aarsa nasta tar marathi nibandh | आरसा नसता तर मराठी निबंध

निबंध 1 
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण aarsa nasta tar marathi nibandh बघणार आहोत. हा एक कल्‍पनात्‍मक निबंध आहेत त्‍यामुळे आरसा नसता तर काय झाले असते याचे वर्णन खालील 5 निबंधामध्‍ये तुम्‍हाला दिसुन येईल चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

आजच्या युगात माणसाला ज्या गोष्टी अनिवार्य वाटतात; त्यांपैकी एक म्हणजे 'आरसा.' घरातून बाहेर पडताना लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकजण आरशात डोकावल्याशिवाय राहत नाही. शहरांमधून ऑफिसात  काम करणाऱ्या तसेच कॉलेजांत शिकणाऱ्या मुलींच्या पर्सेसमध्ये 'आरसा' आढळतोच. रस्त्यावरून जाणारा कॉलेज युवक एखादया मोटारच्या आरशात डोकावून आपले केस ठाकठीक असल्याची खातरजमा करून घेतो. सांगायचा हेतू काय की, प्रत्येकाला आपली छबी वारंवार पाहण्याची हौस असते आणि त्यामुळे आरसा ही आज आवश्यक गोष्ट झाली आहे.

aarsa-nasta-tar-marathi-nibandh
aarsa-nasta-tar-marathi-nibandh


आरसा नसता तर माणसाची मोठी गैरसोय झाली असती. स्वत:चे रंगरूप माणूस जाणू शकला नसता आणि मग स्वत:चीच तोंडओळख त्याला पटली नसती. परीक्षेत आपणाला लाभलेल्या यशाचा आनंद आपल्याला आरसा दाखवतो. आपल्या आवडत्या माणसाची दीर्घकालानंतर झालेली आतुरतेची भेट आरसा खुलवतो आणि एखादया दुःखद प्रसंगी सगळ्यांच्या नजरा चुकवून आपल्या डोळ्यांनी गाळलेले अश्रू हाच आरसा टिपून घेतो. आरसा हा माणसाचा फार जवळचा मित्र आहे.

आरशाला संस्कृतमध्ये आदर्श' म्हणतात. रूप जसे असेल तसेच आरसा दाखवतो. तो कुरूपाला सुंदर बनवू शकत नाही. म्हणजे आरसा हा 'प्रामाणिकपणाचा आदर्श' आहे. म्हणून तर आपण आरशाची उपमा देऊन म्हणतो, त्याचे मन आरशासारखे नितळ आहे. आरसा नसता तर सुंदर माणसांना आपल्या सौंदर्याची अवास्तव जाणीव झाली नसती आणि त्यामुळे कुरूप माणसांना वाईट वाटले नसते. 

केशकर्तनालये, फोटो स्टुडिओ  अशा अनेक ठिकाणी आरसे मोठी कामगिरी बजावतात. आरसा नसता तर अनेक ठिकाणी सजावटीचे काम अपूर्ण राहिले असते. अनेक वैज्ञानिक प्रयोगांत आरशाला स्थान असते. आरसा नसेल तर ते प्रयोग अपूर्ण राहतील. अंतर्गोल भिंग-बहिर्गोल भिंग असलेले आरसे माणसांना हसवतात व ते मोटारींनाही उपयोगी पडतात. गावातील जत्रांत आरशांना महत्त्वाचे स्थान असते. आरसा नसेल तर ही सारी गंमत हरवून जाईल. तेव्हा असा हा बहुगुणी आरसा हवा आणि हवाच!

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

aarsa nasta tar essay in marathi language

निबंध 2
रोज आपण अशा अनेक गोष्टींचा वापर करत असतो की, त्यांचे अस्तित्वही आपण विसरलेले असतो. म्हणतात ना - अतिपरिचयात् अवज्ञा. (अति परिचयाच्या गोष्टीला किंमत न देणे ) तशी स्थिती आहे आपली आरशाच्या बाबतीत. अगदी सहजगत्या जातायेता आपण आरशात डोकावतो आणि आपण ठाकठीक आहोत ना याची खात्री करून घेतो. असा हा आरसा प्रत्येक घरात असतोच असतो. कधी तो एखादया भिंतीवर लटकत असतो, तर कधी एखादया मोठ्या कपाटाच्या दारावर, कधी एखादया सुंदरीच्या पर्समध्ये असतो, तर कधी एखादया मोठ्या दिवाणखान्याच्या दाराशी स्थानापन्न होऊन तो येणाऱ्या-जाणाऱ्याला त्याची छबी दाखवत असतो.

असा हा आरसा नसता तर - ? तर माणसाने आपली छबी कोठे पाहिली असती? एखादया मुलाखतीला जाताना, एखादया समारंभासाठी नटताना, माणूस पुनः पुन्हा आरशात डोकावतो आणि त्या आरशाला विचारतो- 'सांग दर्पणा, कसा मी दिसतो?' पण हा आरसा मात्र बेटा खरा प्रामाणिक ! उगाच नाही त्याला संस्कृतमध्ये 'आदर्श' म्हणतात. तुम्ही जसे आहात तसेच तुम्ही आरशात दिसणार. आरसा तुम्हांला सुंदरही बनवत नाही वा तुमच्या कुरूपतेतही भर घालत नाही. म्हणून तर आरशाचा आदर्श व्यक्तीपुढे ठेवला जातो. कसे बना? कसे असा? - तर आरशासारखे स्वच्छ चारित्र्य असलेले.

आरसा हा माणसाला पुराणकालापासून परिचयाचा आहे. रामायणातील रडणाऱ्या रामाला आरशात चंद्र दाखवून मंत्री सुमंताने त्याची समजूत काढली होती. इतिहासकालातही हा आरसा आपल्याला भेटतो. चितोडच्या महाराणी पद्मिनीचे सौंदर्य अल्लाउद्दीनने आरशातच पाहिले होते. मोगल साम्राज्यातील 'आरसे-महाला'चे वर्णन आपण ऐकलेले आहे. त्या काळात घर, महाल, प्रासाद यांना सजवण्यात आरशांचे स्थान महत्त्वाचे होते.

आजच्या विज्ञानयुगातही माणसाला आरशाची मदत अनेक ठिकाणी घ्यावी लागते. भौतिकशास्त्रात प्रकाशाचे नियम हे आरशाच्या साहाय्यानेच समजून घेतले जातात. अनेक वस्तू निर्माण करताना आरशांचा उपयोग होतो. मग एखादया आरशात आपण गोलमटोल होतो, नाहीतर एखादया आरशात आपण उंचचउंच झालेलो असतो. ही गंमत सोडली तरी, वाहन चालवताना-- मग गाडी असो वा बाईक - आरसा आपल्याला आपल्यामागून येणाऱ्या वाहनाची कल्पना देत असतो. हा आरसा नसेल तर चालकाचा फार गोंधळ उडेल. अभिनय करणारे कलावंत आरशात पाहून सराव करतात म्हणे... !
असा हा आरसा नसेल तर माणसाची अशी अनेक प्रकारे गैरसोय होईल. मग तो आरशाची जागा कोण घेऊ शकेल याचा शोध घेऊ लागेल.

निबंध 3  

आरसा बाजूला सारून कधी पाहिलंय का कुणी? आपल्या रोजच्या जीवनात इतकी महत्त्वाची जागा अडवून बसलाय हा की आपण तो नसता तर! यावर विचारच करीत नाही. आपण आरशात पाहतो ते आपलं रूप बघण्यासाठी. आपल्या प्रसाधनात आरसा नाही म्हणजे जणू डोळ्याविना चेहरा! लोकांनी आपल्याकडे पहावं यासाठी स्वत:ला खुलविण्यासाठी आपण आरशात पाहतो. कारण आजच्या युगात माणूस अंतरंगापेक्षा बाह्यरंगाकडे अधिक लक्ष देतो.

ह्या आरशाचा शोध तरी केव्हा लागला? जेव्हा मानव उत्क्रांतीच्या पहिल्या पायरीवर उभा होता, तेव्हा त्याच्याजवळ अन्न होते, ना वस्त्र, ना निवारा, मग प्रसाधनाची तर बातच सोडा. पण एक मात्र निश्चित की प्रतिबिंब ही गोष्ट मानवाला पहिल्यांदा पाण्यामुळे माहिती झाली असणार. म्हणजेच पाण्यामुळे काचेचा व काचेतून आरसा जन्मला असणार ! 

या आरशानं काहीवेळा प्रताप घडवून आणलेत, तर कधी मदतही केली आहे. अहो, हा नसता तर, बाल श्रीरामाचा चंद्राचा हट्ट सुमंत पुरविता नाकीनऊ आले असते. हा नसता तर महाराणी पद्मिनीच्या सौंदर्याला कुणी वाचवलं असतं ? तिने आपलं प्रतिबिंब अल्लाऊद्दिनाला दाखवून स्वत:ची सुटका करून घेतली. हा नसता तर गॅलिलिओला ग्रीसची लढाई जिंकताच आली नसती! प्रत्यक्ष दर्शन न देता प्रतिबिंबाच्या रूपाने दर्शन घडवून संतुष्ट करणारा हा आरसा खूपच उपयोगी पडला.

असा हा आरसा नसता तर कुरूप लोकांच्या दृष्टीने फायदाच झाला असता. त्यांची दु:खे तरी कमी झाली असती. परंतु स्त्रिया, तरुण मुले, मुली, चित्रतारका यांची खूपच पंचाईत झाली असती. आरसाच नाही. मग नटणार कसे ? सतत दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागले असते. दिवसातून, दर पाच मिनिटांनी सांग दर्पणा, मी कशी दिसते?' असं गुणगुणत आरशात पाहणाऱ्या ललनांची खूपच पंचाईत झाली असती. आरसा नसता तर न्हाव्याच्या हातात डोकं देऊन हजामत करायला कुणाची छाती झाली असती?

आरसा नसता तर केवळ तरूण-तरूणींचीच नव्हे तर शास्त्रज्ञांचीही पंचाईत झाली असती. अहो, आरशामुळेच प्रकाशाच्या परावर्तनाच्या नियमांचा शोध लागला. आरसाच नसता तर गुणितप्रतिमा मिळाल्या असत्या का?
असो! आरसा नसता तर घडामोडी घडल्या असत्या. पण मग यावर उपायही शोधावा लागला असता. आरसा नसता तर प्रत्येकाने आपली छबी आपल्या आवडत्या माणसाच्या डोळ्यात पाहिली असती कारण 'डोळा हा माणसाच्या  मनाचा आरसा आहे!' पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध 4 

aarsa nasta tar marathi nibandh | आरसा नसता तर मराठी निबंध


काचेचा शोध म्हणजे मानवाच्या प्रगल्भ
बुद्धिमत्तेचा एक आविष्कार ! काचेच्या शोधामुळे सुधारणेची अनेक दालने खुली झाली. मूलभूत गरजांच्या शोधयात्रेत स्वत:च्या प्रतिबिंबाचाही शोध लागला. पाण्यात डोकावताना प्रतिबिंब दिसले व काचेच्या शोधातून आरशाचा जन्म झाला.


आरसा माणसाचा जीवनसाथी! घरात त्याचे स्थान अगदी महत्त्वाच्या जागी असते. स्वत:चे प्रतिबिंब पाहिल्याशिवाय माणसाची दैनंदिनी सुरूच होत नाही; आणि हा आरसाच नसता तर... 'डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे।' म्हणजे दुसऱ्यांच्या डोळ्यांत बघून आपले प्रतिबिंब शोधावे लागले असते.


प्राचीनकाळी राजेलोकांना
आपल्या रूपवती राण्यांसाठी 'आरसेमहाल' उभारताच आले नसते. सुमंतांना बाल प्रभुरामचंद्रांचा 'चंद्र' पाहण्याचा हट्ट पुरा करताच आला नसता. आरसा नसता तर अल्लाउद्दीन खिलजीला लावण्यवती पद्मिनीचे दर्शन झालेच नसते. 


शहाजहान बादशहा लाल किल्ल्यात कैदेत असताना 'ताजमहाल'चे प्रतिबिंब आरशात पाहून समाधान मानीत असे. आपल्या निर्मितीचे दर्शन तो आरशातून घेई; आरसा नसता तर त्याचे उर्वरित आयुष्य कंटाळवाणे झाले असते.


आधुनिक काळात सुंदर-सुंदर डिझाईनची ड्रेसिंग टेबले आणि आकर्षक गोदरेजची कपाटे, निरनिराळ्या आकाराचे आरसे घेण्याचा ललनांनी हट्ट केलाच नसता. आजकाल स्त्रियांच्या पर्समध्येसुद्धा आरशाने स्थान मिळविले आहे. मग 'सांग दर्पणा कशी मी दिसते?' असे आरशाशी हितगुज करणाऱ्या तरुणींच्या ओठी हे गाणे आलेच नसते. 


अहो, रामप्रहरी स्नान वैगेरे करून 'सौभाग्यलेणे - कुंकुमतिलक लावण्याचीदेखील पंचाईत झाली असती.
भिंग बिलोरी सहा बाजूंनी बांधून आरसेमहाल असला, उभे राहूनी मध्ये पहावे,
रूप आपुले छंद मनाला॥



हा छंद कसा पुरा करता आला असता? लमाणी बायकांना आपल्या काचोळ्यांना लावण्यासाठी आरसे मिळालेच नसते. अहो, पुरुषांचे तरी आरशावाचून कुठे चालते? रोजच्या दाढीची गैरसोय तर झालीच असती; पण न्हाव्याच्या मर्जीनुसार केस कापून घ्यावे लागले असते. 


वाहनचालकाच्या बाजूला बहिर्वक्र आरसा नसता तर मागून भरघाव वेगाने येणारी वाहने चालकांना दिसलीच नसती, मग अपघातांचे प्रमाण वाढले असते. हल्ली पंचतारांकित हॉटेल्स, मोठमोठ्या शोरूम्स, दुकाने जी काही आरशांनी सजवलेली असतात, त्यांना आरसे नसते तर अवकळा आली असती.



आरसा नसता तर शास्त्रज्ञांचे थोडे का अडले असते? आरसा नसता तर गुणित प्रतिमा मिळविता आल्या नसत्या. प्रयोगशाळेत तर आरशावाचून फारच अडले असते. नवीन नवीन उपकरणे निर्माण करताच आली नसती. पाणबुड्यांना पाण्यावरील शत्रूची जहाजे दिसलीच नसती.



आरसेच नसते तर दुर्बिणीचा शोध तरी कसा लागला असता? सोलर एनर्जीवर चालणारी उपकरणे तयार करता आली नसती. अर्थात आरसा नसता तर कुरूप व्यक्तींना आपल्या कुरूपतेची जाणीव झाली नसती, हा एक फायदाच झाला असता. पण माणूस काही स्वस्थ बसणारा प्राणी नाही. 


तो अंतर्मनाच्या आरशात डोकावून पाहील. अंतर्मुख होऊन आरशाला पर्याय शोधील. तो जीवनाचा (पाण्याचा) तळ शोधेल व तेथे आपले प्रतिबिंब स्थिर करता येईल का याचा विचार करील. अंधारातून चालताना तो आपल्या बुद्धीचा किरण पाडून प्रकाशाचा शोध घेईल.  मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 5

aarsa nasta tar marathi nibandh | आरसा नसता तर मराठी निबंध

 

आरसा नसता तर रजपुतांच्या इतिहासातला प्रसंग. राणी पद्मिनीला पाहण्यासाठी अल्लाउद्दीन खिलजी वेडा झाला होता. त्याकाळी रजपूत रमणी परपुरुषापुढे येत नसे. त्यातून हा शत्रू. त्यावेळी आरसा त्याच्या मदतीला आला.
आरशात पधिनीची मोहक छबी पाहून तो परतला. 


त्यावेळी तरी आरशाने तिला कठीण प्रसंगातून निभावून नेले. दशरथाचा राजमहाल. चिमुकला राम आभाळातला चंद्र हवा असा हट्ट घेऊन बसला. सगळ्यांनी नानापरीने त्याची समजूत घातली. पण तो काही केल्या ऐकेना. 


शेवटी चतुर अशा सुमंताने आरसा आणला व त्या आरशात रामाला बंद दाखविला. इतका वेळ रडणारा तो बाळ श्रीराम खुदकन हसला. ही आरशाची किमया.. आरसा ही दैनंदिन जीवनात गरजेची वस्तू आहे. आरसा नसता तर लग्न-समारंभात आकर्षक वेषभूषा, केशभूषा करणाऱ्या वधूचे काय झाले असते? 


लग्नसमारंभात वधू ही उत्सवमूर्ती. तेव्हा तिचे प्रसाधन आरशावाचून होऊच शकले नसते. तिच्या जोडीला तिच्या मैत्रिणी, घरातील स्त्रिया आणि पुरुषसुद्धा आपला जामानिमा नीटनेटका आहे ना हे कसे पाह शकले असते?
घरात छोट्या बेबीचा किंवा बाळाचा वाढदिवस आहे. 


त्याला नवे सुंदर कपडे घातल्यावर आपण आधी आरशापुढे उभे करतो. त्यात स्वत:ची सजलेली प्रतिमा पाहून ते मूलही खूष होते. आरशाविना त्याचा हा आनंद पूर्ण झाला नसता. पूर्वी आरसा हा स्त्रिया, मुलींचाच लाडका सखा होता. आज मुलांनाही तो तितकाच प्रिय आहे.


शाळेत, घरात, स्टेशनवर, हॉटेलात, रेल्वेत सर्वत्र आरसे असतात. तसे नसते तर आरशात पाहून भांग पडणे, प्रसाधन करणे, नव्हे गाण्याच्या तालावर नाचणे कसे शक्य झाले असते ? त्यातून तारुण्यात नुकतेच पदार्पण केलेल्या युवक-युवतींचे विचारूच नका. 

घरातला आरसा त्यांना पुरत नाही. म्हणून बरेचदा खिशात, पर्समध्येसुद्धा छोटा आरसा बाळगला जातो. आरसा नसता तर त्यांच्या या आनंदात नक्कीच विरजण पडले असते. कुणी म्हणतील, पूर्वी कुठे आरसे होते? तलावाचे पाणी, नदीचे पाणी यात प्रतिबिंब पाहिले जात असे. पण सगळीकडेच कुठे तलाव,


नद्या असणार? शिवाय गढूळ
पाण्यात प्रतिबिंब कसे दिसेल? आजकाल घरात कपाट घेताना आरसा आधी पाहिला जातो. लग्नात, इतरप्रसंगी भेट देण्यासाठी आरसा वापरला जातो. 


तेव्हा आरशाचा उपयोग निर्विवाद आहे.सारांश, आरसा हा माणसांचा लाडका मित्र आहे. तो नसता तर बाळांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांचे विविध प्रकारचे आनंद त्यांना उपभोगता आले नसते. म्हणून आरसा हवाच. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.  धन्‍यवाद


aarsa nasta tar marathi nibandh | आरसा नसता तर मराठी निबंध

essay on trees our best friend in marathi | वृक्ष आपले मित्र मराठी निबंध



नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वृक्ष आपले मित्र मराठी निबंध बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. या निबंधात मानवाला जिवन जगण्‍यासाठी वृक्ष किती उपयोगी आहेत याचे महत्‍व पटवुन सांंगीतले आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

वृक्षांची महती आपल्या भारतात प्राचीन काळापासून सांगीतली  गेली आहे. तुकाराम महाराजांना तर वृक्ष हे आपले सगेसोयरे वाटतात. असे हे वृक्ष आज या आधुनिक विज्ञानयुगातही- आपले जिवलग मित्र आहेत.

विज्ञानामुळे माणसाने खूप प्रगती केली पण या विकासासाठी माणसाने अविचाराने जंगलतोड केली. आपण आपल्या या वृक्षमित्राचा घात केल्याने स्वत:वरच दुष्काळाचे, प्रदूषणाचे संकट ओढवून घेत आहोत, याचा माणसाला विसर पडलेला आहे. वृक्ष ही निसर्गाची फुप्फुसे आहेत. हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि 'प्राणवायू' हवेत सोडून हवा शुद्ध करण्याचे काम करतात. यामुळे माणसाचे जगणे सुकर व सुखी झाले आहे.

essay-on-trees-our-best-friend-in-marathi
essay-on-trees-our-best-friend-in-marathi

वृक्ष आपल्याला सहस्र हातांनी मदत करतात. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा तर ते भागवतातच; शिवाय आपल्या पूजाविधीसाठी नानाविध साहित्य देऊन आपल्याला सुखावतात. आज वनस्पतींपासून मिळालेल्या अनेक औषधींचा उपयोग करून माणसाने असाध्य आजारांवर मात केली आहे.

स्वतः जळून हे वृक्ष इतरांच्या उपयोगी पडतात. वृक्षाचा प्रत्येक अवयव माणूस, प्राणी, पक्षी यांना उपयुक्त आहे. वृक्षांजवळ भेदभाव नसतो. ते सर्वांना समान वागणूक देतात. अगदी त्याच्या अंगावर घाव घालणाऱ्या कुन्हाडीचे पातेही तो सुगंधित करतो. मानवाच्या एकाकी जीवनातही वृक्ष साथसंगत देतात. माणूस आपल्या अनेक आठवणी या वृक्षांशी जपून ठेवतो. तो त्यांच्याशी हितगूज करतो. असे हे वृक्ष मानवाचे जिवलग मित्र आहेत.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व वृक्षारोपण करण्‍यासाठी आणखी काय उपाय योजना करायला पाहीजे हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद  पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 2 

 वृक्ष आपले मित्र मराठी निबंध | essay on trees our best friend in marathi 


“आजी, घरी एकट्याच राहता?' 'एकटी का? ही झाडं आहेत की सोबतीला.' मी फाटकाजवळ आल्यावर समोरच अंगणात उगवलेली मोठी मोठी गुलाबाची फुले डोकावून बघतात व सांगतात, या आजी, आम्ही केव्हाची वाट पहातोय. बांधाच्या शेजारच्या फुललेला कुंद अंगावरच्या कळ्या सावरत होकारार्थी हसतो.



'एकटी कशी मी? अगं ती तुळस बघितलीस का? कशी छान डंवरली आहे. मंजिऱ्यांनी गच्च भरून गेली आहे. 'मला मंजिऱ्यांचा भार सहन होत नाही, थोडा कत्री करा,' असे सांगते आहे.



उजव्या हातची माझी राजसबाळी बघितलीत का? माझी राजसबाळी 'केळ' आहे हो. सध्या ओली बाळंतीण आहे. पाहिलीत तिची छोटी छोटी बाळं. आईच्या कुशीत पानांचं मोठं पांघरुण घेऊन कशी शांत झोपली आहेत ती. मी रोज माझ्या बाळीच्या अंगावरून हात फिरवते. तिला चांगलं-चुंगलं खाऊ घालते. बाळंतपणाला आलेली माझी लेक आहे ती.


पाठीमागच्या अंगणात उभा असलेला व्रात्य आंबा बघितलात का? वारा सुटल्यावर असा नाचतो. त्याची मुलंही तशीच नाचरी. लहानपणापासूनच आपल्या आईवडिलांना सोडून पटापट जमिनीवर उड्या मारतात. त्यांना आवरता आवरता नाकी नऊ येतात माझ्या, पण त्याची बाळं मोठी झाली, वयात आली की, किती गोंडस दिसतात म्हणून सांगू?


आंब्याच्या मागे सर्वांना आवडणारा शेवगा, मला तर तो गोड शेंगा देतोच. परंतु अंगाखांद्यावर मर्कटराजांनाही मनमराट खेळू देतो. पहाटे मला जाग येते ती प्राजक्ताच्या व बकुळीच्या फुलांच्या मंद सुगंधाने. सूर्य उगवल्याबरोबर ती नाजूक, कोमल अंत:करणाची प्राजक्ताची फुले मी वेचते व छाया गर्द सुरेख, गार हिरवी शोभे तुझी पालवी। 



सो सो गर्जत वाहुनी गदगदा वारा तुला हालवी। छोटे गोंडस, पांढरे सुम तुझे हंगू किती मी तया। छोट्या, सुंदर पाकळ्या कितीतरी, येती न मोजावया॥ अशा कवितेच्या ओळी गुणगुणत मी बकुळीची फुले वेचते.


रस्त्याच्या कडेला फणस कटिखांद्यावर बाळे घेऊन उभा असतोच. त्याच्या मुलाबाळांची मी चौकशी करते. माझीही मुले खुशाल आहेत असे त्याला सांगते. तोही हसून आपल्या काटेरी बाळाला माझ्याशी गुजगोष्टी करायला पाठवून देतो. डाव्या हातचा चाफा मात्र फारच रागीट. 



कधी रुसेल व कधी हसेल सांगता येत नाही. रागावला की, आपल्या अंगावरची सगळी पानांची वस्त्रे काढून टाकतो व खुलला की चाफा फुलांनी भरून जातो. माझे भलेभक्कम सोबती म्हणजे आमचे नारळराव. असे उंच वाढलेत की, आल्यागेल्यावर करडी नजर ठेवून पहारा देत असतात. 


शरीर थोडे रस्त्याकडे झुकलेलेच, 'माझ्या सावलीत येऊन बस ना,' असा सारखा लाडिक हट्ट करीत असतात.
एवढे सत्पुरुष माझे सखेसोबती असताना मी एकटी कशी? मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद



essay on trees our best friend in marathi | वृक्ष आपले मित्र मराठी निबंध

maza avadta kalakar marathi essay | माझा आवडता कलाकार मराठी निबंध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण maza avadta kalakar marathi essay बघणार आहोत. प्रत्‍येकाला कोणत्‍यातरी कलेमध्‍ये रस असतो मला गायनात आहे त्‍यामुळे माझ्या आवडत्‍या कलाकार आहेत लता दीदी चला तर जाणुन घेऊया त्‍यांच्‍याविषयी माहीती.

ग्रीष्म ऋतूतील ती संध्याकाळ होती. सूर्यदेव अस्ताला गेले होते. तरीपण त्यांच्या कठोर कर्तबगारीची चुणूक अजून जाणवत होती. एक सभा गेले दोन तास रंगली होती. लतादीदी रंगमंचावर उपस्थित होत्या. सभा संपत आली तेव्हा सर्वांनी दीदींना गाणे म्हणण्याचा आग्रह केला. लोकाग्रहाखातर दीदींनी सूर लावला, कोणतेही वादय साथीला नसताना 'मोगरा फुलला' हा अभंग लतादीदी गाऊ लागल्या नि वातावरणातील दाहकता अचानक लुप्त झाली. सर्वत्र प्रसन्न समाधानी वातावरण निर्माण झाले आणि याच वातावरणात सभा संपली. हे सामर्थ्य असलेल्या कलावती लता मंगेशकर आज साऱ्या विश्वात विख्यात आहेत. त्याच लतादीदी माझ्या आवडत्या कलावंत आहेत.

maza-avadta-kalakar-marathi-essay
maza-avadta-kalakar-marathi-essay

भारत सरकारने लतादीदींना 'भारतरत्न' हा किताब दिला,
तेव्हा मनात आले की या उपाधीने त्यांचा गौरव झाला की त्यांच्यामुळे प्रत्यक्ष या उपाधीची झळाळी वाढली. लता मंगेशकर यांना आजवर राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर 'स्वरभारती', 'कलाप्रवीण', 'सूर श्री', 'स्वरलता' व 'डी. लिट.' असे अनेक बहुमान प्राप्त झाले आहेत. पण या यशामागे पर्वतासारखे परिश्रम आहेत. यशाचा मार्ग हा काट्याकुट्यांतून जातो. अनेक कसोट्यांतून उतरल्यावरच सुवर्णाचे तेज झळाळते.

 आज साऱ्या  मर्यादा ओलांडून लतादीदी या कोट्यवधी जनतेच्या मनावर अधिराज्य करत आहेत. संगीताच्या क्षेत्रात त्यांचे स्थान सर्वोत्कृष्ट व सर्वमान्य आहे.  अनेक ख्यातनाम संगीतकारांची १८०० च्या वर चित्रपटांतील विविध रंगढंगांची सुमारे बावीस भाषांतील गाणी लतादीदींनी गायली असून त्यांची संख्या सुमारे पंचवीस ते तीस हजारांच्या घरात सहज जाते.

लतादीदींच्या स्वर्गीय मधुर आवाजाने असंख्य गाणी चिरंजीव झाली आहेत. मराठी माणसाच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर दीदींच्या आवाजातील ओळी आपल्याला साथ देत असतात. 'आनंदघन' या नावाने त्यांनी संगीत-दिग्दर्शनही केले. त्यांनी गायलेले 'ए मेरे वतन के लोगों' हे गीत आजही भारतीयांचे डोळे ओले करते.

अगदी लहान वयात दीदींनी आपल्या बाबांबरोबर नारदाची भूमिका केली होती. 'सौभद्र', 'भावबंधन' अशा नाटकांतूनही त्यांनी कामे केली. 'गजाभाऊ' व 'पहिली मंगळागौर' अशा काही मराठी चित्रपटांतूनही छोट्या भूमिका केल्या. कारण साऱ्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती.

लतादीदींच्या  सुरेल, मुलायम व परिपूर्ण अशा स्वरांनी लक्षावधी श्रोत्यांना सुरांची माधुरी व सौंदर्य प्रत्ययास आणून दिले. त्यांच्या आवाजाच्या उंच खोलीमुळे, लवचिकतेमुळे, अलौकिक फिरतीमळे चित्रपट संगीतकारांना नवनवीन प्रयोग करणे शक्य झाले. 'तीन मिनिटांच्या तबकडीतून लोकांपर्यंत संगीत पोचवण्याचे अवघड काम लताने केले,' असा त्यांचा गौरव प्रत्यक्ष कुमार गंधर्वांनी केला आहे.

आपल्या भावंडांसाठी, आपल्या कुटुंबासाठी लतादीदींनी जे अतोनात श्रम केले, त्यांची आठवण आजही त्यांना, त्यांच्या भावंडांना व्यथित करते. अत्युच्च पदावर पोचूनही या थोर कलावतीने विनम्रपणा सोडला नाही. आपली सामाजिक जबाबदारीही ती विसरली नाही. पुण्याचे 'दीनानाथ मंगेशकर रुग्णालय' हे त्याचेच द्योतक आहे. या एवढ्या यशस्वी जीवनातही शास्त्रीय संगीताला आणि आपल्या इतर छंदांना आपण पुरेसा वेळ देऊ शकलो नाही, ही खंत दीदींना आहे. अशी ही गानकोकिळा भारतवर्षाचे अक्षय वैभव आहे.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

maza avadta kalakar marathi essay | माझा आवडता कलाकार मराठी निबंध

maza avadta prani essay in marathi | माझा आवडता प्राणी मराठी निबंध

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण maza avadta prani essay in marathi निबंध बघणार आहोत. आपल्‍या अवतीभोवती आपल्‍याला गाय म्‍हैस, मांजर,कुत्रा यासारखे प्राणी दिसुन येतात, प्रत्‍येक लोकांना वेगवेगळे प्राणी आवडतात परंतु मला कुत्रा आवडतो. म्‍हणुन मी या विषयावर 2  सुंदर निबंध लिहीले आहेत चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 

माझ्या बाबांना कुत्रा हा प्राणी खूप प्रिय आहे. त्यामुळे आमच्या घरात नेहमी एक-दोन कुत्री पाळलेली असतात. त्यांपैकी एक म्हणजे आमची गोल्डी. मी दुसरीत असताना बाबांनी हे पिलू विकत आणले. त्यामुळे ते माझ्याबरोबरच मोठे झाले आणि माझी खास मैत्रीण बनले. ही कुत्री आहे आणि ती खास लॅब्रेडॉर जातीची आहे. तिला विकणाऱ्याने तिच्या घराण्याचा सर्व इतिहास व तिची माहिती दिली होती. आमच्या घरी आली, तेव्हा ती फक्त सहा आठवड्यांची होती. पांढरा, सोनेरी असा लोकरीचा गुबगुबीत गुंडा! आजीने तिच्या रंगावरून तिचे गोल्डी' नाव ठेवले.


maza-avadta-prani-essay-in-marathi
maza-avadta-prani-essay-in-marathi

पाहता पाहता गोल्डी मोठी झाली. आमच्याकडे येणारे लोक तिचा आकार पाहूनच घाबरतात. ती पूर्ण शाकाहारी आहे. टोमॅटो, काकडी, बटाटे तिला प्रिय. लपवलेली वस्तू शोधून काढण्याचा खेळ तिला आवडतो. ती सर्वांना 'शेक हॅन्ड' करते. गाडीत बसून फिरायला जाताना ती फार खूश असते. गोल्डी अतिशय स्वच्छताप्रिय आहे. ती अतिशय प्रेमळ आहे. त्यामुळे नंतर आमच्या घरी आणलेल्या इतर कुत्र्यांवरही ती प्रेम करते. आता ती वृद्ध झाली आहे, पण तिचा रुबाब तसाच टिकून आहे.

तर हा होता आमच्‍या लाडक्‍या गोल्‍डीचा निबंध हा तुम्‍हाला कसा वाटला ते तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . व खालील दुसरा निबंध वाचायला विसरू नका धन्‍यवाद .

निबंध 2

maza avadta prani marathi nibandh

माझा आवडता पाळीव प्राणी आम्ही आमच्या कुत्र्याला 'बॉबी' म्हणतो. कोणताही मानवी संरक्षक रक्षण करणार नाही, एवढे बॉबी आमच्या घराचे रक्षण करतो. हे घर आमचे नसून त्याचेच असावे अशा रुबाबात तो आपल्या गोंडेदार शेपटीसह साऱ्या बंगल्यात वावरत असतो. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचा भाव जण सांगत असतो की, 'माझ्याच कृपेने तुम्ही या घरात वास्तव्य करत आहात हं!'

आठ वर्षांपूर्वी बॉबी आमच्या घरात आला तेव्हा तो इतका गुबगुबीत होता की, मऊ मऊ लोकरीचा एक गुंडाच भासत असे. छोटा बॉबी दुधाशिवाय दुसरे काहीही खात नसे आणि लुटूलुटू चालणाऱ्या त्याला धड जिनाही चढता येत नसे. तोच बॉबी आता अवाढव्य झाला आहे. त्याचा भव्य देह, काळेभोर पाणीदार डोळे आणि त्याचा प्रचंड आवाज यांमुळे कोणीही परका माणूस घरात शिरण्याचा चुकूनसुद्धा विचार करत नाही.

बॉबीचे नाक मोठे तिखट आहे. त्यामुळे घराच्या फाटकाशी आलेली व्यक्ती परिचित आहे की अपरिचित हे त्याला केवळ वासानेच कळते. बॉबीला बोलता येत नाही, पण आपण बोललेले सर्व त्याला कळते. त्याला काही हवे असल्यास तो विविध आवाज काढून तसे सुचवतो आणि जर का आपण दुर्लक्ष केले तर तो आपल्या अंगावर चढाई करतो. 'आंघोळ' असा शब्द नुसत्या बोलण्यातही आला. तरी तो लपतो. पण एकदा आंघोळीला सुरवात झाली की तो मनसोक्त आंघोळ करतो.

बॉबी खरा खेळकर आहे. चेंडू फेकाफेकीचा खेळ त्याला खूपच आवडतो. कुठेही दडलेला चेंडू तो बरोबर हुडकून काढतो. बॉबीची स्मरणशक्ती दांडगी आहे; म्हणून तर एकदा इंजेक्शन घेतलेला बॉबी आता सिरिंज पाहताच पळून जातो आणि पलंगाखाली दडून बसतो. असा बॉबी माझा अत्यंत लाडका व आवडता कुत्रा आहे.

maza avadta prani essay in marathi | माझा आवडता प्राणी मराठी निबंध

my best friend essay in Marathi | माझा आवडता मित्र मराठी निबंध

नमस्‍कार मित्रांनो आज आपण माझा आवडता मित्र मराठी निबंध बघणार आहोत,  मित्र हा शब्द बोलायला जेवढा सोपा आहे तेवढाच खरा मित्र मिळविणे कठीण काम आहे एक खरा मित्र तो आहे जो तुम्हाला संकटात मदत करतो आणि योग्य मार्गदर्शन करतो. आपल्‍या वागण्‍याबोलण्‍यातील उणीवा दाखवतो. 


इंग्रजीत एक म्हण आहे – “A friend in need is a friend indeed.” गरजेच्या, संकटाच्या वेळी जो कामी येतो तोच खरा मित्र. मनुष्य एक समाजशील प्राणी आहे. समाजात तो एकटा राहू शकत नाही. त्याला समाजात सर्वांच्या बरोबर चालण्यासाठी, सुख दु:खात सहभागी होण्यासाठी, मनातल्या गोष्टी सांगण्यासाठी एका विश्वसनीय मित्राची गरज असते. 


मैत्रीबाबत असे म्हटले जाते की, मैत्री केली जात नाही, मैत्री आपोआप होते. मने जुळल्यावर एकमेकांचे वागणे आवडल्यावर परिचयाचे रूपांतर गाढ मैत्रीत होते. भारतात कृष्ण-सुदामा, राम-सुग्रीव, कर्ण-दुर्योधन ही मैत्रीची उत्तम उदाहरणे दाखविता येतात.



माझा पण असाच एक खरा मित्र आहे. त्याचे नाव अशोक आहे व तो माझा वर्गमित्र आहे. आम्ही दोघे नेहमी बरोबर असतो. आमचे कुटुंबीय दहा वर्षांपूर्वी महिनाभराच्या अंतराने या गावी आले. तेव्हापासूनच आमची मैत्री जमली. अशोकचे वडील शिक्षक आहेत आणि माझे वडील बँकेत काम करतात. अशोकचे वडीलच शाळेत प्रवेश घेताना आमच्याबरोबर आले होते. तेव्हापासून आमची ओळख व मग मैत्री झाली.



अशोकची उंची ४.५" आहे. आम्ही ७ व्या वर्गात आहोत. अशोक खूप अभ्यास करतो. वर्गात शिकविणे चालू असताना तो एकाग्र होऊन शिक्षकांकडे लक्ष देतो. महत्त्वाचे मुद्दे वहीत लिहून घेतो. त्याचे अक्षर सुंदर आहे. त्याला नेहमीच चांगले गुण मिळतात. तो जसा चांगला विद्यार्थी आहे तितकाच चांगला खेळाडू आहे. तो फुटबॉल संघाचा कप्तान आहे. त्याचे वागणे नम्र आहे. 



शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये तो सारखाच लोकप्रिय आहे. तो नेहमी वेळेवर शाळेत येतो. त्याचे कपडे स्वच्छ असतात, बुटांना पॉलिश केलेले असते. त्यांचे दांत मोत्यांप्रमाणे चमकदार आहेत. नखे कापलेली असतात. आम्ही वर्गात एकाच बाकावर वसतो. गणित, विज्ञानाचे, प्रश्न आम्ही मिळून सोडवितो. मला इंग्रजी चांगले येते. अशा प्रकारे एकमेकांच्या सहकार्याने आम्ही चांगले गुण मिळविण्यात यशस्वी होतो.



शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांतही तो माझ्याबरोबर असतो. संध्याकाळी आम्ही एकत्रच खेळतो. कधी कधी एकमेकांच्या घरी जातो. एकदा माझे वडील आजारी असताना तो संध्याकाळी रोज-दवाखान्यात येत असे. त्याचे वडील पण तब्येतीची चौकशी करीत.

मला माझ्या मित्राचा अभिमान आहे. आमची मैत्री सदैव अशीच राहावी असे मला वाटते. मला खात्री व विश्वास आहे की आमची मैत्री कधीच तुटणार नाही.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध 2 

मी फार नशीबवान आहे की मला समीरसारखा मित्र मिळाला.समीर हा माझा एक जिवलग मित्र आहे. तो नेहमी खेळांच्याच गप्पा मारत असतो. तो खरा खेळगडी आहे. समीरला कुठल्याही एका विशिष्ट खेळाची आवड आहे, असे नाही हं ! सर्वच खेळांत तो रस घेतो. विशेष म्हणजे प्रत्येक खेळाविषयी त्याला तंत्रशुद्ध माहिती आहे. नाहीतर सदासर्वकाळ क्रिकेटमध्ये रंगणाऱ्या आमच्यापैकी कितीजणांना क्रिकेटच्या मैदानाची लांबीरुंदी माहीत असते बरे? 

my-best-friend-essay-in-Marathi
my-best-friend-essay-in-Marathi


समीर खेळांविषयीची केवळ माहिती गोळा करत नाही, तर तो सर्व खेळ उत्तम खेळतो. सहज एखादा निरोप सांगायला म्हणून तो घरी येतो, आणि कॅरमचा एक डाव जिंकून जातो. तितक्याच सफाईने तो शाळेच्या क्रिकेट संघात आपली कामगिरी बजावतो. रात्रीच्या वेळी रस्त्यावर  खेळणाऱ्या कामगारांतही त्याला भाव आहे. 'समीरदादा' आले की आपला संघ जिंकणार, अशी त्यांना खात्री असते.

कोणत्याही खेळाच्या जागतिक स्पर्धा सुरू झाल्या की, त्याची सर्व माहिती, अगदी आकडेवारीसह समीरला तोंडपाठ ! किती राष्ट्रे या स्पर्धेत उतरली आहेत? सामने कोठे कोठे आहेत? प्रत्येक संघातील उत्तम खेळाडू कोण? त्या खेळाडूंच्या खेळाचे वैशिष्ट्य काय? यांबाबतची सगळी माहिती समीर देत असतो. त्याने बांधलेले अंतिम निकालाबद्दलचे अंदाज सहसा चुकत नाहीत; कारण याबाबतचा समीरचा अभ्यास चोख आहे.

 खेळांविषयीच्या पुस्तकांचा मोठा संग्रह त्याच्याजवळ आहे. प्रत्येक वृत्तपत्रात येणाऱ्या क्रीडाविषयक बातम्या तो बारकाईने वाचतो. आवश्यक ती कात्रणे काढून ठेवतो. त्याने जमवलेला खेळाडूंचा आल्बम तर पाहण्यासारखा आहे. कुठेही कोणी खेळाडू येणार आहे, असे कळले की समीर धावलाच तेथे त्याला भेटायला.

समीरच्या या छंदाला त्याचे आईवडील केव्हाही विरोध करत नाहीत. उलट दोघेही त्याचे कौतुक करतात. त्याचे बाबा क्रीडाविषयक मासिके त्याला आणून देतात. कारण समीर छंद सांभाळून आपला अभ्यासही उत्तम ठेवतो. त्यामुळे माझा हा दोस्त घरात, शाळेत आणि सर्व मित्रांत विशेष आवडता आहे.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

my best friend essay in Marathi | माझा आवडता मित्र मराठी निबंध

Maza avadta sant essay in Marathi | माझा आवडता संत मराठी निबंध


नमस्‍कार मित्रांनो आज आपण माझा आवडता संत मराठी निबंध बघणार आहोत.  भारत ही संताची भुमी आहे. संतानी आपल्‍या शिकवणी व ज्ञानातुन समाजाची प्रगतीच करण्‍याचे काम केले आहे. भारताला खुप मोठी संतपंरपरा लाभलेली आहे. याच संतपंरपरेतील संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज , संत गाडगेबाबा यांच्‍या विषयी अनुक्रमे ३ निबंध बघणार आहोत चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

maza-avadta-sant-essay-in-marathi
maza-avadta-sant-essay-in-marathi

 majha avadta sant tukaram nibandh | संत तुकाराम महाराज

मुद्दे : 
  • महाराष्ट्राला संतांची परंपरा 
  • संत तुकाराम महाराज हे एक श्रेष्ठ संतकवी 
  • आई-वडील, जन्म इ. 
  • प्रतिष्ठित घराणे
  • घरात विठ्ठलभक्तीची परंपरा 
  • लहान वयातच आध्यात्मिक विदयेचे संस्कार
  • कालांतराने अध्यात्माची ओढ 
  •  गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत वगैरे थोर ग्रंथांचा व्यासंग 
  • विरक्ती- स्वप्नात गुरूपदेश 
  • कवित्वाची स्फूर्ती 
  • अलौकिक प्रतिभेतून निर्माण झालेली अमृतवाणी 
  • भोंदू लोकांवर कोरडे ओढले
  • सामान्यांपासून प्रतिष्ठितांपर्यंत सर्व थरांतील लोक आकर्षित 
  • मत्सरी लोकांकडून छळ 
  • धर्मरक्षण हेच जीवितकार्य 
  • जातिभेद नाकारले 
  • 'संत तुकारामांची गाथा' हे मराठी भाषेचे श्रेष्ठ असे भूषण.

महाराष्ट्राला थोर संतांची फार मोठी परंपरा लाभली आहे. या परंपरेतील संत तुकाराम महाराज हे एक श्रेष्ठ संतकवी होत. त्यांचा जन्म १६०८ साली देहू येथे झाला.  संत तुकारामांचे घराणे हे त्या काळातील एक प्रतिष्ठित घराणे होते. त्यांचे शिक्षण त्या काळातील प्रतिष्ठित घराण्यांतील व्यक्तींप्रमाणे झाले.

संत तुकाराम महाराजांच्या घरात पिढ्यान्पिढ्यांची विठ्ठलभक्तीची परंपरा होती. त्यांचे एक पूर्वज विश्वंभर यांना शेतात विठ्ठल-रखुमाईची मूर्ती सापडली. त्यांनी नदीकाठावरील घरात त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. या घराला 'देऊळवाडा' असे म्हणत. या देऊळवाड्यात चालणारी भजने, कीर्तने, पुराणे ऐकून लहान वयातच तुकाराम महाराजांच्या मनावर आध्यात्मिक विदयेचे खोलवर संस्कार झाले.

त्या काळात महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. असंख्य माणसे देशोधडीला लागली. कित्येक मृत्युमुखी पडली. तुकाराम महाराजांवर नातेवाइकांचेही  मृत्यू पाहण्याचे दुर्भाग्य ओढवले. त्या भीषण दुष्काळाने माणसांची केलेली दैना पाहून तुकाराम महाराजांच्या मनात विरक्ती दाटून आली. लहानपणापासून अध्यात्मविदयेचे संस्कार जागृत झाले. त्यांचे मन अध्यात्मचिंतनात गढू लागले. ते देहूजवळच्या भामनाथगडावर जाऊन अध्यात्मचिंतन करू लागले. 

गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, नामदेव गाथा वगैरे थोर ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला. या दरम्यानच्या काळात संत तुकाराम महाराजांना स्वप्नात गुरूपदेश झाला. संत नामदेव पांडुरंगासमवेत त्यांच्या स्वप्नात आले. त्यांनी त्यांना कवित्व करायला सांगितले आणि अलौकिक प्रतिभेतून स्फुरलेली त्यांची अमृतवाणी सिद्ध झाली.

संत तुकाराम महाराजांच्या  काव्याकडे सामान्य माणसापासून ते त्या काळातील प्रतिष्ठित लोकांपर्यंत सर्व थरांतील लोक आकर्षित झाले. गावागावांत त्यांची कीर्ती पसरली. संत तुकाराम महाराजांची लोकप्रियता पाहून काहीजणांना त्यांचा मत्सर वाटू लागला. हे मत्सरी लोक त्यांचा नाना प्रकारे छळ करू लागले. त्यांच्या अभंगांच्या वह्या  त्या दुष्ट लोकांनी इंद्रायणी नदीत बुडवायला लावल्या. परंतु विठ्ठलकृपेने त्या वह्या  तरंगून वर आल्या, ही कथा सगळ्यांना ठाऊकच आहे. यामुळे लोकांच्या मनात तुकाराम महाराजांविषयी अपार भक्तिभावच निर्माण झाला.

संत तुकाराम महाराजांनी धर्मरक्षण हेच जीवितकार्य मानले होते. त्यांनी जातपात, उच्चनीच हे भेद नाकारले. संत तुकाराम महाराजांच्या कार्याच्या रूपाने भागवत संप्रदायाने कळसच गाठला. त्यांचे काव्य सुभाषितांसारख्या वचनांनी नटलेले आहे

जे का रंजले गांजले। त्यांसि म्हणे जो आपुले।
 तोचि साधु ओळखावा। देव तेथेचि जाणावा।।

अशा हजारो प्रासादिक अभंगांतून आपले दिव्य तत्त्वज्ञान संत तुकाराम महाराजांनी जनतेसमोर मांडले आहे. जनसामान्यांच्या जिभेवर हे काव्य विराजमान झाले आहे. 'संत तुकारामांची गाथा' ही मराठी भाषेचे एक अलौकिक भूषण बनले आहे.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला  हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता बाकीचे २ निबंध तुम्‍हाला खाली स्‍क्रोल केल्‍यावर दिसुन येतील. धन्‍यवाद   


maza avadta sant eknath marathi nibandh | संत एकनाथ मराठी निबंध


आजही जन्मावरून माणसांत उच्चनीचता मानली जाते. अशा वेळी मनात येते, स्वर्गातील एकनाथांच्या आत्म्याला काय वाटत असेल? चारशे वर्षांपूर्वी एकनाथांनी प्रत्यक्ष कृतीद्वारा समाजाला समानतेची व मानवतेची शिकवण दिली होती.

इ. स. १५३३ मध्ये सुविदय, भाविक अशा चक्रपाणींच्या घरात संत एकनाथांचा जन्म झाला. एकनाथांच्या घराण्यात विठ्ठलभक्ती फार पूर्वीपासून रुजलेली होती. त्यांच्या आजोबांनी म्हणजे संत भानुदासांनी कर्नाटकातून पांडुरंगाची मूर्ती पंढरीला आणली. एकनाथांना तर अगदी बालपणापासून परमेश्वरप्राप्तीचे वेड लागले होते. त्यासाठी त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षीच घराचा त्याग केला आणि ते देवगडला आपल्या गुरुगृही, जनार्दनस्वामींकडे आले. जनार्दनस्वामींनी एकनाथांची परीक्षा घेतली. ते त्या कसोटीला उत्तम प्रकारे उतरले. तेव्हा त्यांना गुरूंचा अनुग्रह मिळाला.

एकनाथ विद्वान होते, ज्ञानी होते; धर्म व रूढी यांतील फरक त्यांनी जाणला होता. सनातनीपणाचे पांघरूण पांघरणारे लोक माणुसकीपासून दूर जात आहेत, हे एकनाथांनी ओळखले. संस्कृत भाषेचा त्यांचा उत्तम अभ्यास होता. तिची थोरवी ते जाणत होते; पण त्याचबरोबर मराठीची महत्ताही त्यांनी जाणली होती. त्यामुळे त्यांनी कर्मठ समाजाचा रोष पत्करूनही सामान्य जनांसाठी मराठीत प्रासादिक रचना केली.

त्यांनी अविश्रांत परिश्रम घेऊन ज्ञानेश्वरांच्या भावार्थदीपिकेचे शुद्धीकरण केले व तिच्यातील पाठभेद काढून टाकून 'ज्ञानेश्वरी' सिद्ध केली. एकनाथांनी भागवताची रचना केली व भावार्थ रामायणातून रामकथा सांगितली. 'रुक्मिणी-स्वयंवर' हा त्यांच्या पंडिती काव्याचा उत्कृष्ट नमुना आहे. एकनाथांनी ही सर्व रचना मराठीत केली. एकनाथांच्या या मराठी रचनेला काशीच्या पंडितांनी प्रारंभी विरोध केला; पण ग्रंथ श्रवण केल्यावर त्याच पंडितांनी एकनाथांच्या ग्रंथाची काशीत मिरवणूक काढली.

एकनाथ संत होते, कवी होते, तसेच ते श्रेष्ठ समाजसुधारक होते. समाजातील चातुर्वर्ण्य पद्धत व त्यामुळे समाजातील विशिष्ट वर्गावर होणारा अन्याय त्यांना मान्य नव्हता. रणरणत्या वाळूत रडणाऱ्या हरिजन बालकाला त्यांनी उचलून घेतले व त्याला महारवाड्यात नेऊन पोचवले. एवढेच नव्हे, तर त्यांनी स्वत:च्या वडलांच्या श्राद्धाला महारांना आपल्या घरी पंक्तीला जेवायला बोलावले. काशीहून आणलेली गंगा तहानलेल्या गाढवाला पाजली. हे सारे एकनाथ करू शकले; कारण जनता हाच त्यांचा जनार्दन होता व जनसेवा हीच त्यांना ईश्वरपूजा वाटत होती.


sant gadge baba essay in marathi | संत गाडगेबाबा मराठी निबंध एक समाजसेवक संत

मुद्दे :
  • जन्म - बालपण
  • दारिद्र्याचे चटके
  • निरक्षरता, अंधश्रद्धा यांविरुद्ध प्रचार
  • 'गाडगेबाबा' हे नाव का पडले?
  • कष्ट करून भिक्षा घेणे
  • स्वच्छतेचा आग्रह
  • देणग्यांचा उपयोग जनतेसाठी
  • अनेक संस्था
  • निधन
संत गाडगेबाबांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यात झाला. त्यांचे मूळ नाव डेबूजी हे होते. वडिलांना दारूचे व्यसन असल्यामुळे घरात कायमचे दारिद्र्य होते. वडील अकाली वारले. त्यामुळे त्यांच्या मामाने त्यांचा सांभाळ केला.
संत गाडगेबाबांनी मामासोबत शेतात खूप कष्ट केले, पण सावकाराने मामाच्या शेतावर जप्ती आणली. मामाच्या अशिक्षितपणामुळे सावकाराने मामाला फसवले. या घटनेचा गाडगेबाबांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्यामुळे 'व्यसन सोडा, शिक्षण घ्या. कर्ज घेऊ नका,' असा त्यांनी आयुष्यभर प्रचार केला.

सामाजिक प्रबोधनासाठी त्यांनी भजन, कीर्तन व प्रवचन हा मार्ग वापरला. ते नेहमी अंगावर फाटकी गोधडी घेत. त्यांच्या हातात नेहमी गाडगे असे. त्यामुळे त्यांना 'गाडगेबाबा' हे नाव पडले. गाडगेबाबा कधी एका जागी जास्त काळ राहत नसत. कष्ट करूनच भिक्षा घेत. त्यांच्या हातात नेहमी झाडू असे. ते स्वत: झाडण्याचे काम करत आणि लोकांना स्वच्छतेचा उपदेश करत.

लोकांकडून त्यांनी खूप देणग्या मिळवल्या. पण एकही पैसा स्वत:साठी खर्च केला नाही. त्यांनी धर्मशाळा बांधल्या, गोरक्षण संस्था उभारल्या. त्यांनी अनेक शाळा व महाविदयालये सुरू केली. आयुष्याच्या अंतापर्यंत त्यांनी लोकजागृतीचे व लोकसेवेचे काम केले. १९५६ साली त्यांचे निधन झाले. ते एक महान सेवाभावी संत होते.

Maza avadta sant essay in Marathi | माझा आवडता संत मराठी निबंध


Maza avadta lekhak marathi nibandh | माझा आवडता लेखक मराठी निबंध

निबंध 1 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  माझा आवडता लेखक  मराठी निबंध बघणार आहोत. आपण भरपुर पुस्‍तके वाचत असतो पण त्‍यातील काही निवडकच लेखक आपले आवडते असतात. माझे आवडते लेखक आहेत पु. ल.  देशपांंडे कारण त्‍यांचे लिखाण इतके आनंददायी आहे की तुम्‍ही पुर्ण पुस्‍तक वाचल्‍याशिवाय राहणार नाही.  

मुद्दे :

  • पु. ल. देशपांडे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व
  • लहान मुलांसाठी लेखन
  • विनोदी लेखन
  • व्यक्तिचित्रे
  • अनेक नाटके
  • प्रवासवर्णने
  • अनेकांच्या पुस्तकांना प्रस्तावना
  • माणुसकी गौरवणारा,
  • माणुसकीचा गहिवर असलेला एक अलौकिक व्यक्तिमत्त्वाचा माणूस व अष्टपैलू लेखक


पु. ल. देशपांडे यांची अनेक पुस्तके माझ्या संग्रही आहेत. ही पुस्तके कितीही वेळा वाचली तरी त्यांची गोडी कमी होत नाही. कारण पु. ल. देशपांडे हे माझे आवडते लेखक आहेत. माझेच का? पु. ल. हे साऱ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व आहे.

अगदी सुरुवातीला माझ्या वाचनात आले पु. लं.चे 'खोगीरभरती' आणि 'नस्ती उठाठेव' हे विनोदी लेखसंग्रह. हा काहीतरी वेगळाच लेखक आहे,या पुस्तकांबरोबर मोठे होत असतानाच मला कळलं की ज्या 'नाच रे मोरा' या गाण्यावर आपण नाचलो, त्या गाण्याची चाल पु. लं.नी दिलेली आहे.

maza-avadta-lekhak-nibandh
maza-avadta-lekhak-nibandh


 नंतर वाचनात आली पु. लं.ची 'व्यक्ती आणि वल्ली' आणि 'गणगोत' ही पुस्तके. तेव्हा लक्षात आले की, हा लेखक केवळ विनोदीच लिहीत नाही, तर हा उत्कृष्ट व्यक्तिचित्रेही रेखाटतो. कारुण्याची झालर असलेले विनोदही जागोजागी आढळतात. त्यांचा विनोद हसवता हसवता अंतर्मुख करून जातो.

पु. लं.ची 'तुझे आहे तुजपाशी', 'अंमलदार', 'ती फुलराणी...' ही नाटके पाहिली; पण 'बटाट्याची चाळ', 'वाऱ्यावरची वरात', 'असा मी असामी' हे एकपात्री प्रयोगपाहायची संधी मला मिळाली नाही. मग त्या पुस्तकांची पारायणे केली; ध्वनिफिती ऐकल्या. बटाट्याच्या चाळी 'ला जोडलेले 'एक चिंतन' हे पु. लं.च्या विनोदाचे खास उदाहरण म्हणून सांगता येईल. पु. लं.ची पुस्तके बाजूला ठेवली, तरी त्यांच्या चितळे मास्तरांच्या झिजलेल्या चपला वा त्यांच्या नारायणची नारायणगिरी' विसरता येत नाही.

पु. लं.नी खूप प्रवास केला आणि तो अत्यंत मिस्कील, खुसखुशीत भाषेत शब्दरूपांतही आणला. अपूर्वाई, पूर्वरंग, वंगदेश ही त्यांची पुस्तके म्हणजे मराठी साहित्यातील अजरामर प्रवासवर्णने आहेत. पु. लं.नी अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या. त्या छोट्याशा प्रस्तावनाही आपल्याला एखादा मौल्यवान विचार देऊन जातात. पु. ल. एके ठिकाणी लिहितात, "हास्य हे माणसा-माणसांच्या मनात निर्भयता निर्माण करणारे मोठे साधन आहे. हास्य आणि सहानुभूती या दोन गोष्टी देऊन निसर्गाने माणसाला माणूसपण दिले आहे. खळाळून हसणाऱ्या मोठ्या समुदायातून या माणुसकीचे सर्वांत प्रभावी दर्शन होते."

आज पु. ल. आपल्यात नाहीत; पण माणुसकी गौरवणारा हा महाराष्ट्राचा महान अष्टपैलू लेखक माझा आवडता लेखक आहे. 

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व पु. ल. देशपांडे यांची कोणती पुस्‍तके तुम्‍ही वाचली  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

निबंध 2

माझा आवडता लेखक पु ल देशपांडे मराठी निबंध

माझे आवडते लेखक आहेत पु. ल. देशपांंडे कारण पु.ल. आनंदात जगले, विविध कलांच्या क्षेत्रांत ते लीलया वावरले. विशेष म्हणजे पु.लं.ना जो जो आनंद गवसला, जेथे जेथे आनंद मिळाला, तो त्यांनी सर्वांसाठी मुक्तपणे उधळला. आपल्या एका मुलाखतीत पु.ल. म्हणाले होते, 'मला जेव्हा जेव्हा काही चांगले दिसते, आवडते तेव्हा तेव्हा ते दुसऱ्याला सांगण्यासाठी मी उत्सुक असतो, आतुर असतो.' म्हणून पु.ल. हे केवळ शब्दार्थी आनंदयात्री नव्हते, तर ते खरोखरीचा आनंद उधळणारे 'आनंददात्री' होते. 

पु.लं.नी मराठी माणसाला काय दिले, असा प्रश्न विचारण्याऐवजी पु.लं.नी मराठी माणसाला काय दिले नाही? असेच विचारावे लागेल. अशा या अष्टपैलू कलावंताचा जन्म १९१९ साली झाला. त्यांचे शिक्षण मुंबई व पुणे येथे एम्.ए.,एल्.एल्.बी. पर्यंत झाले. त्यांनी संस्कृत व बंगाली या भाषांचा परिश्रमपूर्वक अभ्यास केला. त्यांनी लिपिक, शिक्षक, प्राध्यापक अशा विविध स्तरांवर नोकऱ्या केल्या. आकाशवाणीवर नाट्यविभागप्रमुख म्हणून काम केले. दिल्ली दूरदर्शनवरील कार्यक्रमांचे ते पहिले निर्माते होते.

पु.लं.जवळ असामान्य निरीक्षणशक्ती होती. त्यांच्या लहानपणी घरी आलेल्या पाहुण्याचे अचूक निरीक्षण करून आपला हा बाळ काही जगावेगळे बोलणार नाही ना, अशी भीती त्यांच्या आईला वाटे. पण याच निरीक्षणशक्तीतून पु.लं.च्या 'व्यक्ती आणि वल्ली' साकार झाल्या. 'गणगोता 'तील आप्तजन चिरंजीव झाले. पु.लं.च्या लेखनाचे वैशिष्ट्य असे की, अनेकदा वाचून, पाहून वाचकांनाही ती सारी माणसे आपलीच, जवळचीच वाटू लागली. 'बटाट्याची चाळ' या पु.लं.च्या पुस्तकातील प्रत्येक माणूस आपल्यापरीने वेगळा आहे.

पु.लं.नी भरपूर प्रवास केला आणि 'अपूर्वाई' , 'पूर्वरंग' आणि 'वंगदेश' अशा पुस्तकांतून तो वाचकांपुढे मांडला. युरोपातील 'कापी' बेटावरील निळाईच्या सौंदर्याने पु.लं.चे अंत:करण भरून आले आणि त्यांना आठवला ज्ञानेश्वरांनी वर्णिलेला 'कोटिचंद्रप्रकाश'.

पु.लं.चे चित्रपट, नाटके, एकपात्री प्रयोग सारेच लोकांनी डोक्यावर घेतले. त्यांतल्या संवादांनी, गाण्यांनी, अभिनयाने आणि दिग्दर्शनाने रसिकांना अमाप आनंद दिला. पु.लं.चा विनोद हा अभिजात होता. कुणालाही न दुखावणारा, कुणाच्याही व्यंगावर बोट न ठेवणारा. शब्दाशब्दांवर ते लीलया कोट्या करत. त्यांचे 'कोट्यधीश' हे पुस्तक वाचकाला कोणत्याही परिस्थितीत खुलवते.

पु.ल. स्वतः मूलतः कविमनाचे होते, संगीतकार होते. त्यांचे 'नाच रे मोरा' हे गाणे ऐकल्यावर प्रत्येक मराठी बालकाचे बालपण सुखावून जाते. पु.ल. आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाई हे दोघेही काव्यवेडे. स्वानंदासाठी ते नेहमीच कविता वाचत, म्हणत. त्यांना शेकडोंनी कविता पाठ होत्या. पण त्यांच्या मनात आले, हा आनंद आपण इतरांपर्यंत पोहोचवला तर... आणि मग भाईंनी आणि सुनीताताईंनी कविवर्य बोरकर, मढेकर आणि आरती प्रभूच्या कवितांच्या वाचनाचे जाहीर कार्यक्रम केले. स्वत:ला मिळालेला आनंद हजारो श्रोत्यांवर उधळून दिला.

पु.लं.च्या बाबतीत म्हणावे लागते की, 'देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी आमुची झोळी'.कोठे कोणी चांगले काम करत आहे, पैशासाठी काम अडले आहे असे कळले की, पु.लं.चा मदतीचा हात तेथे पोहोचत असे. कुणा एका आडवळणाच्या गावी एक प्राचार्य आपल्या महाविदयालयासाठी धडपडत आहे, हे कळल्यावर पु.ल. फाऊंडेशन तेथे मदतीला गेले. 

रक्तपेढ्या, रुग्णालये, मुक्तांगण, शैक्षणिक संस्था... साऱ्यांना भरभरून मदत पोहोचली. कुणी तरुण तज्ज्ञ डॉक्टरीण, व्यसनाधीनांना व्यसनांपासून मुक्त करण्यासाठी धडपडत आहे, असे कळल्यावर हा थोर दाता तेथेही पोहोचला. मग सांगा, पु.ल. हे खरोखरच एक आगळेवेगळे आनंदयात्री नव्हते का?

 
निबंध 3


माझा आवडता साहित्यिक मराठी निबंध

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे महान विनोदाचार्य प्र.के. अत्रे म्हणत असत, 'लता मंगेशकर आणि पु.लं. देशपांडे हे महाराष्ट्रातले दोन चमत्कार आहेत. ही तेजाने तेजाची केलेली आरती आहे. खरोखर, 'चमत्कार' या शब्दाव्यतिरिक्त पु.लंचं वर्णन करताच येणार नाही.


 अवघं साहित्यविश्व त्यांचा 'महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व' असा उल्लेख करतं. 'लाडकं' हे वात्सल्याच्या विश्वातलं विशेषण दुसऱ्या कोणाला लावता येईल असं वाटत नाही. ते हरहुन्नरी होते आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक चमकदार पैलू होते. म्हणूनच असं म्हणावंसं वाटतं की 'याच्या आधी असं व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रात झालं नाही आणि पुढे कधी होईल असं वाटत नाही.'



 अशी माणसं शतकात किंवा हजार वर्षात एखादवेळच जन्माला येतात. धन्य त्यांचे आई-वडील. त्यांच्या आई-वडिलांनी जेव्हा त्यांचं नाव 'पुरुषोत्तम' असं ठेवलं, तेव्हा त्यांना यत्किंचितही कल्पना आली नसेल की हे मूल जेव्हा 'पुरुष' होईल तेव्हा ते अनेक क्षेत्रात 'उत्तम' ठरेल. देव माणसाला केव्हा केव्हा चकवतो, तो असा.
पु.लं. ना काही येत नव्हतं असं नाहीच. ते उत्कृष्ट विनोदी (आणि गंभीरही) लेखक होते. नाटककार आणि नटही. गीतकार आणि संगीतकारही, गायक आणि वादकही, कथालेखक व कथाकथक, वक्तृत्वही, कर्तृत्वही.


एखाद्याला वाटेल त्यांना नृत्यकला अवगत नसावी. पण ज्यांनी त्यांचे 'गुळाचा गणपती' सारखे चित्रपट, 'वाऱ्यावरची वरात' यासारखं प्रहसन किंवा 'सुंदर मी होणार' यासारखं नाटक पाहिलं असेल, त्यांना कळून येईल की नृत्याच्या क्षेत्राचेही ते चांगले जाणकार होते. ते साहित्यातले सिकंदर होते, जिंकायला आता क्षेत्रच राहिलं नाही म्हणून खंतावणारे. ज्या क्षेत्रात ते गेले, त्या क्षेत्रातले ते सम्राट झाले. त्या क्षेत्रावर त्यांनी अधिराज्य गाजविले. 



साम्राज्य तर असं स्थापलं की त्यांच्या साम्राज्यावर सूर्य कधी मावळला नाही आणि कधी मावळणारही नाही.
पद्य विडंबनावर आचार्य अत्रे यांनी आपली मोहोर उमटवली आहे, तर गद्य विडंबनावर पु. लं. नी आपला ठसा उमटवला आहे. त्याचे 'व्यवच्छेदक लक्षण' व 'सहानुभावांचे वाङ्मय' बटाट्याच्या चाळीतलं 'एक चिंतन' असे लेख मराठीत कधी लिहिलेच गेले नाहीत. यातलं विडंबन विशेष. 


त्याच्या अगोदर व्यंकटेश माडगूळकरांनी अप्रतिम व्यक्तिचित्रं रेखाटली. पण माडगूळकरांची व्यक्तिचित्रे आणि पु.लंची व्यक्तिचित्रे यात खूप फरक आहे. असं म्हणता येईल की माडगूळकरांच्या 'व्यक्ती' आहेत तर पु.लंच्या 'वल्ली' आहेत. पु.लंच्या लिखाणाचं वैशिष्ट्य असं की ते एखाद्याची टिंगल - टवाळी करतात. खट्याळपणे त्याच्यावर लिहून आपल्याला हसवतात. पण मग शेवटी अगदी गंभीर होतात. काळजाचा ठाव घेणारं असं काहीतरी लिहून जातात.


'तुझं आहे तुजपाशी' मधील आचार्य घ्या. सबंध नाटकभर आपण त्यांना हसत असतो. पण पु.लं. शेवटी त्यांच्या तोंडी असं एक भाषण घालतात की, आपल्याला आचार्यांची कीव यायला लागते. त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटायला लागते. वाटतं, अरेरे, आपण या स्फटिकासारख्या स्वच्छ आणि प्रामाणिक माणसाला उगाच हसलो.
त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल, त्यांनी इतकं विनोदी लेखन केलं, पण कुठेही

आचरटपणा नाही आजची व्यासपीठावरची आणि दूरदर्शनची विनोदी नाटके म्हणजे शुध्द आचरटपणा. हल्ली विनोद म्हणजे विदूषकी चाळे. विनोद म्हणजे आचरटपणा  असं समीकरण झालेलं आहे. म्हणूनच खुद्द पु.लंच दूरदर्शनला 'दुर्दशन' असं म्हणत असत. त्यांनी हयात व मृत व्यक्तीची कधी कुचाळकी केली नाही किवा
कुणाच्या वर्मी झोंबेल असं काही लिहिलं नाही. ते मांगल्याचे, सौंदर्याचे पुजारी होते. म्हणून । त्यांना सगळं काही सुंदर आणि मंगल वाटे. 


एकपात्री प्रयोग करावा, तर पु.लं.नीच. एकनाथांनी | लिहून ठेवलंय की ज्ञानेश्वरापाठी कोणीही महाटी ओवी करू नये. मला सुध्दा असंच वाटतं की | पु.लं. नंतर कोणीही एकपात्री प्रयोग करू नयेत. त्यांनी विनोदाची पातळी तर इतकी उंचावून | ठेवलीय की त्या पातळीपर्यंत फारच थोडे लोक येऊ शकतील.  पु.लं. गेले आणि त्यांच्याबरोबर | असं काही गेलंय की जे महाराष्ट्र परत कधीच पाहू शकणार नाही.

निबंध 4

 majha avadta lekhak in marathi essay


मला लहानपणापासून वाचनाची आवड. लहानपणी पंचतंत्र, इसापनीती, अद्भुत कथा आवडायच्या. हळूहळू वाचनकक्षा रुंदावत गेल्या. सानेगुरुजींची ‘गोड गोष्टी', 'श्यामची आई' पुस्तके वाचली आणि साने गुरुजी आवडू लागले. नंतर मात्र मी ललित साहित्य वाचू लागले. त्यात ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, अनंत काणेकर, चिं. वि. जोशी, रणजीत देसाई, प्र. के. अत्रे यांची पुस्तके वाचू लागले. पण सर्वात प्रभाव पडला, तो पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याचा.



 त्यामुळे पु. ल. देशपांडे माझे आवडते लेखक बनले. मग अर्थातच पुलंची पुस्तके वाचण्याचा मी सपाटा चालविला. पु. ल. देशपांडे म्हणजेच पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचा एक प्रदीर्घ कालखंडच! साहित्य, नाट्य, संगीत, चित्रपट, एकपात्री प्रयोग, संस्कृती अशा जीवनाच्या सर्वांगांना स्पर्श करणारे. असे एकही क्षेत्र नाही, की जिथे पुलंचा परिसस्पर्श झालेला नाही. आयुष्य मी सुटी' समजून घालविली, असे म्हणणारे पु. ल. खरोखरीच आनंदयात्री होते. 




लेखकाचे अंतरंग त्यांच्या साहित्यात डोकावते. त्यांचे म्हणणे होते की, “जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्यामध्ये पकडून नियतीने चालविलेली आपणा साऱ्यांची फसवणूक एकदा लक्षात आली, की त्यातून सुटायला आपली आणि आपलकीने भोवताली जमणाऱ्या माणसांची हसवणूक करण्यापलीकडे आणखी काय करायचं? त्यामुळेच त्यांची भाषाशैली अत्यंत खेळकर होती. कोणतेही तत्त्वज्ञान हसत-खेळत सांगण्याची त्यांची शैली कोणाही वाचकाला भुरळ न पाडेल, तरच नवल!




संगीत आणि नाटक हे पुलंच्या संपन्न कलाजीवनाचे खास विशेष. तुझे आहे तुजपाशी, ती फुलराणी, सुंदर मी होणार, अंमलदार, एक झुंज वाऱ्याशी, बटाट्याची चाळ, पुढारी पाहिजे, वयम् मोठम् खोटम् इ. नाटकांद्वारे पुलंनी जो विषय हाताळला, किंबहुना ज्या विषयाला स्पर्श केला, त्याचे सोने झाल्याशिवाय राहिले नाही. संवादात सहजता, खेळकरपणा, सुबोधता, मोहकता असल्याने त्याची वाचकांवर, ती नाटके पाहणाऱ्या प्रेक्षकांवर जादू झालीच पाहिजे.



पु.लं च्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा त्यांच्या प्रत्येक पुस्तकातील प्रत्येक पानावर, प्रत्येक ओळीवर दिसून येतो. त्यांची पुस्तके म्हणजे मोठे मासे छोटे मासे, अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्याच्या देशा, नसती उठाठेव. गोळाबेरीज, खिल्ली, आम्ही लटिके न बोलू, तीन पैशांचा तमाशा, गुण गाईन आवडी, व्यक्ति आणि वल्ली', एवढी ग्रंथसंपदा त्यांनी आपल्या मराठी रसिकांसाठी निर्माण केली. वाचकांना आपल्या विनोदी शैलीने सतत हसवत ठेवले. 



त्यामुळेच त्यांना कोट्याधीश पुल म्हणत. शाब्दिक कोट्या करणे वाटते तेवढे सोपे नाही. त्यासाठी हजरजबाबीपणा, शब्दांची समृद्धता हवी. ती पुलंच्याकडे विपुल प्रमाणात होती. एक उदाहरण सांगते. पं. भीमसेन जोशी सवाई गंधर्वांचे शिष्य. विमानातून प्रवास केल्याशिवाय त्यांचा एकही दिवस जात नसे. त्यावर पु.ल. म्हणाले, “सवाई गंधर्वांचा शिष्य हवाई गंधर्वच आहे." ही झाली समयसूचकता!




'व्यक्ति आणि वल्ली'मधील व्यक्तिरेखा वाचताना त्या प्रत्यक्ष डोळ्यांपुढे साकारतात. त्यातील व्यक्ती त्यांच्या खास वैशिष्ट्यांनिशी साकारतात; जिवंत होतात. त्यातील प्रत्येक पात्र समाजात कोठेतरी आढळते; पण अशा व्यक्तींचे यथार्थ चित्रण करणे प्रत्येकाला जमत नाही. अशा व्यक्तिरेखा साकारताना निरीक्षण हवे, त्यांच्या लकबी टिपल्या पाहिजेत. तसेच, त्यांची विशिष्ट भाषादेखील शब्दांत मांडता आली पाहिजे, तरच ती व्यक्तिरेखा जिवंत होते आणि ती आपल्या मनात घर करून राहते. 



नारायण, चितळे मास्तर, नाथा कामत, रावसाहेब, पानवाला, सखाराम गटणे सर्वच पात्रे लक्षात राहतात, ती लेखनशैलीमुळे आणि समर्पक शब्दांच्या योजनेमुळेच ना! अशा प्रकारे वाङ्मयीन प्रतिष्ठा लाभलेले दर्जेदार साहित्य, विविध वाङ्मय-प्रकार हाताळणारा हा लेखक सर्वांनाच आवडतो. मग मीच त्याला अपवाद कसा असेन ?


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

Maza avadta lekhak marathi nibandh | माझा आवडता लेखक मराठी निबंध