बर्ड फ्लू मराठी निबंध | bird flu marathi nibandh

 बर्ड फ्लू  मराठी निबंध | bird flu marathi nibandh


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण बर्ड फ्लू  मराठी निबंध मराठी निबंध बघणार आहोत. संपूर्ण जगात १६ आणि आशिया खंडात किमान ११ देशात बर्डफ्लूच्या दहशतीने थैमान घातले आहे.


सन २००६ मध्ये या रोगाने भारतात तेही महाराष्ट्रातल्या नंदूरबार आणि जळगाव जिल्ह्यात डोके वर काढले आहे. आत्तापर्यंत किमान दोनशे दशलक्ष कोंबड्यांचा बळी घेणाऱ्या या रोगाने पोल्ट्री व्यवसायाचा कणाच मोडला आहे


भारताचा ३४-३५ हजार कोटीचा व्यवसाय त्यावर अवलंबून असणारे १० लाख रोजगार या रोगाच्या दहशतीखाली आहेत. इनफ्लुएन्झा 16N प्रकार 9N उपप्रकार या गटातील H5 N1 हे विषाणू या रोगास कारणीभूत असून आतापर्यंत लाखो कोंबड्यांचा बळी घेण्यास कारणीभूत आहे. शास्त्रज्ञांच्या शोधानुसार आजवर हा रोग पक्ष्यांपासून माणसात पसरत आहे. 


माणसाकडून माणसाकडे याचा प्रादूर्भाव झालेला नाही; असे घडलेच तर जगातील २५% मानवी जीवन यांच्या संसर्गाने नाश पावेल, सरकार, सामाजिक संस्था, उद्योगसंस्था कितीही जनजागृती, योजना राबवत असले तरी लोकांच्या मनातील भीती घालवू शकलेले नाहीत.



चिकन, अंडी यांचे भाव ८० टक्क्यांनी उतरले आहेत. चिकन प्रेमी लोक चिकनला बघायलासुद्धा तयार नाहीत. मोठ-मोठी राजकीय मंडळी, सिनेस्टार, खेळाडू, चिकन फेस्टीव्हलमधील पोल्ट्री संस्था बर्डफ्लूची दहशत घालविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. 



या विषाणूंचा संसर्ग मुख्यत: स्थलांतरीत पक्ष्यांकडून होतो. पोल्ट्री व्यवसायातील गलथान कारभार अयोग्य साफसफाई यांच्यामुळे याचा प्रादुर्भाव वेगाने झाला आहे. त्यासाठी राज्य शासनाने त्या-त्या प्रभावित क्षेत्राला सील करून त्या क्षेत्रात पोल्ट्री वाहतुकीला प्रतिरोधीत केले आहे.


बाधीत पक्ष्यांना मारून पुरले जात आहे. माणसाला संसर्ग होऊ नये यासाठी दक्षता समित्या नेमण्यात आल्या आहेत. खबरदारी म्हणून प्रत्येक महानगरपालिकांनी समन्स जारी केले आहेत. यात रोगांचा संसर्ग होण्यापासून वाचवण्याकरिता वेगवेगळे उपाय दिले आहेत. 


यामध्ये चिकन, अंडी खाताना ७०° पर्यंत शिजवून खाणे, बाधीत व्यक्तिला स्थलांतरावर बंदी घालणे, कोंबड्या पाळण्याच्या छंदावर आवर घालण्यास सागितल कृषिव्यवसायाला पूरक अशा कुक्कुटपालनाला या रोगामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.


हा व्यवसाय करणाऱ्या लाखो लोकांना आपले पक्षी मारावे लागत आहेत. चिकन व अंड्याची मागणीच नसल्यान मोठ-मोठी हॉटेल्स, बेकरी उद्योग, मांसविक्री करणारे दुकाने ओस पडली आहेत.



कोंबड्या पाळण्यासाठी साधारणत: एका कोंबडीला ४० ते ५० रुपये खर्च होतो पण सरकार प्रत्येकी २० रुपयेच भाव देऊन कोंबड्यांची विल्हेवाट लावत आहेत. पोल्ट्री उद्योग करणारे कर्जबाजारी झाले आहेत. यामुळे आहे त्या कोंबड्यांना पोसणे त्यांना परवडणारे नाही म्हणून ते स्वत: कोंबड्यांना मारून पुरत आहेत.



वेगवेगळ्या देशात होणारी चिकनची निर्यात थांबली आहे, त्या देशांनी रोगाच्या दहशतीने निर्यातीवर बंदी घातली आहे. केवळ एका महिन्यात यामुळे सहाशे कोटीचे नुकसान झाले. केवळ एक ग्रॅम संसर्गित पक्ष्यांच्या विष्ठमुळे दहा लाख पक्ष्यांना याची लागण होऊ शकते.



भारतातच नव्हे थायलंड, चीन, मलेशिया, इंडोनेशिया, जपान आदी देशांत या रोगाने आपली दहशत बसवली आहे. फ्लू सदृश्य या रोगांच्या दहशतीने लाखो लोकांवर बेरोजगार होण्याची पाळी आली आहे. सुदैवाने भारतात आत्तापर्यंत एकही माणसाला या रोगाची लागण झालेली नाही पण नजिकच्या काळात योग्य खबरदारी न घेतल्यास याचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. 


कुक्कुटपालन करणाऱ्यांनी स्वच्छतेची पक्ष्यांना योग्य प्रकारे लसीकरणाची सोय केल्यास या रोगाला प्रतिरोधीत केले जाऊ शकत शकते. कोंबड्यांची योग्य प्रकारे हाताळणी करून त्यांच्या विष्ठेची योग्य सोय लावावी. बाधित कोंबड्यापासून दुसऱ्या कोंबड्यांच्या संपर्कात येऊ देऊ नये. 



कोंबड्या हाताळताना, हात, तोंड, डोळे, इतर त्वचेच्या उघड्या भागाशी पक्ष्यांचा संपर्क टाळावा. लोकांना बर्ड-फ्लूच्या या संकटातून बाहेर काढण्यासाठी योग्य व त्वरीत उपाययोजना करणे गरजेचे आहे. जेणेकरून पोल्ट्री व्यवसाय पुन्हा एकदा उभारी घेऊ शकेल.



उपचारापूर्वीच प्रतिबंधाची काळजी घेतल्यास बर्डफ्लूचे भूत लोकांच्या मनातून उतरून लाखो बेरोजगारांचे रोजगार त्यांच्या हाताशी येतील व सामान्य लोक चिकन अंड्यांचा आस्वाद पूर्वीप्रमाणेच घेऊ शकतील. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 2


बर्ड फ्लू  मराठी निबंध | bird flu marathi nibandh


बर्ड फ्लू ! हे नाव आपल्याला चांगले परिचित झाले आहे. हे नाव दिसायला जरी साधे वाटत असले तरी प्रत्यक्षात मात्र ते एक गूढच आहे. महाराष्ट्रात प्रथम 'नवापूर या ठिकाणापासून जरी याची सुरुवात झाली असे असले तरी ते काही तेथून उगम पावलेले नाही. 


'बर्ड फ्लू' हे नाव १९९५ पासूनच या पृथ्वीतलावर वावरत आहे. मुख्यत्वे हा एक प्रकारचा तापच आहे, पण तो पक्ष्यांशी विशेषत: कोंबड्यांशी निगडित असल्यामुळे त्याला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे. जणू एक प्रकारची दहशतच निर्माण केली आहे या रोगाने !



आपल्याला माहितीच आहे की संपूर्ण भारतभर जवळपास ३५००० कोटी कुक्कुटपालन क्षेत्रे आहेत. त्यामधून जवळपास ३० लाख लोकांना रोजगार मिळत आहे. या कुक्कुटपालन व्यवसायापासून देशाला जवळपास १ कोटी चिकन व ११ कोटी अंडी मिळतात. 



भविष्यकाळात या व्यवसायाचे सुमारे ६५० कोटी रुपये उत्पन्नापासून २००० कोटी रुपये उत्पन्नापर्यंत वाढ होणारी होती. एकंदरीत या 'बर्ड फ्लू' नावाच्या रोगाने फक्त भारतच नव्हे तर संपूर्ण हादरून टाकले आहे.



'बर्ड फ्लू' या नावामुळे प्रकाशझोतात आलेले 'नवापूर' हे ठिकाण आपल्याला नवीन असेल पण जगाला नव्हे. 'बर्ड फ्लू'ची प्रथम लागण १९९५ च्या काळात आग्नेय आशियात झाली. तेव्हापासून या रोगासाठीचे उपचार शोधणे सुरू आहे पण ते अचानकपणे 'नवापूर सारख्या ठिकाणी उद्भवेल असा कुणाचाच अंदाज नसेल.



बड हा एक विषाणूजन्य रोग आहे हे आपणास परिचित आहेत. सर्व प्रकारचे 'फ्लू' हा रोग म्हणजेच 'ताप, हा राग अनक विषाणूपासून होतो. त्याचे भरपूर प्रकारचे संसर्ग होतात. उपचार ही आहेत, पण 'बर्ड फ्लू' हा रोग काही औरच आहे, याच कारण असे आहे की, हा रोग ज्या विषाणूंपासून होतो. 


त्याच्या बऱ्याच अशा जाती किंवा प्रकार आहेत. पण यापका HSNI हाच एक जात म्हणजे, हा विषाणू फार कार्यक्षम आहे. हा विषाणू जेथे जेथे प्रवेश करतो, तेथे त्याची रूप बदलून जातात.याचा अर्थ त्याची रुपे बदलत जातात. 



जर एखाद्या पक्ष्यात किंवा कोंबडीत हा रोग असेल आणि तो विवाणू जर कुण्या माणसाच्या संसर्गात आला तर त्याचे रूप बदलून जाते. याचा अर्थ असा की, जेव्हा तो कोंबडीकडून माणसात प्रवश करतो तेव्हा तो सरळ सरळ आपल्या शरीरातील 'DNA' वर प्रभाव पाडतो. त्यामुळे या विषाणूचे रूप हमा बदलत राहत. जर 'A' ना B, तर 'C' अशा नवीनच प्रकारचा जन्म होतो. त्यामुळे त्यावर उपचार पद्धती शोधण्यात फार अडचण आहे.



बर्ड फ्लू या रोगाचे सुरुवातीच्या काळात 'थायलंड, चीन' या देशात विषाणू आढळले. जरी या विभागात आढळले तशत पृथ्वावर इतरत्रही आहेतच पण याचा प्रसार हा विशेषत: स्थलांतरीत पक्ष्यांद्वारे होतो असे निष्कर्ष आढळून आले आहेत.


एक महत्त्वाची बाब अशी की काही शास्त्रज्ञांच्या मते हा विषाणू पृथ्वीवरील नसून काही धूमकेतूंच्या किंवा उल्कांच्या गावरील आहे जो भमण म्हणजे परिभ्रमण करता करता पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या संपर्कात आल्यामुळे त्याचे पृथ्वीवर आगमन झाले. अर्थातच या आगमनाचे फार बिकट परिस्थितीत रूपांतर झाले आहे.



या विषाणूची लागण ही संसर्गजन्य असल्यामुळे 'बर्ड फ्लू' बाधित कोंबड्यांच्या संपर्कात राहणारी व्यक्ती फार सहजपणे ससागत होऊ शकते. याचे प्रमुख माध्यम म्हणजे कोंबड्यांची पिसे किंवा पिसांखालील त्वचा व विष्ण ! हे दोनच फार प्रभावी माध्यमे आहेत. 



एकवेळ या रोगाची लागण झाल्यास त्यावर रामबाण असा कोणताच उपचार नाही. या रोगाने फार मोठ्या प्रमाणात दहशत पसरवली आहे. एकवेळ दहशतवाद्यांचा जेवढा प्रभाव नाही तेवढा या चिमुकल्या विषाणूने संपूर्ण जगावर प्रभाव पाडला आहे. त्यामुळे सुमारे ६५० कोटी (जवळपास 150 Bilian) चा रुपयाचे उत्पन्नावर फार मोठे सावट उदभवले आहे.


भारतात आंध्र प्रदेश हे राज्य कुक्कुटपालनात अग्रेसर असूनसुद्धा त्या ठिकाणी याची लागण न होणे हे तेथील शासन आपल्याकडील शासनाकडील व्यवस्थेपेक्षा चांगले आहे असे दिसते. यासाठी प्रतिबंधात्मक उपचार आहेत पण आपल्या शासनाने कधी त्याचे महत्त्व लक्षात घेतले नाही. 


 'बर्ड फ्लू'चा संसर्ग होण्यासाठी कोंबड्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात येणे हेच प्रमुख माध्यम नसून खाण्यातून याचा सर्वात जास्त संसर्ग होतो.



प्रयोगशाळेत झालेल्या निष्कर्षामुळे असे निष्पन्न झाले आहे की हा विषाणू ६०-७०°च्या वातावरणात जगू शकत नाही. सगळीकडे याचा प्रसार केलेला दिसतोच की चिकन ७०° पर्यंत शिजवूनच खावे, अन्यथा टाळावे. या रोगाची दहशत एवढी प्रचंड प्रमाणात झाली आहे की काही लोक मांसाहारीहून शाकाहारी बनले आहेत आणि शाकाहारी लोकांचा तर मांसाहाराला राम-रामच आहे !



या रोगामुळे एवढी बिकट स्थिती उद्भवली आहे की जवळपास १०००२००० कुक्कुटपालनांच्या कोंबड्यांना पुरून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एक सर्वात मोठी बाब अशी की यामुळे माणसे कुक्कुटपालनाभोवती किंवा त्या परिसरातसुद्धा दूरपर्यंत वावरत नाहीत. 


नवापूरपासून जवळपास २०० कि. मी. क्षेत्रापर्यंत धोक्याचा ईशारा देण्यात आला असून यामुळे कोंबड्यांचे हाल होत आहेत. एवढी बिकट स्थिती उद्भवली आहे की भुकीमुळे कोंबड्याचं एकमेकांना चोचीने मारून एकमेकांना आपले उदरनिर्वाहाचे साधन मानून त्यावर हल्ला चढवीत आहेत. 


अर्थातच हे सगळे कुठे ना कुठे थांबले पाहिजेच. पण कुठे ? आता तरी प्रसार माध्यमांमुळे मांसाहारात वाढ होत आहे पण असा काही काळ तरी वाट पाहावी लागणार की चिकन किंवा अंडी यांच्याकडून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होईल या सर्वांवर शासनाकडून जे सहकार्य मिळत आहे ते अर्थातच कमी प्रमाणात आहे. 



यामुळे शेवटी मृत्यू ओढवतो. या विचारानेच आपले मन छिन्नविछिन्न होऊन जाते. त्यामुळे आपण फक्त वाट पाहायची ! अर्थातच ही जबाबदारी शासनावर आहे. त्यामुळे ओढावलेली स्थिती बदलून परत ६५० कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न केव्हा जाईल हे देवालाच ठाऊक. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद