वर्णनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वर्णनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

प्रजासत्ताक दिन वर मराठी निबंध | Republic day 26 January essay in Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण प्रजासत्ताक दिन वर मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्‍ये दरवषी प्रजासत्ताक दिन कश्‍याप्रकारे साजरा केल्‍या जातो याचे वर्णन केले जाते. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला

निबंध 1 

प्रजासत्ताकदिन आणि  स्वातंत्र्यादिन हे दोन मोठे राष्ट्रीय समारंभ आहेत. प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीला तर स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्टला साजरा केला जातो. संपूर्ण राष्ट्र मोठ्या उत्साहाने हे दिवस साजरे करते. आपल्या इतिहासाची आणि हौतात्म्य स्वीकारलेल्या वीरांची आठवण देश करतो. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी यादिवशी नवे संकल्प केले जातात.

Republic-day-26-January-essay-in-Marathi
Republic-day-26-January-essay-in-Marathi




२६ जानेवारी १९५० ला भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले आणि घटना लागू करण्यात आली. प्रजासत्ताक दिनाची कहाणी मोठी आहे. याचा इतिहास १९२९ साली झालेल्या लाहोरच्या काँग्रेस अधिवेशनापासून सुरू होतो. या अधिवेशनाचे पं. नेहरू अध्यक्ष होते. संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव यात पास करण्यात आला. याच दिवशी रात्री बारा वाजता रावी नदीच्या किनाऱ्यावर नेहरूंनी स्वातंत्र्याचा ध्वज फडकविला. देशाला उद्देशुन संपूर्ण स्वातंत्र्य प्राप्त करण्याची घोषण केली. हा दिवस २६ जानेवारी होता. त्यादिवशी सर्व प्रतिनिधींनी एका स्वरात भारतमातेला गुलामगिरीच्या साखळ्यांतून मुक्त करण्याची प्रतिज्ञा केली. अशा प्रकारे हा दिवस आमच्यासाठी अविस्मरणीय बनला.



त्यानंतर दरवर्षी २६ जानेवारीला भारतीय जनता या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार करीत राहिली. ज्यामुळे स्वातंत्र्य चळवळीला उत्तेजन व गती मिळाली, देशप्रेम आणि देशभक्तीने झंझावाताचे रूप घेतले. १९४२ मध्ये 'भारत छोडो' चळवळीचा श्रीगणेशा करण्यात आला. शेवटी इंग्रजांना इथून जावेच लागले व देश स्वतंत्र झाला.



देशाच्या घटना निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली ती २६ जानेवारी १९५० ला पूर्ण झाली. त्यानंतर भारत प्रजासत्ताक घटक राज्य बनले. त्याला सार्वभौमत्व मिळाले. त्याने लोकशाही शासनपद्धतीचा स्वीकार केला. संपूर्ण भारतात प्रसन्नता व संपूर्ण स्वातंत्र्याची एक लाट आली. लोकांनी २६ जानेवारीला त्याचे समारंभ साजरे केले. 


२६ जानेवारी हा राष्ट्रीय समारंभ असल्यामुळे त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. सर्व संस्था, खाजगी व सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज इत्यादी बंद असतात. २५ जानेवारीला संध्याकाळी राष्ट्रपती इंटरनेट व दूरदर्शनच्या माध्यमातून संपूर्ण देशाला उद्देशून संदेश देतात. तो हिंदी व इंग्रजीत असतो. या प्रसंगी वृत्तपत्रे, मासिकांचे विशेष अंक प्रकाशित होतात. ठिकठिकाणी ध्वजारोहण व विशेष कार्यक्रम सादर केले जातात. संपूर्ण राष्ट्रात एक उत्साहाचे वातावरण असते.


२६ जानेवारीला सकाळी सर्वप्रथम पंतप्रधान इंडिया गेटवर जाऊन अनाम हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात. त्यानंतर राजपथावर शानदार कार्यक्रमाला प्रारंभ होतो.  राष्ट्रपती जेव्हा तिथे येतात तेव्हा त्यांचे स्वागत उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सेनेच्या तिन्ही विभागांचे प्रमुख करतात. ध्वजारोहण होते आणि नंतर सेनेच्या तिन्ही विभागांच्या तुकड्यांची परेड होते. राष्ट्रपती त्यांची सलामी घेतात. बँडवर राष्ट्रीय धून वाजविली जाते त्यानंतर भारतात तयार झालेल्या तोफा, रणगाडे, क्षेपणास्त्रांचे प्रदर्शन होते.


आपल्या सैन्याच्या तयारीची आपणास एक झलक पाहावयास मिळते. शाळेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मनोरंजनाचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. नंतर वेगवेगळ्या राज्यांच्या आकर्षक शोभायात्रा निघतात. त्यातून राष्ट्रीय ऐक्य, संस्कृती, इतिहास आणि समृद्धीचे दर्शन घडते. प्रादेशिक लोकनृत्ये सादर केली जातात. हा सर्व कार्यक्रम मंत्रमुग्ध करणारा असतो. हजारो लोक हे सर्व पाहण्यासाठी आलेले असतात.


इंटरनेट व दूरदर्शनवर त्याचे थेट प्रसारण केले जाते. रात्री सरकारी इमारतींवर विद्युत रोषणाई केली जाते. असे वाटते जणू दिवाळीच आहे.  राजधानी दिल्लीखेरीज इतर राज्यांच्या राजधान्या, शहरे, गावे सर्वत्र प्रजासत्ताकदिन धूमधडाक्याने साजरा केला जातो. प्रांतांच्या राजधान्यांत राज्यपाल परेडची सलामी घेतात. शाळा, कॉलेज, संस्था इ. ठिकाणी अनेक कार्यक्रम आयोजित केलेले असतात. सर्व सरकारी इमारतींवर तिरंगा फडकविण्यात येतो.


या उत्साह व उत्सवाबरोबर हा दिवस आमच्या चिंतनाचा पण आहे. तो आपणास ही प्रेरणा देतो की आपण आपल्या भारताला अधिक सुदृढ, सुखी, समृद्ध आणि उन्नत बनविले पाहिजे. आपल्या स्वातंत्र्याला कोणत्याही प्रकारचा धक्का न लागला पाहिजे. आपली त्याग आणि बलिदानाची परंपरा नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. खरोखरच हा एक अविस्मरणीय दिवस असतो. राष्ट्रीय उत्सव, मेळा असतो. ज्यात सर्व वर्ग जाती, धर्माचे लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळे उत्साहाने भाग घेतात. त्यामुळे आपल्या राष्ट्रीय ऐक्य, भावनात्मकता, अखंडतेला बळ मिळते. 


भारतात इतरही अनेक उत्सव होतात पण २६ जानेवारी एकमेवच. परदेशांत भारतीयांखेरीज इतर परदेशी लोक पण हा कार्यक्रम आवडीने पाहतात. या प्रसंगी इतर राष्ट्रांचे प्रतिनिधी विशेष पाहुणे पण हजर असतात. ते आपल्याबरोबर या दिवसाच्या आठवणी घेऊन जातात.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका  धन्‍यवाद



निबंध 2

गणतंत्र दिवस मराठी निबंध | Best Essay On Republic Day In Marathi


भारतात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक सण व उत्सव साजरे केले जातात. पण काही सण असे असतात की ज्यांचा संबंध राष्ट्र आणि त्यातील निवासी यांच्याशी असतो. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय सण आहेत. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. २६ जानेवारी १९५० पासून भारताने आपली नवी घटना लागू केली. स्वत:चे स्वतंत्र सरकार, राष्ट्रपती, ध्वज यांची निर्मिती झाली.


भारत जगातील सर्वात मोठे सार्वभौम प्रजासत्ताक बनले. राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सूत्रे सोपाविण्यात आली. या दिवशी सकाळी सर्वप्रथम पंतप्रधान इंडिया गेटवर जाऊन अनाम हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतात. सकाळी ७ वाजता राष्ट्रपती विजय चौकात येतात. तेव्हा पंतप्रधान, उपराष्ट्रपती आणि भारतीय सेनेच्या तिन्ही दलांचे सेनाप्रमुख राष्ट्रपतींचे स्वागत करतात. 


तिरंगी झेंडा फडकविल्यानंतर तिन्ही सेनेच्या तुकड्या सलामी मंचाकडे जातात. बँडवर सैनिक राष्ट्रीय संगीत वाजवितात. घोडे व उंटावर स्वार झालेल्या सैनिकांच्या तुकड्या येतात. भारतात तयार करण्यात आलेले रणगाडे, तोफा, रॉकेट आदींचे प्रदर्शन केले जाते. भारताच्या सामर्थ्याचे प्रदर्शन केले जाते. शालेय विद्यार्थी हे  नृत्ये, व्यायाम, आणि कसरतींचे प्रदर्शन करतात. विविधतेत एकता दाखविणारे देखावे निघतात. या देखाव्यांत त्या त्या राज्यांची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक झलक असते. 


शौर्य गाजविणाऱ्या मुला-मुलींचा सन्मान केला जातो. साडेअकरा वाजता लाल किल्ल्यावर परेडचे विसर्जन होते. आकाशातून विमाने पुष्पवृष्टी करतात.  सर्व राज्यांत प्रजासत्ताकदिन उत्साहाने साजरा केला जातो. त्याठिकाणी राज्यपाल सलामी घेतात आणि प्रादेशिक वेशभूषेत नृत्यगायन होते. शाळेतील मुलेही सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. सरकारी कार्यालयांवर रोषणाई केली जाते. राष्ट्रपती भवन, संसद, सचिवालय विजेच्या रोषणाईत न्हाऊन निघतात. हे दृश्य पाहण्यासारखे असते. 



राष्ट्रपती रात्री देशी-विदेशी अतिथींना मेजवानी देतात. या दिवशी शासकीय व अशासकीय कार्यालयांना सुट्टी असते. शाळा-महाविद्यालयांत सांस्कृतिक कार्यक्रम, खेळांच्या स्पर्धा होतात.



प्रजासत्ताक दिन आपणास आपल्या कर्तव्यांची जाणीव करुन देतो. आपल्या देशातील अमर हुतात्म्यांचे स्मरण करून आपण विचार केला पाहिजे की आपण काय गमावले आणि काय मिळविले! आपण राष्ट्राच्या सेवेत सहभागी झाले पाहिजे. राष्ट्राचे ऐक्य, अखंडता, आणि रक्षणासाठी सदैव तत्पर असले पाहिजे.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

प्रजासत्ताक दिन वर मराठी निबंध | Republic day 26 January essay in Marathi

वृक्षदिंडी निबंध इन मराठी | vruksha dindi nibandh Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वृक्षदिंडी निबंध इन मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधामध्‍ये पर्यावरणाविषयी जनजागृती व वृक्ष लागवड वाढवण्‍याविषयी शाळेतील मुले कश्‍याप्रकारे वृक्षदिंडी काढुन वृक्षारोपण करतात याविषयी सविस्‍तर माहीती दिली आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला

vruksha-dindi-nibandh-Marathi
vruksha-dindi-nibandh-Marathi



पर्यावरणाचा प्रश्न ही आजची जागतिक समस्या झाली आहे. प्रदूषणाचे बळी आपण केव्हा होऊ, हे सांगता येणार नाही. हा धोका ओळखून आमच्या शाळेने विदयार्थ्यांच्या मदतीने प्रदूषणाशी दोन हात करण्याचे ठरवले. वनमहोत्सवाच्या निमित्ताने आमच्या शाळेने 'वृक्षदिंडी'चा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याची तयारी जवळजवळ महिनाभर चालू होती. प्रत्येक विदयार्थ्याला आपल्या घरी एक 'बालवृक्ष' तयार करायला सांगितला होता. कोणी कोणते झाड लावावे, हे प्रत्‍येकजण आपआपल्‍या आवडीप्रमाणे ठरवु शकत होते. 


३० सप्टेंबरला सर्व विदयार्थ्यांना आपण लावलेली रोपे घेऊन सकाळी सातला शाळेत बोलावले होते, कारण त्या दिवशी शाळेतून वृक्षदिंडी निघणार होती. साऱ्या गावात फिरून ती परत शाळेतच येणार होती. शाळेच्या मागच्या मैदानात ही झाडे लावली जाणार होती. ते बालतरू भूमातेच्या स्वाधीन केले जाणार होते.



ठरल्याप्रमाणे ३० सप्टेंबरला सकाळी सात वाजताच सर्व विदयार्थी शाळेच्या गणवेशात आपापले बालवृक्ष घेऊन शाळेत हजर होते. आतापर्यंत शाळेतून अनेक प्रसंगी मिरवणुका निघाल्या होत्या; पण आजचा उत्साह अगदी आगळाच होता. कारण आम्ही स्वतः लावलेल्या व काही काळ आम्हीच जोपासलेल्या बालवृक्षांची मिरवणूक होती ती! आजच्या मिरवणुकीत दिल्या जाणाऱ्या घोषणाही आगळ्यावेगळ्या होत्या- 'झाडे लावा, झाडे जगवा, प्रदूषणाचा नाश करा', 'आजचे बालतरू, उदयाचे कल्पतरू !' वृक्षदिंडीत काही विदयार्थ्यांनी वृक्षांसारखे हिरवेगार पोशाख केले होते. त्यांच्या हातांत फलक होते- 


'वृक्षवल्ली आम्हां सोयरी', 

'एक बालक, एक झाड', 

'निसर्ग अमुचा सखा, आम्हां आरोग्य देई फुका!'


त्या बालतरूंचे स्वागत गावातील सारेजण उत्साहाने करत होते. संपूर्ण गावातून फिरत फिरत ही वृक्षदिंडी शाळेच्या मागच्या मैदानात आली. तेथे झाडे लावण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करून ठेवण्यात आली होती. आळी तयार होती. सर्व विदयार्थ्यांनी आपापली झाडे लावली. गुरुजींनी, मुख्याध्यापकांनीही वृक्षारोपणात भाग घेतला आणि काय गंमत ! आकाशाच्या झारीतून त्यांच्यावर पाण्याचा वर्षाव झाला. पळत पळत शाळेच्या इमारतीत शिरलो. पाऊस थांबला. टवटवीत झालेली झाडांची पाने वाऱ्याबरोबर सळसळत होती. जणू ती आनंदाने टाळ्याच पिटत होती.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व पर्यावरण वाचवण्‍यासाठी तुम्‍ही कोणते उपाय वापरता  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


महत्‍वाचे मुद्दे : 

(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )


  • पर्यावरणाचा प्रश्न
  • प्रदूषणाचे बळी 
  • झाडे लावण्याची आवश्यकता 
  • वनमहोत्सव 
  • बालवृक्षांची निर्मिती 
  • वृक्षदिंडी 
  • गणवेशात विदयार्थी 
  • इतर मिरवणुकांपेक्षा वेगळी
  • उत्साहाचे वातावरण
  • प्रत्येकाच्या हातात बालतरू वा फलक
  • काही विद्यार्थी वृक्ष बनले होते
  • लोकांच्यात उत्सुकता
  • गावभर जत्रा 
  • पाऊस 
  • त्याचे स्वागत..

वृक्षदिंडी निबंध इन मराठी | vruksha dindi nibandh Marathi

स्वतंत्र दिन निबंध मराठी | swatantra din nibandh marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण स्वतंत्र दिन मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्‍ये दरवषी स्वातंत्र्यदिन कश्‍याप्रकारे साजरा केल्‍या जातो याचे वर्णन केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला

निबंध 1 

१५ ऑगस्ट १९४७ ला भारत पारतंत्र्याच्या अंधारातून निघून स्वातंत्र्याच्या प्रकाशात आला. दिडशे वर्षांची गुलामी संपली. ब्रिटिश या देशातुन निघून गेले. देशाची प्रशासन व्यवस्था व्यवस्थितपणे चालविण्यासाठी पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद व पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांना नियुक्त करण्यात आले. प्रतिवर्षी १५ ऑगस्ट राष्ट्रीय पर्वाच्या रूपात साजरा केला जातो.

swatantra-din-nibandh-marathi
swatantra-din-nibandh-marathi

मुख्य समारंभ लाल किल्ल्यावर साजरा होतो. पंतप्रधान तिथे पोहोचल्यावर सेनेच्या तिन्ही विभागांचे प्रमुख त्यांना सलामी देतात.पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवितात. ध्वजाला २१ तोफांची सलामी सन्मानाप्रीत्यर्थ दिली जाते. राष्ट्राच्या नावे दिल्या जाणाऱ्या संदेशात पंतप्रधान देशाची प्रगती आणि भविष्यातील योजना याबद्दल राष्ट्राला माहिती देतात. या प्रसंगी देशातील सन्माननीय व्यक्तींबरोबरच विदेशी पाहुणे पण हजर असतात. भाषण संपल्यावर तीन वेळा 'जयहिंद'च्या घोषणेनंतर राष्ट्रगीत गायिले जाते, नंतर कार्यक्रम समाप्त होतो. १५ ऑगस्टला राष्ट्रीय सुट्टी असते. रात्री सरकारी इमारतींवर विद्युत रोषणाई केली जाते. ती पाहण्यासारखी असते. १५ ऑगस्टचा या सोहळयाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर आणी इंटरनेटवर दाखविले जाते. त्यानंतर देशभक्तिपर गीते, कविता, नाटके प्रसारित केली जातात. राज्या-राज्यात व गावा- गावात उत्साहाने ध्वजारोहण केले जाते. आपणा भारतीयांसाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस आपल्याला आपल्या जुन्या चुकांचा विचार करण्यास व त्या पुन्हा न होऊ देण्याचा प्रयत्न करण्यास सांगतो. कोणत्याही परिस्थितीत आपण आपले ऐक्य व अखंडतेचे रक्षण केले पाहिजे. तरच आपण आपल्या देशाचे नागरिक आहोत असे अभिमानाने जगाला सांगू शकू. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

निबंध 2

दरवर्षी स्वातंत्र्यदिनाला शाळेत जायचे, राष्ट्रध्वजाला वंदन करायचे, पाहुण्यांचे भाषण ऐकायचे हा एक ठराविक चाकोरीतील कार्यक्रम होता; पण यंदा आमचे वर्गशिक्षक म्हणाले की, "उदया झेंडावंदनाला याल, तेव्हा घरी सांगून या की आता एकदम संध्याकाळी घरी येऊ. आणि हो, येताना तुमचा दुपारच्या जेवणाचा डबाही घेऊन या, बरं का!"


१५ ऑगस्ट उजाडला. आम्ही शाळेत जमलो. ध्वजवंदन झाले. शाळेतील कार्यक्रम संपला. आता कोठे जायचे आहे, हे सरांनी काही सांगितलेच नव्हते, त्यामुळे उत्सुकता खूप वाढली होती. सरांबरोबर आम्ही सर्वजण निघालो.


आम्ही गावाबाहेरच्या एका जुन्या घरापाशी आलो. आमचे कुतूहल वाढले होते. सरांनी कुणाला तरी हाक मारली. एक वृद्ध पण तेजस्वी व्यक्ती पुढे आली. सरांनी ओळख करून दिली, ते सरांचे 'सर' होते. पण त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे ते जुन्या पिढीतील एक स्वातंत्र्यसैनिक होते. १९४२ च्या 'चले जाव' आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता. अनेक वर्षे ते भूमिगत होते आणि काही काळ त्यांनी कारावासही भोगला होता है पण  आम्हांला सांगितले.


स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र दिवशी त्या वृद्ध तपस्वी स्वातंत्र्यसैनिकाच्या तोंडुन स्वातंत्र्यलढ्याची गाथा ऐकण्यात आम्ही रमून गेलो. दोन तास केव्हा संपले ते कळलेच नाही. त्या स्वातंत्र्यवीराने तो इतिहास प्रत्यक्ष अनुभवला होता.

नंतर ते तपस्वी आम्हांला जवळच्याच एका घरात घेऊन गेले. स्वातंत्र्योत्तर काळात काही अनाथ बालकांच्या संगोपनाची व शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतली होती. त्या मुलांबरोबरच आम्ही आमचे भोजन केले. नंतर आम्ही काही वेळ गप्पागोष्टी व खेळ झाल्यावर घराकडे परत निघालो. तेव्हा एकच विचार मनात रेंगाळत होता की, स्वातंत्र्यदिन आज आम्ही खऱ्या अर्थाने साजरा केला.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 3

भारताचा स्वातंत्र्यदिन

स्वातंत्र्यदिन हा प्रत्येक राष्ट्रासाठी व त्यांच्या जनतेसाठी एक स्वतःचे अस्तित्व दाखवणारा व कोणतेही राष्ट्र असो प्रत्येकाला आपला स्वातंत्र्यदिन हा प्रिय असतो.


स्वातंत्र्य म्हणजे नेमके तरी काय हो? तर स्वातंत्र्याचे अनेक अर्थ, संकल्पना असू शकतील परंतु स्वातंत्र्य म्हणजे राष्ट्रातील व जगातील प्रत्येक व्यक्तीला वा समूहाला त्याच्या इच्छेप्रमाणे, आवडीप्रमाणे जगता यावे व तो स्वतःचे अस्तित्व तो स्वतःच्या इच्छेप्रमाणे समाजात दाखवू शकतो.


जगातील प्रत्येक राष्ट्राला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी काही धडपड करावी लागली तर काही राष्ट्रांना स्वातंत्र्य हे सहजगत्या मिळाले. राष्ट्र लोकशाही, कम्युनिस्ट, हुकूमशाही असे देत. परंतु ज्या राष्ट्रात जास्तीत जास्त लोक स्वातंत्र्य उपभोगतात तोच देश अथवा राष्ट्र हे स्वातंत्र्याचे प्रतिक मानले जाते.


आपल्या देशालाही स्वातंत्र्य मिळविताना अनेक अडचणी आल्या. परंतु देशातील स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिश सरकारला विरोध करून वा प्रसंगी अहिंसा करत स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. त्यात अनेकांना प्राणांची अहिंसा करत स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. त्यात अनेकांना प्राणांची आहुती द्यावीच लागली. परंतु स्वातंत्र्य मिळाले ते १५ ऑगस्ट १९४७ साली.


परंतु हे स्वातंत्र्य मिळविण्यास जेवढे परिश्रम, त्रास झाला तेवढाच किंबहुना त्याहून अधिक त्रास हे स्वातंत्र्य व देशातील शांतता टिकविण्यास झाला. त्यातली कारणे वेगळी वेगळी आहेत. परंतु प्रश्न पडतो की स्वातंत्र्यदिन हा खड्या पहात किंवा सुरक्षेच्या जाळ्यात म्हणजे एखाद्या तुरुंगात असल्याप्रमाणे साजरा करणे व ते हेच का स्वातंत्र्य की ज्यासाठी आपण इतकी वर्षे लढलो. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या आयुष्याची प्रसंगी जिवाची होळी केली ते जर या स्वातंत्र्यदिनाच्या वेळी उपस्थित असतील तर त्यांचीही मान शरमेने खाली जाईल.


ज्या देशाची सूरक्षाव्यवस्था व आंतरिक शांतता योग्य, मजबूत आहे त्या देशाचे स्वातंत्र्य अबाधित असते. परंतु आपल्या देशाची भौगोलिक रचना व तसेच आंतरिक रचना बघताना आपली शांतता, स्वातंत्र्य टिकविणे अवघड व महत्त्वपूर्ण असल्याचे वाटते. भारताच्या पश्चिमेस पाकिस्तान व पूर्वेस बांगलादेश ही फाळणीतून निर्माण झालेली राष्ट्रे आहेत व तीच राष्ट्रे ही जगातील व आशियातील महत्त्वाची दहशतवादी केंद्रे आहेत. व त्यांचे उद्दिष्ट हे जगातील व प्रामुख्याने विकसित देशांची शांतता, सुरक्षा भंग करणे व प्रसंगी हिंसा करणे. त्यामुळेच आपल्या राष्ट्रांना आपली सुरक्षाव्यवस्था मजबूतपणे कार्यरत ठेवणे भागच आहे.


भारतात विविध धर्माचे, पंथाचे, जातीचे लोक एकत्र राहतात परंतु भारतात धार्मिक, प्रादेशिक हे वाद देशाच्या दृष्टीने घातक निर्माण होत आहेत. भारतात अनेक धर्माचे लोक हे आपल्या पद्धतीने स्वतःच्या धर्माचे श्रेष्ठत्व गाजवताना दिसतात व त्यामुळेच आंतरिक शक्ती ह्या परोपरीने वा अनपेक्षितपणे शांततेस, सुरक्षेस आव्हान देत असतात.


ज्या देशाच्या स्वातंत्र्यास ६० वर्षे पूर्ण होऊनही त्या देशाला स्वतःचा 'स्वातंत्र्यदिन' हा सुरक्षाव्यवस्थेत पार पाडावा लागतो ही खरी शरमेची बाब आहे.


भारताचा स्वातंत्र्यदिन हा खड्या पहाऱ्यात साजरा होत असताना त्यात किती सामान्य लोक उत्साहपूर्वक सहभागा होऊ शकतात ? किती लोकांना शांत वातावरणात आपला स्वातंत्र्यदिन पाहायला मिळतो ?

स्वातंत्र्योत्तर काळात स्वातंत्र्याचे अनेक फायदे जनतेस समजते. परंतु आंतरिक शांतता निर्माण करण्यास देशातील नेते कमी पडले.

खड्या पहाऱ्यात स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना पाहताना हेच का ते स्वातंत्र्य जे आपण ६० वर्षांपूर्वी मिळविले व त्यासाठी अगणित हिरे गमावले. प्रत्येक स्वातंत्र्यदिन जवळ आला की सुरक्षेची चाचपणी सुरू होते व त्या दिवसापुरता तो दिवस यथायोग्यपणे पारही पडतो. परंतु इतर दिवस हे अशांतता, भीतीपूर्ण वातावरणात होतात त्याचे काय ?

स्वातंत्र्यदिनी आमचा ऊर भरून येतो आम्ही अभिमानाने तो विविध पूर्ण पद्धतीने साजरा करतो. परंतु हा स्वातंत्र्यदिन आम्ही यापुढेही याच पद्धतीने, भीतीपूर्ण वातावरणात साजरा करणार काय ? हाच प्रश्न मनात घर करून राहतो. ज्या देशाचा स्वातंत्र्यदिन हा खड्या पहायात होतो तर मग सामान्य लोकांचे स्वातंत्र्य कसे अबाधित राहू शकते हे कळतच नाही.

म्हणूनच असे सतत वाटत राहते की माझ्या भारताचा स्वातंत्र्यदिन हा विना सुरक्षा व्यवस्थेत पार पडेल तेव्हाच तो खरा यथायोग्यपणे साजरा होऊ शकेल. व त्याचवेळी त्या राष्ट्राचे भवितव्य चांगले असेल आणि तोच माझ्या स्वप्नातील भारत असेल.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

स्वतंत्र दिन निबंध मराठी | swatantra din nibandh marathi

 रेल्वे स्थानकावरील एक तास निबंध मराठी | Railway Station Varil Ek Taas Marathi Nibandh 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण रेल्वे स्थानकावरील एक तास मराठी निबंध बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. या निबंधामध्‍ये  रेल्‍वे प्लॅटफॉर्मवर सामान्‍यपणे घडणाऱ्या  गोष्‍टीचे वर्णन केले आहे.पण सामान्‍य असुनही जिवनाच्‍या विविध पैलुला स्‍पर्श करण्‍याचा प्रयत्‍न यातुन केला  आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

Railway-Station-Varil-Ek-Taas-Marathi-Nibandh
Railway-Station-Varil-Ek-Taas-Marathi-Nibandh



" दुपारी चार वाजता पोचत आहे " ताईने मोबाईलवर सांगीतले म्हणून स्टेशनवर गेलो. प्लॅटफॉर्म तिकीट घ्यायला दुसऱ्या  वर्गाच्या खिडकीवर ही गर्दी. पहिल्या वर्गावर मात्र २-३ च होते. समाजाच्या वर्गवारीचं सम्यक् दर्शन झालं. तिकीट घेऊन फलाटावर पाय ठेवला तो “ मुंबईसे आनेवाली १३७ डाऊन एक्सप्रेस एक घंटा देरीसे आयेगी..." ध्वनिवर्धकानं सांगितलं. झालं ! तासभर थांबणंच आलं. वेळ काढायला उगाच भटकत बसलो. 


प्लॅटफॉर्म माणसांनी नुसता फुलला होता. गरीब, मध्यम, श्रीमंत सर्व थरांतील लोक होते. त्यांचे कपडेच बोलत होते. रंगहीन, रंगीबेरंगी, मळकट, जीर्ण, लाजेपुरते तसे झकपक सूटबूट टायही होते. लंकेची पार्वती तशी सालंकृत रमाही ! सप्तरंगी तारुण्य सळसळत होतं तसं वार्धक्याच्या जाळ्यात सापडलेले चेहरेही. लहान निरागस बालकं तसे उगाच केसावरून कंगवा फिरवणारे सख्याहरिही ! माणसांचं म्युझियमच. एवढी माणसं...कशाला प्रवास करत असतील?...मामाच्या गावाला तर कुणी कामाला. नविन  सासुरवाशीण तर कुणी माहेरवाशीण, नोकरीच्या शोधात, कुणी औषधपाण्याला कुणी हवापाण्याला. एकाच्या डोळ्यात पाणी दुसऱ्याच्या ओठी गाणी . 


गर्दीतून चटपटीतपणे " चाय गरमऽ” “ए, वडा, वडा" म्हणत फिरणारे फेरीवाले. हातात, डोक्यावर, खांद्यावर सामान वाहणारे हमाल, 'रस्ता छोडो' म्हणत नसलेल्या जागेतून वाट काढणारे अन् पळत्या गाडीत चढून जागा धरणारे. पांढरी पैंट, निळा ब्लेझरचा कोट, टायवाले टी. सी. हे सारे सराईत आहेत हे न सांगता कळत होतं.


गाडीला अवकाश होता म्हणून काहीजण उपाहारगृहापाशी चहानाष्‍टा करत होते तर पेपर स्टॉलवर  वाचक रेंगाळत होते. कुणी उगीच भिंतीवरचं रेल्वेटाईमटेबल माना वाकडी करून वाचत होते. कुणी वजन काट्यावर 'वजन' करायचा प्रयत्न करीत होते- ' मशीन बंद आहे-' हे न वाचताच ! प्रतीक्षागृहात उच्चभ्रू लोक टाय सावरत India Today वाचत होते. खरं तर ते नुसते बाहेर आले असते तरी India Today ' दिसला असता.


कुठली तरी गाडी शिटी मारत धडाडत येत होती. एक इंजिन कर्कश्य शिटी मारत शंटिंग करत भाव खात होतं. भिंतींवर सिनेमाची भयानक पोस्टर्स होती.  ध्वनिवर्धक तीन भाषांतून गाड्यांची माहिती देत होते. पोर्टर उभ्या गाड्यांची चाकं तपासत होते. घड्याळ बंद होते. गाडीची बेल कधीमधी वाजत होती.  मनात विचार आला, अठरा पगड जातींना पोटात सामावणारी आगगाडी, ही राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीकच आहे. खरं तर जीवन हेही या प्लॅटफॉर्मसारखंच आहे. माणसं येतात कुठून, जातात कुठे काहीच माहीत नसतं. योग्य गाडी मिळेपर्यंत थांबतात ती या प्लॅटफॉर्मवर...आणि हा थांबण्याचा थोडा काळ म्हणजेच जीवन !


आपली वेळ झाली, गाडी मिळाली की झटकन् निघून जातो प्रत्येक जण !! “मुंबईसे आनेवाली १३७ डाऊन प्लॅटफॉर्म नंबर दो पर आ रही है" म्हणत असताच आरडत ओरडत, दिमाखात स्टेशनमध्ये घुसणाऱ्या गाडीकडे सारे धावले. त्यामध्येच नकळत सामावला जाऊन मी ताईला शोधू लागलो. 


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व रेल्वे स्थानकावर तुम्‍हाला आलेला अनुभव तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका 


निबंध 2 

 रेल्वे स्थानकावरील एक तास निबंध मराठी | Railway Station Varil Ek Taas Marathi Nibandh


रेल्वे स्टेशन ही खूप व्यस्त आणि उत्तेजित करणारी जागा आहे. तिथे नेहमी गाड्या येत जात राहतात. तो एक छोटासा संसार असतो. ज्यात सर्व प्रकारचे स्त्री-पुरुष मुले सतत दिसत असतात. मला अनेकदा रेल्वे प्रवासाची संधी मिळाली आहे. परंतु जेव्हा मी माझ्या काकांना घेण्यास लखनौ स्टेशनवर गेलो तेव्हा मला रेल्वे प्लॅटफॉर्मचा खरा अनुभव आला. 


काका दिल्लीहून येत होते. मी गाडी येण्यापूर्वी २०-२५ मिनिटे आधीच गेलो. प्लॅटफॉर्म तिकिट घेतले आणि स्टेशनात गेलो. गाडी अर्धा तास उशिरा येणार होती. मला वाटले एक तास वाट पाहणे फारच कंटाळवाणे होईल. वेळ कसा जाईल मी काय करू?


पण एक तास १० मिनिटासारखा गेला. अजिबात कंटाळा आला नाही. प्रथमच मला असे वाटले की वेळेलाही पंख असतात. तिथे मी जे जे पाहिले, जो अनुभव आला ते सर्व माझ्यासाठी रोमांचक व अविस्मरणीय ठरेल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. कधी मी बेंचवर बसत होतो तर कधी प्लॅटफॉर्मवर इकडे तिकडे फिरत होतो. गरम चहा पीत होतो.


प्लॅटफॉर्मवर प्रवासी, हमाल, फेरीवाले रेल्वेचे गार्ड तिकिट कलेक्टर, मेकॅनिक्स, भिकारी इत्यादी ची खूप गर्दी होती. हा एक अद्भुत मेळा होता. सगळेच जण घाईत होते. आपापाल्या कामात व्यस्त होते. पण मी मात्र मजेने या सर्वाचा आनंद लुटत होतो. 


प्रेक्षक म्हणून, प्लॅटफॉर्मवर तीळ ठेवायलाही जागा नव्हती. ठिकठिकाणी बॅगा, सुटकेस, बेडिंग, टोपले, पाकिटे, खेळणी, पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या होत्या. काही लहान मुले आपली खेळणी व फुग्यांशी खेळत होती. एक मुलगा मिठाईसाठी हट्ट करीत होता तर दुसरा छोटा मुलगा कशासाठी तरी आपल्या आईच्या मांडीवर बसून रडत होता.


जेव्हा प्लॅटफॉर्मवर एखादी गाडी यायची तेव्हा लोकांची गर्दी तिच्यावर झडप घालायची. धक्का बुक्की करीत एकमेकांना ढकलीत सगळ्यात आधी घुसण्याचा प्रयत्न लोक करीत होते. हमाल चालत्या गाडीत चढून प्रवाशांना चढविण्यात गढले होते. बायका, म्हातारी माणसे आणि मुले यांना गाडीत चढणे मुश्किल झाले होते.


कुठे रेल्वेचा गार्ड हिरवा झेंडा दाखवून तर गाडीचा ड्रायव्हर शिट्टी वाजवून गाडी सुरू झाल्याचा इशारा प्रवाशांना करीत होता. एखादा टी.सी. तिकिट न घेतलेल्या प्रवाशांना पकडून नेत होता. फारच अजब आणि रोमांचक वातावरण होते. 


इंजिन आणि गाड्यांच्या येण्या जाण्याचा जोराने सारखा आवाज येत होता. फेरीवाले ओरडून आपल्या वस्तू विकत होते. कुणी हमाल जास्त हमाली मिळावी म्हणून भांडत होता. कुणी प्रवासी खराब चहा दिल्याबद्दल चहावाल्याशी भांडत होता. कुणी वर्तमानपत्रे, मासिके वाचत बसले होते, कुणी पान चघळत होते. कुणी तिथेच जमिनीवर पथारी पसरून आराम करीत होते. सफाई


कामगार घाण साफ करीत होते. नळावर पाण्यासाठी खूप गर्दी झाली होती. जणू काही दुधाचेच मोफत वाटप होत होते. निरनिराळे रंगीबेरंगी कपडे घातलेले वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक पाहून देशाच्या विशालतेची, विविधतेची, त्यातून प्रतित होणाऱ्या ऐक्याची सहजच ओळख होत होती.


मी प्रवाशांच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहत होतो. त्यांचे मनोभाव समजून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. त्यांच्या हावभावांचे निरीक्षण करीत होतो. हे सर्व करण्यात मला आनंद वाटत होता. वेगवेगळ्या प्रकारचे चेहरे, त्यावरील हावभाव, अभिव्यक्ती सारे काही खरोखरच आकर्षक, मनोहर व ज्ञान वाढविणारे होते.


गाड्या जात येत होत्या. लोक एकमेकांशी हस्तांदोलन करून निरोप घेत होते. कुणी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करीत होते. कुणी माझ्याप्रमाणेच कुणाची तरी वाट पाहत उभे होते. तिथे एक लग्नाचे व हाड गाडीची वाट पाहत होते


नवरा मुलगा खेड्याचा होता आणि त्याने नवरदेवासाठी असलेला पारंपरिक पोषाख घातला होता. आणि त्यामुळे तो फार आकर्षक वाटत होता. पण पान खाऊन तो इकडे तिकडे धुंकत होता ते पाहून मला खूप किळस आली. इतक्यात एका पोलिसाने एका खिसेकापूला रंगेहात पकडले आणि तो त्याला मारू लागला. 


त्यांच्याभोवती गर्दी जमा झाली. चोराची पिटाई होत असलेली पाहून बरेच लोक खुश झाले आणि चोराबद्दल तहेत हेच्या गोष्टी करू लागले. शेवटी त्याला दोरीने बांधून तुरुंगात नेले.


त्याच वेळी मला समजले की माझ्या काकाची गाडी प्लॅटफॉर्मवर येत आहे. मी सावध झालो. गाडी धडधडत येऊन प्लॅटफॉर्मवर थांबली. काका वातानुकूलित कुपेने येत होते म्हणून मला त्यांना शोधावे लागले नाही. मी धावतच त्यांच्याजवळ गेलो व त्यांना नमस्कार केला. मला पाहून त्यांना खूप आनंद झाला. 


त्यांनी मला जवळ घेतले व आशीर्वाद दिला. सामान जास्त नव्हते. फक्त एक सुटकेस होती. काकांनी ती हमालाजवळ दिली आम्ही लगेच स्टेशनच्या बाहेर आलो. एक टॅक्सी केली आणि अर्ध्या तासात घरी पोहोचलो. त्यादिवशी प्लॅटफॉर्मवर घालविलेला एक तास माझ्यासाठी एक आठवण आणि अनुभव बनला. तो मी कधीही विसरू शकणार नाही. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . 


रेल्वे स्थानकावरील एक तास निबंध मराठी | Railway Station Varil Ek Taas Marathi Nibandh

Vachan Ek Uttam Chand Essay In Marathi | वाचन एक उत्तम छंद

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  वाचन  एक उत्तम छंद मराठी निबंध बघणार आहोत.आज आपण वाचन एक उत्तम छंदशीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत प्रत्‍येकाला कोणतातरी छंद असतोच आणि यांच छंदामुळे आपण उत्‍साहाने भरून जात असतो व त्‍याच बरोबर त्‍यामुळे आपण आनंद, मनोरंजन , ज्ञान पण मिळवु शकतो. आज आपण वाचन या छंदाविषयी माहीती या निबंधात बघणार आहोत चला  तर मग सुरूवात करूया निबंधाला.


मुद्दे :

  • उत्तम छंद 
  • भरपूर वाचन असलेला माणूस संकुचित विचार विसरतो
  • वाचनामुळे अन्य देशांची, अन्य लोकांची, इतर धर्मांची माहिती मिळते
  • आपल्यातील उणिवा कळतात
  • आनंद मिळतो 
  • इतिहासातील माहिती मिळते 
  • कुठेही वाचन करता येते 
  • वृद्ध, लहान मुले यांना तर खूपच मदत.


असा धरी छंद, जाई तुटोनिया भावबंध।


मोठमोठे लोक सांगतात की, असा छंद धरा की, ज्यामुळे संकुचित विचार झटकून टाकाल.वाचन या छंदामुळे बहुश्रुतपणा येतो. वाचनामुळे आपल्याला आपल्या देशाची व जगाची माहिती मिळते. अन्य देशांतील लोक कसे राहतात, त्यांचा पोशाख कोणता आहे, हे आपल्याला समजते. इतर धर्मांतील लोकांची माहिती मिळते. या सर्व माहितीमुळे आपल्याला आपल्या उणिवा कळतात. आपल्याला आपल्या जीवनात सुधारणा करता येते.




आपल्याला कथा-कादंबऱ्या वाचल्यावर आनंद मिळतो. अनेक लोकांचे अनुभव समजतात. काही पुस्तकांमध्ये पूर्वीच्या काळाची माहिती असते. त्यामुळे पूर्वीच्या काळी पृथ्वीवर काय काय घडले, याची माहिती मिळते. आतापर्यंत माणसाने किती प्रगती केली हे कळते.


आपण वाचन केव्हाही, कुठेही करू शकतो. रेल्वेच्या डब्यात खूप गर्दी असते, तेथे खूप गोंगाट असतो, तरी काही माणसे शांतपणे वाचत असतात. वृद्ध माणसांना वेळ कसा घालवावा, ही चिंता असते. त्यांना वाचनाची मदत होऊ शकते. लहान मुलांना गोष्टींच्या पुस्तकांतून खूप आनंद मिळतो. खरोखर, सर्वांना उपयोगी पडणारा वाचन हा छंद सर्वोत्कृष्ट छंद आहे.


मित्रांनो तुम्‍हाला वाचन एक उत्तम छंद हा निबंध कसा वाटला व तुमचा आवडता छंद कोणता आहे हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



Vachan-Ek-Uttam-Chand-Essay-Marathi
Vachan-Ek-Uttam-Chand-Essay-Marathi

निबंध 2

Vachan Ek Uttam Chand Essay In Marathi | वाचन एक उत्तम छंद


 नुकतेच माझ्या वाचनात आले...डॉ. भीमराव आंबेडकर यांनी आपल्या एका भाषणात मागासलेल्या बांधवांना कळवळून सांगितले होते - “वाचाल तर वाचाल !" ऐकायला आणि वाचायलाही जरा विचित्र वाक्य वाटते हे, पण ते अर्थपूर्ण आहे हे विचारांती पटते.



'वाचाल' म्हणजे वाचन कराल, 'तर वाचाल' म्हणजेच टिकाल ! 'वाचाल तर वाचाल' याचा अर्थ वाचन कराल तर टिकून राहाल ! चांगले जीवन जगाल इंग्रजीत म्हण आहे - Survival of the Fittest. जे देशकाल परिस्थितीला अनुसरून अगदी योग्य असेल ते टिकते.



इतर प्राणिमात्र आणि माणूस यात मुख्य फरक हाच आहे की माणूस विचार करू शकतो. तो बोलतो, वाचतो, लिहितो. विचार करण्याची ही शक्ती वाचनातून अधिक विकसित होते. डॉ. आंबेडकरांनी हा विचार ज्या समाजासमोर मांडला त्यापैकी ९९% लोक निरक्षर होते. त्यांना लिहिता, वाचता येत नव्हते.



पुस्तके किंवा वर्तमानपत्रे सोडा साधे पत्रदेखील त्यांना दुसऱ्याकडून वाचून घ्यायला लागे आणि उत्तरसुद्धा दुसरा लिहिणार तेव्हा लिहिले जायचे ! वाचता येईना ! हिशेब समजेना ! काय विचारांवी त्यांची दैना ? सरकार व सावकार दोघेही त्यांना फसवत, लुबाडत असत. म्हणूनच त्यानी वाचायला शिकले पाहिजे (लिहायला व हिशेब करायला शिकले पाहिजे) असे डॉ. आंबेडकर म्हणत.



गेल्या चाळीस पन्नास वर्षात ह्या समाजात खूपच सुधारणा झाली आहे. बरेच लोक केवळ साक्षर नव्हे तर सुशिक्षित झाले आहेत. आपल्या व्यथा वेदना ते बोलून दाखविताहेत. दया पवार यांचे 'बलुतं', लक्ष्मण माने यांचे 'उपरा', शरणकुमार लिंबाळे यांचे 'अक्करमाशी' अशा कित्येक आत्मकथा प्रसिद्ध झाल्या आहेत. मागासलेल्या समाजातून अशी आशेची प्रकाशकिरणे फाकत आहेत.



पण केवळ एका विशिष्ट समाजापुरताच हा संदेश आहे का ? तसेच वाचाल म्हणजे केवळ वाचायला शिकाल, साक्षर व्हाल तर वाचाल एवढेच का डॉक्टरांना सांगायचे असावे ? 'वाचाल' याचा अर्थ इतका मर्यादित असेल का ? तसे नक्कीच नाही. वाचाल म्हणजे काय वाचाल ? दुसरी चौथीची पुस्तके ? वर्तमानपत्रे ? दरमहा प्रसिद्ध होणारी मासिके ? रस्त्यावर दिसणाऱ्या लहान मोठ्या जाहिराती ?



निरक्षराने साक्षर होणे आणि साक्षराने सुशिक्षित बनणे, हे जसे क्रमप्राप्त ठरते, तसे वाचता येऊ लागल्यावर वर वाचनात सहजता, सफाई येणे आवश्यक आहे. मोठ्या आवाजात आवश्यक तेथे योग्य तो चढउतार करून वाचता येणे, आवाज न करता मनात वाचता येणे हे जमले पाहिजे.



त्याचप्रमाणे पुढे पुढे वाचनात निवड हवी. रोज कोणते तरी एक पुस्तक वाचून ज्ञान वाढत नाही व मन समृद्ध होत नाही. मनोरंजनासाठी कथाकादंबऱ्यासारखे हलके फुलके साहित्य वाचणे आवश्यक तसे विचार प्रवर्तक निबंध, माहितीपूर्ण लेखन, उत्तमोत्तम प्रवास वर्णन, थोरा मोठ्यांची चरित्रे किंवा आत्मचरित्रे यांचेही वेचक वाचन हवे.


नुसते भराभर व भाराभर वाचन करणारा माणूस म्हणजे टनावारी ओझी वाहणारा हमालच ! त्याच्या डोक्यावरून तो जे नेतो त्यातले त्याच्या डोक्यात काय उतरते? म्हणूनच वाचनाला शिस्त हवी, वळण हवे, वाचलेले नीट पचले पाहिजे, आकलन झाले पाहिजे. त्यातूनच बौद्धिक समंजसपणा येतो. It is not what you eat but what you digest, that makes you strong; it is not what you read but what you understand, that makes you learned.



त्याचप्रमाणे वाचन चौफेर हवे. आपल्या आवडत्या एकाच विषयाचे वाचन नको. विविध विषय विविध प्रकार वाचनात असावेत. जाता जाता अखेरची एक शंका मांडावीशी वाटते. सध्याचे जग इलेक्ट्रॉनिक्सचे व संगणकाचे आहे. टी. व्ही., व्हिडिओ, टेपरेकॉर्डर, कॅसेटस् यांच्या जमान्यात वाचनाचे महत्त्व पुढे राहील का ? काळच याचे खरे उत्तर देईल ! पण चित्रपट आले म्हणून नाटके संपली नाहीत.



टी. व्ही, व्हिडिओ आले म्हणून चित्रपटगृहे ओस पडली नाहीत. तसेच वाचनाचे ! वाचन कशासाठी ? ज्ञानासाठी ! ते एवढ्या पुरतेच नसते तर एका वेगळ्या प्रकारच्या आत्मिक समाधानासाठी असते. वाचनाचे वेड लागलेला माणूस पहा. वाचन त्याचे काम नसते. वाचन हा त्याचा स्वभाव बनतो. अनेक उत्तमोत्तम ग्रंथांशी त्याची जवळची दोस्ती बनते. त्याच्या सुखदुःखाच्या क्षणी हे ग्रंथच त्याला सोबत करतात. दिलासा देतात. प्रोत्साहन देतात. प्रेरणा मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद



Vachan Ek Uttam Chand Essay In Marathi | वाचन एक उत्तम छंद

pradushan ek samasya in marathi essay | प्रदूषण एक समस्या मराठी निबंध

निबंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण प्रदूषण एक समस्या मराठी निबंध बघणार आहोत.  या लेखामध्ये ऐकून 4 निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. आज जगातील सर्वात गंभीर समस्‍या असेल तर ती वाढते प्रदूषण आहे . आज भारत असो की इतर कोणताही देश त्‍या देशातील हवा, पाणी, माती,ध्‍वनी यांचे प्रदूषण दिवसेदिवस वाढतच आहे. या 3 निबंधात प्रदूषणाची कारणे व उपाय यावर सविस्‍तर माहीती दिलेली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला
 

२१ व्या शतकाकडे वाटचाल करत असलेल्या मानवाच्या प्रगतीचा वारू आज बेलगाम चौखूर उधळला आहे, ज्याची वेसण आज अडकली आहे- भ्रष्टाचाराच्या भस्मासुरामध्ये, लोकसंख्येच्या लकव्यामध्ये आणि प्रदूषणरूपी प्रलयामध्ये! जेव्हा भौतिक, रासायनिक आणि जीवशास्त्रीय बदल वातावरणात घडून येतात, जे मनुष्याच्या अस्तित्वालाच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने ग्रहण लावतात, त्यालाच ‘प्रदूषण' असे म्हणतात. 

आज प्रदूषण कोठे नाही? हवा, पाणी, अन्न, जमीन, तापमान, आवाज या साऱ्यांनाच या प्रदूषणाने ग्रहण लावलंय! औद्योगिक क्रांतीपूर्वीच प्रदूषणाचा जन्म झाला. परंतु निसर्गाच्या कुंपणाने माणसाच्या जीवनाला धडका मारणारा हा उन्मत्त बैल थोपवून धरला होता. वातावरणात मिसळणारे वाहनांचे धूर व Lead Poisoning सारखं माणसानंच निर्माण केलेलं प्रदुषणाचं रूप, आज जग गिळंकृत करू पाहणाऱ्या वामनात कधी रूपांतरित झालं हे भौतिक सुखाच्या मृगजळामागे धावणाऱ्या मनुष्यप्राण्याला कधी कळलंच नाही. 

pradushan-ek-samasya-in-marathi-essay
pradushan-ek-samasya-in-marathi-essay


परंतु चेर्नेबिल अणुभट्टीच्या स्फोटासारखं प्रदूषण निसर्ग कसा थांबवणार? अशा स्फोटांमुळे तापमानात बदल होऊन त्यामुळे ऋतुचक्राची चाकेच खिळखिळी होऊ लागली आहेत. भोपाळच्या वायु दुर्घटनेची भीषणता आज कुणी विसरू शकेल? डॉ. दत्ता सामंतांच्या शरीरालाच संप पुकारावा लागला, तो मुंबईमध्ये झालेल्या क्लोरीन गळतीमुळे ! -Touch of Midas' गोष्टीतल्या मिडास राजासारखीच आज मानवाची अवस्था होऊ लागली आहे!


Soclean Society च्या अहवालानुसारं ३ हजार टन इतका गोबरगॅस एकट्या मुंबईमध्ये दर दिवशी गोळा होतो. सतराशे टन इतकी प्रदूषिते रोज हवेत सोडली जातात अन् २० लाख लिटरपेक्षा जास्त सांडपाणी जमा होते. प्रदूषण दूर करण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रणा २४ तास वापरणेही आज माणसाला शक्य नाही.
लाऊडस्पीकरवर वाजवली जाणारी कर्णकर्कश्श गाणी, सिनेमागीते, डिस्को, वाढलेली रहदारी, वाहनांचे कर्णकटू आवाज या साऱ्यांनी ध्वनिप्रदूषण निर्माण केले आहे. २० ते ७० डेसिबल इतका आवाज ऐकू शकण्याची व सहन करण्याची क्षमता असणाऱ्या माणसाच्या कानांनी धोक्याची घंटा वाजवण्यास सुरुवात केली आहे. 



१०० च्या पेक्षा जास्त डेसिबलचा आवाज ऐकून विघ्नहर्त्याने गणेशोत्सवात कुणाकडे दाद मागावी? याहीपेक्षा भयानक आहे ते म्हणजे 'मानसिक प्रदूषण' वाढती गुन्हेगारी, बालिका-हत्या, भ्रष्टाचार, वशिलेबाजी, युवा पिढीची उदासीनता, जुन्या पिढीची निष्क्रियता, व्यसनाधीनता, अति सुखासीनता यामुळे मानवी मनच कलुषित झालं आहे, प्रदूषित झालं आहे. ही समस्या हा प्रत्येक राष्ट्राचा ज्वलंत प्रश्न आहे. ही एक राष्ट्रीय समस्या आहे. मग यावर उपाय तो कोणता? 'स्वच्छ पर्यावरण', चांगल्या विचारांचं मन हे कुठल्याही उदबत्तीच्या सुवासापेक्षाही सुवासिक आहे.  



१९७४ मधील Water Act व १९८१ मधील 'Clean air act' ची अंमलबजावणी होणं आवश्यक आहे. कलम २७७, २७८, ८४ च्या नुसार गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून जसा साजरा केला जातो तसा प्रत्येक दिवस पर्यावरण दिन म्हणून मानला पाहिजे, पाळला पाहिजे. जमीन प्रदूषित करणारी रासायनिक खते व औषधी फवारे यांच्या अमर्याद वापरावर बंधन आणले पाहिजे. 'झाडे लावा, झाडे जगवा' ही मोहीम राबविणारे अण्णा हजारे घराघरातून निर्माण झाले पाहिजेत.



वाया गेलेल्यांतून नवीन गोष्टींचा जन्म झाला मळीपासून स्पिरीट,  शेणापासून गोबरगॅस, पेट्रोलियमपासून घरगुती गॅस निर्माण झाला तर ताजमहाल पुन्हा धवल बनेल, गंगा ' मैली' राहणार नाही! मनाची नि तनाची शुचिता व शुद्धता नष्ट करू पाहणाऱ्या या प्रदूषणरूपी प्रलयांतून मनुष्याच्या आशा-आकाक्षाचा मनू तरून जाणे सहज शक्य आहे फक्त गरज आहे ती कल्पकतेची, नियोजनाच्या होडीची!
मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 2

प्रदूषणाची समस्या मराठी निबंध

 मानवासहित सर्व सजीव प्राणी वनस्पतींना जगण्यासाठी संतुलित वातावरणाची आवश्यकता असते. संतुलित वातावरणात सर्व घटक एका निश्चित प्रमाणात असतात. परंतु जेव्हा वातावरणात या घटकांची उणीव निर्माण होते किंवा त्यात हानिकारक घटक मिसळतात तेव्हा वातावरण प्रदूषित होते व मानवासाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नुकसानकारक ठरते. 



आज संपूर्ण जग प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रदूषणाने घर केले आहे आणि आपण पूर्णपणे त्याच्या मुठीत गेलो आहोत. प्राचीन काळात ही समस्या इतकी बिकट नव्हती. त्यावेळी प्रदूषणाचे नामोनिशाण नव्हते. निसर्गात एक प्रकारचे संतुलन होते. हवा, पाणी शुद्ध होते. पृथ्वीची उत्पादन शक्ती जास्त होती. हळूहळू लोकसंख्या वाढली. मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नित्य नवे कारखाने उघडू लागले. 



औद्योगिकीरणाच्या स्पर्धेत प्रत्येक राष्ट्र धावू लागले. ऐषआरामाच्या उपभोग्य वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी भूगर्भातील बहुमूल्य संपत्ती खेचून बाहेर काढली जाऊ लागली. नैसर्गिक संपत्ती नष्ट होताच भूगर्भातील कोळसा, खनिजतेल, धातू यांचे वायुरूपात परिवर्तन होऊन संपूर्ण वातावरणाला व्यापून टाकेल आणि मग मानवाला जगणे मुश्किल होईल.



लोकसंख्येच्या वाढीमुळे निवासस्थानांचे संकट उत्पन्न झाले आहे. परिणामी लहान लहान भूखंडांवर लहान लहान घरे उभारली जात आहेत. दहा दहा मजली उंच इमारती तयार होत आहेत. या घरांमधे सूर्यप्रकाश व शुद्ध हवेचा अभाव असतो. जंगल कटाई करून राहण्यासाठी जागा उपलब्ध केली जात आहे. मानव स्वत:च या प्रदूषणाला कारणीभूत आहे. 



समुद्राला अमर्याद शक्तीचा स्वामी समजून सर्व कचरा समुद्रात टाकला जात आहे. नद्यापण आपले प्रदूषित पाणी समुद्रात मिसळतात. शास्त्रज्ञांनी सावधगिरीचा इशारा देऊनही औद्योगिक घटकांद्वारे केरकचरा समुद्रात टाकणे बंद न झाले तर लवकरच त्यातील मासे मरतील. सध्या हजारो जहाजे व पेट्रोलियम टॅकर्सची समुद्रातून वाहतूक होते. 


एकीकडे हे मानवाला प्रगतीकडे घेऊन जातात. तर दुसरीकडे लाखो टन पेट्रोलियमच्या गळतीमुळे किंवा अपघातामुळे समुद्राच्या पाण्यावर ते पसरते. समुद्राच्या पर्यावरणासाठी हा मोठा धोका आहे. या तेलात अनेक किमती धातू उदा. शिसे, निकेल, मँगेनीज इत्यादी असते. जे जीवजंतू किंवा वनस्पतीद्वारे मानवाच्या शरीरात प्रवेश करून त्याचे नुकसान करते. नद्यांच्या पाण्याचे प्रदूषण झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे बिकट संकट विक्राळ रूप धारण करीत आहे.



ध्वनिप्रदूषणामुळे मानवाची श्रवणशक्ती क्षीण होते. त्यामुळे चिडचिडेपणा, थकवा, निद्रानाश, श्वासाचे रोग उत्पन्न होतात. शहरांची लोकसंख्या दिवसेदिवस वाढतच जात आहे. ग्रामीण जनतेचे शहरांकडे होणारे पलायन. शहरी जीवन कष्टमय बनवीत आहे. जो जो लोकसंख्येची घनता वाढते तो तो वाहुकीच्या साधनांत वाढ होते. इंधनावर चालणाऱ्या या वाहनांमधून निघणाऱ्या विषारी वायूमुळे वायुप्रदूषण होते. ज्यामुळे श्वासाचे अनेक रोग उद्भवतात उदा. फुप्फुसाचा कॅन्सर, दमा, खोकला, सर्दी इत्यादी वायुप्रदूषण मंदगतीने विषाचेच कार्य करते. 


परंतु भोपाळ वायू दुर्घटनेत निघालेला "मिथाईल आइसोसायनाईड" मुळे हजारो लोक तात्काळ मृत्यू पावले. जे लोक मेले ते मुक्त झाले पण जे वाचले ते कणाकणाने मरण्यासाठी आणि विकसनशील राष्ट्रांतील विज्ञानाचा शाप सहन करण्यास विवश झाले. औद्योगिकीकरणाच्या वाढत्या प्रवृत्तिमुळे कारखान्यांतून निघणारे विषारी वायू हवा विषमय करतात. कारखान्याजवळ लावलेल्या झाडांवर काजळीची पुटे चढ़तात. मग तेथेच वास्तव्य करणाऱ्या लोकांबद्दल काय? अल्ट्राव्हायोलेट (अतिनील) किरणांपासून पृथ्वीला वाचविणाऱ्या ओझोनलाही छिद्र पडले आहे.



निसर्गाशी मानवाचा अयोग्य व्यवहार या समस्येला आणखीनच गंभीर करतो. जंगल कटाई करणे, उद्याने उजाडणे आणि वातावरण शुद्ध ठेवणाऱ्या झाडांना नष्ट करणे हा मानवाचा स्वभावच बनला आहे. जर आता वृक्षारोपण मोहीम वेगाने चालविली नाही तर प्रदूषण हा एक असाध्य रोग बनेल. आज शेतीव्यवसायाचे यांत्रिकीकरण झाले आहे. त्यामुळेही पर्यावरणाचे प्रदूषण होते. 


अधिक उत्पादनासाठी शेतात लाखो टन रासायनिक खते टाकली जातात कीटकनाशके फवारली जातात. वाढत्या शेतीउत्पादनासाठी मानवाला खूप मोठी किंमत चुकवावी लागते. हीच रसायने हळूहळू अन्नाद्वारे आपल्या पोटात जातात व अनेक रोगांचे कारण बनतात. । आजकाल ग्राहकांना आकर्जून घेण्यासाठी फळे, धान्ये इत्यादींना  कृत्रिम रंग दिले जातात. हे रंग आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात.



संपूर्ण पृथ्वी प्रदूषित करून मानवाला चैन पडले नाही म्हणून त्याने खाद्य पदार्थही दूषित करण्यास सुखात केली. तापमानाचे प्रदूषण होणे पण मानवासाठी घातक आहे. वातावरणाचे तापमान वाढले की हिमखंड वितळू लागतात. जर बर्फाचे पर्वत वितळू लागले तर संपूर्ण पृथ्वी जलमय होईल. 




ही समस्या सोडविण्यासाठी अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञ विचार करीत आहेत. अनेक प्रत्यत्नानंतर थोडेसे यश मिळाले आहे. दाट लोकसंख्येपासून कारखाने दूर नेले जावेत. विषारी वायू जाण्यासाठी उंच चिमण्या बसविण्यात याव्यात. विषारी वायू बाहेर निघण्यापूर्वीच नष्ट करण्यात यावेत. 




केरकचऱ्याचा उपयोग जमिनीच्या भरावासाठी करण्यात यावा, पिकांवर जास्त प्रमाणात कीटकनाशके फवारू नयेत, नैसर्गिक रूपात धान्य ग्राहकाला मिळावे, गावांतून शहरांकडे जाणाऱ्या बुद्धिजीवींचे पलायन थांबविण्यासाठी गावातच रोजगार उत्पन्न करुन द्यावा. वृक्षतोड बंद करून वृक्षारोपण मोहीम राबवावी. कारखान्यांतील सांडपाण्याचे शुद्धीकरण करावे. वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करावे. बायोडिग्रेडेबल गॅसचा वापर करावा.



जगात सर्वात जास्त चर्चा प्रदूषणाची होते. शास्त्रज्ञ प्रदूषण थांबविण्यासाठी नवनवे तंत्रज्ञान विकसित करीत आहेत. प्रत्येकाने या कामात मदत केली पाहिजे. जर असे केले नाही तर स्वर्गापेक्षाही प्रिय असणाऱ्या पृथ्वीची स्थिती कशी होईल ते आपण जाणतोच.

हा  निबंध तुमच्या मित्रमंडळी सोबत व  व्हाट्सअँप ग्रुपवर  शेयर करून लोकसंख्या जनजागृती निर्माण करण्यासाठी हातभार लावावा  हि नम्र  विनंती.  पुढील  निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 3


प्रदूषण एक समस्या:  भौतिक सुखाच्या मागे पळताना प्रदूषण आपला पाठलाग करीत आहे . याकडे आपले लक्ष नसते. आजच्या विज्ञानयुगात प्रगतीचे बोट धरून प्रदूषणाने थैमान घातले आहे. कधी काळी कारखाने , वीज केंद्रे यांपासून माणूस खूप दूर होता . मुक्त निसर्गात मोकळेपणे तो श्वास घेत होता. आता मात्र त्याचा श्वास घुसमटतो आहे. हवेतले ऑक्सीजन कमी झाले आहे कारण प्रदूषित हवा आपल्याला मिळत आहे. 


कारखान्याचे धूर, रसायनांचा गंध , दूषित पाण्याची विल्हेवाट , प्लास्टिक, खते यांचा अतिरेक , जंगलतोड, वाहनांची वाढती संख्या या सर्वांनी मिळून वायूप्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनिप्रदूषण याबरोबरच मानसिक प्रदूषणाची देणगी आपणास दिली आहे. आपले आरोग्य धोक्यात आणले आहे.



५ जून जागतिक पर्यावरणदिन' आणि '२२ एप्रिल-वसुंधरा दिन' म्हणून आपण साजरे करतो. पण खऱ्या अर्थाने प्रत्येकाने प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न करायला हवा. हवा, अन्न, पाणी दूषित मिळाले तर आरोग्य चांगले कसे राहील? ज्या गोष्टी आपल्या हातात आहे त्या तर आपण करू शकतो ना? वृक्ष लावा-वृक्ष जगवा' हे तत्व आपण स्वीकारावे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा. कचरा इतरत्र न फेकता कचराकुंडीतच टाकावा. धूर होईल असे इंधन लाकडे वगैरे वापरू नये. 



घर व घराचा परिसरच नव्हे तर आपले गाव , आपला देश स्वच्छ सुंदर कसा राहील, यासाठी आपले प्रयत्न हवेत . So Clean Society चा अहवाल सांगतो. की फक्त एकट्या मुंबईत १७०० टन प्रदूषिते हवेत सोडली जातात. वीस लाख लिटरपेक्षा जास्त सांडपाणी जमा होते. तीन हजार टन गोबरगॅस गोळा होतो. चर्नेबील अणुभट्टीतला स्फोट, भोपाळची वायू दुर्घटना, कर्नाटकमधील दोनशे हत्तींची हत्या व चंदनतस्करी अशा घटना म्हणजे. स्वच्छ पर्यावरणावर गदा होय.


पृथ्वीदिन साजरा होतो. त्याच दिवशी कोलकत्ता येथे प्रचंड प्रमाणावर वृक्षतोड झाली. मध्य प्रदेशातील अभयारण्यात आगी लावण्यात आल्या निसर्ग व मानव यांच्यातले हे युध्द प्रदूषणाने झाकळून आपला विनाश करीत आहे. मास्कोच्या हवेत दरवर्षी दहा लाख टन प्रदूषिते सोडली जातात. 



दामोदर नदीत चुकीने लाखो टन तेल ओतले गेले हे सर्व काही का होते? बॉम्बस्फोट होतात. तापमानात बदल होतो. ऋतूचक्र उलटे फिरू लागते. एकूण भूपृष्ठाच्या ४०% जंगले हवीत पण भारतात हे प्रमाण ७ ते ८ % आहे. वाढती लोकसंख्या, वाढती वाहने, वाढती कारखानदारी, अपघात , कुजणारी शरीरे , खेड्यातील गटारे, शहरातील वाढती गर्दी या साऱ्या गोष्टींमुळे प्रदूषण वाढत चालले आहे.



'हरितश्यामल व निर्मल वसुधा' हवी असेल तर प्रदूषणाचे गंभीर धोके लक्षात घेऊन उपाययोजना झालीच पाहिजे. १९७४ मधील Water Act व १९८१ मधील Clean Air Act ची अंमलबजावणी झालीच पाहिजे . हवेत कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे. ओझोन वायू कमी होत आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी ओझोन आवश्यक आहे. प्रदूषण कमी झालेच पाहिजे. उत्सवात होणारे ध्वनिप्रदूषण आपण टाळले पाहिजे. 


जमीन प्रदूषित करणारी रासायनिक खते, औषधे यांचा अतिरेक नको. प्रत्येकाने एक तरी वृक्ष लावून जोपासले पाहिजे . तसेच माणुसकी जागी ठेवून मानसिक प्रदूषण होऊ न देण्यासाठी जागरूक राहिले पाहिजे तरच या पृथ्वीवर आपण सुखाने नांदू शकू.



नियोजनाला कृतीची जोड हवी प्रत्यक्ष कृतीने समस्या सुटते केवळ मनोरथांनी नाही. ही समस्या वैयक्तीक नाही. ती सर्वांची आहे. सर्वांनी मिळून ती सोडवायला हवी. वाढत्या प्रदूषणाने निसर्गाचा समतोल अधिक ढासळला तर भारतासारख्या कृषिप्रधान देशाचे भवितव्य काय? प्रगती व विकास स्वच्छ पर्यावरणानेच शक्य आहे. अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी ते आवश्यक आहे.



परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा परिस्थिती बदलणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी खूप प्रयत्न हवेत . प्रदूषणाची गगनचुंबी भिंत पाडून निसर्ग व विज्ञान यांच्या मिलनाने पृथ्वीवर स्वर्ग आणू या .....
प्रदूषण हटवू या.... प्रदूषण पळवू या....

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

निबंध 4

प्रदूषणाची समस्या मराठी निबंध


मानवासहित सर्व सजीव प्राणी वनस्पतींना जगण्यासाठी संतुलित वातावरणाची आवश्यकता असते. संतुलित वातावरणात सर्व घटक एका निश्चित प्रमाणात असतात. परंतु जेव्हा वातावरणात या घटकांची उणीव निर्माण होते किंवा त्यात हानिकारक घटक मिसळतात 


तेव्हा वातावरण प्रदूषित होते व मानवासाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नुकसानकारक ठरते. आज संपूर्ण जग प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रदूषणाने घर केले आहे आणि आपण पूर्णपणे त्याच्या मुठीत गेलो आहोत. 



प्राचीन काळात ही समस्या इतकी बिकट नव्हती. त्यावेळी प्रदूषणाचे नामोनिशाण नव्हते. निसर्गात एक प्रकारचे संतुलन होते. हवा, पाणी शुद्ध होते. पृथ्वीची उत्पादन शक्ती जास्त होती. हळूहळू लोकसंख्या वाढली. मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नित्य नवे कारखाने उघडू लागले. 


औद्योगिकीरणाच्या स्पर्धेत प्रत्येक राष्ट्र धावू लागले. ऐषआरामाच्या उपभोग्य वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी भूगर्भातील बहुमूल्य संपत्ती खेचून बाहेर काढली जाऊ लागली. नैसर्गिक संपत्ती नष्ट होताच भूगर्भातील कोळसा, खनिजतेल, धातू यांचे वायुरूपात परिवर्तन होऊन संपूर्ण वातावरणाला व्यापून टाकेल आणि मग मानवाला जगणे मुश्किल होईल.


लोकसंख्येच्या वाढीमुळे निवासस्थानांचे
संकट उत्पन्न झाले आहे. परिणामी लहान लहान भूखंडांवर लहान लहान घरे उभारली जात आहेत. दहा दहा मजली उंच इमारती तयार होत आहेत. या घरांमधे सूर्यप्रकाश व शुद्ध हवेचा अभाव असतो. 


जंगल कटाई करून राहण्यासाठी जागा उपलब्ध केली जात आहे. मानव स्वत:च या प्रदूषणाला कारणीभूत आहे. समुद्राला अमर्याद शक्तीचा स्वामी समजून सर्व कचरा समुद्रात टाकला जात आहे. नद्यापण आपले प्रदूषित पाणी समुद्रात मिसळतात. 



शास्त्रज्ञांनी सावधगिरीचा इशारा देऊनही औद्योगिक घटकांद्वारे केरकचरा समुद्रात टाकणे बंद न झाले तर लवकरच त्यातील मासे मरतील. सध्या हजारो जहाजे व पेट्रोलियम टॅकर्सची समुद्रातून वाहतूक होते. एकीकडे हे मानवाला प्रगतीकडे घेऊन जातात. 


तर दुसरीकडे लाखो टन पेट्रोलियमच्या गळतीमुळे किंवा अपघातामुळे समुद्राच्या पाण्यावर ते पसरते. समुद्राच्या पर्यावरणासाठी हा मोठा धोका आहे. या तेलात अनेक किमती धातू उदा. शिसे, निकेल, मँगेनीज इत्यादी असते. जे जीवजंतू किंवा वनस्पतीद्वारे मानवाच्या शरीरात प्रवेश करून त्याचे नुकसान करते. 



नद्यांच्या पाण्याचे प्रदूषण झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे बिकट संकट विक्राळ रूप धारण करीत आहे. ध्वनिप्रदूषणामुळे मानवाची श्रवणशक्ती क्षीण होते. त्यामुळे चिडचिडेपणा, थकवा, निद्रानाश, श्वासाचे रोग उत्पन्न होतात. शहरांची लोकसंख्या दिवसेदिवस वाढतच जात आहे. 


ग्रामीण जनतेचे शहरांकडे होणारे पलायन. शहरी जीवन कष्टमय बनवीत आहे. जो जो लोकसंख्येची घनता वाढते तो तो वाहुकीच्या साधनांत वाढ होते. इंधनावर चालणाऱ्या या वाहनांमधून निघणाऱ्या विषारी वायूमुळे वायुप्रदूषण होते. ज्यामुळे श्वासाचे अनेक रोग उद्भवतात उदा. फुप्फुसाचा कॅन्सर, दमा, खोकला, सर्दी इत्यादी वायुप्रदूषण मंदगतीने विषाचेच कार्य करते. 


परंतु भोपाळ वायू दुर्घटनेत निघालेला "मिथाईल आइसो सायनाईड" मुळे हजारो लोक तात्काळ मृत्यू पावले. जे लोक मेले ते मुक्त झाले पण जे वाचले ते कणाकणाने मरण्यासाठी आणि विकसनशील राष्ट्रांतील विज्ञानाचा शाप सहन करण्यास विवश झाले.


औद्योगिकीकरणाच्या वाढत्या प्रवृत्तिमुळे कारखान्यांतून निघणारे विषारी वायू हवा विषमय करतात. कारखान्याजवळ लावलेल्या झाडांवर काजळीची पुटे चढ़तात. मग तेथेच वास्तव्य करणाऱ्या लोकांबद्दल काय? अल्ट्राव्हायोलेट (अतिनील) किरणांपासून पृथ्वीला वाचविणाऱ्या ओझोनलाही छिद्र पडले आहे.


निसर्गाशी मानवाचा अयोग्य व्यवहार या समस्येला आणखीनच गंभीर करतो. जंगल कटाई करणे, उद्याने उजाडणे आणि वातावरण शुद्ध ठेवणाऱ्या झाडांना नष्ट करणे हा मानवाचा स्वभावच बनला आहे. जर आता वृक्षारोपण मोहीम वेगाने चालविली नाही तर प्रदूषण हा एक असाध्य रोग बनेल. आज शेतीव्यवसायाचे यांत्रिकीकरण झाले आहे.



त्यामुळेही पर्यावरणाचे प्रदूषण होते. अधिक उत्पादनासाठी शेतात लाखो टन रासायनिक खते टाकली जातात व कीटकनाशके फवारली जातात. वाढत्या शेतीउत्पादनासाठी मानवाला खूप मोठी किंमत चुकवावी लागते. हीच रसायने हळूहळू अन्नाद्वारे आपल्या पोटात जातात व अनेक रोगांचे कारण बनतात. 


आजकाल ग्राहकांना आकषून घेण्यासाठी फळे, धान्ये इत्यादींना ला कृत्रिम रंग दिले जातात. हे रंग आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. संपूर्ण पृथ्वी प्रदूषित करून मानवाला चैन पडले नाही म्हणून त्याने खाद्य पदार्थही दूषित करण्यास सुखात केली. तापमानाचे प्रदूषण होणे पण मानवासाठी घातक आहे. 



वातावरणाचे तापमान वाढले की हिमखंड वितळू लागतात. जर बर्फाचे पर्वत वितळू लागले तर संपूर्ण पृथ्वी जलमय होईल, ही समस्या सोडविण्यासाठी अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञ विचार करीत आहेत. अनेक प्रत्यत्नानंतर थोडेसे यश मिळाले आहे. दाट लोकसंख्येपासून कारखाने दूर नेले जावेत. 


विषारी वायू जाण्यासाठी उंच चिमण्या बसविण्यात याव्यात. विषारी वायू बाहेर निघण्यापूर्वीच नष्ट करण्यात यावेत. केरकचऱ्याचा उपयोग जमिनीच्या भरावासाठी करण्यात यावा, पिकांवर जास्त प्रमाणात कीटकनाशके फवारू नयेत, नैसर्गिक रूपात धान्य ग्राहकाला मिळावे, गावांतून शहरांकडे जाणाऱ्या बुद्धिजीवींचे पलायन थांबविण्यासाठी गावातच रोजगार उत्पन्न करुन द्यावा. 



वृक्षतोड बंद करून वृक्षारोपण मोहीम राबवावी. कारखान्यांतील सांडपाण्याचे शुद्धीकरण करावे. वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करावे. बायोडिग्रेडेबल गॅसचा वापर करावा. जगात सर्वात जास्त चर्चा प्रदूषणाची होते. शास्त्रज्ञ प्रदूषण थांबविण्यासाठी नवनवे तंत्रज्ञान विकसित करीत आहेत. 


प्रत्येकाने या कामात मदत केली पाहिजे. जर असे केले नाही तर स्वर्गापेक्षाही प्रिय असणाऱ्या पृथ्वीची स्थिती कशी होईल ते आपण जाणतोच. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . 


pradushan ek samasya in marathi essay | प्रदूषण एक समस्या मराठी निबंध

my sister essay in marathi | माझी ताई मराठी निबंध

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझी ताई  मराठी निबंध बघणार आहोत. आई वडीलांनतर सांभाळ करणारे, मार्गदर्शन करणारे असतात ते भांवडे. या निबंधात आदर्श अश्‍या मोठ्या बहीणीचे वर्णन केले आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.  

तशा आम्ही आईबाबांच्या दोघी लाडक्या लेकी-मोठी ताई आणि धाकटी मी. ताई सुकृता आणि मी संपदा. ताई माझ्याहून चांगली पाच-सहा वर्षांनी मोठी आहे. घरात मी लाडोबा, पण मनात मला ताईबद्दल प्रेमयुक्त आदर वाटत असतो. कारण माझी ताई आहेच तशी नावाप्रमाणे 'सुकृता' ! |

my-sister-essay-in-marathi
my-sister-essay-in-marathi


ताई आणि मी सख्ख्या बहिणी, पण आमच्या दोघींच्या बोलण्याचालण्यात मात्र खूपच फरक आहे. ताई तशी थोडी अबोल आहे. त्याचे कारण तिला विचारले तर ती म्हणते, "मला आपणच बोलत राहण्यापेक्षा, दुसऱ्याचे बोलणे ऐकायलाच अधिक आवडते." याउलट मी खूपच बडबडी आहे. एका जागी बसून एखादे काम करण्याची चिकाटी अजूनही माझ्या अंगी नाही. ताईजवळ ही चिकाटी वाखाणण्यासारखी आहे.

ताईने शाळेतील दोन्ही शिष्यवृत्ती परीक्षांत उत्तम यश मिळवले आहे. किंबहुना 'अशक्य', 'असाध्य' हे शब्दच ताईच्या शब्दकोशात (Dictionary) नाहीत. महाविदयालयातील अभ्यासशाखेची निवड करतानाही 'ताई'ने आपल्या स्वतंत्र विचारांची चमक दाखवली. अभ्यास करत असताना छंद म्हणून तिने अनेक अन्य विदेशी भाषांचा अभ्यास चालू ठेवला आहे.

ताई ही काही केवळ पुस्तकातील किडा नाही. तिला अनेक कला अवगत आहेत. सहज गमतीने म्हणून तिने चित्र काढले, तरी ते अत्यंत रेखीव व चित्तवेधक असते. पण हीच ताई मला म्हणते, “संपदा, तुझी चित्रे खुप छान असतात हं!" अशा या प्रेमळ, गुणी, कलासंपन्न ताईचा आदर्श मी सतत माझ्यासमोर ठेवलेला आहे. माझ्या ताईच्या मार्गदर्शनामुळेच आतापर्यंत चौथी, सातवीच्या शिष्यवृत्त्या मी मिळवल्या आहेत.

ताईच्या पावलावर पाऊल ठेवून शालान्त परीक्षेतही गुणवत्ता यादीत येण्याचे माझे एक स्वप्न आहे. माझ्या ताईच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने माझे तेही स्वप्न साकार होईल, याची मला खात्री आहे.
मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

my sister essay in marathi | माझी ताई मराठी निबंध

karmaveer bhaurao patil essay in marathi | कर्मवीर भाऊराव पाटील मराठी निबंध 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण कर्मवीर भाऊराव पाटील मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधात त्‍यांनी शैक्षणीक क्षेत्रात केलेल्‍या कामगीरी सोबतच त्‍यांच्‍या बद्दल माहीती दिली आहे. चला तर मग सुरू करूया निबंधाला.  

स्वावलंबी शिक्षणाचे उद्गाते : कर्मवीर भाऊराव पाटील 'स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय आणि स्वातंत्र्य' हीच खरी शैक्षणिक तत्त्वज्ञानाची चतु:सूत्री मानणारे 'कर्मवीर भाऊराव पाटील यांना थोर शिक्षणतज्ज्ञच म्हटले पाहिजे. 'कमवा आणि शिका' असा अतिशय सोप्या भाषेत शिक्षणाचे मर्म सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारे कर्मवीर एक श्रेष्ठ समाजसुधारकही आहेत.

karmaveer-bhaurao-patil-essay-in-marathi
karmaveer-bhaurao-patil-essay-in-marathi

कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज गावी २२ सप्टेंबर १८८७ ला  जन्मलेले
हे बालक बालपणापासून हट्टी स्वभावाचे होते. वडील सरकारी नोकरीत, त्यामुळे वडिलांसोबत भाऊरावांच्या पायालाही भिंगरी लागलेली. परंतु भाऊरावांचे मामा हे पैलवान, त्याचा मित्र सत्याप्पा हा तर शूर साहसी अन् त्याबरोबर दयाळू अन् गरिबांचा वाली. तो श्रीमंताकडून मिळालेले पैसे गोरगरिबात वाटून टाकत असे. त्याच्या चातुर्याच्या, हिमतीच्या चांगुलपणाच्या गोष्टींचा प्रभाव भाऊरावांवर चांगलाच होत होता. अन्यायाविरुद्ध बंड करण्याचे बाळकडू त्यांना लहानपणीच सत्याप्याकडून मिळाले होते.

भाऊरावांचे शिक्षण बेताचेच. वसतिगृहात शिकत असताना तेथील नियम हे व्यक्तिस्वातंत्र्याच्या विरुद्ध दिसल्याबरोबर भाऊरावांनी वसतिगृह सोडले. आणि आयुष्याला एक वेगळेच वळण लागले. कुस्ती-मल्लखांब यासारख्या खेळात ते नेहमीआघाडावर असल्यामुळे त्यांना राजर्षी शाहू महाराजांच्या वाड्यात आश्रय मिळाला, शाहू महाराज्याकडून समाजसेवेचा वारसा घेतला. पुढे उद्योगाच्या निमित्ताने ते जेव्हा भारतभर फिरून आले तेव्हा त्यांचा 'शिक्षणाचा पिंड गप्प बसू देईना,' "विचार, आचार, उच्चार' यांचे उगमस्थान म्हणजे खरे शिक्षण, सत्य सामाजिक समता या सर्वांचा संगम त्यांना शिक्षणात दिसला, इतकेच नव्हे तर जनजागृती-समाजक्रांतीसाठीही शिक्षणासारखे दुसरे माध्यम नाही, अशी त्यांची खात्री झाली.

म. फुल्यांचा पाईक बनून दुधगाव येथे शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना केली. पुढे १९१९ मध्ये कराड तालुक्यातील वाले या गावी 'रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. एकूणच शिक्षणासाठी सर्व जीवन वाहून जनसामान्याच्या मुलांसाठी अतोनात कष्ट भाऊरावांनी घेतले. या त्यांच्या शैक्षणिक कार्यात त्यांची पत्नी लक्ष्मीबाईंचा हातभार फार मोठा हाता, कमवा आणि शिका' हा कर्मवीरांचा शिक्षणापाठीमागचा मूलमंत्र तर रयतेला पटवून देण्यासाठी ती स्वावलंबी शिक्षणाची कल्पना प्रत्यक्षात ते जगले. बहुजन समाजाला ज्ञानाची संजीवनी देऊन गरिबांच्या झोपडीपर्यंत ज्ञानगंगा पोहोचण्याचे व्रत त्‍यांनी आयुष्यभर पाळले.

'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।' गीतेतील या महान संदेशानुसार कर्मावर त्यांचा गाढा विश्वास होता, कोणतेही काम किंवा श्रम हे हलके नसते. काम म्हणजे ईश्वर त्याच श्रमाला प्रतिष्ठा देण्याचे कार्य, पावित्र्य देण्याचे काम, स्वावलंबनाचा आनंद लुटू देण्याचे महान श्रेय कर्मवीरांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानातून दिसून येते.
रयतेच्या शिक्षणाबरोबरच समाजपरिवर्तनही घडवून आणण्याचा वारसा कर्मवीरांनी म. फुले, शाहू महाराज विठ्ठल रामजी शिंदे, संत गाडगेमहाराज यांच्यापासून घेतला होता. 

शिक्षणाच्या गंगोत्रीतून दारिद्रय, अंधश्रद्धा, लोकभ्रम, अज्ञान अशा अनेक महासंकटातून सुटण्यासाठी अनेक समाजोद्धारक उपक्रम राबविले. एक कर्तव्यनिष्ठ शिक्षक हाच संपूर्ण समाज बदलू शकतो. लहान मुले हीच देशाचे भविष्य घडविणारे असतात. तेव्हा शिक्षणातून देशप्रेम, स्वावलंबन, अन्यायाची चीड, श्रमाची प्रतिष्ठा अशा सद्गुणांते बाळकडू जर त्यांना पाजले गेले तर निश्चित देशाचा विकास हा घडेल. शिक्षण हेच माणसाच्या पर्यायाने देशाच्या विकासाचे मूळ आहे, हीच त्यांची पक्की विचारसरणी होती.


कर्मवीरांच्या कार्याचा प्रसार, त्यांच्या कार्याची पाऊले,खुणा, त्यांच्या स्मृती आठवणी म्हणून सांगलीतील 'दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ' नावाची मोठी संस्था, साताऱ्यातील 'छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस' तर बोधचिन्ह वटवृक्षा' सह आजही दिमाखात उभे आहे. वसतिगृहातून भेदभाव नष्ट करणे, अस्पृश्यांना न्याय मिळवून देणे, सामाजिक समता प्रस्थापित करणे, सर्व जाती-धर्माचे सर्व थरातील विद्यार्थी एकत्र राहणार... त्यांचा समन्वय घडवून आणणार. या त्यांच्या असामान्य कार्याची सर्वांनी मुक्तकंठाने स्तुती केली.

या महापुरुषाचे महानिर्वाण १९५९ झाले. परंतु मित्रहो, संपूर्ण महाराष्ट्रभर अनेकानेक, प्राथमिक, पूर्व प्राथमिक, माध्यमिक, अध्यापन विद्यालये, महाविद्यालये, वसतिगृह, कार्यालये आणि इतर अनेक शिक्षण संस्था आज कर्मवीरांच्या त्या विशाल वटवृक्षाखाली गुण्यागोविंदाने नांदत आहेत, त्या अमर आहेत.
आपण सामान्यांनी या महापुरुषाचे किती सन्मान करायचे ? अनेक सामाजिक संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे. भारत सरकारने पद्मभूषण हा किताब देऊन सर्वोच्च सन्मान केला आहे.

महाराष्ट्राचा 'बुकर टी. वॉशिंग्टन' या नावाने त्यांना ओळखतात. यशवंतराव चव्हाण त्यांच्याविषयी म्हणतात, 'कर्मवीर' हीच महान संस्था, बहुजन समाजाचा ज्ञानप्रकाश, रयत शिक्षण संस्था ही शिक्षणाची गंगोत्री आहे.
मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

karmaveer bhaurao patil essay in marathi | कर्मवीर भाऊराव पाटील मराठी निबंध


Maza avadta lekhak marathi nibandh | माझा आवडता लेखक मराठी निबंध

निबंध 1 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  माझा आवडता लेखक  मराठी निबंध बघणार आहोत. आपण भरपुर पुस्‍तके वाचत असतो पण त्‍यातील काही निवडकच लेखक आपले आवडते असतात. माझे आवडते लेखक आहेत पु. ल.  देशपांंडे कारण त्‍यांचे लिखाण इतके आनंददायी आहे की तुम्‍ही पुर्ण पुस्‍तक वाचल्‍याशिवाय राहणार नाही.  

मुद्दे :

  • पु. ल. देशपांडे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व
  • लहान मुलांसाठी लेखन
  • विनोदी लेखन
  • व्यक्तिचित्रे
  • अनेक नाटके
  • प्रवासवर्णने
  • अनेकांच्या पुस्तकांना प्रस्तावना
  • माणुसकी गौरवणारा,
  • माणुसकीचा गहिवर असलेला एक अलौकिक व्यक्तिमत्त्वाचा माणूस व अष्टपैलू लेखक


पु. ल. देशपांडे यांची अनेक पुस्तके माझ्या संग्रही आहेत. ही पुस्तके कितीही वेळा वाचली तरी त्यांची गोडी कमी होत नाही. कारण पु. ल. देशपांडे हे माझे आवडते लेखक आहेत. माझेच का? पु. ल. हे साऱ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व आहे.

अगदी सुरुवातीला माझ्या वाचनात आले पु. लं.चे 'खोगीरभरती' आणि 'नस्ती उठाठेव' हे विनोदी लेखसंग्रह. हा काहीतरी वेगळाच लेखक आहे,या पुस्तकांबरोबर मोठे होत असतानाच मला कळलं की ज्या 'नाच रे मोरा' या गाण्यावर आपण नाचलो, त्या गाण्याची चाल पु. लं.नी दिलेली आहे.

maza-avadta-lekhak-nibandh
maza-avadta-lekhak-nibandh


 नंतर वाचनात आली पु. लं.ची 'व्यक्ती आणि वल्ली' आणि 'गणगोत' ही पुस्तके. तेव्हा लक्षात आले की, हा लेखक केवळ विनोदीच लिहीत नाही, तर हा उत्कृष्ट व्यक्तिचित्रेही रेखाटतो. कारुण्याची झालर असलेले विनोदही जागोजागी आढळतात. त्यांचा विनोद हसवता हसवता अंतर्मुख करून जातो.

पु. लं.ची 'तुझे आहे तुजपाशी', 'अंमलदार', 'ती फुलराणी...' ही नाटके पाहिली; पण 'बटाट्याची चाळ', 'वाऱ्यावरची वरात', 'असा मी असामी' हे एकपात्री प्रयोगपाहायची संधी मला मिळाली नाही. मग त्या पुस्तकांची पारायणे केली; ध्वनिफिती ऐकल्या. बटाट्याच्या चाळी 'ला जोडलेले 'एक चिंतन' हे पु. लं.च्या विनोदाचे खास उदाहरण म्हणून सांगता येईल. पु. लं.ची पुस्तके बाजूला ठेवली, तरी त्यांच्या चितळे मास्तरांच्या झिजलेल्या चपला वा त्यांच्या नारायणची नारायणगिरी' विसरता येत नाही.

पु. लं.नी खूप प्रवास केला आणि तो अत्यंत मिस्कील, खुसखुशीत भाषेत शब्दरूपांतही आणला. अपूर्वाई, पूर्वरंग, वंगदेश ही त्यांची पुस्तके म्हणजे मराठी साहित्यातील अजरामर प्रवासवर्णने आहेत. पु. लं.नी अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या. त्या छोट्याशा प्रस्तावनाही आपल्याला एखादा मौल्यवान विचार देऊन जातात. पु. ल. एके ठिकाणी लिहितात, "हास्य हे माणसा-माणसांच्या मनात निर्भयता निर्माण करणारे मोठे साधन आहे. हास्य आणि सहानुभूती या दोन गोष्टी देऊन निसर्गाने माणसाला माणूसपण दिले आहे. खळाळून हसणाऱ्या मोठ्या समुदायातून या माणुसकीचे सर्वांत प्रभावी दर्शन होते."

आज पु. ल. आपल्यात नाहीत; पण माणुसकी गौरवणारा हा महाराष्ट्राचा महान अष्टपैलू लेखक माझा आवडता लेखक आहे. 

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व पु. ल. देशपांडे यांची कोणती पुस्‍तके तुम्‍ही वाचली  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

निबंध 2

माझा आवडता लेखक पु ल देशपांडे मराठी निबंध

माझे आवडते लेखक आहेत पु. ल. देशपांंडे कारण पु.ल. आनंदात जगले, विविध कलांच्या क्षेत्रांत ते लीलया वावरले. विशेष म्हणजे पु.लं.ना जो जो आनंद गवसला, जेथे जेथे आनंद मिळाला, तो त्यांनी सर्वांसाठी मुक्तपणे उधळला. आपल्या एका मुलाखतीत पु.ल. म्हणाले होते, 'मला जेव्हा जेव्हा काही चांगले दिसते, आवडते तेव्हा तेव्हा ते दुसऱ्याला सांगण्यासाठी मी उत्सुक असतो, आतुर असतो.' म्हणून पु.ल. हे केवळ शब्दार्थी आनंदयात्री नव्हते, तर ते खरोखरीचा आनंद उधळणारे 'आनंददात्री' होते. 

पु.लं.नी मराठी माणसाला काय दिले, असा प्रश्न विचारण्याऐवजी पु.लं.नी मराठी माणसाला काय दिले नाही? असेच विचारावे लागेल. अशा या अष्टपैलू कलावंताचा जन्म १९१९ साली झाला. त्यांचे शिक्षण मुंबई व पुणे येथे एम्.ए.,एल्.एल्.बी. पर्यंत झाले. त्यांनी संस्कृत व बंगाली या भाषांचा परिश्रमपूर्वक अभ्यास केला. त्यांनी लिपिक, शिक्षक, प्राध्यापक अशा विविध स्तरांवर नोकऱ्या केल्या. आकाशवाणीवर नाट्यविभागप्रमुख म्हणून काम केले. दिल्ली दूरदर्शनवरील कार्यक्रमांचे ते पहिले निर्माते होते.

पु.लं.जवळ असामान्य निरीक्षणशक्ती होती. त्यांच्या लहानपणी घरी आलेल्या पाहुण्याचे अचूक निरीक्षण करून आपला हा बाळ काही जगावेगळे बोलणार नाही ना, अशी भीती त्यांच्या आईला वाटे. पण याच निरीक्षणशक्तीतून पु.लं.च्या 'व्यक्ती आणि वल्ली' साकार झाल्या. 'गणगोता 'तील आप्तजन चिरंजीव झाले. पु.लं.च्या लेखनाचे वैशिष्ट्य असे की, अनेकदा वाचून, पाहून वाचकांनाही ती सारी माणसे आपलीच, जवळचीच वाटू लागली. 'बटाट्याची चाळ' या पु.लं.च्या पुस्तकातील प्रत्येक माणूस आपल्यापरीने वेगळा आहे.

पु.लं.नी भरपूर प्रवास केला आणि 'अपूर्वाई' , 'पूर्वरंग' आणि 'वंगदेश' अशा पुस्तकांतून तो वाचकांपुढे मांडला. युरोपातील 'कापी' बेटावरील निळाईच्या सौंदर्याने पु.लं.चे अंत:करण भरून आले आणि त्यांना आठवला ज्ञानेश्वरांनी वर्णिलेला 'कोटिचंद्रप्रकाश'.

पु.लं.चे चित्रपट, नाटके, एकपात्री प्रयोग सारेच लोकांनी डोक्यावर घेतले. त्यांतल्या संवादांनी, गाण्यांनी, अभिनयाने आणि दिग्दर्शनाने रसिकांना अमाप आनंद दिला. पु.लं.चा विनोद हा अभिजात होता. कुणालाही न दुखावणारा, कुणाच्याही व्यंगावर बोट न ठेवणारा. शब्दाशब्दांवर ते लीलया कोट्या करत. त्यांचे 'कोट्यधीश' हे पुस्तक वाचकाला कोणत्याही परिस्थितीत खुलवते.

पु.ल. स्वतः मूलतः कविमनाचे होते, संगीतकार होते. त्यांचे 'नाच रे मोरा' हे गाणे ऐकल्यावर प्रत्येक मराठी बालकाचे बालपण सुखावून जाते. पु.ल. आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाई हे दोघेही काव्यवेडे. स्वानंदासाठी ते नेहमीच कविता वाचत, म्हणत. त्यांना शेकडोंनी कविता पाठ होत्या. पण त्यांच्या मनात आले, हा आनंद आपण इतरांपर्यंत पोहोचवला तर... आणि मग भाईंनी आणि सुनीताताईंनी कविवर्य बोरकर, मढेकर आणि आरती प्रभूच्या कवितांच्या वाचनाचे जाहीर कार्यक्रम केले. स्वत:ला मिळालेला आनंद हजारो श्रोत्यांवर उधळून दिला.

पु.लं.च्या बाबतीत म्हणावे लागते की, 'देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी आमुची झोळी'.कोठे कोणी चांगले काम करत आहे, पैशासाठी काम अडले आहे असे कळले की, पु.लं.चा मदतीचा हात तेथे पोहोचत असे. कुणा एका आडवळणाच्या गावी एक प्राचार्य आपल्या महाविदयालयासाठी धडपडत आहे, हे कळल्यावर पु.ल. फाऊंडेशन तेथे मदतीला गेले. 

रक्तपेढ्या, रुग्णालये, मुक्तांगण, शैक्षणिक संस्था... साऱ्यांना भरभरून मदत पोहोचली. कुणी तरुण तज्ज्ञ डॉक्टरीण, व्यसनाधीनांना व्यसनांपासून मुक्त करण्यासाठी धडपडत आहे, असे कळल्यावर हा थोर दाता तेथेही पोहोचला. मग सांगा, पु.ल. हे खरोखरच एक आगळेवेगळे आनंदयात्री नव्हते का?

 
निबंध 3


माझा आवडता साहित्यिक मराठी निबंध

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे महान विनोदाचार्य प्र.के. अत्रे म्हणत असत, 'लता मंगेशकर आणि पु.लं. देशपांडे हे महाराष्ट्रातले दोन चमत्कार आहेत. ही तेजाने तेजाची केलेली आरती आहे. खरोखर, 'चमत्कार' या शब्दाव्यतिरिक्त पु.लंचं वर्णन करताच येणार नाही.


 अवघं साहित्यविश्व त्यांचा 'महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व' असा उल्लेख करतं. 'लाडकं' हे वात्सल्याच्या विश्वातलं विशेषण दुसऱ्या कोणाला लावता येईल असं वाटत नाही. ते हरहुन्नरी होते आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक चमकदार पैलू होते. म्हणूनच असं म्हणावंसं वाटतं की 'याच्या आधी असं व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रात झालं नाही आणि पुढे कधी होईल असं वाटत नाही.'



 अशी माणसं शतकात किंवा हजार वर्षात एखादवेळच जन्माला येतात. धन्य त्यांचे आई-वडील. त्यांच्या आई-वडिलांनी जेव्हा त्यांचं नाव 'पुरुषोत्तम' असं ठेवलं, तेव्हा त्यांना यत्किंचितही कल्पना आली नसेल की हे मूल जेव्हा 'पुरुष' होईल तेव्हा ते अनेक क्षेत्रात 'उत्तम' ठरेल. देव माणसाला केव्हा केव्हा चकवतो, तो असा.
पु.लं. ना काही येत नव्हतं असं नाहीच. ते उत्कृष्ट विनोदी (आणि गंभीरही) लेखक होते. नाटककार आणि नटही. गीतकार आणि संगीतकारही, गायक आणि वादकही, कथालेखक व कथाकथक, वक्तृत्वही, कर्तृत्वही.


एखाद्याला वाटेल त्यांना नृत्यकला अवगत नसावी. पण ज्यांनी त्यांचे 'गुळाचा गणपती' सारखे चित्रपट, 'वाऱ्यावरची वरात' यासारखं प्रहसन किंवा 'सुंदर मी होणार' यासारखं नाटक पाहिलं असेल, त्यांना कळून येईल की नृत्याच्या क्षेत्राचेही ते चांगले जाणकार होते. ते साहित्यातले सिकंदर होते, जिंकायला आता क्षेत्रच राहिलं नाही म्हणून खंतावणारे. ज्या क्षेत्रात ते गेले, त्या क्षेत्रातले ते सम्राट झाले. त्या क्षेत्रावर त्यांनी अधिराज्य गाजविले. 



साम्राज्य तर असं स्थापलं की त्यांच्या साम्राज्यावर सूर्य कधी मावळला नाही आणि कधी मावळणारही नाही.
पद्य विडंबनावर आचार्य अत्रे यांनी आपली मोहोर उमटवली आहे, तर गद्य विडंबनावर पु. लं. नी आपला ठसा उमटवला आहे. त्याचे 'व्यवच्छेदक लक्षण' व 'सहानुभावांचे वाङ्मय' बटाट्याच्या चाळीतलं 'एक चिंतन' असे लेख मराठीत कधी लिहिलेच गेले नाहीत. यातलं विडंबन विशेष. 


त्याच्या अगोदर व्यंकटेश माडगूळकरांनी अप्रतिम व्यक्तिचित्रं रेखाटली. पण माडगूळकरांची व्यक्तिचित्रे आणि पु.लंची व्यक्तिचित्रे यात खूप फरक आहे. असं म्हणता येईल की माडगूळकरांच्या 'व्यक्ती' आहेत तर पु.लंच्या 'वल्ली' आहेत. पु.लंच्या लिखाणाचं वैशिष्ट्य असं की ते एखाद्याची टिंगल - टवाळी करतात. खट्याळपणे त्याच्यावर लिहून आपल्याला हसवतात. पण मग शेवटी अगदी गंभीर होतात. काळजाचा ठाव घेणारं असं काहीतरी लिहून जातात.


'तुझं आहे तुजपाशी' मधील आचार्य घ्या. सबंध नाटकभर आपण त्यांना हसत असतो. पण पु.लं. शेवटी त्यांच्या तोंडी असं एक भाषण घालतात की, आपल्याला आचार्यांची कीव यायला लागते. त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटायला लागते. वाटतं, अरेरे, आपण या स्फटिकासारख्या स्वच्छ आणि प्रामाणिक माणसाला उगाच हसलो.
त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल, त्यांनी इतकं विनोदी लेखन केलं, पण कुठेही

आचरटपणा नाही आजची व्यासपीठावरची आणि दूरदर्शनची विनोदी नाटके म्हणजे शुध्द आचरटपणा. हल्ली विनोद म्हणजे विदूषकी चाळे. विनोद म्हणजे आचरटपणा  असं समीकरण झालेलं आहे. म्हणूनच खुद्द पु.लंच दूरदर्शनला 'दुर्दशन' असं म्हणत असत. त्यांनी हयात व मृत व्यक्तीची कधी कुचाळकी केली नाही किवा
कुणाच्या वर्मी झोंबेल असं काही लिहिलं नाही. ते मांगल्याचे, सौंदर्याचे पुजारी होते. म्हणून । त्यांना सगळं काही सुंदर आणि मंगल वाटे. 


एकपात्री प्रयोग करावा, तर पु.लं.नीच. एकनाथांनी | लिहून ठेवलंय की ज्ञानेश्वरापाठी कोणीही महाटी ओवी करू नये. मला सुध्दा असंच वाटतं की | पु.लं. नंतर कोणीही एकपात्री प्रयोग करू नयेत. त्यांनी विनोदाची पातळी तर इतकी उंचावून | ठेवलीय की त्या पातळीपर्यंत फारच थोडे लोक येऊ शकतील.  पु.लं. गेले आणि त्यांच्याबरोबर | असं काही गेलंय की जे महाराष्ट्र परत कधीच पाहू शकणार नाही.

निबंध 4

 majha avadta lekhak in marathi essay


मला लहानपणापासून वाचनाची आवड. लहानपणी पंचतंत्र, इसापनीती, अद्भुत कथा आवडायच्या. हळूहळू वाचनकक्षा रुंदावत गेल्या. सानेगुरुजींची ‘गोड गोष्टी', 'श्यामची आई' पुस्तके वाचली आणि साने गुरुजी आवडू लागले. नंतर मात्र मी ललित साहित्य वाचू लागले. त्यात ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, अनंत काणेकर, चिं. वि. जोशी, रणजीत देसाई, प्र. के. अत्रे यांची पुस्तके वाचू लागले. पण सर्वात प्रभाव पडला, तो पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याचा.



 त्यामुळे पु. ल. देशपांडे माझे आवडते लेखक बनले. मग अर्थातच पुलंची पुस्तके वाचण्याचा मी सपाटा चालविला. पु. ल. देशपांडे म्हणजेच पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचा एक प्रदीर्घ कालखंडच! साहित्य, नाट्य, संगीत, चित्रपट, एकपात्री प्रयोग, संस्कृती अशा जीवनाच्या सर्वांगांना स्पर्श करणारे. असे एकही क्षेत्र नाही, की जिथे पुलंचा परिसस्पर्श झालेला नाही. आयुष्य मी सुटी' समजून घालविली, असे म्हणणारे पु. ल. खरोखरीच आनंदयात्री होते. 




लेखकाचे अंतरंग त्यांच्या साहित्यात डोकावते. त्यांचे म्हणणे होते की, “जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्यामध्ये पकडून नियतीने चालविलेली आपणा साऱ्यांची फसवणूक एकदा लक्षात आली, की त्यातून सुटायला आपली आणि आपलकीने भोवताली जमणाऱ्या माणसांची हसवणूक करण्यापलीकडे आणखी काय करायचं? त्यामुळेच त्यांची भाषाशैली अत्यंत खेळकर होती. कोणतेही तत्त्वज्ञान हसत-खेळत सांगण्याची त्यांची शैली कोणाही वाचकाला भुरळ न पाडेल, तरच नवल!




संगीत आणि नाटक हे पुलंच्या संपन्न कलाजीवनाचे खास विशेष. तुझे आहे तुजपाशी, ती फुलराणी, सुंदर मी होणार, अंमलदार, एक झुंज वाऱ्याशी, बटाट्याची चाळ, पुढारी पाहिजे, वयम् मोठम् खोटम् इ. नाटकांद्वारे पुलंनी जो विषय हाताळला, किंबहुना ज्या विषयाला स्पर्श केला, त्याचे सोने झाल्याशिवाय राहिले नाही. संवादात सहजता, खेळकरपणा, सुबोधता, मोहकता असल्याने त्याची वाचकांवर, ती नाटके पाहणाऱ्या प्रेक्षकांवर जादू झालीच पाहिजे.



पु.लं च्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा त्यांच्या प्रत्येक पुस्तकातील प्रत्येक पानावर, प्रत्येक ओळीवर दिसून येतो. त्यांची पुस्तके म्हणजे मोठे मासे छोटे मासे, अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्याच्या देशा, नसती उठाठेव. गोळाबेरीज, खिल्ली, आम्ही लटिके न बोलू, तीन पैशांचा तमाशा, गुण गाईन आवडी, व्यक्ति आणि वल्ली', एवढी ग्रंथसंपदा त्यांनी आपल्या मराठी रसिकांसाठी निर्माण केली. वाचकांना आपल्या विनोदी शैलीने सतत हसवत ठेवले. 



त्यामुळेच त्यांना कोट्याधीश पुल म्हणत. शाब्दिक कोट्या करणे वाटते तेवढे सोपे नाही. त्यासाठी हजरजबाबीपणा, शब्दांची समृद्धता हवी. ती पुलंच्याकडे विपुल प्रमाणात होती. एक उदाहरण सांगते. पं. भीमसेन जोशी सवाई गंधर्वांचे शिष्य. विमानातून प्रवास केल्याशिवाय त्यांचा एकही दिवस जात नसे. त्यावर पु.ल. म्हणाले, “सवाई गंधर्वांचा शिष्य हवाई गंधर्वच आहे." ही झाली समयसूचकता!




'व्यक्ति आणि वल्ली'मधील व्यक्तिरेखा वाचताना त्या प्रत्यक्ष डोळ्यांपुढे साकारतात. त्यातील व्यक्ती त्यांच्या खास वैशिष्ट्यांनिशी साकारतात; जिवंत होतात. त्यातील प्रत्येक पात्र समाजात कोठेतरी आढळते; पण अशा व्यक्तींचे यथार्थ चित्रण करणे प्रत्येकाला जमत नाही. अशा व्यक्तिरेखा साकारताना निरीक्षण हवे, त्यांच्या लकबी टिपल्या पाहिजेत. तसेच, त्यांची विशिष्ट भाषादेखील शब्दांत मांडता आली पाहिजे, तरच ती व्यक्तिरेखा जिवंत होते आणि ती आपल्या मनात घर करून राहते. 



नारायण, चितळे मास्तर, नाथा कामत, रावसाहेब, पानवाला, सखाराम गटणे सर्वच पात्रे लक्षात राहतात, ती लेखनशैलीमुळे आणि समर्पक शब्दांच्या योजनेमुळेच ना! अशा प्रकारे वाङ्मयीन प्रतिष्ठा लाभलेले दर्जेदार साहित्य, विविध वाङ्मय-प्रकार हाताळणारा हा लेखक सर्वांनाच आवडतो. मग मीच त्याला अपवाद कसा असेन ?


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

Maza avadta lekhak marathi nibandh | माझा आवडता लेखक मराठी निबंध