एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निंबध आत्‍मकथनात्‍मक

eka hutatma che manogat essay in marathi


एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निंबध आत्‍मकथनात्‍मक : या लेखामध्ये ऐकून 3 निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. देशभक्ताचे आत्मवृत्त “माझ्या देशबांधवांनो! आज तुम्ही केवळ औपचारिकरीत्या 'हुतात्मा दिन' साजरा केलात, हे माझ्या पूर्णपणे लक्षात आले आहे. 


अकरा वाजता भोंगा वाजला आणि मिनिटभर तुम्ही आमचे स्मरण केलेत. काही जणांनी तेही केले नाही. कारण त्यांना हे भोंगे कशासाठी वाजले हेच मुळी उमगले नाही. माझ्या देशबांधवांनो,.


तुम्ही एवढे निष्ठुर का झालात? अरे, हया देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले, आपल्या आत्म्यांची आहुती दिली त्यांची आठवणही तुम्ही विसरून गेला आहात, इतके कृतघ्न तुम्ही का झालात?


“सध्याच्या युगाला नाव दयायचे असेल तर त्याला स्वार्थी युग' म्हणावे लागेल, असे मला वाटते. आजचा माणूस विचार करतो तो फक्त स्वतःचा, फक्त 'मी'चा. आमच्या युगात हा 'मी' अस्तित्वातही नव्हता. सारेजण भारावले होते ते एकाच विचाराने आणि तो विचार म्हणजे 'देशाचे स्वराज्य' मिळविणे, गुलामगिरीचे पाश तोडणे. 'एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार'अशी सर्वांची मनःस्थिती होती.


 स्वातंत्र्यसंघर्षाचा मार्ग हा अतिशय अवघड होता याची आम्हां सर्व देशभक्तांना कल्पना होती. हे 'सतीचे वाण' कोणी आमच्यावर लादले नव्हते, तर ते आम्ही स्वतःहूनच स्वीकारले होते. त्यावेळी पुढे वाढून ठेवलेल्या सर्व दुःखांची, संकटांची आम्हाला पूर्ण कल्पना होती. तरी पण आम्ही या मार्गाने निघालो. कारण- 'आम्हा बांधू न शकले, कीर्तीचे वा प्रीतीचे धागे.


eka hutatma che manogat essay in marathi
eka hutatma che manogat essay in marathi


“देशभक्तीचे हे व्रत आम्हाला दिले होते लोकमान्यांनी. या व्रताचा मार्ग दाखविला होता महात्माजींनी. अहिंसेचे व्रत स्वीकारून आम्ही हा वसा उचलला. परक्या क्रूर सरकारने गोळ्यांच्या फैरी झाडल्या तरी आम्ही आमच्या छातीचा कोट त्यासाठी उघडा केला. 'चले जाव'चा आदेश परक्या सरकारला फार झोंबला, त्यांनी जुलूम-जबरदस्तीचा कळस गाठला; साऱ्या नेत्यांना अटक केली. 


सरकारला वाटले की नेतेमंडळी तुरुंगात पडली की चळवळ आपोआप शमेल. पण परिणाम उलटा झाला. सारा देश पेटून उठला. लहानमोठे, स्त्रीपुरुष सर्वच स्वातंत्र्यलढयात हिरीरीने उतरले. स्वतःला सुचेल तो मार्ग प्रत्येकाने अनुसरला. त्यामुळे अहिंसक मार्गाने चाललेली चळवळ कुठे कुठे हिंसकही बनली. सरकार तर अगदी पिसाळले होते. पण प्राणांची बाजी लावणाऱ्या देशभक्तांपुढे सरकारचे काही चालले नाही.


“भारतीयांनो, काय सांगू तुम्हांला! त्यापुढची सात वर्षे नुसती मंतरलेली होती. देशभक्तीची भावना देशात सर्वत्र पसरली होती. श्रीमंत-गरीब, श्रेष्ठ-कनिष्ठ, धर्म, पंथ, जाती, स्पृश्य-अस्पृश्य असा कोणताही भेदभाव उरला नव्हता.



सर्वजण एकच गोष्ट जाणत होते की, आम्ही भारतीय आहोत आणि आमचा देश स्वतंत्र करणे हेच आमचे पहिले कर्तव्य आहे. त्यासाठी हजारोंनी 'सश्रम कारावास' स्वीकारला. कठोर शिक्षा साहिल्या. पण हूं की चूं केले नाही. म्हणून  तर 'स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशी सर्वांना आपले जीवन कृतार्थ झाल्याचा आनंद झाला. 


सर्वजण स्वराज्याचे सुराज्य होण्याचे स्वप्न उरी बाळगून होते. पण.....आता चाळीस वर्षांनंतर ते स्वप्न भंग पावलेले दिसत आहे. सत्तास्पर्धेपुढे आज देशनिष्ठा, प्रामाणिकपणा उरला नाही. स्वार्थासाठी माणूस वाटेल ते पाप करीत आहे. 


भ्रष्टाचाराचा भस्मासूर मातला आहे हे पाहून आम्हा देशभक्तांचे, हुतात्म्यांचे अंतःकरण फाटत आहे. म्हणून आम्ही तुम्हांला आवाहन करीत आहोत. उठा, जागे व्हा आणि आपल्या स्वातंत्र्याचे सुराज्य करण्यास कटिबदध व्हा!" वरील निबंध एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निंबध आत्‍मकथनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



 निबंध 2


एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निंबध | Eka Hutatma Che Manogat Essay In Marathi


 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निबंध बघणार आहोत. तुम्ही मला हुतात्म्याची आई म्हणालात, बरं वाटलं. आधी आई म्हटल्यावरच आईचं मन उचंबळून येतं. त्यात हुतात्म्याची आई, कुणी मला 'वीरमाता' म्हणतात. 


पण मला 'वीरमाता' नका म्हणू 'धीरमाता' म्हणा. कारण मी काही वीर्य - शौर्य नाही गाजवलं. पण धैर्य दाखवलं. माझ्या मुलाला मी मोठ्या धीराने सैन्यात पाठवलं. माहिती आहे ना, सैनिकाचं जीवन किती खडतर असतं ! लष्करी दुनिया निराळीच असते. तिथे मरण हा नियम असतो आणि जिवंत राहणं हा अपवाद असतो. 



हे ठाऊक असूनही मी माझ्या मुलाला सैन्यात पाठवलं. 'हुतात्म्याची आई' हे शब्द कानी पडताच, आनंद, अभिमान, कर्तव्यपूर्ती, देशाभिमान, त्यांग अशा भावनांचा सागरच मनात उसळून येतो आणि कसं धन्य - धन्य वाटतं. सुंगंधी पाण्याने सचैल स्नान झाल्यासारखं वाटतं. 



जणू स्वर्गातल्या कल्पवृक्षांच्या फुलांची अंगावर बरसात झाल्यासारखं वाटतं. पण तुम्ही जाणू शकता का ? पुष्कळ वेळा फोमच्या गादीवर लोळत असताना मधेच सुईचे अग्र टोचावे तसं वाटतं. एक खंत टोचत असते. 


ज्या माझ्या लाडक्याला मांडीचा पाळणा करून जोजावताना मांडीचं हाड त्याला टोचू नये याची काळजी वाहिली, त्याला न्हाऊ, मांखू घालताना हाताचं नख लागता कामा नये याची खबरदारी घेतली, त्याच्या चिमण्या तोंडात चिमणे घास अगदी नाजूकपणे भरवले, डोळ्यांची निरांजने करून मायेची पाखर घातली; 


तो माझा बाळ अंत्यसमयी रक्ताळलेल्या शरीराने आणि घायाळलेल्या मनाने, कुठेतरी दगडा - धोंड्यांच्या राशीवर पडला असेल, रणरणत्या उन्हात कुठल्या तरी मरुभूमीत पोळला असेल, नाहीतर कुठेतरी बर्फात गोठून गेला असेल. 


मी त्याचं अंत्यदर्शन घेतलं नाही आणि घेतलंही नसतं. कदाचित त्या दर्शनाने माझ्या डोळ्यांच्या खाचा झाल्या असत्या. देहमनाचं काष्ठ झालं असतं.पुष्कळ वेळा तुम्ही जेव्हा माझ्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव करीत असता, तेव्हा अनेक शल्यं माझ्या मनात सलत असतात. 


त्यातला वरपांगीपणा मनाला झोंबत असतो. निवडणूक जवळ आली की जसा लोकांना निवडणूकज्वर भरतो, तसा प्रसंगवशात तुम्हांला कौतुकाचा, सहानुभूतीचा ज्वर भरतो. बेभानपणे, तोंड फाटेपर्यंत आमची स्तुती करता, पण दुपारी आमच्याकडे चूल पेटते का ? अशी चौकशी करायला येता कोणी ? फाटके का होईनात, 


पण आमच्या पोरांच्या अंगावर कपडे आहेत की नाहीत, हे पहायला येता कोणी ? आमच्या डोक्यावर छप्पर आहे की नाही याची काळजी वहातंय कुणी ? लाखालाखांच्या देणग्या जाहीर करता, पण त्यातले पाच - दहा रुपये तरी आमच्यापर्यंत पोहोचलेत की नाही, केलाय याचा कुणी तपास ? तुमच्या सहानुभूतीने माझ्या मनाला कोरड पडते.


जाऊ दे, मी माझ्या मनाला आवर घालते. मला समजतंय यालाच म्हणतात जनरीती, यालाच म्हणतात माणुसकीचा उमाळा, यालाच म्हणतात जनमानसात सतत घोघावणारा दयासागर.पण माझं भान सुटत नाही. 


माझं मन खुरटत नाही. उलट अभिमानाने, कृतकृत्यतेच्या. तृप्तीच्या भावनेने काठोकाठ भरून येतं. तुम्हाला सुखाची झोप यावी म्हणून, माझा मुलगा सीमेवर जागत होता. तुम्ही जखमी होऊ नये म्हणून शत्रूच्या शस्त्रांचे घाव आपल्या अंगावर झेलत होता. 


या विचाराने माझं मन आकाशाएवढं अनंत आणि असीम बनतं. सागरासारखं विस्तीर्ण बनतं. वाटतं मी एकाच मुलाची नाही, तर जे जे जखमी झाले, जे जे हुतात्मा झाले, त्या साऱ्यांची मी आई आहे. मी कंसाची माता नाहीये, मी कृष्णमाता आहे. मी कुंती आहे. 


जिथे आपल्या मुलाला युध्दाच्या खाईत लोटायला अगणित माता कचरल्या, तिथे मी आपण होऊन माझ्या मुलाला धगधगत्या रणकुंडात लोटलं. पवित्र स्थंडिलावर बळी दिला. देव जर कधी मला भेटला तर एकच मागणं मी त्याच्याजवळ मागेन, 'हे परमेश्वरा, पुढच्या जन्मी माझ्या पोटी असाच पुत्र जन्मू दे, आणि असाच मरू दे.


पाथेयातीलं पौष्टिक अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त । स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात ।। जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान ।। काळोखातुन विजयाचा ये पहाटचा तारा | प्रणाम माझा पहिला तुजला, मृत्युंजय वीरा ||


कुसुमाग्रज एक दिवस, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मोर्चा काढला होता. मोर्चा फ्लोरा फाउंटन येथे अडवण्यात आला. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई होते. पोलिसांना गोळीबार करण्याचा आदेश देण्यात आला. 


पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. त्यात १०५ कार्यकर्ते हुतात्मा झाले. आता फ्लोरा फाउंटनला हुतात्मा चौक असे नामाभिधान मिळाले आहे. त्यातल्या एका हुतात्म्याला उद्देशून विंदा करंदीकरांनी 'हे सारे श्रेय तुझेच आहे नावाची उत्कृष्ट जाज्वल्य अशी कविता रचली. त्यातला काही भाग खाली देत आहे. 


सर्व कविता कठस्य करण्यासारखी आहे. सुरुवात - 'मस्तीच्या मातीवर रक्ताची गुळणी थुकून तू, मातीत विलीन झालास' - अशी आहे. यांतल्या कल्पना, उपमा अत्युत्कृष्ट आहेत. 'त्याचे तोंड बंद करू नका असं पैशाच्या पिशवीसारखं ! 


'त्याची मांडी मोडू नका, कारण ती ताठ होती शेवटपर्यंत, बुडणाऱ्या गलबताच्या डोलकाठी सारखी! संयुक्त महाराष्ट्राच्या शत्रूनी, त्यांच्याबद्दल खेद न बाळगता; ते मवाली होते - त्यांचे कसलं कौतुक - असे म्हणणारे दुवाचार्य, प्रत्यक्ष विंदांच्या अवती - भोवती होते. त्यांना उद्देशून विंदांनी लिहिले जवळ जाऊ नका - फटकन शिवी घालील - मवाली आहे !


त्यात एक ओळ आहे 'ही माती तुला कधी विसरणार नाही !' ही ओळ आली की विंदा कविता वाचन थांबवतात आणि म्हणतात. 'इतकी गाढवपणाची ओळ मी कधी लिहिली नाही. व्यंग्यार्थ आला ना लक्षात ?. प्रेताची कवटी फुटली की प्रेत संपूर्ण जळलं असं मानतात. 


म्हणून पोचवायला आलेली मंडळी कवटीचा फाट् असा आवाज होईपर्यंत थांबतात, त्या संबंधी विंदांनी लिहिलं,आणि कवटी फुटेपर्यंत थांबू ही नका, कारण ती अगोदरच फुटली आहे.' मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 3

एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निंबध | Eka Hutatma Che Manogat Essay In Marathi

आमच्या गावच्या हुतात्मा चौकातून मी चाललो होतो. चौकात हुतात्मा स्मारक मोठ्या दिमाखात उभे केलेले आहे. जाता जाता माझ्या कानावर आवाज आला आज तुम्ही हुतात्मा दिन साजरा केला, तो केवळ उपचार म्हणून! अकरा वाजता भोंगा वाजला अन तम्ही १ मिनिट साऱ्या हतात्म्यांचे स्मरण केलेत. बस! झाले तुमचे कर्तव्य! 



आता वर्षभर पुनः माझी आठवण करायची गरज नाही! तुमचे हे वागणे पाहून माझ्या मनाला अतिशय यातना होतात. अरे, हुतात्म्यांनी आपले प्राण पणाला लावले. स्वत:चा संसार सोडून देऊन देशाचा संसार केला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन या हुतात्म्यांनी, क्रांतिकारकांनी सतीचे वाण घेतले होते. 


या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सर्वस्वाचा होम केला. या साऱ्याबद्दल कृतज्ञता म्हणून येथे हुतात्मा स्मारक बांधण्यात आले. या साऱ्या क्रांतिकारकांना देशभक्तीचे व्रत लोकमान्यांनी दिले होते, बापूजींनी दिले होते. इंग्रज सरकारने या क्रांतिकारकांना तुरुंगात टाकले, फाशी दिले. 


पण ते सारे न डगमगता 'जय भारतमाता', 'वंदे मातरम्' असे म्हणत वधस्तंभाकडे हसत हसत गेले आणि हुतात्मा झाले. अशा अनेक हुतात्म्यांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले. त्या दिवशी साऱ्यांना आपले जीवन कृतार्थ झाले असे वाटले. 

सर्व हुतात्म्यांच्या आत्म्याला अतिशय मोठे समाधान लाभले असेल. समाजानेही त्या हुतात्म्यांची आठवण सतत जागती ठेवावी म्हणून हे स्मारक येथे उभे केले. परंतु त्या हुतात्म्यांच्या मनातील देशाबद्दलची उज्ज्वल प्रतिमा आज डागाळून गेली आहे. स्वातंत्र्य मिळून ५० वर्षे झाली. पण आज देशात सत्तास्पर्धा चाललेली दिसते. 


भ्रष्टाचाराच्या अनेक घटना आजकाल उजेडात येत आहेत. देशनिष्ठा, प्रामाणिकपणा असे गुण आजकाल फारसे कोठे आढळत नाहीत. देशात अराजक, हिंसाचार हे मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. त्यामुळे त्या हुतात्म्यांच्या अंत:करणाच्या शतश: चिंधड्या होत आहेत.

हतात्म्यांचे स्मारक म्हणून मला येथे उभे केले आहे. पण कोणाचेही माझ्याकडे लक्षसुद्धा नसते. वर्षभर माझी अवस्था अतिशय दयनीय असते. अंगावर धूळ साठते, ऊनपावसाचे तडाखे सहन करावे लागतात. ज्या हुतात्म्यांच्या आठवणीसाठी हे स्मारक आहे, त्या हुतात्म्यांना लोक पार विसरले आहेत हे पाहून मला वैफल्य येते.


माझा उपयोग येथे प्रेमिकांच्या भेटीचे संकेत स्थळ म्हणून केला जातो, भिकारी येथे बसून जेवणखाण करतात, कावळे कबुतरे माझ्यावर घाण करतात. वास्तविक स्मारक करतात ते त्या हुतात्म्यांचे स्मरण ठेवण्यासाठी, त्यांचे कार्य नजरेपुढे ठेवण्यासाठी! परंतु हा हेतू नजरेआड झाला आहे. स्मारक हे प्रेरक ठरले पाहिजे. 


प्रेरणा देण्यास स्मारक जर यशस्वी होत नसेल तर अशी स्मारके उभारून त्या थोर हतात्म्यांचा अपमान तरी करू नका!! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निंबध आत्‍मकथनात्‍मक

एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निंबध आत्‍मकथनात्‍मक

eka hutatma che manogat essay in marathi


एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निंबध आत्‍मकथनात्‍मक : या लेखामध्ये ऐकून 3 निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. देशभक्ताचे आत्मवृत्त “माझ्या देशबांधवांनो! आज तुम्ही केवळ औपचारिकरीत्या 'हुतात्मा दिन' साजरा केलात, हे माझ्या पूर्णपणे लक्षात आले आहे. 


अकरा वाजता भोंगा वाजला आणि मिनिटभर तुम्ही आमचे स्मरण केलेत. काही जणांनी तेही केले नाही. कारण त्यांना हे भोंगे कशासाठी वाजले हेच मुळी उमगले नाही. माझ्या देशबांधवांनो,.


तुम्ही एवढे निष्ठुर का झालात? अरे, हया देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले, आपल्या आत्म्यांची आहुती दिली त्यांची आठवणही तुम्ही विसरून गेला आहात, इतके कृतघ्न तुम्ही का झालात?


“सध्याच्या युगाला नाव दयायचे असेल तर त्याला स्वार्थी युग' म्हणावे लागेल, असे मला वाटते. आजचा माणूस विचार करतो तो फक्त स्वतःचा, फक्त 'मी'चा. आमच्या युगात हा 'मी' अस्तित्वातही नव्हता. सारेजण भारावले होते ते एकाच विचाराने आणि तो विचार म्हणजे 'देशाचे स्वराज्य' मिळविणे, गुलामगिरीचे पाश तोडणे. 'एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार'अशी सर्वांची मनःस्थिती होती.


 स्वातंत्र्यसंघर्षाचा मार्ग हा अतिशय अवघड होता याची आम्हां सर्व देशभक्तांना कल्पना होती. हे 'सतीचे वाण' कोणी आमच्यावर लादले नव्हते, तर ते आम्ही स्वतःहूनच स्वीकारले होते. त्यावेळी पुढे वाढून ठेवलेल्या सर्व दुःखांची, संकटांची आम्हाला पूर्ण कल्पना होती. तरी पण आम्ही या मार्गाने निघालो. कारण- 'आम्हा बांधू न शकले, कीर्तीचे वा प्रीतीचे धागे.


eka hutatma che manogat essay in marathi
eka hutatma che manogat essay in marathi


“देशभक्तीचे हे व्रत आम्हाला दिले होते लोकमान्यांनी. या व्रताचा मार्ग दाखविला होता महात्माजींनी. अहिंसेचे व्रत स्वीकारून आम्ही हा वसा उचलला. परक्या क्रूर सरकारने गोळ्यांच्या फैरी झाडल्या तरी आम्ही आमच्या छातीचा कोट त्यासाठी उघडा केला. 'चले जाव'चा आदेश परक्या सरकारला फार झोंबला, त्यांनी जुलूम-जबरदस्तीचा कळस गाठला; साऱ्या नेत्यांना अटक केली. 


सरकारला वाटले की नेतेमंडळी तुरुंगात पडली की चळवळ आपोआप शमेल. पण परिणाम उलटा झाला. सारा देश पेटून उठला. लहानमोठे, स्त्रीपुरुष सर्वच स्वातंत्र्यलढयात हिरीरीने उतरले. स्वतःला सुचेल तो मार्ग प्रत्येकाने अनुसरला. त्यामुळे अहिंसक मार्गाने चाललेली चळवळ कुठे कुठे हिंसकही बनली. सरकार तर अगदी पिसाळले होते. पण प्राणांची बाजी लावणाऱ्या देशभक्तांपुढे सरकारचे काही चालले नाही.


“भारतीयांनो, काय सांगू तुम्हांला! त्यापुढची सात वर्षे नुसती मंतरलेली होती. देशभक्तीची भावना देशात सर्वत्र पसरली होती. श्रीमंत-गरीब, श्रेष्ठ-कनिष्ठ, धर्म, पंथ, जाती, स्पृश्य-अस्पृश्य असा कोणताही भेदभाव उरला नव्हता.



सर्वजण एकच गोष्ट जाणत होते की, आम्ही भारतीय आहोत आणि आमचा देश स्वतंत्र करणे हेच आमचे पहिले कर्तव्य आहे. त्यासाठी हजारोंनी 'सश्रम कारावास' स्वीकारला. कठोर शिक्षा साहिल्या. पण हूं की चूं केले नाही. म्हणून  तर 'स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशी सर्वांना आपले जीवन कृतार्थ झाल्याचा आनंद झाला. 


सर्वजण स्वराज्याचे सुराज्य होण्याचे स्वप्न उरी बाळगून होते. पण.....आता चाळीस वर्षांनंतर ते स्वप्न भंग पावलेले दिसत आहे. सत्तास्पर्धेपुढे आज देशनिष्ठा, प्रामाणिकपणा उरला नाही. स्वार्थासाठी माणूस वाटेल ते पाप करीत आहे. 


भ्रष्टाचाराचा भस्मासूर मातला आहे हे पाहून आम्हा देशभक्तांचे, हुतात्म्यांचे अंतःकरण फाटत आहे. म्हणून आम्ही तुम्हांला आवाहन करीत आहोत. उठा, जागे व्हा आणि आपल्या स्वातंत्र्याचे सुराज्य करण्यास कटिबदध व्हा!" वरील निबंध एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निंबध आत्‍मकथनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



 निबंध 2


एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निंबध | Eka Hutatma Che Manogat Essay In Marathi


 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निबंध बघणार आहोत. तुम्ही मला हुतात्म्याची आई म्हणालात, बरं वाटलं. आधी आई म्हटल्यावरच आईचं मन उचंबळून येतं. त्यात हुतात्म्याची आई, कुणी मला 'वीरमाता' म्हणतात. 


पण मला 'वीरमाता' नका म्हणू 'धीरमाता' म्हणा. कारण मी काही वीर्य - शौर्य नाही गाजवलं. पण धैर्य दाखवलं. माझ्या मुलाला मी मोठ्या धीराने सैन्यात पाठवलं. माहिती आहे ना, सैनिकाचं जीवन किती खडतर असतं ! लष्करी दुनिया निराळीच असते. तिथे मरण हा नियम असतो आणि जिवंत राहणं हा अपवाद असतो. 



हे ठाऊक असूनही मी माझ्या मुलाला सैन्यात पाठवलं. 'हुतात्म्याची आई' हे शब्द कानी पडताच, आनंद, अभिमान, कर्तव्यपूर्ती, देशाभिमान, त्यांग अशा भावनांचा सागरच मनात उसळून येतो आणि कसं धन्य - धन्य वाटतं. सुंगंधी पाण्याने सचैल स्नान झाल्यासारखं वाटतं. 



जणू स्वर्गातल्या कल्पवृक्षांच्या फुलांची अंगावर बरसात झाल्यासारखं वाटतं. पण तुम्ही जाणू शकता का ? पुष्कळ वेळा फोमच्या गादीवर लोळत असताना मधेच सुईचे अग्र टोचावे तसं वाटतं. एक खंत टोचत असते. 


ज्या माझ्या लाडक्याला मांडीचा पाळणा करून जोजावताना मांडीचं हाड त्याला टोचू नये याची काळजी वाहिली, त्याला न्हाऊ, मांखू घालताना हाताचं नख लागता कामा नये याची खबरदारी घेतली, त्याच्या चिमण्या तोंडात चिमणे घास अगदी नाजूकपणे भरवले, डोळ्यांची निरांजने करून मायेची पाखर घातली; 


तो माझा बाळ अंत्यसमयी रक्ताळलेल्या शरीराने आणि घायाळलेल्या मनाने, कुठेतरी दगडा - धोंड्यांच्या राशीवर पडला असेल, रणरणत्या उन्हात कुठल्या तरी मरुभूमीत पोळला असेल, नाहीतर कुठेतरी बर्फात गोठून गेला असेल. 


मी त्याचं अंत्यदर्शन घेतलं नाही आणि घेतलंही नसतं. कदाचित त्या दर्शनाने माझ्या डोळ्यांच्या खाचा झाल्या असत्या. देहमनाचं काष्ठ झालं असतं.पुष्कळ वेळा तुम्ही जेव्हा माझ्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव करीत असता, तेव्हा अनेक शल्यं माझ्या मनात सलत असतात. 


त्यातला वरपांगीपणा मनाला झोंबत असतो. निवडणूक जवळ आली की जसा लोकांना निवडणूकज्वर भरतो, तसा प्रसंगवशात तुम्हांला कौतुकाचा, सहानुभूतीचा ज्वर भरतो. बेभानपणे, तोंड फाटेपर्यंत आमची स्तुती करता, पण दुपारी आमच्याकडे चूल पेटते का ? अशी चौकशी करायला येता कोणी ? फाटके का होईनात, 


पण आमच्या पोरांच्या अंगावर कपडे आहेत की नाहीत, हे पहायला येता कोणी ? आमच्या डोक्यावर छप्पर आहे की नाही याची काळजी वहातंय कुणी ? लाखालाखांच्या देणग्या जाहीर करता, पण त्यातले पाच - दहा रुपये तरी आमच्यापर्यंत पोहोचलेत की नाही, केलाय याचा कुणी तपास ? तुमच्या सहानुभूतीने माझ्या मनाला कोरड पडते.


जाऊ दे, मी माझ्या मनाला आवर घालते. मला समजतंय यालाच म्हणतात जनरीती, यालाच म्हणतात माणुसकीचा उमाळा, यालाच म्हणतात जनमानसात सतत घोघावणारा दयासागर.पण माझं भान सुटत नाही. 


माझं मन खुरटत नाही. उलट अभिमानाने, कृतकृत्यतेच्या. तृप्तीच्या भावनेने काठोकाठ भरून येतं. तुम्हाला सुखाची झोप यावी म्हणून, माझा मुलगा सीमेवर जागत होता. तुम्ही जखमी होऊ नये म्हणून शत्रूच्या शस्त्रांचे घाव आपल्या अंगावर झेलत होता. 


या विचाराने माझं मन आकाशाएवढं अनंत आणि असीम बनतं. सागरासारखं विस्तीर्ण बनतं. वाटतं मी एकाच मुलाची नाही, तर जे जे जखमी झाले, जे जे हुतात्मा झाले, त्या साऱ्यांची मी आई आहे. मी कंसाची माता नाहीये, मी कृष्णमाता आहे. मी कुंती आहे. 


जिथे आपल्या मुलाला युध्दाच्या खाईत लोटायला अगणित माता कचरल्या, तिथे मी आपण होऊन माझ्या मुलाला धगधगत्या रणकुंडात लोटलं. पवित्र स्थंडिलावर बळी दिला. देव जर कधी मला भेटला तर एकच मागणं मी त्याच्याजवळ मागेन, 'हे परमेश्वरा, पुढच्या जन्मी माझ्या पोटी असाच पुत्र जन्मू दे, आणि असाच मरू दे.


पाथेयातीलं पौष्टिक अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त । स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात ।। जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान ।। काळोखातुन विजयाचा ये पहाटचा तारा | प्रणाम माझा पहिला तुजला, मृत्युंजय वीरा ||


कुसुमाग्रज एक दिवस, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मोर्चा काढला होता. मोर्चा फ्लोरा फाउंटन येथे अडवण्यात आला. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई होते. पोलिसांना गोळीबार करण्याचा आदेश देण्यात आला. 


पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. त्यात १०५ कार्यकर्ते हुतात्मा झाले. आता फ्लोरा फाउंटनला हुतात्मा चौक असे नामाभिधान मिळाले आहे. त्यातल्या एका हुतात्म्याला उद्देशून विंदा करंदीकरांनी 'हे सारे श्रेय तुझेच आहे नावाची उत्कृष्ट जाज्वल्य अशी कविता रचली. त्यातला काही भाग खाली देत आहे. 


सर्व कविता कठस्य करण्यासारखी आहे. सुरुवात - 'मस्तीच्या मातीवर रक्ताची गुळणी थुकून तू, मातीत विलीन झालास' - अशी आहे. यांतल्या कल्पना, उपमा अत्युत्कृष्ट आहेत. 'त्याचे तोंड बंद करू नका असं पैशाच्या पिशवीसारखं ! 


'त्याची मांडी मोडू नका, कारण ती ताठ होती शेवटपर्यंत, बुडणाऱ्या गलबताच्या डोलकाठी सारखी! संयुक्त महाराष्ट्राच्या शत्रूनी, त्यांच्याबद्दल खेद न बाळगता; ते मवाली होते - त्यांचे कसलं कौतुक - असे म्हणणारे दुवाचार्य, प्रत्यक्ष विंदांच्या अवती - भोवती होते. त्यांना उद्देशून विंदांनी लिहिले जवळ जाऊ नका - फटकन शिवी घालील - मवाली आहे !


त्यात एक ओळ आहे 'ही माती तुला कधी विसरणार नाही !' ही ओळ आली की विंदा कविता वाचन थांबवतात आणि म्हणतात. 'इतकी गाढवपणाची ओळ मी कधी लिहिली नाही. व्यंग्यार्थ आला ना लक्षात ?. प्रेताची कवटी फुटली की प्रेत संपूर्ण जळलं असं मानतात. 


म्हणून पोचवायला आलेली मंडळी कवटीचा फाट् असा आवाज होईपर्यंत थांबतात, त्या संबंधी विंदांनी लिहिलं,आणि कवटी फुटेपर्यंत थांबू ही नका, कारण ती अगोदरच फुटली आहे.' मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 3

एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निंबध | Eka Hutatma Che Manogat Essay In Marathi

आमच्या गावच्या हुतात्मा चौकातून मी चाललो होतो. चौकात हुतात्मा स्मारक मोठ्या दिमाखात उभे केलेले आहे. जाता जाता माझ्या कानावर आवाज आला आज तुम्ही हुतात्मा दिन साजरा केला, तो केवळ उपचार म्हणून! अकरा वाजता भोंगा वाजला अन तम्ही १ मिनिट साऱ्या हतात्म्यांचे स्मरण केलेत. बस! झाले तुमचे कर्तव्य! 



आता वर्षभर पुनः माझी आठवण करायची गरज नाही! तुमचे हे वागणे पाहून माझ्या मनाला अतिशय यातना होतात. अरे, हुतात्म्यांनी आपले प्राण पणाला लावले. स्वत:चा संसार सोडून देऊन देशाचा संसार केला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन या हुतात्म्यांनी, क्रांतिकारकांनी सतीचे वाण घेतले होते. 


या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सर्वस्वाचा होम केला. या साऱ्याबद्दल कृतज्ञता म्हणून येथे हुतात्मा स्मारक बांधण्यात आले. या साऱ्या क्रांतिकारकांना देशभक्तीचे व्रत लोकमान्यांनी दिले होते, बापूजींनी दिले होते. इंग्रज सरकारने या क्रांतिकारकांना तुरुंगात टाकले, फाशी दिले. 


पण ते सारे न डगमगता 'जय भारतमाता', 'वंदे मातरम्' असे म्हणत वधस्तंभाकडे हसत हसत गेले आणि हुतात्मा झाले. अशा अनेक हुतात्म्यांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले. त्या दिवशी साऱ्यांना आपले जीवन कृतार्थ झाले असे वाटले. 

सर्व हुतात्म्यांच्या आत्म्याला अतिशय मोठे समाधान लाभले असेल. समाजानेही त्या हुतात्म्यांची आठवण सतत जागती ठेवावी म्हणून हे स्मारक येथे उभे केले. परंतु त्या हुतात्म्यांच्या मनातील देशाबद्दलची उज्ज्वल प्रतिमा आज डागाळून गेली आहे. स्वातंत्र्य मिळून ५० वर्षे झाली. पण आज देशात सत्तास्पर्धा चाललेली दिसते. 


भ्रष्टाचाराच्या अनेक घटना आजकाल उजेडात येत आहेत. देशनिष्ठा, प्रामाणिकपणा असे गुण आजकाल फारसे कोठे आढळत नाहीत. देशात अराजक, हिंसाचार हे मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. त्यामुळे त्या हुतात्म्यांच्या अंत:करणाच्या शतश: चिंधड्या होत आहेत.

हतात्म्यांचे स्मारक म्हणून मला येथे उभे केले आहे. पण कोणाचेही माझ्याकडे लक्षसुद्धा नसते. वर्षभर माझी अवस्था अतिशय दयनीय असते. अंगावर धूळ साठते, ऊनपावसाचे तडाखे सहन करावे लागतात. ज्या हुतात्म्यांच्या आठवणीसाठी हे स्मारक आहे, त्या हुतात्म्यांना लोक पार विसरले आहेत हे पाहून मला वैफल्य येते.


माझा उपयोग येथे प्रेमिकांच्या भेटीचे संकेत स्थळ म्हणून केला जातो, भिकारी येथे बसून जेवणखाण करतात, कावळे कबुतरे माझ्यावर घाण करतात. वास्तविक स्मारक करतात ते त्या हुतात्म्यांचे स्मरण ठेवण्यासाठी, त्यांचे कार्य नजरेपुढे ठेवण्यासाठी! परंतु हा हेतू नजरेआड झाला आहे. स्मारक हे प्रेरक ठरले पाहिजे. 


प्रेरणा देण्यास स्मारक जर यशस्वी होत नसेल तर अशी स्मारके उभारून त्या थोर हतात्म्यांचा अपमान तरी करू नका!! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद