वर्णनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वर्णनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

pradushan ek samasya in marathi essay | प्रदूषण एक समस्या मराठी निबंध

निबंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण प्रदूषण एक समस्या मराठी निबंध बघणार आहोत.  या लेखामध्ये ऐकून 4 निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. आज जगातील सर्वात गंभीर समस्‍या असेल तर ती वाढते प्रदूषण आहे . आज भारत असो की इतर कोणताही देश त्‍या देशातील हवा, पाणी, माती,ध्‍वनी यांचे प्रदूषण दिवसेदिवस वाढतच आहे. या 3 निबंधात प्रदूषणाची कारणे व उपाय यावर सविस्‍तर माहीती दिलेली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला
 

२१ व्या शतकाकडे वाटचाल करत असलेल्या मानवाच्या प्रगतीचा वारू आज बेलगाम चौखूर उधळला आहे, ज्याची वेसण आज अडकली आहे- भ्रष्टाचाराच्या भस्मासुरामध्ये, लोकसंख्येच्या लकव्यामध्ये आणि प्रदूषणरूपी प्रलयामध्ये! जेव्हा भौतिक, रासायनिक आणि जीवशास्त्रीय बदल वातावरणात घडून येतात, जे मनुष्याच्या अस्तित्वालाच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने ग्रहण लावतात, त्यालाच ‘प्रदूषण' असे म्हणतात. 

आज प्रदूषण कोठे नाही? हवा, पाणी, अन्न, जमीन, तापमान, आवाज या साऱ्यांनाच या प्रदूषणाने ग्रहण लावलंय! औद्योगिक क्रांतीपूर्वीच प्रदूषणाचा जन्म झाला. परंतु निसर्गाच्या कुंपणाने माणसाच्या जीवनाला धडका मारणारा हा उन्मत्त बैल थोपवून धरला होता. वातावरणात मिसळणारे वाहनांचे धूर व Lead Poisoning सारखं माणसानंच निर्माण केलेलं प्रदुषणाचं रूप, आज जग गिळंकृत करू पाहणाऱ्या वामनात कधी रूपांतरित झालं हे भौतिक सुखाच्या मृगजळामागे धावणाऱ्या मनुष्यप्राण्याला कधी कळलंच नाही. 

pradushan-ek-samasya-in-marathi-essay
pradushan-ek-samasya-in-marathi-essay


परंतु चेर्नेबिल अणुभट्टीच्या स्फोटासारखं प्रदूषण निसर्ग कसा थांबवणार? अशा स्फोटांमुळे तापमानात बदल होऊन त्यामुळे ऋतुचक्राची चाकेच खिळखिळी होऊ लागली आहेत. भोपाळच्या वायु दुर्घटनेची भीषणता आज कुणी विसरू शकेल? डॉ. दत्ता सामंतांच्या शरीरालाच संप पुकारावा लागला, तो मुंबईमध्ये झालेल्या क्लोरीन गळतीमुळे ! -Touch of Midas' गोष्टीतल्या मिडास राजासारखीच आज मानवाची अवस्था होऊ लागली आहे!


Soclean Society च्या अहवालानुसारं ३ हजार टन इतका गोबरगॅस एकट्या मुंबईमध्ये दर दिवशी गोळा होतो. सतराशे टन इतकी प्रदूषिते रोज हवेत सोडली जातात अन् २० लाख लिटरपेक्षा जास्त सांडपाणी जमा होते. प्रदूषण दूर करण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रणा २४ तास वापरणेही आज माणसाला शक्य नाही.
लाऊडस्पीकरवर वाजवली जाणारी कर्णकर्कश्श गाणी, सिनेमागीते, डिस्को, वाढलेली रहदारी, वाहनांचे कर्णकटू आवाज या साऱ्यांनी ध्वनिप्रदूषण निर्माण केले आहे. २० ते ७० डेसिबल इतका आवाज ऐकू शकण्याची व सहन करण्याची क्षमता असणाऱ्या माणसाच्या कानांनी धोक्याची घंटा वाजवण्यास सुरुवात केली आहे. 



१०० च्या पेक्षा जास्त डेसिबलचा आवाज ऐकून विघ्नहर्त्याने गणेशोत्सवात कुणाकडे दाद मागावी? याहीपेक्षा भयानक आहे ते म्हणजे 'मानसिक प्रदूषण' वाढती गुन्हेगारी, बालिका-हत्या, भ्रष्टाचार, वशिलेबाजी, युवा पिढीची उदासीनता, जुन्या पिढीची निष्क्रियता, व्यसनाधीनता, अति सुखासीनता यामुळे मानवी मनच कलुषित झालं आहे, प्रदूषित झालं आहे. ही समस्या हा प्रत्येक राष्ट्राचा ज्वलंत प्रश्न आहे. ही एक राष्ट्रीय समस्या आहे. मग यावर उपाय तो कोणता? 'स्वच्छ पर्यावरण', चांगल्या विचारांचं मन हे कुठल्याही उदबत्तीच्या सुवासापेक्षाही सुवासिक आहे.  



१९७४ मधील Water Act व १९८१ मधील 'Clean air act' ची अंमलबजावणी होणं आवश्यक आहे. कलम २७७, २७८, ८४ च्या नुसार गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून जसा साजरा केला जातो तसा प्रत्येक दिवस पर्यावरण दिन म्हणून मानला पाहिजे, पाळला पाहिजे. जमीन प्रदूषित करणारी रासायनिक खते व औषधी फवारे यांच्या अमर्याद वापरावर बंधन आणले पाहिजे. 'झाडे लावा, झाडे जगवा' ही मोहीम राबविणारे अण्णा हजारे घराघरातून निर्माण झाले पाहिजेत.



वाया गेलेल्यांतून नवीन गोष्टींचा जन्म झाला मळीपासून स्पिरीट,  शेणापासून गोबरगॅस, पेट्रोलियमपासून घरगुती गॅस निर्माण झाला तर ताजमहाल पुन्हा धवल बनेल, गंगा ' मैली' राहणार नाही! मनाची नि तनाची शुचिता व शुद्धता नष्ट करू पाहणाऱ्या या प्रदूषणरूपी प्रलयांतून मनुष्याच्या आशा-आकाक्षाचा मनू तरून जाणे सहज शक्य आहे फक्त गरज आहे ती कल्पकतेची, नियोजनाच्या होडीची!
मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 2

प्रदूषणाची समस्या मराठी निबंध

 मानवासहित सर्व सजीव प्राणी वनस्पतींना जगण्यासाठी संतुलित वातावरणाची आवश्यकता असते. संतुलित वातावरणात सर्व घटक एका निश्चित प्रमाणात असतात. परंतु जेव्हा वातावरणात या घटकांची उणीव निर्माण होते किंवा त्यात हानिकारक घटक मिसळतात तेव्हा वातावरण प्रदूषित होते व मानवासाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नुकसानकारक ठरते. 



आज संपूर्ण जग प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रदूषणाने घर केले आहे आणि आपण पूर्णपणे त्याच्या मुठीत गेलो आहोत. प्राचीन काळात ही समस्या इतकी बिकट नव्हती. त्यावेळी प्रदूषणाचे नामोनिशाण नव्हते. निसर्गात एक प्रकारचे संतुलन होते. हवा, पाणी शुद्ध होते. पृथ्वीची उत्पादन शक्ती जास्त होती. हळूहळू लोकसंख्या वाढली. मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नित्य नवे कारखाने उघडू लागले. 



औद्योगिकीरणाच्या स्पर्धेत प्रत्येक राष्ट्र धावू लागले. ऐषआरामाच्या उपभोग्य वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी भूगर्भातील बहुमूल्य संपत्ती खेचून बाहेर काढली जाऊ लागली. नैसर्गिक संपत्ती नष्ट होताच भूगर्भातील कोळसा, खनिजतेल, धातू यांचे वायुरूपात परिवर्तन होऊन संपूर्ण वातावरणाला व्यापून टाकेल आणि मग मानवाला जगणे मुश्किल होईल.



लोकसंख्येच्या वाढीमुळे निवासस्थानांचे संकट उत्पन्न झाले आहे. परिणामी लहान लहान भूखंडांवर लहान लहान घरे उभारली जात आहेत. दहा दहा मजली उंच इमारती तयार होत आहेत. या घरांमधे सूर्यप्रकाश व शुद्ध हवेचा अभाव असतो. जंगल कटाई करून राहण्यासाठी जागा उपलब्ध केली जात आहे. मानव स्वत:च या प्रदूषणाला कारणीभूत आहे. 



समुद्राला अमर्याद शक्तीचा स्वामी समजून सर्व कचरा समुद्रात टाकला जात आहे. नद्यापण आपले प्रदूषित पाणी समुद्रात मिसळतात. शास्त्रज्ञांनी सावधगिरीचा इशारा देऊनही औद्योगिक घटकांद्वारे केरकचरा समुद्रात टाकणे बंद न झाले तर लवकरच त्यातील मासे मरतील. सध्या हजारो जहाजे व पेट्रोलियम टॅकर्सची समुद्रातून वाहतूक होते. 


एकीकडे हे मानवाला प्रगतीकडे घेऊन जातात. तर दुसरीकडे लाखो टन पेट्रोलियमच्या गळतीमुळे किंवा अपघातामुळे समुद्राच्या पाण्यावर ते पसरते. समुद्राच्या पर्यावरणासाठी हा मोठा धोका आहे. या तेलात अनेक किमती धातू उदा. शिसे, निकेल, मँगेनीज इत्यादी असते. जे जीवजंतू किंवा वनस्पतीद्वारे मानवाच्या शरीरात प्रवेश करून त्याचे नुकसान करते. नद्यांच्या पाण्याचे प्रदूषण झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे बिकट संकट विक्राळ रूप धारण करीत आहे.



ध्वनिप्रदूषणामुळे मानवाची श्रवणशक्ती क्षीण होते. त्यामुळे चिडचिडेपणा, थकवा, निद्रानाश, श्वासाचे रोग उत्पन्न होतात. शहरांची लोकसंख्या दिवसेदिवस वाढतच जात आहे. ग्रामीण जनतेचे शहरांकडे होणारे पलायन. शहरी जीवन कष्टमय बनवीत आहे. जो जो लोकसंख्येची घनता वाढते तो तो वाहुकीच्या साधनांत वाढ होते. इंधनावर चालणाऱ्या या वाहनांमधून निघणाऱ्या विषारी वायूमुळे वायुप्रदूषण होते. ज्यामुळे श्वासाचे अनेक रोग उद्भवतात उदा. फुप्फुसाचा कॅन्सर, दमा, खोकला, सर्दी इत्यादी वायुप्रदूषण मंदगतीने विषाचेच कार्य करते. 


परंतु भोपाळ वायू दुर्घटनेत निघालेला "मिथाईल आइसोसायनाईड" मुळे हजारो लोक तात्काळ मृत्यू पावले. जे लोक मेले ते मुक्त झाले पण जे वाचले ते कणाकणाने मरण्यासाठी आणि विकसनशील राष्ट्रांतील विज्ञानाचा शाप सहन करण्यास विवश झाले. औद्योगिकीकरणाच्या वाढत्या प्रवृत्तिमुळे कारखान्यांतून निघणारे विषारी वायू हवा विषमय करतात. कारखान्याजवळ लावलेल्या झाडांवर काजळीची पुटे चढ़तात. मग तेथेच वास्तव्य करणाऱ्या लोकांबद्दल काय? अल्ट्राव्हायोलेट (अतिनील) किरणांपासून पृथ्वीला वाचविणाऱ्या ओझोनलाही छिद्र पडले आहे.



निसर्गाशी मानवाचा अयोग्य व्यवहार या समस्येला आणखीनच गंभीर करतो. जंगल कटाई करणे, उद्याने उजाडणे आणि वातावरण शुद्ध ठेवणाऱ्या झाडांना नष्ट करणे हा मानवाचा स्वभावच बनला आहे. जर आता वृक्षारोपण मोहीम वेगाने चालविली नाही तर प्रदूषण हा एक असाध्य रोग बनेल. आज शेतीव्यवसायाचे यांत्रिकीकरण झाले आहे. त्यामुळेही पर्यावरणाचे प्रदूषण होते. 


अधिक उत्पादनासाठी शेतात लाखो टन रासायनिक खते टाकली जातात कीटकनाशके फवारली जातात. वाढत्या शेतीउत्पादनासाठी मानवाला खूप मोठी किंमत चुकवावी लागते. हीच रसायने हळूहळू अन्नाद्वारे आपल्या पोटात जातात व अनेक रोगांचे कारण बनतात. । आजकाल ग्राहकांना आकर्जून घेण्यासाठी फळे, धान्ये इत्यादींना  कृत्रिम रंग दिले जातात. हे रंग आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात.



संपूर्ण पृथ्वी प्रदूषित करून मानवाला चैन पडले नाही म्हणून त्याने खाद्य पदार्थही दूषित करण्यास सुखात केली. तापमानाचे प्रदूषण होणे पण मानवासाठी घातक आहे. वातावरणाचे तापमान वाढले की हिमखंड वितळू लागतात. जर बर्फाचे पर्वत वितळू लागले तर संपूर्ण पृथ्वी जलमय होईल. 




ही समस्या सोडविण्यासाठी अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञ विचार करीत आहेत. अनेक प्रत्यत्नानंतर थोडेसे यश मिळाले आहे. दाट लोकसंख्येपासून कारखाने दूर नेले जावेत. विषारी वायू जाण्यासाठी उंच चिमण्या बसविण्यात याव्यात. विषारी वायू बाहेर निघण्यापूर्वीच नष्ट करण्यात यावेत. 




केरकचऱ्याचा उपयोग जमिनीच्या भरावासाठी करण्यात यावा, पिकांवर जास्त प्रमाणात कीटकनाशके फवारू नयेत, नैसर्गिक रूपात धान्य ग्राहकाला मिळावे, गावांतून शहरांकडे जाणाऱ्या बुद्धिजीवींचे पलायन थांबविण्यासाठी गावातच रोजगार उत्पन्न करुन द्यावा. वृक्षतोड बंद करून वृक्षारोपण मोहीम राबवावी. कारखान्यांतील सांडपाण्याचे शुद्धीकरण करावे. वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करावे. बायोडिग्रेडेबल गॅसचा वापर करावा.



जगात सर्वात जास्त चर्चा प्रदूषणाची होते. शास्त्रज्ञ प्रदूषण थांबविण्यासाठी नवनवे तंत्रज्ञान विकसित करीत आहेत. प्रत्येकाने या कामात मदत केली पाहिजे. जर असे केले नाही तर स्वर्गापेक्षाही प्रिय असणाऱ्या पृथ्वीची स्थिती कशी होईल ते आपण जाणतोच.

हा  निबंध तुमच्या मित्रमंडळी सोबत व  व्हाट्सअँप ग्रुपवर  शेयर करून लोकसंख्या जनजागृती निर्माण करण्यासाठी हातभार लावावा  हि नम्र  विनंती.  पुढील  निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 3


प्रदूषण एक समस्या:  भौतिक सुखाच्या मागे पळताना प्रदूषण आपला पाठलाग करीत आहे . याकडे आपले लक्ष नसते. आजच्या विज्ञानयुगात प्रगतीचे बोट धरून प्रदूषणाने थैमान घातले आहे. कधी काळी कारखाने , वीज केंद्रे यांपासून माणूस खूप दूर होता . मुक्त निसर्गात मोकळेपणे तो श्वास घेत होता. आता मात्र त्याचा श्वास घुसमटतो आहे. हवेतले ऑक्सीजन कमी झाले आहे कारण प्रदूषित हवा आपल्याला मिळत आहे. 


कारखान्याचे धूर, रसायनांचा गंध , दूषित पाण्याची विल्हेवाट , प्लास्टिक, खते यांचा अतिरेक , जंगलतोड, वाहनांची वाढती संख्या या सर्वांनी मिळून वायूप्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनिप्रदूषण याबरोबरच मानसिक प्रदूषणाची देणगी आपणास दिली आहे. आपले आरोग्य धोक्यात आणले आहे.



५ जून जागतिक पर्यावरणदिन' आणि '२२ एप्रिल-वसुंधरा दिन' म्हणून आपण साजरे करतो. पण खऱ्या अर्थाने प्रत्येकाने प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न करायला हवा. हवा, अन्न, पाणी दूषित मिळाले तर आरोग्य चांगले कसे राहील? ज्या गोष्टी आपल्या हातात आहे त्या तर आपण करू शकतो ना? वृक्ष लावा-वृक्ष जगवा' हे तत्व आपण स्वीकारावे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा. कचरा इतरत्र न फेकता कचराकुंडीतच टाकावा. धूर होईल असे इंधन लाकडे वगैरे वापरू नये. 



घर व घराचा परिसरच नव्हे तर आपले गाव , आपला देश स्वच्छ सुंदर कसा राहील, यासाठी आपले प्रयत्न हवेत . So Clean Society चा अहवाल सांगतो. की फक्त एकट्या मुंबईत १७०० टन प्रदूषिते हवेत सोडली जातात. वीस लाख लिटरपेक्षा जास्त सांडपाणी जमा होते. तीन हजार टन गोबरगॅस गोळा होतो. चर्नेबील अणुभट्टीतला स्फोट, भोपाळची वायू दुर्घटना, कर्नाटकमधील दोनशे हत्तींची हत्या व चंदनतस्करी अशा घटना म्हणजे. स्वच्छ पर्यावरणावर गदा होय.


पृथ्वीदिन साजरा होतो. त्याच दिवशी कोलकत्ता येथे प्रचंड प्रमाणावर वृक्षतोड झाली. मध्य प्रदेशातील अभयारण्यात आगी लावण्यात आल्या निसर्ग व मानव यांच्यातले हे युध्द प्रदूषणाने झाकळून आपला विनाश करीत आहे. मास्कोच्या हवेत दरवर्षी दहा लाख टन प्रदूषिते सोडली जातात. 



दामोदर नदीत चुकीने लाखो टन तेल ओतले गेले हे सर्व काही का होते? बॉम्बस्फोट होतात. तापमानात बदल होतो. ऋतूचक्र उलटे फिरू लागते. एकूण भूपृष्ठाच्या ४०% जंगले हवीत पण भारतात हे प्रमाण ७ ते ८ % आहे. वाढती लोकसंख्या, वाढती वाहने, वाढती कारखानदारी, अपघात , कुजणारी शरीरे , खेड्यातील गटारे, शहरातील वाढती गर्दी या साऱ्या गोष्टींमुळे प्रदूषण वाढत चालले आहे.



'हरितश्यामल व निर्मल वसुधा' हवी असेल तर प्रदूषणाचे गंभीर धोके लक्षात घेऊन उपाययोजना झालीच पाहिजे. १९७४ मधील Water Act व १९८१ मधील Clean Air Act ची अंमलबजावणी झालीच पाहिजे . हवेत कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे. ओझोन वायू कमी होत आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी ओझोन आवश्यक आहे. प्रदूषण कमी झालेच पाहिजे. उत्सवात होणारे ध्वनिप्रदूषण आपण टाळले पाहिजे. 


जमीन प्रदूषित करणारी रासायनिक खते, औषधे यांचा अतिरेक नको. प्रत्येकाने एक तरी वृक्ष लावून जोपासले पाहिजे . तसेच माणुसकी जागी ठेवून मानसिक प्रदूषण होऊ न देण्यासाठी जागरूक राहिले पाहिजे तरच या पृथ्वीवर आपण सुखाने नांदू शकू.



नियोजनाला कृतीची जोड हवी प्रत्यक्ष कृतीने समस्या सुटते केवळ मनोरथांनी नाही. ही समस्या वैयक्तीक नाही. ती सर्वांची आहे. सर्वांनी मिळून ती सोडवायला हवी. वाढत्या प्रदूषणाने निसर्गाचा समतोल अधिक ढासळला तर भारतासारख्या कृषिप्रधान देशाचे भवितव्य काय? प्रगती व विकास स्वच्छ पर्यावरणानेच शक्य आहे. अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी ते आवश्यक आहे.



परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा परिस्थिती बदलणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी खूप प्रयत्न हवेत . प्रदूषणाची गगनचुंबी भिंत पाडून निसर्ग व विज्ञान यांच्या मिलनाने पृथ्वीवर स्वर्ग आणू या .....
प्रदूषण हटवू या.... प्रदूषण पळवू या....

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

निबंध 4

प्रदूषणाची समस्या मराठी निबंध


मानवासहित सर्व सजीव प्राणी वनस्पतींना जगण्यासाठी संतुलित वातावरणाची आवश्यकता असते. संतुलित वातावरणात सर्व घटक एका निश्चित प्रमाणात असतात. परंतु जेव्हा वातावरणात या घटकांची उणीव निर्माण होते किंवा त्यात हानिकारक घटक मिसळतात 


तेव्हा वातावरण प्रदूषित होते व मानवासाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नुकसानकारक ठरते. आज संपूर्ण जग प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रदूषणाने घर केले आहे आणि आपण पूर्णपणे त्याच्या मुठीत गेलो आहोत. 



प्राचीन काळात ही समस्या इतकी बिकट नव्हती. त्यावेळी प्रदूषणाचे नामोनिशाण नव्हते. निसर्गात एक प्रकारचे संतुलन होते. हवा, पाणी शुद्ध होते. पृथ्वीची उत्पादन शक्ती जास्त होती. हळूहळू लोकसंख्या वाढली. मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नित्य नवे कारखाने उघडू लागले. 


औद्योगिकीरणाच्या स्पर्धेत प्रत्येक राष्ट्र धावू लागले. ऐषआरामाच्या उपभोग्य वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी भूगर्भातील बहुमूल्य संपत्ती खेचून बाहेर काढली जाऊ लागली. नैसर्गिक संपत्ती नष्ट होताच भूगर्भातील कोळसा, खनिजतेल, धातू यांचे वायुरूपात परिवर्तन होऊन संपूर्ण वातावरणाला व्यापून टाकेल आणि मग मानवाला जगणे मुश्किल होईल.


लोकसंख्येच्या वाढीमुळे निवासस्थानांचे
संकट उत्पन्न झाले आहे. परिणामी लहान लहान भूखंडांवर लहान लहान घरे उभारली जात आहेत. दहा दहा मजली उंच इमारती तयार होत आहेत. या घरांमधे सूर्यप्रकाश व शुद्ध हवेचा अभाव असतो. 


जंगल कटाई करून राहण्यासाठी जागा उपलब्ध केली जात आहे. मानव स्वत:च या प्रदूषणाला कारणीभूत आहे. समुद्राला अमर्याद शक्तीचा स्वामी समजून सर्व कचरा समुद्रात टाकला जात आहे. नद्यापण आपले प्रदूषित पाणी समुद्रात मिसळतात. 



शास्त्रज्ञांनी सावधगिरीचा इशारा देऊनही औद्योगिक घटकांद्वारे केरकचरा समुद्रात टाकणे बंद न झाले तर लवकरच त्यातील मासे मरतील. सध्या हजारो जहाजे व पेट्रोलियम टॅकर्सची समुद्रातून वाहतूक होते. एकीकडे हे मानवाला प्रगतीकडे घेऊन जातात. 


तर दुसरीकडे लाखो टन पेट्रोलियमच्या गळतीमुळे किंवा अपघातामुळे समुद्राच्या पाण्यावर ते पसरते. समुद्राच्या पर्यावरणासाठी हा मोठा धोका आहे. या तेलात अनेक किमती धातू उदा. शिसे, निकेल, मँगेनीज इत्यादी असते. जे जीवजंतू किंवा वनस्पतीद्वारे मानवाच्या शरीरात प्रवेश करून त्याचे नुकसान करते. 



नद्यांच्या पाण्याचे प्रदूषण झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे बिकट संकट विक्राळ रूप धारण करीत आहे. ध्वनिप्रदूषणामुळे मानवाची श्रवणशक्ती क्षीण होते. त्यामुळे चिडचिडेपणा, थकवा, निद्रानाश, श्वासाचे रोग उत्पन्न होतात. शहरांची लोकसंख्या दिवसेदिवस वाढतच जात आहे. 


ग्रामीण जनतेचे शहरांकडे होणारे पलायन. शहरी जीवन कष्टमय बनवीत आहे. जो जो लोकसंख्येची घनता वाढते तो तो वाहुकीच्या साधनांत वाढ होते. इंधनावर चालणाऱ्या या वाहनांमधून निघणाऱ्या विषारी वायूमुळे वायुप्रदूषण होते. ज्यामुळे श्वासाचे अनेक रोग उद्भवतात उदा. फुप्फुसाचा कॅन्सर, दमा, खोकला, सर्दी इत्यादी वायुप्रदूषण मंदगतीने विषाचेच कार्य करते. 


परंतु भोपाळ वायू दुर्घटनेत निघालेला "मिथाईल आइसो सायनाईड" मुळे हजारो लोक तात्काळ मृत्यू पावले. जे लोक मेले ते मुक्त झाले पण जे वाचले ते कणाकणाने मरण्यासाठी आणि विकसनशील राष्ट्रांतील विज्ञानाचा शाप सहन करण्यास विवश झाले.


औद्योगिकीकरणाच्या वाढत्या प्रवृत्तिमुळे कारखान्यांतून निघणारे विषारी वायू हवा विषमय करतात. कारखान्याजवळ लावलेल्या झाडांवर काजळीची पुटे चढ़तात. मग तेथेच वास्तव्य करणाऱ्या लोकांबद्दल काय? अल्ट्राव्हायोलेट (अतिनील) किरणांपासून पृथ्वीला वाचविणाऱ्या ओझोनलाही छिद्र पडले आहे.


निसर्गाशी मानवाचा अयोग्य व्यवहार या समस्येला आणखीनच गंभीर करतो. जंगल कटाई करणे, उद्याने उजाडणे आणि वातावरण शुद्ध ठेवणाऱ्या झाडांना नष्ट करणे हा मानवाचा स्वभावच बनला आहे. जर आता वृक्षारोपण मोहीम वेगाने चालविली नाही तर प्रदूषण हा एक असाध्य रोग बनेल. आज शेतीव्यवसायाचे यांत्रिकीकरण झाले आहे.



त्यामुळेही पर्यावरणाचे प्रदूषण होते. अधिक उत्पादनासाठी शेतात लाखो टन रासायनिक खते टाकली जातात व कीटकनाशके फवारली जातात. वाढत्या शेतीउत्पादनासाठी मानवाला खूप मोठी किंमत चुकवावी लागते. हीच रसायने हळूहळू अन्नाद्वारे आपल्या पोटात जातात व अनेक रोगांचे कारण बनतात. 


आजकाल ग्राहकांना आकषून घेण्यासाठी फळे, धान्ये इत्यादींना ला कृत्रिम रंग दिले जातात. हे रंग आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. संपूर्ण पृथ्वी प्रदूषित करून मानवाला चैन पडले नाही म्हणून त्याने खाद्य पदार्थही दूषित करण्यास सुखात केली. तापमानाचे प्रदूषण होणे पण मानवासाठी घातक आहे. 



वातावरणाचे तापमान वाढले की हिमखंड वितळू लागतात. जर बर्फाचे पर्वत वितळू लागले तर संपूर्ण पृथ्वी जलमय होईल, ही समस्या सोडविण्यासाठी अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञ विचार करीत आहेत. अनेक प्रत्यत्नानंतर थोडेसे यश मिळाले आहे. दाट लोकसंख्येपासून कारखाने दूर नेले जावेत. 


विषारी वायू जाण्यासाठी उंच चिमण्या बसविण्यात याव्यात. विषारी वायू बाहेर निघण्यापूर्वीच नष्ट करण्यात यावेत. केरकचऱ्याचा उपयोग जमिनीच्या भरावासाठी करण्यात यावा, पिकांवर जास्त प्रमाणात कीटकनाशके फवारू नयेत, नैसर्गिक रूपात धान्य ग्राहकाला मिळावे, गावांतून शहरांकडे जाणाऱ्या बुद्धिजीवींचे पलायन थांबविण्यासाठी गावातच रोजगार उत्पन्न करुन द्यावा. 



वृक्षतोड बंद करून वृक्षारोपण मोहीम राबवावी. कारखान्यांतील सांडपाण्याचे शुद्धीकरण करावे. वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करावे. बायोडिग्रेडेबल गॅसचा वापर करावा. जगात सर्वात जास्त चर्चा प्रदूषणाची होते. शास्त्रज्ञ प्रदूषण थांबविण्यासाठी नवनवे तंत्रज्ञान विकसित करीत आहेत. 


प्रत्येकाने या कामात मदत केली पाहिजे. जर असे केले नाही तर स्वर्गापेक्षाही प्रिय असणाऱ्या पृथ्वीची स्थिती कशी होईल ते आपण जाणतोच. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . 


pradushan ek samasya in marathi essay | प्रदूषण एक समस्या मराठी निबंध

my sister essay in marathi | माझी ताई मराठी निबंध

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझी ताई  मराठी निबंध बघणार आहोत. आई वडीलांनतर सांभाळ करणारे, मार्गदर्शन करणारे असतात ते भांवडे. या निबंधात आदर्श अश्‍या मोठ्या बहीणीचे वर्णन केले आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.  

तशा आम्ही आईबाबांच्या दोघी लाडक्या लेकी-मोठी ताई आणि धाकटी मी. ताई सुकृता आणि मी संपदा. ताई माझ्याहून चांगली पाच-सहा वर्षांनी मोठी आहे. घरात मी लाडोबा, पण मनात मला ताईबद्दल प्रेमयुक्त आदर वाटत असतो. कारण माझी ताई आहेच तशी नावाप्रमाणे 'सुकृता' ! |

my-sister-essay-in-marathi
my-sister-essay-in-marathi


ताई आणि मी सख्ख्या बहिणी, पण आमच्या दोघींच्या बोलण्याचालण्यात मात्र खूपच फरक आहे. ताई तशी थोडी अबोल आहे. त्याचे कारण तिला विचारले तर ती म्हणते, "मला आपणच बोलत राहण्यापेक्षा, दुसऱ्याचे बोलणे ऐकायलाच अधिक आवडते." याउलट मी खूपच बडबडी आहे. एका जागी बसून एखादे काम करण्याची चिकाटी अजूनही माझ्या अंगी नाही. ताईजवळ ही चिकाटी वाखाणण्यासारखी आहे.

ताईने शाळेतील दोन्ही शिष्यवृत्ती परीक्षांत उत्तम यश मिळवले आहे. किंबहुना 'अशक्य', 'असाध्य' हे शब्दच ताईच्या शब्दकोशात (Dictionary) नाहीत. महाविदयालयातील अभ्यासशाखेची निवड करतानाही 'ताई'ने आपल्या स्वतंत्र विचारांची चमक दाखवली. अभ्यास करत असताना छंद म्हणून तिने अनेक अन्य विदेशी भाषांचा अभ्यास चालू ठेवला आहे.

ताई ही काही केवळ पुस्तकातील किडा नाही. तिला अनेक कला अवगत आहेत. सहज गमतीने म्हणून तिने चित्र काढले, तरी ते अत्यंत रेखीव व चित्तवेधक असते. पण हीच ताई मला म्हणते, “संपदा, तुझी चित्रे खुप छान असतात हं!" अशा या प्रेमळ, गुणी, कलासंपन्न ताईचा आदर्श मी सतत माझ्यासमोर ठेवलेला आहे. माझ्या ताईच्या मार्गदर्शनामुळेच आतापर्यंत चौथी, सातवीच्या शिष्यवृत्त्या मी मिळवल्या आहेत.

ताईच्या पावलावर पाऊल ठेवून शालान्त परीक्षेतही गुणवत्ता यादीत येण्याचे माझे एक स्वप्न आहे. माझ्या ताईच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने माझे तेही स्वप्न साकार होईल, याची मला खात्री आहे.
मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

my sister essay in marathi | माझी ताई मराठी निबंध

karmaveer bhaurao patil essay in marathi | कर्मवीर भाऊराव पाटील मराठी निबंध 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण कर्मवीर भाऊराव पाटील मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधात त्‍यांनी शैक्षणीक क्षेत्रात केलेल्‍या कामगीरी सोबतच त्‍यांच्‍या बद्दल माहीती दिली आहे. चला तर मग सुरू करूया निबंधाला.  

स्वावलंबी शिक्षणाचे उद्गाते : कर्मवीर भाऊराव पाटील 'स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय आणि स्वातंत्र्य' हीच खरी शैक्षणिक तत्त्वज्ञानाची चतु:सूत्री मानणारे 'कर्मवीर भाऊराव पाटील यांना थोर शिक्षणतज्ज्ञच म्हटले पाहिजे. 'कमवा आणि शिका' असा अतिशय सोप्या भाषेत शिक्षणाचे मर्म सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारे कर्मवीर एक श्रेष्ठ समाजसुधारकही आहेत.

karmaveer-bhaurao-patil-essay-in-marathi
karmaveer-bhaurao-patil-essay-in-marathi

कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज गावी २२ सप्टेंबर १८८७ ला  जन्मलेले
हे बालक बालपणापासून हट्टी स्वभावाचे होते. वडील सरकारी नोकरीत, त्यामुळे वडिलांसोबत भाऊरावांच्या पायालाही भिंगरी लागलेली. परंतु भाऊरावांचे मामा हे पैलवान, त्याचा मित्र सत्याप्पा हा तर शूर साहसी अन् त्याबरोबर दयाळू अन् गरिबांचा वाली. तो श्रीमंताकडून मिळालेले पैसे गोरगरिबात वाटून टाकत असे. त्याच्या चातुर्याच्या, हिमतीच्या चांगुलपणाच्या गोष्टींचा प्रभाव भाऊरावांवर चांगलाच होत होता. अन्यायाविरुद्ध बंड करण्याचे बाळकडू त्यांना लहानपणीच सत्याप्याकडून मिळाले होते.

भाऊरावांचे शिक्षण बेताचेच. वसतिगृहात शिकत असताना तेथील नियम हे व्यक्तिस्वातंत्र्याच्या विरुद्ध दिसल्याबरोबर भाऊरावांनी वसतिगृह सोडले. आणि आयुष्याला एक वेगळेच वळण लागले. कुस्ती-मल्लखांब यासारख्या खेळात ते नेहमीआघाडावर असल्यामुळे त्यांना राजर्षी शाहू महाराजांच्या वाड्यात आश्रय मिळाला, शाहू महाराज्याकडून समाजसेवेचा वारसा घेतला. पुढे उद्योगाच्या निमित्ताने ते जेव्हा भारतभर फिरून आले तेव्हा त्यांचा 'शिक्षणाचा पिंड गप्प बसू देईना,' "विचार, आचार, उच्चार' यांचे उगमस्थान म्हणजे खरे शिक्षण, सत्य सामाजिक समता या सर्वांचा संगम त्यांना शिक्षणात दिसला, इतकेच नव्हे तर जनजागृती-समाजक्रांतीसाठीही शिक्षणासारखे दुसरे माध्यम नाही, अशी त्यांची खात्री झाली.

म. फुल्यांचा पाईक बनून दुधगाव येथे शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना केली. पुढे १९१९ मध्ये कराड तालुक्यातील वाले या गावी 'रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. एकूणच शिक्षणासाठी सर्व जीवन वाहून जनसामान्याच्या मुलांसाठी अतोनात कष्ट भाऊरावांनी घेतले. या त्यांच्या शैक्षणिक कार्यात त्यांची पत्नी लक्ष्मीबाईंचा हातभार फार मोठा हाता, कमवा आणि शिका' हा कर्मवीरांचा शिक्षणापाठीमागचा मूलमंत्र तर रयतेला पटवून देण्यासाठी ती स्वावलंबी शिक्षणाची कल्पना प्रत्यक्षात ते जगले. बहुजन समाजाला ज्ञानाची संजीवनी देऊन गरिबांच्या झोपडीपर्यंत ज्ञानगंगा पोहोचण्याचे व्रत त्‍यांनी आयुष्यभर पाळले.

'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।' गीतेतील या महान संदेशानुसार कर्मावर त्यांचा गाढा विश्वास होता, कोणतेही काम किंवा श्रम हे हलके नसते. काम म्हणजे ईश्वर त्याच श्रमाला प्रतिष्ठा देण्याचे कार्य, पावित्र्य देण्याचे काम, स्वावलंबनाचा आनंद लुटू देण्याचे महान श्रेय कर्मवीरांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानातून दिसून येते.
रयतेच्या शिक्षणाबरोबरच समाजपरिवर्तनही घडवून आणण्याचा वारसा कर्मवीरांनी म. फुले, शाहू महाराज विठ्ठल रामजी शिंदे, संत गाडगेमहाराज यांच्यापासून घेतला होता. 

शिक्षणाच्या गंगोत्रीतून दारिद्रय, अंधश्रद्धा, लोकभ्रम, अज्ञान अशा अनेक महासंकटातून सुटण्यासाठी अनेक समाजोद्धारक उपक्रम राबविले. एक कर्तव्यनिष्ठ शिक्षक हाच संपूर्ण समाज बदलू शकतो. लहान मुले हीच देशाचे भविष्य घडविणारे असतात. तेव्हा शिक्षणातून देशप्रेम, स्वावलंबन, अन्यायाची चीड, श्रमाची प्रतिष्ठा अशा सद्गुणांते बाळकडू जर त्यांना पाजले गेले तर निश्चित देशाचा विकास हा घडेल. शिक्षण हेच माणसाच्या पर्यायाने देशाच्या विकासाचे मूळ आहे, हीच त्यांची पक्की विचारसरणी होती.


कर्मवीरांच्या कार्याचा प्रसार, त्यांच्या कार्याची पाऊले,खुणा, त्यांच्या स्मृती आठवणी म्हणून सांगलीतील 'दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ' नावाची मोठी संस्था, साताऱ्यातील 'छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस' तर बोधचिन्ह वटवृक्षा' सह आजही दिमाखात उभे आहे. वसतिगृहातून भेदभाव नष्ट करणे, अस्पृश्यांना न्याय मिळवून देणे, सामाजिक समता प्रस्थापित करणे, सर्व जाती-धर्माचे सर्व थरातील विद्यार्थी एकत्र राहणार... त्यांचा समन्वय घडवून आणणार. या त्यांच्या असामान्य कार्याची सर्वांनी मुक्तकंठाने स्तुती केली.

या महापुरुषाचे महानिर्वाण १९५९ झाले. परंतु मित्रहो, संपूर्ण महाराष्ट्रभर अनेकानेक, प्राथमिक, पूर्व प्राथमिक, माध्यमिक, अध्यापन विद्यालये, महाविद्यालये, वसतिगृह, कार्यालये आणि इतर अनेक शिक्षण संस्था आज कर्मवीरांच्या त्या विशाल वटवृक्षाखाली गुण्यागोविंदाने नांदत आहेत, त्या अमर आहेत.
आपण सामान्यांनी या महापुरुषाचे किती सन्मान करायचे ? अनेक सामाजिक संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे. भारत सरकारने पद्मभूषण हा किताब देऊन सर्वोच्च सन्मान केला आहे.

महाराष्ट्राचा 'बुकर टी. वॉशिंग्टन' या नावाने त्यांना ओळखतात. यशवंतराव चव्हाण त्यांच्याविषयी म्हणतात, 'कर्मवीर' हीच महान संस्था, बहुजन समाजाचा ज्ञानप्रकाश, रयत शिक्षण संस्था ही शिक्षणाची गंगोत्री आहे.
मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

karmaveer bhaurao patil essay in marathi | कर्मवीर भाऊराव पाटील मराठी निबंध


Maza avadta lekhak marathi nibandh | माझा आवडता लेखक मराठी निबंध

निबंध 1 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  माझा आवडता लेखक  मराठी निबंध बघणार आहोत. आपण भरपुर पुस्‍तके वाचत असतो पण त्‍यातील काही निवडकच लेखक आपले आवडते असतात. माझे आवडते लेखक आहेत पु. ल.  देशपांंडे कारण त्‍यांचे लिखाण इतके आनंददायी आहे की तुम्‍ही पुर्ण पुस्‍तक वाचल्‍याशिवाय राहणार नाही.  

मुद्दे :

  • पु. ल. देशपांडे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व
  • लहान मुलांसाठी लेखन
  • विनोदी लेखन
  • व्यक्तिचित्रे
  • अनेक नाटके
  • प्रवासवर्णने
  • अनेकांच्या पुस्तकांना प्रस्तावना
  • माणुसकी गौरवणारा,
  • माणुसकीचा गहिवर असलेला एक अलौकिक व्यक्तिमत्त्वाचा माणूस व अष्टपैलू लेखक


पु. ल. देशपांडे यांची अनेक पुस्तके माझ्या संग्रही आहेत. ही पुस्तके कितीही वेळा वाचली तरी त्यांची गोडी कमी होत नाही. कारण पु. ल. देशपांडे हे माझे आवडते लेखक आहेत. माझेच का? पु. ल. हे साऱ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व आहे.

अगदी सुरुवातीला माझ्या वाचनात आले पु. लं.चे 'खोगीरभरती' आणि 'नस्ती उठाठेव' हे विनोदी लेखसंग्रह. हा काहीतरी वेगळाच लेखक आहे,या पुस्तकांबरोबर मोठे होत असतानाच मला कळलं की ज्या 'नाच रे मोरा' या गाण्यावर आपण नाचलो, त्या गाण्याची चाल पु. लं.नी दिलेली आहे.

maza-avadta-lekhak-nibandh
maza-avadta-lekhak-nibandh


 नंतर वाचनात आली पु. लं.ची 'व्यक्ती आणि वल्ली' आणि 'गणगोत' ही पुस्तके. तेव्हा लक्षात आले की, हा लेखक केवळ विनोदीच लिहीत नाही, तर हा उत्कृष्ट व्यक्तिचित्रेही रेखाटतो. कारुण्याची झालर असलेले विनोदही जागोजागी आढळतात. त्यांचा विनोद हसवता हसवता अंतर्मुख करून जातो.

पु. लं.ची 'तुझे आहे तुजपाशी', 'अंमलदार', 'ती फुलराणी...' ही नाटके पाहिली; पण 'बटाट्याची चाळ', 'वाऱ्यावरची वरात', 'असा मी असामी' हे एकपात्री प्रयोगपाहायची संधी मला मिळाली नाही. मग त्या पुस्तकांची पारायणे केली; ध्वनिफिती ऐकल्या. बटाट्याच्या चाळी 'ला जोडलेले 'एक चिंतन' हे पु. लं.च्या विनोदाचे खास उदाहरण म्हणून सांगता येईल. पु. लं.ची पुस्तके बाजूला ठेवली, तरी त्यांच्या चितळे मास्तरांच्या झिजलेल्या चपला वा त्यांच्या नारायणची नारायणगिरी' विसरता येत नाही.

पु. लं.नी खूप प्रवास केला आणि तो अत्यंत मिस्कील, खुसखुशीत भाषेत शब्दरूपांतही आणला. अपूर्वाई, पूर्वरंग, वंगदेश ही त्यांची पुस्तके म्हणजे मराठी साहित्यातील अजरामर प्रवासवर्णने आहेत. पु. लं.नी अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या. त्या छोट्याशा प्रस्तावनाही आपल्याला एखादा मौल्यवान विचार देऊन जातात. पु. ल. एके ठिकाणी लिहितात, "हास्य हे माणसा-माणसांच्या मनात निर्भयता निर्माण करणारे मोठे साधन आहे. हास्य आणि सहानुभूती या दोन गोष्टी देऊन निसर्गाने माणसाला माणूसपण दिले आहे. खळाळून हसणाऱ्या मोठ्या समुदायातून या माणुसकीचे सर्वांत प्रभावी दर्शन होते."

आज पु. ल. आपल्यात नाहीत; पण माणुसकी गौरवणारा हा महाराष्ट्राचा महान अष्टपैलू लेखक माझा आवडता लेखक आहे. 

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व पु. ल. देशपांडे यांची कोणती पुस्‍तके तुम्‍ही वाचली  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

निबंध 2

माझा आवडता लेखक पु ल देशपांडे मराठी निबंध

माझे आवडते लेखक आहेत पु. ल. देशपांंडे कारण पु.ल. आनंदात जगले, विविध कलांच्या क्षेत्रांत ते लीलया वावरले. विशेष म्हणजे पु.लं.ना जो जो आनंद गवसला, जेथे जेथे आनंद मिळाला, तो त्यांनी सर्वांसाठी मुक्तपणे उधळला. आपल्या एका मुलाखतीत पु.ल. म्हणाले होते, 'मला जेव्हा जेव्हा काही चांगले दिसते, आवडते तेव्हा तेव्हा ते दुसऱ्याला सांगण्यासाठी मी उत्सुक असतो, आतुर असतो.' म्हणून पु.ल. हे केवळ शब्दार्थी आनंदयात्री नव्हते, तर ते खरोखरीचा आनंद उधळणारे 'आनंददात्री' होते. 

पु.लं.नी मराठी माणसाला काय दिले, असा प्रश्न विचारण्याऐवजी पु.लं.नी मराठी माणसाला काय दिले नाही? असेच विचारावे लागेल. अशा या अष्टपैलू कलावंताचा जन्म १९१९ साली झाला. त्यांचे शिक्षण मुंबई व पुणे येथे एम्.ए.,एल्.एल्.बी. पर्यंत झाले. त्यांनी संस्कृत व बंगाली या भाषांचा परिश्रमपूर्वक अभ्यास केला. त्यांनी लिपिक, शिक्षक, प्राध्यापक अशा विविध स्तरांवर नोकऱ्या केल्या. आकाशवाणीवर नाट्यविभागप्रमुख म्हणून काम केले. दिल्ली दूरदर्शनवरील कार्यक्रमांचे ते पहिले निर्माते होते.

पु.लं.जवळ असामान्य निरीक्षणशक्ती होती. त्यांच्या लहानपणी घरी आलेल्या पाहुण्याचे अचूक निरीक्षण करून आपला हा बाळ काही जगावेगळे बोलणार नाही ना, अशी भीती त्यांच्या आईला वाटे. पण याच निरीक्षणशक्तीतून पु.लं.च्या 'व्यक्ती आणि वल्ली' साकार झाल्या. 'गणगोता 'तील आप्तजन चिरंजीव झाले. पु.लं.च्या लेखनाचे वैशिष्ट्य असे की, अनेकदा वाचून, पाहून वाचकांनाही ती सारी माणसे आपलीच, जवळचीच वाटू लागली. 'बटाट्याची चाळ' या पु.लं.च्या पुस्तकातील प्रत्येक माणूस आपल्यापरीने वेगळा आहे.

पु.लं.नी भरपूर प्रवास केला आणि 'अपूर्वाई' , 'पूर्वरंग' आणि 'वंगदेश' अशा पुस्तकांतून तो वाचकांपुढे मांडला. युरोपातील 'कापी' बेटावरील निळाईच्या सौंदर्याने पु.लं.चे अंत:करण भरून आले आणि त्यांना आठवला ज्ञानेश्वरांनी वर्णिलेला 'कोटिचंद्रप्रकाश'.

पु.लं.चे चित्रपट, नाटके, एकपात्री प्रयोग सारेच लोकांनी डोक्यावर घेतले. त्यांतल्या संवादांनी, गाण्यांनी, अभिनयाने आणि दिग्दर्शनाने रसिकांना अमाप आनंद दिला. पु.लं.चा विनोद हा अभिजात होता. कुणालाही न दुखावणारा, कुणाच्याही व्यंगावर बोट न ठेवणारा. शब्दाशब्दांवर ते लीलया कोट्या करत. त्यांचे 'कोट्यधीश' हे पुस्तक वाचकाला कोणत्याही परिस्थितीत खुलवते.

पु.ल. स्वतः मूलतः कविमनाचे होते, संगीतकार होते. त्यांचे 'नाच रे मोरा' हे गाणे ऐकल्यावर प्रत्येक मराठी बालकाचे बालपण सुखावून जाते. पु.ल. आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाई हे दोघेही काव्यवेडे. स्वानंदासाठी ते नेहमीच कविता वाचत, म्हणत. त्यांना शेकडोंनी कविता पाठ होत्या. पण त्यांच्या मनात आले, हा आनंद आपण इतरांपर्यंत पोहोचवला तर... आणि मग भाईंनी आणि सुनीताताईंनी कविवर्य बोरकर, मढेकर आणि आरती प्रभूच्या कवितांच्या वाचनाचे जाहीर कार्यक्रम केले. स्वत:ला मिळालेला आनंद हजारो श्रोत्यांवर उधळून दिला.

पु.लं.च्या बाबतीत म्हणावे लागते की, 'देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी आमुची झोळी'.कोठे कोणी चांगले काम करत आहे, पैशासाठी काम अडले आहे असे कळले की, पु.लं.चा मदतीचा हात तेथे पोहोचत असे. कुणा एका आडवळणाच्या गावी एक प्राचार्य आपल्या महाविदयालयासाठी धडपडत आहे, हे कळल्यावर पु.ल. फाऊंडेशन तेथे मदतीला गेले. 

रक्तपेढ्या, रुग्णालये, मुक्तांगण, शैक्षणिक संस्था... साऱ्यांना भरभरून मदत पोहोचली. कुणी तरुण तज्ज्ञ डॉक्टरीण, व्यसनाधीनांना व्यसनांपासून मुक्त करण्यासाठी धडपडत आहे, असे कळल्यावर हा थोर दाता तेथेही पोहोचला. मग सांगा, पु.ल. हे खरोखरच एक आगळेवेगळे आनंदयात्री नव्हते का?

 
निबंध 3


माझा आवडता साहित्यिक मराठी निबंध

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे महान विनोदाचार्य प्र.के. अत्रे म्हणत असत, 'लता मंगेशकर आणि पु.लं. देशपांडे हे महाराष्ट्रातले दोन चमत्कार आहेत. ही तेजाने तेजाची केलेली आरती आहे. खरोखर, 'चमत्कार' या शब्दाव्यतिरिक्त पु.लंचं वर्णन करताच येणार नाही.


 अवघं साहित्यविश्व त्यांचा 'महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व' असा उल्लेख करतं. 'लाडकं' हे वात्सल्याच्या विश्वातलं विशेषण दुसऱ्या कोणाला लावता येईल असं वाटत नाही. ते हरहुन्नरी होते आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक चमकदार पैलू होते. म्हणूनच असं म्हणावंसं वाटतं की 'याच्या आधी असं व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रात झालं नाही आणि पुढे कधी होईल असं वाटत नाही.'



 अशी माणसं शतकात किंवा हजार वर्षात एखादवेळच जन्माला येतात. धन्य त्यांचे आई-वडील. त्यांच्या आई-वडिलांनी जेव्हा त्यांचं नाव 'पुरुषोत्तम' असं ठेवलं, तेव्हा त्यांना यत्किंचितही कल्पना आली नसेल की हे मूल जेव्हा 'पुरुष' होईल तेव्हा ते अनेक क्षेत्रात 'उत्तम' ठरेल. देव माणसाला केव्हा केव्हा चकवतो, तो असा.
पु.लं. ना काही येत नव्हतं असं नाहीच. ते उत्कृष्ट विनोदी (आणि गंभीरही) लेखक होते. नाटककार आणि नटही. गीतकार आणि संगीतकारही, गायक आणि वादकही, कथालेखक व कथाकथक, वक्तृत्वही, कर्तृत्वही.


एखाद्याला वाटेल त्यांना नृत्यकला अवगत नसावी. पण ज्यांनी त्यांचे 'गुळाचा गणपती' सारखे चित्रपट, 'वाऱ्यावरची वरात' यासारखं प्रहसन किंवा 'सुंदर मी होणार' यासारखं नाटक पाहिलं असेल, त्यांना कळून येईल की नृत्याच्या क्षेत्राचेही ते चांगले जाणकार होते. ते साहित्यातले सिकंदर होते, जिंकायला आता क्षेत्रच राहिलं नाही म्हणून खंतावणारे. ज्या क्षेत्रात ते गेले, त्या क्षेत्रातले ते सम्राट झाले. त्या क्षेत्रावर त्यांनी अधिराज्य गाजविले. 



साम्राज्य तर असं स्थापलं की त्यांच्या साम्राज्यावर सूर्य कधी मावळला नाही आणि कधी मावळणारही नाही.
पद्य विडंबनावर आचार्य अत्रे यांनी आपली मोहोर उमटवली आहे, तर गद्य विडंबनावर पु. लं. नी आपला ठसा उमटवला आहे. त्याचे 'व्यवच्छेदक लक्षण' व 'सहानुभावांचे वाङ्मय' बटाट्याच्या चाळीतलं 'एक चिंतन' असे लेख मराठीत कधी लिहिलेच गेले नाहीत. यातलं विडंबन विशेष. 


त्याच्या अगोदर व्यंकटेश माडगूळकरांनी अप्रतिम व्यक्तिचित्रं रेखाटली. पण माडगूळकरांची व्यक्तिचित्रे आणि पु.लंची व्यक्तिचित्रे यात खूप फरक आहे. असं म्हणता येईल की माडगूळकरांच्या 'व्यक्ती' आहेत तर पु.लंच्या 'वल्ली' आहेत. पु.लंच्या लिखाणाचं वैशिष्ट्य असं की ते एखाद्याची टिंगल - टवाळी करतात. खट्याळपणे त्याच्यावर लिहून आपल्याला हसवतात. पण मग शेवटी अगदी गंभीर होतात. काळजाचा ठाव घेणारं असं काहीतरी लिहून जातात.


'तुझं आहे तुजपाशी' मधील आचार्य घ्या. सबंध नाटकभर आपण त्यांना हसत असतो. पण पु.लं. शेवटी त्यांच्या तोंडी असं एक भाषण घालतात की, आपल्याला आचार्यांची कीव यायला लागते. त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटायला लागते. वाटतं, अरेरे, आपण या स्फटिकासारख्या स्वच्छ आणि प्रामाणिक माणसाला उगाच हसलो.
त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल, त्यांनी इतकं विनोदी लेखन केलं, पण कुठेही

आचरटपणा नाही आजची व्यासपीठावरची आणि दूरदर्शनची विनोदी नाटके म्हणजे शुध्द आचरटपणा. हल्ली विनोद म्हणजे विदूषकी चाळे. विनोद म्हणजे आचरटपणा  असं समीकरण झालेलं आहे. म्हणूनच खुद्द पु.लंच दूरदर्शनला 'दुर्दशन' असं म्हणत असत. त्यांनी हयात व मृत व्यक्तीची कधी कुचाळकी केली नाही किवा
कुणाच्या वर्मी झोंबेल असं काही लिहिलं नाही. ते मांगल्याचे, सौंदर्याचे पुजारी होते. म्हणून । त्यांना सगळं काही सुंदर आणि मंगल वाटे. 


एकपात्री प्रयोग करावा, तर पु.लं.नीच. एकनाथांनी | लिहून ठेवलंय की ज्ञानेश्वरापाठी कोणीही महाटी ओवी करू नये. मला सुध्दा असंच वाटतं की | पु.लं. नंतर कोणीही एकपात्री प्रयोग करू नयेत. त्यांनी विनोदाची पातळी तर इतकी उंचावून | ठेवलीय की त्या पातळीपर्यंत फारच थोडे लोक येऊ शकतील.  पु.लं. गेले आणि त्यांच्याबरोबर | असं काही गेलंय की जे महाराष्ट्र परत कधीच पाहू शकणार नाही.

निबंध 4

 majha avadta lekhak in marathi essay


मला लहानपणापासून वाचनाची आवड. लहानपणी पंचतंत्र, इसापनीती, अद्भुत कथा आवडायच्या. हळूहळू वाचनकक्षा रुंदावत गेल्या. सानेगुरुजींची ‘गोड गोष्टी', 'श्यामची आई' पुस्तके वाचली आणि साने गुरुजी आवडू लागले. नंतर मात्र मी ललित साहित्य वाचू लागले. त्यात ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, अनंत काणेकर, चिं. वि. जोशी, रणजीत देसाई, प्र. के. अत्रे यांची पुस्तके वाचू लागले. पण सर्वात प्रभाव पडला, तो पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याचा.



 त्यामुळे पु. ल. देशपांडे माझे आवडते लेखक बनले. मग अर्थातच पुलंची पुस्तके वाचण्याचा मी सपाटा चालविला. पु. ल. देशपांडे म्हणजेच पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचा एक प्रदीर्घ कालखंडच! साहित्य, नाट्य, संगीत, चित्रपट, एकपात्री प्रयोग, संस्कृती अशा जीवनाच्या सर्वांगांना स्पर्श करणारे. असे एकही क्षेत्र नाही, की जिथे पुलंचा परिसस्पर्श झालेला नाही. आयुष्य मी सुटी' समजून घालविली, असे म्हणणारे पु. ल. खरोखरीच आनंदयात्री होते. 




लेखकाचे अंतरंग त्यांच्या साहित्यात डोकावते. त्यांचे म्हणणे होते की, “जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्यामध्ये पकडून नियतीने चालविलेली आपणा साऱ्यांची फसवणूक एकदा लक्षात आली, की त्यातून सुटायला आपली आणि आपलकीने भोवताली जमणाऱ्या माणसांची हसवणूक करण्यापलीकडे आणखी काय करायचं? त्यामुळेच त्यांची भाषाशैली अत्यंत खेळकर होती. कोणतेही तत्त्वज्ञान हसत-खेळत सांगण्याची त्यांची शैली कोणाही वाचकाला भुरळ न पाडेल, तरच नवल!




संगीत आणि नाटक हे पुलंच्या संपन्न कलाजीवनाचे खास विशेष. तुझे आहे तुजपाशी, ती फुलराणी, सुंदर मी होणार, अंमलदार, एक झुंज वाऱ्याशी, बटाट्याची चाळ, पुढारी पाहिजे, वयम् मोठम् खोटम् इ. नाटकांद्वारे पुलंनी जो विषय हाताळला, किंबहुना ज्या विषयाला स्पर्श केला, त्याचे सोने झाल्याशिवाय राहिले नाही. संवादात सहजता, खेळकरपणा, सुबोधता, मोहकता असल्याने त्याची वाचकांवर, ती नाटके पाहणाऱ्या प्रेक्षकांवर जादू झालीच पाहिजे.



पु.लं च्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा त्यांच्या प्रत्येक पुस्तकातील प्रत्येक पानावर, प्रत्येक ओळीवर दिसून येतो. त्यांची पुस्तके म्हणजे मोठे मासे छोटे मासे, अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्याच्या देशा, नसती उठाठेव. गोळाबेरीज, खिल्ली, आम्ही लटिके न बोलू, तीन पैशांचा तमाशा, गुण गाईन आवडी, व्यक्ति आणि वल्ली', एवढी ग्रंथसंपदा त्यांनी आपल्या मराठी रसिकांसाठी निर्माण केली. वाचकांना आपल्या विनोदी शैलीने सतत हसवत ठेवले. 



त्यामुळेच त्यांना कोट्याधीश पुल म्हणत. शाब्दिक कोट्या करणे वाटते तेवढे सोपे नाही. त्यासाठी हजरजबाबीपणा, शब्दांची समृद्धता हवी. ती पुलंच्याकडे विपुल प्रमाणात होती. एक उदाहरण सांगते. पं. भीमसेन जोशी सवाई गंधर्वांचे शिष्य. विमानातून प्रवास केल्याशिवाय त्यांचा एकही दिवस जात नसे. त्यावर पु.ल. म्हणाले, “सवाई गंधर्वांचा शिष्य हवाई गंधर्वच आहे." ही झाली समयसूचकता!




'व्यक्ति आणि वल्ली'मधील व्यक्तिरेखा वाचताना त्या प्रत्यक्ष डोळ्यांपुढे साकारतात. त्यातील व्यक्ती त्यांच्या खास वैशिष्ट्यांनिशी साकारतात; जिवंत होतात. त्यातील प्रत्येक पात्र समाजात कोठेतरी आढळते; पण अशा व्यक्तींचे यथार्थ चित्रण करणे प्रत्येकाला जमत नाही. अशा व्यक्तिरेखा साकारताना निरीक्षण हवे, त्यांच्या लकबी टिपल्या पाहिजेत. तसेच, त्यांची विशिष्ट भाषादेखील शब्दांत मांडता आली पाहिजे, तरच ती व्यक्तिरेखा जिवंत होते आणि ती आपल्या मनात घर करून राहते. 



नारायण, चितळे मास्तर, नाथा कामत, रावसाहेब, पानवाला, सखाराम गटणे सर्वच पात्रे लक्षात राहतात, ती लेखनशैलीमुळे आणि समर्पक शब्दांच्या योजनेमुळेच ना! अशा प्रकारे वाङ्मयीन प्रतिष्ठा लाभलेले दर्जेदार साहित्य, विविध वाङ्मय-प्रकार हाताळणारा हा लेखक सर्वांनाच आवडतो. मग मीच त्याला अपवाद कसा असेन ?


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

Maza avadta lekhak marathi nibandh | माझा आवडता लेखक मराठी निबंध

maze ajoba marathi nibandh | माझे आजोबा मराठी निबंध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझे आजोबा मराठी निबंध बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. आजोबा या शब्‍दाबरोबर आठवण येतात, ते आपल्‍यावर प्रेम करणारे व आपले सर्व लाड व  हट्ट पुरवणारे आपले आजोबा. लहानपणीचे ते आनंदीदायी क्षण आजही आनंद देऊन जातात, अश्‍याच एका प्रसंगाचे वर्णन निबंधात केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

आज आमच्याकडे एक छोटासा घरगुती समारंभ झाला. माझे सर्व काका, आत्या, कुटुंबातील लहानथोर सर्व मंडळी एकत्र जमली होती. आम्ही आमच्या आजोबांचा ऐंशीवा वाढदिवस साजरा केला. गेले सात-आठ दिवस आमची अगदी गुप्त तयारी चालली होती. आम्हांला आजोबांना काही कळू दयायचे नव्हते.

maze-ajoba-marathi-nibandh
maze-ajoba-marathi-nibandh

 पण शेवटी आजोबांनीच आम्हांला धक्का दिला. जेवण झाल्यावर त्यांनी सर्वांसाठी उत्कृष्ट आंबा आइस्क्रीम मागवले होते आणि समारंभाला उपस्थित असलेल्या प्रत्येकाला त्यांनी एकेक भेटवस्तु दिली आणि ती भेटवस्तू देताना त्यांनी प्रत्येक व्यक्तीचे वैशिष्ट्य, तिचे छंद, तिच्या आवडी लक्षात घेतल्या होत्या. त्यामुळे खूपच मजा आली.
 
माझे आजोबा सदा प्रसन्न आणि तृप्त असतात. आजोबांच्या या आनंदी, आशावादी वृत्तीमागे आहे त्यांची तंदुरुस्ती ! त्यांचे वागणे अतिशय नियमबद्ध  आहे. काहीही झाले तरी त्यांचे पहाटे फिरायला जाणे कधी चुकत नाही. त्यांनी एक 'पेन्शनरांचा क्लब' स्थापन केला आहे. ही वृद्ध मंडळी एकमेकांचे वाढदिवस साजरे करतात, सहलीला जातात. अशा प्रसंगी आजोबा आपल्या दोस्तांसाठी आजीला कुरकुरीत चकल्या करायला सांगतात.

आजोबांना आमच्या आजीविषयी विशेष अभिमान आहे. आजोबा सरकारी कचेरीत मोठ्या हुद्द्यावर होते आणि तेथे अगदी उच्च पदावरून ते सन्मानाने निवृत्त झाले. त्याचे श्रेयही ते आमच्या आजीला देतात; कारण त्यांच्या मते, घराच्या आघाडीवर त्यांना कधीही लक्ष घालावे लागले नाही. आमच्या आजीमुळेच आपले घर 'आदर्श' राहिले, असे ते मानतात.  

आजही आजोबा घरात असूनही सर्वांपासून अलिप्त राहतात. कुणाच्याही कुठल्याही निर्णयात ते ढवळाढवळ करत नाहीत. पण आम्ही एखादी शंका विचारली, तर ते त्याचे खुलासेवार निरसन करतात. उत्तम आरोग्य, स्वच्छ विचारसरणी आणि सतत उदयोगात रमलेले आजोबा अगदी ऐंशीव्या वर्षीही तेज:पुंज वाटतात. आपल्या वार्धक्यातही त्यांनी आपल्या 'युवा' मनाला जपले आहे, म्हणून ते सदा आनंदी राहू शकतात. 'कर्ते व्हा. कार्यरत राहा' हा त्यांचा आम्हांला सदैव उपदेश असतो.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व  तुमच्‍या आजोंबासोबत असलेल्‍या गमतीदार आठवणी तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद.  पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

महत्‍वाचे मुद्दे : 

(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. ) 

  • व्यक्तिमत्त्व वर्णन
  • वय, पोशाख, काही सवयी
  • स्वभाव- एखादा प्रसंग
  • घरात असून अलिप्त
  • परंतु घरातील एक 
  • वय मोठे; पण मन तरुण 
  • कर्तबगारी
  • कर्तव्यदक्ष 
  • शिकवण

टीप : वरील निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते
  • My (majhe) Grandfather Essay in Marathi language


 निबंध 2 

maze ajoba marathi nibandh | माझे आजोबा मराठी निबंध


आज मी दोन दिवसांची रजा घेऊन आजोबांना भेटायला आलो आहे. बसमधून उतरल्याबरोबर माझी पावले फारच जलद पडू लागली आहेत. डोळे कौलारू घराचे छप्पर शोधताहेत. गेली पंधरा वर्षे असाच धावत धावत मी माझ्या आजोळी येत आहे.

कधी 'मे' महिन्याची सुटी लागते व कधी कोकणात जातो, असे मला व्हायचे. मुंबईहन कोकणात मला न्यायला पूर्वी आजोबाच यायचे. पुढे मोठी झाल्यावर आम्ही नातवंडे एकटी यायला लागलो. पण कोकणात आल्यावर बसमधून उतरताक्षणीच आजोबांचे शद्र कानावर पडायचे, आलात बाळांनो, या.' या वात्सल्यपूर्ण शब्दांनी आमचं स्वागत व्हायचं व प्रवासाचा सर्व शीण जायचा!


आमचं कोकणातील घर नारळी पोफळींच्या गर्द छायेत झाकून गेलं होतं. परंतु आजोबांचा सहवास जास्त शीतल वाटायचा. आजोबांना कधीच रागावलेलं मी पाहिलं नाही. एखादी मनाविरुद्ध गोष्ट झाल्यास ते फक्त 'गोविंद! गोविंद!' म्हणायचे.


नातवंडांशी बोलताना, गोठ्यातल्या जनावरांशी बोलताना किंवा शेतातील गड्यांशी बोलताना त्यांचा स्वर नेहमीच शांत व प्रेमळ असायचा. आजोबा कधीच रिकामे बसायचे नाहीत. त्यांचा निम्मा वेळ शेतात व गोठ्यातच जायचा. शेतात ते गड्यांच्या बरोबरीनं काम करायचे. 


गोठा तर इतका स्वच्छ ठेवत की, घरातच जनावरं बांधलीत की काय असे वाटावे! संध्याकाळी घरात आल्यावरही हातानं बारीक-सारीक काम चालूच. त्यांना कोठे एवढासाही केर पडलेला खपत नसे. वर्तमानपत्रं, पुस्तकं, औषधे कशी व्यवस्थित लावून ठेवलेली. त्यांच्या सर्व वस्तू जिथल्या तिथे; अंधारातही अचूक सापडणाऱ्या!


संध्याकाळी त्यांच्या मुखातून देवाची स्तोत्रं एकामागून एक बाहेर पडत असत. आम्हा नातवंडांनाही स्तोत्र शिकवणं हे त्यांचं आवडतं काम. ते आम्हाला गोष्टीही सांगायचे. पण अभ्यास शिकवणं, श्लोक शिकवणं त्यांना जास्त आवडायचं. 

आजही जुन्या कवितांचं, स्तोत्रांचं, श्लोकांचं धन माझ्याजवळ आहे ते आजोबांच्यामुळेच. आजीचे व त्यांचे नेहमी भांडण व्हायचे कारण त्यांच्या स्वभावातला दोष म्हणजे दातृत्वाचा अतिरेक. गड्यांना आंबे, सुपाऱ्या, नारळ न मागता मुक्तहस्ताने ते देत. 


आला गेला पै-पाहुणा पिशव्या भरभरून माल घेऊन जाई. एखादा मित्र बरोबर घेतल्याशिवाय ते कधी जेवलेच नाहीत. त्यामुळे ते सदैव समाधानी असत. जेवण तरी काय? साधा आमटी-भात असला तरी चालेल पण तो रुचकर असला पाहिजे. पाट-पाणी, वाढप सर्वच त्यांना व्यवस्थित लागायचं. 

पण परवा शेतातून परत येताना बांधावरून पाय घसरून ते पडले. पाय दुखावला. त्यांना वाटलं, आपली अखेरच जवळ आली. त्यामुळे कोणताही उपाय न करता त्यांनी शेवटचं भेटायला बोलावलं, म्हणून मी धावत-पळत आलो आहे. आजोबांना मुंबईला नेऊन मला बरं करायचं आहे. आजोबांचा प्रेमळ सहवास मला अजून हवा आहे; अजून हवा आहे ! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद



maze ajoba marathi nibandh | माझे आजोबा मराठी निबंध

Maza avadata rutu essay in marathi language | माझा आवडता ऋतू मराठी निबंध 


माझा आवडता ऋतु पावसाळा मराठी | maza avadata rutu pavsala essay in marathi

ग्रीष्म ऋतू म्हणजे सर्व निर्जीव-सजीव वस्तू आणि प्राणिमात्रांना होरपळून काढणारा ऋतू... न्हाळा म्हणजेच ग्रीष्म मानवाला नकोनकोसे करून सोडतो. सारी जीवनसृष्टी हवालदिल होऊन जाते. 'पुरे-पुरे आता तो उन्हाळा !' असा आक्रोश करू लागतात. आणि तेवढ्यात कोठे तरी एखादा काळा ढग दिसू लागतो.

चातकाप्रमाणे आतुर झालेला मानव त्याला न्याहाळू लागतो. एकाएकी एकमेकांवर ढग आपटू लागतात, त्या तालावर मोर नाचू लागतात, बेधुंदपणे वारा वाहू लागतो. आकाशातून टपोरे थेंब पृथ्वीवर पडू लागतात. धरित्री तर केव्हाची तहानलेली असते. भराभरा ते पाणी अधाश्याप्रमाणे पिऊन टाकते. तिची तहान भागते, ती वसुंंधरा आनंदाने पुलकित होऊन...


सगळीकडे आपल्या जवळचा सुगंध पसरवून टाकते. मग तर मोर बेहोष होऊन नाचू लागतात. गुरे, ढोरे शेपट्या उंचावून धावत सुटतात. बेडकांच्या तर 'डराँव डराँव'ने सारा आसमंत भरून जातो आणि 'वर्षा ऋतू'चे आगमन मोठ्या उत्साहात या पृथ्वीतलावर होते.


खरोखरीच या चराचरसृष्टीला मिळालेली अनमोल भेट म्हणजे हा 'वर्षा ऋतू' होय. 'नवचैतन्य' घेऊन येतो हा वर्षा ऋतू. कालपर्यंत उजाड-खडकाळ माळरान तापलेला, तो दोन-तीन दिवसात हिरवागार होऊन जातो. या हिरव्या रंगांच्या छटा तरी किती हो ! हिरवा कंच... काळपट हिरवा... पोपटी हिरवा... हिरवागार हिरवा... अशा विविध रंगात रोपटी वाढतात.


शेते बहरतात. झाडे फळे-फुले-पाने यांनी बहरून जातात. मानवाला आपले सारे वैभव देण्यास आनंदाने डुलू लागतात, नम्र होतात. मक्याची-ज्वारीची-गव्हाची ताटे, लोंब्या वाऱ्यावर डोलु लागतात. कळ्या उमलू लागतात, फुले हसू लागतात अन् हिरव्यागार शालूवर पाण्याचे मोती चमकू लागतात.

ग्रीष्मात आटून गेलेल्या नद्या-नाले-ओढे आता दुथडी भरून वाहू लागतात. त्यामधील दगड-धोंडे-गोटे-खडक एकदम स्वच्छ धुऊन जाऊन चमकायला लागतात. नद्यांची पात्रे अथांगपणे भरधाव वाहु लागतात. असा हा जीवनदायी 'पावसाळा'. मानवी जीवनाला समृद्ध करून टाकतो.

Maza-avadata-rutu-essay-marathi-language
Maza-avadata-rutu-essay-marathi-languageAdd caption

कोठेही नजर टाका, हिरवा मांगल्याचा, सूचक समृद्धीचा प्रतिक, डोळे अन् आत्मामन तृप्त करणारा हा वर्षा ऋतू म्हणूनच सर्वांना हवाहवासा वाटतो. ना ग्रीष्माचा दाह ना शिशिरातील थंडीचा कडाका.. सगळा कसा सात्त्विक... सौम्य स्वभावाचा आल्हाददायी हा ऋतू. आषाढातील वर्षाचे आगमन...


याच आषाढात... संपूर्ण वर्षा ऋतूचा आनंद घेण्यासाठी वारकऱ्यांची लाट येते... 'ग्यानबा तुकाराम'च्या जयघोषात वारकरी चिंब भिजून जातात. पण उत्साहात नाचत राहतात.

शेतकरी या पावसाच्या धारामध्ये आपल्या घामाच्या...कष्टाच्या धाराही मिसळतो अन् मग काय ? आनंदच आनंद. धरित्री भरभरून पीक देते. शेतकरीच नव्हे तर सर्व प्राणिमात्र आनंदीत होतात.

तसा पाहिला तर 'वर्षा ऋतू', 'वसंत ऋतू'च्या पुढे उपेक्षिला जातो. परंतु त्या 'वसंत ऋतूच्या क्षणिक सुखापुढे या 'वर्षा'चा उदात्तपणा. उदारपणा केवढा महान असतो. खरोखरीच वर्षा ऋतू सृष्टीचे 'सौभाग्य' आहे. ती मानवी जीवनाची 'गंगोत्री' आहे. मानवाला मिळालेले 'महान वरदान' आहे.

मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला  हे  तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद .


Maza avadata rutu marathi nibandh


निबंध 2



घरामध्ये महिलामंडळच भरलं होतं. सर्वांजवळ पोळपाट लाटणी होती, म्हटलं , “ मोर्चा आहे की काय ? " म्हणून आईला विचारलं तर, " अरे, पावसाळा आला ना तोंडावर ! वर्षाचे पापड, लोणची करून ठेवते - " उत्तर आलं...पावसाळा येणार त्याची अशी आगमनाची वार्ता घरोघरी होणाऱ्या पापड लोणच्यांनी येते. तशीच लगबग सर्वत्र दिसते.

छत्र्या दुरुस्तीला निघतात, गच्चीवर गळती थांबवण्याचे लेप दिले जातात, बाजारात छत्र्या रेनकोटची रेलचेल होते, विक्सच्या जाहिराती वाढतात, शेतकरी शेतं नांगरून आभाळाकडे नजर लावून बसतात...!
पावसाची नऊ नक्षत्रं कोरडी गेली तर ग्रीष्माची अनिर्बंध सत्ताच ! एरवी ग्रीष्माने भाजून काढलेल्या जमीन, झाडवेली, पशुपक्षी यांना दिलासा देते ती वर्षाराणीच...

मृगाच्या रथात बसून बिजलीचा चाबूक घेऊन, नभांच्या मेघगर्जनेच्या तुताऱ्या फुकत तिचं दिमाखदार आगमन होतं. साऱ्या आसमंतात मृद्गंधाचं अत्तर उधळलं जाऊन सारं वातावरण कसं सुगंधी होतं. मरगळलेले वृक्ष वेली अंग झटकुन चैतन्यानं फुलू लागतात, आनंदान डोलू लागतात.

कोरड पडलेल्या नद्या, ओढे, तळी, धरणे पाणी पिऊन आनंदीत होतात. अगोदरच तयार करून ठेवलेल्या घरट्यात पक्षी विसावतात. दाणागोटाही अगोदरच साठवलेला असतो म्हणून हळूच डोकावून वर्षाराणीचं वैभव निःशब्दपणे कौतुकाने बघतात.


मुंग्याही वारुळाचा आश्रय घेतात. हिरवा शालू नेसून काळ्या मेघांचं काजळकुंकू करून तर जास्तच गोड दिसते. घरांच्या छपरावर होणारी टप टप् कृषिराजाला मधुर स्वर वाटू लागतात.
शहरातून वाहतूक विस्कळीत होते. क्वचित वीज जाऊन अंधारात जग बुडून जाते. “ ये रे ये रे पावसा..." म्हणत मुलं नाचतात. कागदी नौदल प्रमुख होऊन आईचा मार खातात...कुणी रसिक गरम गरम चहाचे घुटके घेत उबदार पांघरूण घेऊन झक्कपैकी कादंबरी वाचत पडतो...

सारी सृष्टी बेहोष होते. बेभान, धुंद होते. तशीच बेहोषी भाविकांनाही येते. नामसंकीर्तनात दंग होऊन त्यांची "पाऊले चालती पंढरीची वाट ! " चंद्रभागेच्या तीरी जल्लोष होतो. टाळ मृदुंग आकाश दणाणून सोडतात.
...पण हीच वर्षाराणी रुसली तर तोंडचं पाणी पळवते. डोळ्यात पाणी आणते. देवाला गाभाऱ्यात कोंडलं जातं, एवढेच काय गाढवागाढवीचं लग्नही लावलं जातं. कृषिराजा भिकारी होतो. गायवासरे कसायांची धन होते.

पाणी...वेळच्या वेळी, हवा तेवढाच पाऊस पडला तर सर्व धरित्री सुजलां सुफलां होते. तीन महिन्यांत वर्षाची बेगमी होते म्हणूनच का तिला वर्षा 'राणी म्हणत असतील."

Maza avadata rutu essay in marathi language | माझा आवडता ऋतू मराठी निबंध

मी पाहिलेला क्रिकेटचा सामना मराठी निबंध | mi pahilela cricket samna essay in marathi

निबंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी पाहिलेला क्रिकेटचा सामना मराठी निबंध बघणार आहोत. क्रिकेटचे आणि भारताचे एक निराळेच नाते आहे.  हॉकी राष्‍ट्रीय खेळ असल्‍यावरही गल्‍ली बोळामधेही आपल्‍याला क्रिकेटचे सामने आपल्‍याला दिसुन येतील. क्रिकेटचे भारतात असलेले वेड  आणि खेळाडुंची क्रिकेटला जिव की प्राण म्हणुन खेळण्याची तळमळ आपल्याला खालील ४ निबंधामधुन दिसुन येईल चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.  


माझा अविस्मरणीय सामना : यंदा 'महाविद्यालयीन ट्रॉफी जिंकून आणायचीच. अशी प्रतिज्ञा आमच्या मुंबई कॉलेज संघाने केली होती. त्यासाठी गेले सहा महिने रात्रंदिवस सराव चालू होता. मागील  वेळेस  हातातोंडाशी आलेली ट्रॉफी शेवटच्या बॉलवर घालवावी लागली होती. आता कोणतीही कसर सोडायची नाही अन् कसूरही करायची नाही असा निश्चय केला होता सर्व खेळाडूंनी...

सामने सुरू झाले, अन् आमचा सामना अंतिम डावापर्यंत तरी कोणतीही अडचण न येता पोहोचला. आता खरा कसोटीचा क्षण होता. आमच्याबरोबर खेळणारा संघही काही कमी नव्हता. त्याची ही तयारी उत्तम होती. 'ट्रॉफी' जिंकण्यासाठी त्यांनीही जिद्दीने खेळ सुरू केला होता. तोडीस तोड - धावांबरोबर धावा - खेळ कसा अटीतटीचा चालला होता. (हे पण वाचा मी पाहिलेला चुरशीचा सामना निबंध)

दोनवेळा सामना अनिर्णित राहिला. अर्थात त्यामुळे विश्रांतीचा दिवसही रद्द करून सामना चालू ठेवायचा आणि त्यातून निर्णय घ्यायचा असे ठरले. वादावादी, गाजावाजाही वाढत होताच. आणि अखेरीस तो दिवस उजाडला. स्टेडियम माणसांनी कसे फुलून गेले होते. अशा सामन्यातून आंतरराष्ट्रीय संघांची निवड होणार असते. देशभरातून अनेक क्रिकेट शौकिनांनी आज भाऊगर्दी केली होती.

एखादा चौकार असो किंवा षटकार सारा स्टेडियम टाळ्यांच्या गजराने दुमदुमून निघत होता. एखादा झेल सुटला तरी सगळीकडे निराशेचा सुस्कारा ऐकू येत होता. इकडे विरुद्ध संघही बचावाचा खेळ खेळत होता. त्यामुळे खेळात तसा रंग चढत नव्हता. विकेट तर आमच्या गोलंदाजांनाच अनुकूल होती. परंतु नावाजलेल्या गोलंदाजांची गोलंदाजीही आज मूग गिळून बसली होती. 

मैदानाच्या दिशेने आता प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्या, फळांच्या साली, कागदांचे बोळे यायला लागले. अखेरीस दिवस संपेपर्यंत विरुद्ध संघ कसाबसा संपूर्ण आटोपला तेव्हा त्याच्या २१० धावा झाल्या होत्या.

दुसरा दिवस उजाडला तो आमच्या संघाच्या धडाडीच्या खेळानेच. चौकारांच्या दणक्याने कांबळीने सर्वांना खूश करून सोडले. तर सरदेसाईची त्याला साथ आणि चोरट्या धावा यामुळे आमचा संघ धावसंख्या वाढवीत होता. अखेरीस ३०४ धावांवर आमचा संघ बाद झाला अन् ९४ धावांनी आघाडी मिळवली. दुसऱ्या डावात विरुद्ध संघानेही धावांचा डोंगर रचायला सुरुवात केली.

पहिल्या आघाडीच्या पाच खेळाडूंनी जणू चंगच बांधला होता. एकही बॉल, बॅटला स्पर्श केल्याशिवाय जातच नव्हता. ९४ धावांची आघाडी पार करून त्यांनी पुढे जोराचा पवित्रा घेतला आणि अखेरचा गडी बाद होईपर्यंत आमच्यावर १९९ धावांची आघाडी मिळविली.

mi-pahilela-cricket-samna-essay-in-marathi
mi-pahilela-cricket-samna-essay-in-marathi


आमच्या संघाला वाटले, ही धावसंख्या आपण सहज पार करू. परंतु पहिले तीन खेळाडू जेमतेम ४०-४५ धावा करून तंबूत परतले. सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. इकडे विरुद्ध पक्षाला 'चिअरअप' जोरात सुरू झाला आणि आमच्यावर दबाव वाढला.

नशिबाने साथ दिली. अन् पुढील दोन खेळाडूंनी दमदार खेळ सुरू करून धावसंख्या १५० पर्यंत नेली. पुन्हा एकापाठोपाठ पाच गडी बाद झाले. आता धावसंख्या पार करण्यासाठी ५० धावांची गरज होती. नववा गडी म्हणून मी तंबूतून बाहेर पडलो. खरा मी गोलंदाज, आता बॅट कशी साथ देते तेच पाहायचे होते. कॅप्टनने मला धीर दिला. माझी पाठ थोपटली. मी मैदानावर आलो. बॅटला बॉल लागला आणि समोरच्या खेळाडूच्या मदतीने धावा सुरू केल्या.

 दोघांनी मिळून ४३ धावा केल्या. तेवढ्यात समोरचा गडी बाद झाला. पुन्हा टेन्शन वाढले. पाहिजे होत्या फक्त ७ धावा. आता दहाव्या खेळाडूला धीर देण्याची वेळ माझी होती. तो दबकत दबकत खेळत होता. चोरटी एखाद्-दुसरी धाव काढत होता. एक चेंडू आला अन माझ्याकडून दणदणीत चौकार मारला गेला अन् स्टेडियम दणाणून गेले. कप्तानासह सर्व खेळाडुंनी मैदानाकडे धाव ठोकली. मला व माझ्या जोडीदार खेळाडूला उचलून घेतले.

गौरवाने तंबूत आणले, जणू काही मीच एकटा यशाचा मानकरी होतो. आमच्या संघाने ट्रॉफी जिंकली होती. ट्रॉफी घेतानाही आमचा सर्व संघ उपस्थित होता. ट्रॉफी डोक्यावर घेऊन नाचत होता. असा हा माझा क्रिकेटचा सामना माझ्या जीवनातील अविस्मरणीय सामना ठरला. (100 हुन अधिक निबंध वाचा तुमच्‍या मोबाईलवर  )

मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला  हे  तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद .

निबंध 2

 एक रंगलेला क्रिकेटचा सामना


आमच्या वसाहतीच्या जवळच एक मोठे मैदान आहे. तेथे आम्ही नेहमी क्रिकेट खेळतो. एके दिवशी मोठ्या माणसांचा क्रिकेटचा सामना घ्यायचे ठरले. माझे बाबासुद्धा त्यात सामील झाले. 'संघ अ' आणि 'संघ ब' असे दोन संघ तयार करण्यात आले. आमच्या वसाहतीतील सर्व घरांत ही बातमी पसरली. सर्वांना उत्सुकता वाटत होती.

मग सामन्याचा दिवस उगवला. दोन्ही संघ मैदानात उतरले. वसाहतीत सर्व लोक सामना पाहण्यासाठी जमले होते. काहीजण खिडकीतून पाहत होते. सामना सुरू झाला. काहीजण खरोखरच छान खेळले. 'अ' संघातल्या चित्रेकाकांनी ५० धावा काढल्या, तर 'ब' संघातल्या मूर्तीकाकांनी सहा गडी बाद केले. बोंद्रेकाका खूप जाडे आहेत. त्यामुळे धावताना ते मजेशीर दिसत होते.

एकदा धावताना ते पडले. तेव्हा सगळे हसून हसून बेजार झाले. स्वत: बोंद्रेकाकासुद्धा हसत होते. अखेरीस ‘संघ अ' विजयी झाला. सगळ्यांनी एकमेकांचे अभिनंदन केले. त्यानंतर सगळ्यांना खाऊ वाटण्यात आला. त्या दिवशी सर्वजण खेळातील आठवणी काढून गप्पा मारत होते. त्या दिवशी खूप मजा आली.

 महत्‍वाचे मुद्दे :

  • आम्ही मुले नेहमीच खेळतो 
  • एके दिवशी मोठ्या माणसांचा सामना 
  • काहीजण चांगले खेळले 
  • काही गमती 
  • आनंदाचे वातावरण.

निबंध  3

मी पाहिलेला क्रिकेटचा सामना 


भारतीय संघ बांग्लादेशात खेळायला निघाला होता. कोण जाणार, कोण नाही याची चर्चा होऊन शेवटी संघ रवाना झाला. एकदिवसीय चार सामने आणि दोन कसोटी सामने खेळले जाणार होते. सुरुवात तर चांगली झाली. एकदिवसीय चारही सामने भारतीय संघाने जिंकले.

पण यात विशेष आवडला तो दुसरा कसोटी सामना. कारण, या सामन्यामुळे विश्वचषक सामन्यात लागलेला कलंक पुसला गेला. बांगलादेशच्या याच संघाने आमच्या सर्व वीरांना चारी मुंड्या चित केले होते. त्याच संघावर  आमच्या क्रिकेट वीरांनी नेत्रदीपक विजय मिळवला.


असा हा सामना बांग्लादेशातील ढाका येथील शेरेबांगला स्टेडियमवर झाला. प्रथमच नाणेफेक जिंकून भारतीय संघाने फलंदाजी स्वीकारली. सुरुवातीलाच आपल्या खेळाडूंना सूर सापडला आणि भारतीय फलंदाजांनी बांग्लादेशच्या वेगवान व फिरकी गोलंदाजीचे पार खोबरे करून टाकले. एकापाठोपाठ एक अशा पाच फलंदाजांनी आपली शतके झळकावली.

सचिन व सौरभ यांनी आधीचा लागलेला डाग पुसून टीकाकारांची बोलती बंद केली. सहाशे दहा धावांचा डोंगर रचून भारतीय संघाने आपला डाव सोडला आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याला, बांग्लादेशला, खेळाची संधी दिली.
भारताच्या झहीर खानच्या तुफानी गोलंदाजीपुढे बांग्लादेशचा अर्धा संघ बाद झाला. उरल्यासुरल्या फलंदाजांना अनिल कुंबळेने तंबूत पाठवले.

चारशे धावांचे ओझे घेऊन फालोऑन स्वीकारून बांगलादेश दुसरा डाव खेळायला मैदानात उतरला. आता पाऊसच त्यांना वाचवू शकणार होता. पण त्या दिवशी तोही त्यांच्यावर फिदा नव्हता. या डावात बांगलादेशच्या खालेद मासूद, अश्रफूल आणि मोर्तझा यांनी अटीतटीची झुंज दिली. पण भारतीय खेळाडू आता पेटून उठले होते. अगदी सचिनने गोलंदाजीतही आपली करामत दाखवली आणि दोन गडी टिपले. भारताने बांग्लादेशचा १ डाव आणि २३९ धावांनी दणदणीत पराभव केला.

या यशाने भारताने जणू दाखवून दिले, 'हम भी कुछ कम नही !' आता आपल्या लाडक्या खेळाडूंवर टीका करणाऱ्यांची तोंडे बंद झाली, याचा मला विशेष आनंद झाला.

महत्‍वाचे मुद्दे :
  • विश्वचषक सामन्यात आलेले अपयश 
  • त्यामुळे निंदानालस्ती
  • मन दुखावले 
  • बांग्लादेशात सामने 
  • फलंदाजीतील पराक्रम 
  • गोलंदाजीतील विक्रम
  • मिळालेले यश
  • यशाचा परिणाम. 

निबंध 4


मी पाहिलेला चुरशीचा सामना 

इंग्लंडमध्ये विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामने चालले होते. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया या संघांत उपांत्य सामना होणार होता. हा मी पाहिलेला अत्यंत चुरशीचा सामना होता. सामन्याचा दिवस उजाडला. मी खादयपेये घेऊन स्टेडियमवर गेलो. ठीक वेळेवर दोन पंच आणि दोन्ही संघांचे कप्तान मैदानावर आले. नाणेफेक झाली.

त्यात दक्षिण आफ्रिकेच्या कप्तानाने हॅन्सी क्रॉनिएने बाजी मारली. मैदानाचा रागरंग पाहून त्याने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. थोड्याच वेळात ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर अॅडम गिलख्रिस्ट आणि मार्क वॉ फलंदाजीसाठी मैदानात उतरले, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला. कप्तानाने चेंडू शॉन पोलॉक याच्या हातात दिला.

आता साऱ्या प्रेक्षकांनी आपले श्वास रोखून धरले होते. जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपल्या खेळाची सुरवात मोठ्या सावधपणे केली. खेळ थोडा धीमा वाटत होता. प्रेक्षक धावांच्या आतषबाजीसाठी आतुर होते; पण फलंदाज फारच जबाबदारीने खेळत होते.

नियोजित पन्नास षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाने आपल्या नावावर २१३ धावा झळकावल्या. चाळीस मिनिटांची विश्रांती सुरू झाली. क्रीडांगणावर खेळाडू नव्हते, प्रेक्षक जरा सैलावले होते. बरोबर आणलेल्या खादयवस्तूंचा समाचार घेणे सुरू झाले. पण कोठेही कागद फेकाफेकी नव्हती. विश्रांतीचा काळ संपला; पण कोठेही अस्वच्छतेचा अंशही नव्हता.

थोड्याच वेळात दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर मैदानावर फलंदाजीसाठी उतरले. ऑस्ट्रेलियाचा संघही क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला. दक्षिण आफ्रिकेला सामना जिकण्यासाठी २१४ धावा करायच्या होत्या. सुरवात चांगली झाली. धावफलकावर दक्षिण आफ्रिकेच्या नावावर बिनबाद ४६ धावा लागल्या. जॉन्टी होडस व लान्स क्लसनर यांनी वेगाने फलंदाजी केली.

धावफलकावर ७ गडी बाद २०० धावा लागल्या. आता फक्त १४ धावा करायच्या होत्या. बहुतेक हेच दोन्ही खेळाडु सामना जिंकून देतील, असे वाटत असतानाच जॉन्टी बाद झाला. सारे प्रेक्षक हळहळले. जमलेली जोडी फुटली होती. नंतर आलेला शॉन पोलॉक शून्यावर बाद झाला. आता चुटपूट लागली, दक्षिण आफ्रिका सामना गमावणार की काय? पण अखेरच्या षटकात क्लुसनरने तीन चौकार मारले.

 आता फक्त दोनच धावा हव्या होत्या; पण शेवटचा फक्त एकच गडी बाकी होता. कशीबशी एक धाव मिळाली. आता एक धाव काढली की विजय दक्षिण आफ्रिकेचा होणार होता. सारे प्रेक्षक नि:स्तब्ध होते आणि दुर्दैव म्हणजे, डोनॉल्ड धावचीत झाला. दोन्ही संघांची धावसंख्या सारखीच झाली, २१३ ! मॅच 'टाय' झाली होती.
मग विजय कोणाचा? सारे वातावरण संभ्रमित होते. पंच निर्णय काय देणार?

 सर्व अधिकाऱ्यांच्या विचारविनिमयानंतर निर्णय जाहीर झाला. साखळी सामन्यांत पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर मात केलेली असल्यामुळे 'ऑस्ट्रेलिया'चा संघ विजयी ठरला. दक्षिण आफ्रिकेचा संघ या रोमहर्षक सामन्यात पराभूत झाला होता. 'क्रिकेट इज ए गेम ऑफ चान्स' म्हणतात ते यासाठीच! आजवर मी अनेक सामने पाहिले; पण अखेरच्या क्षणापर्यंत उत्सुकता टिकवून धरणारा असा रंगतदार सामना मी यापूर्वी कधीच पाहिला नव्हता.

महत्‍वाचे मुद्दे :
  • सामना कोठे व कोणत्या खेळाचा 
  • संघ 
  • सामन्याचे वर्णन 
  • सामना आवडल्याची कारणे 
  • अविस्मरणीय घटना 
  • सामना पाहून आल्यावर मनात आलेले विचार...

निबंध 5

मी पाहिलेला एक क्रिकेटचा सामना (क्रिकेट मॅच)


 एकदा मी एक विलक्षण अद्भुत आणि लोकविलक्षण असा क्रिकेटचा सामना पाहिला दोन संघ दंड थोपटून एकमेंकाविरुद्ध लढायला रणांगणात उतरले होते. संघात ११ खेळाडू लागतात हा नियम त्यांना ठाऊक नसावा किंवा मान्य नसावा. एका संघात ५ खेळाडू आणि दुसऱ्या संघात ६ खेळाडू असे ते संघ होते. चला ११ चा आकडा तर जुळला. त्यांच्याजवळ २ बॅटी होत्या. पण स्टंप तीनच होते.


१ स्टंप गोलंदाजाच्या बाजूला ठोकला आणि उरलेले दोन फलंदाजाच्या बाजूला ठोकले. दोन स्टंपांच्या मध्ये चांगले दोन वितीचं अंतर ठेवलं होतं. इथे "ठोकणं' हे क्रियापद चपखल बसतंय. कारण स्टंपच्या टोकाच्या पत्र्यांच्या टोप्या नाहीशा झाल्या होत्या. तेव्हा ते स्टंपस नीट बसत नव्हते. सारखे ठोकावे लागत होते. मला वाटतं सामन्याचा अर्धा वेळ स्टंपस् ठोकण्यातच जात होता. 


वास्तविक ते टेनिस - बॉलने खेळत होते, तरी सुध्दा फलंदाजांनी आणि यष्टिरक्षकाने पॅडस बांधले होते. त्यांच्या पॅडसचं गोलदांजाला वैषम्य वाटलं म्हणून त्याने पण आपल्या एका पायाला पॅड बांधला. गोलंदाज पायाला पॅड बांधत नाही हा नियम एकाने त्याच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्याने पॅड नाराजीने काढला.


अंपायर क्रिकेटच्या बाबतीत अगदी अनभिज्ञ होता. आपण इथे उभे राहून नेमकी कोणती कामगिरी पार पाडायची याची त्याला कल्पना नव्हती. सामना सुरू झाला. गोलंदाज चेंडू टाकायला लागला. सहा चेंडू झाले, सात झाले, आठ झाले, तरी अंपायर ओव्हर देईचना. 


तेव्हा गोलंदाजी करायला अगदी अधीर झालेला दुसरा खेळाडू ओरडला, "अरे, ओव्हर दे ना ! पंचानी शांतपणे विचारले, ओव्हर; म्हणजे काय असतं ते ?" अरे सहा चेंडू झाले की ओरडायचं "ओव्हर !" अच्छा! अंपायरने ते गणित समजावून घेतलं, दुसरं षटक बरोबर सहा चेंडूचं झालं. मगच तो खेळाडू दुसरं षटक टाकायला आला. 

त्याचे ४ चेंडू टाकून झाल्यावर अंपायर ओरडला "ओव्हर." "अरे, चारच चेंडू झाले. ओव्हर कशी देतोस," पण अंपायर गणितात कच्चा होता तो बोलला." मग आता तू आठ चेंडू नाही का टाकलेस ? या षटकात ते दोन जादा चेंडू वळते करून घेतले" थोडी बाचाबाची झाली आणि खेळ पुढे सुरू झाला.


एका गोलंदाजाने टीव्हीवर पाहिलं होतं की, गोलंदाज चेंडूला थुंकी  लावतो. या गोलंदाजाने चेंडूला एवढी थुंकी  लावली की चेंडू थुंकी  भिजला. या कारणाने चेंडू बदलावा लागला.  एक खेळाडू सरळ मध्ये येऊन खेळत होता.


त्याच्या पायाला बॉल लागल्यावर सारे क्षेत्ररक्षक ओरडले, "हाऊस टॅट !" अंपायर गोंधळला "आऊट कसा' ती दांडी कुठे पडलीय. "अरे, बॉल पायाला लागला की आऊट असतो. एल.बी.डब्लू. अंपायरने ते लक्षात ठेवलं. थोड्या वेळाने रन घेण्यासाठी म्हणून धावत असणाऱ्या खेळाडूच्या पायाला बॉल लागतो; 


अंपायर ओरडला "आऊट" एल.बी.डब्लू ! त्या बलदंडाने निकाल दिल्यानंतर त्याच्याशी वाद घालण्यात अर्थ नव्हता. धावत असलेला खेळाडू मुकाट्याने तंबूत परतला.


खेळापेक्षा अंपायरचे एकेक निकालच प्रेक्षकांचं जास्त मनोरंजन करीत होते. एक खेळाडू खप वेळ खेळत होता आणि चांगला खेळत होता. त्याने एक चौका मारला. अंपायर ओरडला, "आऊट!" अरे आऊट कसा ? "त्याचं काय आहे, हा एकटाच कितीतरी वेळ खेळतोय; दुसऱ्यांना खेळू दे ना आता." सगळ्यांनी कपाळावर हात मारून घेतला.



गडी बाद झाले ते सर्व झेल बाद आणि पायचित; बोल्ड एकही नाही. कारण दोन स्टंप्स मध्ये एवढं अंतर होतं की चेंडू स्टंपच्या मधूनच जायचा नेहमी. स्टंपला कसला लागतो; आणि अंपायर आपल्या विचारावर ठाम होता. दांडी पडल्याशिवाय आऊट द्यायचं नाही. करता करता सारे बाद झाले. एका संघाची पाळी संपली. 


मग चौकशी सुरू झाली "स्कोअर किती झाला ?" स्कोअर किती झाला ? जो तो विचारू लागला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की स्कोअरर नेमायचा राहिला होता. मग माझे किती, तुझे किती ? असं करून काय तरी एक संख्या ठरविण्यात आली. स्कोअरचं प्रकरण एकदाचं संपलं. पण दुसरंच प्रकरण सुरू झालं. अंपायर विचार करायला लागला, 


"मी केव्हा खेळायचं," अरे अंपायर काय खेळत नाय; तो नुसता उभा असतो. "अंपायर महाशय भडकले, मला खेळायला मिळणार नाही हे आधी का नाही सांगितलंत? मी अंपायर झालोच नसतो." लाथ मारून त्याने स्टंप उडवून दिला आणि तोंडाने शिव्या पुटपुटत तो चालता झाला. पंच गेले - म्हणजे पंचाईत झाली. पंचापाठोपाठ मी पण जाणार होतो. कारण सामना बघण्याची माझीही सहनशक्ती संपुष्टात आली होती. पण म्हटलं, 



त्यांचे खेळाडू कसे खेळतात जरा बघू या. थोडा वेळ खेळ व्यवस्थित चालला. पण मग कशावरून तरी वादावादी सुरू झाली. पहिल्याने हातवारे, मग गुद्दे अखेर कोणी स्टंप उपटून दुसऱ्यांच्या अंगावर धावले, कोणी बॅटी उगारल्या. समर प्रसंगच निर्माण झाला. 


निकाल काय लागतो ते बघायाला थांबलो. पण सामन्याचा एकंदरीत निकालच लागला, त्याच्या नंतर मी खूप सामने पाहिले, त्याच्या पुढेही पाहीन; पण हा सामना कधीही विसरणार नाही. कारण या सामन्याची स्मृती माझ्या मनात स्टंपसारखी घट्ट ठोकली गेलीय.

निबंध 6

मी पाहिलेला क्रिकेटचा सामना मराठी निबंध | mi pahilela cricket samna essay in marathi


क्रिकेट मॅच) एकदा मी एक विलक्षण अदभुत आणि लोकविलक्षण असा क्रिकेटचा सामना पाहिला दोन संघ दंड थोपटून एकमेंकाविरुद्ध लढायला रणांगणात उतरले होते. संघात ११ खेळाडू लागतात हा नियम त्यांना ठाऊक नसावा किंवा मान्य नसावा. 

एका संघात ५ खेळाडू आणि दुसऱ्या संघात ६ खेळाडू असे ते संघ होते. चला ११ चा आकडा तर जुळला. त्यांच्याजवळ २ बॅटी होत्या. पण स्टंप तीनच होते. १ स्टंप गोलंदाजाच्या बाजूला ठोकला आणि उरलेले दोन फलंदाजाच्या बाजूला ठोकले. 


दोन स्टंपांच्या मध्ये चांगले दोन वितीचं अंतर ठेवलं होतं. इथे "ठोकणं" हे क्रियापद चपखल बसतंय. कारण स्टंपच्या टोकाच्या पत्र्यांच्या टोप्या नाहीशा झाल्या होत्या. तेव्हा ते स्टंपस नीट बसत नव्हते. सारखे ठोकावे लागत होते. मला वाटतं सामन्याचा अर्धा वेळ स्टंपस् ठोकण्यातच जात होता.


वास्तविक ते टेनिस बॉलने खेळत होते, तरी सुध्दा फलंदाजांनी आणि यष्टिरक्षकाने पॅडस् बांधले होते. त्यांच्या पॅडस्चं गोलदांजाला वैषम्य वाटलं म्हणून त्याने पण आपल्या एका पायाला पॅड बांधला. गोलंदाज पायाला पॅड बांधत नाही हा नियम एकाने त्याच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्याने पॅड नाराजीने काढला.


अंपायर क्रिकेटच्या बाबतीत अगदी अनभिज्ञ होता. आपण इथे उभे राहून नेमकी कोणती कामगिरी पार पाडायची याची त्याला कल्पना नव्हती. सामना सुरू झाला. गोलंदाज चेंडू टाकायला लागला. सहा चेंडू झाले, सात झाले, आठ झाले, तरी अंपायर ओव्हर देईचना. 


तेव्हा गोलंदाजी करायला अगदी अधीर झालेला दुसरा खेळाडू ओरडला, "अरे, ओव्हर दे ना ! पंचानी शांतपणे विचारले, ओव्हर; म्हणजे काय असतं ते ?" अरे सहा चेंडू झाले की ओरडायचं "ओव्हर !" अच्छा! अंपायरने ते गणित समजावून घेतलं, दुसरं षटक बरोबर सहा चेंडूचं झालं. 


मगच तो खेळाडू दुसरं षटक टाकायला आला. त्याचे ४ चेंडू टाकून झाल्यावर अंपायर ओरडला "ओव्हर." "अरे, चारच चेंडू झाले. ओव्हर कशी देतोस, पण अंपायर गणितात कच्चा होता तो बोलला." मग आता तू आठ चेंडू नाही का टाकलेस? या षटकात ते दोन जादा चेंडू वळते करून घेतले" थोडी बाचाबाची झाली आणि खेळ पुढे सुरू झाला.


एका गोलंदाजाने टीव्हीवर पाहिलं होतं की, गोलंदाज चेंडूला थुकी लावतो. या गोलंदाजाने चेंडूला एवढी थुकी लावली की चेंडू थुकीने भिजला. या कारणाने चेंडू बदलावा लागला.



एक खेळाडू सरळ मध्ये येऊन खेळत होता. त्याच्या पायाला बॉल लागल्यावर सारे क्षेत्ररक्षक ओरडले, "हाऊस टॅट!" अंपायर गोंधळला "आऊट कसा" ती दांडी कुठे पडलीय. "अरे, बॉल पायाला लागला की आऊट असतो. एल.बी.डब्लू. अंपायरने ते लक्षात ठेवलं. 


थोड्या वेळाने रन घेण्यासाठी म्हणून धावत असणाऱ्या खेळाडूच्या पायाला बॉल लागतो; अंपायर ओरडला "आऊट" एल.बी.डब्लू ! त्या बलदंडाने निकाल दिल्यानंतर त्याच्याशी वाद घालण्यात अर्थ नव्हता. धावत असलेला खेळाडू मुकाट्याने तंबूत परतला.


खेळापेक्षा अंपायरचे एकेक निकालच प्रेक्षकांचं जास्त मनोरंजन करीत होते. एक खेळाडू खूप वेळ खेळत होता आणि चांगला खेळत होता. त्याने एक चौका मारला. अंपायर ओरडला, "आऊट!'' अरे आऊट कसा ? "त्याचं काय आहे, हा एकटाच कितीतरी वेळ खेळतोय; दुसऱ्यांना खेळू दे ना आता." सगळ्यांनी कपाळावर हात मारून घेतला.


गडी बाद झाले ते सर्व झेल बाद आणि पायचित; बोल्ड एकही नाही. कारण दोन स्टंप्स मध्ये एवढं अंतर होतं की चेंडू स्टंपच्या मधूनच जायचा नेहमी. स्टंपला कसला लागतो; आणि अंपायर आपल्या विचारावर ठाम होता. दांडी पडल्याशिवाय आऊट द्यायचं नाही. करता करता सारे बाद झाले. 


एका संघाची पाळी संपली. मग चौकशी सुरू झाली “स्कोअर किती झाला ?" स्कोअर किती झाला ? जो तो विचारू लागला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की स्कोअरर नेमायचा राहिला होता. मग माझे किती, तुझे किती ? असं करून काय तरी एक संख्या ठरविण्यात आली. 


स्कोअरचं प्रकरण एकदाचं संपलं. पण दुसरंच प्रकरण सुरू झालं. अंपायर विचार करायला लागला, "मी केव्हा खेळायचं," अरे अंपायर काय खेळत नाय; तो नुसता उभा असतो.''अंपायर महाशय भडकले, मला खेळायला मिळणार नाही हे आधी का नाही सांगितलंत? मी अंपायर झालोच नसतो.


" लाथ मारून त्याने स्टंप उडवून दिला आणि तोंडाने शिव्या पुटपुटत तो चालता झाला. पंच गेले - म्हणजे पंचाईत झाली. पंचापाठोपाठ मी पण जाणार होतो. कारण सामना बघण्याची माझीही सहनशक्ती संपुष्टात आली होती. पण म्हटलं, त्यांचे खेळाडू कसे खेळतात जरा बघू या. थोडा वेळ खेळ व्यवस्थित चालला. 



पण मग कशावरून तरी वादावादी सुरू झाली. पहिल्याने हातवारे, मग गुद्दे अखेर कोणी स्टंप उपटून दुसऱ्यांच्या अंगावर धावले, कोणी बॅटी उगारल्या. समर प्रसंगच निर्माण झाला. निकाल काय लागतो ते बघायाला थांबलो. पण सामन्याचा एकंदरीत निकालच लागला, त्याच्या नंतर मी खूप सामने पाहिले, त्याच्या पुढेही पाहीन; पण हा सामना कधीही विसरणार नाही. कारण या सामन्याची स्मृती माझ्या मनात स्टंपसारखी घट्ट ठोकली गेलीय.


क्रिकेटची फारशी माहिती नसलेला एक नवखा गोलंदाज, पहिल्यानेच गोलंदाजी करायला आला. अंपायरने त्याला विचारलं, Are you bowling over the wicket or round the wicket ?' त्या नवख्या गोलंदाजाने उत्तर दिले. No, No! I am bowling at the wicket.


असाच एक नवखा खेळाडू खेळायला आला. जलदगती गोलंदाजाचा चेंडू त्याच्या पायावर एवढ्या जोरात लागला की तो विव्हळून खाली बसला. जरा पाय चेपलान, झटकलान् आणि पुन्हा खेळायला उभा राहिला. पंचांनी त्याला विचारलं; Can you walk ?' खेळाडू उद्गारला - Oh yes ! Just see, I can walk' म्हणून त्याने चालून दाखवले. तेव्हा पंच त्याला म्हणाला, you can walk , no ? Then walk to the pavilion, you are out !'



5 निबंध मी पाहिलेला क्रिकेटचा सामना मराठी निबंध | mi pahilela cricket samna essay in marathi



mi pahilela apghat essay in marathi | मी पाहिलेला अपघात मराठी निबंंध



निबंंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी पाहिलेला अपघात मराठी निबंंध  बघणार आहोतया लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

मी पाहिलेला अपघात रोजच्याप्रमाणे सकाळी शाळेत जाण्यासाठी मी बाहेर पडलो होतो. माझ्याबरोबर माझा एक वर्गमित्र होता. रस्त्यावर नेहमीचीच वर्दळ होती. मित्राबरोबर मी गप्पा मारत चाललो असताना 'कर्रऽऽ' असा आवाज आमच्या कानी आला. बसचे ब्रेक लावल्याचा तो विलक्षण कर्कश आवाज होता. त्या राक्षसी आवाजाने माझ्या अंगाचा थरकाप उडाला.

mi-pahilela-apghat-essay-in-marathi
mi-pahilela-apghat-essay-in-marathi


मी चमकून समोर पाहिले तो एक दुमजली बस थडथडत उभी होती. रस्त्यावरचे लोक बसच्या दिशेने पळत होते. पाहता पाहता बघ्यांची अलोट गर्दी तेथे लोटली. बसमधील उतारू डोकावून बघत होते. मोठा अपघात झाला असणार अशी शंका माझ्या मनात आली. म्हणून मी त्या गर्दीत थोडे पुढे शिरण्याचा प्रयत्न केला.



लोकांच्या बोलण्यावरून मला समजले की, दोन छोट्या मुली बसखाली आल्या होत्या. मला आठवले की, दररोज या वेळी दोन छोट्या मुली आपल्या नर्सरी शाळेत जाण्यासाठी शाळेच्या बसची वाट पाहत उभ्या असत. त्यांचे ते हसरे, बोलके, निरागस चेहरे माझ्या डोळ्यांसमोरून तरळून गेले.

आज शाळेच्या बसच्या आधी आलेली ही बस त्यांचा घात करून बसली होती. गर्दी वाढत होती. त्या मुलींचे पालक ओक्साबोक्शी रडत होते. पोलीस गर्दी हटवण्याची पराकाष्ठा करत होते. शाळेला उशीर होईल म्हणून मी तेथून जड पावलांनी पुढे गेलो; पण ते दृश्य काही केल्या माझ्या डोळ्यांपुढून हलत नव्हते.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला  व अपघात कमी करण्‍यासाठी काय उपाय केले पाहीजे याविषयी  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंंध 2

मी पाहिलेला अपघात निबंध | Mi Pahilela Apghat Marathi Essay

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी पाहिलेला अपघात मराठी निबंध बघणार आहोत. वाहतुकीसाठी भारतात रस्ते फार लोकप्रिय आहेत. कारण अगदी लहान खेड्यापासून मोठ्या शहरापर्यंत सगळीकडे रस्ते आहेत. रस्त्यामुळे संपूर्ण देश जोडला गेला आहे. 


रस्त्याने जाणे येणे जसे सोयिस्कर आहे तसेच स्वस्तही. परंतु भारतात रस्त्यांची स्थिती फार वाईट आहे. पावसाळ्यात तर ती अधिकच धोकादायक व दयनीय होऊन जाते. रस्त्यांची देखभाल आणि विकास यात भारत फारच मागासलेला आहे. रस्त्यांवरील वाहतूक खूप वाढली आहे. परंतु त्यानुसार रस्त्यांचा विकास झालेला नाही. 


परिणामी आपले रस्ते रक्तरंजित आहेत. रोज शेकडो अपघात रस्त्यांवर होतात. त्यात भरपूर प्राणहानी व वित्तहानी होते. दरवर्षी अंदाजे ६०,००० लोकांचा रस्त्यांवरील अपघातात मृत्यू होतो. त्यापेक्षा किती तरी पटीने जास्त लोक जखमी व अपंग होतात. 


अमेरिकेच्या तुलनेत भारतात रस्त्यांवरील अपघातांत मरणारांची संख्या २५ पट जास्त आहे. रस्त्यांवर वाहुतकीचा पडणारा ताण दिवसेंदिवस वाढतच आहे. दरवर्षी अंदाजे ८.१० % रस्त्यांवरील वाहतुकीत वाढ होत आहे. 


१९५१ मध्ये भारतात ३ लाख मोटारी होत्या आता त्या ५४० लाख झाल्या आहेत. फक्त दिल्लीत ३ लाख वाहने असतील. वाहन-चालक वाहतुकीच्या नियमांचा भंग करतात. वाहन चांगल्या प्रकारे चालविता येत नसले तरी वाहन चालक परवाना दिला जातो. याच्याशी संबंधीत सर्व सरकारी कार्यालयांत सर्वात जास्त भ्रष्टाचार होतो.


एक अडचण ही पण आहे की येथील रस्त्यांवर अनेक प्रकारची वाहने चालतात. उदा. ट्रक, मोटारी, बस, ट्रॅक्टर, टेम्पो, स्कूटर, सायकली, बैलगाड्या, पादचारी, घोडे, गाढवे इ. यापैकी काही जलद काही मंद तर काही अगदी हळू गतीची आहेत. गावांत शहरांत बसमध्ये गर्दी असणे ही तर सामान्य गोष्ट आहे. 


खेड्यातील लोक बसच्या टपावर बसून प्रवास करतात. दोन चाकी वाहनांवर कधीकधी ४ जणांचे संपूर्ण कुटुंब प्रवास करते. परिणामी गंभीर स्वरूपाचे अपघात होतात आणि वाहतूक अधिकारी त्याकडे डोळे झाक करतात. वाहतुकीच्या नियमांचे नागरिकांकडून कडक पालन करवून घेत नाहीत. 


वास्तविक वाहतुकीच्या नियम पालनाचा समावेश शाळेच्या पाठ्यक्रमातच असला पाहिजे. म्हणजे बालपणापासूनच नियमपालनाची सवय लागते. रस्त्यावरून चालावे कसे? वाहने कशी चालवातीत? वाहतुकीचे नियम कोणते इत्यादींची माहिती होते.


रस्त्यांची स्थिती तर खराब आहेच पण त्याहीपेक्षा जास्त वाहनांची स्थिती वाईट आहे. ती जुनी व निरुपयोगी आहेत तरी त्यांचा वापर केला जातो. त्यांची वेळेवर दुरुस्ती केली जात नाही. योग्य निगा राखली जात नाही, ती खूप धूर सोडतात, ज्यामुळे प्रदूषण वाढते, व इतर वाहनाचालकांना रस्ता नीट दिसत नाही. 


एका सर्वेक्षणानुसार ५०% वाहने भारतीय रस्त्यांवर चालण्यास निरुपयोगी आहेत. अमर्याद बोजा लादल्यामुळे, प्रवाशांना चढविण्यामुळे रस्ते व वाहने लवकर खराब होतात. रेल्वेमार्गावर पुष्कळ ठिकाणी चौक असतात पण तिथे फाटकाची सोय नसते वा देखरेख करणारा रेल्वे कर्मचारी नसतो त्यामुळे असंख्य अपघात होतात.


या सर्व कारणांमुळे भारतातील रस्त्यांवरून प्रवास करणे खूपच धोकादायक झाले आहे. बस व ट्रक चालकांना सामान्यपणे दारूची, अमली पदार्थांची सवय असते. त्याचे सेवन करूनच ते वाहने चालवितात. शिवाय ते कमी शिकलेले व मागास जातीचे असतात. 


सतत १०/१२ तास वाहन चालवून थकून जातात. थकल्यावर नशा करणे त्यांची सवय होते. कच्च्या, खराब रस्त्यांवर त्यांचा वाहनावरील ताबा सुटतो आणि मग अपघात होतो. दुर्घटनेनंतर ते पळून जातात. कारण त्यांच्यात मानवता, दया, करुणा, सहकार्याची भावना नसते. शिवाय वाहनात प्रथमोपचाराची पेटी नसते. 


रस्त्याच्या जवळ दवाखाना, अॅम्ब्युलन्स, क्रेन आदींची सोय नसते. पोलिसांचा व्यवहारही असमाधानकारकच असतो. रस्त्यावरच कुठेही, कशीही वाहने उभी केली जातात. रस्त्याच्या बाजूला सार्वजनिक जागेवर दुकाने, वर्कशॉप, घरे, खानावळी असतात. त्यामुळे वाहतुकीत अडथळे येऊन अपघात होतात. 


सांडपाण्याच्या नाल्या उघड्या असतात. मेनहोलमधून घाण बाहेर येते. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडून वाहतुकीत अडथळे येतात. रस्त्यांवरील अपघातांना आळा बसावा म्हणून अल्पकालीन व दीर्घकालीन योजना बनवून त्या अमलात आणाव्यात. रस्त्यांची सुरक्षितता हा विषय शालेय अभ्यासक्रमात असावा. 


रस्त्यांमध्ये वाढ करावी, नवे रस्ते बांधावेत, जुने दुरुस्त करावेत, त्यांची वरचेवर देखभाल करावी. वाहन चालकांना योग्य ते प्रशिक्षण दिले जावे. वेळोवेळी वाहन चालकांच्या परीक्षा घ्याव्यान. मंदगती वाहनांसाठी वेगळे रस्ते असावेत. वाहनांची गती, निगा, उपयुक्तता यांची तपासणी व्हावी. 


रस्ते व वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्यात यावी. परंतु त्यासाठी संबंधित अधिकारी प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ असले पाहिजेत. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद  या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता.


निबंंध 3

mi pahilela apghat essay in marathi | मी पाहिलेला अपघात मराठी निबंंध

मी ज्या बसस्टॉपवर उभा होतो, तो रस्ता खप गर्दीचा होता. संध्याकाळची वेळ होती. आजूबाजूच्या शाळा सुटल्या होत्या. मी देखील घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या फूटपाथवर बरेच विक्रेते आपला माल घेऊन बसले होते.


अचानक कर्कश आवाज आला व एक मारुती गाडी थांबली. त्या गाडीसमार एक विदयार्थी पडला होता. त्याचे दप्तर बाजूला पडले होते. त्याच्या डोक्याला खोक पडली होती आणि तो खूप घाबरलेला दिसत होता. क्षणात लोकांची गर्दी जमली होती; पण मदत करायला कोणी पुढे येत नव्हते.


सिग्नल पडला म्हणून हा विद्यार्थी रस्ता ओलांडायला पुढे आला आणि सिग्नल पडण्यापूर्वी आपण रस्ता ओलांडू, या विचाराने मारुती गाडीवाला पुढे आला अन् अपघात घडला. गाडीवाला त्या मुलाला डॉक्टरकडे न्यायला तयार होता. पण गर्दीतून कोणीही पुढे यायला तयार नव्हते. 


अशा वेळी मी त्याला म्हणालो, "चला, मी येतो तुमच्याबरोबर." अपघात झालेल्या त्या मुलाचे नाव होते सुदीप खरे. आम्ही सुदीपला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी त्याच्या जखमेवर औषधोपचार केले व त्याला कॉफी प्यायला दिली. आम्ही दोघांनी सुदीपला त्याच्या घरी पोहोचवले. 


त्या गाडीवाल्याने आपले कार्ड सुदीपच्या आईवडिलांना दिले व 'काही गरज वाटल्यास फोन करा' असे सांगन त्याने त्यांचा निरोप घेतला आणि मलाही माझ्या घरी सोडले. तेव्हा माझे आभार मानायला तो विसरला नाही.


अपघाताबद्दल माझ्या आईला सांगताना माझ्या मनात आले की, हा अपघात टाळता आला नसता का? याला जबाबदार कोण? मला असे वाटते की रहदारीसाठी सिग्नल असले. तरी लहान मुले आणि वृद्ध यांच्यासाठी, विशेषत: गर्दीच्या वेळी रहदारी नियंत्रक पोलीस हवाच.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


[शब्दार्थ : कर्कश आवाज- harsh sound. श भवा४. कठोर आवाज, तीव्र आवाज। रहदारी- traffic. सव२४१२. यातायात, आवागमन।]



mi pahilela apghat essay in marathi | मी पाहिलेला अपघात मराठी निबंंध