हुंडा एक सामाजिक समस्या मराठी निबंध । Hunda Ek Samajik Samasya Essay In Marathi

निबंध 1

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण हुंडा एक सामाजिक समस्या मराठी निबंध । Hunda Ek Samajik Samasya Essay In Marathi बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून 3निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. हुंडा पद्धती म्हणजे समाजातील लोभिष्ट् स्वभावाच्या  माणसाच्या  वाईट मनोवृत्तीचा आरसा  आहे. तसे तर हुंडाबळी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारा विषयीच्या बातम्या आपण वृत्तपत्र, टीव्ही व इंटरनेटच्या् माध्यमातून दररोज पाहतो. 


या निबंधामध्ये आपण याविषयी चर्चात्मक व चिंतनात्मक स्वरूपाने विश्लेषण करणार आहोत. हुंडा प्रथेबद्दल समाजाची असणारी मानसिकता व हुंडाबळी कायद्यात असलेल्या  कमतरता याविषयी सविस्तर वर्णन आपण करणार आहोत चला तर मग निबंध लेखनाला सुरुवात करुया. यामध्ये  एकूण दोन निबंध देण्यात आहे 

रस्त्यात एका घरासमोर बरीच गर्दी दिसली. आणि या गर्दीचे वैशिष्ट्य म्हणजे या गर्दीत सर्व स्त्रियाच होत्या. कुतूहलाने मी जवळ गेलो. एका प्रशस्त बंगल्यासमोर त्या निदर्शने करीत होत्या. कोणावर अन्याय घडला होता याची चौकशी करता कळले की, त्या घरातील गृहलक्ष्मीनवागत सून ही हुंडाबळी ठरली होती. त्यासाठी 'नारी समता मंचा'च्या त्या स्त्रिया त्या कुटुंबातील लोभी माणसांची छीःथू करीत होत्या. मनात विचार आला की, या आलिशान बंगल्यातील मंडळींना अधिक धनाची इतकी हाव का सूटावी? मोठया थाटामाटात विवाह करून सासरी आणलेल्या आपल्या सूनेचा बळी त्यांनी धनासाठी का घ्यावा?


आपल्या भारतात आर्थिक विषमता फार मोठ्या प्रमाणात आहे. एका बाजूला गडगंज संपत्ती असणारे भांडवलदार आहेत; तर दुसऱ्या बाजूला अन्नाची भ्रांत असणारे लक्षावधी गरीब आहेत. एका बाजूला उंच उंच आलिशान इमारती आहेत, तर दुसऱ्या बाजूला हीनदीन झोपडपट्ट्या आहेत. अशा या दोन परस्परविरोधी समाजांत एका बाबतीत मात्र साम्य आहे आणि ती बाब म्हणजे 'हुंडाबळी'.


श्रीमंतांकडे ज्याप्रमाणे हुंड्यासाठी बळी पडतात, त्याप्रमाणे गरिबांच्यातही हुंड्यामुळे खून केले जातात. हुंड्याचे हे जहर आज पिढ्यान्पिढ्या आपल्या समाजात भिनले आहे. त्यामुळे मुलगी झाली की आईवडिलांच्या काळजाचा ठोका चुकतो. मुलीला जन्म देणाऱ्या स्त्रीकडे उपेक्षेने पाहिले जाते. कित्येक गरीब घरांतून तर या हुंड्याच्या रूढीपायी कित्येक मुली अविवाहित राहतात.


Hunda Ek Samajik Samasya essay in marathi
Hunda Ek Samajik Samasya essay in marathi


आपल्याला असे वाटत होते की, जग जसे प्रगत होईल, शिक्षणाचा जसा प्रसार होईल तसा हा हुंड्याचा फास कमी होईल; पण आपली ही आशा फोल ठरलेली दिसत आहे. आज शहरांतून तरी शिक्षणाचा खूप प्रसार झाला आहे. मुली पदवीधर झाल्या आहेत. स्वतः नोकरी करून पैसे मिळवू लागल्या आहेत. तरी पण लोकांची हुंड्याची हाव काही सुटली नाही. उलट सध्या हुंडा वेगवेगळ्या स्वरूपांत समोर येतो. वरदक्षिणा, दागदागिने, मानपान, राहण्याची जागा, वाहन, टी व्ही., फ्रीज अशा विविध रूपांत हा हुंडारूपी भस्मासूर अवतरतो. जो ज्यांच्या अंगी संचारतो ते आपल्यातील माणूस हरवून बसतात आणि शेवटी त्यात नवपरिणित मुलीचा बळी घेतला जातो. 


या हुंडापद्धतीला आळा कसा घालायचा? वास्तविक १९६१ पासून आपल्याकडे हुंडाप्रतिबंधक कायदा लागू झाला आहे. पण हा कायदा अपुरा पडतो. त्यातून अनेक पळवाटा निघतात. हुंडा घेण्याचा गुन्हा करणाऱ्यांना त्या. फार सौम्य शासन आहे. म्हणून कायदयात सुधारणा करण्याचे खूप प्रयत्न चालू आहेत. पण येथे एक मोठा प्रश्न उभा राहतो की, या गोष्टी कायदयाने अमलात येतील का? 


खरे म्हणजे त्यासाठी फार मोठ्या प्रमाणात समाजप्रबोधन आवश्यक आहे. समाजपरिवर्तन व्हायला हवे, पण हे कोण करणार? काही महिला संघटना आपल्यापरीने प्रयत्न करीत आहेत. पण या प्रश्नातले एक कटू सत्य असे की, बहुसंख्य हुंडाबळी प्रकरणांमध्ये सासू, नणंद अशा स्त्रियाच कारणीभूत ठरलेल्या दिसतात. मग सांगा आता काय करावे?


निबंध 2

महत्‍वाचे मुद्दे : 
(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • एखादया प्रसंगातून प्रस्तावना
  • या दुष्ट प्रथेची परंपरा
  • 'वरदक्षिणा' 
  • 'स्त्री'ला कमी लेखणे
  • आज स्त्रीने पुरुषाची बरोबरी केली. 
  • शिक्षण, अर्थार्जन सर्व बाबतींत स्त्री पुढे
  • हुंड्याचे दुष्परिणाम
  • विवाह म्हणजे मनोमीलन

आमच्या ताईचे लग्न जमले होते. खरे पाहता, ही किती आनंदाची गोष्ट; पण मला आईबाबांच्या चेहऱ्यावर काळजीच दिसत होती. असे का? मला पडलेला हा प्रश्न मी कोणाला विचारणार? हळूहळू मला अंदाज आला की, काहीतरी पैशांची अडचण असावी. ताईच्या सासरच्या लोकांची आमच्याकडून खूप मोठ्या रकमेची अपेक्षा होती आणि त्याचेच आईबाबांना ओझे झाले होते. या प्रसंगामुळेच प्रथम माझी 'हुंडा' या शब्दाशी ओळख झाली आणि मग वरचेवर तो भयसूचक शब्द माझ्या कानी पडू लागला, वाचनात येऊ लागला.


 'हुंडा' ही आपल्या समाजातील खरोखर एक दुष्ट प्रथा आहे. या प्रथेची मुळे पुरातन काळापासून आढळतात. बहुधा हुंडा हा वरपक्ष वधूपक्षाकडून हक्क म्हणून वसूल करतो. फारच थोड्या जातींत मुलाकडून मुलीला हुंडा दिला जातो. पूर्वी या हुंड्याला 'वरदक्षिणा' या गोंडस नावाने गौरवले जात असे. आपल्या पुरुषप्रधान समाजात स्त्रीला कमी लेखले जात असे आणि या कमीपणाची भरपाई हुंड्याने केली जात असे.


आज स्त्रीने हे सिद्ध केले आहे की, ती कोणत्याही बाबतीत पुरुषापेक्षा कमी नाही. आज मुली भरपूर शिकतात. कुठलाही सुविदय पुरुष सुशिक्षित स्त्रीचीच पत्नी म्हणून निवड करतो. म्हणजे शिक्षणाचा खर्च दोघांनीही केलेला असतो.


आज बहुतेक स्त्रिया अर्थार्जन करत असतात. म्हणजे आपल्या संसाराची आर्थिक जबाबदारीही त्या उचलत असतात. त्याशिवाय घर, कुटुंब आणि अपत्ये यांसाठीही घरातील स्त्री सतत कष्ट उपसत असते. अशा परिस्थितीत तिच्या जन्मदात्यांकडून धनाची वा इतर भेटींची अपेक्षा करणे हे फार दुष्टपणाचे लक्षण आहे.
आज 'हुंडा' या दुष्ट प्रथेचे अनेक दुष्परिणाम आपल्याला अधूनमधून दिसून येतात. मुलीच्या सासरच्या लोकांकडून वारंवार अनेक मागण्या झाल्यामुळे कित्येक विवाहित मुली आत्महत्या करतात. कित्येकदा हुंड्याच्या हव्यासासाठी सुनेला जाळण्यापर्यंत सासरच्या माणसांची मजल जाते.

वरपक्षाकडून होणाऱ्या हुंड्याच्या मागणीमुळे कित्येक गरीब घरातील मुलींचे विवाहच होत नाहीत. त्यामुळे मुलीचा जन्म हा मातापित्याला संकटच वाटू लागतो. काही समाजात मुलींना जन्मतःच मारले जाते, तर काही ठिकाणी मुलीचा जन्मच नाकारला जातो. हे खरोखरच दुःखदायक आहे. खरे तर स्त्री व पुरुष हे समाजाचे दोन आधारस्तंभ आहेत, दोन पाय आहेत. एक पाय आपण कमकुवत ठेवला, तर लुळापांगळा समाज प्रगती करू शकेल काय?

खरे पाहता, हुंड्याला कायदयाने बंदी आहे, पण आपल्या समाजात कायदा गुंडाळून ठेवून अनेक पळवाटा काढल्या जातात. तेव्हा ही दुष्ट प्रथा कायदयाने बंद होणार नाही. त्यासाठी समाजप्रबोधन व्हायला हवे. प्रत्येक मुलाने व प्रत्येक मुलीने 'मी हुंडा घेणार नाही' किंवा 'मी हुंडा देणार नाही' अशी प्रतिज्ञा केली पाहिजे आणि त्यानुसार आचरणही केले पाहिजे. तरच या अनिष्ट प्रथेला कायमचा पायबंद बसेल. तो सोन्याचा दिवस लवकर येवो.

मित्र-मैत्रिणींनो तुमच्याा मते समाजाची मानसिकता बदलण्यासाठी काय उपाययोजना केली पाहीजे व हुंडा बळी कायद्यात काय आवश्यक बदल केले गेले पाहीजेत ते तुम्ही कमेंट करून सांगु शकता. तुम्हाला  हुंडा एक सामाजिक समस्या मराठी निबंध । Hunda Ek Samajik Samasya Essay In Marathi हा निबंध कसा वाटला याबद्दल तुम्ही तुमचा प्रतिसाद देऊ शकता. धन्यवाद पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 3


हुंडा एक सामाजिक समस्या मराठी निबंध । Hunda Ek Samajik Samasya Essay In Marathi



मुलींचा जन्म स्त्रीसुद्धा का नाकारते? स्त्री आणि पुरुष ही समाजरथाची दोन चाके. असे असताना स्त्रीचा जन्म का नको? एकीकडे 'मुलगा-मुलगी एक समान', अशा घोषण द्यायच्या आणि एकीकडे मुलीचा जन्म नाकारायचा. पुरुषाचा जन्म स्त्रीशिवाय संभवत नाही, 

हे सत्य समाज का नाकारत आहे? 'यत्र नार्यस्तु पूजन्ते, रमन्ते तत्र देवता।' असे म्हणायचे आणि स्त्रीचा अपमान करायचा, तिला गौण स्थान द्यायचे, अशी माणसाची वृत्ती का? या सगळ्यामागे सामाजिक अनिष्ट प्रथा आहे. ती म्हणजेच हुंडा. 

मुलीला लहानाचे मोठे करायचे, तिच्यावर उत्तम संस्कार करायचे, तिला शिक्षण द्यायचे आणि ती उपवर झाली, की तिचा बाजार मांडायचा. उत्तम स्थळ हवे? द्या हुंडा, करा खर्च. गरीब आईबाप नाही देऊ शकत हुंडा. हुंडा नाही, तर लग्न नाही. झालंच लग्न, तर सासरच्यांकडून छळ, लोभ, हव्यास यातूनच हुंड्याचा जन्म झाला. 

'माहेराहून पैसे आण. नाही आणलेस, तर तुझा जगण्याचा हक्कदेखील आम्ही नाकारू.' मग हुंडाबळी, जिवंत जाळणे किंवा आत्महत्येस प्रवृत्त करणे. अशी ही स्त्रीची विटंबना कधी थांबणार? शिक्षणाबरोबर समाजही प्रगत होईल, वैचारिक क्रांती होईल असे वाटले होते. 


हुंडा देणे व घेणे कायद्याने गुन्हा ठरविला. पण कायद्याचे पालन करतो कोण? कायद्याला पळवाटा असतातच ना? हुंडा नको? मग वरदक्षिणा द्या. मुलीचे सालंकृत कन्यादान करा. मानपान करा. मुलीला फ्लॅट देऊन घ्या. जावयाला गाडी घेऊन द्या. अशा अनेक मागण्या होऊ लागल्या. 

याशिवाय लग्नाचा दोन्ही बाजूंचा खर्च वधुपित्यानेच उचलायचा. आपली मुलगी सुखी राहावी, तिला सासरच्यांची उणी-दुणी ऐकायला लागू नयेत; म्हणून काही वधूचे माता-पिता आपण होऊन न झेपणारा खर्च करतात. मग आपापसांत चढाओढ लागते. 'अमक्याचा मुलगा एवढा काही शिकलेला नाही. 

पगारही बेताचाच; पण सासुरवाडी बघा केवढी मालदार मिळालीय!' यातून इतरांना चेवच चढतो. अशा वेळी वाटते, कायद्याची नाही; समाज-प्रबोधनाची गरज अधिक आहे. त्यासाठी मुलानीच ज्ञा केली पाहिजे   'मी हुंडा घेणार नाही.' मुलींनी प्रतिज्ञा केली पाहिजे  'हंडा घेणाऱ्या मुलाशी लग्न करणार नाही.' हुंडा या प्रकाराशी स्त्रीच संबंधित असते.

सासू, नणंद, जाऊ अशा मंडळींचे नाव हुंडाबळी प्रकरणात असते. १९६१ साली हुंडा प्रतिबंधक कायदा' झाला; पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. या गुन्ह्यासाठी शिक्षादेखील सौम्य आहे. याबाबत सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे. अशा गोष्टी कायद्यापेक्षा माणुसकीच्या नात्याने, परस्परांच्या सहकार्याने आणि समंजसपणाने सोडविला पाहिजे.

आज मुलीदेखील उच्चशिक्षित असतात, लठ्ठ पगाराची नोकरी करत असतात, तरीही त्यांना हुंडा द्यावा लागतो. पण जी मुलगी लग्नाआधी नोकरी करत नाही, तिने कुठून आणायचे हुंड्यासाठी पैसे? प्रत्येक स्त्री संसाररथ ओढताना मोलाचा हातभार लावतच असते. 


तरीही सासरच्या अडी-अडचणीच्या वेळी सुनेने माहेरहून पैसे आणावेत, ही अपेक्षा का? प्रश्न अनेक आहेत; पण त्यांवर उत्तरे नाहीत. ऐपत असो अथवा नसो, तुम्ही काय वाट्टेल ते करा; 

पण मुलगी उजवायचीय ना मग द्या हुंडा, कधी उघडणार समाजाचे डोळे ? कधी संपुष्टात येणार ही हुंड्याची अनिष्ट प्रथा? या समाजाला सुबुद्धी होईल तेव्हा.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 4


हुंडा एक सामाजिक समस्या मराठी निबंध । Hunda Ek Samajik Samasya Essay In Marathi


"चला रूढीवर आता घसरा टाकूनि सीमा मृतधर्माच्या दंभाच्या या अंधपणाच्या जुनेपणाच्या, अहंपणाच्यासीमोल्लंघनकालचि दसरा" कविवर्य गोविंदाग्रज यांनी घातक रूढींचे उल्लंघन हेच खरे सीमाउल्लंघन आहे. असे सूचित केले आहे. 


काही अनावश्यक व वाईट रूढींचा अस्त व्हायलाच हवा. तरच नवविचारांचा सूर्य उदयास येईल. हुंडा एक जीवघेणी प्रथा आहे.महात्मा फुले, राजाराम मोहनरॉय , महर्षी कर्वे यांनी अनिष्ट रूढींचा नाश होण्यासाठी प्रयत्न केले.



कारण विशिष्ट चौकटीत मानवाला बंदिस्त करणाऱ्या या रूढीमुळे संस्कृती संस्कृती, समजा-समाज यामध्ये तणाव सुरू झाले. समाजात एकेरीपणा आला आहे.प्रेमाचा, भावनेचा चुराडा होत आहे. हुंड्याने 'मी पण' हरवलेली व्यक्ती आक्रोश करतांना दिसते. 



माणुसकी हिरावून घेणाऱ्या या रूढीविरूद्ध प्रत्येक तरूणाने बंड पुकारले पाहिजे. या रूढीला नाकारण्याची शक्ती प्रत्येक तरूणात हवी. आर्थिक विषमतेने श्रीमंत व गरीब असे वर्ग निर्माण केले.या दोन्ही वर्गात. या दोन्ही वर्गात आर्थिक विषमता आहे पण 'हुंडाबळी' च्या बाबतीत या दोन्ही वर्गात समानता आहे.


श्रीमंत आणि गरीब दोघांच्याही घरी हुंडाबळीचा आक्रोश निनादत आहे. १९६१ पासून हुंडाप्रतिबंधक कायदा लागू झालेला आहे पण त्यातील शासन फार सौम्य आहे, त्यात अनेक पळवाटा आहेत. म्हणून हा कायदा अपुरा पडत आहे. 'मलगी नको या भावनेचा जन्म होत आहे.


गर्भपात , गर्भलिंगनिदान याचे प्रमाण वाढले आहे मलीचा गर्भ असेल तर जगात येण्यापूर्वीच तिला संपविले जात आहे. हुंड्याच्या यक्षप्रश्नाम अनेक मुली अविवाहित आहेत. अनेक मुली बळी पडल्या आहेत.


हा यक्षप्रश्न सोडविण्यासाठी समाजप्रबोधनाची आवश्यकता आहे.नुसता कायदा सुधारून हे काम होणारे नाही. समाजपरिवर्तन झालेच पाहिजे ही सर्वांची सामाजिक आवश्यकता आहे.तरच या रूढीचा अस्त व नवविचारांचा उदय शक्य आहे.शिक्षणाबरोबर हुंडा कमी होईल ही आशा फोल ठरली आहे.


मुली पदवीधर झाल्या, नोकरीस लागल्या, तरी हुंडा आहेच.मानपान, दागिने, टि.व्ही. गाडी या रूपाने हुंड्याने उग्र रूप धारण केले आहे. वर्तमानपत्रात हुंडाबळीच्या बातम्या रोजच वाचावयास मिळतात. हुंड्यामुळे खून , आत्महत्या असे प्रकार घडतात.


सृष्टीची धारणा स्त्रीमुळे होते. तिला प्रेम द्या, विश्वास द्या, तिच्या भावना समजवून घ्या. ती सबला आहे,शक्ती आहे, जन्मदात्री आहे. तिची कदर करा.पैशाच्या लोभापायी, हुंड्याच्या उच्च विचाराची, समजुतदार असेल तर संसाराचा गाडाच काय, समाज व देशाच्या कल्याणासाठी ती प्रयत्नांच्या रथाची उत्तम सारथी बनून दाखवील. 


हुंड्यामुळे ज्या स्त्रीचा बळी जातो, तिच्या लहान मुलांचे जीवनही उद्ध्वस्त होते. संस्कृतीला लागलेला हा कलंक घालविण्यासाठी प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. हुंडासमस्याप्रधान चित्रपटे व नाटके , युवामंच , नारीअत्याचार विरोधी मंच या सर्वांबरोबर 'मी हुंडा घेणार नाही' हा प्रत्येक तरुणाचा निर्धार महत्त्वाचा आहे. 



हुंड्याच्या मोजकाट्याने लग्नमंडपात वराने आपली प्रतिष्ठा का मोजून घ्यावी? वधूच्या गळ्यात मंगळसूत्र की गळफास बांधला जात आहे? या गोष्टी क्षुल्लक नाहीत . एक स्त्री हुंडाबळी ठरते त्यामागे दोन कुटुंबे, दोन परिवार, सर्व आप्तेष्ट, तिची अपत्ये या सर्वांची खूप हानी होते. 



एक दुष्ट चक्र सुरू होते.कोर्ट, कचेऱ्या, शिक्षा, मानहानी या चक्रव्यूहात मग बाकीचेही अडकले जातात.शेवटी माणसासाठी नियम हवेत, नियमासाठी माणूस नको'. जी कृत्ये उजेडात करायला लाज वाटते, ती अंधारातही करायला नकोत. 



समाजाला उन्नत करण्यासाठी घातक प्रथांची होळी करायलाच हवी.नाही तर रोज एक 'मंजुश्री सारडा' बळी जात राहील.हुंडा मानवाला गिळेल.

“ 'लक्ष्मी' साठी 'लक्ष्मी'ला मारलेस

हुंड्यासाठी काय रे केलेस? 

हा लोभ लागेल हात धुऊन तुझ्याच मागे

माणसा, माणसा का रे असे केलेस? 

सुंदर संसार फुलविण्याऐवजी संहार का केलास?

आज दूर गेल्या सुखाच्या वाटा अन्

तुझ्या गळा अटकला फास......." 

असे शब्द माझ्या अंतरंगातून उमटतात. मन खूप व्यथित होत.खरं तर एक चांगली सहचारिणी मिळणे ही खूप भाग्याची गोष्ट आहे. योगायोगाने तसं मिळालं तर संसार फुलतो, खुलतो.पैसा काय आज आहे उद्या नाही.नसेल तर तो कमविता येतो.पण एकदा मोहापायी व्यक्ती गमावली तर ती परत मिळविता येत नाही. 


शिक्षण घेऊन जर तुमचे मन प्रगल्भ होत नसेल तर अशिक्षित राहिलेलेच बरे. प्रत्येक तरुणाने मनापासून ह्या सर्व बाबींचा विचार केला पाहिजे. जन्मभर साथ देणारी चांगली सहचारिणी मिळावी म्हणून प्रयत्न केला पाहिजे . 


वीस वर्षे जपलेले माहेर सोडून सर्वस्व द्यायला जी लक्ष्मी तुमच्या दारी येते तिचे स्वागत करा , प्रेमाने तिला जिंका, मग बघा सुख कस दारी लोळण घेतं ते! पैशाचा , हुंड्याचा हव्यास सोडून समाधानी जगा. नुसत्या शपथा नकोत कृती करा. कविवर्य केशवसुतांच्या शब्दात


"जुने जाऊ द्या मरणालागूनि 

जाळूनि किंवा पुरूनि टाका

सडत न एका ठायी ठाका

सावध! ऐका पुढल्या हाका....

हल्ली महाराष्ट्रात हुंडा प्रतिबंधक अधिनियमानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना हुंडा न घेतल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.इंजिनिअर, डॉक्टर बनूनही लग्नाच्या वेळी हुंडा देण्याची वेळ येते. अशा मुलींनी वर पक्षाची हुंडा मागणी झुगारून दिली पाहिजे. 


जावयाचे सणवार, पहिलं बाळंतपण, येण्या-जाण्याचा खर्च या नावाखाली होणारी वधूपक्षाची लूट थांबविण्यासाठी प्रत्येक मुलीने हुंडाविरोधी क्रांती केलीच पाहिजे.आता ही वेळ आलेलीच आहे अन्यथा हे हुंड्याचे दुष्टचक्र संसारालाच गिळून टाकेल.युवक व युवतींचा हुंडाविरोधी निश्चय हाच प्रभावी उपाय आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

हुंडा एक सामाजिक समस्या मराठी निबंध । Hunda Ek Samajik Samasya Essay In Marathi

हुंडा एक सामाजिक समस्या मराठी निबंध । Hunda Ek Samajik Samasya Essay In Marathi

निबंध 1

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण हुंडा एक सामाजिक समस्या मराठी निबंध । Hunda Ek Samajik Samasya Essay In Marathi बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून 3निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. हुंडा पद्धती म्हणजे समाजातील लोभिष्ट् स्वभावाच्या  माणसाच्या  वाईट मनोवृत्तीचा आरसा  आहे. तसे तर हुंडाबळी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारा विषयीच्या बातम्या आपण वृत्तपत्र, टीव्ही व इंटरनेटच्या् माध्यमातून दररोज पाहतो. 


या निबंधामध्ये आपण याविषयी चर्चात्मक व चिंतनात्मक स्वरूपाने विश्लेषण करणार आहोत. हुंडा प्रथेबद्दल समाजाची असणारी मानसिकता व हुंडाबळी कायद्यात असलेल्या  कमतरता याविषयी सविस्तर वर्णन आपण करणार आहोत चला तर मग निबंध लेखनाला सुरुवात करुया. यामध्ये  एकूण दोन निबंध देण्यात आहे 

रस्त्यात एका घरासमोर बरीच गर्दी दिसली. आणि या गर्दीचे वैशिष्ट्य म्हणजे या गर्दीत सर्व स्त्रियाच होत्या. कुतूहलाने मी जवळ गेलो. एका प्रशस्त बंगल्यासमोर त्या निदर्शने करीत होत्या. कोणावर अन्याय घडला होता याची चौकशी करता कळले की, त्या घरातील गृहलक्ष्मीनवागत सून ही हुंडाबळी ठरली होती. त्यासाठी 'नारी समता मंचा'च्या त्या स्त्रिया त्या कुटुंबातील लोभी माणसांची छीःथू करीत होत्या. मनात विचार आला की, या आलिशान बंगल्यातील मंडळींना अधिक धनाची इतकी हाव का सूटावी? मोठया थाटामाटात विवाह करून सासरी आणलेल्या आपल्या सूनेचा बळी त्यांनी धनासाठी का घ्यावा?


आपल्या भारतात आर्थिक विषमता फार मोठ्या प्रमाणात आहे. एका बाजूला गडगंज संपत्ती असणारे भांडवलदार आहेत; तर दुसऱ्या बाजूला अन्नाची भ्रांत असणारे लक्षावधी गरीब आहेत. एका बाजूला उंच उंच आलिशान इमारती आहेत, तर दुसऱ्या बाजूला हीनदीन झोपडपट्ट्या आहेत. अशा या दोन परस्परविरोधी समाजांत एका बाबतीत मात्र साम्य आहे आणि ती बाब म्हणजे 'हुंडाबळी'.


श्रीमंतांकडे ज्याप्रमाणे हुंड्यासाठी बळी पडतात, त्याप्रमाणे गरिबांच्यातही हुंड्यामुळे खून केले जातात. हुंड्याचे हे जहर आज पिढ्यान्पिढ्या आपल्या समाजात भिनले आहे. त्यामुळे मुलगी झाली की आईवडिलांच्या काळजाचा ठोका चुकतो. मुलीला जन्म देणाऱ्या स्त्रीकडे उपेक्षेने पाहिले जाते. कित्येक गरीब घरांतून तर या हुंड्याच्या रूढीपायी कित्येक मुली अविवाहित राहतात.


Hunda Ek Samajik Samasya essay in marathi
Hunda Ek Samajik Samasya essay in marathi


आपल्याला असे वाटत होते की, जग जसे प्रगत होईल, शिक्षणाचा जसा प्रसार होईल तसा हा हुंड्याचा फास कमी होईल; पण आपली ही आशा फोल ठरलेली दिसत आहे. आज शहरांतून तरी शिक्षणाचा खूप प्रसार झाला आहे. मुली पदवीधर झाल्या आहेत. स्वतः नोकरी करून पैसे मिळवू लागल्या आहेत. तरी पण लोकांची हुंड्याची हाव काही सुटली नाही. उलट सध्या हुंडा वेगवेगळ्या स्वरूपांत समोर येतो. वरदक्षिणा, दागदागिने, मानपान, राहण्याची जागा, वाहन, टी व्ही., फ्रीज अशा विविध रूपांत हा हुंडारूपी भस्मासूर अवतरतो. जो ज्यांच्या अंगी संचारतो ते आपल्यातील माणूस हरवून बसतात आणि शेवटी त्यात नवपरिणित मुलीचा बळी घेतला जातो. 


या हुंडापद्धतीला आळा कसा घालायचा? वास्तविक १९६१ पासून आपल्याकडे हुंडाप्रतिबंधक कायदा लागू झाला आहे. पण हा कायदा अपुरा पडतो. त्यातून अनेक पळवाटा निघतात. हुंडा घेण्याचा गुन्हा करणाऱ्यांना त्या. फार सौम्य शासन आहे. म्हणून कायदयात सुधारणा करण्याचे खूप प्रयत्न चालू आहेत. पण येथे एक मोठा प्रश्न उभा राहतो की, या गोष्टी कायदयाने अमलात येतील का? 


खरे म्हणजे त्यासाठी फार मोठ्या प्रमाणात समाजप्रबोधन आवश्यक आहे. समाजपरिवर्तन व्हायला हवे, पण हे कोण करणार? काही महिला संघटना आपल्यापरीने प्रयत्न करीत आहेत. पण या प्रश्नातले एक कटू सत्य असे की, बहुसंख्य हुंडाबळी प्रकरणांमध्ये सासू, नणंद अशा स्त्रियाच कारणीभूत ठरलेल्या दिसतात. मग सांगा आता काय करावे?


निबंध 2

महत्‍वाचे मुद्दे : 
(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • एखादया प्रसंगातून प्रस्तावना
  • या दुष्ट प्रथेची परंपरा
  • 'वरदक्षिणा' 
  • 'स्त्री'ला कमी लेखणे
  • आज स्त्रीने पुरुषाची बरोबरी केली. 
  • शिक्षण, अर्थार्जन सर्व बाबतींत स्त्री पुढे
  • हुंड्याचे दुष्परिणाम
  • विवाह म्हणजे मनोमीलन

आमच्या ताईचे लग्न जमले होते. खरे पाहता, ही किती आनंदाची गोष्ट; पण मला आईबाबांच्या चेहऱ्यावर काळजीच दिसत होती. असे का? मला पडलेला हा प्रश्न मी कोणाला विचारणार? हळूहळू मला अंदाज आला की, काहीतरी पैशांची अडचण असावी. ताईच्या सासरच्या लोकांची आमच्याकडून खूप मोठ्या रकमेची अपेक्षा होती आणि त्याचेच आईबाबांना ओझे झाले होते. या प्रसंगामुळेच प्रथम माझी 'हुंडा' या शब्दाशी ओळख झाली आणि मग वरचेवर तो भयसूचक शब्द माझ्या कानी पडू लागला, वाचनात येऊ लागला.


 'हुंडा' ही आपल्या समाजातील खरोखर एक दुष्ट प्रथा आहे. या प्रथेची मुळे पुरातन काळापासून आढळतात. बहुधा हुंडा हा वरपक्ष वधूपक्षाकडून हक्क म्हणून वसूल करतो. फारच थोड्या जातींत मुलाकडून मुलीला हुंडा दिला जातो. पूर्वी या हुंड्याला 'वरदक्षिणा' या गोंडस नावाने गौरवले जात असे. आपल्या पुरुषप्रधान समाजात स्त्रीला कमी लेखले जात असे आणि या कमीपणाची भरपाई हुंड्याने केली जात असे.


आज स्त्रीने हे सिद्ध केले आहे की, ती कोणत्याही बाबतीत पुरुषापेक्षा कमी नाही. आज मुली भरपूर शिकतात. कुठलाही सुविदय पुरुष सुशिक्षित स्त्रीचीच पत्नी म्हणून निवड करतो. म्हणजे शिक्षणाचा खर्च दोघांनीही केलेला असतो.


आज बहुतेक स्त्रिया अर्थार्जन करत असतात. म्हणजे आपल्या संसाराची आर्थिक जबाबदारीही त्या उचलत असतात. त्याशिवाय घर, कुटुंब आणि अपत्ये यांसाठीही घरातील स्त्री सतत कष्ट उपसत असते. अशा परिस्थितीत तिच्या जन्मदात्यांकडून धनाची वा इतर भेटींची अपेक्षा करणे हे फार दुष्टपणाचे लक्षण आहे.
आज 'हुंडा' या दुष्ट प्रथेचे अनेक दुष्परिणाम आपल्याला अधूनमधून दिसून येतात. मुलीच्या सासरच्या लोकांकडून वारंवार अनेक मागण्या झाल्यामुळे कित्येक विवाहित मुली आत्महत्या करतात. कित्येकदा हुंड्याच्या हव्यासासाठी सुनेला जाळण्यापर्यंत सासरच्या माणसांची मजल जाते.

वरपक्षाकडून होणाऱ्या हुंड्याच्या मागणीमुळे कित्येक गरीब घरातील मुलींचे विवाहच होत नाहीत. त्यामुळे मुलीचा जन्म हा मातापित्याला संकटच वाटू लागतो. काही समाजात मुलींना जन्मतःच मारले जाते, तर काही ठिकाणी मुलीचा जन्मच नाकारला जातो. हे खरोखरच दुःखदायक आहे. खरे तर स्त्री व पुरुष हे समाजाचे दोन आधारस्तंभ आहेत, दोन पाय आहेत. एक पाय आपण कमकुवत ठेवला, तर लुळापांगळा समाज प्रगती करू शकेल काय?

खरे पाहता, हुंड्याला कायदयाने बंदी आहे, पण आपल्या समाजात कायदा गुंडाळून ठेवून अनेक पळवाटा काढल्या जातात. तेव्हा ही दुष्ट प्रथा कायदयाने बंद होणार नाही. त्यासाठी समाजप्रबोधन व्हायला हवे. प्रत्येक मुलाने व प्रत्येक मुलीने 'मी हुंडा घेणार नाही' किंवा 'मी हुंडा देणार नाही' अशी प्रतिज्ञा केली पाहिजे आणि त्यानुसार आचरणही केले पाहिजे. तरच या अनिष्ट प्रथेला कायमचा पायबंद बसेल. तो सोन्याचा दिवस लवकर येवो.

मित्र-मैत्रिणींनो तुमच्याा मते समाजाची मानसिकता बदलण्यासाठी काय उपाययोजना केली पाहीजे व हुंडा बळी कायद्यात काय आवश्यक बदल केले गेले पाहीजेत ते तुम्ही कमेंट करून सांगु शकता. तुम्हाला  हुंडा एक सामाजिक समस्या मराठी निबंध । Hunda Ek Samajik Samasya Essay In Marathi हा निबंध कसा वाटला याबद्दल तुम्ही तुमचा प्रतिसाद देऊ शकता. धन्यवाद पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 3


हुंडा एक सामाजिक समस्या मराठी निबंध । Hunda Ek Samajik Samasya Essay In Marathi



मुलींचा जन्म स्त्रीसुद्धा का नाकारते? स्त्री आणि पुरुष ही समाजरथाची दोन चाके. असे असताना स्त्रीचा जन्म का नको? एकीकडे 'मुलगा-मुलगी एक समान', अशा घोषण द्यायच्या आणि एकीकडे मुलीचा जन्म नाकारायचा. पुरुषाचा जन्म स्त्रीशिवाय संभवत नाही, 

हे सत्य समाज का नाकारत आहे? 'यत्र नार्यस्तु पूजन्ते, रमन्ते तत्र देवता।' असे म्हणायचे आणि स्त्रीचा अपमान करायचा, तिला गौण स्थान द्यायचे, अशी माणसाची वृत्ती का? या सगळ्यामागे सामाजिक अनिष्ट प्रथा आहे. ती म्हणजेच हुंडा. 

मुलीला लहानाचे मोठे करायचे, तिच्यावर उत्तम संस्कार करायचे, तिला शिक्षण द्यायचे आणि ती उपवर झाली, की तिचा बाजार मांडायचा. उत्तम स्थळ हवे? द्या हुंडा, करा खर्च. गरीब आईबाप नाही देऊ शकत हुंडा. हुंडा नाही, तर लग्न नाही. झालंच लग्न, तर सासरच्यांकडून छळ, लोभ, हव्यास यातूनच हुंड्याचा जन्म झाला. 

'माहेराहून पैसे आण. नाही आणलेस, तर तुझा जगण्याचा हक्कदेखील आम्ही नाकारू.' मग हुंडाबळी, जिवंत जाळणे किंवा आत्महत्येस प्रवृत्त करणे. अशी ही स्त्रीची विटंबना कधी थांबणार? शिक्षणाबरोबर समाजही प्रगत होईल, वैचारिक क्रांती होईल असे वाटले होते. 


हुंडा देणे व घेणे कायद्याने गुन्हा ठरविला. पण कायद्याचे पालन करतो कोण? कायद्याला पळवाटा असतातच ना? हुंडा नको? मग वरदक्षिणा द्या. मुलीचे सालंकृत कन्यादान करा. मानपान करा. मुलीला फ्लॅट देऊन घ्या. जावयाला गाडी घेऊन द्या. अशा अनेक मागण्या होऊ लागल्या. 

याशिवाय लग्नाचा दोन्ही बाजूंचा खर्च वधुपित्यानेच उचलायचा. आपली मुलगी सुखी राहावी, तिला सासरच्यांची उणी-दुणी ऐकायला लागू नयेत; म्हणून काही वधूचे माता-पिता आपण होऊन न झेपणारा खर्च करतात. मग आपापसांत चढाओढ लागते. 'अमक्याचा मुलगा एवढा काही शिकलेला नाही. 

पगारही बेताचाच; पण सासुरवाडी बघा केवढी मालदार मिळालीय!' यातून इतरांना चेवच चढतो. अशा वेळी वाटते, कायद्याची नाही; समाज-प्रबोधनाची गरज अधिक आहे. त्यासाठी मुलानीच ज्ञा केली पाहिजे   'मी हुंडा घेणार नाही.' मुलींनी प्रतिज्ञा केली पाहिजे  'हंडा घेणाऱ्या मुलाशी लग्न करणार नाही.' हुंडा या प्रकाराशी स्त्रीच संबंधित असते.

सासू, नणंद, जाऊ अशा मंडळींचे नाव हुंडाबळी प्रकरणात असते. १९६१ साली हुंडा प्रतिबंधक कायदा' झाला; पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. या गुन्ह्यासाठी शिक्षादेखील सौम्य आहे. याबाबत सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे. अशा गोष्टी कायद्यापेक्षा माणुसकीच्या नात्याने, परस्परांच्या सहकार्याने आणि समंजसपणाने सोडविला पाहिजे.

आज मुलीदेखील उच्चशिक्षित असतात, लठ्ठ पगाराची नोकरी करत असतात, तरीही त्यांना हुंडा द्यावा लागतो. पण जी मुलगी लग्नाआधी नोकरी करत नाही, तिने कुठून आणायचे हुंड्यासाठी पैसे? प्रत्येक स्त्री संसाररथ ओढताना मोलाचा हातभार लावतच असते. 


तरीही सासरच्या अडी-अडचणीच्या वेळी सुनेने माहेरहून पैसे आणावेत, ही अपेक्षा का? प्रश्न अनेक आहेत; पण त्यांवर उत्तरे नाहीत. ऐपत असो अथवा नसो, तुम्ही काय वाट्टेल ते करा; 

पण मुलगी उजवायचीय ना मग द्या हुंडा, कधी उघडणार समाजाचे डोळे ? कधी संपुष्टात येणार ही हुंड्याची अनिष्ट प्रथा? या समाजाला सुबुद्धी होईल तेव्हा.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 4


हुंडा एक सामाजिक समस्या मराठी निबंध । Hunda Ek Samajik Samasya Essay In Marathi


"चला रूढीवर आता घसरा टाकूनि सीमा मृतधर्माच्या दंभाच्या या अंधपणाच्या जुनेपणाच्या, अहंपणाच्यासीमोल्लंघनकालचि दसरा" कविवर्य गोविंदाग्रज यांनी घातक रूढींचे उल्लंघन हेच खरे सीमाउल्लंघन आहे. असे सूचित केले आहे. 


काही अनावश्यक व वाईट रूढींचा अस्त व्हायलाच हवा. तरच नवविचारांचा सूर्य उदयास येईल. हुंडा एक जीवघेणी प्रथा आहे.महात्मा फुले, राजाराम मोहनरॉय , महर्षी कर्वे यांनी अनिष्ट रूढींचा नाश होण्यासाठी प्रयत्न केले.



कारण विशिष्ट चौकटीत मानवाला बंदिस्त करणाऱ्या या रूढीमुळे संस्कृती संस्कृती, समजा-समाज यामध्ये तणाव सुरू झाले. समाजात एकेरीपणा आला आहे.प्रेमाचा, भावनेचा चुराडा होत आहे. हुंड्याने 'मी पण' हरवलेली व्यक्ती आक्रोश करतांना दिसते. 



माणुसकी हिरावून घेणाऱ्या या रूढीविरूद्ध प्रत्येक तरूणाने बंड पुकारले पाहिजे. या रूढीला नाकारण्याची शक्ती प्रत्येक तरूणात हवी. आर्थिक विषमतेने श्रीमंत व गरीब असे वर्ग निर्माण केले.या दोन्ही वर्गात. या दोन्ही वर्गात आर्थिक विषमता आहे पण 'हुंडाबळी' च्या बाबतीत या दोन्ही वर्गात समानता आहे.


श्रीमंत आणि गरीब दोघांच्याही घरी हुंडाबळीचा आक्रोश निनादत आहे. १९६१ पासून हुंडाप्रतिबंधक कायदा लागू झालेला आहे पण त्यातील शासन फार सौम्य आहे, त्यात अनेक पळवाटा आहेत. म्हणून हा कायदा अपुरा पडत आहे. 'मलगी नको या भावनेचा जन्म होत आहे.


गर्भपात , गर्भलिंगनिदान याचे प्रमाण वाढले आहे मलीचा गर्भ असेल तर जगात येण्यापूर्वीच तिला संपविले जात आहे. हुंड्याच्या यक्षप्रश्नाम अनेक मुली अविवाहित आहेत. अनेक मुली बळी पडल्या आहेत.


हा यक्षप्रश्न सोडविण्यासाठी समाजप्रबोधनाची आवश्यकता आहे.नुसता कायदा सुधारून हे काम होणारे नाही. समाजपरिवर्तन झालेच पाहिजे ही सर्वांची सामाजिक आवश्यकता आहे.तरच या रूढीचा अस्त व नवविचारांचा उदय शक्य आहे.शिक्षणाबरोबर हुंडा कमी होईल ही आशा फोल ठरली आहे.


मुली पदवीधर झाल्या, नोकरीस लागल्या, तरी हुंडा आहेच.मानपान, दागिने, टि.व्ही. गाडी या रूपाने हुंड्याने उग्र रूप धारण केले आहे. वर्तमानपत्रात हुंडाबळीच्या बातम्या रोजच वाचावयास मिळतात. हुंड्यामुळे खून , आत्महत्या असे प्रकार घडतात.


सृष्टीची धारणा स्त्रीमुळे होते. तिला प्रेम द्या, विश्वास द्या, तिच्या भावना समजवून घ्या. ती सबला आहे,शक्ती आहे, जन्मदात्री आहे. तिची कदर करा.पैशाच्या लोभापायी, हुंड्याच्या उच्च विचाराची, समजुतदार असेल तर संसाराचा गाडाच काय, समाज व देशाच्या कल्याणासाठी ती प्रयत्नांच्या रथाची उत्तम सारथी बनून दाखवील. 


हुंड्यामुळे ज्या स्त्रीचा बळी जातो, तिच्या लहान मुलांचे जीवनही उद्ध्वस्त होते. संस्कृतीला लागलेला हा कलंक घालविण्यासाठी प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. हुंडासमस्याप्रधान चित्रपटे व नाटके , युवामंच , नारीअत्याचार विरोधी मंच या सर्वांबरोबर 'मी हुंडा घेणार नाही' हा प्रत्येक तरुणाचा निर्धार महत्त्वाचा आहे. 



हुंड्याच्या मोजकाट्याने लग्नमंडपात वराने आपली प्रतिष्ठा का मोजून घ्यावी? वधूच्या गळ्यात मंगळसूत्र की गळफास बांधला जात आहे? या गोष्टी क्षुल्लक नाहीत . एक स्त्री हुंडाबळी ठरते त्यामागे दोन कुटुंबे, दोन परिवार, सर्व आप्तेष्ट, तिची अपत्ये या सर्वांची खूप हानी होते. 



एक दुष्ट चक्र सुरू होते.कोर्ट, कचेऱ्या, शिक्षा, मानहानी या चक्रव्यूहात मग बाकीचेही अडकले जातात.शेवटी माणसासाठी नियम हवेत, नियमासाठी माणूस नको'. जी कृत्ये उजेडात करायला लाज वाटते, ती अंधारातही करायला नकोत. 



समाजाला उन्नत करण्यासाठी घातक प्रथांची होळी करायलाच हवी.नाही तर रोज एक 'मंजुश्री सारडा' बळी जात राहील.हुंडा मानवाला गिळेल.

“ 'लक्ष्मी' साठी 'लक्ष्मी'ला मारलेस

हुंड्यासाठी काय रे केलेस? 

हा लोभ लागेल हात धुऊन तुझ्याच मागे

माणसा, माणसा का रे असे केलेस? 

सुंदर संसार फुलविण्याऐवजी संहार का केलास?

आज दूर गेल्या सुखाच्या वाटा अन्

तुझ्या गळा अटकला फास......." 

असे शब्द माझ्या अंतरंगातून उमटतात. मन खूप व्यथित होत.खरं तर एक चांगली सहचारिणी मिळणे ही खूप भाग्याची गोष्ट आहे. योगायोगाने तसं मिळालं तर संसार फुलतो, खुलतो.पैसा काय आज आहे उद्या नाही.नसेल तर तो कमविता येतो.पण एकदा मोहापायी व्यक्ती गमावली तर ती परत मिळविता येत नाही. 


शिक्षण घेऊन जर तुमचे मन प्रगल्भ होत नसेल तर अशिक्षित राहिलेलेच बरे. प्रत्येक तरुणाने मनापासून ह्या सर्व बाबींचा विचार केला पाहिजे. जन्मभर साथ देणारी चांगली सहचारिणी मिळावी म्हणून प्रयत्न केला पाहिजे . 


वीस वर्षे जपलेले माहेर सोडून सर्वस्व द्यायला जी लक्ष्मी तुमच्या दारी येते तिचे स्वागत करा , प्रेमाने तिला जिंका, मग बघा सुख कस दारी लोळण घेतं ते! पैशाचा , हुंड्याचा हव्यास सोडून समाधानी जगा. नुसत्या शपथा नकोत कृती करा. कविवर्य केशवसुतांच्या शब्दात


"जुने जाऊ द्या मरणालागूनि 

जाळूनि किंवा पुरूनि टाका

सडत न एका ठायी ठाका

सावध! ऐका पुढल्या हाका....

हल्ली महाराष्ट्रात हुंडा प्रतिबंधक अधिनियमानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना हुंडा न घेतल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.इंजिनिअर, डॉक्टर बनूनही लग्नाच्या वेळी हुंडा देण्याची वेळ येते. अशा मुलींनी वर पक्षाची हुंडा मागणी झुगारून दिली पाहिजे. 


जावयाचे सणवार, पहिलं बाळंतपण, येण्या-जाण्याचा खर्च या नावाखाली होणारी वधूपक्षाची लूट थांबविण्यासाठी प्रत्येक मुलीने हुंडाविरोधी क्रांती केलीच पाहिजे.आता ही वेळ आलेलीच आहे अन्यथा हे हुंड्याचे दुष्टचक्र संसारालाच गिळून टाकेल.युवक व युवतींचा हुंडाविरोधी निश्चय हाच प्रभावी उपाय आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद