माझे आवडते शिक्षक | my favorite teacher essay in marathi

                                                                        मराठी निबंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण maze avadte shikshak nibandh in marathi बघणार आहोत. या ३ निबंधामध्‍ये लहानपणातील शाळेतील प्रसंग वर्णन केेले आहे. विद्यार्थ्‍यांना कश्‍याप्रकारे शिकविले पाहीजे याचे उदाहरण सुध्‍दा या निबंधात दिले आहे  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

मराठीचा पहिलाच तास ! गोडबोले सरांनी वर्गात पाऊल ठेवलं आणि माझी कळी खुलली. सरांविषयी इतकं ऐकलं की कधी त्यांचा तास येतो असं मला झालं होतं. 'मराठी शिकवण्यात त्यांचा हात धरणारं कोणी नाही' अशी त्यांची ख्याती ! पण ते दहावीलाच शिकवायचे, त्या वर्षी प्रथमच नववीला आले होते.


Maze-Avadte-Shikshak-Nibandh-In-Marathi
Maze-Avadte-Shikshak-Nibandh-In-Marathi


आत्यंतिक आदराने मी त्यांच्याकडे पाहात होतो . पायात चपला, हिरवट रंगाची पैंट, पांढरा शर्ट, उजव्या हातात घड्याळ, डाव्या हातात अंगठी, गौरवर्ण, पिंगट बोलके डोळे, कोरीव मिश्या, मुख्य म्हणजे अतिशय प्रसन्न हसणं
हजेरी सुरू झाली. “ आपटेऽ...” " येस्स सरऽ!” पहिल्याच हजेरीला सरांनी वर बघितलं. मिस्किल हसले, “ मुलांनो! तास मराठी मग उत्तर इंग्रजीतुन का रे. 

माहीत आहे मराठीचा गोडवा आणि शक्ती ?" त्यांनी हजेरी बाजूला ठेवून मग अमृताची बरसात केली. 'माझा मराठाचि बोलु कवतुके..' अशी । मराठी भाषा, तिचं सौंदर्य, पावित्र्य, आवश्यकता, थोरवी, ...अशा काही रसाळपणे सांगितल्या की तासाची घंटा झाली तेव्हा कळलेच नाही की वेळ कुठे निघुन गेला.

त्यांना मी नेहमी ' गोडबोले सरच' म्हणायचो गोडबोलें सरांची वाट आम्ही नेहमीच आतुरतेनं पाहात असू. त्यांची शिकवण्याची पद्धत वेगळीच होती. त्यांनी पुस्तक हाती कधी धरलंच नाही. धड्यावरचे प्रश्न लिहून दिलेच नाहीत. धडा घरून वाचून यायला सांगायचे आणि वर्गात तो धडा ज्यांनी लिहिला त्यांची माहिती, का लिहिला, कुठल्या मनःस्थितीत लिहिला ही पार्श्वभूमी, ज्यातून तो धडा घेतला त्या पुस्तकाची माहिती, धड्याचा आशय, त्यातील सौंदर्य, तसे समान दाखले -इतर पुस्तकातले, जीवनानुभव, तत्त्वज्ञान, मार्गदर्शन...असं करत करत तो धडा व्हायचा.

मराठीतल्या साऱ्या अलंकारांनी आम्ही सारे नटलो. ' गोडबोले सर' कधी रागवायचे नाहीत. तास कधी बुडवायचे नाहीत. अंगात ताप  असताना शिकवलेलं मी पाहिलंय, आम्हीही कधी तास चुकवायचो नाही. त्यांच्या वाणीत जादूच तशी होती ! ते शिकवत असताना ज्ञानेश्वर, नामदेव, गिरीश, पाडगावकर, लोकहितवादी, गोरे, अत्रे, फडके...हे सारे त्यांच्या रोजच्या बैठकीला असतात असे वाटायचे. इतर विषयांचा द्वेष त्यांनी कधी केला नाही. 

इंग्लिश मीडियमची लाट पाहून ते खंतावायचे. म्हणायचे " अरे ! आपल्या आईची सेवा आपण नाही केली तर इतर कोणी येऊन करणार आहे का ? आपली आजी संस्कृत, अगोदरच रानोमाळ भटकते आहे.
 
दहावीच्या निरोप समारंभाचे वेळी सर गोडबोल्यांनी केलेलं भाषण शिल्प होऊन मनात बसले आहे. ते म्हणाले, "आता तुमच्या दिशा बदलतील...भाषा बदलतील ....आचार बदलतील...विचार बदलतील...माणसं कपडे बदलतात...राहायची घरं बदलतात, पण आपलं कुलदैवत नाही बदलत, पिढ्यान् पिढ्या तेच ठेवतात. तसं तुम्ही तुमचं मराठीपण, मराठी भाषा हे कुलदैवत, या बदलत्या काळातही अभंग, अखंड ठेवा हीच इच्छा !...शुभास्ते पंथानः सन्तु !"

मराठीवर असं सपाटून प्रेम करणाऱ्या आणि आम्हालाही आमच्या न कळत करायला लावणाऱ्या सा गोडबोलेंना मी कशी विसरेन ? आजही माझ्या अभ्यासिकेत मराठी साहित्याचा पुस्तक ठेवा, त्यांचीच आठवण म्हणून, साठवण केलेला तुम्हाला दिसेल!
 


मराठी निबंध 2

आवडते शिक्षक म्हणताच मला आठवतात ते आमचे जाधव सर. जाधव सर हेच आमचे आवडते शिक्षक आहेत. केवळ आवडतेच नव्हेत; तर वंदनीय आहेत.

केवळ माझेच नव्हे; तर आमच्या गावातील या शाळेत जे जे विदयार्थी शिकून गेले त्या सर्वांचे आवडते शिक्षक म्हणजे जाधव सर ! किंबहुना या शाळेतील विदयार्थी कोठेही, केव्हाही एकमेकांना भेटले की, ते जाधव सरांच्या हटकून आठवणी काढतात..

जाधव सरांचे व्यक्तिमत्त्व रुबाबदार आहे. उंच शरीरयष्टी, आणि प्रसन्न चेहरा. सरांचा पोशाख अगदी साधा, पण स्वच्छ. कधी कधी ते खादीचा लांब सदरा घालतात; तेव्हा तर ते एकदम रुबाबदार दिसतात. त्यांनी कधी भडक रंगाचे कपडे घातलेले मला आठवतच नाही. सिनेमातल्या ढंगाचे फॅशनेबल कपडे त्यांच्या अंगावर कधी दिसले नाहीत. या स्वच्छ व साध्या पोशाखावरूनही पाहणाऱ्याला सरांच्या स्वच्छ व निर्मळ अंतःकरणाची आणि निष्कलंक चारित्र्याची लगेच साक्ष पटावी.

जाधव सर आम्हांला विज्ञान व गणित विषय शिकवतात. या विषयांत त्यांचा हातखंडाच होता. विज्ञान विषय कठीण व कंटाळवाणा आणि गणित तर भीतिदायक ! पण जाधव सरांचे कौशल्य असे की, हे विषय आम्हांला कधी कंटाळवाणे वाटले नाहीत वा त्यांची भीतीही वाटली नाही.

घरगुती प्रसंगांतील उदाहरणे घेत घेत ते सहज अभ्यासाकडे वळत. एकदा विज्ञानाच्या तासिकेच्या वेळी ते 'दही लावण्या'चे प्रकार सांगू लागले. दही आंबट न होता ते मधुर व मलईसारखे होण्यासाठी विरजण कसे लावतात, हे सांगता सांगता बॅक्टेरिया म्हणजे काय, त्यांचे स्वरूप कसे असते, त्यांचे प्रकार किती वगैरे पाठ्यपुस्तकातील माहितीकडे ते केव्हा वळले, कळलेच नाही. 

एकदा घरातील फ्युज गेल्यावर त्यांना वितळतार मिळेना, तेव्हा वायरमधील साधी तार लावून वीजप्रवाह कसा सुरू केला, हे त्यांनी आम्हांला वर्गात सांगितले. पण त्यानंतर लागलीच धावतपळत जाऊन वितळतार आणली आणि साध्या तारेच्या जागी ती बसवली. हे आपण का केले, नाही तर कोणता धोका होता, हे समजावून सांगता सांगता त्यांनी विजेचे वहन, त्याचे परिणाम इत्यादी बाबी अलगद आमच्या डोक्यात घातल्या.

 अनेकदा ते शास्त्रज्ञांच्या आयुष्यातले धडपडीचे प्रसंग रंगवून सांगत आणि त्यायोगे अनेक सिदधांत गप्पांच्या स्वरूपात शिकवत. जाधव सर गणितातील अनेक प्रमेये शिकवताना गणितज्ञांच्या रंजक आठवणी सांगत. त्यामुळे प्रमेये आम्हांला कधी किचकट वाटलीच नाहीत.

विज्ञानप्रदर्शन हा तर जाधव सरांचा जिव्हयाळ्याचा विषय. आम्हा विदयार्थ्यांचे गट करून ते सगळ्यांना प्रदर्शनात भाग घ्यायला लावत. आम्हांला ते विषय नेमून देत. आम्हांला विचार करायला लावत; उपक्रम शोधायला लावत. या प्रयत्नांत त्यांचे मार्गदर्शनही असे. त्यामुळे आम्ही मोठ्या शास्त्रज्ञांच्या ऐटीत विज्ञानातील उपक्रम सादर करीत असू.

आता दहावीचे वर्ष संपत आले आहे. माझ्या मनात सारखे येत आहे की, विज्ञान-गणिताची गोडी लावणारे जाधव सरांसारखे शिक्षक यानंतर मला भेटतील का? ... माहीत नाही. मात्र मला मनापासून वाटते की, यापुढे कदाचित असे सर मिळतील, न मिळतील; पण जाधव सर आम्हांला मिळाले, हे आमचे केवढे भाग्य !


 मराठी निबंध 3
माझे आवडते शिक्षक | my favorite teacher essay in marathi : हो, हो. आपटे गुरुजी हेच आमचे प्रिय गुरुजी आहेत. केवळ प्रियच नव्हेत, तर ते वंदनीयही आहेत. आमच्या गावातील या शाळेत जे जे विदयार्थी गेल्या तीस वर्षांत शिकुन  गेले त्या सर्वांचे आपटे गुरुजी हे एक आदरणीय स्थान आहे. किंबहुना या शाळेतील माजी विदयार्थी कोठेही, केव्हाही एकमेकांना भेटतात तेव्हा ते 'गुरुजी' म्हणून ज्यांचा उल्लेख करतात, तो आपटे गुरुजींचाच असतो. 

केवळ 'गुरुजी' म्हटले की एकमेकांना उमगते की आपल्याला कुणाविषयी बोलायचे आहे. या शाळेत अनेक मुख्याध्यापक आले आणि गेले; पण सर्वांच्या मनात ठसले ते आपटे गुरुजीच. सर्व विदयार्थ्यांच्या तोंडी एकच नाव आणि ते म्हणजे 'आमचे गुरुजी-आपटे गुरुजी.'

 माझे पाचही भाऊ याच शाळेचे विदयार्थी, आज माझे हे पाचही भाऊ नोकरी-शिक्षणाच्या निमित्ताने दूरवर राहतात, ते जेव्हा जेव्हा काहीही निमित्ताने घरी येतात तेव्हा आपटे गुरुजींचा विषय निघाला नाही असे होत नाही. कारण आपटे गुरुजी हे कुणा एकटया-दुकटयालाच प्रिय नव्हते तर ते सर्वांचेच आवडते गुरुजी होते आणि आजही आहेत.

गुरुजींचे व्यक्तिमत्त्वही उठावदार आहे. उंच, तेजस्वी गौर वर्ण आणि प्रसन्न चेहरा. त्यामुळे ज्यांनी एकदा गुरुजींना पाहिले ते त्यांना विसरू शकत नाहीत. ते नेहमी ताठ चालतात अगदी साठीला येऊन पोहोचले तरी त्यांना कोणीही पाठीत किंचितही वाकलेले पाहिले नाही. काळ कितीही बदलला तरी गुरुजींच्या पोशाखात बदल नाही. दोन्ही बाजूंनी काचा मारलेले पांढरे शुभ्र धोतर, लांब नेहरू शर्ट आणि पांढरी शुभ्र गांधी टोपी. हे साधेच कपडे इतके स्वच्छ आणि टापटिपीचे असतात की पाहणाऱ्याला गुरुजींच्या स्वच्छ निर्मल अंतःकरणाची त्वरित साक्ष पटावी. 

त्यांनी खादीची टोपी डोक्यावरून कधीही काढली नाही पण तरीही ते कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधीत  नाहीत. किंबहुना राजकारणापासून ते सदैव दूरच राहिले. तरी पण देशात आणि विश्वात घडणाऱ्या सर्व घडामोडींची झूचक माहिती आपटे गुरुजींना असते, हे अनेकदा त्यांच्याशी बोलताना लक्षात येते. ते मोकळया वेळेत विदयार्थ्यांशी मनमोकळेपणाने गप्पा करत असतात. त्यांच्या बोलण्यात कधीही कोणांबद्दल द्वेष आढळून येत नाही.

शास्त्र, गणित हे गुरुजींचे विषय. त्या विषयांचे ते पदवीधर आहेत. त्या विषयांतील अदययावत माहिती जाणून घेण्यास ते नेहमीच उत्सुक असतात. इतर गोष्टींत काटकसर करून गुरुजी शास्त्रविषयक अनेक नियतकालिके व पुस्तके विकत घेतात. शालेय जीवनात ज्या वर्गांना, ज्या इयत्तांना शास्त्राध्ययनासाठी आपटे गुरुजी लाभत ते वर्ग भाग्यवान ठरत असत. शाळेच्या वेळाबाहेर गुरुजींबरोबर आम्ही शास्त्रातील कित्येक गोष्टी शिकलो, कित्येक उपकरणे, कित्येक शास्त्रज्ञ यांची ओळख करून घेतली.

जोवर आपटे गुरुजी शाळेत होते तोवर वार्षिक स्नेहसम्मेलनाच्या प्रदर्शनात शास्त्रविभागाच्या प्रदर्शनात काहीतरी वेगळेपणा असेच व त्याबद्दल सर्वांना उत्सुकता वाटे. याला कारण काहीना काही नवे करावे ही आपटे गुरुजींची ओढ. आपटे गुरुजी अध्यापक असले तरी  त्यांच्यातील विदयार्थी फार मोठा आहे. गुरुजींना चाहणारा विदयार्थिवर्ग तर अफाट आहे. 

आजही आपल्या जुन्या विदयार्थ्यांशी ते स्नेहाचे संबंध ठेवून असतात. त्यांचे अनेक विदयार्थी आता शास्त्रविषयाच्या वेगवेगळया शाखांत मोठ्या पदांवर आहेत. ते कधी गावात आले की आपटे गुरुजींकडे आवर्जून जातात. इतर वेळी गुरुजींचा पत्रव्यवहार चालूच असतो. त्यांचा एक विदयार्थी अणुशक्तिकेंद्रात उच्च पदावर आहे. गुरुजींना अणुशक्तिकेंद्र दाखविण्यासाठी त्याने त्यांना खास मुंबईला नेले होते.

परवाच मला गुरुजी रस्त्यात भेटले तेव्हा म्हणाले, “काय पिंटू, सुट्टीत मुंबईला येणार ना? मी जाणार आहे." माझा प्रश्नांकित चेहरा पाहुन तेच म्हणाले, "अग तुझ्या दादाचे पत्र आले आहे; तो ‘सागरसम्राट'वर आहे ना
असे आहेत हे आमचे सर्वांचे आपटे गुरुजी. एक जातिवंत शास्त्रशिक्षक आणि आमचे खरेखुरे मित्रच.वरील निबंध माझे आवडते शिक्षक | my favorite teacher essay in marathi हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

माझे आवडते शिक्षक मराठी निबंध | my favorite teacher essay in marathi

 नदी बोलू लागली तर मराठी निबंध | nadi bolu lagli tar essay in marathi

 नदी बोलू लागली तर मराठी निबंध | nadi bolu lagli tar essay in marathi:  मुंबईहून पुण्याकडे परतत होतो. पुणे जवळ आल्याच्या खुणा दिसत होत्या. आता आपल्या आवडत्या नदीचे आपल्याला दर्शन घडणार असे वाटू लागले. नदीजवळील परिसरातून आम्ही जात होतो; पण नदी दिसत नव्हती. एवढी मोठी नदी हरवली होती, अगदी चक्क गायब झाली होती.कारण त्या नदीच्या संपूर्ण पृष्ठभागावर ‘पाणवनस्पती' उगवली होती. अनेकदा या वनस्पतीविषयी मी वर्तमानपत्रात वाचले होते, पण ती एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरत असेल अशी कल्पना नव्हती. नदीला काय वाटत असेल बरं! नदी बोलू लागली तर...



...तर ती नक्कीच मानवाला दोष देईल. या नदीने माणसाला काय दिले नाही? कुठल्यातरी डोंगरकपारीतून ती वाहत येते ती कशासाठी? आपल्या मानवपुत्रांना जीवन देण्यासाठीच ना! 


nadi bolu lagli tar essay in marathi
nadi bolu lagli tar essay in marathi



ती जीवन देते आणि माणसाचे जीवन फुलते. मानवी संस्कृतीचा इतिहास काय सांगतो? पूर्वीच्या काळी नदीच्या काठीच तर गावे वसत होती, मानवी संस्कृतीचा विकास होत होता. म्हणून तर प्राचीन काळापासून नदयांना 'लोकमाता' म्हणून संबोधिले जाते. या नदया आपल्या काटांवर सुपीक माती, गाळ टाकून शेतीसाठी उत्कृष्ट भूमी निर्माण करतात. या सरितेमुळेच माणसाची तहान भागते, शेते पिकतात, द्राक्षांच्या बागा फुलतात. आपल्याजवळ जे जे आहे ते दुसऱ्याला देत जा, हाच संदेश सांगत ही आपला सतत मार्गक्रमण करीत असते. 



वर्षाऋतूकडून मिळालेल्या जलाचा लोढा घेऊन येणाऱ्या या तटिनीला माणसाने अडविले, मोठमोठ्या भिती बांधून तिचा प्रवाह थांबविला, तरीही ही सरिता रागावली नाही. तिने माणसांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. त्यांच्यासाठी तिने कड्यावरून उड्या घेतल्या, बोगदयातील काळोखातून ती धावली. तिच्या पाण्यावर माणसाने वीज निर्माण केली. त्यामुळे त्याचे घर प्रकाशाने उजळून निघाले, कारखान्यातील यंत्रे फिरू लागली. माणसांचे जीवन अधिक संपन्न, समृद्ध झाले. नदी आपल्या पाण्यातील मासे देऊन माणसाच्या जेवणाची लज्जतही वाढवीत होती.


आम्ही माणसे मात्र हे सारे विसरलो. मुंबई-पुण्यासारख्या शहरात राहणाऱ्या मुलांना विचारले, “तुम्हांला पाणी कोठून मिळते?" तर ती सांगतात, “नळांतून.” अशा त-हेने आपल्याच कामात सदा गुंतलेल्या माणसाला या लोकमातेची आता आठवणही राहिलेली नाही. आपल्या गावातील सारी घाण आणून तो नदीत सोडतो, मोठमोठे कारखानदार आपल्या कारखान्यांतील दूषित पाणी नदीत आणून सोडतात. साखरेच्या कारखान्याची मळी पाण्यात सोडली जाते. अशावेळी नदीला केवढे दुःख होत असेल! तिला बोलता येत नाही. अगदीच भावना अनावर झाल्या तर ती बेफाम होते आणि मग गावेच्या गावे उद्ध्वस्त करीत जाते.


या नदीला बोलता आले तर ती प्रथम या द्वाड माणसाचे कान पकडून म्हणेल, "अरे उद्दामांनो, तुम्हांला काही अक्कल आहे का? तुम्ही माझ्या पाण्यावरून भांडणे करता. राज्याराज्यात माझ्या पाण्यावरून आज भांडणे पेटली आहेत. आता भारत आणि बांगलादेशातही पाण्याचा वाद सुरू झाला आहे. माझे पाणी म्हणजे तुम्हा सर्वांचे जीवन. ते भरभरून घ्या आणि हसत हसत जगा; आणि हो, जरा माझी स्वच्छताही ठेवा. अरे बाळांनो, माझ्याकडे पाण्याचा साठा उदंड आहे. ते कोणालाच कमी पडणार नाही. यास्तव तुम्ही भांडणे थांबवा व सुखाने जगा."
वरील निबंध नदी बोलू लागली तर मराठी निबंध | nadi bolu lagli tar essay in marathi हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

नदी बोलू लागली तर मराठी निबंध | nadi bolu lagli tar essay in marathi

मी कल्पवृक्षाखाली बसतो तेव्हा मराठी निबंध | mi kalpvrushakhali basto tevha essay in marathi

मी कल्पवृक्षाखाली बसतो तेव्हा मराठी निबंध | mi kalpvrushakhali basto tevhaessay in marathi : विदयापीठाच्या वनस्पतिविभागाने भरविलेले ते एक प्रदर्शन होते. विश्वातील सर्व वृक्षवेलींची ओळख आपण या प्रदर्शनात करून दिली आहे, असा प्रदर्शन-नियोजकांचा दावा होता. म्हणून मी पुनः पुन्हा फिरून ते प्रदर्शन पाहत होतो. शेवटी एका संयोजकाचे लक्ष माझ्याकडे गेले आणि त्याने मला विचारले, “आपणाला काय हवे आहे?"


मी मुळातच गोंधळलेलो होतो त्यात या प्रश्नाने अधिकच भर पडली आणि मी त्याला सांगितले, “मला कल्पवृक्ष हवा आहे, मला कल्पवृक्षाखाली बसायचे आहे." क्षणभर तो व्यवस्थापक गोंधळला; पण तो बराच चलाख असावा. लगेच सावरून तो म्हणाला, "चला, मी तुम्हांला कल्पवृक्ष दाखवतो." मग आम्ही दोघेजण त्या प्रदर्शनाच्या दुसऱ्या टोकाला गेलो. तेथे लोकांची गर्दी मुळीच नव्हती. अगदी कडेला एक बुटकेसे डेरेदार झाड होते, त्याकडे बोट दाखवून तो म्हणाला, “हा पाहा कल्पवृक्ष. आता तुम्ही याचे निरीक्षण करा. मी येतो हं, मला दुसरे काम आहे."
mi kalpvrushakhali basto tevha essay in marathi
mi kalpvrushakhali basto tevha essay in marathi


त्या निर्जन भागात आता मी एकटाच होतो. दूरवर माणसांचे आवाज ऐकू येत होते; पण मी होतो त्या भागात माणसांचीच काय ; पण पक्ष्यांचीही चाहूल ऐकू येत नव्हती. त्या क्षणी मला हसू आले. या सर्वांना या कल्पवृक्षाची व त्याच्या सामर्थ्याची कल्पना नसावी बहुतेक. असे वाटले आणि मी विचार केला-चला, आपण तरी आपली अनेक वर्षांची मनीषा पूर्ण करून घ्यावी. झाड जरा खालच्या बाजूला होते, तेव्हा तेथे उतरून झाडाखाली बसावे असे मी ठरविले. म्हणून मी थोडे खाली उतरलो. पण तेवढ्यात मनात आले की प्रथम आपण हे निश्चित करू या, की कल्पवृक्षाखाली बसून काय मागायचे?


हो, उगाचच काही चुकीचे मागितले तर शेवटी आपल्यालाच पश्चात्ताप करायची वेळ यायची. तेव्हा आधी पूर्ण विचार करून ठरवावे आणि मगच मागणी करावी. काय मागावे बरे या कल्पवृक्षाकडे? खूप पैसा मागावा का? हो, कारण पैशाने सर्व गोष्टी साध्य होतात. कारण ‘सर्वे गुणाः काञ्चनमाश्रयन्ते', असे विद्वानांनी म्हटलेच आहे. तेव्हा ठरले, कल्पवृक्षाला सांगावे की, कधीही संपणार नाही इतकी संपत्ती दे. पण ही एवढी संपत्ती आपण घरी कशी नेणार? आणि घरी तरी कोठे ठेवणार?


एकदम एवढा पैसा आला की लोकांच्या डोळ्यांत भरणार. लोक समजतील की आपण काही तरी अनैतिक मार्गाने हा पैसा मिळविला. शिवाय 'इन्कम टॅक्स' वाले पिच्छा पूरवतील आणि सर्वांत मोठी भीती म्हणजे चोरांची. चोरांमूळे या पैशापायी प्राण गमवावे लागतील. मग काय मागावे बरे या कल्पवृक्षाकडे?

विदया मागावी का? कोणत्या शाखेतील पदवी मागावी? कला, शास्त्र की व्यापार? कोणती पदवी मागावी? एम्. ए., एम्. एस्सी., एम्. कॉम., पीएच्. डी., डॉक्टर की इंजिनीअर? पण कल्पवृक्षाकडून मिळविलेल्या या पदवीचा आपण उपयोग करू शकू का? लोक विश्वास ठेवतील का आपल्यावर? डॉक्टर झालो तर आपण रुग्णांवर औषधोपचार करू शकू का? असे एक ना अनेक प्रश्नांचे मनात काहूर माजले, पण त्याच क्षणी माझे सुसंस्कारित मन आक्रंदून उठले. छे, छे; हे बरोबर नाही. कष्टाविना विदया साध्य होणे शक्य नाही. ती विदया, विदया नव्हेच, ते ज्ञान, खरे ज्ञानच नव्हे. कल्पवृक्षाजवळ काय मागावे? हा प्रश्न अदयापि सुटलाच नव्हता.


यापूर्वी होऊन गेलेल्या मोठमोठ्या लोकांनी काय मागितले होते त्याची मला आठवण झाली. मोरोपंतांनी देवाला प्रार्थिले, 'सूसंगती सदा घडो.' ज्ञानदेवांनी पसायदान मागितले-'जो जे वांच्छील, तो ते लाहो प्राणिजात.' मग आपण काय मागावे? कशी कोण जाणे, मला भोवतालची जाणीव झाली. सर्वत्र अंधार पडला होता. दूरवर येणारा माणसांचा आवाजही बंद झाला होता. बहतेक प्रदर्शन बंद झाले असावे. किर्रऽऽ असा रातकिड्यांचा आवाज येत होता. मी घाबरून पटकन कल्पवृक्षाखाली गेलो आणि म्हटले, “मला आता घरी पोहोचव." दुसऱ्या क्षणी मी माझ्या घरी होतो.


वरील निबंध मी कल्पवृक्षाखाली बसतो तेव्हा मराठी निबंध | mi kalpvrushakhali basto tevha essay in marathi हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

मी कल्पवृक्षाखाली बसतो तेव्हा मराठी निबंध | mi kalpvrushakhali basto tevha essay in marathi

झोपडपट्टी बोलू लागते तेव्हा आत्‍मकथनात्‍मक  मराठी निबंध | zopadpatti bolu lagte tevha essay in marathi


झोपडपट्टी बोलू लागते तेव्हा आत्‍मकथनात्‍मक  मराठी निबंध | zopadpatti bolu lagte tevha essay in marathi : एकदा काय गंमत झाली, आमच्या अकरा मजली उत्तुंग ‘गिरनार'जवळची झोपडपट्टी बोलू लागली. अहो, अगदी चक्क एखादया फडा वक्त्यासारखी ती आपले विचार मांडू लागली. वेळ होती रात्रीची. 'गिरनार' अगदी शांत झोपला होता-मऊ, मऊ फोमच्या गादयांत गोड गुलाबी स्वप्ने पाहत. त्याला कशाचा पत्ताच नव्हता. 


'गिरनारची' श्रीमंत शेजारीण 'उषाकिरण'सुद्धा अगदी रम्य, तरल स्वप्नात गुंग होती. जागी होती फक्त त्या दोन उंच इमारतींमधील झोपडपट्टी आणि जागा होता समोरचा अथांग निळा सागर. तो सुद्धा आपला नेहमीचा खळखळाट थांबवून शांतपणे त्या झोपडपट्टीचे गा-हाणे ऐकत होता. कारण कधी नव्हे ती झोपडपट्टी बोलत होती.
तिचा स्वर अगदी धीरगंभीर होता. तिच्या वयाचा विचार केला तर ती जरा अधिकच पोक्त वाटत होती. नाहीतरी संकटे कोसळली की अनुभवाने सर्वांनाच अकाली प्रौढत्व येते.


zopadpatti bolu lagte tevha essay in marathi
 zopadpatti bolu lagte tevha essay in marathi


 या झोपडपट्टीचे तसेच झाले होते. बरेच दिवस मनात साचलेली 'दु:खे' तिला आता कुणाला तरी सांगायची होती. तिने गिरनारला हाका मारल्या तेव्हा उषाकिरण जागी झाली आणि नवलाईने ऐकू लागली. “अरे गिरनार, तू आणि तुझी मैत्रीण उषाकिरण, माझ्याकडे तिरस्काराने बघता. माझ्या ओंगळ रूपामुळे तुमचे सौंदर्य डागाळते असे तुम्हांला वाटते. पण, तुमचा हा उलटा न्यायच नाही का? अरे सांगा, या जागेवर आधी कोण होते, तुम्ही की मी? माझीच जागा बळकावून तुम्ही मला दूर करू पाहता.


 कोठे जातील ही गरीब माणसे आणि त्यांची कच्चीबच्ची? तुमच्या मोठमोठ्या फ्लॅट्समध्ये जेवढी माणसे राहतात त्याच्या दसपट माणसे एका एका झोपडीत राहतात. रात्री झोपताना पाहावे तर एकाच्या अंगावर दुसऱ्याचे पाय ; तुमच्याकडे मात्र प्रत्येकाला स्वतंत्र खोली. तुम्ही माणसे आणि तीही माणसेच ना! मग हा फरक का? तुमच्याजवळ जे अवयव आहेत, तेच त्यांच्याजवळ. शक्तिसामर्थ्याबद्दल बोलायचे झाले तर कदाचित ती माणसे तुमच्यापेक्षा वरचढ ठरतील! मग हा भेदभाव का? पुरेसे अन्न नाही, चांगले कपडे नाहीत. चैनीच्या गोष्टी नाहीत. कारण त्यांच्याजवळ दामाजीपंतांचा अभाव आहे. तुम्ही मात्र स्वतःच्या गरजेपेक्षा अवास्तव पैसा बळकावून बसला आहात.



तुम्हांला माझे रूप ओंगळ वाटते. पण याला जबाबदार कोण? येथे राहणाऱ्या हजारो माणसांना का स्वच्छ जीवन आवडणार नाही! पण साधे पाणी तरी त्यांना पुरेसे मिळते का? तुला आठवते ती पु. लं. ची 'फुलराणी' रंगमंचावर काय सांगत होती? 'म्युनिसिपालटीचा मोठा नळ फुटतो तेव्हा आमची आंघोळ.' एवढ्या लहानशा जागेत हा माणसे आपले सर्व विधी उरकतात. मग घाण नाही का होणार?



 त्यांची दुःखं तरी किती अगणित. त्यामुळे ते मदयाला जवळ करतात. तर तुम्ही त्यांना त्यासाठी बोल लावता. पण तुमचे फ्रीज-कपाटांचे चोरकप्पे उघडा. तेथे काय आढळते? परक्या देशातील चोरट्या वाटेने आलेल्या मदयाच्या बाटल्या. तुमचे जीवन सुखी व्हावे यासाठी ही माणसे राबतात. या माणसांच्या श्रमांवरच तुम्ही तुमचे सुखी जीवन उभारलेले असते. पण त्यांचे जीवन साधारण सुसहय व्हावे एवढेही तुम्ही पाहत नाहीत. उलट आम्ही म्हणजे या झोपडपट्ट्या आणि त्यांतील माणसे यांचे खरेखोटे जीवन तुम्ही तुमच्या साहित्यात रंगवता आणि मानवतेचा पुळका आल्याचे भासवून पडदयावरही त्याचे अवास्तव चित्रण करता. पण एक लक्षात ठेवा,


 अनंत काणेकरांनी सांगितलंय त्याप्रमाणे ‘याच माणसांजवळ मोठं मन आहे, माणुसकी आहे.' झोपडपट्टी गप्प झाली, ती थकली होती; पण आता तिला हलके वाटत होते. 'गिरनार' शांत होता. सागर मात्र खवळला होता. वरील निबंध झोपडपट्टी बोलू लागते तेव्हा आत्‍मकथनात्‍मक  मराठी निबंध | zopadpatti bolu lagte tevha essay in marathi हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

झोपडपट्टी बोलू लागते तेव्हा आत्‍मकथनात्‍मक मराठी निबंध | zopadpatti bolu lagte tevha essay in marathi