वर्णनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वर्णनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

Essay On Pahat In Marathi -रम्‍य पहाट मराठी निबंध 442 Words


नमस्‍कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत रम्य पहाट मराठी निबंध, या निबंधामध्‍ये निसर्गाच्‍या लहरी स्‍वभावाचे वर्णन केले आहे. निसर्गाने रौद्र रूप दाखवल्‍यानंतर हतबल मानव व त्‍यानंतर येणाऱ्या  नयन रम्‍य पहाटचे वर्णन केले आहे .  चला तर मग सुरूवात सुरूवात करूया रम्‍य पहाट मराठी निबंधाची . 

निबंध लिहीत असताना लक्षात ठेवायचे महत्त्वाचे मुद्दे:-

स्थळ- शहर वा खेडेगाव (निवडलेल्या स्थळानुसार पुढील वर्णन)

  • पहाटेची जागा 
  • भोवतालचे वर्णन 
  • अंधारातून अंधुक प्रकाश 
  • गावाबाहेर/शहराबाहेर वाटेत दिसणारी दृश्ये 
  • व्यक्ती 
  • सूर्योदयापूर्वीचे आकाश 
  • तारकांचे अस्ताला जाणेवातावरणातील शांतता 
  • पक्ष्यांची किलबिल 
  • आकाशातील रंगांची मैफील 
  • काव्याची आठवण 
  • अरुणोदयानंतरची पहाट 
  • बदललेले वातावरण 
  • प्रसन्नता, ताजेपणा



मी यंदाच्या सुट्टीत माझा वर्गमित्र अमित याच्या गावी जायचे ठरवले. अमितच्या गावी येऊन पोचलो, तेव्हा बरीच रात्र झाली होती. दिवसभर कष्टाची कामे करून गाव शांत झोपले होते. अमितच्या घरात माझे मोठ्या प्रेमाने स्वागत झाले. रुचकर भोजन घेतल्यावर निद्रादेवीने माझ्या अंगावर आपले पांघरूण केव्हा घातले, ते मला कळलेच नाही.

 मला जाग आली, तेव्हा सभोवार अंधार होता. पहाट झालेली नव्हती. अमितच्या घरातील मंडळी मात्र जागी झालेली होती. त्या सर्वांची नित्याची कामे शांतपणे चालू होती. पहाटेची भ्रमंती करण्यासाठी मी आणि अमित घराबाहेर पडलो. सूर्योदय झालेला नव्हता. दिशा नुकत्याच उजळत होत्या. सारा गाव हळूहळू जागा होत होता. घरोघरी अंगणात सडा-सारवण, झाडलोट ही कामे चालू होती. वातावरण शांत व प्रसन्न होते. काही न बोलता मी आणि अमित चालत होतो. शहरात कधी अनुभवायला न मिळणारी नीरव शांतता व प्रसन्नता माझ्या मनाला सुखावत होती.

आम्ही टेकडीवर पोचलो. अंधुक अंधुक दिसू लागले. आकाशातील तारे हळूहळू विझू लागले. एखादाच तारा आपले तेजस्वी अस्तित्व दाखवत होता; पण मावळतीचे वेध त्यालाही लागले होते. या काम
नि पूर्वेकडचे आकाश आता केशरी, गुलाबी, पिवळ्या अशा विविध रंगांच्या छटांनी उजळून निघाले होते. एखादया विदूषकाने क्षणाक्षणाला रंगीबेरंगी कपडे बदलावेत तसाच हा प्रकार होता. त्या क्षणी बालकवींची ओळ मनात जागी झाली

'कुणी उधळिली मूठ नभी ही लाल गुलालाची!'  पाहता पाहता क्षितिजाची कडा सोनेरी होऊ लागली. पक्ष्यांच्या किलबिलाटाने झाडांना जाग आली. अरुणोदय होत होता. पूर्वेकडील क्षितिज तेजोमय झाले. मनात आले, ही रम्य, प्रसन्न पहाट जो अनुभवतो, त्याचे अंतःकरणही तसेच विशाल होते. म्हणून तर खेडेगावांतून अजूनही मानवतेचे दर्शन घडते!

त्या प्रसन्न वातावरणात काही काळ रेंगाळून आम्ही परत फिरलो. परतीच्या वाटेवर घरांच्या छोट्या अंगणात तुळशीवृंदावनांपुढे रांगोळ्यांची शोभा दिसली. रानाकडे निघालेल्या गुरांच्या गळ्यांतील घंटा किणकिणत होत्या. दूरवरून देवळांतील सनईचे मंजूळ सूर कानांवर पडत होते. सारे गाव आता कामाला लागले होते. पण शहरातील धांदल त्यात दिसत नव्हती. सगळीकडे 'प्रसन्नता' भरून राहिली होती. शाहीर होनाजीची 'अमर भूपाळी' जणू साकार झाली होती.

पहाटेच्या या आगळ्यावेगळ्या भ्रमंतीने आपण समृद्ध झालो आहोत, असे मला वाटले.


काही विशेष : शालान्त परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत निबंधांबरोबर मुद्दे दिलेले नसतात. परंतु प्रश्नपत्रिकेतून निवडलेला निबंध कोणकोणत्या मुद्दयांना धरून लिहावा, याचा सराव विदयार्थ्यांना असला तर ते सहजतेने निबंध लिहू शकतील. परीक्षेत निबंध लिहिण्यापूर्वी अशी सवय विदयार्थ्यांमध्ये बाणावी, या उद्देशाने या ब्‍लागवर  सर्व निबंधांसाठी योग्य असे मुद्दे देण्यात आले आहेत.



Essay On Pahat In Marathi -रम्‍य पहाट मराठी  निबंध   




श्रावणातल्या पावसानंतरची पहाट 'श्रावणात घननिळा' याचाच अनुभव ती रात्र देत होती. काळ्या मेघांनी सारे नभ आक्रमिले होते. नेहमी दिमाखाने चमचमणाऱ्या लक्षावधी चांदण्याही आज आकाशात कोठे दिसत नव्हत्या. चादण्याच काय पण त्यांचा तो तारकानाथही गगनाच्या प्रांगणात कोठेच दिसत नव्हता.

त्या रात्री एकच गोष्ट फक्त मूर्त स्वरूपात प्रतीत होत होती आणि ती म्हणजे कोसळणारा पाऊस. बराच वेळ मी तो पाऊस ऐकत होते-हो ऐकतच होते

कारण बाहेरच्या मिट्ट काळोखात काहीच दिसत नव्हते. पण मध्येच मोठ्या चपळाईने ती चपला चमकून गेली आणि त्या निमिषार्धच मला त्या पावसाचे रौद्र स्वरूप दिसले. खिडकी बंद करून मी डोक्यावरून पांघरूण घेतले. त्या क्षणी मनात आले, श्रावणातील अशाच एका रौद्र रात्री भगवंतांनी कृष्णावतारात या इहलोकात आगमन केले होते. नाही!

ती रात्र आणि तो पाऊस केव्हा संपला माहीत नाही. पण मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा खिडकीच्या काचेचे रूप मला आगळेच भासले. क्षणात उठून मी बाहेर आले. रात्रीचा तो काळ्या ढगांचा बुरखा गगनाने केव्हाच फेकला होता. भगवान सूर्याचे आगमन अदयापि व्हायचे होते, पण आकाशात विविध रंगांची उधळण झालेली दिसत होती. कुणा बालिकेने रंगावली रेखाटण्याऐवजी स्वतःजवळचे सारे रंगच उधळले आहेत की काय, असे वाटत होते. हेच का ते कालचे काळेकुट्ट आकाश म्हणून मी कुतूहलाने पाहू लागले.


रात्रीचा पाऊस आता नव्हता, पण त्या पावसाच्या खुणा मात्र सर्वत्र दिसत होत्या. सारा आसमत धुऊन निघाला होता. झाडांची पाने अजूनही ओलीचिब दिसत होती. ओल्या ओल्या पानांतून जाई, जुईसारखी पांढरी फुले त्या नुकत्याच न्हाऊन निघालेल्या आसमंताला गंधित करीत होती. हळूहळू वर येणाऱ्या भास्कराने या साऱ्या दृश्यावर सोनेरी किरणांचा मुकुट चढविला; आणि जणू त्या सोनेरी किरणांतून भोवतालच्या वातावरणावर चैतन्याचा शिडकावा केला.




ramya-pahat-essay-marathi




श्रावणातील प्रत्येक पहाट आपल्याबरोबर चैतन्याची कुपीच घेऊन येते. कधी ते चैतन्य शिवाला बेल, शिवामूठ वाहणाऱ्या भक्तांच्या रूपाने भेटते; तर कधी मंगळागौरीसाठी पत्री-फूले गोळा करणाऱ्या परड्यात दिसते. विविध रंगांचा नाजूक तेरडाही जिवतीच्या व्रतासाठीच सकाळी हसत असतो. तर कुठे शनिवारची कहाणी शनीच्या पूजेची आठवण देते. 

अशा या श्रावणातील निसर्गदर्शन घेण्यास निघावे तर सरसर आवाज करीत सर कोसळते आणि आडोसा शोधावा तर पुन्हा हा खट्याळ श्रावण आपले हास्य पिवळ्या उन्हातून ओसंडून देतो. पावसानंतरची ही पहाट तप्त मनाला दिलासा देते व आपूलकीच्या ओलाव्याने खुलविते. अशाप्रकारे essay on pahat in marathi -रम्‍य पहाट मराठी  निबंध हा  निबंध  वरील प्रमाणे  
वर्णन करता येईल . आपले रम्‍य पहाट विषयी काय मत हे कमेंट करून कळवा, तुमची प्रतिक्रीया आमच्‍यासाठी अमुल्‍य आहे. धन्‍यवाद 




वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते 

  • mi anubhavleli pahat nibandh
  • me anubhavleli pahat in marathi
  • mi anubhavleli ek ramya pahat
  • me anubhavleli pahat marathi nibandh 
  • mi pahileli ramya pahat nibandh
  • me anubhavleli ek ramya pahat

रम्‍य पहाट मराठी निबंध | Essay On Pahat In Marathi

Essay on rainy season in marathi | पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध

 निबंध 1

नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पावसाळ्यातील एक दिवस मराठी  निबंध, मानवाने विज्ञान आज भरपुर प्रगती केली असली तरी निर्सगावर त्‍याला मात करता आली नाही, खालील निबंधामध्‍ये निसर्ग मानवाची कश्‍याप्रकारे परीक्षा घेतो , व मानव त्‍यावर किती हतबल होतो याचे वर्णन केले आहे . चला तर मग सुरूवात करूया पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंधाला .
एकदा तोंड दाखवून तो लुच्चा पाऊस कुठे गडप झाला होता कोण जाणे? शेतकऱ्यांच्या डोळ्यांत तर पाणी तरळले होतेच; पण शहरवासीयांच्याही तोंडचे पाणी पळाले होते. पावसाचे आगमन व्हावे म्हणून त्याची विविध प्रकारे आळवणी चालली होती. होमहवन, जपजाप्य, मंत्रजागर सारे झाले; पण तो लबाड कुठे दडून बसला होता कोण जाणे! नेहमी सर्वज्ञतेचा टेंभा मिरविणाऱ्या माणसाला नाकदुऱ्या काढावयास लावताना त्याला खदखदून हसू येत असावे. त्याचा खेळ चालला होता, पण माणसे मात्र हवालदिल झाली होती. 


पुनः पुन्हा नक्षत्रांची गणना होत होती. पावसाची नक्षत्रे तर केव्हाच सुरू झाली होती; पण पावसाचा पत्ता नव्हता. 'येरे येरे पावसा' हे बालगीत बालकांबरोबर मोठेही मनातल्या मनात आळवीत होते. शेवटी त्या घनाला दया आली असावी! सकाळी माणसे जागी झाली ती नेहमीप्रमाणे पक्ष्यांच्या मधुर किलबिलाटाने नव्हे, भगवान सहस्ररश्मीच्या सूचक पदन्यासाने नव्हे; तर मुसळधार कोसळणाऱ्या धारांच्या आवाजाने. या मुसळधार धारा पाहिल्यावर मात्र माणसे सूखावली. कारण ज्याची ती चातकाप्रमाणे वाट पाहत होती, तोच मुळी त्यांच्या भेटीसाठी आला होता. 



Essay on rainy season in marathi
Essay on rainy season in marathi 

हव्या हव्या असलेल्या त्या पाहुण्याचे मोठ्या आनंदाने स्वागत होऊ लागले.
पण सगळ्यांना गंमत वाटत होती ती ही की, ज्या पाहण्याची आपण वाट पाहत होतो, तो पाहुणा अचानक केव्हा आला ते कळलेही नव्हते. दिवस वर येत होता, पण तो वर येत आहे हे कळत होते ते केवळ घड्याळाच्या काट्यांमुळे. कारण वरुणराजाच्या आगमनामुळे भगवान सूर्यदेवांनी रजा घेतली असावी; किंवा परमेश्वराच्या या लाडक्या बाळांना-मानवांना-आपण नाहक इतके दिवस पीडा दिली म्हणून हा सहस्ररश्मी संकोचला असावा. 

काही का कारण असेना, पण एकूण आजचा दिवस हा दिनमणीचा दिवस नव्हता, तर तो एक ओला दिवस होता. पाऊस कोसळत होता. दाही दिशा अगदी कुंद झाल्या होत्या. उन्हाने त्रासलेल्या जीवांना तो ओला दिवस सुखावीत होता.
घड्याळाचे काटे सरकत होते; पण पाऊस थांबावयाचे काही चिन्ह दिसत नव्हते. मोठ्यांना आता कामावर जायला हवे होते. शाळा-कॉलेजाची मुलांना आठवण झाली. पण कसे जाणार? सारे रस्ते जलमय झाले होते. वरुणराजा अजूनही कोसळत होता. आता त्या पावसातील नावीन्य संपले होते. आता जाणवत होती केवळ त्याच्यातील रुद्रता. आनंदाने स्वागत केलेल्या पाहुण्याविषयी आता भय वाटू लागले!

 लोकांचे सर्व व्यवहार ठप्प झाले. सारे रस्ते पाण्याने भरून वाहू लागले. गोरगरिबांच्या झोपड्या पाण्यात वाहून गेल्या. सगळी वाहने जेथल्या तेथे कळाहीन होऊन स्थिरावली होती. एवढी मोठी आगगाडी, पण तिचाही तोरा या जलधारांनी हिरावून घेतला.

