विदयार्थी जीवन मराठी निबंध | Student Life Essay In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आमच्‍या ब्लॉगवर तुमचे स्‍वागत आहे, आज आपण विदयार्थी जीवन मराठी निबंध | Student Life Essay In Marathi या विषयावर निबंध बघणार आहोत.आजच्‍या स्‍पधेच्‍या युगात विद्यार्थी जिवन फारच कठीण झाले आहे . आई वडीलांचे अपेक्षा पुर्ण करता करता तो किती भरडल्‍या जातो हे त्‍यालाच ठाऊक, आजची शिक्षण पध्‍दती विद्यार्थी बनविते की परीक्षार्थी, त्‍याच्‍या समोर येणाऱ्या समस्‍यांचे वर्णन या निबंधा मध्‍ये केले आहे. चला तर मग सुरू करूया निबंधाला. 



“आई, आता फक्त एवढ्याच प्रश्नाचे उत्तर सांग. अगदी शेवटचाच प्रश्न आहे बघ!" मिनू अगदी केविलवाण्या शब्दांत आईला सांगत होती. जवळजवळ दोन तास ती आईच्या मदतीने आपले प्रश्न सोडवीत होती. मिनूच्या उद्गाराने मी ही भानावर आलो. मी देखील खूप वेळ गणिते सोडवीत होतो, आणि अजून मला कितीतरी विषयांचे प्रश्न सोडवावयाचे होते. केव्हा संपायचे बरे हे प्रश्न? छे, आमची सारी विदयार्थिदशा या प्रश्नांच्या भेंडोळयातच अडकली आहे. या साऱ्या प्रश्नांची रूपे तरी किती आगळीवेगळी! त्यांच्या स्वरूपांप्रमाणे विदयार्थ्यांना त्यांना सामोरे जावे लागते. नाहीतर वस्तुनिष्ठ प्रश्नाला दीर्घ उत्तर दिले की बसलाच शून्याचा फटकारा.


student-life-essay-in-marathi
student-life-essay-in-marathi

आजचे विदयार्थिजीवन म्हणजे नानाविध प्रश्नांची सर्कसच! या सर्कशीतील तंत्र आणि मंत्र जो साध्य करतो तोच यशाचे शिखर गाठतो. पण एक गोष्ट मात्र नक्की की, असा विदयार्थी खरा ज्ञानार्थी न होता केवळ परीक्षार्थी बनतो. याचे एक कारण हेही आहे की, आजच्या विदयार्थ्यांवर विविध विषयांचा फार मोठा बोजा आहे. मर्यादित वेळेत अभ्यास कसा संपवायचा हे विदयार्थ्यांपुढील मोठे प्रश्नचिन्ह आहे.


तेवढ्याने काय संपते! विदयार्थी हा सर्वगुणसंपन्न असावा अशी सर्व पालकांची व शिक्षकांची अपेक्षा. आपण विदयार्थिदशेत जे करू शकलो नाही ते सारे आजच्या विदयार्थ्यांनी करावे असे त्यांना वाटते. अशा प्रसंगी विदयार्थ्यांचा मात्र कोंडमारा होतो. एखादया विदयार्थ्याला सुनील गावसकर व्हावेसे वाटते; तेवढयात जयंत नारळीकरांसारख्या थोर शास्त्रज्ञाचा आदर्श त्याच्यासमोर ठेवला जातो. मुलाने आपली प्रकृती उत्तम ठेवावी असे सांगणारे पालक, त्याच मुलाने व्यायामशाळेत जरा जास्त वेळ घालविला की, लगेच म्हणतात,


काय आखाड्यात उतरायचे काय!" त्यामुळे आपल्याला आयुष्यात नक्की काय करायचे आहे, हयाबद्दल विदयार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो.अभ्यासात यश मिळवून तरी आजच्या विदयार्थ्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे मिळाली आहेत का? उच्च शिक्षणासाठी त्याला हव्या त्या शिक्षणशाखेत प्रवेश घेता येतो का? तेथेही अनेक अडसर! जागा कमी, मागणी अधिक! या व्यस्त प्रमाणामुळे सर्वत्र झिम्मड. मग भ्रष्टाचार, वशिलेबाजी आलीच. 


विदयार्थ्याला आवडत असलेली शिक्षणशाखा तो निवड शकत नाही; मग तो अगतिक होतो वा भरकटतो.
अशा या विदयार्थिजीवनात अनेक मोह विदयार्थ्याला ग्रासावयास उभे असतात. कधी चुकून, तर कधी वैफल्याने तो त्यांकडे वळतो. अशा सर्व समस्यांवर मात करून विदयार्थ्याने उत्तम यश संपादन केले तरी त्याचे प्रश्न संपत नाहीत. शिक्षणानंतर नोकरीचा प्रश्न त्याच्यापुढे उभा ठाकतो. बेकारीचा भस्मासूर त्याला वाकुल्या दाखवितो. स्वतःचा व्यवसाय हा बेकारीवरचा उपाय त्याला दाखविला जातो. पण तेथेही जीवघेणी स्पर्धा व गैरव्यवहार त्याला रोखतात.

प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न! विचारवंतांच्या मते, माणूस हा आयुष्यभर विदयार्थीच असतो. मग प्रश्न पडतो की हे प्रश्न सुटणार तरी केव्हा? आणि हे प्रश्नही त्याला सतत साथ देत असतात.


मित्र-मैत्रिणींनो तुम्‍हाला विदयार्थी जीवन मराठी निबंध | Student Life Essay In Marathi हा निबंध कसा वाटला व विद्याथ्‍यांच्‍या या प्रश्‍नांवर तुम्‍हाला तुमचे मत प्रकट करावयाचे असेल तर तुम्ही कमेंट करून कळवु शकता, धन्‍यवाद 

विदयार्थी जीवन मराठी निबंध | Student Life Essay In Marathi

मराठी आमची मायबोली मराठी निबंध | marathi aamachi mayboli essay in marathi


मराठी आमची मायबोली मराठी निबंध | marathi aamachi mayboli essay in marathi आज आपण मराठी आमची मायबोली  शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत 
मराठी असे आमुची मायबोली "मराठी असे आमुची मायबोली, जरी भिन्नधर्मानुयायी असू।हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू, वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी॥" अशा त-हेने आपल्या मायबोलीची गोडवी गाणारे आम्ही आज खरोखर तिचे पांग फेडीत आहोत का? 



प्रतिष्ठेच्या पोकळ व आकर्षक कल्पनांत गुरफटलेल्या आमच्या मनाला अजूनही इंग्रजीचे आकर्षण आहे. मराठी भाषिक चार सुशिक्षित माणसे एकत्र आली तर ती गप्पा मारण्यासाठी इंग्रजीला जवळ करतात. 
दीडशे वर्षांची राजकीय गुलामगिरी संपली तरी इंग्रजीची मानसिक गुलामगिरी सोडायला आम्ही तयार होत नाही.

 

कारण आमच्या मायबोलीची थोरवी आजही आम्हांला उमगली नाही; तिचे सामर्थ्य आजही आम्हांला कळले नाही असेच म्हणावे लागेल.


मराठी मायबोलीविषयी लिहिताना साने गुरुजी म्हणतात, “आमच्या मराठीचे भाग्य असे आहे की, तिचा पहिलाच कवी हिमालयाएवढा मोठा महाकवी होऊन गेला. त्याच्या काव्यशक्तीला स्पर्श करणारे सामर्थ्य अजून मराठीत निर्माण झालेले नाही.' 



अशी ही ज्ञानदेवांची मराठी अमृतालाही पैजेने जिंकणारी, हिची थोरवी वर्णिताना योगवासिष्ठ म्हणते

“परिमलांमध्ये कस्तुरी। 

का अंबरामध्ये शंबरारी।

तैसी महाटी सुंदरी।
 
भाषांमध्ये।" 

marathi aamachi mayboli essay in marathi
marathi aamachi mayboli essay in marathi


मराठी अशी भाग्यवान की तिला सदैव अनेक सुपुत्रांची सोबत लाभली. नामदेव, एकनाथ, तुकाराम अशा संतांच्या सहवासातून ती पंडितकवींच्या वाग्विलासात रमली आणि नंतर शाहिरांच्या शब्दांतून डफ-तुणतुण्याबरोबर नाचू लागली. आधुनिक काळात तर तिच्या वैभवाला आगळाच बहर आला. नव्या नव्या वाङ्मयप्रकारांनी ती सजू लागली आणि रसिकांना रमवू लागली.


या माझ्या मायबोलीवर अनेकदा अनेक आक्रमणे झाली, पण ती अशी ‘चिवट' की तिने ती सारी परतवून लावली. अग्निदिव्य केल्यावर सीतामाई जशी अधिक उजळून निघाली, त्याप्रमाणे यावनी आणि इंग्रजी भाषांच्या आक्रमणानंतर मराठी भाषा अधिक तेजस्विनी झाली. 



संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा देताना तर तिने आपला नाजूकपणा झटकून देऊन शूर, करारी भवानी देवतेचे रूप धारण केले आणि आपली अस्मिता साऱ्या भारताला दाखवून दिली. या माझ्या मायबोलीच्या सामर्थ्याविषयी आता कोणालाही संभ्रम नाही. भारत देशाच्या सीमा ओलांडून परदेशांतही तिने आपले सामर्थ्य दाखविले आहे. 



शरदाच्या चांदण्याप्रमाणे सौख्य देणारी ती नाठाळांच्या माथ्यावर काठी हाणण्यास डरणार नाही; म्हणूनच कवी कुसुमाग्रज आत्मविश्वासाने म्हणतात.

"माझ्या मराठी मातीचा।
 
लावा ललाटास टिळा। 

हिच्या संगे जागतील। 

मायदेशातील शिळा॥" 


मराठी आमची मायबोली मराठी निबंध | marathi aamachi mayboli essay in marathi हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे.  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 2

मराठी आमची मायबोली मराठी निबंध | marathi aamachi mayboli essay in marathi



मराठी असे आमुची मायबोली. जरी भिन्न धर्मानुयायी असे, तरी आज ती राष्टभाषा नसे. आपण महाराष्ट्रीयन, आपली मन मराठी, भाषा अस्सल मराठी. या महाराष्ट्राला गोविंदाग्रज ‘बकुळ फुलांच्या प्राजक्ताच्या दळदारी देशा' असं संबोधतात. तर बा. भ. बोरकर म्हणतात, 'राकट कणखर दगडांच्या देशा! 


महाराष्ट्रातली मराठीही अशीच रांगडी. सह्याद्रीच्या कड्यांसारखी. कधी रेशीम सुतासारखी, लोण्याहूनी मऊ नी वज्राहून कठोर. गोदा, कृष्णा, भीमेसारखी निर्मळ, सरळ, साधी तर कधी कोकणातल्या नागमोडी घाटमाथ्यांसारखी वळणावळणाची. ज्ञानदेवाच्या स्पर्शाने पुनीत झालेली.


माझी मराठीची बोली । 

अमृतातेही पैजा जिंकी।

 ऐसी अक्षरे रसिके । 

मेळविन ।।


असे आव्हान स्वीकारून, ते लीलया पेलूनच ज्ञानदेवांनी संस्कृतातील भगवद्गीता प्राकृत भाषेत-मराठीत लिहिली, सांगितली व रसिक श्रोत्यांवर जणू मोहिनी घातली.'मराठी या माणसाला नको अमृताचा घट, ज्ञानेशाच्या ओवीतला पुरे त्याला एक घोट । अशी मराठीची अभिरूची माणसामाणसांत निर्माण केली. 


संत तुकाराम महाराजांची गाथा, समर्थ रामदासांचा दासबोध, मनाचे श्लोक, एकनाथांचे भागवत ह्या वाङ्मयाने शेकडो वर्षे मराठी ज्ञानगंगा प्रवाही ठेवली. मराठी लोकगीते, भूपाळ्या, पोवाडे, कवनं, आरत्या, जात्यावरच्या ओव्यांनी मराठी समृद्ध केली, वैभवशाली केली.


माळ्याच्या मळ्यात नुस्ती माळीण एकली. जादुच्या फुलांची इनं काचोळी गुंफली. अशा ओवीतून रचनेतून माळीणीचा एकटेपणा किती मृदू व तरल शब्दांत गुंफलाय हे मराठी माणूसच जाणे. भावना, विचार, कल्पना, अनुभव व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम म्हणजेच मायबोली. 


मातेनंतर जवळ घेतात ते मायबोलीतले शब्दच. सुखदु:खाच्या प्रसंगी आपले सखे नि सोबती. कसोटीच्या क्षणांना कातरवेळांना त्यांचाच तर मनाला आधार वाटतो. कवी केशव मेश्राम ह्या शब्दांकडे प्रांजळपणे कृतज्ञता व्यक्त करतात. जे शब्द त्यांच्या हाकेला ओ देतात, त्या शब्दांचे सामर्थ्य सांगताना तुकाराम महाराजही म्हणतात,
आम्हां घरी धन शब्दांचिच रत्ने शब्दांचीच शस्त्रे-यत्न करू!


मराठी भाषा अतिप्राचीन आहे. मराठी वाङ्मयाचे समृद्ध दालन उघडले संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी. मग ही परंपरा संत तुकाराम, एकनाथ, नामदेव, मुक्ताबाई... त्यानंतर कवी मुक्तेश्वर, नरहरी, चंद्रशेखर आदिंनी सुरू ठेवली. लो. टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर, न्या. रानडे, स्वा. सावरकर ह्यांची लेखणी म्हणजे तळपणारे साक्षात खड्गच!


ललित वाङ्मय, कविता, ललित निबंध, कादंबऱ्या, कथांचा काळ म्हटलं म्हणजे ह. ना. आपटे, नाथमाधव, श्री. ना. पेंडसे, ना. सी. फडके, पु. ल. देशपांडे, गो. नी. दांडेकर हे मराठी साहित्यिक डोळ्यांपुढे उभे राहतात. वि. वा. शिरवाडकर, गडकरी, अत्रे, वसंत कानेटकर, ह्यांनी मराठी नाटकांचा नजराणा पेश केला तर बालकवी, आरती प्रभू, केशवसूत, बोरकर, शंकर वैद्य, विंदा करंदीकर, पाडगांवकर, वसंत बापट, ना. धों. महानोर ह्यांनी निसर्ग कवितांचे घडेच्या घडे वाचकांसमोर उपडे केले.


मराठी भाषा दर बारा मैलांवर बदलते म्हणतात. मराठीमध्ये प्रमाण भाषेव्यतिरिक्त अनेक बोलीभाषा आहेत. भाषेचे विविध रंग, ढंग वैशिष्ट्ये आहेत इतकेच. ती प्रदेशानुसार बदलते आणि काळानुसारही बदलते. तिची सारी रूपे मोहकच आहेत. 'लीळाचरित्र' हा तेराव्या शतकात लिहिला गेलेला पहिला पद्यग्रंथ मानला जातो. 


शिवकालीन पत्रांमधले मराठी थोडे सोपे होते. सोळाव्या शतकात ख्रिस्तपुराणातील मराठी म्हणजे, हे सर्व मराठीये भासेत लिहिले आहे असे होते. अठराव्या शतकात पेशवे उत्तम मराठी लिहीत. १८७५ मधील नाटक मंडळींची मराठी पत्रे मोठी मजेशीर वाटतात. 


सुमारे शंभर वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरीमधील नीतीकथांचे अर्थ उलगडून दाखवताना इतिहासकार राजवाडे वरिवरि पालवी खुडिजे । आणि मुळी उदक घालिजे।।' असे मराठी लिहितात... एरव्ही कानडीचा प्रभाव असलेली धारवाडी मराठी, कोकणातली कोकणी थाटाची मराठी, 'आईमाय' म्हणणारी व-हाडी मराठी, जळगावकडची खानदेशी मराठी, नगरी, पठारी... मराठी! तर... ही अशी मायबोली. पूर्वीची सनातनी,


नऊवारी पैठणीतली नाकात नथ, हातात पाटल्या, बांगड्या, तोडे, बाजूबंद, बिलवरांनी सजलेली वा आत्ताची सहावारी गोल साडीतली साधी असो माधुर्य व मोहकता कायम टिकवून धरणारी. पण... दुर्दैवाने... आज ह्या मायबोलीला आपण अडगळीची जागा दाखवली की काय असं वाटतंय. 


जणू सोन्यामोत्याचा भरगच्च दागिना माळ्यावर भिरकावून दिलाय. कारण आपली मातृभाषा सोडून आपण इंग्रजीला जवळ करू लागलोय. मराठी माध्यमातून शिक्षण घेणं मागासलेपणाचं मानू लागलोय. मराठी बोलायला, आपण चारचौघात लाजतोय. पिवळ्या, हिरव्या रंगाना यलो, ग्रीन म्हणणं हे पुढारलेपणाचं नि आईला मम्मी न म्हणता आई म्हणून हाक मारणं हे बुरसटलेपणाचं लक्षण मानतोय.


'मी वॉश घेऊन फ्रेश होऊन येतो' 'फॉर मी, हे फारच डिफिकल्ट आहे हं,' किंवा 'हाय फ्रेंड्स' 'बाय डॅडी,' म्हणत पाश्चिमात्य लोकांचं अंधानुकरण करतोय. पितृऋण, मातृऋण ह्या गोष्टी विस्मरणात टाकून 'मदर्स डे साजरा करतो. हे सारं पाहन मायबोली मराठीला किती यातना होत असतील, हे पाहायला आपणास वेळही नाही.
 


मला मान्य आहे विश्व जवळ येत चाललंय. इंग्रजी ही विश्वाची बोलीभाषा आहे. पण मराठीलाही एका हळव्या कोपऱ्यात आपण जपलं पाहिजे. अभ्यासाच्या संकल्पना मायभाषेतच सुस्पष्ट होतात. परदेशस्थ मराठी माणूसही जगाच्या पाठीवर मराठी माणसाला भेटला, तर किती आनंदित होतो. 


आपल्या मातृभाषेतून किती निकाय बोलू असे त्याला होऊन जाते. नि तो जेव्हा एकटा असतो... आपल्या मायभूला, मातृभाषेला सोडून दूर दूर... तेव्हा मायबोलीला उत्स्फूर्तपणे म्हणतो, जयकार असावा तुझा 'मराठी' नित्य या जगी उच्च रवाने येतो उर नयन हे भरूनी, तुझ्या शब्द उच्चाराने। तू सतत असावी जवळी माझ्या, आस मनीची आस असे, साद घालीता मी एकांती, कुशीत मजला धीर देतसे। व मायबोलीचा जयजयकार करतो. 
मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद

मराठी आमची मायबोली मराठी निबंध | marathi aamachi mayboli essay in marathi