आत्मकथनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आत्मकथनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

bhukamp grastache manogat nibandh | भूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध


 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण भूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध बघणार आहोत. मानवी जिवन हे संकटानी भरलेले असते त्‍यात कधी कोणते संकट येईल हे सांगता येत नसते या निबंधामध्‍ये अश्‍याच एका संकटाचा म्हणजे भुंकपाचा सामना केलेली व्‍यक्‍ती त्‍याचे मनोगत स्‍वरूपात त्‍यांनी अनुभवलेले भुंकपाचे संकट व्‍यक्‍त करते त्‍यावर त्‍यांनी कशी मात केली हे या 5 निंबधात सविस्‍तर सांगीतले आहे  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 

bhukamp-grastache-manogat-nibandh
bhukamp-grastache-manogat-nibandh



निबंध 1 (450 शब्‍दात) 


एके दिवशी वर्गशिक्षिका वर्गात आल्या व म्हणाल्या, “आज आपण निबंध लिहायचा." मुलांनी “विषय कोणता, विषय कोणता," असा एकच कुजबुजाट केला. त्यातच त्‍यांनी  विषय जाहीर केला – भूकंप ! ' भूकंप' हा शब्द उच्चारताच माझ्या बाजूलाच बसलेला माझा मित्र स्वप्निल कावराबावरा झाला. माझ्या नजरेने हे तत्क्षणी हेरले. मधल्या सुट्टीत मी त्याला त्याबद्दल बोलते केले, तेव्हा तो व्याकूळ होऊन सर्व आठवणी सांगू लागला…


“भूकंप हा शब्द ऐकला तरी मला गलबलून येते. कारण मी स्वतः भूकंप अनुभवला आहे. भूकंप झालेल्या गावातूनच मी आलो आहे. आमचं गाव अगदी साधंसुधं खेडेगाव आहे. दिवसभर शेतात राबायचे, दोन वेळचं साधंसं जेवण घ्यायचं आणि रात्री गाढ झोपी जायचं, हाच गावाचा मुख्य दिनक्रम. एके दिवशी आम्ही असेच शांतपणे झोपलो होतो. मध्यरात्रीनंतर अचानक जमीन थरथरली... फक्त काही सेकंदच ! आणि काही कळायच्या आत झाडे, घरेदारे धडाधड कोसळली... अनेक गुरेढोरे, माणसे सगळी घरांखाली गाडली गेली. 


काही मिनिटांनी सगळीकडे एकच हलकल्लोळ माजला. रडणे, ओरडणे, मदतीसाठी पुकारणारे  यांनी अवघा अवकाश व्यापून टाकला. ढिगारे उपसण्याचे असहाय प्रयत्न करण्यात, आपली माणसे शोधण्यात सकाळ उजाडली... आणि सर्वांसमोर उद्ध्वस्त वास्तव लख्ख प्रगटलं. प्रचंड मोठ्या नांगराने कोणीतरी जमीन नांगरावी, त्याप्रमाणे सगळी जमीन खणल्यासारखी दिसत होती.


सर्व घरे, वाडे उद्ध्वस्त झाले होते. मोठमोठी झाडेसुद्धा मुळापासून उपटून आडवी झाली होती. जी घरे माणसांना आजपर्यंत आश्रय देत होती, त्या घरांखालीच अनेकजण गाडले होते.  काही जणांचे हात तुटले होते; पाय तुटले होते. कित्येकजण जबर जखमी होऊन विव्हळत पडले होते. कित्येक मृतदेह इतस्ततः पसरले होते. प्रत्येक घरात मृत्यूने थैमान घातले होते. कुणी कुणाला सावरायचं? कुणी कुणाचे अश्रू पुसायचे?

" त्यानंतर झालेल्या हालांना तर पारावारच उरला नाही. भूक लागल्यावर खायला काहीच नव्हते. आमच्या वाडीवरची एकुलती एक विहीर उद्ध्वस्त झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचं संकटच उभं राहिलं.


औषधोपचाराविना अनेकजण तळमळत होते. आम्ही सर्वजण भुकेने व्याकूळ झालो होतो. रस्ते उखडलेले, झाडेझुडपे कोसळून पडलेली... त्यामुळे गावाबाहेरचे लोक आमच्यापर्यंत पोहोचायला संध्याकाळ उजाडली. तेव्हा कुठे आम्हांला खायला पहिला घास व पाण्याचा पहिला घोट मिळाला. हळूहळू सर्वत्र दुर्गंधी पसरू लागली. आम्हांला दूर मोकळ्या जागेत एकत्र केले. रडून रडून दमल्यावर आम्ही रात्री उघड्या माळरानावरच झोपी गेलो.


" नंतरच्या दिवसापासून मात्र दूरदूरचे अनेकजण आमच्यासाठी मदत घेऊन येऊ लागले. विविध वस्तू, कपडे, अन्नधान्ये यांची मदत सुरू झाली. तात्पुरते तंबू उभारून आमची राहण्याची सोय केली गेली. आम्हांला घरे बांधून देण्याच्या बातम्या येऊ लागल्या. बरीच मदत आली, हे खरे. पण मदतीतला मोठा वाटा गावातल्या मातब्बर लोकांनी व दांडगाई करणाऱ्यांनी बळकावला. पण आम्ही काहीच करू शकत नव्हतो. काही गावकरी तर आजही उघड्यावर पडले आहेत.



“भूकंपाच्या आठवणी आल्या की, अजूनही माझं मन गलबलतं. माझी आई या भूकंपामुळे धरणीच्या कुशीत विसावली. माझा धाकटा भाऊ जबर जखमी होऊन काही दिवसांनी देवाघरी गेला. आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. माझी बहीण, आजी आणि बाबा गावी कष्ट करून कसेबसे पोट भरत आहे. माझ्या मामाने मला इकडे बोलावून घेतले, म्हणून तर मी या शाळेत शिकायला येऊ शकलो आहे.

"नको रे बाबा ! त्या भूकंपाच्या आठवणी नकोत ! त्या आठवणींनी आजही माझ्या जीवाचा थरकाप होतोय."


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . खालील दुसरा निबंध वाचण्‍यास विसरू नका  धन्‍यवाद



निबंध 2  (350 शब्‍दात) 


सारा गाव देवीच्या कुशीत विसावला होता. दिवसाभराची कामं झाली होती. जमिनीची, नोकरीची कामं; कुणाचं लग्न, कुणाचा वाढदिवस कुणाचं काय कुणाचं काय... भुकंप आला आणि... होत्याचे नव्हते झाले सूर्य उगवायचा होता; अंधारातच “धडाइ धूडम्” “गडगडगड" आवाज घुमले. घरे हालली; भांड्यांची भांडणे झाली, दरवाजांचे आवाज आले.....  अंधाराचा महासागर, गगनाला चिरणाऱ्या किंकाळ्या, उघडण्याआधीच कायमचे मिटलेले डोळे...  सूर्योदयापूर्वीच जीवनाचा  सूर्यास्त झाला. माझ्या सर्व नातेवाईकांबरोबर ४० हजार आयुष्ये गिळून हा भूकंप दैत्य शांत झाला.



जिवन हे चांगल्‍या प्रवासासमान असते पण उद्या काय होईल याबद्दल काही सांगता येत नसते .पाप वाढते तेव्हा धरणीकंप होतो असे म्‍हणतात मग  आम्ही काय पाप केलं होतं ? की आम्ही ४० हजारांनीच मिळून फक्त पाप केलं होतं ? मग आम्हाला ही शिक्षा का?


राहिलेल्या उजाड जीवनाचे मी करू काय ? आईवडील, बहीणभाऊ सारे गेले. दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली तुटलेल्या कमरेची माझी आई. फुटलेल्या डोक्याने आईला बिलगलेली बाहुलीसारखी बहीण, भींतीखाली दोन्ही पाय गमावुन निजलेले वडील, ढिगाऱ्यात हरवलेला भाऊ.... डोळ्यांसमोरून हलवा हे दृश्य.... नाहीतर मी वेडा होईन.


क्षणात गाव पुसलं गेलं. जगाला जाग आली. सहानुभूतीची लाट उसळली. संकटात सापडलेल्यांच्या मदतीला सरकार, स्वयंसेवी संस्था धावल्या. गावाला युद्ध छावणीचे रूप आले. अन्न, पाणी, दूध, वस्त्रे, औषधे, निवारे तंबू सर्व वाटले गेले. सर्वधर्मी प्रार्थना झाल्या. पुनर्वसनाची चक्रे फिरू लागली. माणुसकीचे दर्शन झाले.


हळूहळू सर्व ठीक होईल. लोक आपल्या विश्वात रमून जातील. हे सारं विसरूनही जातील. विस्मृतीच्या वरदानावरच माणसाचं जीवन सुसह्य होतं. परदुःख शीतल पण ज्याचं जळतं त्याचं काय ?... मदतीच्या खैरातीवर कां आयुष्य काढायचे ? -


उध्वस्त जपानकडून स्फूर्ति घ्यायला हवी. फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी मारायचीय. जखमा विसरून कामाला लागायचे आहे.

"उष:काल होता होता काळरात्र झाली पुन्हा आता आयुष्याच्या पेटवा मशाली"


सारं सुरळीत होईल. पण एक नक्की, जेव्हा केव्हा ३० सप्टेंबर तारीख कलेंडरवर दिसेल तेव्हा मनात वादळं निर्माण होतील; आणि डोळ्यातुन अश्रुंच्‍या धारा वाहु लागतील. 

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 3  

 भूकंपग्रस्ताचे मनोगत मित्रांनो, मी तुम्हाला एका वेगळ्या थरारक अशा अनुभवाची घटना सांगणार आहे. मी जो भूकंप अनुभवला त्याचे सविस्तर वृत्त मी तुम्हाला सांगणार आहे . 


काही क्षण थरथर थरथर जमिनीचे असे कंपन झाले. खडखड खडखड घरातील भांडे पडण्याचा आवाज आला आणि लगेच काही क्षणातच धडाम धूम, धाडधाड असा घरे पडण्याचा आवाज. पुढे अनेक आवाज. आई गऽऽऽऽ......मेलो रेऽऽऽऽ.....बाप रेऽऽऽ.....ओंऽऽऽ.... वाचवाऽऽऽऽ..असे अनेक आवाज व त्यात मिसळला जात होता तो रडण्याचा आवाज आणि विव्हळण्याचा आवाज. काय झाले हे समजण्याच्या आधीच एका सुंदर अशा वस्तीचे; विटा,दगड,माती मध्ये रुपांतर झाले होते. भूकंपाने संपूर्ण गाव उध्वस्त करुन टाकले होते. रस्ते कोणते व घरे कोणती यातील फरक समजत नव्हता. अगदी पक्की घर सुध्दा वाचली नव्हती.


काही कळायच्या आत काळाने त्यांच्यावर झडप घातली. काही जनावरे सुध्दा मृत्युमुखी पडली. जे वाचले ते क्षणभर अवाक होऊन नुसते बघत राहिले. परिवारातील सदस्य ढिगाऱ्याखाली दडले हे समजताच काय करावे त्यांना सुचेनासे झाले होते.



 भानावर येताच त्यांना वस्तुस्थितीची जाणीव झाली. त्यांचा शोध घेण्यासाठी ढिगारा उपसण्याचे प्रयत्न ते करु लागले. ढिगारा उपसणे तेवढे सोपे नव्हते. काय करावे? मदतीला कुणाला बोलवावे? प्रत्येकाचा चेहरा रडवेला,हताश, घाबरलेला दिसत होता. कुणाची अगदी वेड्यासारखी स्थिती. “अरे देवा, हे काय केलस?' वर पाहून कुणा एकाचा प्रश्न. तर “लय पाप वाढलं होतं आपल्या गावात म्हणून असं घडलं' असा दुसऱ्याचा उदास स्वर.


 "गावातील पाप्यांना हाकलून दिलं असतं तर असा प्रसंग आला नसता”असा तिसऱ्याचा सूर. अशा प्रकारे विविध क्रिया, प्रतिक्रिया, आश्चर्य, दुःख, वेदना, हताशपणा, गोंधळ सुरु झाला होता. भूकंपाची ही बातमी प्रशासनापर्यंत पोहोचली. प्रशासनाच्या गाड्या पोहोचल्या. वृत्तपत्रे व विविध वाहिन्यांचे प्रतिनिधी,पत्रकार पोहोचले. काही वेळाने मदतीसाठी सेना जवान पोहोचले. मदत कार्य सुरु झाले परंतु निसर्गाचा राग शांत झाला नव्हता. त्याने मदतीत अडथळा निर्माण केला. 


पावसाला सुरुवात झाली. पहिल्यांदा धरतीने झिडकारले नंतर पावसाने झोडपायला सुरुवात केली. धो धो पाऊस पडू लागला. पावसाच्या धारा व वाचलेल्या व्यक्तींच्या डोळ्यातील धारा थांबता थांबेनात. तर मदत कार्याला जसा विलंब होत जात होता. तसा लोकांचा धीर खचत होता. ढिगाऱ्याखाली कुणी जिवंत सापडण्याची आशा मावळत गेली.पाऊस थांबला. मदत कार्य सुरु झाले. अंधार पडू लागला होता. 


वीज गेली होती. परंतु तरीही बत्तीच्या उजेडात जवान एक एक प्रेत बाहेर काढू लागले. वातावरण भेसूर दिसत होते. मृतदेह बाहेर काढताच आप्त स्वकीयांचा हंबरडा फुटायचा. वातावरणाचा भेसूरपणा आणखीनच वाढायचा. कुणाची पत्नी, कुणाचा मुलगा, कुणाची मुलगी, कुणाची आई, कुणाचे वडील, कुणाचा भाऊ, कुणाची बहिण. काही घरातील पूर्ण सदस्य मृत्युमुखी पडले होते.


 काही लोक जखमी झाले होते. कुणाचा हात निकामी तर कुणाचे पाय निकामी झाले होते. अधून मधुन विजांचा कडकडाट तर जखमींचा उपचाराकरिता तडफडाट होत होता. जखमींचा उपचार करावा की मृतकांचा अंत्यसंस्कार ह्या पेचात आप्त स्वकीय पडले होते. पाहणाऱ्यांचे हृदय फाटावे असे विदारक चित्र निर्माण झाले होते. “संकटे कधी एकटी येत नाहीत” ह्या वचनाचा प्रत्यक्ष अनुभव आला होता.



शासनाने पुनर्वसनाचे आश्वासन दिले. परंतू मला प्रश्न पडला की, शासन कोणाचे पुनर्वसन करणार ? घरांचे की कुटूंबांचे ? भुकंपात कुटूंबची-कुटूंब गाडली गेली. घराला घरपण येतं ते परिवारामुळे. घरात रहायला परिवारच नाही तर घर कुणासाठी?. 


मित्रांनो, कुणाला सरस तर कुणाला निरसा असा मदतीचा वाटा शासनाकडून मिळाला. जिवित हानी ही पैशांनी भरुन निघत नसते. निसर्गाने दिलेल्या या सजेमुळे हृदयावर झालेल्या जखमांवर काळाशिवाय कोणीही कुंकर घालु शकत नाही.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध 4 


किल्लारी येथे प्रचंड भूकंप झाला अन् तेथील सारे समाजजीवनच उद्ध्वस्त होऊन गेले. पेपरमध्ये याच्या बातम्या रोज वाचत होतो. अन् अशातच एक दिवस एक तरूण आमच्या दाराशी आला. त्याने आपली  कहाणी सांगितली.


“सारे लोक पहाटेच्या साखरझोपेत होते अन् एकाएकी जमीन गदगदा हालू लागली. झोपलेल्या लोकांना काय झाले ते कळलेच नाही. अन् एकाएकी घरे, वाडे सारे जमीनदोस्त होऊ लागले. अर्धवट जागे झालेले लोक सैरावैरा धावू लागले. त्यांच्या अंगावर मातीचे ढीग पडू लागले. अनेक लोक मातीच्या ढिगाखाली गाडले गेले. कित्येक संसार उद्ध्वस्त झाले. 


पाच मिनिटांत सगळे होत्याचे नव्हते झाले. लोक भानावर येईपर्यंत सारा गाव जमीनदोस्त झाला होता. वाडवडिलांपासूनचे चालत आलेले माझे घर कोसळून फक्त एक मोठा मातीचा ढीग उरला. घरातील भांडीकुंडी, चीजवस्तू सारे काही त्या मातीत गेले. माझा छोटासा मुलगा, माझी बायको कोणीच वाचू शकले नाहीत. मी एकटाच या जगात उरलो आहे.


 मी तरी कशाला वाचलो ? आता माझा व्यवसाय, आजूबाजूच्या लोकांची शेती सारे काही भूतकाळात जमा झाले आहे. दुसऱ्याच दिवशी मातीचे ढिगारे उपसून त्याखालून मृतांना बाहेर काढण्याचे कार्य चालू झाले. क्वचित एखाद्या ठिकाणी दैवाच्या बळावरच एखादी व्यक्ती जिवंत सापडली. एरवी मातीच्या ढिगाऱ्यांवर बसलेले खिन्न जीव, त्या ढिगाऱ्यातून काही चीजवस्तू मिळते का असे शोधणारे अभागी लोक असेच दृश्य सर्वत्र दिसत होते. असले भयानक दृश्य पाहून जीव गलबलून जात होता. झालेला सर्वनाश अतिशय भयाकारी होता.


एवढी वर्षे काडीकाडी जमवून उभारलेली घरटी उद्ध्वस्त होऊन गेली होती. मृत्यू आलेले लोक तरी सुटले म्हणावे, अशी परिस्थिती जिवंत असणाऱ्यांची होती. जिवंतपणी मरणयातना भोगण्याची पाळी लोकांवर आली होती. दुसऱ्या दिवशी सरकारी पाहाणी चालू झाली. गावात पाणी नव्हते, वीज नव्हती, खाद्यपदार्थ नव्हते. त्यामुळे मदतकार्य अत्यंत अपुरे पडत होते. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाची हानी झाली होती, पशुपक्ष्यांचे हाल झाले होते. 



मंत्री लोक दौरा करून जात होते. भूकंपग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर करीत होते. पण प्रत्यक्ष आमच्या हातात त्यातील फार थोडी रक्कम पडली. बाकीची कुठे गडप झाली, तो एक परमेश्वरच जाणे! परंतु अनेक संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांनी मदतीचा हात पुढे केला. सर्वांना शाब्दिक आधार दिला. ठिकठिकाणच्या लोकांकडून मदतीचा ओघ चालू झाला. 


निराधार झालेल्यांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न चालू झाला. भूकंपाला तोंड देऊ शकतील अशी घरे बांधण्याच्या योजना आखल्या जाऊ लागल्या. आता माझे घरटे पुन: कधी उभारले जाते, ते पाहायचे. सध्या तरी मी बेकार झालो आहे. कामधंदा मिळेल या आशेने शहरात आलो आहे. मला कुठेतरी नोकरी मिळेल का हो?"

त्याचा तो कारुण्यपूर्ण स्वर माझे अंत:करण कापीत गेला. आणि मी अंतर्मुख होऊन विचार करू लागले.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 5



स्वप्नांच्या कुशीत झोपी गेलेले लोक मृत्यूच्या मांडीवर निद्राधीन झाले होते.कायमचे विसावले होते.फक्त तीस सेकंद ‘भूकंप' ही तीनच अक्षरे ... आई ऽ ऽ ऽ वाचवा ऽ ऽ मेलोऽ ऽ असा आक्रोश, दगड, माती, विटा यात गाडले गेलेले लोक..... वेदना व दुःख यांचे थैमान ..... निसर्गाचे उग्र रूप..... मुलांनो, काय सांगू तुम्हाला ....आजही अंगावर काटा उभा राहतो....."


धुडूम...ऽ ऽ धडाड..... आवाजाने अचानक मी जागा झालो. समोरची भिंत कोसळली होती.सारे घर थरथरत होते.माझी लाडकी लेक शांती , तान्हुला किसना अन् माझी कारभारणी सखू , सारेच दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती.मी उधडला गेलो होतो.मनाचं वस्त्र चिंध्या चिंध्या होऊन समोर नाचत होतं.मी सुन्न झालो होतो. दगड-माती उकरत माझ्या जिवाभावाच्या पोटच्या गोळ्यांचा , बायकोचा शोध घेत होतो. डोळ्यातले अश्रू अनावर झाले होते.मनातलं क्रंदन संपता संपत नव्हतं.हाती काही लागत नव्हतं.


निसर्गाचं हे विनाशाचं तांडवनृत्य घेऊन आलेली ती काळरात्र दुसऱ्या दिवशी सकाळ झाली खरी, पण अजूनही निराशेचा दुःखाचा अंधार दाट पसरलेलाच होता. लातूर ,उस्मानाबाद , जिल्ह्यातील सास्तूर, पेठसांगवी इत्यादी ८३ गावांतील घरे धरतीने गिळली होती. अनेक कुटूंबे बेचिराख झाली होती. चिमुरडी मुले, स्त्रिया , माणसे यांच्या प्रेतांनी परिसर शोकाकुल झाला होता.अनेक बालके अनाथ झाली होती.एकेका घरातून पाच - सहा मृतदेह बाहेर काढले जात होते.बघणाऱ्यांच्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहत होते. 


रेडिओ, वर्तमानपत्रे,टी व्ही.द्वारे बातम्या जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचल्या.सहानुभूती व मदत घेऊन अनेक जण तेथे पोहोचले. भारतीय लष्कराने मोठ्या प्रमाणावर मदत कार्य सुरू केले. पंतप्रधान , मुख्यमंत्री यांनी तेथे तात्काळ भेटी दिल्या. दुःखितांना मदतीची आश्वासने दिली, त्यांचे अश्रू पुसले.चाळीस हजारांपेक्षा आधिक लोक मृत्यूच्या विळख्यात सापडले गेले होते. २० ऑक्टोबर १९९१ मध्ये उत्तर काशीत झालेल्या भूकंपाची वेदना परत ताजी झाली होती.''



"माझा संसार संपला तरी इतर शेकडो निराश्रितांचे अश्रू पुसण्यासाठी मी पुढे सरसावलो. “हे विश्वचि माझे घर' समजून मी समाजकार्याची कास हाती घेतली . भूकंपग्रस्त लोकांचे पुनर्वसन झाले. भूकंपासंबंधी पूर्व अनुमान संभव करण्यासाठी भूगर्भ शास्त्रज्ञ पुढे आले. अशा नैसर्गिक संकटातही मनुष्यहानी व वित्तहानी होऊ नये म्हणून सर्वच प्रयत्नशील आहेत.''


लातूर, किल्लारीच्या भूकंपानंतर २-३ वर्षानं अचानक भेटलेल्या भूकंपग्रस्ताचे हे हृदयातल्या दुःखद भावनांच काव्यमय शब्दरूप माझे काळीज चिरून गेले.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद

bhukamp grastache manogat nibandh | भूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध

bhaji vikretyache manogat marathi nibandh | भाजी विक्रेत्याचे मनोगत मराठी निबंध 

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण भाजी विक्रेत्याचे मनोगत मराठी निबंध बघणार आहोत. धन्‍यवाद या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. या निबंधामध्‍ये  एक भाजीव्रिकेत्‍या मुलाने स्‍वताचे मनोगत सांगीतले आहे . त्‍याची घरची परीस्‍थीती, ग्राहकांसोबत होणारी वागणुक व त्‍याचे स्‍वताच्‍या भविष्‍याविषयीचे निर्णय याबदृदल मनोगत स्‍वरूपात निबंध दिलेला आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


bhaji-vikretyache-manogat-marathi-nibandh
bhaji-vikretyache-manogat-marathi-nibandh



रोज ठरावीक वेळी 'दादा, भाजी' अशी आरोळी कानावर येते. विनायक एक पंधरा-सोळा वर्षांचा मुलगा आमच्या वसाहतीत रोज भाजीची गाडी घेऊन येतो. विनायकचे वागणे आदबशीर व नम्र असते. त्यामुळे तो सर्वांचा आवडता झाला आहे. एकदा या विनायकला मी बोलते केले. मुद्दाम त्याला संध्याकाळी बोलावून घेतले आणि त्याची माहिती विचारली.


"दादा, मी आठवी नापास आहे,' विनायक सांगत होता. "आठवी नापास झालो आणि शाळा सोडली, तेव्हाच माझा बाबा वारला आणि घरासाठी काम करण्याची गरज निर्माण झाली. पूर्वी हीच गाडी माझा बाबा फिरवत असे, तेव्हा गमतीने मी त्याच्याबरोबर फिरत असे, म्हणून या कामाची मला माहिती होती.


“भाजी आणण्यासाठी मला भल्यापहाटे मोठ्या मंडईत, घाऊक बाजारात जावे लागते. भाजी खरेदी झाली की माझी गाडी लावतो. काही गिहाईकांनी काही खास भाज्या आणायला सांगितलेल्या असतात. त्या मी अगदी आठवणीने आणतो आणि मग आमचा शहराकडे प्रवास सुरू होतो. मोठी मंडई तशी गावापासून खूप दूर आहे. त्यामुळे चालायचे खूप श्रम होतात. त्याच वेळी मन साशंकही असते. 'एवढी भाजी आज विकली जाईल ना?' कारण भाजी हा नाशिवंत माल आहे. पण बहुधा सगळा माल संपतो.



"या व्यवसायात खूप पायपीट करावी लागते. पण अनेक ग्राहकांशी माझे एवढे प्रेमाचे नाते निर्माण झाले आहे की, त्या पायपिटीचे मला काही वाटत नाही. कित्येक आजींना मी त्यांच्या घरात भाजी पोचवतो. मग त्या प्रेमाने मला चहापाणी देतात. संक्रांतीला आठवणीने तिळगूळ देणाऱ्या अनेक ताई-माई आहेत. कुणाकडे काही कार्य असले की, ते भाजीची भलीमोठी यादी देतात.


"काही त्रासदायक, कटकटी ग्राहकही भेटतात. पण मी कोणाशी वाद घालत नाही. त्यामुळे खटके उडत नाहीत. संध्याकाळचा वेळ मला मोकळा असतो. त्यावेळी मी वाचन करतो. रोजची वृत्तपत्रे वाचतो. साने गुरुजींची पुस्तके मला खूप आवडतात. माझे घर व्यवस्थित चालेल एवढे पैसे सध्या मला मिळतात. पण मी यात समाधानी नाही.


"एक छोटासा गाळा घेणार आहे. त्यामुळे दुपारनंतर मी तेथे भाजी विकू शकेन. पण काही झाले तरी मी माझी सकाळची फेरी सोडणार नाही; कारण त्यामुळे मला खूप स्नेहीसोबती मिळतात.'' विनायकच्या विचारांनी मला मनोमन आनंद झाला. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



मराठी 2 

bhaji vikretyache manogat marathi nibandh | भाजी विक्रेत्याचे मनोगत मराठी निबंध 


"खूप दिवस मनात इच्छा होती की कुणाशी तरी मन मोकळे करावे; पण तशी संधीच मिळत नव्हती. आज मिळाली आहे तर माझे मनोगत मी व्यक्त करतो. "मी एक भाजी विक्रेता आहे. आमचे वडील मळ्यात भाजीपाला पिकवीत आणि उरलेला वेळ विठ्ठलभक्तीत घालवीत. पुढे कुटुंब वाढले. 


थोड्याशा जमिनीवर कुटुंबाचे पोट भरेना. मग माझे आईवडील शहरात येऊन भाजी विकू लागले. मी आणि माझा भाऊ जवळच्याच शाळेत शिकायला जात असू. "दहावी पास झाल्यावर मी आईबाबांच्या कामातच लक्ष घातले. रस्त्याच्या बाजूला एक पत्र्याची शेड उभी केली. 


माझे दुकान सुरू झाले. पहाटे मी मोठ्या मार्केटमध्ये जाऊन ताजी भाजी खरेदी करीत असे. आता भाज्यांबरोबर मी ताजी फळेही दुकानात ठेवू लागलो. उत्तम माल, अचूक माप आणि उत्कृष्ट वागणूक म्हणून माझे 'आनंद भाजी-फूटस् मार्ट' सदैव गजबजलेले असे. 


अनेक ग्राहक महिलांनी विनंती केल्यामुळे आम्ही आता दुकानात भिजवलेली कडधान्येही ठेवू लागलो. हिरवीगार भाजी, ताजी फळे व चवदार कडधान्ये माझ्या दुकानात विक्रीला असतात.


"त्याच वेळी एक दुर्दैवी घटना घडली. रस्ता रुंदीकरण आले आणि आमचे दुकान उडाले. मग मी एक गाडी घेतली आणि फिरता भाजी-विक्रेता झालो. कष्ट वाढले तरीपण भाजीचा खप होत होता. तेवढ्यात आणखी एक नवे संकट कोसळले. नव्या शहरात नवे नवे 'मॉल' उभे राहिले आणि तेथे शेतावरची ताजी भाजी स्वस्तात मिळू लागली.


मॉलमध्ये जाऊन भाजी खरेदी करण्याची रीत आली आणि आमचा धंदा बसला. आता कोणाकडे तक्रार करायची? भविष्यात मी भाजी-विक्रेता राहणार का? याचीच मला चिंता लागून राहिली आहे." मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

[शब्दार्थ : चवदार - tasty. स्वादिष्ट. स्वादिष्ट। कडधान्ये - pulses. ठीण. दालें। खप - sale. वेया. खपत, बिक्री। रीत-custom. पद्धति, रीत. तरीका।]


bhaji vikretyache manogat marathi nibandh | भाजी विक्रेत्याचे मनोगत मराठी निबंध

padkya killyache atmavrutta marathi nibandh | पडक्या किल्ल्याचे आत्मवृत्त मराठी निबंध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पडक्या किल्ल्याचे आत्मवृत्त / मनोगत मराठी निबंध बघणार आहोत.या निबंधामध्‍ये एके काळी शत्रुंशी झुंज देवुन विजयत्री खेचुन आणणारा तो गड त्‍यांची झालेली दुरावस्‍था तो मनोगत म्‍हणुन तेथे आलेल्‍या वाटेकरूंना सांगत आहे. याविषयी सवीस्‍तर लेखन बघणार आहोत चला तर मग सुरूवात करूया निबंधाला


बाळांनो, तुम्ही आज सहज सहल म्हणून इथे आलात तरी मला कित्ती आनंद झालाय म्हणून सांगू ! पण, काय देऊन मी तुमचं स्वागत करू ? काय दाखवू?



" अवघे झाले जीर्ण शीर्ण अन् सुन्न झाल्या दिशा खूप सोसले आता झाली मूक माझी भाषा......" हे माझे ढासळलेले बुरूज, ह्या पडक्या भिंती, जमीनदोस्त झालेले महाल आणि कोठया. हे पाहून तुम्हाला 'मी' समजणारच नाही रे !

३५० वर्षे तरी झाली असतील माझ्या वयाला ! मोगल साम्राज्य हिंदु राष्ट्रावर आक्रमण करायला शिवशिवत असतानाच तेजस्वी सूर्य श्रीशिवाजी महाराजांनी गणाजी बंडोला आज्ञा केली माझ्या उभारणीची ! साताऱ्याच्या पूर्वेकडून शत्रूच्या फौजा रोखण्यासाठी ह्या डोंगरावर माझी नेमणूक झाली. महाराजांचा शब्द ! तो झेलला गणाजी बंडो आणि बंदेअलीनं. जिवाचं रान करून चार महिन्यांत मला बाळसं आणलं.


बंदेअलीनं माझी अंतर्गत रचना केली. पूर्वेला नगारखाना, आत मध्यभागी खलबतखाना, बाजूला दरबार मंडपी, कोपऱ्यात मुदपाकखाना, उत्तर-दक्षिणेला टेहळणी बुरूज, जनानी, मर्दानी महाल, अश्वपागा, मावळ्यांसाठी छोटी घरं, पाण्याचं तळं अन् सहज न दिसणारं दारूगोळ्याचं कोठार ! उभारणीचा इतिवृत्तान्त सादर होताच महाराज प्रसन्न झाले. गणाजी बंडो आणि बंदेअलीला सोन्याची भेट महाराजांनी दिली...! आदिलशहा नित्य कुरापती काढतच होता.

padkya-killyache-atmavrutta-marathi-nibandh
padkya-killyache-atmavrutta-marathi-nibandh




म्हसवडवरून त्याच्या फौजांचा तळ उठला अन् सूर्यास्ताला गडाच्‍या क्षेत्रात आला. ५०० ची कुमक माझ्या पोटात होती. दत्ताजी सुभेदार, माझा किलेदार, यानं इशारा केला आणि माझ्या बुरुजावरून प्रथमच तोफांचे गोळे शत्रुसैन्यावर आग ओतू लागले. पहिल्यावहिल्या लढाईनं माझ्या अंगात थरार भरला... वीरश्रीचा ! या अचानक हल्यानं शत्रुची पळापळ झालेली मी नेत्रांनी पाहिली. पश्चिमेकडे निघालेले ते वाघ शेळी होऊन पूर्वेला पसार झाले. माझं काम मी चोख बजावलं !...आणि मग किती लढाया, किती संग्राम केले, गणतीच नाही.



ती वीरश्री, तो 'हर हर महादेव 'चा घोष... ' दीन दीन' करत झालेली शत्रची दीनवाणी अवस्था...कधी मलाही जखमा झाल्या, पण एका प्रसंगानं साऱ्या भरून निघाल्या...घडलं ते असं... कर्नाटक विजय मिळवून महाराज परतत होते. गोंदावल्यापाशी अंधारून आले. सैन्य थकलेले, महाराज माझ्यापाशी मुक्कामाला आले. त्यांचा पदस्पर्श झाला...आणि अंगावर रोमांच आला...मनाच्या गाभाऱ्यात शेकडो घंटा निनादल्या.



उभ्या आयुष्यात महाराज एकच रात्र माझ्यापाशी होते. पण कित्येक शतके पुरेल असं चैतन्य मला देऊन गेले. म्हणूनच आजवर मी आहे. जखमाही भरल्या. अल्प मुक्कामातही महाराजांनी मारुती मंदिर स्थापण्याची सूचना दत्ताजीला केली. मावळतीला ते आजही आहे. तो काळ गेला...महाराज गेले....मराठे, पेशवे बुडाले...जग पुढे धावले. माणसाने आकाश हाती घेतले...आणि...आणि माझी गरजच संपली. डोक्यावरून हल्ले झाले तिथे मी कसा लढणार ? मी दुर्लक्षिला गेलो. जवळची माणसे निघून गेली...सुसाट वारा, ऊन, पाऊस खात एकाकी मी ढासळू लागलो. मनानं तर मी महाराज गेले तेव्हाच खचलो, आता शरीरानेही...


आता कोणी तुमच्यासारखे येतात तेव्हा मनावरची धूळ उडते. तुम्हीही थोडे भूतकाळात जाता. 'अरेरे!... जतन केलं पाहिजे' म्हणता...निघून जाऊन कामात गुंतता. माझ्या आवारामध्ये मात्र सुसाट वारा घोंघावत राहतो आणि रातकिडे किरकिरत राहतात...

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व जिर्ण झालेल्‍या गडकिल्यांचे वैभव पुन्‍हा प्राप्‍त करण्‍यासाठी काय केले पाहीजे हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद.

padkya killyache atmavrutta marathi nibandh | पडक्या किल्ल्याचे आत्मवृत्त मराठी निबंध

Essay on parrot in marathi | पोपट मराठी निबंध 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पोपट मराठी निबंध  बघणार आहोत. मानव प्राणी हा नेहमी आंनदाच्‍या शोधात असतो. त्‍यासाठी तो वेगवेगळे छंद जोपासतो. आपल्‍या आवडीच्‍या ठिकाणी फिरायला जातो. त्‍याला मनपसंत असलेले खाद्य पदार्थ खातो. पण मानवाचा सर्वात मोठा आनंद हा स्‍वतंत्र होण्‍यात आहे. त्‍यासाठी तो प्रंसगी युध्‍दही करतो. पंरतु इतर प्राण्‍यांच्‍या स्‍वतंत्रतेविषयी विचारही करत नाही. जसे उदाहरण द्यायचे झाल्‍यास पोपटाचे देता येईल. निबंधातील पोपटाने स्‍वता त्‍यांचे मनोगत स्‍पष्‍ट केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


मी पिंजऱ्यातला पोपट. आज मी तुम्हांला माझे मनोगत सांगणार आहे. तुम्ही माणसे तुमच्या आनंदासाठी आम्हांला पकडता, घरी आणता आणि पिंजऱ्यात ठेवता. पण आम्हांला काय वाटत असेल, याचा विचार तुम्ही माणसे करत नाहीत. हेच बघा ना! या घरात आज अनेक वर्षे मला पिंजऱ्यात ठेवलेले आहे. ही घरातील माणसे माझ्यावर खूप प्रेम करतात. मला आवडणारे पदार्थ खायला देतात. माझ्यासाठी खास पेरू आणतात. माझे नेहमी कौतुक करतात. येणाऱ्या पाहुण्यांपुढे माझे प्रदर्शन करतात. मला नवे नवे शब्द बोलायला शिकवतात. पण मला खरोखरीच काय हवे आहे, ते हे लोक समजून घेत नाहीत.

Essay on parrot in marathi
Essay on parrot in marathi 

मला स्वातंत्र्य हवे आहे. अगदी सोन्याचा पिंजरा असला, तरी तो मला नकोसा वाटतो. मला रानात मुक्तपणे विहार करायचा आहे. माझ्या भाऊबंदांबरोबर मला मोकळ्या आकाशात उडायचे आहे. मी तुम्हांला एक प्रश्न विचारतो, तुम्ही माणसे स्वत:च्या स्वातंत्र्यासाठी झगडता, युद्धही करता; मग आमचे स्वातंत्र्य मात्र कसे हिरावून घेता?

मला आता या पिंजऱ्यातून मुक्त करा. मी तुम्हांला रोज भेटायला येईन.

मित्रांनो तुम्‍हाला पोपट मराठी निबंध  हा निबंध कसा वाटला  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.
व खालील निबंंध नं 2 पण वाचु शकता धन्‍यवाद .

