कागदाची गोष्ट मराठी निबंध KAGDACHI GOSHAT MARATHI NIBANDH

कागदाची गोष्ट मराठी निबंध KAGDACHI GOSHAT MARATHI NIBANDH

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण कागदाची गोष्ट मराठी निबंध बघणार आहोत. कागद हा आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे ते सर्व जण जाणतात. कागद नसलेल्या जगाची कल्पना आज आपण करूच शकत नाही. लिहिल्या-वाचण्याखेरीज कागदाचे अन्य किती तरी उपयोग आहेत. 


अतिप्राचीन काळात मनुष्य दगडावर, खडकावर खोदकाम करून आपली लेखनवाचनाची हौस पुरवीत असे. परंतु कागदाचा शोध लागल्यावरही अनेक कारणांमुळे शिलालेख कोरणे चालू राहिले. अशोकाचे शिलालेख जगप्रसिद्ध आहेत.


पाषाणयुगानंतर मनुष्याने मातीच्या पाट्या व स्लेटांचा लिहिण्यासाठी उपयोग केला. ओल्या चिकण मातीवर लिहिण्यानंतर त्यांस वाळविले जाई. आणि मग भट्टीत भाजले जाई. या कामासाठी एखाद्या सोप्या साधनाचा शोध घेणे चालू राहिले. मानवे झाडांची पाने व सालींचा उपयोग लिहिण्यासाठी करू लागला, ४००० वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये लोक पेप्यिरसच्या झाडाच्या सालीचा उपयोग लिहिण्यासाठी करू लागले होते. 


ते या सालीला लांब आकारात चिटकवून वाळवून घेत आणि मग त्यावर लिहीत. इंग्रजीतील पेपर हा शब्द त्याच "पेप्यिरस" पासून निर्माण झाला आहे. भारतात भोजपत्र आणि ताडपत्रांचा उपयोग प्राचीन काळापासून लिहिण्यासाठी केला जात असे. भोजपत्रावर लिहिलेली अनेक प्राचीन पुस्तके व ग्रंथ आजही उपलब्ध आहेत.


या हस्तलिखितांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व खूप आहे. आपल्या देशात भोजपत्राला नेहमीच पवित्र मानले गेले आहे. आजही मंत्र-तंत्र लिहिण्यासाठी भोजपत्राचा उपयोग केला जातो. झाडाची पाने आणि सालीखेरीज चामड्यांचा उपयोगही लिहिण्यासाठी होऊ लागला. त्यास पार्चमेंट म्हणत. 


मध्ययुगात शेळ्या मेंढ्यांच्या कातडीपासून पार्चमेंट बनवून त्याला चौकोनी आकारात कापले जाई. नंतर त्याची पुस्तकाच्या आकारात बांधणी केली जाई व त्यावर लिहिले जाई. अशा प्रकारे पुस्तकाची निर्मिती सुरू झाली. पार्चमेंटवर एकाच बाजूने लिहिता येत असे. 


ही मध्ययुगीन पुस्तके प्रारंभी केवळ धार्मिक असत नंतर कायद्याची, औषध-शास्त्राची इतिहासाची पुस्तके तयार होऊ लागली. कागदाचा शोध चीनमध्ये लागला. यासाठी चिनी लोकांनी शहतुतच्या सालीचा उपयोग केला. पाण्यात ही साल भिजवून कुटून घेत त्यामुळे त्यातील रेषा वेगळ्या होत आणि लगदा राही. तो एका ताटात टाकून वाळविला जाई. नंतर जुने कपडे आणि बांबूच्या लगद्याचाही यात उपयोग होऊ लागला.


चिनी प्रवाशांनी आणि व्यापाऱ्यांनी ही कला समरकंदला नेली. तेथील अरबी लोकांनी ती शिकून घेतली. त्यांनी कागद बनविण्याची कला स्पेनमध्ये नेली. तिथून ती इंग्लंड व साऱ्या युरोप खंडात पसरली. हळूहळू या कलेचा विकास होत राहिला. आणि मग यात यंत्रांचा वापर होऊ लागला. 


१७९८ मध्ये सर्वप्रथम फ्रान्समध्ये कागद बनविण्याचे यंत्र तयार करण्यात आले. आज कागद तयार करण्याची मोठमोठी यंत्रे उपलब्ध आहेत. त्याद्वारे हजारो टन कागद तयार केला जातो. आज कागद तयार करण्यासाठी रद्दी कागद, गवत, जुने कपडे, चिंध्या, बांबू इत्यादी चा वापर केला जातो. 


आजही काही ठिकाणी अल्प प्रमाणात हात कागद तयार केला जातो. परंतु व्यापक प्रमाणावर यंत्रांनीच कागद तयार करतात. त्याचा खपही खूप असतो. कागदाचा पहिला कारखाना इंग्लंडमध्ये काढण्यात आला. सर्वप्रथम गवत, बांबू, चिंध्या इ. कुटून खूप बारीक करतात. नंतर त्यात वेगवेगळे मसाले (रसायने) टाकून त्याला घुसळण्यात येते. त्यामुळे त्याचा लगदा तयार होतो. 


नंतर याचाच कागद बनतो. हे सर्व काम मोठी यंत्रे करतात. अशाप्रकारे आपणास कागदाचे थान मिळतात. आवश्यकतेनुसार ते कापून रीम, दस्ते बनवितात. आज आपण जो कागद वापरतो तो चोपडा व मजबूत असतो. गुणवत्ता आणि उपयोगाच्या दृष्टीने अनेक प्रकारचा कागद तयार केला जातो. उदा. वृत्तपत्रे आणि नोटांसाठी वेगवेळ्या प्रकारचा कागद वापला जातो. 


पश्चिमात्य देशांत तर कागदाची वस्त्रे वापरतात जी. एकदा घालून फेकून देतात. कागद जसे वरदान आहे तसा तो शापही आहे. कारण त्याच्या उत्पादनासाठी वनसंपत्तीचा विनाश होतो. आज कागद उद्योग जगातील एक अत्यंत विकसित व महत्त्वाचा उद्योग झाला आहे. लाखो लोकांना यात रोजगार मिळाला आहे. 


अब्जावधी रुपये यात गुंताविण्यात आले आहेत. तरी पण कागदाचा उपयोग आपण विचारपूर्वक केला पाहिजे. जो वाया न घालविला पाहिजे. एकापेक्षा जास्त वेळा त्याचा वापर केला पाहिजे. झाडांच्या बेसुमार कापणीवर नियंत्रण ठेवले पाहिजे. संगणक, क्रेडिट कार्ड यामुळे कागदाचा वापर कमी होत आहे. 


कार्यालयात कागदविहीन काम केले जात आहे. तरी पण कागदाचे महत्त्व, उपयोग आणि वैशिष्ट्ये कायम राहतील. कागद, आपणासाठी वरदान असले तरी त्याचा उपयोग विचारपूर्वक काटकसरीनेच केला पाहिजे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद