दरवेशाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Darveshache Manogat Essay In Marathi


दरवेशाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक : “मी आहे एक दरवेशी. दारोदार हिंडणारा. बरोबर आहे माझा सारा कुटुंबकबिला. त्यांत मुख्य आहे भालू-म्हणजे हे माझे काळे अस्वल. नंतर माझी पत्नी आणि माझी दोन चिल्लीपिल्ली. सध्या तरी हा भालूच आम्हां सर्वांचा पोशिंदा आहे.


"माझ्या वाडवडिलांकडून हा व्यवसाय माझ्याकडे आला. माझा बापही दरवेशीच होता. त्याच्याबरोबर मी लहानपणी गावोगाव हिंडत असे. मी केव्हा मोठा झालो आणि ही अस्वलाची दोरी माझ्या हातात कशी आली हे मला उमगलेच नाही. बाप थकला होता, तरीही आमच्याबरोबरच हिंडत होता. कारण आम्हांला कायमचं असं घरच नाही. अशाच भटकंतीत कुठेतरी बापाला मरण आलं. तिथेच त्याला अग्नी दिला.

“लोकहो, हेच माझे दुःख आहे. कसले हे जगणे! पाय दुखेस्तोवर आम्ही चालत राहतो. गाव लागला की खेळ करतो. कधी कुठे बरी मिळकत होते तेव्हा आम्ही भालूला प्रथम पोटभर खायला घालतो. भालूला सर्व भाजीपाला आवडतो. पण मांस खायला मिळाले की स्वारी खूष. भालूला सर्वांत प्रिय म्हणजे 'मध.' मी त्याला सणावारी भरपूर मध खायला घालतो. आमची चार माणसांची गूजराण बहधा होते ती वडापावांवर. जेव्हा एखादया गावात आमचा मुक्काम असतो तेव्हाच आम्ही तीन दगडांची चूल पेटवितो आणि त्याच वेळी पोरांना भाकरी मिळते.



darveshache manogat essay in marathi
darveshache manogat essay in marathi


“लोकहो, आता मला या भटक्या जीवनाचा कंटाळा आला आहे. पण मी दुसरे कोणतेच काम करू शकत नाही. मी पूर्णपणे अडाणी आहे. मला कधी शिकायला मिळाले नाही. या अस्वलाबरोबरच मी मोठा झालो. म्हणून त्याच्याबरोबर नाचणे, उड्या मारणे एवढेच मला जमते. आज त्याचीच शिक्षा मी भोगत आहे. वर्षातील एकही दिवस मला पोटभर जेवण मिळत नाही. लोक खेळ बघायला गर्दी करतात, 


अस्वलाचे काम पाहून टाळ्या पिटतात. पण पैशासाठी थाळी फिरविली की मात्र पळ काढतात. काही खेड़त लोक अस्वलाच्या केसांचा ताईत विकत घेऊन आपल्या लेकरांच्या गळ्यात घालतात. खरं सांगू का! माझा काही या ताईतांवर विश्वास नाही, तरी पण मी ताईत तयार करून विकतो. कारण त्यांतच मला मिळकत होते. चार आणे खर्च येणारा ताईत मी दोन रुपयांना विकतो.

“मायबाप लोकहो! माझं तुमच्याकडे एकच मागणे आहे. आता मी असं ऐकतो की भटक्या लोकांच्या  मुलांसाठी सरकार शाळा काढणार आहे. मला माझ्या या दोन्ही मुलांना शिकवायचे आहे. त्यांच्या तरी नशिबी हा दरवेशीपणा नको. निघाली आहे का अशी शाळा? तिथं माझी ही कोकरं राहतील! मग त्यांच्यासाठी कितीही कष्ट करायला लागले तरी मी व माझा भालू करू. अगदी शेवटपर्यंत मी आणि भालू एकमेकांना सोडणार नाही.

वरील निबंध दरवेशाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

दरवेशाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Darveshache Manogat Essay In Marathi


भग्न देवालयाचे मनोगत मराठी निबंध  आत्‍मकथनात्‍मक

Autobiography of An Old temple in Marathi essay

भग्न देवालयाचे मनोगत मराठी निबंध  आत्‍मकथनात्‍मक : सुट्टी लागली म्हणून आम्ही काही मित्र आमच्या एका मित्राच्या गावी गेलो. शहरापासून दूर अशा त्या शांत गावात आम्हांला खूपच बरे वाटत होते. मोकळ्या वातावरणात दूरदूर फिरताना एक आगळा आनंद मिळत होता. अशाच भटकंतीत एका गर्द वनराईत एक देऊळ आढळले. कुतुहलाने देवळात शिरलो आणि मन विषण्ण झाले. कारण ते देऊळ भंगलेले होते. केवळ देवळाचीच पडझड झालेली नव्हती, तर आतील मूर्तीही भग्न झाली होती. हे कोणातरी मूर्तिभंजकाचे काम असावे, हे सहज लक्षात येत होते. माझ्याबरोबरचे सर्वच मित्र खिन्न झाले. हे कोणाचे कृत्य असावे बरे? सारेजण विचारात पडले. तेवढ्यात एक गंभीर आवाज निनादला.

Autobiography of An Old temple in Marathi essay
Autobiography of An Old temple in Marathi essay
"ऐका युवकांनो, तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी देते. मी कोण? तुमची श्रद्धा असलेला 'राम' हा देव आहे ना, त्याची मी प्रतिमा. खूप वर्षांपूर्वी एका भाविकाने माझी येथे प्रतिष्ठापना केली. मोठ्या भाविकतेने त्याने राजस्थानातून मला येथे आणले. दूरवरून कारागीर आणून हे सुंदर मंदिर उभारले. सभोवताली गर्द वनराजी लावली. गावातील लोक भक्तिभावाने माझी पूजा करीत. सर्व मंडळी गुण्यागोविंदाने नांदत होती तोवर मी वैभवात होते. धर्म, जात, पंथ येथे आड येत नव्हते. सर्व माणसे देवाला सारखीच, तसा सर्वांचा ईश्वरही एकच. केवढी थोर भावना.

“गावात कुणी बाहेरचे लोक येऊ लागले. त्यांच्याबरोबर अनेक नवे विचार गावात येत गेले, कुरबूरी सुरू झाल्या. भांडणे होऊ लागली, ती वाढली आणि विकोपाला गेली. माझा धर्म इतरांच्या धर्मापेक्षा श्रेष्ठ असे प्रत्येकाला वाटू लागले. मग कुणी वेड्यापीराने माझी अशी दुर्दशा केली. येथे रणकंदन माजले. अनेकांचे बळी पडले आणि या मंदिराचीही मोडतोड झाली. तेव्हापासून लोक येथे फिरकत नाहीत. तुम्ही येथे आलात म्हणून मी मन मोकळे केले.
वरील निबंध भग्न देवालयाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

भग्न देवालयाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Autobiography of An Old temple in Marathi essay

स्वतंत्रतेची कैफियत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक


स्वतंत्रतेची कैफियत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक : “अरे अज्ञ मुलांनो, जरा इकडे लक्ष दया. मला बोलू दया. माझे डोळे तुमचे हे सहस्र अपराध पाहन आता थकले आहेत. ओळखलंत ना मला! मी आहे तुमची 'स्वातंत्र्यदेवता.' आपण स्वतंत्र देशाचे नागरिक आहोत असे तुम्ही केवढे अभिमानाने सांगता. तेव्हा क्षणभर मी रोमांचित होते, पण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या तुम्हांला पाहिले ना की, मी व्यथित होते.



 मला प्राप्त करण्यासाठी तुमच्या काही बांधवांनी प्राणांची बाजी लावली. आठवा त्यांचा त्याग! केवळ 'हुतात्मे' म्हणून वर्षातून एक दिवस त्यांचे स्मरण करून तुमचे त्यांच्याविषयीचे कर्तव्य संपत नाही. माझी प्राप्ती करून घेण्यासाठी ज्या माझ्या एका सपत्राने प्राण दिले त्याची दुर्दैवी पत्नी आज चार घरची भांडीधुणी करून आपले व आपल्या चार मुलांचे कसेबसे पोट भरीत आहे. तरी का तुम्हांला याची जाण? आयुष्यभर महात्माजी कष्टले, ते कशासाठी? आपल्या संसाराचा सारिपाट उधळून स्वातंत्र्यवीर झिजले ते कशासाठी? आपल्या साऱ्या वैभवाचा त्याग करून पंडितजींनी कारावासातील कष्टप्रद जीवन पत्करले, ते कशासाठी? माझ्यासाठीच ना?



swatantratechi kaifiyat essay in marathi
swatantratechi kaifiyat essay in marathi
आजचे माझे पुत्र-पुत्र कसले कुपूत्र. तुम्ही माझा-स्वतंत्रतेचा लिलाव करायलाच उदयुक्त झाला आहात का? प्रत्यक्ष आपल्या मातेची अशी विटंबना करणारे साऱ्या पृथ्वीवर कूणी नसतील. नाहीतर मूठभर पैशासाठी आपल्या देशाची रहस्ये विकायला माझेच हे सुज्ञ पुत्र कसे तयार झाले असते? कुणीतरी भडकविले म्हणून माझेच तुकडे करायला हे माझे दिवटे पुत्र कसे तयार झाले असते?


स्वातंत्र्य, समता, बंधुता या त्रयींचा सदैव जप करणारे तुम्ही दुसऱ्याला गुलामीत कसे ठेवता? घरातील स्त्रीला तुम्ही स्वातंत्र्य देत नाही. कुणाला तरी आपला ऋणको समजून त्याला पिढ्यान्पिढयाचा गुलाम करता, कूणाला तरी जन्माने दलित मानून त्याला बंधनात टाकता, स्वतःची हौस म्हणून स्वच्छंदी पक्ष्यांना, माशांना पिंजऱ्यांत टाकता. हे कसे? हीच माझी तुमच्याविरुद्ध कैफियत आहे.
वरील निबंध स्वतंत्रतेची कैफियत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

स्वतंत्रतेची कैफियत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक

सागराचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक 


सागराचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक : "माझ्या काठावर जमलेल्या मुशाफिरांनो, क्षणभर येथे थांबा आणि माझे मनोगत ऐकून घ्या. आजवर अनेकदा मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न केले पण ते यशस्वी झाले नाहीत. शेवटी मलाही मर्यादा आहेतच ना!


“मानवा, महासागर म्हणून तू माझे कौतुक करतोस. रत्नाकर' म्हणून मला संबोधून माझ्या वैभवाचा गौरव करतोस तरीपण हे मानवा, माझ्या उणिवा मी जाणतो. माझ्या काठी आलेल्या तुझी तहान मी भागवू शकत नाही. माझे पाणी खारट आहे म्हणून तुम्ही सर्वजण मला नावे ठेवता. पण हा खारटपणा माझ्यात का उतरला माहीत आहे तुम्हांला? 


साऱ्या जगाची सारी घाण, सारे क्षार मी सामावून घेतो. धर्म, जात, पंथ, वर्ण इत्यादी कारणांवरून तुम्ही झगडता; पण तसा भेदभाव माझ्याकडे नाही. तुमच्या श्रीगजाननांच्या मूर्तीना मी माझ्यात सामावून घेतो, त्याचप्रमाणे इस्लाम बांधवांचे ताबूतही माझ्यातच समर्पित होतात!


sagarache manogat marathi nibandh
sagarache manogat marathi nibandh


“मनुपुत्रांनो, तुम्ही मला कितीही नावे ठेवलीत ना, तरी तुम्ही माझे लाडके आहात! म्हणूनच तुमच्या साऱ्या लीला मी आजवर सहन केल्या. तुमच्यातल्या एका कवीने माझी निदानालस्ती करताना म्हटले आहे की, हा पयोधर पाणी साठवून ठेवतो म्हणून त्याचे स्थान खाली आहे आणि पयोद पाणी देतो म्हणून त्याचे स्थान उंचावर, आकाशात आहे. पण या मूर्ख कवीला हे माहीत नसावे की, पयोधर आहे म्हणूनच पयोद आहे. बरे असू दे ते. मला आज तुमच्याशी बोलायचे आहे ते वेगळेच. 


मानवा, आजवर तू समुद्रमंथनाची कथा केवळ कौतुकाने सांगत होतास. पण आज मात्र तु खरोखरच माझे मंथन चालविले आहेस. देवकथेतील चौदा रत्नांपेक्षाही अधिक अमूल्य, या औदयोगिक युगाला आवश्यक असे इंधन तुम्ही माझ्या अंतःकरणातून बाहेर काढले. तुमच्या बुद्धिवैभवाचे मला सदैव कौतुक वाटते. म्हणूनच यंत्रांकडून घुसळले जाण्याचे सर्व दुःख मी सहन करतो. तुमच्या साहसाने मी दिङ्मूढ होतो. तुमच्यातील काहीजण वर्षानुवर्षे माझ्या उदरात दडलेल्या अंटाक्टिकावरही पोहोचले आहेत.

"अभिमानास्पद वाटणाऱ्या या घटना घडतानाच पुढच्या काही अशुभ घटनांची मला चाहूल लागत आहे. अंटाक्टिका खंडावरील अधिवासाबाबतचे झगडे आताच सुरू होऊ लागले आहेत. हिंदी महासागरावरील तुमची ही सशस्त्र आरमारी जहाजे पाहून माझे अथांग मनही व्यथित होते. मानवांनो, हे थांबवा. आपापसांत भांडू नका. अरे या महासागराजवळ अमाप संपत्ती आहे, त्याचा उपभोग सर्वांनी घ्या."
टीप : वरील निबंध सागराचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते

  • सागराचे मनोगत निबंध मराठी
  • समुद्राचे मनोगत मराठी निबंध
  • सागराचे आत्मकथन मराठी
  • समुद्राचे आत्मवृत्त निबंध
  • sagarache manogat marathi nibandh
  • samudrache manogat marathi nibandh

सागराचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | sagarache manogat marathi nibandh

एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | shetkari manogat in marathi essay

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध shetkari manogat in marathi essay आत्‍मकथनात्‍मक या विषयावर निबंध  बघणार आहोत . शेतकरी हा जगाचा पोशींदा आहे तो स्‍वता अहोरात्र मेहनत करून पिक घेत्‍याचा प्रयत्‍न करतो पण सरतेशेवटी त्‍याचे हे प्रयत्‍न अस्‍मानी किंवा सुलतानी संकटांनी प्रयत्‍न वाया जातात , 

सरकार शेतकऱ्याची करू इच्‍छीते पण ती मदत खरच शेतकरऱ्यापर्यंत पोहचते का ? या सर्वांचा परीणाम म्‍हणुन शेतकरी कश्‍याप्रकारे आपले मत व्‍यक्त करतो याचे वर्णन याचे वर्णन एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध या निबंधात केले आहे. चला तर मग  निबंधाला सुरुवात करुया. 

निबंध लिहीताना लक्षात घ्‍यावयाचे मुद्दे  

  • बिकट अवस्था 
  • अवर्षणाची किंवा अतिवृष्टीची टांगती तलवार 
  • कृषिप्रधान देश 
  • शासनाची तुटपुंजी मदत
  • संरक्षण नाही
  • पुरेशा साधनसामग्रीचा अभाव 
  • बाजारात अनेक अडचणी
  • उत्पादनास योग्य भाव मिळत नाही
  • परिणामी शेतकरी गरीब, कर्जबाजारी
  • आत्महत्येसारख्या घटना
  • शेतकरी सुखी, तर देश सुखी


"लोकहो, मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे. मी या भूमीचा पुत्र आहे. ही माती माझी आई आहे. वर्षानुवर्षे शेतात खपून, घाम गाळून मी धान्य पिकवतो. मी तुम्हां सर्वांचा नम्र सेवक आहे. आज मी तुमच्यापाशी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. "आपला हा देश कृषिप्रधान आहे. 'कसेल त्याची जमीन' असा कायदा झाला. हेतू हा की, शेतात राबणारा शेतकरी जमिनीचा खऱ्या अर्थाने मालक व्हावा. 

शेतकऱ्यांची सावकाराकडून होणारी पिळवणूक बंद करण्यात आली व बँकांमार्फत शेतकऱ्यांना मदत देऊ करण्यात आली. या साऱ्या गोष्टींचा गाजावाजा भरपूर झाला. पण सामान्य शेतकऱ्यांपर्यंत या साऱ्या योजना खरोखरीच पोहोचल्या आहेत का, याची कुणी कधी खात्री करून घेतली आहे का? त्यातच निसर्गाचा लहरीपणा, कधी अवर्षण तर कधी अतिवर्षाव..



shetkari manogat in marathi essay
shetkari manogat in marathi essay

 "हल्ली खेडेगावांतून धनदांडग्यांचा, म्हणजेच सधन शेतकऱ्यांचा एक नवा वर्ग निर्माण झाला आहे. सारे फायदे हा वर्ग गिळंकृत करीत आहे. हेच लोक वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून सरकारी सोयीसुविधा मिळवतात, मानसन्मान पटकावतात आणि गरीब शेतकऱ्यांवर अन्याय करतात. त्यामुळे धनिक शेतकरी अधिक श्रीमंत होत आहेत; तर गरीब शेतकरी हा अधिकच कंगाल जीवन जगत आहे.

 गरीब शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाला काही वेळा योग्य भाव येत नाही. मग तो त्या च्या  गरजा भागवण्यासाठी कर्ज घेतो व कर्जबाजारी होतो. मग कर्जफेड कशी करणार? हप्त्यांचा तगादा लागतो. जेव्हा  शेतकरी दुष्काळग्रस्त (dushkal grast ) होतों तेव्हा् त्याच्यावरील संकट अधिकच मोठे होते. शेवटी काहीजण आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात, कर्जबळी ठरतात.

"स्वतःचे शेत नसलेल्या मजुराचे हाल तर विचारूच नका. त्याला धड मजुरीदेखील दिली जात नाही. त्याला वेठबिगारासारखे राबवून घेतले जाते. पावसाळ्यात हे शेतमजूर कसे जगतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे? सारे राष्ट्र ज्यांच्या कष्टावर जगते तो गरीब शेतकरी उपाशी आहे, याची देशवासीयांना कल्पनाही नसेल.


"या सामान्य शेतकऱ्यांकडे व शेतमजुरांकडे सरकारने तसेच शहरी नागरिकांनी देखील लक्ष देणे आवश्यक आहे. खरे भूमिपुत्र असलेले आम्ही गरीब आहोत. स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आम्हांलाही मानाने जगू दया. 'जय जवान, जय किसान' ही घोषणा सार्थ होण्यासाठी योग्य असे जीवन आम्हा सामान्य किसानांना लाभू दया, एवढीच आमची मागणी आहे." 

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. खालील निबंंध नं 2 पण वाचु शकता धन्‍यवाद .



Essay no 2 

निबंध क्रमांक २

एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | shetkari manogat in marathi essay


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध क्रमांक २  Shetkari Manogat in Marathi Nibandh no 2 ३५० शब्दात  या विषयावर निबंध  बघणार आहोत . वरील निबंधापेक्षा या निबंधात वेगळी माहीती दिलेली आहे . चला तर मग सुरू करूया निबंधाला.  


 “लोकहो, आज तुम्ही येथे जमला आहात ते देशाचा प्रजासत्ताकदिन साजरा करण्यासाठी, हे मला माहीत आहे. मलाही या दिवसाचा, आपल्या राष्ट्राचा पुरेपूर अभिमान आहे. पण आज मी येथे उभा आहे तो वेगळ्या उद्देशाने. माननीय मुख्यमंत्री यांच्याकडून मी मुद्दाम ही परवानगी मिळविली आहे. मी हाच दिवस, हाच समारंभ निवडला त्यांतही माझा खास हेतू आहे. आज येथे जमलेले लोक देशाचे-पर्यायाने देशवासीयांचे हितचिंतक आहेत. 

आज येथे देशातील कानाकोपऱ्यातून वृत्तपत्रांची मंडळी उपस्थित राहिली आहेत. त्या सर्वांपुढे आपले मनोगत व्यक्त केले की, ते देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचेल अशी मला खात्री आहे, आणि म्हणूनच माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी मी येथे उभा आहे.

“आपला देश हा कृषिप्रधान देश आहे, असा तूम्ही थोरमंडळी वारंवार उल्लेख करीत असता. स्वातंत्र्योत्तर काळात औदयोगिक क्षेत्रात देशाचा विकास करण्याचे योजनापूर्वक प्रयत्न झाले. त्याचवेळी शेतकऱ्यालाही काही सवलती देण्यात आल्या. कसेल त्याची जमीन' असा कायदा झाला. हेतु हा की, शेतात राबणारा शेतकरी जमिनीचा मालक व्हावा. कर्जमाफी देण्यात आली, सावकारी बंद करण्यात आली व बँकांमार्फत शेतकऱ्यांना मदत देऊ करण्यात आली. या साऱ्या गोष्टी केल्याचा गाजावाजा भरपूर झाला. पण खरोखरीच सामान्य शेतकऱ्यांपर्यंत या साऱ्या योजना पोहोचल्या आहेत का? याची शासनाने वा कुणी नेत्याने कधी खात्री करून घेतली आहे का?

"काही वर्षांपासून आमचे महाराष्ट्र सरकार हरितक्रांती झाल्याचे आनंदाने जाहीर करीत आहे. पण ही हरितक्रांती आणि तिच्यातून आलेले वैभव कोणाकडे गेले? हल्ली खेडेगावांतून एक नवा वर्ग निर्माण झाला आहे आणि तो म्हणजे 'धनिक शेतकरीवर्ग.' सारे फायदे हा वर्ग स्वतःसाठी उचलत आहे. वेगवेगळया नावांखाली ते सरकारी मदती मिळवितात, मानसन्मान पटकवितात, आमदार-खासदार बनतात आणि गरीब शेतकऱ्यांना चिरडून टाकतात. त्यामुळे धनिक शेतकरी अधिक धनिक होत आहेत तर गरीब शेतकरी या धनिक शेतकऱ्यांचे गुलाम होत आहेत, नष्ट होत आहेत.

“या सामान्य शेतकऱ्याकडे सरकारने, शहरी नागरिकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच हे आत्मवृत्त जाणुन घेऊन सरकारणे त्‍यावर उपाय शोधने आवश्‍यक आहे. आमचे हे मनोगत मी आपल्यापर्यंत पोहोचविले आहे. स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आम्हांलाही मानाने जगु दया, एवढीच आमची मागणी आहे."

Essay no 3 

निबंध क्रमांक 3

eka shetkaryache atmavrutta


 वर्तमानपत्र उघडले की शेतकऱ्याच्या आत्महत्येची बातमी हल्ली रोजच आढळते. मन सुन्न होते . भारत हा कृषीप्रधान देश . शेत आणि शेतकरी यातून 'सुजलाम् सुफलाम्' ची वाटचाल सुरू असतांना धडाधड शेतकरी आत्महत्या का करीत आहेत? प्रश्नांची आवर्तनं हृदयाला घरे करू लागली . एक शेतकरी आपली व्यथा सांगतोय असं वाटलं अन् आवाज आला


“मी एक सामान्य शेतकरी. एक भूमिपुत्र. भूमी ही माझी माता. तिच्यावर माझे अगाध प्रेम आहे. तिच्याच कुशीत जन्मलो, खेळलो, बागडलो, मोठा झालो. तिनेच अन्न दिले , पाणी दिले. पण दिवसेंदिवस स्थिती बिकट होत चालली आहे. वरुणराजा लहरी झाला आहे. लहरी पावसाने दगा दिला आहे. अवर्षणाचे सावट पसरले आहे. 


आभाळाबरोबर डोळ्यातले ही पाणी आता आटले आहे. दुष्काळाची भीषणता गिळून टाकत आहे. कर्जाचा डोंगर मुद्दलापेक्षा दुप्पट व्याजाने जीवघेणा झाला आहे. उपाशी बायका-पोरांना बघवत नाही. हाडं हाडं झालेली जनावरं मुक्यानंही खूप काही सांगत असतात. सणासुदीला नवा कपडा तर सोडाच पण अंगभर कपडाही नशिबी नाही. घराच्या भिंतीला ठिगळं, कपड्यांना ठिगळं असं भिकार जीवन...खर सांगू? सारं सारं असहय झालं.... अगदी जीव पार गुदमरून गेलाय.... आता सांगा, आत्महत्या करावीशी वाटणार नाही तर काय करायचे?


वर्षानुवर्षे दिवस उजाडल्यापासून ते मावळेपर्यंत कष्ट करूनही अन्न, वस्त्र, निवारा या गरजा पूर्ण होत नाहीत. गरीबी पाचवीला पुजलेली तशीच आजन्म बरोबर ..... यासारखं दुर्दैव ते कोणतं?''
"स्वातंत्र्याची पहाट झाली पण आमच्या जीवनातला काळोख दूर झाला का? शेतकऱ्यांना सवलती दिल्या गेल्या. कर्जमाफी देण्यात आली . बँकामार्फत शेतकऱ्यांना कर्ज मिळू लागले. 'कसेल त्याची जमीन' असा कायदा झाला.

हरितक्रांती कोणाला समृद्ध करून गेली? या साऱ्या योजना सामान्य व गरीब शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचल्याच नाहीत. सधन शेतकऱ्यांनीच या योजनांचा लाभ उठवला. बिचारा खरा कष्टकरी शेतकरी घाम गाळत कर्जाच्या विळख्यात अडकतच गेला. धनिक शेतकऱ्यांचा तो गुलाम झाला. अर्धवस्त्र व अर्धी भाकरी देणारं हे जीवन अर्धवट सोडायला तो तयार झाला; यात नवल काय? "भ्रष्टाचार, अज्ञान व महागाई यामुळे आम्हा शेतकऱ्यांचे जिणे कठीण झाले .


कर्ज ' वाढत चाललंय.... खूप सहनशक्तीनं सगळं रेटलं चतकोर कोरडी भाकरही पाण्याबरोबर गिळली. ओठांवर विठूचं नाव अन् शेतात अहोरात्र काम . पण.... सारं सारं करूनही माझी झोळी रितीच... निसर्गाचा कोप, तुटपुंजा पैसा, कर्जबाजारीपणा, कुटुंबाचे हाल या साऱ्यांना आता कोणतंच उत्तर राहीलं नाही म्हणून मीच संपलो....."


"एक भयाण सत्य... चिरंजीव शेतीत मरणारा मी शेतकरी...शेतकरी सुखी तर देश सुखी असं म्हणताना माझ्यासारख्या शेतकऱ्यांचे हाल तुमच्या मनाला का दिसत नाहीत? माझ्यासारखे असंख्य बांधव आहेत. त्यांना तरी वाचवा! शेतकरी अर्थव्यवस्थचा कणा आहे. मग त्याच शेतकऱ्याच जीवन जर समाधानी नसेल तर अर्थव्यवस्थेचे कोणते नगारे तुम्ही बडवणार आहात?


जुने तंत्रज्ञान व पारंपारिक शेतीपध्दती बरोबर आज नवतंत्रज्ञान आहे, हरितक्रांतीकडून जैव क्रांतीकडे वाटचाल होत आहे. कृषि-विस्तार, उत्पादन क्षमतावाढीचे प्रयत्न होत आहेत . मूठभर शेतकऱ्यांचा फायदा होतो तो ही सधन असणाऱ्यांचा माझ्यासारखे उपेक्षित राहतात.'

मृत्यूच्या दारातही दारिद्र्य माझ्यासोबत होते.... माझी व्यथा माझ्याबरोबर संपलेली नाही....माझ्या बांधवांच्या अश्रूतून ती झिरपते आहे. भारतमातेच्या पुत्रांनो , अजूनही जागे व्हा . विचार करा- डोळसपणे! शासनाची मदत व तुमची धडपड खऱ्या अर्थाने गरजूंपर्यंत पोहोचू द्या . त्यांचे अज्ञान दूर करा. शिक्षण द्या. शेतीबरोबर पशुपालन , मत्स्यशेती , कुटिरोद्योग , जलसिंचन सुविधा यांची माहिती द्या . 

दारिद्रय , उपासमार व कर्ज यांनी थकलेला शेतकरी दारूच्या व्यसनात जीवन बरबाद करतो. वाया जातो , यापासून त्याला परावृत्त करा . त्याला जगू द्या . मरणाच्या खाईत ढकलू नका . 'जय जवान जय किसान'चा खरा मान त्याला द्या. तरच देश समृध्द होईल . समृध्दता मातीतून उगवते . त्या मातीच्या लाडक्या पुत्रास समाधानी जीवनही प्राप्त होऊ नये ही एक शोकांतिका आहे .''

टीप : वरील निबंध एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते. 
  • marathi composition on shetkaryachi atmakatha

एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | shetkari manogat in marathi essay

बहिष्कृत व्यक्तीची आत्मकथा मराठी निबंध किंवा बहिष्कार? छे! कसोटी मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक


बहिष्कृत व्यक्तीची आत्मकथा मराठी निबंध किंवा बहिष्कार? छे! कसोटी मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक" : आजचा दिवस आपल्या जीवनात कधी उजाडेल असं मला वाटलंच नव्हतं! आज या गावाचा सरपंच म्हणून माझी एकमताने निवड झाली. केवढा मोठा हा विश्वास गावकऱ्यांनी माझ्यावर टाकला आहे! आज मी साठीच्या उंबरठ्यावर आहे. चाळीस वर्षांपूर्वीचा गाव आजही माझ्या नजरेसमोर स्पष्ट दिसत आहे. पण गावाने त्यावेळी मला दिलेली कटू वागणूक मात्र मी आता पूर्णपणे विसरून गेलो आहे.


"त्यासाठी मी माझ्या गावकऱ्यांना दोष देणार नाही. तो काळच तसा विचित्र होता. थांबा! मी तुम्हांला माझी कर्मकहाणीच सांगतो. मी या गावातील एक श्रीमंत जमीनदार घराण्यात जन्मलो. समाजातील श्रेष्ठ वर्ग म्हणून स्वतःला गौरवून घेणाऱ्या जातीत जन्मल्यामुळे मला उच्च शिक्षण मिळाले. शहरात शिकत असताना माझी मैत्री झाली, ती समाजाने अस्पृश्य मानलेल्या वर्गातील एका दोस्ताशी. त्यामुळे त्या वर्गातील अभागी लोकांच्या जवळ मी जाऊ शकलो, त्यांची दुःखे जाणू शकलो. आणि शिक्षण पूर्ण करून परत आलो ते निश्चित ध्येय ठरवूनच.


bahiskar essay in marathi
bahiskar essay in marathi

"मी गावातील अस्पृश्य वस्तीत काम करू लागलो. तेथे जाऊ-येऊ लागलो. त्यांच्याबरोबर जेवु लागलो. हे माझ्या घरातील, माझ्या जातीतील लोकांना कसे रुचणार? त्यांनी मला साम, . दाम, दंड सर्व मार्गांनी वळविण्याचा यत्न केला. पण मी एकच जात मानत होतो, ती म्हणजे 'मानव जात.' शेवटी माझ्या घराची दारे मला बंद झाली. माझ्याबरोबर काम करणाऱ्या त्या मागासवर्गातील एक मुलगीच मी माझी सहधर्मचारिणी म्हणून निवडली. त्यामुळे गावानेही मला बहिष्कृत केले.



"त्या काळातील माझे जीवन ही माझी कसोटीच होती. आगीत उजळून निघणाऱ्या सोन्याचे अग्निदिव्य मी अनुभवीत होतो. घर ना दार, खाली जमीन वर आकाश. खिशात फारसे पैसे नसत. जवळ एकच गोष्ट होती 'दुर्दम्य आशावाद' आणि सतत साथ देणारी पत्नी व दोन-चार सच्चे दोस्त. न कंटाळता सर्व छळ सहन करीत मी माझे कार्य करीत राहिलो. वर्षा हीन जीवन जगणाऱ्या या माणसांच्यातील माणूस जागा करण्याचा यत्न केला. हळूहळू यश येत होते. गावकुसाबाहेरच्या त्या माणसांनीही जेव्हा काही भरीव कामगिरी केली, तेव्हा गावाचे लक्षही गावकुसाबाहेरील त्या लोकांकडे जाऊ लागले. निवडणूक न होता आज जेव्हा माझी सरपंच म्हणून निवड झाली, तेव्हा मनात आले, याच गावाने मला बहिष्कृत केले होते ना! नाही, गाव माझी कसोटी घेत होता, हेच खरे!"

वरील बहिष्कृत व्यक्तीची आत्मकथा मराठी निबंध किंवा बहिष्कार? छे! कसोटी मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक मराठी निबंध हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

बहिष्कृत व्यक्तीची आत्मकथा मराठी निबंध किंवा बहिष्कार? छे! कसोटी मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक

मोकळा तास (ऑफ पीरियड) मराठी निंबध

 

मोकळा तास (ऑफ पीरियड) मराठी निंबध  : 'मोकळा तास' म्हणजे शालेय जीवनातील एक आनंदाची पर्वणीच! “मी उदया येणार नाही हं!" असे सूतोवाच कधी एखादे गुरुजी करतात; तर-“अरे, आज अत्रे सर येणार नाहीत. त्यांच्या मेहुणीचे लग्न आहे.” अशी बित्तंबातमी एखादा वर्गमित्र आणतो तेव्हा या 'मोकळ्या तासा'ची पूर्वसूचना मिळते. पण एखादे दिवशी अनपेक्षितपणे असा 'मोकळा तास' मिळतो आणि मग आश्चर्य, आनंद अशा संमिश्र भावनेने 'ऑफ पीरियड' असा वर्गात एकच जल्लोष उठतो. मोकळ्या तासाला वर्गावर येणारे शिक्षक खिलाडू वृत्तीचे असले तर ते हे स्वागत हसत स्वीकारतात; पण असा अनुभव क्वचितच येतो. बहुतेक शिक्षक काही ना काही अभ्यासच घेत असतात.



खरे पाहता, मोकळ्या तासाला अभ्यास म्हणजे आमच्या हक्कावर आक्रमणच नाही का? मोकळा तास म्हणजे गप्पांचा तास असे आमचे गणित असते. अशा गप्पांतून आमचे जनरल नॉलेज'-सामान्य ज्ञान कितीतरी वाढते. माझ्या वर्गातील 'राजीव जोगळेकर' याला अशा मोकळ्या तासाला फार भाव असतो. कारण राजीवचे वडील शिकारी आहेत; त्यामुळे राजीवजवळ शिकारकथा, साहसकथा यांचा भरपूर साठा आहे. वर्गात आलेले शिक्षकही राजीवला एखादी चित्तथरारक शिकारकथा सांगण्याचा आग्रह करतात. मग राजीव कथा सुरू करतो. 

off period in school essay in marathi
off period in school essay in marathi


कथानिवेदनाची उत्कृष्ट कला राजूला लाभली आहे. राजूची कथा रंगू लागते तशी मुले तास विसरतात, वर्ग विसरतात, शाळाही विसरतात. राजूची कथा सुरू झालेली असते आणि आता सर्वजण जंगलात जाऊन पोहोचलेले असतात. सर्वांच्या अंगावर रोमांच उभे असतात. श्वास रोखून धरलेले असतात. बिबट्या वाघ व शिकारी, परस्परांवर नेम धरून बसलेले असतात आणि तेवढ्यात घंटेचा टोला पडतो. गुरुजींसह सर्वांना तो तास संपू नये असे वाटत असते; पण नाइलाजाने राजूला कथा थांबवावी लागते. आणि मग कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी आम्हांला दुसऱ्या मोकळ्या तासाची वाट पाहावी लागते.



एखादा मोकळा तास म्हणजे विनोदाची मेजवानीच ठरते. आमच्या शाळेतील ‘भागवत सर' अशा मोकळ्या तासाला वर्गावर आले की ते स्वतःच काही विनोद सांगतात. मग एकापाठोपाठ एक विनोदांची, चुटक्यांची मुलांकडून मैफल झडते. प्रत्येक विनोद-श्रवणानंतर वर्गात हास्याचा कल्लोळ उठतो. काही काही विनोद तर इतके अफलातून असतात की हशाबरोबर बाकेही बडविली जातात. आपण शाळेत आहोत याचा विसर पडतो. अशा वेळी शेजारच्या वर्गातील शिक्षक आमच्या वर्गात डोकावतात; पण आम्हांला त्याची तमा नसते. असा हा मोकळा तास संपला की वाईट वाटते. पुन्हा मोकळा तास मिळावा आणि भागवत सरच वर्गावर यावेत अशी आम्ही मनोमन प्रार्थना करीत असतो.

एखादया मोकळ्या तासाला कोणीही सर वर्गावर येत नाहीत. मग काय विचारता, आमचेच राज्य चालू होते. वर्गप्रतिनिधी वर्गाची सूत्रे हाती घेतो तेव्हा वर वर वर्ग शांत दिसत असतो; पण आमच्या काही ना काही खोड्या चालूच असतात. बाकाखालची वया, पुस्तके, दप्तरे, खाण्याचा डबा, चपला इकडून तिकडे सरकविल्या जातात. कुणाच्या पाठीवर 'विकाऊ गाढवा'ची चिठ्ठी लावली जाते,


 तर कधी कुठूनतरी एखादा बाण येतो आणि मग कागदाच्या बाणांचा पाऊस पडतो. त्यातच कधीतरी नकलांचा कार्यक्रम सुरू होतो आणि मग सर्व शिक्षकांच्या नकला घडू लागतात. वर्ग अक्षरशः डोक्यावर घेतला जातो. कधी याचे पर्यवसान शिक्षेतही होते; पण त्याचेही आम्हांला काही वाटत नाही. कारण मोकळया तासाची मजा पोटभर उपभोगलेली असते. 'मोकळा तास' हा शालेय जीवनातील 'ओयासिस', रम्य हिरवळ आहे हे खरेच!

टीप : वरील निबंध मोकळा तास (ऑफ पीरियड) मराठी निंबध  या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते
  • shaletil aathvani essay in marathi
  • shaletil gamti jamti essay in marathi

मोकळा तास (ऑफ पीरियड) मराठी निंबध