निबंध 2 

एके दिवशी गंमतच झाली. पिंजऱ्यातील पोपट बाहेर आला आणि आम्ही त्याला शिकवलेल्या शब्दांपेक्षा वेगळेच काही बोलू लागला. तेव्हा आम्हा सर्वांना नवल वाटले आणि घरातली सारी माणसे त्याच्याभोवती जमली. पोपट सांगत होता, "हल्ली तुम्ही माझ्या पिंजऱ्याचे दार उघडे ठेवता. पण मी पिंजऱ्याबाहेर सहसा येत नाही. कारण वर्षानुवर्षे या पिंजऱ्यात राहिल्याने मला आता पिंजरा हेच आपले घर वाटू लागले आहे. बाहेरच्या जगाचे मला थोडेही आकर्षण राहिले नाही.

तुमच्याकडे येण्यापूर्वी मी माझ्या आईवडलांसह रानात मोकळे जीवन जगत होतो, त्यावेळी मी अगदी लहान होतो. 'कसे उडायचे' हेही मला अवगत नव्हते. आईवडील माझ्यासाठी खाऊ आणायला गेल्यावर मी झाडाच्या ढोलीत त्यांची वाट पाहत राहत असे.


याच प्रचंड झाडाच्या ढोलीमध्ये इतर पोपटांची वस्ती होती. त्यामुळे त्यांच्या छोट्यांबरोबर खेळण्यात, उडण्याचा सराव करण्यात माझा वेळ किती छान जात असे! अचानक तो घातवार उजाडला. एका पक्षिविक्याने मला पकडले. त्याच्याकडून मी तुमच्या घरी आलो. तुम्ही पहिल्या दिवसापासून माझे कौतुक करत आहात. मला खाऊपिउ घालत आहात. लाडाने माझ्याशी बोलत आहात. तेव्हा तुमच्या व जगाच्या दृष्टीने मी येथे सुखी आहे. पण खरे पाहता, मी सुखी नाही. कारण माझे स्वातंत्र्य मी कायमचे गमावले आहे. आकाशात मी केव्हाच उंच भरारी मारली नाही. आता तुम्ही मला मुक्त केलेत, तरी स्वतंत्र जगात मी जगूच शकणार नाही. आता माझे एकच सांगणे आहे की, माझ्या मृत्यूनंतर हा पिंजरा फेकून दया. दुसऱ्या कोणालाही कदापिही गुलाम करू नका.

मित्रांनो तुम्‍हाला पोपट मराठी निबंध  हा निबंध कसा वाटला  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद .

Essay on parrot in marathi | पोपट मराठी निबंध

 नदी बोलू लागली तर मराठी निबंध | nadi bolu lagli tar essay in marathi

 नदी बोलू लागली तर मराठी निबंध | nadi bolu lagli tar essay in marathi:  मुंबईहून पुण्याकडे परतत होतो. पुणे जवळ आल्याच्या खुणा दिसत होत्या. आता आपल्या आवडत्या नदीचे आपल्याला दर्शन घडणार असे वाटू लागले. नदीजवळील परिसरातून आम्ही जात होतो; पण नदी दिसत नव्हती. एवढी मोठी नदी हरवली होती, अगदी चक्क गायब झाली होती.कारण त्या नदीच्या संपूर्ण पृष्ठभागावर ‘पाणवनस्पती' उगवली होती. अनेकदा या वनस्पतीविषयी मी वर्तमानपत्रात वाचले होते, पण ती एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरत असेल अशी कल्पना नव्हती. नदीला काय वाटत असेल बरं! नदी बोलू लागली तर...



...तर ती नक्कीच मानवाला दोष देईल. या नदीने माणसाला काय दिले नाही? कुठल्यातरी डोंगरकपारीतून ती वाहत येते ती कशासाठी? आपल्या मानवपुत्रांना जीवन देण्यासाठीच ना! 


nadi bolu lagli tar essay in marathi
nadi bolu lagli tar essay in marathi



ती जीवन देते आणि माणसाचे जीवन फुलते. मानवी संस्कृतीचा इतिहास काय सांगतो? पूर्वीच्या काळी नदीच्या काठीच तर गावे वसत होती, मानवी संस्कृतीचा विकास होत होता. म्हणून तर प्राचीन काळापासून नदयांना 'लोकमाता' म्हणून संबोधिले जाते. या नदया आपल्या काटांवर सुपीक माती, गाळ टाकून शेतीसाठी उत्कृष्ट भूमी निर्माण करतात. या सरितेमुळेच माणसाची तहान भागते, शेते पिकतात, द्राक्षांच्या बागा फुलतात. आपल्याजवळ जे जे आहे ते दुसऱ्याला देत जा, हाच संदेश सांगत ही आपला सतत मार्गक्रमण करीत असते. 



वर्षाऋतूकडून मिळालेल्या जलाचा लोढा घेऊन येणाऱ्या या तटिनीला माणसाने अडविले, मोठमोठ्या भिती बांधून तिचा प्रवाह थांबविला, तरीही ही सरिता रागावली नाही. तिने माणसांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. त्यांच्यासाठी तिने कड्यावरून उड्या घेतल्या, बोगदयातील काळोखातून ती धावली. तिच्या पाण्यावर माणसाने वीज निर्माण केली. त्यामुळे त्याचे घर प्रकाशाने उजळून निघाले, कारखान्यातील यंत्रे फिरू लागली. माणसांचे जीवन अधिक संपन्न, समृद्ध झाले. नदी आपल्या पाण्यातील मासे देऊन माणसाच्या जेवणाची लज्जतही वाढवीत होती.


आम्ही माणसे मात्र हे सारे विसरलो. मुंबई-पुण्यासारख्या शहरात राहणाऱ्या मुलांना विचारले, “तुम्हांला पाणी कोठून मिळते?" तर ती सांगतात, “नळांतून.” अशा त-हेने आपल्याच कामात सदा गुंतलेल्या माणसाला या लोकमातेची आता आठवणही राहिलेली नाही. आपल्या गावातील सारी घाण आणून तो नदीत सोडतो, मोठमोठे कारखानदार आपल्या कारखान्यांतील दूषित पाणी नदीत आणून सोडतात. साखरेच्या कारखान्याची मळी पाण्यात सोडली जाते. अशावेळी नदीला केवढे दुःख होत असेल! तिला बोलता येत नाही. अगदीच भावना अनावर झाल्या तर ती बेफाम होते आणि मग गावेच्या गावे उद्ध्वस्त करीत जाते.


या नदीला बोलता आले तर ती प्रथम या द्वाड माणसाचे कान पकडून म्हणेल, "अरे उद्दामांनो, तुम्हांला काही अक्कल आहे का? तुम्ही माझ्या पाण्यावरून भांडणे करता. राज्याराज्यात माझ्या पाण्यावरून आज भांडणे पेटली आहेत. आता भारत आणि बांगलादेशातही पाण्याचा वाद सुरू झाला आहे. माझे पाणी म्हणजे तुम्हा सर्वांचे जीवन. ते भरभरून घ्या आणि हसत हसत जगा; आणि हो, जरा माझी स्वच्छताही ठेवा. अरे बाळांनो, माझ्याकडे पाण्याचा साठा उदंड आहे. ते कोणालाच कमी पडणार नाही. यास्तव तुम्ही भांडणे थांबवा व सुखाने जगा."
वरील निबंध नदी बोलू लागली तर मराठी निबंध | nadi bolu lagli tar essay in marathi हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

नदी बोलू लागली तर मराठी निबंध | nadi bolu lagli tar essay in marathi

झोपडपट्टी बोलू लागते तेव्हा आत्‍मकथनात्‍मक  मराठी निबंध | zopadpatti bolu lagte tevha essay in marathi


झोपडपट्टी बोलू लागते तेव्हा आत्‍मकथनात्‍मक  मराठी निबंध | zopadpatti bolu lagte tevha essay in marathi : एकदा काय गंमत झाली, आमच्या अकरा मजली उत्तुंग ‘गिरनार'जवळची झोपडपट्टी बोलू लागली. अहो, अगदी चक्क एखादया फडा वक्त्यासारखी ती आपले विचार मांडू लागली. वेळ होती रात्रीची. 'गिरनार' अगदी शांत झोपला होता-मऊ, मऊ फोमच्या गादयांत गोड गुलाबी स्वप्ने पाहत. त्याला कशाचा पत्ताच नव्हता. 


'गिरनारची' श्रीमंत शेजारीण 'उषाकिरण'सुद्धा अगदी रम्य, तरल स्वप्नात गुंग होती. जागी होती फक्त त्या दोन उंच इमारतींमधील झोपडपट्टी आणि जागा होता समोरचा अथांग निळा सागर. तो सुद्धा आपला नेहमीचा खळखळाट थांबवून शांतपणे त्या झोपडपट्टीचे गा-हाणे ऐकत होता. कारण कधी नव्हे ती झोपडपट्टी बोलत होती.
तिचा स्वर अगदी धीरगंभीर होता. तिच्या वयाचा विचार केला तर ती जरा अधिकच पोक्त वाटत होती. नाहीतरी संकटे कोसळली की अनुभवाने सर्वांनाच अकाली प्रौढत्व येते.


zopadpatti bolu lagte tevha essay in marathi
 zopadpatti bolu lagte tevha essay in marathi


 या झोपडपट्टीचे तसेच झाले होते. बरेच दिवस मनात साचलेली 'दु:खे' तिला आता कुणाला तरी सांगायची होती. तिने गिरनारला हाका मारल्या तेव्हा उषाकिरण जागी झाली आणि नवलाईने ऐकू लागली. “अरे गिरनार, तू आणि तुझी मैत्रीण उषाकिरण, माझ्याकडे तिरस्काराने बघता. माझ्या ओंगळ रूपामुळे तुमचे सौंदर्य डागाळते असे तुम्हांला वाटते. पण, तुमचा हा उलटा न्यायच नाही का? अरे सांगा, या जागेवर आधी कोण होते, तुम्ही की मी? माझीच जागा बळकावून तुम्ही मला दूर करू पाहता.


 कोठे जातील ही गरीब माणसे आणि त्यांची कच्चीबच्ची? तुमच्या मोठमोठ्या फ्लॅट्समध्ये जेवढी माणसे राहतात त्याच्या दसपट माणसे एका एका झोपडीत राहतात. रात्री झोपताना पाहावे तर एकाच्या अंगावर दुसऱ्याचे पाय ; तुमच्याकडे मात्र प्रत्येकाला स्वतंत्र खोली. तुम्ही माणसे आणि तीही माणसेच ना! मग हा फरक का? तुमच्याजवळ जे अवयव आहेत, तेच त्यांच्याजवळ. शक्तिसामर्थ्याबद्दल बोलायचे झाले तर कदाचित ती माणसे तुमच्यापेक्षा वरचढ ठरतील! मग हा भेदभाव का? पुरेसे अन्न नाही, चांगले कपडे नाहीत. चैनीच्या गोष्टी नाहीत. कारण त्यांच्याजवळ दामाजीपंतांचा अभाव आहे. तुम्ही मात्र स्वतःच्या गरजेपेक्षा अवास्तव पैसा बळकावून बसला आहात.



तुम्हांला माझे रूप ओंगळ वाटते. पण याला जबाबदार कोण? येथे राहणाऱ्या हजारो माणसांना का स्वच्छ जीवन आवडणार नाही! पण साधे पाणी तरी त्यांना पुरेसे मिळते का? तुला आठवते ती पु. लं. ची 'फुलराणी' रंगमंचावर काय सांगत होती? 'म्युनिसिपालटीचा मोठा नळ फुटतो तेव्हा आमची आंघोळ.' एवढ्या लहानशा जागेत हा माणसे आपले सर्व विधी उरकतात. मग घाण नाही का होणार?



 त्यांची दुःखं तरी किती अगणित. त्यामुळे ते मदयाला जवळ करतात. तर तुम्ही त्यांना त्यासाठी बोल लावता. पण तुमचे फ्रीज-कपाटांचे चोरकप्पे उघडा. तेथे काय आढळते? परक्या देशातील चोरट्या वाटेने आलेल्या मदयाच्या बाटल्या. तुमचे जीवन सुखी व्हावे यासाठी ही माणसे राबतात. या माणसांच्या श्रमांवरच तुम्ही तुमचे सुखी जीवन उभारलेले असते. पण त्यांचे जीवन साधारण सुसहय व्हावे एवढेही तुम्ही पाहत नाहीत. उलट आम्ही म्हणजे या झोपडपट्ट्या आणि त्यांतील माणसे यांचे खरेखोटे जीवन तुम्ही तुमच्या साहित्यात रंगवता आणि मानवतेचा पुळका आल्याचे भासवून पडदयावरही त्याचे अवास्तव चित्रण करता. पण एक लक्षात ठेवा,


 अनंत काणेकरांनी सांगितलंय त्याप्रमाणे ‘याच माणसांजवळ मोठं मन आहे, माणुसकी आहे.' झोपडपट्टी गप्प झाली, ती थकली होती; पण आता तिला हलके वाटत होते. 'गिरनार' शांत होता. सागर मात्र खवळला होता. वरील निबंध झोपडपट्टी बोलू लागते तेव्हा आत्‍मकथनात्‍मक  मराठी निबंध | zopadpatti bolu lagte tevha essay in marathi हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

झोपडपट्टी बोलू लागते तेव्हा आत्‍मकथनात्‍मक मराठी निबंध | zopadpatti bolu lagte tevha essay in marathi

गुलाबफुलाचे मनोगत (गुलाबपुष्प प्रदर्शनात पहिला क्रमांक मिळालेल्या)  मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Gulab Fulache Manogat Essay In Marathi

गुलाबफुलाचे मनोगत (गुलाबपुष्प प्रदर्शनात पहिला क्रमांक मिळालेल्या)  मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Gulab Fulache Manogat Essay In Marathi :  “मित्रांनो, या तुमच्या समारंभात आज मला भाषण करण्याची संधी हवी आहे. मला ओळखलेत ना तुम्ही ! अहो, तुमच्या या समारंभातील मी सम्राज्ञी आहे. आज दोन दिवस येथे हे प्रदर्शन चालू आहे. या गुलाबपुष्प प्रदर्शनातील सम्राज्ञी ठरलेली मी एक गुलाबकळी. या प्रदर्शनात मी पहिला क्रमांक मिळविला आहे. तो मान तुम्हीच मला दिलात. हजारो फूलांतुन माझी निवड  झाली आहे. त्या निमित्ताने माझ्या मालकिणीचाही गौरव झाला आहे.


“माझ्या मालकिणीचे श्रेय मी मान्य करतेच. कारण तिने घेतलेल्या निगराणीमुळेच मलो आजचे हे सौंदर्य प्राप्त झाले आहे. दिवसातील बराच वेळ ती आमच्यासाठी खर्च करते. त्यासाठी ती बरेच वाचन करते, संशोधन करते आणि त्यामुळेच अनेकदा माझ्या मालकिणीला गुलाबपुष्प प्रदर्शनात बक्षिसे मिळतात. तिचा छंद आज तिचा ध्यास झाला आहे.



Gulab Fulache Manogat Essay In Marathi
Gulab Fulache Manogat Essay In Marathi


“आज मी तुम्हांला माझे मनोगत सांगणार आहे. आम्हां गुलाबपुष्पांचा जन्म माणसाच्या जन्मापूर्वीच झालेला आहे. तसे संदर्भ आढळतात. पण आमची निश्चित जन्मभूमी कोणती हे मात्र कुणाला सांगता येत नाही, तरी प्राचीनकाळी रोम हे गुलाबांच्या बागांसाठी विख्यात होते. दहाव्या शतकात अरबांनी आम्हांला भारतात आणले. तुमच्या प्राचीन वाङ्मयात आम्हांला अनेक नावांनी संबोधिलेले आहे. त्यांतील एक नाव आहे 'तरुणीपुष्प.'


 किती यथार्थ नाव आहे हे! तरुणतरुणींत मी विशेष प्रिय आहे. एकमेकांच्या प्रेमाचे प्रतीकच ते मला मानतात. मोगल राजांच्या काळात आमची लोकप्रियता विशेष वाढली. जहांगीर बादशहा ब बेगम नूरजहान यांच्या विवाहप्रसंगी आमच्यापासून प्रथम अत्तर तयार करण्यात आले.

“आज आमच्या हजारो जाती तयार करण्यात आल्या आहेत. पण सर्वच जाती सुगंधी नाहीत. नाना आकार, नाना रंग. मित्रांनो, आजवर आम्हांला अनेक गौरव लाभले. पंडितजींच्या कोटावरील लाल गुलाब हा विश्वप्रेमाचा संदेश देत होता. आज गुलाबपुष्पांचा छंद विश्वव्यापी झाला आहे. त्यामुळेच जगभर ठिकठिकाणी आमची प्रदर्शने भरविली जातात.


“या सगळ्यात एक खंत आहे की हे माझे वैभव फक्त काही मूठभर लोकांचीच मिरासदारी झाली आहे. गुलाबाचा छंद जोपासणे म्हणजे चिक काम आहे. त्यामुळे गोरगरीब याकडे वळतही नाहीत. कालपासून मी पाहते, एवढी मंडळी माझे सौंदर्य पाहून गेली पण त्यांत एकही श्रमिक नव्हता, झोपडपट्टीतील एकही मूल नव्हते.


 मी मान्य करते की माझ्यासारखी फुले देणारी झाडे ते लावू शकणार नाहीत पण या प्रदर्शनातील हजारो फुलांचे अनुपम सौंदर्य ते आपल्या डोळ्यांनी लुटू शकणार नाहीत का? हा आगळा आनंद त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. दोन दिवस हे प्रदर्शन तिकिट लावून झाले. आता एखादा दिवस विनातिकिट हे प्रदर्शन ठेवले तर चालणार नाही का? भाकरीमागे धडपडणाऱ्या मंडळींना मुद्दाम येथे आणले तर ... तरच माझ्या या अल्पायुषी जीवनाचे खरे सार्थक होईल.”


टीप : वरील निबंध गुलाबफुलाचे मनोगत (गुलाबपुष्प प्रदर्शनात पहिला क्रमांक मिळालेल्या)  मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Gulab Fulache Manogat Essay In Marathi या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते


  • fulache manogat nibandh marathi
  • fulanchi atmakatha nibandh in marathi
  • fulanchi atmakatha essay in marathi language
  • fulache atmavrutta essay in marathi language
  • fulache atmakatha essay in marathi

गुलाबफुलाचे मनोगत (गुलाबपुष्प प्रदर्शनात पहिला क्रमांक मिळालेल्या) मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Gulab Fulache Manogat Essay In Marathi

गावकुसाबाहेरील वस्ती'चे आत्मवृत्त आत्‍मकथनात्‍मक मराठी निबंध 



मी गावकुसाबाहेरची वस्ती आहे' “पाहुण्यांनो, क्षणभर थांबा. नाकावर रुमाल ठेवून तुम्ही येथून झपाझप जात आहात. पण थांबा. मला तुमच्याशीच बोलायचे आहे. इतका वेळ तुम्ही गावाची प्रशंसा करीत होता. पण आता मला पाहुन नाक मुरडता. किती कृतघ्न आहात तुम्ही! 'गाव तिथं महारवाडा असायचाच' असे तुम्ही उपेक्षेने म्हणता. पण खरं सांगू का, हा महारवाडा आहे म्हणूनच गाव एवढा स्वच्छ आहे. गावातला केरकचरा हा महार गोळा करून आणतो. मेलेले ढोर हा मांग ओढून आणतो. या वस्तीतील ही सारी मंडळी गावासाठी राबत असतात आणि त्याबद्दल या लोकांना काय मिळते? तर केवळ शिव्याशाप.


"निसर्गाने सर्वांसाठी भरभरून दिलेले पाणीही या लोकांना मिळत नाही. तहान भागायची मारामार, मग त्यांनी स्वच्छ तरी कसे राहायचे? यांची पोटे तर सदा रिकामीच. मग जे काही मिळेल ते खायचे. 'शिळेपाके, आंबलेले' या शब्दांशिवाय दुसरे शब्द त्यांना माहीतच नाहीत. कष्टांशिवाय ‘कचाकचा भांडायचे' एवढीच त्यांची दुसरी करमणूक. कोणत्याही रोग-साथीला ही वस्ती प्रिय, मग फटाफट मृत्यू. नव्या जन्माचा आनंद नाही. मृत्यूचा शोक नाही. आनंद-शोक करायला येथील माणसांजवळ वेळ आहे तरी कुठे?

gavakusabaheril vastiche atamrutta essay in marathi
gavakusabaheril vastiche atamrutta essay in marathi


“आता हे गावकुसाबाहेरील जगही जागे व्हावयास लागले आहे. येथील काही मुले शहरात जाऊन शिक्षण घेत आहेत. त्यांच्यातला माणूस जागा झाला आहे. ते आपल्या लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊ लागले आहेत. गावाने दिलेले फाटके कपडेच तराळाने घातले पाहिजेत, नवीन कोरे कपडे अंगावर चढवायचे नाहीत, ही वर्षानुवर्षे चालत आलेली समजूत ते पुसू पाहत आहेत.


 ग्रहणाच्या वेळी 'दे दान सुटे गिराण' म्हणून दान मागायचे नाही अशी शिकवण ते आपल्या लोकांना देत आहेत. त्यांच्यातील भटक्या लोकांच्या मुलांना स्थिर जीवन लाभावे म्हणून त्यांची खटपट चालू आहे. त्यासाठी आता येथे शाळा पण सुरू झाली. गावातील विहिरीवर ते आपला हक्क आता संगू लागले आहेत. गावकऱ्यांना हे कसे रूचणार? मग ते म्हणतात-'म्हारडा मातला आहे.' कधी कधी मला पेटवून दिले जाते. मारझोड तर नित्याचीच. पण लक्षात ठेवा, आता मी ऐकणार .... वर्षे तुम्ही मला गावाबाहेर ठेवलेत, पण आता येथेही नवे गाव वसणार आहे."




वरील निबंध गावकुसाबाहेरील वस्ती'चे आत्मवृत्त आत्‍मकथनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

गावकुसाबाहेरील वस्ती'चे आत्मवृत्त आत्‍मकथनात्‍मक मराठी निबंध | Gavakusabaheril Vastiche Atamrutta Essay In Marathi

मी चहा बोलतोय मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Mi Chaha Boltoy Nibandh In Marathi

निबंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी चहा बोलतोय मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्ये चहाच्या उगमापासून ते आजपर्यंत चहा मानवी जीवनात कोणते चांगले वाईट बदल घडवून आणतो हे सांगितले आहे.  यात चहा स्वतः त्याची मनोगत सांगत असल्याने निबंध खूपच  मनोरंजक होतो.  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला


प्रवास अगदी कंटाळवाणा झाला होता. केव्हा एखादे स्टेशन येते आणि आपण कपभर चहा घेतो असं मला झाले होते. वेळ होती मध्यरात्रीची. बाकीचे प्रवासी शांतपणे झोपले होते. गाडीचा वेग मंदावला, स्टेशन आले. पण माझी मनीषा काही पूर्ण झाली नाही, कारण चहावालाही शांत झोपला होता. अस्सा राग आला तेव्हा त्याचा.



गाडी पुढे निघाली आणि काय चमत्कार! एक वाफाळलेला चहाचा कप माझ्यापुढे आला, मी कप उचलणार तेवढ्यात आवाज आला, “मी चहा आहे. तू माझी आठवण काढलीस ना, म्हणून मुद्दाम आलो. अरे, मी तुझ्या देशातीलच आहे आणि आता सर्वांच्या इतक्या परिचयाचा झालो आहे की काही वेळेला ‘अतिपरिचयात् अवज्ञा' असाही अनुभव येतो.



माझे पूर्वज मूळचे चीनमधील. चीन या देशानेच साऱ्या जगाला माझी देणगी दिली आहे. खरं पाहता आपल्या भारतात आसाममध्येही माझे पूर्वज फार पूर्वीपासून अस्तित्वात होते. पण कोणाचे त्यांच्याकडे विशेष लक्ष नव्हते. ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भारतात माझा खरा विकास साधला. आज भारताला मी आणि माझे बांधव बरेच परकीय चलन मिळवून देतो."

Mi Chaha Boltoy Nibandh In Marathi
Mi Chaha Boltoy Nibandh In Marathi


"खरं सांगू का, मला माझा विशेष अभिमान वाटतो तो वेगळ्या गोष्टीसाठी. आज या भारतात एवढी विषमता आहे. गरीब-श्रीमंत हा केवढा भेदभाव आहे; पण माझ्याजवळ असा कोणताच फरक नाही. आलिशान बंगल्यात माझे जेवढे अगत्याने स्वागत होते तेवढीच एखादया झोपडपट्टीत केले जाते. एखादया विद्वान साहित्यिकाला, संशोधकाला माझी जेवढी गरज असते तेवढीच यंत्रावर काम करणाऱ्या कामगारालाही माझी आवश्यकता असते. सर्वांना स्फूर्ती देणारे, प्रेरणा देणारे असे उत्तेजक पेय माझ्यापासून तयार करता येते.



“मळ्यातल्या छोट्या छोट्या झुडपांवर माझा जन्म होतो. आसाममधील ब्रह्मपुत्रेचे खोरे हिमालयाच्या पायथ्यावर दुआर व तराई हा डोंगराळ भाग, दार्जिलिंग, रांची, डेहराडून खोरे, कांगा खोरे अशा भारतातील विविध भागांत मी व माझे भाईबंद जन्माला येतो. आमची खुडणी भारतात हातांनीच केली जाते. खुडणी करणाऱ्या स्त्रियांच्या पाठीवर पिशवी असते, त्यांत त्या आमची पाने टाकतात. तेथन आमची पाठवणी कारखान्यात होते, तेथे यंत्राच्या साहाय्याने वळविणे, वाळविणे वगैरे क्रिया होतात आणि मग खास प्लायवूडच्या पेट्यांतून आमची देशोदेशी रवानगी होते."



“मित्रा, साखर, दूध व पाणी यांच्या संयोगाने तुम्ही आमचा आस्वाद घेता. काही. देशात दुधाचा वापर न करता लिंबू, लोणी यांचा उपयोग करतात. काही लोक आमच्यावर टीका करताना 'टॅनिनचा' गाजावाजा करतात; पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. फार उकळविल्याने टॅनिन पेयात उतरते त्यात आमची काय चूक ? उलट चहा हे शरीराला हितकारक व उत्साहवर्धक पेय आहे
.

आवाज थांबला, पण माझा कंटाळा आणि आलेली मरगळ केव्हाच संपली होती. गाडी कुठल्यातरी स्टेशनात थांबली आणि एक चहावाला न बोलावताच माझ्यासमोर चहा घेऊन उभा ठाकला होता!


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 2

chaha che atmavrutta in essay in  marathi



तुमची नि माझी खूप गट्टी आहे. कारण तुमच्या प्रत्येक दिवसाची सुरुवातच मुळी माझ्या, म्हणजे चहाच्या सेवनाने होते. चहाचा एक कप घेतल्याशिवाय तुमच्या कामाला सुरुवात होत नाही. कचेरीत काम करताना किंवा अभ्यास करताना कंटाळा आला की, तुम्ही माझी आठवण काढता.


एक कप गरमागरम चहा मिळाला की, पुन्हा कामाला, पुन्हा अभ्यासाला सुरुवात ! संध्याकाळी कामावरून दमून परत आल्यावर पुन्हा माझी आठवण होतेच.  तुमच्यासाठीच मी दूरवरून येतो. तुमची आणि माझी पहिली ओळख करून दिली ती चिनी प्रवाशांनी. आता भारतात माझी खूप लागवड होते. 


ज्यावेळी भारतावर ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं, तेव्हा येथे आलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी माझी खूप लागवड केली. आसाममधील ब्रह्मपुत्रेचं खोरं, हिमालयाच्या पायथ्यावरील दुआर व तराईचा डोंगराळ भाग, दार्जिलिंग, रांची, डेहराडून खोरं येथे आमची खूप लागवड केली जाते. आज भारतात आमची एवढी विपुल निर्मिती होते की, परदेशात आमची निर्यात होते. भारताला आम्ही भरपूर परकीय चलन मिळवून देतो.


आसाममधील एका मळ्यातल्या छोट्या झुडपावर माझा जन्म झाला. स्थानिक स्त्रिया आमच्या खुडणीचं काम करतात. दोन्ही हातांनी पानं खुडून त्या पाठीवरच्या टोपलीत टाकतात. तेथून आमची पाठवणी कारखान्यात होते. पुढील सर्व कामं कारखान्यात चालतात. यंत्राच्या साहाय्याने पानं वळवणं, वाळवणं वगैरे सोपस्कार होतात आणि मग खास खोक्यांतून आम्हांला देशोदेशी पाठवलं जातं. तेव्हा तेथे आम्हांला विविध नावे मिळतात.


आज मला जगात सर्व ठिकाणांहून मागणी आहे. श्रीमंतांच्या महालापासून गरिबांच्या झोपडीपर्यंत सर्वत्र माझे कायमचे वास्तव्य असते. माझ्यापासून उत्तेजक पेय बनवण्याच्या विविध पद्धती आढळतात. बहुसंख्य लोक पाणी, दूध, साखर यांचा चहापेय बनवण्यासाठी उपयोग करतात. काही देशांत चहात लिंबू, लोणी टाकतात, तर काहीजण मीठ टाकून चहाला नमकीन बनवतात, कुणाला चहा फार कडक लागतो, तर कोणाला अतिशय सौम्य लागतो.


कोणी टीकाकार चहाला अपेय ' मानतात. त्यांतील टॅनिनचा ते बागुलबुवा करतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट, त्याच न्यायाने 'चहाबाजपणा' तापदायक होतो. त्याचे  व्यसन जडते. तुमच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण समारंभांची लज्जत वाढवण्यात तुम्हांला माझी मोलाची मदत होते. अशी आहे ही तुमच्या-माझ्यातील दोस्ती!

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


महत्‍वाचे मुद्दे : 
(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • चहाचा जुना परिचय 
  • दिवसाची सुरुवात 
  • चहा चीनमधून आला 
  • लागवडीची पद्धत
  • अनुकूल वातावरण व जागा
  • कारखान्यात होणारे संस्कार 
  • सर्वत्र मागणी
  • श्रीमंत, गरीब
  • बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती
  • सर्वांना उत्तेजन देतो
  • तरी टीका
  • जीवनात चहाला आगळे त्त्व.


टीप : वरील निबंध मी चहा बोलतोय मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते.
  • mi chaha boltoy nibandh in  marathi

मी चहा बोलतोय मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Mi Chaha Boltoy Nibandh In Marathi

एका पुतळयाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक| Eka Putlyache Manogat Essay In Marathi

एका पुतळयाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक : 'पुण्याचे रूपांतर लवकरच पुतळ्यांच्या शहरात होईल' पुण्याच्या 'दैनिक सकाळ'मध्ये कुणीतरी वर्तविलेले हे भविष्य. त्यामागचा उपरोध बराच काळ मनात रेंगाळत राहिला. टीकाकाराने पुण्यातील एका रस्त्यावरच्या पुतळयाची मोजदाद केली होती आणि मग असे हे पुतळे जागोजागी असावेत की नसावेत याबद्दलची उलटसुलट मते वाचकांनी मांडली होती. मनात आले या वादविषयात त्या पुतळ्यांचे कोणी मत घेतले आहे का?


"किती वेडी आहेस ग! अग पुतळयांच मत कोण घेणार? पुतळयांना आपलं मत मांडता आलं असतं तर मग त्यांना पूतळे म्हणता आले असते का?" आता मात्र त्या पुतळ्याने आपले पुतळेपण काही काळ बाजूला ठेवले होते आणि तो स्वतःचे मन उघडे करीत होता

"अरे माणसा, आमच्यासारखे दुर्दैवी आम्हीच. कारण आम्हांला रस्त्यांवर उभे करणारे लोक, त्यातून आपला काही ना काही स्वार्थच साधत असतात; आणि गप्पा मात्र स्वार्थत्यागाच्या करतात. केवढी विसंगती आहे ही! पण तेही आम्ही निमूटपणे सहन करतो. एखादी थोर व्यक्ती विशिष्ट ध्येयासाठी जीवनभर अखंड झिजते. प्रसंगी त्या ध्येयासाठी प्राणही ठेवते आणि मग तिच्या मृत्यूनंतर तिच्या ध्येयतत्त्वांना हरताळ फासला जाऊन तिचा पुतळा उभारला जातो. भांडवलशाहीला विरोध करणाऱ्या नेत्याच्या पुतळ्यासाठी भांडवलदारांकडून चंदा गोळा केला जातो. केवढा हा दैवदुर्विलास!



“मग सांगा, आवश्यकता आहे का अशा पुतळयांची? पुतळे उभारले जातात ते उभारणाऱ्या व्यक्तींचा वा संस्थेचा दानशूरपणा, मोठेपणा सिद्ध व्हावा म्हणूनच. थोरांची ही थोर स्मारके इतरांना स्फूर्तिदायक होतात ही एक फसवी, लोणकढी थाप आहे. लोकांना आपल्या दैनंदिन व्यवहारात त्यांची आठवणही होत नाही.
Eka Putlyache Manogat Essay In Marathi
Eka Putlyache Manogat Essay In Marathi


"माझा जन्मही अशाच काही धनवंतांच्या गर्वातून झाला आहे. ज्या व्यक्तीचं प्रतिनिधित्व मी करीत आहे तिच्या पासंगालाही उभं राहण्याची या धनवंतांची योग्यता नाही. आपण विचारवतांना मानतो, याचे भव्य प्रदर्शन हा या पुतळानिमितीमागचा त्याचा हेतू आहे. त्या महान व्यक्तीचा गौरव करण्याच्या निमित्ताने त्यांनी स्वतःचीच नावे लिहून, स्वतःचाच गौरव करून घेतला आहे. खरं सांगू, माझ्या अनावरणाचा तो दिवस माझ्या जीवनातील सर्वांत आनंदाचा दिवस असावयास हवा होता, पण तोच माझ्या दुःखाचा दिवस ठरला. कारण तेव्हापासूनच माझी ही विटंबना सुरू झाली आहे.”

"उन्हापावसात मी येथे तटस्थपणे उभा आहे. माझ्याभोवती अनेक थोर व्यक्तीही माझ्यासारख्याच पुतळ्यांच्या रूपांत उभ्या आहेत. अंगावर कावळे, चिमण्या व इतर पाखरे घाण करीत आहेत. पण याहूनही मला उबग आला आहे तो काही लोकांच्या हीन वृत्तीचा. या लोकांच्या विघातक गोष्टींपूढे पक्ष्यांनी केलेल्या घाणीचे काहीच वाटत नाही. समाजकंटक लोकांची ही कुटिल कृत्ये पाहून मन बेचैन होते, पण मी काय करणार? बोलूनचालून मी एक पुतळा!" एवढं बोलून तो आवाज बंद झाला आणि तो बोलणारा पुतळा पुनश्च मूक पुतळा झाला.

वरील निबंध एका पुतळयाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद



एका पुतळयाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Eka Putlyache Manogat Essay In Marathi

दरवेशाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Darveshache Manogat Essay In Marathi


दरवेशाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक : “मी आहे एक दरवेशी. दारोदार हिंडणारा. बरोबर आहे माझा सारा कुटुंबकबिला. त्यांत मुख्य आहे भालू-म्हणजे हे माझे काळे अस्वल. नंतर माझी पत्नी आणि माझी दोन चिल्लीपिल्ली. सध्या तरी हा भालूच आम्हां सर्वांचा पोशिंदा आहे.


"माझ्या वाडवडिलांकडून हा व्यवसाय माझ्याकडे आला. माझा बापही दरवेशीच होता. त्याच्याबरोबर मी लहानपणी गावोगाव हिंडत असे. मी केव्हा मोठा झालो आणि ही अस्वलाची दोरी माझ्या हातात कशी आली हे मला उमगलेच नाही. बाप थकला होता, तरीही आमच्याबरोबरच हिंडत होता. कारण आम्हांला कायमचं असं घरच नाही. अशाच भटकंतीत कुठेतरी बापाला मरण आलं. तिथेच त्याला अग्नी दिला.

“लोकहो, हेच माझे दुःख आहे. कसले हे जगणे! पाय दुखेस्तोवर आम्ही चालत राहतो. गाव लागला की खेळ करतो. कधी कुठे बरी मिळकत होते तेव्हा आम्ही भालूला प्रथम पोटभर खायला घालतो. भालूला सर्व भाजीपाला आवडतो. पण मांस खायला मिळाले की स्वारी खूष. भालूला सर्वांत प्रिय म्हणजे 'मध.' मी त्याला सणावारी भरपूर मध खायला घालतो. आमची चार माणसांची गूजराण बहधा होते ती वडापावांवर. जेव्हा एखादया गावात आमचा मुक्काम असतो तेव्हाच आम्ही तीन दगडांची चूल पेटवितो आणि त्याच वेळी पोरांना भाकरी मिळते.



darveshache manogat essay in marathi
darveshache manogat essay in marathi


“लोकहो, आता मला या भटक्या जीवनाचा कंटाळा आला आहे. पण मी दुसरे कोणतेच काम करू शकत नाही. मी पूर्णपणे अडाणी आहे. मला कधी शिकायला मिळाले नाही. या अस्वलाबरोबरच मी मोठा झालो. म्हणून त्याच्याबरोबर नाचणे, उड्या मारणे एवढेच मला जमते. आज त्याचीच शिक्षा मी भोगत आहे. वर्षातील एकही दिवस मला पोटभर जेवण मिळत नाही. लोक खेळ बघायला गर्दी करतात, 


अस्वलाचे काम पाहून टाळ्या पिटतात. पण पैशासाठी थाळी फिरविली की मात्र पळ काढतात. काही खेड़त लोक अस्वलाच्या केसांचा ताईत विकत घेऊन आपल्या लेकरांच्या गळ्यात घालतात. खरं सांगू का! माझा काही या ताईतांवर विश्वास नाही, तरी पण मी ताईत तयार करून विकतो. कारण त्यांतच मला मिळकत होते. चार आणे खर्च येणारा ताईत मी दोन रुपयांना विकतो.

“मायबाप लोकहो! माझं तुमच्याकडे एकच मागणे आहे. आता मी असं ऐकतो की भटक्या लोकांच्या  मुलांसाठी सरकार शाळा काढणार आहे. मला माझ्या या दोन्ही मुलांना शिकवायचे आहे. त्यांच्या तरी नशिबी हा दरवेशीपणा नको. निघाली आहे का अशी शाळा? तिथं माझी ही कोकरं राहतील! मग त्यांच्यासाठी कितीही कष्ट करायला लागले तरी मी व माझा भालू करू. अगदी शेवटपर्यंत मी आणि भालू एकमेकांना सोडणार नाही.

वरील निबंध दरवेशाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

दरवेशाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Darveshache Manogat Essay In Marathi


भग्न देवालयाचे मनोगत मराठी निबंध  आत्‍मकथनात्‍मक

Autobiography of An Old temple in Marathi essay

भग्न देवालयाचे मनोगत मराठी निबंध  आत्‍मकथनात्‍मक : सुट्टी लागली म्हणून आम्ही काही मित्र आमच्या एका मित्राच्या गावी गेलो. शहरापासून दूर अशा त्या शांत गावात आम्हांला खूपच बरे वाटत होते. मोकळ्या वातावरणात दूरदूर फिरताना एक आगळा आनंद मिळत होता. अशाच भटकंतीत एका गर्द वनराईत एक देऊळ आढळले. कुतुहलाने देवळात शिरलो आणि मन विषण्ण झाले. कारण ते देऊळ भंगलेले होते. केवळ देवळाचीच पडझड झालेली नव्हती, तर आतील मूर्तीही भग्न झाली होती. हे कोणातरी मूर्तिभंजकाचे काम असावे, हे सहज लक्षात येत होते. माझ्याबरोबरचे सर्वच मित्र खिन्न झाले. हे कोणाचे कृत्य असावे बरे? सारेजण विचारात पडले. तेवढ्यात एक गंभीर आवाज निनादला.

Autobiography of An Old temple in Marathi essay
Autobiography of An Old temple in Marathi essay
"ऐका युवकांनो, तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी देते. मी कोण? तुमची श्रद्धा असलेला 'राम' हा देव आहे ना, त्याची मी प्रतिमा. खूप वर्षांपूर्वी एका भाविकाने माझी येथे प्रतिष्ठापना केली. मोठ्या भाविकतेने त्याने राजस्थानातून मला येथे आणले. दूरवरून कारागीर आणून हे सुंदर मंदिर उभारले. सभोवताली गर्द वनराजी लावली. गावातील लोक भक्तिभावाने माझी पूजा करीत. सर्व मंडळी गुण्यागोविंदाने नांदत होती तोवर मी वैभवात होते. धर्म, जात, पंथ येथे आड येत नव्हते. सर्व माणसे देवाला सारखीच, तसा सर्वांचा ईश्वरही एकच. केवढी थोर भावना.

“गावात कुणी बाहेरचे लोक येऊ लागले. त्यांच्याबरोबर अनेक नवे विचार गावात येत गेले, कुरबूरी सुरू झाल्या. भांडणे होऊ लागली, ती वाढली आणि विकोपाला गेली. माझा धर्म इतरांच्या धर्मापेक्षा श्रेष्ठ असे प्रत्येकाला वाटू लागले. मग कुणी वेड्यापीराने माझी अशी दुर्दशा केली. येथे रणकंदन माजले. अनेकांचे बळी पडले आणि या मंदिराचीही मोडतोड झाली. तेव्हापासून लोक येथे फिरकत नाहीत. तुम्ही येथे आलात म्हणून मी मन मोकळे केले.
वरील निबंध भग्न देवालयाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

भग्न देवालयाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Autobiography of An Old temple in Marathi essay

स्वतंत्रतेची कैफियत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक


स्वतंत्रतेची कैफियत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक : “अरे अज्ञ मुलांनो, जरा इकडे लक्ष दया. मला बोलू दया. माझे डोळे तुमचे हे सहस्र अपराध पाहन आता थकले आहेत. ओळखलंत ना मला! मी आहे तुमची 'स्वातंत्र्यदेवता.' आपण स्वतंत्र देशाचे नागरिक आहोत असे तुम्ही केवढे अभिमानाने सांगता. तेव्हा क्षणभर मी रोमांचित होते, पण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या तुम्हांला पाहिले ना की, मी व्यथित होते.



 मला प्राप्त करण्यासाठी तुमच्या काही बांधवांनी प्राणांची बाजी लावली. आठवा त्यांचा त्याग! केवळ 'हुतात्मे' म्हणून वर्षातून एक दिवस त्यांचे स्मरण करून तुमचे त्यांच्याविषयीचे कर्तव्य संपत नाही. माझी प्राप्ती करून घेण्यासाठी ज्या माझ्या एका सपत्राने प्राण दिले त्याची दुर्दैवी पत्नी आज चार घरची भांडीधुणी करून आपले व आपल्या चार मुलांचे कसेबसे पोट भरीत आहे. तरी का तुम्हांला याची जाण? आयुष्यभर महात्माजी कष्टले, ते कशासाठी? आपल्या संसाराचा सारिपाट उधळून स्वातंत्र्यवीर झिजले ते कशासाठी? आपल्या साऱ्या वैभवाचा त्याग करून पंडितजींनी कारावासातील कष्टप्रद जीवन पत्करले, ते कशासाठी? माझ्यासाठीच ना?



swatantratechi kaifiyat essay in marathi
swatantratechi kaifiyat essay in marathi
आजचे माझे पुत्र-पुत्र कसले कुपूत्र. तुम्ही माझा-स्वतंत्रतेचा लिलाव करायलाच उदयुक्त झाला आहात का? प्रत्यक्ष आपल्या मातेची अशी विटंबना करणारे साऱ्या पृथ्वीवर कूणी नसतील. नाहीतर मूठभर पैशासाठी आपल्या देशाची रहस्ये विकायला माझेच हे सुज्ञ पुत्र कसे तयार झाले असते? कुणीतरी भडकविले म्हणून माझेच तुकडे करायला हे माझे दिवटे पुत्र कसे तयार झाले असते?


स्वातंत्र्य, समता, बंधुता या त्रयींचा सदैव जप करणारे तुम्ही दुसऱ्याला गुलामीत कसे ठेवता? घरातील स्त्रीला तुम्ही स्वातंत्र्य देत नाही. कुणाला तरी आपला ऋणको समजून त्याला पिढ्यान्पिढयाचा गुलाम करता, कूणाला तरी जन्माने दलित मानून त्याला बंधनात टाकता, स्वतःची हौस म्हणून स्वच्छंदी पक्ष्यांना, माशांना पिंजऱ्यांत टाकता. हे कसे? हीच माझी तुमच्याविरुद्ध कैफियत आहे.
वरील निबंध स्वतंत्रतेची कैफियत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

स्वतंत्रतेची कैफियत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक

सागराचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक 


सागराचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक : "माझ्या काठावर जमलेल्या मुशाफिरांनो, क्षणभर येथे थांबा आणि माझे मनोगत ऐकून घ्या. आजवर अनेकदा मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न केले पण ते यशस्वी झाले नाहीत. शेवटी मलाही मर्यादा आहेतच ना!


“मानवा, महासागर म्हणून तू माझे कौतुक करतोस. रत्नाकर' म्हणून मला संबोधून माझ्या वैभवाचा गौरव करतोस तरीपण हे मानवा, माझ्या उणिवा मी जाणतो. माझ्या काठी आलेल्या तुझी तहान मी भागवू शकत नाही. माझे पाणी खारट आहे म्हणून तुम्ही सर्वजण मला नावे ठेवता. पण हा खारटपणा माझ्यात का उतरला माहीत आहे तुम्हांला? 


साऱ्या जगाची सारी घाण, सारे क्षार मी सामावून घेतो. धर्म, जात, पंथ, वर्ण इत्यादी कारणांवरून तुम्ही झगडता; पण तसा भेदभाव माझ्याकडे नाही. तुमच्या श्रीगजाननांच्या मूर्तीना मी माझ्यात सामावून घेतो, त्याचप्रमाणे इस्लाम बांधवांचे ताबूतही माझ्यातच समर्पित होतात!


sagarache manogat marathi nibandh
sagarache manogat marathi nibandh


“मनुपुत्रांनो, तुम्ही मला कितीही नावे ठेवलीत ना, तरी तुम्ही माझे लाडके आहात! म्हणूनच तुमच्या साऱ्या लीला मी आजवर सहन केल्या. तुमच्यातल्या एका कवीने माझी निदानालस्ती करताना म्हटले आहे की, हा पयोधर पाणी साठवून ठेवतो म्हणून त्याचे स्थान खाली आहे आणि पयोद पाणी देतो म्हणून त्याचे स्थान उंचावर, आकाशात आहे. पण या मूर्ख कवीला हे माहीत नसावे की, पयोधर आहे म्हणूनच पयोद आहे. बरे असू दे ते. मला आज तुमच्याशी बोलायचे आहे ते वेगळेच. 


मानवा, आजवर तू समुद्रमंथनाची कथा केवळ कौतुकाने सांगत होतास. पण आज मात्र तु खरोखरच माझे मंथन चालविले आहेस. देवकथेतील चौदा रत्नांपेक्षाही अधिक अमूल्य, या औदयोगिक युगाला आवश्यक असे इंधन तुम्ही माझ्या अंतःकरणातून बाहेर काढले. तुमच्या बुद्धिवैभवाचे मला सदैव कौतुक वाटते. म्हणूनच यंत्रांकडून घुसळले जाण्याचे सर्व दुःख मी सहन करतो. तुमच्या साहसाने मी दिङ्मूढ होतो. तुमच्यातील काहीजण वर्षानुवर्षे माझ्या उदरात दडलेल्या अंटाक्टिकावरही पोहोचले आहेत.

"अभिमानास्पद वाटणाऱ्या या घटना घडतानाच पुढच्या काही अशुभ घटनांची मला चाहूल लागत आहे. अंटाक्टिका खंडावरील अधिवासाबाबतचे झगडे आताच सुरू होऊ लागले आहेत. हिंदी महासागरावरील तुमची ही सशस्त्र आरमारी जहाजे पाहून माझे अथांग मनही व्यथित होते. मानवांनो, हे थांबवा. आपापसांत भांडू नका. अरे या महासागराजवळ अमाप संपत्ती आहे, त्याचा उपभोग सर्वांनी घ्या."
टीप : वरील निबंध सागराचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते

  • सागराचे मनोगत निबंध मराठी
  • समुद्राचे मनोगत मराठी निबंध
  • सागराचे आत्मकथन मराठी
  • समुद्राचे आत्मवृत्त निबंध
  • sagarache manogat marathi nibandh
  • samudrache manogat marathi nibandh

सागराचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | sagarache manogat marathi nibandh

एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | shetkari manogat in marathi essay

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध shetkari manogat in marathi essay आत्‍मकथनात्‍मक या विषयावर निबंध  बघणार आहोत . शेतकरी हा जगाचा पोशींदा आहे तो स्‍वता अहोरात्र मेहनत करून पिक घेत्‍याचा प्रयत्‍न करतो पण सरतेशेवटी त्‍याचे हे प्रयत्‍न अस्‍मानी किंवा सुलतानी संकटांनी प्रयत्‍न वाया जातात , 

सरकार शेतकऱ्याची करू इच्‍छीते पण ती मदत खरच शेतकरऱ्यापर्यंत पोहचते का ? या सर्वांचा परीणाम म्‍हणुन शेतकरी कश्‍याप्रकारे आपले मत व्‍यक्त करतो याचे वर्णन याचे वर्णन एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध या निबंधात केले आहे. चला तर मग  निबंधाला सुरुवात करुया. 

निबंध लिहीताना लक्षात घ्‍यावयाचे मुद्दे  

  • बिकट अवस्था 
  • अवर्षणाची किंवा अतिवृष्टीची टांगती तलवार 
  • कृषिप्रधान देश 
  • शासनाची तुटपुंजी मदत
  • संरक्षण नाही
  • पुरेशा साधनसामग्रीचा अभाव 
  • बाजारात अनेक अडचणी
  • उत्पादनास योग्य भाव मिळत नाही
  • परिणामी शेतकरी गरीब, कर्जबाजारी
  • आत्महत्येसारख्या घटना
  • शेतकरी सुखी, तर देश सुखी


"लोकहो, मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे. मी या भूमीचा पुत्र आहे. ही माती माझी आई आहे. वर्षानुवर्षे शेतात खपून, घाम गाळून मी धान्य पिकवतो. मी तुम्हां सर्वांचा नम्र सेवक आहे. आज मी तुमच्यापाशी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. "आपला हा देश कृषिप्रधान आहे. 'कसेल त्याची जमीन' असा कायदा झाला. हेतू हा की, शेतात राबणारा शेतकरी जमिनीचा खऱ्या अर्थाने मालक व्हावा. 

शेतकऱ्यांची सावकाराकडून होणारी पिळवणूक बंद करण्यात आली व बँकांमार्फत शेतकऱ्यांना मदत देऊ करण्यात आली. या साऱ्या गोष्टींचा गाजावाजा भरपूर झाला. पण सामान्य शेतकऱ्यांपर्यंत या साऱ्या योजना खरोखरीच पोहोचल्या आहेत का, याची कुणी कधी खात्री करून घेतली आहे का? त्यातच निसर्गाचा लहरीपणा, कधी अवर्षण तर कधी अतिवर्षाव..



shetkari manogat in marathi essay
shetkari manogat in marathi essay

 "हल्ली खेडेगावांतून धनदांडग्यांचा, म्हणजेच सधन शेतकऱ्यांचा एक नवा वर्ग निर्माण झाला आहे. सारे फायदे हा वर्ग गिळंकृत करीत आहे. हेच लोक वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून सरकारी सोयीसुविधा मिळवतात, मानसन्मान पटकावतात आणि गरीब शेतकऱ्यांवर अन्याय करतात. त्यामुळे धनिक शेतकरी अधिक श्रीमंत होत आहेत; तर गरीब शेतकरी हा अधिकच कंगाल जीवन जगत आहे.

 गरीब शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाला काही वेळा योग्य भाव येत नाही. मग तो त्या च्या  गरजा भागवण्यासाठी कर्ज घेतो व कर्जबाजारी होतो. मग कर्जफेड कशी करणार? हप्त्यांचा तगादा लागतो. जेव्हा  शेतकरी दुष्काळग्रस्त (dushkal grast ) होतों तेव्हा् त्याच्यावरील संकट अधिकच मोठे होते. शेवटी काहीजण आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात, कर्जबळी ठरतात.

"स्वतःचे शेत नसलेल्या मजुराचे हाल तर विचारूच नका. त्याला धड मजुरीदेखील दिली जात नाही. त्याला वेठबिगारासारखे राबवून घेतले जाते. पावसाळ्यात हे शेतमजूर कसे जगतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे? सारे राष्ट्र ज्यांच्या कष्टावर जगते तो गरीब शेतकरी उपाशी आहे, याची देशवासीयांना कल्पनाही नसेल.


"या सामान्य शेतकऱ्यांकडे व शेतमजुरांकडे सरकारने तसेच शहरी नागरिकांनी देखील लक्ष देणे आवश्यक आहे. खरे भूमिपुत्र असलेले आम्ही गरीब आहोत. स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आम्हांलाही मानाने जगू दया. 'जय जवान, जय किसान' ही घोषणा सार्थ होण्यासाठी योग्य असे जीवन आम्हा सामान्य किसानांना लाभू दया, एवढीच आमची मागणी आहे." 

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. खालील निबंंध नं 2 पण वाचु शकता धन्‍यवाद .



Essay no 2 

निबंध क्रमांक २

एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | shetkari manogat in marathi essay


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध क्रमांक २  Shetkari Manogat in Marathi Nibandh no 2 ३५० शब्दात  या विषयावर निबंध  बघणार आहोत . वरील निबंधापेक्षा या निबंधात वेगळी माहीती दिलेली आहे . चला तर मग सुरू करूया निबंधाला.  


 “लोकहो, आज तुम्ही येथे जमला आहात ते देशाचा प्रजासत्ताकदिन साजरा करण्यासाठी, हे मला माहीत आहे. मलाही या दिवसाचा, आपल्या राष्ट्राचा पुरेपूर अभिमान आहे. पण आज मी येथे उभा आहे तो वेगळ्या उद्देशाने. माननीय मुख्यमंत्री यांच्याकडून मी मुद्दाम ही परवानगी मिळविली आहे. मी हाच दिवस, हाच समारंभ निवडला त्यांतही माझा खास हेतू आहे. आज येथे जमलेले लोक देशाचे-पर्यायाने देशवासीयांचे हितचिंतक आहेत. 

आज येथे देशातील कानाकोपऱ्यातून वृत्तपत्रांची मंडळी उपस्थित राहिली आहेत. त्या सर्वांपुढे आपले मनोगत व्यक्त केले की, ते देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचेल अशी मला खात्री आहे, आणि म्हणूनच माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी मी येथे उभा आहे.

“आपला देश हा कृषिप्रधान देश आहे, असा तूम्ही थोरमंडळी वारंवार उल्लेख करीत असता. स्वातंत्र्योत्तर काळात औदयोगिक क्षेत्रात देशाचा विकास करण्याचे योजनापूर्वक प्रयत्न झाले. त्याचवेळी शेतकऱ्यालाही काही सवलती देण्यात आल्या. कसेल त्याची जमीन' असा कायदा झाला. हेतु हा की, शेतात राबणारा शेतकरी जमिनीचा मालक व्हावा. कर्जमाफी देण्यात आली, सावकारी बंद करण्यात आली व बँकांमार्फत शेतकऱ्यांना मदत देऊ करण्यात आली. या साऱ्या गोष्टी केल्याचा गाजावाजा भरपूर झाला. पण खरोखरीच सामान्य शेतकऱ्यांपर्यंत या साऱ्या योजना पोहोचल्या आहेत का? याची शासनाने वा कुणी नेत्याने कधी खात्री करून घेतली आहे का?

"काही वर्षांपासून आमचे महाराष्ट्र सरकार हरितक्रांती झाल्याचे आनंदाने जाहीर करीत आहे. पण ही हरितक्रांती आणि तिच्यातून आलेले वैभव कोणाकडे गेले? हल्ली खेडेगावांतून एक नवा वर्ग निर्माण झाला आहे आणि तो म्हणजे 'धनिक शेतकरीवर्ग.' सारे फायदे हा वर्ग स्वतःसाठी उचलत आहे. वेगवेगळया नावांखाली ते सरकारी मदती मिळवितात, मानसन्मान पटकवितात, आमदार-खासदार बनतात आणि गरीब शेतकऱ्यांना चिरडून टाकतात. त्यामुळे धनिक शेतकरी अधिक धनिक होत आहेत तर गरीब शेतकरी या धनिक शेतकऱ्यांचे गुलाम होत आहेत, नष्ट होत आहेत.

“या सामान्य शेतकऱ्याकडे सरकारने, शहरी नागरिकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच हे आत्मवृत्त जाणुन घेऊन सरकारणे त्‍यावर उपाय शोधने आवश्‍यक आहे. आमचे हे मनोगत मी आपल्यापर्यंत पोहोचविले आहे. स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आम्हांलाही मानाने जगु दया, एवढीच आमची मागणी आहे."

Essay no 3 

निबंध क्रमांक 3

eka shetkaryache atmavrutta


 वर्तमानपत्र उघडले की शेतकऱ्याच्या आत्महत्येची बातमी हल्ली रोजच आढळते. मन सुन्न होते . भारत हा कृषीप्रधान देश . शेत आणि शेतकरी यातून 'सुजलाम् सुफलाम्' ची वाटचाल सुरू असतांना धडाधड शेतकरी आत्महत्या का करीत आहेत? प्रश्नांची आवर्तनं हृदयाला घरे करू लागली . एक शेतकरी आपली व्यथा सांगतोय असं वाटलं अन् आवाज आला


“मी एक सामान्य शेतकरी. एक भूमिपुत्र. भूमी ही माझी माता. तिच्यावर माझे अगाध प्रेम आहे. तिच्याच कुशीत जन्मलो, खेळलो, बागडलो, मोठा झालो. तिनेच अन्न दिले , पाणी दिले. पण दिवसेंदिवस स्थिती बिकट होत चालली आहे. वरुणराजा लहरी झाला आहे. लहरी पावसाने दगा दिला आहे. अवर्षणाचे सावट पसरले आहे. 


आभाळाबरोबर डोळ्यातले ही पाणी आता आटले आहे. दुष्काळाची भीषणता गिळून टाकत आहे. कर्जाचा डोंगर मुद्दलापेक्षा दुप्पट व्याजाने जीवघेणा झाला आहे. उपाशी बायका-पोरांना बघवत नाही. हाडं हाडं झालेली जनावरं मुक्यानंही खूप काही सांगत असतात. सणासुदीला नवा कपडा तर सोडाच पण अंगभर कपडाही नशिबी नाही. घराच्या भिंतीला ठिगळं, कपड्यांना ठिगळं असं भिकार जीवन...खर सांगू? सारं सारं असहय झालं.... अगदी जीव पार गुदमरून गेलाय.... आता सांगा, आत्महत्या करावीशी वाटणार नाही तर काय करायचे?


वर्षानुवर्षे दिवस उजाडल्यापासून ते मावळेपर्यंत कष्ट करूनही अन्न, वस्त्र, निवारा या गरजा पूर्ण होत नाहीत. गरीबी पाचवीला पुजलेली तशीच आजन्म बरोबर ..... यासारखं दुर्दैव ते कोणतं?''
"स्वातंत्र्याची पहाट झाली पण आमच्या जीवनातला काळोख दूर झाला का? शेतकऱ्यांना सवलती दिल्या गेल्या. कर्जमाफी देण्यात आली . बँकामार्फत शेतकऱ्यांना कर्ज मिळू लागले. 'कसेल त्याची जमीन' असा कायदा झाला.

हरितक्रांती कोणाला समृद्ध करून गेली? या साऱ्या योजना सामान्य व गरीब शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचल्याच नाहीत. सधन शेतकऱ्यांनीच या योजनांचा लाभ उठवला. बिचारा खरा कष्टकरी शेतकरी घाम गाळत कर्जाच्या विळख्यात अडकतच गेला. धनिक शेतकऱ्यांचा तो गुलाम झाला. अर्धवस्त्र व अर्धी भाकरी देणारं हे जीवन अर्धवट सोडायला तो तयार झाला; यात नवल काय? "भ्रष्टाचार, अज्ञान व महागाई यामुळे आम्हा शेतकऱ्यांचे जिणे कठीण झाले .


कर्ज ' वाढत चाललंय.... खूप सहनशक्तीनं सगळं रेटलं चतकोर कोरडी भाकरही पाण्याबरोबर गिळली. ओठांवर विठूचं नाव अन् शेतात अहोरात्र काम . पण.... सारं सारं करूनही माझी झोळी रितीच... निसर्गाचा कोप, तुटपुंजा पैसा, कर्जबाजारीपणा, कुटुंबाचे हाल या साऱ्यांना आता कोणतंच उत्तर राहीलं नाही म्हणून मीच संपलो....."


"एक भयाण सत्य... चिरंजीव शेतीत मरणारा मी शेतकरी...शेतकरी सुखी तर देश सुखी असं म्हणताना माझ्यासारख्या शेतकऱ्यांचे हाल तुमच्या मनाला का दिसत नाहीत? माझ्यासारखे असंख्य बांधव आहेत. त्यांना तरी वाचवा! शेतकरी अर्थव्यवस्थचा कणा आहे. मग त्याच शेतकऱ्याच जीवन जर समाधानी नसेल तर अर्थव्यवस्थेचे कोणते नगारे तुम्ही बडवणार आहात?


जुने तंत्रज्ञान व पारंपारिक शेतीपध्दती बरोबर आज नवतंत्रज्ञान आहे, हरितक्रांतीकडून जैव क्रांतीकडे वाटचाल होत आहे. कृषि-विस्तार, उत्पादन क्षमतावाढीचे प्रयत्न होत आहेत . मूठभर शेतकऱ्यांचा फायदा होतो तो ही सधन असणाऱ्यांचा माझ्यासारखे उपेक्षित राहतात.'

मृत्यूच्या दारातही दारिद्र्य माझ्यासोबत होते.... माझी व्यथा माझ्याबरोबर संपलेली नाही....माझ्या बांधवांच्या अश्रूतून ती झिरपते आहे. भारतमातेच्या पुत्रांनो , अजूनही जागे व्हा . विचार करा- डोळसपणे! शासनाची मदत व तुमची धडपड खऱ्या अर्थाने गरजूंपर्यंत पोहोचू द्या . त्यांचे अज्ञान दूर करा. शिक्षण द्या. शेतीबरोबर पशुपालन , मत्स्यशेती , कुटिरोद्योग , जलसिंचन सुविधा यांची माहिती द्या . 

दारिद्रय , उपासमार व कर्ज यांनी थकलेला शेतकरी दारूच्या व्यसनात जीवन बरबाद करतो. वाया जातो , यापासून त्याला परावृत्त करा . त्याला जगू द्या . मरणाच्या खाईत ढकलू नका . 'जय जवान जय किसान'चा खरा मान त्याला द्या. तरच देश समृध्द होईल . समृध्दता मातीतून उगवते . त्या मातीच्या लाडक्या पुत्रास समाधानी जीवनही प्राप्त होऊ नये ही एक शोकांतिका आहे .''

टीप : वरील निबंध एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते. 
  • marathi composition on shetkaryachi atmakatha

एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | shetkari manogat in marathi essay