कल्पनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कल्पनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मी कल्पवृक्षाखाली बसतो तेव्हा मराठी निबंध | mi kalpvrushakhali basto tevha essay in marathi

मी कल्पवृक्षाखाली बसतो तेव्हा मराठी निबंध | mi kalpvrushakhali basto tevhaessay in marathi : विदयापीठाच्या वनस्पतिविभागाने भरविलेले ते एक प्रदर्शन होते. विश्वातील सर्व वृक्षवेलींची ओळख आपण या प्रदर्शनात करून दिली आहे, असा प्रदर्शन-नियोजकांचा दावा होता. म्हणून मी पुनः पुन्हा फिरून ते प्रदर्शन पाहत होतो. शेवटी एका संयोजकाचे लक्ष माझ्याकडे गेले आणि त्याने मला विचारले, “आपणाला काय हवे आहे?"


मी मुळातच गोंधळलेलो होतो त्यात या प्रश्नाने अधिकच भर पडली आणि मी त्याला सांगितले, “मला कल्पवृक्ष हवा आहे, मला कल्पवृक्षाखाली बसायचे आहे." क्षणभर तो व्यवस्थापक गोंधळला; पण तो बराच चलाख असावा. लगेच सावरून तो म्हणाला, "चला, मी तुम्हांला कल्पवृक्ष दाखवतो." मग आम्ही दोघेजण त्या प्रदर्शनाच्या दुसऱ्या टोकाला गेलो. तेथे लोकांची गर्दी मुळीच नव्हती. अगदी कडेला एक बुटकेसे डेरेदार झाड होते, त्याकडे बोट दाखवून तो म्हणाला, “हा पाहा कल्पवृक्ष. आता तुम्ही याचे निरीक्षण करा. मी येतो हं, मला दुसरे काम आहे."
mi kalpvrushakhali basto tevha essay in marathi
mi kalpvrushakhali basto tevha essay in marathi


त्या निर्जन भागात आता मी एकटाच होतो. दूरवर माणसांचे आवाज ऐकू येत होते; पण मी होतो त्या भागात माणसांचीच काय ; पण पक्ष्यांचीही चाहूल ऐकू येत नव्हती. त्या क्षणी मला हसू आले. या सर्वांना या कल्पवृक्षाची व त्याच्या सामर्थ्याची कल्पना नसावी बहुतेक. असे वाटले आणि मी विचार केला-चला, आपण तरी आपली अनेक वर्षांची मनीषा पूर्ण करून घ्यावी. झाड जरा खालच्या बाजूला होते, तेव्हा तेथे उतरून झाडाखाली बसावे असे मी ठरविले. म्हणून मी थोडे खाली उतरलो. पण तेवढ्यात मनात आले की प्रथम आपण हे निश्चित करू या, की कल्पवृक्षाखाली बसून काय मागायचे?


हो, उगाचच काही चुकीचे मागितले तर शेवटी आपल्यालाच पश्चात्ताप करायची वेळ यायची. तेव्हा आधी पूर्ण विचार करून ठरवावे आणि मगच मागणी करावी. काय मागावे बरे या कल्पवृक्षाकडे? खूप पैसा मागावा का? हो, कारण पैशाने सर्व गोष्टी साध्य होतात. कारण ‘सर्वे गुणाः काञ्चनमाश्रयन्ते', असे विद्वानांनी म्हटलेच आहे. तेव्हा ठरले, कल्पवृक्षाला सांगावे की, कधीही संपणार नाही इतकी संपत्ती दे. पण ही एवढी संपत्ती आपण घरी कशी नेणार? आणि घरी तरी कोठे ठेवणार?


एकदम एवढा पैसा आला की लोकांच्या डोळ्यांत भरणार. लोक समजतील की आपण काही तरी अनैतिक मार्गाने हा पैसा मिळविला. शिवाय 'इन्कम टॅक्स' वाले पिच्छा पूरवतील आणि सर्वांत मोठी भीती म्हणजे चोरांची. चोरांमूळे या पैशापायी प्राण गमवावे लागतील. मग काय मागावे बरे या कल्पवृक्षाकडे?

विदया मागावी का? कोणत्या शाखेतील पदवी मागावी? कला, शास्त्र की व्यापार? कोणती पदवी मागावी? एम्. ए., एम्. एस्सी., एम्. कॉम., पीएच्. डी., डॉक्टर की इंजिनीअर? पण कल्पवृक्षाकडून मिळविलेल्या या पदवीचा आपण उपयोग करू शकू का? लोक विश्वास ठेवतील का आपल्यावर? डॉक्टर झालो तर आपण रुग्णांवर औषधोपचार करू शकू का? असे एक ना अनेक प्रश्नांचे मनात काहूर माजले, पण त्याच क्षणी माझे सुसंस्कारित मन आक्रंदून उठले. छे, छे; हे बरोबर नाही. कष्टाविना विदया साध्य होणे शक्य नाही. ती विदया, विदया नव्हेच, ते ज्ञान, खरे ज्ञानच नव्हे. कल्पवृक्षाजवळ काय मागावे? हा प्रश्न अदयापि सुटलाच नव्हता.


यापूर्वी होऊन गेलेल्या मोठमोठ्या लोकांनी काय मागितले होते त्याची मला आठवण झाली. मोरोपंतांनी देवाला प्रार्थिले, 'सूसंगती सदा घडो.' ज्ञानदेवांनी पसायदान मागितले-'जो जे वांच्छील, तो ते लाहो प्राणिजात.' मग आपण काय मागावे? कशी कोण जाणे, मला भोवतालची जाणीव झाली. सर्वत्र अंधार पडला होता. दूरवर येणारा माणसांचा आवाजही बंद झाला होता. बहतेक प्रदर्शन बंद झाले असावे. किर्रऽऽ असा रातकिड्यांचा आवाज येत होता. मी घाबरून पटकन कल्पवृक्षाखाली गेलो आणि म्हटले, “मला आता घरी पोहोचव." दुसऱ्या क्षणी मी माझ्या घरी होतो.


वरील निबंध मी कल्पवृक्षाखाली बसतो तेव्हा मराठी निबंध | mi kalpvrushakhali basto tevha essay in marathi हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

मी कल्पवृक्षाखाली बसतो तेव्हा मराठी निबंध | mi kalpvrushakhali basto tevha essay in marathi


आज जोतिबा अवतरले तर मराठी निबंध

आज जोतिबा अवतरले तर मराठी निबंध Aaj Jyotiba Avtarle Tar Essay In Marathi : स्वार्थाने बरबटलेल्या आजच्या समाजावस्थेत जेव्हा एखादा अगतिक माणूस आदर्श शोधत हिंडायला लागतो तेव्हा वर्तमानकाळात तर त्याची पूर्ण निराशा होणे स्वाभाविकच आहे. परंतु जेव्हा का तो गेल्या शतकाचा वेध घेऊ लागतो, तेव्हा त्याला हिमालयासारखी उत्तुंग अशी अनेक व्यक्तिमत्त्वे भेटतात आणि मग अशा या अगतिक माणसाचे मन "रितेच जीवन सारे। ही तहान सांगा केव्हा संपायची?' या विचाराने आक्रंदू लागते.अशा मानसिक संभ्रमावस्थेत असताना मनात येते, आज जोतिबा अवतरले तर.


जोतिबा आज अवतरले तर ते आनंदित होतील की खंतावतील? असा प्रश्न पडतो. ज्या स्त्री-शिक्षणासाठी त्यांनी आयुष्यभर अट्टाहास केला ती स्त्री सुशिक्षित झालेली पाहन त्यांना आनंद होईल; पण त्याचबरोबर त्यांच्या डोळ्यांत पाणीही येईल. कारण स्त्रीवरचे अन्याय आजही संपलेले नाहीत. कारणे बदलली असतील; पण छळ तसाच चालू आहे. त्या काळी विधवा स्त्रीची मानहानी करून तिला घरातील विहिरीचा मार्ग दाखविला जात असे; तर आज स्त्रीला जिवंत जाळण्याच्या घटना घडताहेत.

Aaj Jyotiba Avtarle Tar Essay In Marathi
Aaj Jyotiba Avtarle Tar Essay In Marathi


ज्या दलितांच्या उद्धारासाठी जोतिरावांनी समाजाचा रोष ओढवून घेतला तो दलित तरी सुखी आहे का? जोतिबांनी आपल्या घरातील आड मुक्त करून या अस्पृश्यांची तहान भागविली; पण आज गावोगावी 'एक गाव एक पाणवठा' हा कार्यक्रम योजूनही खेडोपाडी हा अस्पृश्य अजूनही एका व्यापक अर्थाने तहानलेला आहे. आजही त्याची वस्ती गावकुसाबाहेरच आहे. 


जोतिराव आजअवतरले तर त्यांना आढळेल की, त्यांच्या मागणीनुसार आज शासनाने या मागासलेल्या लोकांना अनेक सवलती दिल्या आहेत, शिक्षणाच्या सोयी उपलब्ध केल्या आहेत; पण त्यांनी हा हरिजन सुखी झाला आहे का? सुशिक्षित झाला आहे का? नाही. फार थोड्या संख्येने तो साक्षर झाला आहे आणि जे शिकलेसवरले आहेत ते आपल्या समाजासाठी काही करीत आहेत का? याचा विचार केला तर निराशाच पदरी पडेल.बहुसंख्य दलित अजूनही जुन्या संस्कारांच्या, रूढींच्या पिंजऱ्यातच बंदिस्त आहेत.



जोतिबांना त्यांच्या 'शेतकऱ्याचा असूड' खेड्यातील भिंतीवर दिसेल. पण त्यांच्या कल्पनेतील खेडी तेथे आढळणार नाहीत. बहुतेक खेडी ओस पडलेली दिसतील. हा जमिनीचा पुत्र पोटार्थी होऊन शहरात गर्दी करताना त्यांना आढळेल. शेतकऱ्यांतही जोतिबांना एक नवा अपरिचित वर्ग आढळेल. तो म्हणजे 'सधन शेतकरी'. जोतिरावांच्या हयातीत या वर्गाचा उदय झाला नव्हता. शेतमजूर मात्र पूर्वीपेक्षाही अधिक दरिद्री झालेला त्यांना आढळेल पुण्याच्या बाजूला हिंडताना मात्र त्यांना आपल्या सावित्रीचे आगळे स्मारक दिसेल आणि ते म्हणजे 'सावित्रीबाई फुले दत्तक योजना'. 


गरीब घरांतील विदयार्थिनींच्या शिक्षणाची झालेली ती सोय पाहुन जोतिबांना गदगदून येईल. सावित्रीच्या श्रमाचे चीज झाले, या विचाराने ते आनंदित होतील आणि मग जोतिबा एक अर्ज लिहितील. कोणाला माहीत आहे? प्रत्यक्ष त्यांच्या निर्मिकाला-भगवंताला. कशासाठी? स्वर्गवासाची सुट्टी घेऊन ते भूलोकावर वास्तव्याला येतील आणि पुनश्च आपल्या कामाला लागतील.

वरील निबंध आज जोतिबा अवतरले तर मराठी निबंध हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

आज जोतिबा अवतरले तर मराठी निबंध | Aaj Jyotiba Avtarle Tar Essay In Marathi

 माणसे अमर झाली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक Manus Amar Zala Tar Essay In Marathi

निबंध 1 
माणसे अमर झाली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक Manus Amar Zala Tar Essay In Marathi:  माझा छोटा भाऊ विचारीत होता, “दादा, देवांना 'त्रिदश' का म्हणतात?" मी म्हणालो, "अरे, त्यांना माणसांसारखी चौथी वार्धक्यावस्था नाही.देव कधी मरत नाहीत." म्हणजे देव अमर आहेत. “देवांप्रमाणेच माणसे अमर झाली तर " त्याने प्रश्न निर्माण केला.


 खरोखर, देवांना मिळालेली संजीवनीची कुपी माणसापर्यंत आली तर? नाहीतरी आज माणसाचे त्या दिशेने प्रयत्न चालू आहेतच. रक्तदान, मूत्रपिंडदान असे अवयव दान करून, अवघड शस्त्रक्रिया पार पाडून आणि प्रभावी औषधोपचार करून तो माणसाला मृत्यूच्या दारातून मागे फिरवितो. आज माणसाची आयुर्मर्यादा वाढली आहे आणि मृत्युसंख्या घटली आहे; तरीपण मानव मृत्यूवर पूर्णपणे मात करू शकलेला नाही. आजही माणूस मर्त्य आहे. अशा या मानवाला संजीवनी गवसली तर....


Manus Amar Zala Tar Essay In Marathi
Manus Amar Zala Tar Essay In Marathi

तर प्रथम ज्याच्या हातास ती संजीवनी-अमृत-गवसेल तो लक्षाधीश, कोट्याधीश होईल. मग या अमृताचा काळाबाजार' होईल. कारण कोणतीही गोष्ट अदृश्य करून तिचा काळाबाजार करण्यात माणस मोठा पटाईत आहे. मग या अमृतातही भेसळ होईल व थोड्याच दिवसांत या अमृताची नक्कल केलेले कृत्रिम अमृतही बाजारात अवतरेल.

विचार करण्याचा मुद्दा असा आहे की, माणसाला अमृत गवसल्याने तरी त्याचे दुःख संपेल का? तो सुखी होईल का? होईल, कारण त्याला त्यामुळे आपल्या प्रिय माणसांचा वियोग होणार नाही. एक-एक कुटुंब म्हणजे पारंब्या फुटलेला मोठा वटवृक्षच होईल. पण यामुळे मात्र समाजाला नको असलेली दुष्ट माणसे देखील अमर होतील की! असे घडले तर मात्र माणसे सुखी होण्याची शक्यता कमीच. 


शिवाय 'अतिपरिचयात् अवज्ञा' या उक्तीनूसार अमरत्व प्राप्त झालेली ही माणसे एकमेकांचा दुस्वास करू लागतील. शिवाय या अनुषंगाने विचार करता, दोन पिढयांतील विचारांचे अंतर हीसुद्धा एक चिंतेची बाब ठरेल. आज अनेक घरांतून, समाजांतून अनेक त-हेचे वाद निर्माण झाले आहेत. माणसे अमर झाली तर हे पिढीतील विचारांचे अंतर फारच वाढेल. कुटुंबात, समाजात तीन-चार पिढ्या आढळतील. मग वादांना काय तोटा?



माणसाला अमरत्व प्राप्त झाले की, लोकसंख्या बेसुमार वाढणार आणि वाढत्या बेकारीचा प्रश्न 'आ' वासून उभा राहणार. आजही आपल्या देशापुढे बेकारीची समस्या आहेच, त्यामुळे मग माणसे अमर झाली तर हाहाःकारच उडेल. अन्नधान्य, पाणी, निवारा या मूलभूत गरजा भागविण्यासाठी आपल्याला आपल्या सवयी बदलाव्या लागतील. कदाचित या सर्व गरजा भागविण्यासाठी वैयक्तिक मालकी हक्काला राष्ट्रीय संपत्तीचे स्वरूप दयावे लागेल. प्रयोगशाळांना शरण जावे लागेल आणि निसर्गनिर्मित संपत्तीला मानवनिर्मितीची जोड दयावी लागेल.



 आपण अमर आहोत असे एकदा सिद्ध झाले की, माणसातील साहसी वृत्तीला उधाण येईल. चंद्राबरोबर इतर ग्रहांवर जाण्यासाठीही माणूस पुढे सरसावेल. धाडसी स्पर्धांना ऊत येईल. पण येथे एक धोकाही संभवतो. मरण नाही म्हटल्यावर पुनर्जन्माची कल्पना नष्ट होईल. त्याबरोबरच पापपुण्याचा निवाडा होण्याची कल्पनाही लोप पावेल. त्यामुळे माणूस दुष्कृत्ये करताना कचरणार नाही, ऐहिक जीवनात गुंतलेला असताना तो अध्यात्माचा विचार करणार नाही आणि मग मानवी जीवन क्षुद्र बनेल



या साऱ्या विचारांत एक धोका आपण विसरलो आणि तो म्हणजे माणूस अमर झाला तरी तो अजर होणार का? तसे नसेल तर माणसाला हे अमरत्व नकोसे होईल. जखमेची वेदना घेऊन शोकाकूल अवस्थेत फिरणारा चिरंजीव अश्वत्थामा आपल्या परिचयाचा आहेच. त्याला आपले चिरंजीवित्व नकोसे झाले होते. त्याप्रमाणेच माणसाची अवस्था होईल व तो देवाकडे गा-हाणे घालील, “देवा, सोडव रे बाबा आता या यातनांतून, लवकर मरण येऊ दे."

वरील निबंध माणसे अमर झाली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद
धन्‍यवाद

निबंध 2  


पुराणकालीन कथांमध्ये देवदानवांनी अमृतमंथन केले आणि त्यातून अमृताचा कलश बाहेर काढला. त्यामुळे त्यांच्यात भांडण झाले. अखेरीस देवांच्याच युक्तीने 'मोहिनी' रूपात आलेल्या श्रीविष्णूने ते देवांना मिळवून देण्याचा प्रयत्न केला तो यशस्वी झाला अन् सारे देव अमर झाले. ही कथा ऐकत असताना माझ्या दहा वर्षांच्या भावाने मला प्रश्न विचारला. "दादा तसे ते अमृत आपल्याला मिळाले तर ? आपले आजी-आजोबा, बाबा-आई, तू-मी सर्वजण अमर होऊन जा ना ! आपण अमर झाल्यावर काय मज्जा येईल नाही !"

भावाच्या या प्रश्नाने माझी मात्र झोप उडाली. अहो, खरोखरच जर हा 'अमृताचा कलश' या माणसांपर्यंत आला आणि माणसे अमर झाली तर ? आज आपण पाहतोय काळ बदलतोय... नवीन नवीन शोध लागताहेत. औषधे, इलाज, शस्त्रक्रिया या मोठ्या प्रमाणात होताहेत आणि त्या यशस्वी होताहेत. प्रभावी गुणकारी औषधोपचाराने माणूस आज मृत्यूच्या दारातून अनेकवेळा परत आला आहे. त्याची आयुर्मर्यादा वाढली आहे, तरी पण 'मृत्यू' कुणाला टळलेला नाही. माणूस हा मर्त्य आहेच. आणि मग अशा माणसाला ही 'संजीवनी' मिळाली तर...


प्रथम या 'अमृताचा'च काळाबाजार वाढेल, भ्रष्टाचार वाढेल. सर्वजण लक्षाधीश, कोट्यधीश होतील. अमृतातही भेसळ होईल आणि पुढे तर कृत्रिम अमृतही बनवले जाईल. पण माणसाला अमर झाल्यानंतर त्याची दुःखे संपतील का? एकमेकांतील भांडणतंटे-दुरावा-दुःस्वास-स्पर्धा या थांबतील का ? नाही ! उलट आयुष्यमान वाढल्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अतिरेक होईल. अंदाधुंदी माजेल, बेबंदशाही आणि हाहाकार निर्माण होईल. प्रेम-भक्ती अशा भावनांचा अंत होईल.


दुसरीकडे अमृत गवसल्याने लोकसंख्या प्रचंड वाढेल त्याबरोबर खाणारी तोंडे... म्हणजेच पुन्हा बेकारीची समस्या, पृथ्वीतलावर असलेल्या 'अन्न-पाणी-हवा' या मूलभूत गरजा भागविता येणार नाहीत... त्यासाठी पुन्हा सुंदोपसुंदी वैयक्तिक संपत्ती म्हणून मानव ते जमा करू लागेल. आणि प्रिय माणसांचा वियोग होणार नाही, ही गोष्ट धरली तरी 'अति परिचयात् अवज्ञा' ही उक्ती खरी होईल. पिढ्या वाढत जातील. विचारांची रेलचेल होईल. एक घर, एक समाज, एक देश अशा मर्यादा न राहता अविचारांचाच धुमाकूळ सुरू होईल.

सध्या सुद्धा तीन-चार पिढ्या झाल्या तरी त्यांच्यात ऐक्य टिकणे कठीण आहे, तर मग ही अफाट नाती, या अनेक पिढ्या यांचे काय होणार ? महाभारतातील 'यादवी' आठवते ना? तशीच ती सुरू होईल. माणसे माणसांना मारतील. राहायला जागा राहणार नाही.


माणसांच्या साहसीवृत्तीचा-त्यांच्या बुद्धिमत्तेचा ही विचार करायला लागतो तर त्यांना हे ब्रह्मांड कमी पडेल. कल्पनांच्या भराऱ्या आकाशपाताळ एक करतील. त्यामुळे पुन्हा सर्व गोष्टी विनाशाकडेच वळतील. पुनर्जन्म-पापपुण्य, कल्याण, सुखदुःख या गोष्टींचा नामोनिशाण राहणार नाही. मानवी जीवनाचे महत्त्वच नाहीसे होईल, तो क्षद्र होऊन जाईल आणि अखेर पुन्हा त्या पुराणकथेतील अमरत्व प्राप्त झालेल्या अश्वत्थामा आठवू लागेल.


तोही त्याच्या चिरंजीवत्वाला कंटाळला. जखमेच्या वेदना घेऊन शोकाकूल होऊन अखंडपणे नाहक भटकत राहिला. हे सर्व आठवल्यावर वाटते, "नको रे बाबा ते अमरत्व, आणि त्या यातना, फक्त हे ईश्वरा, अमर असे कल्याणकारी काम मात्र आमच्याकडून करून घे. एवढेच मागणे." मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

माणसे अमर झाली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक | Manus Amar Zala Tar Essay In Marathi

यंत्रे संपावर गेली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक | Yantra Sampavar Geli Tar Marathi Nibandh

यंत्रे संपावर गेली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक | Yantra Sampavar Geli Tar Marathi Nibandh आज आपण पावलोपावली यंत्रांवर अवलंबून असतो. ही यंत्रे आता आपल्या नित्य व्यवहारात एवढी एकरूप झाली आहेत की ती यंत्रे आहेत व त्यांच्याविना आपले अडेल हे आपल्याला उमगतही नाही. कळले तरी वळत नाही. मग अनेकदा आपण त्या यंत्रांना अतिशय निष्काळजीपणे वागवतो. एकदा काय झाले, ही यंत्रे रागावली आणि त्यांनी आपली संघटना स्थापन केली. या संघटनेने संपाचा आदेश दिला. एका मध्यरात्री सारी यंत्रे संपावर गेली. मग जो गोंधळ उडाला तो काय वर्णावा!



सकाळी नेहमीप्रमाणे घड्याळाने आपला गजरच केला नाही. त्यामुळे सर्वांना जाग आली ती उन्हं वर आल्यावरच. धावत धावत आई नळाजवळ गेली; पण नळातून एक थेंबही पाणी येत नव्हते. घरातला फ्रीज बंद पडला होता. रेडिओ बोलत नव्हता. पंखा फिरत नव्हता. घराबाहेर आलो तर लिफ्टही चालत नव्हती. सगळेजण हवालदिल झाले. रोज सकाळी सकाळीच वृत्तपत्रे वाचायची सवय. सवय कसली, व्यसनच म्हणा ना! पण आज त्या वृत्तपत्रांचाही पत्ता नव्हता.



रस्त्यावर एकही गाडी धावत नव्हती. बस नाही, स्कूटर नाही, साधी सायकलही नाही. रस्त्यावर फक्त दिसत होती माणसेच माणसे. सारीच गोंधळून गेलेली. हे काय आहे? असे कशामुळे झाले? जरा चौकशी करा, वृत्तपत्रांकडे विचारा. पोलिसांना कळवा. कुणीतरी कल्पना काढली . फोन करा, फोन उचलला गेला, पण त्यातून कसलाच आवाज आला नाही. फोनही बंद. आता पायी चालण्याशिवाय पर्याय नव्हता. लोक हिंडू लागले, अदमास घेऊ लागले.

yantra sampavar geli tar marathi nibandh
yantra sampavar geli tar marathi nibandh


नेहमी यावेळी गजबजलेली स्टेशने आज शांत होती. म्हणजे माणसे जा-ये करीत होती; पण गाड्याच धावत नव्हत्या. 'पूतळ्याच्या' खेळातल्याप्रमाणे त्या जागच्या जागी उभ्या होत्या. बेकरीत ब्रेड नव्हता. मार्केटात भाजी नव्हती. शहरातील सारे जीवन विस्कळीत झाले होते. पाण्याच्या अभावामुळे लोकांच्या तोंडचे पाणी पळाले होते.
सहज एका रुग्णालयात डोकावलो, तेथे तर हाहाकार उडाला होता.


 यंत्रे थांबल्यामुळे शल्यविशारद शस्त्रक्रिया पार पाडू शकत नव्हते. त्यामुळे रोग्यांचे विलक्षण हाल होत होते. पंखे फिरत नव्हते. रक्त, सलाईन देता येत नव्हते. एका कमी वजनाच्या बाळाला दिवे लावून विशिष्ट उबेत ठेवले होते. पण तो दिवाच बंद पडला होता. त्यापेक्षा शोचनीय गोष्ट म्हणजे-एका हृदयविकाराच्या रुग्णाला कृत्रिम श्वासोच्छ्वासाचे यंत्र लावून ठेवले होते, ते यंत्र बंद पडल्याने तो रोगी गतप्राण झाला होता!  



सारे वातावरण बेचैन, अस्वस्थ होते. यंत्रविशारद यंत्रांशी झगडत होते; पण यंत्रे चालूच होत नव्हती. अशा अस्वस्थ वातावरणात दिवस तर संपला. यंत्रे चालू होत नव्हती; पण आकाशातील सहस्ररश्मीचे यंत्र मात्र व्यवस्थित चालु होते. ठरलेल्या वेळी भास्कर अस्ताचलावर गेला आणि सर्वत्र काळोख पडला. नेहमी विजेच्या दिव्यांनी झगमगणारे ते शहर! पण त्या दिव्यांनीही असहकार पुकारला होता. त्यामुळे सर्वत्र पणत्या, मेणबत्त्या तेवत होत्या. या शहरातील लोकांचे आज प्रथम लक्ष गेले ते आकाशातील चंद्राकडे व चांदण्यांकडे. पण तरीसुद्धा पृथ्वीवरचा काळोख नकोसा झाला होता. शेवटी मानवी उपाय संपल्यावर सर्वांना आठवण झाली ती दैवी उपायांची.



सर्वधर्मीय मानवांनी शहरातील मोठ्या पटांगणावर येऊन यंत्रांची क्षमा मागितली यंत्रदेवाला विनविले, “या पामरांना माफ कर आणि यंत्रांची चक्रे सुरू कर. यंत्राविना माणूस अपूर्ण आहे." यंत्रजगतात खळबळ उडाली, विचारविनिमय झाला. दिली तेवढी शिक्षा बस झाली असा विचार एकमताने ठरला आणि यंत्रांनी संप मागे घेतला. कारण अखेरीस मानवच त्यांचा जन्मदाता होता. दिवे लागले, पंखे फिरू लागले, नळांना पाणी आले, सर्वत्र आनंदीआनंद झाला.


वरील निबंध यंत्रे संपावर गेली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

यंत्रे संपावर गेली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक | Yantra Sampavar Geli Tar Marathi Nibandh

सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध 
Essay on sun in marathi
Surya Ugavala Nahi Tar Essay in Marathi

निबंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण सूर्य उगवला नाही तर मराठी निबंधबघणार आहोतसुर्य उगवला नाही तर असा विचारही करणे आपल्‍यासाठी कठीण आहे. कारण जसे मानवाला अन्‍नवस्‍त्रनिवारा या मुलभुत गरजा आहेत त्‍यासोबतच सुर्याचीपण नितांत आवश्‍यकता आहे.ते खालील निबंधावरून समजुन घेता येईल.

 दहावी - बारावी इयत्तेतील विदयार्थ्यांचे जे काही हाल होतात, ते अन्य लोकांना समजणे अशक्यच आहे. ज्यांना हे समजून घ्यायचे असतील, त्यांनी या दहावीबारावीच्या परीक्षेला बसून बघावेच ! सुखाची झोप टाकून पहाटे पहाटे उठणे, पेंगुळणाऱ्या डोळ्यांनी अभ्यासाला बसणे, धावत-पळत क्लासला जाणे. पुन्‍हा घुऊन येऊन गृहपाठ . मग शाळेत जाणे,  

शाळेतून आल्यावर पुन्हा क्लासला जाणे, घरी आल्यावर पुन्हा अभ्यासाला बसणे व रात्री उशिरापर्यंत सराव प्रश्नपत्रिका सोडवायला बसणे या रहाटगाड्यात अक्षरशःआम्ही पिळून निघतो ! सकाळी जबरदस्तीने उठताना वाटते - हा सूर्य उगवला नाही तर किती बरे होईल ! सगळी पीडा नाहीशी होईल ! 

खरेच सांगतो, माझ्या मनात अनेकदा हा विचार येतो - सूर्य उगवला नाही तर ? तर... सगळी मज्जाच मज्जा ! मग सकाळी उठायची कटकट नसेल. हवे तितके मनसोक्त झोपता येईल ! उठल्यावरही कसली घाई नसेल. शाळेत जाण्याची धावाधाव नसेल. मनसोक्त टी. व्ही. पाहता येईल. पत्ते, कॅरम हे खेळ भरपूर खेळता येतील.

अमूक वाजले; आता हे करा; तमूक वाजले; आता ते करा. असल्या जाचातून मुक्तता होईल. सूर्यच नसल्याने घामाच्या धारा नसतील आणि कडाक्याच्या उन्हाळ्याने हैराण व्हावे लागणार नाही ! 

surya-ugawala-nahi-tar-essay-in-marathi
surya-ugawala-nahi-tar-essay-in-marathi
कडक उन्हाळाच नसल्याने नदी-नाले-विहिरी आटण्याचा प्रश्नच येणार नाही. मैल मैल अंतरावरून पाण्याचे हंडे वाहून आणण्याचे काबाडकष्ट करावे लागणार नाहीत. दिवसच नसल्याने सगळ्यांची कामाची ठिकाणे जवळच असतील. दूर दूर अंतराच्या प्रवासाची दगदग संपलेली असेल. आई-बाबा खूप वेळ घरी असतील... आणि आमच्या गावाकडची मजा तर काय विचारूच नका... सतत पांढरेशुभ्र चांदणे ! किती किती फायदे !

मी मात्र त्याच वेळी माझे दुसरे मन मला सावध करू लागले - खरेच का, सूर्य नसेल तर फक्त मजाच असेल? थोडा वेळ विचार करताच भविष्यातील एकेक बाब डोळ्यासमोर साकार होऊ लागली. भीतीदायक विचारांचे मोहोळच उठू लागले. सूर्य उगवलाच नाही, तर शाळा नसेल, हे वरवर ठीक वाटते. पण शाळेत मिळणारा केवढा आनंद आयुष्यातून वजा होईल ! 

मित्र नसतील, मग मित्रांबरोबर संध्याकाळचे भटकणे कसे घडेल? मित्रांबरोबरची सगळी धमालच नष्ट होईल ! मैदानावर कधी मनसोक्त खेळताच येणार नाही ! कायम घरात नि घरात ! टी. व्ही., पत्ते, कॅरम किती वेळ चालणार? अंथरुणात लोळत तरी किती वेळ राहणार? 

सूर्य उगवलाच नाही तर शाळा नसतील; म्हणून ज्ञानाचे मार्ग बंद होतील. मग मानवाने आजवर साधली तशी प्रगती कुठे असेल? विविध सेवा पुरवणारी कार्यालये नसतील; कारखाने व उदयोगधंदेही नसतील; म्हणजे नोकऱ्या नसतीलच. मग पैसे कुठून येतील? खाणार काय?

सूर्य नसल्यामुळे सगळीकडे काळोख असेल. फक्त काळा रंग ! मग वसंत ऋतूतील विविधरंगी फुलांच्या सौंदर्याचे वैभव व श्रावणातील लावण्यवती सृष्टी यांचा आस्वाद कसा घेणार? आयुष्यातून सगळे रंग हद्दपार होतील ! सूर्योदय व सूर्यास्त या क्षणांचे दर्शन घेण्याचे सुख कायमचे निघून जाईल !

एक वेळ सर्व ठीक मानता येईल. पण खाणार काय? ऊन नाही म्हणून पाऊस नाही. म्हणून शेती नसेल. मग अन्नधान्य कसे मिळेल? मुख्य म्हणजे सूर्यप्रकाश हा सर्व वनस्पतींचा जीवनाधार. सूर्य नसेल तर, म्हणूनच वनस्पती-सृष्टीही नसेल. अशा स्थितीत प्राणी, मानव इतकेच कशाला कोणताही सजीव कसा काय जगु शकेल ? म्ह णजे पृथ्वी  फक्ता मातीचा एक निर्जीव गोळा बनेल. आपण कोणीच अस्तित्वा‍त नसणार ! 

नको रे बाबा ! सूर्य न उगवण्यााची कल्पनाच नको. तो आपल्याप सर्व सजीवांचा जीवनदाता आहे. तो हवाच . ओम सूर्यनारायणाय नम : 

निबंध 2

सूर्य संतापला, तर... मराठी निबंध 

सूर्यसंतापला, तर... मराठी निबंध : जगात माणसाला नेहमी स्वत:च्या कर्तृत्वाचा फार गर्व असतो. 'हे मी केलं, ते मी केलं,' असे तो मोठमोठ्याने ओरडून सांगतो आणि त्यावेळी आपण खरोखरी किती परावलंबी आहोत, याचा त्याला विसर पडतो.

आता सूर्याचीच गोष्ट पाहा ना! भगवान सूर्यदेव आहेत म्हणून पृथ्वीतलावरील प्राणी जगू शकतात. सूर्यापासून आपल्याला प्रकाश व उष्णता मिळते. पण सूर्य आपल्याला देत असलेल्या सर्व गोष्टींची महती अतिपरिचयाने आपल्याला वाटेनाशी होते. समजा हाच सर्वदायी सूर्य आपल्यावर रागावला तर... आणि आकाशात उगवलाच नाही, तर ...

तर सर्वत्र काळोख पसरेल. चोवीस तास रात्रच रात्र. काही दिवसांनी वातावरणातील उष्णता संपेल आणि अतोनात थंडी वाजू लागेल. सूर्य उगवलाच नाही तर रोगराई वाढेल, झाडांची वाढ खुंटेल. सूर्य नाही तर, पाण्याची वाफ कशी होणार? वाफ नाही तर पाऊस कसा पडणार?

माणसांनो, तुमच्यास वागण्यातील भोंदूपणाचा आम्हांंला उबग येतो. इतर वेळी आमच्यााशी निष्ठुशरपणे वागणारे तुम्ही  वनमहोत्स‍वाच्या‍ निमित्तायने दोन-चार दिवस आमचे कौतुक करता. तुमच्याातील काही विद्वान कवी आमच्यामवर कविता करतात. पण तुमच्या दांभिक वागणुकीचा वीट येऊन आम्ही आता तुमच्या्शी बोलण्यावचे सोडुन देणार आहोत. असे सांगून झाडे कायमची गप्पद झाली. 

निबंध 3

 सूर्य उगवला नाही तर 

'राजू, ऊठ लवकर. शाळेत नाही जायच का?' आईने नेहमीप्रमाणे उठवायला सुरुवात केली. 'होय ग, उठतो पाच मिनीटांत' म्हणत मी परत पांघरुण ओढले, माझ्या मनात आले काय ही रोज सकाळी शाळेची कटकट आहे. त्याऐवजी सूर्य उगवलाच नाही तर? काय हरकत आहे? डॉक्टर संपावर जाऊ शकतात, कामगार संपावर जाऊ शकतात मग सूर्य संपावर गेला तर काय बिघडले?


काय मज्जा येईल नाही? रोज सकाळी आई उठवणार नाही. शाळेत जायला लागणार नाही. शाळा नाही म्हणजे परिक्षा नाही आणि परिक्षा नाहीत म्हणजे निबंध लेखनही नाही. दिवसभर, नव्हे रात्रभर गादीत लोळायला मिळेल. खेळायला मिळेल. उन्हाळ्यात उकाड्याने जीव हैराण होणार नाही. आपले सगळयांचे वेळापत्रक कोलमडेल. 


अरे! पण सूर्यच नसला तर पाऊस तरी कसा पडेल? कारण उष्णता नसल्याने पाण्याची वाफ होणारच नाही. झाडे आपले अन्न तयार करु शकणार नाही. मग आपल्याला अन्न कसे मिळेल? फळ नाहीत, धान्य नाही तर मग आपण खाणार काय? पृथ्वीचे तापमान एकदम खाली येईल. प्राणवायु  मिळणार नाही. सौर उर्जेवर चालणाऱ्या  यंत्रांचा उपयोग करता येणार नाही.


पृथ्वीवर नेहमीच अंधार असेल. प्रकाशासाठी आपल्याला कायम लाइट, बल्ब लावावे लागतील. मग इलेक्ट्रिसीटीचे बिल किती वाढेल! चोरांची तर मज्जाच होईल. काम व्यवसायानिमित्त लोक बाहेर कसे पडतील? काम नसल्यामुळे आपण आळशी होऊ. सूर्य नाही म्हणजे चंद्र नाही की चांदण्या नाही. मग चांदण्या रात्रीची, कोजागिरी पोर्णिमेची मजा कशी लुटणार? म्हणजे आपले जीवन अगदी निरुत्साही, निरस बनेल. नुसता विचार करुनही माझा थरकाप उडाला.

आपण सूर्याला देव का मानत आलो आहोत हे लक्षात आले. अशा या सूर्यदेवाने संपावर जाण्याचा विचारही करु नये म्हणून मी त्याचीच प्रार्थना करु लागलो.

टीप : वरील निबंध सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते
  • autobiography of sun in marathi
  • atmakatha of sun in marathi
  • surya information in marathi
  • surya che mahatva in marathi
  • surya chi atmakatha in marathi
  • marathi nibandh surya
  • surya ugavala nahi tar short essay in marathi

सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध