य देशांची, अन्य लोकांची, इतर धर्मांची माहिती मिळते
  • आपल्यातील उणिवा कळतात
  • आनंद मिळतो 
  • इतिहासातील माहिती मिळते 
  • कुठेही वाचन करता येते 
  • वृद्ध, लहान मुले यांना तर खूपच मदत.


असा धरी छंद, जाई तुटोनिया भावबंध।


मोठमोठे लोक सांगतात की, असा छंद धरा की, ज्यामुळे संकुचित विचार झटकून टाकाल.वाचन या छंदामुळे बहुश्रुतपणा येतो. वाचनामुळे आपल्याला आपल्या देशाची व जगाची माहिती मिळते. अन्य देशांतील लोक कसे राहतात, त्यांचा पोशाख कोणता आहे, हे आपल्याला समजते. इतर धर्मांतील लोकांची माहिती मिळते. या सर्व माहितीमुळे आपल्याला आपल्या उणिवा कळतात. आपल्याला आपल्या जीवनात सुधारणा करता येते.




आपल्याला कथा-कादंबऱ्या वाचल्यावर आनंद मिळतो. अनेक लोकांचे अनुभव समजतात. काही पुस्तकांमध्ये पूर्वीच्या काळाची माहिती असते. त्यामुळे पूर्वीच्या काळी पृथ्वीवर काय काय घडले, याची माहिती मिळते. आतापर्यंत माणसाने किती प्रगती केली हे कळते.


आपण वाचन केव्हाही, कुठेही करू शकतो. रेल्वेच्या डब्यात खूप गर्दी असते, तेथे खूप गोंगाट असतो, तरी काही माणसे शांतपणे वाचत असतात. वृद्ध माणसांना वेळ कसा घालवावा, ही चिंता असते. त्यांना वाचनाची मदत होऊ शकते. लहान मुलांना गोष्टींच्या पुस्तकांतून खूप आनंद मिळतो. खरोखर, सर्वांना उपयोगी पडणारा वाचन हा छंद सर्वोत्कृष्ट छंद आहे.


मित्रांनो तुम्‍हाला वाचन एक उत्तम छंद हा निबंध कसा वाटला व तुमचा आवडता छंद कोणता आहे हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



Vachan-Ek-Uttam-Chand-Essay-Marathi
Vachan-Ek-Uttam-Chand-Essay-Marathi

निबंध 2

Vachan Ek Uttam Chand Essay In Marathi | वाचन एक उत्तम छंद


 नुकतेच माझ्या वाचनात आले...डॉ. भीमराव आंबेडकर यांनी आपल्या एका भाषणात मागासलेल्या बांधवांना कळवळून सांगितले होते - “वाचाल तर वाचाल !" ऐकायला आणि वाचायलाही जरा विचित्र वाक्य वाटते हे, पण ते अर्थपूर्ण आहे हे विचारांती पटते.



'वाचाल' म्हणजे वाचन कराल, 'तर वाचाल' म्हणजेच टिकाल ! 'वाचाल तर वाचाल' याचा अर्थ वाचन कराल तर टिकून राहाल ! चांगले जीवन जगाल इंग्रजीत म्हण आहे - Survival of the Fittest. जे देशकाल परिस्थितीला अनुसरून अगदी योग्य असेल ते टिकते.



इतर प्राणिमात्र आणि माणूस यात मुख्य फरक हाच आहे की माणूस विचार करू शकतो. तो बोलतो, वाचतो, लिहितो. विचार करण्याची ही शक्ती वाचनातून अधिक विकसित होते. डॉ. आंबेडकरांनी हा विचार ज्या समाजासमोर मांडला त्यापैकी ९९% लोक निरक्षर होते. त्यांना लिहिता, वाचता येत नव्हते.



पुस्तके किंवा वर्तमानपत्रे सोडा साधे पत्रदेखील त्यांना दुसऱ्याकडून वाचून घ्यायला लागे आणि उत्तरसुद्धा दुसरा लिहिणार तेव्हा लिहिले जायचे ! वाचता येईना ! हिशेब समजेना ! काय विचारांवी त्यांची दैना ? सरकार व सावकार दोघेही त्यांना फसवत, लुबाडत असत. म्हणूनच त्यानी वाचायला शिकले पाहिजे (लिहायला व हिशेब करायला शिकले पाहिजे) असे डॉ. आंबेडकर म्हणत.



गेल्या चाळीस पन्नास वर्षात ह्या समाजात खूपच सुधारणा झाली आहे. बरेच लोक केवळ साक्षर नव्हे तर सुशिक्षित झाले आहेत. आपल्या व्यथा वेदना ते बोलून दाखविताहेत. दया पवार यांचे 'बलुतं', लक्ष्मण माने यांचे 'उपरा', शरणकुमार लिंबाळे यांचे 'अक्करमाशी' अशा कित्येक आत्मकथा प्रसिद्ध झाल्या आहेत. मागासलेल्या समाजातून अशी आशेची प्रकाशकिरणे फाकत आहेत.



पण केवळ एका विशिष्ट समाजापुरताच हा संदेश आहे का ? तसेच वाचाल म्हणजे केवळ वाचायला शिकाल, साक्षर व्हाल तर वाचाल एवढेच का डॉक्टरांना सांगायचे असावे ? 'वाचाल' याचा अर्थ इतका मर्यादित असेल का ? तसे नक्कीच नाही. वाचाल म्हणजे काय वाचाल ? दुसरी चौथीची पुस्तके ? वर्तमानपत्रे ? दरमहा प्रसिद्ध होणारी मासिके ? रस्त्यावर दिसणाऱ्या लहान मोठ्या जाहिराती ?



निरक्षराने साक्षर होणे आणि साक्षराने सुशिक्षित बनणे, हे जसे क्रमप्राप्त ठरते, तसे वाचता येऊ लागल्यावर वर वाचनात सहजता, सफाई येणे आवश्यक आहे. मोठ्या आवाजात आवश्यक तेथे योग्य तो चढउतार करून वाचता येणे, आवाज न करता मनात वाचता येणे हे जमले पाहिजे.



त्याचप्रमाणे पुढे पुढे वाचनात निवड हवी. रोज कोणते तरी एक पुस्तक वाचून ज्ञान वाढत नाही व मन समृद्ध होत नाही. मनोरंजनासाठी कथाकादंबऱ्यासारखे हलके फुलके साहित्य वाचणे आवश्यक तसे विचार प्रवर्तक निबंध, माहितीपूर्ण लेखन, उत्तमोत्तम प्रवास वर्णन, थोरा मोठ्यांची चरित्रे किंवा आत्मचरित्रे यांचेही वेचक वाचन हवे.


नुसते भराभर व भाराभर वाचन करणारा माणूस म्हणजे टनावारी ओझी वाहणारा हमालच ! त्याच्या डोक्यावरून तो जे नेतो त्यातले त्याच्या डोक्यात काय उतरते? म्हणूनच वाचनाला शिस्त हवी, वळण हवे, वाचलेले नीट पचले पाहिजे, आकलन झाले पाहिजे. त्यातूनच बौद्धिक समंजसपणा येतो. It is not what you eat but what you digest, that makes you strong; it is not what you read but what you understand, that makes you learned.



त्याचप्रमाणे वाचन चौफेर हवे. आपल्या आवडत्या एकाच विषयाचे वाचन नको. विविध विषय विविध प्रकार वाचनात असावेत. जाता जाता अखेरची एक शंका मांडावीशी वाटते. सध्याचे जग इलेक्ट्रॉनिक्सचे व संगणकाचे आहे. टी. व्ही., व्हिडिओ, टेपरेकॉर्डर, कॅसेटस् यांच्या जमान्यात वाचनाचे महत्त्व पुढे राहील का ? काळच याचे खरे उत्तर देईल ! पण चित्रपट आले म्हणून नाटके संपली नाहीत.



टी. व्ही, व्हिडिओ आले म्हणून चित्रपटगृहे ओस पडली नाहीत. तसेच वाचनाचे ! वाचन कशासाठी ? ज्ञानासाठी ! ते एवढ्या पुरतेच नसते तर एका वेगळ्या प्रकारच्या आत्मिक समाधानासाठी असते. वाचनाचे वेड लागलेला माणूस पहा. वाचन त्याचे काम नसते. वाचन हा त्याचा स्वभाव बनतो. अनेक उत्तमोत्तम ग्रंथांशी त्याची जवळची दोस्ती बनते. त्याच्या सुखदुःखाच्या क्षणी हे ग्रंथच त्याला सोबत करतात. दिलासा देतात. प्रोत्साहन देतात. प्रेरणा मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद



Vachan Ek Uttam Chand Essay In Marathi | वाचन एक उत्तम छंद

 अंधश्रद्धा मराठी निबंध | andhashraddha marathi nibandh


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण अंधश्रद्धा मराठी निबंध बघणार आहोत. आज आपण विज्ञानयुगात राहुन सुध्‍दा मानवी समाजात अंधश्रद्धा दिसुन येते याची कारणे काय असु शकतात व यावर कशी मात करता येईल हे सांगीतले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 

माणसे अपूर्ण असतात आणि मानवी मनातल्या श्रद्धा, प्रेम यांचीदेखील पूर्तता कधीच होत नाही. आईवडिलांचे जरी मुलावर उत्कट प्रेम असले तरी त्या प्रेमाला अज्ञानाच्या, अविचाराच्या मर्यादा पडलेल्या असतात. असेच आपल्या सर्वाचे आहे. एखादी वास्तव गोष्‍ट ! मानवी ज्ञानशक्ती पलीकडे असलेले असे सत्य भासते तेव्हा ती भासू लागते - अंधश्रद्धा .


andhashraddha-marathi-nibandh
andhashraddha-marathi-nibandh


मुळात अंधश्रद्धा निर्माण होण्याचं कारण, त्याच्या पराधीनपणात लपलेल आहे. यश संपूर्ण स्वत:च नसून त्याला काही कारण म्‍हणुन, तसंच अपयशाची कारणमीमांसा म्हणूनही अंधश्रद्धा निर्माण झाल्या.
आजच्या यंत्रयुगातसुद्धा अंधश्रद्धेचा मानवी मनावर जबरदस्त पगडा आहे. आपण म्हणतो की मांजर आडवे जाण्याने काम होत नाही!

 पण सगळ्यांना काही तोच अनुभव आजपर्यंत आला आहे का? खर तर कार्याचे स्वरूप, साधनांची उपलब्धता इ.वर यशापयश अवलंबून असते. त्यात बिचाऱ्या मांजराचा काहीही संबंध नसतो. 'तीन तिगडा काम बिघडा' व 'साप चावलेल्या मनुष्यास खांद्यावर बसवून मारूतीला प्रदक्षिणा मारणे' हाही त्यातलाच एक खुळा प्रकार ! पण ही झाली अंधश्रद्धेची प्रथम पायरी ! पण हीच अंधश्रद्धा पुढे फार भयानक वळण घेते.

कुठल्याही सुजाण माणसाच्या अंगावर शहारे आणेल असं मानवत' प्रकरण या विज्ञानयुगात घडू शकतंय ही गोष्ट काय दर्शविते ? अमावास्येच्या दिवशी स्त्रियांनी केस सोडून फिरू नये इथपासून ते भूतबाधा झालेल्यांचे भूत उतरविणे इथपर्यंत! दक्षिणेकडे पाय करून झोपू नये, तिकडे यमाचे राज्य असते, मृत्यू येतो, असे आपले पूर्वज प्राचीन वेदात सांगतात. परंतु यासारख्या अंधश्रद्धा या विज्ञानाच्या अढळ बुरूजावर उभ्या आहेत हा शोध आज नवीन लागला आहे. 

हवेतून हात फिरवून घड्याळे, कुंकू, मंगळसूत्रे काढणाऱ्यांवर, ३०-३० दिवस समाधीस्थ होणार अशी प्रतिज्ञा करण्यावर विश्वास ठेवला की या जगात बुवाबाजीचा सुळसुळाट झालाच म्हणून समजा. पण काही अंधश्रद्धांना दुसरा पर्यायच नाही. 'दृष्ट काढणे' ! पण खरंच अशी नजर लागते का ? दृष्ट काढल्यावर ती जाते का? पण आपल्याला दृष्ट काढल्यावर मोकळं, हलकं वाटू लागतं; मग हे कसं काय ? खरंच देव असं काही करतो का?... या प्रश्नांना उत्तर नाहीत. अंगात येणं' हा दुसरा प्रकार. पण याबाबतीत बहुतांशी असत्य अनुभवच येतात. मग खरंच परमेश्वर मानवी शरीरात अवतरतो का? या गोष्टींवर अविश्वास ठेवावाच लागतो.


पण आज एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर मानवाचे पाऊल पडणार आहे... छे! छे! तो ओलांडणारही आहे. मग या खुळ्या, अविचारी, पुरातन समजुतींवर आपण किती विश्वास ठेवायचा? कधी कधी तर हे अज्ञान निरपराधांच्या मृत्यूलाही कारणीभूत ठरतं- जसा गुप्तधनासाठी कुमारिकेचा बळी! म्हणूनच ‘लोकशिक्षण' व 'जनजागृती' या दोन विकासाच्या साधनांची कास धरूनच व विज्ञानाच्या कसोटीवर घासून घेतलेले, मनाला पटतील तेच विचार अनुसरले तर एकविसाव्या शतकाची रम्य, निरभ्र पहाट उगवू शकेल अन् मानवतेने पांघरलेला हा अंधश्रद्धांचा बुरखा आपोआप गळून पडेल !

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

अंधश्रद्धा मराठी निबंध | andhashraddha marathi nibandh

internet essay in marathi | इंटरनेट मराठी निबंध 


निबंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण internet essay in marathi निबंध बघणार आहोत. या  निबंधामध्‍ये मानवाने आपल्‍या फायद्यासाठी तयार केलेली इंटरनेट नावाची जादु कोणती कामे करू शकते व चुकीच्‍या रीतीने वापरल्‍यास कीती  नुकसान करू शकते याचे वर्णन केेले आहे. व त्‍यावर कोणते उपाय योजले जाऊ शकता हे तुम्‍हाला वाचण्‍यात येईल . चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

सकाळची वेळ १०.३० ची अमेरिकेतल्या एका उत्तुंग इमारतीत महत्त्वाची मिटींग बोलावली होती. विषय खूप गंभीर होता. या मिटींगसाठी त्याविषयातील जाणकार तज्ञ आली होती. एक गंभीर परिस्थिती उद्भवली होती. त्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी ही मिटींग बोलावली होती. नुकतेच एका हॅकरनी इंटरनेटवरील एका प्रोग्रामद्वारे 'आय लव्ह यु' नावाचा व्हायरस सोडला होता. या व्हायरसद्वारे इंटरनेटवरील अतिमहत्त्वाची माहिती पुसली जाणार होती किंवा त्या माहितीत बदल होण्याचा संभव होता. यावर उपाय योजण्यासाठी ही बैठक बोलावली होती.

internet essay in marathi
internet essay in marathi 


या बैठकीत तज्ज्ञांनी विचार मांडून त्यावर तोडगा शोधला. एका अँटीव्हायरस विकसित केला. या अँटीव्हायरस प्रोग्रामद्वारे तात्पुरता या परिस्थितीवर उपाय योजला गेला. जोपर्यंत पुढे गंभीर परिस्थिती उद्भवत नाही तोपर्यंत हे शास्त्रज्ञ निर्धास्त झाले.

 तर या इंटरनेटची सुरुवात ७० व्या दशकात झाली. इंटरनेट असे जे जाळे जे एकमेकांना जोडले आहे. अमेरिकेमध्ये सुरुवातीला संरक्षण दलातील माहिती आदान-प्रदान करण्याकरिता हे तंत्रज्ञान विकसित केले गेले. त्यालाच व्यापक असे जागतिक रूप देऊन इंटरनेटची सुरुवात केली गेली या इंटरनेट 'वर्ल्ड वाईड बेब' असेही म्हणाले जाते. असे जे जाळे जे जागतिक पातळीवर पसरले आहे.

 इंटरनेट असण्यासाठी पहिली गरज संगणक असावे लागते नंतर दुसरे महत्त्वाचे उपकरण मोडेम लागते. भारतात या इंटरनेटची सुरुवात १९९४ साली पासून सुरू झाली. आज आपण मोबाईलवर सहजरीत्‍या इंटरनेट वापरू शकतो.

वर उल्लेख केल्यामुळे या इंटरनेटचे काही धोकेही आहेत. सध्या 'आय लव्ह यू', 'बग' या नावाने अनेक व्हायरस सध्या धुमाकूळ घालत आहेत. हे एका प्रकारच्या प्रणाली (प्रोग्राम)मध्ये बनविलेले असतात, जे चुकून इंटरनेटवरती काम करतेवेळी आपल्या हातून उघडले गेले तर आपल्या संगणकातील नव्हेच तर आपल्या संगणकाला 'लॅन'मार्फत (लोकल एरिया नेटवर्क) जोडल्या गेलेल्या सर्व संगणकातील महत्त्वाची नोंद यामुळे पुसली जाते. किंवा त्यामध्ये फेरफार होतात तर हे इंटरनेट हॅकर हे खरेतर याबाबतीत तज्ज्ञ असतात ते इंटरनेटमार्फत देशाची जी गुप्त माहिती आहे, ती पळवून इतर देशांना विकतात.

 इंटरनेटच्या आहारी गेलेली इतकी माणसे आहेत की दिवस-दिवस ते इंटरनेट पुढे बसून असतात. त्यामुळे त्यांना भूक लागत नाही पण खूप वेळ बसल्याने त्यांना पाठीचा त्रास होत राहतो. हा खरंच खूप गंभीर प्रश्न आहे.
या तोट्याबरोबरच इंटरनेटद्वारे आपल्याला खूप मोठे वरदान लाभले आहे. या इंटरनेटमार्फत आपल्यापुढे खूप मोठा माहितीचा विस्फोट उभा आहे. 

याद्वारे आपल्याला जगातील कोणतीही, कसलीही, कशाहीप्रकारची माहिती मिळवु शकतो. जर आपल्याला ती माहिती कोणत्या संकेतस्थळावर आहे हे शोधण्यासाठी याहू, गुगलसारखे संकेतस्थळे शोधुन देणारे माध्यमेही आहेत. या इंटरनेटचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे 'ई-मेल' ज्याला 'इलेक्ट्रॉनिक मेल' ही म्हणतात. याद्वारे आपण आपल्या मित्राला नातेवाइकाच्या सेकंदाच्या काही भागामध्ये पत्र पाठवू शकतो. यामार्फत आपल्याला बाहेर कोठेही न जाता घरातल्या घरात संगणकाद्वारे कोणतीही वस्तू विकत घेऊ शकतो. यालाच इ. कॉमर्स म्हणतात
.
भविष्यात इंटरनेटची खूप मोठी भरारी होणार आहे. सध्या जे रोबोट आहेत त्याला जर इंटरनेटचे तंत्रज्ञान विकसित केले तर त्याला प्रश्न विचारण्याचा अवकाश, तात्काळ तो तुमच्यासमोर त्याचे उत्तर सादर करेल.
या इंटरनेटमार्फत जे धोके संभवतात त्यासाठी चांगले असे सायबर लॉ योजले पाहिजेत.त्याचबरोबर आपण त्या इंटरनेटचे गुलाम होण्यापेक्षा त्याला आपणच गुलाम ठेवले पाहिजे. इंटरनेट आपला वेळ वाचविण्यासाठी विकसित  कले आहे . त्याला तेथेच मर्यादित ठेवले पाहिजे.

या इंटरनेटच्या महापुराला आपले जीवन सुखकर करण्यासाठी उपयोगात आणावे. तो तुमचा दक्ष सेवक आहे. जे तुम्ही त्याच्याकडून मागाल ते तुम्हांला चांगल्या प्रकारे देऊ शकेल. इंटरनेटचा योग्य वापर करावा.
 
मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व इंटरनेट वापरताना तुम्‍ही काय उपाय योजना करता व इंटरनेटव्‍दारे तुम्‍ही कोणती कामे सहजरीत्‍या करीत असता हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद 

निबंध 2

इंटरनेट मराठी निबंध 

माहिती तंत्रज्ञानाचा एक सुंदर आविष्कार म्हणजे इंटरनेट. आज जिकडे पाहावे तिकडे सगळीकडेच इंटरनेटच हा शब्द आपल्या कानावर पडत असतो. इंटरनेटची उपयुक्तता जवळजवळ सर्वच क्षेत्रांत आपल्याला जाणवत आहे. पण काय आहे हो हे इंटरनेट? ते कसे तयार होते ? त्याचा विस्तार नक्की कुठून कसा झाला? यांसारखे अनेक प्रश्न नेहमीच सर्वसामान्य मनात घोळत असतात. तर हे इंटरनेट म्हणजे असंख्य कॉम्प्युटर किंवा संगणकांचे जगभर पसरलेले जाळे होय किंवा अनेक नेटवर्क यांचे हे एक नेटवर्क आहे. 


या इंटरनेटशी आज संपूर्ण जगातील असंख्य लोक एकमेकांशी जोडले गेले आहेत. अमेरिकेतल्या पेंटॉगॉन या त्यांच्या सुरक्षाव्यवस्था असलेल्या ठिकाणी सर्वप्रथम अशाप्रकारच्या नेटवर्कची गरज भासू लागली. कारण युद्धपरिस्थिती दरम्यान या अधिकाऱ्यांमधील अपुऱ्या सुसंवादाचे परिणाम तेथील सुरक्षाव्यवस्थेला जाणवत होता. म्हणून सर्वप्रथम पेंटॉगॉनमधील संगणक हे जोडण्याची कल्पना यातून निघाली. त्यातूनच सर्वप्रथम 'अपनिट' तयार झाले व पुढे 'अर्पानेट'चाच विस्तार होत होत त्यातून इंटरनेटचा जन्म झाला आणि हळूहळू जगभरातील संगणक एकमेकांना जोडले जाऊन इंटरनेटचे हे महाकाय जाळे विणले गेले.


पुढे इ.स. १९९१ मध्ये टिम बर्नर ली या गणितज्ञाने स्वीत्झर्लंडमधील जिनिव्हा येथे सर्वप्रथम 'वर्ल्ड वाइब वेब' (www) सुरू केले. कदाचित तेव्हा त्या बिचाऱ्याच्या हे ध्यानीही नसेल की पुढे यामध्ये एवढे क्रांतिकारक बदल होतील म्हणून. भारतामध्ये इंटरनेटचा व पर्यायाने 'वर्ल्ड वाइब वेब'चा प्रसार होण्यास १९९५ सालापासून सुरुवात झाली आणि हा प्रसार अजूनही असाच चालू आहे.


 आज जवळजवळ असे कोणतेच क्षेत्र उरलेले नाही की जेथे इंटरनेटचे अस्तित्व किंवा उपयुक्तता नाही. मग ते शिक्षण क्षेत्र असो वा क्रीडा, आरोग्य, बँक. राजकारण असे कोणतेही क्षेत्र असो, त्यांना इंटरनेट नवीन नाही सर्वांनाच इंटरनेट हे आपल्याला माहिती-तंत्रज्ञानामुळे लाभलेले वरदान वाटू लागले आहे.


आज इंटरनेटमुळे घरबसल्या आपण जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातील माहिती किंवा ज्ञान मिळवू शकतो. अगदी घरबसल्या आपण बँकेचे व्यवहारही करू शकतो. जगातल्या सर्वोत्कृष्ट गोष्टीची माहिती आपल्याला इंटरनेटवरून मिळते आणि शिक्षणक्षेत्रात तर इंटरनेटचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विद्यार्थ्यांना, शिक्षकांना हव्या त्या विषयाची अद्ययावत माहिती इंटरनेटवरील वेगवेगळ्या वेबसाइटवरून मिळते. अगदी एखादा आजारी माणूसही त्याच्या आजाराविषयीची माहिती, इलाज अगदी चांगला तज्ज्ञ डॉक्टर यांची निवड इंटरनेटच्या माध्यमातून करू शकतो.



एवढेच नाही तर दररोजच्या बातम्या, वर्तमानपत्रे, हे सर्वच्या सर्व इंटरनेटवर आपल्याला पाहायला मिळते. अगदी अमेरिका किंवा इंग्लंडमधील एखादा भारतीय माणूस किंवा कोणीही व्यक्ती आज भारतात काय चालू आहे याची माहिती तेथे बसून इंटरनेट वरून मिळवू शकतो. खरेच किती मोठी विज्ञानाने केलेली क्रांती आहे ही !
तसेच आपण चक्क इंटरनेटवर खरेदीही करू शकतो.


 इंटरनेटवर वेगवेगळ्या कंपन्या आपले प्रॉडक्ट व त्याची माहिती देणाऱ्या वेबसाइट्स बनवीत असतात. आपण चक्क या वेगवेगळ्या जाहिराती पाहून इंटरनेट वरून ऑनलाइन शॉपिंगही करू शकतो. अशाचप्रकारचा व्यवहार हा अनेक कंपन्यांमध्येही चालतो. त्यालाच 'बिझीनेट ट्रेडिंग' असे म्हटले जाते असे इंटरनेटचे एक नाही तर असंख्य फायदे आहेत. आपण इंटरनेटवरून हवाई तिकीट बुक करू शकतो. 


रिझर्वेशन म्हणजेच आरक्षण करू शकतो. इंटरनेट टेलिफोनद्वारा जगात कुणाशीही चक्क लोकल फोनच्या दरात संभाषण करू शकतो. खरोखरच इंटरनेटमुळे जग हे जवळ आल्यासारखे वाटते म्हणूनच इंटरनेट हे मानवाला लाभलेले एक वरदानच आहे. पण प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात. 


तसेच या बाबतीतही आहे. या इंटरनेटचा वाईट मार्गाने उपयोग करणारी माणसे असतात. ते इंटरनेटवर असलेली महत्त्वाची माहिती काढून टाकणे व तिथे नको ते लिहिणे, दुसऱ्याचा पासवर्ड मिळवून त्याच्या व्यक्तिगत माहितीत डोकावणे किंवा इंटरनेटवरून व्हायरस (विषाणू) सोडून जगभराचे व्यवहार ठप्प करणे यांसारखे गुन्हे करतात. त्यांना इंटरनेटच्या भाषेत 'सायबर गुन्हे' असे म्हणतात व त्यासाठी त्यांना शिक्षाही होऊ शकते आणि असे अनेक गुन्हे सायबर विश्वात घडले आहेत.


काहीजण इंटरनेटच्या ई-मेल (E-mail) या माध्यमातून एखाद्याला धमकावतात तर काही जण चक्क इंटरनेटवरून मुलींची छेड काढतात. त्यांना अश्लील छायाचित्रे पाठवतात. अश्लील ई-मेल (E-mail) करतात. खरंच या तर माणुसकीलाही काळिमा फासणाऱ्या घटना आहेत की एवढ्या उपयोगी माध्यमाचा काहीजण अशा अनैतिक मार्गाने वापर करतात व स्वतःहून


या गोष्टीला शापाचे स्वरूप देतात. काहीजण इंटरनेटमधून मुलींना फसवण्याच्याही घटना अलीकडच्या काळात उप येत आहेत. पण खरोखरच मी तर म्हणेन अशी काही विघ्नसंतोषी माणसे सोडली तर इंटरनेट हे मानवाला मिळालेले बहु वरदानच आहे. कारण कोणतीही गोष्ट ही चांगली किंवा वाईट नसते. आपणच तिला चांगल्या किंवा वाईटचा दजा दत असतो. हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे की आपण इंटरनेटचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायचा का अधोगतीसाठी करायचा म्हणूनच मी एकदा नाही तर त्रिवार म्हणेन की इंटरनेट हे मानवाला लाभलेले वरदानच आहे.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

internet essay in marathi | इंटरनेट मराठी निबंध

vidnyan shap ki vardan essay in marathi | विज्ञान शाप की वरदान निबंध मराठी 

निबंध क्रं.1  

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध बघणार आहोत. या 2 निबंधामध्‍ये मानवाने आपल्‍या फायद्यासाठी कश्‍याप्रकारे विज्ञानाचा वापर करून  स्‍वताचे  कश्‍याप्रकारे फायदा  नुकसान केेले आहे. हे तुम्‍हाला निबंधात सवीस्‍तर  वाचण्‍यात येईल . चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

'विज्ञान-शाप की वरदान? (science boon or curse?) हा माणसाला पावलोपावली पडणारा प्रश्न आहे. विज्ञानाने प्राप्त करून दिलेल्या शेकडो सोयी-सुविधा तो उपभोगत असतो आणि त्याच वेळी वैज्ञानिक शोधांतून ओढवणारे जीवघेणे अपघातही तो अनुभवत असतो. मग त्याला पुनःपुन्हा प्रश्न पडतो की, विज्ञान हा माणसाला मिळालेला शाप आहे की वरदान?

'विज्ञान'रूपी ही कामधेनू माणसावर प्रसन्न झाली आणि मानवी जीवनात आमूलाग्र बदल झाला. चाकाचा शोध लागल्यामुळे माणसाच्या जीवनाला गती आली. विज्ञानाच्या साहाय्याने माणसाने आपल्या सर्व प्रकारचे सामर्थ्य वाढवले. सात महासागरांपलीकडे पसरलेले जग जवळ आले. इतकेच नाही, तर माणसाने अंतराळात झेप घेतली, संगणकाच्या साहाय्याने तर माणसाने आज अशक्‍य वाटलेल्‍या गोष्टी प्राप्त केल्या. इंटरनेटच्या साहाय्याने दुरवर  असलेली माणसे एकमेकांना रोज भेटू लागली.


vidnyan-shap-ki-vardan-essay-in-marathi
vidnyan shap ki vardan essay in marathi


विज्ञानाची ही किमया श्रीमंतांपासून अगदी गरिबांपर्यंत पोचली आहे. अगदी खेड्यातही भाकरीच्या पिठासाठी कुणा अन्नपूर्णेला जाते फिरवावे लागत नाही. विज्ञानाच्या साहाय्याने माणसाने स्वत:चे कष्ट खूप कमी केले आहेत; तसेच वैदयकीय क्षेत्रात अनेक शोध लावून अनेक असाध्य आजारांवर मात केली आहे. 

वैज्ञानिक शोधांमुळे अंधश्रद्धांवर मात करता येते. हे सारे पाहिले की मन ग्वाही देते, विज्ञान मानवाला लाभलेले श्रेष्ठ वरदान आहे. अणुशक्ती ही मानवाला लाभलेली परमशक्ती आहे, पण त्याच क्षणी या विसाव्या शतकात झालेल्या दोन विध्वंसक महायुद्धांची आठवण येते. या महायुद्धांत झालेला मानवसंहार पाहिला की विज्ञानाची अवास्तव शक्ती याला कारण आहे, हे प्रकर्षाने जाणवते.

 गेली पन्नास वर्षे साऱ्या विश्वाला तिसऱ्या महायुद्धाची छाया सतत झाकोळून टाकत आहे. 'तिसरे महायुद्ध' झाले तर सारे विश्व नष्ट होण्याची भीती आहे. माणसाने आपल्या विज्ञाननिष्ठेने जे काही मिळवले त्यांतूनच माणसाने आपला विनाश ओढवून घेतला आहे, असे म्हणावे लागते.

विज्ञानाच्या साहाय्याने माणसाने भयंकर शस्त्रास्त्रे निर्माण केली, त्यांतून आज दहशतवाद फोफावला आहे. माणसातला माणूस हरवला आहे आणि तो जास्तीत जास्त स्वार्थी बनत चालला आहे. माणूस निसर्गापासून दूर गेला आहे. त्यामुळे तो सुखी झाला आहे का, याबाबत संशयच आहे. हे पाहिले की प्रश्न पडतो, खरोखरच 'विज्ञान शाप आहे की वरदान?'

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व विज्ञान शाप आहे की वरदान याविषयी तुमचे मत काय आहे.  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद.

महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )
  • विज्ञान, माणसाची निर्मिती
  • अनेक फायदे 
  • मानवी जीवन संपन्न करण्यासाठी उपयोगी
  • आरोग्य 
  • वाहतूक 
  • दळणवळणात क्रांती
  • परग्रह निरीक्षणसृष्टीचे गूढ उकलण्याचा प्रयत्न 
  • शोधातून अंधश्रद्धा निर्मूलन 
  • प्रयोगाला महत्त्वअणुशक्तीनिर्मिती 
  • मात्र, अणुबॉम्ब आणि इतर शोधांमुळे मानवी जीवन संकटातविज्ञानाचा दुरुपयोग टाळणे मानवाच्या हाती 
  • विज्ञानाचा सुज्ञपणे उपयोग करणे आवश्यक

                                                                 निबंध क्रं.2

Vigyan shap ki vardan marathi nibandh | विज्ञान-सुखदायक की दुःखदायक मराठी निबंध 

इतीहासात राजे महाराजे यांना पण टी.बी. सारख्‍या आजारापुढे काहीही न करता आल्‍यामुळे मृत्‍युशिवाय पर्यांय नव्‍हता परंतु आजच्या युगातील गरीब व्‍यक्‍ती त्यावर मात करून जगतो ही आहे विज्ञानकृपा, हे विज्ञान वरदान  नाही काय ? | आजच्या दैनंदिन जीवनातील एकही घटक नाही, ज्याला विज्ञानाचा परिसस्पर्श झालेला नाही. अंघोळीला गिझर, स्वयंपाकाला कुकर, हिंडायला स्कूटर, टोस्टर, रूम हिटर, टी. व्ही. अन् संगणक सारेच! 

ज्ञानाच्या जिज्ञासेतून विज्ञान आले आणि मानवाने आपल्यासाठी त्याला यथेच्छ राबवले. अनेक सुविधांनी माणसाचे शारीरिक कष्ट कमी केले. सुखासीनता वाढवली. निरोपांसाठी स्वतः जाण्याचे श्रम वाचवून फोनवर काम भागवू लागले. हजारो मैलांचा प्रवास, पोटातील पाणी न हालता, विमानाने काही तासांत होऊ लागला. किचकट बौद्धिक समस्या संगणक (Computer) सोडवू लागला. अवकाशाचा शोध घेतला, सागरतळांचा ठाव घेतला. 

चंद्रावर उतरून आता तर मंगळ काबीज करू लागला आहे. काही दशकांपूर्वी देवी, टॉयफॉइड, टी. बी. या रोगांपुढे हात टेकणारा माणूस आता रोग मोडीत काढू लागला आहे...पृथ्वीवरच्या प्रत्येक निसर्गदत्त गोष्टीचा मानवाने, विज्ञानाच्या साह्याने, कौशल्याने वापर करून घेतला...जग अधिकच सुंदर केले ! आकर्षक केले ! ! मोहमयी केले ! ! ! 

स्वतःलाही दीर्घायू करवून घेतले. नैसर्गिक प्रकोपांचे इशारे अगोदरच मिळवून स्वतःचे रक्षण केले.  चार हजार वर्षांपूर्वीच्या पशूच्या पिढीत व आजच्या त्याच पशूच्या पिढीच्या जीवनमानात काहीच फरक पडला नाही...पण माणसाचे तसे नाही. सर्व प्राणि मात्रांमध्ये सर्वात अवलंबी, अशक्त माणसाने, मेंदूच्या चमत्कारातून विज्ञान निर्माण करून करामत केली. 'विज्ञान' या तीन अक्षरांच्या तीन पावलांनी वामनासारखे तिन्ही लोक पादाक्रान्त केले.

पण गुणांच्या छायेतच दुर्गुणही वाढतात. दीर्घायू झाल्याने लोकसंख्येचा विस्फोट झाला. त्याने सामाजिक तसेच वैयक्तिक जीवनातही अनंत प्रश्न निर्माण केले. जीवन यांत्रिक झाले. यंत्रांच्या अती वापराने बेकारी वाढली, शारीरिक दुखणीही वाढली. निसर्ग आणि माणूस यांत अंतर पडले. आयुष्याला एक प्रचंड गती आली आणि माणूस गरगरू लागला. सर्वांत जास्त हानी झाली-मानवी मनाची! विज्ञानाने जरी

                               " दहा दिशांचे तट कोसळले । ध्रुव दोन्ही जवळी आले ॥" 

अशी स्थिती केलेली असली तरी मनामनांमध्ये अंतर पडून “ दोन ध्रुवांवर दोघे आपण"  अशीही परिस्थिती झाली आहे. घरांचे घरपण हरवले आहे. विज्ञानाने समृद्धी दिली पण बदल्यात चैन हिरावून घेऊन बेचैनी दिली... डोळे दिपवणारी प्रगती विज्ञानाने केली पण मानवाला लाक्षणिक अर्थाने आंधळे केले. चेर्नोबिलचा अणुस्फोटाचे भिषण परीणाम बघितल्‍यावरीही मानव अणुभट्ट्या तयार करणे चालूच ठेवत आहे.

एक प्रकारचा उन्माद त्याला आला आहे.  E = MC2 चा वापर माणसांच्याच विध्वंसासाठी करणे म्हणजे तर कु-हाडीचा दांडा गोतास काळच ! अण्वस्त्रांनी आंतरराष्ट्रीय सामंजस्य ढवळून निघाले आहे. म्हणजेच, विज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. ते सर्वस्व नाही. त्याला लक्ष्मणरेषा हवी. ते साध्य नसून साधन आहे. वैज्ञानिक साधनांचा वापर चुकीचा केला गेला तर त्यात चूक साधकाची ! साधनांची नव्हे ....

पण हे ऐकण्याच्याच मन:स्थितीत आज माणूस नाहीये. त्यामुळेच आज जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. आणि कदाचित त्यातच जगाचा अंत आहे.


निबंध क्रं.3  

विज्ञान : शाप की वरदान!

विज्ञान म्हणजे ज्ञान. वस्तुमात्राच्या स्थितीचे गुणधर्मांचे, व्यवहाराचे ज्ञान. आपल्या विश्वातील अणूरेणूंपासून आकाशातील ग्रहगोलांपर्यंत सर्व गोष्टींचे ज्ञान प्राप्त करून घेण्याची लालसा माणसाला होती व आहे. ही ज्ञानलालसा पुरी करण्यासाठी मानव अखंड धडपडत आहे आणि विज्ञानाची वाटचाल अखंड चालू आहे.


विज्ञान ही माणसाला लाभलेली दिव्य शक्ती आहे. मानवाने विज्ञानाची उपासना केली आणि म्हणूनच त्याची आदिमानवाच्या अवस्थेपासून आजच्या अवस्थेपर्यंत प्रगती झाली. आज मानवी जीवनात असे एकही क्षेत्र नाही जेथे विज्ञानाने प्रवेश केला नाही व जे समृद्ध केले नाही. विज्ञानाच्या बळावर माणसाने अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. 

विज्ञान व तंत्रज्ञानामुळे आपल्याला टी.व्ही., रेडिओ, पंखे, फ्रीज, वॉशिंग मशीन, वातानुकूलन यंत्रे अशा अनेक सुखसोयी उपलब्ध झाल्या आहेत. टेलिफोन, फॅक्स, ई-मेल, इंटरनेट या साऱ्यांद्वारे आपण जगाच्या कानाकोपऱ्यात संपर्क साधू शकतो.


औद्योगिक क्षेत्रातही विज्ञानाने फार मोठी क्रांती केली आहे. अत्याधुनिक छपाई यंत्रावर वृत्तपत्रांच्या लाखो प्रती काही तासांतच छापून वितरणासाठी पाठवल्या जातात. माणूस विविध प्रकारची वाहने वापरतो. समुद्राच्या तळाशी जातो, आकाशातही भरारी घेतो. कृत्रिम उपग्रह सोडून माणूस अवकाशावर सत्ता गाजविण्याच्या प्रयत्नात आहे. वेधशाळेत यंत्रांद्वारे वादळ, मुसळधार पाऊस आदी अनिश्चित गोष्टींचा अंदाज करता येऊ लागला आहे. वैद्यकीय क्षेत्रातसुद्धा विज्ञानामुळे मानवाने फार मोठी झेप घेतली आहे.


रोगनिवारणासाठी अनेक प्रभावी औषधे निर्माण झाली आहेत. मानवाचे निरुपयोगी झालेले अवयव शस्त्रक्रियेद्वारा बदलून त्याला जीवदान देता येते, अपंग माणसाचे अपंगत्व घालवून त्याला निरोगी सुखी जीवन जगण्याची संधी देता येते.


विज्ञानाने शेतीमध्येसुद्धा अनेक प्रयोग केले आहेत. संकरित बी-बियाणे, जपानी भातशेती असे प्रयोग करून आपण धान्य उत्पादन वाढवू लागलो आहोत. अशा त-हेने विज्ञानामुळे आजच्या मानवाचे जीवन अधिक आनंदमय व स्वास्थ्यपूर्ण झाले आहे. विज्ञान ही आपल्याला लाभलेली कामधेनू आहे. __परंतु या विज्ञानरूपी गुलाबाला काटे आहेतच.


विज्ञानामुळे अनेक उद्योगधंदे वाढले आहेत. त्यामुळे वायुप्रदूषण, जलप्रदूषण वाढत आहे. मानव यंत्रांचा गुलाम बनू लागला आहे. शाश्वत नीतिमूल्ये नष्ट होऊ लागली आहेत. विज्ञानाच्या शोधांमुळेच अॅटमबाँब निर्माण होऊ शकला, भयानक शस्त्रास्त्रे तयार केली गेली आणि जीवघेणी महायुद्धे मानवाच्या नाशाला कारणीभूत ठरली. विज्ञानाने माणसांच्या विघातक सामर्थ्यात केलेली वाढ भयावह आहे. त्यामुळे विज्ञान हा अखिल मानवजातीला मिळालेला शापच आहे असे वाटू लागते.


परंतु हा दोष विज्ञानाचा नाही, तर माणसाच्या वृत्तीचा आहे. विज्ञान ही एक शक्ती आहे. अग्नी जसा उष्णता निर्माण करण्यासाठी, अन्न शिजविण्यासाठी वापरता येतो, तसाच आग लावण्यासाठीही वापरता येतो. तो कशासाठी वापरावयाचा हे वापरणाऱ्यावर अवलंबून असते. विज्ञानाचे तसेच आहे. विज्ञानाने मानवी जीवनाला विलक्षण गती दिली आहे,


मानवाची सर्वांगीण प्रगती घडविली आहे. विज्ञानामुळेच त्याच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत आहेत. म्हणून विज्ञानाचा वापर चांगल्या कार्यासाठीच केला तर हे वरदान मानवाला निश्चितच उपकारक ठरू शकेल. आपले जीवनमान उंचावणारे विज्ञान हे मानवाला लाभलेले वरदानच होय!
मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद 

vidnyan shap ki vardan essay in marathi | विज्ञान शाप की वरदान निबंध मराठी


Internet shap ki vardan in marathi essay | इंटरनेट  शाप की वरदान मराठी निबंध 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण इंटरनेट  शाप की वरदान मराठी निबंध बघणार आहोत. इंटरनेटचा वापर करणे आजकाल फार सामान्‍य झाले आहे. परंतु जसा इंटरनेटचा वापर वाढत आहे. त्‍यांचे वाईट व चांगले परीणाम स्‍पष्‍ट दिसायला सुरूवात झाली आहे. इंटरनेटचे फायदे तोटे (internet che fayde tote)  या निबंधात सविस्‍तरपणे स्‍पष्‍ट केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 
 
निसर्गाने दिलेल्या शक्तीचा वापर हा माणसाच्या मतावर आणि त्याच्या माणुसकीवरच अवलंबून आहे. भौतिक सुख प्राप्त करण्याकरिता मनुष्याने केलेल्या अविरत मेहनतीचे फळ म्हणजेच आजच्या भौतिक सुधारणा होय. त्यांपैकी इंटरनेट  हे सुद्धा एक होय. हे दिव्य ज्ञान आता वरदान आहे की शाप हे खालील मुद्द्यांवरून ती स्पष्ट करू इच्छितो.

इंटरनेटचा वापर मुख्यत्वे संकेतस्थळांवर (वेबसाईट) साठवलेल्या माहितीची देवाणघेवाण करण्याकरिता होतो.  इंटरनेटच्या माध्यमातून आपण काही गोष्‍टींचा उत्कृष्ट वापर करू शकतो. जसे e - बँकिंग, e - कॉमर्स, e - चौपाल, e - मेल इत्यादी. म्हणजे आज इंटरनेट वापर ही नित्याची बाब झाली आहे.

इंटरनेटला मेलच्या (संदेशाच्या) माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य भारतीय वंशाच्या अमेरिकेत वास्तव्यास असणाऱ्या 'साबीर भाटीया' या युवकाने 'हॉटमेल'चा शोध लावून केले. सध्या न्यूयॉर्क शिकागो, पॅरीस इत्यादी ठिकाणी अनेक कंपन्यांचे 'माहिती साठवणूक केंद्रे' आहेत व त्या माध्यमातून भूस्थिर उपग्रहाच्या साहाय्याने संकेतस्थळांचा वापर करून हवी ती माहिती इंटरनेटवरून मिळवता येते.

internet-shap-ki-vardan-in-marathi-essay
internet-shap-ki-vardan-in-marathi-essay


इंटरनेटचे संकेत स्थळ असलेले 'Google Earth' हे लष्‍करी दृष्‍टीकोनातुन बघीतले  एक शापच आहे. उपग्रहाच्या साहाय्याने जगातील कुठल्याही ठिकाणांची चित्रे व चित्रफिती कोणत्याही अडथळ्याशिवाय बघणे हे लष्करीदृष्‍टीकोनातुन अतिशय हानिकारक आहे. 

'इंस्टंट न्यूज'सारखे 'ब्लॉग' तयार होण्याचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. त्यामुळेच चुकीची  माहिती सर्रास उपलब्ध असते. ही सामाजिक व राजकीयदृष्ट्या गंभीर बाब आहे. 'व्हायरस' ही इंटरनेटला लागलेली कीडच होय. अशी प्रोग्राम्स तयार करणे ही समाजाला लागलेली कीड, असाध्य रोग आहे. विशेषतः इंटरनेटच्या माध्यमांतून मुलींसोबत होणाऱ्या गैरव्यवहाराचे प्रमाणसुद्धा अतिशय जास्त वाढले आहे.

स्वतःची ओळख लपवण्याची सुविधा असल्याने व कोणतीही प्रतिक्रिया न होण्याच्या विचाराने सामाजिक, राजकीय, आर्थिक गैरव्यवहारांचे प्रमाण गेल्या ३-४ वर्षांत खूप वाढले आहे. वरील गैरव्यवहार, गैरप्रकार इतके जास्त वाढले आहेत की त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 'सायबर क्राईम विभागांची' स्थापना करावी लागली. म्हणजे मानव जातीला ठरलेला शापच आहे.

पण याच इंटरनेटमुळे जगातील प्रत्येक व्यक्ती एक-दुसऱ्याच्या अतिशय जवळ आला, त्यांचा वेळ वाचला, त्यांच्यात आपुलकी निर्माण होण्यास मदत झाली. जग प्रेमाने जिंकता येते असे म्हणतात, त्याच शब्दांना खरे करण्याचे कार्य इंटरनेट करते आहे. हवी असलेली माहिती क्षणार्धात तुम्हांला इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या मिळते, तुमचा फायदा होतो, वेळ वाचतो. पत्र व्यवहार, आर्थिक व्यवहार यांना लागणारा वेग हा १००० पटीनी वाढला झाला आहे त्‍यामुळे ही कामे कमी वेळात पुर्ण होत आहेत.  

देशादेशाविषयीची माहिती उपलब्ध असल्याने देशांना संपर्क करण्यास व त्यातून सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक देवाणघेवाण करण्यास मदत होते, हा अतिशय मोठा फायदा आहे. आर्थिक व्यवहार हे वेळेच्या मर्यादेत जर झाले तर फायदेशीर असतात. इंटरनेटच्या माध्यमातून आर्थिक फायदा मोठ्या प्रमाणावर होतो (शेअर मार्केट).

कित्येक जणांनी इंटरनेटच्या माध्यमातून लग्नसुद्धा जुळवली आहे. मन जुळली आहेत, लोक जवळ आली आहेत, विभिन्न देशांतील संस्कृतीचा परिचय एकमेकांस झाला... एकूणच जग अतिशय छोटे झाले आहे तर आपण याला शाप कसे म्हणणार हे तर वरदानच होय. 

मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला  हे  तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद .

हा निबंध मराठी भाषेत ( marathi language ) आहे.  शब्‍दमर्यादा 500 

या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते 

  • marathi essay on internet advantages and disadvantages
  • Internet is a blessing or curse in Marathi Essay

Internet shap ki vardan in marathi essay | इंटरनेट शाप की वरदान मराठी निबंध

Bhrashtachar Essay in Marathi | भ्रष्टाचार निबंध मराठी 


निबंध 1  
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण भ्रष्टाचार निबंध मराठी बघणार आहोत. या निबंधामध्‍ये आज आपल्‍या देशात बोळकावलेला भ्रष्टाचार, भ्रष्टाचाराविषयी असणारी समाजमनाची मानसिकता याविषयी वर्णन केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

आजच्या एकविसाव्या शतकातही एक भस्मासुर फार मातला आहे. या भस्मासुराचे नाव आहे, भ्रष्टाचार ! हल्ली वर्तमानपत्रांतून तर नित्य नवा 'आर्थिक घोटाळा' जाहीर होत असतो. बँक घोटाळे, मुद्रांक घोटाळे, खोट्या नोटा छापणे... हे असे एक ना अनेक घोटाळे आता चिरपरिचित झालेत.

पुराणकाळातील भस्मासुरापेक्षा या आधुनिक भस्मासुराच्या लीला महाभयंकर आहेत. आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तो  दिसतो. वाढत्या महागाईमागे याचाच हात आहे. कोणत्याही गोष्टीची कृत्रिम टंचाई हाच निर्माण करतो. नोकऱ्यांची टंचाई असली, तर भ्रष्टाचाराला तेथे मुक्त वाव मिळतो. लाखो रुपयांची लाच देऊन अधिकाराच्या जागा मिळवल्या जातात आणि एकदा अधिकाराची जागा मिळाली की, लाच म्हणून दिलेले पैसे वसूल करण्यासाठी लाच स्वीकारली जाते. असे हे एक दुष्टचक्र सुरू आहे. त्यातून 'काळा पैसा' निर्माण झाला आहे.

Bhrashtachar Essay in Marathi
Bhrashtachar Essay in Marathi


विज्ञानाच्या बळावर व्यक्तिगत जीवनात अनेक सुखसोयी, चैनीच्या गोष्टी सहजपणे उपलब्ध झाल्या आहेत. प्रत्येकाला त्या हव्याहव्याशा वाटतात. त्याकरिता पैसा मिळवण्यासाठी कष्ट करण्याची कोणाचीच तयारी नसते. सहजगत्या, सुलभतेने मिळणारा पैसा बहुतेकांना हवा असतो. चंगळवादाच्या या हव्यासापोटी भ्रष्टाचाराचा जन्म होतो. पैसा हे एकदा सर्वस्व' मानल्यावर, तो मिळवण्यासाठी वाट्टेल ते केले जाते.

अन्नात व  औषधातदेखील भेसळ केली जाते. औषधातील भेसळीमुळे निरपराध जीवांचे  बळी घेतले जातात. भ्रष्टाचार करणाऱ्यांची विवेकशक्ती नष्ट झालेली असते. बालवर्गापासून शाळा-महाविद्यालयापर्यंत प्रवेशासाठी लाच घेतली जाते. लाच घेऊन परीक्षच्या प्रश्नपत्रिका फोडल्या जातात व लाच घेऊनच परीक्षेचे गुण फिरवले जातात. वैयक्तिक स्वार्थासाठी देशाची संरक्षणविषयक गुपिते परकीय सत्तेला पुरवली जातात.


चोरट्या व्यापाराला उधाण येते. नव्या पिढीला नष्‍ट करणाऱ्या अमली पदार्थांच्या व्यापाराला जोर चढतो.
भ्रष्टाचाराच्या या भस्मासुराचा वेळीच बळी घेतला नाही, तर तो भारताचा विध्वंस केल्यावाचून राहणार नाही. आजच्या युवकांनी  समाजातील भ्रष्टाचागची मुळे उपटून काढून स्वच्छ जीवनाचा पाया घातला पाहिजे.

मित्रांनो तुम्‍हाला भ्रष्टाचार निबंध मराठी   हा निबंध कसा वाटला  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद 

महत्‍वाचे मुद्दे : 

  • सध्याचा महासुर 
  • सर्व क्षेत्रांत भ्रष्टाचार 
  • कृत्रिम टंचाई
  • महागाई
  • पैसे दिल्याशिवाय काम होत नाही
  • काळा पैसा 
  • चंगळवाद 
  • त्यासाठी सहज मिळणारा पैसा
  • भ्रष्टाचारी नीतिमत्ता घालवून बसतो 
  • भेसळ
  • भयंकर परिणाम 
  • शाळामहाविदयालयीन प्रवेश पैसा
  •  नोकरीसाठी लाच
  • दुष्टचक्र
  • प्रश्नपत्रिका फोडणे 
  • गुण बदलणे 
  • अमली पदार्थांची आयात 
  • नवीन पिढी बरबाद 
  • सचोटी हरवली आहे...

निबंध 2  

Bhrashtachar Ek Samasya, corruption essay in marathi


काही वर्षांपूर्वी आपल्या देशात भ्रष्ट आचरणाला वाव नव्हता. भ्रष्टाचारी माणसाला अतिशय कमी लेखले जाई. पण आज साऱ्याच नैतिक मूल्यांचा हास झाला आहे. आज असे एकही क्षेत्र नाही की, जेथे भ्रष्टाचार होत नाही. उलट आज भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला आहे.

केवळ मोठ्या शहरांतूनच नव्हे, तर अगदी खेडोपाडीसुद्धा कामांच्या कागदांवर 'वजन' ठेवले नाही तर कामे होत नाहीत. सरकारी कार्यालयातुन  या रोगाची लागण प्रथम झाली. कोणतेही काम तेथील कर्मचाऱ्यांकडून करून घ्यायचे असेल, तर आधी त्यांचे हात 'ओले' करावे लागतात. आजकाल विमा कंपनी, बँका, आयकर कार्यालय या ठिकाणी हा भ्रष्टाचार इतका बोकाळला आहे की, यात आपण काही गैर करत आहोत, असे कुणालाही वाटत नाही.
भ्रष्टाचाराची वाळवी समाजमनाला पोखरू लागली आहे.


आज भ्रष्टाचार हा मोठा चिंतेचा विषय झाला आहे; कारण भ्रष्टाचाराने आपले हातपाय शिक्षण, वैदयक अशा मानवी जीवनातील महत्त्वाच्या क्षेत्रांपर्यंत पसरवले आहेत. शाळा-महाविदयालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पैसे चारावे लागतात. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फोडून भागत नाही, म्हणून गुणांची अदलाबदल केली जाते. केवळ काही रुपयांसाठी हुशार विदयार्थी आपल्या गुणवत्तेचे श्रेय कोणालाही विकायला तयार होतात.

वैदयकशास्त्र हे केवढे पवित्र क्षेत्र ! दुसऱ्याला जीवनदान देणारा डॉक्टर, वैदय हा एके काळी परमेश्वराचे दुुुुुसरे रूप  वाटत असे. पण आज अनेक ठिकाणी हा परमेश्वर असुरासारखे वागताना आढळतो. कशासाठी? तर काही मूठभर पैशांसाठी! कुणा गरिबाची किडनी त्याला फसवून काढून विकणारा डॉक्टर हा देव कसला? त्याला दानवच म्हटले पाहिजे. शिक्षणक्षेत्रातही भ्रष्टाचाराने आपले पाय दूरवर पसरले आहेत.



 माणूस भ्रष्टाचारी का होतो? त्याच्या साऱ्या श्रद्धा, निष्ठा का हरवतात? मंदिराचा सुवर्णकळस घडवणाराच कळसातील सोने चोरतो, तेव्हा त्या आचरणाला काय म्हणावे? या साऱ्या वृत्तीला एकच कारण आहे आणि ते म्हणजे  'माणसाची उपभोगवादी वृत्ती!" 'भ्रष्टाचार' हा गरीब-श्रीमंत सगळेच करताना दिसतात. सुशिक्षित  माणसे आपली विद्वत्ता वापरून भ्रष्टाचार करतात. येथे स्त्री-पुरुष असा कोणताच भेदभाव नाही. प्रत्येकाला फक्त चैन हवी, सत्ता हवी. त्यासाठी फार मौल्यवान अशी आपली नीतिमूल्ये आपण हरवून बसलो आहोत.


प्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर यांच्या नाटकातील नायक भ्रष्टाचाराच्या विकृतीला 'मनाचा महारोग' म्हणतो. क्रिकेट खेळातील 'मॅच फिक्सिग' प्रकरणाने सारे जग हादरले. क्रिकेट हा भारतीयांचा आवडता खेळ आणि त्या खेळातील खेळाडू ही त्यांची आवडती दैवते. आपली तहानभूक विसरून, आपली महत्त्वाची कामे बाजूला ठेवून ते त्यांचा खेळ पाहण्यासाठी आटापिटा करतात. असे हे आपले आवडते खेळाडू काही रुपयांसाठी मुद्दाम बाद होतात, हे कळल्यावर लोकांना कमालीचा धक्काच बसला.

भ्रष्टाचाराचा हा भस्मासुर सर्वत्र बोकाळला आहे. खळाळणाऱ्या, उफाळणाऱ्या पाण्यात एखादा भोवरा निर्माण होतो आणि मग पट्टीचा पोहणाराही या भोवऱ्यात गुरफटला जातो; आणि एकदा का भोवऱ्यात गुरफटला गेला की त्याची सुटका नसते. आज असेच आपण सगळे या भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात अडकलो आहोत. त्यातून आपली सुटका होणार तरी कधी?


निबंध 3

Essay on Corruption in Marathi Wikipedia Language

आजकाल 'बुंध्यावर घाव घाला, फांद्या आपोआप पडतील ' या न्यायाने माणूस गुण मिळवण्याऐवजी पैशाच्याच मागे लागलाय. पैसा... मग तो कशाही मार्गाने असो तो मिळवण्याचा तो आटोकाट प्रयत्न करू लागला आहे. यातूनच जन्माला आला-भ्रष्टाचार !

वाढलेल्‍या गरजा हीच या अधोगतीची जननी आहे. वैज्ञानिक प्रगतीन वैयक्तिक सुखांची रेलचेल झाली. माणुस काय सुखाच्‍याच शोधात असतो.  कुठलंही भौतिक सुख सामान्य माणसाला पटकन भावतं, मग ते मिळविण्यासाटी लागणारा पैसा मिळविण्यासाठी प्रथम नकळत, नंतर समजून उमजून तो वाकड्या मार्गाने जातो, मानवी रक्‍ताला चटावलेल्‍या नरमांसभक्षक वाघासारखा पैशावर झडप घालु लागतो. हडप करू लागतो. 
वैयक्तिक स्वरूपाच्या लोभीपणाच एकवेळ   समजु शकतं पण याची लागण आज सगळीकडे झालेली दिसते ही दुदैवाची गोष्ट आहे. आज एकही क्षेत्र असं नाही जिथे भ्रष्टाचार पोचला नाही. भ्रष्टाचार शिष्टाचार होऊ पाहात आहे.

 माणसाची श्रीमंती, उच्चपद, अधिकार, सत्ता हे तो किती भ्रष्ट आहे यावरच अवलंबून आहे असं वाटु  लागतं, हवं ते मिळवण्यासाठी आजकाल माणुस वाटेल ते करू लागलाय, कंडक्टरने सुटे पैसे परत न करणे, वजनामध्ये तराजू मारणे, गॅस सिलेंडरसाठी बक्षिसी देणें, स्वतःचीच जमीन स्वतःच्या नावावर करण्यामठी कचेरीत साहेबांना खुश करणे,


 प्रमोशनसाठी वरिष्ठांना ओली पार्टी देणे, यापासून ते अक्षम्य अशा, राष्ट्राची गुपित परराष्ट्रांना विकणे, राष्ट्रसंरक्षक हत्यारं खरेदीत प्रचंट पैसा खाणे यापर्यत माणसाची मजल गेली आहे. हे सारं का घडतं? माणसाच्या मनावरचा नीतीचा अंकुशच हरवला आहे. 'कष्टाविण नाही फळ' असं पूर्वज म्हणायचे, त्यांना 'या' मार्गाची कल्पना नसावी. अन्यथा 'कष्टावीणही मिळे फळ,' असे म्हटले असते.

सार्वजनिकरीत्या, गोंडस नावाखाली राजरोस भ्रष्टाचार चालतो तेव्हा राष्ट्राच्या भवितव्याची चिंता वाटते. बोगस प्रतिष्टानं काढून राजरोस अलोट पैसा जमवतात तेव्हा कुंपणानं खाल्लेलं शेत पाहुन कीव येते. शाळेच्या प्रवेशासाठी, इमारतीसाठी हजारोंची देणगी उकळली जाते. 

प्रत्येकानं आता भेसळीचं प्रशिक्षण घेतल्यासारखंच वाटतं. उद्घाटनाच्या दिवशीच पूल कोसळताहेत. भेसळीच्या अन्नानं, मद्यानं, औषधानं अनेकांचे प्राण घेतले आहेत. मंत्र्यांचा आशीर्वाद असतो हे तर लाजिरवाण आहे.  पाश्चात्त्य देशांतही 'वॉटरगेट' प्रकरणं होतात तेव्हा अवघ्या मानवजातीलाच ही कीड लागली आहे की काय असे वाटते. मोठेपणाचा मार्ग भ्रष्टाचाराच्या मैदानातूनच जातो की काय असे वाटते. 


याला उपाय ? वरिष्ठांनी स्वतः नीतिमान राहणं, धन्याच्या बागेतील आंबा घेतला तर हात कलम करून घ्यायला निघालेले दादोजी कोंडदेव यांचा आदर्श ठेवणं, स्वत:च्या काकांना राघोबा पेशव्यांना दिलेली शिक्षा योग्य म्हणणारे माधवराव पेशव्यांसारखे स्वच्छ, निःस्पृह राज्यकर्ते असणं, रंगे हाथ पकडलेल्यांना शासन करणं, नवीन पिढीवर सुसंस्कार करणं हेच होत. अन्यथा या नरकातून सुटका नाही.

Bhrashtachar Essay in Marathi | भ्रष्टाचार निबंध मराठी

Zade Lava Zade Jagva | झाडे लावा झाडे जगवा  

निबंध 1

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण Zade Lava Zade Jagva  मराठी निबंध बघणार आहोत. या 8 निबंधामध्‍ये मानवाने आपल्‍या फायद्यासाठी कश्‍याप्रकारे निसर्गाचे नुकसान केेले आहे. व त्‍यावर कोणते उपाय योजले जाऊ शकता हे तुम्‍हाला वाचण्‍यात येईल . चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

पृथ्वीची अवस्था प्रदूषणामुळे दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पृथ्वीवरील वातावरणाचा तोल ढळत आहे. 'पृथ्वीला वाचवा, आपल्या पृथ्वीची काळजी वाहा' हा 'वसुंधरा दिना' चा संदेश आहे.  केवळ जंगलतोडीमुळेच पर्यावरणाचा तोल ढळतो असे नाही; महानगरे आणि कारखानेही या दुरवस्थेला हातभार लावत असतात. 

गावोगावच्या नद्यांमध्ये कचरा व सांडपाणी सोडले जात आहे. उसाच्या मळीमुळे शेते निकामी होत आहेत. पावसाअभावी वाळवंटे वाढू लागली आहेत. अशी अनेक संकटे आपल्यापुढे उभी आहेत.पर्यावरणाचा ढासळणारा तोल सावरण्याचा एक महत्त्वाचा उपाय म्हणजे वृक्षारोपण होय. 

Zade-Lava-Zade-Jagva
Zade-Lava-Zade-Jagva



अलीकडे वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतात. 'सामाजिक वनीकरणा'ची कल्पना आता रूढ होत आहे. झाडे लावणे जितके आवश्यक आहे, त्याहूनही ती वाढवणे व त्यांचे जतन करणे महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येकाने एकतरी झाड दत्तक घेतले पाहिजे. झाडे लावली आणि त्यांची काळजी घेतली नाही तर काय उपयोग? 

निष्काळजीपणामुळे अनेक झाडे मरतात. कधी त्यांना पाणी मिळत नाही. कधी भुकेलेली जनावरे लावलेली रोपटी खाऊन टाकतात. त्यामुळे लावलेल्या झाडांतील फारच थोडी झाडे जगतात; मोठी होतात.यासाठी आता मोहीम सुरू केली पाहिजे  'एकतरी झाड जगवा.' लग्न, मुंजी, वाढदिवस अशा निमित्ताने आपण भेटीदाखल पुष्पगुच्छ देतो, त्याऐवजी एक-एक रोप भेट दयावे. 

नवीन बालक जन्माला आले की, त्या कुटुंबाने नवीन झाड लावावे व बाळाबरोबर त्यालाही बाळासारखे ममतेने वाढवावे. शाळेतील प्रत्येक मुलाने आपापल्या परिसरात एक तरी झाड लावावे व त्याचे नीट संगोपन करावे, प्रेमाने देखभाल करावी.

शहरातील राखीव भूखंडांवर टोलेजंग इमारती उभारण्याऐवजी गर्द झाडे लावावीत. सरकारी गृहनिर्माण संस्थांनी आपल्या वास्तूच्या परिसरात झाडे लावावीत. रस्त्याच्या दुतर्फा वृक्षांची लागवड करावी. निसर्गचक्र खंडित करण्याचा आपल्याला अधिकार नाही. ते आहे तसे अबाधित राखण्यातच मानवजातीचे हित आहे. पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्याची जबाबदारी आपल्यावर आहे. म्हणून 'एकतरी झाड जगवा !' हा आजच्या युगाचा संदेश आहे. या संदेशाप्रमाणे आपण वागलो, तर ही वसुधा पुन्हा 'हरितश्यामल' बनेल.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व झाडे लावण्‍यासाठी आणखी काय उपाय योजना करायला पाहीजे व तुम्‍ही वृक्षप्रेमी असल्‍यास कोणत्‍या उपक्रमात सहभाग घेतला आहे हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )
  • आजचा मानव निसर्गापासून दूर 
  • वृक्षतोड
  • प्रदूषण
  • दुष्काळ
  • पर्यावरणाचा समतोल ढळला 
  • निसर्गाकडे चला 
  • 'एक मूल, एक झाड ' ही नवी घोषणा 
  • इमारतीच्या जंगलांची वाढ थांबवावी 
  • वनोत्सव सुरू करावेत 
  • वृक्षमित्र पुरस्कार 
  • जंगल संपत्तीचे महत्त्व 
  • वृक्ष ही जीवनधारा 
  • वृक्षवल्ली आम्हा सोयरी

निबंध 2 

एका कार्यक्रमाचा समारोप चालू होता. वक्ता आमंत्रित पाहुण्यांचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानत होता आणि आभार मानताना पुष्पगुच्छाऐवजी प्रत्येकाच्या हाती एकेक रोप देत होता. अतिशय आवडली मला ही कल्पना.

माणसाच्या हातून नकळत फार मोठा गुन्हा घडला आहे. माणसांनी विकासाच्या नावाखाली अमर्याद जंगलतोड केली, वनांचा विध्वंस केला. जंगलांवर कुणाचा हक्क? कुणाची मालकी? कुणाचीही नाही; म्हणजे सर्वांचीच. वाहनांची सोय करण्यासाठी मोठमोठे रस्ते आवश्यक झाले. मग वाटेत येणारी झाडे; झाडे कसली मोठमोठे वृक्ष तोडण्यात आले. 

घरे उभारण्यासाठी लाकूड, घरे सजवण्यासाठी लाकूड... पुस्तके, ग्रंथ, कचेयांतील कामांसाठी कागद; त्यासाठी पुन्हा लाकूड. वर्षानुवर्षे डोळ्यांवर पट्टी बांधून आपण झाडे तोडत राहिलो. खेडेगावातील गरजा वेगळ्या, पण त्यांना त्यांचे अन्न शिजवण्यासाठी सरपण हवेच. मग झाडे तोडली जातात.

शेवटी व्हायचे तेच झाले. या बेसुमार वृक्षतोडीमुळे सारा देश उजाड झाला. देशातील वनस्पती लयास गेली आणि मग या नाठाळ माणसाच्या लक्षात आले, की पर्यावरणाचा तोल बिघडला आहे ! झाडे कमी झाली, तसा पाऊस कमी झाला. माणसे वाढली, पाण्याचा उपसा अखंड चालू राहिला. त्यामुळे जमिनीच्या पोटातील पाण्याची पातळी खाली गेली. आता माणसाला पिण्यासाठीही पुरेसे पाणी मिळणे कठीण झाले आहे. सगळ्या जगापुढेच हा प्रश्न उभा राहिला आहे.

मग मात्र माणूस खडबडून जागा झाला. स्वतःला वाचवण्यासाठी झाडांना वाचवले पाहिजे, हे त्याच्या लक्षात आले. आता कुणी झाड तोडू लागला की चारजण धावून त्याचा हात धरतात, त्याला वृक्षतोड करू देत नाहीत.
प्रत्येक मंगलप्रसंगी वृक्षारोपणाची कल्पना आपण आता स्वीकारली पाहिजे. 

घरात बाळ झाले की  झाड लावा. बाळाबरोबर झाडाला वाढवा. पाहुणे आले; त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करा. इतकेच नाही तर घरातील प्रियजनांच्या वियोगप्रसंगी 'स्मृतिवना'त झाड लावून त्यांच्या स्मृती जतन केल्या पाहिजेत.जंगलतोडीच्या चुकीचे परिमार्जन झाडे लावूनच करायचे आहे. अगदी खेडोपाडी, समाजाच्या तळागाळापर्यंत हा विचार पोचवायचा आहे. त्यातच आपल्या देशाचा उत्कर्ष आहे.

महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • झाडांचे महत्त्व
  • नेहमी होत आलेली चूक
  • उजाड देश
  • पाऊस कमी
  • भूगर्भातील पाण्याची पातळी खाली
  • पर्यावरणाचा तोल हरवला
  • आपली चूक उमगली 
  • वृक्षतोड थांबवली  विविध कारणांनी झाडे लावायची. जोपासायची, वाढवायची
  • तरच देश सस्यश्यामल होईल.

निबंध  3 

पृथ्वीची अवस्था प्रदूषणामुळे दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पृथ्वीवरील वातावरणाचा तोल ढळत आहे. 'पृथ्वीला वाचवा, आपल्या पृथ्वीची काळजी वाहा' हा 'वसुंधरा दिना'चा संदेश आहे. परंतु प्रचंड प्रमाणात वाढलेली वृक्षतोड एक दिवस ही पृथ्वी रसातळाला नेईल.


केवळ जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा तोल ढळतो असे नाही; महानगरे आणि कारखानेही या दुरवस्थेला हातभार लावत असतात. गावोगावच्या नदयांमध्ये कचरा व सांडपाणी सोडले जात आहे. उसाच्या मळीमुळे शेते निकामी होत आहेत. पावसाअभावी वाळवंटे वाढू लागली आहेत. अशी अनेक संकटे आपल्यापुढे उभी आहेत.


या साऱ्या गोष्टींवर जे प्रतिबंधात्मक असे अनेक उपाय आहेत, त्यांपैकी एक म्हणजे वृक्षारोपण होय. अलीकडे वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतात. 'सामाजिक वनीकरणा' ची कल्पना आता रूढ होत आहे. झाड लावणे जितके आवश्यक आहे, त्याहूनही ती वाढवणे व जतन करणे महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येकाने एकतरी झाड दत्तक घेतले पाहिजे. 

झाडे लावली आणि त्यांची काळजी घेतली नाही तर काय उपयोग? निष्काळजीपणामुळे अनेक झाडे मरतात. त्यांना पाणी मिळत नाही. कधी भुकेलेली जनावरे लावलेली रोपटी खाऊन टाकतात. त्यामुळे लावलेल्या झाडांतील फारच थोडी झाडे जगतात; मोठी होतात.

यासाठी आता मोहीम सुरू केली पाहिजे  'एकतरी झाड जगवा.' लग्न, मुंजी, वाढदिवस अशा निमित्ताने आपण भेटीदाखल पुष्पगुच्छ देतो, त्याऐवजी एक-एक रोप भेट दयावे. नवीन बालक जन्माला आले की, त्या कुटुंबाने नवीन झाड लावावे व बाळाबरोबर त्यालाही बाळासारखे ममतेने वाढवावे. शाळेतील प्रत्येक मुलाने शाळेच्या आवारात एक तरी झाड लावावे व त्याचे नीट संगोपन करावे, प्रेमाने देखभाल करावी.


शहरातील राखीव भूखंडांवर टोलेजंग इमारती उभारण्याऐवजी गर्द झाडे लावावीत. सरकारी गृहनिर्माण संस्थांनी आपल्या वास्तूच्या परिसरात झाडे लावावीत. रस्त्याच्या दुतर्फा वृक्षांची लागवड करावी. निसर्गचक्र खंडित करण्याचा आपल्याला अधिकार नाही. ते आहे तसे अबाधित राखण्यातच मानवजातीचे हित आहे. पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्याची जबाबदारी आपल्यावर आहे. म्हणून 'एकतरी झाड जगवा !' हा आजच्या युगाचा संदेश आहे. म्हणजे ही वसुधा पुन्हा हरितश्यामल' बनेल.

महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • आजचा मानव निसर्गापासून दूर 
  • वृक्षतोड 
  • प्रदूषण 
  • दुष्काळ
  • पर्यावरणाचा समतोल ढळला 
  • निसर्गाकडे चला 
  • 'एक मूल, एक झाड ' ही नवी घोषणा 
  • इमारतीच्या जंगलांची वाढ थांबवावी 
  • वनोत्सव सुरू करावेत
  • वृक्षमित्र पुरस्कार
  • जंगल संपत्तीचे महत्त्व
  • वृक्ष ही जीवनधारा
  • वृक्षवल्ली आम्हा सोयरी


निबंध  4 

jhade lava jhade jagva


पर्यावरण संतलनासाठी एकूण क्षेत्रफळाच्या ३३ टके वनक्षेत्र असणे आवश्यक असते. परंतु आज भारतात २२ टक्के वनक्षेत्र आहे त्यातही दाट वनक्षेत्राचे प्रमाण ६ ते ७ टके आहे. काही राज्यात वने दाट प्रमाणात आढळतात. तर काही राज्यात वनाचे प्रमाण अतिशय विरळ असते. अशाप्रकारे आपल्याला वन वितरणाच्या बाबतीत विषमता आढळते.

वनांबाबतची ही भीषण परिस्थिती फक्त भारतातच नव्हे तर बहुतांशी देशात आढळते. आज अनेक  कारणामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होत आहे. त्यामध्ये घरांसाठी. उद्योगधंद्यासाठी, उद्यानांसाठी, क्रीडागणे, मैदाने, रस्ते, तलाव, धरणे यांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे वृक्षांची लाकडे बहुउपयोगी असल्यामुळे ती मिळवण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होते.

वनांचे प्रमाण कमी झाल्यामुळे मानवाला विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. वृक्ष CO2 घेतात आणि ऑक्सीजन बाहेर सोडतात. त्यामुळे माणसाला श्वसनासाठी ऑक्सीजन चा पुरवठा होतो, त्याचबरोबर वातावरणातील ऑक्सीजन, आणि CO2  चे प्रमाणही संतुलित राखले जाते.

शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. वृक्ष हे मातीची धूप होण्यापासून रोखत असतात. पण आता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे जमिनीची धूप होते आहे. त्यामुळे जमिनीची उत्पादनक्षमता कमी होते आहे. या गोष्टीचा खूप दूरगामी परिणाम मानवावर होऊ शकतो. भविष्यकाळात मानवाला अन्नधान्याची टंचाई भासू शकते.

दिवसेंदिवस पृथ्वीचे तापमान वाढत आहे आणि पर्जन्याच्या प्रमाणात देखील असमतोल निर्माण होत आहे. वृक्ष हे पर्जन्य पडण्यासाठी एक अत्यावश्यक गोष्ट आहे. मानव आपल्या दैनंदिन जीवनासाठी इतर सजीवांवर देखील अवलंबून असतो. या सर्व सजीवांची एक अन्नसाखळी असते. वृक्ष तोड झाल्यामुळे या अन्नसाखळीलाही मोठ्या प्रमाणात बाधा पोहचत आहे. 

कारण बरेच प्राणी, पशू, कीटक हे घनदाट वनात आढळतात. त्या वनांवरच त्यांचे आयुष्य अवलंबून असते. यात आपल्याला प्रामुख्याने वाघ, सिंह, लांडगे, कोल्हे यांचा उल्लेख करावा लागेल. वनांचे प्रमाण कमी झाल्यामुळे या प्राण्यांचे प्रमाण देखील कमी होत आहे. त्यामुळे त्या प्राण्यांची संख्या वाढावी म्हणून सरकारला विशेष मोहीम हाती घ्यावी लागत आहे. त्यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे.

वनांची मोठ्या प्रमाणावर तोड झाल्यामुळे तो विविध गोष्टींपासून वंचित राहू लागला आहे. कारण मानवाचे जीवन हे मोठ्या प्रमाणावर वनांवर अवलंबून आहे. वनांपासून त्याला इंधनासाठी, घरासाठी, इतर वस्तू बनवण्यासाठी लाकूड मिळते. त्याचबरोबर वनांचे विविध औषधी उपयोगही आहेत. विविध जर्जर व्याधींच्या उपायासाठी आजही मोठ्या प्रमाणात वनौषधींचा वापर होत असतो. 

त्याचप्रमाणे वनांपासून आपल्याला डिंक, लाख, फळे, फुले इ. उपयोगी वस्तूदेखील मिळतात. त्याचप्रमाणे काही आदिवासी जमाती झाडांच्या पाला पाचोळ्यापासून आपली घरे बनवतात. अशाप्रकारे वृक्ष हे कल्पतरू प्रमाणे असतात. ते आपल्याला विश्रांतीसाठी सावली देतात. वृक्ष हे आपल्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण होण्यासाठी मदत करतात.

वनांचे अशा प्रकारे विविध उपयोग माहिती असून देखील, त्यांचे प्रमाण कमी होत आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी विविध उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे. अमेरिकेसारख्या देशात एक झाड तोडायचे असल्यास त्याआधी दोन झाडे लावावी लागतात. आपल्या देशातही अशी परिस्थिती निर्माण करावयाची असल्यास त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे. 

लोकांचे वृक्षसंवर्धनाचे फायदे समजून सांगितले पाहिजे. यासाठी विविध संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. त्यांनी व्याख्याने आयोजित करून लोकांना वनांचे महत्त्व पटवून द्यायला हवे. वनसंपत्ती संवर्धनासाठी जोरदार प्रचार करायला हवा.

त्याचप्रमाणे शाळांतून देखील मुलांना वनसंवर्धनाचे महत्त्व पटवून सांगितले पाहिजेत, कारण तेच भावी काळातील नागरिक आहेत. ते ही गोष्ट आपल्या घरच्यांनादेखील सांगू शकतील. त्यांना विविध गोष्टींद्वारे नैतिक मूल्याद्वारे हे पटवुन दिले पाहिजे. इतकेच नव्हे तर शालेय अभ्यासक्रमात देखील वनसंवर्धन विषयक प्रकरणांचा समावेश केला पाहिजे. शाळेच्या मार्फत १५ ऑगस्ट, २६ जानेवारी ''वृक्षदिंडी'' काढली पाहिजे. 

आज धार्मिक दिंड्यांऐवजी 'वृक्षदिंडी'' ची खरी गरज आहे. त्याचप्रमाणे शाळेत वृक्षसंवर्धन या विषयावर निबंध स्पर्धा, वकृत्त्व स्पर्धा आयोजित केल्या पाहिजे. शाळेवर, गावपातळीवर सामहिकपणे वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवला पाहिजे. सर्वात शेवटचा उपाय म्हणजे या विषयांबद्दल कडक कायदे केले पाहिजे. विनाकारण परवानगी न घेता झाड तोडल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. 

याआधी जनजागृती खूप आवश्यक आहे. आणि त्यासाठी सरकारने जनजागतीसाठी विविध वर्तमानपत्रे, दूरदर्शन यांचा उपयोग केला पाहिजे. अशाप्रकारे वृक्ष हे मानवी जीवनाचा, निसर्गाचा आधारस्तंभ आहे. त्यांचे संवर्धन केले पाहिजे आणि हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

निबंध 


पृथ्वीने सुजनतेला प्रथम जन्म दिला मनुष्यरूपात ! परमेश्वराला वाटलं की या वसुंधरेला फुलवणारं चैतन्य इथे उमलावे, देवांचे व दैत्यांचे समान अंकुर रुजून, एका नंदनवनाची निर्मिती व्हावी, या क्षमेला, प्रेम, दया, शांती या जीवनमूल्यांचे बाळकडू पाजावे. पृथ्वीवर नंदनवन निर्माण करावे, हिरव्यागार मखमली सदाहरित वनांचा प्रसार सर्वत्र व्हावा आणि यासाठीच तर मनुष्याने जन्म घेतला आहे.

कावळा करतो कावकाव म्हणतो; माणसा झाडे लाव, एक तरी झाड लाव, असे म्हणतच आपण मोठे झालो या बालगीतातील बोध मात्र तेथेच विसरून गेलो. पर्यावरण हा शब्द आपणासाठी नवीन नाही, अगदी साध्या शब्दांत पर्यावरण म्हणजे आपल्या अवतीभवतीच्या वातावरणाची गोळाबेरीज,पर्यावरणाचा समतोल टिकविण्याचे काम निसर्ग करतो. 

जेव्हा निसर्गाच्या कार्यात माणसाचा नको तेवढा हस्तक्षेप वाढतो. म्हणजे हवा, पाणी, जमिनीचा नको तेवढा व नको तसा वापर होऊ लागतो तेव्हा पर्यावरणाचा समतोल बिघडतो. मानवाचे स्वास्थ्य हे पर्यावरणाच्या स्वास्थ्यावर अवलंबून असते पर्यावरणाचे स्वास्थ्य बिघडले की आपले स्वास्थ्य बिघडते. आपल्या स्वास्थ्याची पर्यायाने पर्यावरणाची काळजी आपण स्वतःच घ्यायला हवी नाही का ?


पूर्वादीकालापासून संतांनी स्वतःच्या साहित्यातून व वर्तनातून हा आपल्या पर्यावरणाचा समतोल तर सांभाळला आहेच व मार्गदर्शनही केले आहे.तुकोबांनी वृक्ष-वेलींना आपले सगे-सोयरे संबोधले आहे. पण झाडे आपल्याला आरोग्यदायी जीवन देतात कारण 'काळी माती हिरवी सोने' प्राणवायूचे हे कारखाने आपण काटकसर करून सोने विकत घेऊ, प्रतिष्ठा वाढेल सर्व काही मिळेल केव्हा ? 'शिर सलामत तो पगडी पचास' आपण आरोग्याची मूर्ती असू तेव्हा त्या सोन्याचे तेज वाढले ना!

आज धूर ओकणारी वाहने व त्यातील कार्बन त्याबरोबर इतरही अपायकारक घटकद्रव्ये ही आरोग्याला मारक ठरत आहेत. श्वसनांच्या रोगाचे प्रमाण वाढत आहे. शहराच्या दगदगीच्या जीवनात शांती मिळते कुठे माणूस ती शोधायला निसर्गरम्य परिसराकडे वळतो. पण अशी वृंदावने, बागा आहेत तरी किती ? यांचे प्रमाण इतके कमी का ? याचा थोडा जरी विचार माणसाने केला तर आढळून येते की शहरवासीयांनी टुमदार इमारती, मोठमोठे कारखाने, बांधकामे यांकरिता वृक्षांचा नाश केला. 

वृक्षतोडीमुळे डोंगर बोडके झाले, रखरख वाढली, पाऊस अनियमित झाला व पर्यायाने पर्यावरणाचा निसर्गाचा समतोल बिघडला स्वच्छ हवेऐवजी प्रदूषित हवा. याशिवाय पर्याय राहिला नाही. याची जाण आता होऊ लागली आहे. ही एक रोगराई विरुद्धची लढाई आहे. धुरीकरणामुळे सातत्याने छळणारा खोकला हा आपण मित्र बनू न देता वेळीच वृक्ष तोड रोखली पाहिजे. आत्तापर्यंत झालेल्या गोष्टीबद्दल चिंता करीत बसण्यापेक्षा नव्याने वृक्ष लागवड करणे यातच शहाणपणा आहे. 

वेळीच जागा होणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे असा हा एककलमी कार्यक्रम अमलात आणणे गरजेचे आहे.
'दुर्दर राहे पाषाणात तया चारा कोण देतो' म्हणणाऱ्या संत सेना महाराजांनी आपणाला प्रश्न केला आहे की जर खडकाखाली राहणाऱ्या बेडकाला आपण चारा देत नाही तर आपल्याला त्याला नष्ट करण्याचा अधिकार काय ? पर्यावरण दूषित करणारे कृमी, कीटक खाऊन बेडूक पर्यावरणाला मदत करतो तो मानवाचा मित्र ठरतो.

 वृक्षतोड झाल्याने प्राणीजीवन विस्कळीत होऊन त्यांना निवाऱ्याची उणीव भासते व काहीवेळेस त्यांचा शिरकाव शहरांमध्ये झाल्यास त्यासारखे भयास्पद ते काय? पाणी, हवा, प्राणी, वृक्ष या सर्वांचा हितकारी संगम म्हणजेच पर्यावरणाचा समतोल.

वृक्ष मानवाचा खरा मित्र आहे तो त्याला लागवड करून सांभाळ करणाऱ्याला आणि त्याचे तोडून तुकडे करणाऱ्यालाही आपली थंड सावली, शुद्ध हवा, फळे, फुले देतो तो कुणाबरोबरही दुजाभाव करीत नाही. 
आपण स्वतःहून वृक्षलागवड करत नसू तर शासनाकडून किंवा सामुदायिकरीत्या रस्त्याच्या कडेला लावलेल्या झाडांचे संगोपन तरी आपण नक्कीच करू शकतो. वृक्षांचा गैरवापर केल्यास प्रदूषणासारख्या महाभयंकर संकटास तोंड देण्याची वेळ आपल्यावर येईल, हे आपण जाणून आहोतच. 

वृक्ष म्हणजे पृथ्वीने आशीर्वादासाठी उचललेले हात आहेत. ते आशीर्वाद नसतील तर मानवजीवन टिकणार नाही बालपणीच्या पाळण्यासाठी मृत्यूनंतरच्या सरणापर्यंत वृक्ष आपल्याला सोबत करतात.या भूतलावर आधी वनस्पती व नंतर प्राणिसृष्टी जन्माला आली आहे, वनस्पती नष्ट झाल्या तर त्या मागोमाग मानवी जीवनही नष्ट होईल.

शहरांतील सिमेंट-काँक्रीटच्या उंच जंगलापेक्षा आपणांस जीवन ताळ्यावर आणण्यासाठी उंच उंच वृक्षराजींच्या वेसणीची गरज आहे मानवाला आज तनशांतीपेक्षा मनःशांतीसाठी जास्त भटकावे लागत आहे. बाजारात पैसे टाकला की खाण्यापिण्यातून, हिंडण्याफिरण्यातून मनःशांती प्राप्त होत आहे. पण मनाच्या शांतीचा लळा बाजारात पुरविला जाऊ शकत नाही. त्यामुळे अस्वस्थ झालेले मन बगीचा, उद्यान, अभयारण्य, वन, समुद्र, नदीकाठ, सरोवराच्या शोधात बाहेर पडते. 

निसर्गरम्य वातावरणासाठी खरी गरज आहे. वृक्षांची यासाठी का होईना आपण सामाजिक वनीकरण इ. माध्यमांतून केलेल्या वृक्षांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. आपल्या स्वार्थी व नियोजनशून्य वृत्तीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे.आजपर्यंत असे केले असले तरी आज सर्वांना अशी शपथ घेण्याची गरज आहे. 'झाडे लावू आणि झाडे जगवू.' या क्षेत्रात घोषणांना महत्त्व नाही प्रत्यक्ष कृतीला महत्त्व आहे.


निबंध 6

झाडे लावा व पर्यावरण वाचवा



'हिरव्या पानांना पर्याय नाही, संतुलन झाडांशिवाय नाही' अशा ओळी असलेला एक बिल्ला काही दिवसांपूर्वी सामाजिक वनीकरणातर्फे वाटला गेला. तसेच जळगाव जिल्ह्यात इच्छापूर, कुंडशिवार, खामखेडा पूल व टहाकळी या मुक्ताईनगर परिसरात काही सिंचन योजनांचे भूमिपूजन तापी पाटबंधारे विकास महामंडळाद्वारे संपन्न झाले. या आणि अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यातून जनमानसात पर्यावरणासंदर्भात जागृती होत आहे. 

प्रचंड जंगलतोड, चराऊ कुरणाचा हास व जमिनीची धूप या कारणांमुळे महाराष्ट्रावर वारंवार अवर्षणाचे संकट ओढवून टंचाईसदृश स्थिती निर्माण झाली आहे. म्हणून वनीकरण, मृद व जलसंधारण, चराऊ कुरणांचा विकास अशा उपाययोजना राबवल्या जात आहेत. 


ज्या प्रदेशात वृक्षांचे जमिनीवर वनस्पतिक आवरण असते, तेथील वातावरण पावसाला अनुकूल असते. कारण तेथल्या जमिनीतून व वनस्पतींच्या पानांतून जे बाष्पीभवन होते, त्यामुळे हवेत आर्द्रता निर्माण होते. ही आर्द्रता ढगातून पाऊस पाडण्यास कारणीभूत होते. म्हणून वनीकरण, फलोद्यान, गवते व चारा यांची लागवड करणे गरजेचे वाटते. 



वृक्षतोडीमुळे भूपृष्ठ, माळराने उजाड झालीत. पावसाचे पडणारे पाणी या हिरव्या झाडाझुडुपांमुळे अडून राहते. मूळांकडे जाते. म्हणजे भूगर्भात पाणी मुरवण्याचे काम निसर्ग करीत असतो. म्हणून वृक्षारोपण केले, तर पाण्यासाठी दाही दिशा अशी कठीण अवस्था होणार नाही.


मानवजातीकडून होणाऱ्या निसर्गावरील वाढत्या हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा समतोल ढळत चालला आहे.  मूलभूत गरजा भागवताना होणारी वनसंपत्तीची बेछूट लूट थांबणे व त्याचवेळी पुनर्निर्मिती अर्थात झाडे लावणे आवश्यक आहे. 'नैसर्गिक संपदेचा नाश हा अविचार' आणि 'वृक्षारोपण हा आजचा सुविचार' आहे. वृक्षारोपण केले, तरच भूगर्भातील पाणीपातळी सांभाळली जाईल.


श्री छत्रपती शिवाजीमहाराजांनी ३०० वर्षांपूर्वीच त्यांच्या आज्ञापत्रांत वनउत्पादनातल्या वापरासंबंधी काही तत्त्वे ठरवून दिली आहेत. ते म्हणतात, 'रयतेने ही झाडे लावून लेकरांसारखी बहुतकाळ जतन करून वाढविली. ती झाडे तोडिविलयावरी त्यांचे दु:खास पारावार काय?' सम्राट अशोकाने २३०० वर्षांपूर्वी 'राजाज्ञेत प्राणिसंरक्षण आणि वृक्षसंवर्धन याविषयी नमूद केले होते. 


आज तंत्रज्ञानाचा पर्यावरणावर मोठा विपरीत परिणाम होत आहे. प्रदूषण वाढत आहे. ही दखलपात्र घटना वरील पार्श्वभूमीवर विचारात घेण्यासारखी आहे. म्हणून या पर्यावरणाच्या जाणिवेची नितांत गरज आहे.
रस्त्याने चालताना डोक्यावर सावली धरणारी झाडे दिसत नाहीत. वृक्षामुळे आपणास अन्न, प्राणवायू, आर्द्रता मिळून मृद्संहार थांबतो. त्याशिवाय का तुकाराम महाराजांनी वृक्षवल्लींना आपले सोयरे मानले? म्हणजे झाडे जसे भूमिपुत्र, तसे आम्हीही याच मातीची लेकरे... म्हणून 'झाडे लावा आणि पर्यावरण अर्थात विश्व वाचवा' अशा घोषणा अस्तित्वात आल्या.


वृक्षदिंड्याही कौतुकाने निघतात. चांदोबा लपायलाही पूर्वीपासून निंबोणीचे 'झाड' च लागत आले आहे. परसदारी पवित्र ‘तुळसी' चे रोप लागते. मंगलप्रसंगी केळीचे खोड स्नेह्यागत उभे राहते, तर आंब्याची पाने शुभ पताका होऊन दारी मुंडावळ्यागत शोभिवंत होतात. अशी संगसोबत आयुष्यभर झाडे देतात. खऱ्या अर्थाने सोयरे छायादायी ठरतात. बालकवींच्या शब्दांत हरिततृणांच्या मखमालीचे हिरवेहिरवेगार गालिचे आपल्या रंग-सौंदर्याने डोळियांचे पारणेच फेडतात. 


झाडे-पाने, फुले, फळे, औषधी, इंधने, सुगंध, पाऊस, छाया, आधार, चारा, प्रदूषणशोषण, निवारा एवढेच नव्हे, तर पैसासुद्धा देतात. म्हणूनच 'चिपको आंदोलन, वृक्षमित्र मंडळे, जलसंवर्धन, सामाजिक वनीकरण, वनशेती, पर्यावरण बचाव... या साऱ्या गोष्टींना खूप महत्त्व येत आहे.  प्रत्येकाने वृक्षवल्ली वाचवण्याचा, वाढवण्याचा स्वयंनिर्धार करायला हवा.


पर्यावरणाचे आपण केवळ वारसदार नसून त्याचे रक्षण करून, त्याला समृद्ध करणारे विश्वस्तही राहू. काळाची गरज म्हणून पर्यावरणाचा समतोल कायम राखू आणि त्यासाठी झाडे लावू !" यानिमित्त 'वनराई' चळवळीचे जनक मोहन धारियांना सलाम ! 'सामाजिक वनीकरण-ग्रामीण फळबागा-परसबागा' ही ग्रामीण विकासाची त्रिसूत्री राबविणाऱ्या अवघ्यांना सलाम ! 'एक व्यक्ती-एक झाड' योजना जे प्रत्यक्ष आचरणात आणतील, त्या प्रत्येकाला सलाम ! ‘पाणी अडवा - पाणी जिरवा' मोहीम राबविणाऱ्या राळेगणसिद्धीच्या सिद्धपुरुषाला अर्थात अण्णा हजारेंनाही सलाम !


चला, पर्यावरण वाचवण्यास, झाडे लावण्यास कटिबद्ध होऊया 
 रक्षावया पर्यावरण, उपाय एकच... वृक्षारोपण

निबंध 7


 झाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध 

निसर्ग ही मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. डोंगर, दऱ्या, नद्या, पहाड, विविध प्रकारची झाडे, वेली, पशू, पक्षी, कीटक, सूक्ष्म जीव इत्यादी सर्व मानवाला मिळालेली नैसर्गिक संपत्ती आहे. ही पृथ्वी सुंदर दिसते ती झाडे वेलींमुळे. झाडे नसती तर ही पृथ्वी उजाड, भकास दिसली असती. केवळ नद्या, नाले, पहाडांनी ही वसुंधरा सुंदर दिसली नसती. म्हणून पृथ्वीच्या सौंदर्यात वृक्ष वेलींचा महत्त्वाचा वाटा आहे. पृथ्वीचा साज श्रृंगार म्हणजे झाडे वेली.



तुकाराम महाराज केवळ वृक्ष वेलींनाच सोयरे मानतात असे नव्हे तर (वनचरे) वनातील प्राण्यांना सुद्धा ते आपले सोयरे मानतात. पक्षांचा मंजूळ स्वर त्यांना अतिशय आवडतो. मानवांच्या गोंगाटापासून जर दूर जायचे असेल तर भरपूर वृक्ष वेली असलेल्या वनात जावे लागेल. तेथे एकांत मिळतो. तुकाराम महाराज कधी-कधी एकांतात बसून मनन चिंतन करीत असत. 



एकांतात लोभ, मोह,माया, लालसा, द्वेष, मत्सर, या दुर्गुणांपासून मनूष्य दूर होतो. त्यामुळे एकांत सुखकर वाटतो. निसर्गाच्या सान्निध्यात मन प्रसन्न होते. पृथ्वीचं हे सुंदर रुप, विविध पशु पक्षी, त्यांचे विविध आवाज, खळखळ आवाज करुन वाहणारे ओढ्याचे पाणी, विविध रंगाची व विविध आकाराची फुले. त्यांचा वेगवेगळा सुगंध, वेगवेगळ्या रंगाची व आकाराची फळे, प्रत्येकाची वेगळी चव, वळणाच्या वाटा,चढ उताराचा रस्ता, ह्या सर्व गोष्टींचा आस्वाद घ्यायचा असेल तर  निसर्गाच्या सान्निध्यात जावे लागेल. परंतु अशी ठिकाणे दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत आहेत. 


मनुष्य वृक्षांची कत्तल करतो आहे. जंगलेच्या जंगले नष्ट होत आहेत. जंगले नष्ट करणे म्हणजे मानवी जीवन धोक्यात घालणे होय. हे महत्त्व पटवून देण्यासाठी तुकाराम महाराज वृक्षांना व वनचरांना आपल्या सोयऱ्यांची उपमा देतात. त्यामुळे त्यांच्या ह्या अभंगाला शास्त्रीयदृष्ट्या महत्त्व आहे. त्यांचा हा अभंग मानवाला एक चेतावणी आहे की जंगले व त्यातील प्राणी नष्ट करु नका. नातलगा प्रमाणे त्यांना महत्त्व द्या. अन्यथा आपली हानी करुन बसाल. 


त्यांच्या चेतावनीची प्रचीती आज आपणास येत आहे. २००५ मध्ये कोंकणातील दासगाव, जुई इत्यादी गावे भूस्खलनामुळे गाडली गेली होती. तसेच २०१४ मध्ये पुणे जिल्ह्यातील माळीन हे गाव सुध्दा पूर्णपणे गाडले गेले. हा सर्व जंगल तोडीचा दुष्परिणाम आहे. मानवाने निसर्गावर केलेल्या अतिक्रमणाचा हा दुष्परिणाम आहे.
जर कराल नष्ट जंगले तर, धराशायी होतील बंगले वाचवा वृक्ष वल्ली, वनचरे ,तरच राहील भविष्य बरे

निबंध 8


वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ! संत तुकारामांनी ३०० वर्षांपूर्वी सांगून ठेवले आहे की, 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे!' वृक्ष, जंगले यांची उपयुक्तता लक्षात घेऊन त्यांना आपले सगेसोयरे म्हटले आहे. माणसाचे निसर्गाशी नाते अतूट असते. मानवी


जीवन वनस्पतींवर अवलंबून असते. वनस्पती नसतील तर मानवी जीवन अस्तित्वातच राहणार नाही. म्हणून वृक्षवल्ली हे आपले निसर्गधन आहे. फार पूर्वी मानव निसर्गाच्या सान्निध्यातच वनांमध्ये राहत होता. अन्न, निवारा, वस्त्र (वल्कल) त्याला वृक्षांपासूनच मिळत होते. आजारी पडल्यास औषधे वृक्षवेलींपासूनच मिळत होती. त्यामुळे औदुंबर, तुळस अशा वनस्पतींत दैवी अंश आहे असे मानत असत, आजही आपण या वृक्षांना पवित्र मानतो.


'हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणाच्या मखमलीचे' अशी बालकवींनी वर्णिलेली मखमली हिरवळ आपणा सर्वांनाच आवडते. हिरव्यागार वनश्रीने नटलेले निसर्गाचे रूप आपल्या सान्निध्यात माणसाला आनंदाने बेहोष करून टाकते. त्याच्या मनातील उदासीनता नाहीशी करून त्याचे मन प्रसन्न करून टाकते. त्यामुळे हल्ली अनेक लोक पर्यटनाद्वारे निसर्गाच्या कुशीत जात असतात. वृक्ष केवळ मनालाच शांती देतात असे नाही, तर मानवाच्या कल्याणासाठी अनेक गोष्टी करतात.

जंगले असल्यास पाऊस भरपूर पडतो, जमीनीची धूप होत नाही, आपल्याला फळे, फुले, छाया यांची लयलूट होते. इमारती बांधण्यासाठी लाकूड, फर्निचरसाठी लाकूड, कागद निर्मितीसाठी लाकूड वृक्षांपासूनच मिळते. वृक्ष हवाशुद्धीचेही काम करतात. कारखान्यातून निघालेला दूषित वायू, कर्बवायू शोषून प्राणवायू बाहेर सोडतात. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीनेही जंगलांचे महत्त्व खूपच आहे. 



आजकाल वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्यामुळे जास्ती पाऊस, कमी पाऊस अशा दुर्घटना घडू लागल्या आहेत. मातीची धूप, दरडी कोसळणे अशा गोष्टी हल्ली जास्त प्रमाणात आढळून येतात. झाडे वातावरणातील उष्णता शोषून घेतात म्हणून झाडांभोवती गारवा असतो. हिरवी सृष्टी मनाला आल्हाददायक वाटते. 



आजकालच्या विज्ञानयुगात माणूस निसर्गापासून दूर चालला आहे. उंचउंच इमारतींच्या जंगलात खरी जंगले नामशेष व्हायला लागली आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढळत आहे. हा तोल साधण्यासाठी पुन: झाडे लावण्याची मोहीम चालू झाली आहे. 'झाडे लावा, देश वाचवा' अशी घोषणा करून सरकारने सामाजिक वनीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. 


बहुगुणांचे 'चिपको आंदोलन' यासाठीच आहे. सरकारप्रमाणेच सामान्य माणसाचाही हातभार लागणे आवश्यक आहे. तेव्हा एकमेकांना भेटीदाखल रोप द्यावे, कुटुंबात मूल जन्माला आले की एक झाड लावावे, त्याची देखभाल करावी. सहकारी सोसायट्यांनी आपल्या परिसरात झाडे लावावीत. म्युनिसिपालिटीने रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावावीत. तसेच जंगलतोड होऊ नये म्हणून कागद कारखाने स्वत:च बांबूची जंगले वाढवितात. काही देवराया असतात, असे मानले जाते. म्हणजे काही जंगले देवांची मानतात. त्या ठिकाणी कोणी झाडे तोडत नाहीत. त्यामुळे त्या वृक्षांचे जतन होते.


या साऱ्या गोष्टींना यश येऊन पुन: जिकडेतिकडे हिरवेगार वृक्ष दिसू लागतील, सुजलाम् सुफलाम् अशी भारतभूमी नंदनवन बनेल, अशी आशा करूया. यंत्रयुगाची यांत्रिकता, कागदपत्रांची उलाढाल हे काही काळ दूर सारून माणूस वनराईच्या संगतीत राहिला तर निसर्गाचा  रंग त्याच्या मनावर चढेल आणि निसर्गाशी असलेले नाते घट्ट विणीने विणले जाईल. मानव निसर्गाशी एकरूप होईल, निसर्गात मिसळून जाईल.

Zade Lava Zade Jagva | झाडे लावा झाडे जगवा