शब्दचित्रामक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शब्दचित्रामक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

 संगणक वर मराठी निबंध | Computer Essay In Marathi

निबंध 1

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण संगणक वर मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधामध्‍ये संगणकाच्‍या इतीहासापासुन ते आजपर्यंत ते कोणकोणत्‍या उपयोगात येत आहेत त्‍याबद्दल सविस्‍तर माहीती तारखासहीत दिली आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला


संगणक संस्कृतीच्या विकासाबरोबरच उत्तरोत्तर मानवाची वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती होत गेली. विविध इलेक्ट्रॉनिक तंत्राच्या शोधाबरोबरच अनेक आधुनिक उपकरणे निर्माण केली गेली. वास्तविक संगणक ही मानवाने लावलेल्या शोधांतून मिळालेली देणगी आहे. संगणकाचा उपयोग संशोधनकार्य, शोध ऋतुसंबंधीची माहिती, बँक, इत्यादी अनेक क्षेत्रांत होतो.

Computer-Essay-In-Marathi
Computer-Essay-In-Marathi

संगणकाच्या वापरामुळे कार्यास गती येते. कार्य कौशल्यपूर्ण होते. आकडेवारी व माहितीचा चांगला उपयोग होतो. कार्यप्रणालीवर चांगले नियंत्रण राहते.संगणकाची कार्यपद्धती द्विआधार पद्धती (बायनरी सिस्टिम) वर आधारित आहे. जर्मनीतील गणितज्ञ व तत्त्वज्ञ गोटफ्रिड, बिलहेल्म लायबनिज (१६६४-१७९६) ने असे सुचविले की सर्व पाढ्यांचा आधार शून्य व एक मानावा या द्विआधारी पद्धतीत बेरीजवजाबाकीची प्रक्रिया सहजपणे करता येते. गुणाकार आणि भागाकार पण बेरजेच्या क्रमात करता येतो. या पद्धतीत अंकाची सुरवातीच्या व शेवटच्या अक्षरांना जोडल्यानंतर जो शब्द त्यास 'दुयंक' (Bit) म्हणतात. आठ बिटांच्या समूहाला बाईट (Byte) म्हणतात. १०२४ बाईट समूह मिळून एक किलोबाईट बनतो.


अंदाजे १५० वर्षांपूर्वी सर्वप्रथम संगणक निर्मितीच्या सिद्धांताचे प्रतिपादन इंग्लंडमधील चार्ल्स बेबेज या शास्त्रज्ञाने केले. याच्याच सिद्धांताच्या आधारावर हॉर्वर्ड विद्यापीठ (अमेरिका) १९३७ ते १९४४ या काळात संगणकाचा प्राथमिक विकास प्रा. होबोर्ड आयकन याने केला. या संगणकाचे वजन दोन टन होते. त्याची लांबी १५ मीटर व रुंदी 27 मीटर होती. 


१९६५ मध्ये इंटिग्रेटेड सर्किटपासून (IC) पहिला संगणक निर्माण करण्यात आला. त्यानंतर मागील काही वर्षांत संगणकाचा वेगाने विकास झाला. आता संगणक मनुष्यच संचालित करतो. त्याच्याच सूचनेप्रमाणे तो काम करतो. संगणकात मानवसदृश सर्व गुणांचा समावेश करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.


संगणकाचा प्रमुख भाग म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (CPU) ज्यात अनेक छोटे भाग असतात. संगणकाच्या एककापासूनच गणना होते. सेंट्रल प्रोसेसिंगशिवाय त्याचे अन्य भाग विद्युत कुंजिका, विद्युत यांत्रिक प्रिंटर डिस्क संचय एकक(hard disk drive), आवरण, इंटरफेस आणि टेपडेक असतात.


 भारतात शिक्षणाचा प्रसार-प्रचारासाठी संगणकाचा उपयोग केला जातो. साक्षरतेच्या मोहिमेत संगणक महत्त्वाची भूमिका बजावीत आहे.वर्गात शिक्षक जे व्याख्यान देतात त्याचा फायदा सर्व विद्यार्थ्याला होतोच असे नाही. परंतु संगणक प्रत्येक विद्यार्थ्याला सारखे शिक्षण देण्यात सक्षम आहे.



संगणकाच्या उपयोगामुळे बँकेच्या कार्यात सुधारणा झाली आहे. बँकेत संगणकावर प्रत्येक ग्राहकाच्या खात्याची संपूर्ण माहिती पाहावयास मिळते. त्याचे प्रिंट आऊट पण काढता येते. बँकेचा दैनंदिन हिशेब काही क्षणांतच संगणक आपणास देतो. संगणकात ग्राहकांच्या हस्ताक्षरांचा संग्रह करून एका स्कॅनरच्या साह्याने काही क्षणांत त्यांच्या हस्ताक्षराची तपासणी करता येते. बँकेच्या बाहेर कॉम्प्युटराईज्ड स्वयंचलित यंत्रे बसविलेली असतात. त्याद्वारे ग्राहक केव्हाही पैसे काढू शकतात, जमा करू शकतात, चेकसाठी अर्ज करू शकतात. याला वेळेचे बंधन नाही. 


संगणकाद्वारे वधुवरांची निवड करता येते. अनेक उपवर तरुण-तरुणींचे स्वभाव, वय, जात, आवडी इत्यादी माहिती संगणकात साठविली जाते. याच आधारावर निवड केली जाते.


रशिया, अमेरिका, भारत आणि इतर अनेक देशांमध्ये संगणकाचा उपयोग संरक्षण कार्यात होतो. याद्वारे गुन्हयांचा तपास केला जातो. विद्यार्थ्याचे निकाल तयार केले जातात. विविध विषयांचा अभ्यासक्रम तयार करण्यात मदत होते. विमाने आणि रेल्वेत आरक्षण करता येते. संगणकाच्या मदतीने अनेक टेलिफोन लाईन्स एकमेकांना जोडल्या जातात. एखाद्या व्यक्तीच्या गैरहजेरीत फोनवर आलेला संदेश संगणक टाईप करून ठेवतो आणि फोन करणाऱ्याला ती व्यक्ती कधी उपलब्ध असू शकेल ते सांगतो ई-मेलची सोय पण संगणकावर उपलब्ध असते.



संगणकाचा उपयोग डिझाईन, ड्रॉईंगसाठी पण केला जातो. यामुळे चित्रपट उद्योगात क्रांती घडून आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातही संगणकाचा उपयोग होतो. वाहतूक नियंत्रणासाठी संगणकाचा वापर केला जातो. वाहनांच्या येण्या जाण्यावर संगणकाच्या आदेशामुळे आपोआप नियंत्रण येते.


वाहनांची, प्रवाशांची संख्या संगणक सांगतो. मोटार वा अन्य वाहनात रेडियो संचार व्यवस्थेखेरीज एक मायक्रो संगणक असतो. आवश्यकतेनुसार तो अॅम्ब्युलन्स, अग्निशमनाची त्वरित मागणी करतो. रोबोट हा सुद्धा एक प्रकारचा संगणकच आहे. तो माणसाप्रमाणे कार्य करतो.



संगणकाचा दुरुपयोग पण केला जातो उदा. जुगार खेळणे, संगणकाच्या साह्याने कुणाचेही चित्र काढुन त्‍यात अनावश्‍यक असे बदल करने.  कधीकधी संगणक चुकाही करतो. काही जणांना अशी भीती वाटते की संगणक मानवी बुद्धीच्याही पुढे जाईल. परंतु संगणक हे एक निर्जीव यंत्र असल्यामुळे ही गोष्ट शक्य नाही. ही गोष्ट खरी की संगणक अत्यावश्यक यंत्र आहे ज्याचा विकास आपल्या सुखासाठी निरंतर केला जाऊ शकतो.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका  


संगणक मराठी निबंध 

निबंध 2

संस्कृती आणि सभ्यतेच्या विकासाबरोबरच मानवाने शास्त्रीय व तांत्रिक क्षेत्रात उन्नती केली. त्याने इलेक्ट्रॉनिक तांत्रिक शोध लावून मानवोपयोगी आधुनिक उपकरणे बनविली. संगणकाचा शोध मानवाच्या यशाचे एक अद्वितीय उदाहरण आहे. शोध कार्य व अन्य क्षेत्रातून संगणकाला काढून टाकला तर मानव शास्त्रीय प्रगती करू शकणार नाही. 


मागील काही वर्षांत संगणाकाचा विकास तीव्रतेने झाला आणि होत आहे. संगणक मानवाच्या सूचनेनुसारच कार्य करतो. टाईपरायटरप्रमाणेच संगणकात अक्षरांचे, अंकांचे, विरामचिन्हांचे संकेत असलेल्या बटण असतात. त्यांच्या साहाय्याने संगणकाला आदेश दिला जातो. संगणकात लिहिले गेलेले सर्व आकडे, साहित्य साठविले जाते आणि ते एकानंतर एक समोर येतात.


 संगणकात साठविलेल्या साहित्याचे आकडेवारीचे मुद्रण प्रिन्टरच्या सहाय्याने करता येते. आपल्या दैनिक जीवनात संगणकाचा उपयोग खूप वाढला आहे. त्याद्वारे अनेक कामे करवून घेतो. संगणकामुळे मोठमोठी व किचकट कामे, आकडेमोडी चुटकीसरशी होतात. संगणकाद्वारे गुन्हयाची तपासणी केली जाते. विद्यार्थ्यांचे निकाल तयार केले जातात. लहान मुले संगणकावर खेळ खेळतात.


 विविध विषयांचे पाठ्यक्रम संगणकावर तयार होतात. रेल्वे आणि विमानाचे आरक्षण संगणकाच्या मदतीने करता येते. बँकांमध्ये पण संगणकाचा उपयोग वाढला आहे. बँकेतील संगणकात प्रत्येक ग्राहकाचे खाते व त्याचे पूर्ण विवरण साठविलेले असते. बँकेतील दैनंदिन देण्याघेण्याचे हिशेबही असतात. ग्राहकाला संगणकावर त्वरित आपल्या खात्याची माहिती मिळु  शकते.



भारतात शिक्षणाच्या प्रसार-प्रचारासाठी संगणकाचा उपयोग केला जातो. प्रामुख्याने दूर शिक्षण घेणाच्या विद्यार्थ्यांना त्याचा जास्त फायदा होतो. चित्रपट उद्योगातही संगणकाच्या साहाय्याने दृश्यांचे चित्रण होते. वाहतुकीचे नियंत्रणही संगणकाच्या साहाय्याने केले जाते. आपात्कालीन बातम्यांचे प्रसारणही संगणक करतो. अलीकडे लोकप्रिय झालेल्या इंटरनेट सेवेअंतर्गत संगणक टेलिफोनच्या तारांद्वारे जोडले आहेत ज्यामुळे महत्त्वाचे संदेश क्षणात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात.


संगणक आज मानवासाठी अति आवश्यक आणि महत्त्वपूर्ण यंत्र आहे ज्याचा उपयोग आपल्या गरजांनुसार सतत केला जात आहे. भविष्यात याचा उपयोग आणखी वाढतच जाणार आहे.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

संगणक वर मराठी निबंध | Computer Essay In Marathi

essay on camel in marathi | उंट मराठी निबंध 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण उंट मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधात उंटाबद्दल सवीस्‍तर माहीती दिली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

essay-on-camel-in-marathi
essay-on-camel-in-marathi



उंट हा एक विचित्र प्राणी आहे. हा मूळत: भारतात सापडणारा प्राणी नाही. इ. स. पूर्व चौथ्या शतकात ग्रीक आक्रमकांबरोबर खैबर खिंडीमार्गे तो भारतात आला. भारताच्या वाळवंटी प्रदेशात तो मोठ्या प्रमाणावर सापडतो. त्याला वाळवंटातील जहाज असे म्हणतात. आज वाळवंटातील जीवन त्याच्याशिवाय अपूर्ण आहे.

उंटाला चार पाय, दोन, डोळे, शेपटी पाठीवर कुबड व लटकत असलेले ओठ असतात. वाळवंटात जेव्हा जोराचा वादळी वारा सुटतो तेव्हा नाकात वाळू जाऊ नये म्हणून तो नाकपुड्या बंद करून घेतो. उंटाचे गुडघे आणि मान कडक असते त्यामुळे त्याचा घर्षणापासून बचाव होतो. जाड ओठांमुळे तो वाळवंटातील काटेरी झाडा-झुडुपांची पाने खाऊ शकतो. त्याला ३४ दांत असतात.



उंट एका दिवसात ३६ लिटर पाणी पितो. जर त्याला खाण्यासाठी ताजी पाने मिळाली तर चार लिटर पाणी तो कमी पितो. उंटाच्या पोटात एक मोठी पिशवी असते तिला मदारी म्हणतात. त्यात तो अन्न व पाण्याची साठवण करतो. म्हणून खूप दिवस तो बिना अन्न पाण्याचा राहू शकतो. ताजी पाने खाल्ली तर त्याची पाण्याची गरज आणखी कमी होते. वाळवंटात उंट हे सर्वात उपयुक्त वाहन आहे.


उंटाचे केस वस्त्रोद्योगात वापरले जातात. त्यापासून लोकर, दोरी, कोट, पिशव्या इ० तयार केले जाते. ओझे वाहण्यास, स्वारी करण्यास, शेती कामात उंटाचा उपयोग होतो. युद्धातही उंटांचा उपयोग होतो. २६ जानेवारीस सैनिक उंटावर बसून येतात ते आपण T.V. व इंटरनेट वर पाहतो. समुद्रकिनारी किंवा प्राणीसंग्रहालयात उंटावरुन फेरी मारण्याचा आनंद घेता येतो. अशा प्रकारे उंट हा एक उपयुक्त पाळीव प्राणी आहे.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

essay on camel in marathi | उंट मराठी निबंध

peacock essay in marathi | राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधात मोराबद्दल सवीस्‍तर माहीती दिली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

peacock-essay-in-marathi
peacock-essay-in-marathi




मोर हा वनातील एक अत्यंत सुंदर, सावध, लाजाळू पण चतुर पक्षी आहे. भारत सरकारने १९६३ मध्ये जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात त्यास राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले. सौंदर्याचे हे मूर्त रूप साऱ्या भारतीयांना फार आवडते. कवी कालिदासाने त्या काळात मोराला राष्ट्रीय पक्ष्याचा दर्जा दिला होता.



मोर जेव्हा बेधुंद होऊन नाचतो तेव्हा आपली शेपटी उंचावून पंख्यासारखी पसरवितो. हे दृश्य पाहुन भान हरपते. मोराचे शरीर अनेक रंगांचे असते. त्या रंगांच्या छायांचे एक अद्भुत मिश्रण असते. गळ्याचा आणि छातीचा रंग निळा असतो. गळ्याच्या निळेपणावरून संस्कृत कवी त्याला 'नीलकंठ' म्हणतात.



मोर सामान्यपणे पावसाळ्यात नृत्य करतो. खूप लांबून येणाऱ्यांचा आवाज तो ऐकू शकतो. उन्हाळ्यात मोर सुस्तावतात. मोर सापांना मारून खातो. मोर माणसाला त्रास देत नाही. हा सावध आणि भित्रा पक्षी आहे. सामान्यतः कळप करून रहातो. धान्य, किडे व काही भाज्या हे त्याचे अन्न होय. तो काही ऊंचीपर्यंत व अंतरापर्यंतच उडू शकतो. शत्रुपासून बचाव करण्यासाठी त्याला लांब, बारीक परंतु बळकट पाय मिळालेले आहेत.


मोराच्या मादीला लांडोर असे म्हणतात. असा हा आपला राष्ट्रीय पक्षी आपल्या सौंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. अनेक मंदिरात देवाला मोरपिसे वाहतात. सजावटीसाठी मोरपिसांना मागणी असते. फुलदाणीत ही मोरपिसे लावतात. त्याचे पंखेही बनवितात. त्याने वारा घेता येतो.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

peacock essay in marathi | राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध

 lion essay in marathi | जंगलचा राजा सिंह मराठी निबंध

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण जंगलचा राजा सिंह मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधात सिंहाबद्दल सवीस्‍तर माहीती दिली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

lion-essay-in-marathi
lion-essay-in-marathi



सिंह हा मांजराच्या कुलातील जंगलात रहाणारा हिंस्त्र प्राणी आहे. फिकट तपकिरी रंगाचा हा प्राणी खरोखरच जंगलचा राजा आहे. त्याची ती डौलदार चाल, मानेभोवतीची दाट आयाळ आणि धीरगंभीर गर्जना मनाला भुरळ घालते. 


सिंह बहुधा कळप करून रहातात. त्याचे आयुष्य साधारण: २५ वर्षे असते. सिंह हे सिंहीणीपेक्षा मोठे असतात व त्यांना आयाळ असते. सिंहाच्या बछड्यांना छावा म्हणतात. जंगलात सिंहाचे क्षेत्र ठराविक असते. या ठराविक क्षेत्रातच ते फिरतात व शिकार मिळवितात. सिंह मुख्यतः भारत व मध्य आशियात आढळतात.


सिंह मासाहारी असतो म्‍हणजेच सिंह दुसऱ्या जंगली प्राण्यांना मारुन खातात. हरणे, कोल्हे, झेब्रा, काळविट हे त्यांचे भक्ष होय. आजकाल जंगले कमी-कमी होत चालल्याने त्यांचे हे नैसर्गिक अन्नही कमी होत आहे. मग हे भुकेले सिंह जंगलांजवळच्या गावातील बैल, गाय, शेळ्या यांसारखे पाळीव प्राणी मारतात. कधी-कधी ते नरभक्षक ही बनतात. सिंहांना नेहमी पाण्याच्या आसपास रहायला आवडते. ते उत्तम पोहू शकतात.



परंतु आपल्या देशातील सिंहांची संख्या हळू-हळू कमी होत चालली आहे. हे असेच चालू राहिल्यास आपल्याला सिंह फक्त फोटोतच पहायला मिळतील. त्यांची कातडी व दातांसाठी सिंहांची अंदाधुंद शिकार होत आहे. त्यांपासून अनेक शोभेच्या वस्तु तयार केल्या जातात. त्यामुळे सरकारने त्यांच्या शिकारीवर कडक निर्बंध लादले आहेत व शिक्षेची तरतूद केली आहे. गुजरात मधील गिरचे जंगल हे सिंहांचे अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


lion essay in marathi | जंगलचा राजा सिंह मराठी निबंध

essay on elephant in marathi | हत्ती मराठी निबंध


 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण हत्ती मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधात हत्‍तीबद्दल सवीस्‍तर माहीती दिली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


essay-on-elephant-in-marathi
essay-on-elephant-in-marathi



जगात अनेक प्रकारचे प्राणी आहेत पण सर्वात भक्कम पशू हत्ती होय. हत्ती विशालकाय असतो. त्याला नाकाच्या ठिकाणी एक लांब सोंड असते. सोंडेच्या सहाय्याने तो खातो व पाणी पितो. लाकडाचे ओंडके उचलण्याचे अवजड काम पुर्ण करतो. हत्ती मुख्यत: आफ्रिका व आशियात सापडतात. तो शाकाहारी व अतिशय बुद्धीमान प्राणी आहे. 


जंगलात हत्ती कळप करून राहतात. हत्तीच्या पायाचे तळवे मुलायम असतात. खडबडीत जागेवर जर तो चालला तर त्याच्या पायाला जखमा होतात. म्हणून तो मऊ मातीत वा वाळुत चालतो. हत्तीची चाल माणसापेक्षा जलद असते. जर हत्ती मागे लागला तर त्याच्यापासून सुटका होणे कठीण असते.



अवजड कामे करण्यासाठी हत्तींचा उपयोग केला जातो. हत्तींची शिकार करण्यासाठी त्यांच्या जाण्यायेण्याच्या मार्गावर हत्तीच्या उंचीइतका एक खड़ा खोदण्यात येतो. त्याला गवताने झाकले जाते. हत्तींचा कळप जेव्हा तिथून जाते तेव्हा एक तरी हत्ती त्यात पडतोच. मग दोर-काठयांच्या साह्याने हत्तीला बाहेर काढण्यात येते.



प्राचीन काळात राजा हत्तीवर स्वार होऊन युद्धावर आणि शिकारीसाठी जात असे. दक्षिण भारतात आजही उत्सवात हत्तीला सामील करून घेतले जाते. त्याच्याशिवाय उत्सव पूर्ण होत नाही. सर्कशीत हत्ती निरनिराळ्या प्रकारच्या कसरती करून दाखवितो. ओझे वाहून नेण्यासाठी हत्तींचा वापर केला जातो. 


हत्तीचे दांत फार किमती असतात. त्यापासून दागिने व गृहसजावटीच्या वस्तू बनवितात. लग्नात वधूला हस्तिदंती बांगड्या घालतात. प्राचीन काळी राजासिंहासनावर हस्तिदंताचे नक्षीकाम केले जात असे. परंतु हस्तीदंतासाठी त्यांची अंदाधुंद शिकार होत आहे. हे थांबायला हवे. त्यांचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

essay on elephant in marathi | हत्ती मराठी निबंध

horse essay in marathi | घोडा मराठी निबंध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण घोडा मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधामध्‍ये घोड्यांचा इतीहासात कश्‍याप्रकारे उपयोगी होता  व घोडा मानवाला कश्‍याप्रकारे उपयोगी ठरतो याचे वर्णन केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला


horse-essay-in-marathi
horse-essay-in-marathi



हत्ती आणि उंटाप्रमाणेच घोडा पण एक उपयोगी प्राणी आहे. संस्कृतमध्ये त्याला अव आणि इंग्रजीत 'हॉर्स' म्हणतात. पुराणांच्या अनुसार समुद्रमंथनाच्या वेळी जी चौदा रत्ने निघाली त्यातील एक रत्न घोडा होता. हा एक शक्तिशाली प्राणी आहे.  मोटर, विद्यतशक्तीला 'हॉर्स पावर' म्हणूनच म्हणतात. 



घोड्याचा बसण्यासाठी, टांग्याला लावण्यासाठी. डोंगराळ भागात जाण्यासाठी. चारा वाहन नेण्यासाठी उपयोग होतो. प्राचीन काळात घोडा राजे महाराजांच्या सेनेचे प्रमुख अंग होता. त्यांच्या रथांनाही घोडे जोडले जात. विवाहाच्या शुभप्रसंगी वराला घोडीवर बसवितात.


घोड्यांचा पूर्वीपासून आजतागायत युद्धात उपयोग केला जातो. राजे महाराजांच्या कथांशी घोड्यांच्या कथाही जोडल्या गेल्या आहेत. महाराणा प्रतापचा घोडा चेतक, राणी लक्ष्मीबाईचा घोडा यांच्या शौर्याचे उल्लेख इतिहासात सापडतात. आजही पोलीस दल व सैन्यदलात घोडयांचा उपयोग केला जातो. घोड्यांचा अनेक जाती आहेत. 'अरबी घोडा' उच्च प्रतीचा समजला जातो. घोडे अनेक रंगांचे असतात.



टांग्यांना जुंपल्या जाणाऱ्या घोड्यांच्या पायाला नाल ठोकतात. त्यामुळे घोड्याचे खूर खराब होत नाहीत व पाय चांगले राहतात. दुर्गम डोंगराळ भागात सामान आणि माणसांची वाहतूक घोडे  चांगल्या प्रकारे करू शकतात. घोडे खुप वेगाने धावू शकतात. त्यामुळे घोडयांच्या शर्यती हा मनोरंजनाचा लोकप्रिय खेळ आहे. गवत व चणे हे त्याचे अन्न होय.



घोडा एक हुशार प्राणी आहे. योग्य प्रशिक्षण दिल्यास तो माणसाच्या आज्ञा पाळतो. तो अतिशय इमानदार व आज्ञाधारक असतो. कुत्र्यांप्रमाणेच घोडे ही माणसाचे चांगले मित्र आहेत.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

horse essay in marathi | घोडा मराठी निबंध

dog essay in marathi | कुत्रा मराठी निबंध

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण कुत्रा मराठी निबंध बघणार आहोत. मानवी सभ्‍यतेच्‍या सुरूवातीपासुनच कुत्रा मानवाचा मित्र म्‍हणुन साथ देत आला आहे. पाळीव प्राणी भरपुर असतात पण याला विशिष्‍ट दर्जा आहे कारण वेळप्रसंगी तो आपल्‍या मालकासाठी त्‍याचे प्राण पण द्यायला तयार होतो. अश्‍या या प्राण्‍याला आदर देऊन सुरूवात करूया निबंधाला. 

dog-essay-in-marathi
dog-essay-in-marathi




कुत्रा हा एक पाळीव प्राणी आहे. तो स्वामीभक्त असतो. घरांच्या रक्षणासाठी तो फार उपयोगी आहे. त्‍याच्‍या  अनेक जाती असतात. काही तर फार समजदार असतात. त्यांची गंधसंवेदना फार तीव्र असते. म्हणून पोलिस गुन्हेगारांना पकडण्यासाठी कुत्र्यांची मदत घेतात.


कुत्र्याला चार पाय, दोन डोळे, दोन कान, शेपूट असते. कुत्रे अनेक रंगाचे असतात. त्यांचे आकारही वेगवेगळे असतात. काही सशासारखे लहान व गोजिरवाणे तर काही वाघा एवढे मोठे व मजबूत असतात. अनेक लोक घराच्या राखणीसाठी कुत्रे पाळतात. दारावरची घंटी वाजताच कुत्रे सावध होतात. अनोळखी माणसे पाहिली की भुंकू लागतात. रात्रीच्या वेळी चोर आले तर त्याच्या भुंकण्याने लोक जागे होतात. मग चोर एक तर पळून जातो किंवा पकडला जातो. काही लोक आवड किंवा हौस म्हणून कुत्रे पाळतात.



कुत्रा जरी उपयोगी प्राणी असला तरी तो पिसाळला की धोकादायक बनतो तो चावला तर इंजेक्शन घेणे अत्यावश्यक असते. असे न केल्यास ज्याला कुत्रे चावले तो पिसाळू शकतो. भटक्या जमातीचे लोक नेहमी आपल्याबरोबर कुत्रे बाळगतात. त्यात शिकारी कुत्रे पण असतात. त्यांचे मालक लहान, जंगली जनावरांची शिकार करताना या कुत्र्यांची मदत घेतात. कुत्र्याच्या स्वामीभक्तीच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. धर्मराजाला स्वर्गापर्यंत घेऊन जाणारा एक कुत्राच होता. असा हा इमानदार प्राणी माणसाचा खरा मित्र आहे.

 

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

dog essay in marathi | कुत्रा मराठी निबंध

 cow essay in marathi | गाय मराठी निबंध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण गाय मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधामध्‍ये भारतात गायीला विषेश महत्‍व का आहे व प्राचीन भारतापासुन आजपर्यत गाय मानवाला कश्‍याप्रकारे मदत करत आलेली आहे ते या निबंधात स्‍पष्‍ट केले आहे . चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

cow-essay-in-marathi
cow-essay-in-marathi



भारतात गाय पूजनीय आहे. प्राचीन काळात साधू संत, ऋषिमुनी आपल्या आश्रमात गाई पाळत असत. महर्षी जाबालीने आपला शिष्य सत्यकामवर गोसेवेची जबाबदारी सोपविली होती. आणि त्यांना तोपर्यंत चारीत राहण्याचा आदेश दिला होता जो पर्यंत त्यांची संख्या दुप्पट होणार नाही. 


गाईला चार पाय, एक लांब शेपूट असते जिने ती तिच्या पाठीवर बसणारे, पक्षी, माशा, डांस उडविते. तिला दोन मोठे-मोठे सुंदर डोळे असतात. तिचा रंग पांढरा, काळा, लाल, मातकट असतो. खेळाच्या मैदानावर, रस्त्यावर, मोकळ्या जागी ती चरतांना दिसते. 


गाय पाळीव प्राणी आहे. तिचे दूध पौष्टिक व पचायला हलके असते. प्राचीन काळात घरे मातीची असत ती गाईच्या शेणाने सारवीत असत. इंधन म्हणून शेणाच्या गोवऱ्या जाळीत असत. आता गोबर गॅस वापरतात यातून धूर निघत नसल्यामुळे शरीरावर वाईट परिणाम होत नाहीत. गोबर गॅस हे अतिशय स्वस्त इंधन आहे. बैलांचा उपयोग शेतीच्या कामासाठी केला जातो. खेड्यातील स्त्रिया अजूनही शेणानेच चूल सारवितात . शेणाचा उपयोग खतासाठी केला जातो. गोमूत्राचा उपयोग औषधे तयार करण्यासाठी होतो. 


गाईची उपयुक्तता लक्षात घेऊन सरकारने गोशाळा स्थापन करून बेवारस गायींची सोय केली पाहिजे. गाईंची कत्तल थांबविली पाहिजे. ईश्वराकडून मिळालेले श्रेष्ठ बक्षीस 'गाय' आहे. भारतीय परंपरेतील पूज्य पशृंमध्ये गाईचे स्थान आहे. गाय बहुउपयोगी  असल्यामुळे तिला कामधेनू म्हणतात. अशा प्रकारे हा एक उपयुक्त पाळीव प्राणी आहे.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

cow essay in marathi | गाय मराठी निबंध

my pet cat essay in marathi  | माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध बघणार आहोत. माझ्या घरी मनीमाऊ नावाची छोटीशी गोंडस मांजर आहे या निबंधाच्‍या मदतीने आज  आपण तिच्‍याबद्दलच माहीती करून घेऊया  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


my-pet-cat-essay-in-marathi
my-pet-cat-essay-in-marathi



पशू-पक्षी, मनुष्याचे जीवन साथी आहेत. गाय, म्हैस, शेळी, मेंढीपासून आपणांस दूध मिळते. कुत्रे आपल्या शेताची आणि घराची राखण करतात. पोपट, कबुतर, ससे, मांजर, पाळल्याने आपल्याला आनंद मिळतो. आपल्या गरजेनुसार आणि आवडीनुसार लोक पशू पक्षी पाळतात. माझ्या बऱ्याच मित्रांजवळ कोणता ना कोणता पाळीव प्राणी आहे.


मी पण एक छोटीशी सुंदर मांजर पाळली आहे. आम्‍ही लाडाने तिला  मनीमाऊ म्‍हणतो तिचा रंग पांढरा व काळा आहे. तिचे डोळे चमकदार निळ्या रंगाचे आहेत. आम्ही सगळे तिला 'मनीमाऊ' म्हणतो. मनीमाऊ म्हणून हाक मारताच ती धावत माझ्याजवळ येऊन बसते. मी तीला रोज दूध, ब्रेड, बिस्किट खाऊ घालतो. साबण लावून तिला आंघोळ घालतो. 


माझी मनीमाऊ मांजर पूर्णपणे शाकाहारी आहे. ती आज्ञाधारक आहे. घरात अजिबात घाण करीत नाही. त्यासाठी मी तिला बाहेर घेऊन जातो. संध्याकाळी तिला घेऊन मी बागेत फिरावयास जातो. तिथे मी तिच्याबरोबर खेळतो, धावतो तेव्हा ती शेपटी फुगवून म्याऊँ-म्याऊँ करून आपला आनंद व्यक्त करते.


मनीमाऊ घरात मुक्तपणे फिरते. परंतु खाण्याचे पदार्थ खराब करीत नाही. दारावरची घंटी वाजली की तिचे कान उभे राहतात. मग लगेच ती दाराकडे धावत जाते. जणु  आमचे स्वागतच करते. कधी-कधी ती एखादा उंदीर पकडून बाहेर पळून जाते. कुत्रा मांजरीचा शत्रू असतो. पण तीच कुत्र्यावर धावून जाते. थंडीच्या दिवसांत ती  गच्चीवर जाऊन उन्हात बसते. उन्हाळ्यात सोफ्याखाली नाही तर पलंगाखाली जाऊन बसते. मनीमाऊ मला खूप आवडते. मी कुठे बाहेर गेलो तर मला तिची खूप आठवण येते.


मित्रांनो my favourite animal cat in marathi  तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व तुमच्‍या घरी कोणताही पाळीव प्राणी असल्‍यास त्‍याचे नाव  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

my pet cat essay in marathi | माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध

माझे आवडते शिक्षक | my favorite teacher essay in marathi

                                                                        मराठी निबंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण maze avadte shikshak nibandh in marathi बघणार आहोत. या ३ निबंधामध्‍ये लहानपणातील शाळेतील प्रसंग वर्णन केेले आहे. विद्यार्थ्‍यांना कश्‍याप्रकारे शिकविले पाहीजे याचे उदाहरण सुध्‍दा या निबंधात दिले आहे  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

मराठीचा पहिलाच तास ! गोडबोले सरांनी वर्गात पाऊल ठेवलं आणि माझी कळी खुलली. सरांविषयी इतकं ऐकलं की कधी त्यांचा तास येतो असं मला झालं होतं. 'मराठी शिकवण्यात त्यांचा हात धरणारं कोणी नाही' अशी त्यांची ख्याती ! पण ते दहावीलाच शिकवायचे, त्या वर्षी प्रथमच नववीला आले होते.


Maze-Avadte-Shikshak-Nibandh-In-Marathi
Maze-Avadte-Shikshak-Nibandh-In-Marathi


आत्यंतिक आदराने मी त्यांच्याकडे पाहात होतो . पायात चपला, हिरवट रंगाची पैंट, पांढरा शर्ट, उजव्या हातात घड्याळ, डाव्या हातात अंगठी, गौरवर्ण, पिंगट बोलके डोळे, कोरीव मिश्या, मुख्य म्हणजे अतिशय प्रसन्न हसणं
हजेरी सुरू झाली. “ आपटेऽ...” " येस्स सरऽ!” पहिल्याच हजेरीला सरांनी वर बघितलं. मिस्किल हसले, “ मुलांनो! तास मराठी मग उत्तर इंग्रजीतुन का रे. 

माहीत आहे मराठीचा गोडवा आणि शक्ती ?" त्यांनी हजेरी बाजूला ठेवून मग अमृताची बरसात केली. 'माझा मराठाचि बोलु कवतुके..' अशी । मराठी भाषा, तिचं सौंदर्य, पावित्र्य, आवश्यकता, थोरवी, ...अशा काही रसाळपणे सांगितल्या की तासाची घंटा झाली तेव्हा कळलेच नाही की वेळ कुठे निघुन गेला.

त्यांना मी नेहमी ' गोडबोले सरच' म्हणायचो गोडबोलें सरांची वाट आम्ही नेहमीच आतुरतेनं पाहात असू. त्यांची शिकवण्याची पद्धत वेगळीच होती. त्यांनी पुस्तक हाती कधी धरलंच नाही. धड्यावरचे प्रश्न लिहून दिलेच नाहीत. धडा घरून वाचून यायला सांगायचे आणि वर्गात तो धडा ज्यांनी लिहिला त्यांची माहिती, का लिहिला, कुठल्या मनःस्थितीत लिहिला ही पार्श्वभूमी, ज्यातून तो धडा घेतला त्या पुस्तकाची माहिती, धड्याचा आशय, त्यातील सौंदर्य, तसे समान दाखले -इतर पुस्तकातले, जीवनानुभव, तत्त्वज्ञान, मार्गदर्शन...असं करत करत तो धडा व्हायचा.

मराठीतल्या साऱ्या अलंकारांनी आम्ही सारे नटलो. ' गोडबोले सर' कधी रागवायचे नाहीत. तास कधी बुडवायचे नाहीत. अंगात ताप  असताना शिकवलेलं मी पाहिलंय, आम्हीही कधी तास चुकवायचो नाही. त्यांच्या वाणीत जादूच तशी होती ! ते शिकवत असताना ज्ञानेश्वर, नामदेव, गिरीश, पाडगावकर, लोकहितवादी, गोरे, अत्रे, फडके...हे सारे त्यांच्या रोजच्या बैठकीला असतात असे वाटायचे. इतर विषयांचा द्वेष त्यांनी कधी केला नाही. 

इंग्लिश मीडियमची लाट पाहून ते खंतावायचे. म्हणायचे " अरे ! आपल्या आईची सेवा आपण नाही केली तर इतर कोणी येऊन करणार आहे का ? आपली आजी संस्कृत, अगोदरच रानोमाळ भटकते आहे.
 
दहावीच्या निरोप समारंभाचे वेळी सर गोडबोल्यांनी केलेलं भाषण शिल्प होऊन मनात बसले आहे. ते म्हणाले, "आता तुमच्या दिशा बदलतील...भाषा बदलतील ....आचार बदलतील...विचार बदलतील...माणसं कपडे बदलतात...राहायची घरं बदलतात, पण आपलं कुलदैवत नाही बदलत, पिढ्यान् पिढ्या तेच ठेवतात. तसं तुम्ही तुमचं मराठीपण, मराठी भाषा हे कुलदैवत, या बदलत्या काळातही अभंग, अखंड ठेवा हीच इच्छा !...शुभास्ते पंथानः सन्तु !"

मराठीवर असं सपाटून प्रेम करणाऱ्या आणि आम्हालाही आमच्या न कळत करायला लावणाऱ्या सा गोडबोलेंना मी कशी विसरेन ? आजही माझ्या अभ्यासिकेत मराठी साहित्याचा पुस्तक ठेवा, त्यांचीच आठवण म्हणून, साठवण केलेला तुम्हाला दिसेल!
 


मराठी निबंध 2

आवडते शिक्षक म्हणताच मला आठवतात ते आमचे जाधव सर. जाधव सर हेच आमचे आवडते शिक्षक आहेत. केवळ आवडतेच नव्हेत; तर वंदनीय आहेत.

केवळ माझेच नव्हे; तर आमच्या गावातील या शाळेत जे जे विदयार्थी शिकून गेले त्या सर्वांचे आवडते शिक्षक म्हणजे जाधव सर ! किंबहुना या शाळेतील विदयार्थी कोठेही, केव्हाही एकमेकांना भेटले की, ते जाधव सरांच्या हटकून आठवणी काढतात..

जाधव सरांचे व्यक्तिमत्त्व रुबाबदार आहे. उंच शरीरयष्टी, आणि प्रसन्न चेहरा. सरांचा पोशाख अगदी साधा, पण स्वच्छ. कधी कधी ते खादीचा लांब सदरा घालतात; तेव्हा तर ते एकदम रुबाबदार दिसतात. त्यांनी कधी भडक रंगाचे कपडे घातलेले मला आठवतच नाही. सिनेमातल्या ढंगाचे फॅशनेबल कपडे त्यांच्या अंगावर कधी दिसले नाहीत. या स्वच्छ व साध्या पोशाखावरूनही पाहणाऱ्याला सरांच्या स्वच्छ व निर्मळ अंतःकरणाची आणि निष्कलंक चारित्र्याची लगेच साक्ष पटावी.

जाधव सर आम्हांला विज्ञान व गणित विषय शिकवतात. या विषयांत त्यांचा हातखंडाच होता. विज्ञान विषय कठीण व कंटाळवाणा आणि गणित तर भीतिदायक ! पण जाधव सरांचे कौशल्य असे की, हे विषय आम्हांला कधी कंटाळवाणे वाटले नाहीत वा त्यांची भीतीही वाटली नाही.

घरगुती प्रसंगांतील उदाहरणे घेत घेत ते सहज अभ्यासाकडे वळत. एकदा विज्ञानाच्या तासिकेच्या वेळी ते 'दही लावण्या'चे प्रकार सांगू लागले. दही आंबट न होता ते मधुर व मलईसारखे होण्यासाठी विरजण कसे लावतात, हे सांगता सांगता बॅक्टेरिया म्हणजे काय, त्यांचे स्वरूप कसे असते, त्यांचे प्रकार किती वगैरे पाठ्यपुस्तकातील माहितीकडे ते केव्हा वळले, कळलेच नाही. 

एकदा घरातील फ्युज गेल्यावर त्यांना वितळतार मिळेना, तेव्हा वायरमधील साधी तार लावून वीजप्रवाह कसा सुरू केला, हे त्यांनी आम्हांला वर्गात सांगितले. पण त्यानंतर लागलीच धावतपळत जाऊन वितळतार आणली आणि साध्या तारेच्या जागी ती बसवली. हे आपण का केले, नाही तर कोणता धोका होता, हे समजावून सांगता सांगता त्यांनी विजेचे वहन, त्याचे परिणाम इत्यादी बाबी अलगद आमच्या डोक्यात घातल्या.

 अनेकदा ते शास्त्रज्ञांच्या आयुष्यातले धडपडीचे प्रसंग रंगवून सांगत आणि त्यायोगे अनेक सिदधांत गप्पांच्या स्वरूपात शिकवत. जाधव सर गणितातील अनेक प्रमेये शिकवताना गणितज्ञांच्या रंजक आठवणी सांगत. त्यामुळे प्रमेये आम्हांला कधी किचकट वाटलीच नाहीत.

विज्ञानप्रदर्शन हा तर जाधव सरांचा जिव्हयाळ्याचा विषय. आम्हा विदयार्थ्यांचे गट करून ते सगळ्यांना प्रदर्शनात भाग घ्यायला लावत. आम्हांला ते विषय नेमून देत. आम्हांला विचार करायला लावत; उपक्रम शोधायला लावत. या प्रयत्नांत त्यांचे मार्गदर्शनही असे. त्यामुळे आम्ही मोठ्या शास्त्रज्ञांच्या ऐटीत विज्ञानातील उपक्रम सादर करीत असू.

आता दहावीचे वर्ष संपत आले आहे. माझ्या मनात सारखे येत आहे की, विज्ञान-गणिताची गोडी लावणारे जाधव सरांसारखे शिक्षक यानंतर मला भेटतील का? ... माहीत नाही. मात्र मला मनापासून वाटते की, यापुढे कदाचित असे सर मिळतील, न मिळतील; पण जाधव सर आम्हांला मिळाले, हे आमचे केवढे भाग्य !


 मराठी निबंध 3
माझे आवडते शिक्षक | my favorite teacher essay in marathi : हो, हो. आपटे गुरुजी हेच आमचे प्रिय गुरुजी आहेत. केवळ प्रियच नव्हेत, तर ते वंदनीयही आहेत. आमच्या गावातील या शाळेत जे जे विदयार्थी गेल्या तीस वर्षांत शिकुन  गेले त्या सर्वांचे आपटे गुरुजी हे एक आदरणीय स्थान आहे. किंबहुना या शाळेतील माजी विदयार्थी कोठेही, केव्हाही एकमेकांना भेटतात तेव्हा ते 'गुरुजी' म्हणून ज्यांचा उल्लेख करतात, तो आपटे गुरुजींचाच असतो. 

केवळ 'गुरुजी' म्हटले की एकमेकांना उमगते की आपल्याला कुणाविषयी बोलायचे आहे. या शाळेत अनेक मुख्याध्यापक आले आणि गेले; पण सर्वांच्या मनात ठसले ते आपटे गुरुजीच. सर्व विदयार्थ्यांच्या तोंडी एकच नाव आणि ते म्हणजे 'आमचे गुरुजी-आपटे गुरुजी.'

 माझे पाचही भाऊ याच शाळेचे विदयार्थी, आज माझे हे पाचही भाऊ नोकरी-शिक्षणाच्या निमित्ताने दूरवर राहतात, ते जेव्हा जेव्हा काहीही निमित्ताने घरी येतात तेव्हा आपटे गुरुजींचा विषय निघाला नाही असे होत नाही. कारण आपटे गुरुजी हे कुणा एकटया-दुकटयालाच प्रिय नव्हते तर ते सर्वांचेच आवडते गुरुजी होते आणि आजही आहेत.

गुरुजींचे व्यक्तिमत्त्वही उठावदार आहे. उंच, तेजस्वी गौर वर्ण आणि प्रसन्न चेहरा. त्यामुळे ज्यांनी एकदा गुरुजींना पाहिले ते त्यांना विसरू शकत नाहीत. ते नेहमी ताठ चालतात अगदी साठीला येऊन पोहोचले तरी त्यांना कोणीही पाठीत किंचितही वाकलेले पाहिले नाही. काळ कितीही बदलला तरी गुरुजींच्या पोशाखात बदल नाही. दोन्ही बाजूंनी काचा मारलेले पांढरे शुभ्र धोतर, लांब नेहरू शर्ट आणि पांढरी शुभ्र गांधी टोपी. हे साधेच कपडे इतके स्वच्छ आणि टापटिपीचे असतात की पाहणाऱ्याला गुरुजींच्या स्वच्छ निर्मल अंतःकरणाची त्वरित साक्ष पटावी. 

त्यांनी खादीची टोपी डोक्यावरून कधीही काढली नाही पण तरीही ते कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधीत  नाहीत. किंबहुना राजकारणापासून ते सदैव दूरच राहिले. तरी पण देशात आणि विश्वात घडणाऱ्या सर्व घडामोडींची झूचक माहिती आपटे गुरुजींना असते, हे अनेकदा त्यांच्याशी बोलताना लक्षात येते. ते मोकळया वेळेत विदयार्थ्यांशी मनमोकळेपणाने गप्पा करत असतात. त्यांच्या बोलण्यात कधीही कोणांबद्दल द्वेष आढळून येत नाही.

शास्त्र, गणित हे गुरुजींचे विषय. त्या विषयांचे ते पदवीधर आहेत. त्या विषयांतील अदययावत माहिती जाणून घेण्यास ते नेहमीच उत्सुक असतात. इतर गोष्टींत काटकसर करून गुरुजी शास्त्रविषयक अनेक नियतकालिके व पुस्तके विकत घेतात. शालेय जीवनात ज्या वर्गांना, ज्या इयत्तांना शास्त्राध्ययनासाठी आपटे गुरुजी लाभत ते वर्ग भाग्यवान ठरत असत. शाळेच्या वेळाबाहेर गुरुजींबरोबर आम्ही शास्त्रातील कित्येक गोष्टी शिकलो, कित्येक उपकरणे, कित्येक शास्त्रज्ञ यांची ओळख करून घेतली.

जोवर आपटे गुरुजी शाळेत होते तोवर वार्षिक स्नेहसम्मेलनाच्या प्रदर्शनात शास्त्रविभागाच्या प्रदर्शनात काहीतरी वेगळेपणा असेच व त्याबद्दल सर्वांना उत्सुकता वाटे. याला कारण काहीना काही नवे करावे ही आपटे गुरुजींची ओढ. आपटे गुरुजी अध्यापक असले तरी  त्यांच्यातील विदयार्थी फार मोठा आहे. गुरुजींना चाहणारा विदयार्थिवर्ग तर अफाट आहे. 

आजही आपल्या जुन्या विदयार्थ्यांशी ते स्नेहाचे संबंध ठेवून असतात. त्यांचे अनेक विदयार्थी आता शास्त्रविषयाच्या वेगवेगळया शाखांत मोठ्या पदांवर आहेत. ते कधी गावात आले की आपटे गुरुजींकडे आवर्जून जातात. इतर वेळी गुरुजींचा पत्रव्यवहार चालूच असतो. त्यांचा एक विदयार्थी अणुशक्तिकेंद्रात उच्च पदावर आहे. गुरुजींना अणुशक्तिकेंद्र दाखविण्यासाठी त्याने त्यांना खास मुंबईला नेले होते.

परवाच मला गुरुजी रस्त्यात भेटले तेव्हा म्हणाले, “काय पिंटू, सुट्टीत मुंबईला येणार ना? मी जाणार आहे." माझा प्रश्नांकित चेहरा पाहुन तेच म्हणाले, "अग तुझ्या दादाचे पत्र आले आहे; तो ‘सागरसम्राट'वर आहे ना
असे आहेत हे आमचे सर्वांचे आपटे गुरुजी. एक जातिवंत शास्त्रशिक्षक आणि आमचे खरेखुरे मित्रच.वरील निबंध माझे आवडते शिक्षक | my favorite teacher essay in marathi हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

माझे आवडते शिक्षक मराठी निबंध | my favorite teacher essay in marathi