एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ मराठी निबंध. | Marathi essay ekmeka sahya karu avghe dharu supanth
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ मराठी निबंध बघणार आहोत.या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता.त्या खेडेगावाबद्दल मला फार आश्चर्य वाटले. कारण त्या गरीब खेडेगावातील लोकांचा धंदा शेती असन सर्व खेड्यात मिळून फक्त एकच बैलजोडी आहे. लोक गरीब आहेत.
सर्वांना बैलजोडी घेणं परवडणार नव्हतं. मग सर्वांनी पैसे जमा केले. एक बैलजोडी खरेदी केली व क्रमाक्रमाने एकमेकांच्या सोयीनं, सहकारानं ते शेतीची कामे पार पाडतात. खरंच कौतुक करण्यासारखीच ही गोष्ट नाही का?
एकमेकांना सहकार्य करण्याची भारताची परंपराच आहे. प्राचीन काळी भारतातील खेडी स्वयंपूर्ण होती. एकमेकांच्या सहकार्याने खेड्यातील सर्वांच्या सर्व गरजा पूर्ण केल्या जायच्या. आजही सहकार्याशिवाय कोणतीही गोष्ट घडत नाही.
एखादे घर चांगले चालायचे असले, शाळा चांगली चालायला हवी असेल, एखाद्या संस्थेचा, कंपनीचा, कारखान्याचा कारभार चांगला चालावा असे वाटत असेल, तर एकट्यानं चांगलं काम करून काहीही होत नाही. एकमेकांच्या साह्याशिवाय कोणतीच गोष्ट होऊ शकत नाही. एकटा कॉन्ट्रॅक्टर इमारती बांधू शकत
नाही किंवा एकटा इंजिनिअर मोठमोठ्या पुलांचं बांधकाम करू शकत नाही. म्हणून आपल्याला जे काम करणं शक्य आहे ते काम मनुष्यानं आपल्या कुवतीप्रमाणं केलं पाहिजे, दुसऱ्याला त्याच्या कामात मदत केली पाहिजे, हाच मानवाच्या जीवनातील सन्मार्ग होय.
दुसऱ्याच्या कामात विघ्न उत्पन्न करणारी विघ्नसंतोषी वृत्ती काय कामाची? त्यामुळे आपलाही फायदा नाही. दुसऱ्याचे नुकसान करण्यात कसला शहाणपणा? समाजातील सर्वांनीच एकमेकांच्या अडचणीच्या वेळी, गरजेच्या वेळी एकमेकांना सहाय्य केलं तरच सर्वांचा फायदा होईल. हाच सुपंथ होय.
कोल्हापरच्या राजर्षी छत्रपती शाह महाराजांनीही या सहकाराचे महत्त्व ओळखले होते. 'शेती व उद्योग दोन्ही क्षेत्रांत सहकाराचा अवलंब केला तरच आपला विकास होऊ शकेल,' असे त्यांनी स्पष्टपणे बजावले. तसेच 'भांडवलदारांच्या मर्जीवर, स्वार्थबुद्धीवर व न्यायबुद्धीवर काम करणाऱ्या हजारो लोकांचे जीवित अवलंबून राहते,
ही स्थिती बरोबर नाही,' असेही त्यांनी सांगितले. तसेच पश्चिमेच्या धर्तीवर सर्वस्वी चालणारे कारखाने आमच्या देशात यशस्वी होणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. 'आपली सहकार पतपेढी काढा,' असा सल्लाही त्यांनी दिला.
'सहकार चळवळ' माणसांच्या अनेक समस्या सोडवू शकते. म्हणूनच नामदार गोखले, धनंजयराव गाडगीळ यांनी या चळवळीचा प्रसार केला. प्रवरानगर येथे विठ्ठलराव विखे पाटील यांनी काढलेला साखर कारखाना सहकाराच्या तत्त्वाचे उत्तम उदाहरण आहे.
आज शहरात व ग्रामीण विभागातही या चळवळीचे महत्त्व फार वाढले आहे. घरे बांधण्याची समस्या असो किंवा दुधाचा प्रश्न असो किंवा स्वस्त व चांगल्या दर्जाच्या अन्नधान्याचा प्रश्न असो; सहकारी तत्त्वातून, चळवळीद्वारे ही समस्या सोडवता येते.
आज सर्व लघुउद्योग, ग्रामीण उद्योग सहकारी तत्त्वावर आधारित असतील तर त्यांना शासनाचे कर्ज मिळू शकते. सहकारातून मोठमोठया महाविद्यालयांची, दवाखान्यांची, कारखान्यांची, उद्योगधंद्याची उभारणी होत असते.
देश स्वतंत्र करण्यासाठी महात्मा गांधी, लो. टिळक यांना जनतेचा 'सहकार' होता. स्वराज्य स्थापन करण्यासाठी शिवाजी महाराजांनी मावळ्यांचे, तर सेतू बांधण्यासाठी श्रीरामप्रभुंनी वानरांचे साहा घेतले. आजही आर्थिक साहाय्य, यंत्रसामुग्री, तंत्रज्ञान, अनधान्य इ. बाबतीत महाराष्ट्रात सहकार्याचा हात पुढे केला जातो.
त्यामुळेच आज खेड्यांची, शहरांची व समाजाची प्रगती झपाट्याने होत आहे. हे काम नव्हे तव एकट्याचे! येथे सहकार्य हवे सर्वांचे! मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद