विविध मानवाधिकार मराठी निबंध | VIVIDH MANVADHIKAR ESSAY MARATHI

 विविध मानवाधिकार मराठी निबंध | VIVIDH MANVADHIKAR ESSAY MARATHI

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  विविध मानवाधिकार मराठी निबंध बघणार आहोत. आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी निर्वेध संधी मिळणे हेच स्वातंत्र्य आहे. जो मानवाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. 


कारण मानव एक स्वतंत्र व्यक्ती म्हणूनच जन्म घेतो. परंतु विडंबना ही आहे की स्वातंत्र्यासाठी आयुष्यभर माणसाला झगडावे लागते. संघर्ष हीच मानवाची नियती आहे व राहील. संघर्ष आणि विकासाचा सर्वाधिकार हा एक महत्त्वाचा अधिकार आहे. 


मानवाला, मूलभूत, सामाजिक आणि राजकीय अधिकार असतात. यावरून एखाद्या विकसित सभ्य समाजाची पारख करता येते.मानवाधिकार हवेत निर्माण होत नसतात. कारण प्रत्येक हक्काच्या मागे काही कर्तव्येही असतात. हक्काचे फळ कर्तव्याच्या वृक्षास लागते. 


हक्क प्राप्ती-बाबत निस्पृह होऊन सतत कर्तव्य पालनाची प्रेरणा भगवान श्रीकृष्णाने गांडीवधारी अर्जुनाला "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन" या श्लोकाद्वारे दिली. संघर्ष करीत राहण्यात व कर्तव्य पालन करीत राहण्यातच मानवाधिकारांची व मानवी सभ्यतेच्या विकासाची कहाणी समाविष्ट झालेली आहे.


कुटुंब, समाज आणि शासनाचा विधिनिषेध माणसाच्या स्वातंत्र्याला पावला पावलावर अडथळे आणीत राहतो. परंतु स्वातंत्र्यप्राप्तीच्या हक्काप्रती पूर्ण निष्ठा ठेवून मनुष्य सर्व आव्हानांच्या समोर दंड थोपटून उभा राहतो आणि मानवाधिकाराच्या प्राप्तीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तो आपल्या ठरलेल्या मार्गावर पुढे चालू लागतो.


मन, वाणी आणि कर्माचे स्वातंत्र्य हा वस्तुतः माणसाचा मूलभूत हक्क आहे. कारण तो एकमेव असा जीव आहे ज्याला स्वतंत्र इच्छेचे वरदान मिळालेले आहे. त्यानुसार पुरुषार्थ गाजण्यिास तो स्वतंत्र आहे. या हक्काच्या अभावी तो गुदमरतो. त्याचे मन कुंठित होते. 


त्याला आपले जीवन नीरस, निरर्थक वाटू लागते. मानवी हक्कांचे समर्थक फ्रेंच क्रांतीचा प्रणेता रूसो अशा मानवाला पाहून म्हणतो, “Man is born free but everywhere he is a chain.”अर्थात प्रत्येक व्यक्ती स्वतंत्रपणे जन्माला येते. परंतु ती तरीही साखळ्यांना जखडलेली आहे. 


या साखळ्यांना तोडून आपल्या जन्मसिद्ध हक्काची प्राप्ती व स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहून मनुष्य आपले जीवन सार्थक करतो. पण दिसते असे की मनुष्याच्या स्वातंत्र्याच्या हक्काला अनंत सीमा आहेत. तो शरीराच्या आणि मनाच्या स्वातंत्र्याला पार करून आत्म्याला परमात्म्यासमोर आणण्याच्या हक करतो.


मानवी हक्कात अडथळे कोण आणतो? मानसशास्त्र व तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांचे असे मत आहे की, मनुष्य स्वतःच असे करतो मानसशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार तो आत्मप्रतिष्ठेमुळे असे करतो. तत्त्वज्ञान यास मायेचे फळ मानते. कवि जयशंकर प्रसाद म्हणतात, "प्रश्न स्वतः कुणासमोर येत नाहीत ... 


मनुष्यच त्यांना जीवनासाठी उपयोगी समजतो, तो स्वत:च जाळे विणतो. जीवनाचा मूलभूत उल्हास मनुष्याच्या जीवनात मांगल्य आणि सौभाग्याला आमंत्रित करतो." हा उत्साह वास्तविक मानवाचा स्वातंत्र्याचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी असतो.


वर्णभेद किंवा पाचात्य-पौर्वात्यांमधील भेदभावाच्या दुःखद अनुभवानंतर गांधीजींनी मौलिक मानवी हक्कांच्या प्राप्तीसाठी संघर्ष केला होता. ३० वर्षांनंतर भारताच्या स्वातंत्र्याच्या, रूपात त्यांना अंशत: यश मिळाले. त्यांनी जो मार्ग दाखविला त्या मार्गाने जाण्यास, मानवी हक्क मिळविण्यास संघर्ष करण्यासाठी अनेक वीर पुढे आले. 


या परंपरेत दक्षिण आफ्रिकेतील लोकनेते डॉ. नेल्सन मंडेला यांचे नाव उल्लेखनीय आहे. त्यांनी २७ वर्षे कारावासाच्या यातना सहन केल्या पण वर्णभेदाच्या नावाखाली होणारा भेदभाव नष्ट करण्यात ते बरेच यशस्वी झाले. मानवी हक्कांसाठी संघर्ष करणे हा मानवाचा धर्मच आहे. 


हीच मानवतेची शोभा आहे. खलील जिब्रान म्हणतो, "वास्तविक मोठा तोच आहे जो कुणाचे शासन मानत नाही व कुणावर शासन करीत नाही. मानव मानवावर शासन करून मानवी हक्काचे हनन करतो. त्याबरोबरच तो मानवतेचाही अपमान करतो. 


गुलामगिरीच्या रूपात मानवतेने अपमान सोसला आहे. पारतंत्र्यातील मानवता जेव्हा कण्हते तेव्हा सर्वनाश करणारे ढग क्षितिजावर दिसू लागतात." आदिम अवस्थेतील मानव साधेपणाचा आणि स्वातंत्र्याचा उपभोग जीवनभर घेत असे. भोजन, निद्रा, कामसेवन करून तो स्वतंत्रच असायचा, रूसोच्या मते, "ही एक आदर्श व्यवस्था होती.


व्यक्तिगत खाजगी संपत्तीच्या व्यवस्थेसाठी जन्माबरोबर विधिनियमांची परंपरा होती. नंतर मानवाच्या मूलभूत हक्कांच्या समोर सभ्यता आली. चांगला असभ्य मनुष्य सभ्य बनण्याच्या मोहात आपले नैसर्गिक साम्य आणि स्वातंत्र्य हरवून बसला व अनेक बंधनांत जखडला गेला. त्यानेच हे सगळे घडवून आणले. 


मनुष्याची स्थिती त्या माकडासारखी झाली, जो मूठभर चण्याच्या मोहात फसून बंधनात नसूनही बंधनात असल्याची कल्पना करून घेतो. फक्त मूठ सोडली तर तो स्वतंत्र होऊ शकतो परंतु तो असे करील तर ना? अशाच प्रकारे पारधी पोपटाला पकडतो. अज्ञानामुळेच जीव परतंत्र बनतो.


जन्मसिद्ध स्वतंत्र असलेला मनुष्य अमानवी अत्याचार आणि शोषण अनेक युगे सहन करीत आला आहे. दुसरीकडे अत्याचार आणि शोषणाला विरोधही होतच आहे. मानवी हक्कांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने काही खंबीर पावले उचलली आहेत. 


१० डिसेंबर १९४८ ला संयुक्त राष्ट्र महासभेद्वारे स्वीकृत झालेला प्रस्ताव मानवी हक्कांची हमी देतो. १० डिसेंबर हा दिवस, मानवी हक्क दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. या प्रस्तावात एकूण ३० कलमे आहेत ज्यात माणसाच्या अनेक राजकीय आणि नागरिक हक्कांना मान्यता देण्यात आली आहे. 


"कुणालाही गुलाम म्हणून ठेवता येणार नाही. कुणाकडूनही त्याच्या इच्छेविरुद्ध काम करून घेता येणार नाही. स्वातंत्र्याचा अधिकार सर्वांनाच आहे. कोणत्याही व्यक्तीला वैचारिक मतभेदांच्या आधारावर नजरबंदीत ठेवता येणार नाही किंवा हाकलून देता येणार नाही." इ. परंतु प्रत्यक्षात असे दिसते की., 


मानवी हक्कांच्या सुरक्षिततेच्या नावाखाली हक्काचे निर्मम हनन होत आहे. या प्रक्रियेमुळे मानवी हक्क संस्थेसमोर एक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. परंत भारत कोणत्याही देशाच्या मागे नाही. वैचारिक मतभेद हा भारतात गुन्हा मानला जातो. पोलीस, काठी, गोळी, तुरुंग याचा जितका वापर भारतात केला जातो. 


तितका कोणत्याही सभ्य देशात केला जात नाही. मानवी हक्काच्या हननाविरुद्ध जनतेचे सहकार्य घेतले पाहिजे. संघर्ष केला पाहिजे. आपले अधिकार गमावून बसणे हे एक दुष्कर्मच आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद