शब्दचित्रामक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शब्दचित्रामक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

 होमी भाभा मराठी निबंध | doctor homi bhabha marathi nibandh


निबंध 1 ( 550 शब्दात )


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण होमी भाभा  मराठी निबंध बघणार आहोत. स्‍वतंत्र भारताला परमाणु विज्ञान क्षेत्रात महत्‍वाचे स्‍थान मिळवुन देण्‍याचा गौरव डॉ. होमी भाभा यांनी केला जोपर्यत गरीब राष्‍ट्राला अनुविज्ञान वापरनार नाहीत तोपर्यंत ते आर्थीक व औद्योगीक प्रगती करू शकणार नाहीत त्‍यांच्‍या जन्‍मापासुन भारताला अनुउर्जा प्रदान करण्‍यापर्यतचा प्रवास या निबंधामध्‍ये सविस्‍तर पणे स्‍पष्‍ट केला आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला . 

doctor-homi-bhabha-marathi-nibandh
doctor-homi-bhabha-marathi-nibandh



मुंबईमधील एका पारसी कुटुंबात ३० ऑक्टोबर १९०९ मध्ये डॉ. होमी भाभा यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा म्हैसूर राज्यात दिवाण होते. त्यांचे वडील टाटा उद्योग समुहात वरीष्ठ अधिकारी होते. होमी भाभांना लहानपणापासून शास्त्रीय संगीताची आवड होती. ते लहान असताना जेव्हा रडत असत, तेव्हा त्यांचे माता-पिता त्यांना शास्त्रीय संगीत ऐकवत असत. ते संगीत ऐकताच ते आपले रडणे थांबवीत असत. चित्रकला हा त्यांचा आवडता छंद होता. त्यांनी त्यांच्या आईचे चित्र काढून त्यांना भेट देऊन चकित केले होते.



डॉ. भाभा जॉन कॉर्नन इंग्लिश स्कूलमध्ये शिकले. अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी म्हणून जैं वाचण्यासाठी देत. ती पुस्तके वाचून ते प्रयोग करीत असत. ते अत्यंत जिज्ञासू वृत्तीचे असल्याने प्रयोग करण्यात रममाण होत.

डॉ. भाभा इंटरच्या वर्गात शिकत होते. तेव्हा अमेरिकन शास्त्रज्ञ डॉ. एच्. कॉम्प्टन मुंबईत येणार होते. त्यांच्या भाषणाचा लाभ डॉ. भाभा यांना झाला. त्यांनी अॅटॉमिक शास्त्रज्ञ होण्याचा निर्णय घेतला. त्यांचा निर्णय भविष्यकाळात योग्य ठरला.


गणित हा डॉ. भाभांचा आवडता विषय. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की आपला मुलगा इंजिनियर व्हावा, म्हणून वडिलांनी त्यांना वयाच्या सतराव्या वर्षी इंग्लंडमधील अभियांत्रिकी महाविद्यालयात पाठविले. तेथे गेल्यावर डॉ. भाभांनी एकाच वेळी महत्त्वाच्या पाच विषयांची परीक्षा दिली व त्यात उत्तम यश संपादन केले. त्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून डॉक्टरेट ही पदवी संपादन केली. त्यासाठी त्यांचा पदार्थविज्ञान हा विषय होता. त्यांना न्यूटन शिष्यवृत्ती मिळाली. त्यांनी पदार्थ विज्ञान या विषयात संशोधन केले.



वयाच्या ३१ व्या वर्षी त्यांना फेलोशिप मिळाली. त्याच वेळी भारतात आण्विक सायन्सची ओळख झाली होती. पण प्रयोग करून पाहिल्याशिवाय हा विषय समजणे कठीण असल्याने भाभांनी 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फन्डामेंटल रिसर्च संस्थे'ची मुंबई येथे स्थापना केली. डॉ. भाभा भौतिकशास्त्र विषय शिकवत. १९४२ ते १९४५ या काळात ते इंग्लंडमध्ये 'कॉस्मिक रे रिसर्च इन्स्टिट्यूट', 'सायन्स इन्स्टिट्यूट' आणि काही प्रसिद्ध रिसर्च सेंटर्समध्ये काम करीत होते. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा फायदा भारताला झाला.



डॉ. भाभांनी भारतातील संशोधन केंद्रे विकसित करण्याचा प्रयत्न केला. अणुशक्तीचा विकास संहारासाठी नाही; तर देशाच्या प्रगतीसाठी झाला पाहिजे, असे त्यांचे विचार होते. त्यांनी अमेरिकेच्या साहाय्याने ऑगस्ट १९६२ मध्ये तारापूर येथे अणुशक्ती केंद्र स्थापन केले. त्यानंतर राजस्थानमधील प्रतापसागरमध्ये दुसरे प्रकल्पकेंद्र उभारले. तिसरा अणुप्रकल्प मद्रास येथील कल्पक्कम् येथे उभारला. १९५५ पर्यंत कोणीही अणुपासून विद्युत निर्मीती केलेली नव्हती. डॉ. भाभांजवळ दूरदृष्टी होती.



भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू यांनी डॉ. भाभांच्या कार्याची दखल घेतली व त्यांना भारत सरकारकडून आर्थिक सुविधा पुरवून प्रोत्साहन दिले. २६ ऑगस्ट १९४७ मध्ये भारत सरकारने डॉ. भाभांना 'अणुसंशोधन कौन्सिल'चे जनरल सेक्रेटरी हे पद बहाल केले. नंतर ते त्याचे अध्यक्ष झाले. त्यांनी आण्विक शक्ती संदर्भात भरीव कार्य केले.



४ ऑगस्ट १९५६ मध्ये पहिली भारतीय अणुभट्टी अप्सरा कार्यान्वित झाली डॉ. भाभांचे अणुसंशोधनातील कार्य लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना सर्वोच्च पुरस्कार 'भारतरत्न' देऊन त्यांचा गौरव केला. पटणा विद्यापीठातर्फे त्यांना डॉक्टरेट मिळाली. हॉफकीन पुरस्कार, पद्मभूषण, मेधनाद साहा सुवर्णपदक, लखनौ, अहमदाबाद, केंब्रिज व अन्य विद्यापीठांकडून 'डॉक्टर ऑफ सायन्स' ही पदवी त्यांना मिळाली. अणुशक्तीचा विकास देशाच्या शांततेसाठी व्हावा, यासाठी झटणाऱ्या या संशोधकाचा अपघाती मृत्यू झाला.


भारतीय विज्ञान जगाला अनुऊर्जा   देणारे यांनी शांततावादी वैज्ञानिकाप्रमाणे काम केले . चिन सारख्‍या देशांनी अनुबाॅम्‍ब बनविल्‍यावर भारताने पण अनुउर्जा संपन्‍न व्‍हावे असा  सल्‍ला त्‍यांनी दिला होता . आज वाळवंटातील जमीनीला अनुउर्जेव्‍दारे सुपीक बनविण्‍यात जे यश मिळाले आहे त्‍याचे श्रेय डॉ होमी भाभा यांनाच जाते . 

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका  धन्‍यवाद

निबंध  2 (400 शब्दात)


भारतीय अणुयुगाचे शिल्पकार म्हणून डॉ. होमी भाभा यांचे नाव मोठ्या सन्मानाने घेतले जाते. भारतीय अणुसंशोधनाचा पाया डॉ. भाभांनी रचल्यामुळेच पुढे भारताला अणुवीजनिर्मिती, अणुबाँबस्फोट, अंतराळात उपग्रह उड्डाण हे सारे शक्य झाले, याचा आपल्याला कधीच विसर पडणार नाही.


डॉ. होमी भाभांचा जन्म ३० ऑक्टोबर १९०९ रोजी एका सधन पारशी कुटुंबात झाला. अत्यंत तल्लख बुद्धीमुळे होमी वयाच्या १५ व्या वर्षी सिनियर केंब्रिजची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर केंब्रिज युनिव्हर्सिटीतून त्यांनी वयाच्या २५ व्या वर्षी डॉक्टरेट मिळविण्याचा विक्रम केला. त्यांनी अनेक पारितोषिके व शिष्यवृत्त्या मिळविल्या. त्यानंतर मात्र ते भारतात परत आले आणि बंगलोरला डॉ. रामन यांच्या संशोधन शाळेत त्यांनी आपले संशोधनकार्य चालू ठेवले. त्यानी विश्वकिरणाच्या अधिक सशोधनाला सुरुवात केली.


 १९४५ मध्ये 'टाटा मुलभूत संशोधन संस्थे'ची स्थापना झाली आणि डॉ.होमी भाभा या संस्थेचे संचालक झाले. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाल्यावर पंडित नेहरूंनी अणुशक्तीचे महत्त्व ध्यानात घेऊन 'अणुशक्ती मंडळाची स्थापना केली. मंडळाच्या अध्यक्षपदी अर्थातच डॉ. होमी भाभा होते. 'अणुशक्तीचा शांततामय विधायक कार्यासाठी वापर' हे या मंडळाचे उद्दिष्ट होते. अशा तव्हेने अणुविज्ञानाच्या दालनात भारताने पदार्पण केले.


१९५४ मध्ये तुर्भे येथे 'अणुशक्ती संशोधन केंद्रा'ची उभारणी झाली. आणि १९५६ मध्ये 'अप्सरा' या आशिया खंडातील पहिल्या अणुभट्टीची स्थापना झाली. हिरोशिमा, नागासाकी येथे अणुशक्तीची, संहार करण्याची ताकद जगाला दिसली होती. पण या प्रचंड शक्तीचा वापर विधायक कार्यासाठी करता येतो, यावर डॉ. होमी भाभांचा विश्वास होता. त्यामुळे त्यांनी अणुऊर्जेचा वापर विजनिर्मितीकरिता, शांततामय कारणांकरिता करता येतो हे सिद्ध करून दाखविले.



अणुभट्टीच्या उभारणीबरोबरच त्यासाठी लागणारे इंधन, जड पाणी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आदी गोष्टी भारतातच उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्याबाबतच्या योजनाही डॉ. भाभांनी राबविल्या. तारापूर अणुनिर्मिती प्रकल्पाची आखणीही डॉ. भाभा यांनीच केली.  डॉ. भाभा यांनी अनेक निबंध लिहिले, खूप पुस्तके लिहिली, अनेक विज्ञानविषयक परिसंवादांत भाग घेतला. त्यांनी अल्पावधीत अणुशास्त्रात भारताची एवढी प्रगती करून दाखविली की बडी राष्ट्रे आश्चर्यचकित झाली. डॉ. भाभांनी अनेक विद्वत्तापूर्ण भाषणे दिली. ते उत्तम वक्ते होते. चित्रकलेचे त्यांना चांगले अंग होते. त्यांनी अनेक चित्रे काढली आहेत, तसेच चित्रकारांच्या चित्रांचा संग्रह केला आहे.



कामाच्या व्यापात संगीताची आवड मात्र त्यांना जोपासता आली नाही. विज्ञानाच्या संशोधनात मग्न असणाऱ्या या शास्त्रज्ञाला चित्र, शिल्प, संगीत अशा कलांचीही जाण होती, हा दुर्मिळ योग होय. एक बुद्धिमान आणि अतिशय रसिक असे कलाकाराचे व्यक्तिमत्त्व डॉ. होमी भाभांना लाभले होते. त्यांनी अणुयुगाची पहाट आपल्या कर्तृत्वाने भारताला दाखविली आणि या क्षेत्रातील अग्रगण्य अशा इतर बड्या राष्ट्रांच्या पंगतीला भारताला नेऊन बसविले. दुर्दैवाने या अणुशास्त्रज्ञाचे १९६६ मध्ये एका विमान अपघातात निधन झाले.

परंतु त्यांनी लावलेला अणुसंशोधनाचा दीप मात्र दिवसेंदिवस अधिकाधिक प्रज्वलित होऊन भारताची या क्षेत्रात झपाट्याने प्रगती करीत आहे. जगात भारताची शान वाढवण्यात, मान उंच करण्यात डॉ. होमी भाभा यांचा सिंहाचा वाटा आहे.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

होमी भाभा मराठी निबंध | doctor homi bhabha marathi nibandh

होळी वर मराठी निबंध | holi essay in marathi 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण होळी वर मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधामध्‍ये होळी या सणाविषयी असणारी ऐतिहासिक माहीती  व आज आपण हा सण कश्‍याप्रकारे साजरा करतो याची सविस्‍तर माहीती दिली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला

holi-essay-in-marathi
holi-essay-in-marathi



भारतात साजरे केले जाणारे विविध सण आपला अमूल्य वारसा आहेत. मन प्रसन्न ठेवण्यासाठी सणांची मदत होते. होळी हिंदूंचा प्रसिद्ध सण आहे. होळी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला येते.

प्रत्येक सणाला काही ना काही ऐतिहासिक पार्श्वभूमी असते. त्याचप्रमाणे होळी लाही स्वत:चा एक इतिहास आहे.


हिरण्यकश्यप नामक एक नास्तिक राजा होता. त्याला आपल्या शक्तीचा फार गर्व होता. त्याने स्वत: ला ईश्वर म्हणून घोषित केले होते. त्याने प्रजेला सांगितले की, प्रजेने त्याची पूजा करावी. जी व्यक्ती त्याची पूजा न करता देवाची पूजा करेल त्याला शिक्षा करण्यात येईल. त्याचा पुत्र प्रल्हाद ईश्वरभक्त होता. त्याने आपल्या पित्यास ईश्वर मानण्यास नकार दिला. हिरण्यकश्यपूने आपल्या पुत्रास ठार मारण्याचे अनेक प्रयत्न केले. परंतु हिरण्यकश्यपूला यश मिळाले नाही. म्हणून त्याने आपली बहीण होलिकाला आपल्या दृष्कृत्यांत सामील करून घेतले.


होलिके जवळ ईश्वराने दिलेले एक असे वस्त्र होते, ज्याला आग जाळू शकत नव्हती. होलिका लाकडांच्या ढीगावर ते वस्त्र परिधान करून, प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसली. मात्र प्रल्हादला भगवान विष्णूचे वरदान मिळाल्याने या आगीत होलिका जळून भस्म झाली पण प्रल्हादाच्या केसालाही धक्का लागला नाही. ही घटना दरवर्षी आपणास पाप आणि अन्यायाची होळी करण्याचा उपदेश करते.



होळीचा संबंध भगवान श्रीकृष्णाशी पण आहे. गोप-गोपिकांची होळी फार प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात होळी खेळली जाते. होळीच्या दिवशी लोक आपल्या गल्लीच्या चौकात लाकडे जमा करून खूप उंच होलिका (म्हणजे एक लांब लाकूड) त्या लाकडांच्या ढीगात लावतात. संध्याकाळी स्त्रिया नारळ धूप इत्‍यादीनी होलिकेची पूजा करतात. तिला फेऱ्या घालत दोरा गुंडाळतात. रात्री निश्चित मुहूर्तावर होलिका दहन केले जाते. होळीत गव्हाच्या ओंब्या भाजून मित्रांमध्ये वाटून खातात.



होलिका दहनाच्या पाचव्या दिवशी रंगांची होळी असते. त्यात एक वेगळीच मजा व आनंद असतो. तरुण युवकांच्या टोळ्या गात नाचत रस्त्यावर येतात. पाण्यात वेगवेगळे रंग मिसळून एकमेकांच्या अंगावर टाकतात. एकमेकांच्या तोंडाला लाल, गुलाबी, पिवळे रंग लावतात व एकमेकांना मिठ्या मारतात. रंगीबेरंगी चेहरे आणि रंगीबेरंगी कपडे मजेदार दिसतात. सकाळपासूनच बायका फराळाचे पदार्थ व मिठाया बनवू लागतात.



प्राचीन काळापासून हा सण साजरा केला जातो. यात लहानापासून थोरापर्यंत सर्वजण उत्‍साहाने भाग घेतात  हा एक असा सण आहे जो जातिभेद, उच्च नीचतेची भावना नष्ट करतो.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

होळी वर मराठी निबंध | holi essay in marathi

नाताळ वर निबंध | Christmas Essay in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण ख्रिसमस (नाताळ) मराठी निबंध बघणार आहोत.  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला


ज्याप्रमाणे दसरा आणि दीपावलीचा संबंध राम आणि कृष्णाशी आहे, गोकुळाष्टमा चा संबंध कृष्णाशी आहे त्याचप्रमाणे ख्रिसमसचा संबंध येशू ख्रिस्ताशी आहे. ख्रिसमसचा सण दरवर्षी २५ डिसेंबरला मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याच दिवशी लोकोद्धारक, परम दयाळु, गरिबांचा सेवक येशूचा जन्म झाला होता. जगात ते मसीह (मृतांना जीवन देणारा) म्हणून विख्यात झाले. म्हणून त्यांना इसा मसीह म्हटले जाते.


Christmas-Essay-in-Marathi
Christmas-Essay-in-Marathi




२५ डिसेंबरच्या आधी आठवडाभर धूमधाम सुरू होते. लोक आपल्या घरांची स्वच्छता करतात. घरे, दुकाने, कार्यालये, शाळा, महाविद्यालयांत स्वच्छता अभियान चालविले जाते. बंगल्यापासून झोपडीपर्यंत घरे झगमगू लागतात. दुकाने मालाने गच्च भरली जातात. मिठाया, नवी वस्त्रे, नव्या भेटवस्तू लोकांना आपल्याकडे आकर्षित करतात. सणाच्या आनंदात घराच्या अंगणात ख्रिसमसचा वृक्ष सजविला जातो. त्यावर चित्रे, फळे, फुळे, फुगे, खेळणी अडकविली जातात. चर्चची सजावट केली जाते. 


सणाचा प्रारंभ चर्चमध्ये विशेष स्तोत्रे व आनंद गीते गाऊन होतो. हा सण २५ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत चालतो. लोक आपल्या स्नेह्यांना मिठाई देतात. एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा व्यक्त करतात. प्रीतिभोजाचे आयोजन केले जाते. रात्री दिवे आणि लाईटमुळे सारा गाव प्रकाशित होतो. ठिकठिकाणी येशू ख्रिस्ताच्या जीवनावर नाटक सादर केले जाते. मोठ्या शहरांत मिरवणूक काढली जाते. ख्रिसमसच्या रात्री मुलांच्या उशाशी चॉकलेट, खेळणी, मिठाई ठेवली जाते. सकाळी मुलांना सांगितले जाते की हे सर्व दयाळू, वृद्ध सांताक्लॉजने भेट म्हणून दिले आहे.


ख्रिसमसचा सण पुनर्मिलनाचा सण आहे. या दिवशी लोक आपल्या कुटुंबीयांना भेटतात. त्यासाठी आपल्या दूर असलेल्या नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणाहून आपल्या गावी येतात. संपूर्ण जगात हा सण उत्साहाने साजरा केला जातो. हिंदू लोक आपल्या ख्रिश्चन मित्रांना शुभेच्छा व भेटवस्तू देतात. राष्ट्रपती आणि पंतप्रधान देशातील ख्रिश्चन बांधवांना शुभेच्छा संदेश देतात. ख्रिसमसचा सण आपणास सेवा, त्याग आणि क्षमाशीलतेचा संदेश देतो. हा दिवश येशू ख्रिस्ताच्या महानतेची आठवण करून देतो.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

नाताळ वर निबंध | Christmas Essay in Marathi

पोळा मराठी निबंध | pola essay in marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पोळा मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधामध्‍ये पोळा हा सण कश्‍याप्रकारे व का साजरा करतात याबद्दल माहीती दिली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.




ज्याप्रमाणे पोंगल हा दक्षिण भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. त्याचप्रमाणे 'पोळा' हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. शेतीचा व्यवसाय बैलांच्या जिवावरच करता येतो. भारतीय संस्कृतीत गाई बैलाला महत्त्वाचे स्थान आहे. त्यांची पूजा केली जाते. 


'पोळा' हा सण श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी येतो. ज्या बैलांकडून वर्षभर आपण काम करून घेतो त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करतात. या दिवशी पहाटेच शेतकरी बैलाला आंघोळ घालतात. मग बैलाला सजविण्याचे काम सुरू होते. बैलांच्या अंगावर विविध रंगांचे छापे मारतात. शिंगांना रंग देतात. बैलांच्या गळ्यात घुगूरमाळा घालतात. अंगावर झूल घालतात.


बैलं सजले की गावातील सगळ्या बैलांची मिरवणूक काढतात. त्यावेळी तरुण मुले मिरवणुकीपुढे बेभान होऊन नाचतात. त्यानंतर प्रत्येक शेतकरी आपले बैल घरी नेतो. तिथे त्याची पत्नी बैलाची मनोभावे पूजा करते. त्याला पोटभर पुरण पोळी खाऊ घालते. घरातील लहान थोर बैलांच्या पाया पडतात.



बैलांची मिरवणूक ज्यांच्या दारावरून जाते ते लोक बैलांची पूजा करतात. स्वतःच्या मालकीचे बैलं नसले तरी कोणत्याही बैलाची पूजा केल्यास चालते. शहरात बैलं नसतात म्हणून लोक कुंभाराकडून मातीचे बैलं आणून त्यांची पूजा करतात. पोळ्याच्या दिवशी बैलाला कोणत्याही कामाला लावण्यात येत नाही. त्याला मारत नाहीत. माणसाबद्दलची कृतज्ञता तर कुणीही व्यक्त करतो, पण प्राण्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचे वैशिष्ट्य जगात फक्त भारतीय संस्कृतीतच दिसते.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


pola-essay-in-marathi
pola-essay-in-marathi

पोळा मराठी निबंध | pola essay in marathi

 संगणक शाप की वरदान मराठी निबंध | computer shap ki vardan essay in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण संगणक शाप की वरदान मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्‍ये संगणकाच्‍या वापरामुळे होणारे फायदे व नुकसान याबद्दल सविस्‍तर माहीती दिली आहे.  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

 

computer-shap-ki-vardan-essay-in-Marathi
computer-shap-ki-vardan-essay-in-Marathi



अत्याधुनिक संगणक हा विज्ञानाचा चमत्कार आहे. पण संगणकाचा वापर हानिकारक ठरणार की लाभदायक? संगणक शाप ठरेल की वरदान? हे प्रश्न बहुचर्चित ठरले आहेत. एक संगणक साधारण पंधरा माणसांचे काम करतो. संगणकाच्या साहाय्याने कामे करणारा यंत्रमानव तर एकावेळी साधारणतः पन्नास माणसांचे काम करतो आणि तेही कमी वेळात व अगदी अचूक. 


संगणक अवकाशयाने (spaceship) नियंत्रित करू शकतो. पाणबुड्यांवर नियंत्रण करतो आणि जमिनीवरील जी जी कामे मानव करतो ती सर्व कामे तो करतो. सध्या प्रवासी वाहनांत जागांचे आरक्षण करण्यासाठी, तसेच सर्व प्रकारच्या परीक्षांचे जटिल स्वरूपाचे काम करण्यासाठी संगणकाला वेठीला धरले आहे. आता बँकांमध्येही संगणकाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यास सुरवात झाली आहे. जेथे विषारी वायूंचा धोका आहे, तिथे संगणकनियंत्रित यंत्रमानवाचा (रोबॉट) उपयोग करून प्राणहानी टळू शकते.


संगणकामुळे कामातील चुका टाळता येतात. त्यामुळे उत्पादनखर्चात बचत होते. अर्थातच वस्तू कमी दरात विकता येते. या साऱ्यांमुळे जागतिक बाजारपेठेतील मालाची मागणी वाढते व त्यामुळे मिळणाऱ्या परकीय चलनातही वाढ होते. संगणक माणसाला बाजूला सारून काम करतो. त्यामुळे संगणकाचा वापर हा शापच आहे असे वाटू लागते. आधीच लोकसंख्या भरपूर, त्यात रोजगाराच्या संधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत; अशा परिस्थितीत संगणक म्हणजे दुष्काळात तेरावा महिना ठरणार नाही का?



प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. तसेच संगणकाच्या चांगल्या व वाईट दोन्ही बाजू आहेत. अणुबॉम्बने जपानचा सर्वनाश केला. पण त्याच अणुशक्तीचा आपण विकासासाठी उपयोग करून घेत आहोत. नांगरणी, शिंपणी, मळणी इत्यादींसाठी मोठमोठी अवजारे आज आपण वापरतो. ही अवजारे प्रथम वापरात आली त्यावेळेस बेकारीचे असेच संकट मजुरांवर आले होते, त्याला आपण तोंड दिलेच. तसेच संगणकाचा उपयोग केल्यावर निर्माण होणाऱ्या बेरोजगारांना दुसरीकडे रोजगार उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करता येईल.


संगणकाच्या उपयोगाने आर्थिक बचत खूप होईल. या आर्थिक बळाचा उपयोग करून अधिकाधिक उदयोगधंदे निर्माण करता येईल. संगणक तयार करण्यासाठी, तसेच संगणकातील बिघाड दुरुस्त करण्यासाठी, संगणकाला लागणारे प्रोग्रॅम्स बनवण्यासाठी अनेक प्रशिक्षित माणसांची आवश्यकता असते. बेरोजगारांना प्रशिक्षण देऊन या कामात त्यांना गुंतवता येईल.



संगणक विज्ञानाचे एक अपत्य आहे. मानवाला विज्ञानाने दिलेले एक प्रभावी साधन आहे. तेव्हा संगणकाचा वापर मानवासाठी जास्तीत जास्त सुखसुविधा निर्माण करण्याकरता केल्यास, संगणक हे मानवाला लाभलेले वरदान ठरेल यात शंका नाही. आज भारतीय तरुण संगणकतज्ज्ञ अमेरिकेतील 'सायबर लॉबी' सांभाळत आहेत. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संगणक हा आवश्यकच आहे. मग सांगा, संगणक हा वरदान नाही का? संगणकासाठी माणूस नसून माणसासाठी संगणक आहे, हे लक्षात ठेवले म्हणजे संगणकाची धास्तीच उरणार नाही.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


महत्‍वाचे मुद्दे : 

(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )


  • संगणक हा एक चमत्कारच
  • अचूकतेने व अफाट गतीने कामे
  • एकाच वेळी अनेक माणसांची कामे
  • विविध प्रकारची कामे
  • शाप असे वाटते बेकारी
  • पण ही समजूत चूक
  • संगणकामुळे इतरही उदयोगांची क्षेत्रे निर्माण
  • संगणकामुळे झालेल्या बचतीतून इतर उदयोगधंदे निर्माण करावेत
  • संगणक हा वरदानच
  •  त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे

संगणक शाप की वरदान मराठी निबंध | computer shap ki vardan essay in marathi

 मदर टेरेसा मराठी निबंध | Mother Teresa Essay in Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मदर टेरेसा मराठी निबंध बघणार आहोत.चला तर मग सुरूवात करूया निबंधाला

Mother-Teresa-Essay-in-Marathi
Mother-Teresa-Essay-in-Marathi


निबंध 1 


कलकत्याच्या एका रस्त्यावरून एक विदेशी स्त्री चालली होती. तिच्याबरोबर तिच्या दोन सहकारी स्त्रियाही होत्या. पोशाखावरून ती स्त्री सेवाव्रत स्वीकारलेली धर्मप्रचारिका वाटत होती. रस्त्याच्या कडेला एक माणूस असहाय अवस्थेत पडला होता. जाणाऱ्या-येणाऱ्यांना त्याच्याकडे पाहायलाही सवड नव्हती. तो आता फार थोड्या तासांचा सोबती होता. त्या स्त्रीने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्याला आपल्या आश्रमात आणले. त्याचे अंग पुसले. त्याला स्वच्छ कपडे घातले. मरण्यापूर्वी मिळालेल्या या वागणुकीने त्याचा चेहरा उजळला. तेव्हा ती स्त्री आपल्या साथीदार स्त्रियांना म्हणाली, "मरताना त्याला जर जाणवले की, आपले कोणी तरी आहे तर त्याचे मरण सुखाचे होईल."



एका भिकाऱ्याचा एवढा विचार करणारी ही जगावेगळी आई म्हणजे 'मदर टेरेसा' होय. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांना आपल्या जीवनध्येयाचा साक्षात्कार झाला; तेव्हाच त्यांनी स्वत:ला गरिबांच्या सेवेसाठी वाहून घ्यायचे ठरवले. अठराव्या वर्षी त्यांनी धर्मप्रचारिकेची दीक्षा घेतली व घर सोडले. १९३१ साली दार्जिलिंग येथे त्यांनी सेवेची व धर्मप्रचाराची शपथ घेतली व १९३९ साली त्यांनी कलकत्त्यात आपल्या कामाला सुरवात केली. आतापर्यंत त्यांचे हे कार्य अखंड चालू आहे. १० सप्टेंबर १९४६ नंतर त्यांनी झोपडपट्टीतील दीनदुबळे व गरीब यांच्यासाठी आपले आयुष्य वेचण्याचे ठरवले व त्या लाखो अनाथांच्या, अपंगांच्या सर्वार्थाने 'मदर' झाल्या.


 मदर टेरेसांच्या या सेवेचे मोल जगाला उमगले आणि १९७९ साली त्यांना 'शांततेचे नोबेल पारितोषिक' मिळाले. ती संपूर्ण रक्कमही त्यांनी गरिबांसाठीच खर्चण्याचे ठरवले. भारतानेही 'भारतरत्न' हा किताब देऊन त्यांचा गौरव केला आहे. मदर टेरेसा म्हणजे साक्षात प्रेम आणि मूर्तिमंत करुणा होय.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. व पुढील दुसरा निबंध वाचण्‍यास विसरू नका  धन्‍यवाद





निबंध 2



ती समाजात सेवेचे व्रत घेऊन 'सिस्टर' म्हणून उतरली आणि आपल्या कार्याने समाजाची 'मदर' झाली, अशी ही एक आगळी आई - म्हणजे 'मदर तेरेसा'. स्वत:चे सर्वस्व इतरांच्या सेवेसाठी झोकून देण्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे 'मदर तेरेसा'. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मदर तेरेसांचे सेवाकार्य चालू होते आणि त्याचा विस्तार जगातील पाच खंडांत, सव्वाशे देशांत झालेला आहे.



मदर तेरेसा या मूळच्या अल्बानिया या देशातील. २६ ऑगस्ट १९१० मध्ये 'स्कोपजे' नावाच्या खेड्यात त्यांचा जन्म झाला होता. वयाच्या एकोणिसाव्या वर्षीच त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित केले. 'नन' बनून दुःखितांचे दुःख दूर करायचे हे ते ध्येय होते.


सिस्टर अॅग्नेस म्हणून त्या भारतात कोलकाता येथे आल्या, तेव्हा 'जनसेवा' या एकाच विचाराने त्या झपाटलेल्या होत्या. २४ मार्च १९३१ मध्ये त्यांनी पहिली शपथ घेतली. त्यानुसार त्यांनी गरिबी, ब्रह्मचर्य व कृपाशीलता या गोष्टी स्वीकारल्या. स्वत:साठी 'तेरेसा' हे नाव घेतले. कोलकाता येथे आल्यावर त्यांनी प्राथमिक शाळेत शिकवण्याची जबाबदारी स्वीकारली.


 त्यासाठी प्रथम त्यांनी बंगाली व हिंदी भाषा शिकून घेतल्या. नंतर त्यांची शाळेतील कारकीर्द ' उत्कृष्ट शिक्षिका' म्हणून ठरली. शिक्षिकेचे काम करत असताना सिस्टर तेरेसांना 'ईश्वरी' आवाहन झाले आणि 'कॉन्व्हेंट 'च्या चार भिंती सोडून त्या अधिक व्यापक कार्यासाठी बाहेर पडल्या. त्यांनी मिशन स्थापन केले. सेंट तेरेसा शाळेत पहिले औषधालय काढले व शिवणकामाचे वर्ग सुरू केले.



२० डिसेंबर १९४८ मध्ये त्यांनी कोलकाता शहरात मध्यभागी असलेले 'मोतीझल' हे ठिकाण ही आपली कर्मभूमी म्हणून निवडली. त्यावेळी ते ठिकाण अत्यंत घाणेरडे व अस्वच्छ होते. असाध्य रोगाने ग्रासलेल्या एका मरणासन्न व्यक्तीला त्यांनी रस्त्याच्या कडेला पाहिले. त्या व्यक्तीचा शेवट तरी शांततापूर्ण व्हावा म्हणून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तिला उचलून आपल्या संस्थेत आणले. या घटनेतूनच तेरेसांचे 'सेवागृह' सुरू झाले व तेरेसा त्या सेवागृहाच्या 'मदर' झाल्या.



त्या क्षणापासून या मदरचे काम सतत विस्तारतच गेले. त्यांनी १२५ देशांत ७५५ आधारगृहे काढली. 'मिशनरीज ऑफ चॅरिटी' ही आंतरराष्ट्रीय संस्था त्यांनी सुरू केली. या संस्थेमार्फत पाच लाख लोकांना रोजचे मोफत जेवण सुरू झाले. तीन लाख लोकांना मोफत उपचार मिळू लागले. वीस हजार मुलांच्या शिक्षणाची सोय झाली. यांखेरीज अपंग संस्था, कुष्ठधाम, दुर्बलांसाठी निवारे, व्यसनग्रस्तांसाठी उपचारगृहे त्यांनी सुरू केली. २५ जानेवारी १९६२ रोजी भारत सरकारने त्यांना ' पद्मश्री' हा किताब देऊन गौरवले. १९७१ मध्ये त्यांना 'रॅमन मॅगॅसेसे अॅवॉर्ड' मिळाले. त्यातून त्यांनी आग्रा येथे कुष्ठरुग्णांसाठी आश्रम सुरू केला.



वॉशिंग्टन येथील जोसेफ केनेडी अकादमीचे पारितोषिकही त्यांना मिळाले. त्या पैशांतून त्यांनी कोलकात्याच्या डमडम उपनगरात मनोदुर्बल मुलांसाठी रुग्णालय सुरू केले.  १९७९ साली मदर तेरेसा यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक मिळाले. त्या निमित्ताने तेथे होणारी मेजवानी रद्द करवून घेऊन त्यासाठी होणाऱ्या खर्चाची रक्कम त्यांनी आपल्या कार्यासाठी देणगी म्हणून स्वीकारली. १९८० मध्ये भारत सरकारने त्यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब बहाल करून सन्मानित केले. ५ सप्टेंबर १९९७ रोजी त्यांचे वयाच्या ८८व्या वर्षी कोलकाता येथे निधन झाले. शेवटपर्यंत मोह, मत्सर या दुर्गुणांच्या पलीकडे जाऊन माया, प्रेम, सेवा आणि भक्ती यांचाच साऱ्या जगावर या मदरने वर्षाव केला. अशी होती ही एक आगळी आई !


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

मदर टेरेसा मराठी निबंध | Mother Teresa Essay in Marathi

 संगणक वर मराठी निबंध | Computer Essay In Marathi

निबंध 1

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण संगणक वर मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधामध्‍ये संगणकाच्‍या इतीहासापासुन ते आजपर्यंत ते कोणकोणत्‍या उपयोगात येत आहेत त्‍याबद्दल सविस्‍तर माहीती तारखासहीत दिली आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला


संगणक संस्कृतीच्या विकासाबरोबरच उत्तरोत्तर मानवाची वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती होत गेली. विविध इलेक्ट्रॉनिक तंत्राच्या शोधाबरोबरच अनेक आधुनिक उपकरणे निर्माण केली गेली. वास्तविक संगणक ही मानवाने लावलेल्या शोधांतून मिळालेली देणगी आहे. संगणकाचा उपयोग संशोधनकार्य, शोध ऋतुसंबंधीची माहिती, बँक, इत्यादी अनेक क्षेत्रांत होतो.

Computer-Essay-In-Marathi
Computer-Essay-In-Marathi

संगणकाच्या वापरामुळे कार्यास गती येते. कार्य कौशल्यपूर्ण होते. आकडेवारी व माहितीचा चांगला उपयोग होतो. कार्यप्रणालीवर चांगले नियंत्रण राहते.संगणकाची कार्यपद्धती द्विआधार पद्धती (बायनरी सिस्टिम) वर आधारित आहे. जर्मनीतील गणितज्ञ व तत्त्वज्ञ गोटफ्रिड, बिलहेल्म लायबनिज (१६६४-१७९६) ने असे सुचविले की सर्व पाढ्यांचा आधार शून्य व एक मानावा या द्विआधारी पद्धतीत बेरीजवजाबाकीची प्रक्रिया सहजपणे करता येते. गुणाकार आणि भागाकार पण बेरजेच्या क्रमात करता येतो. या पद्धतीत अंकाची सुरवातीच्या व शेवटच्या अक्षरांना जोडल्यानंतर जो शब्द त्यास 'दुयंक' (Bit) म्हणतात. आठ बिटांच्या समूहाला बाईट (Byte) म्हणतात. १०२४ बाईट समूह मिळून एक किलोबाईट बनतो.


अंदाजे १५० वर्षांपूर्वी सर्वप्रथम संगणक निर्मितीच्या सिद्धांताचे प्रतिपादन इंग्लंडमधील चार्ल्स बेबेज या शास्त्रज्ञाने केले. याच्याच सिद्धांताच्या आधारावर हॉर्वर्ड विद्यापीठ (अमेरिका) १९३७ ते १९४४ या काळात संगणकाचा प्राथमिक विकास प्रा. होबोर्ड आयकन याने केला. या संगणकाचे वजन दोन टन होते. त्याची लांबी १५ मीटर व रुंदी 27 मीटर होती. 


१९६५ मध्ये इंटिग्रेटेड सर्किटपासून (IC) पहिला संगणक निर्माण करण्यात आला. त्यानंतर मागील काही वर्षांत संगणकाचा वेगाने विकास झाला. आता संगणक मनुष्यच संचालित करतो. त्याच्याच सूचनेप्रमाणे तो काम करतो. संगणकात मानवसदृश सर्व गुणांचा समावेश करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.


संगणकाचा प्रमुख भाग म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (CPU) ज्यात अनेक छोटे भाग असतात. संगणकाच्या एककापासूनच गणना होते. सेंट्रल प्रोसेसिंगशिवाय त्याचे अन्य भाग विद्युत कुंजिका, विद्युत यांत्रिक प्रिंटर डिस्क संचय एकक(hard disk drive), आवरण, इंटरफेस आणि टेपडेक असतात.


 भारतात शिक्षणाचा प्रसार-प्रचारासाठी संगणकाचा उपयोग केला जातो. साक्षरतेच्या मोहिमेत संगणक महत्त्वाची भूमिका बजावीत आहे.वर्गात शिक्षक जे व्याख्यान देतात त्याचा फायदा सर्व विद्यार्थ्याला होतोच असे नाही. परंतु संगणक प्रत्येक विद्यार्थ्याला सारखे शिक्षण देण्यात सक्षम आहे.



संगणकाच्या उपयोगामुळे बँकेच्या कार्यात सुधारणा झाली आहे. बँकेत संगणकावर प्रत्येक ग्राहकाच्या खात्याची संपूर्ण माहिती पाहावयास मिळते. त्याचे प्रिंट आऊट पण काढता येते. बँकेचा दैनंदिन हिशेब काही क्षणांतच संगणक आपणास देतो. संगणकात ग्राहकांच्या हस्ताक्षरांचा संग्रह करून एका स्कॅनरच्या साह्याने काही क्षणांत त्यांच्या हस्ताक्षराची तपासणी करता येते. बँकेच्या बाहेर कॉम्प्युटराईज्ड स्वयंचलित यंत्रे बसविलेली असतात. त्याद्वारे ग्राहक केव्हाही पैसे काढू शकतात, जमा करू शकतात, चेकसाठी अर्ज करू शकतात. याला वेळेचे बंधन नाही. 


संगणकाद्वारे वधुवरांची निवड करता येते. अनेक उपवर तरुण-तरुणींचे स्वभाव, वय, जात, आवडी इत्यादी माहिती संगणकात साठविली जाते. याच आधारावर निवड केली जाते.


रशिया, अमेरिका, भारत आणि इतर अनेक देशांमध्ये संगणकाचा उपयोग संरक्षण कार्यात होतो. याद्वारे गुन्हयांचा तपास केला जातो. विद्यार्थ्याचे निकाल तयार केले जातात. विविध विषयांचा अभ्यासक्रम तयार करण्यात मदत होते. विमाने आणि रेल्वेत आरक्षण करता येते. संगणकाच्या मदतीने अनेक टेलिफोन लाईन्स एकमेकांना जोडल्या जातात. एखाद्या व्यक्तीच्या गैरहजेरीत फोनवर आलेला संदेश संगणक टाईप करून ठेवतो आणि फोन करणाऱ्याला ती व्यक्ती कधी उपलब्ध असू शकेल ते सांगतो ई-मेलची सोय पण संगणकावर उपलब्ध असते.



संगणकाचा उपयोग डिझाईन, ड्रॉईंगसाठी पण केला जातो. यामुळे चित्रपट उद्योगात क्रांती घडून आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातही संगणकाचा उपयोग होतो. वाहतूक नियंत्रणासाठी संगणकाचा वापर केला जातो. वाहनांच्या येण्या जाण्यावर संगणकाच्या आदेशामुळे आपोआप नियंत्रण येते.


वाहनांची, प्रवाशांची संख्या संगणक सांगतो. मोटार वा अन्य वाहनात रेडियो संचार व्यवस्थेखेरीज एक मायक्रो संगणक असतो. आवश्यकतेनुसार तो अॅम्ब्युलन्स, अग्निशमनाची त्वरित मागणी करतो. रोबोट हा सुद्धा एक प्रकारचा संगणकच आहे. तो माणसाप्रमाणे कार्य करतो.



संगणकाचा दुरुपयोग पण केला जातो उदा. जुगार खेळणे, संगणकाच्या साह्याने कुणाचेही चित्र काढुन त्‍यात अनावश्‍यक असे बदल करने.  कधीकधी संगणक चुकाही करतो. काही जणांना अशी भीती वाटते की संगणक मानवी बुद्धीच्याही पुढे जाईल. परंतु संगणक हे एक निर्जीव यंत्र असल्यामुळे ही गोष्ट शक्य नाही. ही गोष्ट खरी की संगणक अत्यावश्यक यंत्र आहे ज्याचा विकास आपल्या सुखासाठी निरंतर केला जाऊ शकतो.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका  


संगणक मराठी निबंध 

निबंध 2

संस्कृती आणि सभ्यतेच्या विकासाबरोबरच मानवाने शास्त्रीय व तांत्रिक क्षेत्रात उन्नती केली. त्याने इलेक्ट्रॉनिक तांत्रिक शोध लावून मानवोपयोगी आधुनिक उपकरणे बनविली. संगणकाचा शोध मानवाच्या यशाचे एक अद्वितीय उदाहरण आहे. शोध कार्य व अन्य क्षेत्रातून संगणकाला काढून टाकला तर मानव शास्त्रीय प्रगती करू शकणार नाही. 


मागील काही वर्षांत संगणाकाचा विकास तीव्रतेने झाला आणि होत आहे. संगणक मानवाच्या सूचनेनुसारच कार्य करतो. टाईपरायटरप्रमाणेच संगणकात अक्षरांचे, अंकांचे, विरामचिन्हांचे संकेत असलेल्या बटण असतात. त्यांच्या साहाय्याने संगणकाला आदेश दिला जातो. संगणकात लिहिले गेलेले सर्व आकडे, साहित्य साठविले जाते आणि ते एकानंतर एक समोर येतात.


 संगणकात साठविलेल्या साहित्याचे आकडेवारीचे मुद्रण प्रिन्टरच्या सहाय्याने करता येते. आपल्या दैनिक जीवनात संगणकाचा उपयोग खूप वाढला आहे. त्याद्वारे अनेक कामे करवून घेतो. संगणकामुळे मोठमोठी व किचकट कामे, आकडेमोडी चुटकीसरशी होतात. संगणकाद्वारे गुन्हयाची तपासणी केली जाते. विद्यार्थ्यांचे निकाल तयार केले जातात. लहान मुले संगणकावर खेळ खेळतात.


 विविध विषयांचे पाठ्यक्रम संगणकावर तयार होतात. रेल्वे आणि विमानाचे आरक्षण संगणकाच्या मदतीने करता येते. बँकांमध्ये पण संगणकाचा उपयोग वाढला आहे. बँकेतील संगणकात प्रत्येक ग्राहकाचे खाते व त्याचे पूर्ण विवरण साठविलेले असते. बँकेतील दैनंदिन देण्याघेण्याचे हिशेबही असतात. ग्राहकाला संगणकावर त्वरित आपल्या खात्याची माहिती मिळु  शकते.



भारतात शिक्षणाच्या प्रसार-प्रचारासाठी संगणकाचा उपयोग केला जातो. प्रामुख्याने दूर शिक्षण घेणाच्या विद्यार्थ्यांना त्याचा जास्त फायदा होतो. चित्रपट उद्योगातही संगणकाच्या साहाय्याने दृश्यांचे चित्रण होते. वाहतुकीचे नियंत्रणही संगणकाच्या साहाय्याने केले जाते. आपात्कालीन बातम्यांचे प्रसारणही संगणक करतो. अलीकडे लोकप्रिय झालेल्या इंटरनेट सेवेअंतर्गत संगणक टेलिफोनच्या तारांद्वारे जोडले आहेत ज्यामुळे महत्त्वाचे संदेश क्षणात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात.


संगणक आज मानवासाठी अति आवश्यक आणि महत्त्वपूर्ण यंत्र आहे ज्याचा उपयोग आपल्या गरजांनुसार सतत केला जात आहे. भविष्यात याचा उपयोग आणखी वाढतच जाणार आहे.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

संगणक वर मराठी निबंध | Computer Essay In Marathi