झाडे नसती तर  मराठी निबंध बघणार  | if trees were not there essay in marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण झाडे नसती तर  मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधामध्‍ये झाडे नसल्‍यावर कोणत्‍या गोष्‍टी अशक्‍य होतील याविषयी सविस्‍तर माहीती  दिली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

if-trees-were-not-there-essay-in-marathi
if-trees-were-not-there-essay-in-marathi




स्वत: उन्हात उभे राहून जे दुसऱ्यांना सावली देतात आणि दुसऱ्यांसाठी फळेसुद्धा धारण करतात ते वृक्ष जणू सत्पुरुषच आहेत, असे वृक्षांचे यथार्थ वर्णन सुभाषितकारांनी केलेले आहे. सर्वांना सुखावह सावली देणारी ही झाडे नसती तर... विविध रंगांची व आकारांची पाने नसती. सुगंधी फुले नसती. मग रसाळ फळे कुठली? मग शंकराला बेल, गणपतीला दूर्वा, सत्यनारायणाला तुळस आणि मंगळागौरीला सोळा प्रकारची पत्री कोठून मिळाली असती?


झाडे नसती तर हापूसचा आंबा खायला कसा मिळाला असता? कच्ची कैरी, लालबुंद सफरचंद, डाळिंब, पेरू, अननस अशा फळांची चंगळ नसती. चाफा, मोगरा, गुलाब यांचा मन प्रसन्‍न करणारा सुवास आणि वेड लावणारे सौंदर्यच नसते. पिंपळाच्या पारावरच्या गप्पा, वडाच्या सूरपारंब्यांचा खेळ, पारिजातकाचा सडा या साऱ्या गोष्टींतील मौजच हरवली असती!


आज अनेक औषधे वनस्पतींपासून उपलब्ध होतात. कडुनिंबाची पाने आरोग्याची हमी देतात. तुळशी, बेहडा, सबजा इत्यादी औषधी वनस्पती मानवाला वरदाणापेक्षा कमी नाहीत  आहेत. झाडे नसती तर आयुर्वेद निर्माण झाला नसता. झाडे नसती तर... वाऱ्याचे अस्तित्व कसे जाणवले असते? पाऊस आला नसता... मातीची धूप थांबली नसती. चंदनाचे झाड नसते तर विरहार्ताला शीतलता आणि देवपूजेला गंध नसते. झाडे नसती तर प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली असती. प्राणवायूचा पुरवठा कसा झाला असता?


झाडे नसती तर कवीमंडळींची फार अडचण झाली असती. 'त्या तरुतळी विसरले गीत' अशी सुंदर काव्यपंक्ती निर्माणच झाली नसती.  श्रावणात झोपाळे कोठे बांधले असते? सुगरण पक्ष्याने आपला घरोटा कोठे बांधला असता?


झाडे नसती तर... गजराजासारख्या शाकाहारी प्राण्यांनी काय केले असते? प्रत्येक शुभप्रसंगी आंब्याची पाने घरात मांगल्य आणतात. भाजी-आमटीच्या फोडणीची लज्जत कढीपत्ता वाढवतो. झाडे नसती तर... माणसाच्या जीवनातील हिरवेपणा, मृदुताच हरवली असती. मग चांदोबा कोठे लपला असता? हिरव्या चाफ्याला सुगंध लपवण्याची गरजच पडली नसती. रजनीगंधा धुंद झाली नसती. वृक्षाविना सारे जीवन रूक्ष झाले असते. मानवाच्या जीवनातील प्रत्येक क्षण झाडांशी इतका निगडित आहे की, त्यामुळेच माणूस आपल्या वंशावळीला 'वंशवृक्ष' असे सार्थ अभिधान देतो. असा हा मानवाचा थोर मित्र नसेल तर मानवी जीवन नष्टप्राय होईल.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

महत्‍वाचे मुद्दे : 

(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )


  • झाडांचे महत्त्व व उपयुक्तता 
  • झाडांचे विविध प्रकार
  • प्रदूषण
  • फळे, फुले, लाकडे, औषधे
  • निसर्गसौंदर्यात काव्य असते
  • पाण्याचा पुरवठा 
  • वनसंपत्ती उत्पादन 
  • पशु-पक्षी आणि मानवी जीवनाचा आधार

झाडे नसती तर मराठी निबंध बघणार | if trees were not there essay in marathi

झाडे नसती तर  मराठी निबंध बघणार  | if trees were not there essay in marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण झाडे नसती तर  मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधामध्‍ये झाडे नसल्‍यावर कोणत्‍या गोष्‍टी अशक्‍य होतील याविषयी सविस्‍तर माहीती  दिली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

if-trees-were-not-there-essay-in-marathi
if-trees-were-not-there-essay-in-marathi




स्वत: उन्हात उभे राहून जे दुसऱ्यांना सावली देतात आणि दुसऱ्यांसाठी फळेसुद्धा धारण करतात ते वृक्ष जणू सत्पुरुषच आहेत, असे वृक्षांचे यथार्थ वर्णन सुभाषितकारांनी केलेले आहे. सर्वांना सुखावह सावली देणारी ही झाडे नसती तर... विविध रंगांची व आकारांची पाने नसती. सुगंधी फुले नसती. मग रसाळ फळे कुठली? मग शंकराला बेल, गणपतीला दूर्वा, सत्यनारायणाला तुळस आणि मंगळागौरीला सोळा प्रकारची पत्री कोठून मिळाली असती?


झाडे नसती तर हापूसचा आंबा खायला कसा मिळाला असता? कच्ची कैरी, लालबुंद सफरचंद, डाळिंब, पेरू, अननस अशा फळांची चंगळ नसती. चाफा, मोगरा, गुलाब यांचा मन प्रसन्‍न करणारा सुवास आणि वेड लावणारे सौंदर्यच नसते. पिंपळाच्या पारावरच्या गप्पा, वडाच्या सूरपारंब्यांचा खेळ, पारिजातकाचा सडा या साऱ्या गोष्टींतील मौजच हरवली असती!


आज अनेक औषधे वनस्पतींपासून उपलब्ध होतात. कडुनिंबाची पाने आरोग्याची हमी देतात. तुळशी, बेहडा, सबजा इत्यादी औषधी वनस्पती मानवाला वरदाणापेक्षा कमी नाहीत  आहेत. झाडे नसती तर आयुर्वेद निर्माण झाला नसता. झाडे नसती तर... वाऱ्याचे अस्तित्व कसे जाणवले असते? पाऊस आला नसता... मातीची धूप थांबली नसती. चंदनाचे झाड नसते तर विरहार्ताला शीतलता आणि देवपूजेला गंध नसते. झाडे नसती तर प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली असती. प्राणवायूचा पुरवठा कसा झाला असता?


झाडे नसती तर कवीमंडळींची फार अडचण झाली असती. 'त्या तरुतळी विसरले गीत' अशी सुंदर काव्यपंक्ती निर्माणच झाली नसती.  श्रावणात झोपाळे कोठे बांधले असते? सुगरण पक्ष्याने आपला घरोटा कोठे बांधला असता?


झाडे नसती तर... गजराजासारख्या शाकाहारी प्राण्यांनी काय केले असते? प्रत्येक शुभप्रसंगी आंब्याची पाने घरात मांगल्य आणतात. भाजी-आमटीच्या फोडणीची लज्जत कढीपत्ता वाढवतो. झाडे नसती तर... माणसाच्या जीवनातील हिरवेपणा, मृदुताच हरवली असती. मग चांदोबा कोठे लपला असता? हिरव्या चाफ्याला सुगंध लपवण्याची गरजच पडली नसती. रजनीगंधा धुंद झाली नसती. वृक्षाविना सारे जीवन रूक्ष झाले असते. मानवाच्या जीवनातील प्रत्येक क्षण झाडांशी इतका निगडित आहे की, त्यामुळेच माणूस आपल्या वंशावळीला 'वंशवृक्ष' असे सार्थ अभिधान देतो. असा हा मानवाचा थोर मित्र नसेल तर मानवी जीवन नष्टप्राय होईल.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

महत्‍वाचे मुद्दे : 

(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )


  • झाडांचे महत्त्व व उपयुक्तता 
  • झाडांचे विविध प्रकार
  • प्रदूषण
  • फळे, फुले, लाकडे, औषधे
  • निसर्गसौंदर्यात काव्य असते
  • पाण्याचा पुरवठा 
  • वनसंपत्ती उत्पादन 
  • पशु-पक्षी आणि मानवी जीवनाचा आधार