अंधश्रद्धा मराठी निबंध | andhashraddha marathi nibandh


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण अंधश्रद्धा मराठी निबंध बघणार आहोत. आज आपण विज्ञानयुगात राहुन सुध्‍दा मानवी समाजात अंधश्रद्धा दिसुन येते याची कारणे काय असु शकतात व यावर कशी मात करता येईल हे सांगीतले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 

माणसे अपूर्ण असतात आणि मानवी मनातल्या श्रद्धा, प्रेम यांचीदेखील पूर्तता कधीच होत नाही. आईवडिलांचे जरी मुलावर उत्कट प्रेम असले तरी त्या प्रेमाला अज्ञानाच्या, अविचाराच्या मर्यादा पडलेल्या असतात. असेच आपल्या सर्वाचे आहे. एखादी वास्तव गोष्‍ट ! मानवी ज्ञानशक्ती पलीकडे असलेले असे सत्य भासते तेव्हा ती भासू लागते - अंधश्रद्धा .


andhashraddha-marathi-nibandh
andhashraddha-marathi-nibandh


मुळात अंधश्रद्धा निर्माण होण्याचं कारण, त्याच्या पराधीनपणात लपलेल आहे. यश संपूर्ण स्वत:च नसून त्याला काही कारण म्‍हणुन, तसंच अपयशाची कारणमीमांसा म्हणूनही अंधश्रद्धा निर्माण झाल्या.
आजच्या यंत्रयुगातसुद्धा अंधश्रद्धेचा मानवी मनावर जबरदस्त पगडा आहे. आपण म्हणतो की मांजर आडवे जाण्याने काम होत नाही!

 पण सगळ्यांना काही तोच अनुभव आजपर्यंत आला आहे का? खर तर कार्याचे स्वरूप, साधनांची उपलब्धता इ.वर यशापयश अवलंबून असते. त्यात बिचाऱ्या मांजराचा काहीही संबंध नसतो. 'तीन तिगडा काम बिघडा' व 'साप चावलेल्या मनुष्यास खांद्यावर बसवून मारूतीला प्रदक्षिणा मारणे' हाही त्यातलाच एक खुळा प्रकार ! पण ही झाली अंधश्रद्धेची प्रथम पायरी ! पण हीच अंधश्रद्धा पुढे फार भयानक वळण घेते.

कुठल्याही सुजाण माणसाच्या अंगावर शहारे आणेल असं मानवत' प्रकरण या विज्ञानयुगात घडू शकतंय ही गोष्ट काय दर्शविते ? अमावास्येच्या दिवशी स्त्रियांनी केस सोडून फिरू नये इथपासून ते भूतबाधा झालेल्यांचे भूत उतरविणे इथपर्यंत! दक्षिणेकडे पाय करून झोपू नये, तिकडे यमाचे राज्य असते, मृत्यू येतो, असे आपले पूर्वज प्राचीन वेदात सांगतात. परंतु यासारख्या अंधश्रद्धा या विज्ञानाच्या अढळ बुरूजावर उभ्या आहेत हा शोध आज नवीन लागला आहे. 

हवेतून हात फिरवून घड्याळे, कुंकू, मंगळसूत्रे काढणाऱ्यांवर, ३०-३० दिवस समाधीस्थ होणार अशी प्रतिज्ञा करण्यावर विश्वास ठेवला की या जगात बुवाबाजीचा सुळसुळाट झालाच म्हणून समजा. पण काही अंधश्रद्धांना दुसरा पर्यायच नाही. 'दृष्ट काढणे' ! पण खरंच अशी नजर लागते का ? दृष्ट काढल्यावर ती जाते का? पण आपल्याला दृष्ट काढल्यावर मोकळं, हलकं वाटू लागतं; मग हे कसं काय ? खरंच देव असं काही करतो का?... या प्रश्नांना उत्तर नाहीत. अंगात येणं' हा दुसरा प्रकार. पण याबाबतीत बहुतांशी असत्य अनुभवच येतात. मग खरंच परमेश्वर मानवी शरीरात अवतरतो का? या गोष्टींवर अविश्वास ठेवावाच लागतो.


पण आज एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर मानवाचे पाऊल पडणार आहे... छे! छे! तो ओलांडणारही आहे. मग या खुळ्या, अविचारी, पुरातन समजुतींवर आपण किती विश्वास ठेवायचा? कधी कधी तर हे अज्ञान निरपराधांच्या मृत्यूलाही कारणीभूत ठरतं- जसा गुप्तधनासाठी कुमारिकेचा बळी! म्हणूनच ‘लोकशिक्षण' व 'जनजागृती' या दोन विकासाच्या साधनांची कास धरूनच व विज्ञानाच्या कसोटीवर घासून घेतलेले, मनाला पटतील तेच विचार अनुसरले तर एकविसाव्या शतकाची रम्य, निरभ्र पहाट उगवू शकेल अन् मानवतेने पांघरलेला हा अंधश्रद्धांचा बुरखा आपोआप गळून पडेल !

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

अंधश्रद्धा मराठी निबंध | andhashraddha marathi nibandh

pradushan ek samasya in marathi essay | प्रदूषण एक समस्या मराठी निबंध

निबंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण प्रदूषण एक समस्या मराठी निबंध बघणार आहोत.  या लेखामध्ये ऐकून 4 निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. आज जगातील सर्वात गंभीर समस्‍या असेल तर ती वाढते प्रदूषण आहे . आज भारत असो की इतर कोणताही देश त्‍या देशातील हवा, पाणी, माती,ध्‍वनी यांचे प्रदूषण दिवसेदिवस वाढतच आहे. या 3 निबंधात प्रदूषणाची कारणे व उपाय यावर सविस्‍तर माहीती दिलेली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला
 

२१ व्या शतकाकडे वाटचाल करत असलेल्या मानवाच्या प्रगतीचा वारू आज बेलगाम चौखूर उधळला आहे, ज्याची वेसण आज अडकली आहे- भ्रष्टाचाराच्या भस्मासुरामध्ये, लोकसंख्येच्या लकव्यामध्ये आणि प्रदूषणरूपी प्रलयामध्ये! जेव्हा भौतिक, रासायनिक आणि जीवशास्त्रीय बदल वातावरणात घडून येतात, जे मनुष्याच्या अस्तित्वालाच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने ग्रहण लावतात, त्यालाच ‘प्रदूषण' असे म्हणतात. 

आज प्रदूषण कोठे नाही? हवा, पाणी, अन्न, जमीन, तापमान, आवाज या साऱ्यांनाच या प्रदूषणाने ग्रहण लावलंय! औद्योगिक क्रांतीपूर्वीच प्रदूषणाचा जन्म झाला. परंतु निसर्गाच्या कुंपणाने माणसाच्या जीवनाला धडका मारणारा हा उन्मत्त बैल थोपवून धरला होता. वातावरणात मिसळणारे वाहनांचे धूर व Lead Poisoning सारखं माणसानंच निर्माण केलेलं प्रदुषणाचं रूप, आज जग गिळंकृत करू पाहणाऱ्या वामनात कधी रूपांतरित झालं हे भौतिक सुखाच्या मृगजळामागे धावणाऱ्या मनुष्यप्राण्याला कधी कळलंच नाही. 

pradushan-ek-samasya-in-marathi-essay
pradushan-ek-samasya-in-marathi-essay


परंतु चेर्नेबिल अणुभट्टीच्या स्फोटासारखं प्रदूषण निसर्ग कसा थांबवणार? अशा स्फोटांमुळे तापमानात बदल होऊन त्यामुळे ऋतुचक्राची चाकेच खिळखिळी होऊ लागली आहेत. भोपाळच्या वायु दुर्घटनेची भीषणता आज कुणी विसरू शकेल? डॉ. दत्ता सामंतांच्या शरीरालाच संप पुकारावा लागला, तो मुंबईमध्ये झालेल्या क्लोरीन गळतीमुळे ! -Touch of Midas' गोष्टीतल्या मिडास राजासारखीच आज मानवाची अवस्था होऊ लागली आहे!


Soclean Society च्या अहवालानुसारं ३ हजार टन इतका गोबरगॅस एकट्या मुंबईमध्ये दर दिवशी गोळा होतो. सतराशे टन इतकी प्रदूषिते रोज हवेत सोडली जातात अन् २० लाख लिटरपेक्षा जास्त सांडपाणी जमा होते. प्रदूषण दूर करण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रणा २४ तास वापरणेही आज माणसाला शक्य नाही.
लाऊडस्पीकरवर वाजवली जाणारी कर्णकर्कश्श गाणी, सिनेमागीते, डिस्को, वाढलेली रहदारी, वाहनांचे कर्णकटू आवाज या साऱ्यांनी ध्वनिप्रदूषण निर्माण केले आहे. २० ते ७० डेसिबल इतका आवाज ऐकू शकण्याची व सहन करण्याची क्षमता असणाऱ्या माणसाच्या कानांनी धोक्याची घंटा वाजवण्यास सुरुवात केली आहे. 



१०० च्या पेक्षा जास्त डेसिबलचा आवाज ऐकून विघ्नहर्त्याने गणेशोत्सवात कुणाकडे दाद मागावी? याहीपेक्षा भयानक आहे ते म्हणजे 'मानसिक प्रदूषण' वाढती गुन्हेगारी, बालिका-हत्या, भ्रष्टाचार, वशिलेबाजी, युवा पिढीची उदासीनता, जुन्या पिढीची निष्क्रियता, व्यसनाधीनता, अति सुखासीनता यामुळे मानवी मनच कलुषित झालं आहे, प्रदूषित झालं आहे. ही समस्या हा प्रत्येक राष्ट्राचा ज्वलंत प्रश्न आहे. ही एक राष्ट्रीय समस्या आहे. मग यावर उपाय तो कोणता? 'स्वच्छ पर्यावरण', चांगल्या विचारांचं मन हे कुठल्याही उदबत्तीच्या सुवासापेक्षाही सुवासिक आहे.  



१९७४ मधील Water Act व १९८१ मधील 'Clean air act' ची अंमलबजावणी होणं आवश्यक आहे. कलम २७७, २७८, ८४ च्या नुसार गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून जसा साजरा केला जातो तसा प्रत्येक दिवस पर्यावरण दिन म्हणून मानला पाहिजे, पाळला पाहिजे. जमीन प्रदूषित करणारी रासायनिक खते व औषधी फवारे यांच्या अमर्याद वापरावर बंधन आणले पाहिजे. 'झाडे लावा, झाडे जगवा' ही मोहीम राबविणारे अण्णा हजारे घराघरातून निर्माण झाले पाहिजेत.



वाया गेलेल्यांतून नवीन गोष्टींचा जन्म झाला मळीपासून स्पिरीट,  शेणापासून गोबरगॅस, पेट्रोलियमपासून घरगुती गॅस निर्माण झाला तर ताजमहाल पुन्हा धवल बनेल, गंगा ' मैली' राहणार नाही! मनाची नि तनाची शुचिता व शुद्धता नष्ट करू पाहणाऱ्या या प्रदूषणरूपी प्रलयांतून मनुष्याच्या आशा-आकाक्षाचा मनू तरून जाणे सहज शक्य आहे फक्त गरज आहे ती कल्पकतेची, नियोजनाच्या होडीची!
मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 2

प्रदूषणाची समस्या मराठी निबंध

 मानवासहित सर्व सजीव प्राणी वनस्पतींना जगण्यासाठी संतुलित वातावरणाची आवश्यकता असते. संतुलित वातावरणात सर्व घटक एका निश्चित प्रमाणात असतात. परंतु जेव्हा वातावरणात या घटकांची उणीव निर्माण होते किंवा त्यात हानिकारक घटक मिसळतात तेव्हा वातावरण प्रदूषित होते व मानवासाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नुकसानकारक ठरते. 



आज संपूर्ण जग प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रदूषणाने घर केले आहे आणि आपण पूर्णपणे त्याच्या मुठीत गेलो आहोत. प्राचीन काळात ही समस्या इतकी बिकट नव्हती. त्यावेळी प्रदूषणाचे नामोनिशाण नव्हते. निसर्गात एक प्रकारचे संतुलन होते. हवा, पाणी शुद्ध होते. पृथ्वीची उत्पादन शक्ती जास्त होती. हळूहळू लोकसंख्या वाढली. मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नित्य नवे कारखाने उघडू लागले. 



औद्योगिकीरणाच्या स्पर्धेत प्रत्येक राष्ट्र धावू लागले. ऐषआरामाच्या उपभोग्य वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी भूगर्भातील बहुमूल्य संपत्ती खेचून बाहेर काढली जाऊ लागली. नैसर्गिक संपत्ती नष्ट होताच भूगर्भातील कोळसा, खनिजतेल, धातू यांचे वायुरूपात परिवर्तन होऊन संपूर्ण वातावरणाला व्यापून टाकेल आणि मग मानवाला जगणे मुश्किल होईल.



लोकसंख्येच्या वाढीमुळे निवासस्थानांचे संकट उत्पन्न झाले आहे. परिणामी लहान लहान भूखंडांवर लहान लहान घरे उभारली जात आहेत. दहा दहा मजली उंच इमारती तयार होत आहेत. या घरांमधे सूर्यप्रकाश व शुद्ध हवेचा अभाव असतो. जंगल कटाई करून राहण्यासाठी जागा उपलब्ध केली जात आहे. मानव स्वत:च या प्रदूषणाला कारणीभूत आहे. 



समुद्राला अमर्याद शक्तीचा स्वामी समजून सर्व कचरा समुद्रात टाकला जात आहे. नद्यापण आपले प्रदूषित पाणी समुद्रात मिसळतात. शास्त्रज्ञांनी सावधगिरीचा इशारा देऊनही औद्योगिक घटकांद्वारे केरकचरा समुद्रात टाकणे बंद न झाले तर लवकरच त्यातील मासे मरतील. सध्या हजारो जहाजे व पेट्रोलियम टॅकर्सची समुद्रातून वाहतूक होते. 


एकीकडे हे मानवाला प्रगतीकडे घेऊन जातात. तर दुसरीकडे लाखो टन पेट्रोलियमच्या गळतीमुळे किंवा अपघातामुळे समुद्राच्या पाण्यावर ते पसरते. समुद्राच्या पर्यावरणासाठी हा मोठा धोका आहे. या तेलात अनेक किमती धातू उदा. शिसे, निकेल, मँगेनीज इत्यादी असते. जे जीवजंतू किंवा वनस्पतीद्वारे मानवाच्या शरीरात प्रवेश करून त्याचे नुकसान करते. नद्यांच्या पाण्याचे प्रदूषण झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे बिकट संकट विक्राळ रूप धारण करीत आहे.



ध्वनिप्रदूषणामुळे मानवाची श्रवणशक्ती क्षीण होते. त्यामुळे चिडचिडेपणा, थकवा, निद्रानाश, श्वासाचे रोग उत्पन्न होतात. शहरांची लोकसंख्या दिवसेदिवस वाढतच जात आहे. ग्रामीण जनतेचे शहरांकडे होणारे पलायन. शहरी जीवन कष्टमय बनवीत आहे. जो जो लोकसंख्येची घनता वाढते तो तो वाहुकीच्या साधनांत वाढ होते. इंधनावर चालणाऱ्या या वाहनांमधून निघणाऱ्या विषारी वायूमुळे वायुप्रदूषण होते. ज्यामुळे श्वासाचे अनेक रोग उद्भवतात उदा. फुप्फुसाचा कॅन्सर, दमा, खोकला, सर्दी इत्यादी वायुप्रदूषण मंदगतीने विषाचेच कार्य करते. 


परंतु भोपाळ वायू दुर्घटनेत निघालेला "मिथाईल आइसोसायनाईड" मुळे हजारो लोक तात्काळ मृत्यू पावले. जे लोक मेले ते मुक्त झाले पण जे वाचले ते कणाकणाने मरण्यासाठी आणि विकसनशील राष्ट्रांतील विज्ञानाचा शाप सहन करण्यास विवश झाले. औद्योगिकीकरणाच्या वाढत्या प्रवृत्तिमुळे कारखान्यांतून निघणारे विषारी वायू हवा विषमय करतात. कारखान्याजवळ लावलेल्या झाडांवर काजळीची पुटे चढ़तात. मग तेथेच वास्तव्य करणाऱ्या लोकांबद्दल काय? अल्ट्राव्हायोलेट (अतिनील) किरणांपासून पृथ्वीला वाचविणाऱ्या ओझोनलाही छिद्र पडले आहे.



निसर्गाशी मानवाचा अयोग्य व्यवहार या समस्येला आणखीनच गंभीर करतो. जंगल कटाई करणे, उद्याने उजाडणे आणि वातावरण शुद्ध ठेवणाऱ्या झाडांना नष्ट करणे हा मानवाचा स्वभावच बनला आहे. जर आता वृक्षारोपण मोहीम वेगाने चालविली नाही तर प्रदूषण हा एक असाध्य रोग बनेल. आज शेतीव्यवसायाचे यांत्रिकीकरण झाले आहे. त्यामुळेही पर्यावरणाचे प्रदूषण होते. 


अधिक उत्पादनासाठी शेतात लाखो टन रासायनिक खते टाकली जातात कीटकनाशके फवारली जातात. वाढत्या शेतीउत्पादनासाठी मानवाला खूप मोठी किंमत चुकवावी लागते. हीच रसायने हळूहळू अन्नाद्वारे आपल्या पोटात जातात व अनेक रोगांचे कारण बनतात. । आजकाल ग्राहकांना आकर्जून घेण्यासाठी फळे, धान्ये इत्यादींना  कृत्रिम रंग दिले जातात. हे रंग आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात.



संपूर्ण पृथ्वी प्रदूषित करून मानवाला चैन पडले नाही म्हणून त्याने खाद्य पदार्थही दूषित करण्यास सुखात केली. तापमानाचे प्रदूषण होणे पण मानवासाठी घातक आहे. वातावरणाचे तापमान वाढले की हिमखंड वितळू लागतात. जर बर्फाचे पर्वत वितळू लागले तर संपूर्ण पृथ्वी जलमय होईल. 




ही समस्या सोडविण्यासाठी अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञ विचार करीत आहेत. अनेक प्रत्यत्नानंतर थोडेसे यश मिळाले आहे. दाट लोकसंख्येपासून कारखाने दूर नेले जावेत. विषारी वायू जाण्यासाठी उंच चिमण्या बसविण्यात याव्यात. विषारी वायू बाहेर निघण्यापूर्वीच नष्ट करण्यात यावेत. 




केरकचऱ्याचा उपयोग जमिनीच्या भरावासाठी करण्यात यावा, पिकांवर जास्त प्रमाणात कीटकनाशके फवारू नयेत, नैसर्गिक रूपात धान्य ग्राहकाला मिळावे, गावांतून शहरांकडे जाणाऱ्या बुद्धिजीवींचे पलायन थांबविण्यासाठी गावातच रोजगार उत्पन्न करुन द्यावा. वृक्षतोड बंद करून वृक्षारोपण मोहीम राबवावी. कारखान्यांतील सांडपाण्याचे शुद्धीकरण करावे. वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करावे. बायोडिग्रेडेबल गॅसचा वापर करावा.



जगात सर्वात जास्त चर्चा प्रदूषणाची होते. शास्त्रज्ञ प्रदूषण थांबविण्यासाठी नवनवे तंत्रज्ञान विकसित करीत आहेत. प्रत्येकाने या कामात मदत केली पाहिजे. जर असे केले नाही तर स्वर्गापेक्षाही प्रिय असणाऱ्या पृथ्वीची स्थिती कशी होईल ते आपण जाणतोच.

हा  निबंध तुमच्या मित्रमंडळी सोबत व  व्हाट्सअँप ग्रुपवर  शेयर करून लोकसंख्या जनजागृती निर्माण करण्यासाठी हातभार लावावा  हि नम्र  विनंती.  पुढील  निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 3


प्रदूषण एक समस्या:  भौतिक सुखाच्या मागे पळताना प्रदूषण आपला पाठलाग करीत आहे . याकडे आपले लक्ष नसते. आजच्या विज्ञानयुगात प्रगतीचे बोट धरून प्रदूषणाने थैमान घातले आहे. कधी काळी कारखाने , वीज केंद्रे यांपासून माणूस खूप दूर होता . मुक्त निसर्गात मोकळेपणे तो श्वास घेत होता. आता मात्र त्याचा श्वास घुसमटतो आहे. हवेतले ऑक्सीजन कमी झाले आहे कारण प्रदूषित हवा आपल्याला मिळत आहे. 


कारखान्याचे धूर, रसायनांचा गंध , दूषित पाण्याची विल्हेवाट , प्लास्टिक, खते यांचा अतिरेक , जंगलतोड, वाहनांची वाढती संख्या या सर्वांनी मिळून वायूप्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनिप्रदूषण याबरोबरच मानसिक प्रदूषणाची देणगी आपणास दिली आहे. आपले आरोग्य धोक्यात आणले आहे.



५ जून जागतिक पर्यावरणदिन' आणि '२२ एप्रिल-वसुंधरा दिन' म्हणून आपण साजरे करतो. पण खऱ्या अर्थाने प्रत्येकाने प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न करायला हवा. हवा, अन्न, पाणी दूषित मिळाले तर आरोग्य चांगले कसे राहील? ज्या गोष्टी आपल्या हातात आहे त्या तर आपण करू शकतो ना? वृक्ष लावा-वृक्ष जगवा' हे तत्व आपण स्वीकारावे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा. कचरा इतरत्र न फेकता कचराकुंडीतच टाकावा. धूर होईल असे इंधन लाकडे वगैरे वापरू नये. 



घर व घराचा परिसरच नव्हे तर आपले गाव , आपला देश स्वच्छ सुंदर कसा राहील, यासाठी आपले प्रयत्न हवेत . So Clean Society चा अहवाल सांगतो. की फक्त एकट्या मुंबईत १७०० टन प्रदूषिते हवेत सोडली जातात. वीस लाख लिटरपेक्षा जास्त सांडपाणी जमा होते. तीन हजार टन गोबरगॅस गोळा होतो. चर्नेबील अणुभट्टीतला स्फोट, भोपाळची वायू दुर्घटना, कर्नाटकमधील दोनशे हत्तींची हत्या व चंदनतस्करी अशा घटना म्हणजे. स्वच्छ पर्यावरणावर गदा होय.


पृथ्वीदिन साजरा होतो. त्याच दिवशी कोलकत्ता येथे प्रचंड प्रमाणावर वृक्षतोड झाली. मध्य प्रदेशातील अभयारण्यात आगी लावण्यात आल्या निसर्ग व मानव यांच्यातले हे युध्द प्रदूषणाने झाकळून आपला विनाश करीत आहे. मास्कोच्या हवेत दरवर्षी दहा लाख टन प्रदूषिते सोडली जातात. 



दामोदर नदीत चुकीने लाखो टन तेल ओतले गेले हे सर्व काही का होते? बॉम्बस्फोट होतात. तापमानात बदल होतो. ऋतूचक्र उलटे फिरू लागते. एकूण भूपृष्ठाच्या ४०% जंगले हवीत पण भारतात हे प्रमाण ७ ते ८ % आहे. वाढती लोकसंख्या, वाढती वाहने, वाढती कारखानदारी, अपघात , कुजणारी शरीरे , खेड्यातील गटारे, शहरातील वाढती गर्दी या साऱ्या गोष्टींमुळे प्रदूषण वाढत चालले आहे.



'हरितश्यामल व निर्मल वसुधा' हवी असेल तर प्रदूषणाचे गंभीर धोके लक्षात घेऊन उपाययोजना झालीच पाहिजे. १९७४ मधील Water Act व १९८१ मधील Clean Air Act ची अंमलबजावणी झालीच पाहिजे . हवेत कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे. ओझोन वायू कमी होत आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी ओझोन आवश्यक आहे. प्रदूषण कमी झालेच पाहिजे. उत्सवात होणारे ध्वनिप्रदूषण आपण टाळले पाहिजे. 


जमीन प्रदूषित करणारी रासायनिक खते, औषधे यांचा अतिरेक नको. प्रत्येकाने एक तरी वृक्ष लावून जोपासले पाहिजे . तसेच माणुसकी जागी ठेवून मानसिक प्रदूषण होऊ न देण्यासाठी जागरूक राहिले पाहिजे तरच या पृथ्वीवर आपण सुखाने नांदू शकू.



नियोजनाला कृतीची जोड हवी प्रत्यक्ष कृतीने समस्या सुटते केवळ मनोरथांनी नाही. ही समस्या वैयक्तीक नाही. ती सर्वांची आहे. सर्वांनी मिळून ती सोडवायला हवी. वाढत्या प्रदूषणाने निसर्गाचा समतोल अधिक ढासळला तर भारतासारख्या कृषिप्रधान देशाचे भवितव्य काय? प्रगती व विकास स्वच्छ पर्यावरणानेच शक्य आहे. अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी ते आवश्यक आहे.



परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा परिस्थिती बदलणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी खूप प्रयत्न हवेत . प्रदूषणाची गगनचुंबी भिंत पाडून निसर्ग व विज्ञान यांच्या मिलनाने पृथ्वीवर स्वर्ग आणू या .....
प्रदूषण हटवू या.... प्रदूषण पळवू या....

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

निबंध 4

प्रदूषणाची समस्या मराठी निबंध


मानवासहित सर्व सजीव प्राणी वनस्पतींना जगण्यासाठी संतुलित वातावरणाची आवश्यकता असते. संतुलित वातावरणात सर्व घटक एका निश्चित प्रमाणात असतात. परंतु जेव्हा वातावरणात या घटकांची उणीव निर्माण होते किंवा त्यात हानिकारक घटक मिसळतात 


तेव्हा वातावरण प्रदूषित होते व मानवासाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नुकसानकारक ठरते. आज संपूर्ण जग प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रदूषणाने घर केले आहे आणि आपण पूर्णपणे त्याच्या मुठीत गेलो आहोत. 



प्राचीन काळात ही समस्या इतकी बिकट नव्हती. त्यावेळी प्रदूषणाचे नामोनिशाण नव्हते. निसर्गात एक प्रकारचे संतुलन होते. हवा, पाणी शुद्ध होते. पृथ्वीची उत्पादन शक्ती जास्त होती. हळूहळू लोकसंख्या वाढली. मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नित्य नवे कारखाने उघडू लागले. 


औद्योगिकीरणाच्या स्पर्धेत प्रत्येक राष्ट्र धावू लागले. ऐषआरामाच्या उपभोग्य वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी भूगर्भातील बहुमूल्य संपत्ती खेचून बाहेर काढली जाऊ लागली. नैसर्गिक संपत्ती नष्ट होताच भूगर्भातील कोळसा, खनिजतेल, धातू यांचे वायुरूपात परिवर्तन होऊन संपूर्ण वातावरणाला व्यापून टाकेल आणि मग मानवाला जगणे मुश्किल होईल.


लोकसंख्येच्या वाढीमुळे निवासस्थानांचे
संकट उत्पन्न झाले आहे. परिणामी लहान लहान भूखंडांवर लहान लहान घरे उभारली जात आहेत. दहा दहा मजली उंच इमारती तयार होत आहेत. या घरांमधे सूर्यप्रकाश व शुद्ध हवेचा अभाव असतो. 


जंगल कटाई करून राहण्यासाठी जागा उपलब्ध केली जात आहे. मानव स्वत:च या प्रदूषणाला कारणीभूत आहे. समुद्राला अमर्याद शक्तीचा स्वामी समजून सर्व कचरा समुद्रात टाकला जात आहे. नद्यापण आपले प्रदूषित पाणी समुद्रात मिसळतात. 



शास्त्रज्ञांनी सावधगिरीचा इशारा देऊनही औद्योगिक घटकांद्वारे केरकचरा समुद्रात टाकणे बंद न झाले तर लवकरच त्यातील मासे मरतील. सध्या हजारो जहाजे व पेट्रोलियम टॅकर्सची समुद्रातून वाहतूक होते. एकीकडे हे मानवाला प्रगतीकडे घेऊन जातात. 


तर दुसरीकडे लाखो टन पेट्रोलियमच्या गळतीमुळे किंवा अपघातामुळे समुद्राच्या पाण्यावर ते पसरते. समुद्राच्या पर्यावरणासाठी हा मोठा धोका आहे. या तेलात अनेक किमती धातू उदा. शिसे, निकेल, मँगेनीज इत्यादी असते. जे जीवजंतू किंवा वनस्पतीद्वारे मानवाच्या शरीरात प्रवेश करून त्याचे नुकसान करते. 



नद्यांच्या पाण्याचे प्रदूषण झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे बिकट संकट विक्राळ रूप धारण करीत आहे. ध्वनिप्रदूषणामुळे मानवाची श्रवणशक्ती क्षीण होते. त्यामुळे चिडचिडेपणा, थकवा, निद्रानाश, श्वासाचे रोग उत्पन्न होतात. शहरांची लोकसंख्या दिवसेदिवस वाढतच जात आहे. 


ग्रामीण जनतेचे शहरांकडे होणारे पलायन. शहरी जीवन कष्टमय बनवीत आहे. जो जो लोकसंख्येची घनता वाढते तो तो वाहुकीच्या साधनांत वाढ होते. इंधनावर चालणाऱ्या या वाहनांमधून निघणाऱ्या विषारी वायूमुळे वायुप्रदूषण होते. ज्यामुळे श्वासाचे अनेक रोग उद्भवतात उदा. फुप्फुसाचा कॅन्सर, दमा, खोकला, सर्दी इत्यादी वायुप्रदूषण मंदगतीने विषाचेच कार्य करते. 


परंतु भोपाळ वायू दुर्घटनेत निघालेला "मिथाईल आइसो सायनाईड" मुळे हजारो लोक तात्काळ मृत्यू पावले. जे लोक मेले ते मुक्त झाले पण जे वाचले ते कणाकणाने मरण्यासाठी आणि विकसनशील राष्ट्रांतील विज्ञानाचा शाप सहन करण्यास विवश झाले.


औद्योगिकीकरणाच्या वाढत्या प्रवृत्तिमुळे कारखान्यांतून निघणारे विषारी वायू हवा विषमय करतात. कारखान्याजवळ लावलेल्या झाडांवर काजळीची पुटे चढ़तात. मग तेथेच वास्तव्य करणाऱ्या लोकांबद्दल काय? अल्ट्राव्हायोलेट (अतिनील) किरणांपासून पृथ्वीला वाचविणाऱ्या ओझोनलाही छिद्र पडले आहे.


निसर्गाशी मानवाचा अयोग्य व्यवहार या समस्येला आणखीनच गंभीर करतो. जंगल कटाई करणे, उद्याने उजाडणे आणि वातावरण शुद्ध ठेवणाऱ्या झाडांना नष्ट करणे हा मानवाचा स्वभावच बनला आहे. जर आता वृक्षारोपण मोहीम वेगाने चालविली नाही तर प्रदूषण हा एक असाध्य रोग बनेल. आज शेतीव्यवसायाचे यांत्रिकीकरण झाले आहे.



त्यामुळेही पर्यावरणाचे प्रदूषण होते. अधिक उत्पादनासाठी शेतात लाखो टन रासायनिक खते टाकली जातात व कीटकनाशके फवारली जातात. वाढत्या शेतीउत्पादनासाठी मानवाला खूप मोठी किंमत चुकवावी लागते. हीच रसायने हळूहळू अन्नाद्वारे आपल्या पोटात जातात व अनेक रोगांचे कारण बनतात. 


आजकाल ग्राहकांना आकषून घेण्यासाठी फळे, धान्ये इत्यादींना ला कृत्रिम रंग दिले जातात. हे रंग आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. संपूर्ण पृथ्वी प्रदूषित करून मानवाला चैन पडले नाही म्हणून त्याने खाद्य पदार्थही दूषित करण्यास सुखात केली. तापमानाचे प्रदूषण होणे पण मानवासाठी घातक आहे. 



वातावरणाचे तापमान वाढले की हिमखंड वितळू लागतात. जर बर्फाचे पर्वत वितळू लागले तर संपूर्ण पृथ्वी जलमय होईल, ही समस्या सोडविण्यासाठी अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञ विचार करीत आहेत. अनेक प्रत्यत्नानंतर थोडेसे यश मिळाले आहे. दाट लोकसंख्येपासून कारखाने दूर नेले जावेत. 


विषारी वायू जाण्यासाठी उंच चिमण्या बसविण्यात याव्यात. विषारी वायू बाहेर निघण्यापूर्वीच नष्ट करण्यात यावेत. केरकचऱ्याचा उपयोग जमिनीच्या भरावासाठी करण्यात यावा, पिकांवर जास्त प्रमाणात कीटकनाशके फवारू नयेत, नैसर्गिक रूपात धान्य ग्राहकाला मिळावे, गावांतून शहरांकडे जाणाऱ्या बुद्धिजीवींचे पलायन थांबविण्यासाठी गावातच रोजगार उत्पन्न करुन द्यावा. 



वृक्षतोड बंद करून वृक्षारोपण मोहीम राबवावी. कारखान्यांतील सांडपाण्याचे शुद्धीकरण करावे. वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करावे. बायोडिग्रेडेबल गॅसचा वापर करावा. जगात सर्वात जास्त चर्चा प्रदूषणाची होते. शास्त्रज्ञ प्रदूषण थांबविण्यासाठी नवनवे तंत्रज्ञान विकसित करीत आहेत. 


प्रत्येकाने या कामात मदत केली पाहिजे. जर असे केले नाही तर स्वर्गापेक्षाही प्रिय असणाऱ्या पृथ्वीची स्थिती कशी होईल ते आपण जाणतोच. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . 


pradushan ek samasya in marathi essay | प्रदूषण एक समस्या मराठी निबंध

maza avadta samaj sudharak essay in marathi | माझा आवडता समाजसुधारक मराठी निबंध 



समाजाच्या दु:खांशी नातं सांगणाऱ्यांना, शतकांची कुंपणं अडवत नाहीत. ते शब्द कुरवाळीत नाहीत अन् खाजगी व्यथाही गोंजारत नाहीत! सभोवतीच्या दुःखांना आव्हान देत येतात. या समाजातल्या दु:खभरल्या रात्री अन् अंधारलेली मने उजळून लख्ख करतात. अशी ही परमेश्वराप्रमाणे पूजनीय व्यक्तिमत्त्व म्हणजेच आपले समाजसुधारक होत. असाच एक वंदनीय समाजसुधारक मराठी मातीत जन्मलेला आहे, जो आज महाराष्ट्राचंच नव्हे तर जगाचं भूषण ठरला आहे आणि तो म्हणजे बाबा आमटे! मुरलीधर देवीदास आमटे हे त्यांचं खरं नाव. 

maza-avadta-samaj-sudharak-essay-in-marathi
maza-avadta-samaj-sudharak-essay-in-marathi


२६ डिसेंबर १९१४ रोजी हिंगणघाट येथे एका कर्मठ जमीनदाराच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. १९४९ मध्ये ‘स्कूल ऑफ ट्रॉपिकल डिसीझेस्' इथे त्यांनी महारोग्यांवरील अभ्यासक्रम पूर्ण केला. १९५० मध्ये त्यांनी 'महारोगी सेवा समिती' स्थापन केली. बाबांना ज्या क्षणी 'क्षितीज नसलेले पंख' लाभले असल्याची जाणीव झाली, त्याच क्षणी नियतीने त्यांच्या पुढ्यात परीक्षेतल्या प्रश्नपत्रिकेसारखा, तो गटारात रूतलेला महारोगी आणून टाकला, त्याचक्षणी महारोग्याच्या शरीराच्या जखमा आधुनिक उपचारांनी बऱ्या करणे सोपे असले तरी त्याच्या मनाला झालेल्या जखमा पूर्णपणे भरून यायला त्याचा पुरुषार्थ जागृत केला पाहिजे, हे बाबासाहेबांनी अचूक ओळखले. हे काम करताना आलेल्या अनुभवांतून आणि झालेल्या चिंतनातून चंद्रपूर जिल्ह्यातील 'आनंदवना'चा जन्म झाला.

 उद्ध्वस्त मानवातून पराक्रमी व्यक्तित्व निर्माण करण्याचा हा त्यांचा प्रयत्न पाहून परदेशातील जाणती मंडळी त्यांना मोठ्या आपुलकीने मदत करीत आहेत. आनंदवनासाठी सर्वप्रथम परदेशातून आलेली मदत नॉर्मा शिअर या अभिनेत्रीकडून होती! गांधीजींनी त्यांना अभय साधक' ही पदवी दिली. फक्त आनंदवनापाशीच ते थांबले नाहीत, तो त्यांचा मार्गावरचा एक टप्पा आहे. आज खलिस्तनवादी लोक 'भारत तोडो' म्हणत असतानाच त्यांनी देशाची एकता, अखंडता अबाधित राखण्यासाठी 'भारत जोडो' ही पदयात्रा काढली. समाजसुधारणेचा त्यांचा आणखी एक सुंदर प्रयत्न म्हणजे 'ज्वाला आणि फुले', 'करुणेचा कलाम' ह्या त्यांच्या कविता! त्यांच्या एकांतसाधनेचं ते फलित आहे. 



आजच्या युवापिढीला मारलेली ती अमूर्त हाक आहे. आळस, दैववाद, असामाजिकता, अल्पसंतुष्टता व संवेदनहीनता यांनी ग्रासलेल्या मनांना उद्देशून सोमनाथच्या आंतरभारती श्रमसंस्कार छावणीत बाबा म्हणाले, 'मन का कुष्ठ शरीर के कुष्ठसे अधिक भयंकर होता है।' हे जग व जीवन, फुलवण्याकरिता, उपभोग घेण्याकरिता आपल्याला दिले आहे, निसर्ग अनंत हस्तांनी आपणाला देऊ शकतो, पण त्याला संतुष्ट करण्याचे आव्हान भारतीयाने स्वीकारले पाहिजे, असा बाबांचा आग्रह आहे. यश यावे आणि या माझ्या आवडत्या समाजसुधारकाचे स्वप्न साकार व्हावे हीच माझ्यासारख्या त्यांच्या चाहतीची इच्छा ! म्हणून मला बाबांविषयी म्हणावंसं वाटतं 'जे का रंजले गांजले त्यांसि म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावा देव तेथेचि

 निबंध  2

तुकाराम महाराज म्हणतात,
जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले
तोची साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा' 
देवाची अशी सुंदर परिभाषा तुकाराम महाराजांनी केली. खरे म्हणजे देव ह्या पेक्षा वेगळा असूच शकत नाही. देव हा माणसात आहे मूर्तीत नाही हे तुकाराम महाराज सांगतात. तुकाराम महाराजांच्या या अभंगानुसार मला अशा प्रकारचे गुण असलेला महापुरुष आढळून आला ते म्हणजे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
बी.ए.,बी.एससी.,डीएससी.,एम.ए.,पी.एच.डी. अशा अनेक पदव्या प्राप्त करुन ते उच्चविद्याविभुषीत झाले.


भरपुर संपत्ती कमावून आपल्या कुटूंबाचा फायदा करु शकले असते.परंतु समाजसेवेचे व्रत घेणा-या या महापुरुषाला संपत्ती कमविण्याचे ध्येय नव्हते.त्यांना वेड होत ते भारतीय समाजाला अंधारातुन प्रकाशाकडे नेण्याचे, अज्ञानातुन ज्ञानाकडे नेण्याचे,अधोगतीतुन प्रगतीकडे नेण्याचे. बुद्ध,कबीर व महात्मा फुले या महापुरुषांना त्यांनी आपले गुरु मानले.या तीनपैकी कुणाचाही त्यांच्याशी प्रत्यक्ष संबंध आला नाही किंवा ते समकालीन सुद्धा नव्हते परंतु त्यांचे विचार व कार्य डॉ.आंबेडकरांना अतिशय महत्वाचे वाटले.त्यामुळे वरिल तिन्ही महापुरुषांना त्यांनी आपल्या गुरुस्थानी मानले.



त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा प्रचंड आहे. प्रत्येक ग्रंथात अमूल्य विचार आहेत. २) ग्रंथ निर्मिती : शूद्रांना शतकानुशतके विद्या ग्रहण करण्यावर परंपरेने बंदी घातली होती त्यामुळे भारतीय बांधव आपला इतिहास विसरला. त्याला आपली ओळख राहिली नाही. तेंव्हा त्याला आपली ओळख व्हावी या उद्देशाने बाबासाहेबांनी त्यांच्या करिता “शुद्र पूर्वी कोण होत?' हा ग्रंथ लिहिला. 'हिंदू स्त्रियांची उन्नती व अधोगती', 'रीडल्स इन हिंदूइझम'इ. प्रत्येक भारतीयाने वाचावेत अशी ग्रंथसंपदा आहे.


बुद्ध आणि त्यांचा धम्म' हा ग्रंथ सुद्धा बाबासाहेबांनी सर्वच बहुजनासाठी लिहला. तो केवळ बौद्ध अनुयायांसाठीच लिहिला असे अजिबात नाही. हा ग्रंथ म्हणजे बुद्धाने केलेल्या क्रांतीचा इतिहास आहे. हा कुण्या एका जातीसाठी लिहिला नाही. कुण्या एका धर्मासाठी लिहिला नाही. ३) हिंदू कोड बिल : हिंदू स्त्रियांना आपले हक्क व अधिकार मिळावेत या करिता हिंदू कोड बिल तयार केले होते. परंतु त्या बिलात कोणत्या तरतुदी आहेत ह्याची पुसटशीही कल्पना नसलेल्या हिंदू स्त्रियांनी त्याचा प्रखर विरोध केला.


४) घटना निर्मिती : आज जगातील सर्वात मोठी लिखित घटना म्हणून महत्व आहे. जगातील एक महान घटनाकार म्हणून जग बाबासाहेबांना घटनेवरच आज भारतीय लोकशाही सुरु आहे.परंपरेने नाकारलेले मुलभूत अधिकार घटनेमुळे '. मिळाले.


स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि न्याय यावर अधारीत राष्ट्राच्या निर्मितीवर त्यांनी भर दिला व त्या प्रकारची कलमे संविधानात अंतर्भुत केली.शिका,संघटीत व्हा व अन्यायाविरुद्ध संघर्ष करा ही त्यांची त्रिसुत्री आहे.
म्हणूनच कवी म्हणतो, “उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे”. बहुजनांचे हित साधणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माझे कोटी कोटी प्रणाम!


 निबंध 3


माझा आवडता समाजसुधारक महात्मा ज्योतिबांं फुले



महत्‍वाचे मुद्दे : 

(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • माझा आवडता समाजसुधारक एकोणिसाव्या शतकातील महात्मा जोतीराव फुले
  • विदयेचे महत्त्व जाणणारा
  • बालपणापासून आईचा वियोग
  • वडिलांचे प्रेम मिळाले
  • समाजातील अनिष्ट प्रथांची जाणीव 
  • कार्याची आखणी 
  • पत्नीचे बहुमोल साहाय्य
  • ज्ञानदान
  • स्त्रियांसाठी शाळा
  • दलितांसाठी हौद
  • शेतकऱ्याचा असूड 
  • सत्यशोधक समाज

"विदयेविना मति गेली। 
मतीविना नीति गेली। 
नीतीविना गति गेली। 
गतीविना वित्त गेले।।
इतके अनर्थ एका अविदयेने केले."

किती मोजक्या शब्दांत जोतीरावांनी येथे विदयेचे महत्त्व सांगितले आहे ! कारण स्वतः त्यांना विदया मिळवायला खुप  कष्ट घ्यावे लागले होते. १८२७ मध्ये  त्यांचा जन्म झाला होता. बालवयातच त्यांची आई देवाघरी गेली आणि आईचे प्रेम त्यांना त्यांच्या वडलांनी, गोविंदरावांनीच दिले. शिकत असतानाच विविध अनुभवांतून जोतीरावांना भोवतालच्या समाजातील अनिष्ट प्रथा लक्षात आल्या.

 मोठ्या कष्टाने त्यांनी इंग्रजी विदया संपादन केली आणि भरपूर वाचन करून ते बहुश्रुत झाले. शिक्षणाचे महत्त्व पटलेल्या जोतीरावांनी १८४८ साली मुलींची पहिली शाळा स्थापन केली. त्यांनी प्रथम आपल्या पत्नीला-सावित्रीबाईंना शिकवले आणि त्यांच्याकडे विद्यार्थिनींच्या अध्यापनाचे काम सोपवले. सावित्रीबाईंची त्यांना जन्मभर साथ मिळाली. 


स्त्रियांच्या शिक्षणाला त्या काळात प्रखर विरोध होता. जोतीरावांना व सावित्रीबाईंना दगडगोटे, शेणमाती यांचा मारा सहन करावा लागला. पण १८४८ साली सुरू केलेले ज्ञानदानाचे कार्य त्यांनी सतत चालू ठेवले. जोतीराव फुले यांना जे वाटले, ते त्यांनी बोलून दाखवले, त्याप्रमाणे कृती केली म्हणून आचार्य अत्रे त्यांचा उल्लेख 'कर्ते सुधारक' असा करतात.



जोतीरावांच्या काळात म्हणजे सुमारे दीडशे वर्षांपूर्वी स्त्रियांची स्थिती अत्यंत दयनीय होती. विशेषतः विधवा स्त्रियांना फार वाईट वागणूक दिली जात असे. त्यांचे केशवपन केले जाई. ही अनिष्ट रूढी बंद पडावी म्हणून जोतीरावांनी न्हाव्यांचाच संप घडवून आणला. त्यांनी विधवांच्या पुनर्विवाहाची चळवळ उभी केली. तसेच, त्यांनी बालहत्याप्रतिबंधकगृहाची देखील स्थापना केली.



जोतीरावांनी दलित वर्गाचीही दुःखे हलकी करण्याचा यत्न केला. त्यांच्यासाठी आपल्या घरचा पाण्याचा हौद खुला केला. शेतकऱ्यांच्या दयनीय स्थितीचा अभ्यास करून त्यांची स्थिती सुधारावी म्हणून जोतीरावांनी शेतकऱ्याचा असूड' हे पुस्तक लिहून सरकारला अनेक उपाय सुचवले. 


१८७३ मध्ये फुले यांनी 'सत्यशोधक समाजा'ची स्थापना केली. सर्व धर्मांचे व जातींचे नागरिक या सत्यशोधक समाजाचे सदस्य व्हावेत, अशी त्यांनी योजना केली होती. आपले विचार मांडताना जोतीरावांनी 'अखंड रचले. त्यांत ते आपल्या देशबांधवांना मौलिक संदेश देतात -
जगाच्या कल्याणा। देह कष्टवावा। कारणी लावावा। सत्यासाठी।। असा हा कर्ता सुधारक माझा आवडता आणि आदर्श समाजसुधारक आहे. 

maza avadta samaj sudharak essay in marathi | माझा आवडता समाजसुधारक मराठी निबंध

my sister essay in marathi | माझी ताई मराठी निबंध

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझी ताई  मराठी निबंध बघणार आहोत. आई वडीलांनतर सांभाळ करणारे, मार्गदर्शन करणारे असतात ते भांवडे. या निबंधात आदर्श अश्‍या मोठ्या बहीणीचे वर्णन केले आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.  

तशा आम्ही आईबाबांच्या दोघी लाडक्या लेकी-मोठी ताई आणि धाकटी मी. ताई सुकृता आणि मी संपदा. ताई माझ्याहून चांगली पाच-सहा वर्षांनी मोठी आहे. घरात मी लाडोबा, पण मनात मला ताईबद्दल प्रेमयुक्त आदर वाटत असतो. कारण माझी ताई आहेच तशी नावाप्रमाणे 'सुकृता' ! |

my-sister-essay-in-marathi
my-sister-essay-in-marathi


ताई आणि मी सख्ख्या बहिणी, पण आमच्या दोघींच्या बोलण्याचालण्यात मात्र खूपच फरक आहे. ताई तशी थोडी अबोल आहे. त्याचे कारण तिला विचारले तर ती म्हणते, "मला आपणच बोलत राहण्यापेक्षा, दुसऱ्याचे बोलणे ऐकायलाच अधिक आवडते." याउलट मी खूपच बडबडी आहे. एका जागी बसून एखादे काम करण्याची चिकाटी अजूनही माझ्या अंगी नाही. ताईजवळ ही चिकाटी वाखाणण्यासारखी आहे.

ताईने शाळेतील दोन्ही शिष्यवृत्ती परीक्षांत उत्तम यश मिळवले आहे. किंबहुना 'अशक्य', 'असाध्य' हे शब्दच ताईच्या शब्दकोशात (Dictionary) नाहीत. महाविदयालयातील अभ्यासशाखेची निवड करतानाही 'ताई'ने आपल्या स्वतंत्र विचारांची चमक दाखवली. अभ्यास करत असताना छंद म्हणून तिने अनेक अन्य विदेशी भाषांचा अभ्यास चालू ठेवला आहे.

ताई ही काही केवळ पुस्तकातील किडा नाही. तिला अनेक कला अवगत आहेत. सहज गमतीने म्हणून तिने चित्र काढले, तरी ते अत्यंत रेखीव व चित्तवेधक असते. पण हीच ताई मला म्हणते, “संपदा, तुझी चित्रे खुप छान असतात हं!" अशा या प्रेमळ, गुणी, कलासंपन्न ताईचा आदर्श मी सतत माझ्यासमोर ठेवलेला आहे. माझ्या ताईच्या मार्गदर्शनामुळेच आतापर्यंत चौथी, सातवीच्या शिष्यवृत्त्या मी मिळवल्या आहेत.

ताईच्या पावलावर पाऊल ठेवून शालान्त परीक्षेतही गुणवत्ता यादीत येण्याचे माझे एक स्वप्न आहे. माझ्या ताईच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने माझे तेही स्वप्न साकार होईल, याची मला खात्री आहे.
मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

my sister essay in marathi | माझी ताई मराठी निबंध

karmaveer bhaurao patil essay in marathi | कर्मवीर भाऊराव पाटील मराठी निबंध 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण कर्मवीर भाऊराव पाटील मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधात त्‍यांनी शैक्षणीक क्षेत्रात केलेल्‍या कामगीरी सोबतच त्‍यांच्‍या बद्दल माहीती दिली आहे. चला तर मग सुरू करूया निबंधाला.  

स्वावलंबी शिक्षणाचे उद्गाते : कर्मवीर भाऊराव पाटील 'स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय आणि स्वातंत्र्य' हीच खरी शैक्षणिक तत्त्वज्ञानाची चतु:सूत्री मानणारे 'कर्मवीर भाऊराव पाटील यांना थोर शिक्षणतज्ज्ञच म्हटले पाहिजे. 'कमवा आणि शिका' असा अतिशय सोप्या भाषेत शिक्षणाचे मर्म सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारे कर्मवीर एक श्रेष्ठ समाजसुधारकही आहेत.

karmaveer-bhaurao-patil-essay-in-marathi
karmaveer-bhaurao-patil-essay-in-marathi

कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज गावी २२ सप्टेंबर १८८७ ला  जन्मलेले
हे बालक बालपणापासून हट्टी स्वभावाचे होते. वडील सरकारी नोकरीत, त्यामुळे वडिलांसोबत भाऊरावांच्या पायालाही भिंगरी लागलेली. परंतु भाऊरावांचे मामा हे पैलवान, त्याचा मित्र सत्याप्पा हा तर शूर साहसी अन् त्याबरोबर दयाळू अन् गरिबांचा वाली. तो श्रीमंताकडून मिळालेले पैसे गोरगरिबात वाटून टाकत असे. त्याच्या चातुर्याच्या, हिमतीच्या चांगुलपणाच्या गोष्टींचा प्रभाव भाऊरावांवर चांगलाच होत होता. अन्यायाविरुद्ध बंड करण्याचे बाळकडू त्यांना लहानपणीच सत्याप्याकडून मिळाले होते.

भाऊरावांचे शिक्षण बेताचेच. वसतिगृहात शिकत असताना तेथील नियम हे व्यक्तिस्वातंत्र्याच्या विरुद्ध दिसल्याबरोबर भाऊरावांनी वसतिगृह सोडले. आणि आयुष्याला एक वेगळेच वळण लागले. कुस्ती-मल्लखांब यासारख्या खेळात ते नेहमीआघाडावर असल्यामुळे त्यांना राजर्षी शाहू महाराजांच्या वाड्यात आश्रय मिळाला, शाहू महाराज्याकडून समाजसेवेचा वारसा घेतला. पुढे उद्योगाच्या निमित्ताने ते जेव्हा भारतभर फिरून आले तेव्हा त्यांचा 'शिक्षणाचा पिंड गप्प बसू देईना,' "विचार, आचार, उच्चार' यांचे उगमस्थान म्हणजे खरे शिक्षण, सत्य सामाजिक समता या सर्वांचा संगम त्यांना शिक्षणात दिसला, इतकेच नव्हे तर जनजागृती-समाजक्रांतीसाठीही शिक्षणासारखे दुसरे माध्यम नाही, अशी त्यांची खात्री झाली.

म. फुल्यांचा पाईक बनून दुधगाव येथे शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना केली. पुढे १९१९ मध्ये कराड तालुक्यातील वाले या गावी 'रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. एकूणच शिक्षणासाठी सर्व जीवन वाहून जनसामान्याच्या मुलांसाठी अतोनात कष्ट भाऊरावांनी घेतले. या त्यांच्या शैक्षणिक कार्यात त्यांची पत्नी लक्ष्मीबाईंचा हातभार फार मोठा हाता, कमवा आणि शिका' हा कर्मवीरांचा शिक्षणापाठीमागचा मूलमंत्र तर रयतेला पटवून देण्यासाठी ती स्वावलंबी शिक्षणाची कल्पना प्रत्यक्षात ते जगले. बहुजन समाजाला ज्ञानाची संजीवनी देऊन गरिबांच्या झोपडीपर्यंत ज्ञानगंगा पोहोचण्याचे व्रत त्‍यांनी आयुष्यभर पाळले.

'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।' गीतेतील या महान संदेशानुसार कर्मावर त्यांचा गाढा विश्वास होता, कोणतेही काम किंवा श्रम हे हलके नसते. काम म्हणजे ईश्वर त्याच श्रमाला प्रतिष्ठा देण्याचे कार्य, पावित्र्य देण्याचे काम, स्वावलंबनाचा आनंद लुटू देण्याचे महान श्रेय कर्मवीरांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानातून दिसून येते.
रयतेच्या शिक्षणाबरोबरच समाजपरिवर्तनही घडवून आणण्याचा वारसा कर्मवीरांनी म. फुले, शाहू महाराज विठ्ठल रामजी शिंदे, संत गाडगेमहाराज यांच्यापासून घेतला होता. 

शिक्षणाच्या गंगोत्रीतून दारिद्रय, अंधश्रद्धा, लोकभ्रम, अज्ञान अशा अनेक महासंकटातून सुटण्यासाठी अनेक समाजोद्धारक उपक्रम राबविले. एक कर्तव्यनिष्ठ शिक्षक हाच संपूर्ण समाज बदलू शकतो. लहान मुले हीच देशाचे भविष्य घडविणारे असतात. तेव्हा शिक्षणातून देशप्रेम, स्वावलंबन, अन्यायाची चीड, श्रमाची प्रतिष्ठा अशा सद्गुणांते बाळकडू जर त्यांना पाजले गेले तर निश्चित देशाचा विकास हा घडेल. शिक्षण हेच माणसाच्या पर्यायाने देशाच्या विकासाचे मूळ आहे, हीच त्यांची पक्की विचारसरणी होती.


कर्मवीरांच्या कार्याचा प्रसार, त्यांच्या कार्याची पाऊले,खुणा, त्यांच्या स्मृती आठवणी म्हणून सांगलीतील 'दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ' नावाची मोठी संस्था, साताऱ्यातील 'छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस' तर बोधचिन्ह वटवृक्षा' सह आजही दिमाखात उभे आहे. वसतिगृहातून भेदभाव नष्ट करणे, अस्पृश्यांना न्याय मिळवून देणे, सामाजिक समता प्रस्थापित करणे, सर्व जाती-धर्माचे सर्व थरातील विद्यार्थी एकत्र राहणार... त्यांचा समन्वय घडवून आणणार. या त्यांच्या असामान्य कार्याची सर्वांनी मुक्तकंठाने स्तुती केली.

या महापुरुषाचे महानिर्वाण १९५९ झाले. परंतु मित्रहो, संपूर्ण महाराष्ट्रभर अनेकानेक, प्राथमिक, पूर्व प्राथमिक, माध्यमिक, अध्यापन विद्यालये, महाविद्यालये, वसतिगृह, कार्यालये आणि इतर अनेक शिक्षण संस्था आज कर्मवीरांच्या त्या विशाल वटवृक्षाखाली गुण्यागोविंदाने नांदत आहेत, त्या अमर आहेत.
आपण सामान्यांनी या महापुरुषाचे किती सन्मान करायचे ? अनेक सामाजिक संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे. भारत सरकारने पद्मभूषण हा किताब देऊन सर्वोच्च सन्मान केला आहे.

महाराष्ट्राचा 'बुकर टी. वॉशिंग्टन' या नावाने त्यांना ओळखतात. यशवंतराव चव्हाण त्यांच्याविषयी म्हणतात, 'कर्मवीर' हीच महान संस्था, बहुजन समाजाचा ज्ञानप्रकाश, रयत शिक्षण संस्था ही शिक्षणाची गंगोत्री आहे.
मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

karmaveer bhaurao patil essay in marathi | कर्मवीर भाऊराव पाटील मराठी निबंध

 aarsa nasta tar marathi nibandh | आरसा नसता तर मराठी निबंध

निबंध 1 
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण aarsa nasta tar marathi nibandh बघणार आहोत. हा एक कल्‍पनात्‍मक निबंध आहेत त्‍यामुळे आरसा नसता तर काय झाले असते याचे वर्णन खालील 5 निबंधामध्‍ये तुम्‍हाला दिसुन येईल चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

आजच्या युगात माणसाला ज्या गोष्टी अनिवार्य वाटतात; त्यांपैकी एक म्हणजे 'आरसा.' घरातून बाहेर पडताना लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकजण आरशात डोकावल्याशिवाय राहत नाही. शहरांमधून ऑफिसात  काम करणाऱ्या तसेच कॉलेजांत शिकणाऱ्या मुलींच्या पर्सेसमध्ये 'आरसा' आढळतोच. रस्त्यावरून जाणारा कॉलेज युवक एखादया मोटारच्या आरशात डोकावून आपले केस ठाकठीक असल्याची खातरजमा करून घेतो. सांगायचा हेतू काय की, प्रत्येकाला आपली छबी वारंवार पाहण्याची हौस असते आणि त्यामुळे आरसा ही आज आवश्यक गोष्ट झाली आहे.

aarsa-nasta-tar-marathi-nibandh
aarsa-nasta-tar-marathi-nibandh


आरसा नसता तर माणसाची मोठी गैरसोय झाली असती. स्वत:चे रंगरूप माणूस जाणू शकला नसता आणि मग स्वत:चीच तोंडओळख त्याला पटली नसती. परीक्षेत आपणाला लाभलेल्या यशाचा आनंद आपल्याला आरसा दाखवतो. आपल्या आवडत्या माणसाची दीर्घकालानंतर झालेली आतुरतेची भेट आरसा खुलवतो आणि एखादया दुःखद प्रसंगी सगळ्यांच्या नजरा चुकवून आपल्या डोळ्यांनी गाळलेले अश्रू हाच आरसा टिपून घेतो. आरसा हा माणसाचा फार जवळचा मित्र आहे.

आरशाला संस्कृतमध्ये आदर्श' म्हणतात. रूप जसे असेल तसेच आरसा दाखवतो. तो कुरूपाला सुंदर बनवू शकत नाही. म्हणजे आरसा हा 'प्रामाणिकपणाचा आदर्श' आहे. म्हणून तर आपण आरशाची उपमा देऊन म्हणतो, त्याचे मन आरशासारखे नितळ आहे. आरसा नसता तर सुंदर माणसांना आपल्या सौंदर्याची अवास्तव जाणीव झाली नसती आणि त्यामुळे कुरूप माणसांना वाईट वाटले नसते. 

केशकर्तनालये, फोटो स्टुडिओ  अशा अनेक ठिकाणी आरसे मोठी कामगिरी बजावतात. आरसा नसता तर अनेक ठिकाणी सजावटीचे काम अपूर्ण राहिले असते. अनेक वैज्ञानिक प्रयोगांत आरशाला स्थान असते. आरसा नसेल तर ते प्रयोग अपूर्ण राहतील. अंतर्गोल भिंग-बहिर्गोल भिंग असलेले आरसे माणसांना हसवतात व ते मोटारींनाही उपयोगी पडतात. गावातील जत्रांत आरशांना महत्त्वाचे स्थान असते. आरसा नसेल तर ही सारी गंमत हरवून जाईल. तेव्हा असा हा बहुगुणी आरसा हवा आणि हवाच!

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

aarsa nasta tar essay in marathi language

निबंध 2
रोज आपण अशा अनेक गोष्टींचा वापर करत असतो की, त्यांचे अस्तित्वही आपण विसरलेले असतो. म्हणतात ना - अतिपरिचयात् अवज्ञा. (अति परिचयाच्या गोष्टीला किंमत न देणे ) तशी स्थिती आहे आपली आरशाच्या बाबतीत. अगदी सहजगत्या जातायेता आपण आरशात डोकावतो आणि आपण ठाकठीक आहोत ना याची खात्री करून घेतो. असा हा आरसा प्रत्येक घरात असतोच असतो. कधी तो एखादया भिंतीवर लटकत असतो, तर कधी एखादया मोठ्या कपाटाच्या दारावर, कधी एखादया सुंदरीच्या पर्समध्ये असतो, तर कधी एखादया मोठ्या दिवाणखान्याच्या दाराशी स्थानापन्न होऊन तो येणाऱ्या-जाणाऱ्याला त्याची छबी दाखवत असतो.

असा हा आरसा नसता तर - ? तर माणसाने आपली छबी कोठे पाहिली असती? एखादया मुलाखतीला जाताना, एखादया समारंभासाठी नटताना, माणूस पुनः पुन्हा आरशात डोकावतो आणि त्या आरशाला विचारतो- 'सांग दर्पणा, कसा मी दिसतो?' पण हा आरसा मात्र बेटा खरा प्रामाणिक ! उगाच नाही त्याला संस्कृतमध्ये 'आदर्श' म्हणतात. तुम्ही जसे आहात तसेच तुम्ही आरशात दिसणार. आरसा तुम्हांला सुंदरही बनवत नाही वा तुमच्या कुरूपतेतही भर घालत नाही. म्हणून तर आरशाचा आदर्श व्यक्तीपुढे ठेवला जातो. कसे बना? कसे असा? - तर आरशासारखे स्वच्छ चारित्र्य असलेले.

आरसा हा माणसाला पुराणकालापासून परिचयाचा आहे. रामायणातील रडणाऱ्या रामाला आरशात चंद्र दाखवून मंत्री सुमंताने त्याची समजूत काढली होती. इतिहासकालातही हा आरसा आपल्याला भेटतो. चितोडच्या महाराणी पद्मिनीचे सौंदर्य अल्लाउद्दीनने आरशातच पाहिले होते. मोगल साम्राज्यातील 'आरसे-महाला'चे वर्णन आपण ऐकलेले आहे. त्या काळात घर, महाल, प्रासाद यांना सजवण्यात आरशांचे स्थान महत्त्वाचे होते.

आजच्या विज्ञानयुगातही माणसाला आरशाची मदत अनेक ठिकाणी घ्यावी लागते. भौतिकशास्त्रात प्रकाशाचे नियम हे आरशाच्या साहाय्यानेच समजून घेतले जातात. अनेक वस्तू निर्माण करताना आरशांचा उपयोग होतो. मग एखादया आरशात आपण गोलमटोल होतो, नाहीतर एखादया आरशात आपण उंचचउंच झालेलो असतो. ही गंमत सोडली तरी, वाहन चालवताना-- मग गाडी असो वा बाईक - आरसा आपल्याला आपल्यामागून येणाऱ्या वाहनाची कल्पना देत असतो. हा आरसा नसेल तर चालकाचा फार गोंधळ उडेल. अभिनय करणारे कलावंत आरशात पाहून सराव करतात म्हणे... !
असा हा आरसा नसेल तर माणसाची अशी अनेक प्रकारे गैरसोय होईल. मग तो आरशाची जागा कोण घेऊ शकेल याचा शोध घेऊ लागेल.

निबंध 3  

आरसा बाजूला सारून कधी पाहिलंय का कुणी? आपल्या रोजच्या जीवनात इतकी महत्त्वाची जागा अडवून बसलाय हा की आपण तो नसता तर! यावर विचारच करीत नाही. आपण आरशात पाहतो ते आपलं रूप बघण्यासाठी. आपल्या प्रसाधनात आरसा नाही म्हणजे जणू डोळ्याविना चेहरा! लोकांनी आपल्याकडे पहावं यासाठी स्वत:ला खुलविण्यासाठी आपण आरशात पाहतो. कारण आजच्या युगात माणूस अंतरंगापेक्षा बाह्यरंगाकडे अधिक लक्ष देतो.

ह्या आरशाचा शोध तरी केव्हा लागला? जेव्हा मानव उत्क्रांतीच्या पहिल्या पायरीवर उभा होता, तेव्हा त्याच्याजवळ अन्न होते, ना वस्त्र, ना निवारा, मग प्रसाधनाची तर बातच सोडा. पण एक मात्र निश्चित की प्रतिबिंब ही गोष्ट मानवाला पहिल्यांदा पाण्यामुळे माहिती झाली असणार. म्हणजेच पाण्यामुळे काचेचा व काचेतून आरसा जन्मला असणार ! 

या आरशानं काहीवेळा प्रताप घडवून आणलेत, तर कधी मदतही केली आहे. अहो, हा नसता तर, बाल श्रीरामाचा चंद्राचा हट्ट सुमंत पुरविता नाकीनऊ आले असते. हा नसता तर महाराणी पद्मिनीच्या सौंदर्याला कुणी वाचवलं असतं ? तिने आपलं प्रतिबिंब अल्लाऊद्दिनाला दाखवून स्वत:ची सुटका करून घेतली. हा नसता तर गॅलिलिओला ग्रीसची लढाई जिंकताच आली नसती! प्रत्यक्ष दर्शन न देता प्रतिबिंबाच्या रूपाने दर्शन घडवून संतुष्ट करणारा हा आरसा खूपच उपयोगी पडला.

असा हा आरसा नसता तर कुरूप लोकांच्या दृष्टीने फायदाच झाला असता. त्यांची दु:खे तरी कमी झाली असती. परंतु स्त्रिया, तरुण मुले, मुली, चित्रतारका यांची खूपच पंचाईत झाली असती. आरसाच नाही. मग नटणार कसे ? सतत दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागले असते. दिवसातून, दर पाच मिनिटांनी सांग दर्पणा, मी कशी दिसते?' असं गुणगुणत आरशात पाहणाऱ्या ललनांची खूपच पंचाईत झाली असती. आरसा नसता तर न्हाव्याच्या हातात डोकं देऊन हजामत करायला कुणाची छाती झाली असती?

आरसा नसता तर केवळ तरूण-तरूणींचीच नव्हे तर शास्त्रज्ञांचीही पंचाईत झाली असती. अहो, आरशामुळेच प्रकाशाच्या परावर्तनाच्या नियमांचा शोध लागला. आरसाच नसता तर गुणितप्रतिमा मिळाल्या असत्या का?
असो! आरसा नसता तर घडामोडी घडल्या असत्या. पण मग यावर उपायही शोधावा लागला असता. आरसा नसता तर प्रत्येकाने आपली छबी आपल्या आवडत्या माणसाच्या डोळ्यात पाहिली असती कारण 'डोळा हा माणसाच्या  मनाचा आरसा आहे!' पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध 4 

aarsa nasta tar marathi nibandh | आरसा नसता तर मराठी निबंध


काचेचा शोध म्हणजे मानवाच्या प्रगल्भ
बुद्धिमत्तेचा एक आविष्कार ! काचेच्या शोधामुळे सुधारणेची अनेक दालने खुली झाली. मूलभूत गरजांच्या शोधयात्रेत स्वत:च्या प्रतिबिंबाचाही शोध लागला. पाण्यात डोकावताना प्रतिबिंब दिसले व काचेच्या शोधातून आरशाचा जन्म झाला.


आरसा माणसाचा जीवनसाथी! घरात त्याचे स्थान अगदी महत्त्वाच्या जागी असते. स्वत:चे प्रतिबिंब पाहिल्याशिवाय माणसाची दैनंदिनी सुरूच होत नाही; आणि हा आरसाच नसता तर... 'डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे।' म्हणजे दुसऱ्यांच्या डोळ्यांत बघून आपले प्रतिबिंब शोधावे लागले असते.


प्राचीनकाळी राजेलोकांना
आपल्या रूपवती राण्यांसाठी 'आरसेमहाल' उभारताच आले नसते. सुमंतांना बाल प्रभुरामचंद्रांचा 'चंद्र' पाहण्याचा हट्ट पुरा करताच आला नसता. आरसा नसता तर अल्लाउद्दीन खिलजीला लावण्यवती पद्मिनीचे दर्शन झालेच नसते. 


शहाजहान बादशहा लाल किल्ल्यात कैदेत असताना 'ताजमहाल'चे प्रतिबिंब आरशात पाहून समाधान मानीत असे. आपल्या निर्मितीचे दर्शन तो आरशातून घेई; आरसा नसता तर त्याचे उर्वरित आयुष्य कंटाळवाणे झाले असते.


आधुनिक काळात सुंदर-सुंदर डिझाईनची ड्रेसिंग टेबले आणि आकर्षक गोदरेजची कपाटे, निरनिराळ्या आकाराचे आरसे घेण्याचा ललनांनी हट्ट केलाच नसता. आजकाल स्त्रियांच्या पर्समध्येसुद्धा आरशाने स्थान मिळविले आहे. मग 'सांग दर्पणा कशी मी दिसते?' असे आरशाशी हितगुज करणाऱ्या तरुणींच्या ओठी हे गाणे आलेच नसते. 


अहो, रामप्रहरी स्नान वैगेरे करून 'सौभाग्यलेणे - कुंकुमतिलक लावण्याचीदेखील पंचाईत झाली असती.
भिंग बिलोरी सहा बाजूंनी बांधून आरसेमहाल असला, उभे राहूनी मध्ये पहावे,
रूप आपुले छंद मनाला॥



हा छंद कसा पुरा करता आला असता? लमाणी बायकांना आपल्या काचोळ्यांना लावण्यासाठी आरसे मिळालेच नसते. अहो, पुरुषांचे तरी आरशावाचून कुठे चालते? रोजच्या दाढीची गैरसोय तर झालीच असती; पण न्हाव्याच्या मर्जीनुसार केस कापून घ्यावे लागले असते. 


वाहनचालकाच्या बाजूला बहिर्वक्र आरसा नसता तर मागून भरघाव वेगाने येणारी वाहने चालकांना दिसलीच नसती, मग अपघातांचे प्रमाण वाढले असते. हल्ली पंचतारांकित हॉटेल्स, मोठमोठ्या शोरूम्स, दुकाने जी काही आरशांनी सजवलेली असतात, त्यांना आरसे नसते तर अवकळा आली असती.



आरसा नसता तर शास्त्रज्ञांचे थोडे का अडले असते? आरसा नसता तर गुणित प्रतिमा मिळविता आल्या नसत्या. प्रयोगशाळेत तर आरशावाचून फारच अडले असते. नवीन नवीन उपकरणे निर्माण करताच आली नसती. पाणबुड्यांना पाण्यावरील शत्रूची जहाजे दिसलीच नसती.



आरसेच नसते तर दुर्बिणीचा शोध तरी कसा लागला असता? सोलर एनर्जीवर चालणारी उपकरणे तयार करता आली नसती. अर्थात आरसा नसता तर कुरूप व्यक्तींना आपल्या कुरूपतेची जाणीव झाली नसती, हा एक फायदाच झाला असता. पण माणूस काही स्वस्थ बसणारा प्राणी नाही. 


तो अंतर्मनाच्या आरशात डोकावून पाहील. अंतर्मुख होऊन आरशाला पर्याय शोधील. तो जीवनाचा (पाण्याचा) तळ शोधेल व तेथे आपले प्रतिबिंब स्थिर करता येईल का याचा विचार करील. अंधारातून चालताना तो आपल्या बुद्धीचा किरण पाडून प्रकाशाचा शोध घेईल.  मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 5

aarsa nasta tar marathi nibandh | आरसा नसता तर मराठी निबंध

 

आरसा नसता तर रजपुतांच्या इतिहासातला प्रसंग. राणी पद्मिनीला पाहण्यासाठी अल्लाउद्दीन खिलजी वेडा झाला होता. त्याकाळी रजपूत रमणी परपुरुषापुढे येत नसे. त्यातून हा शत्रू. त्यावेळी आरसा त्याच्या मदतीला आला.
आरशात पधिनीची मोहक छबी पाहून तो परतला. 


त्यावेळी तरी आरशाने तिला कठीण प्रसंगातून निभावून नेले. दशरथाचा राजमहाल. चिमुकला राम आभाळातला चंद्र हवा असा हट्ट घेऊन बसला. सगळ्यांनी नानापरीने त्याची समजूत घातली. पण तो काही केल्या ऐकेना. 


शेवटी चतुर अशा सुमंताने आरसा आणला व त्या आरशात रामाला बंद दाखविला. इतका वेळ रडणारा तो बाळ श्रीराम खुदकन हसला. ही आरशाची किमया.. आरसा ही दैनंदिन जीवनात गरजेची वस्तू आहे. आरसा नसता तर लग्न-समारंभात आकर्षक वेषभूषा, केशभूषा करणाऱ्या वधूचे काय झाले असते? 


लग्नसमारंभात वधू ही उत्सवमूर्ती. तेव्हा तिचे प्रसाधन आरशावाचून होऊच शकले नसते. तिच्या जोडीला तिच्या मैत्रिणी, घरातील स्त्रिया आणि पुरुषसुद्धा आपला जामानिमा नीटनेटका आहे ना हे कसे पाह शकले असते?
घरात छोट्या बेबीचा किंवा बाळाचा वाढदिवस आहे. 


त्याला नवे सुंदर कपडे घातल्यावर आपण आधी आरशापुढे उभे करतो. त्यात स्वत:ची सजलेली प्रतिमा पाहून ते मूलही खूष होते. आरशाविना त्याचा हा आनंद पूर्ण झाला नसता. पूर्वी आरसा हा स्त्रिया, मुलींचाच लाडका सखा होता. आज मुलांनाही तो तितकाच प्रिय आहे.


शाळेत, घरात, स्टेशनवर, हॉटेलात, रेल्वेत सर्वत्र आरसे असतात. तसे नसते तर आरशात पाहून भांग पडणे, प्रसाधन करणे, नव्हे गाण्याच्या तालावर नाचणे कसे शक्य झाले असते ? त्यातून तारुण्यात नुकतेच पदार्पण केलेल्या युवक-युवतींचे विचारूच नका. 

घरातला आरसा त्यांना पुरत नाही. म्हणून बरेचदा खिशात, पर्समध्येसुद्धा छोटा आरसा बाळगला जातो. आरसा नसता तर त्यांच्या या आनंदात नक्कीच विरजण पडले असते. कुणी म्हणतील, पूर्वी कुठे आरसे होते? तलावाचे पाणी, नदीचे पाणी यात प्रतिबिंब पाहिले जात असे. पण सगळीकडेच कुठे तलाव,


नद्या असणार? शिवाय गढूळ
पाण्यात प्रतिबिंब कसे दिसेल? आजकाल घरात कपाट घेताना आरसा आधी पाहिला जातो. लग्नात, इतरप्रसंगी भेट देण्यासाठी आरसा वापरला जातो. 


तेव्हा आरशाचा उपयोग निर्विवाद आहे.सारांश, आरसा हा माणसांचा लाडका मित्र आहे. तो नसता तर बाळांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांचे विविध प्रकारचे आनंद त्यांना उपभोगता आले नसते. म्हणून आरसा हवाच. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.  धन्‍यवाद


aarsa nasta tar marathi nibandh | आरसा नसता तर मराठी निबंध

essay on trees our best friend in marathi | वृक्ष आपले मित्र मराठी निबंध



नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वृक्ष आपले मित्र मराठी निबंध बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. या निबंधात मानवाला जिवन जगण्‍यासाठी वृक्ष किती उपयोगी आहेत याचे महत्‍व पटवुन सांंगीतले आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

वृक्षांची महती आपल्या भारतात प्राचीन काळापासून सांगीतली  गेली आहे. तुकाराम महाराजांना तर वृक्ष हे आपले सगेसोयरे वाटतात. असे हे वृक्ष आज या आधुनिक विज्ञानयुगातही- आपले जिवलग मित्र आहेत.

विज्ञानामुळे माणसाने खूप प्रगती केली पण या विकासासाठी माणसाने अविचाराने जंगलतोड केली. आपण आपल्या या वृक्षमित्राचा घात केल्याने स्वत:वरच दुष्काळाचे, प्रदूषणाचे संकट ओढवून घेत आहोत, याचा माणसाला विसर पडलेला आहे. वृक्ष ही निसर्गाची फुप्फुसे आहेत. हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि 'प्राणवायू' हवेत सोडून हवा शुद्ध करण्याचे काम करतात. यामुळे माणसाचे जगणे सुकर व सुखी झाले आहे.

essay-on-trees-our-best-friend-in-marathi
essay-on-trees-our-best-friend-in-marathi

वृक्ष आपल्याला सहस्र हातांनी मदत करतात. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा तर ते भागवतातच; शिवाय आपल्या पूजाविधीसाठी नानाविध साहित्य देऊन आपल्याला सुखावतात. आज वनस्पतींपासून मिळालेल्या अनेक औषधींचा उपयोग करून माणसाने असाध्य आजारांवर मात केली आहे.

स्वतः जळून हे वृक्ष इतरांच्या उपयोगी पडतात. वृक्षाचा प्रत्येक अवयव माणूस, प्राणी, पक्षी यांना उपयुक्त आहे. वृक्षांजवळ भेदभाव नसतो. ते सर्वांना समान वागणूक देतात. अगदी त्याच्या अंगावर घाव घालणाऱ्या कुन्हाडीचे पातेही तो सुगंधित करतो. मानवाच्या एकाकी जीवनातही वृक्ष साथसंगत देतात. माणूस आपल्या अनेक आठवणी या वृक्षांशी जपून ठेवतो. तो त्यांच्याशी हितगूज करतो. असे हे वृक्ष मानवाचे जिवलग मित्र आहेत.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व वृक्षारोपण करण्‍यासाठी आणखी काय उपाय योजना करायला पाहीजे हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद  पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 2 

 वृक्ष आपले मित्र मराठी निबंध | essay on trees our best friend in marathi 


“आजी, घरी एकट्याच राहता?' 'एकटी का? ही झाडं आहेत की सोबतीला.' मी फाटकाजवळ आल्यावर समोरच अंगणात उगवलेली मोठी मोठी गुलाबाची फुले डोकावून बघतात व सांगतात, या आजी, आम्ही केव्हाची वाट पहातोय. बांधाच्या शेजारच्या फुललेला कुंद अंगावरच्या कळ्या सावरत होकारार्थी हसतो.



'एकटी कशी मी? अगं ती तुळस बघितलीस का? कशी छान डंवरली आहे. मंजिऱ्यांनी गच्च भरून गेली आहे. 'मला मंजिऱ्यांचा भार सहन होत नाही, थोडा कत्री करा,' असे सांगते आहे.



उजव्या हातची माझी राजसबाळी बघितलीत का? माझी राजसबाळी 'केळ' आहे हो. सध्या ओली बाळंतीण आहे. पाहिलीत तिची छोटी छोटी बाळं. आईच्या कुशीत पानांचं मोठं पांघरुण घेऊन कशी शांत झोपली आहेत ती. मी रोज माझ्या बाळीच्या अंगावरून हात फिरवते. तिला चांगलं-चुंगलं खाऊ घालते. बाळंतपणाला आलेली माझी लेक आहे ती.


पाठीमागच्या अंगणात उभा असलेला व्रात्य आंबा बघितलात का? वारा सुटल्यावर असा नाचतो. त्याची मुलंही तशीच नाचरी. लहानपणापासूनच आपल्या आईवडिलांना सोडून पटापट जमिनीवर उड्या मारतात. त्यांना आवरता आवरता नाकी नऊ येतात माझ्या, पण त्याची बाळं मोठी झाली, वयात आली की, किती गोंडस दिसतात म्हणून सांगू?


आंब्याच्या मागे सर्वांना आवडणारा शेवगा, मला तर तो गोड शेंगा देतोच. परंतु अंगाखांद्यावर मर्कटराजांनाही मनमराट खेळू देतो. पहाटे मला जाग येते ती प्राजक्ताच्या व बकुळीच्या फुलांच्या मंद सुगंधाने. सूर्य उगवल्याबरोबर ती नाजूक, कोमल अंत:करणाची प्राजक्ताची फुले मी वेचते व छाया गर्द सुरेख, गार हिरवी शोभे तुझी पालवी। 



सो सो गर्जत वाहुनी गदगदा वारा तुला हालवी। छोटे गोंडस, पांढरे सुम तुझे हंगू किती मी तया। छोट्या, सुंदर पाकळ्या कितीतरी, येती न मोजावया॥ अशा कवितेच्या ओळी गुणगुणत मी बकुळीची फुले वेचते.


रस्त्याच्या कडेला फणस कटिखांद्यावर बाळे घेऊन उभा असतोच. त्याच्या मुलाबाळांची मी चौकशी करते. माझीही मुले खुशाल आहेत असे त्याला सांगते. तोही हसून आपल्या काटेरी बाळाला माझ्याशी गुजगोष्टी करायला पाठवून देतो. डाव्या हातचा चाफा मात्र फारच रागीट. 



कधी रुसेल व कधी हसेल सांगता येत नाही. रागावला की, आपल्या अंगावरची सगळी पानांची वस्त्रे काढून टाकतो व खुलला की चाफा फुलांनी भरून जातो. माझे भलेभक्कम सोबती म्हणजे आमचे नारळराव. असे उंच वाढलेत की, आल्यागेल्यावर करडी नजर ठेवून पहारा देत असतात. 


शरीर थोडे रस्त्याकडे झुकलेलेच, 'माझ्या सावलीत येऊन बस ना,' असा सारखा लाडिक हट्ट करीत असतात.
एवढे सत्पुरुष माझे सखेसोबती असताना मी एकटी कशी? मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद



essay on trees our best friend in marathi | वृक्ष आपले मित्र मराठी निबंध