पर्यावरण आणि मानवी जीवन मराठी निबंध | paryavaran ani manvi jivan nibandh marathi

पर्यावरण आणि मानवी जीवन मराठी निबंध | paryavaran ani manvi jivan nibandh marathi

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पर्यावरण आणि मानवी जीवन मराठी निबंध बघणार आहोत.या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. पर्यावरण म्हणजे मानवाच्या सभोवतालची परिस्थिती किंवा सजीवांच्या वसतिस्थानाभोवती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या परिणाम करणाऱ्या घटकांचे भूजैविक दृश्य. पर्यावरण, वने, पर्वत, सरोवर, झाडे, जल यांचा मनुष्याच्या जीवनावर परिणाम होत असतो. 


पृथ्वी हा ग्रहच फक्त पर्यावरण आढळणारा आहे. त्यामुळे मनुष्य, प्राणिसृष्टी, यांच्या जीवनाचे संरक्षण होते, जीवन व्यतीत करणाऱ्या ऋषिमुनींनी आपल्या वंशजांसाठी अगोदरच वराहपुराणात लिहून ठेवले आहे की,

"यावत् भूमंडलात धते, ससैलवनकाननम् ।

तावत् तिष्ठन्ति मेदिन्यां, संततिः पुत्रपौतृकी ।।" 


जोपर्यंत या भूतलावर पर्वत, वने, सरोवर आहेत तोपर्यंत तुम्ही तुमची मुले व भावी पिढ्या सुखाने जगतील.परतु या कृतघ्न माणसाने पर्यावरणाचा, परिणामी स्वतःचा नाश ओढवून घेतलाय, हे स्वतःच्या पायावर कु-हाड मारण्यासारखे आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. लोकसंख्येचा विस्फोट होत आहे.


उद्योगीकरण, शहरीकरण, नैसर्गिक साधनसंपत्तीचा अविचारी वापर या सर्वांमुळे विनाश ओढवला आहे. मनुष्याच्या हव्यासापोटी हे सर्व घडतेय. गांधीजींनी म्हटलं होत की, "There is sufficiency in the world for man's need but not for man's greed."


सरपण, वनौषधी, कागदासाठी लागणारा बांबू, इमारत लाकूड, उद्योगधंद्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल इत्यादीसाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाली जमिनीवरील वृक्षांचे आच्छादन गेल्यामुळे, मातीची धूप होते आहे. वृक्षसंपत्ती कमी झाल्यामुळे पावसाचे प्रमाणही कमी होत आहे. 


परिणामी देशाच्या अर्थव्यवस्थेवरचा ताण वाढतो आहे.महाराष्ट्रात जुलै २००५ मध्ये अनेक भागांत अतिवृष्टी झाली. नदी पर्यावरणात होणारा अनिबंध मानवी हस्तक्षेप हा या संकटामागचा मुख्य घटक आहे. मुंबईसारख्या महानगरात विक्रमी पर्जन्यानंतर, पावसाच्या पाण्याला साचून राहण्याशिवाय गत्यंतरच नाही अशी परिस्थिती होती.


मानव या २१ व्या शतकात यशस्वी वाटचाल करीत असताना ही सृष्टी अडकली आहे. प्रदूषणरूपी प्रलयामध्ये! जेव्हा भौतिक, रासायनिक आणि जीवशास्त्रीय बदल वातावरणात घडून येतात. जे मनुष्याच्या अस्तित्वालाच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या ग्रहण लावतात त्यालाच प्रदूषण म्हणतात


हवेचे, पाण्याचे, आवाजाचे प्रदूषण औद्योगिक कारखान्यातून बाहेर पडणारे वायू, वाहनांतून बाहेर पडणारे कार्बनडॉयऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड यामुळे प्रदूषण वाढले आहे.१९८४ ची भोपाळ वायू दुर्घटना तसेच चेर्नोबिलच्या अणुभट्टीतील स्फोट लक्षात घेतल्यास वायू प्रदूषण किती गंभीर समस्या आहे 


हे वेगळे सांगण्याची गरज नाही पाण्यास आपण जीवन म्हणतो आणि तेच पाणी कारखान्यांतील टाकाऊ घटक, शहरी वस्त्यांतील सांडपाणी याद्वारे प्रदूषण करतो. परंतु


"पिबन्ति नद्यःस्वयमेव नाम्भः ।

स्वयं न खादन्ति फलानि वृक्षा ।।' 


म्हणजे नद्या स्वतःचे पाणी पीत नाहीत, झाडे स्वतःची फळे खात नाहीत, त्यांचे जीवन परोपकार करण्यासाठीच असते. मग किती कृतघ्न आहे हा मनुष्य ! असेच मनात येते.'ओझोन' म्हणजे जणू पृथ्वीचा आत्माच ! त्याच्यामुळे पृथ्वीचे आयुष्यमान व तापमान स्थिर राहण्यास मदत होते. 


परंतु गेल्या काही वर्षात ओझोनच्या थरास छिद्र पडल्याचे दिसून येऊ लागले आहे. मानवनिर्मिती काही वायूंमुळे 'ओझोन' वायू नाश होऊ लागला आहे. क्लोरो कार्बन, फ्रियॉन गॅस, कार्बन टेट्रा क्लोराईड, हॅलोजन गॅस हे ओझोनचे शत्रू आहेत.


तसेच हरितगृह परिणाम याचाही प्रामुख्याने विचार करावा लागेल. पृथ्वीचे तापमान वाढण्यास कारणीभूत ठरलेल्या वायूंना हरितगृह वायू म्हणतात."In nature there are no rewards or punishments. There are only onsequences."त्यामुळे पर्यावरण संरक्षण आपल्या श्वासाइतके महत्त्वाचे आहे. 


पर्यावरणाचा समतोल राखण्याचा पहिला उपाय म्हणजे जंगलतोड थांबविणे. आणि वनीकरण करणे म्हणजे सुंदरलाल बहुगुणांच्या चिपको आंदोलन पासून प्रेरणा घेऊन त्यादृष्टीने लोकांमध्ये जागृती करणे. तसेच शेतजमिनीवर वृक्षांची व पिकांची एकत्रित लागवड म्हणजेच वनशेती केल्यास पर्यावरणाचा समतोल साधण्यास मदत होईल. 


तसेच वातावरणात जास्त झालेल्या कार्बनडायऑक्साइडचे वृक्षांमार्फत शोषण होते, त्याला 'कार्बन सिक्वेट्रेशन' म्हणतात. म्हणून झाडे लावणे आणि वनस्पती निर्माण करणे ही मूलभूत बाब बनली आहे.


१६ फेब्रुवारी २००५ रोजी अस्तित्वात आलेल्या 'क्योटो करारा'ने प्रगती तसेच विकसनशील देशांना वायूंच्या उत्सर्जनाच्या मर्यादा ठरवून दिल्या आहेत. भारतासारख्या देशात निलगिरी सुबाभूळ या पटकन वाढणाऱ्या वृक्षांपेक्षा उंबर, जांभूळ, वड ही झाडे 'कार्बन सिक्वेट्रेशन' अधिक उपयुक्त आहेत.


तसेच प्रदूषणाबाबत कडक निर्बंध लागू करण्यात यावेत. अलीकडेच ध्वनिक्षेपकांच्या वापराबाबत काही कायदे संमत झाले आहेत. त्याची कठोरपणे अंमलबजावणी गरजेची आहे. वातानुकूलित यंत्रे, रेफ्रिजरेटर्स, वॉटर कलर्स ही उपकरणे वापरताना त्यामधून कोणत्याही वायूची गळती होता कामा नये हे महत्त्वाचे आहे. 


अन्यथा छोटीशी गळतीदेखील कालांतराने 'ओझोन'च्या सर्वनाशास जबाबदार ठरू शकते. 'सुनिता नारायण' या दिल्लीतील सेंटर फॉर सायन्स अॅन्ड एन्व्हॉयरॉनमेन्ट (सीएसई) च्या संचालिका आहेत. सीएसईच्या प्रयत्नामुळे दिल्लीबरोबर मुंबई आणि अन्य काही शहरांमध्ये नैसर्गिक आणि द्रवरूप वायूचा पर्यायी इंधन म्हणून वापर स्थिरावतो आहे.


वेगवेगळ्या उपाययोजनांची अंमलबजावणी करून पर्यावरणाचे संरक्षण करणे हे मनुष्य व प्राणिसृष्टीसाठी हितकारक आहे.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध 2 

पर्यावरण आणि मानवी जीवन मराठी निबंध | paryavaran ani manvi jivan nibandh marathi

भरपूर पीक येऊ दे. परंतु आत्ता मात्र वेळेवर, पुरेसा पाऊस पडेलच अशी खात्री देता येत नाही. एवढेच नाही तर कोणती नैसर्गिक आपत्ती केव्हा कोसळेल हे सांगता येत नाही. पावसाचे प्रमाणही फार कमी झाले आहे. याचे कारण काय तर म्हणे'पर्यावरणाचा समतोल ढासळला' असं सर्वजण सांगतात. 


आज़ मानव आपल्या सोयीसाठी सर्व वने नष्ट करत चालला आहे. त्यामुळे प्रसिद्ध संशोधक प्रफुल्ल बिडवाई यांच्या मते भारतातील सर्व जमिनी जैविकदृष्टया मृत झाल्या आहेत, त्यामुळेच जमिनींची पाणी धरून ठेवण्याची क्षमता नष्ट झाली आहे.' तसेच ओझोनच्या वाढत्या छिद्रामुळे माणसांना अनेक शारीरिक विकारांना तोंड द्यावे लागणार आहे.


आज वाढलेल्या लोकसंख्येमुळे, वाहतुकीच्या साधनांमुळे, विविध कारखान्यांमुळे हवेचे प्रदूषण वाढले आहे. पर्यावरणाच्या या प्रदूषणामुळे माणसाचे आरोग्य खालावणार आहे. स्वच्छ व उत्साहवर्धक पर्यावरणामुळे मिळणारे समाधान, आनंद कायमचे नष्ट होणार आहे. पर्यायाने मानवाला खऱ्या अर्थाने जगण्यासारखे असे हे विश्वच उरणार नाही. 


याउला झाडे लावा, झाडे जगवा' असा आदेश शासनाने दिला आहे. कारण झाडे हे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करतात. वृक्ष हवेतील विषारी कण पकडून ठेवतात. दूषित हवेत जादा प्राणवायू सोडून झाडे हवा शुद्ध करतात. झाडे आपल्या आजूबाजूला हवेत तात्पुरती स्तब्धता निर्माण करतात, त्यामुळे दूषित कण जमिनीवर उतरतात.


दुर्गंधीयुक्त हवा शुद्ध करण्याचे कार्य वृक्ष करतात. प्रदूषित हवेत शुद्ध हवा मिसळून झाडे हवेचा दूषितपणा कमी करण्यास मदत करतात. पर्यावरणाचा समतोल राखण्याचा किंवा पर्यावरण संरक्षणाचा सोपा उपाय म्हणजे जंगलतोड थांबवणं व वनीकरण करणं. 


पर्यावरणतज्ज्ञ डॉ. स्वामीनाथन यांच्या मते भारतात ५० वर्षांपूर्वीच्या तुलनेत फक्त अर्धेच वनक्षेत्र उरले आहे.' वृक्षसंपत्तीच्या वाढीकरिता वनशेतीचा विचार करणे आवश्यक आहे. वनशेतीत मोठी झाडे लावली जातात, कारण मोठ्या झाडाखाली झुडुपे वाढतात. 


सर्वांना सूर्यप्रकाश मिळू शकतो. पण अलीकडे वनशेती म्हणजे निव्वळ निलगिरी, साग, सुबाभुळ लावायची पद्धत रुढ झाली आहे. ही नैसर्गिक वनशेती नव्हे. वनशेतीमध्ये पिके व मोठी झाडे यांचे सहजीवन असते. वनशेतीची कल्पना प्राचीन कृषिशास्त्रामध्ये आढळून आली आहे. 


शेतात पिकाबरोबर किमान शेताच्या बांधावर तरी झाडे वाढविण्यास सांगितले आहे. कारण झाडांपासून फायदे मिळतातच, पण पिकांचे किडींपासून संरक्षण होते. जमिनीची होणारी धूप, शेतीचे होणारे नुकसान व जमिनीच्या कसावर होणारा परिणाम वनीकरणाने आपण टाळू शकतो. 


शेतातून वाहणाऱ्या नद्या, ओढे, नाले यांच्या दुतर्फा झाडे लावली पाहिजेत. कारण मोठा पाऊस पडल्यावर शेतातली चांगली मातीही वाहून नेली जाते. ही ओढ्याकाठची झाडे आपल्या मुळांनी माती पकडून ठेवतील. जमिनीची धूप कमी होईल, 


तुकारामांचे वचन'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। शास्त्रीय दृष्टिकोनातूनही किती सार्थ आहे नाही? पर्यावरण संरक्षण आपल्या श्वासाइतकं महत्त्वाचं आहे. पर्यावरण संरक्षण हे मानवाचे जीवित आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका 



निबंध 3 

पर्यावरण आणि मानवी जीवन मराठी निबंध | paryavaran ani manvi jivan nibandh marathi


आजकाल पर्यावरण हा शब्द बराच प्रचलित झाला आहे.नद्या या साऱ्यांचे अस्तित्व. पृथ्वीचे पर्यावरण सजीवांना रहाण्यास उपयक्त आहे. केवळ पृथ्वीचेच पर्यावरण, वातावरण सजीवांना मानवते. त्यामळे इतर ग्रहांवर प्राणिमात्र नाहीत अन् पृथ्वीवर आहेत. परंतु गेल्या काही दशकांत या पर्यावरणाची उपेक्षा झाली, त्याचा तोल ढळू लागला.


पर्यावरणाचा तोल आणखी ढळू द्यावयाचा नाही, यासाठी वसुंधरा परिषदही झाली, आणि तोडगा काढण्याचे प्रयत्न झाले. सभोवतालचा निसर्ग सर्वांनाच हवाहवासा वाटत असतो. मानव व निसर्ग यांचे एक अतूट नाते असते. निसर्ग हा मानवाचे प्रेरणास्थान आहे. वनस्पती, वृक्ष नसतील तर मानवाचे अस्तित्वच धोक्यात येईल. 


म्हणून ते आपले निसर्गधन आहे.'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे' असे तुकाराम महाराजांनीही सांगून ठेवले आहे. हे निसर्गधन वाचविण्याची धडपड शासनाप्रमाणेच समाजानेही करायला हवी. आज शहरातून इमारतींची जंगले वाढीस लागली आहेत.


माणूस आपल्या सुखासाठी वने नष्ट करीत आहे अन् त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे, जमिनीची धूप होत आहे, पावसाचे प्रमाण कमी होऊ लागले आहे, वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन दूषित वायू वाढत आहेत. आजच्या विज्ञानयुगात मानव निसर्गापासून दूर चालला आहे. 



परिणामत: दूषित हवा, वायूप्रदूषण, दुष्काळ असे दुष्परिणाम त्याला भोगावे लागत आहेत. जंगलतोडीमुळे मानवाचा नैसर्गिक पर्यावरणाशी असलेला संबंध तुटू लागला आहे. अशा वातावरणात हळूहळू मानवाला जगणे कठीण होईल. आज कारखानदारी खूप वाढली आहे. 


त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हवेचे प्रदूषण होते. वाढती लोकसंख्या, शहरातील झोपडपट्ट्या या साऱ्यांमुळे प्रदूषण वाढत जात आहे आणि पर्यावरणाची नासधूस होते आहे. वाढत्या प्रदूषणामुळे कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण वाढत चालले असून तो ओझोन वायूवर अतिक्रमण करीत आहे आणि हा ओझोन वायू पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी आवश्यक असतो.


अशा त-हेच्या पर्यावरणाच्या नाशाची भयानकता माणसांनी जाणून घ्यायला हवी. या विचारातून आजकाल निसर्गाच्या सान्निध्यात म्हणून पर्यटनाला जाण्याची प्रथा वाढत चालली आहे. पण या पर्यटकांमुळे त्या ठिकाणच्या निसर्गावर पर्यावरणावर, माणसांवर अनेक प्रकारचे दबाव येत आहेत. त्याचा पर्यावरणावर फार परिणाम होत आहे.


माणसांच्या प्रचंड प्रमाणावरील उलाढालीमुळे पृथ्वीतलावरील पर्यावरणाचा समतोल डळमळीत होण्याची शक्यता वाढीस लागली आहे. वन्य प्राण्यांसाठी राखलेल्या अभयारण्यात पर्यटकांचे लोंढे येतात. त्यामुळे तेथील पशुपक्षी यांची संख्या रोडावली आहे. 


समुद्रकिनाऱ्यांची अवस्था तर फारच बिकट झाली आहे. समुद्र आणि किनारा यांमधील पर्यावरणीय समतोल हा अतिशय नाजूकपणे संभाळला गेलेला असतो. पण आजकाल पर्यटकांसाठी बांधली जाणारी हॉटेल्स, वॉटर स्पोर्टस् यामुळे समुद्रकिनारे गजबजू लागले आहेत. 


अंदमान निकोबार येथील पर्यावरण अक्षरश: उध्वस्त झालेले दिसते. मोठमोठे बाजार, कॅसिनो, हॉटेल्स यांमुळे तेथील निसर्ग बिचारा अगदी आक्रसून गेला आहे, अनेक जातींच्या वनस्पती नाहीशा होत आहेत. प्रवाळाबरोबर तर अक्षरश: घालाच घातला गेला आहे.याहून दयनीय अवस्था डोंगरांची, पर्वतराजीची झाली आहे. 


तेथील पर्यावरण फार ढवळून निघाले आहे. डोंगर उघडे पडले आहेत, झाडे, वनस्पती कमी झाल्या आहेत, प्राणी नाहीसे झाले आहेत, पाऊस आटला आहे. डोंगरांचा परिसर पर्यटकांनी घाणीने भरून टाकला आहे. प्लॅस्टिकच्या, काचेच्या बाटल्या, पॅकिंगचे कागद, अंड्याची टरफले, प्लॅस्टिक पिशव्या यांचे तेथे साम्राज्य आढळते. 



स्वत:च्या सुखचैनीसाठी मानव निसर्गाचा अपमान करीत आहे. यावर उपाय काय? शाळा कॉलेजातून मुलांना निसर्गाच्या समतोलाचे महत्त्व शिकवायला हवे. निसर्ग नाही, पर्यावरणाचा समतोल नाही, तर आपण नाही, मनुष्यजात नाही हे समजून घ्यायला हवे. निसर्गाबद्दलची मानसिकता व निसर्गाचा सहवास खऱ्या अर्थाने डोळस व्हायला हवा. 


महाराष्ट्रात पर्यावरण शिक्षण अत्यावश्यक करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्यात यामुळे पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण होईल आणि पुढील काही वर्षांत याचे चांगले परिणाम आपल्याला दिसू लागतील. देशभर पर्यावरण सुधारणेची लाट उसळेल. 


पर्यावरण संतुलनासाठी जंगले आवश्यक आहेत, हे ध्यानात घेऊन वृक्षतोड थांबवणे व वृक्षारोपण करणे अशा मोहिमा आजकाल हाती घेतल्या जात आहेत. बहुगुणा यांचे 'चिपको आंदोलन' झाडे वाचवण्यासाठीच होते. 'झाडे लावा, झाडे जगवा' या शासनाच्या भूमिकेमुळे पर्यावरण संतुलनास मदत होत आहे 


पर्यावरणाचा विनाश झाल्यास प्रगती साधणार नाही. पर्यावरण संरक्षण हे माणसाला श्वासोच्छवासाइतकेच महत्त्वाचे आहे. स्वच्छ व उत्साहवर्धक पर्यावरणामुळेच मानव सुखी व आनंदी जीवनाचा आस्वाद घेऊ शकेल. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .