होमी भाभा मराठी निबंध | doctor homi bhabha marathi nibandh


निबंध 1 ( 550 शब्दात )


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण होमी भाभा  मराठी निबंध बघणार आहोत. स्‍वतंत्र भारताला परमाणु विज्ञान क्षेत्रात महत्‍वाचे स्‍थान मिळवुन देण्‍याचा गौरव डॉ. होमी भाभा यांनी केला जोपर्यत गरीब राष्‍ट्राला अनुविज्ञान वापरनार नाहीत तोपर्यंत ते आर्थीक व औद्योगीक प्रगती करू शकणार नाहीत त्‍यांच्‍या जन्‍मापासुन भारताला अनुउर्जा प्रदान करण्‍यापर्यतचा प्रवास या निबंधामध्‍ये सविस्‍तर पणे स्‍पष्‍ट केला आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला . 

doctor-homi-bhabha-marathi-nibandh
doctor-homi-bhabha-marathi-nibandh



मुंबईमधील एका पारसी कुटुंबात ३० ऑक्टोबर १९०९ मध्ये डॉ. होमी भाभा यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा म्हैसूर राज्यात दिवाण होते. त्यांचे वडील टाटा उद्योग समुहात वरीष्ठ अधिकारी होते. होमी भाभांना लहानपणापासून शास्त्रीय संगीताची आवड होती. ते लहान असताना जेव्हा रडत असत, तेव्हा त्यांचे माता-पिता त्यांना शास्त्रीय संगीत ऐकवत असत. ते संगीत ऐकताच ते आपले रडणे थांबवीत असत. चित्रकला हा त्यांचा आवडता छंद होता. त्यांनी त्यांच्या आईचे चित्र काढून त्यांना भेट देऊन चकित केले होते.



डॉ. भाभा जॉन कॉर्नन इंग्लिश स्कूलमध्ये शिकले. अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी म्हणून जैं वाचण्यासाठी देत. ती पुस्तके वाचून ते प्रयोग करीत असत. ते अत्यंत जिज्ञासू वृत्तीचे असल्याने प्रयोग करण्यात रममाण होत.

डॉ. भाभा इंटरच्या वर्गात शिकत होते. तेव्हा अमेरिकन शास्त्रज्ञ डॉ. एच्. कॉम्प्टन मुंबईत येणार होते. त्यांच्या भाषणाचा लाभ डॉ. भाभा यांना झाला. त्यांनी अॅटॉमिक शास्त्रज्ञ होण्याचा निर्णय घेतला. त्यांचा निर्णय भविष्यकाळात योग्य ठरला.


गणित हा डॉ. भाभांचा आवडता विषय. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की आपला मुलगा इंजिनियर व्हावा, म्हणून वडिलांनी त्यांना वयाच्या सतराव्या वर्षी इंग्लंडमधील अभियांत्रिकी महाविद्यालयात पाठविले. तेथे गेल्यावर डॉ. भाभांनी एकाच वेळी महत्त्वाच्या पाच विषयांची परीक्षा दिली व त्यात उत्तम यश संपादन केले. त्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून डॉक्टरेट ही पदवी संपादन केली. त्यासाठी त्यांचा पदार्थविज्ञान हा विषय होता. त्यांना न्यूटन शिष्यवृत्ती मिळाली. त्यांनी पदार्थ विज्ञान या विषयात संशोधन केले.



वयाच्या ३१ व्या वर्षी त्यांना फेलोशिप मिळाली. त्याच वेळी भारतात आण्विक सायन्सची ओळख झाली होती. पण प्रयोग करून पाहिल्याशिवाय हा विषय समजणे कठीण असल्याने भाभांनी 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फन्डामेंटल रिसर्च संस्थे'ची मुंबई येथे स्थापना केली. डॉ. भाभा भौतिकशास्त्र विषय शिकवत. १९४२ ते १९४५ या काळात ते इंग्लंडमध्ये 'कॉस्मिक रे रिसर्च इन्स्टिट्यूट', 'सायन्स इन्स्टिट्यूट' आणि काही प्रसिद्ध रिसर्च सेंटर्समध्ये काम करीत होते. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा फायदा भारताला झाला.



डॉ. भाभांनी भारतातील संशोधन केंद्रे विकसित करण्याचा प्रयत्न केला. अणुशक्तीचा विकास संहारासाठी नाही; तर देशाच्या प्रगतीसाठी झाला पाहिजे, असे त्यांचे विचार होते. त्यांनी अमेरिकेच्या साहाय्याने ऑगस्ट १९६२ मध्ये तारापूर येथे अणुशक्ती केंद्र स्थापन केले. त्यानंतर राजस्थानमधील प्रतापसागरमध्ये दुसरे प्रकल्पकेंद्र उभारले. तिसरा अणुप्रकल्प मद्रास येथील कल्पक्कम् येथे उभारला. १९५५ पर्यंत कोणीही अणुपासून विद्युत निर्मीती केलेली नव्हती. डॉ. भाभांजवळ दूरदृष्टी होती.



भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू यांनी डॉ. भाभांच्या कार्याची दखल घेतली व त्यांना भारत सरकारकडून आर्थिक सुविधा पुरवून प्रोत्साहन दिले. २६ ऑगस्ट १९४७ मध्ये भारत सरकारने डॉ. भाभांना 'अणुसंशोधन कौन्सिल'चे जनरल सेक्रेटरी हे पद बहाल केले. नंतर ते त्याचे अध्यक्ष झाले. त्यांनी आण्विक शक्ती संदर्भात भरीव कार्य केले.



४ ऑगस्ट १९५६ मध्ये पहिली भारतीय अणुभट्टी अप्सरा कार्यान्वित झाली डॉ. भाभांचे अणुसंशोधनातील कार्य लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना सर्वोच्च पुरस्कार 'भारतरत्न' देऊन त्यांचा गौरव केला. पटणा विद्यापीठातर्फे त्यांना डॉक्टरेट मिळाली. हॉफकीन पुरस्कार, पद्मभूषण, मेधनाद साहा सुवर्णपदक, लखनौ, अहमदाबाद, केंब्रिज व अन्य विद्यापीठांकडून 'डॉक्टर ऑफ सायन्स' ही पदवी त्यांना मिळाली. अणुशक्तीचा विकास देशाच्या शांततेसाठी व्हावा, यासाठी झटणाऱ्या या संशोधकाचा अपघाती मृत्यू झाला.


भारतीय विज्ञान जगाला अनुऊर्जा   देणारे यांनी शांततावादी वैज्ञानिकाप्रमाणे काम केले . चिन सारख्‍या देशांनी अनुबाॅम्‍ब बनविल्‍यावर भारताने पण अनुउर्जा संपन्‍न व्‍हावे असा  सल्‍ला त्‍यांनी दिला होता . आज वाळवंटातील जमीनीला अनुउर्जेव्‍दारे सुपीक बनविण्‍यात जे यश मिळाले आहे त्‍याचे श्रेय डॉ होमी भाभा यांनाच जाते . 

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका  धन्‍यवाद

निबंध  2 (400 शब्दात)


भारतीय अणुयुगाचे शिल्पकार म्हणून डॉ. होमी भाभा यांचे नाव मोठ्या सन्मानाने घेतले जाते. भारतीय अणुसंशोधनाचा पाया डॉ. भाभांनी रचल्यामुळेच पुढे भारताला अणुवीजनिर्मिती, अणुबाँबस्फोट, अंतराळात उपग्रह उड्डाण हे सारे शक्य झाले, याचा आपल्याला कधीच विसर पडणार नाही.


डॉ. होमी भाभांचा जन्म ३० ऑक्टोबर १९०९ रोजी एका सधन पारशी कुटुंबात झाला. अत्यंत तल्लख बुद्धीमुळे होमी वयाच्या १५ व्या वर्षी सिनियर केंब्रिजची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर केंब्रिज युनिव्हर्सिटीतून त्यांनी वयाच्या २५ व्या वर्षी डॉक्टरेट मिळविण्याचा विक्रम केला. त्यांनी अनेक पारितोषिके व शिष्यवृत्त्या मिळविल्या. त्यानंतर मात्र ते भारतात परत आले आणि बंगलोरला डॉ. रामन यांच्या संशोधन शाळेत त्यांनी आपले संशोधनकार्य चालू ठेवले. त्यानी विश्वकिरणाच्या अधिक सशोधनाला सुरुवात केली.


 १९४५ मध्ये 'टाटा मुलभूत संशोधन संस्थे'ची स्थापना झाली आणि डॉ.होमी भाभा या संस्थेचे संचालक झाले. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाल्यावर पंडित नेहरूंनी अणुशक्तीचे महत्त्व ध्यानात घेऊन 'अणुशक्ती मंडळाची स्थापना केली. मंडळाच्या अध्यक्षपदी अर्थातच डॉ. होमी भाभा होते. 'अणुशक्तीचा शांततामय विधायक कार्यासाठी वापर' हे या मंडळाचे उद्दिष्ट होते. अशा तव्हेने अणुविज्ञानाच्या दालनात भारताने पदार्पण केले.


१९५४ मध्ये तुर्भे येथे 'अणुशक्ती संशोधन केंद्रा'ची उभारणी झाली. आणि १९५६ मध्ये 'अप्सरा' या आशिया खंडातील पहिल्या अणुभट्टीची स्थापना झाली. हिरोशिमा, नागासाकी येथे अणुशक्तीची, संहार करण्याची ताकद जगाला दिसली होती. पण या प्रचंड शक्तीचा वापर विधायक कार्यासाठी करता येतो, यावर डॉ. होमी भाभांचा विश्वास होता. त्यामुळे त्यांनी अणुऊर्जेचा वापर विजनिर्मितीकरिता, शांततामय कारणांकरिता करता येतो हे सिद्ध करून दाखविले.



अणुभट्टीच्या उभारणीबरोबरच त्यासाठी लागणारे इंधन, जड पाणी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आदी गोष्टी भारतातच उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्याबाबतच्या योजनाही डॉ. भाभांनी राबविल्या. तारापूर अणुनिर्मिती प्रकल्पाची आखणीही डॉ. भाभा यांनीच केली.  डॉ. भाभा यांनी अनेक निबंध लिहिले, खूप पुस्तके लिहिली, अनेक विज्ञानविषयक परिसंवादांत भाग घेतला. त्यांनी अल्पावधीत अणुशास्त्रात भारताची एवढी प्रगती करून दाखविली की बडी राष्ट्रे आश्चर्यचकित झाली. डॉ. भाभांनी अनेक विद्वत्तापूर्ण भाषणे दिली. ते उत्तम वक्ते होते. चित्रकलेचे त्यांना चांगले अंग होते. त्यांनी अनेक चित्रे काढली आहेत, तसेच चित्रकारांच्या चित्रांचा संग्रह केला आहे.



कामाच्या व्यापात संगीताची आवड मात्र त्यांना जोपासता आली नाही. विज्ञानाच्या संशोधनात मग्न असणाऱ्या या शास्त्रज्ञाला चित्र, शिल्प, संगीत अशा कलांचीही जाण होती, हा दुर्मिळ योग होय. एक बुद्धिमान आणि अतिशय रसिक असे कलाकाराचे व्यक्तिमत्त्व डॉ. होमी भाभांना लाभले होते. त्यांनी अणुयुगाची पहाट आपल्या कर्तृत्वाने भारताला दाखविली आणि या क्षेत्रातील अग्रगण्य अशा इतर बड्या राष्ट्रांच्या पंगतीला भारताला नेऊन बसविले. दुर्दैवाने या अणुशास्त्रज्ञाचे १९६६ मध्ये एका विमान अपघातात निधन झाले.

परंतु त्यांनी लावलेला अणुसंशोधनाचा दीप मात्र दिवसेंदिवस अधिकाधिक प्रज्वलित होऊन भारताची या क्षेत्रात झपाट्याने प्रगती करीत आहे. जगात भारताची शान वाढवण्यात, मान उंच करण्यात डॉ. होमी भाभा यांचा सिंहाचा वाटा आहे.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

होमी भाभा मराठी निबंध | doctor homi bhabha marathi nibandh

 होमी भाभा मराठी निबंध | doctor homi bhabha marathi nibandh


निबंध 1 ( 550 शब्दात )


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण होमी भाभा  मराठी निबंध बघणार आहोत. स्‍वतंत्र भारताला परमाणु विज्ञान क्षेत्रात महत्‍वाचे स्‍थान मिळवुन देण्‍याचा गौरव डॉ. होमी भाभा यांनी केला जोपर्यत गरीब राष्‍ट्राला अनुविज्ञान वापरनार नाहीत तोपर्यंत ते आर्थीक व औद्योगीक प्रगती करू शकणार नाहीत त्‍यांच्‍या जन्‍मापासुन भारताला अनुउर्जा प्रदान करण्‍यापर्यतचा प्रवास या निबंधामध्‍ये सविस्‍तर पणे स्‍पष्‍ट केला आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला . 

doctor-homi-bhabha-marathi-nibandh
doctor-homi-bhabha-marathi-nibandh



मुंबईमधील एका पारसी कुटुंबात ३० ऑक्टोबर १९०९ मध्ये डॉ. होमी भाभा यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा म्हैसूर राज्यात दिवाण होते. त्यांचे वडील टाटा उद्योग समुहात वरीष्ठ अधिकारी होते. होमी भाभांना लहानपणापासून शास्त्रीय संगीताची आवड होती. ते लहान असताना जेव्हा रडत असत, तेव्हा त्यांचे माता-पिता त्यांना शास्त्रीय संगीत ऐकवत असत. ते संगीत ऐकताच ते आपले रडणे थांबवीत असत. चित्रकला हा त्यांचा आवडता छंद होता. त्यांनी त्यांच्या आईचे चित्र काढून त्यांना भेट देऊन चकित केले होते.



डॉ. भाभा जॉन कॉर्नन इंग्लिश स्कूलमध्ये शिकले. अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी म्हणून जैं वाचण्यासाठी देत. ती पुस्तके वाचून ते प्रयोग करीत असत. ते अत्यंत जिज्ञासू वृत्तीचे असल्याने प्रयोग करण्यात रममाण होत.

डॉ. भाभा इंटरच्या वर्गात शिकत होते. तेव्हा अमेरिकन शास्त्रज्ञ डॉ. एच्. कॉम्प्टन मुंबईत येणार होते. त्यांच्या भाषणाचा लाभ डॉ. भाभा यांना झाला. त्यांनी अॅटॉमिक शास्त्रज्ञ होण्याचा निर्णय घेतला. त्यांचा निर्णय भविष्यकाळात योग्य ठरला.


गणित हा डॉ. भाभांचा आवडता विषय. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की आपला मुलगा इंजिनियर व्हावा, म्हणून वडिलांनी त्यांना वयाच्या सतराव्या वर्षी इंग्लंडमधील अभियांत्रिकी महाविद्यालयात पाठविले. तेथे गेल्यावर डॉ. भाभांनी एकाच वेळी महत्त्वाच्या पाच विषयांची परीक्षा दिली व त्यात उत्तम यश संपादन केले. त्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून डॉक्टरेट ही पदवी संपादन केली. त्यासाठी त्यांचा पदार्थविज्ञान हा विषय होता. त्यांना न्यूटन शिष्यवृत्ती मिळाली. त्यांनी पदार्थ विज्ञान या विषयात संशोधन केले.



वयाच्या ३१ व्या वर्षी त्यांना फेलोशिप मिळाली. त्याच वेळी भारतात आण्विक सायन्सची ओळख झाली होती. पण प्रयोग करून पाहिल्याशिवाय हा विषय समजणे कठीण असल्याने भाभांनी 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फन्डामेंटल रिसर्च संस्थे'ची मुंबई येथे स्थापना केली. डॉ. भाभा भौतिकशास्त्र विषय शिकवत. १९४२ ते १९४५ या काळात ते इंग्लंडमध्ये 'कॉस्मिक रे रिसर्च इन्स्टिट्यूट', 'सायन्स इन्स्टिट्यूट' आणि काही प्रसिद्ध रिसर्च सेंटर्समध्ये काम करीत होते. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा फायदा भारताला झाला.



डॉ. भाभांनी भारतातील संशोधन केंद्रे विकसित करण्याचा प्रयत्न केला. अणुशक्तीचा विकास संहारासाठी नाही; तर देशाच्या प्रगतीसाठी झाला पाहिजे, असे त्यांचे विचार होते. त्यांनी अमेरिकेच्या साहाय्याने ऑगस्ट १९६२ मध्ये तारापूर येथे अणुशक्ती केंद्र स्थापन केले. त्यानंतर राजस्थानमधील प्रतापसागरमध्ये दुसरे प्रकल्पकेंद्र उभारले. तिसरा अणुप्रकल्प मद्रास येथील कल्पक्कम् येथे उभारला. १९५५ पर्यंत कोणीही अणुपासून विद्युत निर्मीती केलेली नव्हती. डॉ. भाभांजवळ दूरदृष्टी होती.



भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू यांनी डॉ. भाभांच्या कार्याची दखल घेतली व त्यांना भारत सरकारकडून आर्थिक सुविधा पुरवून प्रोत्साहन दिले. २६ ऑगस्ट १९४७ मध्ये भारत सरकारने डॉ. भाभांना 'अणुसंशोधन कौन्सिल'चे जनरल सेक्रेटरी हे पद बहाल केले. नंतर ते त्याचे अध्यक्ष झाले. त्यांनी आण्विक शक्ती संदर्भात भरीव कार्य केले.



४ ऑगस्ट १९५६ मध्ये पहिली भारतीय अणुभट्टी अप्सरा कार्यान्वित झाली डॉ. भाभांचे अणुसंशोधनातील कार्य लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना सर्वोच्च पुरस्कार 'भारतरत्न' देऊन त्यांचा गौरव केला. पटणा विद्यापीठातर्फे त्यांना डॉक्टरेट मिळाली. हॉफकीन पुरस्कार, पद्मभूषण, मेधनाद साहा सुवर्णपदक, लखनौ, अहमदाबाद, केंब्रिज व अन्य विद्यापीठांकडून 'डॉक्टर ऑफ सायन्स' ही पदवी त्यांना मिळाली. अणुशक्तीचा विकास देशाच्या शांततेसाठी व्हावा, यासाठी झटणाऱ्या या संशोधकाचा अपघाती मृत्यू झाला.


भारतीय विज्ञान जगाला अनुऊर्जा   देणारे यांनी शांततावादी वैज्ञानिकाप्रमाणे काम केले . चिन सारख्‍या देशांनी अनुबाॅम्‍ब बनविल्‍यावर भारताने पण अनुउर्जा संपन्‍न व्‍हावे असा  सल्‍ला त्‍यांनी दिला होता . आज वाळवंटातील जमीनीला अनुउर्जेव्‍दारे सुपीक बनविण्‍यात जे यश मिळाले आहे त्‍याचे श्रेय डॉ होमी भाभा यांनाच जाते . 

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका  धन्‍यवाद

निबंध  2 (400 शब्दात)


भारतीय अणुयुगाचे शिल्पकार म्हणून डॉ. होमी भाभा यांचे नाव मोठ्या सन्मानाने घेतले जाते. भारतीय अणुसंशोधनाचा पाया डॉ. भाभांनी रचल्यामुळेच पुढे भारताला अणुवीजनिर्मिती, अणुबाँबस्फोट, अंतराळात उपग्रह उड्डाण हे सारे शक्य झाले, याचा आपल्याला कधीच विसर पडणार नाही.


डॉ. होमी भाभांचा जन्म ३० ऑक्टोबर १९०९ रोजी एका सधन पारशी कुटुंबात झाला. अत्यंत तल्लख बुद्धीमुळे होमी वयाच्या १५ व्या वर्षी सिनियर केंब्रिजची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर केंब्रिज युनिव्हर्सिटीतून त्यांनी वयाच्या २५ व्या वर्षी डॉक्टरेट मिळविण्याचा विक्रम केला. त्यांनी अनेक पारितोषिके व शिष्यवृत्त्या मिळविल्या. त्यानंतर मात्र ते भारतात परत आले आणि बंगलोरला डॉ. रामन यांच्या संशोधन शाळेत त्यांनी आपले संशोधनकार्य चालू ठेवले. त्यानी विश्वकिरणाच्या अधिक सशोधनाला सुरुवात केली.


 १९४५ मध्ये 'टाटा मुलभूत संशोधन संस्थे'ची स्थापना झाली आणि डॉ.होमी भाभा या संस्थेचे संचालक झाले. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाल्यावर पंडित नेहरूंनी अणुशक्तीचे महत्त्व ध्यानात घेऊन 'अणुशक्ती मंडळाची स्थापना केली. मंडळाच्या अध्यक्षपदी अर्थातच डॉ. होमी भाभा होते. 'अणुशक्तीचा शांततामय विधायक कार्यासाठी वापर' हे या मंडळाचे उद्दिष्ट होते. अशा तव्हेने अणुविज्ञानाच्या दालनात भारताने पदार्पण केले.


१९५४ मध्ये तुर्भे येथे 'अणुशक्ती संशोधन केंद्रा'ची उभारणी झाली. आणि १९५६ मध्ये 'अप्सरा' या आशिया खंडातील पहिल्या अणुभट्टीची स्थापना झाली. हिरोशिमा, नागासाकी येथे अणुशक्तीची, संहार करण्याची ताकद जगाला दिसली होती. पण या प्रचंड शक्तीचा वापर विधायक कार्यासाठी करता येतो, यावर डॉ. होमी भाभांचा विश्वास होता. त्यामुळे त्यांनी अणुऊर्जेचा वापर विजनिर्मितीकरिता, शांततामय कारणांकरिता करता येतो हे सिद्ध करून दाखविले.



अणुभट्टीच्या उभारणीबरोबरच त्यासाठी लागणारे इंधन, जड पाणी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आदी गोष्टी भारतातच उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्याबाबतच्या योजनाही डॉ. भाभांनी राबविल्या. तारापूर अणुनिर्मिती प्रकल्पाची आखणीही डॉ. भाभा यांनीच केली.  डॉ. भाभा यांनी अनेक निबंध लिहिले, खूप पुस्तके लिहिली, अनेक विज्ञानविषयक परिसंवादांत भाग घेतला. त्यांनी अल्पावधीत अणुशास्त्रात भारताची एवढी प्रगती करून दाखविली की बडी राष्ट्रे आश्चर्यचकित झाली. डॉ. भाभांनी अनेक विद्वत्तापूर्ण भाषणे दिली. ते उत्तम वक्ते होते. चित्रकलेचे त्यांना चांगले अंग होते. त्यांनी अनेक चित्रे काढली आहेत, तसेच चित्रकारांच्या चित्रांचा संग्रह केला आहे.



कामाच्या व्यापात संगीताची आवड मात्र त्यांना जोपासता आली नाही. विज्ञानाच्या संशोधनात मग्न असणाऱ्या या शास्त्रज्ञाला चित्र, शिल्प, संगीत अशा कलांचीही जाण होती, हा दुर्मिळ योग होय. एक बुद्धिमान आणि अतिशय रसिक असे कलाकाराचे व्यक्तिमत्त्व डॉ. होमी भाभांना लाभले होते. त्यांनी अणुयुगाची पहाट आपल्या कर्तृत्वाने भारताला दाखविली आणि या क्षेत्रातील अग्रगण्य अशा इतर बड्या राष्ट्रांच्या पंगतीला भारताला नेऊन बसविले. दुर्दैवाने या अणुशास्त्रज्ञाचे १९६६ मध्ये एका विमान अपघातात निधन झाले.

परंतु त्यांनी लावलेला अणुसंशोधनाचा दीप मात्र दिवसेंदिवस अधिकाधिक प्रज्वलित होऊन भारताची या क्षेत्रात झपाट्याने प्रगती करीत आहे. जगात भारताची शान वाढवण्यात, मान उंच करण्यात डॉ. होमी भाभा यांचा सिंहाचा वाटा आहे.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद