कथनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कथनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

खेळाचे महत्व मराठी निबंध | Khelache Mahatva Essay Marathi

निबंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण खेळाचे महत्व मराठी निबंध  बघणार आहोतया लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. या निबंधामध्‍ये आज खेळांबद्दल असलेला दृष्‍टीकोन , खेळाचे शारीरीक व मानसीक दृष्‍टया असणारे फायदे स्‍पष्‍ट केले आहेत.  आज आपण खेळाचे महत्व  शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 


आज भारतीयांच्या जीवनात खेळांना महत्त्व आले आहे. आजकाल खेळाविषयीचा दृष्टिकोन थोडा थोडा बदलू लागला आहे; पण काही वर्षांपूर्वी खेळण्यात वेळ घालवणारे मूल हे अवलक्षणी समजले जायचे. इतकेच काय, एखादयाने 'खेळ' हे आपले जीवनध्येय (करिअर) करायचे ठरवले, तर त्याला 'भिकेचे डोहाळे' लागले असे मानले जायचे.


आज खेळातूनही पैसा मिळू शकतो, हे पाहून काही लोक तो आपल्या करिअरचा भाग करतात; पण त्याचबरोबर खेळाचे इतर फायदेही आज आपणाला उमगले आहेत. निकोप शरीरातच निकोप मन असू शकते, हे उमगल्यावर शरीर निकोप, सुदृढ ठेवण्यासाठी माणसे धडपडू लागली आणि निकोप शरीराचा एक मार्ग खेळाच्या पटांगणातून जातो, हे उमगल्यावर त्यांना खेळ हवेहवेसे वाटू लागले.


Khelache-Mahatva-Essay-Marathi
Khelache-Mahatva-Essay-Marathi


लहानपणी आपला बराचसा वेळ हा खेळण्यात जातो; पण लहानपणचे बहुतेक खेळ हे गमतीखातर खेळले जातात. त्यांत कोणतीही शिस्त नसते. बालपण हे फुलपाखरासारखे असते. जेव्हा बालपण संपते, शैशवही ओलांडले जाते आणि कुमारावस्था प्राप्त होते, तेव्हा शिस्तीची आवश्यकता निर्माण होते. जीवनातील सर्वच क्षेत्रांत शिस्त अनिवार्य आहे, तशी ती खेळांतही आवश्यक असते.(हा निबंध पण वाचा शालेय जीवनात खेळाचे महत्त्व)


खेळांनी व्यायाम होतो, शरीर बळकट होते; पण खेळातील शिस्त जीवनालाही वळण देते. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. तेथे आपल्या एकट्याचा विचार करून चालत नाही, संपूर्ण संघाचा विचार करावा लागतो. खेळामुळे मनोरंजन होते व मनाला उत्साह मिळतो. दोन-चार तास अभ्यास केल्यावर कंटाळा येतो. त्यानंतर थोडा वेळ खेळल्यावर कंटाळा पळून जातो आणि अभ्यासासाठी पुन्हा उत्साह येतो. खेळात मनाची एकाग्रता साधता येते.



खेळांचाही अभ्यास करावा लागतो, खेळालाही सराव लागतो आणि खेळासाठीही उत्तम मार्गदर्शक गुरू असावा लागतो. खेळ म्हटला की यश आणि अपयश आलेच. कधी हार होणार, कधी जीत होणार; पण हारही हसत स्वीकारता आली पाहिजे. हरणारा खेळाडू जिंकलेल्या खेळाडूचे प्रथम अभिनंदन करतो. खेळातून येणारी ही खिलाडूवृत्ती जीवनात फार उपयोगी पडते. (हा निबंध पण वाचा माझा आवडता खेळाडू निबंध मराठी मध्ये)



प्रत्येकाला आपल्या जीवनात केव्हा ना केव्हा संकटाला तोंड दयावे लागते. कधी हार  पत्करावी लागते. अशा वेळी खिलाडूवृत्ती असेल तरच आपण पुढे जातो. अपयशाने खचून जाणाऱ्याच्या हातून काहीच घडत नाही. जशी हार, तशीच जीत ! हार झाल्याने खचून जाऊ नका. तसेच, जीत झाल्याने फुगून जाऊ नका, असे सच्चा खेळाडू सांगतो. खेळातील हार संयमाने स्वीकारावी, तसाच जीवनातील विजयही विनम्रतेने स्वीकारावा.

खेळात हार-जीत असली तरी खेळ खेळले जातात ते मैत्रीसाठी! ऑलिम्पिक, विम्बल्डन, एशियाड आदी विविध खेळांच्या जागतिक स्पर्धा वर्षभर खेळल्या जातात, ते एकमेकांचे कौतुक करण्यासाठी, स्नेहाचा हात पुढे करण्यासाठी! खेळांमुळेच आपली उत्साही वृत्ती टिकून राहते.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 2

अभ्यासाइतकेच जीवनात व्यायाम व खेळ यांनाही महत्त्व आहे. मुलांच्या मानसिक विकासाबरोबरच मुलाचा शारीरिक विकासही झाला पाहिजे. व्यायाम, खेळ शारीरिक विकास करतात तर शिक्षण, चिंतन, मननामुळे व्यक्तीचा मानसिक विकास होतो. 


खेळाची अनेक रूपे आहेत. काही खेळ मुलांसाठी, काही मोठ्यांसाठी तर काही वृद्धांसाठी असतात. काही खेळ खेळण्यासाठी मोठी मैदाने लागतात. काही खेळांना मात्र लागत नाहीत. घरातल्या घरात खेळले जाणारे कॅरम, पत्ते, बुद्धिबळ, सोंगट्या या खेळामुळे मनोरंजन व बौद्धिक विकास होतो.

स्वस्थ शरीरातच स्वस्थ मनाचा विकास होतो" जी मुले अभ्यासाबरोबरच खेळातही भाग घेतात ती चपळ, उत्साही असतात. त्यांची हाडे मजबूत आणि चेहरा तजेलदार होतो. पचनशक्ती चांगली राहते. डोळे चांगले राहतात, शरीर वज्राप्रमाणे होते. व्यायाम न केल्यास मनुष्य आळशी व निस्तेज बनतो.



मनुष्याला जे धडे शिक्षण शिकवू शकत नाही ते खेळाचे मैदान शिकविते. उदा० खेळ खेळताना शिस्त पाळावी, नेत्याच्या आज्ञेचे पालन करावे, खेळात विजयाच्या वेळी उत्साह असावा पण हार झाली तरी बदल्याची भावना नसावी. 


मुलांच्या किशोरावस्थेपासूनच त्यांना त्यांच्या आवडीचे खेळ खेळू दिले पाहिजेत. त्यांना संघर्षासाठी तयार केले पाहिजे. म्हणजे ते भविष्यातही यशस्वी होतील. विश्व विक्रम करून आपला आणि देशाचा गौरव ते वाढवितील. सांघिक खेळांमुळे संघभावना व जबाबदारीची जाणीव होते.


खेड्यांतील आणि शहरांतील खेळात फरक असतो. खेड्यांतली मुले विटीदांडू, कबड्डी, गोट्या खेळतात. तर शहरातील मुले क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिससारखे खेळ खेळतात. वाढत्या लोकसंख्येमुळे खेळांची मैदाने कमी होत आहेत. खेळांडूसाठी खेळाचे मैदान मोठे आणि हवेशीर असले पाहिजे. त्यांनी हिरव्या भाज्या, दूध, फळे आदींचे सेवन केले पाहिजे. 


स्वच्छ वातावरणात राहिले पाहिजे. हे शरीर ईश्वराची देणगी आहे. त्याला निरोगी ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे. त्याच्या सुरक्षिततेसाठी खेळ, व्यायाम, आणि शिक्षण आवश्यक आहे. शाळेमध्ये खेळांत भाग घेण्यास उत्तेजन दिले पाहिजे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 3


खेळाचे महत्व मराठी निबंध | Khelache Mahatva Essay Marathi


विद्यार्थी जीवनात अभ्यासाइतकेच खेळालाही महत्त्व आहे. पालकांच्या आता हे लक्षात आले आहे की, मुलांच्या मानसिक विकासाबरोबरच त्यांचा शारीरिक विकासही झाला पाहिजे. मानवाचे संपूर्ण जीवन मन आणि शरीररूपी गाडीच्या दोन चाकांवर चालते.



शिक्षण, चिंतन, मनन, व्यक्तीचा मानसिक विकास आणि व्यायाम, खेळ, शारीरिक विकास करतात. खेळाची दोन रूपे असतात. घरात बसून खेळले जाणारे खेळ उदा. कॅरम, बुद्धिबळ, पत्ते इ. मैदानावर मोकळ्या जागी खेळले जाणारे खेळ उदा. खो खो, क्रिकेट, फुटबॉल इ. घरात खेळल्या जाणाऱ्या खेळांमुळे व्यायाम कमी पण बौद्धिक विकास आणि मनोरंजन होते. मैदानी खेळांमुळे शरीराला भरपूर व्यायाम होतो व मनोरंजनही होते.



'निरोगी शरीरात निरोगी मनाचा निवास असतो' शरीर अस्वथ असेल तर मनही अस्वस्थ असते. जी मुले केवळ पुस्तकातील किडे असतात त्यांचा शारीरिक विकास खुंटतो. ती चिडचिडी व सुस्त होतात. स्वत:चे रक्षणही ती करू शकत नाहीत. जी मुले अभ्यासाबरोबरच निरनिराळे खेळही खेळतात ती प्रसन्न व निरोगी राहतात.

उत्साही आणि चपळ राहिल्यामुळे शारीरिक शक्तीचा विकास होतो. यावरच मानसिक व आत्मिक विकास अवलंबून असतो. दिवसभर यंत्राप्रमाणे काम केल्यानंतर जर खेळाच्या मैदानावर मुले गेली नाहीत तर बुद्धिमान विद्यार्थीसुद्धा निर्बुद्ध होऊन जाईल. आणखी काम करण्याची इच्छा मनांत निर्माण होण्यासाठी खेळणे आवश्यक आहे.


विद्यार्थी, जीवनात फक्त अभ्यासच करीत राहू नये किंवा नुसते खेळतच बसू तये तर “Work while you work, play while you play." हे चांगल्या विद्यार्थ्याचे लक्षण आहे. माणसाचे मन सदैव अभ्यासात गुंतलेले राहिल्यास डोके जड़ पडते आणि त्याला विश्रांतीची गरज भासते. ही विश्रांती खेळण्यामुळेच मिळते.



खेळण्यामुळे मानसिक द्वंद्व मिटते. मन हलके होऊन शरीरात नवीन ऊर्जा शक्ती येते. हाडे मजबूत होतात आणि चेहरा कांतिमान होतो. पचनशक्ती चांगली राहते. डोळ्यांची ज्योती (तेज) वाढते. शरीर वज्राप्रमाणे होते. खेळ जीवनात संजीवनी बुटीचे काम करते. खेळ मनोरंजनाचे एक चांगले साधन आहे.



जेव्हा खेळाडू खेळाच्या मैदानावर खेळतो तेव्हा तो पुलकित होतो. खेळ खेळण्यामुळे खेळाडू, स्वतः प्रेक्षकही आनंदी होतात. क्रिकेट आणि हॉकीचा सामना पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक स्टेडियमवर उपस्थित असतात. खेळाडूची एकाग्रता खेळ व अन्य कामांत सारखीच असते.



शिक्षण घेऊन जे शिकावयास मिळत नाही ते खेळात शिकावयास मिळते. उदा. शिस्त विद्यार्थी जीवनात शिस्तीला खूप महत्त्व आहे. शिस्तीत राहूनच विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतो. शिक्षकही शिस्तीतच अध्यापन करतात. शिस्त नसेल तर शाळा कुस्तीचे मैदान बनेल.



जो संघ जितका शिस्तबद्ध असेल तितके सामना जिंकणे त्याला सोपे होते. अन्यथा हरण्याची शक्यता जास्त असते. याखेरीज खेळात परस्पर सहकार्याची भावना पण उत्पन्न होते. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी इत्यादी खेळांमध्ये दोन संघ असतात. प्रत्येक संघाचे खेळ वेगळे असतात व प्रत्येकाचे महत्त्वही वेगळे असते.



कप्तान संघनेता असतो. त्याच्या आदेशाचे सगळे खेळाडू पालन करतात. संघातील खेळाडूंच्या परस्पर सहकार्यामुळे संघ विजयी होतो. खेळ मनुष्याला स्वावलंबी व आत्मविश्वासू बनवितो. ज्याप्रमाणे विद्यार्थी जीवनाचे उद्दिष्ट अभ्यास करणे हे असते त्याचप्रमाणे खेळाच्या मैदानावर उतरल्यावर खेळाडूचे उद्दिष्ट आत्मविश्वासाने खेळून विजय प्राप्त करणे हे असते. विजयाची इच्छा खेळाडूला विजयी बनविते.

खेळ हा खेळाडूचा आत्मा असतो. खेळ केवळ खेळाच्या भावनेतूनच खेळले जावेत. त्यामुळे खेळाडूंमध्ये परस्पर सहकार्य, शिस्त, संघटन, सहनशीलपणा येतो. खेळात संघर्ष हा असतोच. त्यातून जो विजय मिळतो त्याचा आनंद खास असतो.



विजय मिळाल्यावर उत्साह वाटणे, पराजय सहन करणे व बदल्याची भावना मनात न ठेवता पराजयाच्या कारणांचा शोध घेऊन ती दूर करून जिंकण्याचा प्रयत्न करणे ही खऱ्या खेळाडूची लक्षणे होत. पराजयच यशाचा संदेश देते.


खेळांमध्ये केवळ दोन संघांमध्येच जवळीक निर्माण होते, असे नसून क्रिकेटसारख्या खेळांमुळे दोन देशांमध्ये ही जवळीक निर्माण होते. खेळ विश्वबंधुत्वाची भावना निर्माण करतात. धनुर्विद्या, घोडेस्वारी, कबड्डी, मल्लयुद्ध यासारख्या खेळांची परंपरा आपल्या देशात प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.



आजही या खेळांचे महत्त्व कमी झालेले नाही. भारत खेळांमध्ये मागे नाही. आशियाई क्रीडा स्पर्धा, क्रिकेटचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामने येथे नेहमीच होतात. जिल्हा, मंडळ, प्रादेशिक, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडास्पर्धा होत राहतात. विजयी खेळाडूंना पुरस्कार दिले जातात.



नव्या खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाते. खेळामध्ये नव्या गोष्टी शिकावयास मिळतात. आपल्या पराजयाची कारणे शोधून ती दूर करून पुन्हा विजय प्राप्त केला जातो. यात गुरू वा प्रशिक्षकाचे सहकार्य मिळते म्हणून भारत सरकार विजयी खेळाडूला "अर्जुन पुरस्कार" देते आणि प्रशिक्षकाला "द्रोणाचार्य पुरस्कार' देते.

शिक्षण मनुष्याला सभ्य आणि देशप्रेमी बनविते. खेळांमुळे बंधुत्व, सहकार्य, शिस्त, निष्ठा, स्वावलंबीपणा इत्यादी गुण विकसित होतात. म्हणून जीवनात खेळांचे स्थान गौण नाही. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.

खेळाचे महत्व मराठी निबंध | Khelache Mahatva Essay Marathi

माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध | My Favourite Game Cricket Essay In Marathi

निबंध 1 

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्‍ये  लोकांचे क्रिकेटवर  असलेले अपार प्रेम व्यक्त  केले आहे. क्रिकेट या खेळाचे फायदे , सविस्तर रित्या सांगीतले आहेत . वर्णन केेले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 

आज एकविसाव्या शतकात माणसाला खेळाचे महत्त्व उमगलेले आहे. शरीर निरोगी राहण्याकरिता व्यायाम, योग वा खेळ आवश्यक आहेत हे सर्वमान्य झाले आहे. आज भारतात क्रिकेट हा अत्यंत लोकप्रिय खेळ ठरला आहे. त्यामुळे साहजिकच क्रिकेट खेळणाऱ्यांपेक्षा क्रिकेट पाहणारे व ऐकणारे यांचीच संख्या फार मोठी झाली आहे. मी त्यांपैकीच एक मी क्रिकेट खेळतो, क्रिकेटसंबंधित पुस्तके वाचतो आणि मैदानावर जाऊन मी मोठ्या हौसेने क्रिकेट खेळतो, पंरतु मैदानावर जाणे न जमल्यास T.V. किंंवा मोबाईलवर क्रिकेटचे सामने पाहतो.


 असे सामने पाहताना सर्व क्रिकेटप्रेमी देहभान हरपून जातात. क्रिकेटवर अलीकडे खूप टीका होत आहे. ती रास्तच आहे. हा खेळ चार-चार, पाच-पाच दिवस चालतो. क्रिकेटचे सामने असले की लोकांमध्ये अक्षरशः वारे संचारते. लोक कामधाम सोडून हा खेळ पाहत बसतात. त्यामुळे देशभर कामाचे लक्षावधी तास फुकट जातात. कामावर हजर असलेले लोक एकाग्र चित्ताने कामे करीत नाहीत. विदयार्थ्यांचे तर अभ्यासाकडेही दुर्लक्ष होते. देशाच्या कार्यशक्तीची ही फार मोठी हानी आहे, यात शंकाच नाही.



आपले क्रिकेटपटू खेळापेक्षा पैशाकडे लक्ष देतात. आपण देशाच्या वतीने खेळत आहोत, ही भावनाच लुप्त होत आहे. अलीकडे तर आपल्या खेळाडूंचा कोटी कोटी रुपयांना लिलाव होऊ लागला आहे. वारेमाप प्रसिद्धी व वारेमाप पैसा यांमुळे या खेळांच्या सामन्यात मॅच फिक्सिंगसारख्या विकृत प्रवृत्ती शिरल्या आहेत. या खेळाकडे कोणीही खेळ म्हणून पाहतच नाही. खिलाडूवृत्ती नष्ट होत आहे. इतर खेळांना काडीचीही किंमत कोणी देताना दिसत नाही.

My-Favorite-Game-Essay-In-Marathi
My-Favorite-Game-Essay-In-Marathi



असे असले तरी हा खेळ मला खूप आवडतो. या खेळाचे काही फायदेही आहेत. या खेळामुळे चपळता, काटकपणा व शिस्तप्रियता या गुणांचा विकास होतो. या खेळात फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या सर्व बाबतीत आपले नैपुण्य दाखवता येते. चौकार षटकार मारणाऱ्या, अवघड झेल पकडणाऱ्या खेळाडूला प्रेक्षक डोक्यावर घेतात. क्षणाक्षणाला चुरस वाढवणारा असा हा खेळ आहे.

अलीकडे क्रिकेटचे स्वरूप बदलत आहे. सध्या कसोटी सामन्यांबरोबर एकदिवसीय सामनेही खेळले जातात. वीस वीस (20-20 किंवा T20) षटकांचे सामनेही लोकप्रिय झाले आहेत; कारण त्यांचा निकाल झटपट लागतो. आपल्या देशात अनेक उत्कृष्ट क्रिकेटवीर होऊन गेले व आजही आहेत. त्यांनी जागतिक कीर्ती मिळवली. आज सचिन तेंडुलकर हा सर्वांचा आवडता खेळाडू आहे.

क्रिकेटमध्ये वैयक्तिक विक्रमांची नोंद ठेवली जात असली तरी या खेळात सांघिक एकता हीच महत्त्वाची आहे. तीच यश खेचून आणते. काही वेळेला एखादया खेळाडूने भरपूर धावा केल्या तरी संघाला यश मिळत नाही. 'क्रिकेट हा योगायोगाचा (Chance) खेळ आहे'. प्रत्येक डावात काय घडेल, हे सांगणे कठीण असते. प्रत्येक खेळाडूला अतिशय जबाबदारीने खेळावे लागते; कारण त्यावरच त्याच्या संघाचा आणि पर्यायाने देशाचा लौकिक अवलंबून असतो.

मित्रांनो तुम्‍हाला maza avadta khel marathi nibandh हा निबंध कसा वाटला  व तुमचा आवडता क्रिकेटर कोण आहे हे सांगण्‍यास विसरू नका.  . धन्‍यवाद . 
महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  •  खेळाचे जीवनातील अनन्यसाधारण स्थान
  •  खेळांचे उपयोग नेतृत्वगुण
  • सांघिक भावना ,ऐक्य 
  • जबाबदारीची जाणीव 
  • निकोप दृष्टिकोन दुसऱ्यांविषयी आपुलकी 
  • वेळेचे महत्त्व 
  • शिस्तप्रियता, चपळता, काटकपणा 
  • सध्या बहुतेकांची आवड क्रिकेट 
  • खेळाचा तपशील व महत्त्व
 निबंध 2

क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. यात दोन संघांत सामने होतात. प्रत्येक संघात ११ + ३ खेळाडू असतात. या खेळासाठी चपळता, काटकपणा आणि शिस्तप्रियता आवश्यक असते. तीन स्टम्प्स व त्यांवरील दोन बेल्स मिळून विकेट  तयार होते. अशा समोरासमोरील दोन विकेट्स असतात. विकेटची रुंदी २२.९ सेमी असते. दोन विकेट्समध्ये २२ यार्ड अंतर असते, यालाच 'पिच' किंवा खेळपट्टी म्हणतात. खेळपट्टीची रुंदी ५ फूट असते. मैदान सामान्यत: वर्तुळाकृती असते. 


जेव्हा एक संघ फलंदाजी स्वीकारतो, तेव्हा दुसरा संघ गोलंदाजी पत्करतो. दिवसा खेळल्या जाणाऱ्या कसोटी क्रिकेटसाठी लाल रंगाचा चेंडू वापरतात तर दिवस-रात्र खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी सफेद रंगाचा चेंडू वापरतात. बॅटची लांबी ३४ इंचांपेक्षा व रुंदी ४ ५ इंचांपेक्षा अधिक नसावी. बॅटचे वजन मात्र निश्चित नसते.

या खेळात फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या सर्व बाबतीत आपले नैपुण्य दाखवता येते. चौकार-षटकार मारणाऱ्या, अवघड झेल पकडणाऱ्या खेळाडूला प्रेक्षक डोक्यावर घेतात. क्षणाक्षणाला चुरस वाढवणारा असा हा खेळ आहे.

सध्या कसोटी सामन्यांबरोबर एकदिवसीय सामनेही खेळले जातात. या प्रकारचे सामने लोकप्रिय झाले आहेत; कारण त्यांचा निकाल झटपट लागतो. आपल्या देशात अनेक उत्कृष्ट क्रिकेटवीर होऊन गेले व आजही आहेत. त्यांनी जागतिक कीर्ती मिळवली. आज सचिन तेंडुलकर हा सर्वांचा आवडता खेळाडू आहे.

निबंध 3 

माझा आवडता खेळ


खेळ म्हणजे क्रीडा, करमणुकीचे साधन. ज्याच्यामुळे आपल्याला विरंगुळा मिळतो. आनंद मिळतो, तो खेळ. आपण आजच्या धकाधकीच्या जीवनात मनावरील दडपण कमी करण्यासाठी खेळ खेळतो किंवा बघतो. आपले जीवन-देखील एक खेळच आहे.


"दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव,

हासत हासत झेलू, आपण पराजयाचे घाव॥"


खेळ म्हटला, की जय-पराजय, यश-अपयश आलेच. मग यशाने हुरळून जाऊ नका नि पराजयाने खचून जाऊ नका, असा सदेश देणारा खेळ मला आवडतो. खेळ प्राण पणाला लावून खेळला जात नाही; तर कौशल्य पणाला लावून खेळला जातो. कौशल्य प्राप्त होण्यासाठी सराव महत्त्वाचा असतो. खेळ वैयक्तिक पातळीवर आणि सांघिकपणे खेळला जातो.



लंगडी, कबड्डी, हॉकी, व्हॉलीबॉल, फुटबॉल, बास्केट बॉल, टेनिस इ. पण सध्या सर्वात लोकप्रिय खेळ आहे क्रिकेट. क्रिकेट हा खेळ सांघिकपणे खेळला जातो. या खेळात चौदा प्रमुख खेळाडू असतात. त्यातील अकरा खेळाडू खेळतात. म्हणजेच तीन खेळाडू राखीव असतात. या खेळात गोलंदाजी, फलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही बाबतीत आपले नैपुण्य दाखवता येते. चौकारषटकार मारणाऱ्या फलंदाजाला, तसेच अवघड झेल पकडणाऱ्या क्षेत्ररक्षकाला प्रेक्षकांकडून प्रोत्साहन मिळते. क्षणाक्षणाला चुरस वाढविणारा हा खेळ आहे.



क्रिकेटमध्ये वैयक्तिक विक्रमांची नोंद ठेवली जाते. तरीही, या खेळात सांघिक एकता फार महत्त्वाची ठरते. सांघिक एकता, सहकार्य असल्याशिवाय यश मिळत नाही. कधीकधी एखाद्या खेळाडूने भरपूर धावा केल्या, तरीही संघ यशस्वी होईल, असे निश्चित सांगता येत नाही. 'क्रिकेट हा योगायोगाचा' खेळ आहे. प्रत्येक डाव हा उत्सुकता वाढविणारा असतो. प्रत्येक खेळाडूला अतिशय सावधतेने व जबाबदारीने खेळावे लागते.



ह्या खेळाबद्दलचे सामान्य लोकांना वाटणारे आकर्षण वाढत चालले आहे. खेळाडूंचे चारित्र्य निखळ हवे, तरच खेळ निखळ होईल. निखळपणाबद्दल सांगायचे, तर भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना होता. गुंडाप्पा विश्वनाथ संघनायक होते. सामना रंगात आला असताना पंचांनी इंग्लंडच्या एका खेळाडूला बाद दिले. तो निर्णय चुकीचा होता, हे कर्णधार गुंडाप्पा विश्वनाथने पंचांच्या लक्षात आणून दिले व त्या खेळाडूला खेळू देण्याची विनंती केली.



पंचांनीही विनंती मान्य करून त्या खेळाडूला खेळू दिले. या निर्णयामुळे सामना फिरला आणि भारताचा पराभव झाला. पण मला वाटते, हा खेळ स्कोअर बुकच्या पलीकडे नोंदवला गेला. कारण या सामन्यातील भारतीय संघाच्या पराभवापेक्षा विश्वानाथने निखळ खेळाडू म्हणून नोंदवलेला विजय जास्त महत्त्वाचा !  



म्हणून या खेळात नम्रता, शिस्तपालन, माणुसकी हे गुण खेळातील यशापेक्षा मोठे यश असतात. या खेळामुळे करमणूक होते, ती खेळ पाहणाराची; पण खेळ प्रत्यक्ष मैदानावर खेळणाराचा व्यायाम होतो. 



खेळ खेळल्याने शरीर बळकट होते. खेळातील शिस्त जीवनालाही वळण देते. क्रिकेट हा खेळ सांघिक खेळ असल्याने या खेळात वैयक्तिक विचार करून चालत नाही. संपूर्ण संघाचा विचार करावा लागतो. शिवाय, खेळामुळे मनाची एकाग्रता वाढते. खिलाडूवृत्ती वाढते. हे सगळे फायदे लक्षात घेता मलाच काय, सगळ्यांनाच आवडणारा खेळ म्हणजे क्रिकेट.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद



माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध | My Favourite Game Cricket Essay In Marathi

माझे गाव मराठी निबंध | Maze Gav Essay In Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझे गाव मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्‍ये गावात असलेेेेेल्‍या अडचणी जर मनावर घेतल्‍या तर कश्‍या प्रकारे सोडवल्‍या जाऊ शकते व त्‍यानंतर झालेल्‍या प्रगतीचे  वर्णन केेले आहे.  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

आज मी माझ्या गावाची हकिकत सांगणार आहे. त्याचे कारणही महत्त्वाचे आहे. नुकताच शासनाकडून 'निर्मल ग्राम' हा गौरव पुरस्कार माझ्या गावाला मिळाला आहे. पुरस्कारापोटी दोन लाख रुपये मिळाले. हजारो गावांत माझे  गाव 'निर्मल ग्राम' ठरले याचा मला मोठा अभिमान वाटतो.


सह्याद्रीच्या कुशीतील अणूर हे एक खेडे. जमीन खडकाळ, बरड. फारशी सुपीक नाही. पाण्याची तर नेहमीचीच ओरड. गावात साधारण सहाशे-सातशेपर्यंतची वस्ती. गावात शिक्षणाचे प्रमाण कमी. सहकार्य जवळजवळ नाहीच. स्वच्छता बाळगण्याची वृत्ती नाही. गाव एकंदरीत बकाल बनला होता.

maze gav essay in marathi
maze gav essay in marathi


अशा या गावाचे एवढे परिवर्तन कसे झाले? गावाचेच सुदैव म्हणायचे ! गावातला रघू शहरातून गावाकडे परत आला; म्हणून हे सारे घडले ! रघू शहरात नोकरी करत होता. पण त्याची प्रकृती ठीक राहीना म्हणून तो गावाकडे परत आला. रघूला बरे वाटले आणि त्याने गावातच राहायचे ठरवले. रघूला स्वस्थ बसवेना. त्याने सर्व गावकऱ्यांना एकत्र केले. तो गावात नवा असल्याने त्याचे गावातील कोणाशीही भांडण नव्हते. त्यामुळे त्याच्या विनंतीवरून सगळे एकत्र जमले. रघुने स्वच्छ सुंदर गावाची कल्पना गावकऱ्यांसमोर मांडली. बहुसंख्य लोकांनी रघूची टिंगल केली.

रघूने कामाला सुरुवात केली. प्रथम त्याने प्रत्येक घराला संडास बांधायची कल्पना मांडली. गावकऱ्यांबरोबर तो स्वतः काम करत असे. गावाची दुसरी अडचण होती ती पाण्याची. गावातल्या महिलांना खूप दूरवरून पाणी आणावे लागत असे. रघूने यासंबंधी खूप विचार केला. काही जाणकारांशी चर्चा केली. त्याने जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावात तीन विहिरी खणल्या. काही बोअर विहिरी काढल्या आणि जो काही तुटपुंजा पाऊस पडतो त्याचे पाणी अडवण्याचे उपाय सुचवले. बघता बघता गावाचा कायापालट होऊ लागला. गोबर गॅस, ओल्या कचऱ्यापासून खत असे काही प्रकल्प यशस्वी झाले. रघूने पारंपरिक शेतीला वनशेतीची जोड दिली. गावाची आर्थिक स्थिती सुधारली.

गावातील भांडणे संपली. गावकरी गुण्यागोविंदाने राहू लागले. एकमेकांच्या मदतीला जाऊ लागले. गावात दहावीपर्यंत शाळा सुरू झाली. लघुउदयोग सुरू झाले. लोक विधायक कामात गुंतले. बघता बघता माझा गाव निर्मळ झाला. साऱ्या महाराष्ट्रात 'निर्मल ग्राम' हा किताब मिळवणारा माझा गाव आज साऱ्यांच्या कौतुकाचा विषय झाला आहे. अशी आहे आमच्या आदर्श गावाची कथा.

मित्रांनो तुम्‍हाला माझे गाव मराठी निबंध  हा निबंध कसा वाटला  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद . 


महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )
  •  स्थळ 
  •  गावाचे मूळ स्वरूप 
  •  गावाचे विकृत रूप 
  •  गावातील भांडणे 
  • गावाला लाभलेले योग्य नेतृत्व 
  • गावाच्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न
  • गावाचा विकास
  • गावातील भांडणे संपली 
  • निर्मळ गाव.

माझे गाव मराठी निबंध | Maze Gav Essay In Marathi

मी पाहिलेले पर्यटन स्थळ मराठी निबंध |  Tourist Destination essay in marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी पाहिलेले पर्यटन स्थळ मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्‍ये आंबोली  या पर्यटन स्थळा विषयी माहीती  देण्‍यात आली आहे.उन्‍हाळ्याच्‍या सुट्टीत घालवलेले ते सोनेरी क्षण या निबंधात दर्शविले आहेत ते तुम्‍हाला लक्षात येईलच .  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


 माझे एक काका सावंतवाडीला राहतात. एकदा मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही काकांकडे गेलो होतो. आम्ही सर्वचजण आल्यामुळे काका आनंदात होते. मोठ्या उत्साहात त्यांनी आम्हांला संपूर्ण सावंतवाडीचे दर्शन घडवले. एके दिवशी त्यांनी आंबोलीला जाण्याचा बेत जाहीर केला आणि आम्हा मुलांमध्ये उत्साहाची लाटच पसरली. वास्तविक मी पूर्वी आंबोली पाहिले आहे. परंतु हे डोंगरमाथ्यावरील सुंदर गाव पुन्हा पाहायला मिळणार, याचा मलाही खूप आनंद झाला होताच.

Tourist Destination essay in marathi
Tourist Destination essay in marathi


आंबोली हे निसर्गाची कृपा लाभलेले डोंगरमाथ्यावरचे एक छोटेसे गाव आहे. प्रथम आम्ही सावंतवाडीहून गाडीने आंबोलीकडे निघालो, तेव्हा त्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या 'दानोली' या गावी पोहोचलो. मग रमतगमत डोंगरमाथ्यावरील आंबोली या गावी पोहोचलो. या आंबोलीला अलीकडे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्धी मिळू लागल त्याला 'गरिबांचे महाबळेश्वर' म्हणून ओळखतात,

'आंबोली ' या ठिकाणाचा समावेश कोकणातील सिंधदुर्गात केला जातो, अजूनही या ठिकाणाचे शहरीकरण झाले नाही, म्हणून ते घाटमाथ्यावरील एक टुमदार खेडेगावच आह. या घाटमाथ्यावरून सुंदर दृश्ये दिसणारी ठिकाणे आहेत, ते पॉइन्टस म्हणूनच ओळखले जातात. तेथील सूर्यास्त पाहण्यासाठी प्रवासी आवर्जून येतात. या आंबोली गावात अजून दोन प्रेक्षणीय स्थानांचा उल्लेख केला जातो. ती स्थाने म्हणजे 'महादेवगड' आणि 'नारायणगड'. गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्थानांवर गडांच्या कोणत्याही खुणा आज आढळत नाहीत. या गडांच्या आश्रयाने तेथील काही भूमिपुत्रांची वस्ती आहे. अगदी थोड्या पैशात ते भाकरी, पिठले, कढी देऊन आपले स्वागतही छान करतात.

आंबोली घाटाला कोणत्याही काळात पर्यटक भेट देतात, पण खासकरून वर्षा ऋतूत येथील सौंदर्य अनुपम असते. निसर्गराजा प्रसन्न होऊन आपले जलवैभव येथे ओतत असतो आणि शहरातून थकून आलेले पर्यटक या पाण्यात न्हाऊन आपल्या थकव्याला पळवून लावतात. आंबोली-बेळगाव रस्त्यावर थोडी पायपीट केल्यावर हिरण्यकेशी नदीचे उगमस्थान दिसते. येथे पार्वतीदेवीचे मंदिर आहे. ही हिरण्यकेशी नदी म्हणजे भगवान महादेवाने पार्वतीला दिलेली भेट अशी कथा सांगितली जाते. पुढे या नदीला चित्री नावाची नदी मिळते आणि मग या मैत्रिणी हातात हात घालून कर्नाटकाकडे मार्गस्थ होतात. या हिरण्यकेशी नदीवर असलेला नागरतास धबधबा आपल्या डोळ्यांचे पारणे फेडतो.

निसर्गरम्य कोकणातील आंबोलीला आंबा, काजू यांचे वरदान लाभलेले आहेच. पण त्याशिवाय हिरडा, जांभूळ, ऐन, अंजनी इत्यादी औषधी झाडांचे वैभवही प्राप्त झाले आहे. आंबोलीच्या घाटात हिंडताना इतकी रंगीबेरंगी झाडे, पाने, फुले दिसतात की, काय पाहू आणि काय नको असे होते. अजून आंबोली हे एक डोंगरमाथ्यावरील टुमदार खेडे आहे. तेथे पंचतारांकित संस्कृती पोहोचली नाही. त्यामुळे तेथे पुन:पुन्हा जावेसे वाटते.

मित्रांनो तुम्‍हाला मी पाहिलेले पर्यटन स्थळ मराठी निबंध हा निबंध कसा वाटला व पर्यटन स्थळाचा तुमचा अनुभव शेअर करू शकता . धन्‍यवाद


महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • आंबोलीला जाण्याचे प्रयोजन
  • आंबोली - निसर्गाचे वरदान लाभलेले एक छोटेसे गाव 
  • गरिबांचे महाबळेश्वर 
  • सुंदर ठिकाणे 
  • महादेवगड, नारायणगड 
  • मूळ वस्ती
  • आंबोलीतील नदी 
  • धबधबा 
  • आंबोलीतील झाडे
  • साधेपणा हाच आगळेपणा.

मी पाहिलेले पर्यटन स्थळ मराठी निबंध | Tourist Destination essay in marathi

Maza Avadta San Essay In Marathi | माझा आवडता सण मराठी निबंध 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता सण मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्‍ये दसरा या सणा‍विषयी माहीती व महत्‍व देण्‍यात आले आहे.  दसरा या सणाचे नाते महाभारत व रामायणा सोबत कसे आहे हे सांगण्‍याचा प्रयत्न केला  आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

सण ! भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक ! भारतीयांच्या आध्यात्मिक अन् भाविक भावनांतून जन्मले - सण!! प्रत्येक सणाला एक खास व्यक्तिमत्त्व असते. गुढीपाडवा एखाद्या धीरललित राजासारखा !...वस्त्राभरणांनी नटलेली, सौम्य पण प्रसन्न, रसिक नार दीपावली !!...तारुण्याचं वारं प्यालेल्या पंचमी अन् होळी या हरिणी...
याउलट प्रतापशाली वीरोत्तम-दसरा ! माझा सर्वांत आवडता सण. तो येतोच तो उच्चैःश्रवावर आरूढ होऊन. त्याच्या आगमनाच्या तुताऱ्या, वाऱ्यावर डोलणारी झेंडूची फुले, वाजवत आकाश दणाणून सोडतात. गुढीपाडव्याच्या शिरावर राजासारखा राजमुकुट असेल तर दसऱ्याच्या मस्तकी 'शिरस्त्राण' असते. अंगात चिलखत असते. माणसांच्या औक्षणाची मानवंदना स्वीकारत, शरद ऋतच्या आरंभी, वरुणराज जेव्हा पांढरे निशाण दाखवून अंतराळाच्या मैदानातून पळ काढतो, तेव्हा प्रकट होतो, -दसरा!

Maza Avadta San Essay In Marathi
Maza Avadta San Essay In Marathi


हा दसरा आहे मोठा दिमाखदार ! याच वेळी पूर्वी सैन्ये दिग्विजयासाठी बाहेर पडत आणि शत्रूला धूळ चारून खरे सोने लुटून आणीत. प्रभू श्रीरामाने सोन्याच्या लंकेवर चाल केली ती याच मुहूर्तावर. 'रामलीला' महोत्सव रूपानं ती स्मृती अजून जपली जाते. अज्ञातवास संपल्यावर पांडवांनी शमी वृक्षावर ठेवलेली आपली शस्त्रास्त्रे काढली तीही-- याच दिवशी. अन् पुढे महाभारत घडलं. शमी वृक्षाची पूजा आजही करून आपण त्याचा आदर करतो. 'रामायण' व 'महाभारत' दोन्हीची आठवण करून देणारा एकमेव-दसराच.रघुराजानं वरतंतुशिष्य कौत्स याला गुरुदक्षिणा देण्यासाठी स्वर्गातून सोन्याचा पाऊस पाडायला लावला तो दसऱ्याला ! म्हणूनच दसरा हा सोनियाचा सण ! महाशक्तिमान दुर्गादेवीनं 'महिषासुर ' मर्दन केले तेही दसऱ्यालाच.

हिंदू पंचांगातील साडेतीन शुभ मुहुर्तापैकी एक आहे-हा दसरा ! पावसाळा संपल्याने सैन्याला कूच करणे, पिके तरारून आल्याने ' हातपाय पसरायला' किसानांना मोकळीक मिळणे हे दसऱ्यामुळे मिळते. म्हणून घराघरांतून गोडधोड होते. शस्त्रास्त्रे, वाहने, विद्या, आयुधे यांची पूजा होते. हल्ली आपट्यांच्या पानांवर 'सोने लुटीचा' अन् 'सीमोल्लंघना'चा आनंद मानावा लागतो. 'कालाय तस्मै नमः !' 

दसरा म्हणजे माहेश्वरी ( ऐश्वर्य), महाकाली (शक्ती), महालक्ष्मी (संपत्ती आणि सौंदर्य), महासरस्वती (ज्ञान ) या आदिशक्तींचे पूजन – म्हणजेच दसरा ! तुम्हा आम्हा सामान्यांना दसरा हा अनोखा शुभ दिवस वाटतो. पण तुकाराम म्हणतात,

 'तुका म्हणे हरिच्या दासा । शुभकाळ अवघ्या दिशा॥' गोडधोड खाऊन लोळत पडणे हा या सणाचा अपमान आहे. सज्जन, थोर, योगी मंडळींना घरी बोलावून त्यांच्या सहवासापासून विचारांचे सोने लुटणे, काव्यशास्त्रविनोदाची पक्वान्ने आस्वादणे हाच या युगातला दसरा.“ साधुसंत येती घरा । तोचि दिवाळी दसरा ॥" शौर्य, त्याग, वाईट वृत्तींचा शेवट ही त्रिसूत्री सांगून, 'त्येन त्यक्तेन भुंजीथाः ' असा मंत्र कानात सांगून, आपल्या घोड्याला टाच मारून, इंद्रधनुष्याच्या 'फ्लायओव्हर 'वरून हा दसरा निघून जातो. पुन्हा वर्षाचा प्रवास संपवून, ऋतुचक्राचा एक फेरा पूर्ण करून शरद ऋतूच्या प्रारंभी तो पुन्हा दिमाखाने येईल आणि आमच्या जीवनातील रोजची दुःखे विसरून आम्ही सदैव म्हणत राहू,
'दसरा सण मोठा । नाही आनंदा तोटा ।'

मित्रांनो तुम्‍हाला maza avadta san marathi nibandh हा निबंध कसा वाटला व दसरा हा सण तुम्‍ही कसा साजरा करता हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

Maza Avadta San Essay In Marathi | माझा आवडता सण मराठी निबंध

Mazi Aaji Essay In Marathi

निबंध क्र १ 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझी आजी मराठी निंबध बघणार आहोत. या निबंधामध्‍ये गावाकडे राहणा-या आजीची दिनचर्या व माहीती दिली आहे . या निबंधात आजीने माझे म्हणजे नातवाचे पुरवलेले लाड, गावात असणा-या लोकांची मदत आजी कश्‍याप्रकारे करते हे  तुम्‍हाला वाचण्‍यात येईल . चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


बाबांना 'पारितोषिक मिळाले होते आणि बाबांचा सत्कार समारंभ होता, म्हणून आजी गावाहुन आली होती. आज ती परत जायला निघाली होती. आम्ही तिला येथेच राहण्याचा खूप आग्रह करीत होतो. पण ती मुळीच तयार नव्हती. आजी म्हणाली, " अरे नंदू, माझी खुप कामे रखडली आहेत तिकडे. हे बघ यापेक्षा आता ऑक्टोबरमध्ये तुला सुट्टी लागेल ना, तेव्हा तूच तिकडे ये. अरे, तुझी मदत होईल मला." आजीने माझी समजूत घातली आणि घराबाहेर पाऊल टाकले. आम्ही पाहतच राहिलो.


आजीने वयाची पंच्याहत्तरी ओलांडली आहे; पण आजी थोडीही वाकलेली नाही. खरं सांगायचं तर गेल्या कित्येक वर्षांत आजीच्या शारीरिक ठेवणीत कोणताच बदल झालेला नाही. गेली वीस वर्षे आजीआजोबा त्या गावात राहत आहेत. चार वर्षांपूर्वी आजोबा वारले, तेव्हा वाटलं की आजी आता तरी आमच्या घरी शहरात येईल; पण उलट आजी गावातच अधिक गुंतत गेली.


माझे आजीआजोबा हे पहिल्यापासूनच आदर्शवादी. उत्कृष्ट गुणवत्ता असतानाही ते कधी पैशांच्या मागे लागले नाहीत; तर आयुष्यभर ते दोघेही कर्मवीर भाऊरावांच्या 'रयत शिक्षण' संस्थेत काम करीत राहिले. संस्थेतून निवृत्त झाल्यावर ते सासवने गावात काम करीत राहिले. सगळा 'निष्काम कर्मयोग'! काम करणाऱ्याला कामांची उणीव कधीच भासत नाही हे खरंच!  


हे  निबंध पण वाचा  




आजीआजोबांच्या भोवती सदा माणसांचा गराडा असे. आता आजोबा नाहीत. पण एकटी आजी गावाचे सगळे प्रश्न सोडवत असते. ती साऱ्या गावाची 'मोठी आई' बनली आहे.

Mazi Aaji Essay In Marathi
Mazi Aaji Essay In Marathi


आजीच्या स्वतःच्या गरजा अतिशय मर्यादित आहेत. अगदी सकाळी लवकर उठून ती स्वतःची सर्व कामे  आवरते. साडेआठ नऊला ती न्याहरी करते. न्याहरी म्हणजे भाकरी किंवा पोळी. कधी भाताची पेज. पण हेच आजीचे दिवसभराचे जेवण. आजी दिवसातून एकदाच जेवते. मधल्या वेळी एखादे फळ आणि रात्री फक्त कपभर दूध; मर्यादित खाणे हेच आजीच्या उत्तम प्रकृतीचे गमक असावे, असे मला वाटते. 


आजी स्वतःसाठी नित्याच्या स्वयंपाकाखेरीज खास काही करत नसली, तरी निरनिराळे स्वादिष्ट पदार्थ तयार करण्यात तिचा हातखंडा आहे. त्यामुळे सुट्टीत आजीकडे गेलो की, चंगळ असते. दुसरी चंगळ असते, ती वाचनाची. आजीकडे उत्तम पुस्तकांचा संग्रह आहे. त्यामुळे मला मनसोक्त वाचन करता येते. आजीने गावाला अगदी वेगळेच रूप आणून दिले आहे. गावातील सर्व स्त्रिया आता स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. आजीने त्यांचे बचतगट स्थापन केले आहेत. आजी स्वतः कोणत्याही पदावर नसते; पण ती त्यांच्या मागे खंबीरपणे उभी असते. आजीच्या स्वास्थ्यपूर्ण जीवनाचे हेच रहस्य असावे.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व गावाकडील तुमच्‍या कोणत्‍या आडवणी ताज्‍या झाल्‍या त्‍या तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद 
महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • शहरापेक्षा खेडेगावात राहणे आजीला आवडते
  • पंच्याहत्तरी ओलांडली तरी
  • तेवढीच कार्यव्यग्रता 
  • सुरुवातीपासून आदर्शवादी जीवन 
  • दुसऱ्यांसाठी झटणे 
  • वेळ अपुरा पडतो 
  • कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता सतत कामात दंग.

निबंध क्र २ 

Majhi Aaji Essay In Marathi


माझी आजी ! आमच्या कुटुंबातील वयाने सर्वांत मोठी, वडीलधारी व्यक्ती. तिच्या वागण्याबोलण्यात कमालीचा साधेपणा आहे. ती सकाळी आमच्या लवकर उठते. अंघोळ आटोपली की ती माझ्या आईबरोबर स्वयंपाकघरात वावरते. आई तिला काम करू देत नाही. पण आजी ऐकतच नाही. आजीला स्वयंपाक करायला खूप आवडते. न्याहारीसाठी ती कधीतरी एखादा पदार्थ करते. तिने केलेला पदार्थ सगळ्यांना आवडला की ती खूश होते. दुपारी जेवून झाले की काही वेळ ती टी. व्ही. पाहते. कधी कधी टी. व्ही. पाहता पाहता तेथेच झोपते. संध्याकाळ झाली की ती फेरी मारायला बाहेर पडते. ही संध्याकाळची फेरी मात्र ती कधीच चुकवत नाही.


माझी आजी एका कारणासाठी मला खूप आवडते. ती कधीही रागावत नाही. मला तिने अजूनपर्यंत एकदाही साधी एक चापटही मारलेली नाही. एकदाही रागावली नाही. उलट, आईबाबा रागावले की ती माझीच बाजू घेते. माझ्या बाबांनाच दटावते ! आईबाबा अभ्यासासाठी खूप मागे लागले, तरी आजीला आवडत नाही. त्यामुळे मी आजीवर खूश ! तिने काहीही सांगितले की मी ताबडतोब करतो. तिला वाईट वाटणार नाही. याची काळजी घेतो. आईबाबासुद्धा आजीसारखेच वागले, तर किती छान होईल ! 



आजीला वाचनाचा छंद आहे; पण हल्ली तिचे डोळे दुखतात. मग ती मलाच, वाचायला सांगते आणि ती ऐकते. तिला माझी अभ्यासाची पुस्तकेसुद्धा आवडतात. माझीच पुस्तके मला मोठ्याने वाचायला सांगते. दररोज संध्याकाळी मी तिच्यासाठी माझे एखादे पुस्तक वाचतो. मध्ये मध्ये तिला काही कळले नाही की ती मला आपली शंका विचारते. मीसुद्धा माझ्या परीने तिचे शंकानिरसन करतो. अलीकडे माझ्या लक्षात येऊ लागले आहे की, आजीला वाचून दाखवता दाखवता माझा अभ्यास आपोआप होत असतो.


एका गोष्टीसाठी मात्र तिचा खास आग्रह असतो. काहीही खाण्यापूर्वी किंवा स्वयंपाकाच्या भांड्यांना हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुतले पाहिजेत, असे ती सांगते. बाबांनासुद्धा ती तसेच सांगते. आजीने काहीही सांगितले की बाबा निमूटपणे ऐकतात. माझे मित्र घरी आले की आजी बेहद्द खूश होते. ती काहीतरी खाऊ करून त्यांना देतेच. ऐंशीच्या घरातील माझी आजी अजूनही उत्साहात वावरते. ती कधी आजारी पडल्याचे मला तरी आठवत नाही. कधीतरी ती मला आपले पाय चेपायला सांगते, तेवढेच. अशी ही माझी आजी मला खूप खूप आवडते.


महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )
  • माझी आजी साधी 
  • दिनक्रम 
  • सकाळी अंघोळीनंतर देवपूजा
  • स्वयंपाकात आईला मदत
  • दुपारी टी. व्ही. पाहणे
  • संध्याकाळी फेरी मारणे
  • रागावत नाही
  • नीटनेटकेपणा स्वच्छता 
  • मित्रांशी प्रेमाने वागते 
  • अजूनही ठणठणीत.



निबंध क्र ३ 

आजीने केव्हाच सत्तरी ओलांडली आहे, पण याची आठवण आजीला कुठे आहे? तीन वर्षांपूर्वी तिचा सत्तरावा वाढदिवस साजरा करायला आम्ही सगळेजण तिच्या घरी-तळेगावला गेलो, तेव्हा तिला धक्काच बसला. आपण इतके वृद्ध झालो आहोत, असे तिच्या कधी स्वप्नातही आले नव्हते.आजीचे म्हणजेच आम्हा सर्वांचे घर तळेगावला आहे. तेथून जवळच आमचा एक शेतमळा आहे.

त्यामुळे माझे बाबा, काका, आत्या शिक्षणासाठी आणि पुढे नोकरी-व्यवसायासाठी गावाबाहेर पडले, तरी आजीआजोबा तळेगावच्या घरातच वास्तव्य करून राहिले आणि आजोबांच्या मागेही आजी आजवर त्याच घरात एकटी राहते. आपण एकटे आहोत असे मुळी तिला कधी वाटतच नाही. दिवसभर ती आपल्या कामातच गुंतलेली असते. आमची आजी तेथील शेजारपाजारच्या लोकांची 'आई' आहे.

ती सकाळी लवकर उठते आणि आपली स्वत:ची सर्व कामे उरकून, थोडीशी न्याहारी करून गावातल्या 'निवारा' केंद्रात जाते. तेथे अनेक वृद्ध राहतात. त्यांतील काही वृद्ध निराधार आहेत. रोज दोन तास आजी तेथील मंडळींची कामे करत असते. कुणाचे पत्र लिहायचे असते, कुणाच्या शर्टाला गुंड्या लावायच्या असतात. अशी बारीकसारीक हजारो कामे करताना आजी स्वत:ला कधी वृद्ध समजतच नाही.

दुपारच्या वेळी काही गृहिणी जमतात. त्यांच्याबरोबर चांगल्या पुस्तकांचे वाचन, वर्तमानपत्रांचे सामुदायिक वाचन, त्यावर चर्चा, चिंतन असे तिचे कार्य सतत चाललेले असते. तोपर्यंत दुपार संपत येते. नंतर आजी जवळच्या एका आदिवासी पाड्यावर जाते. त्या आदिवासी स्त्री-पुरुषांना चांगल्या कामात गुंतवून व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी आजी धडपडत असते. हातपाय चालतात तोवर माणसाने काही तरी कार्य करत राहिले पाहिजे अशी तिची शिकवण आहे. खऱ्या अर्थाने आजी त्या गावाच्या परिसरातील लोकांची आई झाली आहे.


निबंध क्र ४ 

आमची आजी घरातील सर्वांना खूप आवडते. ती नेहमी हसतमुख असते. सगळ्यांशी प्रेमाने वागते.आमची आजी अजिबात आळशी नाही. ती सर्वांच्या आधी उठते आणि रात्री मात्र सर्वांत लवकर झोपते. ती आम्हांला नेहमी सांगते, “लवकर निजे, लवकर उठे, त्यास ज्ञान, आरोग्य भेटे." सकाळी उठल्यावर स्वत:ची सर्व कामे आटोपून घेते. मग देवपूजा व पोथीवाचन करते. देवपूजेनंतर न्याहरी करते. त्यानंतर ती आईसोबत थोडे कामही करते.

 नऊ वाजेपर्यंत सगळेजण आपापल्या कामावर निघून जातात, मग आजी एकटीच घरी असते. तीच मग घराची काळजी घेते. संध्याकाळी आम्ही घरी येतो, तेव्हा ती आम्हाला काहीतरी छानसा खाऊ करून देते,संध्याकाळी ती मुरलीधराच्या देवळात जाते. तेथे ती सातपर्यंत रमलेली असते, घरी जाल्यावर थोडेसे काहीतरी खाऊन ती वाचन करते आणि मग झोपी जाते. अशी ही आमची आजी सर्वांची आवडती आहे.
महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • आजीचे घरातील आणि इतरांच्या मनातील स्थान 
  • वयदिनक्रम 
  • सुगरण, सुगृहिणी 
  • संध्याकाळी देवळात 
  • रात्री जेवण, वाचन व झोप.

निबंध क्र 5

“मी देवळात जाऊन येते ग,' पूजेच्या तबकात ओंजळभर मोगऱ्याची फुलं आणि दुर्वांची जुडी ठेवत आजी आईला म्हणाली. आम्हा नातवंडांपैकी एकालाही बरोबर चलण्याचा आग्रह तिने केला नाही. कारण आज तिला एकटीलाच जायचे होते. त्या दिवशी आजीने गजानन महाराजांच्या पादुकांवर मोगऱ्याची फुले वाहून माथा टेकवला तो अखेरचाच! मनाचा मोगरा, देहाचे दुर्वांकुर योगिराजाच्या चरणी समर्पित केले. असं भाग्याचं मरण 

एखाद्याच्याच भाळी रेखलं असतं.  आजीच्या मृत्यूने आमच्या कुटुंबावर दुर्भाग्याची कुन्हाड कोसळली. अपत्यांवर, सुनांवर, नातवंडांवर अतूट माया करणाऱ्या त्या माऊलीने 'भरल्या गोकुळा' चा कायमचा निरोप घेतला. 'देवळात जाते' सांगून 'देवाघरी' प्रयाण केले. आम्ही शोकावेगाने फोडलेला टाहो तिला ऐकू जाणार नव्हता. एकाच वर्षाच्या आत आजोबा-आजीचं छत्र हिरावून घेणारा देव ‘दयाघन' उरला नाही. आमचं दुःख शब्दातीत होतं.


आमच्यावर आजीचा केवढा जीव ! बाबा म्हणायचे, "तुझं मुलांपेक्षा नातवंडांवर काकणभर जास्तच प्रेम आहे.' त्यावर ती उत्तरायची, “अरे बाबा, नातवंडं म्हणजे दुधावरची साय'' खरं सांगायचं तर तिने आम्हाला सायीपेक्षाही जास्त जपलं. तिच्या शब्दात काय जादू होती कोणास ठाऊक, तिने सांगितलेली प्रत्येक गोष्ट मला पटायची. साहजिकच तिची अवज्ञा करण्याचा प्रसंग सहसा येत नसे.


लवकर उठणे, देवपूजेसाठी फुले तोडणे, आईला छोट्या छोट्या कामात मदत करणे, नियमित गृहपाठ करणे, संध्याकाळी खेळून आल्यावर शुभंकरोति, रामरक्षा म्हणणे यामुळे आजी माझ्यावर खूष असायची. माझी चुलत भावंडं लटक्या रुसव्याने म्हणायची, "नाहीतरी समीरदादा आजीचा जास्तच लाडका आहे.'' लोण्याहून मऊ अंतःकरणाची आजी कठीण वज्राचा भेद करण्याइतकी खंबीरही होती. तिचं जीवन म्हणजे एक कंटकमय प्रवास.


ऐन तारुण्यात आजोबांना अपघात झाला. 'जिवावरचं पायावर निभावलं' यातच आजीनं समाधान मानल. पदरी तीन अपत्य. संसाराचा गाडा कसा रेटायचा? यक्षप्रश्न होता. युधिष्ठिराच्या स्थिरतेने, चतुराईने तिने तो सोडवला. सुदैवाने एका खाजगी शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली. पतीची सेवा, मुलांचं संगोपन करता करता विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करण्याचे काम ती मनापासून करू लागली. तिच्या उद्बोधक गोष्टी नि सुरेल आवाजातील कविता ऐकणे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक सुखद अनुभव होता.



आजीच्या स्वभावाचा एक उल्लेशनीय पैलू म्हणजे ती 'आदर्श सासू' होती. तिने सुनांना भरभरून प्रेम दिले. त्यांना माहेरची आठवण येऊ दिली नाही. “सून म्हणजे गृहलक्ष्मी. ती प्रसन्न असली तर घरात स्वर्गसुख नांदतं' असं तिचं ठाम मत होतं. त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला न घातला त्यांच्यावर प्रेमाचा अंकुश ठेवण्याचं तंत्र तिला उत्तम साधलं होतं. पुरणपोळी खावी तर आजीच्याच हातची. अन्नपूर्णेचा वरदहस्त लाभलेली आजी 'सुगरण' होती हे सांगायलाच नको. चटणीपासून पंचपक्वान्नांपर्यंत तिच्या हातच्या प्रत्येक पदार्थाला अमृताची गोडी असायची. जेवणाऱ्याने तृप्तीची ढेकर दिली की आजीचं मन आनंदाने तुडुंब भरायचं. चेहऱ्यावर समाधान झळकायचं.


तिचं प्रत्येक काम स्वच्छ, व्यवस्थित, नीटनेटकं. अंगणात रेखलेली रांगोळी असो की पाटीवर लिहिलेली बाराखडी असो, ती पुसावीशी वाटत नसे. तिला काय येत नव्हतं ते विचारा. शिवणकाम, विणकाम, भरतकाम, पाककला, हस्तकला सर्वच कलांमध्ये तिला चांगली गती होती. अशा 'बहुगुणी' आजीचे गुण किती व" नि किती नको?


आजी म्हणजे अस्सल चंदनी खोड. झिजणे हा तिचा मंत्र. आजाऱ्याची शुश्रूषा करायची, अडल्यानडल्याच्या मदतीला धावून जायचे, हतबल झालेल्याला धीर द्यायचा हेच तिचं जीवनव्रत होतं. उपासना होती, देवपूजा होती. तिने व्रतवैकल्यं, सोवळंओवळं, पूजापोथी याचं फारसं अवडंबर केल्याचं स्मरत नाही. 'Work is worship, Duty is God' हे वचन तिनं आपल्या जीवनात उतरवलं होतं. तिच्या पार्थिव देहाला अग्नी देण्यात आला तेव्हा मनात विचार चमकून गेला, चितेवर रचलेली काष्ठे चंदनाची नसतील, पण देह मात्र अस्सल चंदनी आहे.'

निबंध क्र 6

 माझी आजी ही माझ्या जीवनातील एक महत्त्वाची व्यक्ती आहे. तिचे वय साठ वर्षे आहे. मात्र तिची प्रकृती अतिशय उत्तम आहे. मी आजपर्यंत तिला कधीही आजारी पडलेले किंवा औषधे घेताना पाहिले नाही. फक्त वाचण्यापुरता तिला चश्मा लावावा लागतो. तिचा पोशाख म्हणजे साधी पण स्वच्छ सुती साडी. स्वच्छतेच्या बाबतीत ती फार काटेकोर असते.


आजी कायम हसतमुख असते. ती आजोबांच्या तब्बेतीची सर्व प्रकारे काळजी घेते. दिवसभर ती स्वत:ला व्यस्त ठेवते. तिला वाचनाची अतिशय आवड आहे. वेळ मिळेल तेव्हा ती पुस्तके वाचते. रोज संध्याकाळी ती नियमाने फिरायला जाते. सणांच्या दिवशी मंदिरात जाणे, पूजा-अर्जा करायला तिला अतिशय आवडते. तिने बनविलेले पदार्थही अतिशय रुचकर असतात. ती अतिशय शिस्तप्रिय आहे. आम्हा नातवंडांनाही ती शिस्तीचे धडे देत असते. बाबा तिचा व आजोबांचा सल्ला घेतल्याशिवाय कुठलेही काम करीत
नाहीत.


मला माझी आजी खूप आवडते. आई किंवा बाबा मला रागवल्यावर तीच माझी समजूत काढते. मी परिक्षेत चांगले गुण मिळवल्यावर ती माझे कौतुक करते. रोज झोपतांना ती मला एक छानशी गोष्ट सांगते. आजी आमच्या घरातील महत्त्वाची व्यक्ती आहे. मला माझी आजी खूप आवडते.

निबंध क्र 7

माझी आजी मराठी निबंध 


माझी आजी :  माझ्या आजीचे नाव आहे 'मथुरा'. ती मुंबईला  राहते. तिला निसर्ग फार आवडतो . तिला स्वच्छता फार आवडते. ती शिस्तप्रिय आहे. तिला रिकामे बसणे आवडत नाही . वेळ अमूल्य आहे, वेळेचा सदुपयोग करा हाच तिचा संदेश आहे.


सत्तरी उलटली तरी ती उद्योगी आहे. 'आळसे कार्यभाग नासतो' हे तिचे ठाम मत आहे. अजूनही ती दिवसभर घरकाम , बागकाम , समाजकार्य यात मग्न असते. ती रोज सकाळी देवदर्शनास जाते, ज्ञानेश्वरी वाचते, गीतेचे श्लोक म्हणते, बातम्या ऐकते व सायंकाळी समुद्रकिनाऱ्यावर जाते. तिला समुद्र, खळाळणाऱ्या लाटांचं संगीत , देखणा सूर्यास्त सारं खूप आवडतं. शांतपणे निसर्ग निरखित ती बराच वेळ स्तब्धपणे बसून राहते. जणू अथांग सागरासारख्या या अथांग जीवनाचा वेध घेत असावी.



माझी आजी उत्तम कवयित्री आहे. निसर्गाचं सान्निध्य तिला खूप आवडतं. वृक्ष , लता, वेली, पाखरं , चंद्र, चांदणे, धरती, आभाळ हे तिचे जिवाभावाचे शब्द . आपल्या हृदयातल्या भावना या शब्दात ती सहजगत्या ओवते. कविता जन्माला येते. नुसते शब्द नसतात ते! सारं जीवन बध्द असतं त्यात! 


आजीचं शिक्षण फारसं झालेलं नसलं तरी हृदयानं ती खूप खूप श्रीमंत आहे, मोठ्या मनाची आहे. केस पांढरे झाले पण मनाचा हिरवेपणा कायम आहे. ती चिरयौवना आहे. दुःखी, गरजू यांच्या हाकेला ती धावून जाते. सर्व जण तिला 'आजी' च म्हणतात.


पांढरी शुभ्र साडी, नितळ कांती, हसरा चेहरा, बोलके डोळे, केसांचा घट्ट अंबाडा, त्यात खोचलेले गुलाबाचे फूल, सारं काही सुंदर. तिच्या हातच्या बेसनाच्या लाडूची चव काही वेगळीच! अन्न हे पूर्णब्रह्म आहे, फक्त उदरभरण नाही, हे तिनेच मला समजाविले . संस्काराचं जे खत-पाणी तिने मला दिलं , तो माझा अमूल्य ठेवा आहे. तिच्याबरोबर राहण्याची गोडीच अवीट आहे. प्रत्येक सुटीत मी आजीकडे जातो.



सुटी संपली की तिला सोडून निघणं जिवावर येतं. पाय निघतच नाही तिथून . आम्हा दोघांचेही डोळे पाणावतात तिच्या सहवासातले क्षण अलगद मुठीत मखमली मुलायमतेने लपवून मी निघतो, परत लवकर येण्यासाठी! ती बरोबर नसताना तिने सांगितलेल्या गोष्टी आठवतात , मग एकटाच मी कधी खदाखदा हसतो तर कधी एकटाच हमसाहमशी रडतो.


तिने माझ्याबरोबर दिलेली तिची औषधे मला हमखास बरी करतात इतिहासातले आदर्श तिने गोष्टीतून माझ्या रक्ताच्या थेंबाथेंबात पेरले आहेत ; मला त्याची जाणीव आहे. मला खऱ्या अर्थाने 'मोठे' होऊन कुटुंब, समाज , देश यांचे ऋण फेडायचे आहे. तिनेच मला सांगितले 
“ फेक भविष्य फसवे,
हाती ठेव वर्तमान..." 

इतक्या सहजतेने ती जीवनाला सामोरं जाणं शिकविते . ती माझा गुरू , मित्र सारं काही आहे. दुधावरच्या सायीसारखं ती मला जपते. तिच्या मायेच्या पदराआड अखिल विश्वातली भीती लुप्त होते. तिच्या प्रेमात मी आकंठ तृप्त होतो. फुलासारखं कोमल तर प्रसंगी वज्राहूनही कठीण असं तिच हृदय आहे. माझ्या निराशेवर ती फुकर घालते. तिचे वर्णन करायला शब्द थिटे पडतात.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

Mazi Aaji Essay In Marathi | माझी आजी मराठी निबंध

Maze Baba Marathi Essay | माझे बाबा मराठी निबंध 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझे बाबा मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्‍ये एका सामान्‍य कुटुंबातील वडीलांची दिनचर्या व माहीती दिली आहे . या निबंधात तुम्‍ही तुमच्‍या वडीलांचा व्यवसाय व माहीती जोडुन आवश्‍यक तेथे बदल करू शकता. जास्‍त वेळ न घेता सुरूवात करूया निबंधाला  .

महत्‍वाचे मुद्दे : 
(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. ) :

  • वडिलांविषयीची भावना 
  • वडिलांचा व्यवसाय
  • वडिलांचा दिनक्रम
  • वडिलांचे कुटुंबीयांशी वागणे
  • वडिलांचा छंद

माझे बाबा मला खूप आवडतात. त्यांचा मी लाडका मुलगा आहे. माझे बाबा हे पदवीधर आहेत. नोकरी करत करत त्यांनी शिक्षण घेतले. आपण स्वतःचा एखादा व्यवसाय करायचा, असा त्यांनी निश्चय केला होता. त्यामुळे ते रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतात. सुरुवातीला ते दुसऱ्याची रिक्षा चालवत; पण आता त्यांनी स्वत:ची रिक्षा घेतली आहे.
Maze Baba Marathi Essay
Maze Baba Marathi Essay

बाबा सकाळी लवकर उठतात. आंघोळ आटोपतात. देवपूजा करतात आणि आठ वाजता बाहेर पडतात. दुपारी घरी आल्यावर जेवण व विश्रांती घेतात व रात्री आठ वाजता घरी येतात. बाबा घरी आले की, काही कामे करतात. मग आमचा अभ्यास घेतात. कधी कधी प्रवाशांच्या गमती सांगतात. कधी एखादे पुस्तक वाचत बसतात, त्यांना मुंबईतील खूप ठिकाणे माहीत आहेत. आम्हांला ते कधी कधी फिरायलाही नेतात. बाबांचे त्यांच्या रिक्षावर प्रेम आहे. ते प्रेमाने रिक्षाची देखभाल करतात, रिक्षाची छोटी छोटी दुरुस्ती ते स्वत:च करतात. आमच्या बाबांना वाईट व्यसन अजिबात नाही, म्हणून माझ्या बाबांचा मला खूप अभिमान वाटतो.

मित्रांंनो तुम्‍हाला majhe baba essay in marathi कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवावेे. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका 
धन्‍यवाद    

 माझे वडील मराठी निबंध 2


माझे वडील केंद्रीय सचिवालयात काम करतात. त्यांचे कार्यालय आठवड्यातून पाच दिवस उघडे असते. शनिवार, रविवार त्यांना सुट्टी असते. माझ्या वाडिलांचे वय अंदाजे ४० वर्षे आहे. त्यांची उंची पाच फूट दहा इंच आहे. रंग सावळा आणि शरीर सुदृढ आहे. त्यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठात झाले. ते एम.एस्सी. फिजिक्स आहेत. त्यांनी एम.बी.ए. पण केले आहे. त्यांना अभ्यासाची व वाचनाची खूप आवड आहे. ते रोज ४/५ तास अभ्यास करतात. आमच्या घरी एक चांगले ग्रंथालय आहे. आमच्याकडे रोज दोन वृत्तपत्रे येतात. त्यांचे ते वाचन करतात.
माझे वडील सकाळी ५.३० वाजता उठतात. 

सकाळी थोडा योगाभ्यास करतात. नंतर बागेत फिरावयास जातात. तेथून परतल्यानंतर स्नान करून नास्ता करतात, वतर्मानपत्र वाचतात. दूरदर्शनवरील सकाळच्या बातम्या पाहतात व त्यानंतर कामावर जातात. असा त्यांचा दैनादिन कार्यक्रम असल्यामुळे ते नेहमीच निरोगी आणि उत्साही असतात.


सुट्टीच्या दिवशी ते आम्हा सर्वांना फिरावयास घेऊन जातात. मागच्या शनिवारी आम्ही बागेत खूप खेळलो. आम्ही सर्व भावंडे आणि माझी आई त्यांच्यावर खूप प्रेम करतो. ते पण आमच्यावर खूप प्रेम करतात. आम्ही सर्व जण त्यांच्या आज्ञेत असतो. माझे वडील सर्वांशी मिळून मिसळून वागतात. शेजाऱ्यांना, मित्रांना मदत करण्यास ते नेहमीच तत्पर असतात. कधी-कधी ते त्यांच्याबरोबर फिरावयास जातात. त्यांच्या मित्रांचेही आमच्याकडे जाणे-येणे असते. 

कॉलनीच्या कल्याण सभेचे ते सचिव आहेत. त्यामुळे कॉलनीच्या अडचणी सोडविण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. कर्मचाऱ्यांना, नेत्यांना भेटत असतात. त्यांच्यामुळेच आमच्या कॉलनीत पोस्ट ऑफिस आणि दवाखाना सुरू झाला.


ते कधीच दु:खी, अस्वस्थ नसतात. आम्हा भावंडांच्या अभ्यासातही ते मदत करतात. परीक्षेच्या काळात आमची खास तयारी करून घेतात. आमच्या आरोग्याकडेही त्यांचे पूर्ण लक्ष असते. आमच्याशी ते खेळतात आणि गोष्टींच्या माध्यमातून आमच्यावर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर चांगल्या सवयी आम्हाला लागाव्यात अशीच त्यांची इच्छा असते. आमच्या वाढदिवसाला आणि परीक्षेत पास झाल्यावर सुंदर-सुंदर भेटी देतात. असे माझे वडील मला खूपच आवडतात. मला त्यांचा अभिमान वाटतो.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

Maze Baba Marathi Essay | माझे बाबा मराठी निबंध

Swami Vivekananda Essay In Marathi | स्वामी विवेकानंद मराठी निबंध

निबंध क्रं. १ 

नमस्‍कार मित्रांनो आज आपण  Swami Vivekananda Essay In Marathi | स्वामी विवेकानंद मराठी निबंध बघणार आहोत.  स्वामी विवेकानंद यांनी  भारताचे व हिंदू धर्माचे नाव नाव संपुर्ण विश्‍वात कश्‍याप्रकारे केले त्‍यांच्‍या बालपणा गमती जमती , त्‍यांनी केलेली भारत भ्रमंती ,  यांचे वर्णन खालील २  निबंधात केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 


स्वामी विवेकानंद यांचा जन्म कलकत्त्यातील प्रसिद्ध वकील विश्वनाथ दत्त यांच्या घरी १२ जानेवारी, १८६३ रोजी झाला. विश्वनाथ दत्त यांच्या पत्नी भुवनेश्वरी देवी यांनी पुत्रप्राप्तीसाठी शिवाचे कठीण व्रत सुरू केले होते. या व्रतामुळेच आपल्याला पुत्ररत्‍न लाभले, अशी त्यांची भावना होती. मोठ्या कौतुकाने त्यांनी आपल्या मुलाचे नाव 'नरेंद्र' असे ठेवले.


नरेंद्र हा बालवयात कोपिष्ट होता. शाळेतही तो फार खोड्या काढत असे. पण पुढे त्याच्यात पूजाअर्चा, भक्तिभाव यांची आवड निर्माण झाली. नरेंद्राला तीव्र बुद्धि्मत्तेचे वरदान लाभले होते. नित्यनेमाने व्यायामशाळेत जाऊन त्याने आपले शरीर सुदृढ बनवले होते. मोठा झाल्यावर नरेंद्र ब्राम्‍हणसमाजात जाऊ लागला. तेथे त्याच्या मनात देवाविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले. 'खरोखरच देव आहे की नाही? देव असेल तर तो कोठे भेटेल?' नरेंद्र ज्याला-त्याला हे प्रश्न विचारत असे. तेव्हा ब्राहमसमाजवादी पुढारी देवेंद्र यांनी नरेंद्राला स्वामी रामकृष्ण परमहंसांकडे पाठवले आणि पुढे तेच नरेंद्राचे गुरू झाले.

Swami Vivekananda Essay In Marathi
Swami Vivekananda Essay In Marathi



परमेश्वर सर्वत्र आहे आणि तो मानवातही आहे, ही शिकवण परमहंसांनी नरेंद्राला दिली. सुरवातीला नरेंद्राला हे मान्य झाले नाही. नंतर परमहंसांच्या शिकवणीतून हे सत्य नरेंद्राला प्रतीत झाले. तो कालिमातेचा भक्त बनला. रामकृष्ण परमहंसांनी या जगाचा निरोप घेताना नरेंद्राला सांगितले की, तू हिंदुत्वाचा प्रसार कर आणि त्यातील अमर तत्त्वज्ञान साऱ्या जगाला सांग.


१८९३ मध्ये नरेंद्र अमेरिकेतील सर्वधर्मीय परिषदेला उपस्थित राहिले. लोक त्यांना 'स्वामी विवेकानंद' म्हणून ओळखू लागले. त्या जागतिक परिषदेत विवेकानंदांनी भाषणाला सुरवात करताना 'सभ्य स्त्री-पुरुषहो' असे न संबोधता 'माझ्या बंधु-भगिनींनो' असे संबोधून उपस्थितांची मने जिंकली. त्या सभेत विवेकानंदांनी हिंदू धर्माचे माहात्म्य सर्वांना पटवून दिले. आपले उर्वरित आयुष्यही त्यांनी या महान कार्यासाठी वेचले.







 स्वामी विवेकानंद निबंध क्रं. २ 


महत्‍वाचे मुद्दे : 
(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )


  1. बालपण वैभवात 
  2. अभ्यास,खेळ, व्यायाम, संगीत, काव्य इत्यादी अनेक गोष्टींत रुची
  3. १४-१५ व्या वर्षी भारतभ्रमण 
  4. गुलामीच्या गर्तेत सापडलेल्या भारतीयांचे दर्शन 
  5. स्वधर्म विसरलेल्या हिंदूंचे दर्शन
  6. राजा राममोहन रॉय यांच्या विचारांचा प्रभाव
  7. अनेक धर्मांतील, ग्रंथांतील तत्त्वांचा अभ्यास
  8. रामकृष्ण परमहंसांचे शिष्यत्व
  9. भारतभ्रमणाला सुरुवात
  10. कन्याकुमारी येथे तपश्चर्या 
  11. अमेरिकेत
  12. सर्वधर्म परिषदेला हजर 
  13. सभा जिंकली
  14. जगभर नाव.


जेव्हा भारत पारतंत्र्यात होता, तेव्हा भारतीय समाजाला एक प्रकारची धर्मग्लानीच आली होती म्हणा ना! अशा अंधकारात १२ जानेवारी १८६३ रोजी दत्त घराण्यात एक दीपज्योती जन्माला आली. तिचे नाव नरेंद्रनाथ दत्त, म्हणजेच विश्वविख्यात स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंदांचे बालपण अत्यंत आनंदात व वैभवात गेले. विशाल नेत्र आणि विशाल भाल लाभलेले स्वामी विवेकानंद अत्यंत कुशाग्र बुद्धीचे, सुदृढ, निर्भय, विलोभनीय असे व्यक्तिमत्त्व होते. त्यांना अभ्यास, खेळ, व्यायाम, संगीत, काव्य, पाकशास्त्र अशा अनेक क्षेत्रांत खूप रुची होती. लहान वयात आईकडून धार्मिक विचारांचे; तर मोठेपणी वडिलांकडून आधुनिक बुद्धिवादी विचारसरणीचे संस्कार झाले. सत्य वचन व सत्य आचरण हा तर त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र होता.

१४-१५ वर्षांचे असतानाच अर्धाअधिक भारत त्यांनी पालथा घातला. त्या काळी त्यांनी भारतीयांची केविलवाणी अवस्था पाहिली. गुलामीच्या गर्तेत सापडलेल्या, स्वत्व विसरलेल्या हिंदू समाजाला पाश्चात्य शिक्षणाने भारून टाकले होते. परकीयांंच्या फसव्या सांस्कृतिक श्रेष्ठत्वाने भारतीय समाजाची दिशाभूल केली जात होती. हे सर्व पाहून विवेकानंद अत्यंत व्यथित व अस्वस्थ झाले.


 रवींद्रनाथ टागोरांशी चर्चा करून आणि राजा राममोहन रॉय यांची तत्त्वे विचारात घेऊन विवेकानंदांनी सर्व धर्माचा आणि तत्‍वज्ञानाचा अभ्यास करायला सुरुवात केली, त्यांचे इंग्रजी, संस्कृत, बंगाली इत्यादी भाषांवर प्रभुत्व होते. निरनिराळ्या धर्मातील व पंथांतील विद्वानांशी त्यांनी तत्त्वज्ञानावर चर्चा केली. त्यांनी रामकृष्ण परमहंसांचे शिष्यत्व पत्करले.


विवेकानंद हे १८८४ साली पदवीधर झाले. रामकृष्ण परमहंसांच्या प्रभावामुळे त्यांनी संन्यास घेतला आणि भिक्षेची झोळी घेऊन राष्ट्रकल्याणासाठी घराबाहेर पडले. अंतिम सत्य काय? या एकाच विचाराचा त्यांनी ध्यास घेतला आणि भारतभ्रमणाला सुरुवात केली. भारतभ्रमणानंतर कन्याकुमारीच्या समुद्रातील खडकावर बसून विचार करत असताना भारतातील दरिद्री, अज्ञानी जनतेसाठी सर्वस्व अर्पण करणारे अनेक स्त्री-पुरुष निर्माण केले पाहिजेत, असे त्यांना तीव्रतेने जाणवू लागले. 


 अमेरिकेतील शिकागो शहरी ११ सप्टेंबर १८९३ या दिवशी सर्वधर्म परिषद भरणार होती. हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून स्वामी विवेकानंद तेथे उपस्थित राहिले. परिषदेच्या दिवशी विवेकानंदांनी 'माझ्या अमेरिकन बंधूंनो आणि भगिनींनो' अशी भावपूर्ण शब्दांनी सुरुवात करून सभा जिंकली. त्यावेळी दोन मिनिटे सतत टाळ्यांचा गजर होत होता. या परिषदेत ते ज्या दिवशी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण व अत्यंत विचारगर्भ भाषणाने हिंदू धर्माविषयीचे निबंध वाचत होते, त्या दिवशी 'न भूतो न भविष्यति' अशी गर्दी लोटली होती. 


होमरूल लीगच्या नेत्या अॅनी बेझंट यांनी या प्रसंगी 'एक योद्धा संन्यासी, समस्त प्रतिनिधींमध्ये वयाने लहान तरीही प्राचीन व श्रेष्ठ सत्याची जिवंत मूर्तीच' असे स्वामी विवेकानंदांचे वर्णन केले आहे. विवेकानंदांनी खऱ्या धर्माची तत्त्वे सांगून धर्म हे उन्नतीचे साधन असावे, असे प्रतिपादन केले.


विवेकानंदांची प्रभावी भाषणशैली साऱ्या जगतात वाखाणली गेली. समस्त पाश्चात्त्य जगात विवेकानंदांची कीर्ती व भारताचा मान वाढला. अपूर्व सहनशीलता, असीम धैर्य, अलौकिक त्यागशक्ती यांचा सहज समन्वय म्हणजे स्वामी विवेकानंद ! ज्याने आपल्या देशाला आणि देशबांधवांना आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शिखरावर नेऊन ठेवले, ते स्वामी विवेकानंद माझी आवडती विभूती आहेत. या महान विभूतीने ४ जुलै १९०२ या  दिवशी रात्री बेलूर या मठात महासमाधी घेतली.

मित्रांनो  तुम्‍हाला वरील निबंध कसा वाटला हे आम्‍हाला कमेंट करून जरूर कळवा . निबंध पुर्ण वाचल्‍याबद्दल धन्यवाद. 

टीप : वरील निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते

  1. Swami Vivekananda Nibandh In Marathi
  2. swami vivekananda marathi madhe nibandh

Swami Vivekananda Essay In Marathi | स्वामी विवेकानंद मराठी निबंध

महात्मा गांधी निबंध मराठी | Mahatma Gandhi Nibandh In Marathi

निबंध क्रं. १ 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण महात्मा गांधी मराठी निबंध बघणार आहोत. सत्‍य आणि अहींसेचा मार्ग वापरून विविध चळवळीच्‍या माध्‍यामातुन भारताला गुलामगीरीच्‍या बेळीतुन मुक्‍तता मिळवुन देण्‍याचे कार्य महात्‍मा गांधीजींनी पुर्ण केले. जन्माने सामान्‍य असणारे गांधीजी आपल्‍या कार्यामुळे कश्‍याप्रकारे महान व्‍यक्‍तीमत्‍व प्राप्‍त करू शकले याची सखोल माहीती खालील 4 निबंधात प्रस्‍तुत केली आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.



मानवतेचा मानदंड महात्मा गांधी यांची एका शब्दात ओळख करून दयायची झाली, तर त्यासाठी समर्पक शब्द आहे, 'महामानव', गांधीजी स्वत:ला नेहमी 'एक सामान्य माणूस' मानत असत. त्यांनी आपल्या हातून घडलेल्या चुका प्रामाणिकपणे कबूल केल्या आणि कोणताही कमीपणा न बाळगता त्या सुधारण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. कोणत्याही महान गोष्टीचे मोजमाप करण्यासाठी मानदंड वापरला जातो. मानवतेचे मापन करण्यासाठी वापरला जाणारा मानदंड म्हणजे 'गांधीजी' होय.



महात्माजींनी कोणतेही काम करताना मानवजातीचा विचार केला. ते वकिलीचा व्यवसाय करण्यासाठी आफ्रिकेत गेले होते; पण तेथील भारतीयांची दैन्यावस्था पाहून ते त्यांच्यामागे उभे राहिले. तेथील भारतीय जनतेवर जे अमानुष कायदे लादले गेले होते, त्यांच्याविरुद्ध ते खंबीरपणे झगडले.


Mahatma-Gandhi-Nibandh-In-Marathi
Mahatma-Gandhi-Nibandh-In-Marathi


भारतात परत आल्यावर त्यांनी प्रथम संपूर्ण भारताचा प्रवास केला. सामान्य भारतीय हे अर्धनग्न अवस्थेत जिवन ज‍गतात, अर्धपोटी राहतात हे पाहून ते अस्वस्थ झाले. त्यांनी आपल्या पोशाखात, आपल्या आहारात आमूलाग्र बदल केला. भव्य प्रासादतुल्य बंगल्यात राहण्यापेक्षा  छोट्या वस्‍तीत राहणे त्यांनी पसंत केले. सर्व लोकांना समाजात समान वागणूक हवी, असे आग्रहपूर्वक सांगणारे महात्माजी कचराकुंडी साफ करण्याचे काम करायला स्वत: सदैव पुढे येत असत.



मीठ म्हणजे सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजेचे प्रतीकच! त्या मिठावर बसवलेला कर त्यांना अन्यायकारक वाटला; म्हणून त्या अन्यायाविरुद्ध झगडण्यासाठी महात्माजीनी 'दांडी यात्रा' काढली. महात्माजींंनी कधीही कोणत्याही मानसन्मानाची अपेक्षा केली नाही. सर्व धर्मातील व सर्व जातीजमातीतील जनतेने एकदिलाने राहावे, यासाठी ते जीवनभर झटले. एका प्रार्थनासभेत त्यांची हत्या झाली. आज गांधीजी देहाने हयात नाहीत; पण त्यांच्या अलौकिक कार्याने  ते अमर झाले आहेत.  

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध क्रमांक २
राष्ट्रपिता महात्मा गांधी
 महत्‍वाचे मुद्दे : 
(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  1. सामान्यातून असामान्य 
  2. चुका कबूल करण्याची वृत्ती -
  3. आत्मवृत्ताला नाव 'सत्याचे प्रयोग ' 
  4. बॅरिस्टर झाल्यावर आफ्रिकेला प्रयाण 
  5. विषमतेची वागणूक सशस्त्र सत्तेला अहिंसेने उत्तर
  6. भारतदर्शन 
  7. राजकारणात प्रवेश
  8. सत्याग्रह निःशस्त्र प्रतिकार 
  9. सविनय कायदेभंग 
  10. उपोषण 
  11. निरपेक्ष समाजकार्य 
  12. सर्व जनतेचे बापू 
  13. सेवाग्राममधून समाजसेवा 
  14. कुटिर उदयोगांना महत्त्व 
  15. सत्ता पद स्वीकारले नाही
  16. सत्यासाठी मरणही पत्करले 
  17. राष्ट्राचा पिता.



भारताला स्‍वतंत्र करण्‍यासाठी अनेक महान स्‍त्री व पुरूषांनी आपले सर्वस्‍व राष्‍ट्राला अर्पण केले . अश्‍या महापुरूषापैकी एक होते महात्‍मा गांधी. महात्‍मा गांधी युगपुरूष होते. त्‍यांच्‍या बद्दल सर्व विश्‍व आदराची भावना ठेवत होते . अश्‍या महामानवाला नमन करूया आणि निबंधाला सुरूवात करूया .



महात्माजींच्या कार्याची थोरवी गाताना प्रसिद्ध वैज्ञानिक आईनस्टाईन म्हणाले होते, "आणखी काही पिढ्यांनंतर लोकांचा विश्वासही बसणार नाही की, असा कधी कोणी माणूस झाला होता." ध्येयवेडाने प्रेरित झाल्यावर एका सामान्यातून असामान्य व्यक्तिमत्त्व कसे फुलू शकते, त्याचे महात्माजी हे उदाहरण आहेत. २ ऑक्टोबर १८६९ ला काठेवाडमध्ये पोरबंदर येथे त्यांचा जन्म झाला होता.

त्यांची विदयार्थिदशा ही इतर सर्वसामान्य मुलांसारखीच होती. त्या वयात त्यांच्याही हातून चुका झाल्या. त्यांचा वेगळेपणा एवढाच की, त्यांनी आपल्या चुका कबूल केल्या. पुढेही जीवनात वेगवेगळे प्रयोग करताना जेव्हा जेव्हा चुका झाल्या, तेव्हा तेव्हा त्या त्यांनी सर्वांपुढे मान्य केल्या व त्याचे शासनही स्वत:ला करून घेतले. आपल्या आत्मवृत्तालाही त्यांनी नाव दिले आहे  'सत्याचे प्रयोग.' दुसरा गांधीजींचे विशेष म्हणजे परदेशात जाण्यापूर्वी आपल्या मातेजवळ त्यांनी ज्या प्रतिज्ञा केल्या त्या आयुष्यभर पाळल्या.

वयाच्या अट्ठाविसाव्या वर्षी बॅरिस्टर गांधी कामानिमित्त आफ्रिकेत गेले, पण तेथील हिंदी लोकांना मिळणारी अमानुष वागणूक पाहून त्यांच्या कार्याचे स्वरूपच बदलले. त्यांना स्वत:लाही 'काळा आदमी' म्हणून हा छळ काही काळ सहन करावा लागला आणि तेथेच त्यांच्या कार्याचे स्वरूप ठरले. या अन्यायापुढे मान तुकवणे योग्य नाही, हे त्यांना जाणवले. त्याच वेळी गांधीजींनी सशस्त्र शक्तीपुढे 'अहिंसे'चे हत्यार स्वीकारले. "हे सामर्थ्य आपल्याला आपल्या पत्नीकडून मिळाले" असे महात्माजी सदैव सांगत.

आफ्रिकेतून परत आल्यावर आपल्या गुरूंच्या ना. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या - सांगण्यानुसार गांधीजींनी संपूर्ण भारताचे - भारतीय समाजाचे दर्शन घेतले आणि १९२० पासून आपल्या लढ्याला सुरुवात करताना सत्याग्रह, नि:शस्त्र प्रतिकार, सविनय कायदेभंग व स्वदेशीचा पुरस्कार या चतु:सूत्रीचा स्वीकार केला. एखादया लढ्यात हिंसेने प्रवेश केला, तर गांधीजी त्या क्षणी तो लढा थांबवत व उपोषणाचा मार्ग स्वीकारून स्वशासन करून घेत.

यानंतर गांधीजी जगले ते देशासाठी, त्यांनी कधीही आपल्या पत्नीचा, आपल्या मुलांचा, कुटुंबाचा वा घराण्याच्या स्वार्थाचा विचार केला नाही, त्यांच्या अशा वागण्यामुळे त्यांचा मोठा मुलगा हरिलाल त्यांना दुरावला, पण ते संपूर्ण भारतीय जनतेचे 'बापू' झाले होते. ब्रिटिशांशी लढण्यात ते अखंड गुंतलेले असतानाही आपल्या देशातील दलित पीडित समाजाचा त्यांना क्षणभरही विसर पडला नव्हता. हरिजनांच्या उद्धारासाठी त्यांनी 'हरिजन' साप्ताहिक चालवले. साबरमतीच्या सेवाश्रमात त्यांनी हरिजन, आदिवासी, कुष्ठपीडित सर्वांची सेवा केली. मोठ्या कारखान्यांपेक्षा 'कुटिर उदयोगा'ला ते महत्त्व देत.

बापूजी जे जगले ते इतरांसाठीच. म्हणून कवी मनमोहन म्हणतात, 'चंदनाचे खोड लाजे। हा झिजे त्याहूनही  कोणतेही पद, कोणतेही स्थान, सत्ता त्यांनी स्वीकारली नाही. असेच कार्यरत असताना ३० जानेवारी १९४८ रोजी या राष्ट्रपित्याचा एका मारेकऱ्याने खून केला. त्यावेळी प्रसिद्ध नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणाले होते, “या जगात अतिशय चांगले असणेही तितके चांगले नाही."

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद



निबंध क्रमांक ३

Mahatma Gandhi Information In Marathi Essay

महत्‍वाचे मुद्दे : 

  1. महात्मा गांधी
  2. आवडते पुढारी
  3. सत्याग्रह व असहकार ही शस्त्रास्त्रे
  4. बापूजीपासून महात्माजी
  5. सत्वाचे प्रयोग' आत्मचरित्र
  6. असामान्य धाडस
  7. सशस्त्र शक्तीशी निशस्त्र मुकाबला
  8. असहकार चळवळ
  9. दांडी यात्रा
  10. चले जाव आंदोलन 
  11. निकंलक चारित्र्य 
  12. संयम, मनोनिग्रह
  13. सामान्याकडून असामान्यत्वाकडे वाटचाल

राष्ट्रपिता महात्मा गांधी हे माझे आवडते पुढारी आहेत. सत्याग्रह व असहकार या जगावेगळ्या अहिंसक शस्त्रांनी त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. बापूजी 'महात्मा' कसे झाले, याचा शोध घेतला की त्यांच्या चरित्रातील दिव्यत्व प्रत्ययास येते. आपली जीवन कहाणी सांगताना बापूजी तिचा उल्लेख 'सत्याचे प्रयोग' म्हणून करतात. आपल्या जीवनातील सर्व चुकांची त्यांनी प्रांजळपणे कबुली दिली आहे. गांधीजींनी लोकांना सत्याचे नुसते पाठ दिले नाहीत, तर स्वत:च्या जीवनात सत्याचे प्रयोग प्रत्यक्ष करून दाखवले.

महात्माजीचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी, बापूजींनी आयुष्यभर सत्य, अहिंसा या व्रतांचे कठोरपणे पालन केले: बापूजीजवळ असामान्य धाडस होते. आपल्या देशातील लोकांची गरीबीची अवस्‍था पाहून बापूजी केवळ पंचा नेसूनच सर्वत्र वावरू लागले. बापूजींंनी आपला देश, भारतीय संस्कृती, भारतातील सर्वसामान्य माणूस यांचा प्रथम विचार केला. म्हणूनच सशस्त्र चळवळीचा हिंसक मार्ग त्यांनी अनुसरला नाही.

सशस्त्र सरकारला त्यांनी आव्हान दिले ते नि:शस्त्र हातांनी. 'सत्याग्रह या नवीन अस्त्राचा उपयोग त्यांनी प्रथम आफ्रिकेत आणि नंतर भारतात केला. १९२० ची बापुजीची असहकार चळवळ, १९३० ची 'दांडी यात्रा' व १९४२ चा 'चले जाव' लढा' हे संपुर्ण विश्वातील स्वातंत्र्य आंदोलनांमधील सोनेरी क्षण होते. बापूजींच्या मोठेपणाचे रहस्य त्यांच्या निष्कलंक चारित्र्यात होते. बापुजींजवळ विलक्षण 'संयम' होता. 


आजच्या विदयार्थ्यांत कोणत्याही त-हेचा 'मनोनिग्रह' आढळत नाही. मनोनिग्रहाचे महत्त्व त्यांना बापूजींच्या जीवनचरित्रातून कळून येईल. एकदा डॉक्टरांनी कस्तुरबांना आजारपणात मीठ सोडायला सांगितले होते, परंतु त्या तयार नव्हत्या. तेव्हा बापूजींनी त्यांचे मनोबल तयार करण्यासाठी स्वत:च मीठ सोडले. खजूर व शेळीचे दूध या साध्या पदार्थांवर ते अखेरपर्यंत राहिले. 

सत्ता, संपत्ती यांच्या जीवघेण्या स्पर्धेत बापूजी केव्हाच अडकले नाहीत. आफ्रिका सोडताना आपल्याला मिळालेल्या सर्व भेटी त्यांनी देशकार्यासाठी देऊन टाकल्या. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सत्तेच्या कोणत्याही पदाची हाव न धरता, ते निर्वासितांच्या सेवेला धावून गेले. सामान्याकडून असामान्यत्वाकडे यशस्वी वाटचाल कशी करता येते, याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आमचे राष्ट्रपिता बापूजी


प्रख्यात तत्त्वज्ञ आईनस्टाईनने महात्माजी र्विषयी असे म्हटले आहे की, “आणखी काही वर्षांनंतर असा एक मनुष्य झाला होता, यावर कोणी विश्वास ठेवणार नाही."सर्वाना सत्‍य व अहिंसेचा मार्ग दाखवणारे आपले आवडते बापू आता आपल्यात राहिले नाहीत, परंतु त्यांची तत्वे नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करत राहतील .

मित्रांनो मी आशा  करतो तुम्हाला महात्मा गांधी निबंध मराठी आवडला असेल , निबंध पुर्ण वाचल्‍याबद्दल  धन्‍यवाद 

निबंध क्रमांक 4

 राष्ट्रपिता महात्मा गांधी Essay On Mahatma Gandhi In Marathi

 भारतात अनेक थोर व्यक्तींनी जन्म घेतला. परंतु गांधीजी त्या सर्वांपेक्षा अधिक थोर होते. त्यामागील कारणांचा आपण शोध घेऊ. गांधीजींचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य एव्हरेस्ट शिखराप्रमाणे उच्च दर्जाचे आहे. त्यांची तुलना फक्त त्यांच्याशीच होऊ शकत होती.  आदर्शाची ते जिवंत साकार प्रतिमा होते. 


सत्य, अहिंसा, न्याय, समानता, सेवा, राष्ट्र समर्पणासारख्या आदर्शाचे आणि जीवनमूल्यांचे ते एक आदर्श उदाहरण होते. हिंसा, स्वार्थ, असत्य, संकुचितपणा, राजकारण, जातिभेद, घृणा, द्वेष, लोभ, लालसेच्या कलियुगातही त्यांनी आपले विचार आणि आदर्श यांचे उच्चांक गाठून मानवतेची कीर्ती वाढविली. या वास्तवतेवर कदाचित येणाऱ्या पिढीचा विश्वासही बसणार नाही.


जे असाधारण, असंभव आणि अविश्सनीय वाटत होते ते सर्व काही गांधीजींनी करून दाखविले. त्यांचे जीवन, आदर्श, उच्च विचार, साधेपणा, खरेपणा युगानुयुगे लोकांना प्रेरणा देत राहील.
त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे २ ऑक्टोबर १८६९ मध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव पुतलीबाई होते. त्यांचे वडील पोरबंदर संस्थानचे दिवाण होते. आई ईश्वरभक्त, श्रद्धाळू साधी, धार्मिक स्त्री होती.  वयाच्या १३ व्या वर्षी गांधीजीचा विवाह कस्तुरबाशी झाला. ते ७ वर्षांचे असताना त्यांच्या कुटुंबाने पोरबंदरहून राजकोटला स्थलांतर केले.


किशोरवयातच गांधीजींनी अहिंसा, ब्रह्मचर्य आणि करुणेचे व्रत घेतले होते. पित्याच्या मृत्यूनंतर कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी लंडनला गेले परंतु तेथील दिखाऊ, कृत्रिम जीवनशैली त्यांना अजिबात आवडली नाही. ते भारतात परत आले व वकिली करू लागले. तेव्हाच त्यांना एका दाव्याच्या संदर्भात दक्षिण आफ्रिकेत जावे लागले. 


तेथे त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. इंग्रजांनी त्यांना रेल्वेतून अपमान करून उतरविले. कारण गोऱ्या लोकांसाठी असलेल्या प्रथम श्रेणीच्या डब्यात ते बसले होते. त्यांना अनेकदा कारागृहांत टाकण्यात आले व मारहाण करण्यात आली. यामुळे त्यांच्या आदर्शाना आणखी बळ मिळाले व त्यांनी खरा कर्मयोगी बनण्याचा निश्चय केला. 'गीता' त्यांचा आदर्श बनली. तिथे असतानाच त्यांनी सत्य, अहिंसेचे व्यवहारात अनेक प्रयोग केले. त्यात सत्याग्रह मुख्य होता.


१९१५ मध्ये ते आफ्रिकेतून भारतात परत आले. अहमदाबादजवळ साबरमती नदीच्या किनाऱ्यावर आश्रम स्थापन केला आणि आपल्या आदर्शाचा प्रसार प्रचार त्यांनी सुरू केला. त्यांनी गरीब शेतकरी, गिरणी कामगार, मजूर यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढे दिले व विजय मिळविला. भारतीय स्वातंत्र्य चळवळ तेव्हा चालू होती. गांधीजींनी त्यात भाग घेतला. सत्याग्रह, सविनय कायदेभंग आणि असहकाराचा योग्य उपयोग केला. भारतीय नेते आणि संपूर्ण जनता यांना त्यांनी संघटित केले. त्यांना मार्गदशन केले त्यांच्यावर प्रेम केले. 


त्याच्या सहकार्यामुळे व प्रेरणेमुळे हजारे लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. संपूर्ण भारतात खादी, स्वदेशी, स्वातंत्र्य, असहकार, परदेशी मालांवर बहिष्कार टाकण्याची जणू लाटच आली. त्यामुळे इंग्रजांच्या सत्तेचा पाया डळमळू लागला. गांधीजींनी संपूर्ण भारताचा दौरा केला. नेते, गावप्रमुख जनता यांना भेटले आणि आपले विचार त्यांना पटवून दिले. त्यामुळे सगळा भारत त्यांच्या मागे चालू लागला. 

परिणामी इंग्रजांची दडपशाही आणखीनच वाढली. गांधीजींवर अनेक आरोप करण्यात आले व त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. त्यांच्याबरोबर शेकडो नेत्यांना अटक करण्यात आली. गांधीजी अनेकदा तुरुंगात गेले. अनेक सत्याग्रह केले. दीर्घकाळ उपोषणे केली व जनता संघटित केली.


१२ मार्च १९३० ला गांधीजींनी प्रसिद्ध दांडी यात्रेला प्रारंभ केला जुलमी इंग्रज सरकारला हलवून सोडले. परंतु त्यांच्या मनांत इंग्रज शासकांविरुद्ध तिरस्कार नव्हता. द्वेष नव्हता. ते म्हणत पापाचा तिरस्कार करा पाप्याचा करू नका. त्यांनी 'यंग इंडिया''हरिजन' ही वत्तपत्रे चालविली. या वृत्तपत्रांनी स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा व बळ दिले. काँग्रेस आणि भारताला गांधीजींनीच 'स्वराज्य' ही घोषणा दिली. त्यांच्याच नेतृत्वाखाली 'भारत छोड़ो' चळवळीची सुरुवात झाली व भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्याचा शेवट झाला.


शेवटी १५ ऑगस्ट १९४७ ला गांधीजींच्या नेतृत्वाखाली देश स्वतंत्र झाला. जनतेने सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु देशाचे दोन तुकडे झाले. जातीय दंगे भडकले. हजारो निरपराध लोक मारले गेले. अब्जावधी रुपयांची संपत्ती नष्ट झाली. हे सर्व पाहून गांधीजींना दु:ख झाले. संपूर्ण शक्तिनिशी ते याला तोंड देण्यास सिद्ध झाले. ज्या ज्या ठिकाणी दंगे झाले त्या त्या ठिकाणी गांधीजी गेले. लोकांची समजूत काढली. त्यांना शांत राहण्यास सांगितले. त्यांना या कार्यात अल्प यश मिळाले परंतु त्यांनी प्राणपणाने यासाठी प्रयत्न केले व नैतिक धैर्याचे एक उदाहरणच जनतेसमोर प्रस्तुत केले.


दुर्दैवाने ३० जानेवारी १९४८ रोजी प्रार्थनासभेत जात असताना नथुराम गोडसे याने गोळी मारून गांधीजींचा खून केला. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली. त्यांच्या मृत्यूबरोबरच एका झंझावाती युगाचा अंत झाला. पं. नेहरू आपल्या शोकसंदेशात देशाला उद्देशून म्हणाले, "आमच्या जीवनातील प्रकाश नष्ट झाला. सर्वत्र अंधार पसरला आहे. राष्ट्रपिता आता आमच्यात नाहीत. त्यांना आमची श्रद्धांजली असेल की आपण स्वत:ला सत्य आणि त्या मूल्यांच्या प्रति समर्पित करू ज्याच्यासाठी ते जगले आणि हुतात्मा झाले."

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

निबंध क्रमांक 5


बापूजी - एक थोर आदर्श

"दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती॥ २ ऑक्टोबर महात्मा गांधीजींचा जन्मदिवस. आता, आंतरराष्ट्रीय स्तरावर 'अहिंसा दिन' म्हणून साजरा केला जाणार आहे. अशी नुकतीच वर्तमानपत्रातून बातमी आली. राष्ट्रपिता महात्माजींची अनमोल कारकीर्द- प्रकर्षाने डोळ्यासमोरून जाऊ लागली.

सध्याचे युग 'कलियुग, आक्रमणाचे युग'. रोज वृत्तपत्रात कोठे ना कोठे तरी बंद - हरताळ, जाळपोळ, बलात्कार, लूटमार, दरोडा, घातपात, बॉम्बस्फोट, मोर्चे अशा बातम्या नित्य-परिचयाच्या झाल्या आहेत. शिक्षणासारख्या अत्यंत पवित्र आणि सरळमार्गी असणाऱ्या क्षेत्रातूनही विद्यार्थी - शिक्षण महर्षी संस्थाचालक या सर्वामध्ये अनाचार-भ्रष्टाचार-मारामारीच्या बार्ता आता सरसकट येऊ लागल्या आहेत, मागील शतकार्धात आम्ही स्वातंत्र्यासाठी परकीयांसाठी लढत होतो. आता आपणच आपल्याशी झगडत आहेत आणि आपल्या प्रगती मार्गात मोठे अडथळे निर्माण करीत आहोत. - 'राष्ट्राचे भावी नागरिक' म्हणून आपण युवाशक्तीला, विद्यार्थ्यांना आवाहन करतो, जागरूक करण्याचा प्रयत्न करतो,

परंतु हीच शक्ती, हेच विद्यार्थी आपल्या हक्कांविषयी विशेष जागरूक असताना, पण कर्तव्यांविषयी नाही, त्यांच्या त्या पोरकटपणामुळे, अजाणतेमुळे ते न झालेल्या अन्यायाविरुद्धही चिडून उठताना दिसतात. आणि मग अशात-हेने चुकलेल्या या वासरांना योग्य मार्गाला नेणारा आदर्शच राहिला नाही. अशावेळी आठवण होते ती आपल्या बापूजींची, त्या थोर राष्ट्रपित्याची..

ही कोवळी, अपरिपक्व मुले आणि त्यांच्या सभोवताली हे स्वार्थान-अत्याचाराने-सत्ताप्राप्तीसाठी काहीही करायला निघालेल्या सत्तांधाने बरबटलेले. कसे आणि कोण करणार यांच्यावर संस्कार ? कोण देणार यांना उपदेश ? कोण ठेवणार यांच्यापुढे आदर्श ? अशा या बालकांपुढे गांधीजींच्या थोर जीवनाची अगदी जवळून ओळख करून देणे, आज आवश्यक ठरले आहे.

'२ ऑक्टोबर' महात्माजींचा जन्मदिवस या दिवशी आपण सुट्टी घेतो. परंतु निदान तो दिवस तरी विद्यार्थ्यांसाठी के वळ गांधीजींचा जीवनपरिचय करून देण्यात गेला तरी पुष्कळ गोष्टी साध्य होतील. गांधीजींचे बालपण, जीवनचर्या, शिक्षण, बालपणातील अनुभवातून लिहिलेले 'सत्याचे प्रयोग' हे पुस्तक, हरिश्चंद्र नाटकाचा त्यांच्या मनावर झालेला परिणाम, एकदा कोठे बोलल्यानंतर त्यांच्या वडिलांकडून मिळालेली शिक्षा, नंतर प्रत्येक गोष्ट सत्यपणे सांगायची त्यांची सवय, जीवनातील अपयशही प्रामाणिकपणे सांगण्याची त्यांची पद्धत... अशा अनेक गोष्टींचा बालजीवनावर निश्चित चांगला परिणाम होईल.

बापूजींच्या जीवनातील तो अतिशय महत्त्वाचा प्रसंग, द. आफ्रिकेमध्ये असताना... काळ्या लोकांना दिली जाणारी वागणूक तो रेल्वेमधील प्रसंग... त्यातून त्यांचे दिसणारे देशप्रेम... धाडस-धडाडी, निश्चितपणे मुलांना देशप्रेमाचा उपदेश करून जाईल. आपण सामान्य माणसे अनेकदा न पटणाऱ्या गोष्टी इतरांसाठी करतो, इतर लोक आपल्याला हसतील म्हणून आपण घाबरतो. परंतु गांधीजी स्वतः धुतलेले कपडेच परदेशात घालत असत.


बापूजींच्या पंचाची तर आपल्या देशात तर चेष्टा झाली, परदेशातही फार चेष्टा झाली. पण त्यांनी पंचा वापरणे सोडले नाही, अशा पद्धतीने "माझ्या देशातील लोकांना जर अंगभर कपडा मिळत नाही तर, मी कसे घालू अंगभर कपडे ?" असा महान हेतू - विचार त्यांच्यामागे होता. म्हणूनच गांधीजींनाच ते शोभले आणि जीवनभर निभावले. गांधीजींचा ‘संयम' फार मोठा होता. मद्य, मांस आणि परस्त्री या तीन गोष्टींपासून कायम दूर राहण्याचे वचन त्यांनी आपल्या मातेला दिले होते, ते त्यांनी अखेरपर्यंत पाळले. हा संयम - असा मनोनिग्रह आजच्या पिढीत कोठून येणार, कोठे आढळणार?

तो गांधीजींच्या चरित्रातून निश्चितच विद्यार्थ्यांना मिळेल. एकदा त्यांच्या पत्नी-कस्तुरबा यांना 'मीठ' सोडण्यास डॉक्टरांनी सांगितले. त्या तयार नव्हत्या म्हणून बापूजींनीच मीठ सोडले, नंतर त्या कबूल झाल्या. गांधीजी खजूर आणि शेळीचे दूध या साध्या गोष्टींवर अखेरपर्यंत जगले.

सत्ता, संपत्ती यांच्या विनाशक स्पर्धेत बापूजी केव्हाही अडकले नाहीत. द. आफ्रिकेतून परत येताना त्यांना मिळालेल्या सर्व भेटी त्यांनी देशासाठी देऊन टाकल्या. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ते कोणत्याच सत्तेच्या पदावर राहिले नाहीत तर निर्वासितांच्या सेवेसाठी रुजू झाले. त्यांचे स्वतःचे अक्षर चांगले नव्हते. पण ते म्हणत वाईट अक्षर हे अपूर्ण शिक्षणाचे द्योतक आहे.

अशा या केवळ भारतापुरतेच नाही तर साऱ्या जगात महान ठरलेल्या बापूजींना आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिनाचा हीरक महोत्सव साजरा करताना आमचे शतशः प्रणाम...

महात्मा गांधी निबंध मराठी | Mahatma Gandhi Nibandh In Marathi