मी पाहिलेला क्रिकेटचा सामना मराठी निबंध | mi pahilela cricket samna essay in marathi

निबंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी पाहिलेला क्रिकेटचा सामना मराठी निबंध बघणार आहोत. क्रिकेटचे आणि भारताचे एक निराळेच नाते आहे.  हॉकी राष्‍ट्रीय खेळ असल्‍यावरही गल्‍ली बोळामधेही आपल्‍याला क्रिकेटचे सामने आपल्‍याला दिसुन येतील. क्रिकेटचे भारतात असलेले वेड  आणि खेळाडुंची क्रिकेटला जिव की प्राण म्हणुन खेळण्याची तळमळ आपल्याला खालील ४ निबंधामधुन दिसुन येईल चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.  


माझा अविस्मरणीय सामना : यंदा 'महाविद्यालयीन ट्रॉफी जिंकून आणायचीच. अशी प्रतिज्ञा आमच्या मुंबई कॉलेज संघाने केली होती. त्यासाठी गेले सहा महिने रात्रंदिवस सराव चालू होता. मागील  वेळेस  हातातोंडाशी आलेली ट्रॉफी शेवटच्या बॉलवर घालवावी लागली होती. आता कोणतीही कसर सोडायची नाही अन् कसूरही करायची नाही असा निश्चय केला होता सर्व खेळाडूंनी...

सामने सुरू झाले, अन् आमचा सामना अंतिम डावापर्यंत तरी कोणतीही अडचण न येता पोहोचला. आता खरा कसोटीचा क्षण होता. आमच्याबरोबर खेळणारा संघही काही कमी नव्हता. त्याची ही तयारी उत्तम होती. 'ट्रॉफी' जिंकण्यासाठी त्यांनीही जिद्दीने खेळ सुरू केला होता. तोडीस तोड - धावांबरोबर धावा - खेळ कसा अटीतटीचा चालला होता. (हे पण वाचा मी पाहिलेला चुरशीचा सामना निबंध)

दोनवेळा सामना अनिर्णित राहिला. अर्थात त्यामुळे विश्रांतीचा दिवसही रद्द करून सामना चालू ठेवायचा आणि त्यातून निर्णय घ्यायचा असे ठरले. वादावादी, गाजावाजाही वाढत होताच. आणि अखेरीस तो दिवस उजाडला. स्टेडियम माणसांनी कसे फुलून गेले होते. अशा सामन्यातून आंतरराष्ट्रीय संघांची निवड होणार असते. देशभरातून अनेक क्रिकेट शौकिनांनी आज भाऊगर्दी केली होती.

एखादा चौकार असो किंवा षटकार सारा स्टेडियम टाळ्यांच्या गजराने दुमदुमून निघत होता. एखादा झेल सुटला तरी सगळीकडे निराशेचा सुस्कारा ऐकू येत होता. इकडे विरुद्ध संघही बचावाचा खेळ खेळत होता. त्यामुळे खेळात तसा रंग चढत नव्हता. विकेट तर आमच्या गोलंदाजांनाच अनुकूल होती. परंतु नावाजलेल्या गोलंदाजांची गोलंदाजीही आज मूग गिळून बसली होती. 

मैदानाच्या दिशेने आता प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्या, फळांच्या साली, कागदांचे बोळे यायला लागले. अखेरीस दिवस संपेपर्यंत विरुद्ध संघ कसाबसा संपूर्ण आटोपला तेव्हा त्याच्या २१० धावा झाल्या होत्या.

दुसरा दिवस उजाडला तो आमच्या संघाच्या धडाडीच्या खेळानेच. चौकारांच्या दणक्याने कांबळीने सर्वांना खूश करून सोडले. तर सरदेसाईची त्याला साथ आणि चोरट्या धावा यामुळे आमचा संघ धावसंख्या वाढवीत होता. अखेरीस ३०४ धावांवर आमचा संघ बाद झाला अन् ९४ धावांनी आघाडी मिळवली. दुसऱ्या डावात विरुद्ध संघानेही धावांचा डोंगर रचायला सुरुवात केली.

पहिल्या आघाडीच्या पाच खेळाडूंनी जणू चंगच बांधला होता. एकही बॉल, बॅटला स्पर्श केल्याशिवाय जातच नव्हता. ९४ धावांची आघाडी पार करून त्यांनी पुढे जोराचा पवित्रा घेतला आणि अखेरचा गडी बाद होईपर्यंत आमच्यावर १९९ धावांची आघाडी मिळविली.

mi-pahilela-cricket-samna-essay-in-marathi
mi-pahilela-cricket-samna-essay-in-marathi


आमच्या संघाला वाटले, ही धावसंख्या आपण सहज पार करू. परंतु पहिले तीन खेळाडू जेमतेम ४०-४५ धावा करून तंबूत परतले. सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. इकडे विरुद्ध पक्षाला 'चिअरअप' जोरात सुरू झाला आणि आमच्यावर दबाव वाढला.

नशिबाने साथ दिली. अन् पुढील दोन खेळाडूंनी दमदार खेळ सुरू करून धावसंख्या १५० पर्यंत नेली. पुन्हा एकापाठोपाठ पाच गडी बाद झाले. आता धावसंख्या पार करण्यासाठी ५० धावांची गरज होती. नववा गडी म्हणून मी तंबूतून बाहेर पडलो. खरा मी गोलंदाज, आता बॅट कशी साथ देते तेच पाहायचे होते. कॅप्टनने मला धीर दिला. माझी पाठ थोपटली. मी मैदानावर आलो. बॅटला बॉल लागला आणि समोरच्या खेळाडूच्या मदतीने धावा सुरू केल्या.

 दोघांनी मिळून ४३ धावा केल्या. तेवढ्यात समोरचा गडी बाद झाला. पुन्हा टेन्शन वाढले. पाहिजे होत्या फक्त ७ धावा. आता दहाव्या खेळाडूला धीर देण्याची वेळ माझी होती. तो दबकत दबकत खेळत होता. चोरटी एखाद्-दुसरी धाव काढत होता. एक चेंडू आला अन माझ्याकडून दणदणीत चौकार मारला गेला अन् स्टेडियम दणाणून गेले. कप्तानासह सर्व खेळाडुंनी मैदानाकडे धाव ठोकली. मला व माझ्या जोडीदार खेळाडूला उचलून घेतले.

गौरवाने तंबूत आणले, जणू काही मीच एकटा यशाचा मानकरी होतो. आमच्या संघाने ट्रॉफी जिंकली होती. ट्रॉफी घेतानाही आमचा सर्व संघ उपस्थित होता. ट्रॉफी डोक्यावर घेऊन नाचत होता. असा हा माझा क्रिकेटचा सामना माझ्या जीवनातील अविस्मरणीय सामना ठरला. (100 हुन अधिक निबंध वाचा तुमच्‍या मोबाईलवर  )

मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला  हे  तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद .

निबंध 2

 एक रंगलेला क्रिकेटचा सामना


आमच्या वसाहतीच्या जवळच एक मोठे मैदान आहे. तेथे आम्ही नेहमी क्रिकेट खेळतो. एके दिवशी मोठ्या माणसांचा क्रिकेटचा सामना घ्यायचे ठरले. माझे बाबासुद्धा त्यात सामील झाले. 'संघ अ' आणि 'संघ ब' असे दोन संघ तयार करण्यात आले. आमच्या वसाहतीतील सर्व घरांत ही बातमी पसरली. सर्वांना उत्सुकता वाटत होती.

मग सामन्याचा दिवस उगवला. दोन्ही संघ मैदानात उतरले. वसाहतीत सर्व लोक सामना पाहण्यासाठी जमले होते. काहीजण खिडकीतून पाहत होते. सामना सुरू झाला. काहीजण खरोखरच छान खेळले. 'अ' संघातल्या चित्रेकाकांनी ५० धावा काढल्या, तर 'ब' संघातल्या मूर्तीकाकांनी सहा गडी बाद केले. बोंद्रेकाका खूप जाडे आहेत. त्यामुळे धावताना ते मजेशीर दिसत होते.

एकदा धावताना ते पडले. तेव्हा सगळे हसून हसून बेजार झाले. स्वत: बोंद्रेकाकासुद्धा हसत होते. अखेरीस ‘संघ अ' विजयी झाला. सगळ्यांनी एकमेकांचे अभिनंदन केले. त्यानंतर सगळ्यांना खाऊ वाटण्यात आला. त्या दिवशी सर्वजण खेळातील आठवणी काढून गप्पा मारत होते. त्या दिवशी खूप मजा आली.

 महत्‍वाचे मुद्दे :

  • आम्ही मुले नेहमीच खेळतो 
  • एके दिवशी मोठ्या माणसांचा सामना 
  • काहीजण चांगले खेळले 
  • काही गमती 
  • आनंदाचे वातावरण.

निबंध  3

मी पाहिलेला क्रिकेटचा सामना 


भारतीय संघ बांग्लादेशात खेळायला निघाला होता. कोण जाणार, कोण नाही याची चर्चा होऊन शेवटी संघ रवाना झाला. एकदिवसीय चार सामने आणि दोन कसोटी सामने खेळले जाणार होते. सुरुवात तर चांगली झाली. एकदिवसीय चारही सामने भारतीय संघाने जिंकले.

पण यात विशेष आवडला तो दुसरा कसोटी सामना. कारण, या सामन्यामुळे विश्वचषक सामन्यात लागलेला कलंक पुसला गेला. बांगलादेशच्या याच संघाने आमच्या सर्व वीरांना चारी मुंड्या चित केले होते. त्याच संघावर  आमच्या क्रिकेट वीरांनी नेत्रदीपक विजय मिळवला.


असा हा सामना बांग्लादेशातील ढाका येथील शेरेबांगला स्टेडियमवर झाला. प्रथमच नाणेफेक जिंकून भारतीय संघाने फलंदाजी स्वीकारली. सुरुवातीलाच आपल्या खेळाडूंना सूर सापडला आणि भारतीय फलंदाजांनी बांग्लादेशच्या वेगवान व फिरकी गोलंदाजीचे पार खोबरे करून टाकले. एकापाठोपाठ एक अशा पाच फलंदाजांनी आपली शतके झळकावली.

सचिन व सौरभ यांनी आधीचा लागलेला डाग पुसून टीकाकारांची बोलती बंद केली. सहाशे दहा धावांचा डोंगर रचून भारतीय संघाने आपला डाव सोडला आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याला, बांग्लादेशला, खेळाची संधी दिली.
भारताच्या झहीर खानच्या तुफानी गोलंदाजीपुढे बांग्लादेशचा अर्धा संघ बाद झाला. उरल्यासुरल्या फलंदाजांना अनिल कुंबळेने तंबूत पाठवले.

चारशे धावांचे ओझे घेऊन फालोऑन स्वीकारून बांगलादेश दुसरा डाव खेळायला मैदानात उतरला. आता पाऊसच त्यांना वाचवू शकणार होता. पण त्या दिवशी तोही त्यांच्यावर फिदा नव्हता. या डावात बांगलादेशच्या खालेद मासूद, अश्रफूल आणि मोर्तझा यांनी अटीतटीची झुंज दिली. पण भारतीय खेळाडू आता पेटून उठले होते. अगदी सचिनने गोलंदाजीतही आपली करामत दाखवली आणि दोन गडी टिपले. भारताने बांग्लादेशचा १ डाव आणि २३९ धावांनी दणदणीत पराभव केला.

या यशाने भारताने जणू दाखवून दिले, 'हम भी कुछ कम नही !' आता आपल्या लाडक्या खेळाडूंवर टीका करणाऱ्यांची तोंडे बंद झाली, याचा मला विशेष आनंद झाला.

महत्‍वाचे मुद्दे :
  • विश्वचषक सामन्यात आलेले अपयश 
  • त्यामुळे निंदानालस्ती
  • मन दुखावले 
  • बांग्लादेशात सामने 
  • फलंदाजीतील पराक्रम 
  • गोलंदाजीतील विक्रम
  • मिळालेले यश
  • यशाचा परिणाम. 

निबंध 4


मी पाहिलेला चुरशीचा सामना 

इंग्लंडमध्ये विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामने चालले होते. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया या संघांत उपांत्य सामना होणार होता. हा मी पाहिलेला अत्यंत चुरशीचा सामना होता. सामन्याचा दिवस उजाडला. मी खादयपेये घेऊन स्टेडियमवर गेलो. ठीक वेळेवर दोन पंच आणि दोन्ही संघांचे कप्तान मैदानावर आले. नाणेफेक झाली.

त्यात दक्षिण आफ्रिकेच्या कप्तानाने हॅन्सी क्रॉनिएने बाजी मारली. मैदानाचा रागरंग पाहून त्याने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. थोड्याच वेळात ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर अॅडम गिलख्रिस्ट आणि मार्क वॉ फलंदाजीसाठी मैदानात उतरले, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला. कप्तानाने चेंडू शॉन पोलॉक याच्या हातात दिला.

आता साऱ्या प्रेक्षकांनी आपले श्वास रोखून धरले होते. जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपल्या खेळाची सुरवात मोठ्या सावधपणे केली. खेळ थोडा धीमा वाटत होता. प्रेक्षक धावांच्या आतषबाजीसाठी आतुर होते; पण फलंदाज फारच जबाबदारीने खेळत होते.

नियोजित पन्नास षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाने आपल्या नावावर २१३ धावा झळकावल्या. चाळीस मिनिटांची विश्रांती सुरू झाली. क्रीडांगणावर खेळाडू नव्हते, प्रेक्षक जरा सैलावले होते. बरोबर आणलेल्या खादयवस्तूंचा समाचार घेणे सुरू झाले. पण कोठेही कागद फेकाफेकी नव्हती. विश्रांतीचा काळ संपला; पण कोठेही अस्वच्छतेचा अंशही नव्हता.

थोड्याच वेळात दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर मैदानावर फलंदाजीसाठी उतरले. ऑस्ट्रेलियाचा संघही क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला. दक्षिण आफ्रिकेला सामना जिकण्यासाठी २१४ धावा करायच्या होत्या. सुरवात चांगली झाली. धावफलकावर दक्षिण आफ्रिकेच्या नावावर बिनबाद ४६ धावा लागल्या. जॉन्टी होडस व लान्स क्लसनर यांनी वेगाने फलंदाजी केली.

धावफलकावर ७ गडी बाद २०० धावा लागल्या. आता फक्त १४ धावा करायच्या होत्या. बहुतेक हेच दोन्ही खेळाडु सामना जिंकून देतील, असे वाटत असतानाच जॉन्टी बाद झाला. सारे प्रेक्षक हळहळले. जमलेली जोडी फुटली होती. नंतर आलेला शॉन पोलॉक शून्यावर बाद झाला. आता चुटपूट लागली, दक्षिण आफ्रिका सामना गमावणार की काय? पण अखेरच्या षटकात क्लुसनरने तीन चौकार मारले.

 आता फक्त दोनच धावा हव्या होत्या; पण शेवटचा फक्त एकच गडी बाकी होता. कशीबशी एक धाव मिळाली. आता एक धाव काढली की विजय दक्षिण आफ्रिकेचा होणार होता. सारे प्रेक्षक नि:स्तब्ध होते आणि दुर्दैव म्हणजे, डोनॉल्ड धावचीत झाला. दोन्ही संघांची धावसंख्या सारखीच झाली, २१३ ! मॅच 'टाय' झाली होती.
मग विजय कोणाचा? सारे वातावरण संभ्रमित होते. पंच निर्णय काय देणार?

 सर्व अधिकाऱ्यांच्या विचारविनिमयानंतर निर्णय जाहीर झाला. साखळी सामन्यांत पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर मात केलेली असल्यामुळे 'ऑस्ट्रेलिया'चा संघ विजयी ठरला. दक्षिण आफ्रिकेचा संघ या रोमहर्षक सामन्यात पराभूत झाला होता. 'क्रिकेट इज ए गेम ऑफ चान्स' म्हणतात ते यासाठीच! आजवर मी अनेक सामने पाहिले; पण अखेरच्या क्षणापर्यंत उत्सुकता टिकवून धरणारा असा रंगतदार सामना मी यापूर्वी कधीच पाहिला नव्हता.

महत्‍वाचे मुद्दे :
  • सामना कोठे व कोणत्या खेळाचा 
  • संघ 
  • सामन्याचे वर्णन 
  • सामना आवडल्याची कारणे 
  • अविस्मरणीय घटना 
  • सामना पाहून आल्यावर मनात आलेले विचार...

निबंध 5

मी पाहिलेला एक क्रिकेटचा सामना (क्रिकेट मॅच)


 एकदा मी एक विलक्षण अद्भुत आणि लोकविलक्षण असा क्रिकेटचा सामना पाहिला दोन संघ दंड थोपटून एकमेंकाविरुद्ध लढायला रणांगणात उतरले होते. संघात ११ खेळाडू लागतात हा नियम त्यांना ठाऊक नसावा किंवा मान्य नसावा. एका संघात ५ खेळाडू आणि दुसऱ्या संघात ६ खेळाडू असे ते संघ होते. चला ११ चा आकडा तर जुळला. त्यांच्याजवळ २ बॅटी होत्या. पण स्टंप तीनच होते.


१ स्टंप गोलंदाजाच्या बाजूला ठोकला आणि उरलेले दोन फलंदाजाच्या बाजूला ठोकले. दोन स्टंपांच्या मध्ये चांगले दोन वितीचं अंतर ठेवलं होतं. इथे "ठोकणं' हे क्रियापद चपखल बसतंय. कारण स्टंपच्या टोकाच्या पत्र्यांच्या टोप्या नाहीशा झाल्या होत्या. तेव्हा ते स्टंपस नीट बसत नव्हते. सारखे ठोकावे लागत होते. मला वाटतं सामन्याचा अर्धा वेळ स्टंपस् ठोकण्यातच जात होता. 


वास्तविक ते टेनिस - बॉलने खेळत होते, तरी सुध्दा फलंदाजांनी आणि यष्टिरक्षकाने पॅडस बांधले होते. त्यांच्या पॅडसचं गोलदांजाला वैषम्य वाटलं म्हणून त्याने पण आपल्या एका पायाला पॅड बांधला. गोलंदाज पायाला पॅड बांधत नाही हा नियम एकाने त्याच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्याने पॅड नाराजीने काढला.


अंपायर क्रिकेटच्या बाबतीत अगदी अनभिज्ञ होता. आपण इथे उभे राहून नेमकी कोणती कामगिरी पार पाडायची याची त्याला कल्पना नव्हती. सामना सुरू झाला. गोलंदाज चेंडू टाकायला लागला. सहा चेंडू झाले, सात झाले, आठ झाले, तरी अंपायर ओव्हर देईचना. 


तेव्हा गोलंदाजी करायला अगदी अधीर झालेला दुसरा खेळाडू ओरडला, "अरे, ओव्हर दे ना ! पंचानी शांतपणे विचारले, ओव्हर; म्हणजे काय असतं ते ?" अरे सहा चेंडू झाले की ओरडायचं "ओव्हर !" अच्छा! अंपायरने ते गणित समजावून घेतलं, दुसरं षटक बरोबर सहा चेंडूचं झालं. मगच तो खेळाडू दुसरं षटक टाकायला आला. 

त्याचे ४ चेंडू टाकून झाल्यावर अंपायर ओरडला "ओव्हर." "अरे, चारच चेंडू झाले. ओव्हर कशी देतोस," पण अंपायर गणितात कच्चा होता तो बोलला." मग आता तू आठ चेंडू नाही का टाकलेस ? या षटकात ते दोन जादा चेंडू वळते करून घेतले" थोडी बाचाबाची झाली आणि खेळ पुढे सुरू झाला.


एका गोलंदाजाने टीव्हीवर पाहिलं होतं की, गोलंदाज चेंडूला थुंकी  लावतो. या गोलंदाजाने चेंडूला एवढी थुंकी  लावली की चेंडू थुंकी  भिजला. या कारणाने चेंडू बदलावा लागला.  एक खेळाडू सरळ मध्ये येऊन खेळत होता.


त्याच्या पायाला बॉल लागल्यावर सारे क्षेत्ररक्षक ओरडले, "हाऊस टॅट !" अंपायर गोंधळला "आऊट कसा' ती दांडी कुठे पडलीय. "अरे, बॉल पायाला लागला की आऊट असतो. एल.बी.डब्लू. अंपायरने ते लक्षात ठेवलं. थोड्या वेळाने रन घेण्यासाठी म्हणून धावत असणाऱ्या खेळाडूच्या पायाला बॉल लागतो; 


अंपायर ओरडला "आऊट" एल.बी.डब्लू ! त्या बलदंडाने निकाल दिल्यानंतर त्याच्याशी वाद घालण्यात अर्थ नव्हता. धावत असलेला खेळाडू मुकाट्याने तंबूत परतला.


खेळापेक्षा अंपायरचे एकेक निकालच प्रेक्षकांचं जास्त मनोरंजन करीत होते. एक खेळाडू खप वेळ खेळत होता आणि चांगला खेळत होता. त्याने एक चौका मारला. अंपायर ओरडला, "आऊट!" अरे आऊट कसा ? "त्याचं काय आहे, हा एकटाच कितीतरी वेळ खेळतोय; दुसऱ्यांना खेळू दे ना आता." सगळ्यांनी कपाळावर हात मारून घेतला.



गडी बाद झाले ते सर्व झेल बाद आणि पायचित; बोल्ड एकही नाही. कारण दोन स्टंप्स मध्ये एवढं अंतर होतं की चेंडू स्टंपच्या मधूनच जायचा नेहमी. स्टंपला कसला लागतो; आणि अंपायर आपल्या विचारावर ठाम होता. दांडी पडल्याशिवाय आऊट द्यायचं नाही. करता करता सारे बाद झाले. एका संघाची पाळी संपली. 


मग चौकशी सुरू झाली "स्कोअर किती झाला ?" स्कोअर किती झाला ? जो तो विचारू लागला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की स्कोअरर नेमायचा राहिला होता. मग माझे किती, तुझे किती ? असं करून काय तरी एक संख्या ठरविण्यात आली. स्कोअरचं प्रकरण एकदाचं संपलं. पण दुसरंच प्रकरण सुरू झालं. अंपायर विचार करायला लागला, 


"मी केव्हा खेळायचं," अरे अंपायर काय खेळत नाय; तो नुसता उभा असतो. "अंपायर महाशय भडकले, मला खेळायला मिळणार नाही हे आधी का नाही सांगितलंत? मी अंपायर झालोच नसतो." लाथ मारून त्याने स्टंप उडवून दिला आणि तोंडाने शिव्या पुटपुटत तो चालता झाला. पंच गेले - म्हणजे पंचाईत झाली. पंचापाठोपाठ मी पण जाणार होतो. कारण सामना बघण्याची माझीही सहनशक्ती संपुष्टात आली होती. पण म्हटलं, 



त्यांचे खेळाडू कसे खेळतात जरा बघू या. थोडा वेळ खेळ व्यवस्थित चालला. पण मग कशावरून तरी वादावादी सुरू झाली. पहिल्याने हातवारे, मग गुद्दे अखेर कोणी स्टंप उपटून दुसऱ्यांच्या अंगावर धावले, कोणी बॅटी उगारल्या. समर प्रसंगच निर्माण झाला. 


निकाल काय लागतो ते बघायाला थांबलो. पण सामन्याचा एकंदरीत निकालच लागला, त्याच्या नंतर मी खूप सामने पाहिले, त्याच्या पुढेही पाहीन; पण हा सामना कधीही विसरणार नाही. कारण या सामन्याची स्मृती माझ्या मनात स्टंपसारखी घट्ट ठोकली गेलीय.

निबंध 6

मी पाहिलेला क्रिकेटचा सामना मराठी निबंध | mi pahilela cricket samna essay in marathi


क्रिकेट मॅच) एकदा मी एक विलक्षण अदभुत आणि लोकविलक्षण असा क्रिकेटचा सामना पाहिला दोन संघ दंड थोपटून एकमेंकाविरुद्ध लढायला रणांगणात उतरले होते. संघात ११ खेळाडू लागतात हा नियम त्यांना ठाऊक नसावा किंवा मान्य नसावा. 

एका संघात ५ खेळाडू आणि दुसऱ्या संघात ६ खेळाडू असे ते संघ होते. चला ११ चा आकडा तर जुळला. त्यांच्याजवळ २ बॅटी होत्या. पण स्टंप तीनच होते. १ स्टंप गोलंदाजाच्या बाजूला ठोकला आणि उरलेले दोन फलंदाजाच्या बाजूला ठोकले. 


दोन स्टंपांच्या मध्ये चांगले दोन वितीचं अंतर ठेवलं होतं. इथे "ठोकणं" हे क्रियापद चपखल बसतंय. कारण स्टंपच्या टोकाच्या पत्र्यांच्या टोप्या नाहीशा झाल्या होत्या. तेव्हा ते स्टंपस नीट बसत नव्हते. सारखे ठोकावे लागत होते. मला वाटतं सामन्याचा अर्धा वेळ स्टंपस् ठोकण्यातच जात होता.


वास्तविक ते टेनिस बॉलने खेळत होते, तरी सुध्दा फलंदाजांनी आणि यष्टिरक्षकाने पॅडस् बांधले होते. त्यांच्या पॅडस्चं गोलदांजाला वैषम्य वाटलं म्हणून त्याने पण आपल्या एका पायाला पॅड बांधला. गोलंदाज पायाला पॅड बांधत नाही हा नियम एकाने त्याच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्याने पॅड नाराजीने काढला.


अंपायर क्रिकेटच्या बाबतीत अगदी अनभिज्ञ होता. आपण इथे उभे राहून नेमकी कोणती कामगिरी पार पाडायची याची त्याला कल्पना नव्हती. सामना सुरू झाला. गोलंदाज चेंडू टाकायला लागला. सहा चेंडू झाले, सात झाले, आठ झाले, तरी अंपायर ओव्हर देईचना. 


तेव्हा गोलंदाजी करायला अगदी अधीर झालेला दुसरा खेळाडू ओरडला, "अरे, ओव्हर दे ना ! पंचानी शांतपणे विचारले, ओव्हर; म्हणजे काय असतं ते ?" अरे सहा चेंडू झाले की ओरडायचं "ओव्हर !" अच्छा! अंपायरने ते गणित समजावून घेतलं, दुसरं षटक बरोबर सहा चेंडूचं झालं. 


मगच तो खेळाडू दुसरं षटक टाकायला आला. त्याचे ४ चेंडू टाकून झाल्यावर अंपायर ओरडला "ओव्हर." "अरे, चारच चेंडू झाले. ओव्हर कशी देतोस, पण अंपायर गणितात कच्चा होता तो बोलला." मग आता तू आठ चेंडू नाही का टाकलेस? या षटकात ते दोन जादा चेंडू वळते करून घेतले" थोडी बाचाबाची झाली आणि खेळ पुढे सुरू झाला.


एका गोलंदाजाने टीव्हीवर पाहिलं होतं की, गोलंदाज चेंडूला थुकी लावतो. या गोलंदाजाने चेंडूला एवढी थुकी लावली की चेंडू थुकीने भिजला. या कारणाने चेंडू बदलावा लागला.



एक खेळाडू सरळ मध्ये येऊन खेळत होता. त्याच्या पायाला बॉल लागल्यावर सारे क्षेत्ररक्षक ओरडले, "हाऊस टॅट!" अंपायर गोंधळला "आऊट कसा" ती दांडी कुठे पडलीय. "अरे, बॉल पायाला लागला की आऊट असतो. एल.बी.डब्लू. अंपायरने ते लक्षात ठेवलं. 


थोड्या वेळाने रन घेण्यासाठी म्हणून धावत असणाऱ्या खेळाडूच्या पायाला बॉल लागतो; अंपायर ओरडला "आऊट" एल.बी.डब्लू ! त्या बलदंडाने निकाल दिल्यानंतर त्याच्याशी वाद घालण्यात अर्थ नव्हता. धावत असलेला खेळाडू मुकाट्याने तंबूत परतला.


खेळापेक्षा अंपायरचे एकेक निकालच प्रेक्षकांचं जास्त मनोरंजन करीत होते. एक खेळाडू खूप वेळ खेळत होता आणि चांगला खेळत होता. त्याने एक चौका मारला. अंपायर ओरडला, "आऊट!'' अरे आऊट कसा ? "त्याचं काय आहे, हा एकटाच कितीतरी वेळ खेळतोय; दुसऱ्यांना खेळू दे ना आता." सगळ्यांनी कपाळावर हात मारून घेतला.


गडी बाद झाले ते सर्व झेल बाद आणि पायचित; बोल्ड एकही नाही. कारण दोन स्टंप्स मध्ये एवढं अंतर होतं की चेंडू स्टंपच्या मधूनच जायचा नेहमी. स्टंपला कसला लागतो; आणि अंपायर आपल्या विचारावर ठाम होता. दांडी पडल्याशिवाय आऊट द्यायचं नाही. करता करता सारे बाद झाले. 


एका संघाची पाळी संपली. मग चौकशी सुरू झाली “स्कोअर किती झाला ?" स्कोअर किती झाला ? जो तो विचारू लागला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की स्कोअरर नेमायचा राहिला होता. मग माझे किती, तुझे किती ? असं करून काय तरी एक संख्या ठरविण्यात आली. 


स्कोअरचं प्रकरण एकदाचं संपलं. पण दुसरंच प्रकरण सुरू झालं. अंपायर विचार करायला लागला, "मी केव्हा खेळायचं," अरे अंपायर काय खेळत नाय; तो नुसता उभा असतो.''अंपायर महाशय भडकले, मला खेळायला मिळणार नाही हे आधी का नाही सांगितलंत? मी अंपायर झालोच नसतो.


" लाथ मारून त्याने स्टंप उडवून दिला आणि तोंडाने शिव्या पुटपुटत तो चालता झाला. पंच गेले - म्हणजे पंचाईत झाली. पंचापाठोपाठ मी पण जाणार होतो. कारण सामना बघण्याची माझीही सहनशक्ती संपुष्टात आली होती. पण म्हटलं, त्यांचे खेळाडू कसे खेळतात जरा बघू या. थोडा वेळ खेळ व्यवस्थित चालला. 



पण मग कशावरून तरी वादावादी सुरू झाली. पहिल्याने हातवारे, मग गुद्दे अखेर कोणी स्टंप उपटून दुसऱ्यांच्या अंगावर धावले, कोणी बॅटी उगारल्या. समर प्रसंगच निर्माण झाला. निकाल काय लागतो ते बघायाला थांबलो. पण सामन्याचा एकंदरीत निकालच लागला, त्याच्या नंतर मी खूप सामने पाहिले, त्याच्या पुढेही पाहीन; पण हा सामना कधीही विसरणार नाही. कारण या सामन्याची स्मृती माझ्या मनात स्टंपसारखी घट्ट ठोकली गेलीय.


क्रिकेटची फारशी माहिती नसलेला एक नवखा गोलंदाज, पहिल्यानेच गोलंदाजी करायला आला. अंपायरने त्याला विचारलं, Are you bowling over the wicket or round the wicket ?' त्या नवख्या गोलंदाजाने उत्तर दिले. No, No! I am bowling at the wicket.


असाच एक नवखा खेळाडू खेळायला आला. जलदगती गोलंदाजाचा चेंडू त्याच्या पायावर एवढ्या जोरात लागला की तो विव्हळून खाली बसला. जरा पाय चेपलान, झटकलान् आणि पुन्हा खेळायला उभा राहिला. पंचांनी त्याला विचारलं; Can you walk ?' खेळाडू उद्गारला - Oh yes ! Just see, I can walk' म्हणून त्याने चालून दाखवले. तेव्हा पंच त्याला म्हणाला, you can walk , no ? Then walk to the pavilion, you are out !'



5 निबंध मी पाहिलेला क्रिकेटचा सामना मराठी निबंध | mi pahilela cricket samna essay in marathi

मी पाहिलेला क्रिकेटचा सामना मराठी निबंध | mi pahilela cricket samna essay in marathi

निबंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी पाहिलेला क्रिकेटचा सामना मराठी निबंध बघणार आहोत. क्रिकेटचे आणि भारताचे एक निराळेच नाते आहे.  हॉकी राष्‍ट्रीय खेळ असल्‍यावरही गल्‍ली बोळामधेही आपल्‍याला क्रिकेटचे सामने आपल्‍याला दिसुन येतील. क्रिकेटचे भारतात असलेले वेड  आणि खेळाडुंची क्रिकेटला जिव की प्राण म्हणुन खेळण्याची तळमळ आपल्याला खालील ४ निबंधामधुन दिसुन येईल चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.  


माझा अविस्मरणीय सामना : यंदा 'महाविद्यालयीन ट्रॉफी जिंकून आणायचीच. अशी प्रतिज्ञा आमच्या मुंबई कॉलेज संघाने केली होती. त्यासाठी गेले सहा महिने रात्रंदिवस सराव चालू होता. मागील  वेळेस  हातातोंडाशी आलेली ट्रॉफी शेवटच्या बॉलवर घालवावी लागली होती. आता कोणतीही कसर सोडायची नाही अन् कसूरही करायची नाही असा निश्चय केला होता सर्व खेळाडूंनी...

सामने सुरू झाले, अन् आमचा सामना अंतिम डावापर्यंत तरी कोणतीही अडचण न येता पोहोचला. आता खरा कसोटीचा क्षण होता. आमच्याबरोबर खेळणारा संघही काही कमी नव्हता. त्याची ही तयारी उत्तम होती. 'ट्रॉफी' जिंकण्यासाठी त्यांनीही जिद्दीने खेळ सुरू केला होता. तोडीस तोड - धावांबरोबर धावा - खेळ कसा अटीतटीचा चालला होता. (हे पण वाचा मी पाहिलेला चुरशीचा सामना निबंध)

दोनवेळा सामना अनिर्णित राहिला. अर्थात त्यामुळे विश्रांतीचा दिवसही रद्द करून सामना चालू ठेवायचा आणि त्यातून निर्णय घ्यायचा असे ठरले. वादावादी, गाजावाजाही वाढत होताच. आणि अखेरीस तो दिवस उजाडला. स्टेडियम माणसांनी कसे फुलून गेले होते. अशा सामन्यातून आंतरराष्ट्रीय संघांची निवड होणार असते. देशभरातून अनेक क्रिकेट शौकिनांनी आज भाऊगर्दी केली होती.

एखादा चौकार असो किंवा षटकार सारा स्टेडियम टाळ्यांच्या गजराने दुमदुमून निघत होता. एखादा झेल सुटला तरी सगळीकडे निराशेचा सुस्कारा ऐकू येत होता. इकडे विरुद्ध संघही बचावाचा खेळ खेळत होता. त्यामुळे खेळात तसा रंग चढत नव्हता. विकेट तर आमच्या गोलंदाजांनाच अनुकूल होती. परंतु नावाजलेल्या गोलंदाजांची गोलंदाजीही आज मूग गिळून बसली होती. 

मैदानाच्या दिशेने आता प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्या, फळांच्या साली, कागदांचे बोळे यायला लागले. अखेरीस दिवस संपेपर्यंत विरुद्ध संघ कसाबसा संपूर्ण आटोपला तेव्हा त्याच्या २१० धावा झाल्या होत्या.

दुसरा दिवस उजाडला तो आमच्या संघाच्या धडाडीच्या खेळानेच. चौकारांच्या दणक्याने कांबळीने सर्वांना खूश करून सोडले. तर सरदेसाईची त्याला साथ आणि चोरट्या धावा यामुळे आमचा संघ धावसंख्या वाढवीत होता. अखेरीस ३०४ धावांवर आमचा संघ बाद झाला अन् ९४ धावांनी आघाडी मिळवली. दुसऱ्या डावात विरुद्ध संघानेही धावांचा डोंगर रचायला सुरुवात केली.

पहिल्या आघाडीच्या पाच खेळाडूंनी जणू चंगच बांधला होता. एकही बॉल, बॅटला स्पर्श केल्याशिवाय जातच नव्हता. ९४ धावांची आघाडी पार करून त्यांनी पुढे जोराचा पवित्रा घेतला आणि अखेरचा गडी बाद होईपर्यंत आमच्यावर १९९ धावांची आघाडी मिळविली.

mi-pahilela-cricket-samna-essay-in-marathi
mi-pahilela-cricket-samna-essay-in-marathi


आमच्या संघाला वाटले, ही धावसंख्या आपण सहज पार करू. परंतु पहिले तीन खेळाडू जेमतेम ४०-४५ धावा करून तंबूत परतले. सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. इकडे विरुद्ध पक्षाला 'चिअरअप' जोरात सुरू झाला आणि आमच्यावर दबाव वाढला.

नशिबाने साथ दिली. अन् पुढील दोन खेळाडूंनी दमदार खेळ सुरू करून धावसंख्या १५० पर्यंत नेली. पुन्हा एकापाठोपाठ पाच गडी बाद झाले. आता धावसंख्या पार करण्यासाठी ५० धावांची गरज होती. नववा गडी म्हणून मी तंबूतून बाहेर पडलो. खरा मी गोलंदाज, आता बॅट कशी साथ देते तेच पाहायचे होते. कॅप्टनने मला धीर दिला. माझी पाठ थोपटली. मी मैदानावर आलो. बॅटला बॉल लागला आणि समोरच्या खेळाडूच्या मदतीने धावा सुरू केल्या.

 दोघांनी मिळून ४३ धावा केल्या. तेवढ्यात समोरचा गडी बाद झाला. पुन्हा टेन्शन वाढले. पाहिजे होत्या फक्त ७ धावा. आता दहाव्या खेळाडूला धीर देण्याची वेळ माझी होती. तो दबकत दबकत खेळत होता. चोरटी एखाद्-दुसरी धाव काढत होता. एक चेंडू आला अन माझ्याकडून दणदणीत चौकार मारला गेला अन् स्टेडियम दणाणून गेले. कप्तानासह सर्व खेळाडुंनी मैदानाकडे धाव ठोकली. मला व माझ्या जोडीदार खेळाडूला उचलून घेतले.

गौरवाने तंबूत आणले, जणू काही मीच एकटा यशाचा मानकरी होतो. आमच्या संघाने ट्रॉफी जिंकली होती. ट्रॉफी घेतानाही आमचा सर्व संघ उपस्थित होता. ट्रॉफी डोक्यावर घेऊन नाचत होता. असा हा माझा क्रिकेटचा सामना माझ्या जीवनातील अविस्मरणीय सामना ठरला. (100 हुन अधिक निबंध वाचा तुमच्‍या मोबाईलवर  )

मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला  हे  तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद .

निबंध 2

 एक रंगलेला क्रिकेटचा सामना


आमच्या वसाहतीच्या जवळच एक मोठे मैदान आहे. तेथे आम्ही नेहमी क्रिकेट खेळतो. एके दिवशी मोठ्या माणसांचा क्रिकेटचा सामना घ्यायचे ठरले. माझे बाबासुद्धा त्यात सामील झाले. 'संघ अ' आणि 'संघ ब' असे दोन संघ तयार करण्यात आले. आमच्या वसाहतीतील सर्व घरांत ही बातमी पसरली. सर्वांना उत्सुकता वाटत होती.

मग सामन्याचा दिवस उगवला. दोन्ही संघ मैदानात उतरले. वसाहतीत सर्व लोक सामना पाहण्यासाठी जमले होते. काहीजण खिडकीतून पाहत होते. सामना सुरू झाला. काहीजण खरोखरच छान खेळले. 'अ' संघातल्या चित्रेकाकांनी ५० धावा काढल्या, तर 'ब' संघातल्या मूर्तीकाकांनी सहा गडी बाद केले. बोंद्रेकाका खूप जाडे आहेत. त्यामुळे धावताना ते मजेशीर दिसत होते.

एकदा धावताना ते पडले. तेव्हा सगळे हसून हसून बेजार झाले. स्वत: बोंद्रेकाकासुद्धा हसत होते. अखेरीस ‘संघ अ' विजयी झाला. सगळ्यांनी एकमेकांचे अभिनंदन केले. त्यानंतर सगळ्यांना खाऊ वाटण्यात आला. त्या दिवशी सर्वजण खेळातील आठवणी काढून गप्पा मारत होते. त्या दिवशी खूप मजा आली.

 महत्‍वाचे मुद्दे :

  • आम्ही मुले नेहमीच खेळतो 
  • एके दिवशी मोठ्या माणसांचा सामना 
  • काहीजण चांगले खेळले 
  • काही गमती 
  • आनंदाचे वातावरण.

निबंध  3

मी पाहिलेला क्रिकेटचा सामना 


भारतीय संघ बांग्लादेशात खेळायला निघाला होता. कोण जाणार, कोण नाही याची चर्चा होऊन शेवटी संघ रवाना झाला. एकदिवसीय चार सामने आणि दोन कसोटी सामने खेळले जाणार होते. सुरुवात तर चांगली झाली. एकदिवसीय चारही सामने भारतीय संघाने जिंकले.

पण यात विशेष आवडला तो दुसरा कसोटी सामना. कारण, या सामन्यामुळे विश्वचषक सामन्यात लागलेला कलंक पुसला गेला. बांगलादेशच्या याच संघाने आमच्या सर्व वीरांना चारी मुंड्या चित केले होते. त्याच संघावर  आमच्या क्रिकेट वीरांनी नेत्रदीपक विजय मिळवला.


असा हा सामना बांग्लादेशातील ढाका येथील शेरेबांगला स्टेडियमवर झाला. प्रथमच नाणेफेक जिंकून भारतीय संघाने फलंदाजी स्वीकारली. सुरुवातीलाच आपल्या खेळाडूंना सूर सापडला आणि भारतीय फलंदाजांनी बांग्लादेशच्या वेगवान व फिरकी गोलंदाजीचे पार खोबरे करून टाकले. एकापाठोपाठ एक अशा पाच फलंदाजांनी आपली शतके झळकावली.

सचिन व सौरभ यांनी आधीचा लागलेला डाग पुसून टीकाकारांची बोलती बंद केली. सहाशे दहा धावांचा डोंगर रचून भारतीय संघाने आपला डाव सोडला आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याला, बांग्लादेशला, खेळाची संधी दिली.
भारताच्या झहीर खानच्या तुफानी गोलंदाजीपुढे बांग्लादेशचा अर्धा संघ बाद झाला. उरल्यासुरल्या फलंदाजांना अनिल कुंबळेने तंबूत पाठवले.

चारशे धावांचे ओझे घेऊन फालोऑन स्वीकारून बांगलादेश दुसरा डाव खेळायला मैदानात उतरला. आता पाऊसच त्यांना वाचवू शकणार होता. पण त्या दिवशी तोही त्यांच्यावर फिदा नव्हता. या डावात बांगलादेशच्या खालेद मासूद, अश्रफूल आणि मोर्तझा यांनी अटीतटीची झुंज दिली. पण भारतीय खेळाडू आता पेटून उठले होते. अगदी सचिनने गोलंदाजीतही आपली करामत दाखवली आणि दोन गडी टिपले. भारताने बांग्लादेशचा १ डाव आणि २३९ धावांनी दणदणीत पराभव केला.

या यशाने भारताने जणू दाखवून दिले, 'हम भी कुछ कम नही !' आता आपल्या लाडक्या खेळाडूंवर टीका करणाऱ्यांची तोंडे बंद झाली, याचा मला विशेष आनंद झाला.

महत्‍वाचे मुद्दे :
  • विश्वचषक सामन्यात आलेले अपयश 
  • त्यामुळे निंदानालस्ती
  • मन दुखावले 
  • बांग्लादेशात सामने 
  • फलंदाजीतील पराक्रम 
  • गोलंदाजीतील विक्रम
  • मिळालेले यश
  • यशाचा परिणाम. 

निबंध 4


मी पाहिलेला चुरशीचा सामना 

इंग्लंडमध्ये विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामने चालले होते. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया या संघांत उपांत्य सामना होणार होता. हा मी पाहिलेला अत्यंत चुरशीचा सामना होता. सामन्याचा दिवस उजाडला. मी खादयपेये घेऊन स्टेडियमवर गेलो. ठीक वेळेवर दोन पंच आणि दोन्ही संघांचे कप्तान मैदानावर आले. नाणेफेक झाली.

त्यात दक्षिण आफ्रिकेच्या कप्तानाने हॅन्सी क्रॉनिएने बाजी मारली. मैदानाचा रागरंग पाहून त्याने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. थोड्याच वेळात ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर अॅडम गिलख्रिस्ट आणि मार्क वॉ फलंदाजीसाठी मैदानात उतरले, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला. कप्तानाने चेंडू शॉन पोलॉक याच्या हातात दिला.

आता साऱ्या प्रेक्षकांनी आपले श्वास रोखून धरले होते. जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपल्या खेळाची सुरवात मोठ्या सावधपणे केली. खेळ थोडा धीमा वाटत होता. प्रेक्षक धावांच्या आतषबाजीसाठी आतुर होते; पण फलंदाज फारच जबाबदारीने खेळत होते.

नियोजित पन्नास षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाने आपल्या नावावर २१३ धावा झळकावल्या. चाळीस मिनिटांची विश्रांती सुरू झाली. क्रीडांगणावर खेळाडू नव्हते, प्रेक्षक जरा सैलावले होते. बरोबर आणलेल्या खादयवस्तूंचा समाचार घेणे सुरू झाले. पण कोठेही कागद फेकाफेकी नव्हती. विश्रांतीचा काळ संपला; पण कोठेही अस्वच्छतेचा अंशही नव्हता.

थोड्याच वेळात दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर मैदानावर फलंदाजीसाठी उतरले. ऑस्ट्रेलियाचा संघही क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला. दक्षिण आफ्रिकेला सामना जिकण्यासाठी २१४ धावा करायच्या होत्या. सुरवात चांगली झाली. धावफलकावर दक्षिण आफ्रिकेच्या नावावर बिनबाद ४६ धावा लागल्या. जॉन्टी होडस व लान्स क्लसनर यांनी वेगाने फलंदाजी केली.

धावफलकावर ७ गडी बाद २०० धावा लागल्या. आता फक्त १४ धावा करायच्या होत्या. बहुतेक हेच दोन्ही खेळाडु सामना जिंकून देतील, असे वाटत असतानाच जॉन्टी बाद झाला. सारे प्रेक्षक हळहळले. जमलेली जोडी फुटली होती. नंतर आलेला शॉन पोलॉक शून्यावर बाद झाला. आता चुटपूट लागली, दक्षिण आफ्रिका सामना गमावणार की काय? पण अखेरच्या षटकात क्लुसनरने तीन चौकार मारले.

 आता फक्त दोनच धावा हव्या होत्या; पण शेवटचा फक्त एकच गडी बाकी होता. कशीबशी एक धाव मिळाली. आता एक धाव काढली की विजय दक्षिण आफ्रिकेचा होणार होता. सारे प्रेक्षक नि:स्तब्ध होते आणि दुर्दैव म्हणजे, डोनॉल्ड धावचीत झाला. दोन्ही संघांची धावसंख्या सारखीच झाली, २१३ ! मॅच 'टाय' झाली होती.
मग विजय कोणाचा? सारे वातावरण संभ्रमित होते. पंच निर्णय काय देणार?

 सर्व अधिकाऱ्यांच्या विचारविनिमयानंतर निर्णय जाहीर झाला. साखळी सामन्यांत पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर मात केलेली असल्यामुळे 'ऑस्ट्रेलिया'चा संघ विजयी ठरला. दक्षिण आफ्रिकेचा संघ या रोमहर्षक सामन्यात पराभूत झाला होता. 'क्रिकेट इज ए गेम ऑफ चान्स' म्हणतात ते यासाठीच! आजवर मी अनेक सामने पाहिले; पण अखेरच्या क्षणापर्यंत उत्सुकता टिकवून धरणारा असा रंगतदार सामना मी यापूर्वी कधीच पाहिला नव्हता.

महत्‍वाचे मुद्दे :
  • सामना कोठे व कोणत्या खेळाचा 
  • संघ 
  • सामन्याचे वर्णन 
  • सामना आवडल्याची कारणे 
  • अविस्मरणीय घटना 
  • सामना पाहून आल्यावर मनात आलेले विचार...

निबंध 5

मी पाहिलेला एक क्रिकेटचा सामना (क्रिकेट मॅच)


 एकदा मी एक विलक्षण अद्भुत आणि लोकविलक्षण असा क्रिकेटचा सामना पाहिला दोन संघ दंड थोपटून एकमेंकाविरुद्ध लढायला रणांगणात उतरले होते. संघात ११ खेळाडू लागतात हा नियम त्यांना ठाऊक नसावा किंवा मान्य नसावा. एका संघात ५ खेळाडू आणि दुसऱ्या संघात ६ खेळाडू असे ते संघ होते. चला ११ चा आकडा तर जुळला. त्यांच्याजवळ २ बॅटी होत्या. पण स्टंप तीनच होते.


१ स्टंप गोलंदाजाच्या बाजूला ठोकला आणि उरलेले दोन फलंदाजाच्या बाजूला ठोकले. दोन स्टंपांच्या मध्ये चांगले दोन वितीचं अंतर ठेवलं होतं. इथे "ठोकणं' हे क्रियापद चपखल बसतंय. कारण स्टंपच्या टोकाच्या पत्र्यांच्या टोप्या नाहीशा झाल्या होत्या. तेव्हा ते स्टंपस नीट बसत नव्हते. सारखे ठोकावे लागत होते. मला वाटतं सामन्याचा अर्धा वेळ स्टंपस् ठोकण्यातच जात होता. 


वास्तविक ते टेनिस - बॉलने खेळत होते, तरी सुध्दा फलंदाजांनी आणि यष्टिरक्षकाने पॅडस बांधले होते. त्यांच्या पॅडसचं गोलदांजाला वैषम्य वाटलं म्हणून त्याने पण आपल्या एका पायाला पॅड बांधला. गोलंदाज पायाला पॅड बांधत नाही हा नियम एकाने त्याच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्याने पॅड नाराजीने काढला.


अंपायर क्रिकेटच्या बाबतीत अगदी अनभिज्ञ होता. आपण इथे उभे राहून नेमकी कोणती कामगिरी पार पाडायची याची त्याला कल्पना नव्हती. सामना सुरू झाला. गोलंदाज चेंडू टाकायला लागला. सहा चेंडू झाले, सात झाले, आठ झाले, तरी अंपायर ओव्हर देईचना. 


तेव्हा गोलंदाजी करायला अगदी अधीर झालेला दुसरा खेळाडू ओरडला, "अरे, ओव्हर दे ना ! पंचानी शांतपणे विचारले, ओव्हर; म्हणजे काय असतं ते ?" अरे सहा चेंडू झाले की ओरडायचं "ओव्हर !" अच्छा! अंपायरने ते गणित समजावून घेतलं, दुसरं षटक बरोबर सहा चेंडूचं झालं. मगच तो खेळाडू दुसरं षटक टाकायला आला. 

त्याचे ४ चेंडू टाकून झाल्यावर अंपायर ओरडला "ओव्हर." "अरे, चारच चेंडू झाले. ओव्हर कशी देतोस," पण अंपायर गणितात कच्चा होता तो बोलला." मग आता तू आठ चेंडू नाही का टाकलेस ? या षटकात ते दोन जादा चेंडू वळते करून घेतले" थोडी बाचाबाची झाली आणि खेळ पुढे सुरू झाला.


एका गोलंदाजाने टीव्हीवर पाहिलं होतं की, गोलंदाज चेंडूला थुंकी  लावतो. या गोलंदाजाने चेंडूला एवढी थुंकी  लावली की चेंडू थुंकी  भिजला. या कारणाने चेंडू बदलावा लागला.  एक खेळाडू सरळ मध्ये येऊन खेळत होता.


त्याच्या पायाला बॉल लागल्यावर सारे क्षेत्ररक्षक ओरडले, "हाऊस टॅट !" अंपायर गोंधळला "आऊट कसा' ती दांडी कुठे पडलीय. "अरे, बॉल पायाला लागला की आऊट असतो. एल.बी.डब्लू. अंपायरने ते लक्षात ठेवलं. थोड्या वेळाने रन घेण्यासाठी म्हणून धावत असणाऱ्या खेळाडूच्या पायाला बॉल लागतो; 


अंपायर ओरडला "आऊट" एल.बी.डब्लू ! त्या बलदंडाने निकाल दिल्यानंतर त्याच्याशी वाद घालण्यात अर्थ नव्हता. धावत असलेला खेळाडू मुकाट्याने तंबूत परतला.


खेळापेक्षा अंपायरचे एकेक निकालच प्रेक्षकांचं जास्त मनोरंजन करीत होते. एक खेळाडू खप वेळ खेळत होता आणि चांगला खेळत होता. त्याने एक चौका मारला. अंपायर ओरडला, "आऊट!" अरे आऊट कसा ? "त्याचं काय आहे, हा एकटाच कितीतरी वेळ खेळतोय; दुसऱ्यांना खेळू दे ना आता." सगळ्यांनी कपाळावर हात मारून घेतला.



गडी बाद झाले ते सर्व झेल बाद आणि पायचित; बोल्ड एकही नाही. कारण दोन स्टंप्स मध्ये एवढं अंतर होतं की चेंडू स्टंपच्या मधूनच जायचा नेहमी. स्टंपला कसला लागतो; आणि अंपायर आपल्या विचारावर ठाम होता. दांडी पडल्याशिवाय आऊट द्यायचं नाही. करता करता सारे बाद झाले. एका संघाची पाळी संपली. 


मग चौकशी सुरू झाली "स्कोअर किती झाला ?" स्कोअर किती झाला ? जो तो विचारू लागला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की स्कोअरर नेमायचा राहिला होता. मग माझे किती, तुझे किती ? असं करून काय तरी एक संख्या ठरविण्यात आली. स्कोअरचं प्रकरण एकदाचं संपलं. पण दुसरंच प्रकरण सुरू झालं. अंपायर विचार करायला लागला, 


"मी केव्हा खेळायचं," अरे अंपायर काय खेळत नाय; तो नुसता उभा असतो. "अंपायर महाशय भडकले, मला खेळायला मिळणार नाही हे आधी का नाही सांगितलंत? मी अंपायर झालोच नसतो." लाथ मारून त्याने स्टंप उडवून दिला आणि तोंडाने शिव्या पुटपुटत तो चालता झाला. पंच गेले - म्हणजे पंचाईत झाली. पंचापाठोपाठ मी पण जाणार होतो. कारण सामना बघण्याची माझीही सहनशक्ती संपुष्टात आली होती. पण म्हटलं, 



त्यांचे खेळाडू कसे खेळतात जरा बघू या. थोडा वेळ खेळ व्यवस्थित चालला. पण मग कशावरून तरी वादावादी सुरू झाली. पहिल्याने हातवारे, मग गुद्दे अखेर कोणी स्टंप उपटून दुसऱ्यांच्या अंगावर धावले, कोणी बॅटी उगारल्या. समर प्रसंगच निर्माण झाला. 


निकाल काय लागतो ते बघायाला थांबलो. पण सामन्याचा एकंदरीत निकालच लागला, त्याच्या नंतर मी खूप सामने पाहिले, त्याच्या पुढेही पाहीन; पण हा सामना कधीही विसरणार नाही. कारण या सामन्याची स्मृती माझ्या मनात स्टंपसारखी घट्ट ठोकली गेलीय.

निबंध 6

मी पाहिलेला क्रिकेटचा सामना मराठी निबंध | mi pahilela cricket samna essay in marathi


क्रिकेट मॅच) एकदा मी एक विलक्षण अदभुत आणि लोकविलक्षण असा क्रिकेटचा सामना पाहिला दोन संघ दंड थोपटून एकमेंकाविरुद्ध लढायला रणांगणात उतरले होते. संघात ११ खेळाडू लागतात हा नियम त्यांना ठाऊक नसावा किंवा मान्य नसावा. 

एका संघात ५ खेळाडू आणि दुसऱ्या संघात ६ खेळाडू असे ते संघ होते. चला ११ चा आकडा तर जुळला. त्यांच्याजवळ २ बॅटी होत्या. पण स्टंप तीनच होते. १ स्टंप गोलंदाजाच्या बाजूला ठोकला आणि उरलेले दोन फलंदाजाच्या बाजूला ठोकले. 


दोन स्टंपांच्या मध्ये चांगले दोन वितीचं अंतर ठेवलं होतं. इथे "ठोकणं" हे क्रियापद चपखल बसतंय. कारण स्टंपच्या टोकाच्या पत्र्यांच्या टोप्या नाहीशा झाल्या होत्या. तेव्हा ते स्टंपस नीट बसत नव्हते. सारखे ठोकावे लागत होते. मला वाटतं सामन्याचा अर्धा वेळ स्टंपस् ठोकण्यातच जात होता.


वास्तविक ते टेनिस बॉलने खेळत होते, तरी सुध्दा फलंदाजांनी आणि यष्टिरक्षकाने पॅडस् बांधले होते. त्यांच्या पॅडस्चं गोलदांजाला वैषम्य वाटलं म्हणून त्याने पण आपल्या एका पायाला पॅड बांधला. गोलंदाज पायाला पॅड बांधत नाही हा नियम एकाने त्याच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्याने पॅड नाराजीने काढला.


अंपायर क्रिकेटच्या बाबतीत अगदी अनभिज्ञ होता. आपण इथे उभे राहून नेमकी कोणती कामगिरी पार पाडायची याची त्याला कल्पना नव्हती. सामना सुरू झाला. गोलंदाज चेंडू टाकायला लागला. सहा चेंडू झाले, सात झाले, आठ झाले, तरी अंपायर ओव्हर देईचना. 


तेव्हा गोलंदाजी करायला अगदी अधीर झालेला दुसरा खेळाडू ओरडला, "अरे, ओव्हर दे ना ! पंचानी शांतपणे विचारले, ओव्हर; म्हणजे काय असतं ते ?" अरे सहा चेंडू झाले की ओरडायचं "ओव्हर !" अच्छा! अंपायरने ते गणित समजावून घेतलं, दुसरं षटक बरोबर सहा चेंडूचं झालं. 


मगच तो खेळाडू दुसरं षटक टाकायला आला. त्याचे ४ चेंडू टाकून झाल्यावर अंपायर ओरडला "ओव्हर." "अरे, चारच चेंडू झाले. ओव्हर कशी देतोस, पण अंपायर गणितात कच्चा होता तो बोलला." मग आता तू आठ चेंडू नाही का टाकलेस? या षटकात ते दोन जादा चेंडू वळते करून घेतले" थोडी बाचाबाची झाली आणि खेळ पुढे सुरू झाला.


एका गोलंदाजाने टीव्हीवर पाहिलं होतं की, गोलंदाज चेंडूला थुकी लावतो. या गोलंदाजाने चेंडूला एवढी थुकी लावली की चेंडू थुकीने भिजला. या कारणाने चेंडू बदलावा लागला.



एक खेळाडू सरळ मध्ये येऊन खेळत होता. त्याच्या पायाला बॉल लागल्यावर सारे क्षेत्ररक्षक ओरडले, "हाऊस टॅट!" अंपायर गोंधळला "आऊट कसा" ती दांडी कुठे पडलीय. "अरे, बॉल पायाला लागला की आऊट असतो. एल.बी.डब्लू. अंपायरने ते लक्षात ठेवलं. 


थोड्या वेळाने रन घेण्यासाठी म्हणून धावत असणाऱ्या खेळाडूच्या पायाला बॉल लागतो; अंपायर ओरडला "आऊट" एल.बी.डब्लू ! त्या बलदंडाने निकाल दिल्यानंतर त्याच्याशी वाद घालण्यात अर्थ नव्हता. धावत असलेला खेळाडू मुकाट्याने तंबूत परतला.


खेळापेक्षा अंपायरचे एकेक निकालच प्रेक्षकांचं जास्त मनोरंजन करीत होते. एक खेळाडू खूप वेळ खेळत होता आणि चांगला खेळत होता. त्याने एक चौका मारला. अंपायर ओरडला, "आऊट!'' अरे आऊट कसा ? "त्याचं काय आहे, हा एकटाच कितीतरी वेळ खेळतोय; दुसऱ्यांना खेळू दे ना आता." सगळ्यांनी कपाळावर हात मारून घेतला.


गडी बाद झाले ते सर्व झेल बाद आणि पायचित; बोल्ड एकही नाही. कारण दोन स्टंप्स मध्ये एवढं अंतर होतं की चेंडू स्टंपच्या मधूनच जायचा नेहमी. स्टंपला कसला लागतो; आणि अंपायर आपल्या विचारावर ठाम होता. दांडी पडल्याशिवाय आऊट द्यायचं नाही. करता करता सारे बाद झाले. 


एका संघाची पाळी संपली. मग चौकशी सुरू झाली “स्कोअर किती झाला ?" स्कोअर किती झाला ? जो तो विचारू लागला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की स्कोअरर नेमायचा राहिला होता. मग माझे किती, तुझे किती ? असं करून काय तरी एक संख्या ठरविण्यात आली. 


स्कोअरचं प्रकरण एकदाचं संपलं. पण दुसरंच प्रकरण सुरू झालं. अंपायर विचार करायला लागला, "मी केव्हा खेळायचं," अरे अंपायर काय खेळत नाय; तो नुसता उभा असतो.''अंपायर महाशय भडकले, मला खेळायला मिळणार नाही हे आधी का नाही सांगितलंत? मी अंपायर झालोच नसतो.


" लाथ मारून त्याने स्टंप उडवून दिला आणि तोंडाने शिव्या पुटपुटत तो चालता झाला. पंच गेले - म्हणजे पंचाईत झाली. पंचापाठोपाठ मी पण जाणार होतो. कारण सामना बघण्याची माझीही सहनशक्ती संपुष्टात आली होती. पण म्हटलं, त्यांचे खेळाडू कसे खेळतात जरा बघू या. थोडा वेळ खेळ व्यवस्थित चालला. 



पण मग कशावरून तरी वादावादी सुरू झाली. पहिल्याने हातवारे, मग गुद्दे अखेर कोणी स्टंप उपटून दुसऱ्यांच्या अंगावर धावले, कोणी बॅटी उगारल्या. समर प्रसंगच निर्माण झाला. निकाल काय लागतो ते बघायाला थांबलो. पण सामन्याचा एकंदरीत निकालच लागला, त्याच्या नंतर मी खूप सामने पाहिले, त्याच्या पुढेही पाहीन; पण हा सामना कधीही विसरणार नाही. कारण या सामन्याची स्मृती माझ्या मनात स्टंपसारखी घट्ट ठोकली गेलीय.


क्रिकेटची फारशी माहिती नसलेला एक नवखा गोलंदाज, पहिल्यानेच गोलंदाजी करायला आला. अंपायरने त्याला विचारलं, Are you bowling over the wicket or round the wicket ?' त्या नवख्या गोलंदाजाने उत्तर दिले. No, No! I am bowling at the wicket.


असाच एक नवखा खेळाडू खेळायला आला. जलदगती गोलंदाजाचा चेंडू त्याच्या पायावर एवढ्या जोरात लागला की तो विव्हळून खाली बसला. जरा पाय चेपलान, झटकलान् आणि पुन्हा खेळायला उभा राहिला. पंचांनी त्याला विचारलं; Can you walk ?' खेळाडू उद्गारला - Oh yes ! Just see, I can walk' म्हणून त्याने चालून दाखवले. तेव्हा पंच त्याला म्हणाला, you can walk , no ? Then walk to the pavilion, you are out !'