चिंतनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चिंतनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

 सोशल मिडिया मराठी निबंध | social media essay in marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण सोशल मिडिया मराठी निबंध बघणार आहोत.  आजचे युग डिजीटल युग म्‍हणुन ओळखले जाते यात सोशल मिडीयाचे महत्‍व दिवसेदिवस वाढत आहे कोणतीही बातमी क्षणात आपल्‍या मोबाईलवर दिसून येते , आपल्‍याला आपले मत सहज मांडता येते पण  कोणत्‍याही गोष्‍टीचा अतीवापर केल्‍यास त्‍याचे नुकसान दिसुन येत असतात, आज ज्‍या प्रमाणात सोशल मिडीयाचा अतिवापर होत आहे त्‍याचे दुष्‍परिणाम आज आपण या निबंधात बघणार आहोत चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


social-media-essay-in-marathi
social-media-essay-in-marathi



आज घराघरात मोबाईल आहे आणि इंटरनेट सुद्धा बहुतेक जण वापरतात. बरीच मुलं मुली, विद्यार्थी तासनतास मोबाइल हाताळण्यात घालवितात. फेसबुक, ट्विटर यावर पोस्ट शेअर करणे, पोस्ट लाईक करणे, चाट करणे, पोस्ट अपलोड करणे इत्यादी कार्यात अगदी भान हरपून असतात. ह्याची त्यांना एवढी आवड निर्माण होते की त्या शिवाय त्यांना करमत नाही. ही लागलेली सवय वाईट व्यसना इतकीच घातक ठरु शकते. 


वेळ खर्च होतो. इंटरनेट  करिता जास्तीचा पैसा लागतो. आणि अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. परिणामी परीक्षेत कमी गुण मिळणे किंवा अपयश येणे ह्या बाबी घडतात.  इंटरनेट वापरणारे कधी कधी जाली कंपन्यांच्या जाळ्यात अचूक अडकतात. बऱ्याच कंपनी ई मेल पत्यावर जाहिराती पाठवितात. कळत नकळत त्या फसव्या जाहिरातींना आपण बळी पडतो. व आपले आर्थिक नुकसान करुन बसतो. 


काही कंपन्या किंवा सायबर गुन्हेगार आपली सर्व माहिती काढून त्याचा दुरुपयोग करतात. बँक अधिकारी बोलतो अशी थाप मारुन आपला ए.टी.एम. नंबर विचारुन खात्यातील रक्कम लंपास झाल्याची अनेक उदाहरणे घडली आहेत. 


इंटरनेट  चा वापर मग तो कोणत्याही कामाकरिता करायचा असेल तर बसल्या जागी करावा लागतो. तासनतास बसल्यामुळे शारीरिक हालचाल होत नाहीत. परिणामी पचन संस्था कमी कार्यक्षम होते. त्यामुळे कमजोरी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शरीराची हालचाल न झाल्यामुळे लठ्ठपणा येतो. स्क्रीन च्या प्रकाशामुळे डोळ्यावर ताण येतो व डोळे कमजोर होवू लागतात. आज आपण पाहतो लहान मुलामुलींना चष्मे लागलेले आहेत. पुढे पुढे पाठ दुखी, मान दुखीचा त्रास व्हायला लागतो. अपचन, आम्लपित्त, मलावरोध यासारखे आजार बळावतात.


सोशल मिडीया वापरून लोकांना छळले जाते विशेषतः मुलींच्या बाबतीत हा प्रकार जास्त घडतो. पहिल्यांदा मुलींना विश्वासात घ्यायचं. त्यांचे फोटो मोबाइल मध्ये घ्यायचे. किंवा त्यांच्या  नकळत फोटो काढायचे व पुढे ते फोटो फेसबुक वर टाकण्याची धमकी द्यायची. व त्यांच्याकडून अधिक वाईट कामे करुन घ्यायची. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. आपली अब्रू वाचविण्याचा जेवढा प्रयत्न ती मुलगी करते तेवढी ती आणखी आणखी फसत जाते. शेवटी आत्महत्या केवळ हाच एक पर्याय तिच्यासमोर उरतो. अशी कित्येक प्रकरणे झाली आहेत. त्यातील केवळ काहीच उघड झाली आहेत कित्येक दाबून ठेवली गेलीत केवळ अब्रू झाकण्यासाठी.



बरेचदा काही देवीदेवतांच्या विटंबना होतील असा मजकूर अथवा फोटो अपलोड केले जातात. त्यामुळे धार्मिक भक्त संतप्त होतात आणि अशा वेळेस दोन गटात हाणामारी, जाळपोळ इत्यादी प्रकार होतात. त्यांचे परिणाम निरपराध्यांना सुद्धा भोगावे लागतात. सामाजिक संबंध दुरावतात. कायदा व सुव्यवस्था राहत नाही.


इंटरनेट मुळे जगातील कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीशी संपर्क साधता येतो. ह्यामुळे अनोळखी व्यक्तीच्या प्रेमात पडणाऱ्याची संख्या सुद्धा वाढली आहे. यामध्ये जेव्हा ती व्यक्ती आधीच विवाहित असेल किंवा वाईट स्वभावाची असेल किंवा दुर्व्यसनी असेल तेव्हा धोका बसतो. घरातील मंडळीना विरोध करुन अशी लग्ने झालीत व अप्लावधीतीतच मुलीच्या जीवाला धोका झाला अशी बरीच उदाहरणे आहेत. 


सोशल मिडिया एवढा लोकप्रिय झाला की मुलांना त्याचे तोटे दिसत नाहीत. त्याचा वापर करु दिला नाही तर मुले व आईवडील यांच्यातील संबंध बिघडायला लागतात. ते आई वडिलांचे ऐकेनासे होतात. सतत नेटच्या संपर्कात राहिल्यामुळे एकटेपणा वाढतो. काही ताण तणाव निर्माण झाल्यास इतरांशी शेअर न करता ताण दाबण्याचा प्रयत्न केला जातो. जो घातक ठरु शकतो. कधी कधी अधिक ताण सहन न झाल्याने अशी व्यक्ती आत्महत्येस प्रवृत्त होते. ह्या सर्व दुष्परिणामावरुन निष्कर्ष निघतो की सोशल मिडिया मुळे सांस्कृतिक पर्यावरण दुषित झाले आहे व होत आहे.


या सर्व समस्‍यांचा कमी करण्‍यासाठी पुढील उपाय वापरतात येतील.   म्हणजे सोशल मिडीया मर्यादीत वापरणे , त्‍यावर असणारी माहीती खरी आहे की नाही हे अगोदर तपासुन घेणे . आणखी काही समस्‍या असल्‍यास वडीलधाऱ्या व्यक्‍तीसमोर ती मांडणे . 


जगभरात करोडो लोग सोशल मिडीया वापरतात . यातील नकारात्‍मक गोष्‍टी न वापरल्‍यास व सोशल मिडीया हे चांगल्‍याप्रकारे वापरल्‍यास आपल्‍याला त्यापासुन फक्‍त फायदाच मिळेल. 


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  व तुमचे सोशल मिडीया बद्दल काय मत आहे हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद

सोशल मिडिया मराठी निबंध | social media essay in marathi

 petrol sample tar marathi nibandh | पेट्रोल संपले तर मराठी निबंध 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पेट्रोल संपले तर मराठी निबंध बघणार आहोत.पेट्रोल व डिझल सारख्‍या खनिज तेलावर  मयार्देपेक्षा अवलंबुन राहील्‍यावर त्‍याचे काय परीणाम होत आहेत व ते संपल्‍यावर काय परीणाम होतील याबद्दल या निबंधात सविस्‍तर माहीती दिली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


petrol-sample-tar-marathi-nibandh
petrol-sample-tar-marathi-nibandh




भौतिक सुखाचा दिवा पेट्रोलवर  तेवतो' हे आजच्या युगातील सुभाषितच म्हणावे लागेल. आज आलेली जीवनाची गती हे पेट्रोलने दिलेलं वरदान आहे. आज ऑस्ट्रेलियात सकाळचा चहा घेऊन भारतात जेवण करून दुपारचा चहा इंग्लंडमध्ये घेऊन रात्री जेवून झोपायला अमेरिकेत जाणे हे यामुळेच शक्य आहे. आजचे युग हे प्लॅस्टिकचे युग मानले जाते त या पेट्रोलमुळेच ! 


निसर्गान आपल्या जादुइ पोतडीतून मानवाला पेट्रोल दिल आणि माणूस हरकुन गेला. त्याची चालच बदलली. तो धावू लागला सुसाट वेगाने ! शाब्दिक आणि लाक्षणिक अर्थानेही !  पण माणूस मुळातच हावरट. 'अजून' अजून' चा जप तो सोडत नाही. हव्यास ही जशी प्रगतीची निशाणी तशी अधोगतीचीही ! कुठे थांबावे ? हेच माणसाला कळत नाही.


 खनिज तेल निसर्गाने पृथ्वीच्या पोटात साठवले, ते मानवाने उकरून काढले... वापरले, वापरत आहे...पण किती अमर्याद ? त्यात माणूस हा प्राणी नंबर एकचा अप्पलपोटा, स्वार्थी, लबाड आणि भांडकुदळ. ' तुझे ते माझे आणि माझे तेही माझेच' ही त्याची वृत्ती ! त्यातूनच उद्भवले हे आखाती युद्ध.साऱ्या जगाला, विशेषत: भारतासारख्या विकसनशील देशांना वेठीला धरणारे. सद्दाम हुसेनने तर उद्दाम होऊन मुद्दाम तेल विहिरी पेटवून दिल्या, समुद्रात तेल सोडून दिले. त्यावर अमेरिका अणुयुद्धाची' बेजबाबदार भाषा बोलते आहे. त्यामुळे साऱ्या तेलविहिरी नष्ट वा निरुपयोगी होतील. मग पुढे ?... तर काय, भौतिक सुखांचा दिवा फडफडू लागेल अन् काही काळाने 'राम' म्हणेल आणि मग माणसाचे डोळे खाडकन् उघडतील.


 आपणच मांडून ठेवलेल्या पसाऱ्याचा अडथळा होऊ लागेल. दळणवळण कोलमडेल. स्कूटर्स, मोटारी आपापल्या जागीच थांबून राहतील. जणू पुतळेच. प्रवास खडतर होईल. संथ होईल. घोडागाडी, बैलगाडी, सायकली आणि स्वतःचे पाय वापरावे लागतील. वेगात चाललेल्या वाहनाला ब्रेक लागून गतिरोध व्हावा तसे जीवन होईल. व्यापार धोक्यात येईल. जिथे जे पिकत नाही तिथे ते पोहचविणे अडचणिचे होईल. महागाई आभाळाला टेकेल तर नश्वर पदार्थांचे अवमूल्यन होईल. द्राक्ष, आंबे यांना विदेश दिसणार नाही. परकीय चलन बुडेल. देशाच्या तिजोरीवर ताण पडेल. एखाद्या वटवृक्षाने स्वतःच 'बोनसाय' बनावे तसे मानवी जीवन खुरटलेलं होईल.


पण यातून काही फायदेही होतील. माणूस निसर्गाच्या जवळ जाईल. प्रदूषणाच्या छायेतुन  बाहेर पडेल, कारण कारखाने पक्षाघात झाल्यासारखे होतील. हातपाय वापरल्याने कात टाकलेल्या सापाप्रमाणे त्याच्यातील चैतन्य पुन्हा सळसळू लागेल...अज्ञात साठे-तेलाचे तो हुडकून काढेल, आणि नाहीच मिळाले तर पर्यायी इंधन तो शोधल-माणूस तसा हिकमती आहे ! 


सौरऊर्जा, समुद्राच्या लाटांपासून तसेच, अणुऊर्जा असे काही ना काही तो शोधेलच. 'गरज ही शोधाची जननी आहे.' माणसाजवळ तेवढी क्षमता नक्कीच आहे. चंद्रावर पाऊल उमटवणाऱ्या मानवी मेंदूला अशक्य काहीच नाही. खनिज तेल संपल्याने जीवनमान दोन पावलं मागे येईल ते पुढची मोठी उडी घेण्यासाठीच !

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

petrol sample tar marathi nibandh | पेट्रोल संपले तर मराठी निबंध