मराठी निबंध  Marathi Nibandh


  1. शाळेचा निरोपसमारंभ मराठी निबंध | Nirop Samarambha Essay Marathi (nibandh in marathi 12th) 


    शाळा आपल्‍या बालपणातील महत्‍वाचा भाग असतो. शालेय जिवनात केलेल्‍या गंमतीदार आठवणी असा हा काळ कोणीही विसरू शकत नाही.या निबंधात निरोप समारंभातील आधीचा काळ व निरोप समारंभातील घडलेल्‍या गोष्‍टीचे वर्णन केले आहे. पुर्ण निबंध वाचण्‍यासाठी येथे क्‍लीक करा.
  2. marathi nibandh
    marathi nibandh
    वसंत सर्व  ऋतुंचा राजा  मराठी  निबंध | vasant essay in marathiया निबंधामध्‍ये वसंत ऋतुचे गुणगाण केले आहे. वसंत ऋतुमध्‍ये पर्यावरणात होणारे बदल सांगीतले आहे. पशु पक्षी कश्‍याप्रकारे आनंदीत होतात हे दाखविले आहे.पुर्ण निबंध वाचण्‍यासाठी येथे क्‍लीक करा.

  1.  स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी | swachata che mahatva marathi nibandh
    या निबंधामध्‍ये स्वच्छतेचे महत्‍व सांगीतले गेले आहे. स्वच्छते अभावी होणारे नुकसानदेखील सांगीतले गेले आहे.भारत सरकार राबवित असलेल्‍या उपाययोजना व नागरीकांनी कोणती पावले उचलली पाहीजे याचे मार्गदर्शन केले आहे.  पुर्ण निबंध वाचण्‍यासाठी येथे क्‍लीक करा.

  2. एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | shetkari manogat in marathi essay
    शेतकरी विश्‍वाचा अन्‍नदाता आहे. पण या अन्नदात्याची कश्‍याप्रकारे पिळवणुक होते व  तो नैर्सगिक व सरकारी संकटा‍त कसा भरडला जातो याचे वर्णन केले आहे. या संकटावुन स्‍वताला काढण्‍यासाठी तो आपली व्‍यथा इतरासमोर मांडत आहे. पुर्ण निबंध वाचण्‍यासाठी येथे क्‍लीक करा.


  1. माझा आवडता छंद मराठी निबंध | My Favourite Hobby Essay In Marathi
    प्रत्‍येक व्‍यक्ती आपआपला छंदातुन आनंद प्राप्‍त करण्‍याचा प्रयत्‍न करत असते. कुणी निसर्ग भ्रमंती करते. कुणी पोस्‍टाची तिकीटे जमा करते. कुणी पुस्‍तकांना आपला मित्र बनवते. या निबंधात अश्‍याच एका छंदाचे वर्णन केले आहे.  पुर्ण निबंध वाचण्‍यासाठी येथे क्‍लीक करा.
  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध | Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi
    बाबासाहेब, आता तुम्ही हवे होता ! बघा ना, तुमच्या मुलांनी काय काय मिळवले आहे. कुणी एखादया राज्याचा मुख्यमंत्री झाला आहे, तर कुणी विदयापीठाचा कुलगुरू, कुणी देशाचा उपराष्ट्रपती, तर कुणी प्रत्यक्ष राष्ट्रपती. बाबासाहेब हेच तुम्हांला हवे होते ना !

    तुम्ही ज्यांच्यासाठी आयुष्यभर खपलात त्याच तुमच्या अनुयायांनी खूप प्रगती केली आहे. त्यांनी शिकावे. अज्ञानरूपी अंधकारातून बाहेर पडावे, म्हणून तुम्ही धडपडलात, शाळा काढल्यात, महाविदयालये काढलीत. 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी' ही संस्था काढली. त्याला आज सुमधुर फळे आली आहेत. बाबासाहेब, हे पाहायला तुम्ही हवे होता !

    बाबासाहेब, तुम्ही नेहमी आम्हांला सांगत होता की 'वाचाल तर वाचाल'. त्याचा पुरेपूर प्रत्यय आज आला आहे. तुमच्या सांगण्यानुसार जे वाचायला शिकले त्यांनी खूप वाचले आणि मग त्यांनी स्वतः लिहायला सुरुवात केली. समाजाकडून वर्षानुवर्षे, पिढ्यान्पिढ्या ज्यांचे दमन झाले होते. त्यांनी धडपड करून आपली प्रगती साधली. त्यामागे तुमचीच प्रेरणा होती. मग या मंडळींनी आपल्या सुखदुःखाचे अनुभव शब्दांत मांडले.

    जीवनाची कठीण वाट तडवताना' बसलेल्या ठेचा त्यांनी आपल्या लेखनातून मांडल्या. अशा या आगळ्यावेगळ्या पण वास्तववादी साहित्याने आज मराठी सारस्वताचे भांडार समृद्ध झाले आहे. आज सर्व मराठी भाषिकांनी त्या साहित्याला गौरवले आहे. कित्येकांच्या पुस्तकांची इतर भाषांतही भाषांतरे झाली आहेत. डॉ. नरेंद्र जाधव यांच्या ' आमचा बाप आणि आम्ही ' या पुस्तकाने तर  स्वदेशाच्या मर्यादाही ओलांडल्या आहेत. जगातल्या अनेक भाषांत या पुस्तकांचे भाषांतर झाले आहे. बाबासाहेब, तुमच्या या लेकरांनी केलेली ही प्रगती पाहायला आज तुम्ही हवे होता !

    हे झाले दलित समाजाबददल. परंत बाबासाहेब तम्ही फक्त दलितांसाठीच कार्य केले. असे नाही. तुमच्या डोळ्यासमोर फक्त दलित समाज नव्हता; तर अखंड समर्थ भारत होता. या देशातील प्रत्येकाला उन्नत आयुष्य मिळावे, असा तुमचा ध्यास होता. त्यासाठी जगात कोणत्याही देशाला लाभली नाही, अशी अजोड घटना तुम्ही लिहिलीत. या देशाला तुम्ही मार्ग दाखवलात.

    त्याच मार्गाने जात असल्यामळे आज आपला देश देदीप्यमान अशी प्रगती करीत आहे; जगातील महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहे. आपल्या अवतीभवतीचे पाकिस्तान, बांगलादेश व अन्य शेकडो देश दुःखदैन्याच्या कर्दमात रुतले आहेत. तुमच्यासारखी विशाल दृष्टी व अंतःकरण असलेला घटनाकार त्यांना लाभला नाही. आम्ही भारतमातेचे पुत्र किती भाग्यवान की, तुमच्यासारखा महामानव आम्हांला नेता म्हणून लाभला !

    खरे तर, तुम्ही फक्त दलितांचे, फक्त भारतीयांचेच नव्हे, तर अखिल मानवजातीचे उद्धारकर्ते आहात ! तुम्ही दाखवलेल्या मार्गाने जाऊन आम्ही भारतीय आज जगभर कशी पताका फडकवत आहोत, हे पाहायला तुम्ही हवे होता ! एक खरे की, भारतात अजूनही दीनदलित, शेतमजूर, कष्टकरी, भूमिहीन दारिद्र्यात होरपळत आहेत. आज आपला देश त्यांच्याही उन्नतीसाठी प्रयत्न करीत आहे. परंतु तुम्ही असता, तर हे प्रयत्न अधिक वेगाने झाले असते. आपल्या समाजातील दुबळी अंगे अधिक वेगाने बलशाली करता आली असती.

    आम्ही या क्षणी तुम्हांला ग्वाही देतो की, तुमची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून तुम्ही दाखवलेल्या मार्गाने आम्ही निष्ठेने प्रयत्न करीत राह आणि या देशात मानवतेचे साम्राज्य निर्माण करू !   Dr Babasaheb Ambedkar निबंध २   पुर्ण निबंध वाचण्‍यासाठी येथे क्‍लीक करा

मराठी निबंध marathi nibandh

मराठी निबंध  Marathi Nibandh


  1. शाळेचा निरोपसमारंभ मराठी निबंध | Nirop Samarambha Essay Marathi (nibandh in marathi 12th) 


    शाळा आपल्‍या बालपणातील महत्‍वाचा भाग असतो. शालेय जिवनात केलेल्‍या गंमतीदार आठवणी असा हा काळ कोणीही विसरू शकत नाही.या निबंधात निरोप समारंभातील आधीचा काळ व निरोप समारंभातील घडलेल्‍या गोष्‍टीचे वर्णन केले आहे. पुर्ण निबंध वाचण्‍यासाठी येथे क्‍लीक करा.
  2. marathi nibandh
    marathi nibandh
    वसंत सर्व  ऋतुंचा राजा  मराठी  निबंध | vasant essay in marathiया निबंधामध्‍ये वसंत ऋतुचे गुणगाण केले आहे. वसंत ऋतुमध्‍ये पर्यावरणात होणारे बदल सांगीतले आहे. पशु पक्षी कश्‍याप्रकारे आनंदीत होतात हे दाखविले आहे.पुर्ण निबंध वाचण्‍यासाठी येथे क्‍लीक करा.

  1.  स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी | swachata che mahatva marathi nibandh
    या निबंधामध्‍ये स्वच्छतेचे महत्‍व सांगीतले गेले आहे. स्वच्छते अभावी होणारे नुकसानदेखील सांगीतले गेले आहे.भारत सरकार राबवित असलेल्‍या उपाययोजना व नागरीकांनी कोणती पावले उचलली पाहीजे याचे मार्गदर्शन केले आहे.  पुर्ण निबंध वाचण्‍यासाठी येथे क्‍लीक करा.

  2. एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | shetkari manogat in marathi essay
    शेतकरी विश्‍वाचा अन्‍नदाता आहे. पण या अन्नदात्याची कश्‍याप्रकारे पिळवणुक होते व  तो नैर्सगिक व सरकारी संकटा‍त कसा भरडला जातो याचे वर्णन केले आहे. या संकटावुन स्‍वताला काढण्‍यासाठी तो आपली व्‍यथा इतरासमोर मांडत आहे. पुर्ण निबंध वाचण्‍यासाठी येथे क्‍लीक करा.


  1. माझा आवडता छंद मराठी निबंध | My Favourite Hobby Essay In Marathi
    प्रत्‍येक व्‍यक्ती आपआपला छंदातुन आनंद प्राप्‍त करण्‍याचा प्रयत्‍न करत असते. कुणी निसर्ग भ्रमंती करते. कुणी पोस्‍टाची तिकीटे जमा करते. कुणी पुस्‍तकांना आपला मित्र बनवते. या निबंधात अश्‍याच एका छंदाचे वर्णन केले आहे.  पुर्ण निबंध वाचण्‍यासाठी येथे क्‍लीक करा.
  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध | Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi
    बाबासाहेब, आता तुम्ही हवे होता ! बघा ना, तुमच्या मुलांनी काय काय मिळवले आहे. कुणी एखादया राज्याचा मुख्यमंत्री झाला आहे, तर कुणी विदयापीठाचा कुलगुरू, कुणी देशाचा उपराष्ट्रपती, तर कुणी प्रत्यक्ष राष्ट्रपती. बाबासाहेब हेच तुम्हांला हवे होते ना !

    तुम्ही ज्यांच्यासाठी आयुष्यभर खपलात त्याच तुमच्या अनुयायांनी खूप प्रगती केली आहे. त्यांनी शिकावे. अज्ञानरूपी अंधकारातून बाहेर पडावे, म्हणून तुम्ही धडपडलात, शाळा काढल्यात, महाविदयालये काढलीत. 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी' ही संस्था काढली. त्याला आज सुमधुर फळे आली आहेत. बाबासाहेब, हे पाहायला तुम्ही हवे होता !

    बाबासाहेब, तुम्ही नेहमी आम्हांला सांगत होता की 'वाचाल तर वाचाल'. त्याचा पुरेपूर प्रत्यय आज आला आहे. तुमच्या सांगण्यानुसार जे वाचायला शिकले त्यांनी खूप वाचले आणि मग त्यांनी स्वतः लिहायला सुरुवात केली. समाजाकडून वर्षानुवर्षे, पिढ्यान्पिढ्या ज्यांचे दमन झाले होते. त्यांनी धडपड करून आपली प्रगती साधली. त्यामागे तुमचीच प्रेरणा होती. मग या मंडळींनी आपल्या सुखदुःखाचे अनुभव शब्दांत मांडले.

    जीवनाची कठीण वाट तडवताना' बसलेल्या ठेचा त्यांनी आपल्या लेखनातून मांडल्या. अशा या आगळ्यावेगळ्या पण वास्तववादी साहित्याने आज मराठी सारस्वताचे भांडार समृद्ध झाले आहे. आज सर्व मराठी भाषिकांनी त्या साहित्याला गौरवले आहे. कित्येकांच्या पुस्तकांची इतर भाषांतही भाषांतरे झाली आहेत. डॉ. नरेंद्र जाधव यांच्या ' आमचा बाप आणि आम्ही ' या पुस्तकाने तर  स्वदेशाच्या मर्यादाही ओलांडल्या आहेत. जगातल्या अनेक भाषांत या पुस्तकांचे भाषांतर झाले आहे. बाबासाहेब, तुमच्या या लेकरांनी केलेली ही प्रगती पाहायला आज तुम्ही हवे होता !

    हे झाले दलित समाजाबददल. परंत बाबासाहेब तम्ही फक्त दलितांसाठीच कार्य केले. असे नाही. तुमच्या डोळ्यासमोर फक्त दलित समाज नव्हता; तर अखंड समर्थ भारत होता. या देशातील प्रत्येकाला उन्नत आयुष्य मिळावे, असा तुमचा ध्यास होता. त्यासाठी जगात कोणत्याही देशाला लाभली नाही, अशी अजोड घटना तुम्ही लिहिलीत. या देशाला तुम्ही मार्ग दाखवलात.

    त्याच मार्गाने जात असल्यामळे आज आपला देश देदीप्यमान अशी प्रगती करीत आहे; जगातील महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहे. आपल्या अवतीभवतीचे पाकिस्तान, बांगलादेश व अन्य शेकडो देश दुःखदैन्याच्या कर्दमात रुतले आहेत. तुमच्यासारखी विशाल दृष्टी व अंतःकरण असलेला घटनाकार त्यांना लाभला नाही. आम्ही भारतमातेचे पुत्र किती भाग्यवान की, तुमच्यासारखा महामानव आम्हांला नेता म्हणून लाभला !

    खरे तर, तुम्ही फक्त दलितांचे, फक्त भारतीयांचेच नव्हे, तर अखिल मानवजातीचे उद्धारकर्ते आहात ! तुम्ही दाखवलेल्या मार्गाने जाऊन आम्ही भारतीय आज जगभर कशी पताका फडकवत आहोत, हे पाहायला तुम्ही हवे होता ! एक खरे की, भारतात अजूनही दीनदलित, शेतमजूर, कष्टकरी, भूमिहीन दारिद्र्यात होरपळत आहेत. आज आपला देश त्यांच्याही उन्नतीसाठी प्रयत्न करीत आहे. परंतु तुम्ही असता, तर हे प्रयत्न अधिक वेगाने झाले असते. आपल्या समाजातील दुबळी अंगे अधिक वेगाने बलशाली करता आली असती.

    आम्ही या क्षणी तुम्हांला ग्वाही देतो की, तुमची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून तुम्ही दाखवलेल्या मार्गाने आम्ही निष्ठेने प्रयत्न करीत राह आणि या देशात मानवतेचे साम्राज्य निर्माण करू !   Dr Babasaheb Ambedkar निबंध २   पुर्ण निबंध वाचण्‍यासाठी येथे क्‍लीक करा