आपला आपण करावा उद्धार मराठी निबंध | AAPLA AAPAN KRAVA UDHHDAR MARATHI NIBANDH
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आपला आपण करावा उद्धार मराठी निबंध बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून 3 निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता.
मुद्दे : भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश –
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार -
परावलंबीपणा
नको-आधाराची अपेक्षा नको
चराति चरतो भग विवेक हवा
परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी हवी
शिवरायांचा आदर्श
ऐकावे जनांचे करावे मनाचे.
प्रत्यक्ष भगवंत श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला आहे. भगवान सांगतात, 'आपला आपण उद्धार करावा, आपणच आपला घात करू नये. आपण स्वतःच स्वतःचे मित्र आहोत, स्वत:च स्वतःचे शत्रू आहोत.'
भगवंताचा हा उपदेश प्रत्येक व्यक्तीने शिरोधार्य मानायला हवा. म्हणूनच, 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' ही उक्ती आपण कायम मनात बाळगली पाहिजे. पण नेमके हेच आपण विसरतो आणि सदैव दुसऱ्याच्या मदतीची अपेक्षा करतो, दुसऱ्याच्या आधारासाठी आसुसतो.
त्याचे कारण म्हणजे बालपणी लागलेली परावलंबित्वाची सवय! लहानपणी माणसाचे अपत्य हे पराधीन असते; पण तीच सवय त्याला कायमची लागते आणि मग तो मानू लागतो की, दुसऱ्यांच्या मदतीशिवाय मी यश संपादन करू शकतच नाही.
अशा व्यक्तीला मग कुणाची मदत मिळाली नाही तर ती व्यक्ती अगतिक होते आणि नशिबाला दोष देत राहते. मग यश तिच्यापासून दूर पळते. 'चराति चरतो भगः' जो चालतो; म्हणजे जो प्रयत्न करतो, तोच यशस्वी होतो; त्याचे भाग्य त्याच्याबरोबर चालते.
आपण लहानपणी सायकल चालवायला शिकतो, तेव्हा आपण दुसऱ्याला आपली सायकल धरायला सांगतो. पण जेव्हा आपण दुसऱ्याला मागे टाकून धीर करून स्वत: सायकल चालवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच आपणाला सायकल चालवता येऊ लागते.
आपण विवेकाने वागले पाहिजे.काळानुरूप स्वतःला बदलले पाहिजे. परिस्थितीला सामोरे जाण्याची आपली तयारी ठेवली पाहिजे. योग्य संधीचा फायदा घेतला पाहिजे आणि आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखवून यशाचे शिखर गाठले पाहिजे.
यासाठी आपल्यासमोर आदर्श हवा शिवरायांचा ! कोणाचाही आधार नसताना त्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते त्यांनी स्वकर्तृत्वाने साकार केले. 'ऐकावे जनांचे, करावे मनाचे.' सर्वांचा सल्ला ऐकावा; पण शेवटी आपण स्वतःच विचार करून आपला आपणच उद्धार मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
निबंध 2
आपला आपण करावा उद्धार मराठी निबंध | AAPLA AAPAN KRAVA UDHHDAR MARATHI NIBANDH
God helps those who help themselves. जे लोक स्वतः प्रयत्न करतात त्यांनाच परमेश्वर मदत करतो असं म्हणतात. आता बघा, परीक्षेत चांगले गुण मिळवून पास व्हायचं आहे, त्यासाठी देवाची नुसती प्रार्थना करून चालेल का? स्वत:च प्रयत्न केले पाहिजेत. अभ्यास केला पाहिजे. तरच यश मिळणार.
न ऋते श्रान्तस्य सख्याय देवाः! पिढीजात श्रीमंती फार थोड्या लोकांना लाभते. परंतु शिक्षणाच्या साहाय्याने नोकरी मिळवून गरिबीचा शापही नष्ट करता येतो. संसारात तर संकटे गुपचुप येऊन उभी असतातच. त्या संकटांना घाबरून कसे चालेल? संकटातच माणसाची खरी परीक्षा होते.
देशाला स्वातंत्र्य इंग्रजांनी सुखासुखी दिलं नाही. तर अनेक देशभक्तांनी स्वप्रयत्नाने, स्वार्थत्यागाने, आत्मबलिदानाने स्वातंत्र्य मिळवलं. स्वत:चा व देशाचा उद्धार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरही म्हणतात, 'दुसरा आपल्या उद्धारार्थ धावून येईल अशी आशा बाळगू नका.