दुष्काळी कामावरील एक प्रसंग मराठी निबंध

Dushkal Ek Bhishan Samasya Marathi Nibandh


दुष्काळी कामावरील एक प्रसंग मराठी निबंध लिहीताना आठवण येते ती त्‍या वर्षी पडलेल्या दुष्‍काळाची,  त्‍या वर्षी राज्यातील पंधरा जिल्हयांत दुष्काळ जाहीर केला गेला होता. सातत्याने दुष्काळ पडण्याचे हे चौथे वर्ष होते. रखरखीत उन्हामुळे आणि पाण्याचा अंशही कोठे न राहिल्याने जमिनीला सर्वत्र भेगाच भेगा पडल्या होत्या. सगळीकडे दुष्काळी कामे सुरू केली गेली होती. त्या दुष्काळी कामांवरचा मुख्य अधिकारी म्हणून माझ्या वडिलांची नेमणूक झाली होती. त्यामुळे बाबांचा सतत दौरा चालू असे.


सुट्टीचे दिवस म्हणून मीही रिकामटेकडा होतो. सतत महिनाभर सुट्टी असल्याने दिवस अगदी कंटाळवाणे झाले होते. शेवटी एक दिवस बाबांच्या जीपमध्येच जाऊन बसलो. मला पाहून बाबा म्हणाले. “अरे, त कशाला येतोस? तेथे काहीही पाहण्यासारखे नाही. दुष्काळामळे सारा प्रदेश उजाड, भगभगीत झालेला आहे." पण आज मी ठरविलेच होते की आपण बाबांबरोबर जायचेच.

dushkal ek bhishan samasya marathi nibandh
dushkal ek bhishan samasya marathi nibandh

बाबा वाटेत दुष्काळाच्या तीव्रतेचे वर्णन करीत होते आणि जागोजाग त्याचे दर्शन घडतच होते. तृषार्त वसुधा डोळे वटारलेल्या भगवान सहस्ररश्मीकडे काकुळतीने पाहत होती. वाटेत लागणाऱ्या वस्त्यांतील हवालदिल माणसे, त्यांच्या हातापायांच्या झालेल्या काड्या, खपाटीला गेलेली पोटे, रिकामे गोठे दुष्काळाच्या लीला मूकपणे दाखवीत होते. एका ठिकाणी मोठे मोठे पक्ष घिरट्या घालताना दिसत होते. 

बाबा म्हणाले, “जनावर मेलेलं दिसतंय!" थोडे पुढे गेलो तर पक्ष्यांनी खाऊन उरलेल्या एका जनावराचा मोठा सांगाडा पडला होता. मनात आले, या अवर्षणरूपी असुरापुढे भेदभाव नाही. माणसे, जनावरे, पक्षी सारेच याला सारखे. माणसाला आपल्या विद्वत्तेचा केवढा गर्व; पण निसर्ग पुनः पुन्हा त्याला जाणीव करून देतो, “अरे तुझ्या जीवनाच्या साऱ्या नाड्या माझ्या हातात आहेत बघ!"

दुष्काळी काम म्हणून एका ठिकाणी रस्ता बांधण्याचे काम चालू होते. हजारो माणसे कामात गुंतलेली होती. त्यांतील काही खडी फोडण्याचे काम करीत होती. जीप थांबली आणि बाबा खाली उतरले; तशी दहा-बीस माणसे त्यांच्या पाया पडू लागली, क्षणभर मला प्रश्न पडला की अशी कोणती आगळीक झाली आहे या लोकांकडून? मग लक्षात आले की, ते बाबांकडे कामाची मागणी करीत आहेत. “साहेब, काम दया, पोटाला दया,” असे केविलवाण्या शब्दांत ते विनवीत होते. माणसांची ही दयनीय स्थिती पाहून माझे मन सुन्न झाले.

बाबा दुष्काळी कामाची पाहणी करीत होते. तेथील मुकादमाला आणि इतर अधिकाऱ्यांना कामाच्या प्रगतीबाबत विचारणा करीत होते. इतक्यात दूरवर काहीतरी गडबड झाली म्हणून आम्ही तेथे गेलो तर काम करणारी एक स्त्री बेशुद्ध होऊन पडली होती. ती स्त्री गरोदर असावी. तात्पुरत्या उपायाने ती शुद्धीवर येईना, तेव्हा तिला जवळच्या गावातील सरकारी दवाखान्यात न्यायचे ठरले. दुसरे काही वाहन नसल्यामुळे आमच्या जीपमधून न्यायचे ठरले. "हिचे नात्याचे कुणी आहे का येथे?" बाबांनी पुनःपुन्हा विचारले, पण कोणीही पुढे आले नाही. तेव्हा तेथील एक सामाजिक कार्यकर्ता जीपमध्ये बसला.

गाडी पुढे निघाली तेव्हा त्या साऱ्या दृश्याने मी अगदी हबकूनच गेलो होतो. पण खरा धक्का मला पुढेच बसला. दवाखाना आला तेव्हा त्या बाईला डॉक्टरच्या स्वाधीन करून आम्ही तेथील डाकबंगल्यावर गेलो तेव्हा तो समाजसेवक बाबांना म्हणाला, “दादासाहेब, तुम्हांला काही गोष्टी सांगायच्या आहेत. तुमच्या या कामावरचे मुकादम मजुरांना अत्यंत छळतात. 

त्यांना मिळणाऱ्या चार-पाच रुपये मजुरीतील प्रत्येकी एक-एक रुपया हे राक्षस कापून घेतात. मजुरांना देण्यात येणाऱ्या धान्यापैकी माप-माप काढून घेतात आणि हजारो रुपये कमावतात. पण हे गरीब लोक परिस्थितीने एवढे हवालदिल झाले आहेत की ते त्यांच्याविरुदध काही बोल शकत नाहीत. आता ही जी बाई बेशुद्ध पडली तिचा नवरा तेथे कामावर होता. पण रोज बुडेल म्हणून त्याने आपली ओळख दिली नाही वा तो बाईबरोबर आलाही नाही.”

हे सारे ऐकून माझे मन अगदी सुन्न झाले. वाटले, दुष्काळाने माणसाला केवढे हे निष्ठूर बनविले आहे!

टीप : वरील निबंध दुष्काळी कामावरील एक प्रसंग मराठी या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते
  • दुष्काळ एक समस्या निबंध
  • दुष्काळ एक आपत्ती निबंध मराठी
  • दुष्काळ एक भीषण समस्या निबंध मराठी
  • पाण्याचा दुष्काळ निबंध मराठी
  • dushkal padla tar marathi nibandh
  • dushkal che parinam marathi nibandh

दुष्काळी कामावरील एक प्रसंग मराठी निबंध | Dushkal Ek Bhishan Samasya Marathi Nibandh

दुष्काळी कामावरील एक प्रसंग मराठी निबंध

Dushkal Ek Bhishan Samasya Marathi Nibandh


दुष्काळी कामावरील एक प्रसंग मराठी निबंध लिहीताना आठवण येते ती त्‍या वर्षी पडलेल्या दुष्‍काळाची,  त्‍या वर्षी राज्यातील पंधरा जिल्हयांत दुष्काळ जाहीर केला गेला होता. सातत्याने दुष्काळ पडण्याचे हे चौथे वर्ष होते. रखरखीत उन्हामुळे आणि पाण्याचा अंशही कोठे न राहिल्याने जमिनीला सर्वत्र भेगाच भेगा पडल्या होत्या. सगळीकडे दुष्काळी कामे सुरू केली गेली होती. त्या दुष्काळी कामांवरचा मुख्य अधिकारी म्हणून माझ्या वडिलांची नेमणूक झाली होती. त्यामुळे बाबांचा सतत दौरा चालू असे.


सुट्टीचे दिवस म्हणून मीही रिकामटेकडा होतो. सतत महिनाभर सुट्टी असल्याने दिवस अगदी कंटाळवाणे झाले होते. शेवटी एक दिवस बाबांच्या जीपमध्येच जाऊन बसलो. मला पाहून बाबा म्हणाले. “अरे, त कशाला येतोस? तेथे काहीही पाहण्यासारखे नाही. दुष्काळामळे सारा प्रदेश उजाड, भगभगीत झालेला आहे." पण आज मी ठरविलेच होते की आपण बाबांबरोबर जायचेच.

dushkal ek bhishan samasya marathi nibandh
dushkal ek bhishan samasya marathi nibandh

बाबा वाटेत दुष्काळाच्या तीव्रतेचे वर्णन करीत होते आणि जागोजाग त्याचे दर्शन घडतच होते. तृषार्त वसुधा डोळे वटारलेल्या भगवान सहस्ररश्मीकडे काकुळतीने पाहत होती. वाटेत लागणाऱ्या वस्त्यांतील हवालदिल माणसे, त्यांच्या हातापायांच्या झालेल्या काड्या, खपाटीला गेलेली पोटे, रिकामे गोठे दुष्काळाच्या लीला मूकपणे दाखवीत होते. एका ठिकाणी मोठे मोठे पक्ष घिरट्या घालताना दिसत होते. 

बाबा म्हणाले, “जनावर मेलेलं दिसतंय!" थोडे पुढे गेलो तर पक्ष्यांनी खाऊन उरलेल्या एका जनावराचा मोठा सांगाडा पडला होता. मनात आले, या अवर्षणरूपी असुरापुढे भेदभाव नाही. माणसे, जनावरे, पक्षी सारेच याला सारखे. माणसाला आपल्या विद्वत्तेचा केवढा गर्व; पण निसर्ग पुनः पुन्हा त्याला जाणीव करून देतो, “अरे तुझ्या जीवनाच्या साऱ्या नाड्या माझ्या हातात आहेत बघ!"

दुष्काळी काम म्हणून एका ठिकाणी रस्ता बांधण्याचे काम चालू होते. हजारो माणसे कामात गुंतलेली होती. त्यांतील काही खडी फोडण्याचे काम करीत होती. जीप थांबली आणि बाबा खाली उतरले; तशी दहा-बीस माणसे त्यांच्या पाया पडू लागली, क्षणभर मला प्रश्न पडला की अशी कोणती आगळीक झाली आहे या लोकांकडून? मग लक्षात आले की, ते बाबांकडे कामाची मागणी करीत आहेत. “साहेब, काम दया, पोटाला दया,” असे केविलवाण्या शब्दांत ते विनवीत होते. माणसांची ही दयनीय स्थिती पाहून माझे मन सुन्न झाले.

बाबा दुष्काळी कामाची पाहणी करीत होते. तेथील मुकादमाला आणि इतर अधिकाऱ्यांना कामाच्या प्रगतीबाबत विचारणा करीत होते. इतक्यात दूरवर काहीतरी गडबड झाली म्हणून आम्ही तेथे गेलो तर काम करणारी एक स्त्री बेशुद्ध होऊन पडली होती. ती स्त्री गरोदर असावी. तात्पुरत्या उपायाने ती शुद्धीवर येईना, तेव्हा तिला जवळच्या गावातील सरकारी दवाखान्यात न्यायचे ठरले. दुसरे काही वाहन नसल्यामुळे आमच्या जीपमधून न्यायचे ठरले. "हिचे नात्याचे कुणी आहे का येथे?" बाबांनी पुनःपुन्हा विचारले, पण कोणीही पुढे आले नाही. तेव्हा तेथील एक सामाजिक कार्यकर्ता जीपमध्ये बसला.

गाडी पुढे निघाली तेव्हा त्या साऱ्या दृश्याने मी अगदी हबकूनच गेलो होतो. पण खरा धक्का मला पुढेच बसला. दवाखाना आला तेव्हा त्या बाईला डॉक्टरच्या स्वाधीन करून आम्ही तेथील डाकबंगल्यावर गेलो तेव्हा तो समाजसेवक बाबांना म्हणाला, “दादासाहेब, तुम्हांला काही गोष्टी सांगायच्या आहेत. तुमच्या या कामावरचे मुकादम मजुरांना अत्यंत छळतात. 

त्यांना मिळणाऱ्या चार-पाच रुपये मजुरीतील प्रत्येकी एक-एक रुपया हे राक्षस कापून घेतात. मजुरांना देण्यात येणाऱ्या धान्यापैकी माप-माप काढून घेतात आणि हजारो रुपये कमावतात. पण हे गरीब लोक परिस्थितीने एवढे हवालदिल झाले आहेत की ते त्यांच्याविरुदध काही बोल शकत नाहीत. आता ही जी बाई बेशुद्ध पडली तिचा नवरा तेथे कामावर होता. पण रोज बुडेल म्हणून त्याने आपली ओळख दिली नाही वा तो बाईबरोबर आलाही नाही.”

हे सारे ऐकून माझे मन अगदी सुन्न झाले. वाटले, दुष्काळाने माणसाला केवढे हे निष्ठूर बनविले आहे!

टीप : वरील निबंध दुष्काळी कामावरील एक प्रसंग मराठी या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते
  • दुष्काळ एक समस्या निबंध
  • दुष्काळ एक आपत्ती निबंध मराठी
  • दुष्काळ एक भीषण समस्या निबंध मराठी
  • पाण्याचा दुष्काळ निबंध मराठी
  • dushkal padla tar marathi nibandh
  • dushkal che parinam marathi nibandh