विमाने सुद्धा आकाशात झेप घेऊ शकत नव्हती. कारण पाच-दहा फुटांपलीकडचेही दिसत नव्हते. सर्वत्र होते फक्त पाणीच पाणी. वर पाणी, खाली पाणी. घरे ओली, छपरे ओली, कपडे ओले. सारे कसे ओलेच ओले. दिवस संपत आला; पण पाऊस थांबला नव्हता वा कमी सुद्धा होत नव्हता. कालपर्यंत पाण्यासाठी आतुर झालेल्यांच्या तोंडचे पाणीच आता पळाले होते. चिंतातूर माणसे थकली. 

आडोशा-निवाऱ्याला जाऊन आडवी झाली आणि नकळत निद्राधीन झाली. रात्रीच्या अंधारात तो पाहुणा जसा अवचित आला होता, तसाच निघूनही गेला होता. हसत हसत बालरवी उदयाचलावर आला. जग जागे झाले, स्तिमित झाले; कारण तो ओला दिवस संपला होता; पण आपल्या अस्तित्वाच्या खुणा ठेऊन !

 मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद
 
निबंध 2

पावसाळ्यातील एक दिवस मराठी  निबंध 

पावसाळ्यातील एक दिवस भारतात वेगवेगळे ऋतू अनुभवायला मिळतात. उन्हाळा, हिवाळा व पावसाळा हे सर्वच ऋतू महत्त्वाचे आहेत. त्यापैकी पावसाळा हा माझा सर्वात आवडता ऋतू आहे. पहिल्या पावसानंतर येणारा मातीचा सुगंध मला अतिशय प्रिय आहे. 


भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथे पावसाला फार महत्त्व आहे. नदी, कालवे, तलाव, विहिरी असून ही पावसाची सदा गरज असते.जून महिना होता. शाळा उघडल्या होत्या. कित्येक दिवसांपासून तापमान वाढलेले होते. रस्ते, घरे, चहू कडे आगीचा वर्षाव होता होता. शाळेत फार कठीण परिस्थिती होती.


पत्रे खुप तापले होते. पंख्याचे वारे पण उष्णच येत होते. तीन वाजण्याची वेळ असेल. अचानक जोरदार वारे वाहू लागले. आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाली. खिडक्याची दारे आपटू लागली. चहूकडे अंधार पडला. खोलीत लाईट नव्हता, असे वाटले जणू रात्रच झाली.शिक्षकांनी शिकविणे नाइलाजाने बंद केले. 



वाऱ्याचा वेग वाढला आणि सुरुवातीला हळूहळू येणाऱ्या पावसाचा वेग काही वेळातच वाढला. विजा कडाडू लागल्या. पत्र्यावर पावसाचे थेंब वाजू लागले. थोड्याच वेळात मोडक्या खिडकीतून पाण्याचे तुषार आत येऊ लागले. पाहता पाहता आणखी ढग आले. असे वाटत होते की जणू आकाशाला कोणी काळी शाईच लावली आहे. 


शाळेच्या खोल्या ओल्या झाल्या, मैदानात पाणी जमू लागले. तितक्यात एका खोडकर मुलाने गोंधळ माजविला की पाण्यात वीज उतरली आहे. सगळे शिक्षक बाहेर आले. मुलांना शाळेतून बाहेर काढले. मुख्याध्यापकांनी सुट्टीची घंटा वाजविण्यास सांगितले.


पाऊस कमी झाला होता पण थांबला नव्हता. शाळेत येताना मी छत्री आणली नव्हती त्यामुळे घरी जाताना भिजलो. रस्त्याच्या उतारावर पाणी जमले होते. वाहतूक जवळपास बंद झाली होती. काही लोक छत्री घेऊन उभे होते. बरेचसे लोक भिजले होते. शाळेजवळच्या खड्यात पाणी जमले होते. सगळे रस्ते स्वच्छ धुतले गेले होते. 



पक्षी झाडांवर किलबिल करु लागले वातावरण थंड झाले. झाडेही पावसात न्हाऊन आनंदाने डोलत होती. आम्ही रस्त्याच्या कडेला साठलेल्या पाण्यात उडया मारायला व कागदांच्या बोटी सोडायला सुरुवात केली. घरी पोहोचलो तेव्हा मी चिखलाने पूर्ण मारवलो होतो, आईने मला हात-पाय धुउन कपडे बदलण्यास सांगितले. मग गरम दूध व नाश्ता दिला. अशा प्रकारे पावसाळयातीला हा पहिला दिवस मी मजेत घालवला.


मला आशा आहे की marathi essay on rainy season हा निबंध तुम्‍हाला नक्‍कीच आवडला असेल , तरी मी तुम्‍हाला विनंती करू इच्‍छीतो की आपल्‍या प्रतिक्रीया कमेंट करून नक्‍की कळवाव्‍या


वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते 


  • marathi essay on rainy season for class 6
  • marathi essay on rainy day
  • marathi essay on one rainy day
  • marathi essay on first day of rainy season
  • marathi essay on first day of rain

Essay on rainy season in marathi | पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध

पावसाळयावर  मराठी निबंध |  Rainy Season Essay In Marathi

नमस्‍कार मित्रांनो पावसाळयावर  मराठी निबंध  Rainy Season Essay In Marathi विषयावर निबंध पाहणार आहोत. 

पावसाळा अर्थातच वर्षा ऋतु हा बालपणातील आठवणी ताज्‍या करून देणारा असतो , कागदाची होडी पावसाच्‍या पाण्‍यात सोडण्‍याची विलक्षण गंमत असते . शालेय जिवनामध्‍ये पावसाळा निबंध मराठी या विषयावर निबंध लेखन करायचे असते. हा वर्णणात्‍मक निबंध असतो, त्‍या अनुशंगाने आपण विस्‍तुत निंबध लेखन करणार आहोत चला तर निबंधाला सुरूवात करूया.

पावसाळ्याचे दिवस असूनही नेमेची येणारा पावसाळा जेव्हा दडी मारतो, तेव्हा माणूस अगदी मेटाकुटीला येतो. माणसे पाण्यासाठी वणवण भटकत असतात आणि त्यांचे डोळे वरचेवर आकाशाकडे वळलेले असतात. पण वर्षाराणीचे इमानी सेवक असलेले काळे ढग आसमंतात कुठेही दिसत नाहीत. कारण वर्षाराणी रुसलेली असते. परंपरेचे अंधपजक असलेल्या कविमंडळींनी आजवर 'ऋतुराज', 'ऋतुराज' म्हणून वसंताला श्रेष्ठ गणले, गौरविले, म्हणूनच ही राणी रुसली असावी की काय!


ऋतुराज्ञी वर्षा मराठी  निबंध  किंवा सर्व  ऋतुंची  राणी  वर्षा  ऋतु मराठी निबंध

सदोदित वसंताचे गुणगान करणाऱ्या लोकांना जेव्हा वर्षाराणीचे महत्त्व उमगले, तेव्हा त्यांनी तिचे राज्ञीपद तिला बहाल केले. कारण वर्षा नसेल तर वसंताचा साजशृंगार तरी कसा झाला असता? जाई, जुई, चमेली वर्षेच्या प्रेमळ वर्षावात भिजून निघतात म्हणून तर वसंताचा साजशृंगार होत असतो. ग्रीष्माने पोळून निघालेली धरतीमाताही वर्षेचे पाणी पिऊन तृप्त होते. तिच्या तृप्ततेचा तो मृद्गंधी निःश्वासही किती मोहक असतो!


वर्षाराणी ही खरोखरच आपली जीवनदात्री आहे. पण या सम्राज्ञीचा रोषही तापदायक असतो, याचा अनुभव कधी ओल्या दुष्काळाने, तर कधी कोरड्या दुष्काळाने येतो. कधी ही राणी रुसून बसते आणि मग सर्वांच्या तोंडचे पाणीच पळते, तर कधी रागारागाने ही दिवसरात्र बरसतच राहते आणि त्यामुळे या वर्षाराणीचे आगमन नकोसे होऊन जाते.जाळणाऱ्या ग्रीष्माच्या पाठोपाठ या वर्षाराणीचे होणारे आगमन केवढे सुखद असते! स्वास्थ्य आणि समृद्धता यांची त्यात हमी असते. वर्षाराणीच्या या आगमनाचे वर्णन करताना कवी निकुब  म्हणतात

'विजेचे नर्तन,


मेघांचे गर्जन मृद्गंध,

विशाल समृद्ध शेते,

अमृतवर्षाव सांगाती घेऊन हिरवा आपुला शृंगार लेऊन,

येई वर्षादेवी.'





आकाशातील काळ्या रंगाचे डोंगर या ऋतुराज्ञीच्या आगमनाची द्वाही फिरवू लागतात. आकाशातील ढगांची ही वादये वाजू लागली की, त्याच तालावर मोर आपले गायन व नर्तन सुरू करतात. धुंद वारा वाहू लागतो आणि शेवटी आकाशातून टपोरे थेंब पृथ्वीवर बरसू लागतात. तहानलेली धरा ते पाणी जणू घटाघटा पिऊन टाकते आणि आनंदाने पुलकित होते. त्यामुळे तिचा मृद्गंध सगळीकडे दरवळतो.


असा हा वर्षाऋतू चैतन्याची सनद आहे. तो सृजनशीलतेचा संहारावरचा विजय आहे वर्षाऋतू हा विपुलतेचा ऋतू. वसुंधरेला सस्यश्यामला करणारा हा ऋतू धरतीपुत्रालाही उदात्ततेची शिकवण देतो. वर्षाराणी ही सर्व सजीवांची गंगोत्री आहे, सृष्टीचे सौभाग्य आहे. आमच्या जीवनात जे काही सुंदर आहे तो तिचाच आशीर्वाद आहे. म्हणून वर्षा ही ऋतुचक्रातील सम्राज्ञी आहे.

मित्रांनो तुम्‍हाला पावसाळयावर  मराठी निबंध |  Rainy Season Essay In Marathi हा निबंध कसा वाटला व तुमचा आवडता ऋतु कोणता आहे हे कमेंट करून जरूर कळवा, धन्‍यवाद

पावसाळयावर मराठी निबंध | Rainy Season Essay In Marathi

 ऋतुराज वसंत मराठी निबंध vasant essay in marathi


ऋतुराज वसंत मराठी निबंध vasant essay in marathi नमस्‍कार मित्रांनो होळी येते तीच मुळी रंगांची उधळण करीत. रंगपंचमीच्या दिवशी तर लहानमोठे सारेजण रंग उडविण्यात रंगून जातात. रंगाची पिचकारी सगळ्याच्या कानात ती गोड बातमी सांगते आणि सर्वांना मोहरवून टाकते. 'वसंत आला, जादूगार वसंत आला' शिशिराच्या जीवघेण्या थंडीने गारठून गेलेली सृष्टी पुन्हा एकदा अंग झटकून रंगांचा झिम्मा खेळावयास तयार होते. कारण दारी आलेला असतो तिचा आवडता अतिथी 'ऋतुराज वसंत!'



आपल्या अंगावरची राजेपणाची वस्त्रे उतरवुन हा खेळकर वसंतही चैतन्यमय खेळात निसर्गदेवतेला सामील करून घेतो. हे कौतुक पाहावयास सहस्ररश्मीही आकाशात उशिरापर्यंत रेंगाळू लागतात. नेहमीच्या परिचित पक्ष्यांबरोबर पीलक, गोविद, तांबट, बुलबुल या साऱ्यांची गर्दी ऋतुराजाच्या स्वागतासाठी होते.


ऋतूचे चक्र फिरते आणि त्या गतीबरोबर पायाखालची भूमी आणि डोक्यावरचे आकाशही नवे रंगरूप धारण करते. निसर्ग जणू माणसाला चकवून कातच टाकीत असतो. आंब्यांच्या झाडांवर फुललेल्या मोहराचा सुगंध बातमी देतो. शिशिर संपला, उठा आणि वसंताचे स्वागत करा. काजू, शेवगा यांच्यावर फुललेली नाजूक फुले फळांच्या आगमनाची सुवार्ता देतात. शिरीषाची झाडे जांभळट गुलाबी नाजूक फुलांच्या शृंगाराने नटतात. जाई, जुई, सायली, मोगरा, चंपक ही सारी सुगंधी मंडळी ऋतुराज वसंताची संध्याकाळ जणू सुगंधमय करतात.

पाहता पाहता आसमंत बदलतो. कुणा जादूगाराने आपली जादूची काठी फिरविली की काय असे भासते. या किमयेने कविमनांवरही आपली सत्ता संपादित केलेली असते. 'आला हा वसंत फेरीवाला' म्हणून कुणी कवी त्याला साद घालतो. कुणाला हा पाहुणा प्रत्यक्ष देवाचा प्रेषित भासतो. वसंताच्या आगमनाने बेहोष झालेला निसर्ग रंग, रूप, गंध यांची पूजा मांडतो. एक आगळे चैतन्य त्याला लाभते. आनंद, उत्कटता, काव्य, संगीत आणि सौंदर्याचा सौदागर असा हा सर्वगुणसंपन्न ऋतुराज आहे म्हणूनच कवी त्याला आळवितो, 'हा प्रसाद काव्यामधला कविसम्मत.' मित्रांनो तुम्‍हाला वसंत सर्व  ऋतुंचा राजा  मराठी  निबंध vasant essay in marathi हा निबंध कसा वाटला व तुमचा आवडता ऋतु कोणता आहे हे कमेंट करून जरूर कळवा, धन्‍यवाद

वसंत सर्व ऋतुंचा राजा मराठी निबंध | vasant essay in marathi

शाळेचा निरोपसमारंभ मराठी निबंध
Nirop Samarambha Essay Marathi



नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण शाळेचा निरोपसमारंभ मराठी निबंध बघणार आहोत.शाळा म्‍हटली की सर्वाना आठवण येते त्‍या शाळेतील झालेल्‍या गंमती जमती, शिक्षकांनी आपल्‍या केलेल्‍या तक्रारी, आपण केलेली मौजमजा , बालपणाचा हा काळ कोणीही विसरू शकत नाही . त्‍या अनुशंगाने आपण सविस्‍तर निंबध लेखन करणार आहोत चला तर निबंधाला सुरूवात करूया.

 
शाळेचा निरोप समारंभ जसाजसा जवळ येत होता तशी निरोप समारंभाची आतुरता वाढत होती . आजवर दहा वर्षे या सभागृहात मी अनेक समारंभांसाठी आलो आहे, बसलो आहे, पण कालचा 'निरोपसमारंभ' हा साऱ्या समारंभांपेक्षा खरोखरच आगळावेगळा होता. 


खरं पाहता या समारंभाची आम्ही सर्वजण गेली वर्षभर वाट पाहत होतो. दहावीत आल्यापासून अनेकदा या निरोपसमारंभाविषयी गप्पा निघत, त्यावेळी आमचे अनेक दोस्त 'आपण या समारंभाविषयी अमूक एक बोलणार, अमूक एक सुनावणार' अशा गोष्टी करीत, पण प्रत्यक्ष वेळ आल्यावर काय घडले?


पूर्वपरीक्षेचा निर्णय जाहीर झाल्यावरच शाळेने हा समारंभ आयोजित केला होता. त्यामुळे "प्रत्येकाला अभ्यासात आपण कोठे आहोत?" हे उमगले होते. “उरलेल्या एका महिन्यात आपण काय करणे आवश्यक आहे" हेच विचार सर्वांच्या मनात गर्दी करून होते. 


निरोपसमारंभाच्या दिवशी आम्हांला सुटी दिली गेली होती आणि ठीक पाच वाजता शाळेत बोलाविले होते. गणवेषाचीही सक्ती नव्हती. किंबहुना आज कोणत्याही नियमाचे बंधन आमच्यावर नव्हते. कारण आजच्या समारंभाचे आम्ही पाहुणे होतो.

nirop-samarambha-essay-marathi


सवयीप्रमाणे पंधरा मिनिटे आधी, म्हणजे पावणेपाचला शाळेत गेलो. रोजची परिचयाची शाळा आज वेगळीच भासत होती. प्रवेशद्वारात भलीमोठी रांगोळी काढली होती आणि सारे गुरुजन आमच्या स्वागतासाठी उभे होते. या स्वागतानेच आम्ही सारे भारावून गेलो. 


सभागृहात पाऊल टाकले तर ते सभागृह आज नव्या नवलाईने नटलेले दिसत होते. आजवर ज्यांनी शाळेस उत्कृष्ट यश मिळवून दिले अशा विदयार्थ्यांची छायाचित्रे मुख्याध्यापकांनी सभोवताली स्टँडवर लावून ठेवली होती. 


केवढी कल्पकता होती यांत! या साऱ्या प्रतिमा आम्हांला प्रेरणा देत होत्या तुम्हांलाही असेच यश मिळवायचे आहे, शाळेचा लौकिक वाढवायचा आहे, असेच जणू त्या आम्हांला सांगत होत्या. निशिगंधाची व गुलाबाची फूले जागोजागी लावल्याने सारे वातावरण कसे सुगंंधित झाले होते. समोरच्या फलकावर एक अर्थपूर्ण कविता लिहिली होती, ती आमच्याच एका शिक्षिकेने केलेली होती. कविता वाचताच आठवले ते त्या बाई शाळेत नवीन आल्या होत्या तो दिवस. किती त्रास दिला होता त्यांना आम्ही! उगाचच, अगदी वाहयातपणा म्हणून. पण पुढे त्यांनी आपल्या उत्कृष्ट शिकविण्याने आम्हांला जिंकून घेतले होते.



ठरल्यावेळी कार्यक्रमाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी समारंभाचे अध्यक्ष होते. पाहुण्यांची ओळख मुख्याध्यापकांनी करून दिली तेव्हा एक सुखद धक्का बसला. कारण ते अधिकारी आमच्याच शाळेचे 'माजी विदयार्थी' होते व त्यांचे नाव शाळेच्या सन्माननीय विदयार्थ्यांत झळकत होते.


निरोपसमारंभाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे आजच्या समारंभात भाषणांची आतिषबाजी नव्हती. मोजक्या शब्दांत मुख्याध्यापकांनी आमच्या बॅचने मिळविलेल्या गेल्या दहा वर्षांतील यशाचा आढावा घेतला. इतिहासाच्या सरांनी चटकदार शैलीत मागच्या काही सुखद आठवणींची उजळणी केली, तर संस्कृतच्या गुरुजींनी  आम्हांला परीक्षेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. पाहुण्यांनीही अगदी मोजक्या शब्दांत आपल्या जीवनातील यशाचे श्रेय शाळेकडे कसे जाते हे विनम्रपणे सांगितले. 



नंतर विदयार्थी आणि शिक्षक यांच्याकडून एकमताने निवड झालेल्या आदर्श विदयार्थ्यांचा सत्कार पाहण्यांतर्फे करण्यात आला. नंतर विदयार्थ्यांना भाषण करण्यास पाचारण करण्यात आले. पण नेहमी सभा गाजविणारे सारे वीर आज गप्प झाले होते. भारावलेल्या कंठांतून शब्द फुटेनात. सारेच वातावरण गंभीर झाले. म्हणून काही गमतीदार खेळ सुरू करण्यात आले व नंतर अल्पोपहाराचा कार्यक्रम होऊन समारंभ संपला..


समारंभ संपला तरी आज आमचे पाय शाळेतून बाहेर पडत नव्हते. त्या वास्तूत अनेक आठवणी दडलेल्या होत्या. नेहमी अगदी वायातपणे वागणारे विदयार्थीही गुरुजनांना वाकून वंदन करीत होते,  कोणताही निरोपसमारंभ हा असा हेलावून टाकणाराच असतो.


तुमच्‍या शाळेतील निरोप समारंभातील आठवणी तुम्‍ही खाली कमेंट मध्‍ये व्‍यक्त करू शकतात मित्रांनो तुम्‍हाला शाळेचा निरोपसमारंभ मराठी निबंध,nirop samarambha essay marathi हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 2

शाळेतील निरोप समारंभ मराठी निबंध | Shaletil Nirop Samarambha Essay Marathi


आज शाळेतील शेवटचा दिवस. मनात विचारांचे काहूर ऊठले. आज खरेच आपण ह्या शाळामातेचा निरोप घेणार? ह्या मातेनेच मला अक्षरे गिरवायला शिकवले, गणितातील अंकांशी ओळख करून दिली, अनेक संतांची महती सांगितली. या शाळेमुळेच माझी शास्त्रज्ञांशी ओळख झाली. नव्हे; या जगाशीच ओळख झाली. आलो, तेव्हा मी म्हणजे एक मातीचा गोळा होतो. आज त्या गोळ्याने आकार घेतलाय. ते सारे माझे गुरुजन, ते मित्र, ती स्नेहसंमेलने, त्या स्पर्धा, तो बक्षीस-समारंभ, कधी कौतुक, तर कधी शिक्षा ! खरेच किती आणि कसा भुर्रकन गेला तो काळ. 


मी भूतकाळातील माणिक-मोती शोधत होतो. एकदम भानावर आलो, ते टाळ्यांच्या आवाजाने. सर्व सभागृह दहावीच्या मुलांनी भरले होते. मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकवृंद सभागृहात दाखल  झाले. कार्यक्रमाची सुरुवात झाली. एवढी वर्षे ज्या प्रार्थनेने शालेय अभ्यासाची सुरुवात व्हायची, ती प्रार्थना सर्वांनी म्हटली. आजची प्रार्थना धीरगंभीर वाटली. 


मुख्याध्यापकांनी सर्वांचे स्वागत केले. सुरूवात झाली ती त्यांच्याच भाषणाने. आज त्यांच्या भाषणात पित्याची माया होती. भावनेचा ओलावा होता. कमंडलूतल्या माशाला कधीतरी महासागरात जावेच लागते. या त्यांच्या वाक्याने मन घट्ट करावे लागले. वस्तुस्थितीची जाणीव झाली.


सर्ववर्गांच्या वर्गशिक्षकांनी आम्हाला भावी आयुष्यासाठी मोलाचा सल्ला व शुभेच्छा दिल्या. आमच्या सरांनी कविता वाचून दाखविली -
"माहीत होते, जाल उडुनिया दोन दिसांनंतर,
- नव्हते ठाऊक असे वियोगी उलेल हे अंतर."

सरांचे डोळे पाणावले. आम्हालाही गलबलून आले. वातावरण गंभीर बनले. सर्वांच्याच भावना तरल बनल्या होत्या. वाटले, 'वियोगाचा प्रत्येक क्षण असाच कातर असतो का?' काही विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त करणारी, काही आठवणी सांगणारी भाषणे केली. मलाही वाटत होते की, आपणही आपल्या हृद्य आठवणी सांगाव्यात, कृतज्ञता व्यक्त करावी; पण माझे शब्दच जणू गोठून गेले होते.

कार्यक्रम संपन्न झाला. शाळामातेने दिलेला प्रेमाचा घास आम्ही सर्वांनी खाल्ला. स्मृती राहण्यासाठी वर्गातील सर्व विद्यार्थी व शिक्षक, असा फोटो काढला. पाऊले जड झाली होती. शाळेच्या मातीतून पाय निघत नव्हता. सर्व शिक्षकांना भेटलो. शाळामातेला डोळे भरून पाहिले. कृतज्ञतेचे दोन अश्रू गालांवरून ओघळले. खरे तर मोठ्या विश्वात प्रवेश करण्यासाठी प्रवासाला निघालोय. 


शाळामातेने बरोबर ज्ञानशिदोरी, संस्कार दिलेय, ते घेऊन निघालो. निघताना निश्चय केला, “शाळेने दिलेले ते ज्ञानाचे रोप आपणही रुजवायचं.” निरोप घेतला नि एकदाही मागे वळून न बघता घराचा रस्ता धरला.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद

वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते.
  • शाळेचा निरोप समारंभ भाषण मराठी
  • कॉलेज निरोप समारंभ निबंध
  • कनिष्ठ महाविद्यालयाचा निरोप घेताना मराठी निबंध
  • निरोप समारंभ मनोगत भाषण

शाळेचा निरोपसमारंभ मराठी निबंध | Nirop Samarambha Essay Marathi