गुलाबफुलाचे मनोगत (गुलाबपुष्प प्रदर्शनात पहिला क्रमांक मिळालेल्या)  मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Gulab Fulache Manogat Essay In Marathi

गुलाबफुलाचे मनोगत (गुलाबपुष्प प्रदर्शनात पहिला क्रमांक मिळालेल्या)  मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Gulab Fulache Manogat Essay In Marathi :  “मित्रांनो, या तुमच्या समारंभात आज मला भाषण करण्याची संधी हवी आहे. मला ओळखलेत ना तुम्ही ! अहो, तुमच्या या समारंभातील मी सम्राज्ञी आहे. आज दोन दिवस येथे हे प्रदर्शन चालू आहे. या गुलाबपुष्प प्रदर्शनातील सम्राज्ञी ठरलेली मी एक गुलाबकळी. या प्रदर्शनात मी पहिला क्रमांक मिळविला आहे. तो मान तुम्हीच मला दिलात. हजारो फूलांतुन माझी निवड  झाली आहे. त्या निमित्ताने माझ्या मालकिणीचाही गौरव झाला आहे.


“माझ्या मालकिणीचे श्रेय मी मान्य करतेच. कारण तिने घेतलेल्या निगराणीमुळेच मलो आजचे हे सौंदर्य प्राप्त झाले आहे. दिवसातील बराच वेळ ती आमच्यासाठी खर्च करते. त्यासाठी ती बरेच वाचन करते, संशोधन करते आणि त्यामुळेच अनेकदा माझ्या मालकिणीला गुलाबपुष्प प्रदर्शनात बक्षिसे मिळतात. तिचा छंद आज तिचा ध्यास झाला आहे.



Gulab Fulache Manogat Essay In Marathi
Gulab Fulache Manogat Essay In Marathi


“आज मी तुम्हांला माझे मनोगत सांगणार आहे. आम्हां गुलाबपुष्पांचा जन्म माणसाच्या जन्मापूर्वीच झालेला आहे. तसे संदर्भ आढळतात. पण आमची निश्चित जन्मभूमी कोणती हे मात्र कुणाला सांगता येत नाही, तरी प्राचीनकाळी रोम हे गुलाबांच्या बागांसाठी विख्यात होते. दहाव्या शतकात अरबांनी आम्हांला भारतात आणले. तुमच्या प्राचीन वाङ्मयात आम्हांला अनेक नावांनी संबोधिलेले आहे. त्यांतील एक नाव आहे 'तरुणीपुष्प.'


 किती यथार्थ नाव आहे हे! तरुणतरुणींत मी विशेष प्रिय आहे. एकमेकांच्या प्रेमाचे प्रतीकच ते मला मानतात. मोगल राजांच्या काळात आमची लोकप्रियता विशेष वाढली. जहांगीर बादशहा ब बेगम नूरजहान यांच्या विवाहप्रसंगी आमच्यापासून प्रथम अत्तर तयार करण्यात आले.

“आज आमच्या हजारो जाती तयार करण्यात आल्या आहेत. पण सर्वच जाती सुगंधी नाहीत. नाना आकार, नाना रंग. मित्रांनो, आजवर आम्हांला अनेक गौरव लाभले. पंडितजींच्या कोटावरील लाल गुलाब हा विश्वप्रेमाचा संदेश देत होता. आज गुलाबपुष्पांचा छंद विश्वव्यापी झाला आहे. त्यामुळेच जगभर ठिकठिकाणी आमची प्रदर्शने भरविली जातात.


“या सगळ्यात एक खंत आहे की हे माझे वैभव फक्त काही मूठभर लोकांचीच मिरासदारी झाली आहे. गुलाबाचा छंद जोपासणे म्हणजे चिक काम आहे. त्यामुळे गोरगरीब याकडे वळतही नाहीत. कालपासून मी पाहते, एवढी मंडळी माझे सौंदर्य पाहून गेली पण त्यांत एकही श्रमिक नव्हता, झोपडपट्टीतील एकही मूल नव्हते.


 मी मान्य करते की माझ्यासारखी फुले देणारी झाडे ते लावू शकणार नाहीत पण या प्रदर्शनातील हजारो फुलांचे अनुपम सौंदर्य ते आपल्या डोळ्यांनी लुटू शकणार नाहीत का? हा आगळा आनंद त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. दोन दिवस हे प्रदर्शन तिकिट लावून झाले. आता एखादा दिवस विनातिकिट हे प्रदर्शन ठेवले तर चालणार नाही का? भाकरीमागे धडपडणाऱ्या मंडळींना मुद्दाम येथे आणले तर ... तरच माझ्या या अल्पायुषी जीवनाचे खरे सार्थक होईल.”


टीप : वरील निबंध गुलाबफुलाचे मनोगत (गुलाबपुष्प प्रदर्शनात पहिला क्रमांक मिळालेल्या)  मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Gulab Fulache Manogat Essay In Marathi या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते


  • fulache manogat nibandh marathi
  • fulanchi atmakatha nibandh in marathi
  • fulanchi atmakatha essay in marathi language
  • fulache atmavrutta essay in marathi language
  • fulache atmakatha essay in marathi

गुलाबफुलाचे मनोगत (गुलाबपुष्प प्रदर्शनात पहिला क्रमांक मिळालेल्या) मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Gulab Fulache Manogat Essay In Marathi

गावकुसाबाहेरील वस्ती'चे आत्मवृत्त आत्‍मकथनात्‍मक मराठी निबंध 



मी गावकुसाबाहेरची वस्ती आहे' “पाहुण्यांनो, क्षणभर थांबा. नाकावर रुमाल ठेवून तुम्ही येथून झपाझप जात आहात. पण थांबा. मला तुमच्याशीच बोलायचे आहे. इतका वेळ तुम्ही गावाची प्रशंसा करीत होता. पण आता मला पाहुन नाक मुरडता. किती कृतघ्न आहात तुम्ही! 'गाव तिथं महारवाडा असायचाच' असे तुम्ही उपेक्षेने म्हणता. पण खरं सांगू का, हा महारवाडा आहे म्हणूनच गाव एवढा स्वच्छ आहे. गावातला केरकचरा हा महार गोळा करून आणतो. मेलेले ढोर हा मांग ओढून आणतो. या वस्तीतील ही सारी मंडळी गावासाठी राबत असतात आणि त्याबद्दल या लोकांना काय मिळते? तर केवळ शिव्याशाप.


"निसर्गाने सर्वांसाठी भरभरून दिलेले पाणीही या लोकांना मिळत नाही. तहान भागायची मारामार, मग त्यांनी स्वच्छ तरी कसे राहायचे? यांची पोटे तर सदा रिकामीच. मग जे काही मिळेल ते खायचे. 'शिळेपाके, आंबलेले' या शब्दांशिवाय दुसरे शब्द त्यांना माहीतच नाहीत. कष्टांशिवाय ‘कचाकचा भांडायचे' एवढीच त्यांची दुसरी करमणूक. कोणत्याही रोग-साथीला ही वस्ती प्रिय, मग फटाफट मृत्यू. नव्या जन्माचा आनंद नाही. मृत्यूचा शोक नाही. आनंद-शोक करायला येथील माणसांजवळ वेळ आहे तरी कुठे?

gavakusabaheril vastiche atamrutta essay in marathi
gavakusabaheril vastiche atamrutta essay in marathi


“आता हे गावकुसाबाहेरील जगही जागे व्हावयास लागले आहे. येथील काही मुले शहरात जाऊन शिक्षण घेत आहेत. त्यांच्यातला माणूस जागा झाला आहे. ते आपल्या लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊ लागले आहेत. गावाने दिलेले फाटके कपडेच तराळाने घातले पाहिजेत, नवीन कोरे कपडे अंगावर चढवायचे नाहीत, ही वर्षानुवर्षे चालत आलेली समजूत ते पुसू पाहत आहेत.


 ग्रहणाच्या वेळी 'दे दान सुटे गिराण' म्हणून दान मागायचे नाही अशी शिकवण ते आपल्या लोकांना देत आहेत. त्यांच्यातील भटक्या लोकांच्या मुलांना स्थिर जीवन लाभावे म्हणून त्यांची खटपट चालू आहे. त्यासाठी आता येथे शाळा पण सुरू झाली. गावातील विहिरीवर ते आपला हक्क आता संगू लागले आहेत. गावकऱ्यांना हे कसे रूचणार? मग ते म्हणतात-'म्हारडा मातला आहे.' कधी कधी मला पेटवून दिले जाते. मारझोड तर नित्याचीच. पण लक्षात ठेवा, आता मी ऐकणार .... वर्षे तुम्ही मला गावाबाहेर ठेवलेत, पण आता येथेही नवे गाव वसणार आहे."




वरील निबंध गावकुसाबाहेरील वस्ती'चे आत्मवृत्त आत्‍मकथनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

गावकुसाबाहेरील वस्ती'चे आत्मवृत्त आत्‍मकथनात्‍मक मराठी निबंध | Gavakusabaheril Vastiche Atamrutta Essay In Marathi


आज जोतिबा अवतरले तर मराठी निबंध

आज जोतिबा अवतरले तर मराठी निबंध Aaj Jyotiba Avtarle Tar Essay In Marathi : स्वार्थाने बरबटलेल्या आजच्या समाजावस्थेत जेव्हा एखादा अगतिक माणूस आदर्श शोधत हिंडायला लागतो तेव्हा वर्तमानकाळात तर त्याची पूर्ण निराशा होणे स्वाभाविकच आहे. परंतु जेव्हा का तो गेल्या शतकाचा वेध घेऊ लागतो, तेव्हा त्याला हिमालयासारखी उत्तुंग अशी अनेक व्यक्तिमत्त्वे भेटतात आणि मग अशा या अगतिक माणसाचे मन "रितेच जीवन सारे। ही तहान सांगा केव्हा संपायची?' या विचाराने आक्रंदू लागते.अशा मानसिक संभ्रमावस्थेत असताना मनात येते, आज जोतिबा अवतरले तर.


जोतिबा आज अवतरले तर ते आनंदित होतील की खंतावतील? असा प्रश्न पडतो. ज्या स्त्री-शिक्षणासाठी त्यांनी आयुष्यभर अट्टाहास केला ती स्त्री सुशिक्षित झालेली पाहन त्यांना आनंद होईल; पण त्याचबरोबर त्यांच्या डोळ्यांत पाणीही येईल. कारण स्त्रीवरचे अन्याय आजही संपलेले नाहीत. कारणे बदलली असतील; पण छळ तसाच चालू आहे. त्या काळी विधवा स्त्रीची मानहानी करून तिला घरातील विहिरीचा मार्ग दाखविला जात असे; तर आज स्त्रीला जिवंत जाळण्याच्या घटना घडताहेत.

Aaj Jyotiba Avtarle Tar Essay In Marathi
Aaj Jyotiba Avtarle Tar Essay In Marathi


ज्या दलितांच्या उद्धारासाठी जोतिरावांनी समाजाचा रोष ओढवून घेतला तो दलित तरी सुखी आहे का? जोतिबांनी आपल्या घरातील आड मुक्त करून या अस्पृश्यांची तहान भागविली; पण आज गावोगावी 'एक गाव एक पाणवठा' हा कार्यक्रम योजूनही खेडोपाडी हा अस्पृश्य अजूनही एका व्यापक अर्थाने तहानलेला आहे. आजही त्याची वस्ती गावकुसाबाहेरच आहे. 


जोतिराव आजअवतरले तर त्यांना आढळेल की, त्यांच्या मागणीनुसार आज शासनाने या मागासलेल्या लोकांना अनेक सवलती दिल्या आहेत, शिक्षणाच्या सोयी उपलब्ध केल्या आहेत; पण त्यांनी हा हरिजन सुखी झाला आहे का? सुशिक्षित झाला आहे का? नाही. फार थोड्या संख्येने तो साक्षर झाला आहे आणि जे शिकलेसवरले आहेत ते आपल्या समाजासाठी काही करीत आहेत का? याचा विचार केला तर निराशाच पदरी पडेल.बहुसंख्य दलित अजूनही जुन्या संस्कारांच्या, रूढींच्या पिंजऱ्यातच बंदिस्त आहेत.



जोतिबांना त्यांच्या 'शेतकऱ्याचा असूड' खेड्यातील भिंतीवर दिसेल. पण त्यांच्या कल्पनेतील खेडी तेथे आढळणार नाहीत. बहुतेक खेडी ओस पडलेली दिसतील. हा जमिनीचा पुत्र पोटार्थी होऊन शहरात गर्दी करताना त्यांना आढळेल. शेतकऱ्यांतही जोतिबांना एक नवा अपरिचित वर्ग आढळेल. तो म्हणजे 'सधन शेतकरी'. जोतिरावांच्या हयातीत या वर्गाचा उदय झाला नव्हता. शेतमजूर मात्र पूर्वीपेक्षाही अधिक दरिद्री झालेला त्यांना आढळेल पुण्याच्या बाजूला हिंडताना मात्र त्यांना आपल्या सावित्रीचे आगळे स्मारक दिसेल आणि ते म्हणजे 'सावित्रीबाई फुले दत्तक योजना'. 


गरीब घरांतील विदयार्थिनींच्या शिक्षणाची झालेली ती सोय पाहुन जोतिबांना गदगदून येईल. सावित्रीच्या श्रमाचे चीज झाले, या विचाराने ते आनंदित होतील आणि मग जोतिबा एक अर्ज लिहितील. कोणाला माहीत आहे? प्रत्यक्ष त्यांच्या निर्मिकाला-भगवंताला. कशासाठी? स्वर्गवासाची सुट्टी घेऊन ते भूलोकावर वास्तव्याला येतील आणि पुनश्च आपल्या कामाला लागतील.

वरील निबंध आज जोतिबा अवतरले तर मराठी निबंध हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

आज जोतिबा अवतरले तर मराठी निबंध | Aaj Jyotiba Avtarle Tar Essay In Marathi

 माणसे अमर झाली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक Manus Amar Zala Tar Essay In Marathi

निबंध 1 
माणसे अमर झाली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक Manus Amar Zala Tar Essay In Marathi:  माझा छोटा भाऊ विचारीत होता, “दादा, देवांना 'त्रिदश' का म्हणतात?" मी म्हणालो, "अरे, त्यांना माणसांसारखी चौथी वार्धक्यावस्था नाही.देव कधी मरत नाहीत." म्हणजे देव अमर आहेत. “देवांप्रमाणेच माणसे अमर झाली तर " त्याने प्रश्न निर्माण केला.


 खरोखर, देवांना मिळालेली संजीवनीची कुपी माणसापर्यंत आली तर? नाहीतरी आज माणसाचे त्या दिशेने प्रयत्न चालू आहेतच. रक्तदान, मूत्रपिंडदान असे अवयव दान करून, अवघड शस्त्रक्रिया पार पाडून आणि प्रभावी औषधोपचार करून तो माणसाला मृत्यूच्या दारातून मागे फिरवितो. आज माणसाची आयुर्मर्यादा वाढली आहे आणि मृत्युसंख्या घटली आहे; तरीपण मानव मृत्यूवर पूर्णपणे मात करू शकलेला नाही. आजही माणूस मर्त्य आहे. अशा या मानवाला संजीवनी गवसली तर....


Manus Amar Zala Tar Essay In Marathi
Manus Amar Zala Tar Essay In Marathi

तर प्रथम ज्याच्या हातास ती संजीवनी-अमृत-गवसेल तो लक्षाधीश, कोट्याधीश होईल. मग या अमृताचा काळाबाजार' होईल. कारण कोणतीही गोष्ट अदृश्य करून तिचा काळाबाजार करण्यात माणस मोठा पटाईत आहे. मग या अमृतातही भेसळ होईल व थोड्याच दिवसांत या अमृताची नक्कल केलेले कृत्रिम अमृतही बाजारात अवतरेल.

विचार करण्याचा मुद्दा असा आहे की, माणसाला अमृत गवसल्याने तरी त्याचे दुःख संपेल का? तो सुखी होईल का? होईल, कारण त्याला त्यामुळे आपल्या प्रिय माणसांचा वियोग होणार नाही. एक-एक कुटुंब म्हणजे पारंब्या फुटलेला मोठा वटवृक्षच होईल. पण यामुळे मात्र समाजाला नको असलेली दुष्ट माणसे देखील अमर होतील की! असे घडले तर मात्र माणसे सुखी होण्याची शक्यता कमीच. 


शिवाय 'अतिपरिचयात् अवज्ञा' या उक्तीनूसार अमरत्व प्राप्त झालेली ही माणसे एकमेकांचा दुस्वास करू लागतील. शिवाय या अनुषंगाने विचार करता, दोन पिढयांतील विचारांचे अंतर हीसुद्धा एक चिंतेची बाब ठरेल. आज अनेक घरांतून, समाजांतून अनेक त-हेचे वाद निर्माण झाले आहेत. माणसे अमर झाली तर हे पिढीतील विचारांचे अंतर फारच वाढेल. कुटुंबात, समाजात तीन-चार पिढ्या आढळतील. मग वादांना काय तोटा?



माणसाला अमरत्व प्राप्त झाले की, लोकसंख्या बेसुमार वाढणार आणि वाढत्या बेकारीचा प्रश्न 'आ' वासून उभा राहणार. आजही आपल्या देशापुढे बेकारीची समस्या आहेच, त्यामुळे मग माणसे अमर झाली तर हाहाःकारच उडेल. अन्नधान्य, पाणी, निवारा या मूलभूत गरजा भागविण्यासाठी आपल्याला आपल्या सवयी बदलाव्या लागतील. कदाचित या सर्व गरजा भागविण्यासाठी वैयक्तिक मालकी हक्काला राष्ट्रीय संपत्तीचे स्वरूप दयावे लागेल. प्रयोगशाळांना शरण जावे लागेल आणि निसर्गनिर्मित संपत्तीला मानवनिर्मितीची जोड दयावी लागेल.



 आपण अमर आहोत असे एकदा सिद्ध झाले की, माणसातील साहसी वृत्तीला उधाण येईल. चंद्राबरोबर इतर ग्रहांवर जाण्यासाठीही माणूस पुढे सरसावेल. धाडसी स्पर्धांना ऊत येईल. पण येथे एक धोकाही संभवतो. मरण नाही म्हटल्यावर पुनर्जन्माची कल्पना नष्ट होईल. त्याबरोबरच पापपुण्याचा निवाडा होण्याची कल्पनाही लोप पावेल. त्यामुळे माणूस दुष्कृत्ये करताना कचरणार नाही, ऐहिक जीवनात गुंतलेला असताना तो अध्यात्माचा विचार करणार नाही आणि मग मानवी जीवन क्षुद्र बनेल



या साऱ्या विचारांत एक धोका आपण विसरलो आणि तो म्हणजे माणूस अमर झाला तरी तो अजर होणार का? तसे नसेल तर माणसाला हे अमरत्व नकोसे होईल. जखमेची वेदना घेऊन शोकाकूल अवस्थेत फिरणारा चिरंजीव अश्वत्थामा आपल्या परिचयाचा आहेच. त्याला आपले चिरंजीवित्व नकोसे झाले होते. त्याप्रमाणेच माणसाची अवस्था होईल व तो देवाकडे गा-हाणे घालील, “देवा, सोडव रे बाबा आता या यातनांतून, लवकर मरण येऊ दे."

वरील निबंध माणसे अमर झाली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद
धन्‍यवाद

निबंध 2  


पुराणकालीन कथांमध्ये देवदानवांनी अमृतमंथन केले आणि त्यातून अमृताचा कलश बाहेर काढला. त्यामुळे त्यांच्यात भांडण झाले. अखेरीस देवांच्याच युक्तीने 'मोहिनी' रूपात आलेल्या श्रीविष्णूने ते देवांना मिळवून देण्याचा प्रयत्न केला तो यशस्वी झाला अन् सारे देव अमर झाले. ही कथा ऐकत असताना माझ्या दहा वर्षांच्या भावाने मला प्रश्न विचारला. "दादा तसे ते अमृत आपल्याला मिळाले तर ? आपले आजी-आजोबा, बाबा-आई, तू-मी सर्वजण अमर होऊन जा ना ! आपण अमर झाल्यावर काय मज्जा येईल नाही !"

भावाच्या या प्रश्नाने माझी मात्र झोप उडाली. अहो, खरोखरच जर हा 'अमृताचा कलश' या माणसांपर्यंत आला आणि माणसे अमर झाली तर ? आज आपण पाहतोय काळ बदलतोय... नवीन नवीन शोध लागताहेत. औषधे, इलाज, शस्त्रक्रिया या मोठ्या प्रमाणात होताहेत आणि त्या यशस्वी होताहेत. प्रभावी गुणकारी औषधोपचाराने माणूस आज मृत्यूच्या दारातून अनेकवेळा परत आला आहे. त्याची आयुर्मर्यादा वाढली आहे, तरी पण 'मृत्यू' कुणाला टळलेला नाही. माणूस हा मर्त्य आहेच. आणि मग अशा माणसाला ही 'संजीवनी' मिळाली तर...


प्रथम या 'अमृताचा'च काळाबाजार वाढेल, भ्रष्टाचार वाढेल. सर्वजण लक्षाधीश, कोट्यधीश होतील. अमृतातही भेसळ होईल आणि पुढे तर कृत्रिम अमृतही बनवले जाईल. पण माणसाला अमर झाल्यानंतर त्याची दुःखे संपतील का? एकमेकांतील भांडणतंटे-दुरावा-दुःस्वास-स्पर्धा या थांबतील का ? नाही ! उलट आयुष्यमान वाढल्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अतिरेक होईल. अंदाधुंदी माजेल, बेबंदशाही आणि हाहाकार निर्माण होईल. प्रेम-भक्ती अशा भावनांचा अंत होईल.


दुसरीकडे अमृत गवसल्याने लोकसंख्या प्रचंड वाढेल त्याबरोबर खाणारी तोंडे... म्हणजेच पुन्हा बेकारीची समस्या, पृथ्वीतलावर असलेल्या 'अन्न-पाणी-हवा' या मूलभूत गरजा भागविता येणार नाहीत... त्यासाठी पुन्हा सुंदोपसुंदी वैयक्तिक संपत्ती म्हणून मानव ते जमा करू लागेल. आणि प्रिय माणसांचा वियोग होणार नाही, ही गोष्ट धरली तरी 'अति परिचयात् अवज्ञा' ही उक्ती खरी होईल. पिढ्या वाढत जातील. विचारांची रेलचेल होईल. एक घर, एक समाज, एक देश अशा मर्यादा न राहता अविचारांचाच धुमाकूळ सुरू होईल.

सध्या सुद्धा तीन-चार पिढ्या झाल्या तरी त्यांच्यात ऐक्य टिकणे कठीण आहे, तर मग ही अफाट नाती, या अनेक पिढ्या यांचे काय होणार ? महाभारतातील 'यादवी' आठवते ना? तशीच ती सुरू होईल. माणसे माणसांना मारतील. राहायला जागा राहणार नाही.


माणसांच्या साहसीवृत्तीचा-त्यांच्या बुद्धिमत्तेचा ही विचार करायला लागतो तर त्यांना हे ब्रह्मांड कमी पडेल. कल्पनांच्या भराऱ्या आकाशपाताळ एक करतील. त्यामुळे पुन्हा सर्व गोष्टी विनाशाकडेच वळतील. पुनर्जन्म-पापपुण्य, कल्याण, सुखदुःख या गोष्टींचा नामोनिशाण राहणार नाही. मानवी जीवनाचे महत्त्वच नाहीसे होईल, तो क्षद्र होऊन जाईल आणि अखेर पुन्हा त्या पुराणकथेतील अमरत्व प्राप्त झालेल्या अश्वत्थामा आठवू लागेल.


तोही त्याच्या चिरंजीवत्वाला कंटाळला. जखमेच्या वेदना घेऊन शोकाकूल होऊन अखंडपणे नाहक भटकत राहिला. हे सर्व आठवल्यावर वाटते, "नको रे बाबा ते अमरत्व, आणि त्या यातना, फक्त हे ईश्वरा, अमर असे कल्याणकारी काम मात्र आमच्याकडून करून घे. एवढेच मागणे." मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

माणसे अमर झाली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक | Manus Amar Zala Tar Essay In Marathi

यंत्रे संपावर गेली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक | Yantra Sampavar Geli Tar Marathi Nibandh

यंत्रे संपावर गेली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक | Yantra Sampavar Geli Tar Marathi Nibandh आज आपण पावलोपावली यंत्रांवर अवलंबून असतो. ही यंत्रे आता आपल्या नित्य व्यवहारात एवढी एकरूप झाली आहेत की ती यंत्रे आहेत व त्यांच्याविना आपले अडेल हे आपल्याला उमगतही नाही. कळले तरी वळत नाही. मग अनेकदा आपण त्या यंत्रांना अतिशय निष्काळजीपणे वागवतो. एकदा काय झाले, ही यंत्रे रागावली आणि त्यांनी आपली संघटना स्थापन केली. या संघटनेने संपाचा आदेश दिला. एका मध्यरात्री सारी यंत्रे संपावर गेली. मग जो गोंधळ उडाला तो काय वर्णावा!



सकाळी नेहमीप्रमाणे घड्याळाने आपला गजरच केला नाही. त्यामुळे सर्वांना जाग आली ती उन्हं वर आल्यावरच. धावत धावत आई नळाजवळ गेली; पण नळातून एक थेंबही पाणी येत नव्हते. घरातला फ्रीज बंद पडला होता. रेडिओ बोलत नव्हता. पंखा फिरत नव्हता. घराबाहेर आलो तर लिफ्टही चालत नव्हती. सगळेजण हवालदिल झाले. रोज सकाळी सकाळीच वृत्तपत्रे वाचायची सवय. सवय कसली, व्यसनच म्हणा ना! पण आज त्या वृत्तपत्रांचाही पत्ता नव्हता.



रस्त्यावर एकही गाडी धावत नव्हती. बस नाही, स्कूटर नाही, साधी सायकलही नाही. रस्त्यावर फक्त दिसत होती माणसेच माणसे. सारीच गोंधळून गेलेली. हे काय आहे? असे कशामुळे झाले? जरा चौकशी करा, वृत्तपत्रांकडे विचारा. पोलिसांना कळवा. कुणीतरी कल्पना काढली . फोन करा, फोन उचलला गेला, पण त्यातून कसलाच आवाज आला नाही. फोनही बंद. आता पायी चालण्याशिवाय पर्याय नव्हता. लोक हिंडू लागले, अदमास घेऊ लागले.

yantra sampavar geli tar marathi nibandh
yantra sampavar geli tar marathi nibandh


नेहमी यावेळी गजबजलेली स्टेशने आज शांत होती. म्हणजे माणसे जा-ये करीत होती; पण गाड्याच धावत नव्हत्या. 'पूतळ्याच्या' खेळातल्याप्रमाणे त्या जागच्या जागी उभ्या होत्या. बेकरीत ब्रेड नव्हता. मार्केटात भाजी नव्हती. शहरातील सारे जीवन विस्कळीत झाले होते. पाण्याच्या अभावामुळे लोकांच्या तोंडचे पाणी पळाले होते.
सहज एका रुग्णालयात डोकावलो, तेथे तर हाहाकार उडाला होता.


 यंत्रे थांबल्यामुळे शल्यविशारद शस्त्रक्रिया पार पाडू शकत नव्हते. त्यामुळे रोग्यांचे विलक्षण हाल होत होते. पंखे फिरत नव्हते. रक्त, सलाईन देता येत नव्हते. एका कमी वजनाच्या बाळाला दिवे लावून विशिष्ट उबेत ठेवले होते. पण तो दिवाच बंद पडला होता. त्यापेक्षा शोचनीय गोष्ट म्हणजे-एका हृदयविकाराच्या रुग्णाला कृत्रिम श्वासोच्छ्वासाचे यंत्र लावून ठेवले होते, ते यंत्र बंद पडल्याने तो रोगी गतप्राण झाला होता!  



सारे वातावरण बेचैन, अस्वस्थ होते. यंत्रविशारद यंत्रांशी झगडत होते; पण यंत्रे चालूच होत नव्हती. अशा अस्वस्थ वातावरणात दिवस तर संपला. यंत्रे चालू होत नव्हती; पण आकाशातील सहस्ररश्मीचे यंत्र मात्र व्यवस्थित चालु होते. ठरलेल्या वेळी भास्कर अस्ताचलावर गेला आणि सर्वत्र काळोख पडला. नेहमी विजेच्या दिव्यांनी झगमगणारे ते शहर! पण त्या दिव्यांनीही असहकार पुकारला होता. त्यामुळे सर्वत्र पणत्या, मेणबत्त्या तेवत होत्या. या शहरातील लोकांचे आज प्रथम लक्ष गेले ते आकाशातील चंद्राकडे व चांदण्यांकडे. पण तरीसुद्धा पृथ्वीवरचा काळोख नकोसा झाला होता. शेवटी मानवी उपाय संपल्यावर सर्वांना आठवण झाली ती दैवी उपायांची.



सर्वधर्मीय मानवांनी शहरातील मोठ्या पटांगणावर येऊन यंत्रांची क्षमा मागितली यंत्रदेवाला विनविले, “या पामरांना माफ कर आणि यंत्रांची चक्रे सुरू कर. यंत्राविना माणूस अपूर्ण आहे." यंत्रजगतात खळबळ उडाली, विचारविनिमय झाला. दिली तेवढी शिक्षा बस झाली असा विचार एकमताने ठरला आणि यंत्रांनी संप मागे घेतला. कारण अखेरीस मानवच त्यांचा जन्मदाता होता. दिवे लागले, पंखे फिरू लागले, नळांना पाणी आले, सर्वत्र आनंदीआनंद झाला.


वरील निबंध यंत्रे संपावर गेली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

यंत्रे संपावर गेली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक | Yantra Sampavar Geli Tar Marathi Nibandh

मी चहा बोलतोय मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Mi Chaha Boltoy Nibandh In Marathi

निबंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी चहा बोलतोय मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्ये चहाच्या उगमापासून ते आजपर्यंत चहा मानवी जीवनात कोणते चांगले वाईट बदल घडवून आणतो हे सांगितले आहे.  यात चहा स्वतः त्याची मनोगत सांगत असल्याने निबंध खूपच  मनोरंजक होतो.  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला


प्रवास अगदी कंटाळवाणा झाला होता. केव्हा एखादे स्टेशन येते आणि आपण कपभर चहा घेतो असं मला झाले होते. वेळ होती मध्यरात्रीची. बाकीचे प्रवासी शांतपणे झोपले होते. गाडीचा वेग मंदावला, स्टेशन आले. पण माझी मनीषा काही पूर्ण झाली नाही, कारण चहावालाही शांत झोपला होता. अस्सा राग आला तेव्हा त्याचा.



गाडी पुढे निघाली आणि काय चमत्कार! एक वाफाळलेला चहाचा कप माझ्यापुढे आला, मी कप उचलणार तेवढ्यात आवाज आला, “मी चहा आहे. तू माझी आठवण काढलीस ना, म्हणून मुद्दाम आलो. अरे, मी तुझ्या देशातीलच आहे आणि आता सर्वांच्या इतक्या परिचयाचा झालो आहे की काही वेळेला ‘अतिपरिचयात् अवज्ञा' असाही अनुभव येतो.



माझे पूर्वज मूळचे चीनमधील. चीन या देशानेच साऱ्या जगाला माझी देणगी दिली आहे. खरं पाहता आपल्या भारतात आसाममध्येही माझे पूर्वज फार पूर्वीपासून अस्तित्वात होते. पण कोणाचे त्यांच्याकडे विशेष लक्ष नव्हते. ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भारतात माझा खरा विकास साधला. आज भारताला मी आणि माझे बांधव बरेच परकीय चलन मिळवून देतो."

