मदर टेरेसा मराठी निबंध | Mother Teresa Essay in Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मदर टेरेसा मराठी निबंध बघणार आहोत.चला तर मग सुरूवात करूया निबंधाला

Mother-Teresa-Essay-in-Marathi
Mother-Teresa-Essay-in-Marathi


निबंध 1 


कलकत्याच्या एका रस्त्यावरून एक विदेशी स्त्री चालली होती. तिच्याबरोबर तिच्या दोन सहकारी स्त्रियाही होत्या. पोशाखावरून ती स्त्री सेवाव्रत स्वीकारलेली धर्मप्रचारिका वाटत होती. रस्त्याच्या कडेला एक माणूस असहाय अवस्थेत पडला होता. जाणाऱ्या-येणाऱ्यांना त्याच्याकडे पाहायलाही सवड नव्हती. तो आता फार थोड्या तासांचा सोबती होता. त्या स्त्रीने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्याला आपल्या आश्रमात आणले. त्याचे अंग पुसले. त्याला स्वच्छ कपडे घातले. मरण्यापूर्वी मिळालेल्या या वागणुकीने त्याचा चेहरा उजळला. तेव्हा ती स्त्री आपल्या साथीदार स्त्रियांना म्हणाली, "मरताना त्याला जर जाणवले की, आपले कोणी तरी आहे तर त्याचे मरण सुखाचे होईल."



एका भिकाऱ्याचा एवढा विचार करणारी ही जगावेगळी आई म्हणजे 'मदर टेरेसा' होय. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांना आपल्या जीवनध्येयाचा साक्षात्कार झाला; तेव्हाच त्यांनी स्वत:ला गरिबांच्या सेवेसाठी वाहून घ्यायचे ठरवले. अठराव्या वर्षी त्यांनी धर्मप्रचारिकेची दीक्षा घेतली व घर सोडले. १९३१ साली दार्जिलिंग येथे त्यांनी सेवेची व धर्मप्रचाराची शपथ घेतली व १९३९ साली त्यांनी कलकत्त्यात आपल्या कामाला सुरवात केली. आतापर्यंत त्यांचे हे कार्य अखंड चालू आहे. १० सप्टेंबर १९४६ नंतर त्यांनी झोपडपट्टीतील दीनदुबळे व गरीब यांच्यासाठी आपले आयुष्य वेचण्याचे ठरवले व त्या लाखो अनाथांच्या, अपंगांच्या सर्वार्थाने 'मदर' झाल्या.


 मदर टेरेसांच्या या सेवेचे मोल जगाला उमगले आणि १९७९ साली त्यांना 'शांततेचे नोबेल पारितोषिक' मिळाले. ती संपूर्ण रक्कमही त्यांनी गरिबांसाठीच खर्चण्याचे ठरवले. भारतानेही 'भारतरत्न' हा किताब देऊन त्यांचा गौरव केला आहे. मदर टेरेसा म्हणजे साक्षात प्रेम आणि मूर्तिमंत करुणा होय.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. व पुढील दुसरा निबंध वाचण्‍यास विसरू नका  धन्‍यवाद





निबंध 2



ती समाजात सेवेचे व्रत घेऊन 'सिस्टर' म्हणून उतरली आणि आपल्या कार्याने समाजाची 'मदर' झाली, अशी ही एक आगळी आई - म्हणजे 'मदर तेरेसा'. स्वत:चे सर्वस्व इतरांच्या सेवेसाठी झोकून देण्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे 'मदर तेरेसा'. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मदर तेरेसांचे सेवाकार्य चालू होते आणि त्याचा विस्तार जगातील पाच खंडांत, सव्वाशे देशांत झालेला आहे.



मदर तेरेसा या मूळच्या अल्बानिया या देशातील. २६ ऑगस्ट १९१० मध्ये 'स्कोपजे' नावाच्या खेड्यात त्यांचा जन्म झाला होता. वयाच्या एकोणिसाव्या वर्षीच त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित केले. 'नन' बनून दुःखितांचे दुःख दूर करायचे हे ते ध्येय होते.


सिस्टर अॅग्नेस म्हणून त्या भारतात कोलकाता येथे आल्या, तेव्हा 'जनसेवा' या एकाच विचाराने त्या झपाटलेल्या होत्या. २४ मार्च १९३१ मध्ये त्यांनी पहिली शपथ घेतली. त्यानुसार त्यांनी गरिबी, ब्रह्मचर्य व कृपाशीलता या गोष्टी स्वीकारल्या. स्वत:साठी 'तेरेसा' हे नाव घेतले. कोलकाता येथे आल्यावर त्यांनी प्राथमिक शाळेत शिकवण्याची जबाबदारी स्वीकारली.


 त्यासाठी प्रथम त्यांनी बंगाली व हिंदी भाषा शिकून घेतल्या. नंतर त्यांची शाळेतील कारकीर्द ' उत्कृष्ट शिक्षिका' म्हणून ठरली. शिक्षिकेचे काम करत असताना सिस्टर तेरेसांना 'ईश्वरी' आवाहन झाले आणि 'कॉन्व्हेंट 'च्या चार भिंती सोडून त्या अधिक व्यापक कार्यासाठी बाहेर पडल्या. त्यांनी मिशन स्थापन केले. सेंट तेरेसा शाळेत पहिले औषधालय काढले व शिवणकामाचे वर्ग सुरू केले.



२० डिसेंबर १९४८ मध्ये त्यांनी कोलकाता शहरात मध्यभागी असलेले 'मोतीझल' हे ठिकाण ही आपली कर्मभूमी म्हणून निवडली. त्यावेळी ते ठिकाण अत्यंत घाणेरडे व अस्वच्छ होते. असाध्य रोगाने ग्रासलेल्या एका मरणासन्न व्यक्तीला त्यांनी रस्त्याच्या कडेला पाहिले. त्या व्यक्तीचा शेवट तरी शांततापूर्ण व्हावा म्हणून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तिला उचलून आपल्या संस्थेत आणले. या घटनेतूनच तेरेसांचे 'सेवागृह' सुरू झाले व तेरेसा त्या सेवागृहाच्या 'मदर' झाल्या.



त्या क्षणापासून या मदरचे काम सतत विस्तारतच गेले. त्यांनी १२५ देशांत ७५५ आधारगृहे काढली. 'मिशनरीज ऑफ चॅरिटी' ही आंतरराष्ट्रीय संस्था त्यांनी सुरू केली. या संस्थेमार्फत पाच लाख लोकांना रोजचे मोफत जेवण सुरू झाले. तीन लाख लोकांना मोफत उपचार मिळू लागले. वीस हजार मुलांच्या शिक्षणाची सोय झाली. यांखेरीज अपंग संस्था, कुष्ठधाम, दुर्बलांसाठी निवारे, व्यसनग्रस्तांसाठी उपचारगृहे त्यांनी सुरू केली. २५ जानेवारी १९६२ रोजी भारत सरकारने त्यांना ' पद्मश्री' हा किताब देऊन गौरवले. १९७१ मध्ये त्यांना 'रॅमन मॅगॅसेसे अॅवॉर्ड' मिळाले. त्यातून त्यांनी आग्रा येथे कुष्ठरुग्णांसाठी आश्रम सुरू केला.



वॉशिंग्टन येथील जोसेफ केनेडी अकादमीचे पारितोषिकही त्यांना मिळाले. त्या पैशांतून त्यांनी कोलकात्याच्या डमडम उपनगरात मनोदुर्बल मुलांसाठी रुग्णालय सुरू केले.  १९७९ साली मदर तेरेसा यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक मिळाले. त्या निमित्ताने तेथे होणारी मेजवानी रद्द करवून घेऊन त्यासाठी होणाऱ्या खर्चाची रक्कम त्यांनी आपल्या कार्यासाठी देणगी म्हणून स्वीकारली. १९८० मध्ये भारत सरकारने त्यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब बहाल करून सन्मानित केले. ५ सप्टेंबर १९९७ रोजी त्यांचे वयाच्या ८८व्या वर्षी कोलकाता येथे निधन झाले. शेवटपर्यंत मोह, मत्सर या दुर्गुणांच्या पलीकडे जाऊन माया, प्रेम, सेवा आणि भक्ती यांचाच साऱ्या जगावर या मदरने वर्षाव केला. अशी होती ही एक आगळी आई !


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

मदर टेरेसा मराठी निबंध | Mother Teresa Essay in Marathi

 संगणक वर मराठी निबंध | Computer Essay In Marathi

निबंध 1

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण संगणक वर मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधामध्‍ये संगणकाच्‍या इतीहासापासुन ते आजपर्यंत ते कोणकोणत्‍या उपयोगात येत आहेत त्‍याबद्दल सविस्‍तर माहीती तारखासहीत दिली आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला


संगणक संस्कृतीच्या विकासाबरोबरच उत्तरोत्तर मानवाची वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती होत गेली. विविध इलेक्ट्रॉनिक तंत्राच्या शोधाबरोबरच अनेक आधुनिक उपकरणे निर्माण केली गेली. वास्तविक संगणक ही मानवाने लावलेल्या शोधांतून मिळालेली देणगी आहे. संगणकाचा उपयोग संशोधनकार्य, शोध ऋतुसंबंधीची माहिती, बँक, इत्यादी अनेक क्षेत्रांत होतो.

Computer-Essay-In-Marathi
Computer-Essay-In-Marathi

संगणकाच्या वापरामुळे कार्यास गती येते. कार्य कौशल्यपूर्ण होते. आकडेवारी व माहितीचा चांगला उपयोग होतो. कार्यप्रणालीवर चांगले नियंत्रण राहते.संगणकाची कार्यपद्धती द्विआधार पद्धती (बायनरी सिस्टिम) वर आधारित आहे. जर्मनीतील गणितज्ञ व तत्त्वज्ञ गोटफ्रिड, बिलहेल्म लायबनिज (१६६४-१७९६) ने असे सुचविले की सर्व पाढ्यांचा आधार शून्य व एक मानावा या द्विआधारी पद्धतीत बेरीजवजाबाकीची प्रक्रिया सहजपणे करता येते. गुणाकार आणि भागाकार पण बेरजेच्या क्रमात करता येतो. या पद्धतीत अंकाची सुरवातीच्या व शेवटच्या अक्षरांना जोडल्यानंतर जो शब्द त्यास 'दुयंक' (Bit) म्हणतात. आठ बिटांच्या समूहाला बाईट (Byte) म्हणतात. १०२४ बाईट समूह मिळून एक किलोबाईट बनतो.


अंदाजे १५० वर्षांपूर्वी सर्वप्रथम संगणक निर्मितीच्या सिद्धांताचे प्रतिपादन इंग्लंडमधील चार्ल्स बेबेज या शास्त्रज्ञाने केले. याच्याच सिद्धांताच्या आधारावर हॉर्वर्ड विद्यापीठ (अमेरिका) १९३७ ते १९४४ या काळात संगणकाचा प्राथमिक विकास प्रा. होबोर्ड आयकन याने केला. या संगणकाचे वजन दोन टन होते. त्याची लांबी १५ मीटर व रुंदी 27 मीटर होती. 


१९६५ मध्ये इंटिग्रेटेड सर्किटपासून (IC) पहिला संगणक निर्माण करण्यात आला. त्यानंतर मागील काही वर्षांत संगणकाचा वेगाने विकास झाला. आता संगणक मनुष्यच संचालित करतो. त्याच्याच सूचनेप्रमाणे तो काम करतो. संगणकात मानवसदृश सर्व गुणांचा समावेश करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.


संगणकाचा प्रमुख भाग म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (CPU) ज्यात अनेक छोटे भाग असतात. संगणकाच्या एककापासूनच गणना होते. सेंट्रल प्रोसेसिंगशिवाय त्याचे अन्य भाग विद्युत कुंजिका, विद्युत यांत्रिक प्रिंटर डिस्क संचय एकक(hard disk drive), आवरण, इंटरफेस आणि टेपडेक असतात.


 भारतात शिक्षणाचा प्रसार-प्रचारासाठी संगणकाचा उपयोग केला जातो. साक्षरतेच्या मोहिमेत संगणक महत्त्वाची भूमिका बजावीत आहे.वर्गात शिक्षक जे व्याख्यान देतात त्याचा फायदा सर्व विद्यार्थ्याला होतोच असे नाही. परंतु संगणक प्रत्येक विद्यार्थ्याला सारखे शिक्षण देण्यात सक्षम आहे.



संगणकाच्या उपयोगामुळे बँकेच्या कार्यात सुधारणा झाली आहे. बँकेत संगणकावर प्रत्येक ग्राहकाच्या खात्याची संपूर्ण माहिती पाहावयास मिळते. त्याचे प्रिंट आऊट पण काढता येते. बँकेचा दैनंदिन हिशेब काही क्षणांतच संगणक आपणास देतो. संगणकात ग्राहकांच्या हस्ताक्षरांचा संग्रह करून एका स्कॅनरच्या साह्याने काही क्षणांत त्यांच्या हस्ताक्षराची तपासणी करता येते. बँकेच्या बाहेर कॉम्प्युटराईज्ड स्वयंचलित यंत्रे बसविलेली असतात. त्याद्वारे ग्राहक केव्हाही पैसे काढू शकतात, जमा करू शकतात, चेकसाठी अर्ज करू शकतात. याला वेळेचे बंधन नाही. 


संगणकाद्वारे वधुवरांची निवड करता येते. अनेक उपवर तरुण-तरुणींचे स्वभाव, वय, जात, आवडी इत्यादी माहिती संगणकात साठविली जाते. याच आधारावर निवड केली जाते.


रशिया, अमेरिका, भारत आणि इतर अनेक देशांमध्ये संगणकाचा उपयोग संरक्षण कार्यात होतो. याद्वारे गुन्हयांचा तपास केला जातो. विद्यार्थ्याचे निकाल तयार केले जातात. विविध विषयांचा अभ्यासक्रम तयार करण्यात मदत होते. विमाने आणि रेल्वेत आरक्षण करता येते. संगणकाच्या मदतीने अनेक टेलिफोन लाईन्स एकमेकांना जोडल्या जातात. एखाद्या व्यक्तीच्या गैरहजेरीत फोनवर आलेला संदेश संगणक टाईप करून ठेवतो आणि फोन करणाऱ्याला ती व्यक्ती कधी उपलब्ध असू शकेल ते सांगतो ई-मेलची सोय पण संगणकावर उपलब्ध असते.



संगणकाचा उपयोग डिझाईन, ड्रॉईंगसाठी पण केला जातो. यामुळे चित्रपट उद्योगात क्रांती घडून आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातही संगणकाचा उपयोग होतो. वाहतूक नियंत्रणासाठी संगणकाचा वापर केला जातो. वाहनांच्या येण्या जाण्यावर संगणकाच्या आदेशामुळे आपोआप नियंत्रण येते.


वाहनांची, प्रवाशांची संख्या संगणक सांगतो. मोटार वा अन्य वाहनात रेडियो संचार व्यवस्थेखेरीज एक मायक्रो संगणक असतो. आवश्यकतेनुसार तो अॅम्ब्युलन्स, अग्निशमनाची त्वरित मागणी करतो. रोबोट हा सुद्धा एक प्रकारचा संगणकच आहे. तो माणसाप्रमाणे कार्य करतो.



संगणकाचा दुरुपयोग पण केला जातो उदा. जुगार खेळणे, संगणकाच्या साह्याने कुणाचेही चित्र काढुन त्‍यात अनावश्‍यक असे बदल करने.  कधीकधी संगणक चुकाही करतो. काही जणांना अशी भीती वाटते की संगणक मानवी बुद्धीच्याही पुढे जाईल. परंतु संगणक हे एक निर्जीव यंत्र असल्यामुळे ही गोष्ट शक्य नाही. ही गोष्ट खरी की संगणक अत्यावश्यक यंत्र आहे ज्याचा विकास आपल्या सुखासाठी निरंतर केला जाऊ शकतो.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका  


संगणक मराठी निबंध 

निबंध 2

संस्कृती आणि सभ्यतेच्या विकासाबरोबरच मानवाने शास्त्रीय व तांत्रिक क्षेत्रात उन्नती केली. त्याने इलेक्ट्रॉनिक तांत्रिक शोध लावून मानवोपयोगी आधुनिक उपकरणे बनविली. संगणकाचा शोध मानवाच्या यशाचे एक अद्वितीय उदाहरण आहे. शोध कार्य व अन्य क्षेत्रातून संगणकाला काढून टाकला तर मानव शास्त्रीय प्रगती करू शकणार नाही. 


मागील काही वर्षांत संगणाकाचा विकास तीव्रतेने झाला आणि होत आहे. संगणक मानवाच्या सूचनेनुसारच कार्य करतो. टाईपरायटरप्रमाणेच संगणकात अक्षरांचे, अंकांचे, विरामचिन्हांचे संकेत असलेल्या बटण असतात. त्यांच्या साहाय्याने संगणकाला आदेश दिला जातो. संगणकात लिहिले गेलेले सर्व आकडे, साहित्य साठविले जाते आणि ते एकानंतर एक समोर येतात.


 संगणकात साठविलेल्या साहित्याचे आकडेवारीचे मुद्रण प्रिन्टरच्या सहाय्याने करता येते. आपल्या दैनिक जीवनात संगणकाचा उपयोग खूप वाढला आहे. त्याद्वारे अनेक कामे करवून घेतो. संगणकामुळे मोठमोठी व किचकट कामे, आकडेमोडी चुटकीसरशी होतात. संगणकाद्वारे गुन्हयाची तपासणी केली जाते. विद्यार्थ्यांचे निकाल तयार केले जातात. लहान मुले संगणकावर खेळ खेळतात.


 विविध विषयांचे पाठ्यक्रम संगणकावर तयार होतात. रेल्वे आणि विमानाचे आरक्षण संगणकाच्या मदतीने करता येते. बँकांमध्ये पण संगणकाचा उपयोग वाढला आहे. बँकेतील संगणकात प्रत्येक ग्राहकाचे खाते व त्याचे पूर्ण विवरण साठविलेले असते. बँकेतील दैनंदिन देण्याघेण्याचे हिशेबही असतात. ग्राहकाला संगणकावर त्वरित आपल्या खात्याची माहिती मिळु  शकते.



भारतात शिक्षणाच्या प्रसार-प्रचारासाठी संगणकाचा उपयोग केला जातो. प्रामुख्याने दूर शिक्षण घेणाच्या विद्यार्थ्यांना त्याचा जास्त फायदा होतो. चित्रपट उद्योगातही संगणकाच्या साहाय्याने दृश्यांचे चित्रण होते. वाहतुकीचे नियंत्रणही संगणकाच्या साहाय्याने केले जाते. आपात्कालीन बातम्यांचे प्रसारणही संगणक करतो. अलीकडे लोकप्रिय झालेल्या इंटरनेट सेवेअंतर्गत संगणक टेलिफोनच्या तारांद्वारे जोडले आहेत ज्यामुळे महत्त्वाचे संदेश क्षणात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात.


संगणक आज मानवासाठी अति आवश्यक आणि महत्त्वपूर्ण यंत्र आहे ज्याचा उपयोग आपल्या गरजांनुसार सतत केला जात आहे. भविष्यात याचा उपयोग आणखी वाढतच जाणार आहे.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

संगणक वर मराठी निबंध | Computer Essay In Marathi

bhukamp grastache manogat nibandh | भूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध


 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण भूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध बघणार आहोत. मानवी जिवन हे संकटानी भरलेले असते त्‍यात कधी कोणते संकट येईल हे सांगता येत नसते या निबंधामध्‍ये अश्‍याच एका संकटाचा म्हणजे भुंकपाचा सामना केलेली व्‍यक्‍ती त्‍याचे मनोगत स्‍वरूपात त्‍यांनी अनुभवलेले भुंकपाचे संकट व्‍यक्‍त करते त्‍यावर त्‍यांनी कशी मात केली हे या 5 निंबधात सविस्‍तर सांगीतले आहे  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 

bhukamp-grastache-manogat-nibandh
bhukamp-grastache-manogat-nibandh



निबंध 1 (450 शब्‍दात) 


एके दिवशी वर्गशिक्षिका वर्गात आल्या व म्हणाल्या, “आज आपण निबंध लिहायचा." मुलांनी “विषय कोणता, विषय कोणता," असा एकच कुजबुजाट केला. त्यातच त्‍यांनी  विषय जाहीर केला – भूकंप ! ' भूकंप' हा शब्द उच्चारताच माझ्या बाजूलाच बसलेला माझा मित्र स्वप्निल कावराबावरा झाला. माझ्या नजरेने हे तत्क्षणी हेरले. मधल्या सुट्टीत मी त्याला त्याबद्दल बोलते केले, तेव्हा तो व्याकूळ होऊन सर्व आठवणी सांगू लागला…


“भूकंप हा शब्द ऐकला तरी मला गलबलून येते. कारण मी स्वतः भूकंप अनुभवला आहे. भूकंप झालेल्या गावातूनच मी आलो आहे. आमचं गाव अगदी साधंसुधं खेडेगाव आहे. दिवसभर शेतात राबायचे, दोन वेळचं साधंसं जेवण घ्यायचं आणि रात्री गाढ झोपी जायचं, हाच गावाचा मुख्य दिनक्रम. एके दिवशी आम्ही असेच शांतपणे झोपलो होतो. मध्यरात्रीनंतर अचानक जमीन थरथरली... फक्त काही सेकंदच ! आणि काही कळायच्या आत झाडे, घरेदारे धडाधड कोसळली... अनेक गुरेढोरे, माणसे सगळी घरांखाली गाडली गेली. 


काही मिनिटांनी सगळीकडे एकच हलकल्लोळ माजला. रडणे, ओरडणे, मदतीसाठी पुकारणारे  यांनी अवघा अवकाश व्यापून टाकला. ढिगारे उपसण्याचे असहाय प्रयत्न करण्यात, आपली माणसे शोधण्यात सकाळ उजाडली... आणि सर्वांसमोर उद्ध्वस्त वास्तव लख्ख प्रगटलं. प्रचंड मोठ्या नांगराने कोणीतरी जमीन नांगरावी, त्याप्रमाणे सगळी जमीन खणल्यासारखी दिसत होती.


सर्व घरे, वाडे उद्ध्वस्त झाले होते. मोठमोठी झाडेसुद्धा मुळापासून उपटून आडवी झाली होती. जी घरे माणसांना आजपर्यंत आश्रय देत होती, त्या घरांखालीच अनेकजण गाडले होते.  काही जणांचे हात तुटले होते; पाय तुटले होते. कित्येकजण जबर जखमी होऊन विव्हळत पडले होते. कित्येक मृतदेह इतस्ततः पसरले होते. प्रत्येक घरात मृत्यूने थैमान घातले होते. कुणी कुणाला सावरायचं? कुणी कुणाचे अश्रू पुसायचे?

" त्यानंतर झालेल्या हालांना तर पारावारच उरला नाही. भूक लागल्यावर खायला काहीच नव्हते. आमच्या वाडीवरची एकुलती एक विहीर उद्ध्वस्त झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचं संकटच उभं राहिलं.


औषधोपचाराविना अनेकजण तळमळत होते. आम्ही सर्वजण भुकेने व्याकूळ झालो होतो. रस्ते उखडलेले, झाडेझुडपे कोसळून पडलेली... त्यामुळे गावाबाहेरचे लोक आमच्यापर्यंत पोहोचायला संध्याकाळ उजाडली. तेव्हा कुठे आम्हांला खायला पहिला घास व पाण्याचा पहिला घोट मिळाला. हळूहळू सर्वत्र दुर्गंधी पसरू लागली. आम्हांला दूर मोकळ्या जागेत एकत्र केले. रडून रडून दमल्यावर आम्ही रात्री उघड्या माळरानावरच झोपी गेलो.


" नंतरच्या दिवसापासून मात्र दूरदूरचे अनेकजण आमच्यासाठी मदत घेऊन येऊ लागले. विविध वस्तू, कपडे, अन्नधान्ये यांची मदत सुरू झाली. तात्पुरते तंबू उभारून आमची राहण्याची सोय केली गेली. आम्हांला घरे बांधून देण्याच्या बातम्या येऊ लागल्या. बरीच मदत आली, हे खरे. पण मदतीतला मोठा वाटा गावातल्या मातब्बर लोकांनी व दांडगाई करणाऱ्यांनी बळकावला. पण आम्ही काहीच करू शकत नव्हतो. काही गावकरी तर आजही उघड्यावर पडले आहेत.



“भूकंपाच्या आठवणी आल्या की, अजूनही माझं मन गलबलतं. माझी आई या भूकंपामुळे धरणीच्या कुशीत विसावली. माझा धाकटा भाऊ जबर जखमी होऊन काही दिवसांनी देवाघरी गेला. आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. माझी बहीण, आजी आणि बाबा गावी कष्ट करून कसेबसे पोट भरत आहे. माझ्या मामाने मला इकडे बोलावून घेतले, म्हणून तर मी या शाळेत शिकायला येऊ शकलो आहे.

"नको रे बाबा ! त्या भूकंपाच्या आठवणी नकोत ! त्या आठवणींनी आजही माझ्या जीवाचा थरकाप होतोय."


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . खालील दुसरा निबंध वाचण्‍यास विसरू नका  धन्‍यवाद



निबंध 2  (350 शब्‍दात) 


सारा गाव देवीच्या कुशीत विसावला होता. दिवसाभराची कामं झाली होती. जमिनीची, नोकरीची कामं; कुणाचं लग्न, कुणाचा वाढदिवस कुणाचं काय कुणाचं काय... भुकंप आला आणि... होत्याचे नव्हते झाले सूर्य उगवायचा होता; अंधारातच “धडाइ धूडम्” “गडगडगड" आवाज घुमले. घरे हालली; भांड्यांची भांडणे झाली, दरवाजांचे आवाज आले.....  अंधाराचा महासागर, गगनाला चिरणाऱ्या किंकाळ्या, उघडण्याआधीच कायमचे मिटलेले डोळे...  सूर्योदयापूर्वीच जीवनाचा  सूर्यास्त झाला. माझ्या सर्व नातेवाईकांबरोबर ४० हजार आयुष्ये गिळून हा भूकंप दैत्य शांत झाला.



जिवन हे चांगल्‍या प्रवासासमान असते पण उद्या काय होईल याबद्दल काही सांगता येत नसते .पाप वाढते तेव्हा धरणीकंप होतो असे म्‍हणतात मग  आम्ही काय पाप केलं होतं ? की आम्ही ४० हजारांनीच मिळून फक्त पाप केलं होतं ? मग आम्हाला ही शिक्षा का?


राहिलेल्या उजाड जीवनाचे मी करू काय ? आईवडील, बहीणभाऊ सारे गेले. दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली तुटलेल्या कमरेची माझी आई. फुटलेल्या डोक्याने आईला बिलगलेली बाहुलीसारखी बहीण, भींतीखाली दोन्ही पाय गमावुन निजलेले वडील, ढिगाऱ्यात हरवलेला भाऊ.... डोळ्यांसमोरून हलवा हे दृश्य.... नाहीतर मी वेडा होईन.


क्षणात गाव पुसलं गेलं. जगाला जाग आली. सहानुभूतीची लाट उसळली. संकटात सापडलेल्यांच्या मदतीला सरकार, स्वयंसेवी संस्था धावल्या. गावाला युद्ध छावणीचे रूप आले. अन्न, पाणी, दूध, वस्त्रे, औषधे, निवारे तंबू सर्व वाटले गेले. सर्वधर्मी प्रार्थना झाल्या. पुनर्वसनाची चक्रे फिरू लागली. माणुसकीचे दर्शन झाले.


हळूहळू सर्व ठीक होईल. लोक आपल्या विश्वात रमून जातील. हे सारं विसरूनही जातील. विस्मृतीच्या वरदानावरच माणसाचं जीवन सुसह्य होतं. परदुःख शीतल पण ज्याचं जळतं त्याचं काय ?... मदतीच्या खैरातीवर कां आयुष्य काढायचे ? -


उध्वस्त जपानकडून स्फूर्ति घ्यायला हवी. फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी मारायचीय. जखमा विसरून कामाला लागायचे आहे.

"उष:काल होता होता काळरात्र झाली पुन्हा आता आयुष्याच्या पेटवा मशाली"


सारं सुरळीत होईल. पण एक नक्की, जेव्हा केव्हा ३० सप्टेंबर तारीख कलेंडरवर दिसेल तेव्हा मनात वादळं निर्माण होतील; आणि डोळ्यातुन अश्रुंच्‍या धारा वाहु लागतील. 

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 3  

 भूकंपग्रस्ताचे मनोगत मित्रांनो, मी तुम्हाला एका वेगळ्या थरारक अशा अनुभवाची घटना सांगणार आहे. मी जो भूकंप अनुभवला त्याचे सविस्तर वृत्त मी तुम्हाला सांगणार आहे . 


काही क्षण थरथर थरथर जमिनीचे असे कंपन झाले. खडखड खडखड घरातील भांडे पडण्याचा आवाज आला आणि लगेच काही क्षणातच धडाम धूम, धाडधाड असा घरे पडण्याचा आवाज. पुढे अनेक आवाज. आई गऽऽऽऽ......मेलो रेऽऽऽऽ.....बाप रेऽऽऽ.....ओंऽऽऽ.... वाचवाऽऽऽऽ..असे अनेक आवाज व त्यात मिसळला जात होता तो रडण्याचा आवाज आणि विव्हळण्याचा आवाज. काय झाले हे समजण्याच्या आधीच एका सुंदर अशा वस्तीचे; विटा,दगड,माती मध्ये रुपांतर झाले होते. भूकंपाने संपूर्ण गाव उध्वस्त करुन टाकले होते. रस्ते कोणते व घरे कोणती यातील फरक समजत नव्हता. अगदी पक्की घर सुध्दा वाचली नव्हती.


काही कळायच्या आत काळाने त्यांच्यावर झडप घातली. काही जनावरे सुध्दा मृत्युमुखी पडली. जे वाचले ते क्षणभर अवाक होऊन नुसते बघत राहिले. परिवारातील सदस्य ढिगाऱ्याखाली दडले हे समजताच काय करावे त्यांना सुचेनासे झाले होते.



 भानावर येताच त्यांना वस्तुस्थितीची जाणीव झाली. त्यांचा शोध घेण्यासाठी ढिगारा उपसण्याचे प्रयत्न ते करु लागले. ढिगारा उपसणे तेवढे सोपे नव्हते. काय करावे? मदतीला कुणाला बोलवावे? प्रत्येकाचा चेहरा रडवेला,हताश, घाबरलेला दिसत होता. कुणाची अगदी वेड्यासारखी स्थिती. “अरे देवा, हे काय केलस?' वर पाहून कुणा एकाचा प्रश्न. तर “लय पाप वाढलं होतं आपल्या गावात म्हणून असं घडलं' असा दुसऱ्याचा उदास स्वर.


 "गावातील पाप्यांना हाकलून दिलं असतं तर असा प्रसंग आला नसता”असा तिसऱ्याचा सूर. अशा प्रकारे विविध क्रिया, प्रतिक्रिया, आश्चर्य, दुःख, वेदना, हताशपणा, गोंधळ सुरु झाला होता. भूकंपाची ही बातमी प्रशासनापर्यंत पोहोचली. प्रशासनाच्या गाड्या पोहोचल्या. वृत्तपत्रे व विविध वाहिन्यांचे प्रतिनिधी,पत्रकार पोहोचले. काही वेळाने मदतीसाठी सेना जवान पोहोचले. मदत कार्य सुरु झाले परंतु निसर्गाचा राग शांत झाला नव्हता. त्याने मदतीत अडथळा निर्माण केला. 


पावसाला सुरुवात झाली. पहिल्यांदा धरतीने झिडकारले नंतर पावसाने झोडपायला सुरुवात केली. धो धो पाऊस पडू लागला. पावसाच्या धारा व वाचलेल्या व्यक्तींच्या डोळ्यातील धारा थांबता थांबेनात. तर मदत कार्याला जसा विलंब होत जात होता. तसा लोकांचा धीर खचत होता. ढिगाऱ्याखाली कुणी जिवंत सापडण्याची आशा मावळत गेली.पाऊस थांबला. मदत कार्य सुरु झाले. अंधार पडू लागला होता. 


वीज गेली होती. परंतु तरीही बत्तीच्या उजेडात जवान एक एक प्रेत बाहेर काढू लागले. वातावरण भेसूर दिसत होते. मृतदेह बाहेर काढताच आप्त स्वकीयांचा हंबरडा फुटायचा. वातावरणाचा भेसूरपणा आणखीनच वाढायचा. कुणाची पत्नी, कुणाचा मुलगा, कुणाची मुलगी, कुणाची आई, कुणाचे वडील, कुणाचा भाऊ, कुणाची बहिण. काही घरातील पूर्ण सदस्य मृत्युमुखी पडले होते.


 काही लोक जखमी झाले होते. कुणाचा हात निकामी तर कुणाचे पाय निकामी झाले होते. अधून मधुन विजांचा कडकडाट तर जखमींचा उपचाराकरिता तडफडाट होत होता. जखमींचा उपचार करावा की मृतकांचा अंत्यसंस्कार ह्या पेचात आप्त स्वकीय पडले होते. पाहणाऱ्यांचे हृदय फाटावे असे विदारक चित्र निर्माण झाले होते. “संकटे कधी एकटी येत नाहीत” ह्या वचनाचा प्रत्यक्ष अनुभव आला होता.



शासनाने पुनर्वसनाचे आश्वासन दिले. परंतू मला प्रश्न पडला की, शासन कोणाचे पुनर्वसन करणार ? घरांचे की कुटूंबांचे ? भुकंपात कुटूंबची-कुटूंब गाडली गेली. घराला घरपण येतं ते परिवारामुळे. घरात रहायला परिवारच नाही तर घर कुणासाठी?. 


मित्रांनो, कुणाला सरस तर कुणाला निरसा असा मदतीचा वाटा शासनाकडून मिळाला. जिवित हानी ही पैशांनी भरुन निघत नसते. निसर्गाने दिलेल्या या सजेमुळे हृदयावर झालेल्या जखमांवर काळाशिवाय कोणीही कुंकर घालु शकत नाही.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध 4 


किल्लारी येथे प्रचंड भूकंप झाला अन् तेथील सारे समाजजीवनच उद्ध्वस्त होऊन गेले. पेपरमध्ये याच्या बातम्या रोज वाचत होतो. अन् अशातच एक दिवस एक तरूण आमच्या दाराशी आला. त्याने आपली  कहाणी सांगितली.


“सारे लोक पहाटेच्या साखरझोपेत होते अन् एकाएकी जमीन गदगदा हालू लागली. झोपलेल्या लोकांना काय झाले ते कळलेच नाही. अन् एकाएकी घरे, वाडे सारे जमीनदोस्त होऊ लागले. अर्धवट जागे झालेले लोक सैरावैरा धावू लागले. त्यांच्या अंगावर मातीचे ढीग पडू लागले. अनेक लोक मातीच्या ढिगाखाली गाडले गेले. कित्येक संसार उद्ध्वस्त झाले. 


पाच मिनिटांत सगळे होत्याचे नव्हते झाले. लोक भानावर येईपर्यंत सारा गाव जमीनदोस्त झाला होता. वाडवडिलांपासूनचे चालत आलेले माझे घर कोसळून फक्त एक मोठा मातीचा ढीग उरला. घरातील भांडीकुंडी, चीजवस्तू सारे काही त्या मातीत गेले. माझा छोटासा मुलगा, माझी बायको कोणीच वाचू शकले नाहीत. मी एकटाच या जगात उरलो आहे.


 मी तरी कशाला वाचलो ? आता माझा व्यवसाय, आजूबाजूच्या लोकांची शेती सारे काही भूतकाळात जमा झाले आहे. दुसऱ्याच दिवशी मातीचे ढिगारे उपसून त्याखालून मृतांना बाहेर काढण्याचे कार्य चालू झाले. क्वचित एखाद्या ठिकाणी दैवाच्या बळावरच एखादी व्यक्ती जिवंत सापडली. एरवी मातीच्या ढिगाऱ्यांवर बसलेले खिन्न जीव, त्या ढिगाऱ्यातून काही चीजवस्तू मिळते का असे शोधणारे अभागी लोक असेच दृश्य सर्वत्र दिसत होते. असले भयानक दृश्य पाहून जीव गलबलून जात होता. झालेला सर्वनाश अतिशय भयाकारी होता.


एवढी वर्षे काडीकाडी जमवून उभारलेली घरटी उद्ध्वस्त होऊन गेली होती. मृत्यू आलेले लोक तरी सुटले म्हणावे, अशी परिस्थिती जिवंत असणाऱ्यांची होती. जिवंतपणी मरणयातना भोगण्याची पाळी लोकांवर आली होती. दुसऱ्या दिवशी सरकारी पाहाणी चालू झाली. गावात पाणी नव्हते, वीज नव्हती, खाद्यपदार्थ नव्हते. त्यामुळे मदतकार्य अत्यंत अपुरे पडत होते. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाची हानी झाली होती, पशुपक्ष्यांचे हाल झाले होते. 



मंत्री लोक दौरा करून जात होते. भूकंपग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर करीत होते. पण प्रत्यक्ष आमच्या हातात त्यातील फार थोडी रक्कम पडली. बाकीची कुठे गडप झाली, तो एक परमेश्वरच जाणे! परंतु अनेक संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांनी मदतीचा हात पुढे केला. सर्वांना शाब्दिक आधार दिला. ठिकठिकाणच्या लोकांकडून मदतीचा ओघ चालू झाला. 


निराधार झालेल्यांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न चालू झाला. भूकंपाला तोंड देऊ शकतील अशी घरे बांधण्याच्या योजना आखल्या जाऊ लागल्या. आता माझे घरटे पुन: कधी उभारले जाते, ते पाहायचे. सध्या तरी मी बेकार झालो आहे. कामधंदा मिळेल या आशेने शहरात आलो आहे. मला कुठेतरी नोकरी मिळेल का हो?"

त्याचा तो कारुण्यपूर्ण स्वर माझे अंत:करण कापीत गेला. आणि मी अंतर्मुख होऊन विचार करू लागले.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 5



स्वप्नांच्या कुशीत झोपी गेलेले लोक मृत्यूच्या मांडीवर निद्राधीन झाले होते.कायमचे विसावले होते.फक्त तीस सेकंद ‘भूकंप' ही तीनच अक्षरे ... आई ऽ ऽ ऽ वाचवा ऽ ऽ मेलोऽ ऽ असा आक्रोश, दगड, माती, विटा यात गाडले गेलेले लोक..... वेदना व दुःख यांचे थैमान ..... निसर्गाचे उग्र रूप..... मुलांनो, काय सांगू तुम्हाला ....आजही अंगावर काटा उभा राहतो....."


धुडूम...ऽ ऽ धडाड..... आवाजाने अचानक मी जागा झालो. समोरची भिंत कोसळली होती.सारे घर थरथरत होते.माझी लाडकी लेक शांती , तान्हुला किसना अन् माझी कारभारणी सखू , सारेच दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती.मी उधडला गेलो होतो.मनाचं वस्त्र चिंध्या चिंध्या होऊन समोर नाचत होतं.मी सुन्न झालो होतो. दगड-माती उकरत माझ्या जिवाभावाच्या पोटच्या गोळ्यांचा , बायकोचा शोध घेत होतो. डोळ्यातले अश्रू अनावर झाले होते.मनातलं क्रंदन संपता संपत नव्हतं.हाती काही लागत नव्हतं.


निसर्गाचं हे विनाशाचं तांडवनृत्य घेऊन आलेली ती काळरात्र दुसऱ्या दिवशी सकाळ झाली खरी, पण अजूनही निराशेचा दुःखाचा अंधार दाट पसरलेलाच होता. लातूर ,उस्मानाबाद , जिल्ह्यातील सास्तूर, पेठसांगवी इत्यादी ८३ गावांतील घरे धरतीने गिळली होती. अनेक कुटूंबे बेचिराख झाली होती. चिमुरडी मुले, स्त्रिया , माणसे यांच्या प्रेतांनी परिसर शोकाकुल झाला होता.अनेक बालके अनाथ झाली होती.एकेका घरातून पाच - सहा मृतदेह बाहेर काढले जात होते.बघणाऱ्यांच्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहत होते. 


रेडिओ, वर्तमानपत्रे,टी व्ही.द्वारे बातम्या जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचल्या.सहानुभूती व मदत घेऊन अनेक जण तेथे पोहोचले. भारतीय लष्कराने मोठ्या प्रमाणावर मदत कार्य सुरू केले. पंतप्रधान , मुख्यमंत्री यांनी तेथे तात्काळ भेटी दिल्या. दुःखितांना मदतीची आश्वासने दिली, त्यांचे अश्रू पुसले.चाळीस हजारांपेक्षा आधिक लोक मृत्यूच्या विळख्यात सापडले गेले होते. २० ऑक्टोबर १९९१ मध्ये उत्तर काशीत झालेल्या भूकंपाची वेदना परत ताजी झाली होती.''



"माझा संसार संपला तरी इतर शेकडो निराश्रितांचे अश्रू पुसण्यासाठी मी पुढे सरसावलो. “हे विश्वचि माझे घर' समजून मी समाजकार्याची कास हाती घेतली . भूकंपग्रस्त लोकांचे पुनर्वसन झाले. भूकंपासंबंधी पूर्व अनुमान संभव करण्यासाठी भूगर्भ शास्त्रज्ञ पुढे आले. अशा नैसर्गिक संकटातही मनुष्यहानी व वित्तहानी होऊ नये म्हणून सर्वच प्रयत्नशील आहेत.''


लातूर, किल्लारीच्या भूकंपानंतर २-३ वर्षानं अचानक भेटलेल्या भूकंपग्रस्ताचे हे हृदयातल्या दुःखद भावनांच काव्यमय शब्दरूप माझे काळीज चिरून गेले.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद

bhukamp grastache manogat nibandh | भूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध

essay on camel in marathi | उंट मराठी निबंध 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण उंट मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधात उंटाबद्दल सवीस्‍तर माहीती दिली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

essay-on-camel-in-marathi
essay-on-camel-in-marathi



उंट हा एक विचित्र प्राणी आहे. हा मूळत: भारतात सापडणारा प्राणी नाही. इ. स. पूर्व चौथ्या शतकात ग्रीक आक्रमकांबरोबर खैबर खिंडीमार्गे तो भारतात आला. भारताच्या वाळवंटी प्रदेशात तो मोठ्या प्रमाणावर सापडतो. त्याला वाळवंटातील जहाज असे म्हणतात. आज वाळवंटातील जीवन त्याच्याशिवाय अपूर्ण आहे.

उंटाला चार पाय, दोन, डोळे, शेपटी पाठीवर कुबड व लटकत असलेले ओठ असतात. वाळवंटात जेव्हा जोराचा वादळी वारा सुटतो तेव्हा नाकात वाळू जाऊ नये म्हणून तो नाकपुड्या बंद करून घेतो. उंटाचे गुडघे आणि मान कडक असते त्यामुळे त्याचा घर्षणापासून बचाव होतो. जाड ओठांमुळे तो वाळवंटातील काटेरी झाडा-झुडुपांची पाने खाऊ शकतो. त्याला ३४ दांत असतात.



उंट एका दिवसात ३६ लिटर पाणी पितो. जर त्याला खाण्यासाठी ताजी पाने मिळाली तर चार लिटर पाणी तो कमी पितो. उंटाच्या पोटात एक मोठी पिशवी असते तिला मदारी म्हणतात. त्यात तो अन्न व पाण्याची साठवण करतो. म्हणून खूप दिवस तो बिना अन्न पाण्याचा राहू शकतो. ताजी पाने खाल्ली तर त्याची पाण्याची गरज आणखी कमी होते. वाळवंटात उंट हे सर्वात उपयुक्त वाहन आहे.


उंटाचे केस वस्त्रोद्योगात वापरले जातात. त्यापासून लोकर, दोरी, कोट, पिशव्या इ० तयार केले जाते. ओझे वाहण्यास, स्वारी करण्यास, शेती कामात उंटाचा उपयोग होतो. युद्धातही उंटांचा उपयोग होतो. २६ जानेवारीस सैनिक उंटावर बसून येतात ते आपण T.V. व इंटरनेट वर पाहतो. समुद्रकिनारी किंवा प्राणीसंग्रहालयात उंटावरुन फेरी मारण्याचा आनंद घेता येतो. अशा प्रकारे उंट हा एक उपयुक्त पाळीव प्राणी आहे.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

essay on camel in marathi | उंट मराठी निबंध

peacock essay in marathi | राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधात मोराबद्दल सवीस्‍तर माहीती दिली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

peacock-essay-in-marathi
peacock-essay-in-marathi




मोर हा वनातील एक अत्यंत सुंदर, सावध, लाजाळू पण चतुर पक्षी आहे. भारत सरकारने १९६३ मध्ये जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात त्यास राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले. सौंदर्याचे हे मूर्त रूप साऱ्या भारतीयांना फार आवडते. कवी कालिदासाने त्या काळात मोराला राष्ट्रीय पक्ष्याचा दर्जा दिला होता.



मोर जेव्हा बेधुंद होऊन नाचतो तेव्हा आपली शेपटी उंचावून पंख्यासारखी पसरवितो. हे दृश्य पाहुन भान हरपते. मोराचे शरीर अनेक रंगांचे असते. त्या रंगांच्या छायांचे एक अद्भुत मिश्रण असते. गळ्याचा आणि छातीचा रंग निळा असतो. गळ्याच्या निळेपणावरून संस्कृत कवी त्याला 'नीलकंठ' म्हणतात.



मोर सामान्यपणे पावसाळ्यात नृत्य करतो. खूप लांबून येणाऱ्यांचा आवाज तो ऐकू शकतो. उन्हाळ्यात मोर सुस्तावतात. मोर सापांना मारून खातो. मोर माणसाला त्रास देत नाही. हा सावध आणि भित्रा पक्षी आहे. सामान्यतः कळप करून रहातो. धान्य, किडे व काही भाज्या हे त्याचे अन्न होय. तो काही ऊंचीपर्यंत व अंतरापर्यंतच उडू शकतो. शत्रुपासून बचाव करण्यासाठी त्याला लांब, बारीक परंतु बळकट पाय मिळालेले आहेत.


मोराच्या मादीला लांडोर असे म्हणतात. असा हा आपला राष्ट्रीय पक्षी आपल्या सौंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. अनेक मंदिरात देवाला मोरपिसे वाहतात. सजावटीसाठी मोरपिसांना मागणी असते. फुलदाणीत ही मोरपिसे लावतात. त्याचे पंखेही बनवितात. त्याने वारा घेता येतो.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

peacock essay in marathi | राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध

 lion essay in marathi | जंगलचा राजा सिंह मराठी निबंध

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण जंगलचा राजा सिंह मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधात सिंहाबद्दल सवीस्‍तर माहीती दिली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

lion-essay-in-marathi
lion-essay-in-marathi



सिंह हा मांजराच्या कुलातील जंगलात रहाणारा हिंस्त्र प्राणी आहे. फिकट तपकिरी रंगाचा हा प्राणी खरोखरच जंगलचा राजा आहे. त्याची ती डौलदार चाल, मानेभोवतीची दाट आयाळ आणि धीरगंभीर गर्जना मनाला भुरळ घालते. 


सिंह बहुधा कळप करून रहातात. त्याचे आयुष्य साधारण: २५ वर्षे असते. सिंह हे सिंहीणीपेक्षा मोठे असतात व त्यांना आयाळ असते. सिंहाच्या बछड्यांना छावा म्हणतात. जंगलात सिंहाचे क्षेत्र ठराविक असते. या ठराविक क्षेत्रातच ते फिरतात व शिकार मिळवितात. सिंह मुख्यतः भारत व मध्य आशियात आढळतात.


सिंह मासाहारी असतो म्‍हणजेच सिंह दुसऱ्या जंगली प्राण्यांना मारुन खातात. हरणे, कोल्हे, झेब्रा, काळविट हे त्यांचे भक्ष होय. आजकाल जंगले कमी-कमी होत चालल्याने त्यांचे हे नैसर्गिक अन्नही कमी होत आहे. मग हे भुकेले सिंह जंगलांजवळच्या गावातील बैल, गाय, शेळ्या यांसारखे पाळीव प्राणी मारतात. कधी-कधी ते नरभक्षक ही बनतात. सिंहांना नेहमी पाण्याच्या आसपास रहायला आवडते. ते उत्तम पोहू शकतात.



परंतु आपल्या देशातील सिंहांची संख्या हळू-हळू कमी होत चालली आहे. हे असेच चालू राहिल्यास आपल्याला सिंह फक्त फोटोतच पहायला मिळतील. त्यांची कातडी व दातांसाठी सिंहांची अंदाधुंद शिकार होत आहे. त्यांपासून अनेक शोभेच्या वस्तु तयार केल्या जातात. त्यामुळे सरकारने त्यांच्या शिकारीवर कडक निर्बंध लादले आहेत व शिक्षेची तरतूद केली आहे. गुजरात मधील गिरचे जंगल हे सिंहांचे अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


lion essay in marathi | जंगलचा राजा सिंह मराठी निबंध

essay on elephant in marathi | हत्ती मराठी निबंध


 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण हत्ती मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधात हत्‍तीबद्दल सवीस्‍तर माहीती दिली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


essay-on-elephant-in-marathi
essay-on-elephant-in-marathi



जगात अनेक प्रकारचे प्राणी आहेत पण सर्वात भक्कम पशू हत्ती होय. हत्ती विशालकाय असतो. त्याला नाकाच्या ठिकाणी एक लांब सोंड असते. सोंडेच्या सहाय्याने तो खातो व पाणी पितो. लाकडाचे ओंडके उचलण्याचे अवजड काम पुर्ण करतो. हत्ती मुख्यत: आफ्रिका व आशियात सापडतात. तो शाकाहारी व अतिशय बुद्धीमान प्राणी आहे. 


जंगलात हत्ती कळप करून राहतात. हत्तीच्या पायाचे तळवे मुलायम असतात. खडबडीत जागेवर जर तो चालला तर त्याच्या पायाला जखमा होतात. म्हणून तो मऊ मातीत वा वाळुत चालतो. हत्तीची चाल माणसापेक्षा जलद असते. जर हत्ती मागे लागला तर त्याच्यापासून सुटका होणे कठीण असते.



अवजड कामे करण्यासाठी हत्तींचा उपयोग केला जातो. हत्तींची शिकार करण्यासाठी त्यांच्या जाण्यायेण्याच्या मार्गावर हत्तीच्या उंचीइतका एक खड़ा खोदण्यात येतो. त्याला गवताने झाकले जाते. हत्तींचा कळप जेव्हा तिथून जाते तेव्हा एक तरी हत्ती त्यात पडतोच. मग दोर-काठयांच्या साह्याने हत्तीला बाहेर काढण्यात येते.



प्राचीन काळात राजा हत्तीवर स्वार होऊन युद्धावर आणि शिकारीसाठी जात असे. दक्षिण भारतात आजही उत्सवात हत्तीला सामील करून घेतले जाते. त्याच्याशिवाय उत्सव पूर्ण होत नाही. सर्कशीत हत्ती निरनिराळ्या प्रकारच्या कसरती करून दाखवितो. ओझे वाहून नेण्यासाठी हत्तींचा वापर केला जातो. 


हत्तीचे दांत फार किमती असतात. त्यापासून दागिने व गृहसजावटीच्या वस्तू बनवितात. लग्नात वधूला हस्तिदंती बांगड्या घालतात. प्राचीन काळी राजासिंहासनावर हस्तिदंताचे नक्षीकाम केले जात असे. परंतु हस्तीदंतासाठी त्यांची अंदाधुंद शिकार होत आहे. हे थांबायला हवे. त्यांचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

essay on elephant in marathi | हत्ती मराठी निबंध