Dr Babasaheb Ambedkar Essay In Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध

निबंध 1 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध  बघणार आहोत. या पानावर पुर्ण 5 निबंध दिले आहेत.  भारतासाठी केलेले कार्य व समाज बांधवासाठी केलेला त्‍याग व कार्य सविस्‍तरपणे स्‍पष्‍ट केले आहेत.    चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर - म्हणजेच, डॉ. भीमराव रामजी आंबेडकर  यांनी भारत स्वतंत्र झाल्याबरोबर भारतीय जनतेला एक मौलिक संदेश दिला होता. तो असा की, लोकशाहीचे अस्तित्व आपणांस टिकवायचे असेल, तर आपले सामाजिक आणि आर्थिक उद्देश साध्य करण्यासाठी आपण फक्त सनदशीर मार्गांचाच अवलंब केला पाहिजे. केवढी दुरदृृृृृष्‍टी होती  या संदेशात !

 पण आपण आज - अगदी स्वतंत्र होऊनही साठ वर्षे झाली तरी या गोष्टी आपल्या आचरणात आणल्या नाहीत. कोणत्याही क्षुल्लक कारणाने प्रक्षोभ झाला की, लगेच जाळपोळ, मोडतोड केली जाते. कारण आपण तेव्हा हे विसरलेले असतो की, अशा विध्वंसात आपण आपलेच नुकसान करत असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र आणि साहित्य यांतून आपल्याला असे मोलाचे संदेश मिळत असतात.

१४ एप्रिल १८९१ मध्ये एका गरीब घरात बाबासाहेबांचा जन्म झाला होता. त्यात भर म्हणजे 'मागासलेली जात' हा शिक्का उमटलेला. पण ते कोणत्याही अडचणीला डगमगले नाहीत. कशासाठीही कुरकुरत बसायचे नाही, हा तर त्यांचा निश्चय होता. त्यामुळे चाळीतल्या गोंगाटातही ते उत्तम अभ्यास करू शकले. माणूस फक्त ज्ञानामुळेच दु:खमुक्त होऊ शकतो, हे त्यांनी जाणले होते.

डॉ. आंबेडकर यांनी स्वत:ची उन्नती तर साधलीच, पण त्यांचा मोठेपणा असा की, ते आपल्या अन्यायग्रस्त समाजालाही विसरले नाहीत. आयुष्यभर खडतर ज्ञानसाधना करून विधिशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी ज्ञानशाखांवर त्यांनी प्रभुत्व संपादन केले होते.
Dr Babasaheb Ambedkar Essay In Marathi
Dr Babasaheb Ambedkar Essay In Marathi

 दलितांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. जनतेला एकत्र आणण्यासाठी त्यांनी 'बहिष्कृत हितकारिणी सभा' (१९२४) स्थापन केली. पुढे 'स्वतंत्र मजूर पक्ष' या राजकीय पक्षाची १९३६ साली स्थापना केली. १९४२ मध्ये 'ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन' या संस्थेची स्थापना केली. दलित जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी विपुल लेखन केले.

 'मूकनायक', 'जनता' (याचेच रूपांतर पुढे 'प्रबुद्ध भारत' असे झाले) अशा नियतकालिकांद्वारे समाजात जागृती निर्माण केली. 'बहिष्कृत भारत'चे ते संस्थापक संपादक होते. 'हु वेअर दि शूद्राज?', 'बुद्ध अँड हिज धम्म' इत्यादी त्यांचे अनेक ग्रंथ विख्यात आहेत. 'भारतरत्न' या सर्वश्रेष्ठ पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले होते.


जातीयतेचा कलंक नाहीसा व्हावा म्हणून बाबासाहेब आयुष्यभर झगडले. जातिपातीचा विचार न करता सर्वांनाच पाणी भरण्याचा हक्क मिळावा, म्हणून बाबासाहेबांनी महाडच्या चवदार तळ्यावर १९२७ साली सत्याग्रह केला. १९३० साली नाशिकच्या काळाराम मंदिरातील प्रवेशाचा लढा दिला.

 हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान हे वर्णवर्चस्वावर आधारलेले असल्यामुळे दलितांना हिंदू धर्मात समतेची व न्यायाची वागणूक मिळणे अशक्य आहे, अशी त्यांची खात्री झाली होती. म्हणून त्यांनी १९५६ मध्ये आपल्या हजारो अनुयायांसह नागपूर येथे हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्मात प्रवेश केला.


डॉ. आंबेडकरांनी महिलांच्या शिक्षणाचाही आग्रह धरला. त्यासाठी ते पालकांना सांगत - मुलामुलींची लग्ने लवकर करू नका. निदान त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहू द्या.  स्त्रियांचे हक्क, त्यांची उन्नती, त्यांचा विकास साधण्यासाठी बाबासाहेबांनी १९४८ मध्‍ये कायदेमंडळापुढे 'हिंदू कोड बिल' सादर केले. मुरळी, देवदासी, मजूर, कामकरी स्त्रिया इत्यादींच्या हक्कांसाठीही ते झटले. कारण स्त्रियांचा सन्मान त्यांना महत्त्वाचा वाटे.


समाजातील जो घटक पीडित आहे, अन्यायग्रस्त आहे, त्याने त्या अन्यायाच्या निवारणासाठी स्वत:च पुढे आले पाहिजे, तरच त्याचे दुःख संपू शकते, असे बाबासाहेब सांगत. आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत अन्यायाविरुद्ध लढलेल्या बाबासाहेबांचे १९५६ साली महानिर्वाण झाले.

 मित्रांनो तुम्‍हाला Dr Babasaheb Ambedkar Nibandh In Marathi हा निबंध कसा वाटला  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद .
महत्‍वाचे मुद्दे : 

  • भारतीय घटनेचे शिल्पकार 
  • लोकशाही राज्य कसे असावे याबाबत मार्गदर्शन 
  • जन्म १८९१
  • कष्टाने शिक्षण
  • ज्ञानामुळेच दु:खमुक्ती हा विश्वास
  • विविध शास्त्रांचा अभ्यास 
  • विपुल लेखन 
  • 'भारतरत्न' पुरस्कार
  • वाचनाची विलक्षण आवड
  • विदयार्थ्यांना मार्गदर्शन 
  • आत्मविश्वास 
  • दीर्घोदयोग, शीलसंवर्धन 
  • स्त्रियांना शिक्षणाचा आग्रह 
  • 'हिंदू कोड बिला'चा आग्रह 
  • प्रत्येकाने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध करावा.
निबंध 2

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल, १८९१ रोजी झाला. शाळेत, महाविद्यालयात अस्पृश्यतेमुळे त्यांचा अनेकदा मानभंग झाला होता व त्यांच्या रास्त हक्कांपासून त्यांना वंचित केले गेले होते. बडोदयाचे महाराज सयाजीराव गायकवाड व कोल्हापूरचे शाहू महाराज यांच्या आर्थिक साहाय्यावर ते बी. ए. झाले. परदेशात जाऊन त्यांनी अर्थशास्त्र या विषयात एम. ए. पीएच. डी. या पदव्या मिळवल्या.

तेथे ते बॅरिस्टरही झाले; सिडनहॅम महाविदयालयात काही काळ ते प्राध्यापक होते. सरकारी विधी महाविदयालयात त्यांनी प्राध्यापक व नंतर काही वर्षे प्राचार्यपद सांभाळले. उच्चवर्णीयांकडून वर्षांनुवर्षे होणाऱ्या पिळवणुकीने दलित समाज भरडला जात होता. अशा या निद्रिस्त समाजाला जागृत करण्याचे अवघड कार्य डॉ. आंबेडकरांनी केले. 



भीमरावांनी आपल्या समाजासाठी वकिली करण्याचा निश्चय केला. त्यासाठी त्यांनी २० जुलै, १९२४ रोजी 'बहिष्कृत हितकारिणी सभा' स्थापन केली. 'शिकवा, चेतवा व संघटित करा' हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते. डॉ. आंबेडकरांना आपल्या निद्रिस्त समाजाची अस्मिता फुलवायची होती. त्यासाठी ते त्या 'मूक समाजाचे नायक' झाले. त्यांनी आपल्या या अशिक्षित बांधवांना एक दिव्य संदेश दिला, 'वाचाल, तर वाचाल.'

वसतिगृहे स्थापन करून अस्पृश्य मुलांना निवासाची सोय पुरवून त्यांना शिक्षण देणे, वाचनालये काढणे, रात्रीच्या शाळा भरवणे, तरुणांसाठी क्रीडामंडळे चालवणे अशा कार्यांवर 'बहिष्कृत हितकारिणी सभे'चा भर होता. आपल्या उत्तर आयुष्यात बाबासाहेबांनी 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी' ही संस्था स्थापन करून मुंबईत सिद्धार्थ महाविदयालय व औरंगाबाद येथे 'मिलिंद महाविदयालय' या संस्था काढल्या व नावारूपास आणल्या. 



दलित समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी १९२७ मध्ये डॉ. आंबेडकरांनी महाडला ‘चवदार तळे' येथे अहिंसक सत्याग्रह केला. अस्पृश्यांना मंदिरप्रवेश मिळावा म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या काळाराम मंदिरातील प्रवेशासाठी सत्याग्रह करण्यात आला.डॉ. आंबेडकरांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळावर काम केले. १९४२ साली ते केंद्र सरकारात मजूरमंत्री होते.

गोलमेज परिषदेसाठी ते दलितांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले आणि स्वातंत्र्योत्तर काळात ते स्वतंत्र भारताच्या घटनेचे शिल्पकार झाले. आपल्या बांधवांना जागृत करण्यासाठी त्यांनी विद्वत्तापूर्ण असे अनेक ग्रंथ लिहिले. राजगृहात त्यांचा स्वत:चा ग्रंथसंग्रह फार मोठा होता. बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर, १९५६ रोजी आपल्या लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. ६ डिसेंबर, १९५६ रोजी दिल्ली येथे डॉ. आंबेडकरांचे महानिर्वाण झाले. मात्र पददलित समाजाला 'भीमशक्ती' प्रदान करूनच डॉ. भीमराव आंबेडकर हा आदित्य अस्तंगत झाला.

महत्‍वाचे मुद्दे : 

  • जन्मतः अस्पृश्यतेचा डाग 
  • पावलोपावली मानभंग 
  • शिक्षण व त्यासाठी मिळालेले साहाय्य 
  • निद्रिस्त समाजाला जागे केले 
  • बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना 
  • मूक समाजाचे नायक
  • वाचाल, तर वाचाल
  • संस्थेची स्थापना
  • महाविद्यालये काढली
  • चवदार तळे', मंदिरप्रवेश इत्यादी चळवळी 
  • वाचनाचा छंद 
  • अनेक ग्रंथलेखन 
  • ग्रंथसंग्रह 
  • घटना तयार केली 
  • बौद्ध धर्माचा स्वीकार 
  • महानिर्वाण

निबंध 3

‘सूर्यफुले हातात ठेवणारा फकीर हजारो वर्षांनंतर लाभला, आता सूर्यफुलासारखे सूर्योन्मुख झालेच पाहिजे,' या शब्दांत कवी नामदेव ढसाळ बाबासाहेब आंबेडकरांविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करतात. कवीने जणू आपल्या शब्दांतून सर्व दलितांचे मनोगतच व्यक्त केले आहे. दलितांना गुलामगिरीच्या बेड्या तोडून ताठ मानेने जगायला बाबासाहेबांनीच शिकवले, म्हणून दलितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परमेश्वरासमानच वाटतात. दलितांच्या वाट्याला आलेली दु:खे त्यांनी स्वतः अनुभवली होती, त्यामुळेच तेे आपल्या बांधवांना आत्मविकासाचा योग्य मार्ग दाखवू शकले,



बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू येथे आला होता, रत्नागिरी जिल्हयातील मंडणगडजवळील आंबवडे हे त्यांचे मूळ गाव, पण त्यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथे आणि माध्यमिक व विश्वविदयालयीन शिक्षण मुंबईत झाले. बडोदे सरकारची शिष्यवृत्ती मिळवून ते अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी गेले, अर्थशास्त्रात पीएच्. डी. पदवी प्राप्त केलेल्या आंबेडकरांना नोकरीत कनिष्ठ जातीमुळे अनेकदा अपमान सहन करावा लागला. तेव्हाच त्यांनी आपल्या कार्याची दिशा निश्चित केली. पुढे इंग्लंडला जाऊन ते कायदयाचे पदवीधर झाले.



विविध वृत्तपत्रे काढून आणि परिषदा भरवून त्यांनी दलित समाजात जागृती निर्माण केली. 'शिकवा, चेतवा व संघटित करा' हे त्यांच्या 'बहिष्कृत हितकारिणी' या संस्थेचे ब्रीदवाक्य होते. १९२७ मध्ये दलितांना प्रवेश करण्यास मनाई असणाऱ्या महाडच्या चवदार तळ्यात ते आपल्या जातिबांधवांसह उतरले. १९३० मध्ये त्यांनी नासिक येथील काळाराम मंदिरात प्रवेश करण्यासाठी सत्याग्रह केला. सायमन कमिशनपुढे साक्ष देऊन व तीनही गोलमेज परिषदांमध्ये भाग घेऊन त्यांनी दलितांची बाजू सातत्याने मांडली. भारताची राज्यघटना व हिंदू कोड बिल ही डॉ. आंबेडकरांची दोन महान कार्ये होत. आपल्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. आपल्या थोर नेत्याविषयी बोलताना कवी म्हणतो,


'तू फुकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर। 

तू तोडल्यास गुलामांच्या पायांतल्या बेड्या।।


निबंध 4 



 १९ व्या शतकात भारतीय समाजाला कलंक असलेल्या अस्पश्यतेच्या निवारणाचे कार्य निरनिराळ्या समाजसुधारकांनी केले होते पण या सर्वापेक्षा अतिशय निष्ठेने स्वानुभवाच्या आधारावर अस्पृश्यांना गुलामगिरीच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी जागृत व संघटित करण्याचे शिक्षणाद्वारे त्यांच्यात नवविचारांचा प्रसार करण्याचे व आत्मसन्मानाचा नवीन मार्ग दाखविण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. तसेच भारताच्या घटनेचे शिल्पकार म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य वेगळे व असामान्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील 'महु' या गावी झाला.



त्यांची माता भीमाबाई लहानपणीच वारल्याने वडील रामजी यांनी त्यांचे पालनपोषण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती पण त्यांना अभ्यासाची आवड होती. तरी त्यांनी बिकट परिस्थितीत १९१२ मध्ये एल्फिन्स्टन कॉलेजमधून बी. ए.ची परीक्षा पास केली. उच्च शिक्षण घेण्याची त्यांची जिज्ञासा होतीच त्यामुळे त्यांनी १९१५ मध्ये प्राचीन भारतातील व्यापार या विषयावर प्रबंध लिहुन त्यांनी कोलंबिया विद्यापीठाची एम. ए. पदवी संपादन केली.

१९१६ मध्ये त्यांच्या 'नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया ए हिस्टॉरिकल अॅण्ड अॅनॅलिटिकल स्टडी' या प्रबंधाबद्दल कोलंबिया विद्यापीठाने त्यांना पी. एच. डी. ही पदवी प्रदान केली. डॉ. आंबेडकरांना अर्थशास्त्रात संशोधन करण्याची व लंडन विद्यापीठाची पदवी मिळविण्याची आणि बॅरिस्टर होण्याची इच्छा होती. १९२१ मध्ये ते एम. एस. सी झाले. 'प्रॉब्लेम ऑफ रूपी' हा त्यांचा प्रबंध मान्य करून लंडन विद्यापीठाने त्यांना डी.एस.सी. पदवी दिली. १९२३ मध्ये बॅरिस्टरच्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले.


१९१७ मध्ये मुंबईला आंबेडकर आल्यानंतर त्यांनी बडोदा संस्थानची नोकरी स्वीकारली पण या नोकरीत ते अस्पृश्य असल्याने त्यांना इतरांकडून अतिशय मानहानीची वागणूक मिळाली तसेच अवहेलना व अपमान सहन करावा लागला. या वागणुकीमुळे आंबेडकरांनी अस्पृश्यांना शिक्षण देणे त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणणे आपल्या न्याय्य सामाजिक व आर्थिक हक्कांसाठी अहिंसक मार्गाने संघटित लढा देण्यासाठी अस्पृश्यांना आत्मनिर्भर बनविणे व त्यांच्या समान हक्कांसाठी निरनिराळ्या चळवळी करणे यांना पुढील काळात प्राधान्य दिले.


जातिसंस्था व अस्पृश्यता ही भारतीय समाज जीवनातील कीड असून अस्पृश्यांना अतिशय दयनीय मानहानिकारक जीवन जगावे लागत होते. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी २० जुलै १९२४ रोजी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. महाड येथे भरलेल्या सत्याग्रह परिषदेतच हिंदू समाजाचा धर्मग्रंथ असलेल्या मनुस्मृतीचे २५ डिसेंबर १९२७ रोजी दहन करण्यात आले. ही घटना अस्पृश्यांचा आत्मविश्वास वाढविणारी घटना होती.

 तसेच त्यांनी महाडच्या चवदार तळ्यावरील केलेला सत्याग्रह अन्यायी समाजव्यवस्थेविरुद्ध केलेले बंड होते. आपणास हक्क आहे हे देशाला सांगणारी एक प्रतीकात्मक कृती होती. २ मार्च १९३० रोजी नाशिक येथील काळा राम मंदिर येथे त्यांनी सत्याग्रह केले. त्याच्या प्रयत्नामुळे २४ सप्टेंबर १९३२ रोजी पुणे करारात अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदाराऐवजी १४८ जागा राखीव ठेवण्यात आल्या. 


१९33 साली काँग्रेसच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीयनी सह्या केल्या. १९३७ - १९३५ कायद्यामुळे झालेल्या निवडणुकीने आंबेडकर विरोधी पक्ष नेते निवडले गेले. १९२० च्या माणगांव परिषदेचा अध्यक्षपद भूषविले.१९३०-३१-३२ या तिन्ही साली गोलमेज परिषदेला अस्पृश्याचे प्रतिनिधी म्हणून उपस्थिती राहिले.१५ ऑगस्ट १९४७ च्या पंडीत नेहरूंच्या मंत्रिमंडळात ते कायदा मंत्री झाले. घटनेचा मसुदा समितीची प्रमुख जबाबदारी डॉ.आंबेडकरांवर टाकली गेली व ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्यामुळेच त्यांना घटनेचे शिल्पकार म्हटले जाते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक अस्पृश्य असल्यामुळे लोकांचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला नव्हता आणि त्यानी जे अस्पृश्यांसाठी कार्य केले त्यामळे उच्चवर्णीय लोकांमध्ये त्याच्या बद्दल आक्रोश होता पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाना अस्पृश्यासाठी जे कार्य केले त्यामुळे अस्पृश्यांना समाजात आर्थिक हक्कांसाठी शिक्षण घेण्यासाठी आत्मनिर्भर बनविले. त्यामुळे आंबेडकर अस्पृश्यांसाठी देवाचे अवतार आहेत.

हिंदू कोडबील संसदेत मांडल्यामुळे आधुनिक मनु म्हणून भारत देश त्यांना 'दलितांचा कैवारी' म्हणून ओळखतो. भारत शासनाने १९९०-९१ साली मरणोत्तर 'भारत रत्न' पुरस्कार दिला व १९९०-९१ साली सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे केले.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या कार्यामुळे बेव्हरले निफोल्सन ने आंबेडकरच्या तोंडून बाहेर पडणारे शब्द म्हणजे पिस्तुलातून बाहेर पडणारे बार त्यांच्याविषयी उद्गार म्हटले आहे. तसेच आचार्य अत्रे त्यांना महाराष्ट्राचा तेजस्वी ज्ञानयोगी म्हणतात. सयाजीराव गायकवाड त्यांना 'दलितांचा उद्धारकर्ता' म्हणतात तर राजर्षी शाहूमहाराज त्यांना 'दलितांचा मुक्तिदाता' म्हणत.


१९३६ साली त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली आणि १९४२ साली त्यांनी 'अखिल भारतीय शेड्युल्ड कास्टस फेडरेशन सोसायटी'ची स्थापना केली. तसेच १९४६ साली पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि त्याच वर्षी औरंगाबाद येथे 'मिलिंद महाविद्यालय' व 'सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स' मुंबई येथे त्यांनी सुरू केले.


१९१६ साली त्यांनी 'Caste in India' हे पुस्तक लिहिले. राजर्षीच्या मदतीने १९२० साली 'मूकनायक' वृत्तपत्र सुरू केले १९३० साली त्यांनी 'जनता उत्कृष्ट वृत्तपत्र' सुरू केले. पुढे ५६ साली नामांतर करून त्याचे 'प्रबुद्ध भारत' केले गेले. १९४६ साली त्यांनी Who Were Shudras पुस्तक लिहिले तसेच त्यांनी The Untouchable हा ग्रंथ लिहिला १९५६ साली त्यांनी Bouddh and his Dharm हा ग्रंथ लिहिला जो त्याच्या मृत्यूनंतर म्हणजे ६ डिसेंबर १९५६ साली त्यांचा मृत्यू झाला आणि १९५७ साली हा ग्रंथ प्रकाशित झाला.



डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना समिती तयार केली जगात सर्वांत उत्कृष्ट घटना समिती आहे. त्यांनी त्या घटना समितीत अस्पृश्यांसाठी राखीव जागा ठेवली आहे ज्यामुळे अस्पृश्यांना नोकरी व अन्य कोणत्याही क्षेत्रात प्रवेश घेता येतो. महात्मा ज्योतीबा फुले, महाराजा सयाजीराव गायकवाड, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, गोपाळबाबा वलंगकर विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारण्याचे कार्य सुरू केलेले होते. पण वरिष्ठ जातींच्या मनोभूमिकेत काहीही बदल झाला नाही.

डॉ. आंबेडकर यांनी हा बदल घडवून आणला. तसेच हे कार्य करताना त्यांना हिंदू धर्मात अस्पृश्यांना माणुसकीचे अधिकार मिळणार नाहीत जाणवू लागले होते. त्यामुळे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे चंद्रमणी महास्थवीर यांच्या हस्ते बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. अशाप्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक महान व्यक्ती होते.

निबंध 5

महामानव - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

थोर समाज उद्धारक, दलितांचे कैवारी, प्रकांड पंडीत, घटनेचे शिल्पकार, मानवतावादी विचारांचे महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. त्यांचे संपूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर. त्यांचे माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे झाले. त्या काळातील समाज अज्ञान, निरक्षरता, अनिष्ट रूढी-परंपरा, गरिबी अशा व्याधींनी पोखरलेला होता.दलित बांधवांना तर मानवतेचे हक्कसुद्धा नाकारले जात होते. 


अन्याय, छळ, अपमान यांनी त्यांचे रोजचे जीवन दु:खमय झाले होते. अशा समाज बांधवांची दुःखे डॉ. बाबासाहेबांनी पाहिली आणि स्वत:ही अनुभवली होती. माझ्या बांधवांचे दुःख मी दूर करीन. त्यांना मानवतेचे अधिकार मिळवून देईन; अशा विचारांनी प्रेरीत होऊन त्यांनी आपल्या कार्याला सुरवात केली. शिक्षणाचे महत्त्व त्यांनी ओळखले होते. म्हणूनच अत्यंत बिकट परिस्थितीतही त्यांनी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतले.


अर्थशास्त्रात डॉक्टरेट आणि कायद्यातील बॅरीस्टर ह्या उच्च पदव्या मिळविल्या. लंडनला भरलेल्या गोलमेज परीषदेत त्यांनी आपल्या बांधवांचे दु:ख जगासमोर आणले. लोकशाही राज्यव्यवस्थेचा पुरस्कार केला.
दलित बांधवात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी मुंबई, औरंगाबाद येथे महाविद्यालये, वसतीगृहांची स्थापना केली. शिका, संघर्ष करा आणि आपले हक्क मिळवा, अशी आपल्या बांधवांना शिकवण दिली. 



समाज प्रबोधनासाठी, त्यांनी अनेक संस्थांची स्थापना केली. अनेक महान ग्रंथ लिहून समाजशिक्षण केले.
त्यांच्या अथक प्रयत्नाने दलित बांधवांमध्ये शिक्षणाचा खूप प्रसार झाला. बाबासाहेबांनी त्यांना माणूसकीचे अधिकार मिळवून दिले. मानाने जगण्यास शिकवले...



हे सर्व करीत असताना त्यांनी आपल्या देशासाठी मोठे योगदान दिले. शेतकरी, मजूर, कामगार यांचे प्रश्न सोडविले. स्वतंत्र भारतासाठी राज्यघटना लिहुन भारतात लोकशाही राज्यव्यवस्थेचा मजबूत पाया घातला. म्हणूनच आज भारत हे जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र ठरले आणि जगाच्या प्रशंसेस पात्र ठरले.



असे सर्व झाले तरी रूढीग्रस्त समाज अजूनही दलित बांधवांना आपले म्हणत नव्हता. म्हणून अखेर डॉ. बाबासाहेबांनी पूर्ण विचार करून आपल्या लाखो अनुयायासह हिंदू धर्माचा त्याग करून १९५६ मध्ये बौद्ध धर्माचा स्वीकार केला. असे मानवतेचे, समाजप्रबोधनाचे कार्य करीत असताना त्यांना राजर्षी शाहूमहाराज, बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी मदत केली. 


डॉ. बाबासाहेबांनी, आपला समाज, आपला देश यांची उन्नती करण्यासाठी अखेरपर्यंत लढा दिला. देशाने आणि जगाने या महामानवाला अनेक सन्मान देऊन गौरविले. आपल्या बांधवांची आणि देशाची सेवा करीत असतानाच ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे महानिर्वाण झाले.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

Dr Babasaheb Ambedkar Essay In Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध

खेळाचे महत्व मराठी निबंध | Khelache Mahatva Essay Marathi

निबंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण खेळाचे महत्व मराठी निबंध  बघणार आहोतया लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. या निबंधामध्‍ये आज खेळांबद्दल असलेला दृष्‍टीकोन , खेळाचे शारीरीक व मानसीक दृष्‍टया असणारे फायदे स्‍पष्‍ट केले आहेत.  आज आपण खेळाचे महत्व  शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 


आज भारतीयांच्या जीवनात खेळांना महत्त्व आले आहे. आजकाल खेळाविषयीचा दृष्टिकोन थोडा थोडा बदलू लागला आहे; पण काही वर्षांपूर्वी खेळण्यात वेळ घालवणारे मूल हे अवलक्षणी समजले जायचे. इतकेच काय, एखादयाने 'खेळ' हे आपले जीवनध्येय (करिअर) करायचे ठरवले, तर त्याला 'भिकेचे डोहाळे' लागले असे मानले जायचे.


आज खेळातूनही पैसा मिळू शकतो, हे पाहून काही लोक तो आपल्या करिअरचा भाग करतात; पण त्याचबरोबर खेळाचे इतर फायदेही आज आपणाला उमगले आहेत. निकोप शरीरातच निकोप मन असू शकते, हे उमगल्यावर शरीर निकोप, सुदृढ ठेवण्यासाठी माणसे धडपडू लागली आणि निकोप शरीराचा एक मार्ग खेळाच्या पटांगणातून जातो, हे उमगल्यावर त्यांना खेळ हवेहवेसे वाटू लागले.


Khelache-Mahatva-Essay-Marathi
Khelache-Mahatva-Essay-Marathi


लहानपणी आपला बराचसा वेळ हा खेळण्यात जातो; पण लहानपणचे बहुतेक खेळ हे गमतीखातर खेळले जातात. त्यांत कोणतीही शिस्त नसते. बालपण हे फुलपाखरासारखे असते. जेव्हा बालपण संपते, शैशवही ओलांडले जाते आणि कुमारावस्था प्राप्त होते, तेव्हा शिस्तीची आवश्यकता निर्माण होते. जीवनातील सर्वच क्षेत्रांत शिस्त अनिवार्य आहे, तशी ती खेळांतही आवश्यक असते.(हा निबंध पण वाचा शालेय जीवनात खेळाचे महत्त्व)


खेळांनी व्यायाम होतो, शरीर बळकट होते; पण खेळातील शिस्त जीवनालाही वळण देते. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. तेथे आपल्या एकट्याचा विचार करून चालत नाही, संपूर्ण संघाचा विचार करावा लागतो. खेळामुळे मनोरंजन होते व मनाला उत्साह मिळतो. दोन-चार तास अभ्यास केल्यावर कंटाळा येतो. त्यानंतर थोडा वेळ खेळल्यावर कंटाळा पळून जातो आणि अभ्यासासाठी पुन्हा उत्साह येतो. खेळात मनाची एकाग्रता साधता येते.



खेळांचाही अभ्यास करावा लागतो, खेळालाही सराव लागतो आणि खेळासाठीही उत्तम मार्गदर्शक गुरू असावा लागतो. खेळ म्हटला की यश आणि अपयश आलेच. कधी हार होणार, कधी जीत होणार; पण हारही हसत स्वीकारता आली पाहिजे. हरणारा खेळाडू जिंकलेल्या खेळाडूचे प्रथम अभिनंदन करतो. खेळातून येणारी ही खिलाडूवृत्ती जीवनात फार उपयोगी पडते. (हा निबंध पण वाचा माझा आवडता खेळाडू निबंध मराठी मध्ये)



प्रत्येकाला आपल्या जीवनात केव्हा ना केव्हा संकटाला तोंड दयावे लागते. कधी हार  पत्करावी लागते. अशा वेळी खिलाडूवृत्ती असेल तरच आपण पुढे जातो. अपयशाने खचून जाणाऱ्याच्या हातून काहीच घडत नाही. जशी हार, तशीच जीत ! हार झाल्याने खचून जाऊ नका. तसेच, जीत झाल्याने फुगून जाऊ नका, असे सच्चा खेळाडू सांगतो. खेळातील हार संयमाने स्वीकारावी, तसाच जीवनातील विजयही विनम्रतेने स्वीकारावा.

खेळात हार-जीत असली तरी खेळ खेळले जातात ते मैत्रीसाठी! ऑलिम्पिक, विम्बल्डन, एशियाड आदी विविध खेळांच्या जागतिक स्पर्धा वर्षभर खेळल्या जातात, ते एकमेकांचे कौतुक करण्यासाठी, स्नेहाचा हात पुढे करण्यासाठी! खेळांमुळेच आपली उत्साही वृत्ती टिकून राहते.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 2

अभ्यासाइतकेच जीवनात व्यायाम व खेळ यांनाही महत्त्व आहे. मुलांच्या मानसिक विकासाबरोबरच मुलाचा शारीरिक विकासही झाला पाहिजे. व्यायाम, खेळ शारीरिक विकास करतात तर शिक्षण, चिंतन, मननामुळे व्यक्तीचा मानसिक विकास होतो. 


खेळाची अनेक रूपे आहेत. काही खेळ मुलांसाठी, काही मोठ्यांसाठी तर काही वृद्धांसाठी असतात. काही खेळ खेळण्यासाठी मोठी मैदाने लागतात. काही खेळांना मात्र लागत नाहीत. घरातल्या घरात खेळले जाणारे कॅरम, पत्ते, बुद्धिबळ, सोंगट्या या खेळामुळे मनोरंजन व बौद्धिक विकास होतो.

स्वस्थ शरीरातच स्वस्थ मनाचा विकास होतो" जी मुले अभ्यासाबरोबरच खेळातही भाग घेतात ती चपळ, उत्साही असतात. त्यांची हाडे मजबूत आणि चेहरा तजेलदार होतो. पचनशक्ती चांगली राहते. डोळे चांगले राहतात, शरीर वज्राप्रमाणे होते. व्यायाम न केल्यास मनुष्य आळशी व निस्तेज बनतो.



मनुष्याला जे धडे शिक्षण शिकवू शकत नाही ते खेळाचे मैदान शिकविते. उदा० खेळ खेळताना शिस्त पाळावी, नेत्याच्या आज्ञेचे पालन करावे, खेळात विजयाच्या वेळी उत्साह असावा पण हार झाली तरी बदल्याची भावना नसावी. 


मुलांच्या किशोरावस्थेपासूनच त्यांना त्यांच्या आवडीचे खेळ खेळू दिले पाहिजेत. त्यांना संघर्षासाठी तयार केले पाहिजे. म्हणजे ते भविष्यातही यशस्वी होतील. विश्व विक्रम करून आपला आणि देशाचा गौरव ते वाढवितील. सांघिक खेळांमुळे संघभावना व जबाबदारीची जाणीव होते.


खेड्यांतील आणि शहरांतील खेळात फरक असतो. खेड्यांतली मुले विटीदांडू, कबड्डी, गोट्या खेळतात. तर शहरातील मुले क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिससारखे खेळ खेळतात. वाढत्या लोकसंख्येमुळे खेळांची मैदाने कमी होत आहेत. खेळांडूसाठी खेळाचे मैदान मोठे आणि हवेशीर असले पाहिजे. त्यांनी हिरव्या भाज्या, दूध, फळे आदींचे सेवन केले पाहिजे. 


स्वच्छ वातावरणात राहिले पाहिजे. हे शरीर ईश्वराची देणगी आहे. त्याला निरोगी ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे. त्याच्या सुरक्षिततेसाठी खेळ, व्यायाम, आणि शिक्षण आवश्यक आहे. शाळेमध्ये खेळांत भाग घेण्यास उत्तेजन दिले पाहिजे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 3


खेळाचे महत्व मराठी निबंध | Khelache Mahatva Essay Marathi


विद्यार्थी जीवनात अभ्यासाइतकेच खेळालाही महत्त्व आहे. पालकांच्या आता हे लक्षात आले आहे की, मुलांच्या मानसिक विकासाबरोबरच त्यांचा शारीरिक विकासही झाला पाहिजे. मानवाचे संपूर्ण जीवन मन आणि शरीररूपी गाडीच्या दोन चाकांवर चालते.



शिक्षण, चिंतन, मनन, व्यक्तीचा मानसिक विकास आणि व्यायाम, खेळ, शारीरिक विकास करतात. खेळाची दोन रूपे असतात. घरात बसून खेळले जाणारे खेळ उदा. कॅरम, बुद्धिबळ, पत्ते इ. मैदानावर मोकळ्या जागी खेळले जाणारे खेळ उदा. खो खो, क्रिकेट, फुटबॉल इ. घरात खेळल्या जाणाऱ्या खेळांमुळे व्यायाम कमी पण बौद्धिक विकास आणि मनोरंजन होते. मैदानी खेळांमुळे शरीराला भरपूर व्यायाम होतो व मनोरंजनही होते.



'निरोगी शरीरात निरोगी मनाचा निवास असतो' शरीर अस्वथ असेल तर मनही अस्वस्थ असते. जी मुले केवळ पुस्तकातील किडे असतात त्यांचा शारीरिक विकास खुंटतो. ती चिडचिडी व सुस्त होतात. स्वत:चे रक्षणही ती करू शकत नाहीत. जी मुले अभ्यासाबरोबरच निरनिराळे खेळही खेळतात ती प्रसन्न व निरोगी राहतात.

उत्साही आणि चपळ राहिल्यामुळे शारीरिक शक्तीचा विकास होतो. यावरच मानसिक व आत्मिक विकास अवलंबून असतो. दिवसभर यंत्राप्रमाणे काम केल्यानंतर जर खेळाच्या मैदानावर मुले गेली नाहीत तर बुद्धिमान विद्यार्थीसुद्धा निर्बुद्ध होऊन जाईल. आणखी काम करण्याची इच्छा मनांत निर्माण होण्यासाठी खेळणे आवश्यक आहे.


विद्यार्थी, जीवनात फक्त अभ्यासच करीत राहू नये किंवा नुसते खेळतच बसू तये तर “Work while you work, play while you play." हे चांगल्या विद्यार्थ्याचे लक्षण आहे. माणसाचे मन सदैव अभ्यासात गुंतलेले राहिल्यास डोके जड़ पडते आणि त्याला विश्रांतीची गरज भासते. ही विश्रांती खेळण्यामुळेच मिळते.



खेळण्यामुळे मानसिक द्वंद्व मिटते. मन हलके होऊन शरीरात नवीन ऊर्जा शक्ती येते. हाडे मजबूत होतात आणि चेहरा कांतिमान होतो. पचनशक्ती चांगली राहते. डोळ्यांची ज्योती (तेज) वाढते. शरीर वज्राप्रमाणे होते. खेळ जीवनात संजीवनी बुटीचे काम करते. खेळ मनोरंजनाचे एक चांगले साधन आहे.



जेव्हा खेळाडू खेळाच्या मैदानावर खेळतो तेव्हा तो पुलकित होतो. खेळ खेळण्यामुळे खेळाडू, स्वतः प्रेक्षकही आनंदी होतात. क्रिकेट आणि हॉकीचा सामना पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक स्टेडियमवर उपस्थित असतात. खेळाडूची एकाग्रता खेळ व अन्य कामांत सारखीच असते.



शिक्षण घेऊन जे शिकावयास मिळत नाही ते खेळात शिकावयास मिळते. उदा. शिस्त विद्यार्थी जीवनात शिस्तीला खूप महत्त्व आहे. शिस्तीत राहूनच विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतो. शिक्षकही शिस्तीतच अध्यापन करतात. शिस्त नसेल तर शाळा कुस्तीचे मैदान बनेल.



जो संघ जितका शिस्तबद्ध असेल तितके सामना जिंकणे त्याला सोपे होते. अन्यथा हरण्याची शक्यता जास्त असते. याखेरीज खेळात परस्पर सहकार्याची भावना पण उत्पन्न होते. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी इत्यादी खेळांमध्ये दोन संघ असतात. प्रत्येक संघाचे खेळ वेगळे असतात व प्रत्येकाचे महत्त्वही वेगळे असते.



कप्तान संघनेता असतो. त्याच्या आदेशाचे सगळे खेळाडू पालन करतात. संघातील खेळाडूंच्या परस्पर सहकार्यामुळे संघ विजयी होतो. खेळ मनुष्याला स्वावलंबी व आत्मविश्वासू बनवितो. ज्याप्रमाणे विद्यार्थी जीवनाचे उद्दिष्ट अभ्यास करणे हे असते त्याचप्रमाणे खेळाच्या मैदानावर उतरल्यावर खेळाडूचे उद्दिष्ट आत्मविश्वासाने खेळून विजय प्राप्त करणे हे असते. विजयाची इच्छा खेळाडूला विजयी बनविते.

खेळ हा खेळाडूचा आत्मा असतो. खेळ केवळ खेळाच्या भावनेतूनच खेळले जावेत. त्यामुळे खेळाडूंमध्ये परस्पर सहकार्य, शिस्त, संघटन, सहनशीलपणा येतो. खेळात संघर्ष हा असतोच. त्यातून जो विजय मिळतो त्याचा आनंद खास असतो.



विजय मिळाल्यावर उत्साह वाटणे, पराजय सहन करणे व बदल्याची भावना मनात न ठेवता पराजयाच्या कारणांचा शोध घेऊन ती दूर करून जिंकण्याचा प्रयत्न करणे ही खऱ्या खेळाडूची लक्षणे होत. पराजयच यशाचा संदेश देते.


खेळांमध्ये केवळ दोन संघांमध्येच जवळीक निर्माण होते, असे नसून क्रिकेटसारख्या खेळांमुळे दोन देशांमध्ये ही जवळीक निर्माण होते. खेळ विश्वबंधुत्वाची भावना निर्माण करतात. धनुर्विद्या, घोडेस्वारी, कबड्डी, मल्लयुद्ध यासारख्या खेळांची परंपरा आपल्या देशात प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.



आजही या खेळांचे महत्त्व कमी झालेले नाही. भारत खेळांमध्ये मागे नाही. आशियाई क्रीडा स्पर्धा, क्रिकेटचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामने येथे नेहमीच होतात. जिल्हा, मंडळ, प्रादेशिक, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडास्पर्धा होत राहतात. विजयी खेळाडूंना पुरस्कार दिले जातात.



नव्या खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाते. खेळामध्ये नव्या गोष्टी शिकावयास मिळतात. आपल्या पराजयाची कारणे शोधून ती दूर करून पुन्हा विजय प्राप्त केला जातो. यात गुरू वा प्रशिक्षकाचे सहकार्य मिळते म्हणून भारत सरकार विजयी खेळाडूला "अर्जुन पुरस्कार" देते आणि प्रशिक्षकाला "द्रोणाचार्य पुरस्कार' देते.

शिक्षण मनुष्याला सभ्य आणि देशप्रेमी बनविते. खेळांमुळे बंधुत्व, सहकार्य, शिस्त, निष्ठा, स्वावलंबीपणा इत्यादी गुण विकसित होतात. म्हणून जीवनात खेळांचे स्थान गौण नाही. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.

खेळाचे महत्व मराठी निबंध | Khelache Mahatva Essay Marathi

माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध | My Favourite Game Cricket Essay In Marathi

निबंध 1 

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्‍ये  लोकांचे क्रिकेटवर  असलेले अपार प्रेम व्यक्त  केले आहे. क्रिकेट या खेळाचे फायदे , सविस्तर रित्या सांगीतले आहेत . वर्णन केेले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 

आज एकविसाव्या शतकात माणसाला खेळाचे महत्त्व उमगलेले आहे. शरीर निरोगी राहण्याकरिता व्यायाम, योग वा खेळ आवश्यक आहेत हे सर्वमान्य झाले आहे. आज भारतात क्रिकेट हा अत्यंत लोकप्रिय खेळ ठरला आहे. त्यामुळे साहजिकच क्रिकेट खेळणाऱ्यांपेक्षा क्रिकेट पाहणारे व ऐकणारे यांचीच संख्या फार मोठी झाली आहे. मी त्यांपैकीच एक मी क्रिकेट खेळतो, क्रिकेटसंबंधित पुस्तके वाचतो आणि मैदानावर जाऊन मी मोठ्या हौसेने क्रिकेट खेळतो, पंरतु मैदानावर जाणे न जमल्यास T.V. किंंवा मोबाईलवर क्रिकेटचे सामने पाहतो.


 असे सामने पाहताना सर्व क्रिकेटप्रेमी देहभान हरपून जातात. क्रिकेटवर अलीकडे खूप टीका होत आहे. ती रास्तच आहे. हा खेळ चार-चार, पाच-पाच दिवस चालतो. क्रिकेटचे सामने असले की लोकांमध्ये अक्षरशः वारे संचारते. लोक कामधाम सोडून हा खेळ पाहत बसतात. त्यामुळे देशभर कामाचे लक्षावधी तास फुकट जातात. कामावर हजर असलेले लोक एकाग्र चित्ताने कामे करीत नाहीत. विदयार्थ्यांचे तर अभ्यासाकडेही दुर्लक्ष होते. देशाच्या कार्यशक्तीची ही फार मोठी हानी आहे, यात शंकाच नाही.



आपले क्रिकेटपटू खेळापेक्षा पैशाकडे लक्ष देतात. आपण देशाच्या वतीने खेळत आहोत, ही भावनाच लुप्त होत आहे. अलीकडे तर आपल्या खेळाडूंचा कोटी कोटी रुपयांना लिलाव होऊ लागला आहे. वारेमाप प्रसिद्धी व वारेमाप पैसा यांमुळे या खेळांच्या सामन्यात मॅच फिक्सिंगसारख्या विकृत प्रवृत्ती शिरल्या आहेत. या खेळाकडे कोणीही खेळ म्हणून पाहतच नाही. खिलाडूवृत्ती नष्ट होत आहे. इतर खेळांना काडीचीही किंमत कोणी देताना दिसत नाही.

My-Favorite-Game-Essay-In-Marathi
My-Favorite-Game-Essay-In-Marathi



असे असले तरी हा खेळ मला खूप आवडतो. या खेळाचे काही फायदेही आहेत. या खेळामुळे चपळता, काटकपणा व शिस्तप्रियता या गुणांचा विकास होतो. या खेळात फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या सर्व बाबतीत आपले नैपुण्य दाखवता येते. चौकार षटकार मारणाऱ्या, अवघड झेल पकडणाऱ्या खेळाडूला प्रेक्षक डोक्यावर घेतात. क्षणाक्षणाला चुरस वाढवणारा असा हा खेळ आहे.

अलीकडे क्रिकेटचे स्वरूप बदलत आहे. सध्या कसोटी सामन्यांबरोबर एकदिवसीय सामनेही खेळले जातात. वीस वीस (20-20 किंवा T20) षटकांचे सामनेही लोकप्रिय झाले आहेत; कारण त्यांचा निकाल झटपट लागतो. आपल्या देशात अनेक उत्कृष्ट क्रिकेटवीर होऊन गेले व आजही आहेत. त्यांनी जागतिक कीर्ती मिळवली. आज सचिन तेंडुलकर हा सर्वांचा आवडता खेळाडू आहे.

क्रिकेटमध्ये वैयक्तिक विक्रमांची नोंद ठेवली जात असली तरी या खेळात सांघिक एकता हीच महत्त्वाची आहे. तीच यश खेचून आणते. काही वेळेला एखादया खेळाडूने भरपूर धावा केल्या तरी संघाला यश मिळत नाही. 'क्रिकेट हा योगायोगाचा (Chance) खेळ आहे'. प्रत्येक डावात काय घडेल, हे सांगणे कठीण असते. प्रत्येक खेळाडूला अतिशय जबाबदारीने खेळावे लागते; कारण त्यावरच त्याच्या संघाचा आणि पर्यायाने देशाचा लौकिक अवलंबून असतो.

मित्रांनो तुम्‍हाला maza avadta khel marathi nibandh हा निबंध कसा वाटला  व तुमचा आवडता क्रिकेटर कोण आहे हे सांगण्‍यास विसरू नका.  . धन्‍यवाद . 
महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  •  खेळाचे जीवनातील अनन्यसाधारण स्थान
  •  खेळांचे उपयोग नेतृत्वगुण
  • सांघिक भावना ,ऐक्य 
  • जबाबदारीची जाणीव 
  • निकोप दृष्टिकोन दुसऱ्यांविषयी आपुलकी 
  • वेळेचे महत्त्व 
  • शिस्तप्रियता, चपळता, काटकपणा 
  • सध्या बहुतेकांची आवड क्रिकेट 
  • खेळाचा तपशील व महत्त्व
 निबंध 2

क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. यात दोन संघांत सामने होतात. प्रत्येक संघात ११ + ३ खेळाडू असतात. या खेळासाठी चपळता, काटकपणा आणि शिस्तप्रियता आवश्यक असते. तीन स्टम्प्स व त्यांवरील दोन बेल्स मिळून विकेट  तयार होते. अशा समोरासमोरील दोन विकेट्स असतात. विकेटची रुंदी २२.९ सेमी असते. दोन विकेट्समध्ये २२ यार्ड अंतर असते, यालाच 'पिच' किंवा खेळपट्टी म्हणतात. खेळपट्टीची रुंदी ५ फूट असते. मैदान सामान्यत: वर्तुळाकृती असते. 


जेव्हा एक संघ फलंदाजी स्वीकारतो, तेव्हा दुसरा संघ गोलंदाजी पत्करतो. दिवसा खेळल्या जाणाऱ्या कसोटी क्रिकेटसाठी लाल रंगाचा चेंडू वापरतात तर दिवस-रात्र खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी सफेद रंगाचा चेंडू वापरतात. बॅटची लांबी ३४ इंचांपेक्षा व रुंदी ४ ५ इंचांपेक्षा अधिक नसावी. बॅटचे वजन मात्र निश्चित नसते.

या खेळात फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या सर्व बाबतीत आपले नैपुण्य दाखवता येते. चौकार-षटकार मारणाऱ्या, अवघड झेल पकडणाऱ्या खेळाडूला प्रेक्षक डोक्यावर घेतात. क्षणाक्षणाला चुरस वाढवणारा असा हा खेळ आहे.

सध्या कसोटी सामन्यांबरोबर एकदिवसीय सामनेही खेळले जातात. या प्रकारचे सामने लोकप्रिय झाले आहेत; कारण त्यांचा निकाल झटपट लागतो. आपल्या देशात अनेक उत्कृष्ट क्रिकेटवीर होऊन गेले व आजही आहेत. त्यांनी जागतिक कीर्ती मिळवली. आज सचिन तेंडुलकर हा सर्वांचा आवडता खेळाडू आहे.

निबंध 3 

माझा आवडता खेळ


खेळ म्हणजे क्रीडा, करमणुकीचे साधन. ज्याच्यामुळे आपल्याला विरंगुळा मिळतो. आनंद मिळतो, तो खेळ. आपण आजच्या धकाधकीच्या जीवनात मनावरील दडपण कमी करण्यासाठी खेळ खेळतो किंवा बघतो. आपले जीवन-देखील एक खेळच आहे.


"दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव,

हासत हासत झेलू, आपण पराजयाचे घाव॥"


खेळ म्हटला, की जय-पराजय, यश-अपयश आलेच. मग यशाने हुरळून जाऊ नका नि पराजयाने खचून जाऊ नका, असा सदेश देणारा खेळ मला आवडतो. खेळ प्राण पणाला लावून खेळला जात नाही; तर कौशल्य पणाला लावून खेळला जातो. कौशल्य प्राप्त होण्यासाठी सराव महत्त्वाचा असतो. खेळ वैयक्तिक पातळीवर आणि सांघिकपणे खेळला जातो.



लंगडी, कबड्डी, हॉकी, व्हॉलीबॉल, फुटबॉल, बास्केट बॉल, टेनिस इ. पण सध्या सर्वात लोकप्रिय खेळ आहे क्रिकेट. क्रिकेट हा खेळ सांघिकपणे खेळला जातो. या खेळात चौदा प्रमुख खेळाडू असतात. त्यातील अकरा खेळाडू खेळतात. म्हणजेच तीन खेळाडू राखीव असतात. या खेळात गोलंदाजी, फलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही बाबतीत आपले नैपुण्य दाखवता येते. चौकारषटकार मारणाऱ्या फलंदाजाला, तसेच अवघड झेल पकडणाऱ्या क्षेत्ररक्षकाला प्रेक्षकांकडून प्रोत्साहन मिळते. क्षणाक्षणाला चुरस वाढविणारा हा खेळ आहे.



क्रिकेटमध्ये वैयक्तिक विक्रमांची नोंद ठेवली जाते. तरीही, या खेळात सांघिक एकता फार महत्त्वाची ठरते. सांघिक एकता, सहकार्य असल्याशिवाय यश मिळत नाही. कधीकधी एखाद्या खेळाडूने भरपूर धावा केल्या, तरीही संघ यशस्वी होईल, असे निश्चित सांगता येत नाही. 'क्रिकेट हा योगायोगाचा' खेळ आहे. प्रत्येक डाव हा उत्सुकता वाढविणारा असतो. प्रत्येक खेळाडूला अतिशय सावधतेने व जबाबदारीने खेळावे लागते.



ह्या खेळाबद्दलचे सामान्य लोकांना वाटणारे आकर्षण वाढत चालले आहे. खेळाडूंचे चारित्र्य निखळ हवे, तरच खेळ निखळ होईल. निखळपणाबद्दल सांगायचे, तर भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना होता. गुंडाप्पा विश्वनाथ संघनायक होते. सामना रंगात आला असताना पंचांनी इंग्लंडच्या एका खेळाडूला बाद दिले. तो निर्णय चुकीचा होता, हे कर्णधार गुंडाप्पा विश्वनाथने पंचांच्या लक्षात आणून दिले व त्या खेळाडूला खेळू देण्याची विनंती केली.



पंचांनीही विनंती मान्य करून त्या खेळाडूला खेळू दिले. या निर्णयामुळे सामना फिरला आणि भारताचा पराभव झाला. पण मला वाटते, हा खेळ स्कोअर बुकच्या पलीकडे नोंदवला गेला. कारण या सामन्यातील भारतीय संघाच्या पराभवापेक्षा विश्वानाथने निखळ खेळाडू म्हणून नोंदवलेला विजय जास्त महत्त्वाचा !  



म्हणून या खेळात नम्रता, शिस्तपालन, माणुसकी हे गुण खेळातील यशापेक्षा मोठे यश असतात. या खेळामुळे करमणूक होते, ती खेळ पाहणाराची; पण खेळ प्रत्यक्ष मैदानावर खेळणाराचा व्यायाम होतो. 



खेळ खेळल्याने शरीर बळकट होते. खेळातील शिस्त जीवनालाही वळण देते. क्रिकेट हा खेळ सांघिक खेळ असल्याने या खेळात वैयक्तिक विचार करून चालत नाही. संपूर्ण संघाचा विचार करावा लागतो. शिवाय, खेळामुळे मनाची एकाग्रता वाढते. खिलाडूवृत्ती वाढते. हे सगळे फायदे लक्षात घेता मलाच काय, सगळ्यांनाच आवडणारा खेळ म्हणजे क्रिकेट.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद



माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध | My Favourite Game Cricket Essay In Marathi

माझे गाव मराठी निबंध | Maze Gav Essay In Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझे गाव मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्‍ये गावात असलेेेेेल्‍या अडचणी जर मनावर घेतल्‍या तर कश्‍या प्रकारे सोडवल्‍या जाऊ शकते व त्‍यानंतर झालेल्‍या प्रगतीचे  वर्णन केेले आहे.  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

आज मी माझ्या गावाची हकिकत सांगणार आहे. त्याचे कारणही महत्त्वाचे आहे. नुकताच शासनाकडून 'निर्मल ग्राम' हा गौरव पुरस्कार माझ्या गावाला मिळाला आहे. पुरस्कारापोटी दोन लाख रुपये मिळाले. हजारो गावांत माझे  गाव 'निर्मल ग्राम' ठरले याचा मला मोठा अभिमान वाटतो.


सह्याद्रीच्या कुशीतील अणूर हे एक खेडे. जमीन खडकाळ, बरड. फारशी सुपीक नाही. पाण्याची तर नेहमीचीच ओरड. गावात साधारण सहाशे-सातशेपर्यंतची वस्ती. गावात शिक्षणाचे प्रमाण कमी. सहकार्य जवळजवळ नाहीच. स्वच्छता बाळगण्याची वृत्ती नाही. गाव एकंदरीत बकाल बनला होता.

maze gav essay in marathi
maze gav essay in marathi


अशा या गावाचे एवढे परिवर्तन कसे झाले? गावाचेच सुदैव म्हणायचे ! गावातला रघू शहरातून गावाकडे परत आला; म्हणून हे सारे घडले ! रघू शहरात नोकरी करत होता. पण त्याची प्रकृती ठीक राहीना म्हणून तो गावाकडे परत आला. रघूला बरे वाटले आणि त्याने गावातच राहायचे ठरवले. रघूला स्वस्थ बसवेना. त्याने सर्व गावकऱ्यांना एकत्र केले. तो गावात नवा असल्याने त्याचे गावातील कोणाशीही भांडण नव्हते. त्यामुळे त्याच्या विनंतीवरून सगळे एकत्र जमले. रघुने स्वच्छ सुंदर गावाची कल्पना गावकऱ्यांसमोर मांडली. बहुसंख्य लोकांनी रघूची टिंगल केली.

रघूने कामाला सुरुवात केली. प्रथम त्याने प्रत्येक घराला संडास बांधायची कल्पना मांडली. गावकऱ्यांबरोबर तो स्वतः काम करत असे. गावाची दुसरी अडचण होती ती पाण्याची. गावातल्या महिलांना खूप दूरवरून पाणी आणावे लागत असे. रघूने यासंबंधी खूप विचार केला. काही जाणकारांशी चर्चा केली. त्याने जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावात तीन विहिरी खणल्या. काही बोअर विहिरी काढल्या आणि जो काही तुटपुंजा पाऊस पडतो त्याचे पाणी अडवण्याचे उपाय सुचवले. बघता बघता गावाचा कायापालट होऊ लागला. गोबर गॅस, ओल्या कचऱ्यापासून खत असे काही प्रकल्प यशस्वी झाले. रघूने पारंपरिक शेतीला वनशेतीची जोड दिली. गावाची आर्थिक स्थिती सुधारली.

गावातील भांडणे संपली. गावकरी गुण्यागोविंदाने राहू लागले. एकमेकांच्या मदतीला जाऊ लागले. गावात दहावीपर्यंत शाळा सुरू झाली. लघुउदयोग सुरू झाले. लोक विधायक कामात गुंतले. बघता बघता माझा गाव निर्मळ झाला. साऱ्या महाराष्ट्रात 'निर्मल ग्राम' हा किताब मिळवणारा माझा गाव आज साऱ्यांच्या कौतुकाचा विषय झाला आहे. अशी आहे आमच्या आदर्श गावाची कथा.

मित्रांनो तुम्‍हाला माझे गाव मराठी निबंध  हा निबंध कसा वाटला  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद . 


महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )
  •  स्थळ 
  •  गावाचे मूळ स्वरूप 
  •  गावाचे विकृत रूप 
  •  गावातील भांडणे 
  • गावाला लाभलेले योग्य नेतृत्व 
  • गावाच्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न
  • गावाचा विकास
  • गावातील भांडणे संपली 
  • निर्मळ गाव.

माझे गाव मराठी निबंध | Maze Gav Essay In Marathi

मी पाहिलेले पर्यटन स्थळ मराठी निबंध |  Tourist Destination essay in marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी पाहिलेले पर्यटन स्थळ मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्‍ये आंबोली  या पर्यटन स्थळा विषयी माहीती  देण्‍यात आली आहे.उन्‍हाळ्याच्‍या सुट्टीत घालवलेले ते सोनेरी क्षण या निबंधात दर्शविले आहेत ते तुम्‍हाला लक्षात येईलच .  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


 माझे एक काका सावंतवाडीला राहतात. एकदा मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही काकांकडे गेलो होतो. आम्ही सर्वचजण आल्यामुळे काका आनंदात होते. मोठ्या उत्साहात त्यांनी आम्हांला संपूर्ण सावंतवाडीचे दर्शन घडवले. एके दिवशी त्यांनी आंबोलीला जाण्याचा बेत जाहीर केला आणि आम्हा मुलांमध्ये उत्साहाची लाटच पसरली. वास्तविक मी पूर्वी आंबोली पाहिले आहे. परंतु हे डोंगरमाथ्यावरील सुंदर गाव पुन्हा पाहायला मिळणार, याचा मलाही खूप आनंद झाला होताच.

Tourist Destination essay in marathi
Tourist Destination essay in marathi


आंबोली हे निसर्गाची कृपा लाभलेले डोंगरमाथ्यावरचे एक छोटेसे गाव आहे. प्रथम आम्ही सावंतवाडीहून गाडीने आंबोलीकडे निघालो, तेव्हा त्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या 'दानोली' या गावी पोहोचलो. मग रमतगमत डोंगरमाथ्यावरील आंबोली या गावी पोहोचलो. या आंबोलीला अलीकडे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्धी मिळू लागल त्याला 'गरिबांचे महाबळेश्वर' म्हणून ओळखतात,

'आंबोली ' या ठिकाणाचा समावेश कोकणातील सिंधदुर्गात केला जातो, अजूनही या ठिकाणाचे शहरीकरण झाले नाही, म्हणून ते घाटमाथ्यावरील एक टुमदार खेडेगावच आह. या घाटमाथ्यावरून सुंदर दृश्ये दिसणारी ठिकाणे आहेत, ते पॉइन्टस म्हणूनच ओळखले जातात. तेथील सूर्यास्त पाहण्यासाठी प्रवासी आवर्जून येतात. या आंबोली गावात अजून दोन प्रेक्षणीय स्थानांचा उल्लेख केला जातो. ती स्थाने म्हणजे 'महादेवगड' आणि 'नारायणगड'. गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्थानांवर गडांच्या कोणत्याही खुणा आज आढळत नाहीत. या गडांच्या आश्रयाने तेथील काही भूमिपुत्रांची वस्ती आहे. अगदी थोड्या पैशात ते भाकरी, पिठले, कढी देऊन आपले स्वागतही छान करतात.

आंबोली घाटाला कोणत्याही काळात पर्यटक भेट देतात, पण खासकरून वर्षा ऋतूत येथील सौंदर्य अनुपम असते. निसर्गराजा प्रसन्न होऊन आपले जलवैभव येथे ओतत असतो आणि शहरातून थकून आलेले पर्यटक या पाण्यात न्हाऊन आपल्या थकव्याला पळवून लावतात. आंबोली-बेळगाव रस्त्यावर थोडी पायपीट केल्यावर हिरण्यकेशी नदीचे उगमस्थान दिसते. येथे पार्वतीदेवीचे मंदिर आहे. ही हिरण्यकेशी नदी म्हणजे भगवान महादेवाने पार्वतीला दिलेली भेट अशी कथा सांगितली जाते. पुढे या नदीला चित्री नावाची नदी मिळते आणि मग या मैत्रिणी हातात हात घालून कर्नाटकाकडे मार्गस्थ होतात. या हिरण्यकेशी नदीवर असलेला नागरतास धबधबा आपल्या डोळ्यांचे पारणे फेडतो.

निसर्गरम्य कोकणातील आंबोलीला आंबा, काजू यांचे वरदान लाभलेले आहेच. पण त्याशिवाय हिरडा, जांभूळ, ऐन, अंजनी इत्यादी औषधी झाडांचे वैभवही प्राप्त झाले आहे. आंबोलीच्या घाटात हिंडताना इतकी रंगीबेरंगी झाडे, पाने, फुले दिसतात की, काय पाहू आणि काय नको असे होते. अजून आंबोली हे एक डोंगरमाथ्यावरील टुमदार खेडे आहे. तेथे पंचतारांकित संस्कृती पोहोचली नाही. त्यामुळे तेथे पुन:पुन्हा जावेसे वाटते.

मित्रांनो तुम्‍हाला मी पाहिलेले पर्यटन स्थळ मराठी निबंध हा निबंध कसा वाटला व पर्यटन स्थळाचा तुमचा अनुभव शेअर करू शकता . धन्‍यवाद


महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • आंबोलीला जाण्याचे प्रयोजन
  • आंबोली - निसर्गाचे वरदान लाभलेले एक छोटेसे गाव 
  • गरिबांचे महाबळेश्वर 
  • सुंदर ठिकाणे 
  • महादेवगड, नारायणगड 
  • मूळ वस्ती
  • आंबोलीतील नदी 
  • धबधबा 
  • आंबोलीतील झाडे
  • साधेपणा हाच आगळेपणा.

मी पाहिलेले पर्यटन स्थळ मराठी निबंध | Tourist Destination essay in marathi

Maza Avadta San Essay In Marathi | माझा आवडता सण मराठी निबंध 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता सण मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्‍ये दसरा या सणा‍विषयी माहीती व महत्‍व देण्‍यात आले आहे.  दसरा या सणाचे नाते महाभारत व रामायणा सोबत कसे आहे हे सांगण्‍याचा प्रयत्न केला  आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

सण ! भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक ! भारतीयांच्या आध्यात्मिक अन् भाविक भावनांतून जन्मले - सण!! प्रत्येक सणाला एक खास व्यक्तिमत्त्व असते. गुढीपाडवा एखाद्या धीरललित राजासारखा !...वस्त्राभरणांनी नटलेली, सौम्य पण प्रसन्न, रसिक नार दीपावली !!...तारुण्याचं वारं प्यालेल्या पंचमी अन् होळी या हरिणी...
याउलट प्रतापशाली वीरोत्तम-दसरा ! माझा सर्वांत आवडता सण. तो येतोच तो उच्चैःश्रवावर आरूढ होऊन. त्याच्या आगमनाच्या तुताऱ्या, वाऱ्यावर डोलणारी झेंडूची फुले, वाजवत आकाश दणाणून सोडतात. गुढीपाडव्याच्या शिरावर राजासारखा राजमुकुट असेल तर दसऱ्याच्या मस्तकी 'शिरस्त्राण' असते. अंगात चिलखत असते. माणसांच्या औक्षणाची मानवंदना स्वीकारत, शरद ऋतच्या आरंभी, वरुणराज जेव्हा पांढरे निशाण दाखवून अंतराळाच्या मैदानातून पळ काढतो, तेव्हा प्रकट होतो, -दसरा!

Maza Avadta San Essay In Marathi
Maza Avadta San Essay In Marathi


हा दसरा आहे मोठा दिमाखदार ! याच वेळी पूर्वी सैन्ये दिग्विजयासाठी बाहेर पडत आणि शत्रूला धूळ चारून खरे सोने लुटून आणीत. प्रभू श्रीरामाने सोन्याच्या लंकेवर चाल केली ती याच मुहूर्तावर. 'रामलीला' महोत्सव रूपानं ती स्मृती अजून जपली जाते. अज्ञातवास संपल्यावर पांडवांनी शमी वृक्षावर ठेवलेली आपली शस्त्रास्त्रे काढली तीही-- याच दिवशी. अन् पुढे महाभारत घडलं. शमी वृक्षाची पूजा आजही करून आपण त्याचा आदर करतो. 'रामायण' व 'महाभारत' दोन्हीची आठवण करून देणारा एकमेव-दसराच.रघुराजानं वरतंतुशिष्य कौत्स याला गुरुदक्षिणा देण्यासाठी स्वर्गातून सोन्याचा पाऊस पाडायला लावला तो दसऱ्याला ! म्हणूनच दसरा हा सोनियाचा सण ! महाशक्तिमान दुर्गादेवीनं 'महिषासुर ' मर्दन केले तेही दसऱ्यालाच.

हिंदू पंचांगातील साडेतीन शुभ मुहुर्तापैकी एक आहे-हा दसरा ! पावसाळा संपल्याने सैन्याला कूच करणे, पिके तरारून आल्याने ' हातपाय पसरायला' किसानांना मोकळीक मिळणे हे दसऱ्यामुळे मिळते. म्हणून घराघरांतून गोडधोड होते. शस्त्रास्त्रे, वाहने, विद्या, आयुधे यांची पूजा होते. हल्ली आपट्यांच्या पानांवर 'सोने लुटीचा' अन् 'सीमोल्लंघना'चा आनंद मानावा लागतो. 'कालाय तस्मै नमः !' 

दसरा म्हणजे माहेश्वरी ( ऐश्वर्य), महाकाली (शक्ती), महालक्ष्मी (संपत्ती आणि सौंदर्य), महासरस्वती (ज्ञान ) या आदिशक्तींचे पूजन – म्हणजेच दसरा ! तुम्हा आम्हा सामान्यांना दसरा हा अनोखा शुभ दिवस वाटतो. पण तुकाराम म्हणतात,

 'तुका म्हणे हरिच्या दासा । शुभकाळ अवघ्या दिशा॥' गोडधोड खाऊन लोळत पडणे हा या सणाचा अपमान आहे. सज्जन, थोर, योगी मंडळींना घरी बोलावून त्यांच्या सहवासापासून विचारांचे सोने लुटणे, काव्यशास्त्रविनोदाची पक्वान्ने आस्वादणे हाच या युगातला दसरा.“ साधुसंत येती घरा । तोचि दिवाळी दसरा ॥" शौर्य, त्याग, वाईट वृत्तींचा शेवट ही त्रिसूत्री सांगून, 'त्येन त्यक्तेन भुंजीथाः ' असा मंत्र कानात सांगून, आपल्या घोड्याला टाच मारून, इंद्रधनुष्याच्या 'फ्लायओव्हर 'वरून हा दसरा निघून जातो. पुन्हा वर्षाचा प्रवास संपवून, ऋतुचक्राचा एक फेरा पूर्ण करून शरद ऋतूच्या प्रारंभी तो पुन्हा दिमाखाने येईल आणि आमच्या जीवनातील रोजची दुःखे विसरून आम्ही सदैव म्हणत राहू,
'दसरा सण मोठा । नाही आनंदा तोटा ।'

मित्रांनो तुम्‍हाला maza avadta san marathi nibandh हा निबंध कसा वाटला व दसरा हा सण तुम्‍ही कसा साजरा करता हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

Maza Avadta San Essay In Marathi | माझा आवडता सण मराठी निबंध

Zade Lava Zade Jagva | झाडे लावा झाडे जगवा  

निबंध 1

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण Zade Lava Zade Jagva  मराठी निबंध बघणार आहोत. या 8 निबंधामध्‍ये मानवाने आपल्‍या फायद्यासाठी कश्‍याप्रकारे निसर्गाचे नुकसान केेले आहे. व त्‍यावर कोणते उपाय योजले जाऊ शकता हे तुम्‍हाला वाचण्‍यात येईल . चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

पृथ्वीची अवस्था प्रदूषणामुळे दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पृथ्वीवरील वातावरणाचा तोल ढळत आहे. 'पृथ्वीला वाचवा, आपल्या पृथ्वीची काळजी वाहा' हा 'वसुंधरा दिना' चा संदेश आहे.  केवळ जंगलतोडीमुळेच पर्यावरणाचा तोल ढळतो असे नाही; महानगरे आणि कारखानेही या दुरवस्थेला हातभार लावत असतात. 

गावोगावच्या नद्यांमध्ये कचरा व सांडपाणी सोडले जात आहे. उसाच्या मळीमुळे शेते निकामी होत आहेत. पावसाअभावी वाळवंटे वाढू लागली आहेत. अशी अनेक संकटे आपल्यापुढे उभी आहेत.पर्यावरणाचा ढासळणारा तोल सावरण्याचा एक महत्त्वाचा उपाय म्हणजे वृक्षारोपण होय. 

Zade-Lava-Zade-Jagva
Zade-Lava-Zade-Jagva



अलीकडे वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतात. 'सामाजिक वनीकरणा'ची कल्पना आता रूढ होत आहे. झाडे लावणे जितके आवश्यक आहे, त्याहूनही ती वाढवणे व त्यांचे जतन करणे महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येकाने एकतरी झाड दत्तक घेतले पाहिजे. झाडे लावली आणि त्यांची काळजी घेतली नाही तर काय उपयोग? 

निष्काळजीपणामुळे अनेक झाडे मरतात. कधी त्यांना पाणी मिळत नाही. कधी भुकेलेली जनावरे लावलेली रोपटी खाऊन टाकतात. त्यामुळे लावलेल्या झाडांतील फारच थोडी झाडे जगतात; मोठी होतात.यासाठी आता मोहीम सुरू केली पाहिजे  'एकतरी झाड जगवा.' लग्न, मुंजी, वाढदिवस अशा निमित्ताने आपण भेटीदाखल पुष्पगुच्छ देतो, त्याऐवजी एक-एक रोप भेट दयावे. 

नवीन बालक जन्माला आले की, त्या कुटुंबाने नवीन झाड लावावे व बाळाबरोबर त्यालाही बाळासारखे ममतेने वाढवावे. शाळेतील प्रत्येक मुलाने आपापल्या परिसरात एक तरी झाड लावावे व त्याचे नीट संगोपन करावे, प्रेमाने देखभाल करावी.

शहरातील राखीव भूखंडांवर टोलेजंग इमारती उभारण्याऐवजी गर्द झाडे लावावीत. सरकारी गृहनिर्माण संस्थांनी आपल्या वास्तूच्या परिसरात झाडे लावावीत. रस्त्याच्या दुतर्फा वृक्षांची लागवड करावी. निसर्गचक्र खंडित करण्याचा आपल्याला अधिकार नाही. ते आहे तसे अबाधित राखण्यातच मानवजातीचे हित आहे. पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्याची जबाबदारी आपल्यावर आहे. म्हणून 'एकतरी झाड जगवा !' हा आजच्या युगाचा संदेश आहे. या संदेशाप्रमाणे आपण वागलो, तर ही वसुधा पुन्हा 'हरितश्यामल' बनेल.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व झाडे लावण्‍यासाठी आणखी काय उपाय योजना करायला पाहीजे व तुम्‍ही वृक्षप्रेमी असल्‍यास कोणत्‍या उपक्रमात सहभाग घेतला आहे हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )
  • आजचा मानव निसर्गापासून दूर 
  • वृक्षतोड
  • प्रदूषण
  • दुष्काळ
  • पर्यावरणाचा समतोल ढळला 
  • निसर्गाकडे चला 
  • 'एक मूल, एक झाड ' ही नवी घोषणा 
  • इमारतीच्या जंगलांची वाढ थांबवावी 
  • वनोत्सव सुरू करावेत 
  • वृक्षमित्र पुरस्कार 
  • जंगल संपत्तीचे महत्त्व 
  • वृक्ष ही जीवनधारा 
  • वृक्षवल्ली आम्हा सोयरी

निबंध 2 

एका कार्यक्रमाचा समारोप चालू होता. वक्ता आमंत्रित पाहुण्यांचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानत होता आणि आभार मानताना पुष्पगुच्छाऐवजी प्रत्येकाच्या हाती एकेक रोप देत होता. अतिशय आवडली मला ही कल्पना.

माणसाच्या हातून नकळत फार मोठा गुन्हा घडला आहे. माणसांनी विकासाच्या नावाखाली अमर्याद जंगलतोड केली, वनांचा विध्वंस केला. जंगलांवर कुणाचा हक्क? कुणाची मालकी? कुणाचीही नाही; म्हणजे सर्वांचीच. वाहनांची सोय करण्यासाठी मोठमोठे रस्ते आवश्यक झाले. मग वाटेत येणारी झाडे; झाडे कसली मोठमोठे वृक्ष तोडण्यात आले. 

घरे उभारण्यासाठी लाकूड, घरे सजवण्यासाठी लाकूड... पुस्तके, ग्रंथ, कचेयांतील कामांसाठी कागद; त्यासाठी पुन्हा लाकूड. वर्षानुवर्षे डोळ्यांवर पट्टी बांधून आपण झाडे तोडत राहिलो. खेडेगावातील गरजा वेगळ्या, पण त्यांना त्यांचे अन्न शिजवण्यासाठी सरपण हवेच. मग झाडे तोडली जातात.

शेवटी व्हायचे तेच झाले. या बेसुमार वृक्षतोडीमुळे सारा देश उजाड झाला. देशातील वनस्पती लयास गेली आणि मग या नाठाळ माणसाच्या लक्षात आले, की पर्यावरणाचा तोल बिघडला आहे ! झाडे कमी झाली, तसा पाऊस कमी झाला. माणसे वाढली, पाण्याचा उपसा अखंड चालू राहिला. त्यामुळे जमिनीच्या पोटातील पाण्याची पातळी खाली गेली. आता माणसाला पिण्यासाठीही पुरेसे पाणी मिळणे कठीण झाले आहे. सगळ्या जगापुढेच हा प्रश्न उभा राहिला आहे.

मग मात्र माणूस खडबडून जागा झाला. स्वतःला वाचवण्यासाठी झाडांना वाचवले पाहिजे, हे त्याच्या लक्षात आले. आता कुणी झाड तोडू लागला की चारजण धावून त्याचा हात धरतात, त्याला वृक्षतोड करू देत नाहीत.
प्रत्येक मंगलप्रसंगी वृक्षारोपणाची कल्पना आपण आता स्वीकारली पाहिजे. 

घरात बाळ झाले की  झाड लावा. बाळाबरोबर झाडाला वाढवा. पाहुणे आले; त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करा. इतकेच नाही तर घरातील प्रियजनांच्या वियोगप्रसंगी 'स्मृतिवना'त झाड लावून त्यांच्या स्मृती जतन केल्या पाहिजेत.जंगलतोडीच्या चुकीचे परिमार्जन झाडे लावूनच करायचे आहे. अगदी खेडोपाडी, समाजाच्या तळागाळापर्यंत हा विचार पोचवायचा आहे. त्यातच आपल्या देशाचा उत्कर्ष आहे.

महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • झाडांचे महत्त्व
  • नेहमी होत आलेली चूक
  • उजाड देश
  • पाऊस कमी
  • भूगर्भातील पाण्याची पातळी खाली
  • पर्यावरणाचा तोल हरवला
  • आपली चूक उमगली 
  • वृक्षतोड थांबवली  विविध कारणांनी झाडे लावायची. जोपासायची, वाढवायची
  • तरच देश सस्यश्यामल होईल.

निबंध  3 

पृथ्वीची अवस्था प्रदूषणामुळे दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पृथ्वीवरील वातावरणाचा तोल ढळत आहे. 'पृथ्वीला वाचवा, आपल्या पृथ्वीची काळजी वाहा' हा 'वसुंधरा दिना'चा संदेश आहे. परंतु प्रचंड प्रमाणात वाढलेली वृक्षतोड एक दिवस ही पृथ्वी रसातळाला नेईल.


केवळ जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा तोल ढळतो असे नाही; महानगरे आणि कारखानेही या दुरवस्थेला हातभार लावत असतात. गावोगावच्या नदयांमध्ये कचरा व सांडपाणी सोडले जात आहे. उसाच्या मळीमुळे शेते निकामी होत आहेत. पावसाअभावी वाळवंटे वाढू लागली आहेत. अशी अनेक संकटे आपल्यापुढे उभी आहेत.


या साऱ्या गोष्टींवर जे प्रतिबंधात्मक असे अनेक उपाय आहेत, त्यांपैकी एक म्हणजे वृक्षारोपण होय. अलीकडे वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतात. 'सामाजिक वनीकरणा' ची कल्पना आता रूढ होत आहे. झाड लावणे जितके आवश्यक आहे, त्याहूनही ती वाढवणे व जतन करणे महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येकाने एकतरी झाड दत्तक घेतले पाहिजे. 

झाडे लावली आणि त्यांची काळजी घेतली नाही तर काय उपयोग? निष्काळजीपणामुळे अनेक झाडे मरतात. त्यांना पाणी मिळत नाही. कधी भुकेलेली जनावरे लावलेली रोपटी खाऊन टाकतात. त्यामुळे लावलेल्या झाडांतील फारच थोडी झाडे जगतात; मोठी होतात.

यासाठी आता मोहीम सुरू केली पाहिजे  'एकतरी झाड जगवा.' लग्न, मुंजी, वाढदिवस अशा निमित्ताने आपण भेटीदाखल पुष्पगुच्छ देतो, त्याऐवजी एक-एक रोप भेट दयावे. नवीन बालक जन्माला आले की, त्या कुटुंबाने नवीन झाड लावावे व बाळाबरोबर त्यालाही बाळासारखे ममतेने वाढवावे. शाळेतील प्रत्येक मुलाने शाळेच्या आवारात एक तरी झाड लावावे व त्याचे नीट संगोपन करावे, प्रेमाने देखभाल करावी.


शहरातील राखीव भूखंडांवर टोलेजंग इमारती उभारण्याऐवजी गर्द झाडे लावावीत. सरकारी गृहनिर्माण संस्थांनी आपल्या वास्तूच्या परिसरात झाडे लावावीत. रस्त्याच्या दुतर्फा वृक्षांची लागवड करावी. निसर्गचक्र खंडित करण्याचा आपल्याला अधिकार नाही. ते आहे तसे अबाधित राखण्यातच मानवजातीचे हित आहे. पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्याची जबाबदारी आपल्यावर आहे. म्हणून 'एकतरी झाड जगवा !' हा आजच्या युगाचा संदेश आहे. म्हणजे ही वसुधा पुन्हा हरितश्यामल' बनेल.

महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • आजचा मानव निसर्गापासून दूर 
  • वृक्षतोड 
  • प्रदूषण 
  • दुष्काळ
  • पर्यावरणाचा समतोल ढळला 
  • निसर्गाकडे चला 
  • 'एक मूल, एक झाड ' ही नवी घोषणा 
  • इमारतीच्या जंगलांची वाढ थांबवावी 
  • वनोत्सव सुरू करावेत
  • वृक्षमित्र पुरस्कार
  • जंगल संपत्तीचे महत्त्व
  • वृक्ष ही जीवनधारा
  • वृक्षवल्ली आम्हा सोयरी


निबंध  4 

jhade lava jhade jagva


पर्यावरण संतलनासाठी एकूण क्षेत्रफळाच्या ३३ टके वनक्षेत्र असणे आवश्यक असते. परंतु आज भारतात २२ टक्के वनक्षेत्र आहे त्यातही दाट वनक्षेत्राचे प्रमाण ६ ते ७ टके आहे. काही राज्यात वने दाट प्रमाणात आढळतात. तर काही राज्यात वनाचे प्रमाण अतिशय विरळ असते. अशाप्रकारे आपल्याला वन वितरणाच्या बाबतीत विषमता आढळते.

वनांबाबतची ही भीषण परिस्थिती फक्त भारतातच नव्हे तर बहुतांशी देशात आढळते. आज अनेक  कारणामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होत आहे. त्यामध्ये घरांसाठी. उद्योगधंद्यासाठी, उद्यानांसाठी, क्रीडागणे, मैदाने, रस्ते, तलाव, धरणे यांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे वृक्षांची लाकडे बहुउपयोगी असल्यामुळे ती मिळवण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होते.

वनांचे प्रमाण कमी झाल्यामुळे मानवाला विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. वृक्ष CO2 घेतात आणि ऑक्सीजन बाहेर सोडतात. त्यामुळे माणसाला श्वसनासाठी ऑक्सीजन चा पुरवठा होतो, त्याचबरोबर वातावरणातील ऑक्सीजन, आणि CO2  चे प्रमाणही संतुलित राखले जाते.

शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. वृक्ष हे मातीची धूप होण्यापासून रोखत असतात. पण आता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे जमिनीची धूप होते आहे. त्यामुळे जमिनीची उत्पादनक्षमता कमी होते आहे. या गोष्टीचा खूप दूरगामी परिणाम मानवावर होऊ शकतो. भविष्यकाळात मानवाला अन्नधान्याची टंचाई भासू शकते.

दिवसेंदिवस पृथ्वीचे तापमान वाढत आहे आणि पर्जन्याच्या प्रमाणात देखील असमतोल निर्माण होत आहे. वृक्ष हे पर्जन्य पडण्यासाठी एक अत्यावश्यक गोष्ट आहे. मानव आपल्या दैनंदिन जीवनासाठी इतर सजीवांवर देखील अवलंबून असतो. या सर्व सजीवांची एक अन्नसाखळी असते. वृक्ष तोड झाल्यामुळे या अन्नसाखळीलाही मोठ्या प्रमाणात बाधा पोहचत आहे. 

कारण बरेच प्राणी, पशू, कीटक हे घनदाट वनात आढळतात. त्या वनांवरच त्यांचे आयुष्य अवलंबून असते. यात आपल्याला प्रामुख्याने वाघ, सिंह, लांडगे, कोल्हे यांचा उल्लेख करावा लागेल. वनांचे प्रमाण कमी झाल्यामुळे या प्राण्यांचे प्रमाण देखील कमी होत आहे. त्यामुळे त्या प्राण्यांची संख्या वाढावी म्हणून सरकारला विशेष मोहीम हाती घ्यावी लागत आहे. त्यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे.

वनांची मोठ्या प्रमाणावर तोड झाल्यामुळे तो विविध गोष्टींपासून वंचित राहू लागला आहे. कारण मानवाचे जीवन हे मोठ्या प्रमाणावर वनांवर अवलंबून आहे. वनांपासून त्याला इंधनासाठी, घरासाठी, इतर वस्तू बनवण्यासाठी लाकूड मिळते. त्याचबरोबर वनांचे विविध औषधी उपयोगही आहेत. विविध जर्जर व्याधींच्या उपायासाठी आजही मोठ्या प्रमाणात वनौषधींचा वापर होत असतो. 

त्याचप्रमाणे वनांपासून आपल्याला डिंक, लाख, फळे, फुले इ. उपयोगी वस्तूदेखील मिळतात. त्याचप्रमाणे काही आदिवासी जमाती झाडांच्या पाला पाचोळ्यापासून आपली घरे बनवतात. अशाप्रकारे वृक्ष हे कल्पतरू प्रमाणे असतात. ते आपल्याला विश्रांतीसाठी सावली देतात. वृक्ष हे आपल्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण होण्यासाठी मदत करतात.

वनांचे अशा प्रकारे विविध उपयोग माहिती असून देखील, त्यांचे प्रमाण कमी होत आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी विविध उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे. अमेरिकेसारख्या देशात एक झाड तोडायचे असल्यास त्याआधी दोन झाडे लावावी लागतात. आपल्या देशातही अशी परिस्थिती निर्माण करावयाची असल्यास त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे. 

लोकांचे वृक्षसंवर्धनाचे फायदे समजून सांगितले पाहिजे. यासाठी विविध संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. त्यांनी व्याख्याने आयोजित करून लोकांना वनांचे महत्त्व पटवून द्यायला हवे. वनसंपत्ती संवर्धनासाठी जोरदार प्रचार करायला हवा.

त्याचप्रमाणे शाळांतून देखील मुलांना वनसंवर्धनाचे महत्त्व पटवून सांगितले पाहिजेत, कारण तेच भावी काळातील नागरिक आहेत. ते ही गोष्ट आपल्या घरच्यांनादेखील सांगू शकतील. त्यांना विविध गोष्टींद्वारे नैतिक मूल्याद्वारे हे पटवुन दिले पाहिजे. इतकेच नव्हे तर शालेय अभ्यासक्रमात देखील वनसंवर्धन विषयक प्रकरणांचा समावेश केला पाहिजे. शाळेच्या मार्फत १५ ऑगस्ट, २६ जानेवारी ''वृक्षदिंडी'' काढली पाहिजे. 

आज धार्मिक दिंड्यांऐवजी 'वृक्षदिंडी'' ची खरी गरज आहे. त्याचप्रमाणे शाळेत वृक्षसंवर्धन या विषयावर निबंध स्पर्धा, वकृत्त्व स्पर्धा आयोजित केल्या पाहिजे. शाळेवर, गावपातळीवर सामहिकपणे वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवला पाहिजे. सर्वात शेवटचा उपाय म्हणजे या विषयांबद्दल कडक कायदे केले पाहिजे. विनाकारण परवानगी न घेता झाड तोडल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. 

याआधी जनजागृती खूप आवश्यक आहे. आणि त्यासाठी सरकारने जनजागतीसाठी विविध वर्तमानपत्रे, दूरदर्शन यांचा उपयोग केला पाहिजे. अशाप्रकारे वृक्ष हे मानवी जीवनाचा, निसर्गाचा आधारस्तंभ आहे. त्यांचे संवर्धन केले पाहिजे आणि हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

निबंध 


पृथ्वीने सुजनतेला प्रथम जन्म दिला मनुष्यरूपात ! परमेश्वराला वाटलं की या वसुंधरेला फुलवणारं चैतन्य इथे उमलावे, देवांचे व दैत्यांचे समान अंकुर रुजून, एका नंदनवनाची निर्मिती व्हावी, या क्षमेला, प्रेम, दया, शांती या जीवनमूल्यांचे बाळकडू पाजावे. पृथ्वीवर नंदनवन निर्माण करावे, हिरव्यागार मखमली सदाहरित वनांचा प्रसार सर्वत्र व्हावा आणि यासाठीच तर मनुष्याने जन्म घेतला आहे.

कावळा करतो कावकाव म्हणतो; माणसा झाडे लाव, एक तरी झाड लाव, असे म्हणतच आपण मोठे झालो या बालगीतातील बोध मात्र तेथेच विसरून गेलो. पर्यावरण हा शब्द आपणासाठी नवीन नाही, अगदी साध्या शब्दांत पर्यावरण म्हणजे आपल्या अवतीभवतीच्या वातावरणाची गोळाबेरीज,पर्यावरणाचा समतोल टिकविण्याचे काम निसर्ग करतो. 

जेव्हा निसर्गाच्या कार्यात माणसाचा नको तेवढा हस्तक्षेप वाढतो. म्हणजे हवा, पाणी, जमिनीचा नको तेवढा व नको तसा वापर होऊ लागतो तेव्हा पर्यावरणाचा समतोल बिघडतो. मानवाचे स्वास्थ्य हे पर्यावरणाच्या स्वास्थ्यावर अवलंबून असते पर्यावरणाचे स्वास्थ्य बिघडले की आपले स्वास्थ्य बिघडते. आपल्या स्वास्थ्याची पर्यायाने पर्यावरणाची काळजी आपण स्वतःच घ्यायला हवी नाही का ?


पूर्वादीकालापासून संतांनी स्वतःच्या साहित्यातून व वर्तनातून हा आपल्या पर्यावरणाचा समतोल तर सांभाळला आहेच व मार्गदर्शनही केले आहे.तुकोबांनी वृक्ष-वेलींना आपले सगे-सोयरे संबोधले आहे. पण झाडे आपल्याला आरोग्यदायी जीवन देतात कारण 'काळी माती हिरवी सोने' प्राणवायूचे हे कारखाने आपण काटकसर करून सोने विकत घेऊ, प्रतिष्ठा वाढेल सर्व काही मिळेल केव्हा ? 'शिर सलामत तो पगडी पचास' आपण आरोग्याची मूर्ती असू तेव्हा त्या सोन्याचे तेज वाढले ना!

आज धूर ओकणारी वाहने व त्यातील कार्बन त्याबरोबर इतरही अपायकारक घटकद्रव्ये ही आरोग्याला मारक ठरत आहेत. श्वसनांच्या रोगाचे प्रमाण वाढत आहे. शहराच्या दगदगीच्या जीवनात शांती मिळते कुठे माणूस ती शोधायला निसर्गरम्य परिसराकडे वळतो. पण अशी वृंदावने, बागा आहेत तरी किती ? यांचे प्रमाण इतके कमी का ? याचा थोडा जरी विचार माणसाने केला तर आढळून येते की शहरवासीयांनी टुमदार इमारती, मोठमोठे कारखाने, बांधकामे यांकरिता वृक्षांचा नाश केला. 

वृक्षतोडीमुळे डोंगर बोडके झाले, रखरख वाढली, पाऊस अनियमित झाला व पर्यायाने पर्यावरणाचा निसर्गाचा समतोल बिघडला स्वच्छ हवेऐवजी प्रदूषित हवा. याशिवाय पर्याय राहिला नाही. याची जाण आता होऊ लागली आहे. ही एक रोगराई विरुद्धची लढाई आहे. धुरीकरणामुळे सातत्याने छळणारा खोकला हा आपण मित्र बनू न देता वेळीच वृक्ष तोड रोखली पाहिजे. आत्तापर्यंत झालेल्या गोष्टीबद्दल चिंता करीत बसण्यापेक्षा नव्याने वृक्ष लागवड करणे यातच शहाणपणा आहे. 

वेळीच जागा होणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे असा हा एककलमी कार्यक्रम अमलात आणणे गरजेचे आहे.
'दुर्दर राहे पाषाणात तया चारा कोण देतो' म्हणणाऱ्या संत सेना महाराजांनी आपणाला प्रश्न केला आहे की जर खडकाखाली राहणाऱ्या बेडकाला आपण चारा देत नाही तर आपल्याला त्याला नष्ट करण्याचा अधिकार काय ? पर्यावरण दूषित करणारे कृमी, कीटक खाऊन बेडूक पर्यावरणाला मदत करतो तो मानवाचा मित्र ठरतो.

 वृक्षतोड झाल्याने प्राणीजीवन विस्कळीत होऊन त्यांना निवाऱ्याची उणीव भासते व काहीवेळेस त्यांचा शिरकाव शहरांमध्ये झाल्यास त्यासारखे भयास्पद ते काय? पाणी, हवा, प्राणी, वृक्ष या सर्वांचा हितकारी संगम म्हणजेच पर्यावरणाचा समतोल.

वृक्ष मानवाचा खरा मित्र आहे तो त्याला लागवड करून सांभाळ करणाऱ्याला आणि त्याचे तोडून तुकडे करणाऱ्यालाही आपली थंड सावली, शुद्ध हवा, फळे, फुले देतो तो कुणाबरोबरही दुजाभाव करीत नाही. 
आपण स्वतःहून वृक्षलागवड करत नसू तर शासनाकडून किंवा सामुदायिकरीत्या रस्त्याच्या कडेला लावलेल्या झाडांचे संगोपन तरी आपण नक्कीच करू शकतो. वृक्षांचा गैरवापर केल्यास प्रदूषणासारख्या महाभयंकर संकटास तोंड देण्याची वेळ आपल्यावर येईल, हे आपण जाणून आहोतच. 

वृक्ष म्हणजे पृथ्वीने आशीर्वादासाठी उचललेले हात आहेत. ते आशीर्वाद नसतील तर मानवजीवन टिकणार नाही बालपणीच्या पाळण्यासाठी मृत्यूनंतरच्या सरणापर्यंत वृक्ष आपल्याला सोबत करतात.या भूतलावर आधी वनस्पती व नंतर प्राणिसृष्टी जन्माला आली आहे, वनस्पती नष्ट झाल्या तर त्या मागोमाग मानवी जीवनही नष्ट होईल.

शहरांतील सिमेंट-काँक्रीटच्या उंच जंगलापेक्षा आपणांस जीवन ताळ्यावर आणण्यासाठी उंच उंच वृक्षराजींच्या वेसणीची गरज आहे मानवाला आज तनशांतीपेक्षा मनःशांतीसाठी जास्त भटकावे लागत आहे. बाजारात पैसे टाकला की खाण्यापिण्यातून, हिंडण्याफिरण्यातून मनःशांती प्राप्त होत आहे. पण मनाच्या शांतीचा लळा बाजारात पुरविला जाऊ शकत नाही. त्यामुळे अस्वस्थ झालेले मन बगीचा, उद्यान, अभयारण्य, वन, समुद्र, नदीकाठ, सरोवराच्या शोधात बाहेर पडते. 

निसर्गरम्य वातावरणासाठी खरी गरज आहे. वृक्षांची यासाठी का होईना आपण सामाजिक वनीकरण इ. माध्यमांतून केलेल्या वृक्षांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. आपल्या स्वार्थी व नियोजनशून्य वृत्तीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे.आजपर्यंत असे केले असले तरी आज सर्वांना अशी शपथ घेण्याची गरज आहे. 'झाडे लावू आणि झाडे जगवू.' या क्षेत्रात घोषणांना महत्त्व नाही प्रत्यक्ष कृतीला महत्त्व आहे.


निबंध 6

झाडे लावा व पर्यावरण वाचवा



'हिरव्या पानांना पर्याय नाही, संतुलन झाडांशिवाय नाही' अशा ओळी असलेला एक बिल्ला काही दिवसांपूर्वी सामाजिक वनीकरणातर्फे वाटला गेला. तसेच जळगाव जिल्ह्यात इच्छापूर, कुंडशिवार, खामखेडा पूल व टहाकळी या मुक्ताईनगर परिसरात काही सिंचन योजनांचे भूमिपूजन तापी पाटबंधारे विकास महामंडळाद्वारे संपन्न झाले. या आणि अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यातून जनमानसात पर्यावरणासंदर्भात जागृती होत आहे. 

प्रचंड जंगलतोड, चराऊ कुरणाचा हास व जमिनीची धूप या कारणांमुळे महाराष्ट्रावर वारंवार अवर्षणाचे संकट ओढवून टंचाईसदृश स्थिती निर्माण झाली आहे. म्हणून वनीकरण, मृद व जलसंधारण, चराऊ कुरणांचा विकास अशा उपाययोजना राबवल्या जात आहेत. 


ज्या प्रदेशात वृक्षांचे जमिनीवर वनस्पतिक आवरण असते, तेथील वातावरण पावसाला अनुकूल असते. कारण तेथल्या जमिनीतून व वनस्पतींच्या पानांतून जे बाष्पीभवन होते, त्यामुळे हवेत आर्द्रता निर्माण होते. ही आर्द्रता ढगातून पाऊस पाडण्यास कारणीभूत होते. म्हणून वनीकरण, फलोद्यान, गवते व चारा यांची लागवड करणे गरजेचे वाटते. 



वृक्षतोडीमुळे भूपृष्ठ, माळराने उजाड झालीत. पावसाचे पडणारे पाणी या हिरव्या झाडाझुडुपांमुळे अडून राहते. मूळांकडे जाते. म्हणजे भूगर्भात पाणी मुरवण्याचे काम निसर्ग करीत असतो. म्हणून वृक्षारोपण केले, तर पाण्यासाठी दाही दिशा अशी कठीण अवस्था होणार नाही.


मानवजातीकडून होणाऱ्या निसर्गावरील वाढत्या हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा समतोल ढळत चालला आहे.  मूलभूत गरजा भागवताना होणारी वनसंपत्तीची बेछूट लूट थांबणे व त्याचवेळी पुनर्निर्मिती अर्थात झाडे लावणे आवश्यक आहे. 'नैसर्गिक संपदेचा नाश हा अविचार' आणि 'वृक्षारोपण हा आजचा सुविचार' आहे. वृक्षारोपण केले, तरच भूगर्भातील पाणीपातळी सांभाळली जाईल.


श्री छत्रपती शिवाजीमहाराजांनी ३०० वर्षांपूर्वीच त्यांच्या आज्ञापत्रांत वनउत्पादनातल्या वापरासंबंधी काही तत्त्वे ठरवून दिली आहेत. ते म्हणतात, 'रयतेने ही झाडे लावून लेकरांसारखी बहुतकाळ जतन करून वाढविली. ती झाडे तोडिविलयावरी त्यांचे दु:खास पारावार काय?' सम्राट अशोकाने २३०० वर्षांपूर्वी 'राजाज्ञेत प्राणिसंरक्षण आणि वृक्षसंवर्धन याविषयी नमूद केले होते. 


आज तंत्रज्ञानाचा पर्यावरणावर मोठा विपरीत परिणाम होत आहे. प्रदूषण वाढत आहे. ही दखलपात्र घटना वरील पार्श्वभूमीवर विचारात घेण्यासारखी आहे. म्हणून या पर्यावरणाच्या जाणिवेची नितांत गरज आहे.
रस्त्याने चालताना डोक्यावर सावली धरणारी झाडे दिसत नाहीत. वृक्षामुळे आपणास अन्न, प्राणवायू, आर्द्रता मिळून मृद्संहार थांबतो. त्याशिवाय का तुकाराम महाराजांनी वृक्षवल्लींना आपले सोयरे मानले? म्हणजे झाडे जसे भूमिपुत्र, तसे आम्हीही याच मातीची लेकरे... म्हणून 'झाडे लावा आणि पर्यावरण अर्थात विश्व वाचवा' अशा घोषणा अस्तित्वात आल्या.


वृक्षदिंड्याही कौतुकाने निघतात. चांदोबा लपायलाही पूर्वीपासून निंबोणीचे 'झाड' च लागत आले आहे. परसदारी पवित्र ‘तुळसी' चे रोप लागते. मंगलप्रसंगी केळीचे खोड स्नेह्यागत उभे राहते, तर आंब्याची पाने शुभ पताका होऊन दारी मुंडावळ्यागत शोभिवंत होतात. अशी संगसोबत आयुष्यभर झाडे देतात. खऱ्या अर्थाने सोयरे छायादायी ठरतात. बालकवींच्या शब्दांत हरिततृणांच्या मखमालीचे हिरवेहिरवेगार गालिचे आपल्या रंग-सौंदर्याने डोळियांचे पारणेच फेडतात. 


झाडे-पाने, फुले, फळे, औषधी, इंधने, सुगंध, पाऊस, छाया, आधार, चारा, प्रदूषणशोषण, निवारा एवढेच नव्हे, तर पैसासुद्धा देतात. म्हणूनच 'चिपको आंदोलन, वृक्षमित्र मंडळे, जलसंवर्धन, सामाजिक वनीकरण, वनशेती, पर्यावरण बचाव... या साऱ्या गोष्टींना खूप महत्त्व येत आहे.  प्रत्येकाने वृक्षवल्ली वाचवण्याचा, वाढवण्याचा स्वयंनिर्धार करायला हवा.


पर्यावरणाचे आपण केवळ वारसदार नसून त्याचे रक्षण करून, त्याला समृद्ध करणारे विश्वस्तही राहू. काळाची गरज म्हणून पर्यावरणाचा समतोल कायम राखू आणि त्यासाठी झाडे लावू !" यानिमित्त 'वनराई' चळवळीचे जनक मोहन धारियांना सलाम ! 'सामाजिक वनीकरण-ग्रामीण फळबागा-परसबागा' ही ग्रामीण विकासाची त्रिसूत्री राबविणाऱ्या अवघ्यांना सलाम ! 'एक व्यक्ती-एक झाड' योजना जे प्रत्यक्ष आचरणात आणतील, त्या प्रत्येकाला सलाम ! ‘पाणी अडवा - पाणी जिरवा' मोहीम राबविणाऱ्या राळेगणसिद्धीच्या सिद्धपुरुषाला अर्थात अण्णा हजारेंनाही सलाम !


चला, पर्यावरण वाचवण्यास, झाडे लावण्यास कटिबद्ध होऊया 
 रक्षावया पर्यावरण, उपाय एकच... वृक्षारोपण

निबंध 7


 झाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध 

निसर्ग ही मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. डोंगर, दऱ्या, नद्या, पहाड, विविध प्रकारची झाडे, वेली, पशू, पक्षी, कीटक, सूक्ष्म जीव इत्यादी सर्व मानवाला मिळालेली नैसर्गिक संपत्ती आहे. ही पृथ्वी सुंदर दिसते ती झाडे वेलींमुळे. झाडे नसती तर ही पृथ्वी उजाड, भकास दिसली असती. केवळ नद्या, नाले, पहाडांनी ही वसुंधरा सुंदर दिसली नसती. म्हणून पृथ्वीच्या सौंदर्यात वृक्ष वेलींचा महत्त्वाचा वाटा आहे. पृथ्वीचा साज श्रृंगार म्हणजे झाडे वेली.



तुकाराम महाराज केवळ वृक्ष वेलींनाच सोयरे मानतात असे नव्हे तर (वनचरे) वनातील प्राण्यांना सुद्धा ते आपले सोयरे मानतात. पक्षांचा मंजूळ स्वर त्यांना अतिशय आवडतो. मानवांच्या गोंगाटापासून जर दूर जायचे असेल तर भरपूर वृक्ष वेली असलेल्या वनात जावे लागेल. तेथे एकांत मिळतो. तुकाराम महाराज कधी-कधी एकांतात बसून मनन चिंतन करीत असत. 



एकांतात लोभ, मोह,माया, लालसा, द्वेष, मत्सर, या दुर्गुणांपासून मनूष्य दूर होतो. त्यामुळे एकांत सुखकर वाटतो. निसर्गाच्या सान्निध्यात मन प्रसन्न होते. पृथ्वीचं हे सुंदर रुप, विविध पशु पक्षी, त्यांचे विविध आवाज, खळखळ आवाज करुन वाहणारे ओढ्याचे पाणी, विविध रंगाची व विविध आकाराची फुले. त्यांचा वेगवेगळा सुगंध, वेगवेगळ्या रंगाची व आकाराची फळे, प्रत्येकाची वेगळी चव, वळणाच्या वाटा,चढ उताराचा रस्ता, ह्या सर्व गोष्टींचा आस्वाद घ्यायचा असेल तर  निसर्गाच्या सान्निध्यात जावे लागेल. परंतु अशी ठिकाणे दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत आहेत. 


मनुष्य वृक्षांची कत्तल करतो आहे. जंगलेच्या जंगले नष्ट होत आहेत. जंगले नष्ट करणे म्हणजे मानवी जीवन धोक्यात घालणे होय. हे महत्त्व पटवून देण्यासाठी तुकाराम महाराज वृक्षांना व वनचरांना आपल्या सोयऱ्यांची उपमा देतात. त्यामुळे त्यांच्या ह्या अभंगाला शास्त्रीयदृष्ट्या महत्त्व आहे. त्यांचा हा अभंग मानवाला एक चेतावणी आहे की जंगले व त्यातील प्राणी नष्ट करु नका. नातलगा प्रमाणे त्यांना महत्त्व द्या. अन्यथा आपली हानी करुन बसाल. 


त्यांच्या चेतावनीची प्रचीती आज आपणास येत आहे. २००५ मध्ये कोंकणातील दासगाव, जुई इत्यादी गावे भूस्खलनामुळे गाडली गेली होती. तसेच २०१४ मध्ये पुणे जिल्ह्यातील माळीन हे गाव सुध्दा पूर्णपणे गाडले गेले. हा सर्व जंगल तोडीचा दुष्परिणाम आहे. मानवाने निसर्गावर केलेल्या अतिक्रमणाचा हा दुष्परिणाम आहे.
जर कराल नष्ट जंगले तर, धराशायी होतील बंगले वाचवा वृक्ष वल्ली, वनचरे ,तरच राहील भविष्य बरे

निबंध 8


वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ! संत तुकारामांनी ३०० वर्षांपूर्वी सांगून ठेवले आहे की, 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे!' वृक्ष, जंगले यांची उपयुक्तता लक्षात घेऊन त्यांना आपले सगेसोयरे म्हटले आहे. माणसाचे निसर्गाशी नाते अतूट असते. मानवी


जीवन वनस्पतींवर अवलंबून असते. वनस्पती नसतील तर मानवी जीवन अस्तित्वातच राहणार नाही. म्हणून वृक्षवल्ली हे आपले निसर्गधन आहे. फार पूर्वी मानव निसर्गाच्या सान्निध्यातच वनांमध्ये राहत होता. अन्न, निवारा, वस्त्र (वल्कल) त्याला वृक्षांपासूनच मिळत होते. आजारी पडल्यास औषधे वृक्षवेलींपासूनच मिळत होती. त्यामुळे औदुंबर, तुळस अशा वनस्पतींत दैवी अंश आहे असे मानत असत, आजही आपण या वृक्षांना पवित्र मानतो.


'हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणाच्या मखमलीचे' अशी बालकवींनी वर्णिलेली मखमली हिरवळ आपणा सर्वांनाच आवडते. हिरव्यागार वनश्रीने नटलेले निसर्गाचे रूप आपल्या सान्निध्यात माणसाला आनंदाने बेहोष करून टाकते. त्याच्या मनातील उदासीनता नाहीशी करून त्याचे मन प्रसन्न करून टाकते. त्यामुळे हल्ली अनेक लोक पर्यटनाद्वारे निसर्गाच्या कुशीत जात असतात. वृक्ष केवळ मनालाच शांती देतात असे नाही, तर मानवाच्या कल्याणासाठी अनेक गोष्टी करतात.

जंगले असल्यास पाऊस भरपूर पडतो, जमीनीची धूप होत नाही, आपल्याला फळे, फुले, छाया यांची लयलूट होते. इमारती बांधण्यासाठी लाकूड, फर्निचरसाठी लाकूड, कागद निर्मितीसाठी लाकूड वृक्षांपासूनच मिळते. वृक्ष हवाशुद्धीचेही काम करतात. कारखान्यातून निघालेला दूषित वायू, कर्बवायू शोषून प्राणवायू बाहेर सोडतात. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीनेही जंगलांचे महत्त्व खूपच आहे. 



आजकाल वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्यामुळे जास्ती पाऊस, कमी पाऊस अशा दुर्घटना घडू लागल्या आहेत. मातीची धूप, दरडी कोसळणे अशा गोष्टी हल्ली जास्त प्रमाणात आढळून येतात. झाडे वातावरणातील उष्णता शोषून घेतात म्हणून झाडांभोवती गारवा असतो. हिरवी सृष्टी मनाला आल्हाददायक वाटते. 



आजकालच्या विज्ञानयुगात माणूस निसर्गापासून दूर चालला आहे. उंचउंच इमारतींच्या जंगलात खरी जंगले नामशेष व्हायला लागली आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढळत आहे. हा तोल साधण्यासाठी पुन: झाडे लावण्याची मोहीम चालू झाली आहे. 'झाडे लावा, देश वाचवा' अशी घोषणा करून सरकारने सामाजिक वनीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. 


बहुगुणांचे 'चिपको आंदोलन' यासाठीच आहे. सरकारप्रमाणेच सामान्य माणसाचाही हातभार लागणे आवश्यक आहे. तेव्हा एकमेकांना भेटीदाखल रोप द्यावे, कुटुंबात मूल जन्माला आले की एक झाड लावावे, त्याची देखभाल करावी. सहकारी सोसायट्यांनी आपल्या परिसरात झाडे लावावीत. म्युनिसिपालिटीने रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावावीत. तसेच जंगलतोड होऊ नये म्हणून कागद कारखाने स्वत:च बांबूची जंगले वाढवितात. काही देवराया असतात, असे मानले जाते. म्हणजे काही जंगले देवांची मानतात. त्या ठिकाणी कोणी झाडे तोडत नाहीत. त्यामुळे त्या वृक्षांचे जतन होते.


या साऱ्या गोष्टींना यश येऊन पुन: जिकडेतिकडे हिरवेगार वृक्ष दिसू लागतील, सुजलाम् सुफलाम् अशी भारतभूमी नंदनवन बनेल, अशी आशा करूया. यंत्रयुगाची यांत्रिकता, कागदपत्रांची उलाढाल हे काही काळ दूर सारून माणूस वनराईच्या संगतीत राहिला तर निसर्गाचा  रंग त्याच्या मनावर चढेल आणि निसर्गाशी असलेले नाते घट्ट विणीने विणले जाईल. मानव निसर्गाशी एकरूप होईल, निसर्गात मिसळून जाईल.

Zade Lava Zade Jagva | झाडे लावा झाडे जगवा