Mi Chaha Boltoy Nibandh In Marathi
Mi Chaha Boltoy Nibandh In Marathi


"खरं सांगू का, मला माझा विशेष अभिमान वाटतो तो वेगळ्या गोष्टीसाठी. आज या भारतात एवढी विषमता आहे. गरीब-श्रीमंत हा केवढा भेदभाव आहे; पण माझ्याजवळ असा कोणताच फरक नाही. आलिशान बंगल्यात माझे जेवढे अगत्याने स्वागत होते तेवढीच एखादया झोपडपट्टीत केले जाते. एखादया विद्वान साहित्यिकाला, संशोधकाला माझी जेवढी गरज असते तेवढीच यंत्रावर काम करणाऱ्या कामगारालाही माझी आवश्यकता असते. सर्वांना स्फूर्ती देणारे, प्रेरणा देणारे असे उत्तेजक पेय माझ्यापासून तयार करता येते.



“मळ्यातल्या छोट्या छोट्या झुडपांवर माझा जन्म होतो. आसाममधील ब्रह्मपुत्रेचे खोरे हिमालयाच्या पायथ्यावर दुआर व तराई हा डोंगराळ भाग, दार्जिलिंग, रांची, डेहराडून खोरे, कांगा खोरे अशा भारतातील विविध भागांत मी व माझे भाईबंद जन्माला येतो. आमची खुडणी भारतात हातांनीच केली जाते. खुडणी करणाऱ्या स्त्रियांच्या पाठीवर पिशवी असते, त्यांत त्या आमची पाने टाकतात. तेथन आमची पाठवणी कारखान्यात होते, तेथे यंत्राच्या साहाय्याने वळविणे, वाळविणे वगैरे क्रिया होतात आणि मग खास प्लायवूडच्या पेट्यांतून आमची देशोदेशी रवानगी होते."



“मित्रा, साखर, दूध व पाणी यांच्या संयोगाने तुम्ही आमचा आस्वाद घेता. काही. देशात दुधाचा वापर न करता लिंबू, लोणी यांचा उपयोग करतात. काही लोक आमच्यावर टीका करताना 'टॅनिनचा' गाजावाजा करतात; पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. फार उकळविल्याने टॅनिन पेयात उतरते त्यात आमची काय चूक ? उलट चहा हे शरीराला हितकारक व उत्साहवर्धक पेय आहे
.

आवाज थांबला, पण माझा कंटाळा आणि आलेली मरगळ केव्हाच संपली होती. गाडी कुठल्यातरी स्टेशनात थांबली आणि एक चहावाला न बोलावताच माझ्यासमोर चहा घेऊन उभा ठाकला होता!


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 2

chaha che atmavrutta in essay in  marathi



तुमची नि माझी खूप गट्टी आहे. कारण तुमच्या प्रत्येक दिवसाची सुरुवातच मुळी माझ्या, म्हणजे चहाच्या सेवनाने होते. चहाचा एक कप घेतल्याशिवाय तुमच्या कामाला सुरुवात होत नाही. कचेरीत काम करताना किंवा अभ्यास करताना कंटाळा आला की, तुम्ही माझी आठवण काढता.


एक कप गरमागरम चहा मिळाला की, पुन्हा कामाला, पुन्हा अभ्यासाला सुरुवात ! संध्याकाळी कामावरून दमून परत आल्यावर पुन्हा माझी आठवण होतेच.  तुमच्यासाठीच मी दूरवरून येतो. तुमची आणि माझी पहिली ओळख करून दिली ती चिनी प्रवाशांनी. आता भारतात माझी खूप लागवड होते. 


ज्यावेळी भारतावर ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं, तेव्हा येथे आलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी माझी खूप लागवड केली. आसाममधील ब्रह्मपुत्रेचं खोरं, हिमालयाच्या पायथ्यावरील दुआर व तराईचा डोंगराळ भाग, दार्जिलिंग, रांची, डेहराडून खोरं येथे आमची खूप लागवड केली जाते. आज भारतात आमची एवढी विपुल निर्मिती होते की, परदेशात आमची निर्यात होते. भारताला आम्ही भरपूर परकीय चलन मिळवून देतो.


आसाममधील एका मळ्यातल्या छोट्या झुडपावर माझा जन्म झाला. स्थानिक स्त्रिया आमच्या खुडणीचं काम करतात. दोन्ही हातांनी पानं खुडून त्या पाठीवरच्या टोपलीत टाकतात. तेथून आमची पाठवणी कारखान्यात होते. पुढील सर्व कामं कारखान्यात चालतात. यंत्राच्या साहाय्याने पानं वळवणं, वाळवणं वगैरे सोपस्कार होतात आणि मग खास खोक्यांतून आम्हांला देशोदेशी पाठवलं जातं. तेव्हा तेथे आम्हांला विविध नावे मिळतात.


आज मला जगात सर्व ठिकाणांहून मागणी आहे. श्रीमंतांच्या महालापासून गरिबांच्या झोपडीपर्यंत सर्वत्र माझे कायमचे वास्तव्य असते. माझ्यापासून उत्तेजक पेय बनवण्याच्या विविध पद्धती आढळतात. बहुसंख्य लोक पाणी, दूध, साखर यांचा चहापेय बनवण्यासाठी उपयोग करतात. काही देशांत चहात लिंबू, लोणी टाकतात, तर काहीजण मीठ टाकून चहाला नमकीन बनवतात, कुणाला चहा फार कडक लागतो, तर कोणाला अतिशय सौम्य लागतो.


कोणी टीकाकार चहाला अपेय ' मानतात. त्यांतील टॅनिनचा ते बागुलबुवा करतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट, त्याच न्यायाने 'चहाबाजपणा' तापदायक होतो. त्याचे  व्यसन जडते. तुमच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण समारंभांची लज्जत वाढवण्यात तुम्हांला माझी मोलाची मदत होते. अशी आहे ही तुमच्या-माझ्यातील दोस्ती!

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


महत्‍वाचे मुद्दे : 
(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • चहाचा जुना परिचय 
  • दिवसाची सुरुवात 
  • चहा चीनमधून आला 
  • लागवडीची पद्धत
  • अनुकूल वातावरण व जागा
  • कारखान्यात होणारे संस्कार 
  • सर्वत्र मागणी
  • श्रीमंत, गरीब
  • बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती
  • सर्वांना उत्तेजन देतो
  • तरी टीका
  • जीवनात चहाला आगळे त्त्व.


टीप : वरील निबंध मी चहा बोलतोय मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते.
  • mi chaha boltoy nibandh in  marathi

मी चहा बोलतोय मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Mi Chaha Boltoy Nibandh In Marathi

एका पुतळयाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक| Eka Putlyache Manogat Essay In Marathi

एका पुतळयाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक : 'पुण्याचे रूपांतर लवकरच पुतळ्यांच्या शहरात होईल' पुण्याच्या 'दैनिक सकाळ'मध्ये कुणीतरी वर्तविलेले हे भविष्य. त्यामागचा उपरोध बराच काळ मनात रेंगाळत राहिला. टीकाकाराने पुण्यातील एका रस्त्यावरच्या पुतळयाची मोजदाद केली होती आणि मग असे हे पुतळे जागोजागी असावेत की नसावेत याबद्दलची उलटसुलट मते वाचकांनी मांडली होती. मनात आले या वादविषयात त्या पुतळ्यांचे कोणी मत घेतले आहे का?


"किती वेडी आहेस ग! अग पुतळयांच मत कोण घेणार? पुतळयांना आपलं मत मांडता आलं असतं तर मग त्यांना पूतळे म्हणता आले असते का?" आता मात्र त्या पुतळ्याने आपले पुतळेपण काही काळ बाजूला ठेवले होते आणि तो स्वतःचे मन उघडे करीत होता

"अरे माणसा, आमच्यासारखे दुर्दैवी आम्हीच. कारण आम्हांला रस्त्यांवर उभे करणारे लोक, त्यातून आपला काही ना काही स्वार्थच साधत असतात; आणि गप्पा मात्र स्वार्थत्यागाच्या करतात. केवढी विसंगती आहे ही! पण तेही आम्ही निमूटपणे सहन करतो. एखादी थोर व्यक्ती विशिष्ट ध्येयासाठी जीवनभर अखंड झिजते. प्रसंगी त्या ध्येयासाठी प्राणही ठेवते आणि मग तिच्या मृत्यूनंतर तिच्या ध्येयतत्त्वांना हरताळ फासला जाऊन तिचा पुतळा उभारला जातो. भांडवलशाहीला विरोध करणाऱ्या नेत्याच्या पुतळ्यासाठी भांडवलदारांकडून चंदा गोळा केला जातो. केवढा हा दैवदुर्विलास!



“मग सांगा, आवश्यकता आहे का अशा पुतळयांची? पुतळे उभारले जातात ते उभारणाऱ्या व्यक्तींचा वा संस्थेचा दानशूरपणा, मोठेपणा सिद्ध व्हावा म्हणूनच. थोरांची ही थोर स्मारके इतरांना स्फूर्तिदायक होतात ही एक फसवी, लोणकढी थाप आहे. लोकांना आपल्या दैनंदिन व्यवहारात त्यांची आठवणही होत नाही.
Eka Putlyache Manogat Essay In Marathi
Eka Putlyache Manogat Essay In Marathi


"माझा जन्मही अशाच काही धनवंतांच्या गर्वातून झाला आहे. ज्या व्यक्तीचं प्रतिनिधित्व मी करीत आहे तिच्या पासंगालाही उभं राहण्याची या धनवंतांची योग्यता नाही. आपण विचारवतांना मानतो, याचे भव्य प्रदर्शन हा या पुतळानिमितीमागचा त्याचा हेतू आहे. त्या महान व्यक्तीचा गौरव करण्याच्या निमित्ताने त्यांनी स्वतःचीच नावे लिहून, स्वतःचाच गौरव करून घेतला आहे. खरं सांगू, माझ्या अनावरणाचा तो दिवस माझ्या जीवनातील सर्वांत आनंदाचा दिवस असावयास हवा होता, पण तोच माझ्या दुःखाचा दिवस ठरला. कारण तेव्हापासूनच माझी ही विटंबना सुरू झाली आहे.”

"उन्हापावसात मी येथे तटस्थपणे उभा आहे. माझ्याभोवती अनेक थोर व्यक्तीही माझ्यासारख्याच पुतळ्यांच्या रूपांत उभ्या आहेत. अंगावर कावळे, चिमण्या व इतर पाखरे घाण करीत आहेत. पण याहूनही मला उबग आला आहे तो काही लोकांच्या हीन वृत्तीचा. या लोकांच्या विघातक गोष्टींपूढे पक्ष्यांनी केलेल्या घाणीचे काहीच वाटत नाही. समाजकंटक लोकांची ही कुटिल कृत्ये पाहून मन बेचैन होते, पण मी काय करणार? बोलूनचालून मी एक पुतळा!" एवढं बोलून तो आवाज बंद झाला आणि तो बोलणारा पुतळा पुनश्च मूक पुतळा झाला.

वरील निबंध एका पुतळयाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद



एका पुतळयाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Eka Putlyache Manogat Essay In Marathi