स्वतंत्र दिन निबंध मराठी | swatantra din nibandh marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण स्वतंत्र दिन मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्‍ये दरवषी स्वातंत्र्यदिन कश्‍याप्रकारे साजरा केल्‍या जातो याचे वर्णन केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला

निबंध 1 

१५ ऑगस्ट १९४७ ला भारत पारतंत्र्याच्या अंधारातून निघून स्वातंत्र्याच्या प्रकाशात आला. दिडशे वर्षांची गुलामी संपली. ब्रिटिश या देशातुन निघून गेले. देशाची प्रशासन व्यवस्था व्यवस्थितपणे चालविण्यासाठी पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद व पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांना नियुक्त करण्यात आले. प्रतिवर्षी १५ ऑगस्ट राष्ट्रीय पर्वाच्या रूपात साजरा केला जातो.

swatantra-din-nibandh-marathi
swatantra-din-nibandh-marathi

मुख्य समारंभ लाल किल्ल्यावर साजरा होतो. पंतप्रधान तिथे पोहोचल्यावर सेनेच्या तिन्ही विभागांचे प्रमुख त्यांना सलामी देतात.पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवितात. ध्वजाला २१ तोफांची सलामी सन्मानाप्रीत्यर्थ दिली जाते. राष्ट्राच्या नावे दिल्या जाणाऱ्या संदेशात पंतप्रधान देशाची प्रगती आणि भविष्यातील योजना याबद्दल राष्ट्राला माहिती देतात. या प्रसंगी देशातील सन्माननीय व्यक्तींबरोबरच विदेशी पाहुणे पण हजर असतात. भाषण संपल्यावर तीन वेळा 'जयहिंद'च्या घोषणेनंतर राष्ट्रगीत गायिले जाते, नंतर कार्यक्रम समाप्त होतो. १५ ऑगस्टला राष्ट्रीय सुट्टी असते. रात्री सरकारी इमारतींवर विद्युत रोषणाई केली जाते. ती पाहण्यासारखी असते. १५ ऑगस्टचा या सोहळयाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर आणी इंटरनेटवर दाखविले जाते. त्यानंतर देशभक्तिपर गीते, कविता, नाटके प्रसारित केली जातात. राज्या-राज्यात व गावा- गावात उत्साहाने ध्वजारोहण केले जाते. आपणा भारतीयांसाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस आपल्याला आपल्या जुन्या चुकांचा विचार करण्यास व त्या पुन्हा न होऊ देण्याचा प्रयत्न करण्यास सांगतो. कोणत्याही परिस्थितीत आपण आपले ऐक्य व अखंडतेचे रक्षण केले पाहिजे. तरच आपण आपल्या देशाचे नागरिक आहोत असे अभिमानाने जगाला सांगू शकू. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

निबंध 2

दरवर्षी स्वातंत्र्यदिनाला शाळेत जायचे, राष्ट्रध्वजाला वंदन करायचे, पाहुण्यांचे भाषण ऐकायचे हा एक ठराविक चाकोरीतील कार्यक्रम होता; पण यंदा आमचे वर्गशिक्षक म्हणाले की, "उदया झेंडावंदनाला याल, तेव्हा घरी सांगून या की आता एकदम संध्याकाळी घरी येऊ. आणि हो, येताना तुमचा दुपारच्या जेवणाचा डबाही घेऊन या, बरं का!"


१५ ऑगस्ट उजाडला. आम्ही शाळेत जमलो. ध्वजवंदन झाले. शाळेतील कार्यक्रम संपला. आता कोठे जायचे आहे, हे सरांनी काही सांगितलेच नव्हते, त्यामुळे उत्सुकता खूप वाढली होती. सरांबरोबर आम्ही सर्वजण निघालो.


आम्ही गावाबाहेरच्या एका जुन्या घरापाशी आलो. आमचे कुतूहल वाढले होते. सरांनी कुणाला तरी हाक मारली. एक वृद्ध पण तेजस्वी व्यक्ती पुढे आली. सरांनी ओळख करून दिली, ते सरांचे 'सर' होते. पण त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे ते जुन्या पिढीतील एक स्वातंत्र्यसैनिक होते. १९४२ च्या 'चले जाव' आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता. अनेक वर्षे ते भूमिगत होते आणि काही काळ त्यांनी कारावासही भोगला होता है पण  आम्हांला सांगितले.


स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र दिवशी त्या वृद्ध तपस्वी स्वातंत्र्यसैनिकाच्या तोंडुन स्वातंत्र्यलढ्याची गाथा ऐकण्यात आम्ही रमून गेलो. दोन तास केव्हा संपले ते कळलेच नाही. त्या स्वातंत्र्यवीराने तो इतिहास प्रत्यक्ष अनुभवला होता.

नंतर ते तपस्वी आम्हांला जवळच्याच एका घरात घेऊन गेले. स्वातंत्र्योत्तर काळात काही अनाथ बालकांच्या संगोपनाची व शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतली होती. त्या मुलांबरोबरच आम्ही आमचे भोजन केले. नंतर आम्ही काही वेळ गप्पागोष्टी व खेळ झाल्यावर घराकडे परत निघालो. तेव्हा एकच विचार मनात रेंगाळत होता की, स्वातंत्र्यदिन आज आम्ही खऱ्या अर्थाने साजरा केला.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 3

भारताचा स्वातंत्र्यदिन

स्वातंत्र्यदिन हा प्रत्येक राष्ट्रासाठी व त्यांच्या जनतेसाठी एक स्वतःचे अस्तित्व दाखवणारा व कोणतेही राष्ट्र असो प्रत्येकाला आपला स्वातंत्र्यदिन हा प्रिय असतो.


स्वातंत्र्य म्हणजे नेमके तरी काय हो? तर स्वातंत्र्याचे अनेक अर्थ, संकल्पना असू शकतील परंतु स्वातंत्र्य म्हणजे राष्ट्रातील व जगातील प्रत्येक व्यक्तीला वा समूहाला त्याच्या इच्छेप्रमाणे, आवडीप्रमाणे जगता यावे व तो स्वतःचे अस्तित्व तो स्वतःच्या इच्छेप्रमाणे समाजात दाखवू शकतो.


जगातील प्रत्येक राष्ट्राला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी काही धडपड करावी लागली तर काही राष्ट्रांना स्वातंत्र्य हे सहजगत्या मिळाले. राष्ट्र लोकशाही, कम्युनिस्ट, हुकूमशाही असे देत. परंतु ज्या राष्ट्रात जास्तीत जास्त लोक स्वातंत्र्य उपभोगतात तोच देश अथवा राष्ट्र हे स्वातंत्र्याचे प्रतिक मानले जाते.


आपल्या देशालाही स्वातंत्र्य मिळविताना अनेक अडचणी आल्या. परंतु देशातील स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिश सरकारला विरोध करून वा प्रसंगी अहिंसा करत स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. त्यात अनेकांना प्राणांची अहिंसा करत स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. त्यात अनेकांना प्राणांची आहुती द्यावीच लागली. परंतु स्वातंत्र्य मिळाले ते १५ ऑगस्ट १९४७ साली.


परंतु हे स्वातंत्र्य मिळविण्यास जेवढे परिश्रम, त्रास झाला तेवढाच किंबहुना त्याहून अधिक त्रास हे स्वातंत्र्य व देशातील शांतता टिकविण्यास झाला. त्यातली कारणे वेगळी वेगळी आहेत. परंतु प्रश्न पडतो की स्वातंत्र्यदिन हा खड्या पहात किंवा सुरक्षेच्या जाळ्यात म्हणजे एखाद्या तुरुंगात असल्याप्रमाणे साजरा करणे व ते हेच का स्वातंत्र्य की ज्यासाठी आपण इतकी वर्षे लढलो. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या आयुष्याची प्रसंगी जिवाची होळी केली ते जर या स्वातंत्र्यदिनाच्या वेळी उपस्थित असतील तर त्यांचीही मान शरमेने खाली जाईल.


ज्या देशाची सूरक्षाव्यवस्था व आंतरिक शांतता योग्य, मजबूत आहे त्या देशाचे स्वातंत्र्य अबाधित असते. परंतु आपल्या देशाची भौगोलिक रचना व तसेच आंतरिक रचना बघताना आपली शांतता, स्वातंत्र्य टिकविणे अवघड व महत्त्वपूर्ण असल्याचे वाटते. भारताच्या पश्चिमेस पाकिस्तान व पूर्वेस बांगलादेश ही फाळणीतून निर्माण झालेली राष्ट्रे आहेत व तीच राष्ट्रे ही जगातील व आशियातील महत्त्वाची दहशतवादी केंद्रे आहेत. व त्यांचे उद्दिष्ट हे जगातील व प्रामुख्याने विकसित देशांची शांतता, सुरक्षा भंग करणे व प्रसंगी हिंसा करणे. त्यामुळेच आपल्या राष्ट्रांना आपली सुरक्षाव्यवस्था मजबूतपणे कार्यरत ठेवणे भागच आहे.


भारतात विविध धर्माचे, पंथाचे, जातीचे लोक एकत्र राहतात परंतु भारतात धार्मिक, प्रादेशिक हे वाद देशाच्या दृष्टीने घातक निर्माण होत आहेत. भारतात अनेक धर्माचे लोक हे आपल्या पद्धतीने स्वतःच्या धर्माचे श्रेष्ठत्व गाजवताना दिसतात व त्यामुळेच आंतरिक शक्ती ह्या परोपरीने वा अनपेक्षितपणे शांततेस, सुरक्षेस आव्हान देत असतात.


ज्या देशाच्या स्वातंत्र्यास ६० वर्षे पूर्ण होऊनही त्या देशाला स्वतःचा 'स्वातंत्र्यदिन' हा सुरक्षाव्यवस्थेत पार पाडावा लागतो ही खरी शरमेची बाब आहे.


भारताचा स्वातंत्र्यदिन हा खड्या पहाऱ्यात साजरा होत असताना त्यात किती सामान्य लोक उत्साहपूर्वक सहभागा होऊ शकतात ? किती लोकांना शांत वातावरणात आपला स्वातंत्र्यदिन पाहायला मिळतो ?

स्वातंत्र्योत्तर काळात स्वातंत्र्याचे अनेक फायदे जनतेस समजते. परंतु आंतरिक शांतता निर्माण करण्यास देशातील नेते कमी पडले.

खड्या पहाऱ्यात स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना पाहताना हेच का ते स्वातंत्र्य जे आपण ६० वर्षांपूर्वी मिळविले व त्यासाठी अगणित हिरे गमावले. प्रत्येक स्वातंत्र्यदिन जवळ आला की सुरक्षेची चाचपणी सुरू होते व त्या दिवसापुरता तो दिवस यथायोग्यपणे पारही पडतो. परंतु इतर दिवस हे अशांतता, भीतीपूर्ण वातावरणात होतात त्याचे काय ?

स्वातंत्र्यदिनी आमचा ऊर भरून येतो आम्ही अभिमानाने तो विविध पूर्ण पद्धतीने साजरा करतो. परंतु हा स्वातंत्र्यदिन आम्ही यापुढेही याच पद्धतीने, भीतीपूर्ण वातावरणात साजरा करणार काय ? हाच प्रश्न मनात घर करून राहतो. ज्या देशाचा स्वातंत्र्यदिन हा खड्या पहायात होतो तर मग सामान्य लोकांचे स्वातंत्र्य कसे अबाधित राहू शकते हे कळतच नाही.

म्हणूनच असे सतत वाटत राहते की माझ्या भारताचा स्वातंत्र्यदिन हा विना सुरक्षा व्यवस्थेत पार पडेल तेव्हाच तो खरा यथायोग्यपणे साजरा होऊ शकेल. व त्याचवेळी त्या राष्ट्राचे भवितव्य चांगले असेल आणि तोच माझ्या स्वप्नातील भारत असेल.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

स्वतंत्र दिन निबंध मराठी | swatantra din nibandh marathi

स्वतंत्र दिन निबंध मराठी | swatantra din nibandh marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण स्वतंत्र दिन मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्‍ये दरवषी स्वातंत्र्यदिन कश्‍याप्रकारे साजरा केल्‍या जातो याचे वर्णन केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला

निबंध 1 

१५ ऑगस्ट १९४७ ला भारत पारतंत्र्याच्या अंधारातून निघून स्वातंत्र्याच्या प्रकाशात आला. दिडशे वर्षांची गुलामी संपली. ब्रिटिश या देशातुन निघून गेले. देशाची प्रशासन व्यवस्था व्यवस्थितपणे चालविण्यासाठी पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद व पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांना नियुक्त करण्यात आले. प्रतिवर्षी १५ ऑगस्ट राष्ट्रीय पर्वाच्या रूपात साजरा केला जातो.

swatantra-din-nibandh-marathi
swatantra-din-nibandh-marathi

मुख्य समारंभ लाल किल्ल्यावर साजरा होतो. पंतप्रधान तिथे पोहोचल्यावर सेनेच्या तिन्ही विभागांचे प्रमुख त्यांना सलामी देतात.पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवितात. ध्वजाला २१ तोफांची सलामी सन्मानाप्रीत्यर्थ दिली जाते. राष्ट्राच्या नावे दिल्या जाणाऱ्या संदेशात पंतप्रधान देशाची प्रगती आणि भविष्यातील योजना याबद्दल राष्ट्राला माहिती देतात. या प्रसंगी देशातील सन्माननीय व्यक्तींबरोबरच विदेशी पाहुणे पण हजर असतात. भाषण संपल्यावर तीन वेळा 'जयहिंद'च्या घोषणेनंतर राष्ट्रगीत गायिले जाते, नंतर कार्यक्रम समाप्त होतो. १५ ऑगस्टला राष्ट्रीय सुट्टी असते. रात्री सरकारी इमारतींवर विद्युत रोषणाई केली जाते. ती पाहण्यासारखी असते. १५ ऑगस्टचा या सोहळयाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर आणी इंटरनेटवर दाखविले जाते. त्यानंतर देशभक्तिपर गीते, कविता, नाटके प्रसारित केली जातात. राज्या-राज्यात व गावा- गावात उत्साहाने ध्वजारोहण केले जाते. आपणा भारतीयांसाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस आपल्याला आपल्या जुन्या चुकांचा विचार करण्यास व त्या पुन्हा न होऊ देण्याचा प्रयत्न करण्यास सांगतो. कोणत्याही परिस्थितीत आपण आपले ऐक्य व अखंडतेचे रक्षण केले पाहिजे. तरच आपण आपल्या देशाचे नागरिक आहोत असे अभिमानाने जगाला सांगू शकू. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

निबंध 2

दरवर्षी स्वातंत्र्यदिनाला शाळेत जायचे, राष्ट्रध्वजाला वंदन करायचे, पाहुण्यांचे भाषण ऐकायचे हा एक ठराविक चाकोरीतील कार्यक्रम होता; पण यंदा आमचे वर्गशिक्षक म्हणाले की, "उदया झेंडावंदनाला याल, तेव्हा घरी सांगून या की आता एकदम संध्याकाळी घरी येऊ. आणि हो, येताना तुमचा दुपारच्या जेवणाचा डबाही घेऊन या, बरं का!"


१५ ऑगस्ट उजाडला. आम्ही शाळेत जमलो. ध्वजवंदन झाले. शाळेतील कार्यक्रम संपला. आता कोठे जायचे आहे, हे सरांनी काही सांगितलेच नव्हते, त्यामुळे उत्सुकता खूप वाढली होती. सरांबरोबर आम्ही सर्वजण निघालो.


आम्ही गावाबाहेरच्या एका जुन्या घरापाशी आलो. आमचे कुतूहल वाढले होते. सरांनी कुणाला तरी हाक मारली. एक वृद्ध पण तेजस्वी व्यक्ती पुढे आली. सरांनी ओळख करून दिली, ते सरांचे 'सर' होते. पण त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे ते जुन्या पिढीतील एक स्वातंत्र्यसैनिक होते. १९४२ च्या 'चले जाव' आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता. अनेक वर्षे ते भूमिगत होते आणि काही काळ त्यांनी कारावासही भोगला होता है पण  आम्हांला सांगितले.


स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र दिवशी त्या वृद्ध तपस्वी स्वातंत्र्यसैनिकाच्या तोंडुन स्वातंत्र्यलढ्याची गाथा ऐकण्यात आम्ही रमून गेलो. दोन तास केव्हा संपले ते कळलेच नाही. त्या स्वातंत्र्यवीराने तो इतिहास प्रत्यक्ष अनुभवला होता.

नंतर ते तपस्वी आम्हांला जवळच्याच एका घरात घेऊन गेले. स्वातंत्र्योत्तर काळात काही अनाथ बालकांच्या संगोपनाची व शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतली होती. त्या मुलांबरोबरच आम्ही आमचे भोजन केले. नंतर आम्ही काही वेळ गप्पागोष्टी व खेळ झाल्यावर घराकडे परत निघालो. तेव्हा एकच विचार मनात रेंगाळत होता की, स्वातंत्र्यदिन आज आम्ही खऱ्या अर्थाने साजरा केला.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 3

भारताचा स्वातंत्र्यदिन

स्वातंत्र्यदिन हा प्रत्येक राष्ट्रासाठी व त्यांच्या जनतेसाठी एक स्वतःचे अस्तित्व दाखवणारा व कोणतेही राष्ट्र असो प्रत्येकाला आपला स्वातंत्र्यदिन हा प्रिय असतो.


स्वातंत्र्य म्हणजे नेमके तरी काय हो? तर स्वातंत्र्याचे अनेक अर्थ, संकल्पना असू शकतील परंतु स्वातंत्र्य म्हणजे राष्ट्रातील व जगातील प्रत्येक व्यक्तीला वा समूहाला त्याच्या इच्छेप्रमाणे, आवडीप्रमाणे जगता यावे व तो स्वतःचे अस्तित्व तो स्वतःच्या इच्छेप्रमाणे समाजात दाखवू शकतो.


जगातील प्रत्येक राष्ट्राला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी काही धडपड करावी लागली तर काही राष्ट्रांना स्वातंत्र्य हे सहजगत्या मिळाले. राष्ट्र लोकशाही, कम्युनिस्ट, हुकूमशाही असे देत. परंतु ज्या राष्ट्रात जास्तीत जास्त लोक स्वातंत्र्य उपभोगतात तोच देश अथवा राष्ट्र हे स्वातंत्र्याचे प्रतिक मानले जाते.


आपल्या देशालाही स्वातंत्र्य मिळविताना अनेक अडचणी आल्या. परंतु देशातील स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिश सरकारला विरोध करून वा प्रसंगी अहिंसा करत स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. त्यात अनेकांना प्राणांची अहिंसा करत स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. त्यात अनेकांना प्राणांची आहुती द्यावीच लागली. परंतु स्वातंत्र्य मिळाले ते १५ ऑगस्ट १९४७ साली.


परंतु हे स्वातंत्र्य मिळविण्यास जेवढे परिश्रम, त्रास झाला तेवढाच किंबहुना त्याहून अधिक त्रास हे स्वातंत्र्य व देशातील शांतता टिकविण्यास झाला. त्यातली कारणे वेगळी वेगळी आहेत. परंतु प्रश्न पडतो की स्वातंत्र्यदिन हा खड्या पहात किंवा सुरक्षेच्या जाळ्यात म्हणजे एखाद्या तुरुंगात असल्याप्रमाणे साजरा करणे व ते हेच का स्वातंत्र्य की ज्यासाठी आपण इतकी वर्षे लढलो. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या आयुष्याची प्रसंगी जिवाची होळी केली ते जर या स्वातंत्र्यदिनाच्या वेळी उपस्थित असतील तर त्यांचीही मान शरमेने खाली जाईल.


ज्या देशाची सूरक्षाव्यवस्था व आंतरिक शांतता योग्य, मजबूत आहे त्या देशाचे स्वातंत्र्य अबाधित असते. परंतु आपल्या देशाची भौगोलिक रचना व तसेच आंतरिक रचना बघताना आपली शांतता, स्वातंत्र्य टिकविणे अवघड व महत्त्वपूर्ण असल्याचे वाटते. भारताच्या पश्चिमेस पाकिस्तान व पूर्वेस बांगलादेश ही फाळणीतून निर्माण झालेली राष्ट्रे आहेत व तीच राष्ट्रे ही जगातील व आशियातील महत्त्वाची दहशतवादी केंद्रे आहेत. व त्यांचे उद्दिष्ट हे जगातील व प्रामुख्याने विकसित देशांची शांतता, सुरक्षा भंग करणे व प्रसंगी हिंसा करणे. त्यामुळेच आपल्या राष्ट्रांना आपली सुरक्षाव्यवस्था मजबूतपणे कार्यरत ठेवणे भागच आहे.


भारतात विविध धर्माचे, पंथाचे, जातीचे लोक एकत्र राहतात परंतु भारतात धार्मिक, प्रादेशिक हे वाद देशाच्या दृष्टीने घातक निर्माण होत आहेत. भारतात अनेक धर्माचे लोक हे आपल्या पद्धतीने स्वतःच्या धर्माचे श्रेष्ठत्व गाजवताना दिसतात व त्यामुळेच आंतरिक शक्ती ह्या परोपरीने वा अनपेक्षितपणे शांततेस, सुरक्षेस आव्हान देत असतात.


ज्या देशाच्या स्वातंत्र्यास ६० वर्षे पूर्ण होऊनही त्या देशाला स्वतःचा 'स्वातंत्र्यदिन' हा सुरक्षाव्यवस्थेत पार पाडावा लागतो ही खरी शरमेची बाब आहे.


भारताचा स्वातंत्र्यदिन हा खड्या पहाऱ्यात साजरा होत असताना त्यात किती सामान्य लोक उत्साहपूर्वक सहभागा होऊ शकतात ? किती लोकांना शांत वातावरणात आपला स्वातंत्र्यदिन पाहायला मिळतो ?

स्वातंत्र्योत्तर काळात स्वातंत्र्याचे अनेक फायदे जनतेस समजते. परंतु आंतरिक शांतता निर्माण करण्यास देशातील नेते कमी पडले.

खड्या पहाऱ्यात स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना पाहताना हेच का ते स्वातंत्र्य जे आपण ६० वर्षांपूर्वी मिळविले व त्यासाठी अगणित हिरे गमावले. प्रत्येक स्वातंत्र्यदिन जवळ आला की सुरक्षेची चाचपणी सुरू होते व त्या दिवसापुरता तो दिवस यथायोग्यपणे पारही पडतो. परंतु इतर दिवस हे अशांतता, भीतीपूर्ण वातावरणात होतात त्याचे काय ?

स्वातंत्र्यदिनी आमचा ऊर भरून येतो आम्ही अभिमानाने तो विविध पूर्ण पद्धतीने साजरा करतो. परंतु हा स्वातंत्र्यदिन आम्ही यापुढेही याच पद्धतीने, भीतीपूर्ण वातावरणात साजरा करणार काय ? हाच प्रश्न मनात घर करून राहतो. ज्या देशाचा स्वातंत्र्यदिन हा खड्या पहायात होतो तर मग सामान्य लोकांचे स्वातंत्र्य कसे अबाधित राहू शकते हे कळतच नाही.

म्हणूनच असे सतत वाटत राहते की माझ्या भारताचा स्वातंत्र्यदिन हा विना सुरक्षा व्यवस्थेत पार पडेल तेव्हाच तो खरा यथायोग्यपणे साजरा होऊ शकेल. व त्याचवेळी त्या राष्ट्राचे भवितव्य चांगले असेल आणि तोच माझ्या स्वप्नातील भारत असेल.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद